* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Availability : Available
  • ISBN : 9788177662160
  • Edition : 8
  • Publishing Year : SEPTEMBER 2001
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 144
  • Language : MARATHI
  • Category : FICTION
  • Available in Combos :V.S KHANDEKAR COMBO SET-119 BOOKS
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
THIS NOVEL IS IN A TRUE SENSE. THE COMPLETE APPERCEPTION OF A WOMAN`. THE AUTHOR HAS LEFT IT INCOMPLETE, BUT IT COMPLETES ITSELF WITH THE AWAKENING OF THE MIND SO WE SHOULD NOT CONSIDER IT AS INCOMPLETE. THE AUTHOR HAS WRITTEN THIS NOVEL IN THE YEAR 1950. BUT EVEN TODAY IT IS MOST INTERESTING AND READABLE. TILL THE PUBLICATION OF THIS NOVEL THE NOVELIST WAS KNOWN TO BE A WEAK CREATIVE LITERATURE WRITER, BUT THE ABOVE SAID NOVEL BROUGHT HIS STRONG SIDE IN FRONT OF THE READERS, HE WAS REVOLUTINARY, PENSIVE WRITER AND HAD A VERY SENSITIVE MINDSET AND WANTED TO HELP WOMEN IN THEIR UPLIFTMENT. THE AUTHOR ALWAYS FELT THAT THE MODERN LADY SHOULD KNOW LAW, ESPECIALLY THE SECTION 144. IT IS TRUE THAT SHE IS GOING TO GET MARRIED EVEN AFTER BEING EDUCATED, BUT AFTER AND BEFORE MARRIAGE HER MIND SHOULD GET MOULDED. THE CONTINUOUS PROCESS OF MOULDING, THAT TO OF SOCIAL MOULDING SHOULD TAKE PLACE IN HER LIFE OR IS SHE GOING TO REMAIN A PUPPET IN HER HUSBAND`S HAND EVEN AFTER EDUCATION? WHY DOES NOT THE SOCIETY RECOGNISE THAT LIKE THE MALE MEMBERS OF THE SOCIETY SHE ALSO HAS A MIND, A FREEDOM? WHY DOES NOT A MAN CONSIDER A WOMAN AS A FRIEND? WHY IS A WOMAN LOOKED UPON ONLY AND ONLY AS A WOMAN? AREN`T THESE QUESTIONS EQUALLY APPLICABLE TO TODAY`S WOMAN TOO? EVEN IN THE 21ST CENTURY?
‘नवी स्त्री’ ही वि. स. खांडेकरांची अपूर्ण अशी कादंबरी असली, तरी तिचं स्वरूप पाहता ती एक पूर्ण ‘स्त्री प्रबोध गीता’ आहे. नव्या स्त्रीनं कायदा जाणायला हवा, १४४ कलम तिला माहीत असायला हवं; शिकून तिचा विवाह तर होणारच, पण त्या पलीकडे जाऊन तिचं सामाजिक मन घडणार आहे कां? की ती केवळ रबरी बाहुली राहणार? तिचं मन मुलां / पुरुषांप्रमाणेच स्वातंत्र्य घेऊन आलेलं असताना समाज ते तिला का देत नाही? पुरुष स्त्रीला मैत्रीण का नाही मानत? अशा प्रश्नांचं काहूर खांडेकरांच्या मनात माजलं असताना सन १९५० मध्ये निर्माण झालेली ही कादंबरी आज पन्नास वर्षांनंतरही तितकीच वाचनीय नि विचारणीय ठरते. खांडेकर ‘दुबळे ललितलेखक होते’ म्हणणायांना ‘नवी स्त्री’ वाचनाने ते क्रांतदर्शी विचारक व स्त्री उद्धारासाठी तळमळणारे संवेदनशील कादंबरीकार होते, हे उमजायला वेळ लागणार नाही.
