* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: ASHI MANE ASE NAMUNE
  • Availability : Available
  • ISBN : 9789386454751
  • Edition : 6
  • Publishing Year : JANUARY 1975
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 152
  • Language : MARATHI
  • Category : BIOGRAPHY & TRUE STORIES
  • Available in Combos :SHIVAJI SAWANT COMBO SET - 10 BOOKS
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
SHIVAJI SAWANT IS KNOWN FOR HIS FICTIONS BASED ON HISTORICAL & MYTHOLOGICAL CHARACTERS , BUT HE ALSO PORTRAITS REAL LIFE HERO’S WITH SAME INTENSITY . THE BOOK ‘ASHI MANE ASE NAMUNE’ IS GREAT EXAMPLE OF HIS UNDERSTANDING OF HUMAN CHARACTERS & THEIR PRESENTATION IN THE LITERARY FORM. HE WAS BORN IN A SMALL FARMER FAMILY OF AAJRA VILLAGE IN KOLHAPUR DISTRICT IN MAHARASHTRA. HE FINISHED HIS SCHOOL EDUCATION IN VYANKATRAO HIGH SCHOOL AJARA. HE WORKED WITH RAJARAM PRASHALA, KOLHAPUR AS A TEACHER FOR 20 YEARS. DURING THESE GLORIOUS YEARS OF HIS LIFE HE CAME ACROSS VARIOUS HUMOROUS PERSONALITIES, WE CAN MEET THEM IN THIS BOOK.
‘अशी मने असे नमुने’ हा शिवाजी सावंत यांच्या सिद्धहस्त लेखणीतून उतरलेला व्यक्तिचित्रसंग्रह आहे. आजरा हे त्यांचं मूळ गाव. या गावातील त्यांच्या स्मरणातील व्यक्तींचं व्यक्तिचित्रण त्यांनी या संग्रहातून केलं आहे. आधी त्या व्यक्तीचं बाह्य वर्णन, मग त्या व्यक्तीचा लेखकाशी असलेला संबंध, त्या व्यक्तीशी संबंधित काही प्रसंग, त्यात त्या व्यक्तीचं वेगळेपण किंवा खास वैशिष्ट्य दर्शवणारा एखादा प्रसंग आणि त्या व्यक्तीबाबतची सद्य: परिस्थिती अशा पद्धतीने ही व्यक्तिचित्रे साकारली आहेत. लेखकाचे बालमित्र कांत्या आणि शंकऱ्या, नाटकात शिवाजीची भूमिका करणारा गणपा, शाळेत शिपाई असलेला मामू, शिकारी असलेला नारायण पावणा, समाजसेवक असलेले काका गवंडळकर अशा विविधरंगी व्यक्ती या व्यक्तिचित्रसंग्रहातून भेटतात. तर या व्यक्तींना भेटण्यासाठी, वैशिष्ट्यपूर्ण भाषेसाठी आणि भावनांची आंदोलने अनुभवण्यासाठी प्रत्येकाने हा व्यक्तिचित्रसंग्रह नक्कीच वाचला पाहिजे.
