* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Availability : Available
  • ISBN : 9789353171865
  • Edition : 1
  • Publishing Year : FEBRUARY 2019
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 156
  • Language : MARATHI
  • Category : FICTION
  • Available in Combos :MANJUSHREE GOKHALE COMBO SET -11 BOOKS
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
SHUBHADA, AN EXTRAORDINARY PERSON, READY TO CATCH THE SKY, COME WHAT MAY. SHE SHOULDERED VARIOUS RESPONSIBILITIES AND FACED MANY PROBLEMS, SEVERE LIKE THE SCORCHING HEAT OF THE SUN. YET, SHE EMERGED AS A CAPABLE PERSON. SHE CREATED HAPPINESS, BLISS AND CONTENT ALL AROUND HER WITH EXTREME DEDICATION. HER STRONG WILL AND CONTINUOUS STRUGGLE HELPED ACHIEVE BOUNTIFUL OF CHEERFULNESS, JOY AND GRATIFICATION FOR THE SATHE FAMILY. HER QUALITIES WERE SHINING LIKE NEVER BEFORE, ALL THANKS TO HER NONSTOP ENDURANCE. SHE WAS SEEN AS THE STRONG FOUNDATION AND ALSO THE STURDY PILLAR OF HER FAMILY, BALANCING THE SKY, WHILE SPREADING PROSPERITY, COMFORT AND SATISFACTION. THIS WAS ALL THAT SHE NEEDED AND WAS LOOKING FORWARD TO. HER LIFE-AIM WAS THUS ACHIEVED ONCE FOR ALL.
शुभदा म्हणजे खरोखर आकाश झेलणारी गंगाच होती. हे करत असताना आलेल्या अनंत संकटांना तिनं आपल्या मजबूत खांद्यावर पेललं होतं. ग्रीष्मातल्या प्रखर सूर्यासारखी अनेक दाहक संकटे तिच्यासमोर एकापाठोपाठ एक उभी ठाकली होती; पण त्या सर्व संकटांवर मात करून तिनं आपल्या कर्तृत्वानं सुखाचं, कल्याणाचं, आनंदाचं वातावरण निर्माण केलं होतं. संकटांचं आकाश झेलून तिनं साठे परिवाराला सुखाची, समाधानाची सावली दिली होती. तिच्यात असलेल्या प्रत्येक गुणाचा कस लावून, कर्तृत्वाच्या कसोटीवर खरी उतरणारी शुभदा आता सर्वांना दिसणार होती सुखाचं, समृद्धीचं, समाधानाचं आकाश झेलताना! हेच तिच्या आयुष्याचं सार्थक होतं. हीच इतिकर्तव्यता होती.
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
#आकाश झेलताना#मंजुश्री गोखले# #AKASH ZELTANA#MANJUSHREE GOKHALE#
Customer Reviews
  • Rating Starमहाराष्ट्र टाइम्स १७-११-१९

    एका समर्थ स्त्रीची कहाणी... मंजुश्री गोखले हे नाव एकल्याबरोबरच त्यांच्या विविध स्त्री-पुरुष संतांवरच्या कादंबऱ्या डोळ्यांसमोर उभ्या राहतात. अतिशय रसाळ आणि ओघवती शैली यामुळे त्यांच्या या कादंबऱ्या वाचकांच्या चांगल्याच स्मरणात आहेत. या पार्श्वभूमीवर ्यांची नुकतीच ‘आकाश झेलताना’ ही कादंबरी प्रकाशित झाली आहे. मात्र ही कादंबरी संतावरची नाही, ती शुभदा या सर्वसामान्य कुटुंबातील, पण एका समर्थ नायिकेची कथा आहे. ज्याला जग सुंदर-सुखी करायचंय तो आपल्यासाठी कमी आणि इतरांसाठी जास्त जगतो, शुभदा या परंपरेतील आहे. जगताना येणाऱ्या संकटाना, आव्हानांना ती समर्थपणे सामोरी जाते. मात्र या संकटांची झळ ती आपल्या अवतीभोवतीच्या माणसांपर्यंत पोचू देत नाही, त्यांच्यापर्यंत ती सुखाची शीतल चांदणच पसरवते. जणू काही तीच तिची इतिकर्तव्यता होती. मराठी साहित्याला एक समर्थ नायिका दिल्याबद्दल लेखिकेचं कौतुकच करायला हवं. - रसिक भोळे ...Read more

