* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: CHEATING DEATH
  • Availability : Available
  • Translators : GAURI GADEKAR
  • ISBN : 9788184989502
  • Edition : 1
  • Publishing Year : JANUARY 2016
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 220
  • Language : Translated From ENGLISH to MARATHI
  • Category : BIOGRAPHY & TRUE STORIES
Quantity
Buying Options:
  • Print Books:
IN THIS RIVETING BOOK, DR. SANJAY GUPTA--NEUROSURGEON, CHIEF MEDICAL CORRESPONDENT FOR CNN, AND BESTSELLING AUTHOR--CHRONICLES THE ALMOST UNBELIEVABLE SCIENCE THAT HAS MADE THESE SEEMINGLY MIRACULOUS RECOVERIES POSSIBLE. A BOLD NEW BREED OF DOCTORS HAS ACHIEVED AMAZING RESCUES BY REFUSING TO ACCEPT THAT ANY LIFE IS IRRETRIEVABLY LOST. EXTENDED CARDIAC ARREST, "BRAIN DEATH," NOT BREATHING FOR OVER AN HOUR--ALL THESE CONDITIONS USED TO BE CONSIDERED INEVITABLY FATAL, BUT THEY NO LONGER ARE. TODAY, REVOLUTIONARY ADVANCES ARE BLURRING THE TRADITIONAL LINE BETWEEN LIFE AND DEATH IN FASCINATING WAYS. DRAWING ON REAL-LIFE STORIES AND USING HIS UNPRECEDENTED ACCESS TO THE LATEST MEDICAL RESEARCH, DR. GUPTA DRAMATICALLY PRESENTS EXCITING ACCOUNTS OF HOW PIONEERING PHYSICIANS AND RESEARCHERS ARE ALTERING OUR UNDERSTANDING OF HOW THE HUMAN BODY FUNCTIONS WHEN IT COMES TO SURVIVAL--AND WHY MORE AND MORE PATIENTS WHO ONCE WOULD HAVE DIED ARE NOW ALIVE. FROM EXPERIMENTS WITH THERAPEUTIC HYPOTHERMIA TO SAVE COMATOSE STROKE OR HEART ATTACK VICTIMS TO LIFESAVING OPERATIONS IN UTERO TO THE STUDY OF ANIMAL HIBERNATION TO HELP WOUNDED SOLDIERS ON FAR-OFF BATTLEFIELDS, THESE REMARKABLE CASE HISTORIES TRANSFORM AND ENRICH ALL OUR ASSUMPTIONS ABOUT THE TRUE NATURE OF DEATH AND LIFE.
‘अद्याप न जन्मलेल्या बाळाच्या हृदयात प्राणघातक दोष...‘नॉर्वेतील गोठलेल्या तलावात तासभर बुडालेली स्कीअर...डॉक्टरांनी `व्हेजिटेबल` ठरवलेला कोमातील रुग्ण...वीस वर्षांपूर्वी यासर्वांना वाचण्याची आशा नाही म्हणून मृत समजून सोडून दिलं असतं; पण अविश्वसनीय अशा नवीन वैद्यकीय प्रगतीमुळे हे सर्वजण आज जिवंत आणि धडधाकट आहेत. चित्त खिळवून ठेवणा-या या पुस्तकात न्यूरोसर्जन,सीएनएन चे प्रमुख वैद्यकीय बातमीदार आणि लोकप्रिय पुस्तकांचे लेखक डॉ. संजयगुप्ता, हे चमत्कार प्रत्यक्षात आणणा-या असामान्य विज्ञानाचं इतिवृत्त नोंदवतात. जेव्हा मृत्यूपासून बचावकरण्याचा प्रश्न येतो, तेव्हा मानवी शरीर ज्या प्रकारे कार्यकरतं, त्या विषयीच्या आपल्या समजुती, हे अग्रेसर डॉक्टर आणि संशोधक कशा बदलून टाकतात, त्याचे वास्तव जीवनातील केसेस वरआधारित असलेले थरारक वृत्तान्त डॉ. गुप्ता सादर करतात. पूर्वी जे रुग्ण मृत्युमुखी पडण्याची दाट शक्यता होती, त्या रुग्णांचं जिवंत राहाण्याचं प्रमाण दिवसेंदिवस का वाढत आहे, यावर ते प्रकाश पाडतात. पक्षाघात विंवाहृदयविकाराच्या झटक्यानंतर कोमात गेलेल्या रुग्णांना वाचवण्यासाठी च्या रोगनिवारक हायपोथर्मिआच्या प्रयोगापासून ते गर्भाला जीवदान देणा-या शस्त्रक्रिया आणि रणांगणांवरील जखमी सैनिकांना वाचवण्याच्या उद्देशाने करण्यात येणा-या प्राण्यांमधील सुप्तनिद्रेच्या अभ्यासापर्यंतच्या या सर्व विलक्षण गोष्टी वाचून जीवन-मृत्यूच्या वास्तव स्वरूपा विषयीची आपली गृहीतवं पार पालटून जातात.

