DR.ARUNA KAULGUD

About Author

Birth Date : 28/01/1948


MA IN ECONOMICS AND DOCTORATE IN CORPORATE PLANNING AND ADMINISTRATION. ARUNA KAULGOOD IS KNOWN AS A MANAGEMENT CONSULTANT, RESEARCHER, SPEAKER, AUTHOR, PROFESSOR AND TRAINER. HE HAS RECEIVED SPECIAL TRAINING AS A TRAINER-MOTIVATOR FROM DELHIS RENOWNED INSTITUTE NISBAD TO IMPART ENTREPRENEURSHIP TRAINING.

अर्थशास्त्रात एम.ए. आणि कॉर्पोरेट प्लॅनिंग अ‍ॅण्ड अ‍ॅडमिनिस्ट्रेशन या विषयात डॉक्टरेट असलेल्या डॉ. अरुणा कौलगुड या व्यवस्थापन सल्लागार, संशोधक, वक्त्या, लेखिका, प्राध्यापक आणि प्रशिक्षक म्हणून ओळखल्या जातात. उद्योजकता प्रशिक्षण देण्यासाठी त्यांनी दिल्लीच्या प्रख्यात निस्बड या संस्थेचे ट्रेनर-मोटिव्हेटर म्हणून विशेष प्रशिक्षण घेतलेले आहे. मुंबई व एस.एन.डी.टी. विद्यापीठात प्राध्यापिका म्हणून त्यांनी काम केले आहे. ऐच्छिक निवृत्तीनंतर त्या व्यवस्थापन सल्लागार व मार्गदर्शक म्हणून कार्यरत आहेत. विविध संघटनांचे व्यवस्थापन, मनुष्यबळ विकास, वर्तन निरीक्षणशास्त्र आणि जीवन कौशल्ये या संबंधित विषयांवर प्रशिक्षण देतात. वल्र्ड बँकेतर्फे श्रीलंकेत त्यांनी इंटरनॅशनल रिव्ह्यूअर म्हणून काम केले. जागतिक श्रम परिषद (वर्ल्ड लेबर ऑर्गनायझेशन) आणि एम्प्लॉयर्स फेडरेशन ऑफ इंडिया यांच्या या प्रशिक्षण कार्यक्रमात त्यांनी व्याख्यात्या-प्रशिक्षक म्हणून काम केले. महिला आर्थिक विकास महामंडळ, महाराष्ट्र राज्य सहकारी संघ, यांच्या संचालक मंडळांवर संचालक म्हणून त्यांनी काम केले. मुंबईच्या रामभाऊ म्हाळगी प्रतिष्ठानच्या सेंटर फॉर इन्स्टीट्युशन बिल्डिंग अ‍ॅण्ड लीडरशीप स्टडीज या केंद्राच्या मानद संचालक होत्या. महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सबरोबर त्या संबंधित होत्या. त्यांनी अनेक पुस्तके, शोधनिबंध, लेख असे विपुल लेखन केलेले आहे.
Sort by
Show per page
Items 1 to 2 of 2 total
INTERVIEW TECHNIQUES AND PRESENTATIO... Rating Star
Add To Cart INR 160
JAGAPRASIDDHA WHA Rating Star
Add To Cart INR 180

