* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: VARUL
  • Availability : Available
  • ISBN : 9789353173029
  • Edition : 3
  • Publishing Year : OCTOBER 2004
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 472
  • Language : MARATHI
  • Category : FICTION
  • Sub Category : SCIENCE FICTION, GENERAL FICTION
  • Available in Combos :BABARAO MUSALE COMBO SET - 4 BOOKS
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
‘VARUL’ THE NOVEL BY BABARAO MUSALE DEPICTS THE LIFE OF OPPRESSED AND DOWNTRODDEN MASSES FROM RURAL AREAS. SPLIT IN TWO PARTS, THE NOVEL PORTRAYS THE DAY TO DAY LIFE OF THREE GENERATIONS (ESPECIALLY TWO GENERATIONS ). IT TALKS ABOUT THEIR SURVIVAL, CLASHES TRIGGERED BY THE MULTI-LAYERED CAST SYSTEM, TRADITIONS AND CUSTOMS, POVERTY, LACK OF EDUCATION AND THE LONG TERM EFFECTS THEREOF UPON THE SOCIAL STRATA. IT ALSO GIVES US A WELL NARRATED COMMENTARY UPON THE FAMINE IN 1970-71, THE WORK DR.BABASAHEB AMBEDKAR DID FOR THE BACKWARD CLASSES, THE UPRISING FOR THE MATANGAS, THE POTENTIAL DISASTERS FOR THE LOCALS BECAUSE OF A PROPOSED DAM, ELECTIONS, THE POLITICAL IMBROGLIO AMONGST THE HOMOGENEOUS AND THE BACKWARD CLASSES AS WELL AS THE INFIGHTING AMONG THEMSELVES, THE RUTHLESS POLITICAL MANIPULATIONS, AND THE RESULT OF ALL OF THIS INTO A ‘DOG EAT DOG’ SITUATION. THE OVERALL EFFECT OF ALL THESE TOUCH-POINTS, WHEN WOVEN INTO A SEAMLESSLY FLOWING NARRATION, ALLOWS THE READER A DETAILED, CLOSER LOOK AT THE LIFE OF THE BACKWARD CLASSES.
‘वारूळ’ ही बाबाराव मुसळे यांची कादंबरी ग्रामीण भागातील मागासवर्गीयांच्या समाजजीवनाचं यथार्थ दर्शन घडवते. दोन भागांत असलेल्या या कादंबरीमध्ये मागास जातींतील तीन पिढ्यांचे (विशेषत: दोन पिढ्यांचे) दैनंदिन जीवन, त्यांच्याच पोटजातीत असलेले कौटुंबिक हेवेदावे, मतभेद, पारंपरिक चालीरिती, त्यांची गरिबी, शिक्षणाचा अभाव यामुळे त्यांच्या एवूÂण सामाजिक जीवनावर होणारे दूरगामी परिणाम यांवर लेखकाने विशेष भर दिला आहे. तसेच यामध्ये १९७०-७१चा दुष्काळ, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी मागासवर्गीयांसाठी केलेल्या कार्याची ओळख, मातंगांसाठीची चळवळ, संभाव्य धरणामुळे त्या परिसरावर अवलंबून असणाऱ्या लोकांवर ओढवू पाहाणारे संकट, निवडणुका, जाती-उपजातींतील (सवर्ण-मागास आणि कुणबी-महार, मांग वगैरे) गुंतागुंतीचे, शह-काटशहाचे स्थानिक राजकारण; त्यामुळे एकमेकांवर केली जाणारी कुरघोडी हे सारे टप्प्याटप्प्याने, ओघाओघाने गुंफले आहे. या सर्वांवर आधारित विविध घटना-प्रसंगांमुळे वाचकाला मागासवर्गीयांच्या समाजजीवनाचे यथार्थ दर्शन होते.
1.महाराष्ट्र शासनाचा उत्कृष्ट ‘वाङ्मय निर्मिती’ पुरस्कार. 2.विदर्भ साहित्य संघ, नागपूर यांचा ‘पु.य. देशपांडे’ पुरस्कार. 3.जनसाहित्य परिषद, अमरावती यांचा ‘जनसारस्वत’ पुरस्कार. 4.मराठी अनुवाद परिषद, बुलढाणा यांचा ‘तुका म्हणे’ पुरस्कार. 5.पद्मगंधा प्रतिष्ठान, नागपूर यांचा पुरस्कार. 6.कै. यशवंत दाते स्मृती पुरस्कार,’ वर्धा यांचा ‘बाबा पद्मनजी’ पुरस्कार. 7.‘शब्दपंढरी पुरस्कार,’ लातूर.