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
#अशी मने असे नमुने #छावा #छावा #कांचनकण #कवडसे #मोरावळा #मृत्युंजय-नाटक #शेलका साज #युगंधर #ASHI MANE ASE NAMUNE #CHHAVA - NATAK #CHHAWA #KANCHANKAN #KAVADASE #MORAVALA #MRUTYUNJAY - NATAK #SHELKA SAJ #YUGANDHAR
Customer Reviews
  • Rating StarDAINIK SAMANA 01-07-2018

    तांबड्या मातीतली नमुनेदार माणसे... शिवाजी सावंत हे नाव उच्चारले की, ‘मृत्युंजय’कार हे शब्द आपोआपच आपल्या मनात येतात. महारथी कर्णावर ‘मृत्युंजय’, छत्रपती शंभूराजांवर ‘छावा’ आणि भगवान श्रीकृष्णावर ‘युगंधर’ अशा तीनच महाकादंबऱ्या शिवाजी रावांनी लिहिल्या पण त्या तीनही साहित्यकृतींनी त्यांना अमाप यश आणि वाचकांना भरभरून आनंद दिला. ‘मृत्युजंय’ची अनेक भाषांमध्ये भाषांतरे झाली. तर ‘मृत्युंजय’ आणि ‘छावा’ यांवर स्वत: शिवाजीरावांनीच नाटकेही लिहिली. २००२ साली वयाच्या ६२व्या वर्षी शिवाजीराव मरण पावले. म्हणजे आता त्यांना जाऊनही सोळा वर्षे उलटली. पण त्यांच्यावरील तीनही साहित्यकृतींची लोकप्रियता जराही उणावलेली नाही. प्रस्तुत ‘अशी मने असे नमुने’ हे पुस्तक मात्र कादंबरी नसून ललित व्यक्तिचित्रांचा संग्रह आहे. शिवाजीराव मूळचे कोल्हापूर जिल्ह्यातल्या आजरा या गावचे. त्यांचा जन्म आणि सगळी घडण आजरा गावच्या लाल मातीत झाली. महारथी कर्ण आणि भगवान श्रीकृष्ण रंगवताना शिवाजीराव अत्यंत मधूर अशी संस्कृतप्रचुर मराठी भाषा वापरतात. छत्रपती शंभूराजे उभे करताना ते शिवकालीन मराठी वापरतात. अभिजात अशी शब्दसंपत्ती आणि ओघवती शैली ही तर त्यांची वैशिष्ट्ये. तेच शिवाजी सावंत ही व्यक्तिचित्रे रंगवताना अस्सल लाल मातीतली भाषा वापरतात. घाट आणि कोकण यांच्या ऐन कण्यावर वसलेल्या आजरा गावच्या लाल मातीतला जिव्हाळा लेखकाच्या अंगी पार मुरून गेला आहे. कांत्या, गणपा, संतू, तातू अशी नमुनेदार व्यक्तिचित्रे काढताना लेखकाच्या शब्दकळेतून तोच जिव्हाळा ओसंडून आलेला दिसतो आणि तो इतका अस्सल, उमाळ्याने आलेला असतो की, वाचक ती व्यक्ती, ते वातावरण, ती भाषा आणि ते गाव यात पार गुंतून, रंगून जातो. ही व्यक्तिचित्रे प्रथम फुटकळ स्वरूपात वेगवेगळ्या नियतकालिकांत प्रसिद्ध झाली होती. प्रस्तावनेत लेखक आपल्याला सांगतो की, ‘खडकावरची म्हातारी’ हे व्यक्तिचित्र ‘मराठा’मध्ये प्रसिद्ध करण्यासाठी दिल्यावर ते वाचून खुद्द आचार्य अत्र्यांचे डोळे पाणावले होते. एकंदरीत पुस्तक वाचनीय आणि संग्राह्य. मांडणी, मुद्रण, मुखपृष्ठ यांसह मेहता प्रकाशनाची निर्मिती सुबक. – मल्हार कृष्ण गोखले ...Read more

  • Rating Starसकाळ १५.१०.१७

    सावंत यांच्या साहित्यविषयक वाटचालीत आजरा या गावाचं योगदान फार महत्वाचा आहे. याच गावात भेटलेल्या नमुनेदार व्यक्तींचं चित्रण सावंत यांनी केलं आहे. अतिशय सूक्ष्म निरीक्षण आणि सावंत यांची खास शैली यामुळं ही व्यक्तिचित्रण सुरेख झाली आहेत.

