* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Availability : Notify Me
     
  • ISBN : 9788177668865
  • Edition : 2
  • Publishing Year : NOVEMBER 2007
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 268
  • Language : MARATHI
  • Category : FICTION
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
NAINA IS BEAUTIFUL, AMBITIOUS AND ADVENTUROUS. AS A SMALL TOWN JOURNALIST FROM JHALAWAR, SHE RUSHES TO DELHI TO JOIN HER LOVE ABHAY DEFYING HER PARENTS. LUCKY TO FIND A JOB IN A DAILY, HER LIFE GETS BUSIER.
या कादंबरीचा विषय पत्रकारितेभोवती फिरणारा आहे. पत्रकारिता व राजकारण यांचं एक बेमालूम रसायन असतं. त्यामध्ये चढाओढ, कुरघोडी, काटछाट, रस्सीखेच, डावपेच ही राजकारणाची अंगप्रत्यंगही पाहावयास मिळतात. विविध प्रलोभनांचीही खिरापत चालू असते. काहीजण त्यात अडकतात अन् स्वत्व गमावून बसतात. स्वातंत्र्यपूर्व काळात पत्रकारिता ध्येयवादानं भारलेली होती. कालमानानुसार त्यात बदल झाले, काही चांगले, काही न रुचणारे. महत्त्वाकांक्षा साध्य करण्यासाठी सर्व गोठींचा वापर करणारेही अनेक असतात. व्यवसायात प्रवेश करून कालांतरानं राजकारणात उडी घेणारे आणि तेथे हात पोळले की व्यवसायात परतणारेही आहेत. त्याचप्रमाणे प्रवाहात वाहून जाणारे, हात पोळल्यावर सावरणारे, परिस्थितीशी झुंज देणारे, जाळ्यात अडकणारे असे अनेक प्रकार आढळतात. बहुतेकांचं जीवन चाकोरीबद्ध असतं. रेल्वेच्या रूळांसारखे समांतर रेषेत चालणारे अनेक. स्थानक जवळ यायला लागलं की, गाडी रूळांच्या निरनिराळ्या सांध्यावरून वळणं घेत पुन्हा समांतर रूळांवर येते, तशी काहींची स्थिती. काहीजण त्रिकोणात तर काही चौकोनात फिरताना दिसतात; इच्छेनुसार मार्ग आखणारेही असतात; पण सर्वांनाच हवं ते ध्येय गाठता येतं, असं नाही. ’जयपूर पत्रिका’मध्ये काम करणारी नैना अशीच एक पत्रकार. ही राजस्थानच्या पोलीस खात्यातील मोहनलाल रजपूत यांची उच्चशिक्षित कन्या. अभयच्या प्रेमापायी घरच्यांची पर्वा न करता तिनं दिल्ली गाठली. संसाराला हातभार लावताना ती पत्रकार झाली खरी; पण तिच्या आयुष्याच्या कॅनव्हासवर नियतीनं वेगळेच रंग भरले होते. अभयशी लग्न होऊन दहा वर्षं झाली होती. या काळात बरंच पाणी वाहून गेलं होतं. मूलबाळ नसल्यानं तिला घरची तशी ओढ राहिलेली नव्हती. म्हणूनच पत्रकारितेच्या व्यवसायात तिनं पूर्ण झोकून देण्याचं ठरविलं. अभयचा व्यवसाय म्हणावा, तसा ठीक चाललेला नव्हता. तो व्यवसायात स्थिर होत नव्हता. पैशाची नेहमीच ओढाताण होत असे. तिच्या नोकरीमुळे कसंबसं घर चालत होतं. त्यातच पत्रकारितेच्या व्यवसायात असलेली असंख्य प्रलोभनं तिच्याभोवती रुंजी घालीत होती. तिने आजवर त्यांना चार हात दूर ठेवलं होतं, परंतु त्यांना कायमचं दूर ठेवता येईल काय? याचं उत्तर मात्र तिच्याकडं नव्हतं. भोवतालच्या परिस्थितीचा प्रत्येकावर काही न काही परिणाम होत असतो. प्रवाहाच्या उलट दिशेनं जाण्याचं धैर्य फारच कमी लोकांमध्ये असतं. आजवर टिकवून ठेवलेलं धैर्य खचेल काय, अशी शंका तिला येत असे. संघर्ष आणि तडजोड या समांतर रेषेत चालणारं तिचं आयुष्य हळूहळू प्रलोभनांच्या भोवर्यात गुरफटू लागलं. आशा-आकांक्षा अन् महत्त्वाकांक्षा यांची रस्सीखेच सुरू झाली. यातूनच निर्माण झालेल्या त्रिकोणांना ती शेवटपर्यंत टाळू शकली नाही. आपल्या आयुष्याचे शिल्पकार आपणच असतो की अन्य कोणी या प्रश्नाचं उत्तर ती शोधत राहिली.