  • Rating StarDAINIK LOKMAT 24-03-2019

    घराची घडी बसविणाऱ्या स्त्रीची कर्तृत्वगाथा... आज स्त्रीच्या शिक्षणाला, महत्त्वाकांक्षांना आभाळ लाभलं आहे. भरपूर पैसा ती कमावत आहे. पण कुटुंब या संस्थेविषयी ती किती जागरूक आहे, हा कळीचा मुद्दा ठरावा अशी परिस्थिती आहे. अशा परिस्थितीच्या पार्श्वभूमीवरमंजुश्री गोखले यांनी एक गरीब घरातली. फारशी न शिकलेली बेताचं रूप असलेली नायिका (शुभदा) वाचकांच्या भेटीला आणली आहे. त्यांच्या ‘आकाश झेलताना’ या कादंबरीतून, शुभदाचं कुटुंबाविषयीचं प्रेम आणि तिचं कर्तृत्व या कादंबरीतून उलगडत जातं. शुभंदा एक सामान्य, गरीब घरातली, एका पायाचं किंचित अधू असलेली मुलगी, वय तिशीच्या आसपास, कोणतीच बाजू समर्थ नसल्यानं लग्न ठरत नसलेली. तिला कोकणातील एका बिजवराचे स्थळ येते. तिथून तिला होकार येतो आणि ती लग्न करते. तिचा नवरा डॉ. विद्याधर याचे मोठे कुटुंब. आई-वडील एक विधवा आत्या, दोन भाऊ, दोन बहिणी, पहिल्या विवाहाची दोन मुले, सगळे घर विस्कटलेले. एक भाऊ चित्रपटाच्या वेडाने मुंबईला पळून जातो. एका बारबालेच्या प्रेमात पडतो. गुंडापासून पळून तिला घेऊन घरी येतो. दुसरा भाऊ गावातल्या एका मुस्लीम मुलीच्या प्रेमात. शुभदा त्या दोन्ही भावांचे आयुष्य सुधारते. एक बहीण २७ वर्षांची. देखणी म्हणून प्रथम सगळी स्थळं नाकारून आणि आता लग्न होत नाही म्हणून कडवट बनलेली. धाकटी बहीण एका बांधकाम मजुराकडून फसवली जाणार असते. शुभदा तिला वाचवते. दोघींचं चांगल्या ठिकाणी लग्न लावून देते. हे करत असताना पर्यटकांसाठी भक्त निवासाची सोय करते. व्यवसाय वाढवते. तीन भक्त निवास बांधते. महाराष्ट्र शासनाचा उत्कृष्ट पर्यटक व्यवस्थापनाचा पुरस्कार मिळवते. सगळं घर सावरते. हे संकटांचं, अडचणीचं आकाश बुद्धीच्या जोरावर, आपल्या समर्थ खांद्यावर झेलते. कर्तव्यदक्ष पत्नी, वत्सल आई, प्रेमळ वहिनी अशी शुभदाची लोभस रूपं या कादंबरीतून समोर येतात. थर अशी ही शुभदाच्या कर्तृत्वाची गाथा आहे. ही कादंबरी वाचकांना योगिनी जोगळेकर, कुसुम अभ्यंकर, जोत्स्ना देवधर इ. कौटुंबिक आणि नायिकाप्रधान कादंबऱ्या लिहिणाऱ्या लेखिकांच्या काळात नेऊन सोडते. मांगल्य, शुचिता आणि सदाचार या आज दुर्मिळ झालेल्या गुणांचं दर्शन ही कादंबरी घडवते. कर्तृत्वाला प्रेमाची, समर्पणाची जोड असेल, तर त्या कर्तृत्वाला अर्थ लाभतो तसेच कर्तृत्वाला अपंगत्व किंवा सुमार रूप कुंपण घालू शकत नाही. असा संदेश देणारी ही कादंबरी आहे. मंजुश्री गोखले यांच्या ‘तुक्याची आवली’, ‘जोहार मायबाप जोहार’, ‘ओंकाराची रेख जना’, ‘ज्ञानसूर्याची सावली’, ‘हेचि दान देगा’ अशा संतचरित्रपर कादंबऱ्यांना पुरस्कार लाभले आहेत. तसेच वाचकांचाही उदंड प्रतिसाद मिळाला आहे. त्यांच्या ओघवत्या भाषेतील या कादंबरीलाही वाचकांचा असाच प्रतिसाद लाभेल, असा विश्वास वाटतो. ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

KHULBHAR DUDHACHI KAHANI
KHULBHAR DUDHACHI KAHANI by SUNANDA AMRAPURKAR Rating Star
श्रीपाद ब्रह्मे

