* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: THE DARK CRUSADER
  • Availability : Available
  • Translators : ASHOK PADHYE
  • ISBN : 9788177665677
  • Edition : 2
  • Publishing Year : JUNE 2005
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 340
  • Language : Translated From ENGLISH to MARATHI
  • Category : FICTION
  • Available in Combos :ALISTAIR MACLEAN COMBO SET- 14 BOOKS
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
A NEW TYPE OF FUEL WAS INVENTED. ENGLAND STARTED MAKING A UNIQUE MISSILE BASED ON IT, BUT ONE BY ONE ALL THE SCIENTISTS WORKING ON IT STARTED DISAPPEARING WITH THEIR WIVES. SOMEWHERE THE SECRET OF THIS PROJECT WAS LEAKING. THE SECRET AGENCY WAS WORRIED ABOUT IT. IT WAS A HUGE PROJECT. THE ENEMIES WANTED TO CONQUER THE WORLD, THEY WANTED THE OWNERSHIP OF THE MISSILE, AND NOW WHEN EVERYTHING WAS ALMOST SET, THERE WAS JUST ONE FLAW, THEY WERE NOT ABLE TO FUSE THE MISSILE. MISSILES, SHIPS, SPYING, FUTURE NUCLEAR WARS, AND THE LUST TO RULE THE WORLD, ALL HAS COME TOGETHER GIVING RISE TO SUSPENSE, ACTION AND HAPPENINGS, YET NOT DEVOID OF A LOVE STORY.
इंग्लंडने एक अभिनव क्षेपणास्त्र तयार करायला घेतले. कारण एका नव्या इंधनाचा शोध लागला होता...... पण त्यांचे शास्त्रज्ञ एकामागोमाग एक गायब होऊ लागले, आपापल्या पत्नींसह!...... कुठेतरी या प्रकल्पाची माहिती झिरपू लागली होती. सारे गुप्तहेरखाते त्रासून गेले...... ती एक मोठी योजना होती. एका शत्रुराष्ट्राची योजना. त्यांना जगावर वर्चस्व हवे होते. ते त्या क्षेपणास्त्रापर्यंत पोहोचू पाहत होते. सर्व काही जमत आले. परंतु क्षेपणास्त्राला फ्यूज घालता येत नव्हता. एक शास्त्रज्ञ त्याचवेळी दूरवरच्या बेटावर पोहोचला. त्याने छडा लावायचा प्रयत्न केला अन् नंतर जो धमाका उडाला तो थरारक भाग वाचताना अंगावर काटे उभे राहतात...... क्षेपणास्त्र, बोटी, हेरगिरी, भावी अणुयुद्धे आणि जगावर सत्ता गाजवण्याची लालसा, एवढ्या सगळ्या गोष्टी एकत्र आल्यावर अ‍ॅक्शन व थरारक घटना जन्म घेणारच. या कठोर पार्श्वभूमीवरती एक नाजूक प्रेमप्रकरण फुलत होते...... अ‍ॅलिस्टर मॅक्लीनच्या या कादंबरीचा तेवढाच सरस अनुवाद आपल्यासाठी सादर करीत आहोत.
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
#MEHTAPUBLISHINGHOUSE #MARATHIBOOKS #SOUTHBYJAVAHEAD #THEDARKCRUSADER #TRANSLATEDBOOKS #ONLINEBOOKS #BIOGRAPHYA&TRUESTORIES #SEAWITCH #PUPPETONACHAIN #MADHAVKARVE #THE SATAN BUG # # THE LAST FRONTIER ##अलीस्टर मैकलिन # अशोकपाध्ये #ASHOK PADHYE # THE DARK CRUSADER #THEGOLDEN GATE #फिअरइजदकी #FEARISTHEKEY #
Customer Reviews
  • Rating StarJyoti Jamnerkar

    I have read it khup chan. Ahe n a. Samajayacha prashnach. Nahi jarur wacha

  • Rating StarM.Mandar

    मी वाचले आहे. हे खूप चांगले पुस्तक आहे. कथा देखील मनोरंजक आहे. फक्त कथा समजणे थोडे जटिल आहे.