No Records Found
No Records Found
Keywords
"#MARATHIBOOKS#ONLINEMARATHIBOOKS#TRANSLATEDMARATHIBOOKS#TBC#TRANSLATEDBOOKS@50% #MRUTYUVARMAAT #CHEATINGDEATH #मृत्युवरमात #BIOGRAPHY&TRUESTORIES #TRANSLATEDFROMENGLISHTOMARATHI #GAURIGADEKAR #SANJAY GUPTA "
Customer Reviews
  • Rating StarDAINIK SAKAL 12-01-2020

    कधीकधी एखादे पुस्तक किचकट विषयावर भाष्य करणारे असते ... वाचायला रटाळ वाटू शकते मात्र ज्ञानाचे भांडार असते.हे असेच एक पुस्तक.जन्म आणि मृत्यू ह्यात एका श्वासाच अंतर असतं.. असं आपण नेहमी म्हणतो. श्वास बंद झाले, हृदय थांबले की मृत्यू झाला मानले जाते... मत्र जिवंत असणे आणि प्रत्यक्ष मृत्यू ह्यातही बरेच काही असते... मृत म्हणून घोषित केलेल्या अनेक पेशंटला चमत्कृतीपूर्ण पद्धतीने जिवंत केल्याच्या वास्तव घटना आणि संशोधन ह्या पुस्तकात नमूद केले आहे. वैज्ञानिक संशोधनाची, शोधांची आवड असणाऱ्या वाचकांना नक्कीच आवडू शकेल. पुस्तकाची प्रस्तावना आणि मुखपृष्ठ आवडले... :- यशश्री रहाळकर ...Read more

  • Rating StarKiran Borkar

    ऍना बागनहॉम नार्वेतील बर्फाळ शिखरावर स्कीईग करायला गेली आणि अपघातात सापडली .ती बर्फात एक तासांपेक्षा जास्त वेळ अडकली होती . क्लीनिकली ती मृत होती . माईक मर्ट्झ एका शाळेत बस ड्रायव्हर होता .एका अपघातात सापडला आणि त्याचे हृद बंद झाले . अफगाणिस्तानाती खिंडीत डोंगरात जखमी झालेल्याना भर युद्धात वैद्यकीय मदत कशी मिळेल. भरपूर रक्तस्त्राव होऊनही तो सैनिक कसा वाचेल??? त्याचे हृदयातचे ठोके थांबवून परत चालू करता येतील का ???? अजून त्या बाळाचा जन्मही झाला नाही पण त्याच्या हृदयात प्राणघातक दोष आहे . डॉक्टरांनी आशा सोडलेला कोमातील रुग्ण केवळ हृदयाचे ठोके बंद पडले आणि श्वास थांबला म्हणजे माणूस मृत झाला नाही . काही वर्षांपूर्वी अश्या रुग्णाची आशा डॉक्टरांनी सोडून दिली असती .पण नवीन वैद्यकीय संशोधनामुळे आज हे जिवंत आहेत तर धडधाकट ही आहेत . लेखक प्रसिद्ध न्यूरो सर्जन आणि लेखक डॉ. संजय गुप्ता विज्ञानाचा आधार घेऊन हे चमत्कार नोंदवतात . जेव्हा मृत्यू जवळ येतो तेव्हा मानवी शरीराची आत काय हालचाल सुरू असते ते सर्व आपल्याला हे डॉक्टर सांगतात. ...Read more

  • Rating StarDAINIK AIKYA 03-04-2016

    ‘अद्याप न जन्मलेल्या बाळाच्या हृदयात प्राणघातक दोष...’ ‘नॉर्वेतील गोठलेल्या तलावात तासभर बुडालेली स्कीअर...’ ‘डॉक्टरांनी व्हेजिटेबल’ ठरवलेला कोमातील रुग्ण... ‘वीस वर्षांपूर्वी या सर्वांना वाचवण्याची आशा नाही म्हणून मृत समजून सोडून दिलं असतं; पण अविशवसनीय अशा नवीन वैद्यकीय प्रगतीमुळे हे सर्वजण आज जिवंत आणि धटधाकट आहेत. चित्त खिळवून ठेवणाऱ्या या पुस्तकात न्यूरोसर्जन, सीएनएनचे प्रमुख वैद्यकीय बातमीदार आणि लोकप्रिय पुस्तकांचे लेखक डॉ. संजय गुप्ता, हे चमत्कार प्रत्यक्षात आणणाऱ्या असामान्य विज्ञानाचं इतिवृत्त नोंदवतात. जेव्हा मृत्यूपासून बचाव करण्याचा प्रश्न येतो, तेव्हा मानवी शरीर ज्या प्रकारे कार्य करतं, त्या विषयीच्या आपल्या समजुती हे अग्रेसर डॉक्टर आणि संशोधक कशा बदलून टाकतात, त्याचे वास्तव जीवनातील केसेसवर आधारीत असलेले थरारक वृत्तांत डॉ. गुप्ता सादर करतात. ...Read more

  • Rating StarTARUN BHARAT BELGAO 20-03-2016