Latest Reviews

वा. पां. जाधव अमरावती

`अमरावतीचे छप्पन स्वभाव एक मनोरंजक काव्यसंग्रह` `अमरावतीचे छप्पन स्वभाव` हे अमरावतीचे सुप्रसिद्ध साहित्यिक श्री जी. बी. देशमुख यांचे अमरावती नगरीचा सहज स्वभाव व ह्या नगरीच्या वेगळ्या ओळखीवर आधारित मनोरंजक पुस्तक वाचले. वाचून भरपूर मनोरंजन झाले. खर काय लिहावे या लेखकाबद्दल, मन गोंधळले. ऐतिहासिक असो, प्रवास वर्णन असो, व्यक्ती विशेष असो, अनुभवात्मक घटना घडामोडी असो कशावरही सहज लिखाण करणारा हा लेखक आहे. आता तर त्यांनी लेखनाला विनोद प्रचुर फोडणी देऊन `अमरावतीचे छप्पन स्वभाव` या काव्यसंग्रहातून अमरावतीकरांना मनोरंजनाची मेजवानीच दिली आहे. प्रत्येक शहराची व त्या शहरातील वैशिष्ट्यांची एक वेगळीच ओळख असते. दिवस जातात, काळ लोटतो, पिढ्या बदलतात मात्र जुन्या स्मृतीची चिन्हे नवीन येणाऱ्या पिढीच्या मनात गुढ निर्माण करत कायम हाक देत राहतात. अमरावतीही त्याला अपवाद नाही. बापट चौकात चौक नाही, त्या जागेवर चौरस्ता नसून टी-पॉइंट आहे, खापर्डे बगीचा म्हणून आजही ओळख आहे मात्र तेथे बगिचा नाही किंवा प्रसिद्ध गांधी चौकात गांधीचा पुतळा अथवा स्मृतीदर्शक चिन्ह अथवा उल्लेख नाही मात्र गांधी चौक अशीच ओळख जनमानसात आहे. अशा एक ना अनेक विसंगत नाम दर्शक ओळख असलेली उदाहरणे त्यात सप्रमाण आहेत. पण खरी गंमत म्हणजे कधी काळी घडलेला इतिहास त्यामध्ये दडलेला आहे हे निश्चित. या सोबतच अमरावतीकरांच्या स्वभावातला स्थायी मजेदारपणाच्या एक एका हटके गुण वैशिष्ट्याच्या गमती लेखकाने हुबेहूब अधोरेखित केलेल्या आहेत. आणि त्यावरुन तत्सम रचनांचा उहापोह लेखकाने पुस्तकात केला असावा. विदेशात स्थाईक झालेल्या मूळ अमरावतीकरांना लेखकाने लिहिलेल्या गमती मनोरंजनात्मक वाटाव्या एवढी किमया जी.बी. च्या सहज लेखनाने दाखवली आहे. अमरावतीचे अग्रगण्य वृत्तपत्र दै. हिंदुस्थान मध्ये लेखकाने सतत ६ महीणे लिहीलेल्या काव्य सदरात अमरावतीच्या जनमानसाच्या हृदयाच्या ठाव घेणाऱ्या काव्य रचनांचा आठवणींनी महापूर ओसंडून गेला होता. विशेष म्हणजे ह्यात कुठेही अनावश्यक अभिनीवेष नव्हता. उलट गमतीत केलेले आत्मपरिक्षण मात्र काही प्रमाणात होते. वयस्क अमरावतीकर रसिकांना या रचना ताज्या करून त्यांच्या तारुण्यात घेऊन गेल्या हेच खरे. जी बी देशमुख या लेखकास मिळालेल्या सकारात्मक प्रतिक्रियां वरून दिसून येते. . सदर पुस्तकातील काव्यमय रचना वाचतांना अमरावतीच्या माणसाच्या वऱ्हाडभोळ्या स्वभावाची प्रचीती येते आणि वेगळाच आनंद देऊन जाते. निखळ मनोरंजन करत गुदगुल्या करणारा असा हा काव्यसंग्रह आहे. अमरावती शहराची ऐतिहासिक वैशिष्टे काव्यरूपात वाचण्याचा आनंद अमरावतीकरांना ते जिथं असतील त्या गावात, परगावात, परदेशात पुस्तक मागवून घेता येईल. ...Read more

ज्योती चेडे, मुंबई.

अमरावतीच्या वैशिष्ट्यांवर आधारीत खुमासदार छप्पन्न कवितांच्या संग्रहातील प्रत्येक कविता वाचत असताना अमरावतीच्या वातावरणाची धुंदी आपसुकच मनावर चढु लागली. सगळ्याच कविता सुंदर आहेत. एकेक कविता अमरावतीचे अप्रतिम वर्णन करते. प्रत्येक कवितेचा शेवट कुठेतरी गंभीर विचार करायला भाग पाडतो आणि मन गलबलून जाते. सगळ्याच कविता सुंदर आहेत पण माझ्या मनाला भावलेल्या व भिडलेल्या कविता आहेत `अमरावतीतल्या गमती`, `अमरावतीचे शिक्षण`, `अमरावतीचे हजरजबाबी`, `अमरावतीचे वेडे`, `अमरावतीच्या काकू` व बाकी सगळ्या. `अमरावतीचे वेडे` या कवितेत उल्लेखीत शेवटचा अश्रुंचा एक थेंब जरुर राखला जाईल. तसेच `अमरावतीच्या काकूं` ची उर्जा उरात भरून उरेल. जीवन देणाऱ्या विहीरीने कोणाचेही जीवन घेऊ नये, अशी सद्भावना मनात जागेल. अमरावतीकर जगात कुठेही असो त्यांच्या मनात एका कोपऱ्यात राजकमल चौक असतोच हे सत्य मनावर कोरले जाईल. प्रत्येक अमरावतीकराने ह्या कविता जगाव्यात. त्यासाठी हे पुस्तक संग्रही ठेवावे आणि परगावी राहणाऱ्या आपल्या अमरावतीकर आप्तेष्टांना भेटी दाखल द्याव्या. ...Read more