* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Availability : Available
  • ISBN : 9789353171865
  • Edition : 1
  • Publishing Year : FEBRUARY 2019
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 156
  • Language : MARATHI
  • Category : FICTION
  • Available in Combos :MANJUSHRI GOKHALE COMBO SET -14 BOOKS
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
SHUBHADA, AN EXTRAORDINARY PERSON, READY TO CATCH THE SKY, COME WHAT MAY. SHE SHOULDERED VARIOUS RESPONSIBILITIES AND FACED MANY PROBLEMS, SEVERE LIKE THE SCORCHING HEAT OF THE SUN. YET, SHE EMERGED AS A CAPABLE PERSON. SHE CREATED HAPPINESS, BLISS AND CONTENT ALL AROUND HER WITH EXTREME DEDICATION. HER STRONG WILL AND CONTINUOUS STRUGGLE HELPED ACHIEVE BOUNTIFUL OF CHEERFULNESS, JOY AND GRATIFICATION FOR THE SATHE FAMILY. HER QUALITIES WERE SHINING LIKE NEVER BEFORE, ALL THANKS TO HER NONSTOP ENDURANCE. SHE WAS SEEN AS THE STRONG FOUNDATION AND ALSO THE STURDY PILLAR OF HER FAMILY, BALANCING THE SKY, WHILE SPREADING PROSPERITY, COMFORT AND SATISFACTION. THIS WAS ALL THAT SHE NEEDED AND WAS LOOKING FORWARD TO. HER LIFE-AIM WAS THUS ACHIEVED ONCE FOR ALL.
शुभदा म्हणजे खरोखर आकाश झेलणारी गंगाच होती. हे करत असताना आलेल्या अनंत संकटांना तिनं आपल्या मजबूत खांद्यावर पेललं होतं. ग्रीष्मातल्या प्रखर सूर्यासारखी अनेक दाहक संकटे तिच्यासमोर एकापाठोपाठ एक उभी ठाकली होती; पण त्या सर्व संकटांवर मात करून तिनं आपल्या कर्तृत्वानं सुखाचं, कल्याणाचं, आनंदाचं वातावरण निर्माण केलं होतं. संकटांचं आकाश झेलून तिनं साठे परिवाराला सुखाची, समाधानाची सावली दिली होती. तिच्यात असलेल्या प्रत्येक गुणाचा कस लावून, कर्तृत्वाच्या कसोटीवर खरी उतरणारी शुभदा आता सर्वांना दिसणार होती सुखाचं, समृद्धीचं, समाधानाचं आकाश झेलताना! हेच तिच्या आयुष्याचं सार्थक होतं. हीच इतिकर्तव्यता होती.
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
#आकाश झेलताना#मंजुश्री गोखले# #AKASH ZELTANA#MANJUSHREE GOKHALE#
Customer Reviews
  • Rating Starमहाराष्ट्र टाइम्स १७-११-१९

    एका समर्थ स्त्रीची कहाणी... मंजुश्री गोखले हे नाव एकल्याबरोबरच त्यांच्या विविध स्त्री-पुरुष संतांवरच्या कादंबऱ्या डोळ्यांसमोर उभ्या राहतात. अतिशय रसाळ आणि ओघवती शैली यामुळे त्यांच्या या कादंबऱ्या वाचकांच्या चांगल्याच स्मरणात आहेत. या पार्श्वभूमीवर ्यांची नुकतीच ‘आकाश झेलताना’ ही कादंबरी प्रकाशित झाली आहे. मात्र ही कादंबरी संतावरची नाही, ती शुभदा या सर्वसामान्य कुटुंबातील, पण एका समर्थ नायिकेची कथा आहे. ज्याला जग सुंदर-सुखी करायचंय तो आपल्यासाठी कमी आणि इतरांसाठी जास्त जगतो, शुभदा या परंपरेतील आहे. जगताना येणाऱ्या संकटाना, आव्हानांना ती समर्थपणे सामोरी जाते. मात्र या संकटांची झळ ती आपल्या अवतीभोवतीच्या माणसांपर्यंत पोचू देत नाही, त्यांच्यापर्यंत ती सुखाची शीतल चांदणच पसरवते. जणू काही तीच तिची इतिकर्तव्यता होती. मराठी साहित्याला एक समर्थ नायिका दिल्याबद्दल लेखिकेचं कौतुकच करायला हवं. - रसिक भोळे ...Read more

