* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Availability : Available
  • ISBN : 9789353173029
  • Edition : 3
  • Publishing Year : OCTOBER 2004
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 472
  • Language : MARATHI
  • Category : FICTION
  • Sub Category : SCIENCE FICTION, GENERAL FICTION
  • Available in Combos :BABARAO MUSALE COMBO SET - 6 BOOKS
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
‘VARUL’ THE NOVEL BY BABARAO MUSALE DEPICTS THE LIFE OF OPPRESSED AND DOWNTRODDEN MASSES FROM RURAL AREAS. SPLIT IN TWO PARTS, THE NOVEL PORTRAYS THE DAY TO DAY LIFE OF THREE GENERATIONS (ESPECIALLY TWO GENERATIONS ). IT TALKS ABOUT THEIR SURVIVAL, CLASHES TRIGGERED BY THE MULTI-LAYERED CAST SYSTEM, TRADITIONS AND CUSTOMS, POVERTY, LACK OF EDUCATION AND THE LONG TERM EFFECTS THEREOF UPON THE SOCIAL STRATA. IT ALSO GIVES US A WELL NARRATED COMMENTARY UPON THE FAMINE IN 1970-71, THE WORK DR.BABASAHEB AMBEDKAR DID FOR THE BACKWARD CLASSES, THE UPRISING FOR THE MATANGAS, THE POTENTIAL DISASTERS FOR THE LOCALS BECAUSE OF A PROPOSED DAM, ELECTIONS, THE POLITICAL IMBROGLIO AMONGST THE HOMOGENEOUS AND THE BACKWARD CLASSES AS WELL AS THE INFIGHTING AMONG THEMSELVES, THE RUTHLESS POLITICAL MANIPULATIONS, AND THE RESULT OF ALL OF THIS INTO A ‘DOG EAT DOG’ SITUATION. THE OVERALL EFFECT OF ALL THESE TOUCH-POINTS, WHEN WOVEN INTO A SEAMLESSLY FLOWING NARRATION, ALLOWS THE READER A DETAILED, CLOSER LOOK AT THE LIFE OF THE BACKWARD CLASSES.
‘वारूळ’ ही बाबाराव मुसळे यांची कादंबरी ग्रामीण भागातील मागासवर्गीयांच्या समाजजीवनाचं यथार्थ दर्शन घडवते. दोन भागांत असलेल्या या कादंबरीमध्ये मागास जातींतील तीन पिढ्यांचे (विशेषत: दोन पिढ्यांचे) दैनंदिन जीवन, त्यांच्याच पोटजातीत असलेले कौटुंबिक हेवेदावे, मतभेद, पारंपरिक चालीरिती, त्यांची गरिबी, शिक्षणाचा अभाव यामुळे त्यांच्या एवूÂण सामाजिक जीवनावर होणारे दूरगामी परिणाम यांवर लेखकाने विशेष भर दिला आहे. तसेच यामध्ये १९७०-७१चा दुष्काळ, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी मागासवर्गीयांसाठी केलेल्या कार्याची ओळख, मातंगांसाठीची चळवळ, संभाव्य धरणामुळे त्या परिसरावर अवलंबून असणाऱ्या लोकांवर ओढवू पाहाणारे संकट, निवडणुका, जाती-उपजातींतील (सवर्ण-मागास आणि कुणबी-महार, मांग वगैरे) गुंतागुंतीचे, शह-काटशहाचे स्थानिक राजकारण; त्यामुळे एकमेकांवर केली जाणारी कुरघोडी हे सारे टप्प्याटप्प्याने, ओघाओघाने गुंफले आहे. या सर्वांवर आधारित विविध घटना-प्रसंगांमुळे वाचकाला मागासवर्गीयांच्या समाजजीवनाचे यथार्थ दर्शन होते.
1.महाराष्ट्र शासनाचा उत्कृष्ट ‘वाङ्मय निर्मिती’ पुरस्कार. 2.विदर्भ साहित्य संघ, नागपूर यांचा ‘पु.य. देशपांडे’ पुरस्कार. 3.जनसाहित्य परिषद, अमरावती यांचा ‘जनसारस्वत’ पुरस्कार. 4.मराठी अनुवाद परिषद, बुलढाणा यांचा ‘तुका म्हणे’ पुरस्कार. 5.पद्मगंधा प्रतिष्ठान, नागपूर यांचा पुरस्कार. 6.कै. यशवंत दाते स्मृती पुरस्कार,’ वर्धा यांचा ‘बाबा पद्मनजी’ पुरस्कार. 7.‘शब्दपंढरी पुरस्कार,’ लातूर.