No Records Found
No Records Found
Keywords
"#MARATHIBOOKS#ONLINEMARATHIBOOKS#TRANSLATEDMARATHIBOOKS#TBC#TRANSLATEDBOOKS@50% #TRIKON #TRIKON #त्रिकोण #FICTION #MARATHI #NAIKVIJAY "
Customer Reviews
  • Rating StarMAHARASHTRA TIMES 31-08-2008

    राजकारणाचे रूप... विजय नाईक हे दिल्लीतील मराठी पत्रकार. गेल्या २५ ते ३० वर्षांतल्या बदलांचे साक्षीदार, राजकीय व्यक्तींची सत्तास्पर्धा आणि हेवेदावे यांची कथाचौकट त्यांनी ती ‘त्रिकोण’ कादंबरीत फिट बसवली आहे. ‘त्रिकोण’ कादंबरीपूर्वी त्यांची एक-दोन पुसतके प्रसिद्ध झालेली असली तरी आता ते लेखक म्हणून चांगले स्थिरावतील याची खात्री पटते. नैना ही ध्येयवादी पत्रकार, राजकारणात मुरलेले मंत्री शिवेंद्रराज, सामाजिक मूल्यांची आस धरून चळवळीच्या कामात झोकून दिलेला नैनाचा पती अभय आणि नैनाच्या वाटचालीत सहाकारी झालेला मित्र मनोहर अशा चौकोनात नाट्य खुलते. नाट्यात पत्रकारिता, राजकारणातले ढोंग आणि क्रौर्य तसेच सामाजिक चळवळीतले प्रामाणिक भाबडेपण यावर भाष्य येते. नवी दिल्ली हे राजकारणातले सर्वांत मोठे सत्ताकेंद्र. हे केंद्र सामाजिक सेवेचे क्षेत्र राहिले नसून, ते व्यावसायिक कसे झाले आहे याचा पानोपानी प्रत्यय येतो. परदेशात परिषदा होतात. शिष्टमंडळे जातात. त्यांची निवड कशी होते यावरही मग प्रकाश पडतो. नैना ही या कादंबरीतले मध्यवर्ती पात्र. ती राजस्थानातल्या पोलीस अधिकाऱ्याची मुलगी. अभयच्या प्रेमासाठी घरच्यांचा विरोध पत्करून ती त्याच्याशी लग्न करते आणि दोघेही दिल्लीत येतात. संसार रेटण्यासाठी नैना पत्रकार बनते. धडाडीमुळे तिची राजकीय वर्तुळात उठबस वाढते. राजकारणातली मुरब्बी माणसे पत्रकाराला बातम्या देतात ते त्यांच्या फायद्यासाठी. ‘त्रिकोण’मध्ये केंद्रीय मंत्री शिवेंद्रराज यांना नैनाचा सहवास हवासा वाटण्यातून लुब्ध होऊन तिला ते बातम्या देतात. याचसाठी नैना ज्युनिअर असी तरी संपादकाला फोन करून ते परदेशातल्या दौऱ्यात तिची वर्णी लावून देतात. पुढे लंडनालाही घेऊन जातात. पण शिवेंद्रराज यांचा आव असा की, तिच्या अडचणीच्यावेळी ते भल्या माणसासारखे मदतीसाठी सदैव तयार आहेत असा. तिला पैसे मिळण्यासाठी ते अनेकांचा विरोध पत्करून पैसे मिळवून देणाऱ्या माहितीपटाचे कामही देतात. मात्र हे सारे तुम्ही का करीत आहात हे नैना कधीच त्यांना विचारीत नाही. माहितीपटाच्या कामात तिच्या कार्यालयातल्या मनोहर मदत करतो. एखाद्या तरुणीसाठी मंत्र्याने नियम वगैरे तोडून कारभार करण्याचा बभ्रा होण्याला वेळ लागत नाही. योगायोग असा की, इकडे राजकीय पटही बदलू लागतो. शिवेंद्रराज हे नैनाला