No Records Found
No Records Found
Keywords
#VARUL #BABARAO MUSALE #MATANG COMMUNITY #DR.BABASAHEBAMBEDKAR
Customer Reviews
  • Rating StarSANJOSH SANAS

    खूप दिवसांनी वाचायला मिळालेले एक अप्रतिम पुस्तक!

  • Rating StarViddya Bayan - Thakur

    ...`हे` वाचून हादरून गेले.माझा जन्म खेड्यात झालेला असला तरी मला माहीत नसलेली एक विदारक दुनिया या कादंबरीत भेटली.सत्तरच्या दशकातलं कथानक असणाऱ्या या कादंबरीत गावकुसाबाहेरच्या वस्तीतल्या जीवनाचं बारकाव्यांसह तपशीलवार रेखाटन आलेलं आहे. मातंग समाजाच्ा सामाजिक स्थीत्यंतरांचा कथारूप इतिहास या कादंबरीतून वाचायला मिळतो.प्रत्येक तरूणाने वाचावी,समजून घ्यावी अशीच ही कादंबरी आहे. तरूणांनाही लाजवणारा उत्साह आदरणीय बाबाराव मुसळे सरांकडे आहे.सरांच्या उत्साहाला सलाम आणि वारूळच्या तिसऱ्या आवृत्तीला खूप खूप शुभेच्छा!💐 ...Read more

  • Rating Starलोकमत १७-११-१९

    भावविश्वाचं बंदिस्त वारूळ... खेडेगावात बालपण व्यतित केलेल्यांना मुंग्यांचं वारूळ अगदी जवळून परिचित असेल. या वारुळात जशी शांतता थंडावा, प्रसन्नता, समाधान असते तीच गोष्ट देवळातदेखील जाणवते. मग मुंग्यांसाठी त्यांचे वारूळ देऊळच नाही का... याच आशयाशी साधयार्म्य सांगणारी म्हणजे वारूळ होय. या कादंबरीचे कथानक ग्रामीण भागातील दलित, अल्प्संखांक यांसारख्या अनेक समूहांवर सामाजिक, आर्थिक, राजकीय परिस्थितीवर भाष्य करते. मातंग समाजाच्या पूर्वापार चालत आलेल्या चालीरीती, जडणघडण असे सारे काही या कादंबरीत विस्तृत, तितकेच संयमी आणि वेळप्रसंगी टोकदार भूमिका मांडते. येसाजी नावाच्या व्यक्तिरेखेभोवती हे फिरणारे कथानक मनाचा ठाव घेते. ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

