* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Availability : Notify Me
     
  • ISBN : 9789353173029
  • Edition : 3
  • Publishing Year : OCTOBER 2004
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 472
  • Language : MARATHI
  • Category : FICTION
  • Sub Category : SCIENCE FICTION, GENERAL FICTION
  • Available in Combos :BABARAO MUSALE COMBO SET - 6 BOOKS
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
‘VARUL’ THE NOVEL BY BABARAO MUSALE DEPICTS THE LIFE OF OPPRESSED AND DOWNTRODDEN MASSES FROM RURAL AREAS. SPLIT IN TWO PARTS, THE NOVEL PORTRAYS THE DAY TO DAY LIFE OF THREE GENERATIONS (ESPECIALLY TWO GENERATIONS ). IT TALKS ABOUT THEIR SURVIVAL, CLASHES TRIGGERED BY THE MULTI-LAYERED CAST SYSTEM, TRADITIONS AND CUSTOMS, POVERTY, LACK OF EDUCATION AND THE LONG TERM EFFECTS THEREOF UPON THE SOCIAL STRATA. IT ALSO GIVES US A WELL NARRATED COMMENTARY UPON THE FAMINE IN 1970-71, THE WORK DR.BABASAHEB AMBEDKAR DID FOR THE BACKWARD CLASSES, THE UPRISING FOR THE MATANGAS, THE POTENTIAL DISASTERS FOR THE LOCALS BECAUSE OF A PROPOSED DAM, ELECTIONS, THE POLITICAL IMBROGLIO AMONGST THE HOMOGENEOUS AND THE BACKWARD CLASSES AS WELL AS THE INFIGHTING AMONG THEMSELVES, THE RUTHLESS POLITICAL MANIPULATIONS, AND THE RESULT OF ALL OF THIS INTO A ‘DOG EAT DOG’ SITUATION. THE OVERALL EFFECT OF ALL THESE TOUCH-POINTS, WHEN WOVEN INTO A SEAMLESSLY FLOWING NARRATION, ALLOWS THE READER A DETAILED, CLOSER LOOK AT THE LIFE OF THE BACKWARD CLASSES.
‘वारूळ’ ही बाबाराव मुसळे यांची कादंबरी ग्रामीण भागातील मागासवर्गीयांच्या समाजजीवनाचं यथार्थ दर्शन घडवते. दोन भागांत असलेल्या या कादंबरीमध्ये मागास जातींतील तीन पिढ्यांचे (विशेषत: दोन पिढ्यांचे) दैनंदिन जीवन, त्यांच्याच पोटजातीत असलेले कौटुंबिक हेवेदावे, मतभेद, पारंपरिक चालीरिती, त्यांची गरिबी, शिक्षणाचा अभाव यामुळे त्यांच्या एकूण सामाजिक जीवनावर होणारे दूरगामी परिणाम यांवर लेखकाने विशेष भर दिला आहे. तसेच यामध्ये १९७०-७१चा दुष्काळ, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी मागासवर्गीयांसाठी केलेल्या कार्याची ओळख, मातंगांसाठीची चळवळ, संभाव्य धरणामुळे त्या परिसरावर अवलंबून असणाऱ्या लोकांवर ओढवू पाहाणारे संकट, निवडणुका, जाती-उपजातींतील (सवर्ण-मागास आणि कुणबी-महार, मांग वगैरे) गुंतागुंतीचे, शह-काटशहाचे स्थानिक राजकारण; त्यामुळे एकमेकांवर केली जाणारी कुरघोडी हे सारे टप्प्याटप्प्याने, ओघाओघाने गुंफले आहे. या सर्वांवर आधारित विविध घटना-प्रसंगांमुळे वाचकाला मागासवर्गीयांच्या समाजजीवनाचे यथार्थ दर्शन होते.
1.महाराष्ट्र शासनाचा उत्कृष्ट ‘वाङ्मय निर्मिती’ पुरस्कार. 2.विदर्भ साहित्य संघ, नागपूर यांचा ‘पु.य. देशपांडे’ पुरस्कार. 3.जनसाहित्य परिषद, अमरावती यांचा ‘जनसारस्वत’ पुरस्कार. 4.मराठी अनुवाद परिषद, बुलढाणा यांचा ‘तुका म्हणे’ पुरस्कार. 5.पद्मगंधा प्रतिष्ठान, नागपूर यांचा पुरस्कार. 6.कै. यशवंत दाते स्मृती पुरस्कार,’ वर्धा यांचा ‘बाबा पद्मनजी’ पुरस्कार. 7.‘शब्दपंढरी पुरस्कार,’ लातूर.

No Records Found
No Records Found
Keywords
#VARUL #BABARAO MUSALE #MATANG COMMUNITY #DR.BABASAHEBAMBEDKAR
Customer Reviews
  • Rating StarSANJOSH SANAS

    खूप दिवसांनी वाचायला मिळालेले एक अप्रतिम पुस्तक!

