* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Availability : Available
  • ISBN : 9788177668957
  • Edition : 16
  • Publishing Year : JANUARY 1977
  • Weight : 120.00 gms
  • Pages : 136
  • Language : MARATHI
  • Category : SHORT STORIES
  • Available in Combos :V. P. KALE COMBO SET-52 BOOKS.
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
"IT IS VERY TRUE THAT ALL THE STORIES BY VA PU ARE BASED COMPLETELY ON THE MIDDLE CLASS PEOPLE, YET THESE STORIES ARE NOT ABOUT THE ROUTINE OF THIS CLASS, THEY HAVE DIFFERENT ASPECTS, VARIOUS DIMENSIONS. THEY GIVE WAY TO THE UNCOMMON MOMENTS OF HAPPINESS AND SORROW IN THE COMMON LIFE OF THE COMMON PEOPLE. VA PU HAS THE BLESSINGS TO WRITE THE STORIES WITH A TOUCH OF HUMOUR BUT AT THE SAME TIME, HIS TRAIN NEVER DERAILS ON THE TRACKS OF FRIVOLITY. HIS WRITING REFLECTS PATIENCE, IT IS NO WHERE LOUD. IT BRINGS SMILE ON THE LIPS AND HOPES IN THE HEARTS. IT GIVES IMPORTANCE TO THE ENTERTAINING ASPECT MORE THAN PAINFUL TORTURE. IT NEVER BECOMES CHEAP. THE AUTHOR HIMSELF HAS A VERSATILE PERSONALITY; THIS SAME IS PORTRAYED THROUGH HIS STORIES AVOIDING REPETITION. THE BEST STRENGTH OF HIS STORIES IS EACH STORY TOUCHES THE SOUL SOMEWHERE COMPELING THE READER TO INTROSPECT.`` PROF. SADA KARHADE: (LALITJULY 1976)
मायाबाजार-वपुंच्या कथाविश्वात मध्यमवर्गीय जीवन केंद्रवर्ती असले, तरीही मध्यमवर्गीय जीवनाच्या ठरावीक चाकोरीच्या या कथा नाहीत. सामान्य माणसाच्या सामान्य जीवनातल्या `असामान्य` सुखदु:खांना उद्गार देणा-या या कथा आहेत. हलक्याफुलक्या, मिस्किल, विनोदी शैलीचे अधिष्ठान `वपुं`च्या कथांना असले, तरीही त्यांच्या कथा कधी `आचरट` होत नाहीत. त्यांच्या कथानिवेदनात एकप्रकारचा संयतपणा आहे. वाचकांना खुलवणाया, हसवणाया रंजकतेचे अधिष्ठान आहे. हव्यास म्हणून त्यांच्या कथा `स्वस्त रंजकते`ला थारा देत नाहीत. लेखक बहुश्रुत असल्यामुळे या कथाविश्वात विविधता व विपुलता आहे. त्यात अनुभवाचा तोचतोचपणा नाही. त्यांच्या कथा या ना त्या प्रकारे सामान्यातल्या सामान्य वाचकांच्या मनोविश्वाला स्पर्श करून जातात. त्या स्पर्शाने वाचक अंतर्मुख व्हावा असे सामथ्र्य `वपुं`च्या कथेत आहे.वपुंच्या कथाविश्वात मध्यमवर्गीय जीवन केंद्रवर्ती असले, तरीही मध्यमवर्गीय जीवनाच्या ठरावीक चाकोरीच्या या कथा नाहीत. सामान्य माणसाच्या सामान्य जीवनातल्या `असामान्य` सुखदु:खांना उद्गार देणा-या या कथा आहेत. हलक्याफुलक्या, मिस्किल, विनोदी शैलीचे अधिष्ठान `वपुं`च्या कथांना असले, तरीही त्यांच्या कथा कधी `आचरट` होत नाहीत. त्यांच्या कथानिवेदनात एकप्रकारचा संयतपणा आहे. वाचकांना खुलवणाया, हसवणाया रंजकतेचे अधिष्ठान आहे. हव्यास म्हणून त्यांच्या कथा `स्वस्त रंजकते`ला थारा देत नाहीत. लेखक बहुश्रुत असल्यामुळे या कथाविश्वात विविधता व विपुलता आहे. त्यात अनुभवाचा तोचतोचपणा नाही. त्यांच्या कथा या ना त्या प्रकारे सामान्यातल्या सामान्य वाचकांच्या मनोविश्वाला स्पर्श करून जातात. त्या स्पर्शाने वाचक अंतर्मुख व्हावा असे सामथ्र्य `वपुं`च्या कथेत आहे.
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
25TH MARCH #SANVADINI #VAPU 85 #NAVRA MHANAVA AAPALA #MODEN PAN VAKNAR NAHI #ONE FOR THE ROAD #ZOPALA #MAYABAJAR #CHATURBHUJ #INTIMATE #GULMOHAR #VAPURVAI #HUNKAR #MI MANUS SHODHATOY #BAI BAYKO CALENDER #SWAR #BHULBHULAIYA #KA RE BHULALASI #VALAY #KARMACHARI #AIK SAKHE #GOSHTA HATATLI HOTI #TAPTAPADI #GHAR HARAVLELI MANASA #DOST #MAHOTSAV #KAHI KHAR KAHI KHOTA #SAKHI #RANG MANACHE #AAPAN SARE ARJUN #THIKARI #TU BHRAMAT AAHASI VAYA #HI VAT EKTICHI #PARTNER #DUNIYA TULA VISAREL #PREMAMAYEE #FANTASY EK PREYASI #PANPOI#NIMITTA #MAZA MAZYAPASHI? #PLEASURE BOX BHAG 1 #PLEASURE BOX BHAG 2 #KATHA KATHANACHI KATHA #VAPURZA #RANGPANCHAMI #SANGE VADILANCHI KIRTI #CHEERS #MANASA #JAPUN TAK PAUL #LALITKALECHYA SAHAWASAT #DAHAVYA RANGETUN #२५ मार्च #संवादिनी #वपु# ८५ # नवरा म्हणावा आपला #मोडेन पण वाकणार नाही #वन फॉर द रोड#झोपाळा #मायाबाजार #चतुर्भुज #इन्टिमेट #गुलमोहर #वपुर्वाई #हुंकार #मी माणूस शोधतोय #बाई, बायको, कॅलेंडर #स्वर #भुलभुलैय्या #का रे भुललासी #वलय #कर्मचारी #ऐक सखे #गोष्ट हातातली होती! #तप्तपदी #घर हरवलेली माणसं #दोस्त #काही खरं काही खोटं #सखी #महोत्सव #रंग मनाचे #आपण सारे अर्जुन #ठिकरी #तू भ्रमत आहासी वाया #"ही वाट एकटीची #(राज्य पुरस्कार १९७०-७१)" #पार्टनर #दुनिया तुला विसरेल #प्रेममयी #फॅण्टसी एक प्रेयसी #पाणपोई #निमित्त #माझं माझ्यापाशी? #प्लेझर बॉक्स भाग-१ #प्लेझर बॉक्स भाग-२ #कथाकथनाची कथा #वपुर्झा #रंगपंचमी #सांगे वडिलांची कीर्ती #चिअर्स #माणसं #जपून टाक पाऊल! # ललितकलेच्या सहवासातून #दहाव्या रांगेतून
Customer Reviews
  • Rating StarVarsha Mahakal

