* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: ARUNAS STORY
  • Availability : Available
  • Translators : MEENA KARNIK
  • ISBN : 9788184981421
  • Edition : 2
  • Publishing Year : DECEMBER 1998
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 206
  • Language : Translated From ENGLISH to MARATHI
  • Category : BIOGRAPHY & TRUE STORIES
  • Available in Combos :PINKI VIRANI COMBO SET - 3 BOOKS
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
A REMARKABLE WORK OF INVESTIGATIVE REPORTING AND NON-FICTION WRITING IN THE TRADITION OF TRUMAN CAPOTE`S IN COLD BLOOD JOURNALIST PINKI VIRANI RECREATES THE REAL-LIFE TRAGEDY OF ARUNA SHANBAUG, WHO WAS ATTACKED WITH A DOG CHAIN AND BRUTALLY RAPED IN THE VERY HOSPITAL WHERE SHE WAS A NURSE, AND ABANDONED BY HER FAMILY THEREAFTER. BRAIN-DEAD FOR SIGHT, SPEECH AND MOVEMENT, YET HOPELESSLY ALIVE TO PAIN, HUNGER AND TERROR, SHE NOW LIES, BARELY ALIVE, IN THE HOSPITAL WHERE SHE ONCE TREATED PATIENTS BACK TO HEALTH. VIRANI`S INVESTIGATIONS ALSO UNEARTHED THE CROWNING TRAGEDY: WHILE ARUNA HAS BEEN IN COMA FOR OVER TWENTY-FIVE YEARS, HER RAPIST, A SWEEPER IN THE HOSPITAL, WALKED A FREE MAN AFTER A MERE SEVEN YEARS IN PRISON FOR `ROBBERY AND ATTEMPT TO MURDER`. VIVID AND GUT-WRENCHING, THIS IS A BOOK THAT WILL HAUNT THE READER LONG AFTER THE FINAL PAGE HAS BEEN TURNED. `PINKI VIRANI HAS NARRATED ARUNA`S BRUTALIZATION THROUGH METICULOUS AND PERSISTENT RESEARCH. THE STRUCTURE OF THE BOOK IS NOTABLE IN THE WAY IT RESISTS SENSATIONALISM. ` - TELEGRAPH .`VIRANI`S BOOK IS RESEARCHED, THOUGHT-PROVOKING, SHARP. IT IS BOTH SAD AND ANGRY, SCATHING AND RESTRAINED. ` - PIONEER .`... HER STORYTELLING SKILL AND ABILITY TO RECREATE SCENES POWERFULLY MAKE THE BOOK GRIPPING ... AN AMAZING EFFORT IN RETELLING A TRUE-LIFE TRAGEDY.’- ASIAN AGE COVER DESIGN BY B & M DESIGN .
अरुणा शानबागसारखं प्रकरण हे वैद्यकीय व्यवसायातलं एकमेव प्रकरण असेल! पण तरीही त्यावर म्हणावं तेवढं संशोधन झालेलं नाही. अशा प्रकारचं आयुष्य जगणा-या रोग्यांसाठी दयामरणाचा निर्णय योग्य म्हणता येईल की अयोग्य यावर म्हणावी तेवढी चर्चा झालेली नाही. बलात्काराविरूद्धच्या कायद्यातील पळवाटांबाबतही योग्य तो उपाय झालेला नाही. अरुणाची ना धड मृत आणि ना धड जिवंत अशी अवस्था करणा-या नराधमाला मात्र केवळ सात वर्षांची शिक्षा झाली! तीही चोरी आणि मारहाणीच्या कृत्यांबद्दल. बलात्कार केल्याचा आणि खुनाच्या प्रयत्नाचा आरोप कोणी त्याच्यावर ठेवलाच नाही. अशा प्रश्नांची उठाठेव करण्याची गरज आहेच कुणाला? पिंकी विराणींचे हे पुस्तक या अशा धगधगत्या प्रश्नांना वाचा फोडते.

