* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: NAVI STRI
  • Availability : Available
  • ISBN : 9788177662160
  • Edition : 8
  • Publishing Year : SEPTEMBER 2001
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 144
  • Language : MARATHI
  • Category : FICTION
  • Available in Combos :V.S KHANDEKAR COMBO SET-119 BOOKS
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
THIS NOVEL IS IN A TRUE SENSE "THE COMPLETE APPERCEPTION OF A WOMAN`. THE AUTHOR HAS LEFT IT INCOMPLETE, BUT IT COMPLETES ITSELF WITH THE AWAKENING OF THE MIND SO WE SHOULD NOT CONSIDER IT AS INCOMPLETE. THE AUTHOR HAS WRITTEN THIS NOVEL IN THE YEAR 1950. BUT EVEN TODAY IT IS MOST INTERESTING AND READABLE. TILL THE PUBLICATION OF THIS NOVEL THE NOVELIST WAS KNOWN TO BE A WEAK CREATIVE LITERATURE WRITER, BUT THE ABOVE SAID NOVEL BROUGHT HIS STRONG SIDE IN FRONT OF THE READERS, HE WAS REVOLUTINARY, PENSIVE WRITER AND HAD A VERY SENSITIVE MINDSET AND WANTED TO HELP WOMEN IN THEIR UPLIFTMENT. THE AUTHOR ALWAYS FELT THAT THE MODERN LADY SHOULD KNOW LAW, ESPECIALLY THE SECTION 144. IT IS TRUE THAT SHE IS GOING TO GET MARRIED EVEN AFTER BEING EDUCATED, BUT AFTER AND BEFORE MARRIAGE HER MIND SHOULD GET MOULDED. THE CONTINUOUS PROCESS OF MOULDING, THAT TO OF SOCIAL MOULDING SHOULD TAKE PLACE IN HER LIFE OR IS SHE GOING TO REMAIN A PUPPET IN HER HUSBAND`S HAND EVEN AFTER EDUCATION? WHY DOES NOT THE SOCIETY RECOGNISE THAT LIKE THE MALE MEMBERS OF THE SOCIETY SHE ALSO HAS A MIND, A FREEDOM? WHY DOES NOT A MAN CONSIDER A WOMAN AS A FRIEND? WHY IS A WOMAN LOOKED UPON ONLY AND ONLY AS A WOMAN? AREN`T THESE QUESTIONS EQUALLY APPLICABLE TO TODAY`S WOMAN TOO? EVEN IN THE 21ST CENTURY?
‘नवी स्त्री’ ही वि. स. खांडेकरांची अपूर्ण अशी कादंबरी असली, तरी तिचं स्वरूप पाहता ती एक पूर्ण ‘स्त्री प्रबोध गीता’ आहे. नव्या स्त्रीनं कायदा जाणायला हवा, १४४ कलम तिला माहीत असायला हवं; शिकून तिचा विवाह तर होणारच, पण त्या पलीकडे जाऊन तिचं सामाजिक मन घडणार आहे कां? की ती केवळ रबरी बाहुली राहणार? तिचं मन मुलां / पुरुषांप्रमाणेच स्वातंत्र्य घेऊन आलेलं असताना समाज ते तिला का देत नाही? पुरुष स्त्रीला मैत्रीण का नाही मानत? अशा प्रश्नांचं काहूर खांडेकरांच्या मनात माजलं असताना सन १९५० मध्ये निर्माण झालेली ही कादंबरी आज पन्नास वर्षांनंतरही तितकीच वाचनीय नि विचारणीय ठरते. खांडेकर ‘दुबळे ललितलेखक होते’ म्हणणायांना ‘नवी स्त्री’ वाचनाने ते क्रांतदर्शी विचारक व स्त्री उद्धारासाठी तळमळणारे संवेदनशील कादंबरीकार होते, हे उमजायला वेळ लागणार नाही.
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
# 11TH JANUARY #YAYATI #AMRUTVEL #RIKAMA DEVHARA #SONERI SWAPNA- BHANGALELI #SUKHACHA SHODH #NAVI STRI #PAHILE PREM #JALALELA MOHAR #PANDHARE DHAG #ULKA #KRAUNCHVADH #HIRVA CHAPHA #DON MANE #DON DHRUV #ASHRU #SARTYA SARI #ABOLI #SWAPNA ANI SATYA #PHULE AANI KATE #JEEVANKALA #PAKALYA #USHAAP #SAMADHIVARLI PHULE #VIKASAN #PRITICHA SHODH #DAVABINDU #CHANDERI SWAPNE #STREE AANI PURUSH #VIDYUT PRAKASH #PHULE ANI DAGAD #SURYAKAMLE #SURYAKAMLE #DHAGAADACHE CHANDANE #DHAGAADACHE CHANDANE #PAHILI LAT #HASTACHA PAUS #SANJVAT #AAJCHI SWAPNE #PRASAD #CHANDRAKOR #KALACHI SWAPNE #ASHRU ANI HASYA #GHARTYABAHER #KAVI #MURALI #BUDDHACHI GOSHTA #BHAUBIJ #SURYASTA #ASTHI #GHARATE #MADHYARATRA #YADNYAKUNDA #SONERI SAVLYA #VECHALELI PHULE #KALIKA #MRUGAJALATIL KALYA #KSHITIJSPARSH #SUVARNAKAN #VANDEVATA #DHUKE #KALPALATA #MANDAKINI #AJUN YETO VAS FULANA #TISARA PRAHAR #VASANTIKA #RANPHULE #AVINASH #HIRWAL #MANJIRYA #SANJSAVLYA #MUKHAVATE #VAYULAHARI #MANZADHAR #CHANDANYAT #SAYANKAL #ZIMZIM #PAHILE PAN #ADNYATACHYA MAHADWARAT #VANHI TO CHETVAVA #GOKARNICHI PHULE #DUSARE PROMETHEUS : MAHATMA GANDHI #RANG ANI GANDH #RESHA ANI RANG #VAMAN MALHAAR JOSHI : VYAKTI ANI VICHAR #GOPAL GANESH AGARKAR : VYAKTI ANI VICHAR #KESHAVSUT : KAVYA ANI KALA #RAM GANESH GADAKARI : VYAKTI ANI VANGAMAY #PRADNYA ANI PRATIBHA #SAHITYA PRATIBHA : SAMARTHYA ANI MARYADA #GADHAVACHI GEETA ANI GAJRACHI PUNGI #SASHACHE SINHAVALOKAN #PAHILI PAVALA #EKA PANACHI KAHANI #RUTU NYAHALANARE PAN #SANGEET RANKACHE RAJYA # V. S. KHANDEKARANCHI KAVITA #TEEN SAMELANE #SAHA BHASHANE #ABHISHEK #SWAPNASRUSHTI #TE DIVAS TEE MANASE #SAMAJSHILPI #JEEVANSHILPI #SAHITYA SHILPI # AASTIK #SUSHILECHA DEV #RAGINI #MUKYA KALYA #INDRADHANUSHYA #ANTARICHA DIVA #NAVE KIRAN #AGNINRUTYA #KAVYAJYOTI #TARAKA #RANGDEVTA #ययाति # (ज्ञानपीठ पुरस्कार १९७६) #अमृतवेल #रिकामा देव्हारा #सोनेरी स्वप्नं-भंगलेली #सुखाचा शोध #नवी स्त्री #पहिले प्रेम #जळलेला मोहर #पांढरे ढग #उल्का #क्रौंचवध #नवी स्त्री
Customer Reviews
  • Rating StarDAINIK TARUN BHARAT 07-04-2002

    स्त्री प्रबोधाची गीता... वि. स. खांडेकरांनी विसाव्या शतकाच्या मध्यावर लिहिलेली ‘नवी स्त्री’ ही कादंबरी सुनीलकुमार लवटे यांनी संपादित केली असून मेहता पब्लिशिंग हाऊसने ती प्रकाशित केली आहे. १९५० साली वसंत मासिकातून प्रकाशित झालेली ही कादंबरी आजही जुनीन वाटता आजच्या नव्या स्त्रीच्या समस्यांचे भावविश्वाचे चित्रण उभे करते. नव्या स्त्रीने कायदा जाणायला हवा, शिकून तिचा विवाह होणारच पण तिने सामाजिक मन घडवायला हवे, तिचं मन मुला-पुरुषांप्रमाणे स्वतंत्र हवे, पुरुषाने तिला मैत्रीण मानायला हवे असे विषय या कादंबरीतून पुढे आले आहेत. खांडेकर हे दुबळे ललित लेखक नव्हते तर क्रांतीदर्शी विचारांचे लेखक होते हे उमजून देणारी ही कादंबरी आहे. ...Read more

  • Rating StarDAINIK SAKAL 06-09-2001

    ज्येष्ठ साहित्यिक वि. स. खांडेकर यांना जाऊन यंदा पंचवीस वर्षे पूर्ण झाली. खांडेकरांची असंकलित स्वरूपातील ‘नवी स्त्री’ ही कादंबरी मेहता पब्लिशिंग हाऊस तर्फे कोल्हापुरात नुकतीच प्रकाशित झाली. सुमारे तीन हजार छापील पृष्ठे होतील एवढे खांडेकरांचे साहित्य द्याप असंकलित होते. ते सारे यंदाच्या त्यांच्या रजत स्मृती वर्षात प्रसिद्ध करण्याचा संपादक डॉ. सुनीलकुमार लवटे यांचा, तसेच खांडेकर कुटुंबीयांचा आणि प्रकाशकांचा संकल्प आहे. खांडेकरांसारख्या द्रष्ट्या, प्रज्ञावंत साहित्यिकाने पन्नास वर्षांपूर्वी ‘नव्या स्त्री’ संबंधी काय म्हटले होते, ही आधुनिक शिक्षित स्त्री खऱ्या अर्थाने सबला व्हावी यासाठी त्यांनी कोणत्या अपेक्षा व्यक्त केल्या होत्या, त्यांचे दर्शन या कादंबरीत घडते; आणि आजची स्थिती पाहता, त्याच अपेक्षा आजही कायम असल्याचेच चित्र दिसते. अर्धशतकाचा मोठा टप्पा ओलांडून पुढे आल्यावरही स्त्रियांच्या सामाजिक व्यावहारिक जडणघडणीत स्थूलमानाने फारसा फरक पडलेला नाही, हे म्हणूनच खूप चिंताजनक वाटते. खांडेकरांना केवळ आधुनिक व सुशिक्षित नवी स्त्री अभिप्रेत नव्हती, तर आधुनिकतेच्या जडणघडणीत तिचे माणूस म्हणून संस्कारीकरण कसे होईल. याचा त्यांना ध्यास होता. नव्या युगाचे, बदलाचे आव्हान केवळ मुठी वळून किंवा हात उगारून स्त्रीला पेलता येणार नाही; तर सामाजिक संघर्षात तिची भूमिका सामंजस्याची आणि अंगाखांद्यावर नवीन जबाबदाऱ्या पेलणारी असावी, असे खांडेकरांना वाटत होते. नव्या स्त्रीला कायद्यापासून इतर अनेक गोष्टींची चांगली जाण आणि माहिती