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
# 11TH JANUARY #YAYATI #AMRUTVEL #RIKAMA DEVHARA #SONERI SWAPNA- BHANGALELI #SUKHACHA SHODH #NAVI STRI #PAHILE PREM #JALALELA MOHAR #PANDHARE DHAG #ULKA #KRAUNCHVADH #HIRVA CHAPHA #DON MANE #DON DHRUV #ASHRU #SARTYA SARI #ABOLI #SWAPNA ANI SATYA #PHULE AANI KATE #JEEVANKALA #PAKALYA #USHAAP #SAMADHIVARLI PHULE #VIKASAN #PRITICHA SHODH #DAVABINDU #CHANDERI SWAPNE #STREE AANI PURUSH #VIDYUT PRAKASH #PHULE ANI DAGAD #SURYAKAMLE #SURYAKAMLE #DHAGAADACHE CHANDANE #DHAGAADACHE CHANDANE #PAHILI LAT #HASTACHA PAUS #SANJVAT #AAJCHI SWAPNE #PRASAD #CHANDRAKOR #KALACHI SWAPNE #ASHRU ANI HASYA #GHARTYABAHER #KAVI #MURALI #BUDDHACHI GOSHTA #BHAUBIJ #SURYASTA #ASTHI #GHARATE #MADHYARATRA #YADNYAKUNDA #SONERI SAVLYA #VECHALELI PHULE #KALIKA #MRUGAJALATIL KALYA #KSHITIJSPARSH #SUVARNAKAN #VANDEVATA #DHUKE #KALPALATA #MANDAKINI #AJUN YETO VAS FULANA #TISARA PRAHAR #VASANTIKA #RANPHULE #AVINASH #HIRWAL #MANJIRYA #SANJSAVLYA #MUKHAVATE #VAYULAHARI #MANZADHAR #CHANDANYAT #SAYANKAL #ZIMZIM #PAHILE PAN #ADNYATACHYA MAHADWARAT #VANHI TO CHETVAVA #GOKARNICHI PHULE #DUSARE PROMETHEUS : MAHATMA GANDHI #RANG ANI GANDH #RESHA ANI RANG #VAMAN MALHAAR JOSHI : VYAKTI ANI VICHAR #GOPAL GANESH AGARKAR : VYAKTI ANI VICHAR #KESHAVSUT : KAVYA ANI KALA #RAM GANESH GADAKARI : VYAKTI ANI VANGAMAY #PRADNYA ANI PRATIBHA #SAHITYA PRATIBHA : SAMARTHYA ANI MARYADA #GADHAVACHI GEETA ANI GAJRACHI PUNGI #SASHACHE SINHAVALOKAN #PAHILI PAVALA #EKA PANACHI KAHANI #RUTU NYAHALANARE PAN #SANGEET RANKACHE RAJYA # V. S. KHANDEKARANCHI KAVITA #TEEN SAMELANE #SAHA BHASHANE #ABHISHEK #SWAPNASRUSHTI #TE DIVAS TEE MANASE #SAMAJSHILPI #JEEVANSHILPI #SAHITYA SHILPI # AASTIK #SUSHILECHA DEV #RAGINI #MUKYA KALYA #INDRADHANUSHYA #ANTARICHA DIVA #NAVE KIRAN #AGNINRUTYA #KAVYAJYOTI #TARAKA #RANGDEVTA #ययाति # (ज्ञानपीठ पुरस्कार १९७६) #अमृतवेल #रिकामा देव्हारा #सोनेरी स्वप्नं-भंगलेली #सुखाचा शोध #नवी स्त्री #पहिले प्रेम #जळलेला मोहर #पांढरे ढग #उल्का #क्रौंचवध #नवी स्त्री
Customer Reviews
  • Rating StarDAINIK TARUN BHARAT 07-04-2002

    स्त्री प्रबोधाची गीता... वि. स. खांडेकरांनी विसाव्या शतकाच्या मध्यावर लिहिलेली ‘नवी स्त्री’ ही कादंबरी सुनीलकुमार लवटे यांनी संपादित केली असून मेहता पब्लिशिंग हाऊसने ती प्रकाशित केली आहे. १९५० साली वसंत मासिकातून प्रकाशित झालेली ही कादंबरी आजही जुनीन वाटता आजच्या नव्या स्त्रीच्या समस्यांचे भावविश्वाचे चित्रण उभे करते. नव्या स्त्रीने कायदा जाणायला हवा, शिकून तिचा विवाह होणारच पण तिने सामाजिक मन घडवायला हवे, तिचं मन मुला-पुरुषांप्रमाणे स्वतंत्र हवे, पुरुषाने तिला मैत्रीण मानायला हवे असे विषय या कादंबरीतून पुढे आले आहेत. खांडेकर हे दुबळे ललित लेखक नव्हते तर क्रांतीदर्शी विचारांचे लेखक होते हे उमजून देणारी ही कादंबरी आहे. ...Read more