उमेदवारीही मिळवून देतात. पर्यटन मंडळाचे अध्यक्षपदही देतात पण नैना निवडणूक हरते. ते स्वत: निवडून येतात. याच काळात नैना आणि अभय यांच्यात भांडणे होतात, तेव्हा मनोहर तिच्याजवळ येतो. पुरते जाळे पसरल्यानंतर आणि पैशांनी अंकित केल्यानंतर शँपेनच्या नशेत शिवेंद्राज नैनाचा उपभोग घेतात. त्याहीवेळी नैना संतापत नाही. एकेकाळी संघर्षशील असणारी नैना प्रलोभनाच्या भोवऱ्यात सापडून घसरते. तिच्या आयुष्यात सतत तडजोडच येते. त्या तुलनेत तिचा नवरा सुखांना लाथाडत जातो. आशा-आकांक्षा आणि महत्त्वाकांक्षा प्रत्येक माणसाला असावी. पण ती गाठताना फरफट होऊ नये. राजकीय लाभ घेतल्याने नैनाची नोकरी जाते. अभय दूर होतो आणि मनोहरला जवळ करताना मूल होणार नाही यावर डॉक्टरी शिक्कामोर्तब होते. तेव्हा मूल दत्तक घेण्याचा निर्णय नैना घेते. अपघातात शिवेंद्रराज मरण पावतात, पण त्यापूर्वीच त्यांनी इच्छापत्र तयार करून नैनासाठी २५ लाखांची तरतूद केलेली असते. नैनाचे आयुष्य कोठून कोठवर येते याची कहाणी म्हणजे ही कादंबरी. राजकारणातील चढाओढ, कुरघोडी, शह आणि काटशह, डावपेच आणि पत्रकाराला वश करण्यासाठी सरकारी खिरापतीची खैरात आपल्याला अस्वस्थ करते. राजकारणाचे अंगप्रत्यंग किती किळसवाणे असते याची जाणीव ही कादंबरी करून देते. नाईक यांनी घटनांचा मालमसाला ठासून भरलाय. तो वाचकांना भोवंडून टाकेल. ...Read more

  • Rating StarNEWSPAPER REVIEW

    तीन कोनांतून उलगडलेले कथानक… जगणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला स्थळ, माणसं, समाज, वेगवेगळ्या समाज व्यवस्था, घडणारे प्रसंग, घटना, त्यांना प्रतिसाद देणारी स्वत:सहित भोवतालची इतर माणसे यांच्यासह जगण्याचे संदर्भ चिकटलेले असतात. स्थळ-काळ यांच्या बरोबरीनेच रूढसाज व्यवस्था आणि व्यक्तिसमूह यांच्यातील क्रिया-प्रतिक्रिया परस्परांची आयुष्यं घडवीत-बिघडवीत असतात. या सर्व गोष्टींचे जगण्यातून भान येणे आणि त्यानंतरचा नवा भोवताल कसा दिसतो/दिसला याचे चित्रण कादंबरीकार कादंबरीतून करत असतो. व्यवस्थेचे, जगण्याचे, जगताना श्रेयस-प्रेयस काय, यांची जाणीव झाल्यानंतर व्यवस्थेशी तडजोड करणे किंवा व्यवस्थेशी जुळवून घेणेच अशक्य आहे हे समजणे, त्यानंतर व्यवस्थेशी झगडणे, असा जाणिवेचा होणारा प्रवास कादंबरीतून व्यक्त होत असतो. कथानक, वेगवेगळ्या घटना, पात्रे, प्रसंग, पात्रांच्या जाणिवेचा विकास या सर्व घटकांच्या एकरूप रचनेतून कादंबरी आकार घेते. प्रसिद्ध पत्रकार विजय नाईक यांच्या ‘त्रिकोण’ या कादंबरीचे सार जाणून घेण्यापूर्वी कादंबरी या साहित्य प्रकाराचे सामर्थ्य आणि तिच्या रचनेचे वैशिष्ट्य