  • Rating StarDAINIK LOKSATTA 16-10-2005

    साहसाचा रोमांचक अनुभव... वाचकांना आवडणाऱ्या लेखकांमध्ये अ‍ॅलिस्टर मॅक्लीन याचे नाव आवर्जून घ्यावे असे आहे. वाचकांचे पुरेपूर मनोरंजन तर होईल, शिवाय त्यांना वेगळ्याच प्रकारच्या विषयाचा, जीवनाचा परिचयही होईल अशा प्रकारे मॅक्लीनच्या कादंबऱ्यांची घडण असत. मनोरंजनासाठी वाचन करणाऱ्यांना दोन प्रकारच्या कादंबऱ्यांत विशेष रस असतो. रहस्यमय आणि देमार म्हणजे वेगाने घडणाऱ्या घटना, हाणामाऱ्यांचे प्रसंग, द्वंद्वांची चटकदार, थरारून टाकणारी वर्णने त्यांना पसंत असतात. यातला खलनायक सुरवातीपासूनच वाचकांना माहीत असतो. तरीही कथानायक कशा प्रकारे त्याच्यावर मात करणार याचा अंदाज वाचकाला सहजी येत नाही. जेम्स बाँड या नायकाच्या कादंबऱ्या या प्रकारच्या रहस्यमय कादंबऱ्यात नायकाप्रमाणेच वाचकाही खलनायक वा क्रूरकर्मा, निदर्य पण चतुर आणि अतिमहत्त्वाकांक्षी व्यक्तीची शोध घेतात. तो लागतो तेव्हा वाचकांना काहीसा धक्का बसतो. कारण त्यांची त्या व्यक्तीबाबतची अपेक्षा वेगळीच असते. अ‍ॅलिस्टर मॅक्लीन या दोन्ही प्रकारांचे चटकदार मिश्रण तयार करतो. ‘अधिकस्य अधिकम् फलम्’ या न्यायाने वाचकांना दुहेरी समाधान मिळते. शिवाय आणखी महत्त्वाची बाब म्हणजे या कादंबऱ्यातील प्रतिस्पर्धी जास्त करून बुद्धिमत्तेच्या आधारावर डावप्रतिडाव रचत असतात. त्यामुळे त्यातील बारकावे वेळीच लक्षात आले, तर खलनायकाची ओळख थोडी लवकर पटते, असे असले तरी कथानायक त्या खलपुरुषाचे खरे रूप कसे उघड करतो, हे कुतूहल कायम राहतेच. अनुवादकार अशोक पाध्ये यांनी भाषांतर केलेल्या मॅक्लीनच्या ‘द डार्क क्रूसेडर’ आणि ‘द गोल्डन रॉन्देव्हू’ या कादंबऱ्या नुकत्याच प्रसिद्ध झाल्या आहेत. त्यातील मनोगतात पाध्ये यांनीही मॅक्लीनच्या लेखनाची वैशिष्ट्ये सांगितली आहेत. ते म्हणतात : सुष्ट आणि दुष्ट हा जो अनादिकाळापासूनचा संघर्ष आहे. तोच त्यांच्या (मॅक्लीनच्या) कादंबऱ्यात दाखविलेला असतो. तसे हे नेहमीचेच आहे. कादंबरीतील दुष्ट खलनायक हा प्रस्थापित यंत्रणेवरती अत्यंत चातुर्याने व हुशारीने कब्जा करतो. सरकार, पोलीस, सुरक्षाव्यवस्था या सर्वांना भारी ठरतो. नीतिवान माणसे, त्यांचा प्रामाणिकपणा, शौर्य इ. वर तो अशी काही मात करतो की, प्रस्थापित यंत्रणा हतबल होते, सरकार नमते व हळूहळू त्याच्याकडे विजयश्री माळ घेऊन येते. केवळ एकटा माणूस अक्कलहुशारीने सर्वांचा ताबा घेतो. त्याच्यावर मात करायची, तर तुम्हाला तीच प्रस्थापित यंत्रणा वापरणे भाग आहे. मग ते सरकार असेल, लष्कर असेल, पोलीस दल असेल, नाहीतर सामाजिक व्यवस्था असेल. अन् इथून पुढे मॅक्लीनचे खरे कौशल्य आहे. ज्या यंत्रणेचा ताबा घेतला, त्याच यंत्रणेच्या शस्त्राने त्या खलनायकाशी संघर्ष करायचा ही एक अतिअवघड गोष्ट सच्छिल नायकापुढे असते. मॅक्लीनचे नायक नेहमी आदर्श, सदाचारी असतात. ते लोभाला बळी पडत नाहीत. उराशी बाळगलेल्या नीतितत्त्वांना ते घट्ट धरून असतात. जी माणसे काही नीतिबंधने मानतात, त्यांच्यावर संघर्ष करण्याची पाळी येते, तेव्हा त्यांची खरी कसोटी असते. कारण कसलीही बंधने न पाळणाऱ्या खलनायकाला सर्व शस्त्रे (मार्ग) वापरता येतात, तर नायकाला मात्र ठराविक बंधनाच्या चौकटीत राहून तुटपुंजी शस्त्रे वापरावी लागतात. परंतु अ‍ॅलिस्टरचा नायक हा नेहमीच खलनायकाच्या चातुर्यावरही मात करणारा तीव्र बुद्धिमान असा असतो. बुद्धी हेच त्याचे खरे शस्त्र असते. त्यामुळे या लेखकाच्या कादंबरीत निम्म्या भागापर्यत खलनायकाची चलती