नुकतंच असंच वेगानं वाचून संपवलेलं दुसरं पुस्तक म्हणजे सुनंदा अमरापूरकर यांचं ‘खुलभर दुधाची कहाणी’. दिवंगत ज्येष्ठ अभिनेते सदाशिव अमरापूरकर यांच्या त्या पत्नी. अर्थात ही काही त्यांची एकमेव ओळख नव्हे. एक चांगल्या अभिनेत्री, उत्तम अनुवादक म्हणूनही त्या ्रसिद्ध आहेत. त्यांनी ‘खुलभर दुधाची कहाणी’ या आत्मचरित्रवजा लेखनातून त्यांच्या जगण्याचा व्यापक पट अतिशय प्रांजळपणे उलगडला आहे. मला हे पुस्तक विशेष भावण्याचं कारण म्हणजे त्यात आलेलं नगरचं वर्णन. मी स्वत: नगरला फार प्रदीर्घ काळ राहिलो नसलो, तरी ते शेवटी माझ्या जिल्ह्याचं गाव. आणि वयाच्या १३ ते २२ अशा महत्त्वाच्या कुमार व तरुण वयातला माझा तिथला रहिवास असल्यानं नगरच्या आठवणी विसरणं शक्य नाही. सुनंदाताई माझ्या आईच्या वयाच्या. त्यामुळं त्यांच्या लहानपणच्या आठवणी जवळपास माझ्या जन्माच्या २०-२५ वर्षं आधीच्या. असं असलं तरी मी त्या वर्णनाशी, त्या काळातल्या नगरशीही रिलेट होऊ शकलो, याचं कारण मुळात गेल्या शतकात बदलांचा वेग अतिशय संथ होता. नगरसारख्या निम्नशहरी भागात तर तो आणखी संथ होता. त्यामुळं एकूण समाजजीवनात १९६० ते १९९० या तीस वर्षांत तपशिलातले फरक सोडले, तर फार मोठा बदल झाला नव्हता. सुनंदाताई माहेरच्या करमरकर. त्यांचं आजोळ‌ सातारा असलं, तरी त्या जन्मापासून नगरमध्येच लहानाच्या मोठ्या झालेल्या. अगदी पक्क्या ‘नगरी’ म्हणाव्यात अशा. ( आजही त्या स्वत:ला अभिमानानं ‘नगरकर’च म्हणवून घेतात.) सुनंदाताईंचे वडील त्या दहा वर्षांच्या असतानाच गेले. त्यांना मामांचा आधार होता, पण आईनंच लहानाचं मोठं केलं. तेव्हाचं त्यांचं निम्न मध्यमवर्गीय जगणं, नगरमधले वाडे, तिथलं समाजजीवन, तिथल्या शाळा, शिक्षक, नगरमधील दुकानं, दवाखाने, तिथल्या गल्ल्या, बाजार हे सगळं सगळं सुनंदाताई अतिशय तपशीलवार उभं करतात. नगरसारख्या मध्यम शहरात वाढलेल्या महाराष्ट्रातील कुठल्याही शहरातील त्या काळातील व्यक्तीला अतिशय सहज रिलेट होईल, असं त्यांचं हे जगणं होतं. त्यात सुनंदाताईंचं लेखन अतिशय सहज, सोपं आणि प्रांजळ असल्यामुळं ते आपल्याला अगदी भिडतं. एका प्रख्यात अभिनेत्याची पत्नी असल्यानं त्यांचं जीवन इतर सर्वसामान्य स्त्रियांपेक्षा वेगळं झालं असेल, अशी आपली अपेक्षा असते. सुनंदाताईंच्या लेखनातून या ‘वेगळ्या जीवना’ची काही तरी झलक मिळेल, अशीही आपली एक भूमिका तयार झालेली असते. सदाशिव अमरापूरकरांसारख्या मनस्वी अभिनेत्याशी लग्न झाल्यानंतर सुनंदाताईंचं जगणं बदललंही; मात्र ते वेगळ्या पद्धतीनं. सदाशिव अमरापूरकर ऊर्फ नगरकरांचा लाडका बंडू त्यांना नगरमध्ये शाळेपासून कसा भेटला, नंतर कॉलेजमध्ये दोघांनी एकाच ग्रुपमधील नाटकं कशी सादर केली, त्यात अगदी नकळतपणे त्यांचं प्रेम कसं जमलं आणि नंतर नगर सोडून त्या पतीच्या कारकिर्दीसाठी मुंबईत कशा आल्या हा सर्व नाट्यमय प्रवास सुनंदाताई अतिशय तन्मयतेनं मांडतात. अमरापूरकर मंडळींच्या घराविषयीचे तपशील त्यात येतात. अमरापूरकरांचे वडील