कोणते, हे जाणणे निकडीचे वाटते. या कादंबरीला जागतिकीकरणाच्या रेट्यातील प्रसारमाध्यमे, पत्रकारिता, हितसंबंधाची जाणीवपूर्वक जोपासना करीत यशस्वी होण्याचे, अधिकाधिक पैसा मिळवीत श्रीमंत होण्याचे संदर्भभान लाभलेले आहे. विशिष्ट काल-परिस्थितीमधून बदलणारी जीवनमूल्ये माणसाच्या जगण्याचा ताबा घेतात. आज आपल्यापैकी प्रत्येकाच्या जगण्यावर अधिकार गाजविणाऱ्या लहान-मोठ्या घटना, एका अर्थाने प्रवापतित होऊन जगावे लागत असल्याची जाणीव होणे, याचा अनुभव आपण घेत आहोत. असा व्यापक समकालीन जगण्याचा संदर्भ ‘त्रिकोण’ या कादंबरीला लाभलेला आहे. परंतु लेखकाला जाणवलेला जगण्याचा अर्थ त्याने कादंबरीच्या चौकटीत कसा मांडलेला आहे, जगण्यातल्या प्रसंगांना मोकळेपणाने भिडणे, त्याच्याबरोबर त्यातले बारकावे टिपत, खोलवर जाणवलेला जगण्याचा अन्वयार्थ मांडण्याचा प्रयत्न लेखकाकडून घडतोय काय, या दोन प्रश्नांच्या उत्तरामधून कादंबरीचे यशापयश निश्चित होत असते. या दृष्टीने विजय नाईक यांच्या ‘त्रिकोण या कादंबरीचा विचार करणे आवश्यक आहे. नैना’ ही राजस्थानच्या पोलीस खात्यातील मोहनलाल यांची उच्चशिक्षित मुलगी ही कादंबरीची नायिका आहे. अभयच्या प्रेमापोटी आई-वडिलांची पर्वा न करता ती दिल्लीत येते. संसाराला हातभार लावणे, या हेतूने ती पत्रकार होते. कामाच्या निमित्ताने तिच्या आयुष्यात आलेले पुरुष, व्यवसायात यश मिळविण्यासाठी राजकीय नेत्यांशी तिने सूत जमविणे, त्याच वेळी अभयबरोबर थाटलेल्या संसारात अपयशी होणे, यांचे चित्रण कादंबरीत आलेले आहे. नैनाला वाटणारी मातृत्वाची ओढ, व्यवसायात यशस्वी होण्याची महत्त्वाकांक्षा, व्यक्तिगत आयुष्यात सहचर असण्याची नैनाला वाटणारी गरज अशा तीन कोनांभोवती कादंबरीचे कथानक रचलेले आहे. कादंबरीत वेगवेगळ्या घटना-पात्रे-प्रसंग-उपप्रसंग परस्परांशी संबंधित नाहीत असे वाटणारी प्रकरणे आलेली आहेत. कादंबरीमध्ये फार मोठ्या परिघात विषयसूत्रे विस्कळितपणे पसरलेली आहेत. कथनपर साहित्यकृती रचण्यासाठी लेखकाजवळ आवश्यक असणारी कल्पकता हा घटकही कादंबरींच्या कथानकाच्या रचनेमध्ये आढळून येत नाही. कथानकाची उकल करणे, पात्रांच्या आंतरिक जाणिवेचा प्रवास उलगडत जाणे, या दोन्हींच्या परस्पररचनेतून एकसंध कादंबरी वाचत असल्याची जाणीव ‘त्रिकोण’ कादंबरीतून जोरकसपणे होत नाही. ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

A-AMITABHCHA
A-AMITABHCHA by G.B. DESHMUKH Rating Star
प्रा. डॉ . वैशाली रवी देशमुख, अमरावती

