* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: PRASTHAN
  • Availability : Available
  • ISBN : 9788184980936
  • Edition : 3
  • Publishing Year : JANUARY 2010
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 168
  • Language : MARATHI
  • Category : FICTION
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
IN EVERY MIND ITSELF IS THE GREAT HIMALAYAS AND THE BLUSTERING STORM. THE HAPPINESS AND THE SADNESS BOTH ATTACK YOU LIKE A STORM. THEY SHRED YOUR PERSONALITY INTO PIECES. BUT PRANAV, JUST REMEMBER WELL, WHEN THE SHIP GETS CAUGHT INTO A STORM, IF THE CAPTAIN OF THE SHIP IS IN A DILEMMA THEN HE SEES THE "EYE OF THE STORM`. YOU MAY CALL IT THE FOCUS OF THE STORM. IT IS REALLY VERY PEACEFUL AT THE CENTER OF THE STORM, UNBELIEVABLY. ONCE THE SHIP IS TAKEN TO THE EYE OF THE STORM THEN IT REMAINS SAFE. JUST LIKE THIS, WE HAVE TO CREATE AN EYE OF THE STORM IN A CORNER OF OUR MIND, DEEP WITHIN US, SO STILL, SO UNSPOKEN, SO SAFE, IN CASE OF ANY STORMY SITUATION IN OUR LIFE, WE SHOULD BE ABLE TO EASILY RETREAT TO THIS PORTION OF OUR MIND. SUCH A CORNER CAN BE CREATED, ONLY THING IS WE HAVE TO MAKE EFFORTS FOR IT. WE HAVE TO INVOLVE OURSELVES DEEPLY INTO SOME FORM OF MEDITATION OR SOME WORK, GET ENGROSSED COMPLETELY, FORGETTING THE TRUE SELF. THIS IS ALSO A FORM OF LIFE.
निश्चल उभा हिमालयही असतो. हे सुख-दु:ख अंगावर चालून येतं. वादळासारखं! व्यक्तिमत्त्वाच्या चिंध्या करत, पण एक लक्षात ठेव प्रणव, समुद्री वादळात जेव्हा जहाज अडकतं आणि कॅप्टन गोंधळतो, तेव्हा त्याला `आय ऑफ स्टॉर्म’ दाखवला जातो. त्या वादळाचा मध्यिंबदू म्हण. त्या मध्यिंबदूत नीरव शांतता असते. अगदी आश्चर्यकारकरित्या. जहाजाला त्या `आय ऑफ स्टॉर्म’मध्ये नेलं की जहाज सुरक्षित राहातं. तसंच अंतर्मनात एक कोपरा एवढा निश्चल, निवांत निर्माण करावा लागतो की आयुष्यात कितीही वादळं आली तरी त्या क्षणी मनाला त्या कोप-याचा आसरा घेता यायला हवा. असा कोपरा प्रयत्नानंच निर्माण करता येतो. स्वत:ला विसरून, विखरून, ध्यानात किंवा एखाद्या कामात. हे जीवनाचं रूप आहे.
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
"#MARATHIBOOKS#ONLINEMARATHIBOOKS#TRANSLATEDMARATHIBOOKS#TBC#TRANSLATEDBOOKS@50% #PRASTHAN #PRASTHAN #प्रस्थान #FICTION #MARATHI #REKHABAIJAL #रेखाबैजल "
Customer Reviews
  • Rating StarSAMACHAR MAIFIL 28-02-2010