RUCHIRA BHAG -1
RUCHIRA BHAG -1 by KAMALABAI OGALE Rating Star
संजीव_वेलणकर

*आज २० एप्रिल* *आज दोन लाख सुनांची एकच आई हे नाव कमवणाऱ्या #कमलाबाई_ओगले यांचा स्मृतिदिन.* जन्म. १६ सप्टेंबर १९१३ सांगली जिल्ह्यातील कुंडल येथे. कमलाबाई ओगले या माहेरच्या गोदूताई अनंत दांडेकर. त्याचा विवाह सांगलीतील कृष्णाजी ओगले यांच्याशी झाला. कमलााई ओगले यांच्या पाककला कृतींवरच्या ‘ रुचिरा‘ हे पुस्तक १९७० च्या सुमारास आले. कुठलाही प्रकाशक, या नाव नसलेल्या कमलाबाई ओगले यांचे हे पुस्तक स्विकारावयास तयार होईना काही प्रकाशकांनी तर बाईंकडेच प्रकाशनासाठी पैसे मागितले. पण या पुस्तकाच्या गुणवत्तेवर आणि उपयुक्ततेवर १०० % विश्वास असणार्‍या ओगल्यांनी धीर न सोडता त्यांचे आणि मुकुंदराव किर्लोस्करांचे स्नेही श्री. भिडे यांच्या मार्फत मुकुंदराव किर्लोस्कर यांना गाठले आणि पुस्तक प्रकाशनाचा प्रस्ताव ठेवला. वृत्तीने पूर्णत: व्यावसायिक असणार्‍या मुकुंदरावांनी फायदा होणार नाही म्हणून हे पुस्तक स्वीकारण्यास नकारच दिला होता पण भिडे यांनी पटवल्यावर आणि तोटा झालाच तर तो सोसण्याची तयारी ओगल्यांनी दाखवल्यावर मुकुंदराव तयार झाले . किर्लोस्कर समूहाने ‘ स्त्री सखी प्रकाशन ‘ या संस्थेची मुहूर्तमेढ रोवली आणि पहिलेच पुस्तक म्हणून ‘ रुचिरा ‘ चे प्रकाशन केले. या पुस्तकामुळे कमलाबाई ओगले या सर्वच स्तरांत अतिशय लोकप्रिय झाल्या. त्यांना परीक्षक म्हणून पूर्वीपेक्षा जास्त बोलावणी येऊ लागली. केंद्रीय मंत्री शंकरराव चव्हाण, आबासाहेब खेबुडकर — कुलकर्णी, दुर्गाबाई भागवत, शांता शेळके, मोहिनी निमकर,अशा अनेक नामवंतांच्या हस्ते त्यांचे कित्येक सत्कार झाले. मुंबईच्या एस.एन.डी.टी. विद्यापीठात त्यांनी वर्ग घेतले. रुचिरा - भाग १ ने अभूतपूर्व यश मिळवले. वास्तविक रुचिराचे जे हस्तलिखित प्रथम तयार केले होते त्यात १०५० पदार्थकृतींचा समावेश होता. परंतु पुस्तक फार मोठे होईल व किंमतीलाही भारी होईल म्हणून त्यातले ३५० पदार्थ कमी करून रुचिरा प्रसिद्ध केले. या बाजूला काढलेल्या ३५० पदार्थांमध्ये अजून काही नवीन पदार्थांची भर घालून रुचिरा - भाग २, सन १९८५ मध्ये प्रसिद्ध केला आहे. कमलाबाई आपल्या मुलांकडे ऑस्ट्रेलियाला गेल्या असताना तेथेही ह्यांना नवनवीन पदार्थांचे प्रयोग केले. ऑस्ट्रेलियन सुगरणींकडून तेथील पदार्थांची माहिती करून घेतली व त्या पदार्थांना भारतीय चव देऊन रुचिराच्या पद्धतीनुसार वाटी चमच्याच्या प्रमाणात तयार केले. त्यामुळे रुचिरा - भाग २ मध्ये अनेक नाविन्यपूर्ण पदार्थांची रेलचेल आहे. स्वीडीश ऍपल पुडींग, स्वीस फिंगर्स, मटी ब्रिझल्स, ब्लॅक फॉरेस्ट केक, चीज मिरची भात, शानसाक, हुसेनी कबाब करी, ब्राऊन स्ट्यू अशा नावांनीच तोंडाला पाणी सुटावे. ऑस्ट्रेलियात तर त्यांना तीनदा बोलावणी आली. या दोन्ही खंडांत त्यांनी तेथल्या भारतीय आणि स्थानिक स्त्रियांना विविध पदार्थांची प्रात्यक्षिके दाखवली. ऑस्ट्रेलियात शिरा करतांना तूप उपलब्ध नव्हते, तर त्यांनी चक्क तेलावर शिरा करून दाखवला! तोही तितकाच स्वादिष्ट झाला होता. या पुस्तकात महाराष्ट्रीय पदार्थांप्रमाणेच काही तमिळी, पंजाबी, गुजराती आणि बंगाली पाककृतींचा समावेश केला आहे. त्याचप्रमाणे हे पुस्तक मराठी भाषेचे कुंपण ओलांडून कानडी भाषेतही गेले. विद्यामूर्ती सत्यनारायण यांनी भाषांतर केलेल्या कानडी पुस्तकाचे भाग्य मराठी पुस्तकाप्रमाणेच बलवत्तर आहे. या पुस्तकाची हिन्दी, इंग्लिश आणि गुजराती भाषांतही भाषांतरे झाली आहेत. ‘फास्ट फूड ‘ पद्धतीच्या पाक कृती असलेल्या या ‘ रुचिरा ‘ चा दुसरा भागही प्रसिद्ध झाला. एखाद्या लोकप्रिय गाण्याप्रमाणे हे पुस्तक घराघरांत पोचले. हे पुस्तक पुढच्या पिढींतील मुलींना / सुनांना ही आपले पुस्तक वाटते. दोन लाख प्रतींचा खप गाठल्यावर ‘ दोन लाख सुनांची एकच आई ‘अशी caption या पुस्तकाच्या blurb वर दिली गेली होती; ती नि:संशय समर्पक होती. या Blurb ला प्रा. मं. वि. राजाध्यक्षांनी ‘ वेष्टण लेख ‘ असा प्रतिशब्द सुचवला होता.. कमलाबाई ओगले यांचे २० एप्रिल १९९९ रोजी निधन झाले. आपल्या समुहा तर्फे कमलाबाई ओगले यांना आदरांजली. ...Read more