वाचनाचे फायदे सांगताना प्रसिद्ध इंग्रजी लेखक फ्रान्सिस बेकन म्हणतो `रीडिंग मेकेथ अ फुल मॅन`. वाचनामुळे माणूस परिपूर्ण होतो. क्वचित एखादं असं पुस्तक हाती येतं जे वाचल्यानंतर ह्या परिपूर्णतेची , आत्यंतिक समाधानाची जाणीव होते . नुकतंच जी. बी. देशुख यांचं `अ- अमिताभचा` हे पुस्तक हाती पडलं एका बैठकीत ते वाचून संपवलं आणि काहीतरी माहितीपर तरीही दर्जेदार आणि साहित्यिक मूल्य असणारं पुस्तक वाचण्याचा आनंद प्राप्त झाला. सीमा आणि केंद्रीय उत्पादन शुल्क विभागात काम करून निवृत्त झालेल्या जीबी देशमुखांनी २०२० मध्ये अमिताभ बच्चनच्या कारकिर्दीच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त त्यांच्या विविध ५० सिनेमातील भूमिकांचे विश्लेषण करणारे साप्ताहिक सदर दैनिक सकाळ मध्ये प्रकाशित केले. कोरोना काळात लिहिलेल्या या लेखमालेला त्यावेळी प्रचंड प्रतिसाद मिळाला. केवळ ज्येष्ठच नाही तर तरुण वाचकांनीही या लेखमालिकेला पसंतीची पावती दिली. २०२२ मध्ये मेहता पब्लिकेशनने अमिताभ बच्चनच्या एकूण ६२ सिनेमांवर आधारित लेख `अ अमिताभचा` या पुस्तक रूपाने प्रकाशित केले. १९६९ पासून चित्रपटसृष्टीत पदार्पण करणाऱ्या अमिताभ बच्चनच्या कारकीर्दीला पाच दशकांपेक्षा अधिक काळ लोटला तरीही त्याचे सिनेरसिकांच्या भावविश्वावर असलेले अधिराज्य कायम आहे. ती जादू कमी ओसरण्याचं नावच घेत नाही तर ती दिवसेंदिवस वाढत आहे . किरकोळ शरीरयष्टी, भरमसाठ उंची आणि सौंदर्याच्या साचेबंद व्याख्येत न बसणारा चेहरा असलेला अमिताभ आणि त्याला मिळालेली अफाट लोकप्रियता याची सांगड घालणे सर्वसामान्य व्यक्तीच्या आकलनापलीकडचे आहे. अमिताभ बच्चनचे प्रचंड चाहते असलेले जी . बी देशमुख यांच्यासाठी `अ` हा अमिताभचाच आहे. परंतु केवळ एक चाहते म्हणून त्यांनी हे पुस्तक लिहिलेलं नाही तर अमिताभ बच्चनचे जे गारुड कित्येक दशकांपासून प्रेक्षकांच्या मनावर आहे त्यामागची नेमकी कारणे कोणती असू शकतात हे अत्यंत अभ्यासपूर्ण पद्धतीने शोधण्याचा प्रयत्न त्यांनी या पुस्तकात केलेला आहे. एक रसिक, चोखंदळ प्रेक्षक, अभ्यासक आणि समीक्षक म्हणून या पुस्तकात लेखक आपल्या समोर येतात. `बेमिसाल` पासून `झुंड` या चित्रपटा पर्यंत अमिताभ बच्चनच्या कारकीर्दीतील उत्तमोत्तम ६२ सिनेमांचा लेखकांनी या पुस्तकात परामर्ष घेतलेला आहे. या चित्रपटांमधील अमिताभ बच्चनच्या भूमिकेशी संबंधित सर्व बाबींचे अत्यंत अभ्यास पूर्वक रसग्रहण केलेले आहे. `अमिताभ बच्चन चांगला कलाकार आहे` किंवा `अमुक अमुक चित्रपट चांगला आहे` असं जेव्हा एखादा सर्वसामान्य प्रेक्षक म्हणतो त्यावेळेस हे आवडणं किंवा चांगलं असणं नेमकं का आहे याची उत्तरं देण्याचा प्रयत्न लेखकाने प्रत्येक लेखात केलेला आहे. प्रत्येक चित्रपटातील