  • Rating StarDAINIK LOKMAT 24-03-2019

    घराची घडी बसविणाऱ्या स्त्रीची कर्तृत्वगाथा... आज स्त्रीच्या शिक्षणाला, महत्त्वाकांक्षांना आभाळ लाभलं आहे. भरपूर पैसा ती कमावत आहे. पण कुटुंब या संस्थेविषयी ती किती जागरूक आहे, हा कळीचा मुद्दा ठरावा अशी परिस्थिती आहे. अशा परिस्थितीच्या पार्श्वभूमीवरमंजुश्री गोखले यांनी एक गरीब घरातली. फारशी न शिकलेली बेताचं रूप असलेली नायिका (शुभदा) वाचकांच्या भेटीला आणली आहे. त्यांच्या ‘आकाश झेलताना’ या कादंबरीतून, शुभदाचं कुटुंबाविषयीचं प्रेम आणि तिचं कर्तृत्व या कादंबरीतून उलगडत जातं. शुभंदा एक सामान्य, गरीब घरातली, एका पायाचं किंचित अधू असलेली मुलगी, वय तिशीच्या आसपास, कोणतीच बाजू समर्थ नसल्यानं लग्न ठरत नसलेली. तिला कोकणातील एका बिजवराचे स्थळ येते. तिथून तिला होकार येतो आणि ती लग्न करते. तिचा नवरा डॉ. विद्याधर याचे मोठे कुटुंब. आई-वडील एक विधवा आत्या, दोन भाऊ, दोन बहिणी, पहिल्या विवाहाची दोन मुले, सगळे घर विस्कटलेले. एक भाऊ चित्रपटाच्या वेडाने मुंबईला पळून जातो. एका बारबालेच्या प्रेमात पडतो. गुंडापासून पळून तिला घेऊन घरी येतो. दुसरा भाऊ गावातल्या एका मुस्लीम मुलीच्या प्रेमात. शुभदा त्या दोन्ही भावांचे आयुष्य सुधारते. एक बहीण २७ वर्षांची. देखणी म्हणून प्रथम सगळी स्थळं नाकारून आणि आता लग्न होत नाही म्हणून कडवट बनलेली. धाकटी बहीण एका बांधकाम मजुराकडून फसवली जाणार असते. शुभदा तिला वाचवते. दोघींचं चांगल्या ठिकाणी लग्न लावून देते. हे करत असताना पर्यटकांसाठी भक्त निवासाची सोय करते. व्यवसाय वाढवते. तीन भक्त निवास बांधते. महाराष्ट्र शासनाचा उत्कृष्ट पर्यटक व्यवस्थापनाचा पुरस्कार मिळवते. सगळं घर सावरते. हे संकटांचं, अडचणीचं आकाश बुद्धीच्या जोरावर, आपल्या समर्थ खांद्यावर झेलते. कर्तव्यदक्ष पत्नी, वत्सल आई, प्रेमळ वहिनी अशी शुभदाची लोभस रूपं या कादंबरीतून समोर येतात. थर अशी ही शुभदाच्या कर्तृत्वाची गाथा आहे. ही कादंबरी वाचकांना योगिनी जोगळेकर, कुसुम अभ्यंकर, जोत्स्ना देवधर इ. कौटुंबिक आणि नायिकाप्रधान कादंबऱ्या लिहिणाऱ्या लेखिकांच्या काळात नेऊन सोडते. मांगल्य, शुचिता आणि सदाचार या आज दुर्मिळ झालेल्या गुणांचं दर्शन ही कादंबरी घडवते. कर्तृत्वाला प्रेमाची, समर्पणाची जोड असेल, तर त्या कर्तृत्वाला अर्थ लाभतो तसेच कर्तृत्वाला अपंगत्व किंवा सुमार रूप कुंपण घालू शकत नाही. असा संदेश देणारी ही कादंबरी आहे. मंजुश्री गोखले यांच्या ‘तुक्याची आवली’, ‘जोहार मायबाप जोहार’, ‘ओंकाराची रेख जना’, ‘ज्ञानसूर्याची सावली’, ‘हेचि दान देगा’ अशा संतचरित्रपर कादंबऱ्यांना पुरस्कार लाभले आहेत. तसेच वाचकांचाही उदंड प्रतिसाद मिळाला आहे. त्यांच्या ओघवत्या भाषेतील या कादंबरीलाही वाचकांचा असाच प्रतिसाद लाभेल, असा विश्वास वाटतो. ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

आबासाहेब कडू, अमरावती.

