* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: A KIDNAPPED MIND
  • Availability : Available
  • Translators : SUSHMA JOSHI
  • ISBN : 9788184989885
  • Edition : 2
  • Publishing Year : MARCH 2016
  • Weight : 200.00 gms
  • Pages : 272
  • Language : Translated From ENGLISH to MARATHI
  • Category : BIOGRAPHY & TRUE STORIES
Quantity
Buying Options:
  • Print Books:
HOW DO WE BEGIN TO DESCRIBE OUR LOVE FOR OUR CHILDREN? PAMELA RICHARDSON SHOWS US WITH HER PASSIONATE MEMOIR OF LIFE WITH AND WITHOUT HER ESTRANGED SON, DASH. FROM AGE FIVE DASH SUFFERED PARENTAL ALIENATION SYNDROME AT THE HANDS OF HIS FATHER. INDOCTRINATED TO BELIEVE HIS MOTHER HAD ABANDONED HIM, AFTER YEARS OF MONITORED PHONE CALLS AND IMPEDED ACCESS EIGHT-YEAR-OLD DASH DECIDED HE DIDN’T WANT TO BE "FORCED" TO VISIT HER AT ALL; LATER HE TOLD HER HE WOULD NEVER SEE HER AGAIN IF SHE TOOK THE CASE TO COURT. BUT HE DIDN’T COUNT ON HIS INDEFATIGABLE MOTHER’S FIERCE LOVE. FOR EIGHT MORE YEARS PAMELA BATTLED DASH’S FATHER, THE LEGAL SYSTEM, THEIR PSYCHOLOGIST, THE SCHOOL SYSTEM, AND DASH HIMSELF TO TRY AND PROTECT HER SON - FIRST FROM HIS FATHER, THEN FROM HIMSELF. A KIDNAPPED MIND IS A HEARTRENDING AND MESMERIZING STORY OF A CANADIAN MOTHER’S EXILE FROM AND REUNION WITH HER CHILD, THROUGH GRIEF AND BEYOND, TO PEACE.
आईचा आपल्या मुलाबद्दलचा शोक आणि ’पालकदुराव्याची लक्षणे’ (पॅरेन्टलएलिनेशनसिंड्रोम - पी.ए.एस.) सांगणारी ही दुपदरी कहाणीआहे. 1985 मध्ये डॉ.रिचर्ड गार्डनर यांनी ’पीएएस’ प्रथम उजेडात आणला. मुला बद्दलचा कस्टडीचा वाद आणि तदनुषंगाने मुलाला पढवणे, दुसर्या जोडीदाराबद्दल मुलाच्या मनात विष कालवणे (इतकंकी, ते पढवलेले विचार शेवटी त्या मुलाला स्वत:चेच वाटू लागतात.) यामुळे त्या मुलाचे मानसिक संतुलन ढासळते. यालाच ’पीएएस’ नाव दिले गेले. पॅमेला रिचर्डसनचा मुलगा डॅश हा त्याच्या वयाच्या पाचव्या वर्षापासून पीएएसपीडित होता. याला कारण त्याचा बापच होता. फोनवरचे निर्बंध आणि अॅक्सेसमध्ये आणलेले अगणित अडथळे याकडे दुर्लक्षकरून, ’आपल्या आईने आपल्याला टाकून दिलं, तिने विश्वासघात केला,’ हे डॅशच्या मनावर हरतर्हेने बिंबवले गेले. आणि आठ वर्षांच्या डॅशने ठरवले की, आईकडे जाण्यासाठी त्याच्यावर बळजबरी करू नये. शेवटीतर त्याने आईला असे ही सांगितले की, ’जर आई कोर्टात गेली, तर तो तिचे तोंडही पाहणार नाही.’ यानंतरची आठ वर्षे डॅशचा बाप, न्यायव्यवस्था, मानसोपचार- तज्ज्ञ, शिक्षण व्यवस्थायासार्यांशी पॅमेला झुंजत राहिली.आपल्या मुलाचा त्याच्या बापापासून आणि शेवटी त्याचा त्याच्या स्वत:पासून बचाव करण्यासाठी झगडत राहिली.