    मृत्यूला चकवा दिलेल्या रुग्णांच्या कथा संजय गुप्ता एम. डी. असून ‘न्यूरोसर्जन’ म्हणून प्रक्टिस करतात. शिवाय अ‍ॅटलांटामधील ‘एमरी युनिव्हर्सिटी हॉस्पिटल’मध्ये ते साहाय्यक प्राध्यापक आहेत. सीएनएन आणि सीबीएसवरील कार्यक्रमातही त्यांच मोठं योगदान आहे. २००६मध्ये त्यांच्या आरोग्यविषयक रिपोटर्सना तीन पारितोषिके मिळाली. या व्यतिरिक्त ‘एमी’ ‘पीचडी’ आणि ‘द ड्यूपॉन्ट’ पारितोषिके मिळाली. २००४ मध्ये अ‍ॅटलांटा प्रेस क्लबने डॉ. गुप्तांना ‘जर्नलिस्ट ऑफ द इयर’ म्हणून गौरवलं. ‘द नॅशनल हेल्थकेअर कम्युनिकेटर्स’चं ‘गोल्ड अ‍ॅवॉर्ड’ आणि ‘द इंटरनॅशनल हेल्थ अँड मेडिकल मीडीआ’’चं ‘फेडी’ नावाचं पारितोषिकही त्यांना मिळालं आहे. ‘चेसिंग लाइफ’या त्यांच्या पहिल्या पुस्तकाला न्यूयॉर्क टाइम्सच्या ‘सर्वाधिक खपाच्या पुस्तका’च्या यादीत स्थान मिळालं आहे. डॉ. गुप्ता ‘द अमेरिकन असोसिएशन ऑफ न्यूरॉलॉजिकल सर्जन्स,’ ‘काँग्रेस ऑफ न्यूरॉलॉजिकल सर्जन्स’, ‘द कौन्सिल ऑफ फॉरिन रिलेशन्स’ अशा अनेक संघटनांचे सदस्य आहेत. डॉ. संजय गुप्ता ‘द लान्स आर्मस्ट्राँग फाऊंडेशन’चे बोर्ड सदस्य आहेत. ‘मृत्यूवर मात’ हे ‘चीटिंग डेथ’ या इंग्रजी पुस्तकाचा मराठी अनुवाद आहे. प्रतिकूल परिस्थितीशी झगडून रुग्णांची आयुष्य वाचवणारे डॉक्टर आणि त्यांचे वैद्यकीय चमत्कार’ पुस्तकात वाचायला मिळतात. हृदयाची धडधड थांबते, तो अंत नसतो. खरंतर ती फक्त संकटाची नांदी असते, असं आढळून आले आहे की, जीवन आणि मृत्यू हे फक्त काळ्या आणि पांढऱ्या रंगांच चित्र नाही. त्या दोन्ही रंगांच्यामध्ये एक करडा रंगही असतो. एक पुसटसा तटस्थ प्रदेश. तिथे माणूस धड मेलेलाही नसतो की, धड जिवंतही नसतो. यावर ताबा मिळवून मृत्यूला चकवण्यासाठी प्रथम आपल्याला ती प्रक्रिया समजून घेतली पाहिजे. मृत्यूविषयी मृत किंवा जिवंत अशा ठाम शब्दांत विचार करायची आपल्याला सवय आहे. मॉनिटरवर वर खाली होणाऱ्या रेषा सपाट होतात. जीवन निसटून जायला काही मिनिटांचा कालावधीही पुरेसा आहे. हृदयाचे टोके थांबले की रक्तप्रवाह थांबतो. दोन मिनिटातच सगळं मंदावत. गंमत म्हणजे शरीराच्या आत चाललेल्या या प्रचंड उलथापालथीची आपल्याला जाणीवही नसते. रक्ता अभावी तडफडणारा, पहिला अवयव म्हणजे मेंदू, प्राणवायू अभावी दहा सेकंदातच मेंदूचे काम थंडावते. आकुंचन - प्रसरण बंद होते. अवयव ढासळू लागतात. मूत्रपिंडांच रक्त शुद्धीकरणाचे कार्य थांबते. शरीरातील पेशीमध्ये रासायनिक प्रक्रियांची गुंतागुंतीची शृंखला सुरू होते आणि त्यात त्या पेशी बळी पडतात. मरणाची प्रक्रिया ही अशी आहे. आपल्या हातात आहे, खळबळजनक आणि झपाट्याने बदलत चाललेल्या विज्ञानाच्या क्षेत्राचा शोध घेणारं, रोमांचक वैद्यकीय कहाण्यांच पुस्तक. याच्या पाना-पानातून जाणवेल. जीवन आणि मृत्यूमधील बारीकशी सीमारेषा आणि भेटतील सीमारेषेच्या अलिकडे रोग्यांना थोपवून धरण्यासाठी जीवाचं रान करणारे डॉक्टर. या सीमारेषेवर ‘तळ्यात-मळ्यात’ करून आलेल्या लोकांनी पाहिलेले- ऐकलेले त्यांचे अनुभव वाचून त्या सीमेविषयी अधिक माहिती मिळेल. आश्चर्यकारक आव्हानं स्वीकारणाऱ्या शास्त्रज्ञांशीही आपला परिचय होतो. आपल्याला अजून सगळ्या प्रश्नांची उत्तरे मिळालेली नसली, तरी कधी ना कधी ती नक्कीच मिळतील, असा विश्वास बाळगणारं निग्रही, आद्य संशोधक खरोखरच