एकाच दमात छप्पन वेळा वाचावा असा काव्यसंग्रह* दै.सकाळच्या सप्तरंग पुरवणीत अ-अमिताभचा व दै.हिंदस्थान मधील `अमरावती सिरीज` चे स्तंभलेखक व अमरावती येथील प्रसिद्ध साहित्यिक श्री जी.बी.देशमुख ह्यांचा छप्पन कवितांचा समावेश असलेल्या अमरावतीच्या वस्तू,वास्ू आणि माणसाच्या वैशिष्ट्यावर आधारित `अमरावतीचे छप्पन स्वभाव` हे पुस्तक मी विकत घेतले. घरी गेल्यावर त्यातील छप्पनही कविता एकाच दमात वाचून काढल्या अन् पैसा वसूल झाल्याचे समाधान झाल्यावर त्यावर चिंतन करावेसे वाटले, म्हणून हा लेखनप्रपंच. वाचक हा अमरावतीकर असेल तर `अमरावतीतल्या गमती` ही पहिलीच कविता त्याच्या मनाचा ठाव घेते आणि `याटोत` बसवून परकोटातल्या मुर्गी मठासह अख्खी अमरावती फिरवून आणते. गांधीचौकात गांधी नाही मालटेकडीवर माल नाही.. खेटरे झाली ब्रँडेड सगळी मोची गल्लीत मोची नाही.. तपोवनात तपस्वी नाही कल्याणनगरात कल्याण नाही… लेखकाच्या भारदस्त शब्दशक्तीचा इथेच विजय होतो आणि मग अमरावतीची एकेक वैशिष्ट्ये पादाक्रांत करित छप्पनीकडे वाटचाल करीत जातो. ही काव्यात्मक रुपातील वैशिष्ट्ये वाचतांना अमरावतीचा पन्नाशितला वाचक देहभान विसरुन गतकाळात रममाण होतो. त्याचे मन नकळत सुखावते, गात्रे जागृत होतात, मेंदू रिचार्ज होतो तर तरुण वाचकाच्या मनात अमरावती शहराविषयी कुतुहल निर्माण होते. तोही मग त्यातील खाणाखुणा शोधायचा प्रयत्न करत बसतो. या संग्रहातील प्रत्येक कवितेवर एकेक निबंध तयार होऊ शकतो. स्वभाव हा शब्द सहसा मनुष्याशी जोडून उपयोगात आणला जातो पण इथे तर लेखकाने निर्जीवातही प्राण फुंकले आहे. अमरावतीच्या याटोत बसून ह्यातील सजीवता आपल्याला अनुभवता येईल. मग तो बेनाम चौक असो, कुथे बस स्टॉप असो, अनेक नावांचे कापसाचे जीन असो, वालकट कम्पाउंड असो, हनुमान आखाडा असो, इर्विन, डफरीन दवाखाने असो, `अमरावतीतल्या विहिरी` असो नाहीतर मोर्शी रोडवरील थोर महात्म्यांचे पुतळे असो. अमरावतीच्या शब्दकळा, अमरावतीच्या हाका, अमरावतीच्या वल्ली, अमरावतीच्या टॉमीची पाॅटी, अमरावतीचे सुपरस्टार, अमरावतीचा बागुलबोवा, अमरावतीचे वेडे एकदमच बेस्ट. अमरावतीच्या रेल्वे ब्रीजचे तर ते भरभरुन कौतुक करतात. चारी बाजूनं उतरणारा पूल फक्त जपानमध्ये आहे अन् सिंगापूरच्या नंतर नंबर आपल्याच पुलाचा आहे कारण हा पूल आहेच कौतुक करण्याजोगा, मलाही ह्या पूलाचे कौतुक याच्याकरिता आहे की ह्या पूलाचे बांधकाम माझ्या पेठ मांगरुळी गावच्या अभियंत्याच्याच देखरेखीखाली झाले आहे. अमरावतीशी प्रत्यक्ष संबंध आला तो १९७५ सालापासून,पण काही अपवाद वगळता लेखकाच्या छप्पनीतील अनेक वैशिष्ट्ये मी अनुभवलेली आहेत. ह्याच रेल्वेपुलावर रोज संध्याकाळी एक भोळसट मुलगा गाणे गायचा,लोक त्याला प्रेमाने शाहरुख म्हणायचे,कारण तो स्वतःला शाहरुख खानंच समजत असे. अमरावतीच्या कॉलेजमधील तरुणांचे भावविश्व मांडतांना लेखकाने हात आखडता घेतला नाही. इंजिनिअरिंग कॉलेज व व्ही.एम.