* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: KINGDOM
  • Availability : Available
  • Translators : UDAY BHIDE
  • ISBN : 9788184984477
  • Edition : 2
  • Publishing Year : JANUARY 2013
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 384
  • Language : Translated From ENGLISH to MARATHI
  • Category : FICTION
Quantity
Buying Options:
  • Print Books:
WHEN THE ABBOT SPOKE, HIS VOICE WAS THIN AND RESIGNED. ‘IT IS THE END OF OUR MONASTERY. BY NIGHTFALL I WILL BE DEAD AND OUR WALLS WILL LIE SHATTERED. A TERRIBLE EVIL IS COMING FROM THE FOREST . . .’ A MONASTERY IN TIBET IS OVERRUN WITH CHINESE SOLDIERS SEARCHING FOR A SACRED RELIC. THE MONKS FLEE TO SEEK REFUGE IN HIDDEN CAVES, BUT THEIR PROGRESS IS HAMPERED BY AN INJURED STRANGER, WHOSE PRESENCE THREATENS THEM ALL . . . JOURNALIST NANCY KELLY RECEIVES A PARCEL CONTAINING A MYSTERIOUS TRUMPET MADE OF BONE, AND HEARS AN ACCOUNT OF A WESTERNER PENETRATING INTO A HIDDEN KINGDOM IN TIBET, WHERE ORCHIDS COVER THE EARTH, PAGODAS HUG THE HILLS AND SOARING CATHEDRALS HIDE UNDERGROUND. SOON SHE EMBARKS ON A DANGEROUS JOURNEY INTO AN ANCIENT LAND OF MYTH AND LEGEND, IN SEARCH OF A SECRET OLDER THAN TIME ITSELF . . .
खाली ठेवलेल्या त्या गो-या माणसाकडे एकदा नजर टाकून उपमठाधिपती स्वत:शीच बोलल्यासारखे पुटपुटले, ‘`... पण खरं म्हणजे इथं पिमाकोपर्यंत एक पाश्चिमात्य माणूस आला तरी कसा?’’ मठाधिपती बोलू लागले. त्यांचा आवाज बारीक आणि उदासीन होता. ‘‘आपल्या मठाचे अस्तित्वच नष्ट होण्याचे संकेत मिळत आहेत. रात्र होईपर्यंत माझे निधन झालेले असेल आणि आपला मठ उद्ध्वस्त झालेला असेल. या निबिड अरण्यातून महाभयंकर, क्रूर शक्ती झडप घालण्यासाठी येत आहेत.’’ एक पवित्र वस्तू हस्तगत करण्यासाठी तिबेटमधल्या एका मठावर चिनी सैनिकांनी धाड टाकली आहे. प्राणरक्षणासाठी तिथल्या भिक्षूूंनी जंगलात दडलेल्या गुहांकडे धाव घेतली आहे, पण एका परक्या जखमी माणसामुळे त्यांची वाटचाल म्हणावी तशी वेगाने होत नाही आणि तो माणूस बरोबर असण्याने त्यांच्या सगळ्यांच्याच जिवाला धोका उत्पन्न झाला आहे. पत्रकार नॅन्सी केलीच्या नावाने एक पार्सल येते. त्यात एक रहस्यमय असे हाड कोरून बनवलेली तुतारी असते आणि एका पाश्चिमात्य माणसाने जिथे ऑर्किड्सच्या फुलांचे गालिचे जमिनीवर पसरलेले आहेत, उंच डोंगरांंना उंचच उंच जाणा-या छतांचे पॅगोडा मिठी मारून बसलेले आहेत आणि जिथे प्रार्थनामंदिरांचे उंच कळस जमिनीच्या गर्भात दडलेले आहेत अशा तिबेटच्या घनदाट जंगलात कुठंतरी दडलेल्या एका राज्यात प्रवेश केल्याचे वर्णन असते. लवकरच तीदेखील एका कालातीत रहस्याचा शोध घेण्यासाठी अद्भुत दंतकथा आणि आख्यायिकांच्या भूप्रदेशातल्या एका धोकादायक प्रवासाला निघते...
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
#MARATHIBOOKS#ONLINEMARATHIBOOKS#TRANSLATEDMARATHIBOOKS#TBC#TRANSLATEDBOOKS@50% #VISHWASATTA #KINGDOM ##विश्वसत्ता #FICTION #TRANSLATEDFROMENGLISHTOMARATHI #UDAYBHIDE #उदयभिडे #TOMMARTIN
Customer Reviews
  • Rating StarKiran Borkar