  • Rating StarDAINIK SAKAL 06-09-2001

    ज्येष्ठ साहित्यिक वि. स. खांडेकर यांना जाऊन यंदा पंचवीस वर्षे पूर्ण झाली. खांडेकरांची असंकलित स्वरूपातील ‘नवी स्त्री’ ही कादंबरी मेहता पब्लिशिंग हाऊस तर्फे कोल्हापुरात नुकतीच प्रकाशित झाली. सुमारे तीन हजार छापील पृष्ठे होतील एवढे खांडेकरांचे साहित्य द्याप असंकलित होते. ते सारे यंदाच्या त्यांच्या रजत स्मृती वर्षात प्रसिद्ध करण्याचा संपादक डॉ. सुनीलकुमार लवटे यांचा, तसेच खांडेकर कुटुंबीयांचा आणि प्रकाशकांचा संकल्प आहे. खांडेकरांसारख्या द्रष्ट्या, प्रज्ञावंत साहित्यिकाने पन्नास वर्षांपूर्वी ‘नव्या स्त्री’ संबंधी काय म्हटले होते, ही आधुनिक शिक्षित स्त्री खऱ्या अर्थाने सबला व्हावी यासाठी त्यांनी कोणत्या अपेक्षा व्यक्त केल्या होत्या, त्यांचे दर्शन या कादंबरीत घडते; आणि आजची स्थिती पाहता, त्याच अपेक्षा आजही कायम असल्याचेच चित्र दिसते. अर्धशतकाचा मोठा टप्पा ओलांडून पुढे आल्यावरही स्त्रियांच्या सामाजिक व्यावहारिक जडणघडणीत स्थूलमानाने फारसा फरक पडलेला नाही, हे म्हणूनच खूप चिंताजनक वाटते. खांडेकरांना केवळ आधुनिक व सुशिक्षित नवी स्त्री अभिप्रेत नव्हती, तर आधुनिकतेच्या जडणघडणीत तिचे माणूस म्हणून संस्कारीकरण कसे होईल. याचा त्यांना ध्यास होता. नव्या युगाचे, बदलाचे आव्हान केवळ मुठी वळून किंवा हात उगारून स्त्रीला पेलता येणार नाही; तर सामाजिक संघर्षात तिची भूमिका सामंजस्याची आणि अंगाखांद्यावर नवीन जबाबदाऱ्या पेलणारी असावी, असे खांडेकरांना वाटत होते. नव्या स्त्रीला कायद्यापासून इतर अनेक गोष्टींची चांगली जाण आणि माहिती असली पाहिजे, असा खांडेकरांचा आग्रह होता. तत्कालीन परिस्थितीत मांडलेले हे विचार लक्षात घेतले, तर खांडेकरांची ही कादंबरी म्हणजे स्त्री प्रबोध गीता ठरते. कालचक्र वेगाने फिरते आहे. विविध क्षेत्रात स्त्रिया नवनवी क्षितिजे जिंकत आहेत. स्पर्धापरीक्षांपासून उद्योग-व्यवसाय, संशोधन अशा अनेकविध ठिकाणी त्यांचे उच्चस्थान दिसतेही आहे; परंतु तेवढ्यावरूनही खांडेकरांच्या मनातील ‘नव्या स्त्री’ची कल्पना प्रत्यक्षात अवतरली आहे. असे म्हणता येणार नाही. शिक्षणाने माणूस साक्षर होतो; पण सबळ, ज्ञानी, व्यवहारी होतोच असे सांगता येत नाही. महिलांच्या निरक्षरतेचे प्रमाण कमी होत आहे असे आकडेवारीने सिद्ध करता आले तरी त्या व्यवहारी झाल्या, असे मानता येणार नाही. आपली एकूण सामाजिक रचना पाहता, स्त्रीला आपण पूर्ण स्वातंत्र्य दिल्याचे दिसत नाही. स्त्रीला कायदा ठाऊक झाला, त्यातून तिच्या हक्कांच्या कर्तव्याच्या जाणिवा जाग्या झाल्या, तर ती श्रेष्ठ ठरेल, या भीतीपोटी तसे प्रयत्नही फार कोणी करीत नाही. महात्मा फुले, महर्षी कर्वे यांच्यापासून स्त्रीशिक्षणाच्या प्रयत्नांची सुरुवात झाली असली, तरी आजही किती तरी स्त्रिया निरक्षरतेच्या अंधकारात चाचपडत आहेत. स्त्रियांच्या विकासाचे हे प्रयत्न पाहिले, तर आजचे चित्र खूप उज्ज्वल व्हावयास हवे होते असे वाटते; पण तसे घडले नाही. स्त्रियांना दिलेले स्वातंत्र्य आजही काही शृंखलांनी जखडलेलेच आहे. माणूस म्हणून स्त्रीचा जगण्याचा