No Records Found
No Records Found
Keywords
#MEHTAPUBLISHINGHOUSE #MARATHIBOOKS #TRANSLATEDBOOKS #ONLINEBOOKS #BIOGRAPHYA&TRUESTORIES #ARUNACHIGOSHTA #MEENAKARNIK #PINKIVIRANI
Customer Reviews
  • Rating StarVikas Jadhav

    सध्या संपूर्ण भारतभर 2-3 प्रकरणांची चर्चा होतेय,ते म्हणजे निर्भया हत्याकांड व दोषींची फाशी,हैद्राबाद बलात्कार व आरोपींचे एन्काऊंटर, उन्नव बलात्कार प्रकरण. ह्या सगळ्या बातम्या वाचतांना,बघतांना एक घटना आठवली की अजूनही अंगावर शहारे येतात.तिचे नाव अरुणाशानभाग.KEM हॉस्पिटलमध्ये नर्स असलेल्या अरुणावर तिथल्याच एका वॉर्ड बॉय ने बलात्कार केला,त्यावेळी तिचा गळा लोखंडी साखळीने आवळल्या मुळे अरुणा कोमात गेली ती तब्बल 42 वर्षे. ह्या काळात तिचा भावी पती होणार असलेल्या डॉक्टर ने देखील साथ सोडली.पण जिवाभावाच्या मैत्रिणींनी तब्बल 42 वर्ष निरपेक्ष सेवा केली.तिच्या गुन्हेगाराला फक्त 7 वर्षे सजा झाली आणि तो मोकाट सुटला ह्या संघर्षाची कहाणी पिंकी विराणी यांनी शब्दबद्ध केलीय,तर मीना कर्णिक यांनी मराठी अनुवाद केलाय अवश्य वाचावे असे ...Read more

  • Rating StarVikas Jadhav

    सध्या संपूर्ण भारतभर 2-3 प्रकरणांची चर्चा होतेय,ते म्हणजे निर्भया हत्याकांड व दोषींची फाशी,हैद्राबाद बलात्कार व आरोपींचे एन्काऊंटर, उन्नव बलात्कार प्रकरण. ह्या सगळ्या बातम्या वाचतांना,बघतांना एक घटना आठवली की अजूनही अंगावर शहारे येतात.तिचे नाव अरुणाशानभाग.KEM हॉस्पिटलमध्ये नर्स असलेल्या अरुणावर तिथल्याच एका वॉर्ड बॉय ने बलात्कार केला,त्यावेळी तिचा गळा लोखंडी साखळीने आवळल्या मुळे अरुणा कोमात गेली ती तब्बल 42 वर्षे ह्या काळात तिचा भावी पती होणार असलेल्या डॉक्टर ने देखील साथ सोडली.पण जिवाभावाच्या मैत्रिणींनी तब्बल 42 वर्ष निरपेक्ष सेवा केली.तिच्या गुन्हेगाराला फक्त 7 वर्षे सजा झाली आणि तो मोकाट सुटला ह्या संघर्षाची कहाणी पिंकी विराणी यांनी शब्दबद्ध केलीय,तर मीना कर्णिक यांनी मराठी अनुवाद केलाय अवश्य वाचावे असे ...Read more

  • Rating StarDAINIK GAONKARI 6-2-2011

    अरुणा शानभाग या के.ई.एम हॉस्पिटलमधील नर्सवर झालेल्या अत्याचाराची ही सत्यकहाणी आहे. तिच्यावर ओढवलेल्या त्या अमंगल आणि क्रूर अशा घटनेनंतर तिच्या मेंदूवर परिणाम होतो आणि ती नेहमीसाठी अर्धवट बेशुद्धावस्थेत जाते आणि सुरू होतो तिचा जीवनमृत्यूशी संघर्ष. मळ लेखिका पिंकी विराणी यांनी अरुणा विषयीचा सगळा तपशील मिळवून लिखाण केले असल्याने वाचनीयता अधिक आहे. अगदी पहिल्या वाक्यापासून वाचक कथेशी एकरूप होऊन जातो. भाषाशैली इतकी प्रभावी आहे की, घटना डोळ्यांसमोर घडत असल्याचे जाणवते आणि आपण देखील या घटनेचे प्रत्यक्षदर्शी असल्याचा भास होतो. अरुणाची निरागसता, तिचे दु:ख-यातना व्यक्त करण्यात लेखिका यशस्वी झाली आहे. याचवेळी लेखिकेने ‘दया मरणाच्या’ विषयावर देखील मंथन केले आहे. आपल्याला मरण हवंय हे सुद्धा सांगता न येणाऱ्या अरुणाच्या भावविश्वात लेखिका आपल्याला सहजपणे घेऊन जाते. तिची प्रत्येक भावना आपल्यापर्यंत पोहोचवते. ...Read more