No Records Found
No Records Found
Keywords
#TRANSLATEDBOOKS #AKIDNAPPEDMINDMARATHI #TRUESTORIES #SUSHMAJOSHI
Customer Reviews
  • Rating StarDaily Aikya 7-5-17

    मुलं या जगात येतात तेव्हा ती त्यांच्या पालकांवर, त्यांच्या प्रेमावर पूर्णतया विसंबून असतात. मुलांचं पालन पोषण करण्याची पद्धती, क्षमता या वेगवेगळ्या असतात. पण बहुतेक जण हे आयुष्यभराचं काम यशस्वीरित्या पार पाडतात. तथापि काही मुलांना मात्र असं पालकांचं ुख मिळत नाही. काही आई वडिलांना त्यांच्या शारीरिक, मानसिक अक्षमता, आजारपणं, व्यसनाधीनता, गुन्हेगारी, गरिबी, युद्ध अशा अनेक कारणांमुळे मुलांचे संगोपन करता येत नाही. अशावेळी या परिस्थितीतील मुलांचे पालन-पोषण कुटुंबातील इतर व्यक्ती, त्या कुटुंबाचे मित्रमंडळ, शेजारी किंवा सामाजिक संस्था याकडून केले जाते. पण काही वेळा असेही पालक आढळतात, की ते आपल्या मुलांचं रक्षण, संगोपन, शिक्षण, मार्गदर्शन करण्यास अपयशी ठरतात. आई-वडील झालेली ही मंडळी काही असमर्थ किंवा पुरेशी साधनसामग्री नसलेली अशी अजिबात नसतात. उलट ही मंडळी पालकत्व सोडलं तर स्वच्छ विचारांची, हिकमती, जीवनाच्या इतर क्षेत्रात कार्यक्षमत असतात. या मंडळींचे मुलांवरचे प्रेम, आस्था विचारात घेतली, तर या पालकांपेक्षा या व्यक्ती स्वतःच्या गरजांकडे अधिक लक्ष देतात. आणि त्यांच्या या स्वतःबद्दलच्या निष्ठेमुळे ही मंडळी इतरांपेक्षा वेगळी वाटतात. स्वतःच्या गरजा पूर्ण करण्याच्या भरात संबंध, नाते नष्ट करतात. मग त्यासाठी कसलीही किंमत मोजण्यास त्यांची तयारी असते. पॅमेला रिचर्डसनच्या ‘अ किडनॅप्ड माइंड’ या पुस्तकात तिने आपल्या मुलाची मानसिक पडझड आणि परिणामी त्याची आत्महत्या हे सारं नोंदवलं आहे. ही एक व्यथित करणारी कहाणी आहे. यात डॅशची जगण्याची धडपड आहे. त्याच्या बापाने आपल्या माजी पत्नीवर सूड उगवण्यासाठी आपल्यावर पूर्णपणे अवलंबून असलेल्या आपल्या मुलाच्या गरजाकडे संपूर्ण दुर्लक्ष केलं होतं. अशा परिस्थितीतील डॅशची धडपड आहे. डॅशला जणू त्याच्या सोळा वर्षांच्या आयुष्यातील अकरा वर्षे मानसिकदृष्टया ओलीस ठेवलं गेलं होतं. ‘अ किडनॅप माइंड’ ही केवळ एका आईची, तिचा कटू घटस्फोट आणि कस्टडी, यानंतर मुलाची कस्टडी मिळवण्याची लढाई यांची कहाणी नाही. एखाद्या मुलाचा दोन्ही पालकांवर प्रेम करण्याचा आणि दोघांकडून त्याच्यावर प्रेम करवून घेण्याचा हक्क हिरावून घेतल्यामुळे त्याची जी भावनिक हानी होते. त्या हानीची ही कहाणी आहे. न्याय व्यवस्थेचं मुलांच्या गरजांकडे केलं जाणारं दुर्लक्ष, याची ही कथा आहे. आई-बापाच्या उबदार प्रेमाचा अनुभव घेतलेल्या