  • Rating StarViddya Bayan - Thakur

    ...`हे` वाचून हादरून गेले.माझा जन्म खेड्यात झालेला असला तरी मला माहीत नसलेली एक विदारक दुनिया या कादंबरीत भेटली.सत्तरच्या दशकातलं कथानक असणाऱ्या या कादंबरीत गावकुसाबाहेरच्या वस्तीतल्या जीवनाचं बारकाव्यांसह तपशीलवार रेखाटन आलेलं आहे. मातंग समाजाच्ा सामाजिक स्थीत्यंतरांचा कथारूप इतिहास या कादंबरीतून वाचायला मिळतो.प्रत्येक तरूणाने वाचावी,समजून घ्यावी अशीच ही कादंबरी आहे. तरूणांनाही लाजवणारा उत्साह आदरणीय बाबाराव मुसळे सरांकडे आहे.सरांच्या उत्साहाला सलाम आणि वारूळच्या तिसऱ्या आवृत्तीला खूप खूप शुभेच्छा!💐 ...Read more

  • Rating Starलोकमत १७-११-१९

    भावविश्वाचं बंदिस्त वारूळ... खेडेगावात बालपण व्यतित केलेल्यांना मुंग्यांचं वारूळ अगदी जवळून परिचित असेल. या वारुळात जशी शांतता थंडावा, प्रसन्नता, समाधान असते तीच गोष्ट देवळातदेखील जाणवते. मग मुंग्यांसाठी त्यांचे वारूळ देऊळच नाही का... याच आशयाशी साधयार्म्य सांगणारी म्हणजे वारूळ होय. या कादंबरीचे कथानक ग्रामीण भागातील दलित, अल्प्संखांक यांसारख्या अनेक समूहांवर सामाजिक, आर्थिक, राजकीय परिस्थितीवर भाष्य करते. मातंग समाजाच्या पूर्वापार चालत आलेल्या चालीरीती, जडणघडण असे सारे काही या कादंबरीत विस्तृत, तितकेच संयमी आणि वेळप्रसंगी टोकदार भूमिका मांडते. येसाजी नावाच्या व्यक्तिरेखेभोवती हे फिरणारे कथानक मनाचा ठाव घेते. ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

BACKSTAGE
BACKSTAGE by MONTEK SINGH AHLUWALIA Rating Star
महाराष्ट्र टाईम्स.. ६.९.२०२६