    अंतःकरणाचा ठाव घेणारी कादंबरी… रेखा बैजल यांची ओळख कादंबरी, कथा, कथाकथन, चित्रपटांच्या लेखिका तसेच कवयित्री म्हणून मराठी वाचकाला आहे. प्रस्थान ही त्यांची नवी कादंबरी. गेल्या दहा वर्षात झालेले सामाजिक बदल, त्यात गुंतून गेलेली तरुण पिढी अनेक सुविधा असानाही मनात असणारी अस्वस्थता एकीकडे चंगळवादी मनोवृत्ती तर दुसरीकडे वेळ मिळत नसल्यामुळे होणारी भावनिक कोंडी या आणि अशा अनेक प्रश्नांसमोर तरुणपिढी हतबल होऊन उभी राहत आहे. विभक्त कुटुंबामुळे सामाजिक, कौटुंबिक आणि महत्त्वाचे म्हणजे मानसिक, भावनिक दबावाचा निचरा होण्याचे साधन संपुष्टात आले आहे. अशा परिस्थितीत भावनाशून्यता निर्माण होत होत ही पिढी केवळ भौतिकवादी होते आणि सहनशक्ती संपलेल्या या व्यक्ती आयुष्यात घटस्फोटासारख्या दुर्दैवाला सामोरी जावी लागते. काँटॅक्ट मॅरेज, वन पॅरेंटल सिस्टिम, क्रेश, वृद्धाश्रम हे कुटुंबव्यवस्थेत शिरलेले व्हायरस असून कुटुंबव्यवस्था यामुळे संपुष्टात येते. या सगळ्या परिस्थितीत एखादी भावनिकदृष्ट्या तरल असणारी तसेच मानसिक गरजांची ओढ अधिक असणारी व्यक्ती सापडली तर तिची अवस्था कशी होईल याचे चित्रण प्रस्थान या कादंबरीत केले आहे. एकादृष्टीने असफल असली तरी सफल प्रेमाची ही प्रेमकथा आहे. यातील व्यक्तिरेखा ठळकपणे वाचकांसमोर येत जातात. प्रणव, मेघना, रोहन, वर्षा, मार्था यांच्या जीवनप्रवासाची एकाच वेळी सुस्थिरता आणि भावनिक पातळीवरची भयानकता स्पष्ट करत जातात. कादंबरीचे सार सांगताना मनातल्या घोंगावणाऱ्या वादळाला त्याचबरोबर अचल असणाऱ्या हिमालयाच्या शिखराला आपण कसे स्थान देतो यावरून व्यक्तीची ओळख घडते. सुख-दुःखं अशाच प्रकारे जीवनात चालून येत असतात. समुद्रात जहाज जेव्हा भरकटते तेव्हा कॅप्टन गोंधळतो. अशा गोंधळलेल्या परिस्थितीत त्याला आय ऑफ स्टॉर्म दाखवला जातो. हा वादळाचा केंद्रबिंदू त्याला दिसल्यावर एक गोष्ट लक्षात येते. त्या मध्यबिंदूत आश्चर्यकारक शांतता असते आणि तिथे जहाज नेले की ते सुरक्षित राहणार असते. असाच मनाचा एक कोपरा आपण निर्माण केला की, आयुष्यात कितीही वादळे आली तरी त्या कोपऱ्याचा आश्रय घेतला की, आपण ती वादळं समर्थपणे परतून लावू शकतो. परंतु, हा कोपरा प्रयत्नपूर्वक निर्माण करावा लागतो. रेख बैजल यांनी प्रस्थानमधून हा कोपरा अत्यंत नेटक्या स्वरूपात उभा केला असून जीवनाचे प्रतिबिंब त्यात पाहावे असेच आहे. मेहता पब्लिशिंग हाऊसच्या या कादंबरीस चंद्रमोहन कुलकर्णी यांचे तेवढेच समर्पक मुखपृष्ठ लाभले आहे. ...Read more

  • Rating StarAPALA MAHANAGR 02-05-2010

    कुटुंब व्यवस्थेचे व्हायरस… मुलांचं काय करायचं? आई-वडिलांना कुठे ठेवायचं? लाईफ पार्टनर कुठवर साथ देणार? असे प्रश्न आता प्रत्येकाला भेडसावू लागले आहेत. सोबत संपन्नताही आहे. आर्थिक स्थैर्य आहे. या सगळ्या परिस्थितीत एखादी भावनिकदृष्ट्या तरल असणारी, मानसक गरजांची ओढ अधिक असणारी व्यक्ती सापडली तर तिची अवस्था कशी होईल याचं रेखाटन लेखिकेने या कादंबरीत केलेलं आहे. ही एक असफल असूनही सफल प्रेमकथा आहे. ...Read more

  • Rating StarSAKAL 28-03-2010

    गेल्या पिढीला जे आयुष्याच्या शेवटी मिळालं, ते आताच्या पिढीला सुरवातीलाच मिळतं, पण यातून वाढला आहे वेग आणि कमी झाला आहे परस्परांसाठीचा वेळ. यात एखादी तरल मनाची व्यक्ती सापडली, तर काय होईल याचं हे चित्रण केलं आहे रेखा बैजल यांनी.