    अतिशय जखमी अवस्थेत तो परकीय माणूस वादळी पावसात मठाच्या दारात आला . त्याला त्या अवस्थेत पाहून तिबेटी धर्मगुरूंच्या मनात अभद्र शंकेची पाल चुकचुकली . याचे आगमन म्हणजे मठाचा विनाश हे त्याला कळून चुकले . तरीही त्याने त्या प्रवाश्याला वाचवायचा निर्णय घेतला. काही साथीदारांसमवेत त्याला घनदाट जंगलातील जादूगाराच्या गुहेत पाठविले . तो गेल्यावर काहीवेळातच चिनी सैनिकांचा हल्ला झाला . त्यांनी मठाच्या प्रमुख धर्मगुरूंना ठार मारले . इकडे इंटरनॅशनल हेरॉल्ड ट्रिब्युन या मान्यवर वृत्तपत्राच्या भारतीय शाखेत नॅन्सी केलीची प्रमुख म्हणून निवड झाली . कारण येथील प्रमुख अंतोन हरगोज तीन महिन्यापासून गायब होता . दिल्लीत आल्याबरोबर पोलिसांकडून नॅन्सीची कसून चौकशी करण्यात आली आणि तिला हरगोजच्या काही वस्तू ताब्यात देण्यात आल्या . त्यात होते एक पुरातन हाड कोरुन तयार केलेली तुतारी . त्यावर आहे तिबेटमधील एक गूढ राज्याचे वर्णन . शांग्रीला नावाच्या राज्याची ती माहिती आहे .लामांच्या काही वयोवृद्ध धर्मगुरूनाच त्याची माहिती आहे . त्या राज्यात गेलेला एकही माणूस जिवंत परत आला नाही असे म्हटले जाते . चीन सरकारही त्या तुतारीचा शोध घेत आहे . नॅन्सी या गूढ अज्ञात राज्याचा शोध घ्यायला निघाली आहे . जगावर नियंत्रण करणारे अदृश्य शांग्री-ला राज्य यांची चित्तथरारक सफर ...Read more

  • Rating StarKiran Borkar‎

    अतिशय जखमी अवस्थेत तो परकीय माणूस वादळी पावसात मठाच्या दारात आला . त्याला त्या अवस्थेत पाहून तिबेटी धर्मगुरूंच्या मनात अभद्र शंकेची पाल चुकचुकली . याचे आगमन म्हणजे मठाचा विनाश हे त्याला कळून चुकले . तरीही त्याने त्या प्रवाश्याला वाचवायचा निर्णय घेतला. काही साथीदारांसमवेत त्याला घनदाट जंगलातील जादूगाराच्या गुहेत पाठविले . तो गेल्यावर काहीवेळातच चिनी सैनिकांचा हल्ला झाला . त्यांनी मठाच्या प्रमुख धर्मगुरूंना ठार मारले . इकडे इंटरनॅशनल हेरॉल्ड ट्रिब्युन या मान्यवर वृत्तपत्राच्या भारतीय शाखेत नॅन्सी केलीची प्रमुख म्हणून निवड झाली . कारण येथील प्रमुख अंतोन हरगोज तीन महिन्यापासून गायब होता . दिल्लीत आल्याबरोबर पोलिसांकडून नॅन्सीची कसून चौकशी करण्यात आली आणि तिला हरगोजच्या काही वस्तू ताब्यात देण्यात आल्या . त्यात होते एक पुरातन हाड कोरुन तयार केलेली तुतारी . त्यावर आहे तिबेटमधील एक गूढ राज्याचे वर्णन . शांग्रीला नावाच्या राज्याची ती माहिती आहे .लामांच्या काही वयोवृद्ध धर्मगुरूनाच त्याची माहिती आहे . त्या राज्यात गेलेला एकही माणूस जिवंत परत आला नाही असे म्हटले जाते . चीन सरकारही त्या तुतारीचा शोध घेत आहे . नॅन्सी या गूढ अज्ञात राज्याचा शोध घ्यायला निघाली आहे . जगावर नियंत्रण करणारे अदृश्य शांग्री-ला राज्य यांची चित्तथरारक सफर ...Read more