आशावादी आहेत. अगदी गर्भाशयापासून ते पार मृत्यूशय्येपर्यंत, जीवन मरणाच्या आपल्या समजाला छेद देणारे आधुनिक विज्ञानाचे असंख्य मार्ग या पुस्तकात आढळतील. लक्षात येईल की, आरंभरेषा आणि समाप्तिरेषा या काळ्या दगडावरील रेषा नसतात. त्या वाळूवर काढलेल्या रेषा असतात. वैद्यकीय ज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या प्रत्येक नव्या लाटेबरोबर त्या सरकत जातात. मृत्यूला जाणून घ्यायच्या आणि त्याला पुढे ढकलायचा मार्ग शोधण्याच्या या प्रवासात आपण जीवन आणि त्या पलीकडे जे काही आहे ते याच्यामधल्या करड्या, तटस्थ प्रदेशाचा थांग लावण्याचा प्रयत्न करणार आहोत. पुस्तकातील निवेदन ८ भागात आहे. १. हिमडॉक्टर्स, २. हृदय थांबण्याचा क्षण, ३. अविश्वासाला स्थगिती, ४. मृत्यूच्या पलीकडे, ५. दो गज जमीन के नीचे, ६. मृत्यूला चकवा गर्भाशयातच, ७. काय हा चमत्कार, ८. वेगळा दिवस. ‘अद्याप न जन्मलेल्या बाळाच्या हृदयात प्राणघातक दोष,’ नार्वेतील गोठवलेल्या तलावात तासभर बुडालेली स्कीअर ‘डॉक्टरांनी व्हेजिटेबल’ ठरवलेला कोमातील रुग्ण...’ वीस वर्षांपूर्वी या सर्वांना वाचण्याची आशा नाही म्हणून मृत समजून सोडून दिलं असतं; पण अविश्वसनीय अशा नवीन वैद्यकीय प्रगतीमुळे हे सर्व जण आज जिवंत आणि धडधाकट आहेत. चित्त खिळवून ठेवणाऱ्या या पुस्तकात न्यूरोसर्जन, सीएनएन चे प्रमुख वैद्यकीय बातमीदार आणि लोकप्रिय पुस्तकांचे लेखक डॉ. संजय गुप्ता हे चमत्कार प्रत्यक्षात आणणाऱ्या असामान्य विज्ञानाचं इतिवृत्त नोंदवतात. जेव्हा मृत्यूपासून बचाव करण्याचा प्रश्न येतो, तेव्हा मानवी शरीर ज्या प्रकारे कार्य करतं, त्याविषयीच्या आपल्या समजुती हे अग्रेसर डॉक्टर आणि संशोधक कशा बदलून टाकतात, त्याचे वास्तव जीवनातील केसेसवर आधारित असलेले थरारक वृत्तांत प्रत्यक्ष पुस्तकातच वाचणे उचित होईल. परीक्षणाच्या सीमारेषेत त्याला बांधणे अशक्यच नाही तर असंभवही आहे. अनुवादाचे काम अगदी उचित व योग्यच झालेले आहे. कुठेही वाचताना अडचण जाणवत नाही. शास्त्रीय संज्ञांचे सुबोध विवेचन आढळते. मृत्यूवर मात! ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

HATUMUTUCHA CHANDRA
HATUMUTUCHA CHANDRA by FARUK KAZI Rating Star
परेश जयश्री मनोहर

मराठी बालसाहित्याचा गेल्या काही दशकांचा अवकाश हा सातत्याने प्रबोधनपर, उद्बोधनपर आणि कोणत्याही कथेच्या शेवटी एका वाक्यात तात्पर्य सांगणाऱ्या बाळबोधकथांचा राहिलेला आहे. या बाल साहित्यामध्ये प्रामुख्याने येणारे पात्र ही मध्यमवर्गीय, उच्च जातीय मराठी घरतील मुलं मुली असतात आणि जेव्हा केव्हा वंचित समाजातील, शोषित समाजातील, गरीब ग्रामीण घरातील मुलांचे चित्रण येतं तेव्हा ते अति दुःखी आणि बिचारे, ज्यांना मदतीची गरज आहे आणि अशी मदत करण्याची जबाबदारी मोठ्या घरातील उच्चवर्णीय, उच्चवर्गीय नायक मुला मुलींची असते. त्यातूनही प्रामुख्याने काय करावे काय करू नये किंवा तत्सम उपदेशच प्रामुख्याने कथेच्या शेवटी केलेले दिसतात. आणि हा लेखक वर्ग ही प्रामुख्याने पुणे मुंबई भागात स्थिरावलेला राहणारा तिथल्या अनुभूती आणि तिथल्या जगण्याचा अवकाश सोबत घेऊन येणारा असतो. अशा सगळ्या पार्श्वभूमीवरती सोलापूर जिल्ह्यातल्या सांगोला तालुक्यात अनकढाळ सारख्या एका छोट्या गावात राहणारा फारुक काझी हा लेखक