RUCHIRA BHAG -2
RUCHIRA BHAG -2 by KAMALABAI OGALE Rating Star
संजीव वेलणकर

*आज २० एप्रिल* *आज दोन लाख सुनांची एकच आई हे नाव कमवणाऱ्या #कमलाबाई_ओगले यांचा स्मृतिदिन.* जन्म. १६ सप्टेंबर १९१३ सांगली जिल्ह्यातील कुंडल येथे. कमलाबाई ओगले या माहेरच्या गोदूताई अनंत दांडेकर. त्याचा विवाह सांगलीतील कृष्णाजी ओगले यांच्याशी झाला. कमलााई ओगले यांच्या पाककला कृतींवरच्या ‘ रुचिरा‘ हे पुस्तक १९७० च्या सुमारास आले. कुठलाही प्रकाशक, या नाव नसलेल्या कमलाबाई ओगले यांचे हे पुस्तक स्विकारावयास तयार होईना काही प्रकाशकांनी तर बाईंकडेच प्रकाशनासाठी पैसे मागितले. पण या पुस्तकाच्या गुणवत्तेवर आणि उपयुक्ततेवर १०० % विश्वास असणार्‍या ओगल्यांनी धीर न सोडता त्यांचे आणि मुकुंदराव किर्लोस्करांचे स्नेही श्री. भिडे यांच्या मार्फत मुकुंदराव किर्लोस्कर यांना गाठले आणि पुस्तक प्रकाशनाचा प्रस्ताव ठेवला. वृत्तीने पूर्णत: व्यावसायिक असणार्‍या मुकुंदरावांनी फायदा होणार नाही म्हणून हे पुस्तक स्वीकारण्यास नकारच दिला होता पण भिडे यांनी पटवल्यावर आणि तोटा झालाच तर तो सोसण्याची तयारी ओगल्यांनी दाखवल्यावर मुकुंदराव तयार झाले . किर्लोस्कर समूहाने ‘ स्त्री सखी प्रकाशन ‘ या संस्थेची मुहूर्तमेढ रोवली आणि पहिलेच पुस्तक म्हणून ‘ रुचिरा ‘ चे प्रकाशन केले. या पुस्तकामुळे कमलाबाई ओगले या सर्वच स्तरांत अतिशय लोकप्रिय झाल्या. त्यांना परीक्षक म्हणून पूर्वीपेक्षा जास्त बोलावणी येऊ लागली. केंद्रीय मंत्री शंकरराव चव्हाण, आबासाहेब खेबुडकर — कुलकर्णी, दुर्गाबाई भागवत, शांता शेळके, मोहिनी निमकर,अशा अनेक नामवंतांच्या हस्ते त्यांचे कित्येक सत्कार झाले. मुंबईच्या एस.एन.डी.टी. विद्यापीठात त्यांनी वर्ग घेतले. रुचिरा - भाग १ ने अभूतपूर्व यश मिळवले. वास्तविक रुचिराचे जे हस्तलिखित प्रथम तयार केले होते त्यात १०५० पदार्थकृतींचा समावेश होता. परंतु पुस्तक फार मोठे होईल व किंमतीलाही भारी होईल म्हणून त्यातले ३५० पदार्थ कमी करून रुचिरा प्रसिद्ध केले. या बाजूला काढलेल्या ३५० पदार्थांमध्ये अजून काही नवीन पदार्थांची भर घालून रुचिरा - भाग २, सन १९८५ मध्ये प्रसिद्ध केला आहे. कमलाबाई आपल्या मुलांकडे ऑस्ट्रेलियाला गेल्या असताना तेथेही ह्यांना नवनवीन पदार्थांचे प्रयोग केले. ऑस्ट्रेलियन सुगरणींकडून तेथील पदार्थांची माहिती करून घेतली व त्या पदार्थांना भारतीय चव देऊन रुचिराच्या पद्धतीनुसार वाटी चमच्याच्या प्रमाणात तयार केले. त्यामुळे रुचिरा - भाग २ मध्ये अनेक नाविन्यपूर्ण पदार्थांची रेलचेल आहे. स्वीडीश ऍपल पुडींग, स्वीस फिंगर्स, मटी ब्रिझल्स, ब्लॅक फॉरेस्ट केक, चीज मिरची भात, शानसाक, हुसेनी कबाब करी, ब्राऊन स्ट्यू अशा नावांनीच तोंडाला पाणी सुटावे. ऑस्ट्रेलियात तर त्यांना तीनदा बोलावणी आली. या दोन्ही खंडांत त्यांनी तेथल्या भारतीय आणि स्थानिक स्त्रियांना विविध पदार्थांची प्रात्यक्षिके दाखवली. ऑस्ट्रेलियात शिरा करतांना तूप उपलब्ध नव्हते, तर त्यांनी चक्क तेलावर शिरा करून दाखवला! तोही तितकाच स्वादिष्ट झाला होता. या पुस्तकात महाराष्ट्रीय पदार्थांप्रमाणेच काही तमिळी, पंजाबी, गुजराती आणि बंगाली पाककृतींचा समावेश केला आहे. त्याचप्रमाणे हे पुस्तक मराठी भाषेचे कुंपण ओलांडून कानडी भाषेतही गेले. विद्यामूर्ती सत्यनारायण यांनी भाषांतर केलेल्या कानडी पुस्तकाचे भाग्य मराठी पुस्तकाप्रमाणेच बलवत्तर आहे. या पुस्तकाची हिन्दी, इंग्लिश आणि गुजराती भाषांतही भाषांतरे झाली आहेत. ‘फास्ट फूड ‘ पद्धतीच्या पाक कृती असलेल्या या ‘ रुचिरा ‘ चा दुसरा भागही प्रसिद्ध झाला. एखाद्या लोकप्रिय गाण्याप्रमाणे हे पुस्तक घराघरांत पोचले. हे पुस्तक पुढच्या पिढींतील मुलींना / सुनांना ही आपले पुस्तक वाटते. दोन लाख प्रतींचा खप गाठल्यावर ‘ दोन लाख सुनांची एकच आई ‘अशी caption या पुस्तकाच्या blurb वर दिली गेली होती; ती नि:संशय समर्पक होती. या Blurb ला प्रा. मं. वि. राजाध्यक्षांनी ‘ वेष्टण लेख ‘ असा प्रतिशब्द सुचवला होता.. कमलाबाई ओगले यांचे २० एप्रिल १९९९ रोजी निधन झाले. आपल्या समुहा तर्फे कमलाबाई ओगले यांना आदरांजली. ...Read more