  • Rating StarDAINIK GOMANTAK SHABDSOHALA 02-11-2014

    काही-काही पुस्तकं वाचून सुन्न-बधिर व्हायला होतं. त्यातील अचाट कथानक-शेवटपर्यंत लीलया खेळवलेली रोमहर्षक रहस्यं, आकर्षक मांडणी, गुंगवून टाकणारी शैली, ‘पुढे काय होईल?’ची वाढवत नेलेली उत्कंठा. सर्व काही, तुमच्यावर असं आणि इतकं कोसळतं, की पुस्तक संपल्यावरदेखी कितीतरी दिसव, दुसरं पुस्तक हातात धरवत नाही. कोणाशी काही बोलू नये, कसली चर्चा करू नये, काहीही वाचू नये... अशी ज्ञानोबांच्या शब्दात सांगायचे तर पुस्तकाशी तादात्म्य पावलेली अशी अवस्था होते. अगदी अशीच अवस्था टॉम मार्टिक लिखित ‘किंगडम’ ही कादंबरी वाचून होते. यातील जागांचे, माणसाचे प्रसंगाचे खरेखुरे संदर्भ वाचून कुठेही ही काल्पनिक कादंबरी असेल, अशी पुसटशीही शंका येत नाही. तिबेट राज्य, त्यातील प्रदेश, पॅगोडा आश्रम, तिथल्या दऱ्या-खोरी, माणसं, लामा, बौद्ध धर्म, स्तूप मठ, निसर्ग, औषध व भविष्य सांगणार ज्ञानग्रंथ, पोथ्या, पुराण, चीन, जर्मनी, अमेरिक-रशिया - भारत हे देश - त्यांचे निबेटी लोकांशी संबंध, आर्य लोकांचे मूळ, देवी-देवता, उपासना, साधना, काळी जादू, जगाच्या मन:शांतीवर साम्राज्य करणारे साधक, विनाश ठरवणारा ज्ञानग्रंथ आणि जगावर नियंत्रण करणारे शांग्री-ला हे अदृश्य राज्य... यांची ही चित्तथरारक कथा आहे. न्यूयॉर्कहून पत्रकार नॅन्सी केलीची अचानक दिल्लीला बदली होते. इंटरनॅशनल हेराल्ड, ट्रिब्युन वार्तापत्रात ती नोकरीला असते. ती ज्याच्या जागेवर कामाला येते तो आन्तोन हरझोग हा हरहुन्नरी, एक अत्यंत बुद्धिमान व चमकदार पत्रकार गेले कित्येक महिने काहीही न सांगता गायब आहे. त्याच्यावर हेरगिरी करत असल्याचा आरोप आहे व त्याने कुठून तरी नॅन्सीच्या नावे एक पुरातन हाडाची तुतारी पाठवल्याचे पार्सल पोलिसांकडे आहे, म्हणून ते नॅन्सीला पहिल्याच दिवशी अटक करतात. नॅन्सी कशीबशी सुटका करवून घेते, ती हाडाची तुतारी ताब्यात घेते व सुरू होतो तो न संपणार शोध व भटकंती. तिला या खडतर प्रवासात कोण कोण कसे-कसे भेटतात, एकापेक्षा एक पुरावे तिला कसे मिळत जातात, ती त्या आन्तोन हरझोगला शोधत निबेटला कशी पोचते व शेवटी वाटेत येणारे हजार अडथळे दूर करत लक्ष्य साध्य करते का? तो तिला जिवंत सोडतो काय? या सर्व प्रश्नांची उत्तरं मिळवायला ही कादंबरी वाचायला हवी. एक अप्रतिम कादंबरी एवढ्या मोजक्या शब्दांत, तिची सर्व गुणवैशिष्ट्ये समावूच शकत नाहीत. यातील निसर्गवर्णन वाचताना, आपण अक्षरश: तिबेटमधील त्या गूढ दऱ्याखोऱ्यातून जंगलातून प्रवास करतोय अशी अनुभूती येते. पहिले महायुद्ध, दलाई लामा, शांग्री-ला, लामा, त्यांची औषधे-गुहा-भाषा अचूक उत्तरे देणार गूढ ज्ञानग्रंथ, ताओ तत्त्वप्रणाली यातील सर्व संदर्भ कथानकात असे काही जोडले आहेत की शेवटपर्यंत ती एक सत्यकथाच वाटत राहते. या कादंबरीचे सर्व काही अफाटच आहे. जितकी उत्तम कादंबरी तितकाच उत्तम तिचा अनुवाद केला आहे उदय भिडे यांनी. शिवाय अफलातून शेवट, एक धक्का तंत्राने, जिथे कथा संपते तिथेच ती एका नव्या रहस्याला जन्म देवून थांबते... परत वाचकांनी पुढे काय झाले असेलची हुरहूर लावून. ...Read more