असली पाहिजे, असा खांडेकरांचा आग्रह होता. तत्कालीन परिस्थितीत मांडलेले हे विचार लक्षात घेतले, तर खांडेकरांची ही कादंबरी म्हणजे स्त्री प्रबोध गीता ठरते. कालचक्र वेगाने फिरते आहे. विविध क्षेत्रात स्त्रिया नवनवी क्षितिजे जिंकत आहेत. स्पर्धापरीक्षांपासून उद्योग-व्यवसाय, संशोधन अशा अनेकविध ठिकाणी त्यांचे उच्चस्थान दिसतेही आहे; परंतु तेवढ्यावरूनही खांडेकरांच्या मनातील ‘नव्या स्त्री’ची कल्पना प्रत्यक्षात अवतरली आहे. असे म्हणता येणार नाही. शिक्षणाने माणूस साक्षर होतो; पण सबळ, ज्ञानी, व्यवहारी होतोच असे सांगता येत नाही. महिलांच्या निरक्षरतेचे प्रमाण कमी होत आहे असे आकडेवारीने सिद्ध करता आले तरी त्या व्यवहारी झाल्या, असे मानता येणार नाही. आपली एकूण सामाजिक रचना पाहता, स्त्रीला आपण पूर्ण स्वातंत्र्य दिल्याचे दिसत नाही. स्त्रीला कायदा ठाऊक झाला, त्यातून तिच्या हक्कांच्या कर्तव्याच्या जाणिवा जाग्या झाल्या, तर ती श्रेष्ठ ठरेल, या भीतीपोटी तसे प्रयत्नही फार कोणी करीत नाही. महात्मा फुले, महर्षी कर्वे यांच्यापासून स्त्रीशिक्षणाच्या प्रयत्नांची सुरुवात झाली असली, तरी आजही किती तरी स्त्रिया निरक्षरतेच्या अंधकारात चाचपडत आहेत. स्त्रियांच्या विकासाचे हे प्रयत्न पाहिले, तर आजचे चित्र खूप उज्ज्वल व्हावयास हवे होते असे वाटते; पण तसे घडले नाही. स्त्रियांना दिलेले स्वातंत्र्य आजही काही शृंखलांनी जखडलेलेच आहे. माणूस म्हणून स्त्रीचा जगण्याचा अधिकार तिला पूर्णपणे लाभला आहे, असे म्हणता येणार नाही, अशी स्थिती आहे. जळगाव-साताऱ्यातील घटना, कोठेवाडीसारखी प्रकरणे, कौटुंबिक छळातून होणाऱ्या महिलांच्या आत्महत्या, अनेक ठिकाणी त्यांना दिली जाणारी दुय्यम वागणूक, ही उदाहरणेच स्त्रीचे समाजातल चित्र स्पष्ट करणारी आहेत. स्त्रीला सबल बनविणारे, तिला पायावर उभे करणारे, तिला हक्कांची जाणीव देणारे प्रयत्न सुरू आहेत. त्यांचा परिणामही कोठे कोठे जाणवतो आहे; परंतु तेवढ्यावर समाधान मानावे आणि आपण प्रगतीचा मोठा पल्ला गाठल्याचे समाधान करून घ्यावे, अशी स्थिती नाही. खांडेकरांना अभिप्रेत असलेली ‘नवी स्त्री’ अर्धशतकानंतरही आज दिसत नाही. हे चित्र झपाट्याने बदलण्यासाठी, स्त्री-पुरुष या उभयतांच्या मानसिकतेतही बदलाची गरज आहे. हा बदलही अत्यंत प्रामाणिक हवा. दिखाऊपणा वेगळा आणि वस्तुस्थिती वेगळी. खांडेकरांची आजवर दडून राहिलेली ‘नवी स्त्री’ यंदाच्या ‘महिला सबलीकरण वर्षा’त अवतरणे, हा खरोखरच योगायोग आहे. आपण तो जाणून घेण्याची गरज आहे. -मल्हार अरणकल्ले ...Read more

  • Rating StarDAINIK SAKAL 16-09-2001

    ‘नवी स्त्री’ ही वि. स. खांडेकर यांची अपूर्ण अशी कादंबरी असली, तरी तिचं स्वरूप पाहता ती एक पूर्ण ‘स्त्री प्रबोध गीता’ आहे. नव्या स्त्रीनं कायदा जाणायला हवा. १४४ कलम तिला माहीत असायला हवं; शिकून तिचा विवाह तर होणारच; पण त्या पलीकडे जाऊन तिचं सामाजिक मनघडणार आहे का, की ती केवळ रबरी बाहुली राहणार? तिचं मन मुलां-पुरुषांप्रमाणेच स्वातंत्र्य घेऊन आलेलं असताना समाज ते तिला का देत नाही? पुरुष स्त्रीला मैत्रीण का नाही मानत? अशा प्रश्नांचं काहूर खांडेकरांच्या मनात माजलं असताना १९५० मध्ये निर्माण झालेली ही कादंबरी आज पन्नास वर्षांनंतरही तितकीच वाचनीय नि विचारणीय ठरते. ...Read more

  • Rating StarSAKAL 10-02-2002