आनंदी निरोगी मुलाला, पद्धतशीरपणे एका पालकाच्या प्रेमापासून का तोडलं जातं, त्या कारणांचा कायद्याच्या मूलभूत चौकटीच्या पलीकडे जावून शोध घेण्याची न्यायव्यवस्थेची अनास्था या कथेत आहे. डॅशची कथा ही ‘पालक दुराव्याचे’ मानसिक कटुतम दुष्पपरिणाम सोसण्याचे प्रतिनिधित्व करते. ‘पालक दुराव्याचे दुष्परिणाम’ हे कस्टडी केसमधले ‘जोड उत्पन्न’ आहे. आपल्या माजी जोडीदाराला धडा शिकवणे, हेच उद्दिष्ट डोळ्यांपुढे ठेवल्याने आपल्या पाल्याच्या आनंदाकडे, भल्याकडे दुर्लक्ष करणारे अनेक पालक आहेत. त्यामुळे कित्येक मुलांना हे दुःख भोगावे लागत आहे. हे पालक मूल आणि दुसरा पालक यांच्यातील नातेसंबंध मुद्दाम नष्ट करत असतात. घटस्फोटानंतर ‘संयुक्त कस्टडी’ हा चांगला पर्याय आहे असा विचार १९८० नंतर कोर्टाने केला. पण तेव्हापासून त्या घटना वारंवार घडत असल्याने संबंधित व्यावसायिकांच्या लक्षात येत आहे. पालक दुराव्याचे मानसिक दुष्परिणाम ही बाब विवाद्य झाली आहे. कारण ‘जस्टीस फॉर चिल्ड्रेन’आणि नॅशनल अलायन्स फॉर फॅमिली कोर्ट अशा सारख्या इतर काही घटकांनी आपल्या कार्यक्षेत्राच्या हितसंबंधाचे रक्षण करण्यासाठी ही बाब अस्तित्वात नाही, असे मत व्यक्त केले आहे. माझा विश्वास आहे, की हे पुस्तक काही दृष्टिकोन देईल. घटस्फोटित पालकांची मुलं शिक्षणात अयशस्वी ठरतात. मग हे शिक्षण उपपत्तीवर वा निरीक्षणावर आधारलेलं असो. अशा मुलांच्या गरजांकडे बघण्याची व्यापक आणि वेगळी दृष्टी अ किडनॅप्ड माइंड या पुस्तकामुळे मिळेल, असा मला विश्वास आहे. या कारणामुळेच हे पुस्तक न्यायाधीश, कुटुंब वकील आणि घटस्फोटित कुटुंबाचे सर्व संबंधित यांनी जरूर वाचले पाहिजे. आपल्या मुलाला त्याच्या आयुष्यभर, त्याच्या मदतीसाठी आणि नंतर त्याचा मृत्यू व्यर्थ जाऊ नये यासाठी पॅमेला रिचर्डसनने दाखवलेली ताकद, केलेला पाठपुरावा आणि तिची बांधिलकी याची मी प्रशंसा करते. या उत्तम पुस्तकाला हातभार लावण्याची संधी मिळाली, हा माझा सन्मानच समजते. ...Read more

  • Rating StarSAKAL 5-6-16

    ‘अ किडनॅप्ड माइंड’ या इंग्रजी पुस्तकाचा ‘एका मातेचा लढा’ हा मराठी अनुवाद सुषमा जोशी यांनी केला आहे. पॅमेला रिचर्डसन यांनी इंग्लिशमध्ये ही सत्यकथा लिहिली आहे. घटस्फोट, घटस्फोटित पालक, त्यांची मुलं हे आता जगभरातलं सर्वत्र दिसणारं ओळखीचं समाजचित्र आहे. टस्फोट घेताना सहजीवनाची होणारी पडझड, कुटुंब, आई-वडील-भावंडं यांच्याबरोबर एकत्र जगण्याचा संपणारा प्रवास हा वेदनादायक अनुभव असल्याची जाणीव ‘एका मातेचा लढा’ या सत्यकथनातून होते. घटस्फोट घेतल्यानंतर मूल आईकडं राहणार, की बाबांकडं? हा कळीचा