असते. त्याच्याविरुद्ध नुकताच कुठे नायक उभा राहत असतो. तराजूचे पारडे पूर्णपणे खलनायकाकडे झुकलेले असते. पण नंतर ते हळूहळू नायकाकडे कलू लागते. या दोघांची खरी बौद्धिक झुंज ही कादंबरीच्या शेवटच्या तीन प्रकरणांत होते. त्या वेळी मात्र दोन्ही पारडी सतत खाली-वर होत असतात. शेवटी विजयश्री नायकाला माळ घालते. तोपर्यंत सततच्या उत्कंठेने वाचकाचा दम उखडत आलेला असतो. ‘नंतर काय झाले असेल’ या उत्सुकतेपोटी तो भराभर पुढे वाचतच जातो आणि पुस्तक संपवून टाकतो. हेच मॅक्लीनचे मोठे यश आहे. कादंबरीत (बहुधा हवी म्हणून) नायिका असते. पण तसे साधे प्रेमप्रसंगही नसतात. प्रणय तर दूरच. कारण सारे महत्त्व खलनायकाचा डाव उधळून टाकण्याला असते. ‘द डार्क क्रुसेडर’ आणि ‘द गोल्डन रॉन्देव्हू’ या दोन्ही कादंबऱ्या बारा प्रकरणांच्या आहेत. मात्र ‘द डार्क क्रुसेडर’ला पूर्वीच्या ‘उपोद्घात’ आणि ‘उपसंहार’ यांच्या धर्तीवर प्रास्ताविक आणि समारोप आहे. आणि तो आवश्यकच आहे असे कादंबरी वाचल्यावर पटते. वाचण्यापूर्वी मध्ये श्री. पाध्ये यांनी कादंबरीच्या नावाबाबत् केलेले विवेचन महत्त्वाचे आहे. कारण त्यात त्यांनी कादंबरीच्या नावाबाबत सविस्तर खुलासा केला आहे. धर्मयुद्ध म्हणजे ‘क्रुसेड’ आणि त्यात भाग घेणारे वीर म्हणजे ‘क्रुसेडर’. पण त्याचबरोबर एखादी मोहीम साध्य करण्यासाठी अनेकांनी सर्व बाजूंनी आपली ताकद, बुद्धी, पैसा वगैरे पणाला लावण्यालाही ‘क्रुसेड’ असे म्हटले जाते. हे कादंबरीच्या संदर्भात ध्यानात घ्यायला हवे. ‘डार्क’ म्हणजे काळा, अंधारी, गडद वा सैतानी नसून तो ‘अचानक काहीतरी कामगिरी करून जाणारा’ म्हणजे इंग्रजीतील ‘द डार्क हॉर्स’ या शब्द प्रयोगात जो अर्थ आहे. तो येथे अभिप्रेम आहे. शत्रूच्या प्रदेशातील लक्ष्याचा अचूक वेध घेणारे जे क्षेपणास्त्र बनविण्यात आलेले असते त्यालाच हे नाव देण्यात मॅक्लीनने मोठी कल्पकता दाखविली आहे. कारण नेमके तेच क्षेपणास्त्र पळविले गेल्याने निर्माण झालेले पेचप्रसंग आणि त्यांची उकल यातच कादंबरीचे कथानक आहे. एकापाठोपाठ एक असे शास्त्रज्ञ गायब होऊ लागतात. त्यामुळे गुप्तहेरखाते सतर्क होते. हा इंधन प्रकल्प यशस्वी झाल्याची बातमी गुप्त न राहिल्यानेच हे घडते. क्षेपणास्त्र पळविले गेले तरी पळविण्याऱ्याला त्यात फ्यूज घालण्याची माहिती नसते. त्यामुळेच शास्त्रज्ञांना वेठीस धरले जाते. या साऱ्याचा छडा शास्त्रज्ञ म्हणून पळविल्या गेलेल्या नायकाला लागलेला असतो. (म्हणूनच त्याची नेमणूक झालेली असते.) जोडीला नायिका शास्त्रज्ञांबरोबर त्यांच्या बायकांचेही अपहरण झालेले असते. क्षेपणास्त्राला फ्यूज लावून ते कार्यान्वित करण्याची जबाबदारी नायकावर पडते. ती तो पार पाडतो? की वेगळी युक्ती करून खलनायकावर मात करतो? क्षेपणास्त्राचे पुढे काय होते? शास्त्रज्ञांची सहीसलामत सुटका होते का? या साऱ्यांची उत्तरे मिळविण्यासाठी ही कादंबरी वाचायला हवी. कादंबऱ्यांची नीटस मांडणी, आकर्षक भाषा, चपखल भाषांतर याने त्या सहजी वाचून पुऱ्या होतात. आपल्या ज्ञानात, माहितीमध्येही भर पडते. कादंबरी वाचताना कथानक खिळविते. कारण या खऱ्या ‘अ‍ॅक्शन थ्रिलर’ आहेत. मॅक्लीनच्या कादंबऱ्यावर चित्रपट बनविले गेले त्याचे हेही एक कारण आहे. कारण बहुतांश वाचकांप्रमाणे प्रेक्षकांनाही असे जागीच खिळून राहायला मनापासून आवडते. तो त्यांना पुरेपूर समाधानही देऊन जातो. हे सारे गुण मान्य करताना हेही लक्षात येते की किशोरवयीन वाचकांच्या हाती या कादंबऱ्या निर्धोकपणे द्यायला हरकत नाही. यातून त्यांची