जेव्हा गेलं दशकभर कवितांमधून, कथांमधून बालविश्व चितारण्याचा प्रयत्न करतो तेव्हा ते जास्त करून ग्रामीण भागातील मातीशी जोडलेलं असतं. आपल्या भोवतालच्या खऱ्याखुऱ्या मुलांमुलींच्या भावविश्वाच्या जवळ जाणारं चित्रण त्याच्या कथांमधून आपण सातत्याने बघत असतो. त्याचे "शिकण्याच्या वाटेवरील आनंदवन" हे पहिले पुस्तक एका प्रयोगशील शिक्षकाच्या शाळेतील अनुभवांवर आधारलेले आहे. त्यांचे आजवर मित्र, प्रिय अब्बू, चुटकीचे जग हे कथासंग्रह प्रकाशित झालेले आहेत. या सगळ्याच पुस्तकातून त्याने सातत्याने ग्रामीण, निमशहरी भागातील कनिष्ठ मध्यमवर्गीय आणि गरीब कुटुंबातील बहुजन आणि वंचित घटकातील, मुस्लिम कुटुंबातील मुलांच्या नजरेने दिसणाऱ्या गोष्टी टिपण्याचा प्रयत्न केलेला आहे. यात कुठेही गरिबीचे गोडवे नाहीत की काठोकाठ पसरलेलं बिचारेपण नाही. तर या आर्थिक दृष्ट्या नागवलेल्या लोकांच्या घरातील मुलांच्या कथा आहेत, ज्यात प्रेम, उत्सुकता, जिद्द, समजून घेणे आणि अनुभवातून आलेलं शहाणपण हे प्रामुख्याने जाणवते. अभावग्रस्तता, एखाद्या गोष्टीचे नसणे, तरीही नातेसंबंधांवरील विश्वास, प्रेम आणि एकमेकांबद्दलचा आदर, काळजी घेऊन जपणारी कुटुंबं फारुकच्या लिखाणात सातत्याने येत राहतात. त्याचा आत्ता आलेला हाटूमुटूचा चंद्र हा एक अफलातून कथासंग्रह आहे. यामध्ये फारुकने वेगवेगळे प्रयोग केलेले आहेत जे त्याच्या नेहेमीच्या लेखन शैलीपेक्षा जरा वेगळ्या अंगाने जाणारे आहेत आणि ते उत्तम जमून आलेले आहेत. या दहा कथांमधल्या पहिल्या तीन कथा या मुलांच्या नजरेतून होणारा पर्यावरण विनाश, निसर्गाची भाषा समजून घेण्याचा मुलांचा प्रयत्न आणि नुसते समजून घेणे नाही तर मुलानी आपले हे जग आपण नीट ठेवण्यासाठी केलेले प्रयत्न असे ही आहे. यात आनंद शोधण्याचे मार्ग, जबाबदारीचे असणारे भान आणि काल्पनिक ग्रहाची भेट करवून आणणारी समायरा आपल्याला भेटते, तर मोकळ्या हवेत असणारा आनंद भरुन कसा घेणार असा प्रश्न विचारणारा अर्पित ही भेटतो आणि तसेच टेकडी स्वच्छ करण्यासाठी न थकता प्रयत्न करणारे ओजस आणि रेहान ही भेटतात. लहानपणी न कळत्या वयात चिंचेवरच्या माकडाला तोटा फेकून मारणारा आणि त्या माराची मनावर झालेली जखम मोठा झाल्यावरही मनावर कोरलेला योगेश, आपल्या लाडक्या लहानग्या मैत्रिणीसाठी व्याकुळ होऊन रोज दारावर धडका देणारे शाहताब अस्वल आपल्याला अस्वस्थ करुन जातात. एका कथेत तर चक्क सायकल ही कथेची नायिका आहे आणि तिच्या सुखाच्या आणि नाराज होण्याच्या अनुभवातून आपणही तिच्यासोबत प्रवास करतो. इथे आपण बाबांच्या अपघाताने अस्वस्थ असणाऱ्या सारंगा सोबत त्या दवाखान्याच्या बाहेर येरझारा घालत असतो आणि अमृताच्या मैतरासोबत मेंढक्या बनून रानावनात चालत असतो. गावात फिरताना, गावाला पडणारं हिरवं स्वप्न अनुभवणारा मंदार आपल्या भेटतो आणि सोबतच गावात राहणारी आणि तुमच्या शहरालाही स्वप्न पडतच असेल की रे? काय असेल ते स्वप्नं? असा प्रश्न विचारणारी चंदा हाच प्रश्न आपल्यालाही विचारते असा भास आपल्याला होतोच होती. शाळेच्या ट्रीपला जायला हजार रुपये नाहीत म्हणून रुसलेल्या साक्षीला बघताना आपणही आपल्या लहानपणी अशा बुडालेल्या शाळेच्या सहली, आणि त्यावेळी आपल्या आईबाबांनी आपल्याला काय सांगितलं होतं आणि कशी आपली समजूत काढलेली हे आठवून आपलेही डोळे ओलसर