* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: NAVI STRI
  • Availability : Available
  • ISBN : 9788177662160
  • Edition : 8
  • Publishing Year : SEPTEMBER 2001
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 144
  • Language : MARATHI
  • Category : FICTION
  • Available in Combos :V.S KHANDEKAR COMBO SET-119 BOOKS
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
THIS NOVEL IS IN A TRUE SENSE "THE COMPLETE APPERCEPTION OF A WOMAN`. THE AUTHOR HAS LEFT IT INCOMPLETE, BUT IT COMPLETES ITSELF WITH THE AWAKENING OF THE MIND SO WE SHOULD NOT CONSIDER IT AS INCOMPLETE. THE AUTHOR HAS WRITTEN THIS NOVEL IN THE YEAR 1950. BUT EVEN TODAY IT IS MOST INTERESTING AND READABLE. TILL THE PUBLICATION OF THIS NOVEL THE NOVELIST WAS KNOWN TO BE A WEAK CREATIVE LITERATURE WRITER, BUT THE ABOVE SAID NOVEL BROUGHT HIS STRONG SIDE IN FRONT OF THE READERS, HE WAS REVOLUTINARY, PENSIVE WRITER AND HAD A VERY SENSITIVE MINDSET AND WANTED TO HELP WOMEN IN THEIR UPLIFTMENT. THE AUTHOR ALWAYS FELT THAT THE MODERN LADY SHOULD KNOW LAW, ESPECIALLY THE SECTION 144. IT IS TRUE THAT SHE IS GOING TO GET MARRIED EVEN AFTER BEING EDUCATED, BUT AFTER AND BEFORE MARRIAGE HER MIND SHOULD GET MOULDED. THE CONTINUOUS PROCESS OF MOULDING, THAT TO OF SOCIAL MOULDING SHOULD TAKE PLACE IN HER LIFE OR IS SHE GOING TO REMAIN A PUPPET IN HER HUSBAND`S HAND EVEN AFTER EDUCATION? WHY DOES NOT THE SOCIETY RECOGNISE THAT LIKE THE MALE MEMBERS OF THE SOCIETY SHE ALSO HAS A MIND, A FREEDOM? WHY DOES NOT A MAN CONSIDER A WOMAN AS A FRIEND? WHY IS A WOMAN LOOKED UPON ONLY AND ONLY AS A WOMAN? AREN`T THESE QUESTIONS EQUALLY APPLICABLE TO TODAY`S WOMAN TOO? EVEN IN THE 21ST CENTURY?
‘नवी स्त्री’ ही वि. स. खांडेकरांची अपूर्ण अशी कादंबरी असली, तरी तिचं स्वरूप पाहता ती एक पूर्ण ‘स्त्री प्रबोध गीता’ आहे. नव्या स्त्रीनं कायदा जाणायला हवा, १४४ कलम तिला माहीत असायला हवं; शिकून तिचा विवाह तर होणारच, पण त्या पलीकडे जाऊन तिचं सामाजिक मन घडणार आहे कां? की ती केवळ रबरी बाहुली राहणार? तिचं मन मुलां / पुरुषांप्रमाणेच स्वातंत्र्य घेऊन आलेलं असताना समाज ते तिला का देत नाही? पुरुष स्त्रीला मैत्रीण का नाही मानत? अशा प्रश्नांचं काहूर खांडेकरांच्या मनात माजलं असताना सन १९५० मध्ये निर्माण झालेली ही कादंबरी आज पन्नास वर्षांनंतरही तितकीच वाचनीय नि विचारणीय ठरते. खांडेकर ‘दुबळे ललितलेखक होते’ म्हणणायांना ‘नवी स्त्री’ वाचनाने ते क्रांतदर्शी विचारक व स्त्री उद्धारासाठी तळमळणारे संवेदनशील कादंबरीकार होते, हे उमजायला वेळ लागणार नाही.
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
# 11TH JANUARY #YAYATI #AMRUTVEL #RIKAMA DEVHARA #SONERI SWAPNA- BHANGALELI #SUKHACHA SHODH #NAVI STRI #PAHILE PREM #JALALELA MOHAR #PANDHARE DHAG #ULKA #KRAUNCHVADH #HIRVA CHAPHA #DON MANE #DON DHRUV #ASHRU #SARTYA SARI #ABOLI #SWAPNA ANI SATYA #PHULE AANI KATE #JEEVANKALA #PAKALYA #USHAAP #SAMADHIVARLI PHULE #VIKASAN #PRITICHA SHODH #DAVABINDU #CHANDERI SWAPNE #STREE AANI PURUSH #VIDYUT PRAKASH #PHULE ANI DAGAD #SURYAKAMLE #SURYAKAMLE #DHAGAADACHE CHANDANE #DHAGAADACHE CHANDANE #PAHILI LAT #HASTACHA PAUS #SANJVAT #AAJCHI SWAPNE #PRASAD #CHANDRAKOR #KALACHI SWAPNE #ASHRU ANI HASYA #GHARTYABAHER #KAVI #MURALI #BUDDHACHI GOSHTA #BHAUBIJ #SURYASTA #ASTHI #GHARATE #MADHYARATRA #YADNYAKUNDA #SONERI SAVLYA #VECHALELI PHULE #KALIKA #MRUGAJALATIL KALYA #KSHITIJSPARSH #SUVARNAKAN #VANDEVATA #DHUKE #KALPALATA #MANDAKINI #AJUN YETO VAS FULANA #TISARA PRAHAR #VASANTIKA #RANPHULE #AVINASH #HIRWAL #MANJIRYA #SANJSAVLYA #MUKHAVATE #VAYULAHARI #MANZADHAR #CHANDANYAT #SAYANKAL #ZIMZIM #PAHILE PAN #ADNYATACHYA MAHADWARAT #VANHI TO CHETVAVA #GOKARNICHI PHULE #DUSARE PROMETHEUS : MAHATMA GANDHI #RANG ANI GANDH #RESHA ANI RANG #VAMAN MALHAAR JOSHI : VYAKTI ANI VICHAR #GOPAL GANESH AGARKAR : VYAKTI ANI VICHAR #KESHAVSUT : KAVYA ANI KALA #RAM GANESH GADAKARI : VYAKTI ANI VANGAMAY #PRADNYA ANI PRATIBHA #SAHITYA PRATIBHA : SAMARTHYA ANI MARYADA #GADHAVACHI GEETA ANI GAJRACHI PUNGI #SASHACHE SINHAVALOKAN #PAHILI PAVALA #EKA PANACHI KAHANI #RUTU NYAHALANARE PAN #SANGEET RANKACHE RAJYA # V. S. KHANDEKARANCHI KAVITA #TEEN SAMELANE #SAHA BHASHANE #ABHISHEK #SWAPNASRUSHTI #TE DIVAS TEE MANASE #SAMAJSHILPI #JEEVANSHILPI #SAHITYA SHILPI # AASTIK #SUSHILECHA DEV #RAGINI #MUKYA KALYA #INDRADHANUSHYA #ANTARICHA DIVA #NAVE KIRAN #AGNINRUTYA #KAVYAJYOTI #TARAKA #RANGDEVTA #ययाति # (ज्ञानपीठ पुरस्कार १९७६) #अमृतवेल #रिकामा देव्हारा #सोनेरी स्वप्नं-भंगलेली #सुखाचा शोध #नवी स्त्री #पहिले प्रेम #जळलेला मोहर #पांढरे ढग #उल्का #क्रौंचवध #नवी स्त्री
Customer Reviews
  • Rating StarDAINIK TARUN BHARAT 07-04-2002

    स्त्री प्रबोधाची गीता... वि. स. खांडेकरांनी विसाव्या शतकाच्या मध्यावर लिहिलेली ‘नवी स्त्री’ ही कादंबरी सुनीलकुमार लवटे यांनी संपादित केली असून मेहता पब्लिशिंग हाऊसने ती प्रकाशित केली आहे. १९५० साली वसंत मासिकातून प्रकाशित झालेली ही कादंबरी आजही जुनीन वाटता आजच्या नव्या स्त्रीच्या समस्यांचे भावविश्वाचे चित्रण उभे करते. नव्या स्त्रीने कायदा जाणायला हवा, शिकून तिचा विवाह होणारच पण तिने सामाजिक मन घडवायला हवे, तिचं मन मुला-पुरुषांप्रमाणे स्वतंत्र हवे, पुरुषाने तिला मैत्रीण मानायला हवे असे विषय या कादंबरीतून पुढे आले आहेत. खांडेकर हे दुबळे ललित लेखक नव्हते तर क्रांतीदर्शी विचारांचे लेखक होते हे उमजून देणारी ही कादंबरी आहे. ...Read more

  • Rating StarDAINIK SAKAL 06-09-2001

    ज्येष्ठ साहित्यिक वि. स. खांडेकर यांना जाऊन यंदा पंचवीस वर्षे पूर्ण झाली. खांडेकरांची असंकलित स्वरूपातील ‘नवी स्त्री’ ही कादंबरी मेहता पब्लिशिंग हाऊस तर्फे कोल्हापुरात नुकतीच प्रकाशित झाली. सुमारे तीन हजार छापील पृष्ठे होतील एवढे खांडेकरांचे साहित्य द्याप असंकलित होते. ते सारे यंदाच्या त्यांच्या रजत स्मृती वर्षात प्रसिद्ध करण्याचा संपादक डॉ. सुनीलकुमार लवटे यांचा, तसेच खांडेकर कुटुंबीयांचा आणि प्रकाशकांचा संकल्प आहे. खांडेकरांसारख्या द्रष्ट्या, प्रज्ञावंत साहित्यिकाने पन्नास वर्षांपूर्वी ‘नव्या स्त्री’ संबंधी काय म्हटले होते, ही आधुनिक शिक्षित स्त्री खऱ्या अर्थाने सबला व्हावी यासाठी त्यांनी कोणत्या अपेक्षा व्यक्त केल्या होत्या, त्यांचे दर्शन या कादंबरीत घडते; आणि आजची स्थिती पाहता, त्याच अपेक्षा आजही कायम असल्याचेच चित्र दिसते. अर्धशतकाचा मोठा टप्पा ओलांडून पुढे आल्यावरही स्त्रियांच्या सामाजिक व्यावहारिक जडणघडणीत स्थूलमानाने फारसा फरक पडलेला नाही, हे म्हणूनच खूप चिंताजनक वाटते. खांडेकरांना केवळ आधुनिक व सुशिक्षित नवी स्त्री अभिप्रेत नव्हती, तर आधुनिकतेच्या जडणघडणीत तिचे माणूस म्हणून संस्कारीकरण कसे होईल. याचा त्यांना ध्यास होता. नव्या युगाचे, बदलाचे आव्हान केवळ मुठी वळून किंवा हात उगारून स्त्रीला पेलता येणार नाही; तर सामाजिक संघर्षात तिची भूमिका सामंजस्याची आणि अंगाखांद्यावर नवीन जबाबदाऱ्या पेलणारी असावी, असे खांडेकरांना वाटत होते. नव्या स्त्रीला कायद्यापासून इतर अनेक गोष्टींची चांगली जाण आणि माहिती असली पाहिजे, असा खांडेकरांचा आग्रह होता. तत्कालीन परिस्थितीत मांडलेले हे विचार लक्षात घेतले, तर खांडेकरांची ही कादंबरी म्हणजे स्त्री प्रबोध गीता ठरते. कालचक्र वेगाने फिरते आहे. विविध क्षेत्रात स्त्रिया नवनवी क्षितिजे जिंकत आहेत. स्पर्धापरीक्षांपासून उद्योग-व्यवसाय, संशोधन अशा अनेकविध ठिकाणी त्यांचे उच्चस्थान