    खांडेकराची ‘नवी स्त्री’… वि. स. खांडेकर यांच्या ‘नवी स्त्री’ या कादंबरीचे संपादन डॉ. सुनीलकुमार लवटे यांनी केले आहे. ही कादंबरी १९५० च्या दरम्यान ‘वसंत’ मासिकात क्रमश: प्रसिद्ध झाली होती. २००१ हे ‘महिला सबलीकरण’ वर्षाचे निमित्त साधून मेहता प्रकाशनान ही कादंबरी नव्याने प्रकाशित केली आहे. वि. स. खांडेकर हे मराठीतील महत्त्वाचे लेखक आहेत. त्यांचे खूप लेखन असंकलित आहे. हे ध्यानात आल्यानंतर सुनीलकुमार लवटे यांनी हे ग्रंथरूपाने प्रकाशित करण्याचे निश्चित केले. प्रस्तुत ‘नवी स्त्री’ ही कादंबरी या योजनेचा एक भाग आहे. खांडेकरांना अभिप्रेत असलेली नवी स्त्री केवळ आधुनिक व सुशिक्षित नको होती. नव्या स्त्रीचे संस्कारीकरण, आधुनिकतेच्या जडणघडणीत माणूस म्हणून कसे होईल, याचा त्यांना ध्ययास लागलो असायचा. ‘नवी स्त्री’ कादंबरी-लेखनात ही तळमळ पानोपानी स्पष्ट होते. नव्या युगाचे, बदलाचे आव्हान केवळ मुठी आवळून नि हात उगारून स्त्रीस पेलता येणार नाही. सामाजिक संघर्षात तिची भूमिका सामंजस्याची, अंगाखांद्यावर नवनवीन दायित्व पेलणारी, जबाबदार समाजधुरीण म्हणून खांडेकरांना अभिप्रेत होती.’ ही लवटे यांनी प्रकट केलेली भूमिका प्रस्तुत कादंबरीतून कितपत दिसते ते पाहू. या कादंबरीची नायिका ललिता खेड्यातून पुण्यात जाऊन वसतिगृहात राहून बी. ए. होते. तेथे सुवर्णपदक मिळवते. समाजवादी विचाराचा मित्र दिवाकराशी मैत्री करते, त्याचयाविषयी जवळीक वाटत असूनही केवळ मैत्री करते. काकासाहेब या श्रीमंत व्यक्तीच्या मुलाशी कमलाकरबरोबर पंधरा दिवस गाडीतून फिरते, त्याच्याशी लग्न करावे असा विचारही तिच्या मनात येतो. त्याच वेळी तिचा मित्र दिवाकर तिला भेटतो आणि कमलाकरशी लग्न झाल्यावर ‘कारखाना कामगारांच्या स्वाधीन करण्याची अट तू काकासाहेबांना घाल’ असे सांगतो आणि तसेच वचन ती दिवाकरला देते. येथे कादंबरी संपते. खांडेकरांच्या अन्य कादंबऱ्यांमध्ये जसे ध्येयवादी, कर्तव्यनिष्ठ पात्रे असतात, त्याचप्रमाणे याही कादंबरीत ललिता, ललिताचे वडील तात्या, दिवाकर आदी पात्रे आहेत. ललिता ध्येयवादी आहे. हे ललिताचे चित्रण नव्या आधुनिक विचाराच्या स्त्रीचे नाही असे वाटण्याची शक्यता नाकारता येत नाही. पण १९५० चा काळ ध्यानात घेतला तर तसे वाटणार नाही. यासंदर्भात डॉ. सुनीलकुमार लवटे प्रस्तावनेत लिहितात ‘नवी स्त्री’ची नायिका ललिता, तिचे वडील तात्यासाहेब, मित्र दिवाकर, समाजवादी समाजरचना यावी म्हणून काया, वाचा, मने धडपडतात. दुसरीकडे मगनभाई, काकासाहेब नि कमलाकर भांडवलशाही रचनेची मुळं आणखी खोल रुतवू पाहत आहेत. या पार्श्वभूमीवर ललिता नव्या स्त्रीचा प्रतिनिधी बनून व्यक्तिगत स्वार्थीपेक्षा समाजहित श्रेष्ठ मानून सर्वस्व त्यागास तयार होते. प्रा. लवटे यांना भाऊसाहेब खांडेकरांविषयी नितांत आदर असल्याने ललिता ही आधुनिक नव्या स्त्रीची प्रतिनिधी वाटते. आज स्त्री अनेक क्षेत्रात स्वयंपूर्ण होऊ पाहत आहे. तिला ‘स्व’ची जाणीव झाली आहे. या पाश्र्वभूमीवर प्रस्तुत कादंबरीतील नायिका ललिता निश्चितच नवी वाटत नाही. खांडेकरांच्या अन्य कादंबरीत जशी ‘टिपिकल’ पात्रे आढळतात, तशी पात्रे या कादंबरीतही आहेत. ललिताचे वडील तात्या, दिवाकर, स्वत: ललिता ही पात्रे ध्येयवादी आहेत, निष्ठावान आहेत. मगनभाई, काकासाहेब, कमलाकर ही पात्रे भांडवलदारी वृत्तीची आहेत. अन्य कादंबरीतील पात्रांप्रमाणे याही कादंबरीत रोमँटिक वृत्तीची पात्रे आहेत; पण असे असूनही ही कादंबरी वाचायला हवी. कारण ही कादंबरी वि. स. खांडेकरांची आहे. भाऊसाहेब खांडेकर जसे कादंबरीकार होते, तसे ते कथाकार, लघुनिबंधकार, रूपककथाकर आणि उत्तम समीक्षक होते. लेखक म्हणून ते प्रसिद्धीच्या शिखरावर असताना खूप लेखन असंकलित असूनही खांडेकरांनी ते प्रकाशित का होऊ दिले नसावे, हा विचार करण्यासारखा प्रश्न आहे. या प्रश्नाचे उत्तर कोणतेही असले तरी भाऊसाहेब खांडेकर मराठी भाषेतील ज्ञानपीठ पुरस्काराचे पहिले मानकरी आहेत. त्यांचे सर्व लेखन जपून ठेवायला हवे. आणि ते काम प्रा. लवटे करीत आहे. त्या कामाचा प्रारंभ त्यांनी ‘नवी स्त्री’ या कादंबरीच्या संपादनापासून केला आहे. पुढील कामाची मोठी तयारीही त्यांनी केली आहे. त्यांना मनापासून शुभेच्छा. उल्का, सुलभा, देवयांनी, र्शिमष्ठा, नंदा, वसू या नायिका ज्यांनी वाचल्या असतील, त्यांनी ललिता समजून घेण्यासाठी ‘नवी स्त्री’ ही कादंबरी वाचायला हवी. ...Read more

  • Read more reviews
Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

SARTH
SARTH by DR. S. L. BHYRAPPA Rating Star
हेमंत सांबरे

गेल्या तीन दिवसांत ही कादंबरी वाचून पूर्ण झाली .. ही कादंबरी वाचून होताच मन अगदी सुन्न होऊन गेले आहे . त्याचबरोबर अनेक संमिश्र भावना मनात दाटून आल्या आहेत . #आवरण ही जगप्रसिद्ध कादंबरी वाचल्यानंतर भैरप्पा यांच्या बद्दल मनात खूप आदरभाव निर्माण झाला होा . त्यानंतर त्यांचे हे दुसरे पुस्तक म्हणजे #सार्थ आज वाचून पूर्ण केले. या कादंबरीची कथा सातव्या शतकात घडत असते . *नागभट्ट* हा कादंबरीचा नायक आहे . हा नागभट्ट तुमच्या माझ्या सारखा एक सर्वसामान्य मनुष्य आहे . भैरप्पा यांनी त्याच्या नजरेतून त्या काळात घडत असलेल्या अनेक घटनांचा सूक्ष्म आढावा आपल्या समोर अतिशय समर्थपणे मांडला आहे . हे सातवे शतक म्हणजे असे होते की वैदिक धर्माचा प्रभाव जरी जनमानसात असला तरी , बौद्ध धर्माने ही आपली पाळेमुळे पूर्ण निदान उत्तर भारत , पूर्व भारत या भागात पसरवली होती . एक सामान्य मनुष्य म्हणून नागभट्टच्या मनात सुरू असलेली विविध द्वंद , त्याची वैदिक धर्म की बौद्ध धर्म याविषयी झालेली द्विधा मनस्थिती ही लेखकाने अचूक टिपली आहे . अनेक चर्चांमधून बौद्ध तत्त्वज्ञान , वैदिक तत्त्वज्ञान यांची ओळख अतिशय सोप्या भाषेत लेखक आपल्याला करून देतात , ते वाचताना आपल्या चित्ताला एक वेगळेच समाधान मिळत राहते .. या सर्व तत्त्वज्ञानाची प्रदीर्घ चर्चा , नायकाला येत असलेले वेगवेगळे अनुभव यातून आपणही समृध्द होत जातो . मधल्या काळात नायक मथुरेला येऊन राहतो . तेव्हा तिथल्या एका नाटक मंडळींबरोबर ओळख होऊन नायकाला त्यांच्या एका नाटकात प्रत्यक्ष *कृष्णाची* भूमिका करायला मिळते . तेव्हा त्याचे नाव *कृष्णानंद* असे होते . या भूमिकेमुळे नायकाला त्या भागात प्रचंड प्रसिध्दी मिळते . या नाटकातील असलेली त्याची नायिका चंद्रिका या सुंदर स्त्री बरोबर त्याचा विशेष स्नेह होऊन त्यांचे प्रेम ही जुळते . एखादी गोष्टीचा प्रचंड अभ्यास करून त्याला मांडणे यात भैरप्पा यांचा हात कदाचित फार कमी लेखक धरू शकतील . ही कादंबरी वाचतानाही प्रत्यही जाणवत राहते . याच काळात आद्य शंकराचार्य व मंडणमिश्र यांच्यातील झालेल्या जगप्रसिद्ध वादावर दोन ते तीन प्रकरणे या पुस्तकात आली आहे . या दोन दिग्गज वैदिक ऋषी बद्दल मी इतर अनेक ठिकाणी खूप ओझरते उल्लेख ऐकले होते , पण या कादंबरीत विस्तृत माहिती मिळाली , व एक वेगळेच समाधान मिळाले . कादंबरीचा शेवट आपल्याला पुस्तकातील आधीच्या अनेक कथावस्तू पासून एका वेगळ्याच दुनियेत घेऊन जातो .. याच सातव्या शतकात वायव्येकडून अरब लोकांची आक्रमणे सुरू झाली होती . तोपर्यंत भारतवर्षात लढली जाणारी युद्ध फक्त रणांगणावर लढली जात , त्याचा सामान्य जनतेला कुठलाही त्रास होत नसे . पण अरबांनी केलेल्या आक्रमण मुळे भारताचा सांस्कृतिक ढाचा कसा उद्ध्वस्त होऊ लागला याचे अचूक व सत्य वर्णन भैरप्पा यांनी केले आहे . ते वाचताना तेव्हाही हिंदूंची सद्गुण विकृती ( अनावश्यक असलेली अती सहिष्णुता ) कशा प्रकारे हिंदूंचा नाश करते हे ही त्यांनी सांगितले आहे . ती सर्व शेवटची प्रकरणे आपण सर्व हिंदूंनी मुळातच वाचण्यासारखी व अभ्यास करण्यासारखी आहे . एका प्रसंगात जेव्हा काही राजे एकत्र येऊन अरबांवर आक्रमण करण्याचे योजतात , तेव्हा धूर्त अरब त्या गावातील सूर्यमंदीर भ्रष्ट करायची धमकी देऊन त्या गावातील लोकांना युद्ध करण्यापासून व बाहेरून आलेल्या सैनिकांना सहाय्य न करण्याचे वचन घेतात . त्यामुळे जे नको तेच होते , व हळूहळू तो प्रदेश अरबांच्या ताब्यात जाऊन तेथला बौद्ध , वैदिक हिंदू धर्म नष्ट होऊ लागतो , याचे विदारक वर्णन आपल्यासमोर येते . हे वाचताना मला १७५१ साली नानासाहेब पेशव्यांनी काशी वर आक्रमण करून ते क्षेत्र मुक्त करण्याच्या प्रसंगाची आठवण झाली . तेव्हाही काशी मधील जनतेने नानासाहेब पेशव्यांना रोखले होते , नाहीतर तेव्हाचा ज्ञानवापी मंदीर मुक्त झाले असते ... तेव्हाही हिंदूंची सद्गुण विकृती आड आली जशी ती सातव्या शतकात ही आड आली होती .. असो --- अनेक अद्भुत प्रसंगातून आपल्याला ही कादंबरी घेऊन जात राहते ..