साहसीवृत्ती, वेगळ्या विषयांची बारकाईने माहिती करून घ्यायची वृत्ती वाढेल, बुद्धीचा वापर करूनच अडचणींतून मार्ग काढण्याची सवय त्यांना हवीहवीशी वाटेल हाही एक महत्त्वाचा लाभ आहेच. पण त्याबरोबरच कादंबरी वाचताना त्या भरात न जाणवलेली एक गोष्ट नंतर सावकाश विचार केला की जाणवते. नायकावरील संकटे, त्याच्यावर होणारे अत्याचार, त्याला होणारी मारहाण, दुखापती, त्याची जवळपास विकलांग अवस्था आणि त्या अवस्थेतही त्याने दिलेला लढा, केलेली साहसे ही तशी अतिशयोक्तच. खरेच सांगायचे तर केवळ अशक्य. मनाच्या उमेदीवर, जिद्दीवर कधी कधी माणूस अचाट कामे करतो म्हणतात. ते क्षणभर खरे मानले तरी शारीरिक अवस्था अगदी अगतिक असताना अशी साहसे म्हणजे... नायक ‘सुपरमॅन’सारखा ‘सुपर हीरो’च म्हणायला हवा! पण म्हणूनच तो सर्वांना आवडतो. प्रिय होतो. कारण तसे बनणे हेच तर बहुतेकांचे अंतरात दडवून ठेवलेले स्वप्न असते ना... -आ. श्री. केतकर ...Read more

  • Rating StarDAINIK SAKAL 18-12-2005

    एकाकी गुप्तहेराची चिवट झुंज... साहस कथा, त्यातही संरक्षण दलांवरील कादंबऱ्या लिहिणाऱ्यांत अ‍ॅलिस्टर मॅक्लीन यांचे नाव फार वर होते. त्यांनी स्वत: दुसऱ्या महायुद्धात नौदलात सेवा बजावली आणि नंतर ते जपान्यांच्या कैदेत सुटका झाल्यावर ते कादंबरी लेखनाकडे वाले आणि नौदलाच्या पार्श्वभुमीवर एकापेक्षा एक अशा सरस सतरा कादंबऱ्या त्यांनी लिहिल्या. अत्यंत अचूक निरीक्षण व वाचकाला खिळवून ठेवणाऱ्या शैलीमुळे अ‍ॅलिस्टर मॅक्लीन यांचा खास वाचकवर्ग निर्माण झाला. मॅक्लीन यांच्या कादंबऱ्यांचे वैशिष्ट्य म्हणजे त्यांचे नायक अगदी साधेसुधे; पण चिवट असतात. परिस्थिती त्यांना नेहमीच प्रतिकूल असते आणि हे नायक त्यातूनही मार्ग काढून ईप्सित साध्य करतात. मॅक्लीन यांची ‘द डार्क क्रुसेडर’ ही कादंबरी अशीच आहे. ऑस्ट्रेलियात एका कंपनीत कामाला असलेले अत्यंत बुद्धिमान शास्त्रज्ञ एकाएकी गूढरीत्या नाहीसे होऊ लागतात. ब्रिटनने एक नवे क्षेपणास्त्र तयार करायला घेतलेले असते आणि अत्यंत गुप्त असलेल्या या प्रकल्पावर हे शास्त्रज्ञ काम करीत असतात. या प्रकल्पाची माहिती कोणाला तरी मिळालेली असते आणि त्यांना ते क्षेपणास्त्र हवे असते, शास्त्रज्ञ गायब व्हायला लागल्यावर साहजिकच गुप्तहेर खात्याचे लक्ष तिकडे जाते आणि लंडनमध्ये धावपळ सुरू होते. शास्त्रज्ञाच्या बुरख्याखाली बेटॉल या गुप्तहेराची या मोहिमेसाठी रवानगी होते. सोबत असते मारी होपमन ही दुसरी हेर. न कळत हे दोघे जवळ येऊ लागतात; पण प्रसंगच असे येतात, की बेंटॉलला प्रेम व्यक्त करायला वेळच मिळत नाही. मुख्य काम असते, ते शत्रू शोधण्याचे. सिडनेला जाताना वाटेत उतरवल्या गेलेल्या या जोडीवर अनेक संकटे येतात आणि कुशाग्र बुद्धिमत्तेच्या जोरावर बेंटॉल त्यातून मार्ग काढत जातो. अखेर तो रहस्याच्या मुळाशी पोहोचता आणि हादरतो. सत्य भलतेच निघते. नेहमीच्या शैलीत मॅक्लीन यांनी कादंबरी लिहिली आहे. अशोक पाध्ये यांनी तिचा सरस अनुवाद केला आहे. गुप्तहेरांचे कष्टाचे जग या कादंबरीत दिसते. वेगळे काही वाचणाऱ्यांना ही कादंबरी नक्कीच आवडेल. -प्रतिनिधी ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

HATUMUTUCHA CHANDRA
HATUMUTUCHA CHANDRA by FARUK KAZI Rating Star
परेश जयश्री मनोहर