दिसतेही आहे; परंतु तेवढ्यावरूनही खांडेकरांच्या मनातील ‘नव्या स्त्री’ची कल्पना प्रत्यक्षात अवतरली आहे. असे म्हणता येणार नाही. शिक्षणाने माणूस साक्षर होतो; पण सबळ, ज्ञानी, व्यवहारी होतोच असे सांगता येत नाही. महिलांच्या निरक्षरतेचे प्रमाण कमी होत आहे असे आकडेवारीने सिद्ध करता आले तरी त्या व्यवहारी झाल्या, असे मानता येणार नाही. आपली एकूण सामाजिक रचना पाहता, स्त्रीला आपण पूर्ण स्वातंत्र्य दिल्याचे दिसत नाही. स्त्रीला कायदा ठाऊक झाला, त्यातून तिच्या हक्कांच्या कर्तव्याच्या जाणिवा जाग्या झाल्या, तर ती श्रेष्ठ ठरेल, या भीतीपोटी तसे प्रयत्नही फार कोणी करीत नाही. महात्मा फुले, महर्षी कर्वे यांच्यापासून स्त्रीशिक्षणाच्या प्रयत्नांची सुरुवात झाली असली, तरी आजही किती तरी स्त्रिया निरक्षरतेच्या अंधकारात चाचपडत आहेत. स्त्रियांच्या विकासाचे हे प्रयत्न पाहिले, तर आजचे चित्र खूप उज्ज्वल व्हावयास हवे होते असे वाटते; पण तसे घडले नाही. स्त्रियांना दिलेले स्वातंत्र्य आजही काही शृंखलांनी जखडलेलेच आहे. माणूस म्हणून स्त्रीचा जगण्याचा अधिकार तिला पूर्णपणे लाभला आहे, असे म्हणता येणार नाही, अशी स्थिती आहे. जळगाव-साताऱ्यातील घटना, कोठेवाडीसारखी प्रकरणे, कौटुंबिक छळातून होणाऱ्या महिलांच्या आत्महत्या, अनेक ठिकाणी त्यांना दिली जाणारी दुय्यम वागणूक, ही उदाहरणेच स्त्रीचे समाजातल चित्र स्पष्ट करणारी आहेत. स्त्रीला सबल बनविणारे, तिला पायावर उभे करणारे, तिला हक्कांची जाणीव देणारे प्रयत्न सुरू आहेत. त्यांचा परिणामही कोठे कोठे जाणवतो आहे; परंतु तेवढ्यावर समाधान मानावे आणि आपण प्रगतीचा मोठा पल्ला गाठल्याचे समाधान करून घ्यावे, अशी स्थिती नाही. खांडेकरांना अभिप्रेत असलेली ‘नवी स्त्री’ अर्धशतकानंतरही आज दिसत नाही. हे चित्र झपाट्याने बदलण्यासाठी, स्त्री-पुरुष या उभयतांच्या मानसिकतेतही बदलाची गरज आहे. हा बदलही अत्यंत प्रामाणिक हवा. दिखाऊपणा वेगळा आणि वस्तुस्थिती वेगळी. खांडेकरांची आजवर दडून राहिलेली ‘नवी स्त्री’ यंदाच्या ‘महिला सबलीकरण वर्षा’त अवतरणे, हा खरोखरच योगायोग आहे. आपण तो जाणून घेण्याची गरज आहे. -मल्हार अरणकल्ले ...Read more

  • Rating StarDAINIK SAKAL 16-09-2001

    ‘नवी स्त्री’ ही वि. स. खांडेकर यांची अपूर्ण अशी कादंबरी असली, तरी तिचं स्वरूप पाहता ती एक पूर्ण ‘स्त्री प्रबोध गीता’ आहे. नव्या स्त्रीनं कायदा जाणायला हवा. १४४ कलम तिला माहीत असायला हवं; शिकून तिचा विवाह तर होणारच; पण त्या पलीकडे जाऊन तिचं सामाजिक मनघडणार आहे का, की ती केवळ रबरी बाहुली राहणार? तिचं मन मुलां-पुरुषांप्रमाणेच स्वातंत्र्य घेऊन आलेलं असताना समाज ते तिला का देत नाही? पुरुष स्त्रीला मैत्रीण का नाही मानत? अशा प्रश्नांचं काहूर खांडेकरांच्या मनात माजलं असताना १९५० मध्ये निर्माण झालेली ही कादंबरी आज पन्नास वर्षांनंतरही तितकीच वाचनीय नि विचारणीय ठरते. ...Read more

  • Rating StarSAKAL 10-02-2002

    खांडेकराची ‘नवी स्त्री’… वि. स. खांडेकर यांच्या ‘नवी स्त्री’ या कादंबरीचे संपादन डॉ. सुनीलकुमार लवटे यांनी केले आहे. ही कादंबरी १९५० च्या दरम्यान ‘वसंत’ मासिकात क्रमश: प्रसिद्ध झाली होती. २००१ हे ‘महिला सबलीकरण’ वर्षाचे निमित्त साधून मेहता प्रकाशनान ही कादंबरी नव्याने प्रकाशित केली आहे. वि. स. खांडेकर हे मराठीतील महत्त्वाचे लेखक आहेत. त्यांचे खूप लेखन असंकलित आहे. हे ध्यानात आल्यानंतर सुनीलकुमार लवटे यांनी हे ग्रंथरूपाने प्रकाशित करण्याचे निश्चित केले. प्रस्तुत ‘नवी स्त्री’ ही कादंबरी या योजनेचा एक भाग आहे. खांडेकरांना अभिप्रेत असलेली नवी स्त्री केवळ आधुनिक व सुशिक्षित नको होती. नव्या स्त्रीचे संस्कारीकरण, आधुनिकतेच्या जडणघडणीत माणूस म्हणून कसे होईल, याचा त्यांना ध्ययास लागलो असायचा. ‘नवी स्त्री’ कादंबरी-लेखनात ही तळमळ पानोपानी स्पष्ट होते. नव्या युगाचे, बदलाचे आव्हान केवळ मुठी आवळून नि हात उगारून स्त्रीस पेलता येणार नाही. सामाजिक संघर्षात तिची भूमिका सामंजस्याची, अंगाखांद्यावर नवनवीन दायित्व पेलणारी, जबाबदार समाजधुरीण म्हणून खांडेकरांना अभिप्रेत होती.’ ही लवटे यांनी प्रकट केलेली भूमिका प्रस्तुत कादंबरीतून कितपत दिसते ते पाहू. या कादंबरीची नायिका ललिता खेड्यातून पुण्यात जाऊन वसतिगृहात राहून बी. ए. होते. तेथे सुवर्णपदक मिळवते. समाजवादी विचाराचा मित्र दिवाकराशी मैत्री करते, त्याचयाविषयी जवळीक वाटत असूनही केवळ मैत्री करते. काकासाहेब या श्रीमंत व्यक्तीच्या मुलाशी कमलाकरबरोबर पंधरा दिवस गाडीतून फिरते, त्याच्याशी लग्न करावे असा विचारही तिच्या मनात येतो. त्याच वेळी तिचा मित्र दिवाकर तिला भेटतो आणि कमलाकरशी लग्न झाल्यावर ‘कारखाना कामगारांच्या स्वाधीन करण्याची अट तू काकासाहेबांना घाल’ असे सांगतो आणि तसेच वचन ती दिवाकरला देते. येथे कादंबरी संपते. खांडेकरांच्या अन्य कादंबऱ्यांमध्ये जसे ध्येयवादी, कर्तव्यनिष्ठ पात्रे असतात, त्याचप्रमाणे याही कादंबरीत ललिता, ललिताचे वडील तात्या, दिवाकर आदी पात्रे आहेत. ललिता ध्येयवादी आहे. हे ललिताचे चित्रण नव्या आधुनिक विचाराच्या स्त्रीचे नाही असे वाटण्याची शक्यता नाकारता येत नाही. पण १९५० चा काळ ध्यानात घेतला तर तसे वाटणार नाही. यासंदर्भात डॉ. सुनीलकुमार लवटे प्रस्तावनेत लिहितात ‘नवी स्त्री’ची नायिका ललिता, तिचे वडील तात्यासाहेब, मित्र दिवाकर, समाजवादी समाजरचना यावी म्हणून काया, वाचा, मने धडपडतात. दुसरीकडे मगनभाई, काकासाहेब नि कमलाकर भांडवलशाही रचनेची मुळं आणखी खोल रुतवू पाहत आहेत. या पार्श्वभूमीवर ललिता नव्या स्त्रीचा प्रतिनिधी बनून व्यक्तिगत स्वार्थीपेक्षा समाजहित श्रेष्ठ मानून सर्वस्व त्यागास तयार होते. प्रा. लवटे यांना भाऊसाहेब खांडेकरांविषयी नितांत आदर असल्याने ललिता ही आधुनिक नव्या स्त्रीची प्रतिनिधी वाटते. आज स्त्री अनेक क्षेत्रात स्वयंपूर्ण होऊ पाहत आहे. तिला ‘स्व’ची जाणीव झाली आहे. या पाश्र्वभूमीवर प्रस्तुत कादंबरीतील नायिका ललिता निश्चितच नवी वाटत नाही. खांडेकरांच्या अन्य कादंबरीत जशी ‘टिपिकल’ पात्रे आढळतात, तशी पात्रे या कादंबरीतही आहेत. ललिताचे वडील तात्या, दिवाकर, स्वत: ललिता ही पात्रे ध्येयवादी आहेत, निष्ठावान आहेत. मगनभाई, काकासाहेब, कमलाकर ही पात्रे भांडवलदारी वृत्तीची आहेत. अन्य कादंबरीतील पात्रांप्रमाणे याही कादंबरीत रोमँटिक वृत्तीची पात्रे आहेत; पण असे असूनही ही कादंबरी वाचायला हवी. कारण ही कादंबरी वि. स. खांडेकरांची आहे. भाऊसाहेब खांडेकर जसे कादंबरीकार होते, तसे ते कथाकार, लघुनिबंधकार, रूपककथाकर आणि उत्तम समीक्षक होते. लेखक म्हणून ते प्रसिद्धीच्या शिखरावर असताना खूप लेखन असंकलित असूनही खांडेकरांनी ते प्रकाशित का होऊ दिले नसावे, हा विचार करण्यासारखा प्रश्न आहे. या प्रश्नाचे उत्तर कोणतेही असले तरी भाऊसाहेब खांडेकर मराठी भाषेतील ज्ञानपीठ पुरस्काराचे पहिले मानकरी आहेत. त्यांचे सर्व लेखन जपून ठेवायला हवे. आणि ते काम प्रा. लवटे करीत आहे. त्या कामाचा प्रारंभ त्यांनी ‘नवी स्त्री’ या कादंबरीच्या संपादनापासून केला आहे. पुढील कामाची मोठी तयारीही त्यांनी केली आहे. त्यांना मनापासून शुभेच्छा. उल्का, सुलभा, देवयांनी, र्शिमष्ठा, नंदा, वसू या नायिका ज्यांनी वाचल्या असतील, त्यांनी ललिता समजून घेण्यासाठी ‘नवी स्त्री’ ही कादंबरी वाचायला हवी. ...Read more

  • Read more reviews
Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

BHARTIYA GANIKA
BHARTIYA GANIKA by DR.S.R. DESHPANDE Rating Star
डॉ. शुचिता नांदापूरकर-फडके