अधिकार तिला पूर्णपणे लाभला आहे, असे म्हणता येणार नाही, अशी स्थिती आहे. जळगाव-साताऱ्यातील घटना, कोठेवाडीसारखी प्रकरणे, कौटुंबिक छळातून होणाऱ्या महिलांच्या आत्महत्या, अनेक ठिकाणी त्यांना दिली जाणारी दुय्यम वागणूक, ही उदाहरणेच स्त्रीचे समाजातल चित्र स्पष्ट करणारी आहेत. स्त्रीला सबल बनविणारे, तिला पायावर उभे करणारे, तिला हक्कांची जाणीव देणारे प्रयत्न सुरू आहेत. त्यांचा परिणामही कोठे कोठे जाणवतो आहे; परंतु तेवढ्यावर समाधान मानावे आणि आपण प्रगतीचा मोठा पल्ला गाठल्याचे समाधान करून घ्यावे, अशी स्थिती नाही. खांडेकरांना अभिप्रेत असलेली ‘नवी स्त्री’ अर्धशतकानंतरही आज दिसत नाही. हे चित्र झपाट्याने बदलण्यासाठी, स्त्री-पुरुष या उभयतांच्या मानसिकतेतही बदलाची गरज आहे. हा बदलही अत्यंत प्रामाणिक हवा. दिखाऊपणा वेगळा आणि वस्तुस्थिती वेगळी. खांडेकरांची आजवर दडून राहिलेली ‘नवी स्त्री’ यंदाच्या ‘महिला सबलीकरण वर्षा’त अवतरणे, हा खरोखरच योगायोग आहे. आपण तो जाणून घेण्याची गरज आहे. -मल्हार अरणकल्ले ...Read more

  • Rating StarDAINIK SAKAL 16-09-2001

    ‘नवी स्त्री’ ही वि. स. खांडेकर यांची अपूर्ण अशी कादंबरी असली, तरी तिचं स्वरूप पाहता ती एक पूर्ण ‘स्त्री प्रबोध गीता’ आहे. नव्या स्त्रीनं कायदा जाणायला हवा. १४४ कलम तिला माहीत असायला हवं; शिकून तिचा विवाह तर होणारच; पण त्या पलीकडे जाऊन तिचं सामाजिक मनघडणार आहे का, की ती केवळ रबरी बाहुली राहणार? तिचं मन मुलां-पुरुषांप्रमाणेच स्वातंत्र्य घेऊन आलेलं असताना समाज ते तिला का देत नाही? पुरुष स्त्रीला मैत्रीण का नाही मानत? अशा प्रश्नांचं काहूर खांडेकरांच्या मनात माजलं असताना १९५० मध्ये निर्माण झालेली ही कादंबरी आज पन्नास वर्षांनंतरही तितकीच वाचनीय नि विचारणीय ठरते. ...Read more

  • Rating StarSAKAL 10-02-2002

    खांडेकराची ‘नवी स्त्री’… वि. स. खांडेकर यांच्या ‘नवी स्त्री’ या कादंबरीचे संपादन डॉ. सुनीलकुमार लवटे यांनी केले आहे. ही कादंबरी १९५० च्या दरम्यान ‘वसंत’ मासिकात क्रमश: प्रसिद्ध झाली होती. २००१ हे ‘महिला सबलीकरण’ वर्षाचे निमित्त साधून मेहता प्रकाशनान ही कादंबरी नव्याने प्रकाशित केली आहे. वि. स. खांडेकर हे मराठीतील महत्त्वाचे लेखक आहेत. त्यांचे खूप लेखन असंकलित आहे. हे ध्यानात आल्यानंतर सुनीलकुमार लवटे यांनी हे ग्रंथरूपाने प्रकाशित करण्याचे निश्चित केले. प्रस्तुत ‘नवी स्त्री’ ही कादंबरी या योजनेचा एक भाग आहे. खांडेकरांना अभिप्रेत असलेली नवी स्त्री केवळ आधुनिक व सुशिक्षित नको होती. नव्या स्त्रीचे संस्कारीकरण, आधुनिकतेच्या जडणघडणीत माणूस म्हणून कसे होईल, याचा त्यांना ध्ययास लागलो असायचा. ‘नवी स्त्री’ कादंबरी-लेखनात ही तळमळ पानोपानी स्पष्ट होते. नव्या युगाचे, बदलाचे आव्हान केवळ मुठी आवळून नि हात उगारून स्त्रीस पेलता येणार नाही. सामाजिक संघर्षात तिची भूमिका सामंजस्याची, अंगाखांद्यावर नवनवीन दायित्व पेलणारी, जबाबदार समाजधुरीण म्हणून खांडेकरांना अभिप्रेत होती.’ ही लवटे यांनी प्रकट केलेली भूमिका प्रस्तुत कादंबरीतून कितपत दिसते ते पाहू. या कादंबरीची नायिका ललिता खेड्यातून पुण्यात जाऊन वसतिगृहात राहून बी. ए. होते. तेथे सुवर्णपदक मिळवते. समाजवादी विचाराचा मित्र दिवाकराशी मैत्री करते, त्याचयाविषयी जवळीक वाटत असूनही केवळ मैत्री करते. काकासाहेब या श्रीमंत व्यक्तीच्या मुलाशी कमलाकरबरोबर पंधरा दिवस गाडीतून फिरते, त्याच्याशी लग्न करावे असा विचारही तिच्या मनात येतो. त्याच वेळी तिचा मित्र दिवाकर तिला भेटतो आणि कमलाकरशी लग्न झाल्यावर ‘कारखाना कामगारांच्या स्वाधीन करण्याची अट तू काकासाहेबांना घाल’ असे सांगतो आणि तसेच वचन ती दिवाकरला देते. येथे कादंबरी संपते. खांडेकरांच्या अन्य कादंबऱ्यांमध्ये जसे ध्येयवादी, कर्तव्यनिष्ठ पात्रे असतात, त्याचप्रमाणे याही कादंबरीत ललिता, ललिताचे वडील तात्या, दिवाकर आदी पात्रे आहेत. ललिता ध्येयवादी आहे. हे ललिताचे चित्रण नव्या आधुनिक विचाराच्या स्त्रीचे नाही असे वाटण्याची शक्यता नाकारता येत नाही. पण १९५० चा काळ ध्यानात घेतला तर तसे वाटणार नाही. यासंदर्भात डॉ. सुनीलकुमार लवटे प्रस्तावनेत लिहितात ‘नवी स्त्री’ची नायिका ललिता, तिचे वडील तात्यासाहेब, मित्र दिवाकर, समाजवादी समाजरचना यावी म्हणून काया, वाचा, मने धडपडतात. दुसरीकडे मगनभाई, काकासाहेब नि कमलाकर भांडवलशाही रचनेची मुळं आणखी खोल रुतवू पाहत आहेत. या पार्श्वभूमीवर ललिता नव्या स्त्रीचा प्रतिनिधी बनून व्यक्तिगत स्वार्थीपेक्षा समाजहित श्रेष्ठ मानून सर्वस्व त्यागास तयार होते. प्रा. लवटे यांना भाऊसाहेब खांडेकरांविषयी नितांत आदर असल्याने ललिता ही आधुनिक नव्या स्त्रीची प्रतिनिधी वाटते. आज स्त्री अनेक क्षेत्रात स्वयंपूर्ण होऊ पाहत आहे. तिला ‘स्व’ची जाणीव झाली आहे. या पाश्र्वभूमीवर प्रस्तुत कादंबरीतील नायिका ललिता निश्चितच नवी वाटत नाही. खांडेकरांच्या अन्य कादंबरीत जशी ‘टिपिकल’ पात्रे आढळतात, तशी पात्रे या कादंबरीतही आहेत. ललिताचे वडील तात्या, दिवाकर, स्वत: ललिता ही पात्रे ध्येयवादी आहेत, निष्ठावान आहेत. मगनभाई, काकासाहेब, कमलाकर ही पात्रे भांडवलदारी वृत्तीची आहेत. अन्य कादंबरीतील पात्रांप्रमाणे याही कादंबरीत रोमँटिक वृत्तीची पात्रे आहेत; पण असे असूनही ही कादंबरी वाचायला हवी. कारण ही कादंबरी वि. स. खांडेकरांची आहे. भाऊसाहेब खांडेकर जसे कादंबरीकार होते, तसे ते कथाकार, लघुनिबंधकार, रूपककथाकर आणि उत्तम समीक्षक होते. लेखक म्हणून ते प्रसिद्धीच्या शिखरावर असताना खूप लेखन असंकलित असूनही खांडेकरांनी ते प्रकाशित का होऊ दिले नसावे, हा विचार करण्यासारखा प्रश्न आहे. या प्रश्नाचे उत्तर कोणतेही असले तरी भाऊसाहेब खांडेकर मराठी भाषेतील ज्ञानपीठ पुरस्काराचे पहिले मानकरी आहेत. त्यांचे सर्व लेखन जपून ठेवायला हवे. आणि ते काम प्रा. लवटे करीत आहे. त्या कामाचा प्रारंभ त्यांनी ‘नवी स्त्री’ या कादंबरीच्या संपादनापासून केला आहे. पुढील कामाची मोठी तयारीही त्यांनी केली आहे. त्यांना मनापासून शुभेच्छा. उल्का, सुलभा, देवयांनी, र्शिमष्ठा, नंदा, वसू या नायिका ज्यांनी वाचल्या असतील, त्यांनी ललिता समजून घेण्यासाठी ‘नवी स्त्री’ ही कादंबरी वाचायला हवी. ...Read more

  • Read more reviews
Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

आबासाहेब कडू, अमरावती.