मराठी बालसाहित्याचा गेल्या काही दशकांचा अवकाश हा सातत्याने प्रबोधनपर, उद्बोधनपर आणि कोणत्याही कथेच्या शेवटी एका वाक्यात तात्पर्य सांगणाऱ्या बाळबोधकथांचा राहिलेला आहे. या बाल साहित्यामध्ये प्रामुख्याने येणारे पात्र ही मध्यमवर्गीय, उच्च जातीय मराठी घरतील मुलं मुली असतात आणि जेव्हा केव्हा वंचित समाजातील, शोषित समाजातील, गरीब ग्रामीण घरातील मुलांचे चित्रण येतं तेव्हा ते अति दुःखी आणि बिचारे, ज्यांना मदतीची गरज आहे आणि अशी मदत करण्याची जबाबदारी मोठ्या घरातील उच्चवर्णीय, उच्चवर्गीय नायक मुला मुलींची असते. त्यातूनही प्रामुख्याने काय करावे काय करू नये किंवा तत्सम उपदेशच प्रामुख्याने कथेच्या शेवटी केलेले दिसतात. आणि हा लेखक वर्ग ही प्रामुख्याने पुणे मुंबई भागात स्थिरावलेला राहणारा तिथल्या अनुभूती आणि तिथल्या जगण्याचा अवकाश सोबत घेऊन येणारा असतो. अशा सगळ्या पार्श्वभूमीवरती सोलापूर जिल्ह्यातल्या सांगोला तालुक्यात अनकढाळ सारख्या एका छोट्या गावात राहणारा फारुक काझी हा लेखक जेव्हा गेलं दशकभर कवितांमधून, कथांमधून बालविश्व चितारण्याचा प्रयत्न करतो तेव्हा ते जास्त करून ग्रामीण भागातील मातीशी जोडलेलं असतं. आपल्या भोवतालच्या खऱ्याखुऱ्या मुलांमुलींच्या भावविश्वाच्या जवळ जाणारं चित्रण त्याच्या कथांमधून आपण सातत्याने बघत असतो. त्याचे "शिकण्याच्या वाटेवरील आनंदवन" हे पहिले पुस्तक एका प्रयोगशील शिक्षकाच्या शाळेतील अनुभवांवर आधारलेले आहे. त्यांचे आजवर मित्र, प्रिय अब्बू, चुटकीचे जग हे कथासंग्रह प्रकाशित झालेले आहेत. या सगळ्याच पुस्तकातून त्याने सातत्याने ग्रामीण, निमशहरी भागातील कनिष्ठ मध्यमवर्गीय आणि गरीब कुटुंबातील बहुजन आणि वंचित घटकातील, मुस्लिम कुटुंबातील मुलांच्या नजरेने दिसणाऱ्या गोष्टी टिपण्याचा प्रयत्न केलेला आहे. यात कुठेही गरिबीचे गोडवे नाहीत की काठोकाठ पसरलेलं बिचारेपण नाही. तर या आर्थिक दृष्ट्या नागवलेल्या लोकांच्या घरातील मुलांच्या कथा आहेत, ज्यात प्रेम, उत्सुकता, जिद्द, समजून घेणे आणि अनुभवातून आलेलं शहाणपण हे प्रामुख्याने जाणवते. अभावग्रस्तता, एखाद्या गोष्टीचे नसणे, तरीही नातेसंबंधांवरील विश्वास, प्रेम आणि एकमेकांबद्दलचा आदर, काळजी घेऊन जपणारी कुटुंबं फारुकच्या लिखाणात सातत्याने येत राहतात. त्याचा आत्ता आलेला हाटूमुटूचा चंद्र हा एक अफलातून कथासंग्रह आहे. यामध्ये फारुकने वेगवेगळे प्रयोग केलेले आहेत जे त्याच्या नेहेमीच्या लेखन शैलीपेक्षा जरा वेगळ्या अंगाने जाणारे आहेत आणि ते उत्तम जमून आलेले आहेत. या दहा कथांमधल्या पहिल्या तीन कथा या मुलांच्या नजरेतून होणारा पर्यावरण विनाश, निसर्गाची भाषा समजून घेण्याचा मुलांचा प्रयत्न आणि नुसते समजून घेणे नाही तर मुलानी आपले हे जग आपण नीट ठेवण्यासाठी केलेले प्रयत्न असे ही आहे. यात आनंद शोधण्याचे मार्ग, जबाबदारीचे असणारे भान आणि काल्पनिक ग्रहाची भेट करवून आणणारी समायरा आपल्याला भेटते, तर मोकळ्या हवेत असणारा आनंद भरुन कसा घेणार असा प्रश्न विचारणारा अर्पित ही भेटतो आणि तसेच टेकडी स्वच्छ करण्यासाठी न थकता प्रयत्न करणारे ओजस आणि रेहान ही भेटतात. लहानपणी न कळत्या वयात चिंचेवरच्या माकडाला तोटा फेकून मारणारा आणि त्या माराची मनावर झालेली जखम मोठा झाल्यावरही मनावर कोरलेला योगेश, आपल्या लाडक्या लहानग्या मैत्रिणीसाठी व्याकुळ होऊन रोज दारावर धडका देणारे शाहताब अस्वल आपल्याला अस्वस्थ करुन जातात. एका कथेत तर चक्क सायकल ही कथेची नायिका आहे आणि तिच्या सुखाच्या आणि नाराज होण्याच्या अनुभवातून आपणही तिच्यासोबत प्रवास करतो. इथे आपण बाबांच्या अपघाताने अस्वस्थ असणाऱ्या सारंगा सोबत त्या दवाखान्याच्या बाहेर येरझारा घालत असतो आणि अमृताच्या मैतरासोबत