प्रश्न असतो. आई-वडील विभक्त झाल्यानंतर ‘मूल,’ मुलावरचा हक्क ही त्या दोघांमध्ये स्पर्धा, असूयेची, कुरघोडीची, विजयाची गोष्ट होते. मुलाची वाढ, त्याचं संगोपन, त्याचं भावविश्व, त्याचं मोठं होणं या गोष्टींना मुलाचा ताबा या प्रकरणात दुय्यम स्थान प्राप्त होतं. अपत्य हे घटस्फोटित पालकांचं सूड उगवण्याचं हक्काचं साधन होतं. आई किंवा वडील खूप वाईट आहेत. आणि माझ्या सांगण्याप्रमाणे वागायचं, बोलायचं हे त्या मुलाला वारंवार सांगितल जातं. या प्रकारामध्ये मुलाचं कोवळं, निरागस भावविश्व विस्कटून जातं. त्याला खूप मानसिक, भावनिक दडपण सहन करीत जगावं लागतं. हा दबाव सहन झाला नाही तर ही मुलं स्वत:वर, शाळेतल्या मुलांवर, एकूणच जगावर चिडतात. प्रसंगी कमालीची क्रूर होतात. या पुस्तकात घटस्फोटित आईच्या नजरेतून मुलांच्या उद्ध्वस्त भावविश्वाची, त्याच्या मनावरील प्रचंड दबावाची, त्यातून घडणाऱ्या त्याच्या आचरणाची कहाणी सांगितलेली आहे. घटस्फोटीत पालकांच्या आचरणाची कटुता मुलाला एकलकोंडा, निराश तर करतेच. पण त्याचं भावनिक-मानसिक संतुलन नष्ट करते. अशा मुलाचं जगणं हे त्याचे पालक, नातेवाईक, शाळा यांच्यासमोरची एक समस्या बनते. याचंच चित्रण इथं केलंय. घटस्फोटित पाल्याचा आत्महत्या करण्याच्या दिशेने होणारा प्रवास यातून स्पष्ट होतो. ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

आबासाहेब कडू, अमरावती.

एकाच दमात छप्पन वेळा वाचावा असा काव्यसंग्रह* दै.सकाळच्या सप्तरंग पुरवणीत अ-अमिताभचा व दै.हिंदस्थान मधील `अमरावती सिरीज` चे स्तंभलेखक व अमरावती येथील प्रसिद्ध साहित्यिक श्री जी.बी.देशमुख ह्यांचा छप्पन कवितांचा समावेश असलेल्या अमरावतीच्या वस्तू,वास्ू आणि माणसाच्या वैशिष्ट्यावर आधारित `अमरावतीचे छप्पन स्वभाव` हे पुस्तक मी विकत घेतले. घरी गेल्यावर त्यातील छप्पनही कविता एकाच दमात वाचून काढल्या अन् पैसा वसूल झाल्याचे समाधान झाल्यावर त्यावर चिंतन करावेसे वाटले, म्हणून हा लेखनप्रपंच. वाचक हा अमरावतीकर असेल तर `अमरावतीतल्या गमती` ही पहिलीच कविता त्याच्या मनाचा ठाव घेते आणि `याटोत` बसवून परकोटातल्या मुर्गी मठासह अख्खी अमरावती फिरवून आणते. गांधीचौकात गांधी नाही मालटेकडीवर माल नाही.. खेटरे झाली ब्रँडेड सगळी मोची गल्लीत मोची नाही.. तपोवनात तपस्वी नाही कल्याणनगरात कल्याण नाही… लेखकाच्या भारदस्त शब्दशक्तीचा इथेच विजय होतो आणि मग अमरावतीची एकेक वैशिष्ट्ये पादाक्रांत करित छप्पनीकडे वाटचाल करीत जातो. ही काव्यात्मक रुपातील वैशिष्ट्ये वाचतांना अमरावतीचा पन्नाशितला वाचक देहभान विसरुन गतकाळात रममाण होतो. त्याचे