भारताच्या आर्थिक सुधारणांवर अनेक पुस्तके आजवर प्रसिद्ध झाली आहेत. काहींमध्ये आकडेवारीचे जंजाळ असते, काही धोरणांचे विश्लेषण करतात, तर काही विशिष्ट नेत्यांची जाहिरातबाजी करतात. मात्र माँटेकसिंग अहलुवालिया यांचे `बॅकस्टेज : भारताच्या उच्च वाढीच्या र्षांमागची कहाणी` हे पुस्तक या सगळ्यांपेक्षा वेगळे ठरते. कारण हे पुस्तक भारताच्या आर्थिक परिवर्तनाची कथा बाहेरून पाहणाऱ्या अभ्यासकाने नव्हे, तर त्या परिवर्तनाच्या केंद्रस्थानी उभ्या असलेल्या व्यक्तीने सांगितलेली आहे. जी. बी. देशमुख यांनी मूळ इंग्रजी पुस्तकाचा केलेला मराठी अनुवाद सरस उतरला आहे. पुस्तकाच्या सुरुवातीलाच माँटेकसिंग एक गोष्ट स्पष्ट करतात, ती म्हणजे, हे पुस्तक आत्मकथन नाही. आत्मप्रौढी मिरवण्यासाठी नव्हे, तर भारताच्या आर्थिक सुधारणांचा प्रवास समजावून सांगण्यासाठी अहलुवालिया हे पुस्तक लिहितात. विषयाच्या अनुषंगाने पुस्तकात त्यांच्या वैयक्तिक आयुष्यातील संदर्भ येतात, पण ते आर्थिक आणि राजकीय घडामोडी समजावून सांगण्यापुरतेच. सिकंदराबादमधील मध्यमवर्गीय वातावरणातून सुरू झालेला त्यांचा प्रवास दिल्ली स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स, ऑक्सफर्ड, जागतिक बँक, अर्थ मंत्रालय, योजना आयोग आणि अखेर देशाच्या सर्वोच्च आर्थिक धोरणनिर्मितीच्या केंद्रापर्यंत पोहोचतो. हा प्रवास वाचताना स्वतंत्र भारताच्या आर्थिक विचारसरणीचा विकासक्रम उलगडत जातो. पुस्तकाचे केंद्रस्थान अर्थातच १९९१च्या आर्थिक संकटाचे आहे. त्यावेळी देशाकडे काही आठवड्यांच्या आयातीपुरताही डॉलर शिल्लक नव्हता. सोन्याचा साठा गहाण ठेवण्याची वेळ आली होती आणि आर्थिक दिवाळखोरीची शक्यता प्रत्यक्ष समोर उभी होती. अशावेळी सरकारने घेतलेले निर्णय, त्यामागील तणाव, राजकीय अनिश्चितता आणि प्रशासकीय संघर्ष यांचे वर्णन पुस्तकात अत्यंत जिवंतपणे आले आहे. नाणेनिधी किंवा जागतिक बँकेच्या दबावामुळे या सुधारणा झाल्याची धारणा माँटेकसिंग ठामपणे नाकारतात. हे पुस्तक आर्थिक सुधारणांना कोणत्याही प्रकारच्या विचारधारेच्या चष्म्यातून पाहत नाही. लेखक ना मुक्त बाजाराचे अंधसमर्थन करतात, ना राज्यनियंत्रित व्यवस्थेचे. त्यांचा दृष्टिकोन व्यवहारवादी आहे. भारतासारख्या लोकशाही देशात सुधारणा एका झटक्यात होत नाहीत; त्या राजकीय वास्तवाशी जुळवून घेत हळूहळू पुढे सरकतात, हे ते वारंवार. अधोरेखित करतात. पुस्तकात अनेक ठिकाणी `सुधारणा` हा आर्थिक नव्हे, तर राजकीय प्रक्रियेचाही विषय आहे, हे प्रकर्षाने जाणवते. अहलुवालिया या पुस्तकात अनेक व्यक्ती, अधिकारी, अर्थतज्ज्ञ आणि राजकीय नेत्यांच्या योगदानाचा उल्लेख करतात. नरसिंह राव, मनमोहन सिंग, पी. चिदंबरम, यशवंत सिन्हा, जसवंत सिंह यांच्यापासून ते विविध सनदी अधिकाऱ्यांपर्यंत अनेकांची भूमिका ते प्रामाणिकपणे नोंदवतात. योजना आयोगाचे उपाध्यक्ष म्हणून काम करताना अहलुवालिया यांनी जवळून अनुभवलेला काळ येथे उभा राहतो. सन २००४ ते २०११ या काळातील उच्च आर्थिक वाढ, दारिद्रयनिर्मूलनातील प्रगती, पायाभूत सुविधांमध्ये झालेली वाढ आणि ग्रामीण विकासाच्या कार्यक्रमांचे मूल्यमापन ते करतात. विशेषतः भारताने सलग अनेक वर्षे सात ते आठ टक्क्यांच्या दरम्यान वाढ नोंदवली, ती केवळ जागतिक परिस्थितीचा. परिणाम नव्हती; १९९० नंतरच्या सुधारणांनी घातलेल्या पायावर उभे राहून ती शक्य झाली, हा त्यांचा युक्तिवाद पटण्याजोगा वाटतो. मात्र पुस्तकाचे खरे सामर्थ्य यशोगाथेत नाही, तर आत्मपरीक्षणात आहे. यूपीए-२ दरम्यान निर्माण झालेली निर्णयप्रक्रियेतील अडचण, गुंतवणुकीतील वातावरण आणि धोरणात्मक संकोच यावर लेखक मंदी, भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे निर्माण झालेले वातावरण आणि धोरणात्मक संकोच यावर लेखक थेट भाष्य करतात. अनुवादक जी. बी. देशमुख यांनी मूळ पुस्तकातील आर्थिक संकल्पना सहज आणि प्रवाही मराठीत मांडल्या आहेत. यात कृत्रिमता जाणवत नाही. आर्थिक विषयावरील पुस्तक असूनही भाषा जड वाटत नाही. आर्थिक सुधारणांच्या व्यापक सामाजिक परिणामांचा स्वतंत्र आणि सविस्तर ऊहापोह येथे अपेक्षेपेक्षा कमी आढळतो. मात्र, हे पुस्तक ज्या उद्देशाने लिहिले गेले आहे त्या उद्देशात ते अत्यंत यशस्वी ठरते. `बॅकस्टेज` हे केवळ पुस्तक नाही; ते भारताच्या आर्थिक परिवर्तनाचा प्रत्यक्षदर्शी दस्तऐवज आहे. १९९१ नंतर भारताने घेतलेल्या वळणाचा अर्थ समजून घ्यायचा असेल, उच्च वाढीच्या वर्षामागील वास्तविक कथा जाणून घ्यायची असेल आणि धोरणनिर्मितीच्या पडद्यामागे काय घडत असते याचा मागोवा घ्यायचा असेल, तर हे पुस्तक अभ्यासणे आवश्यक ठरते. भारतीय अर्थव्यवस्थेच्या आर्थिक सुधारणांचा इतिहास आणि त्यांचे परिणाम समजून घेण्यासाठी हे पुस्तक एक महत्त्वाचा संदर्भग्रंथ म्हणून ओळखले जाऊ शकते. मराठीत उपलब्ध असलेला हा अनुवाद त्या दृष्टीने विशेष स्वागतार्ह आहे. ...Read more

HACHYUKISUNASKI
HACHYUKISUNASKI by ABA MAHAJAN Rating Star
Dinesh

This is a different planet. This is a different world. And this is a truly different book. I loved it. You should also buy it and read it. I’m sure you will love it too. Hachyukisunaski is a fantastic Book.