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

RUCHIRA BHAG -1
RUCHIRA BHAG -1 by KAMALABAI OGALE Rating Star
संजीव_वेलणकर

*आज २० एप्रिल* *आज दोन लाख सुनांची एकच आई हे नाव कमवणाऱ्या #कमलाबाई_ओगले यांचा स्मृतिदिन.* जन्म. १६ सप्टेंबर १९१३ सांगली जिल्ह्यातील कुंडल येथे. कमलाबाई ओगले या माहेरच्या गोदूताई अनंत दांडेकर. त्याचा विवाह सांगलीतील कृष्णाजी ओगले यांच्याशी झाला. कमलााई ओगले यांच्या पाककला कृतींवरच्या ‘ रुचिरा‘ हे पुस्तक १९७० च्या सुमारास आले. कुठलाही प्रकाशक, या नाव नसलेल्या कमलाबाई ओगले यांचे हे पुस्तक स्विकारावयास तयार होईना काही प्रकाशकांनी तर बाईंकडेच प्रकाशनासाठी पैसे मागितले. पण या पुस्तकाच्या गुणवत्तेवर आणि उपयुक्ततेवर १०० % विश्वास असणार्‍या ओगल्यांनी धीर न सोडता त्यांचे आणि मुकुंदराव किर्लोस्करांचे स्नेही श्री. भिडे यांच्या मार्फत मुकुंदराव किर्लोस्कर यांना गाठले आणि पुस्तक प्रकाशनाचा प्रस्ताव ठेवला. वृत्तीने पूर्णत: व्यावसायिक असणार्‍या मुकुंदरावांनी फायदा होणार नाही म्हणून हे पुस्तक स्वीकारण्यास नकारच दिला होता पण भिडे यांनी पटवल्यावर आणि तोटा झालाच तर तो सोसण्याची तयारी ओगल्यांनी दाखवल्यावर मुकुंदराव तयार झाले . किर्लोस्कर समूहाने ‘ स्त्री सखी प्रकाशन ‘ या संस्थेची मुहूर्तमेढ रोवली आणि पहिलेच पुस्तक म्हणून ‘ रुचिरा ‘ चे प्रकाशन केले. या पुस्तकामुळे कमलाबाई ओगले या सर्वच स्तरांत अतिशय लोकप्रिय झाल्या. त्यांना परीक्षक म्हणून पूर्वीपेक्षा जास्त बोलावणी येऊ लागली. केंद्रीय मंत्री शंकरराव चव्हाण, आबासाहेब खेबुडकर — कुलकर्णी, दुर्गाबाई भागवत, शांता शेळके, मोहिनी निमकर,अशा अनेक नामवंतांच्या हस्ते त्यांचे कित्येक सत्कार झाले. मुंबईच्या एस.एन.डी.टी. विद्यापीठात त्यांनी वर्ग घेतले. रुचिरा - भाग १ ने अभूतपूर्व यश मिळवले. वास्तविक रुचिराचे जे हस्तलिखित प्रथम तयार केले होते त्यात १०५० पदार्थकृतींचा समावेश होता. परंतु पुस्तक फार मोठे होईल व किंमतीलाही भारी होईल म्हणून त्यातले ३५० पदार्थ कमी करून रुचिरा प्रसिद्ध केले. या बाजूला काढलेल्या ३५० पदार्थांमध्ये अजून काही नवीन पदार्थांची भर घालून रुचिरा - भाग २, सन १९८५ मध्ये प्रसिद्ध केला आहे. कमलाबाई आपल्या मुलांकडे ऑस्ट्रेलियाला गेल्या असताना तेथेही ह्यांना नवनवीन पदार्थांचे प्रयोग केले. ऑस्ट्रेलियन सुगरणींकडून तेथील पदार्थांची माहिती करून घेतली व त्या पदार्थांना भारतीय चव देऊन रुचिराच्या पद्धतीनुसार वाटी चमच्याच्या प्रमाणात तयार केले. त्यामुळे रुचिरा - भाग २ मध्ये अनेक नाविन्यपूर्ण पदार्थांची रेलचेल आहे. स्वीडीश ऍपल पुडींग, स्वीस फिंगर्स, मटी ब्रिझल्स, ब्लॅक फॉरेस्ट केक, चीज मिरची भात, शानसाक, हुसेनी कबाब करी, ब्राऊन स्ट्यू