एकाच दमात छप्पन वेळा वाचावा असा काव्यसंग्रह* दै.सकाळच्या सप्तरंग पुरवणीत अ-अमिताभचा व दै.हिंदस्थान मधील `अमरावती सिरीज` चे स्तंभलेखक व अमरावती येथील प्रसिद्ध साहित्यिक श्री जी.बी.देशमुख ह्यांचा छप्पन कवितांचा समावेश असलेल्या अमरावतीच्या वस्तू,वास्ू आणि माणसाच्या वैशिष्ट्यावर आधारित `अमरावतीचे छप्पन स्वभाव` हे पुस्तक मी विकत घेतले. घरी गेल्यावर त्यातील छप्पनही कविता एकाच दमात वाचून काढल्या अन् पैसा वसूल झाल्याचे समाधान झाल्यावर त्यावर चिंतन करावेसे वाटले, म्हणून हा लेखनप्रपंच. वाचक हा अमरावतीकर असेल तर `अमरावतीतल्या गमती` ही पहिलीच कविता त्याच्या मनाचा ठाव घेते आणि `याटोत` बसवून परकोटातल्या मुर्गी मठासह अख्खी अमरावती फिरवून आणते. गांधीचौकात गांधी नाही मालटेकडीवर माल नाही.. खेटरे झाली ब्रँडेड सगळी मोची गल्लीत मोची नाही.. तपोवनात तपस्वी नाही कल्याणनगरात कल्याण नाही… लेखकाच्या भारदस्त शब्दशक्तीचा इथेच विजय होतो आणि मग अमरावतीची एकेक वैशिष्ट्ये पादाक्रांत करित छप्पनीकडे वाटचाल करीत जातो. ही काव्यात्मक रुपातील वैशिष्ट्ये वाचतांना अमरावतीचा पन्नाशितला वाचक देहभान विसरुन गतकाळात रममाण होतो. त्याचे मन नकळत सुखावते, गात्रे जागृत होतात, मेंदू रिचार्ज होतो तर तरुण वाचकाच्या मनात अमरावती शहराविषयी कुतुहल निर्माण होते. तोही मग त्यातील खाणाखुणा शोधायचा प्रयत्न करत बसतो. या संग्रहातील प्रत्येक कवितेवर एकेक निबंध तयार होऊ शकतो. स्वभाव हा शब्द सहसा मनुष्याशी जोडून उपयोगात आणला जातो पण इथे तर लेखकाने निर्जीवातही प्राण फुंकले आहे. अमरावतीच्या याटोत बसून ह्यातील सजीवता आपल्याला अनुभवता येईल. मग तो बेनाम चौक असो, कुथे बस स्टॉप असो, अनेक नावांचे कापसाचे जीन असो, वालकट कम्पाउंड असो, हनुमान आखाडा असो, इर्विन, डफरीन दवाखाने असो, `अमरावतीतल्या विहिरी` असो नाहीतर मोर्शी रोडवरील थोर महात्म्यांचे पुतळे असो. अमरावतीच्या शब्दकळा, अमरावतीच्या हाका, अमरावतीच्या वल्ली, अमरावतीच्या टॉमीची पाॅटी, अमरावतीचे सुपरस्टार, अमरावतीचा बागुलबोवा, अमरावतीचे वेडे एकदमच बेस्ट. अमरावतीच्या रेल्वे ब्रीजचे तर ते भरभरुन कौतुक करतात. चारी बाजूनं उतरणारा पूल फक्त जपानमध्ये आहे अन् सिंगापूरच्या नंतर नंबर आपल्याच पुलाचा आहे कारण हा पूल आहेच कौतुक करण्याजोगा, मलाही ह्या पूलाचे कौतुक याच्याकरिता आहे की ह्या पूलाचे बांधकाम माझ्या पेठ मांगरुळी गावच्या अभियंत्याच्याच देखरेखीखाली झाले आहे. अमरावतीशी प्रत्यक्ष संबंध आला तो १९७५ सालापासून,पण काही अपवाद वगळता लेखकाच्या छप्पनीतील अनेक वैशिष्ट्ये मी अनुभवलेली आहेत. ह्याच रेल्वेपुलावर रोज संध्याकाळी एक भोळसट मुलगा गाणे गायचा,लोक त्याला प्रेमाने शाहरुख म्हणायचे,कारण तो स्वतःला शाहरुख खानंच समजत असे. अमरावतीच्या कॉलेजमधील तरुणांचे भावविश्व मांडतांना लेखकाने हात आखडता घेतला नाही. इंजिनिअरिंग कॉलेज व व्ही.एम.