मेंढक्या बनून रानावनात चालत असतो. गावात फिरताना, गावाला पडणारं हिरवं स्वप्न अनुभवणारा मंदार आपल्या भेटतो आणि सोबतच गावात राहणारी आणि तुमच्या शहरालाही स्वप्न पडतच असेल की रे? काय असेल ते स्वप्नं? असा प्रश्न विचारणारी चंदा हाच प्रश्न आपल्यालाही विचारते असा भास आपल्याला होतोच होती. शाळेच्या ट्रीपला जायला हजार रुपये नाहीत म्हणून रुसलेल्या साक्षीला बघताना आपणही आपल्या लहानपणी अशा बुडालेल्या शाळेच्या सहली, आणि त्यावेळी आपल्या आईबाबांनी आपल्याला काय सांगितलं होतं आणि कशी आपली समजूत काढलेली हे आठवून आपलेही डोळे ओलसर होताना अनुभवतो. पण याही कथेत निंबोणीच्या पानांमधून दिसणारा, भासणारा तो चंद्र जो हाटूमुटूचा आहे पण त्याला बघून होणारा आनंद मात्र अस्सल आणि खराखुरा आहे. या सगळ्या कथांमधून फारुक ने आजच्या मुलामुलींना आपल्यासमोर उभं केलं आहे, त्यांचे प्रश्न, त्यांच्या विचार करण्याच्या पद्धती आणि त्याचं अस्वस्थ असणं अगदी नेमकेपणाने आपल्यासमोर येतं. ही मुलं कोणत्याही एका शहरातली, एका भागातली किंवा एकसारख्या घरातली नाहीत पण त्यांचे जगणे हे आजच्या मुलांचे जगणे आहे. फक्त एक प्रश्न मनाला पडतो की आपल्या भोवतालच्या प्रश्नांनी, आपल्या गरिबीने किंवा अभावाने काळवंडलेली मुलं जेव्हा समजूतदारपणे स्वतः शहाणे बनत पुढे निघतात तेव्हा, ही सगळं कोणामुळे, आणि माझ्याच वाट्याला का? याचे जबाबदार कोण असा एखादा प्रश्न एकाही मुलाला पडू नये याची काळजी वाटते. येत्या काळात फारुक च्या कथांतील ही मुलं तुम्हाला मला हे प्रश्न विचारतील याची खात्री आहे आणि मी त्या दिवसाची वाट ही बघतो आहेच. या पुस्तकातील चित्रांचा विशेष उल्लेख करणे फारच महत्वाचे आहे. चंद्रमोहन कुलकर्णी ज्या ताकदीने कथेची भावना नेमक्या कुंचल्यात पकडतात ते बघताना आपण निव्वळ थक्क होतो. इतकी सुंदर आणि मनाला धरुन ठेवणारी चित्रं या पाना आपल्याला भेटत राहतात. इतक्या ताकदींच्या कथांचे पुस्तक मेहता प्रकाशनाने अत्यंत प्रेमाने आणि उत्तम निर्मितीमूल्य जपत काढलेले आहे. आज आपला भोवताल इतका जातधर्म, पर्यावरणीय नाश आणि भविष्याच्या चिंतांनी कुरतडलेला असताना अशा खऱ्याखुऱ्या मुलांच्या कथा आपल्यासमोर येणं हाच आपल्याला दिलासा देणारा आपला हाटूमुटूचा चंद्र आहे...हा असाच राहो... परेश जयश्री मनोहर ...Read more

HATUMUTUCHA CHANDRA
HATUMUTUCHA CHANDRA by FARUK KAZI Rating Star
बालाजी मदन इंगळे

संवेदनशीलतेने लिहिलेल्या तरल बालकथा : हाटुमुटूचा चंद्र मराठीमध्ये जाणीवपूर्वक आणि विचारपूर्वक बालसाहित्य लिहिणाऱ्यांची संख्या खूप कमी आहे. बालसाहित्य आणि बाल मानसशास्त्र यांचा विचार करून आपली प्रतिभा त्यासाठी वापरणाऱ्या मोजक्या बालसाहित्यिकांमध्य फारूक एस. काझी यांचे नाव समाविष्ट करावे लागेल. त्यांच्या नुकत्याच प्रकाशित झालेल्या मुलांसाठीच्या ‘हाटूमुटूचा चंद्र’ या कथासंग्रहातून ही बाब ठळकपणे अधोरेखित होते. कथा म्हणजे केवळ प्रसंगानंतर प्रसंग किंवा घटनेनंतर घटना मांडणे नसते. त्यामध्ये लेखकाच्या प्रतिभेने वास्तव आणि कल्पना यांचा सुरेख संगम घडवून आणावा लागतो. कुठलीही कथा लेखकाला त्याच्या अनुभव विश्वातूनच सापडलेली असते. पण ते अनुभव विश्व मांडत असताना त्यात आपल्या प्रतिभेने काही साहित्य गुण समाविष्ट करावे लागतात. तेव्हा ती कथा साहित्यिकदृष्ट्या अभिजात व साहित्य गुणांनी युक्त अशी कथा होते. या संग्रहातील कथांमध्ये अशा साहित्यिक प्रतिभांच्या बऱ्याच जागा आहेत. आणि म्हणूनच फारूक एस. काझी यांच्या