मंडळी, कालच्या ऱ्हासचक्रानंतर मी विचार करत होते की आज काय? पुस्तकं तर काही वाचून ठेवली होती (म्हणजे वाचली आणि ठेवून दिली बाजूला... अक्षरशः). आत्ताची समोर आहेत ती. कदाचित त्यातलं एखादं उद्या घेईन. मध्ये अचानक या पुस्तकाची जाहिरात वाचली, अगदी गेल्या ठवड्यातली गोष्ट. उत्सुकता चाळवली. समूहात काहीतरी आगळं वेगळं पुस्तक घ्यावं हा विचार सतत मनात असतोच. तसं पुस्तक घरी येताच (जय amazon) चाळायला म्हणून बसले, आणि काय सांगू, हातात मार्कर कधी आलं, मी खुणा कधी केल्या, पुस्तक कधी संपलं... कळलंच नाही. एक गोष्ट प्रामाणिकपणे सांगते... प्रेयर पुस्तकाला तुम्ही जो भरघोस प्रतिसाद दिलात, अनेकांनी ते विकत घेण्याचा विचार केला तेव्हाच सांगायचं होतं, पण राहिलं. ओळख करून दिलेलं पुस्तक पूर्णपणे वाचनीय असतं असं नाही. त्याचा बरचसं भाग बोजड असतो. पण ते नाही का, डेटिंगच्या काळात मुलगा मुलगी स्वतःमधलं केवळ उत्तम ते दाखवतात, तसं मला प्रेयर बद्दल वाटलं. आय मीन प्रेयर पुस्तकाबद्दल वाटलं आणि गणिका या पुस्तकाबद्दल मला नेमकं तेच वाटत आहे. ========== ‘भारतीय कामशिल्प’ या पुस्तकाचं लेखन करत असताना प्राचीन भारताच्या समाजजीवनाची माहिती देणारे अनेक संदर्भग्रंथ वाचण्यात येऊन लेखकांची उत्सुकता चाळवली गेली आणि जेव्हा या विषयावर मराठीत एकही परिपूर्ण संदर्भग्रंथ नाही हे लक्षात आलं, तेव्हा त्यांनी स्वतःच या पुस्तकाचं लेखन मनावर घेतलं. केवळ सनसनाटी विषय सवंगपणे हाताळला आहे असं कुठेही वाटत नाही. अतिशय अभ्यासपूर्वक लेखन आहे. सोबत जोडलेली संदर्भग्रंथांची यादी (एकूण संख्या ६४) पुरेशी आहे. गणिका आणि उर्वरित श्रेणी या शरीरविक्रय करतात, हा वैश्विक व्यवसाय आहे. कैक काळापासून या व्यवसायाला मान्यता मिळाली आहे आणि त्याची आवश्यकता वाटली आहे. प्राचीन काळात भारतीय गणिका यांना एक संस्कृती आणि दर्जा होता. नीतीनियम होते, ते पाळावे लागत होते. पुस्तकाची प्रकरणं – प्रास्ताविक, विदेशी गणिका, भारतीय साहित्यातील गणिका, गणिकेची प्रशिक्षण व वर्णन, गानिकांची वेशभूषा, सौंदर्यप्रसाधने, विट, गणिकामाता, प्रियकराचा राग-रंग, कथांविषयी थोडेसे आणि कथा (या शेवटच्या प्रकरणात एकूण १३ कथा आहेत – अगदी सुरस आणि चमत्कारिक वाटाव्यात अशा, त्यांचा परिचय मी देणार....... नाही.) प्रास्ताविक – (नऊ पानांचं प्रकरण) कुटुंब किंवा विवाहसंस्था कधी आकाराला आले हे नक्की सांगता येत नसलं तरी स्त्री-पुरुष शरीरसंबंध हे आदिम असून ते पशु – पक्ष्यांप्रमाणेच जनन हेतुस्तव नैसर्गिक होते आणि राहतील. फलन हे स्त्रीदेहामध्ये होतं या जाणीवेतून तिला आदरस्थान प्राप्त झालं. सर्जनाची गूढ शक्ती धारण करणारी ती आदिमाया/माता/ अद्याशक्ती होय. जवळपास प्रत्येक धर्मात प्रजा, पशु आणि धान्य समृद्धीसाठी सुफलता विधी आहेत. भारतीय हिंदू धर्म शास्त्रीय ग्रंथांतून स्त्री पवित्र्याच्या कथा वाचायला मिळतात. पतीला परमेश्वर मानलं जाई. त्याही काळात गणिका हा व्यवसाय होता आणि त्याकडे सहिष्णू वृत्तीने पाहिलं जाई.राजे महाराजे त्यांचे पोशिंदे असतं. शरीरविक्रय करणाऱ्या स्त्रिया तिरस्काराला पात्र असत, पण गणिका नाही. त्यांना नगर भूषण, नगर अलंकार, नाग्त रत्न मानलं जाई. प्रसंगी, राजे त्यांचा सल्ला घेत. त्या बहुश्रुत असतं चौसष्ट कलांत पारंगत असतं. संभाषणचतुर, हुशार, समंजस, उदार, योग्य आदर राखणाऱ्या, विनयशील आणि अनुपम सौंदर्यवती असत. एखाद्या गणिकेमुळे त्या राज्याची कीर्ती वाढत असे. धार्मिक समारंभ, सामाजिक कार्यक्रम (विविध झुंजी, शर्यती), करमणुकीचे कार्यक्रम (जलक्रीडा, वनविहार), रंगमंचावर अभिनय, अशा नानाविध ठिकाणी त्यांची ठळक उपस्थिती असे. रथारूढ अथवा सिंहासनाधिष्ठ राजाला वारा घालणे, चवरी ढाळणे, छत्र धरणे अशी कामं त्या करत. त्यांच्याशी संबंध ठेवणं समाजमान्य होतं. प्रतिष्ठितांचा त्यांच्याकडे पाहण्याचा दृष्टीकोन व्यापक, अगत्यशील आणि स्नेहिल होता. मात्र, त्यांना कडक आणि कठोर नियम पालन करावे लागे.विजयनगर साम्राज्याच्या अस्तानंतर ते पेशवाई संपेपर्यंतच्या काळात, मोगल राजवट येऊन गेली, ब्रिटीश वसवतवादाचा प्रसार सुरू झाला, समाज व्यवस्था बदलली, गणिका संस्कृतीला ओहोटी लागली. ब्रिटीशांचा अंमल सुरू झाल्यावर गणिका संस्था नष्ट होऊन वेश्या व्यवसाय वाढीला लागला. यामागे औद्योगिक क्रांती हे एक कारण आहे. वेश्यागमन निंद्य कृत्य मानलं जाऊ लागलं. तरुण अधिकाधिक सुशिक्षित होऊ लागला तसा शरीरसंबंधांपायी स्वास्थ्य गमवावं लागलं तर काय, हा विचार थोडाफार मूळ धरू लागला. आणि या शौकाची आसक्ती कमी झाली. चरितार्थाकरता पैसे मिळवण्यासाठी वेश्याव्यवसाय हादेखील विश्वसनीय आर्थिक व्यवसाय मानण्यात यावा असा निकाल १९११मध्ये युरोपियन न्यायालयाने दिला. विदेशी गणिका – (२७) बहुतेक सर्व प्राचीन संस्कृतीत गणिकांचे पुरावे मिळतात. इजिप्त, बबिलोन, सिरीया, फिनिशिया, ही काही उदाहरणं. ग्रीस, इटली, भारत इथे त्यांना विशिष्ट दर्जा प्राप्त झाला. त्यांचेही प्रकार होते, सामान्य वेश्या अलेत्रय्डी, आणि सर्वोच्च म्हणजे हेटीअरा (या शब्दाचा अर्थ सोबती). काही हेटीअरा वादविवादपटू होत्या. क्लेप्सीड्रा हिच्या वक्तशीरपणामुळे तिला ते नाव मिळालं होतं त्याचा अर्थ जलघटिकापात्र असा होतो. थीओफ्रत्स याने इ.