  • Rating StarHINDUSTAN CHANDERI 29-9-2010

    आज या घटनेला छत्तीस वर्षाचा कालावधी लोटला आहे. केईएम हॉस्पिटलमध्ये एका नर्सवर झालेला खुनी हल्ला, त्यामुळे तिला झालेले ब्रेनहॅमरेज आणि त्यानंतरचा प्रदीर्घ काळ तिचा जीवनाशी चाललेला निर्विकार संघर्ष. घटना नवीन असताना मेडिकलच्या विद्याथ्र्यांना आवर्जून अ्यासायला उपयुक्त केले जायचे. विधी महाविद्यालयातून कायद्याचे शिक्षण घेणाऱ्या विद्याथ्र्यांना पहिल्या वर्षी ही केस अभ्यासावी लागायची. पिंकी विराणीनी ‘अरूणाज स्टोरी’ लिहिली नव्हती तोपर्यंत अरुणा शानबागवर केवळ खुनी हल्ला झाला अशी अनेकांची समजूत होती. आपल्या कायद्याच्या भाषेतील बलात्काराची व्याख्या वेगळी असल्यामुळे गुन्हेगारांना या गुन्ह्यासाठी शिक्षा झालीच नाही. खुनी हल्ला आणि चोरी यासाठी केवळ सात वर्षांची सक्तमजुरीची शिक्षा एकाच वेळेला भोगल्याने त्याची सुटका झाली. पिंकी विराणीने सत्य शोधले, त्या घटनेपासून प्रतिसाद देण्याच्या पलीकडे गेलेल्या अरुणाा शानबागकडून काही माहिती मिळण्याची शक्यता नव्हती. त्यावेळी हजर असलेल्या लोकांचा अरुणाच्या नातेवाईकांचा माग काढत सत्याचा मागोवा घेण्याची कामगिरी अतिशय अवघड होती. पिंकी विराणीने ती पेलली. संशोधनात्मक लेखनाचा विषय समजून लोकांच्या बोलण्यातून धागेदोरे जुळवत अरुणाचा भूतकाळ, कौटुंबिक पाश्र्वभूमी, स्वभाव, प्रत्यक्ष घटना घडलेल्या दिवसाच्या मागच्या पुढच्या काळातील संदर्भ शोधून अरुणाची सत्यकथा वाचकांपुढे मांडली. मीना कर्णिक यांनी भाषेला योग्य वजन देत तीच सत्यकथा मराठीत अनुवादित करून ‘अरुणाची गोष्ट’ या कादंबरीद्वारे वाचकांपुढे मांडली. घटनास्थळ आणि त्यानंतर अरुणाचा दीर्घ निवास (पेशंट म्हणून) केईएममध्येच असल्यामुळे केईएमचा स्टाफ, नर्सेस, डीन हे सगळेच कादंबरीत हजेरी लावतात. मृत नाही आणि फक्त जिवंत म्हणण्याखेरीज अरुणा काहीही करू शकत नाही अशा अवस्थेत तिच्या नातेवाईकांनी तिच्याकडे पाठ फिरवल्यावर गेली अनेक वर्षे तिच्याबरोबर काम करणाNया नर्सेसनी या घटनेनंतर हॉस्पिटलमध्ये रूजू झालेल्या व्रतस्थपणे अरुणाला सांभाळले. अरुणाच्या अत्याचाराइतकीच या नर्सेसच्या माणुसकीची ही कहाणी बनते. एका खुनशी अधम पुरुषाच्या हीनतेबरोबर तेव्हाचे डीन सी. के. देशपांडे अरुणाचा भावी वर डॉ. संदीप सरदेसाई यांच्या सहृदयतेची काहणी बनते. प्रसंगानुसार इतर अनेक पात्रे कादंबरीत हजेरी लावतात. घटनेची उकल करत जातात. पोलीस चौकशी, केस, निकाल या ठरावीक चाकोरीतून केस फिरते आणि नंतर शिल्लक राहतो तो अरुणाचा जीवघेणा संघर्ष. शब्दात व्यक्त करू शकत नाही. तिला डोळ्यांनी दिसत नाही तरीही वेदना तिला जाणवतात. परंतु, या वेदनामय जीवनातून मला मुक्ती हवी आहे हे सांगता न येणाNया अवस्थेत अरुणा शानबाग वर्षानुवर्षे जगते आहे. कादंबरीत प्रत्यक्ष घटना, अरुणाचा भूतकाळ आणि या घटनेनंतर आजपर्यंत सुरू असलेल्या केईएमचा कारभार आणि त्यासंबंधीत व्यक्तीविषयी माहिती देणारे प्रकल्प अशा तीन प्रकरणात कादंबरी आपल्यापुढे उलगडते. कादंबरी संपते आणि वाचकांच्या मनात प्रश्नांची मालिका सुरू होते. स्त्रियांची समाजातील सुरक्षितता आपल्या उपयोगाचा नाही म्हटल्यावर त्याच्या नातेवाईकांची होणारी व्यवहारी प्रतिक्रिया, कोणत्या तरी चुकीने एका जीवाला आयुष्यभर मिळणाNया यातना या सगळ्या मन पिळवटून टाकणाNया विचारांची वाचक विषण्ण होतो. अरुणाची गोष्ट वाचकांच्या मनात करुणा दाटून आणते. या करुणेने वेगळे रूप घेऊन सामाजिक बांधिलकीच्या दृष्टीने काही ठोस पावले उचलली तरच अरुणाची गोष्ट सार्थकी लागली असे म्हणता येईल. अरुणाचा मूक संघर्ष आणि समाजातील पुरुषी पशू यांची गोष्ट ‘अरुणाची गोष्ट’ मध्ये सापडते. ‘अरुणाज स्टोरी’ या पिंकी विराणी लिखित सत्यकथेचा मीना कर्णिक यांनी केलेला अनुवाद ‘अरुणाची गोष्ट’ आणि रविंद्रनाथ टागोर यांनी लिहिलेली ‘नष्ट नीड’ या विवाहबाह्य संबंधातील गुंतागुंत समर्थपणे दाखवणारी कादंबरी मेहता प्रकाशनने प्रकाशित केली आहे. ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