मन नकळत सुखावते, गात्रे जागृत होतात, मेंदू रिचार्ज होतो तर तरुण वाचकाच्या मनात अमरावती शहराविषयी कुतुहल निर्माण होते. तोही मग त्यातील खाणाखुणा शोधायचा प्रयत्न करत बसतो. या संग्रहातील प्रत्येक कवितेवर एकेक निबंध तयार होऊ शकतो. स्वभाव हा शब्द सहसा मनुष्याशी जोडून उपयोगात आणला जातो पण इथे तर लेखकाने निर्जीवातही प्राण फुंकले आहे. अमरावतीच्या याटोत बसून ह्यातील सजीवता आपल्याला अनुभवता येईल. मग तो बेनाम चौक असो, कुथे बस स्टॉप असो, अनेक नावांचे कापसाचे जीन असो, वालकट कम्पाउंड असो, हनुमान आखाडा असो, इर्विन, डफरीन दवाखाने असो, `अमरावतीतल्या विहिरी` असो नाहीतर मोर्शी रोडवरील थोर महात्म्यांचे पुतळे असो. अमरावतीच्या शब्दकळा, अमरावतीच्या हाका, अमरावतीच्या वल्ली, अमरावतीच्या टॉमीची पाॅटी, अमरावतीचे सुपरस्टार, अमरावतीचा बागुलबोवा, अमरावतीचे वेडे एकदमच बेस्ट. अमरावतीच्या रेल्वे ब्रीजचे तर ते भरभरुन कौतुक करतात. चारी बाजूनं उतरणारा पूल फक्त जपानमध्ये आहे अन् सिंगापूरच्या नंतर नंबर आपल्याच पुलाचा आहे कारण हा पूल आहेच कौतुक करण्याजोगा, मलाही ह्या पूलाचे कौतुक याच्याकरिता आहे की ह्या पूलाचे बांधकाम माझ्या पेठ मांगरुळी गावच्या अभियंत्याच्याच देखरेखीखाली झाले आहे. अमरावतीशी प्रत्यक्ष संबंध आला तो १९७५ सालापासून,पण काही अपवाद वगळता लेखकाच्या छप्पनीतील अनेक वैशिष्ट्ये मी अनुभवलेली आहेत. ह्याच रेल्वेपुलावर रोज संध्याकाळी एक भोळसट मुलगा गाणे गायचा,लोक त्याला प्रेमाने शाहरुख म्हणायचे,कारण तो स्वतःला शाहरुख खानंच समजत असे. अमरावतीच्या कॉलेजमधील तरुणांचे भावविश्व मांडतांना लेखकाने हात आखडता घेतला नाही. इंजिनिअरिंग कॉलेज व व्ही.एम.व्ही. ही त्यावेळची आघाडीवरची कॉलेजेस होती. त्यामधील कॉलेजियन्सचे दर्द लेखकाने मिश्कीलपणे मांडले त्या `अमरावतीचा दर्द` ह्या कवितेतील ओळी आताच्या पेन्शनरांना त्या काळात घेऊन जातील. तरुण मंडळींनी तो आनंद पुस्तक वाचून घ्यावा. अमरावतीचा आद्य मॉल म्हणजे फक्त महिलांसाठीच राखीव असलेली बाजारपेठ अशी ओळख असलेलं `जोशी मार्केट`, `अमरावतीची नवरात्र`, `अमरावतीचे जेष्ठ नागरिक` ह्या पूरक कविताही त्याच प्रेमाच्या विश्वात घेऊन जातात.. `अमरावतीचा भुलभुलैय्या` मधील अनुभव आजही अनेकांना येतो, मलाही अनेकदा आला, त्याकरिता ही पूर्ण कविताच वाचणे आवश्यक आहे. अमरावतीचा अंबानाला, त्यानुषंगाने मास्तराने दिलेली `पदवी`, अमरावतीचे भोंगे, अमरावतीच्या उन्हाच्या चटक्यातील गरम चहाचे घोट थेट लंडनच्या थंड हवामानातल्या आईस्क्रीमलाही थंड करुन टाकतात ही तुलना मनाला भावून जाते. ब्लॅक अँड व्हाईट फोटोग्राफीतली मजा आताच्या डिजीटल फोटोग्राफीत नाही. त्यावेळी अमरावतीत मोजक्याच असलेल्या फोटो स्टुडिओची नावे लेखकाने दिलेली आहेत.