पू. ३७२ – २८७ या काळात ‘ऑन मरेज’ हा ग्रंथ लिहिला, याचा सविस्तर अभ्यास करून लिओंटीयम या हेटीअराने त्यावर प्रगल्भ टीका लिहिली. रोमन समाजात कोर्टीझन अस्तित्वात होत्या. पॉम्पेई इथे व्हिकोली बाल्कोन पन्सिली नावाच्या इमारतीत शेकडो रमणी वास करत. या संदर्भातली रतिक्रिडेची मूळ चित्रं पॉम्पेईन wall paintings म्हणून प्रसिद्ध असून ती इटलीच्या वस्तुसंग्रहालयात सुरक्षित आहेत. रोमन साम्राज्यात हेटीअरा ऐवजी कोर्टीझन शब्द रूढ झाला. युरोपात पंधरा-अठरा शतकांत कोर्टीझन आणि कलावंतीण यांना समाजात विशिष्ट स्थान आणि आदर मिळत होता. फ्रान्समध्ये सतराव्या शतकात रमणींची सत्कारगृहं (सलो) प्रसिद्ध होती. जपानमध्ये गै (कलात्मक क्षमता) आणि शा (व्यक्ती) यावरून गैशा ही संज्ञा रूढ झाली. त्यांच्यात अलंकारिक सुरावट, सौजन्य, निष्कपट, सुसंस्कृतपण असे. बाराव्या शतकापासून कार्यरत असलेली ही प्रथा इडो काळात (इ.स.१६००-१८६८) अधिक वाढीला लागली. ओकिया ही त्यांची निवासस्थानं होत. विसाव्या शतकात त्यांचं वर्चस्व राजकीय क्षेत्रात वाढीला लागलं. १९२०-३० मध्ये त्यांची संख्या साधारण ८० हजार होती, ती १९७०-८० दम्यान १७ हजार इतकीच उरली आहे. चीनमध्ये पूर्वी पीकिंग (बीजिंग) इथे सिंगसॉंग हाउस हा भाग राखीव होता. शांघाय इथे अत्यंत विलासी वारांगना गृहं आहेत. सिंगापूरमध्येगिटार गर्ल्स (पीपाचाई) या नावाने त्या ओळखल्या जातात. पाकिस्तानात त्या तवायफ, कान्जारी आणि गश्ती नावाने ओळखल्या जातात. आज मात्र सर्वत्र आमुलाग्र बदल झाला आहे. भारतीय साहित्यातील गणिका – (३२) संस्कृत, प्राकृत, पाळी भाषांत, हिंदू, बौद्ध, जैन वान्ग्मयात, त्यांचा उल्लेख आढळतो. त्या वैदिक काळात भारतात होत्या हे काही ऋचांवरून समजतं. (ऋचा १.१६७.४ – अनेक पुरुषांशी सांग करणारी ती साधारणी). पंचचुडा अप्सरेपासून त्यांची उत्पत्ती झाली असं मानतात. महाभारत काळात त्यांना प्रतिष्ठा प्राप्त झाली. (राज, नागरी, गुप्त, देव आणि ब्रह्म असे पाच प्रकार होते). रामायणात फार स्थान नव्हतं. अमरकोश, महाभाष्य, वार्त्तिके, दशरूपक, कौटिलीय अर्थशास्त्र जातक कथा, पंचतंत्र, वेताळकथा, शुकबहात्तरी, गाथासप्तशती, अशा विविध ग्रंथांत त्यांचा उल्लेख आहे. कामसूत्र या ग्रंथात वात्सायनाने ‘वैशिक’ या प्रकरणात त्यांची माहिती दिली आहे. कथासरीत्सागर, राजतरंगिणी, शृंगारतिलक, सरस्वतीकंठभरणा, कलाविलास, मेघदूत, मृच्छकटिक, रत्नावली, नागानंदा, अशा नाटकांतून त्यांचा उल्लेख येतो. भारतात इ.पू. पहिल्या सहस्रकात ती प्रथा अस्तित्वात येऊन ब्रिटीशांच्या आगमनानंतर एकोणिसाव्या शतकात लोप पावली असावी असं समजलं जातं. गणिकेची प्रशिक्षण व वर्णन – (१६) गणिकेला बालपण जवळपास नव्हतच. वयाच्या सहा-सात वर्षापासून तिला घडवायला सुरुवात होत असे. त्यांच्या प्रशिक्षणात आचार, विचार, शिष्टाचार, विविध कला, खेळ, भाषा, वर्तन, सौंदर्यवर्धन, गायन, वादन, नृत्य, अलंकरण, शरीर सौष्ठव, बुद्धिवर्धन अशा प्रत्येक अंगाचा व्यापक विचार होता. काही हस्तकला शिकाव्या लागत. पाककला, सुगंधी द्रव्य निर्मिती, कामशास्त्र, प्रणायाराधन, हिकाव्म लागे. स्वसंरक्षण शिकावं लागे. गणिकांची वेशभूषा, सौंदर्यप्रसाधने – (५) आधीच्या प्रशिक्षणात हाही एक महत्त्वाचा भाग होता. विट – (७) हा शब्द मी पहिल्यांदाच ऐकला. त्याचा इथे दिलेला अर्थ – शृंगाररस नायकानुचराप्रमाणे संपत्तीचा भोग न घेणारा किंवा जो आपल्या पैशाचा वापर कधी करत नाही, असं नाटकातलं लबाड, धूर्त पात्र. गणिका संस्थेत त्याच्या जोडीने वयस्य, अनुचर, धूर्त