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

RAZOR SHARP
RAZOR SHARP by ASHWIN SANGHI Rating Star
सुनील माने, पुणे

लेखक अश्विन सांघी “द रोझाबल लाइन” या पहिल्याच कादंबरीने खूप लोकप्रिय झाला. प्राचीन भारतीय दंतकथा/ऐतिहासिक संदर्भ घेऊन त्याच्याभोवती आजच्या काळात रहस्यपूर्ण कथा लिहिणारा अश्विन. Chanakya’s Chant, The Krishna Key, The Sialkot Saga, Keepers of the Kalacakra, The Vault of Vishnu, The Magicians of Mazda अशा एकापेक्षा एक सुंदर रहस्य कादंबर्या “भारत सिरीज़” नावाने खूप प्रसिद्ध झाल्या. या सर्व कादंबऱ्या मी इंग्लिश मधेच वाचल्या. यांचा मराठी अनुवाद मेहता पब्लिशिंग हाउस यांच्याकडे उपलब्ध आहे. अश्विन सांघीने या भारत सिरीज शिवाय एक नवीन थ्रिल्लर सिरीज (कुत्ता कदम) सुरू केली आहे. त्यांतील पहिली कादंबरी Razor Sharp. एक सिरियल किलर मुंबईत एकानंतर एक खून पाडतोय. पोलिस चक्रावले आहेत. 1. रविवार दि २ फेब्रुवारी , गोरेगाव पश्चिममधे रवि मेहराचा खून होतो. त्याची बायको खुशी कॅाल सेंटरचा जॅाब करून रात्री ११.३० ला परत येते. खूप वेळा बेल वाजवून दार न उघडल्यामुळे ती उघडून आत येते तर रवि रक्ताच्या थारोळ्यात मरून पडलेला असतो. त्याचे हात पाठीमागे नायलॅान दोरीने बांधलेले असतात. त्याच्या छातीत सुरा खुपसलेला असतो. त्याच्या तोंडात काहीतरी खाद्य पदार्थ असतो. 2. सोमवार दि १० फेब्रुवारी , लोअर परळमधे सुचंद्रा अग्रवालचा खून. तिची कामवाली आल्यावर दार न उघडल्यामुळे सोसायटीवाले दार तोडतात. आत सुचंद्राचा खून झालेला. हात नायलॅान दोरीने मागे बांधलेले, छातीमधे चाकू खुपसलेला, तोंडात काहीतरी खाद्यपदार्थ. पोलिस चक्रावलेले. मग पोलिसखाते जागे होते. त्यांचा नावाजलेला अधिकारी जो सस्पेंड झालेला आहे, त्या प्रकाश कदम, DCP याला बोलावले जाते. राज्याचे गृहमंत्री ओंकार लोखंडे, त्यांचा माणूस कमिशनर चव्हाण आणि उपगृहमंत्री जयंत गायकवाड व त्यांचा माणूस SCP राणे, मुंबईचा डॅान भाऊ पाटील जो लोखंडेचाच माणूस असतो, हे सर्व या केसच्या मागावर लागतात. कदम हा राणेंच्या ओळखीचा खास ऑफिसर असतो म्हणून त्यालाही इन्व्हेस्टीगेशनला बोलावले जाते. 