व्ही. ही त्यावेळची आघाडीवरची कॉलेजेस होती. त्यामधील कॉलेजियन्सचे दर्द लेखकाने मिश्कीलपणे मांडले त्या `अमरावतीचा दर्द` ह्या कवितेतील ओळी आताच्या पेन्शनरांना त्या काळात घेऊन जातील. तरुण मंडळींनी तो आनंद पुस्तक वाचून घ्यावा. अमरावतीचा आद्य मॉल म्हणजे फक्त महिलांसाठीच राखीव असलेली बाजारपेठ अशी ओळख असलेलं `जोशी मार्केट`, `अमरावतीची नवरात्र`, `अमरावतीचे जेष्ठ नागरिक` ह्या पूरक कविताही त्याच प्रेमाच्या विश्वात घेऊन जातात.. `अमरावतीचा भुलभुलैय्या` मधील अनुभव आजही अनेकांना येतो, मलाही अनेकदा आला, त्याकरिता ही पूर्ण कविताच वाचणे आवश्यक आहे. अमरावतीचा अंबानाला, त्यानुषंगाने मास्तराने दिलेली `पदवी`, अमरावतीचे भोंगे, अमरावतीच्या उन्हाच्या चटक्यातील गरम चहाचे घोट थेट लंडनच्या थंड हवामानातल्या आईस्क्रीमलाही थंड करुन टाकतात ही तुलना मनाला भावून जाते. ब्लॅक अँड व्हाईट फोटोग्राफीतली मजा आताच्या डिजीटल फोटोग्राफीत नाही. त्यावेळी अमरावतीत मोजक्याच असलेल्या फोटो स्टुडिओची नावे लेखकाने दिलेली आहेत.त्यांनीही आता डिजीटल फोटोग्राफीच्या युगात प्रवेश केलेला आहे.त्यावेळेस काढलेले ब्लॅक अँड व्हाईट फोटो अनेकांनी जपून ठेवले असावे. लेखक मणीबाई गुजराती शाळेत शिकत होते त्यामुळे त्या शाळेचे व गुरुजनांचे गुणगान, स्वभाववैशिष्ठ्ये हे पुस्तकात येणे स्वाभाविकच आहे, मास्तराला पाणी पाजता पाजता त्यांचा वर्गमित्र पाणी पुरवठा विभागात कार्यकारी अभियंत्यापर्यंत कसा पोचला हा मनोरंजक किस्सा `अमरावतीची गुरुवाणी` कवितेतून खुसखुशीत भाषेत रेखाटला आहे. अमरावतीच्या टाकीजा, त्यांची वैशिष्ट्ये तर आहेतच पण दर गुरुवारी नवे सिनेमे अमरावतीत सर्वात पहिल्यांदा प्रदर्शित होत होते हे आज अनेकांना सांगूनही पटणार नाही पण तो मान अमरावतीला मिळत होता हा इतिहास आपल्याला अचंबित करुन जातो, सिनेमाचे अनेक डिस्ट्रीब्युटर हे अमरावतीतच होते, जवाहर रोडवरील जुन्या इमारतीवर ते बोर्ड तेव्हा हमखास दिसत, काळाच्या ओघात त्या जागी नवीन ईमारती उभ्या झाल्या, परंतु अजूनही एक-दोन ठिकाणी ते बोर्ड दिसतात.असे अनेक अचंबित करणारे किस्से या पुस्तकात काव्यरुपात लेखकाने अत्यंत खुमासदार व मनोरंजक पद्धतीने रेखाटून त्यात जीवंतपणा आणला आहे. हा काव्यसंग्रहातील ठेवा पुढील पीढीसाठी वारसा ठरेल यात मला तीळमात्रही शंका वाटत नाही. खवैयेगीरीत म्हणाल तर विनायकराव तायडेच्या गड्डा हॉटेलचा आलुबोंडा ज्या अमरावतीकरांनी आणि इतरांनीही खाल्ला असेल त्याला जगातल्या कुठल्याही हॉटेलातील आलुबोंडा आवडत नाही, अन् खाल्लाही असेल तर खातांना त्याला विनायकरावाचे आतिथ्य व तर्रीची आठवण आल्याशिवाय रहात नाही. अमरावती जिल्ह्यातील मंडळी लग्नबस्ता खरेदी करायला आली की खरेदी झाल्यावर वर वधूकडील मंडळीचे फराळपाण्याचे हे आदराचे स्थान होते. कॉलेजमध्ये शिकत असतांना मनीऑर्डर हातात पडली की प्रभात चौकातील `गौ दुग्ध सागर` ही विद्यार्थ्यांची पहिली पसंती असे. `जीडीएस` म्हणून ते फेमस होते. साऊथ इंडियन डिशेश मिळणारे जिल्ह्यातील ते एकमेव ठिकाण होते. राजकमल चौकालगतच्या टी स्टॉलवरच्या बोर्डावर चहाचे नावंच `स्पेशल