  • Rating StarLOKPRABHA 2-12-2016

    हा किंगडम या मूळ इंग्रजी पुस्तकाचा अनुवाद आहे. यात पुस्तकाच्या मुखपृष्ठावर म्हटले आहे त्याप्रमाणे जगाच्या मन:शक्तीवर राज्य गाजवणारे साधक, विनाश ठरवणारा ज्ञानग्रंथ आणि जगावर नियंत्रण करणारे अदृश्य शांग्रीला राज्य यांची चित्तथरारक सफर आहे. पत्रकार नॅन्ी केलीच्या नावाने एक पार्सल येते. त्यात एक रहस्यमय तुतारी असते. जमिनीवर पसरलेल्या ऑर्किड्सच्या फुलांच्या गालिच्यांचे, उंच डोंगरांचे, त्यांच्यावर असलेल्या ढगांच्या छतांचे, तिबेटमधल्या घनदाट जंगलांचे, उंच कळस असलेल्या प्रार्थनामंदिरांचे वर्णन असते. त्यानंतर ती एका रहस्याच्या शोधात एका धोकादायक प्रवासाला निघते. ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

SARTH
SARTH by DR. S. L. BHYRAPPA Rating Star
हेमंत सांबरे

गेल्या तीन दिवसांत ही कादंबरी वाचून पूर्ण झाली .. ही कादंबरी वाचून होताच मन अगदी सुन्न होऊन गेले आहे . त्याचबरोबर अनेक संमिश्र भावना मनात दाटून आल्या आहेत . #आवरण ही जगप्रसिद्ध कादंबरी वाचल्यानंतर भैरप्पा यांच्या बद्दल मनात खूप आदरभाव निर्माण झाला होा . त्यानंतर त्यांचे हे दुसरे पुस्तक म्हणजे #सार्थ आज वाचून पूर्ण केले. या कादंबरीची कथा सातव्या शतकात घडत असते . *नागभट्ट* हा कादंबरीचा नायक आहे . हा नागभट्ट तुमच्या माझ्या सारखा एक सर्वसामान्य मनुष्य आहे . भैरप्पा यांनी त्याच्या नजरेतून त्या काळात घडत असलेल्या अनेक घटनांचा सूक्ष्म आढावा आपल्या समोर अतिशय समर्थपणे मांडला आहे . हे सातवे शतक म्हणजे असे होते की वैदिक धर्माचा प्रभाव जरी जनमानसात असला तरी , बौद्ध धर्माने ही आपली पाळेमुळे पूर्ण निदान उत्तर भारत , पूर्व भारत या भागात पसरवली होती . एक सामान्य मनुष्य म्हणून नागभट्टच्या मनात सुरू असलेली विविध द्वंद , त्याची वैदिक धर्म की बौद्ध धर्म याविषयी झालेली द्विधा मनस्थिती ही लेखकाने अचूक टिपली आहे . अनेक चर्चांमधून बौद्ध तत्त्वज्ञान , वैदिक तत्त्वज्ञान यांची ओळख अतिशय सोप्या भाषेत लेखक आपल्याला करून देतात , ते वाचताना आपल्या चित्ताला एक वेगळेच समाधान मिळत राहते .. या सर्व तत्त्वज्ञानाची प्रदीर्घ चर्चा , नायकाला येत असलेले वेगवेगळे अनुभव यातून आपणही समृध्द होत जातो . मधल्या काळात नायक मथुरेला येऊन राहतो . तेव्हा तिथल्या एका नाटक मंडळींबरोबर ओळख होऊन नायकाला त्यांच्या एका नाटकात प्रत्यक्ष *कृष्णाची* भूमिका करायला मिळते . तेव्हा त्याचे नाव *कृष्णानंद* असे होते . या भूमिकेमुळे नायकाला त्या भागात प्रचंड प्रसिध्दी मिळते . या नाटकातील असलेली त्याची नायिका चंद्रिका या सुंदर स्त्री बरोबर त्याचा विशेष स्नेह होऊन त्यांचे प्रेम ही जुळते . एखादी गोष्टीचा प्रचंड अभ्यास