व्ही. ही त्यावेळची आघाडीवरची कॉलेजेस होती. त्यामधील कॉलेजियन्सचे दर्द लेखकाने मिश्कीलपणे मांडले त्या `अमरावतीचा दर्द` ह्या कवितेतील ओळी आताच्या पेन्शनरांना त्या काळात घेऊन जातील. तरुण मंडळींनी तो आनंद पुस्तक वाचून घ्यावा. अमरावतीचा आद्य मॉल म्हणजे फक्त महिलांसाठीच राखीव असलेली बाजारपेठ अशी ओळख असलेलं `जोशी मार्केट`, `अमरावतीची नवरात्र`, `अमरावतीचे जेष्ठ नागरिक` ह्या पूरक कविताही त्याच प्रेमाच्या विश्वात घेऊन जातात.. `अमरावतीचा भुलभुलैय्या` मधील अनुभव आजही अनेकांना येतो, मलाही अनेकदा आला, त्याकरिता ही पूर्ण कविताच वाचणे आवश्यक आहे. अमरावतीचा अंबानाला, त्यानुषंगाने मास्तराने दिलेली `पदवी`, अमरावतीचे भोंगे, अमरावतीच्या उन्हाच्या चटक्यातील गरम चहाचे घोट थेट लंडनच्या थंड हवामानातल्या आईस्क्रीमलाही थंड करुन टाकतात ही तुलना मनाला भावून जाते. ब्लॅक अँड व्हाईट फोटोग्राफीतली मजा आताच्या डिजीटल फोटोग्राफीत नाही. त्यावेळी अमरावतीत मोजक्याच असलेल्या फोटो स्टुडिओची नावे लेखकाने दिलेली आहेत.त्यांनीही आता डिजीटल फोटोग्राफीच्या युगात प्रवेश केलेला आहे.त्यावेळेस काढलेले ब्लॅक अँड व्हाईट फोटो अनेकांनी जपून ठेवले असावे. लेखक मणीबाई गुजराती शाळेत शिकत होते त्यामुळे त्या शाळेचे व गुरुजनांचे गुणगान, स्वभाववैशिष्ठ्ये हे पुस्तकात येणे स्वाभाविकच आहे, मास्तराला पाणी पाजता पाजता त्यांचा वर्गमित्र पाणी पुरवठा विभागात कार्यकारी अभियंत्यापर्यंत कसा पोचला हा मनोरंजक किस्सा `अमरावतीची गुरुवाणी` कवितेतून खुसखुशीत भाषेत रेखाटला आहे. अमरावतीच्या टाकीजा, त्यांची वैशिष्ट्ये तर आहेतच पण दर गुरुवारी नवे सिनेमे अमरावतीत सर्वात पहिल्यांदा प्रदर्शित होत होते हे आज अनेकांना सांगूनही पटणार नाही पण तो मान अमरावतीला मिळत होता हा इतिहास आपल्याला अचंबित करुन जातो, सिनेमाचे अनेक डिस्ट्रीब्युटर हे अमरावतीतच होते, जवाहर रोडवरील जुन्या इमारतीवर ते बोर्ड तेव्हा हमखास दिसत, काळाच्या ओघात त्या जागी नवीन ईमारती उभ्या झाल्या, परंतु अजूनही एक-दोन ठिकाणी ते बोर्ड दिसतात.असे अनेक अचंबित करणारे किस्से या पुस्तकात काव्यरुपात लेखकाने अत्यंत खुमासदार व मनोरंजक पद्धतीने रेखाटून त्यात जीवंतपणा आणला आहे. हा काव्यसंग्रहातील ठेवा पुढील पीढीसाठी वारसा ठरेल यात मला तीळमात्रही शंका वाटत नाही. खवैयेगीरीत म्हणाल तर विनायकराव तायडेच्या गड्डा हॉटेलचा आलुबोंडा ज्या अमरावतीकरांनी आणि इतरांनीही खाल्ला असेल त्याला जगातल्या कुठल्याही हॉटेलातील आलुबोंडा आवडत नाही, अन् खाल्लाही असेल तर खातांना त्याला विनायकरावाचे आतिथ्य व तर्रीची आठवण आल्याशिवाय रहात नाही. अमरावती जिल्ह्यातील मंडळी लग्नबस्ता खरेदी करायला आली की खरेदी झाल्यावर वर वधूकडील मंडळीचे फराळपाण्याचे हे आदराचे स्थान होते. कॉलेजमध्ये शिकत असतांना मनीऑर्डर हातात पडली की प्रभात चौकातील `गौ दुग्ध सागर` ही विद्यार्थ्यांची पहिली पसंती असे. `जीडीएस` म्हणून ते फेमस होते. साऊथ इंडियन डिशेश मिळणारे जिल्ह्यातील ते एकमेव ठिकाण होते. राजकमल चौकालगतच्या टी स्टॉलवरच्या बोर्डावर चहाचे नावंच `स्पेशल