3. मंगळवार दि १८ फेब्रुवारी , ठाणे येथे मंगला शहाचा खून. तिच्या शेजारणीमुळे हे कळते. मंगलाचे हात नायलॅान दोरीने पाठीमागे बांधलेले, छातीमधे चाकू खुपसलेला, तोंडात खाद्यपदार्थ. पोलिस अधिकारी शिंदे कदमबरोबर येतात. मंगलाच्या चेहऱ्याजवळ कदमला पेस्टिसाईडचा वास येतो. चेहरा निळसर झालेला. खून झाल्यावर बॅाडीला हलवलेले दिसते. तो ऑफिसमध्ये जुन्या खूनांचे फोटो तपासतो. त्यांचीही बॅाडी खून केल्यावर हलवलेली दिसते. चेहऱ्यावर निळसर झाक दिसते. तिन्ही खून “फिनेक” ब्रॅंडच्या चाकूने केलेले असतात. हे समान धागे कदम त्याची मुलगी केतुल बरोबर चर्चा करतो. केतुलची आई काही वर्षांपूर्वी कदमला सोडून गेलेली असते. ती भाऊ पाटीलची सावत्र बहीण असते. पण सध्या ती कुठे आहे व काय करते हे माहित नसते. केतुल कोर्टात काम करत असते तसेच ती “शक्ती” या NGO मधेही काम करते. शक्ती हे सोनापूरमधुन सुटका केलेल्या वेश्यांचे पुनर्वसन करत असते. निर्मल नावाचा तिचा मित्र एथिकल हॅकर असतो. तिच्यावर प्रेम करत असतो. कदमला हार्ट अटॅक येऊन गेलेला व स्टेंट बसवलेला असतो. Depression मुळे त्याची सायकॅालॅाजिस्टकडे ट्रिटमेंट चालू असते. कदमला या तिन्ही केसमधे आणखी एक धागा सापडतो. हे खून आठ दिवसांच्या अंतरावर झालेले असतात. म्हणजे पुढचा खून बुधवारी होणार असल्याचे तो राणे व शिंदेला सांगतो. 4. बुधवार दि २६ फेब्रुवारी, कांदिवली पश्चिम, लक्ष्मी बुधीराजाचा खून. तोच पॅटर्न. 5. गुरुवार दि ५ मार्च, खार पश्चिम, गुरुराज अदवानीचा खून सेम पॅटर्न. गुरूराज हा युट्युबवरचा प्रसिद्ध सिंगर असतो. 6. शुक्रवार दि १३ मार्च, ताडदेव, दिव्या शुक्रपाणीवर खूनी हल्ला होतो. पण ती जबर जखमी होते. ती फिटनेस ट्रेनर असल्यामुळे खुन्याबरोबर झटापट करते. पण चाकू पोटात घुसल्यामुळे ती जबर जखमी होते. हात बांधलेले असतानाही ती फोनवर “सिरी” ला तिच्या भावाला, ध्रुवला फोन लावायला सांगते. फोन लागतो व ती “हेल्प हेल्प” एव्हढेच बोलून बेशुद्ध होते. म्हणून खुनी पळून जातो. ध्रुव तिथे पोहोचून तिला हॅास्पिटलमधे ॲडमिट करतो. पोलिसांना तिथे खुन्याची बॅग सापडते. त्यांत नायलॅानची दोरी, बेगॅान स्प्रे व राजमाच्या बिया सापडतात. तिसऱ्या खुनाआधी पोलिस संशयित म्हणून राजू दाभाडेला अटक करतात. पण चौथ्या खूनाच्या वेळेस तो कस्टडीतच असतो. मग खूनी कोण? 7. शनिवार दि २१ मार्च, बान्द्रा पश्चिम, शनिया डिसौजाचा खून होतो. सेम मोडस ऑपरेंडी . 8. शनिवार दि २८ मार्च, चेंबूर, ७१ वर्षांच्या राहुल सिंह नावाच्या सिख व्यक्तिचा खून होतो. तीच पध्दत. यानंतर एक दिवस कदम KBC बघत असताना अमिताभ बच्चन एका सिनेमाचं गाणं लावून त्याचा पिक्चर ओळखायला सांगतात. ते गाणं असते- “सोमवार को हम मिले मंगलवार को नयन बुध को मेरी निंद खुली जुम्मेरात को चैन अरे शुक्र शनी कटे मुश्किलसे आज है इतवार सात दिनों में हो गया जैसे सात जनम का प्यार” आणि