अमिताभ बच्चनच्या भूमिकेशी संबंधित हायलाइट्स जसे की, एखादा उत्कट प्रसंग, गाणे, नृत्य, मारामारीचे दृश्य यावर लेखकाने प्रकाश टाकलेला आहे. आपण जर तो चित्रपट पाहिला असेल तर लेखकाने वर्णन केलेले प्रसंग जसेच्या तसे डोळ्यासमोर उभे राहतात आणि बघितला नसेल तर तो चित्रपट आपण पाहिलाच पाहिजे अशी तीव्र इच्छा मनात निर्माण होते. उदाहरणार्थ, शोले या चित्रपटातील रसग्रहणात ,चेहऱ्यावरचे रेषाही ढळू न देता अमिताभने फेकलेले वन लाइनर्स, बुद्धीची चमक दाखवणारे शांतपणे केलेले विनोद, हळुवार प्रेमासाठी त्याचं आतल्या आत झुरणं , मित्राच्या मांडीवर प्राणत्यागाचे उत्कट दृश्य, आणि पिढ्यानपिढ्या लक्षात राहिलेला मावशी लीला मिश्रा सोबतचा विनोदी संवाद यांचे परिणामकारक वर्णन करून त्यांनी अमिताभची उत्तुंग अभिनय क्षमता उलगडून दाखवली आहे. या पुस्तकाला वाचनीय बनवणारा एक घटक म्हणजे लेखकाने वापरलेली भाषा. अत्यंत साध्या, सोप्या आणि अनुभवातून आलेल्या शब्दातून लेखकाने अमिताभ बच्चन भूमिकांचा उत्तरोत्तर चढत जाणारा आलेख शब्दांकित केला आहे. लेखकाच्या भाषा प्रभुत्वाचे साक्ष देणारी अनेक वाक्य पुस्तकांमध्ये जागजागी आढळतात. एका ठिकाणी ते लिहितात, `अमिताभने सिनेमातील विनोदाची सूत्र हाती घेतली तेव्हापासून विनोदी कलाकारांवर जणू बेकारीचं संकट कोसळलं होतं. प्रेक्षकांना दिलेल्या मनोरंजनाच्या वचनाशी `नमक हलाली` करणाऱ्या प्रकाश मेहरा आणि अमिताभ या जोडीने प्रेक्षकांना `और हम नाचे बिन घुंगरू के` असा आनंद दिला होता. असेच एक सुंदर वाक्य- `अमिताभचा उंट मनोरंजनाचा अख्खा तंबू व्यापून बसला होता`. लेखकाच्या ओघवत्या आणि मनाला भिडणाऱ्या भाषा शैलीचं एक उदाहरण मिली चित्रपटाच्या रसग्रहणातील या परिषदेतून दिसून येत: "शेखरच्या मनावर चढलेली उदासीची पुटं अमिताभच्या कसदार अभिनयामुळे आपल्याला अस्वस्थ,उदास करून सोडतात. दारूच्या नशेतील अमिताभचं एक दृश्य मस्त जमलं होतं . मोबाईल, टीव्ही इत्यादी आधुनिक साधनं व्यवहारात येण्याच्या आधीचा तो काळ होता. मिली आजारामुळे घरात बंदिस्त झाल्यानंतर त्या दोघात नोकराच्या माध्यमातून जो पत्र व्यवहार होतो तो आजच्या मोबाईल चॅटिंग पेक्षाही प्रभावी वाटतो. रोज मिलीला वरच्या मजल्यावरून खालच्या मजल्यावर गुलदस्ता पाठवणारा अमिताभ एका चिठ्ठीत लिहितो `जो गुलदस्ता बनके खुद आ जाऊ तो कहा रखुं . ` हे रोमँटिसिझम खूप वरच्या स्तराचं होतं. अमर्याद दुःखाची वीण घट्ट करत जाताना किशोर कुमारच्या दर्दभऱ्या स्वरात `बडी सुनी, सुनी है जिंदगी ये जिंदगी` आणि `आये तुम याद मुझे गाने लगी हर धडकन` ही दोन गाणी वातावरण औदासिन्यानं