होताना अनुभवतो. पण याही कथेत निंबोणीच्या पानांमधून दिसणारा, भासणारा तो चंद्र जो हाटूमुटूचा आहे पण त्याला बघून होणारा आनंद मात्र अस्सल आणि खराखुरा आहे. या सगळ्या कथांमधून फारुक ने आजच्या मुलामुलींना आपल्यासमोर उभं केलं आहे, त्यांचे प्रश्न, त्यांच्या विचार करण्याच्या पद्धती आणि त्याचं अस्वस्थ असणं अगदी नेमकेपणाने आपल्यासमोर येतं. ही मुलं कोणत्याही एका शहरातली, एका भागातली किंवा एकसारख्या घरातली नाहीत पण त्यांचे जगणे हे आजच्या मुलांचे जगणे आहे. फक्त एक प्रश्न मनाला पडतो की आपल्या भोवतालच्या प्रश्नांनी, आपल्या गरिबीने किंवा अभावाने काळवंडलेली मुलं जेव्हा समजूतदारपणे स्वतः शहाणे बनत पुढे निघतात तेव्हा, ही सगळं कोणामुळे, आणि माझ्याच वाट्याला का? याचे जबाबदार कोण असा एखादा प्रश्न एकाही मुलाला पडू नये याची काळजी वाटते. येत्या काळात फारुक च्या कथांतील ही मुलं तुम्हाला मला हे प्रश्न विचारतील याची खात्री आहे आणि मी त्या दिवसाची वाट ही बघतो आहेच. या पुस्तकातील चित्रांचा विशेष उल्लेख करणे फारच महत्वाचे आहे. चंद्रमोहन कुलकर्णी ज्या ताकदीने कथेची भावना नेमक्या कुंचल्यात पकडतात ते बघताना आपण निव्वळ थक्क होतो. इतकी सुंदर आणि मनाला धरुन ठेवणारी चित्रं या पाना आपल्याला भेटत राहतात. इतक्या ताकदींच्या कथांचे पुस्तक मेहता प्रकाशनाने अत्यंत प्रेमाने आणि उत्तम निर्मितीमूल्य जपत काढलेले आहे. आज आपला भोवताल इतका जातधर्म, पर्यावरणीय नाश आणि भविष्याच्या चिंतांनी कुरतडलेला असताना अशा खऱ्याखुऱ्या मुलांच्या कथा आपल्यासमोर येणं हाच आपल्याला दिलासा देणारा आपला हाटूमुटूचा चंद्र आहे...हा असाच राहो... परेश जयश्री मनोहर ...Read more

HATUMUTUCHA CHANDRA
HATUMUTUCHA CHANDRA by FARUK KAZI Rating Star
बालाजी मदन इंगळे

संवेदनशीलतेने लिहिलेल्या तरल बालकथा : हाटुमुटूचा चंद्र मराठीमध्ये जाणीवपूर्वक आणि विचारपूर्वक बालसाहित्य लिहिणाऱ्यांची संख्या खूप कमी आहे. बालसाहित्य आणि बाल मानसशास्त्र यांचा विचार करून आपली प्रतिभा त्यासाठी वापरणाऱ्या मोजक्या बालसाहित्यिकांमध्य फारूक एस. काझी यांचे नाव समाविष्ट करावे लागेल. त्यांच्या नुकत्याच प्रकाशित झालेल्या मुलांसाठीच्या ‘हाटूमुटूचा चंद्र’ या कथासंग्रहातून ही बाब ठळकपणे अधोरेखित होते. कथा म्हणजे केवळ प्रसंगानंतर प्रसंग किंवा घटनेनंतर घटना मांडणे नसते. त्यामध्ये लेखकाच्या प्रतिभेने वास्तव आणि कल्पना यांचा सुरेख संगम घडवून आणावा लागतो. कुठलीही कथा लेखकाला त्याच्या अनुभव विश्वातूनच सापडलेली असते. पण ते अनुभव विश्व मांडत असताना त्यात आपल्या प्रतिभेने काही साहित्य गुण समाविष्ट करावे लागतात. तेव्हा ती कथा साहित्यिकदृष्ट्या अभिजात व साहित्य गुणांनी युक्त अशी कथा होते. या संग्रहातील कथांमध्ये अशा साहित्यिक प्रतिभांच्या बऱ्याच जागा आहेत. आणि म्हणूनच फारूक एस. काझी यांच्या कथा रोजच्या जगण्यातीलच असल्या तरी त्यातील साहित्य गुणांमुळे या कथा आपले वेगळेपण सिद्ध करतात. कथेमध्येही काव्यात्मकता असते. प्रतिकात्मकता असते. आणि त्यामुळेच ती कथा वैश्विक ठरत असते. हे सर्व गुण ‘हाटुमूटुचा चंद्र’ मधील कथांमध्ये आढळून येतात. म्हणून ही कथा महत्त्वाची आहे. अद्भुतरम्यता, काल्पनिकता आणि धक्का तंत्र याने लिहिलेल्या कथा नेहमीच