आणि डिंडिक ही पुरुष पात्र वावरतात. प्रतिवेशिनी ही गणिकेची शेजारीण. ती विश्वासातली. ती गणिकेसाठी विट आणि प्रियकर यांच्याशी संवाद साधते. गणिकामाता – (७) हे पात्र फार महत्त्वाच. तिला संरक्षित स्त्री, कुट्टनी किंवा कुट्टीनी म्हटलं जाई. तिचं काम शिस्त राखणे, थोडक्यात रेक्टर. कामकुजानांना आळा घालणं, गणिकांना खऱ्या प्रेमापासून वंचित ठेवणं. कामुकांचं मानसशास्त्र तिला मुखोद्गत. पुरुषांच्या गुणदोषाच्या’ आधारे अचूक आडाखे बांधत ती गणिकेला सल्ला देता. तिचा दबदबा असतो. ते नसती तर गणिका ही संस्था कधीच नामशेष झाली असती. कारण स्त्रिया या स्त्रिया असल्याने स्त्रीसुलभ भावनेनुसार गणिकागिरीत न रमता त्या केव्हाच संसाराला लागल्या असत्या. प्रियकराचा राग-रंग – (९) रग हे बारा छटांमधली काम आसक्ती असं म्हणता येईल. पुरुषाची मनोवृत्ती, प्रवृत्ती, स्वभाव, गुणविशेष आणि खास करून राग-लोभ जाणून घेत गणिकेला त्याच्याशी वर्तन करावे लागते. कथांविषयी थोडेसे आणि कथा (४८) – ‘शृंगारमंजरीकथा’ हा राजा भोज रचित संस्कृत ग्रंथ असून त्यात स्त्री-पुरुष मनोवृत्ती दर्शन घडवणाऱ्या तेरा कथा आहेत. त्यापैकी काही जीर्ण, काही अपूर्ण आहेत. पैकी एक कथा वाचून दाखवते. संदर्भग्रंथ (४) सोबत फोटो दिले आहेत त्या पानांचे. या पुस्तकात आढळलेले सुंदर शब्द – गरती, लीलासहचारी, पृथुल (अर्थ कळला नाही अजून), रूपाजीवा, सूरसुंदरी परिचय फार लांबला. या विषयावरच्या इतक्या अभ्यासानंतर एखादा पेपर सहज देता येईल. परत अभिमानाने म्हणता येईल, ‘मा, मै फर्स्ट क्लास फर्स्ट आया!’ मनापासून धन्यवाद. माझी परिचय पाळी नसती तर मी हे पुस्तक वाचलंच नसतं. मजा आली मला वाचताना. तशी तुम्हालाही आली असेल अशी खात्री आहे. थांबते. ...Read more

RESHIMREGHA
RESHIMREGHA by SHANTA J SHELAKE Rating Star
मीना कश्यप शाह

शांता शेळके या कवयित्री म्हणून आपल्या सर्वांच्या माहितीच्या आहेतच. गीतकार म्हणूनही त्यांचे मोठे नाव झाले. रेशीमरेघा हे त्यांनी रचलेल्या गीतांचे पुस्तक. मुख्यतः त्यांनी चित्रपट आणि नाटक यासाठी गीते लिहिली आहेत. प्रस्तावनेत शांताबाई म्हणतात, गीते लििणे त्यांना अतिशय आकर्षक वाटत गेले आणि म्हणून केवळ चित्रपट आणि नाटकांसाठीच नाही, तर स्वानंदासाठीही, त्या गीतं लिहित राहिल्या. चालीवर गीते लिहिणे त्यांना आव्हानात्मक वाटायचे, बंधनकारक नाही. पुढे बंगाली, गुजराती अशा काही गीतांच्या चाली आवडल्या, तर त्या, त्या चालींवरही छंद म्हणून गीते लिहू लागल्या. त्यांच्या गीतांमध्ये लावण्या, गवळणी, नृत्यगीते आणि युगुलगीते (त्यांनी द्वंद्वगीते हा शब्द वापरला आहे, जो मला आवडत नाही) जास्त आहेत. ह्या पुस्तकात त्यांचे संकलन आढळून येतं. पुस्तकातील काही गीतांपेक्षा मला त्यांची प्रस्तावनाच जास्त आवडली. आपल्या गीतांबद्दल त्यांनी हळुवार होत लिहिलं आहे. प्रत्येक गाणं ध्वनिमुद्रीत होतानाचे क्षण त्यांना आठवतात. आणि ही गीतं प्रसिद्ध होण्यासाठी संगीतकार, गायक यांचा हातभार नक्कीच आहे याची त्या आठवण काढतात. गीतांचा अर्थ रसिकांपर्यंत पूर्णपणे पोहोचवण्यासाठी गायक-गायिकांचा खूपच मोठा वाटा आहे, त्यांच्याबद्दल त्या अपार कृतज्ञता व्यक्त करतात. हे पुस्तक त्यांनी लावणेसम्राज्ञी यमुनाबाईंना अर्पित केलेले आहे. त्यान्नी लिहिलेल्या "रेशमाच्या रेघांनी" या सर्वात जास्त प्रसिद्ध पावलेल्या लावणीच्या नावावर ह्या पुस्तकाचे नाव आधारित आहे. अनेक प्रसिद्ध गाणी या गीत संग्रहात आढळतात. रेशमाच्या रेघांनी, काय बाई सांगू, मनाच्या धुंदीत लहरीत, हे श्यामसुंदर, राजसा, शालू हिरवा पाच नि मरवा, चाल तुरू तुरू, मनाच्या धुंदीत लहरीत येना आणि अशी अनेक. शांताबाईंचं काव्य सामर्थ्य ह्या लावण्या/गीतांमध्ये देखील दिसून येतं... कळ्या आजच्या, शिळ्या उद्याला, ओठांशी न्याल का, आल्यावर जवळ मला घ्याल का.... अशी अनेक उदाहरणं! पुस्तकातील बहुतेक गाणी ही लावण्यांच्या स्वरूपातली आहेत. त्यामुळे त्याच त्याच भावना सारख्या सारख्या आढळून येतात. बोलावणे किंवा नको जाऊ म्हणणे, भेटी (गिफ्ट्स) घेणे, वाट पाहणे, विरह, सौंदर्याचे