सातव्या शतकातील भारताचे वर्णन वाचून आपण त्यावेळच्या राजांची वृत्ती , जनतेचा स्वभाव , साधू तसेच बौद्ध भिक्खू यांचे स्वभाव, त्यांचे विचार आपल्याला कळत जातात . लेखक आपल्याला नालंदा विद्यापीठ देखील दाखवून आणतो . त्याकाळात तेथील अध्ययन कसे चालत असे , हेदेखील आपल्याला वाचायला मिळते . पुस्तकाला कादंबरीची मोकळीक असली तरी आपल्याला ऐतिहासिक दृष्टिकोन ही मिळतो , हे नक्की ! ही कादंबरी वाचून होताच, भैरप्पा यांच्या इतर सर्व कादंबऱ्या व पुस्तके वाचण्याची उत्सुकता निर्माण झाली आहे , व ती इच्छा ही लवकरच पूर्ण होईल ही आशा! ...Read more

I HAVE A DREAM
I HAVE A DREAM by RASHMI BANSAL Rating Star
Krishna Diwate

‘स्टे हंग्री स्टे फूलीश’ आणि ‘कनेक्ट द डॉटस’ या बेस्ट सेलर पुस्तकाच्या लेखिका ‘समाजातल्या परंपरागत समस्या सोडवण्याचा नवा मार्ग शोधून काढणार्‍या वीस सामाजिक उद्योजकांच्या प्रेरणादायी कहाण्या’ हे वाक्य पुस्तकाचे पहिले पान उघडले आणि दिसले. त्यामुळे माझ कुतुहल चाळवले आणि ते पुस्तक वाचायला सुरुवात केली. मनोगतात लेखिका म्हणतात की, आता नव्या दमाचे, डोक्याने आणि मनाने ही विचार करणारे काही जण एखाद्याच्या नजरेतील दुःख ओळखतात, पेटून उठतात; पण ते त्याच्यावर विचार एखाद्या उद्योजकाप्रमाणे करतात. म्हणून ते ‘सामाजिक उद्योजक.’ नफा मिळविण्याचा हव्यास नसला तरी ते बिझनेस मधील तत्वे वापरून ती गोष्ट साध्य करतात. हे काही तरी वेगळे आपण वाचत आहोत असे मला वाटले. त्यामुळेच ते पुस्तक वाचायला घेतले. ह्या मध्ये वीस लोकांची चरीत्रे आहेत. ते सर्व भारतीय, उच्चशिक्षित तरूण तरूणी आहेत. कोणी त्यातील शास्त्रज्ञ आहेत तर कोणी मरिन बायोलॉजिस्ट, आयआयटी, आयआयएम ग्रॅज्युएट आहेत पण कोणत्या कोणत्या सामाजिक प्रश्नाने ते अस्वस्थ झाले आणि नेहमीच्या मार्गाने न जाता वेगळीच वाट पकडली. पुस्तकात ‘रेनमेकर्स,’ ‘चेंजमेकर्स’ व ‘स्पिरिच्युअल कॅपिटॅलिस्ट’ असे तीन भाग आहेत. प्रत्येकात अनुक्रमे अकरा,सहा व तीन व्यक्तीमत्वांची ओळख करून दिली आहे. ‘सुलभ’ ही आधुनिक टॉयलेटस उभारणारे बिंदेश्वर पाठक ह्याच्या चरित्राने पुस्तकाची सुरुवात होते. जातीने बिहारमधील ब्राह्मण. पण लहानपणी टॉयलेटस साफ करणार्‍याला हात लावला त्यामुळे आजीने अक्षरशः शेण, गोमुत्र खायला लावले. पण त्याच बिंद्रेश्वरांनी अगदी योगायोगाने ह्याच क्षेत्रात काम करण्याचे ठरविले. अर्थात ही वाट निश्चितच सोपी नव्हती. अनेक हालअपेष्टा सोसत, जगाचे धक्के खात, अनेक समस्यांना तोंड देत आपले स्वप्न ‘सुलभ शौचालयाच्या’ माध्यमातून सुरु केले. तो सगळा खडतर प्रवास अर्थात पुस्तकातूनच वाचायला हवा. त्यासाठी त्यांनी केवळ ती यंत्रणा तयार केली नाही तर ती टॉयलेटस बांधून, त्यासाठी लागणारी प्रेरणा, शिक्षण, संभाषण, ट्रेनिंग, पाठपुरावा अशा सर्वच गोष्टी ‘सुलभ’ तर्फेच संभाळल्या जातात. सध्या ही संस्था स्वबळावर चालते. 100 ते 125 कोटी इतके तिचे वर्षाचे उपन्न आहे. इतकेच नाही पूर्वी जे लोक सफाईचे काम करत असत त्यांच्या मुलांच्या शिक्षणाचा खर्च संस्था करत आहे. ‘सुलभ पब्लिक स्कूल’ नावाने शाळा सुरु केली आहे. तरूणांसाठी व्होकेशनल क्लासेस चालवले जातात. म्हणजे मिळालेला नफा पुन्हा त्याच सफाई कामगारांच्या कल्याणासाठी वापरला जातो. टॉयलेटस बांधून भरपूर पैसा मिळवता येतो हे वाक्य पचायला जरा जडच जाते. अनिता आहुजा ही दिल्लीत सुखवस्तू कुटूंबात रहाणारी सामान्य स्त्री. पण कचरा वेचणार्‍या मुलांचे हाल पाहून त्यांच्यासाठी काही तरी करावे असे तिने ठरविले. तिने 1998 मध्ये कॉन्झर्व्ह नावाची संस्था उभी केली. व त्यातून पहिला प्रोजेक्ट सुरु केला तो म्हणजे आजुबाजूच्या परिसरातील कचरा उचलून त्याचे कंपोस्टखत तयार करणे. कचरा गोळा करण्यासाठी चांगल्या ढकलगाड्या आणल्या, युनिफॉर्म, आय कार्डची सोय केली. 