मुलांना आवडतील असे नाही. आपल्याच अवतीभवती घडणाऱ्या घटना इतक्या सुंदर असू शकतात हे मुलांना वाचायला आवडते. नेमके तेच या कथांमध्ये आहे. या बालकथा या मातीतल्या आहेत. या संस्कृतीतल्या आहेत. म्हणून त्या महत्त्वाच्या आहेत. या संग्रहात एकूण दहा कथा आहेत. सर्वच कथा सुंदर आणि हृदयस्पर्शी आहेत. ‘फिकर नॉट’ या कथेमध्ये दोन मित्रांचे काही प्रसंग आहेत. रेहान आणि त्याचा मित्र अर्पित. दोघे एका टेकडीवर जातात. रेहानसाठी टेकडीवरील अनुभव नवीन असतो. दोघे खूप गप्पा मारतात. तळ्यात पाय सोडून बसतात. तिथे बसल्यानंतर त्या तळ्यातील काही मासे आपण बाटलीत घेऊन जावे असे रेहानला वाटते. पण अर्पित त्याला सांगतो की आपण या टेकडीवरून काय घेऊन जायला हवं तर या टेकडीवरील वातावरण, टेकडीवरील दृश्य, इथे आपण घेतलेला आनंद हे सगळे मनात भरून घेऊन जायला हवे. असं मुक्या प्राण्यांना त्रास द्यायचा नाही, हे नकळतपणे तो रेहानला सांगतो. रेहानलाही ते पटतं आणि मग तो खोल श्वास घेऊन इथल्या सगळ्या आनंदाच्या आठवणी मनात भरून घेतो. आणि निघतो. एखादा कोणी अन्य बालकथा लेखक असता तर या दोघांचं बोलणं, टेकड्यावरील वर्णन, दोघांनी केलेली मज्जा, त्यांनी केलेल्या गमती याचे वर्णन करून कथा संपवली असती पण फारूक काझी यांनी इथून काय घेऊन जायचं? हे लिहून जे एक नवीन वळण कथेला दिलेले आहे, इथेच या कथेतील साहित्यगुणाची जागा आहे. तिथेच कथा लेखक म्हणून फारूक काझी यांची प्रतिभा आपल्याला दिसून येते. आणि बालसाहित्यिक म्हणून त्यांचं वेगळेपणही इथेच आपल्याला दिसतं. ‘कर के देखो’ या कथेमध्ये ट्रेकला गेलेली मुले स्वच्छता दूत कशी बनतात हे मुळातून वाचण्यासारखे आहे. ‘जखम’ या कथेमध्ये इयत्ता तिसरीत शिकत असताना एका माकडीनीला आपण इजा पोहोचवल्याचं मोठं झाल्यावर कथेतील नायकाला आठवतं. आणि तो मोठा असूनही लहानांसारखं रडत रडत ती चूक आपल्या आईकडे कबूल करतो. ही कथा वाचताना पाषाणहृदयी माणूसही भावनिक होऊन जातो. कडूनिंबाच्या झाडाचे खाली पडलेले पान चंद्राची प्रतिमा म्हणून म्हणजेच हाटुमूटुचा चंद्र म्हणून कथेत वापरणे. आणि तो चंद्र कथेतील साक्षीच्या चेहऱ्यावर आनंदाचे प्रतिक म्हणून येणे. आणि त्याद्वारे सहलीला जाण्यासाठी पैसे न मिळाल्याच्या दुःखातून स्वतःला सावरणे ही सगळीच मांडणी भन्नाट झाली आहे. अशा भरपूर जागा या पुस्तकांमध्ये आहेत. ‘हिरवं सपान’ या कथेमध्ये शहरातला मंदार गावाकडे येतो. आणि गावातील चंदा सोबत शेत-शिवारात फिरतो. या शेत-शिवारातील भरपूर झाडे पाहून बी, रोपटं, मग त्याचं झाड ही क्रिया किती महत्त्वाची आहे. आणि या क्रियेचं स्वप्न नेहमीच गावाला पडतं. तसंच हिरवं स्वप्न शहराला का पडत नाही? हा प्रश्न खरंतर लहान-मोठ्या प्रत्येक वाचकाला अस्वस्थ करून जातो. ‘स्वप्न’ ही आणखी एक सुंदर कथा या संग्रहामध्ये आहे. माणसाला अभावातूनच वस्तूंची किंमत कळत असते. ज्याच्याकडे सर्व काही आहे अशा मुलाकडे जेव्हा सायकल येते, तेव्हा तिची काळजी घेतली जात नाही. पण स्वप्नातही ज्याच्या कधी सायकल मिळेल असं वाटत नव्हतं अशा अंकितला जेव्हा सायकल मिळते, तेव्हा तो तिची किती काळजी घेतो आणि हेच त्या सायकलचे स्वप्न होते. आणि अंकितचेही तेच स्वप्न होते ही स्वप्नांची सरमिसळ वाचकांना खूपच आवडून जाते. ‘मैतर’ ही आणखीन एक अनोळखी नातेसंबंध घट्ट करणारी