चहा`, `बादशाही चहा`, `यादगार चहा` अन साब को `एक शिंगल मलाई मारके` असा आपुलकीचा चहा तेव्हा अमरावतीकरांनी यथेच्छ रिचवला. आता ह्या सर्व चहांचा मिळून एकच चहा मिळतो. पण ह्या चहात ती लज्जत नाही. मग तुम्ही त्या स्टॉलला `प्रेमाचा चहा` हे नांव ठेवा किंवा अजून काही. हरेक शहराला एक संस्कृती असते, वस्तू-वास्तू वारसा असतो, त्यातून जगण्यातली नजाकत शोधावी लागते. ती नजाकत `अमरावतीचे छप्पन स्वभाव` ह्या काव्यसंग्रहातून अनुभवावयास मिळते.लेखकाच्या बहारदार लेखणीतून उतरलेले ही काव्यमय वैशिष्ट्ये वाचतांना अमरावती बाहेरील वाचकही मग आपल्या शहरातील वैशिष्ट्ये शोधत बसतो ही हे या पुस्तकाचे वैशिष्ट्य आहे. तसेही छप्पन ह्या शब्दाला फार महत्व आहे, `छप्पन इंची छाती`, `अब तक छप्पन` हा सिनेमा, छप्पन भोग, छप्पन छुरी अन् पिव्वर वऱ्हाडातली वर्ल्ड फेमस धमकी म्हणजे `तुह्यासारखे त म्या सतराशे छप्पन पाह्यले बे, तुह्याकुन जे हुईन थे करुन घे.` छप्पन ह्या शब्दाचा पूरेपूर करुन घेतलेला वापर म्हणजे जी.बी.देशमुख सारख्या दिलखुश लेखकाने लिहिलेले हे खुमासदार,रसभरीत,टवटवीत प्रफुल्लित अन मिश्कील काव्य. आणि शेवटी……….. मणुश्याचे हे शरीर अणित्य आहे आतमा-णित्य आहे हा श्रद्धांजलीपर आवाज ज्याने हिंदू स्मशानभूमीत ऐकला नसेल त्याने ह्या जन्मात तरी तो ऐकेपर्यंत मरु नये. हे शब्द ऐकूनही त्याकडे कानाडोळा केला असेल तो माणूस करंटा पण हे करंटेपण लेखकाने घेतले नाही. लहानपणापासून अमरावतीत वावरतांना `डफरीन` (लँडीग पोर्ट) ते ही `वरची जागा` ह्यातील अत्यंत बारकाईने केलेले निरिक्षण लाजबाबच म्हणावे लागेल,त्याला तोड नाही. हे पुस्तक वाचतांना प्रत्यक्ष यमराज जरी द्वारी आला तरी त्याला "हे पुस्तक वाचेपावतर जराकसा थांबतं काय रे बॉ." अशी म्हणण्याची हिम्मत वाचकात येते हे मात्र नक्की. अमरावतीच्या वस्तू,वास्तू आणि माणसांच्या वैशिष्ट्यावर आधारित आपल्या बालमित्रांना समर्पित केलेला व मेहता पब्लिशिंग हाऊस ह्यानी प्रकाशित केलेला हा अमूल्य ठेवा आपणा सर्वांना नक्कीच आवडेल ह्याची खात्री आहे. ...Read more

बाबाराव घोरमाडे, अमरावती

प्रथम दर्शनी कविता लेखन असले तरी गद्य आणि पद्य सोबत सोबत चालल्यासारख्या लेखन शैलीचा भास जाणवतो. अमरावती शहरातील 70..80 व नंतरच्या दशकातील गुणवैशिष्ट्ये मार्मिक नर्म विनोदी शैलीत सुंदर रीतीने विषद केली आहेत. लेखकाची सुक्ष्म निरीक्षण शैली काव्य चना स्वरूपात पुस्तक रूपाने सादर करण्यात लेखक यशस्वी झाले आहेत. इजाफा,रूतबा, हिरव्या देठाचे,कैलहीचा मौहोल, ढगांचा,इत्यादी जुने वऱ्हाडी शब्द वापरल्यामुळे जुन्या आठवणींना उजाळा मिळाला. लेखकाने अमरावती शहरातील जुन्या जाणत्या, गुणवान, असामान्य अशा व्यक्तींची दखल घेतली......पण काहींची दखल राहून गेली आहे असे माझे मत आहे. उदा. सुरेश भट, मधुकर केचे व त्यांची सायकल , अमरावतीचे दहा दिवसांची गणपती उत्सव सजावट..... प्रत्येकाने वाचावे असे हे पुस्तक, विनोदी पण शेवटी असलेली कारूण्याची किनार अंतर्मुख करुन जाते. ...Read more