वर्णन, शृंगाराचे वर्णन, म्हणजे तुम्हाला काय मिळू शकेल याची कल्पना गीतातून देणे (उदा. कंबरपट्टा रेखून दावी, देहाचा आकार!!) अशा प्रकारचे विषय पुन्हा पुन्हा येत राहतात, पण (शांताबाई बीइंग शांताबाई) कुठेच तोचतोचपणा कंटाळवाणा होत नाही (वाचकाने जरा रोमँटिकपणा दाखवून वाचली ही गीतं तर फारच बहार!) शांताबाई नथ फारच आवडते असं दिसतं... नथ सर्जाची नाकी घालता हसेल डावा गाल किंवा सलगी करते नथ ओठांशी, तो तुमचा अधिकार अशा प्रकारे ती खुलून देखील दिसते ह्या गीतांमधे!! अनेकविध लावण्या आहेत ह्या पुस्तकात. पाडव्याची, रंगपंचमीची, श्रावणाची, अशा विविध दिवसांच्या लावण्या तर हिरव्या रंगाची लावणी देखील आहे. पाडव्याची लावणी म्हणजे पाडव्याला शालू मागते आहे, कारण ती रात्री एकांतात उभारणार आहे. 🙂 "मी सुंदर आहे तर आता मी काय करू?" अशी तक्रारही दिसून येते. "माझ्या नखऱ्याच्या शंभर तऱ्हा" सांगणारीला स्वतःच्या सौंदर्याची पुरेपूर जाणीव आहे आणि त्यापेक्षाही, फक्त शारीरिक सौंदर्यावर विसंबून न राहता, त्याबरोबर तोरा दाखवत भुरळ पाडणे ह्यात ती माहीर आहे. पण त्याचबरोबर ती धोक्याची सूचना पण देते आहे... घटकाभर संग बसून घालवा वेळ, जमल्यास मनांचा जमून येईल मेळ, नाहीतर यायचा अंगाशी हा खेळ, पाय टाकण्याआधी इथे, विचार पुरता करा, माझ्या नखऱ्याच्या शंभर तऱ्हा!! एका लावणीत एका पुरुषाने फसवलंय अशा स्त्रीचे रूप आहे. जत्रेत एक जण भेटला आणि त्याने आपल्याशी फ्लर्ट केलं, जत्रा उलगडल्यावर दुसऱ्या दिवशी मात्र तो डोळ्याला डोळा भिडवत नाही, तोंड चुकवून पुढे जातो, ह्याची तक्रार ह्या लावणीत येते. किती विविधता! अशा लावणी कलाकाराच्या आयुष्याचं विदारक दृश्य देखील शांताबाईंनी दाखवले आहे. तिथे येणारा आज एक, तर उद्या दुसराही असू शकेल किंवा तिथे असणारी आज एक, तर उद्या दुसरीही असू शकेल. हे सांगून त्या म्हणतात... प्रीतीचे नीतीचे व्यर्थ सांगणे, भुकेल्या देहाचे सारे मागणे, जन्माच्या नात्याचे फुका बहाणे, कुणाला सतत इथे राहणे? इथल्या महाली घडीची वस्ती, सुखाचे हिंदोळे आभाळी चढती, घडीत वरती घडीत खालती ऐन विशीतल्या स्त्रीचं सौंदर्याचं अत्युत्तम वर्णन एका गीतात केलं आहे. अनेक गीतांमध्ये पुरुषांनी स्त्रीच्या देहाचे आणि मनाचे केलेले वर्णन दिसून येते. त्यातही नुसता देहच नाही तर स्त्रीचा तोरा (attitude) देखील पुरुषाला कशी भुरळ पाडतो हे दिसतच. "ही चाल तुरुतुरु" आपल्या सगळ्यांच्या आवडीचे आणि माहितीचे आहे. असंच "मनाच्या धुंदीत लहरीत ये ना" हे देखील. गीतांमध्ये श्रावण, पाऊस, विरह, वाट बघणे हे सर्व हमखास येतं. एक गीत आहे "लहरी सजण कुणी दावा" - मीना खडीकर यांचे संगीत, उषा मंगेशकर यांचा आवाज. हे गीत मला ना वाचायला आवडलं ना ऐकायला आवडलं 🫣 श्रीकृष्ण राधेच्या कथा तर आपण गवळणींमधे अनेक वेळा ऐकल्या आहेत. कृष्णाची धून ऐकल्यानंतर अगदी काहीही न सुचता तशीच्या तशी निघालेली राधा! त्यातही तिच्या शृंगारचं वर्णन येतंच. सजण्याची आवड असलेल्या स्त्रीचे वर्णन अतिशय खुबीने शांताबाईंनी केले आहे. मला स्वतःला नटण्या मुरडण्याची अतिशय हौस असल्यामुळे हे सगळं वर्णन वाचून, "हे पुस्तक आपण आधी का नाही वाचलं" याचं दुःख मात्र झालं. ही उदाहरणं बघा ना... माथ्यावर मोतियाची जाळी, भांगेत मोती सर, चंद्रकोर भाळी, कानात झुमके, केसांमध्ये वेल, नाकात नथ, नथित हिरे, बिल्वदळे, वज्रटिक, `बोलताना पाठीवर जिचे रेशमाचे गोंडे खालीवर होतील अशी` पाच पदरी मोहन माळ!! दंडात वाकी रुताव्या, शिंदेशाही तोडे असावेत आणि पायी सांध्यात सोनसळी, गळ्यात तन्मणी, कमरेला कंबरपट्टा, पायी पैंजण.... "शालू हिरवा, पाच नि मरवा, वेणी तीपेडी घाला" हे गीत तर फारच प्रसिद्ध झाले. शृंगार आणि सौंदर्य यांचे वर्णन या सगळ्या गीतांमध्ये अगदी खुलून आलेलं आहे. आणि प्रेम! त्याविषयी किती लिहावं आणि कशाप्रकारे लिहावं असा मोठाच प्रश्न पडला आहे. तरीही एका स्त्रीच्या मनाने वाचलेल्या ह्या चार ओळी लिहीतेच... काय वाजले प्रिय ते पाऊल, तो तर वारा तिची न चाहूल, भास हो फसवा वरचेवरी, शोधितो राधेला श्रीहरी!! ...Read more