No Records Found
No Records Found
Keywords
#VARUL #BABARAO MUSALE #MATANG COMMUNITY #DR.BABASAHEBAMBEDKAR
Customer Reviews
  • Rating StarSANJOSH SANAS

    खूप दिवसांनी वाचायला मिळालेले एक अप्रतिम पुस्तक!

  • Rating StarViddya Bayan - Thakur

    ...`हे` वाचून हादरून गेले.माझा जन्म खेड्यात झालेला असला तरी मला माहीत नसलेली एक विदारक दुनिया या कादंबरीत भेटली.सत्तरच्या दशकातलं कथानक असणाऱ्या या कादंबरीत गावकुसाबाहेरच्या वस्तीतल्या जीवनाचं बारकाव्यांसह तपशीलवार रेखाटन आलेलं आहे. मातंग समाजाच्ा सामाजिक स्थीत्यंतरांचा कथारूप इतिहास या कादंबरीतून वाचायला मिळतो.प्रत्येक तरूणाने वाचावी,समजून घ्यावी अशीच ही कादंबरी आहे. तरूणांनाही लाजवणारा उत्साह आदरणीय बाबाराव मुसळे सरांकडे आहे.सरांच्या उत्साहाला सलाम आणि वारूळच्या तिसऱ्या आवृत्तीला खूप खूप शुभेच्छा!💐 ...Read more

  • Rating Starलोकमत १७-११-१९

    भावविश्वाचं बंदिस्त वारूळ... खेडेगावात बालपण व्यतित केलेल्यांना मुंग्यांचं वारूळ अगदी जवळून परिचित असेल. या वारुळात जशी शांतता थंडावा, प्रसन्नता, समाधान असते तीच गोष्ट देवळातदेखील जाणवते. मग मुंग्यांसाठी त्यांचे वारूळ देऊळच नाही का... याच आशयाशी साधयार्म्य सांगणारी म्हणजे वारूळ होय. या कादंबरीचे कथानक ग्रामीण भागातील दलित, अल्प्संखांक यांसारख्या अनेक समूहांवर सामाजिक, आर्थिक, राजकीय परिस्थितीवर भाष्य करते. मातंग समाजाच्या पूर्वापार चालत आलेल्या चालीरीती, जडणघडण असे सारे काही या कादंबरीत विस्तृत, तितकेच संयमी आणि वेळप्रसंगी टोकदार भूमिका मांडते. येसाजी नावाच्या व्यक्तिरेखेभोवती हे फिरणारे कथानक मनाचा ठाव घेते. ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

बाबाराव घोरमाडे, अमरावती

प्रथम दर्शनी कविता लेखन असले तरी गद्य आणि पद्य सोबत सोबत चालल्यासारख्या लेखन शैलीचा भास जाणवतो. अमरावती शहरातील 70..80 व नंतरच्या दशकातील गुणवैशिष्ट्ये मार्मिक नर्म विनोदी शैलीत सुंदर रीतीने विषद केली आहेत. लेखकाची सुक्ष्म निरीक्षण शैली काव्य चना स्वरूपात पुस्तक रूपाने सादर करण्यात लेखक यशस्वी झाले आहेत. इजाफा,रूतबा, हिरव्या देठाचे,कैलहीचा मौहोल, ढगांचा,इत्यादी जुने वऱ्हाडी शब्द वापरल्यामुळे जुन्या आठवणींना उजाळा मिळाला. लेखकाने अमरावती शहरातील जुन्या जाणत्या, गुणवान, असामान्य अशा व्यक्तींची दखल घेतली......पण काहींची दखल राहून गेली आहे असे माझे मत आहे. उदा. सुरेश भट, मधुकर केचे व त्यांची सायकल , अमरावतीचे दहा दिवसांची गणपती उत्सव सजावट..... प्रत्येकाने वाचावे असे हे पुस्तक, विनोदी पण शेवटी असलेली कारूण्याची किनार अंतर्मुख करुन जाते. ...Read more