कथा रोजच्या जगण्यातीलच असल्या तरी त्यातील साहित्य गुणांमुळे या कथा आपले वेगळेपण सिद्ध करतात. कथेमध्येही काव्यात्मकता असते. प्रतिकात्मकता असते. आणि त्यामुळेच ती कथा वैश्विक ठरत असते. हे सर्व गुण ‘हाटुमूटुचा चंद्र’ मधील कथांमध्ये आढळून येतात. म्हणून ही कथा महत्त्वाची आहे. अद्भुतरम्यता, काल्पनिकता आणि धक्का तंत्र याने लिहिलेल्या कथा नेहमीच मुलांना आवडतील असे नाही. आपल्याच अवतीभवती घडणाऱ्या घटना इतक्या सुंदर असू शकतात हे मुलांना वाचायला आवडते. नेमके तेच या कथांमध्ये आहे. या बालकथा या मातीतल्या आहेत. या संस्कृतीतल्या आहेत. म्हणून त्या महत्त्वाच्या आहेत. या संग्रहात एकूण दहा कथा आहेत. सर्वच कथा सुंदर आणि हृदयस्पर्शी आहेत. ‘फिकर नॉट’ या कथेमध्ये दोन मित्रांचे काही प्रसंग आहेत. रेहान आणि त्याचा मित्र अर्पित. दोघे एका टेकडीवर जातात. रेहानसाठी टेकडीवरील अनुभव नवीन असतो. दोघे खूप गप्पा मारतात. तळ्यात पाय सोडून बसतात. तिथे बसल्यानंतर त्या तळ्यातील काही मासे आपण बाटलीत घेऊन जावे असे रेहानला वाटते. पण अर्पित त्याला सांगतो की आपण या टेकडीवरून काय घेऊन जायला हवं तर या टेकडीवरील वातावरण, टेकडीवरील दृश्य, इथे आपण घेतलेला आनंद हे सगळे मनात भरून घेऊन जायला हवे. असं मुक्या प्राण्यांना त्रास द्यायचा नाही, हे नकळतपणे तो रेहानला सांगतो. रेहानलाही ते पटतं आणि मग तो खोल श्वास घेऊन इथल्या सगळ्या आनंदाच्या आठवणी मनात भरून घेतो. आणि निघतो. एखादा कोणी अन्य बालकथा लेखक असता तर या दोघांचं बोलणं, टेकड्यावरील वर्णन, दोघांनी केलेली मज्जा, त्यांनी केलेल्या गमती याचे वर्णन करून कथा संपवली असती पण फारूक काझी यांनी इथून काय घेऊन जायचं? हे लिहून जे एक नवीन वळण कथेला दिलेले आहे, इथेच या कथेतील साहित्यगुणाची जागा आहे. तिथेच कथा लेखक म्हणून फारूक काझी यांची प्रतिभा आपल्याला दिसून येते. आणि बालसाहित्यिक म्हणून त्यांचं वेगळेपणही इथेच आपल्याला दिसतं. ‘कर के देखो’ या कथेमध्ये ट्रेकला गेलेली मुले स्वच्छता दूत कशी बनतात हे मुळातून वाचण्यासारखे आहे. ‘जखम’ या कथेमध्ये इयत्ता तिसरीत शिकत असताना एका माकडीनीला आपण इजा पोहोचवल्याचं मोठं झाल्यावर कथेतील नायकाला आठवतं. आणि तो मोठा असूनही लहानांसारखं रडत रडत ती चूक आपल्या आईकडे कबूल करतो. ही कथा वाचताना पाषाणहृदयी माणूसही भावनिक होऊन जातो. कडूनिंबाच्या झाडाचे खाली पडलेले पान चंद्राची प्रतिमा म्हणून म्हणजेच हाटुमूटुचा चंद्र म्हणून कथेत वापरणे. आणि तो चंद्र कथेतील साक्षीच्या चेहऱ्यावर आनंदाचे प्रतिक म्हणून येणे. आणि त्याद्वारे सहलीला जाण्यासाठी पैसे न मिळाल्याच्या दुःखातून स्वतःला सावरणे ही सगळीच मांडणी भन्नाट झाली आहे. अशा भरपूर जागा या पुस्तकांमध्ये आहेत. ‘हिरवं सपान’ या कथेमध्ये शहरातला मंदार गावाकडे येतो. आणि गावातील चंदा सोबत शेत-शिवारात फिरतो. या शेत-शिवारातील भरपूर झाडे पाहून बी, रोपटं, मग त्याचं झाड ही क्रिया किती महत्त्वाची आहे. आणि या क्रियेचं स्वप्न नेहमीच गावाला पडतं. तसंच हिरवं स्वप्न शहराला का पडत नाही? हा प्रश्न खरंतर लहान-मोठ्या प्रत्येक वाचकाला अस्वस्थ करून जातो. ‘स्वप्न’ ही आणखी एक सुंदर कथा या संग्रहामध्ये आहे. माणसाला अभावातूनच वस्तूंची किंमत कळत असते. ज्याच्याकडे सर्व काही आहे अशा मुलाकडे जेव्हा सायकल येते, तेव्हा तिची काळजी घेतली जात नाही. पण स्वप्नातही ज्याच्या कधी सायकल मिळेल असं वाटत नव्हतं अशा अंकितला जेव्हा सायकल मिळते, तेव्हा तो तिची किती