2002 पर्यंत एक पूर्ण वेळ काम करणारी मोठी संस्था बनली. त्याचवेळी त्यांनी प्लॅस्टीकच्या कचर्‍यावर प्रयोग सुरु केले. तिचे पती शलभ ह्यांनी बिटस पिलानी मधून इंजिनिअरींग केले आहे. त्यांच्या मदतीने तिने फॅक्टरी सुरु करण्याचे ठरविले. शलभने मोठ्या प्रमाणावर प्लॅस्टिक शीटस निर्मिती करू शकेल असे मशीन तयार केले. त्यासाठी अर्थातच अनेक प्रश्न समोर उभॆ राहिले. चुका झाल्या, ठोकरा खाल्या पण त्यातून वाट काढत त्यांनी चिकाटीने प्रयत्न सुरुच ठेवले. आज दोघे मिळून कचर्‍यातील प्लॅस्टिक पिशव्या वापरून आकर्षक अशा हॅडबॅगस तयार करण्याचा कारखाना चालवतात. जे लोक सुरुवातीला केवळ कचरा उचलण्याचे काम करत होते, त्यांच्या काही कौशल्य दिसले की त्यांना वेगळे काढून ट्रेनिंग दिले जाते. मशीनवर असिस्टंटचे काम करू लागतात त्यातून काही लोक तर ग्रुप लिडर ही झाले आहेत. कटींग करणॆ, क्वालिटी तपासणॆ, फिनिंशींग, पॅकिंग अशी सर्व महत्वाची कामे ते करतात. आता ते कामगार झाल्यामुळॆ त्यांना चांगला पगार, प्रॉव्हिडंट फंड, ओव्हरटाईम अशा सुविधा मिळू लागल्या त्यापेक्षा ही जास्त त्यांना समाजात प्रतिष्ठा मिळाली. त्यांच्या साठी हे नवीनच आहे. अनिता व शलभ दोघॆही मेहनत घेतात पण एनजीओ असून ही भरपूर पैसा कमावणे त्यांना चुकीचे वाटत नाही. कारण आज ह्या एका उद्योगामुळे कित्येक कुटूंबाची आर्थिक स्थिती बदलून गेली आहे. अशीच अजून एक प्रेरणादायी कथा दिल्लीतील रंगसूत्र कंपनी चालविणार्‍या सुमिता घोस ह्यांची. स्वतः ग्रॅज्युएशन पूर्ण केल्यावर मास्टर इन इकॉनॉमिक्स ची पदवी घेतल्यावर संजॉय घोस ह्या या आय आर एम मधून शिक्षण घेतलेल्या ध्येयवादी तरूणाशी लग्न केले. पण दुर्दैवाने आसाममध्ये काम करत असताना त्यांची 1998 मध्ये उल्फाच्या अतिरेक्यांनी हत्या केली. त्यानंतर अनेक टक्केटोणपे खात, दोन लहान मुलांचा संभाळ करत सुमिताने ‘रंगसूत्र’ नावाची कंपनी काढली. त्याच्या मार्फत ती खॆडॆगावातल्या लोकांकडून कापड, शोभॆच्या वस्तू, बनवून घेते आणि त्या फॅब ईंडीयासारख्या प्रसिध्द कंपन्यांना विकते. जैसलमेर, बारमेर जिल्ह्यातले कारागिर तिच्यासोबत काम करत आहेत. अजून एक अशीच ध्येयवादी तरूणी म्हणजे इशिता खन्ना. डेहराडून मध्ये जन्म झालेली एक सर्वसामान्य मुलगी. पण निसर्गसंवर्धन आणि भूगोल या विषयांची आवड असलेली. म्हणूनच तिने आपल्या ग्रॅज्युएशन नंतर टाटा इंन्स्टीट्यूट मधून मास्टर्स केले. पर्यावरण क्षेत्रातच काम करायचे आहे हे निश्चित ठरवून तिने काही वर्षे नोकरी केली. त्यानंतर 2002 मध्ये नोकरी सोडून आपल्या दोन मित्रांसोबत स्पिती व्हॅलीमध्ये मूस नावाची एन्जीओ सुरु केली. तेथील स्थानिक महिलांचे ग्रुपस करून त्यांना तिथे असणार्‍या सीबक थॉर्न ह्या फळांच्या लागवडीचे ट्रेनिंग दिले. त्यावर प्रक्रिया करायला शिकवले. ही झाडॆ मातीला धरून ठेवतात त्यामुळे धूप रोखली जाते, शिवाय नायट्रोजन ही धरून ठेवत असल्याने जमिनीचा पोत सुधारतो. त्यामुळे ह्या फळांवर लक्ष केंद्रित केले. त्यामुळे तिथल्या बायकांना चांगला रोजगार मिळू लागला. त्याचबरोबर तिने स्थानिक तरूणांना पर्यटकांना ट्रेक किंवा जीप सफारीसाठी नेणे, कॅम्प लावणे, गरज पडल्यास प्रथमोपचार करणे ही कामे ही करायला शिकवले. कारण हळूहळू तिथे पर्यटन वाढू लागले. ते इको-फ्रेंडली करण्याकडॆ तिच्या इकोस्पियर संस्थेचा भर आहे. आता दरवर्षी पर्यटनातून 35 ते 40 लाखाचे उत्पन्न मिळते.