वा. पां. जाधव अमरावती

`अमरावतीचे छप्पन स्वभाव एक मनोरंजक काव्यसंग्रह` `अमरावतीचे छप्पन स्वभाव` हे अमरावतीचे सुप्रसिद्ध साहित्यिक श्री जी. बी. देशमुख यांचे अमरावती नगरीचा सहज स्वभाव व ह्या नगरीच्या वेगळ्या ओळखीवर आधारित मनोरंजक पुस्तक वाचले. वाचून भरपूर मनोरंजन झाले. खर काय लिहावे या लेखकाबद्दल, मन गोंधळले. ऐतिहासिक असो, प्रवास वर्णन असो, व्यक्ती विशेष असो, अनुभवात्मक घटना घडामोडी असो कशावरही सहज लिखाण करणारा हा लेखक आहे. आता तर त्यांनी लेखनाला विनोद प्रचुर फोडणी देऊन `अमरावतीचे छप्पन स्वभाव` या काव्यसंग्रहातून अमरावतीकरांना मनोरंजनाची मेजवानीच दिली आहे. प्रत्येक शहराची व त्या शहरातील वैशिष्ट्यांची एक वेगळीच ओळख असते. दिवस जातात, काळ लोटतो, पिढ्या बदलतात मात्र जुन्या स्मृतीची चिन्हे नवीन येणाऱ्या पिढीच्या मनात गुढ निर्माण करत कायम हाक देत राहतात. अमरावतीही त्याला अपवाद नाही. बापट चौकात चौक नाही, त्या जागेवर चौरस्ता नसून टी-पॉइंट आहे, खापर्डे बगीचा म्हणून आजही ओळख आहे मात्र तेथे बगिचा नाही किंवा प्रसिद्ध गांधी चौकात गांधीचा पुतळा अथवा स्मृतीदर्शक चिन्ह अथवा उल्लेख नाही मात्र गांधी चौक अशीच ओळख जनमानसात आहे. अशा एक ना अनेक विसंगत नाम दर्शक ओळख असलेली उदाहरणे त्यात सप्रमाण आहेत. पण खरी गंमत म्हणजे कधी काळी घडलेला इतिहास त्यामध्ये दडलेला आहे हे निश्चित. या सोबतच अमरावतीकरांच्या स्वभावातला स्थायी मजेदारपणाच्या एक एका हटके गुण वैशिष्ट्याच्या गमती लेखकाने हुबेहूब अधोरेखित केलेल्या आहेत. आणि त्यावरुन तत्सम रचनांचा उहापोह लेखकाने पुस्तकात केला असावा. विदेशात स्थाईक झालेल्या मूळ अमरावतीकरांना लेखकाने लिहिलेल्या गमती मनोरंजनात्मक वाटाव्या एवढी किमया जी.बी. च्या सहज लेखनाने दाखवली आहे. अमरावतीचे अग्रगण्य वृत्तपत्र दै. हिंदुस्थान मध्ये लेखकाने सतत ६ महीणे लिहीलेल्या काव्य सदरात अमरावतीच्या जनमानसाच्या हृदयाच्या ठाव घेणाऱ्या काव्य रचनांचा आठवणींनी महापूर ओसंडून गेला होता. विशेष म्हणजे ह्यात कुठेही अनावश्यक अभिनीवेष नव्हता. उलट गमतीत केलेले आत्मपरिक्षण मात्र काही प्रमाणात होते. वयस्क अमरावतीकर रसिकांना या रचना ताज्या करून त्यांच्या तारुण्यात घेऊन गेल्या हेच खरे. जी बी देशमुख या लेखकास मिळालेल्या सकारात्मक प्रतिक्रियां वरून दिसून येते. . सदर पुस्तकातील काव्यमय रचना वाचतांना अमरावतीच्या माणसाच्या वऱ्हाडभोळ्या स्वभावाची प्रचीती येते आणि वेगळाच आनंद देऊन जाते. निखळ मनोरंजन करत गुदगुल्या करणारा असा हा काव्यसंग्रह आहे. अमरावती शहराची ऐतिहासिक वैशिष्टे काव्यरूपात वाचण्याचा आनंद अमरावतीकरांना ते जिथं असतील त्या गावात, परगावात, परदेशात पुस्तक मागवून घेता येईल. ...Read more