कदमच्या डोक्यात एकदम प्रकाश पडतो… अरे, हे सर्व खून असेच रविवार ते शनिवार एक एका वारी घडलेत! पण शनिवारी दोन खून कसे? याच्या मागे काही खगोलशास्त्र किंवा भविष्याचा तर संबंध नाही? कदमला आठवतं की शेजारी राहणारा डॉ. देसाईला पण भविष्य-खगोलशास्त्राची आवड व माहिती आहे. ( डॅाक्टर कडे सापडलेल्या नायलॅानचे रंगीत दोर व फिनेक कंपनीचा चाकू यामुळे एक संशयित म्हणून कदमने त्याला अटक करून पुछताछ केलेली असते) कदम लगेच डॅाक्टरांकडे जातो. त्यांची माफी मागून त्यांना या प्रश्नांत मदत करायला सांगतो. तो या सर्व खुनांचा सिक्वेन्स सांगतो. ते प्रत्येक वारी का घडले? मग शनिवारी दोन का? यापुढे कोणता वार? कुणाचा खून? डॅाक्टर सांगतात की भारतीय भविष्य व खगोल शास्त्रात नवग्रहांना खूप महत्व आहे. रवि, सोम(चंद्र), मंगळ, बुध, गुरू, शुक्र, शनि, राहू आणि केतु. यांचे रंग व धान्य वेगवेगळे असतात. त्या त्या ग्रहाला प्रसन्न करण्यासाठी ते वापरले जातात. कदम ही माहिती लिहून घेतो. त्यावरून प्रत्येक खुनात वापरण्यात आलेले फिनेक कंपनीचे चाकू, वेगवेगळ्या रंगांचे नायलॅान दोर व तोंडातील पदार्थ यांचा संबंध जोडून एक तख्ता तयार करतोः- “रवि मेहरा-रविवार-सोनेरी दोर- तोंडात गहू-दिशा पूर्व सुचंद्रा-सोमवार-चंदेरी दोर-तोंडात तांदूळ-दिशा पश्चिम मंगला शाह-मंगळवार-लाल दोर-तोंडात तूर डाळ- दिशा दक्षिण लक्ष्मी बुधीराजा-बुधवार-हिरवा दोर-तोंडात हिरवे मूग-दिशा उत्तर गुरुराज अदवानी-गुरूवार-पिवळा दोर-तोंडात हरबरा डाळ-दिशा उत्तर पूर्व(ईशान्य) दिव्या शुक्रपाणी-शुक्रवार-पांढरा दोर-राजमा-दिशा दक्षिण पूर्व शनिया डिसौजा-शनिवार-काळा दोर-तोंडात काळे तिळ-दिशा उत्तर पश्चिम राहुल सिंग-शनिवार-निळा दोर-तोंडात उडीद दाळ-दिशा दक्षिण पश्चिम” आता उरला एकच ग्रह-केतु. केतुचा वार मंगळवार. ग्रे रंग, चना दाळ, दिशा दक्षिण पश्चिम. “केतु”म्हणजे कदमची मुलगी केतुलचा नंबर लागणार? आज तर मंगळवारच आहे! कदम घाबरून जातो! तो केतुलला फोन करतो पण तो बंद लागतो. ती सध्या कुठे आहे? कोर्टात? कदम आपल्या मुलीला वाचवतो का? खरा खुनी कोण असतो? तो पकडला जातो का? त्याचे यामागचा उद्देश काय असतो? याच्यामध्ये अजून कोण सामिल असतं का? याची उत्तरे मिळण्यासाठी वाचावी लागेल अश्विन सांघी यांची कादंबरी Razor Sharp. ...Read more

BANGARWADI
BANGARWADI by VYANKATESH MADGULKAR Rating Star
Sameer Kazi

सुंदर अशी कादंबरी माणदेशी बनगरवाडी तशी कोरडी रखरखती पण, यातील पात्रात मायेचा करुणेचाओलावा मनात घर करुन जातो