SARTH
SARTH by DR. S. L. BHYRAPPA Rating Star
हेमंत सांबरे

गेल्या तीन दिवसांत ही कादंबरी वाचून पूर्ण झाली .. ही कादंबरी वाचून होताच मन अगदी सुन्न होऊन गेले आहे . त्याचबरोबर अनेक संमिश्र भावना मनात दाटून आल्या आहेत . #आवरण ही जगप्रसिद्ध कादंबरी वाचल्यानंतर भैरप्पा यांच्या बद्दल मनात खूप आदरभाव निर्माण झाला होा . त्यानंतर त्यांचे हे दुसरे पुस्तक म्हणजे #सार्थ आज वाचून पूर्ण केले. या कादंबरीची कथा सातव्या शतकात घडत असते . *नागभट्ट* हा कादंबरीचा नायक आहे . हा नागभट्ट तुमच्या माझ्या सारखा एक सर्वसामान्य मनुष्य आहे . भैरप्पा यांनी त्याच्या नजरेतून त्या काळात घडत असलेल्या अनेक घटनांचा सूक्ष्म आढावा आपल्या समोर अतिशय समर्थपणे मांडला आहे . हे सातवे शतक म्हणजे असे होते की वैदिक धर्माचा प्रभाव जरी जनमानसात असला तरी , बौद्ध धर्माने ही आपली पाळेमुळे पूर्ण निदान उत्तर भारत , पूर्व भारत या भागात पसरवली होती . एक सामान्य मनुष्य म्हणून नागभट्टच्या मनात सुरू असलेली विविध द्वंद , त्याची वैदिक धर्म की बौद्ध धर्म याविषयी झालेली द्विधा मनस्थिती ही लेखकाने अचूक टिपली आहे . अनेक चर्चांमधून बौद्ध तत्त्वज्ञान , वैदिक तत्त्वज्ञान यांची ओळख अतिशय सोप्या भाषेत लेखक आपल्याला करून देतात , ते वाचताना आपल्या चित्ताला एक वेगळेच समाधान मिळत राहते .. या सर्व तत्त्वज्ञानाची प्रदीर्घ चर्चा , नायकाला येत असलेले वेगवेगळे अनुभव यातून आपणही समृध्द होत जातो . मधल्या काळात नायक मथुरेला येऊन राहतो . तेव्हा तिथल्या एका नाटक मंडळींबरोबर ओळख होऊन नायकाला त्यांच्या एका नाटकात प्रत्यक्ष *कृष्णाची* भूमिका करायला मिळते . तेव्हा त्याचे नाव *कृष्णानंद* असे होते . या भूमिकेमुळे नायकाला त्या भागात प्रचंड प्रसिध्दी मिळते . या नाटकातील असलेली त्याची नायिका चंद्रिका या सुंदर स्त्री बरोबर त्याचा विशेष स्नेह होऊन त्यांचे प्रेम ही जुळते . एखादी गोष्टीचा प्रचंड अभ्यास करून त्याला मांडणे यात भैरप्पा यांचा हात कदाचित फार कमी लेखक धरू शकतील . ही कादंबरी वाचतानाही प्रत्यही जाणवत राहते . याच काळात आद्य शंकराचार्य व मंडणमिश्र यांच्यातील झालेल्या जगप्रसिद्ध वादावर दोन ते तीन प्रकरणे या पुस्तकात आली आहे . या दोन दिग्गज वैदिक ऋषी बद्दल मी इतर अनेक ठिकाणी खूप ओझरते उल्लेख ऐकले होते , पण या कादंबरीत