चहा`, `बादशाही चहा`, `यादगार चहा` अन साब को `एक शिंगल मलाई मारके` असा आपुलकीचा चहा तेव्हा अमरावतीकरांनी यथेच्छ रिचवला. आता ह्या सर्व चहांचा मिळून एकच चहा मिळतो. पण ह्या चहात ती लज्जत नाही. मग तुम्ही त्या स्टॉलला `प्रेमाचा चहा` हे नांव ठेवा किंवा अजून काही. हरेक शहराला एक संस्कृती असते, वस्तू-वास्तू वारसा असतो, त्यातून जगण्यातली नजाकत शोधावी लागते. ती नजाकत `अमरावतीचे छप्पन स्वभाव` ह्या काव्यसंग्रहातून अनुभवावयास मिळते.लेखकाच्या बहारदार लेखणीतून उतरलेले ही काव्यमय वैशिष्ट्ये वाचतांना अमरावती बाहेरील वाचकही मग आपल्या शहरातील वैशिष्ट्ये शोधत बसतो ही हे या पुस्तकाचे वैशिष्ट्य आहे. तसेही छप्पन ह्या शब्दाला फार महत्व आहे, `छप्पन इंची छाती`, `अब तक छप्पन` हा सिनेमा, छप्पन भोग, छप्पन छुरी अन् पिव्वर वऱ्हाडातली वर्ल्ड फेमस धमकी म्हणजे `तुह्यासारखे त म्या सतराशे छप्पन पाह्यले बे, तुह्याकुन जे हुईन थे करुन घे.` छप्पन ह्या शब्दाचा पूरेपूर करुन घेतलेला वापर म्हणजे जी.बी.देशमुख सारख्या दिलखुश लेखकाने लिहिलेले हे खुमासदार,रसभरीत,टवटवीत प्रफुल्लित अन मिश्कील काव्य. आणि शेवटी……….. मणुश्याचे हे शरीर अणित्य आहे आतमा-णित्य आहे हा श्रद्धांजलीपर आवाज ज्याने हिंदू स्मशानभूमीत ऐकला नसेल त्याने ह्या जन्मात तरी तो ऐकेपर्यंत मरु नये. हे शब्द ऐकूनही त्याकडे कानाडोळा केला असेल तो माणूस करंटा पण हे करंटेपण लेखकाने घेतले नाही. लहानपणापासून अमरावतीत वावरतांना `डफरीन` (लँडीग पोर्ट) ते ही `वरची जागा` ह्यातील अत्यंत बारकाईने केलेले निरिक्षण लाजबाबच म्हणावे लागेल,त्याला तोड नाही. हे पुस्तक वाचतांना प्रत्यक्ष यमराज जरी द्वारी आला तरी त्याला "हे पुस्तक वाचेपावतर जराकसा थांबतं काय रे बॉ." अशी म्हणण्याची हिम्मत वाचकात येते हे मात्र नक्की. अमरावतीच्या वस्तू,वास्तू आणि माणसांच्या वैशिष्ट्यावर आधारित आपल्या बालमित्रांना समर्पित केलेला व मेहता पब्लिशिंग हाऊस ह्यानी प्रकाशित केलेला हा अमूल्य ठेवा आपणा सर्वांना नक्कीच आवडेल ह्याची खात्री आहे. ...Read more

बाबाराव घोरमाडे, अमरावती

प्रथम दर्शनी कविता लेखन असले तरी गद्य आणि पद्य सोबत सोबत चालल्यासारख्या लेखन शैलीचा भास जाणवतो. अमरावती शहरातील 70..80 व नंतरच्या दशकातील गुणवैशिष्ट्ये मार्मिक नर्म विनोदी शैलीत सुंदर रीतीने विषद केली आहेत. लेखकाची सुक्ष्म निरीक्षण शैली काव्य चना स्वरूपात पुस्तक रूपाने सादर करण्यात लेखक यशस्वी झाले आहेत. इजाफा,रूतबा, हिरव्या देठाचे,कैलहीचा मौहोल, ढगांचा,इत्यादी जुने वऱ्हाडी शब्द वापरल्यामुळे जुन्या आठवणींना उजाळा मिळाला. लेखकाने अमरावती शहरातील जुन्या जाणत्या, गुणवान, असामान्य अशा व्यक्तींची दखल घेतली......पण काहींची दखल राहून गेली आहे असे माझे मत आहे. उदा. सुरेश भट, मधुकर केचे व त्यांची सायकल , अमरावतीचे दहा दिवसांची गणपती उत्सव सजावट..... प्रत्येकाने वाचावे असे हे पुस्तक, विनोदी पण शेवटी असलेली कारूण्याची किनार अंतर्मुख करुन जाते. ...Read more