दत्तोपंत हे नगरमधलं मोठं प्रस्थ. श्रीमंत घराणं. मोठा वाडा, नोकरचाकर वगैरे. त्या तुलनेत सुनंदाताईंची माहेरची परिस्थिती जेमतेम म्हणावी अशी. अशा परिस्थितीत हे लग्न झालं आणि त्या अमरापूरकरांची सून झाल्या, इथपर्यंत पुस्तकाचा निम्मा प्रवास (मध्यंतरच) होतो. पुढल्या दोनशे पानांत आपल्याला खऱ्या अर्थानं सदाशिव अमरापूरकर हे काय व्यक्तिमत्त्व होतं, हे उलगडत जातं. अमरापूरकरांनी शेवटपर्यंत त्यांची मध्यमवर्गीय राहणी व मध्यमवर्गीय मूल्यं सोडली नाहीत. ‘अर्धसत्य’सारख्या सिनेमामुळं एका रात्रीतून ते भारतभरात प्रसिद्ध झाले. या एका ओळखीमुळं अमरापूरकरांचं जीवन पूर्ण बदलून गेलं. तोपर्यंत असलेली आर्थिक ओढगस्तीही संपली. हिंदी चित्रपटसृष्टीत अगदी स्वप्नवत अशा रीतीनं ते मोठे स्टार झाले. एकापाठोपाठ एक खलनायकी भूमिका त्यांच्याकडं येऊ लागल्या. पैसा येऊ लागला. अशा परिस्थितीत एक मध्यमवर्गीय कुटुंब या सगळ्या धबधब्याला कसं तोंड देतं आणि आपली मूल्यं कायम जपत राहतं, हे सुनंदाताईंनी फार हृद्यपणे लिहिलं आहे. सुनंदाताईंनी अनेक वर्षं एलआयसीत नोकरी केली. पतीचं अस्थिर क्षेत्र असल्यानं त्यांनी सुरुवातीला नोकरी केलीच; पण नवरा हिंदी चित्रपटसृष्टीत सुपरस्टार व्हिलन झाल्यावरही त्यांनी ही नोकरी सोडली नाही. त्यांच्या तिन्ही मुलींवर त्यांनी उत्तम संस्कार केले. एका सिनेमाच्या प्रीमियरनंतर हे सगळे कुटुंबीय कसे घरी जाऊन पिठलं-भाकरीचं जेवण तयार करून जेवले हे त्यांनी एका प्रसंगात अतिशय खेळकरपणे सांगितलं आहे. अमरापूरकरांचं नाटकवेड, भौतिक सुखांविषयीची काहीशी विरक्त वृत्ती, त्यांचा मित्रांचा गोतावळा, अनेक माणसांचा घरात राबता असा एकूण ‘देशस्थी’ कारभार यावर सुनंदाताई कधी गमतीत, तर कधी काहीसं वैतागून टिप्पणी करतात. अर्थात त्यांचं सदाशिव अमरापूरकरांवर अतिशय प्रेम होतं आणि त्यांनी हे शेवटपर्यंत उत्तम निभावलं. अशा आत्मचरित्रांत अनेकदा ‘आहे मनोहर तरी... गमते उदास’ असा सूर लागण्याचा धोका असतो. सुनंदाताईंच्या लेखनाचं वैशिष्ट्य म्हणजे, एखादा अपवाद वगळता, त्यांच्या या संपूर्ण पुस्तकात असा रडवा सूर कधीही लागलेला नाही. आपल्याला जे काही मिळालं, ते आपणच निवडलं आहे आणि त्यामुळं त्याविषयी तक्रार करण्याचा आपल्याला काही अधिकार नाही, अशी एक भूमिका त्यांनी घेतलेली दिसते. त्यांच्या या पुस्तकातून विसाव्या शतकातील मध्यमवर्गीय ब्राह्मण घरातील एका तरुणीच्या आशा-आकांक्षांचा, आयुष्यानं दिलेल्या आश्चर्याच्या धक्क्यांचा आणि त्याला सामोरं जाण्यातील धीट दिलदारपणाचा लोभस प्रवास दिसतो. आपली मध्यमवर्गीय मूल्यं जपत, प्रामाणिकपणे व उमेदीनं आयुष्य जगणाऱ्या अनेक महिलांना या पुस्तकात आपल्या जगण्याचं प्रतिबिंब सापडेल. तेच या ‘खुलभर दुधाच्या कहाणी’चं यश आहे. ...Read more

HITLER AANI BHARAT
HITLER AANI BHARAT by VAIBHAV PURANDARE Rating Star
प्रभाकर गावंडे, अमरावती

मी विकत घेऊन वाचले आहे हे पुस्तकं, चांगले आहे, नवीन माहिती वाचायला मिळाली.