अशा नावांनीच तोंडाला पाणी सुटावे. ऑस्ट्रेलियात तर त्यांना तीनदा बोलावणी आली. या दोन्ही खंडांत त्यांनी तेथल्या भारतीय आणि स्थानिक स्त्रियांना विविध पदार्थांची प्रात्यक्षिके दाखवली. ऑस्ट्रेलियात शिरा करतांना तूप उपलब्ध नव्हते, तर त्यांनी चक्क तेलावर शिरा करून दाखवला! तोही तितकाच स्वादिष्ट झाला होता. या पुस्तकात महाराष्ट्रीय पदार्थांप्रमाणेच काही तमिळी, पंजाबी, गुजराती आणि बंगाली पाककृतींचा समावेश केला आहे. त्याचप्रमाणे हे पुस्तक मराठी भाषेचे कुंपण ओलांडून कानडी भाषेतही गेले. विद्यामूर्ती सत्यनारायण यांनी भाषांतर केलेल्या कानडी पुस्तकाचे भाग्य मराठी पुस्तकाप्रमाणेच बलवत्तर आहे. या पुस्तकाची हिन्दी, इंग्लिश आणि गुजराती भाषांतही भाषांतरे झाली आहेत. ‘फास्ट फूड ‘ पद्धतीच्या पाक कृती असलेल्या या ‘ रुचिरा ‘ चा दुसरा भागही प्रसिद्ध झाला. एखाद्या लोकप्रिय गाण्याप्रमाणे हे पुस्तक घराघरांत पोचले. हे पुस्तक पुढच्या पिढींतील मुलींना / सुनांना ही आपले पुस्तक वाटते. दोन लाख प्रतींचा खप गाठल्यावर ‘ दोन लाख सुनांची एकच आई ‘अशी caption या पुस्तकाच्या blurb वर दिली गेली होती; ती नि:संशय समर्पक होती. या Blurb ला प्रा. मं. वि. राजाध्यक्षांनी ‘ वेष्टण लेख ‘ असा प्रतिशब्द सुचवला होता.. कमलाबाई ओगले यांचे २० एप्रिल १९९९ रोजी निधन झाले. आपल्या समुहा तर्फे कमलाबाई ओगले यांना आदरांजली. ...Read more

RUCHIRA BHAG -2
RUCHIRA BHAG -2 by KAMALABAI OGALE Rating Star
संजीव वेलणकर

*आज २० एप्रिल* *आज दोन लाख सुनांची एकच आई हे नाव कमवणाऱ्या #कमलाबाई_ओगले यांचा स्मृतिदिन.* जन्म. १६ सप्टेंबर १९१३ सांगली जिल्ह्यातील कुंडल येथे. कमलाबाई ओगले या माहेरच्या गोदूताई अनंत दांडेकर. त्याचा विवाह सांगलीतील कृष्णाजी ओगले यांच्याशी झाला. कमलााई ओगले यांच्या पाककला कृतींवरच्या ‘ रुचिरा‘ हे पुस्तक १९७० च्या सुमारास आले. कुठलाही प्रकाशक, या नाव नसलेल्या कमलाबाई ओगले यांचे हे पुस्तक स्विकारावयास तयार होईना काही प्रकाशकांनी तर बाईंकडेच प्रकाशनासाठी पैसे मागितले. पण या पुस्तकाच्या गुणवत्तेवर आणि उपयुक्ततेवर १०० % विश्वास असणार्‍या ओगल्यांनी धीर न सोडता त्यांचे आणि मुकुंदराव किर्लोस्करांचे स्नेही श्री. भिडे यांच्या मार्फत मुकुंदराव किर्लोस्कर यांना गाठले आणि पुस्तक प्रकाशनाचा प्रस्ताव ठेवला. वृत्तीने पूर्णत: व्यावसायिक असणार्‍या मुकुंदरावांनी फायदा होणार नाही म्हणून हे पुस्तक स्वीकारण्यास नकारच दिला होता पण भिडे यांनी पटवल्यावर आणि तोटा झालाच तर तो सोसण्याची तयारी ओगल्यांनी दाखवल्यावर मुकुंदराव तयार झाले . किर्लोस्कर समूहाने ‘ स्त्री सखी प्रकाशन ‘ या संस्थेची मुहूर्तमेढ रोवली आणि पहिलेच पुस्तक म्हणून ‘ रुचिरा ‘ चे प्रकाशन केले. या पुस्तकामुळे कमलाबाई ओगले या सर्वच स्तरांत अतिशय लोकप्रिय झाल्या. त्यांना परीक्षक म्हणून पूर्वीपेक्षा जास्त बोलावणी येऊ लागली. केंद्रीय मंत्री शंकरराव चव्हाण, आबासाहेब खेबुडकर — कुलकर्णी, दुर्गाबाई भागवत, शांता शेळके, मोहिनी निमकर,अशा अनेक नामवंतांच्या हस्ते त्यांचे कित्येक सत्कार झाले. मुंबईच्या एस.