कथा. फक्त काही दिवसांसाठी आलेल्या मेंढक्या काकाची आणि अमृत ची मैत्री होते. आणि ती मैत्री त्या दोघांमध्ये इतकी घट्ट होते की, मेंढक्या काका आपली मेंढरं घेऊन परत निघाल्यावर दोघांनाही एकमेकांचा निरोप घ्यावा असे वाटत नाही. निरोपावेळी दोघांच्याही डोळ्यात पाणी येते. दोघेही निरोपावेळी एकमेकांना भेटवस्तू देतात. हा प्रसंग लेखकाने स्थानिक संदर्भ, संस्कृती, भाषा आणि चित्रदर्शी स्वरूपात असा उभा केला आहे की, वाचक कथा संपली तरी त्या मेंढरांच्या कळपामध्ये आणि अमृतच्या घराच्या आसपासच घुटमळत राहतो. ‘जाऊ दे त्याला’ ही आणखीन एक भावस्पर्शी कथा. जंगली प्राण्यांनाही जीव लावला तर ते माणसांशी प्रेमाने वागतात हे सांगणारी ही कथा वाचकाच्या काळजाचा ठाव घेते. निधी आणि फॉरेस्ट ऑफिसर असलेले तिचे बाबा यांची ही कथा जंगलाच्या दुनियेत वाचकाला घेऊन जाते. पण तिथेही मानवी भावना कशी श्रेष्ठ ठरते हे अतिशय रंजक पद्धतीने लेखकाने लिहिले आहे. ‘बाबांची भाषा’ ही आणखी एक हृदयाला स्पर्श करणारी कथा! शाळेत शिकणारा सारंग अपघातात ऐकणं आणि बोलणं कायमचं गमावलेल्या आपल्या बाबांसाठी हातवाऱ्याची भाषा शिकून घेतो. हे जेव्हा वाचकाला कळतं तेव्हा वाचक जागच्याजागी स्थिर होऊन जातो. ‘एस पी १३’ ही आधुनिक तंत्रज्ञानात घेऊन जाणारी कथा! छोटीशी समायरा स्पेसशीप घेऊन एका नव्या प्लॅनेटवर जाते. आणि त्या नव्या प्लॅनेटवर असलेली माणसं कशी निसर्गाची काळजी घेतात हे पाहून समायरा तिथेच राहण्याचा निर्णय घेते. तेव्हा तिच्या सायंटिस्ट मामासह वाचक ही अचंबित होऊन जातात. निसर्ग आणि आधुनिक तंत्रज्ञान यांचा सुरेख आणि अफलातून संगम या कथेमध्ये लेखकाने घडवून आणला आहे. या पुस्तकाची महत्त्वाची बाजू म्हणजे यातील चित्रे! चंद्रमोहन कुलकर्णी यांची चित्रे या कथेला एक वेगळा आणि नवा आयाम देतात. ही चित्रे या कथेशी एवढी एकरूप झालेली आहेत की ही चित्रे वेगळी काढली तर या कथा अपूर्ण वाटतील! कथेला अनपेक्षित वळण देण्यामध्ये लेखक पटाईत आहेत. हे प्रत्येक कथेतून आपल्याला जाणवतं. आपण सरळ कथा वाचत जातो. आणि कथा देखील आता सरळ या वाटेने जाईल असे वाटत असताना ती कथा असं काही वळण घेते की वाजक स्तंभित होऊन जातो. आणि हीच खरे तर फारूक एस. काझी यांची खरी ताकद आहे. त्यांच्या सर्व कथांमधील पात्र आणि त्यांची नावे पाहिली तर ती विशिष्ट अशी पात्रे किंवा नावे नाहीत. तर सर्वसमावेशक अशी सर्व पात्रे आहेत. त्यामुळे किती तीव्र सामाजिक भान लेखकाला आहे हेही आपल्याला जाणवते. आजच्या सोशल मीडियाच्या काळात नातेसंबंध दूरावत असताना, नातेसंबंध दृढ करणाऱ्या या कथा प्रत्येक वाचकांपर्यंत पोहोचल्या पाहिजेत. या कथांमध्ये कल्पनाशक्ती आहे. वास्तवता आहे. पण याच्या जोडीला कथालेखक म्हणून जी एक संवेदनशीलता लागते, जी एक तरलता लागते आणि मुलांच्या कथांमध्ये जो एक हळुवारपणा आणि नाजूकता आवश्यक असते ते सगळे गुण या कथेमध्ये ओतप्रोत भरलेले आहेत. म्हणून या कथा फक्त लहानच नाही तर मोठ्यांनाही गुंतवून ठेवणाऱ्या आहेत. स्थळ आणि काळानुसार बदलणारी भाषा आणि प्रसंगानुसार बदलणारं वर्णन या कथेच्या जमेच्या बाजू आहेत. यामुळे या कथा वाचकाला पकडून ठेवतात. आणि काही एक सामाजिक भान आणि साहित्यिक जाण या कथा देतात. आणि हेच या कथेचे मोठे यश आहे. - बालाजी मदन इंगळे ...Read more