आणि त्यातून नफा ही मिळतो. इकोस्पियर संस्थेने शेजारच्य़ा ‘लाहुल’ व्हॅलीमध्ये ही विकास कामे सुरु केली आहेत. पर्वतावर तयार होणार्‍या कचर्‍याच्या समस्येवरही तिला काहीतरी करायचे आहे. तिची संस्था लोकांना मुद्दाम तिथले लोक किती अवघड परिस्थितीत रहातात हे दाखवते. अतिशय थंडीत तिथे तापमान मायनस 35 पर्यंत खाली गेल्यावर हॅंडपंपने पाणी काढणे सुध्दा किती कठीण होते हे सांगितले जाते. तेव्हा आपल्यासारख्य़ा पर्यटकांना काय काय करता येईल याबद्दल ती जागरूकता निर्माण करते. मूळात हे पुस्तक 2012 साली लिहिलेले आहे. त्यामुळे आता ह्या वेगवेगळ्या प्रकारचे काम करणार्‍या संस्थेचे काम या दहा वर्षात खूपच वाढले असेल यात काही शंका नाही. दीनबंधू साहू हे मरिन बायोलॉजिस्ट आहेत पण ते प्रयोगशाळेतून बाहेर पडून समाजासाठी काम करतात. ‘प्रोजेक्ट चिलका’ ह्या त्यांच्या संस्थेमार्फत ओरिसातील लोकांना समुद्राची शेती करायला शिकवतात. ओरिसा मधील पुरी येथे जन्म झालेल्या दीनबंधूनी अतिशय हलाखीच्या परिस्थितीत शिक्षण घेतल्यानंतर दिल्लीत एमएसीला ॲडमिशन घेतली. परंतु योगायोगाने १९८७ मध्ये अंटार्क्टिक वर जाण्याची संधी मिळाली. नंतर पीएचडी पूर्ण केल्यानंतर अनेक देशांमध्ये नोकरी निमित्ताने फिरले. पण तरीही शेवटी दिल्ली युनिव्हर्सिटी मध्ये प्रोफेसर म्हणून काम सुरू केले. त्यांना समुद्री वनस्पती बद्दल विशेष आस्था होती; पण त्या बद्दल आपल्या देशात फारशी जागरूकता नव्हती. ही लागवड पर्यावरण पूरक असते शिवाय त्यातून स्थानिक लोकांना उत्पन्नाचे साधन मिळते. त्यासाठी डिएसटीने निधी मंजूर केला. मग त्यांनी चिल्का सरोवराची पहाणी केली, त्यामध्ये वाढू शकतील अशा चार जातींची निवड करून स्थानिक लोकांना समजेल अशा सोप्या भाषेत माहिती दिली. प्रात्यक्षिके दाखवली, वर्कशॉप्स घेतली. त्यामुळे तेथील शेतकऱ्यांना रोजगार मिळू लागला. यातूनच पर्यावरण संरक्षण ही होऊ लागले. यातून त्यांना प्रत्यक्ष कांहीं आर्थिक फायदा होत नसला तरी ते म्हणतात, की आम्हाला दोघांना दिल्लीत चांगली नोकरी आहे. त्यामुळे पैसे कमावणे हा उद्देश नाही; पण अजून तीस वर्षांनंतर मला मी काही तरी काम केलेले दिसेल. असे जर काहीच तुम्हाला दिसणार नसेल तर जगायचे कशाला? भूषण पुनानी हे असेच अत्यंत बुध्दीमान विद्यार्थी. मेडीकलची ॲडमिशन हुकल्यामुळे डेअरी कोर्ससाठी ॲडमिशन घेतली. तिथे ही विद्यापीठात प्रथम क्रमांक मिळविला. नंतर पीएचडी केले. ग्रामविकास शिकण्यासाठी आयआयएम मध्ये एमबीए केले. हे झाल्यावर 1979 मध्ये ब्लाईंड स्कूल मध्ये दोन वर्षांसाठी नोकरी सुरु केली ती सुधा ह्याच हेतूने की मॅनेजमेंट शिकताना जी थेअरी शिकलो ती विकासाच्या क्षेत्रात वापरता येईल का? हळूहळू त्यांना अनेक लोक मिळत गेले. सर्वांनी मिळून आज संस्था खूप मोठी केली आहे.त्यांनी काम सुरु केले तेव्हा फक्त एक कॅपस होता, आज गुजरात मध्ये आठ कॅपस आहेत. दहा लाख मूल्य असलेली संस्था आज दोन कोटी रुपयांची आहे. अपंग लोकांनी स्वावलंबी व्हावे ह्यासाठी संस्था काम करते. दृष्टीहीन मुली ब्यूटी पार्लरसारखे कोर्स चालवतात, फिजिओथेरपी शिकून सेंटर मध्ये काम करतात. विकास साधण्यासाठी योग्य व्यवस्थापनेची गरज असते हे त्यांनी दाखवून दिले आहे. हजारो लोकांच्या आयुष्यात नवा प्रकाश निर्माण करून त्यांना सामान्य आयुष्य जगण्याची संधी मिळवून दिली आहे. अशी ही एकापेक्षा एक वेगवेगळ्या प्रकारची माणसे. कोणत्या तरी ध्येयाने पछाडलेली . सामाजिक कार्य करत असतानाच त्या लोकांचे कल्याण कसे होईल असा विचार करणारी. लेखिकेने त्या सर्वांच्या प्रत्यक्ष मुलाखती घेतल्या आहेत, त्यांचे काम प्रत्यक्ष पाहून जाणून घेतले आहे. त्यामुळे सर्व माहिती व्यवस्थित गोळा करून आपल्यासमोर मांडली आहे. त्यामुळेच त्या मनोगतात म्हणतात, ‘तुमचं आयुष्य कसे ही असले तरी इतरांसाठी एखादा क्षण द्या. इतरांना प्रेम, आनंद, चांगुलपण द्या. जितकं द्याल तितकं तुम्हाला परत मिळेल.’ हेच वाक्य मलाही अतिशय उर्जा देऊन गेले. माझ्याकडे जे आहे, जे मला देणे शक्य आहे ते निरपेक्षपणे ज्यांना गरज आहे त्याला देणे ह्या सारखा आनंद अजून काय असणार? ह्याच वाक्याने मी आपली ह्या आठवड्यात रजा घेते. उद्या पासून सुरु होणार्‍या नवीन सत्रासाठी सारिका ताईंना हार्दिक शुभेच्छा. ...Read more