करून त्याला मांडणे यात भैरप्पा यांचा हात कदाचित फार कमी लेखक धरू शकतील . ही कादंबरी वाचतानाही प्रत्यही जाणवत राहते . याच काळात आद्य शंकराचार्य व मंडणमिश्र यांच्यातील झालेल्या जगप्रसिद्ध वादावर दोन ते तीन प्रकरणे या पुस्तकात आली आहे . या दोन दिग्गज वैदिक ऋषी बद्दल मी इतर अनेक ठिकाणी खूप ओझरते उल्लेख ऐकले होते , पण या कादंबरीत विस्तृत माहिती मिळाली , व एक वेगळेच समाधान मिळाले . कादंबरीचा शेवट आपल्याला पुस्तकातील आधीच्या अनेक कथावस्तू पासून एका वेगळ्याच दुनियेत घेऊन जातो .. याच सातव्या शतकात वायव्येकडून अरब लोकांची आक्रमणे सुरू झाली होती . तोपर्यंत भारतवर्षात लढली जाणारी युद्ध फक्त रणांगणावर लढली जात , त्याचा सामान्य जनतेला कुठलाही त्रास होत नसे . पण अरबांनी केलेल्या आक्रमण मुळे भारताचा सांस्कृतिक ढाचा कसा उद्ध्वस्त होऊ लागला याचे अचूक व सत्य वर्णन भैरप्पा यांनी केले आहे . ते वाचताना तेव्हाही हिंदूंची सद्गुण विकृती ( अनावश्यक असलेली अती सहिष्णुता ) कशा प्रकारे हिंदूंचा नाश करते हे ही त्यांनी सांगितले आहे . ती सर्व शेवटची प्रकरणे आपण सर्व हिंदूंनी मुळातच वाचण्यासारखी व अभ्यास करण्यासारखी आहे . एका प्रसंगात जेव्हा काही राजे एकत्र येऊन अरबांवर आक्रमण करण्याचे योजतात , तेव्हा धूर्त अरब त्या गावातील सूर्यमंदीर भ्रष्ट करायची धमकी देऊन त्या गावातील लोकांना युद्ध करण्यापासून व बाहेरून आलेल्या सैनिकांना सहाय्य न करण्याचे वचन घेतात . त्यामुळे जे नको तेच होते , व हळूहळू तो प्रदेश अरबांच्या ताब्यात जाऊन तेथला बौद्ध , वैदिक हिंदू धर्म नष्ट होऊ लागतो , याचे विदारक वर्णन आपल्यासमोर येते . हे वाचताना मला १७५१ साली नानासाहेब पेशव्यांनी काशी वर आक्रमण करून ते क्षेत्र मुक्त करण्याच्या प्रसंगाची आठवण झाली . तेव्हाही काशी मधील जनतेने नानासाहेब पेशव्यांना रोखले होते , नाहीतर तेव्हाचा ज्ञानवापी मंदीर मुक्त झाले असते ... तेव्हाही हिंदूंची सद्गुण विकृती आड आली जशी ती सातव्या शतकात ही आड आली होती .. असो --- अनेक अद्भुत प्रसंगातून आपल्याला ही कादंबरी घेऊन जात राहते ..सातव्या शतकातील भारताचे वर्णन वाचून आपण त्यावेळच्या राजांची वृत्ती , जनतेचा स्वभाव , साधू तसेच बौद्ध भिक्खू यांचे स्वभाव, त्यांचे विचार आपल्याला कळत जातात . लेखक आपल्याला नालंदा विद्यापीठ देखील दाखवून आणतो . त्याकाळात तेथील अध्ययन कसे चालत असे , हेदेखील आपल्याला वाचायला मिळते . पुस्तकाला कादंबरीची मोकळीक असली तरी आपल्याला ऐतिहासिक दृष्टिकोन ही मिळतो , हे नक्की ! ही कादंबरी वाचून होताच, भैरप्पा यांच्या इतर सर्व कादंबऱ्या व पुस्तके वाचण्याची उत्सुकता निर्माण झाली आहे , व ती इच्छा ही लवकरच पूर्ण होईल ही आशा! ...Read more