काळजी घेतो आणि हेच त्या सायकलचे स्वप्न होते. आणि अंकितचेही तेच स्वप्न होते ही स्वप्नांची सरमिसळ वाचकांना खूपच आवडून जाते. ‘मैतर’ ही आणखीन एक अनोळखी नातेसंबंध घट्ट करणारी कथा. फक्त काही दिवसांसाठी आलेल्या मेंढक्या काकाची आणि अमृत ची मैत्री होते. आणि ती मैत्री त्या दोघांमध्ये इतकी घट्ट होते की, मेंढक्या काका आपली मेंढरं घेऊन परत निघाल्यावर दोघांनाही एकमेकांचा निरोप घ्यावा असे वाटत नाही. निरोपावेळी दोघांच्याही डोळ्यात पाणी येते. दोघेही निरोपावेळी एकमेकांना भेटवस्तू देतात. हा प्रसंग लेखकाने स्थानिक संदर्भ, संस्कृती, भाषा आणि चित्रदर्शी स्वरूपात असा उभा केला आहे की, वाचक कथा संपली तरी त्या मेंढरांच्या कळपामध्ये आणि अमृतच्या घराच्या आसपासच घुटमळत राहतो. ‘जाऊ दे त्याला’ ही आणखीन एक भावस्पर्शी कथा. जंगली प्राण्यांनाही जीव लावला तर ते माणसांशी प्रेमाने वागतात हे सांगणारी ही कथा वाचकाच्या काळजाचा ठाव घेते. निधी आणि फॉरेस्ट ऑफिसर असलेले तिचे बाबा यांची ही कथा जंगलाच्या दुनियेत वाचकाला घेऊन जाते. पण तिथेही मानवी भावना कशी श्रेष्ठ ठरते हे अतिशय रंजक पद्धतीने लेखकाने लिहिले आहे. ‘बाबांची भाषा’ ही आणखी एक हृदयाला स्पर्श करणारी कथा! शाळेत शिकणारा सारंग अपघातात ऐकणं आणि बोलणं कायमचं गमावलेल्या आपल्या बाबांसाठी हातवाऱ्याची भाषा शिकून घेतो. हे जेव्हा वाचकाला कळतं तेव्हा वाचक जागच्याजागी स्थिर होऊन जातो. ‘एस पी १३’ ही आधुनिक तंत्रज्ञानात घेऊन जाणारी कथा! छोटीशी समायरा स्पेसशीप घेऊन एका नव्या प्लॅनेटवर जाते. आणि त्या नव्या प्लॅनेटवर असलेली माणसं कशी निसर्गाची काळजी घेतात हे पाहून समायरा तिथेच राहण्याचा निर्णय घेते. तेव्हा तिच्या सायंटिस्ट मामासह वाचक ही अचंबित होऊन जातात. निसर्ग आणि आधुनिक तंत्रज्ञान यांचा सुरेख आणि अफलातून संगम या कथेमध्ये लेखकाने घडवून आणला आहे. या पुस्तकाची महत्त्वाची बाजू म्हणजे यातील चित्रे! चंद्रमोहन कुलकर्णी यांची चित्रे या कथेला एक वेगळा आणि नवा आयाम देतात. ही चित्रे या कथेशी एवढी एकरूप झालेली आहेत की ही चित्रे वेगळी काढली तर या कथा अपूर्ण वाटतील! कथेला अनपेक्षित वळण देण्यामध्ये लेखक पटाईत आहेत. हे प्रत्येक कथेतून आपल्याला जाणवतं. आपण सरळ कथा वाचत जातो. आणि कथा देखील आता सरळ या वाटेने जाईल असे वाटत असताना ती कथा असं काही वळण घेते की वाजक स्तंभित होऊन जातो. आणि हीच खरे तर फारूक एस. काझी यांची खरी ताकद आहे. त्यांच्या सर्व कथांमधील पात्र आणि त्यांची नावे पाहिली तर ती विशिष्ट अशी पात्रे किंवा नावे नाहीत. तर सर्वसमावेशक अशी सर्व पात्रे आहेत. त्यामुळे किती तीव्र सामाजिक भान लेखकाला आहे हेही आपल्याला जाणवते. आजच्या सोशल मीडियाच्या काळात नातेसंबंध दूरावत असताना, नातेसंबंध दृढ करणाऱ्या या कथा प्रत्येक वाचकांपर्यंत पोहोचल्या पाहिजेत. या कथांमध्ये कल्पनाशक्ती आहे. वास्तवता आहे. पण याच्या जोडीला कथालेखक म्हणून जी एक संवेदनशीलता लागते, जी एक तरलता लागते आणि मुलांच्या कथांमध्ये जो एक हळुवारपणा आणि नाजूकता आवश्यक असते ते सगळे गुण या कथेमध्ये ओतप्रोत भरलेले आहेत. म्हणून या कथा फक्त लहानच नाही तर मोठ्यांनाही गुंतवून ठेवणाऱ्या आहेत. स्थळ आणि काळानुसार बदलणारी भाषा आणि प्रसंगानुसार बदलणारं वर्णन या कथेच्या जमेच्या बाजू आहेत. यामुळे या कथा वाचकाला पकडून ठेवतात. आणि काही एक सामाजिक भान आणि साहित्यिक जाण या कथा देतात. आणि हेच या कथेचे मोठे यश आहे. - बालाजी मदन इंगळे ...Read more