एन.डी.टी. विद्यापीठात त्यांनी वर्ग घेतले. रुचिरा - भाग १ ने अभूतपूर्व यश मिळवले. वास्तविक रुचिराचे जे हस्तलिखित प्रथम तयार केले होते त्यात १०५० पदार्थकृतींचा समावेश होता. परंतु पुस्तक फार मोठे होईल व किंमतीलाही भारी होईल म्हणून त्यातले ३५० पदार्थ कमी करून रुचिरा प्रसिद्ध केले. या बाजूला काढलेल्या ३५० पदार्थांमध्ये अजून काही नवीन पदार्थांची भर घालून रुचिरा - भाग २, सन १९८५ मध्ये प्रसिद्ध केला आहे. कमलाबाई आपल्या मुलांकडे ऑस्ट्रेलियाला गेल्या असताना तेथेही ह्यांना नवनवीन पदार्थांचे प्रयोग केले. ऑस्ट्रेलियन सुगरणींकडून तेथील पदार्थांची माहिती करून घेतली व त्या पदार्थांना भारतीय चव देऊन रुचिराच्या पद्धतीनुसार वाटी चमच्याच्या प्रमाणात तयार केले. त्यामुळे रुचिरा - भाग २ मध्ये अनेक नाविन्यपूर्ण पदार्थांची रेलचेल आहे. स्वीडीश ऍपल पुडींग, स्वीस फिंगर्स, मटी ब्रिझल्स, ब्लॅक फॉरेस्ट केक, चीज मिरची भात, शानसाक, हुसेनी कबाब करी, ब्राऊन स्ट्यू अशा नावांनीच तोंडाला पाणी सुटावे. ऑस्ट्रेलियात तर त्यांना तीनदा बोलावणी आली. या दोन्ही खंडांत त्यांनी तेथल्या भारतीय आणि स्थानिक स्त्रियांना विविध पदार्थांची प्रात्यक्षिके दाखवली. ऑस्ट्रेलियात शिरा करतांना तूप उपलब्ध नव्हते, तर त्यांनी चक्क तेलावर शिरा करून दाखवला! तोही तितकाच स्वादिष्ट झाला होता. या पुस्तकात महाराष्ट्रीय पदार्थांप्रमाणेच काही तमिळी, पंजाबी, गुजराती आणि बंगाली पाककृतींचा समावेश केला आहे. त्याचप्रमाणे हे पुस्तक मराठी भाषेचे कुंपण ओलांडून कानडी भाषेतही गेले. विद्यामूर्ती सत्यनारायण यांनी भाषांतर केलेल्या कानडी पुस्तकाचे भाग्य मराठी पुस्तकाप्रमाणेच बलवत्तर आहे. या पुस्तकाची हिन्दी, इंग्लिश आणि गुजराती भाषांतही भाषांतरे झाली आहेत. ‘फास्ट फूड ‘ पद्धतीच्या पाक कृती असलेल्या या ‘ रुचिरा ‘ चा दुसरा भागही प्रसिद्ध झाला. एखाद्या लोकप्रिय गाण्याप्रमाणे हे पुस्तक घराघरांत पोचले. हे पुस्तक पुढच्या पिढींतील मुलींना / सुनांना ही आपले पुस्तक वाटते. दोन लाख प्रतींचा खप गाठल्यावर ‘ दोन लाख सुनांची एकच आई ‘अशी caption या पुस्तकाच्या blurb वर दिली गेली होती; ती नि:संशय समर्पक होती. या Blurb ला प्रा. मं. वि. राजाध्यक्षांनी ‘ वेष्टण लेख ‘ असा प्रतिशब्द सुचवला होता.. कमलाबाई ओगले यांचे २० एप्रिल १९९९ रोजी निधन झाले. आपल्या समुहा तर्फे कमलाबाई ओगले यांना आदरांजली. ...Read more