विस्तृत माहिती मिळाली , व एक वेगळेच समाधान मिळाले . कादंबरीचा शेवट आपल्याला पुस्तकातील आधीच्या अनेक कथावस्तू पासून एका वेगळ्याच दुनियेत घेऊन जातो .. याच सातव्या शतकात वायव्येकडून अरब लोकांची आक्रमणे सुरू झाली होती . तोपर्यंत भारतवर्षात लढली जाणारी युद्ध फक्त रणांगणावर लढली जात , त्याचा सामान्य जनतेला कुठलाही त्रास होत नसे . पण अरबांनी केलेल्या आक्रमण मुळे भारताचा सांस्कृतिक ढाचा कसा उद्ध्वस्त होऊ लागला याचे अचूक व सत्य वर्णन भैरप्पा यांनी केले आहे . ते वाचताना तेव्हाही हिंदूंची सद्गुण विकृती ( अनावश्यक असलेली अती सहिष्णुता ) कशा प्रकारे हिंदूंचा नाश करते हे ही त्यांनी सांगितले आहे . ती सर्व शेवटची प्रकरणे आपण सर्व हिंदूंनी मुळातच वाचण्यासारखी व अभ्यास करण्यासारखी आहे . एका प्रसंगात जेव्हा काही राजे एकत्र येऊन अरबांवर आक्रमण करण्याचे योजतात , तेव्हा धूर्त अरब त्या गावातील सूर्यमंदीर भ्रष्ट करायची धमकी देऊन त्या गावातील लोकांना युद्ध करण्यापासून व बाहेरून आलेल्या सैनिकांना सहाय्य न करण्याचे वचन घेतात . त्यामुळे जे नको तेच होते , व हळूहळू तो प्रदेश अरबांच्या ताब्यात जाऊन तेथला बौद्ध , वैदिक हिंदू धर्म नष्ट होऊ लागतो , याचे विदारक वर्णन आपल्यासमोर येते . हे वाचताना मला १७५१ साली नानासाहेब पेशव्यांनी काशी वर आक्रमण करून ते क्षेत्र मुक्त करण्याच्या प्रसंगाची आठवण झाली . तेव्हाही काशी मधील जनतेने नानासाहेब पेशव्यांना रोखले होते , नाहीतर तेव्हाचा ज्ञानवापी मंदीर मुक्त झाले असते ... तेव्हाही हिंदूंची सद्गुण विकृती आड आली जशी ती सातव्या शतकात ही आड आली होती .. असो --- अनेक अद्भुत प्रसंगातून आपल्याला ही कादंबरी घेऊन जात राहते ..सातव्या शतकातील भारताचे वर्णन वाचून आपण त्यावेळच्या राजांची वृत्ती , जनतेचा स्वभाव , साधू तसेच बौद्ध भिक्खू यांचे स्वभाव, त्यांचे विचार आपल्याला कळत जातात . लेखक आपल्याला नालंदा विद्यापीठ देखील दाखवून आणतो . त्याकाळात तेथील अध्ययन कसे चालत असे , हेदेखील आपल्याला वाचायला मिळते . पुस्तकाला कादंबरीची मोकळीक असली तरी आपल्याला ऐतिहासिक दृष्टिकोन ही मिळतो , हे नक्की ! ही कादंबरी वाचून होताच, भैरप्पा यांच्या इतर सर्व कादंबऱ्या व पुस्तके वाचण्याची उत्सुकता निर्माण झाली आहे , व ती इच्छा ही लवकरच पूर्ण होईल ही आशा! ...Read more