त्यांनीही आता डिजीटल फोटोग्राफीच्या युगात प्रवेश केलेला आहे.त्यावेळेस काढलेले ब्लॅक अँड व्हाईट फोटो अनेकांनी जपून ठेवले असावे. लेखक मणीबाई गुजराती शाळेत शिकत होते त्यामुळे त्या शाळेचे व गुरुजनांचे गुणगान, स्वभाववैशिष्ठ्ये हे पुस्तकात येणे स्वाभाविकच आहे, मास्तराला पाणी पाजता पाजता त्यांचा वर्गमित्र पाणी पुरवठा विभागात कार्यकारी अभियंत्यापर्यंत कसा पोचला हा मनोरंजक किस्सा `अमरावतीची गुरुवाणी` कवितेतून खुसखुशीत भाषेत रेखाटला आहे. अमरावतीच्या टाकीजा, त्यांची वैशिष्ट्ये तर आहेतच पण दर गुरुवारी नवे सिनेमे अमरावतीत सर्वात पहिल्यांदा प्रदर्शित होत होते हे आज अनेकांना सांगूनही पटणार नाही पण तो मान अमरावतीला मिळत होता हा इतिहास आपल्याला अचंबित करुन जातो, सिनेमाचे अनेक डिस्ट्रीब्युटर हे अमरावतीतच होते, जवाहर रोडवरील जुन्या इमारतीवर ते बोर्ड तेव्हा हमखास दिसत, काळाच्या ओघात त्या जागी नवीन ईमारती उभ्या झाल्या, परंतु अजूनही एक-दोन ठिकाणी ते बोर्ड दिसतात.असे अनेक अचंबित करणारे किस्से या पुस्तकात काव्यरुपात लेखकाने अत्यंत खुमासदार व मनोरंजक पद्धतीने रेखाटून त्यात जीवंतपणा आणला आहे. हा काव्यसंग्रहातील ठेवा पुढील पीढीसाठी वारसा ठरेल यात मला तीळमात्रही शंका वाटत नाही. खवैयेगीरीत म्हणाल तर विनायकराव तायडेच्या गड्डा हॉटेलचा आलुबोंडा ज्या अमरावतीकरांनी आणि इतरांनीही खाल्ला असेल त्याला जगातल्या कुठल्याही हॉटेलातील आलुबोंडा आवडत नाही, अन् खाल्लाही असेल तर खातांना त्याला विनायकरावाचे आतिथ्य व तर्रीची आठवण आल्याशिवाय रहात नाही. अमरावती जिल्ह्यातील मंडळी लग्नबस्ता खरेदी करायला आली की खरेदी झाल्यावर वर वधूकडील मंडळीचे फराळपाण्याचे हे आदराचे स्थान होते. कॉलेजमध्ये शिकत असतांना मनीऑर्डर हातात पडली की प्रभात चौकातील `गौ दुग्ध सागर` ही विद्यार्थ्यांची पहिली पसंती असे. `जीडीएस` म्हणून ते फेमस होते. साऊथ इंडियन डिशेश मिळणारे जिल्ह्यातील ते एकमेव ठिकाण होते. राजकमल चौकालगतच्या टी स्टॉलवरच्या बोर्डावर चहाचे नावंच `स्पेशल चहा`, `बादशाही चहा`, `यादगार चहा` अन साब को `एक शिंगल मलाई मारके` असा आपुलकीचा चहा तेव्हा अमरावतीकरांनी यथेच्छ रिचवला. आता ह्या सर्व चहांचा मिळून एकच चहा मिळतो. पण ह्या चहात ती लज्जत नाही. मग तुम्ही त्या स्टॉलला `प्रेमाचा चहा` हे नांव ठेवा किंवा अजून काही. हरेक शहराला एक संस्कृती असते, वस्तू-वास्तू वारसा असतो, त्यातून जगण्यातली नजाकत शोधावी लागते. ती नजाकत `अमरावतीचे छप्पन स्वभाव` ह्या काव्यसंग्रहातून अनुभवावयास मिळते.