भरून टाकतात. मनाचा चांगला पण लहानपणी आई वडिलांच्या बाबतीत घडलेल्या घटनेने आणि लोकांनी त्याकरिता डिवचल्यानं कच खाल्लेला, प्रेमाची आस लागलेला एक तरुण अमिताभने लाजवाब रंगवला होता. या पुस्तकाच्या रंजकतेत भर टाकणारा आणखी एक घटक म्हणजे लेखकाचे आत्मचरित्रात्मक निवेदन. प्रत्येक चित्रपटाच्या बाबतीत तो चित्रपट त्यांनी केव्हा पाहिला, कुणाबरोबर पाहिला,त्यावेळी ते किती वर्षांचे होते आणि त्या चित्रपटाचा त्यांच्या भावविश्वावर कसा परिणाम झाला याचा उल्लेख जागजागी केलेला आहे. लेखकाच्या पिढीतील वाचकांना यातून पुनः प्रत्ययाचा आनंद मिळतो. आणि आजच्या पिढीतील इतर वाचकांसाठीही ही बाब रंजक ठरते. पुस्तकाच्या मलपृष्ठावर लेखक म्हणतात, `1973 साली आम्ही पाचवीत असताना आम्हाला प्रथमच हिंदी सिनेमातील नायकाची `ये पोलीस स्टेशन है, तुम्हारे बाप का घर नही`, अशी आगळीवेगळी मिजास पडद्यावर बघायला मिळाली आणि आता निवृत्तीला आलो तर हाच अद्भुत माणूस आम्हाला `पिंक` या महिलाप्रधान सिनेमात `ना का मतलब सिर्फ ना होता है`, असं ठणकावतो, `बदला` ह्या रहस्यपटात तितक्याच जोरकसपणे `सबका सच अलग अलग होता है ,` असं तत्वज्ञान मांडतो आणि अगदी अलीकडच्या `झुंड` मध्ये झोपडपट्टीतील धटिंगण मुलांच्या घोळक्याला `झुंड नाही, टीम... `म्हणायची शिकवण देतो तेव्हा आजही त्याचं म्हणणं आमच्या हृदयात थेट उतरतं .` पुस्तक वाचत असताना लेखकाच्या अफाट निरीक्षणशक्तीचे आणि अभ्यासू वृत्तीचे दर्शन घडते . विविध दिग्दर्शकांनी अमिताभच्या अभिनयक्षमतेचा केलेला वापर , अमिताभच्या डोळ्यातून सशक्तपणे व्यक्त झालेले हृदयस्पर्शी भाव, वेगवेगळ्या चित्रपटात त्याने केलेला लाथेचा उपयोग, त्याची वैशिष्ट्यपूर्ण नृत्य, आणि भारदस्त आवाजातील संवाद आणि गाणी यांचं वर्णन वाचत असताना लेखकाची संशोधक वृत्ती तर जाणवतेच परंतु आपणही हे चित्रपट पाहून हा रसास्वाद घ्यायलाच हवा ही इच्छा वाचकांच्या मनात प्रकर्षाने निर्माण होते.यातच या पुस्तकाचे फार मोठे यश सामावले आहे हे नक्की! ...Read more

SAAD GHALATO KALAHARI
SAAD GHALATO KALAHARI by MARK & DELIA OWENS Rating Star
मोहन देशपांडे नागपुर

cry of kalahari ह्या पुस्तके अनुवाद हिंदी सर्वोत्तम (RD) मध्ये कित्येक वर्षापूर्वी वाचले होते. माझ्याजवळ, जपून ठेवलेल्या पुस्तकामधे ते पुस्तक गहाळ झाले. मग 4 वर्षापूर्वी हे पुस्तक मिळाले व विकत घेतले. ते अनेक वेळा वाचून काढले, तरी प्रत्येकवेळी वेगळा नंद होतो. ती तुमची रसाळ भाषेची किमया. ह्या मुळेच Deceiption valley एकदा तरी बघता यावी ही इच्छा तुमचे अभिनंदन व धन्यवाद... ...Read more