लेखकाच्या बहारदार लेखणीतून उतरलेले ही काव्यमय वैशिष्ट्ये वाचतांना अमरावती बाहेरील वाचकही मग आपल्या शहरातील वैशिष्ट्ये शोधत बसतो ही हे या पुस्तकाचे वैशिष्ट्य आहे. तसेही छप्पन ह्या शब्दाला फार महत्व आहे, `छप्पन इंची छाती`, `अब तक छप्पन` हा सिनेमा, छप्पन भोग, छप्पन छुरी अन् पिव्वर वऱ्हाडातली वर्ल्ड फेमस धमकी म्हणजे `तुह्यासारखे त म्या सतराशे छप्पन पाह्यले बे, तुह्याकुन जे हुईन थे करुन घे.` छप्पन ह्या शब्दाचा पूरेपूर करुन घेतलेला वापर म्हणजे जी.बी.देशमुख सारख्या दिलखुश लेखकाने लिहिलेले हे खुमासदार,रसभरीत,टवटवीत प्रफुल्लित अन मिश्कील काव्य. आणि शेवटी……….. मणुश्याचे हे शरीर अणित्य आहे आतमा-णित्य आहे हा श्रद्धांजलीपर आवाज ज्याने हिंदू स्मशानभूमीत ऐकला नसेल त्याने ह्या जन्मात तरी तो ऐकेपर्यंत मरु नये. हे शब्द ऐकूनही त्याकडे कानाडोळा केला असेल तो माणूस करंटा पण हे करंटेपण लेखकाने घेतले नाही. लहानपणापासून अमरावतीत वावरतांना `डफरीन` (लँडीग पोर्ट) ते ही `वरची जागा` ह्यातील अत्यंत बारकाईने केलेले निरिक्षण लाजबाबच म्हणावे लागेल,त्याला तोड नाही. हे पुस्तक वाचतांना प्रत्यक्ष यमराज जरी द्वारी आला तरी त्याला "हे पुस्तक वाचेपावतर जराकसा थांबतं काय रे बॉ." अशी म्हणण्याची हिम्मत वाचकात येते हे मात्र नक्की. अमरावतीच्या वस्तू,वास्तू आणि माणसांच्या वैशिष्ट्यावर आधारित आपल्या बालमित्रांना समर्पित केलेला व मेहता पब्लिशिंग हाऊस ह्यानी प्रकाशित केलेला हा अमूल्य ठेवा आपणा सर्वांना नक्कीच आवडेल ह्याची खात्री आहे. ...Read more

बाबाराव घोरमाडे, अमरावती

प्रथम दर्शनी कविता लेखन असले तरी गद्य आणि पद्य सोबत सोबत चालल्यासारख्या लेखन शैलीचा भास जाणवतो. अमरावती शहरातील 70..80 व नंतरच्या दशकातील गुणवैशिष्ट्ये मार्मिक नर्म विनोदी शैलीत सुंदर रीतीने विषद केली आहेत. लेखकाची सुक्ष्म निरीक्षण शैली काव्य चना स्वरूपात पुस्तक रूपाने सादर करण्यात लेखक यशस्वी झाले आहेत. इजाफा,रूतबा, हिरव्या देठाचे,कैलहीचा मौहोल, ढगांचा,इत्यादी जुने वऱ्हाडी शब्द वापरल्यामुळे जुन्या आठवणींना उजाळा मिळाला. लेखकाने अमरावती शहरातील जुन्या जाणत्या, गुणवान, असामान्य अशा व्यक्तींची दखल घेतली......पण काहींची दखल राहून गेली आहे असे माझे मत आहे. उदा. सुरेश भट, मधुकर केचे व त्यांची सायकल , अमरावतीचे दहा दिवसांची गणपती उत्सव सजावट..... प्रत्येकाने वाचावे असे हे पुस्तक, विनोदी पण शेवटी असलेली कारूण्याची किनार अंतर्मुख करुन जाते. ...Read more