    मायाबाजार.... वपुंच्या अनेक पुस्तकांपैकी असलेलं हे पुस्तकं. वपुंच्या कथांमधली पात्रं ही बहुधा तुमच्या आमच्यातलीच असतात आणि म्हणुनच की काय ती थेट आपल्या ह्रदयाला जाऊन भिडतात. या पुस्तकातील `मायाबाजार ` नावाची कथा पुर्णपणे कल्पनातीत असली तरीही खाडकनआपले डोळे उघडण्याइतकी ती प्रभावी आहे.सटवाई, अधांतरी,षंढ,दीडदमडीची माणसे इ. बरोबरच यातल्या इतर कथा ही आपणास अंतर्मुख करतात. त्यांच्या लिखाणात विविधता असल्याने त्यांना वाचल्यानंतरही त्या कायम स्मरणात राहतात. ...Read more

  • Rating StarPRABODHAN - JANUARY, 2017

    मानवी मनाचे अंतरंग अत्यंत सहजपणे उलगडून श्रोत्यांशी संवाद साधत लेखन करणारे – श्री वसंत पुरुषोत्तम काळे यांनी मराठी वाचकांच्या मनात अढळस्थान प्राप्त केले आहे. मध्यमवर्गीय घरातील माणसे व त्यांच्या आजूबाजूचे जग यावर या संग्रहातील सर्व कथा आहेत. पण प्रत्ेक कथेतील विषय मानवी मनाचे विविध पैलू अत्यंत हळुवारपणे उलगडत जातो व वाचकांचे कथेतील पात्रांशी नाते तयार होते. माया बाजार या कथेत जुनी वस्तू देऊन त्याबद्दल नवीन वस्तू मिळण्याचे ठिकाण तेथून नवीन वस्तु घेऊन दोन दिवस नव्या वस्तूत रमतो. पण जुन्या वस्तूतील आठवणी मनात कुरतडत राहतात तर जुन्या बायकोच्या बदल्यात नवीन सुंदर बायको आणणारा महाभागही येथे दिसतो. याशिवाय या पुस्तकातील अधांतरी, मृदुंग, सरलाई, न उमटलेले छायाचित्र, दीडदमडीची माणसे, चोर व नालायक या सर्वच कथा अतिशय छान आहेत. प्रत्येक मराठी वाचकाने त्या वाचून त्याचा अनुभव घ्यायलाच हवा आहे. प्रत्येकाला आयुष्यात शिक्षक भेटतात. ते मुलांना वळण लावण्याचा प्रयत्न करतात, कधी कधी व्रात्य मुलांना वळण लावण्यासाठी शिक्षा करतात. पण या कथेतील व्रात्य मुलगा शिक्षा भोगतो पण शिक्षकांवर आकस ठेवून, त्यामुळे पुढे आयुष्यात तो काही करू शकत नाही. मोठा झाल्यावर तो शिक्षकांना येऊन भेटतो. म्हणतो सर, मला तुम्ही नालायक म्हणत हिणवत राहिलात. आयुष्यात मी काही करू शकलो नाही. अशा विविध कथा मनाला चटका लावून जातात? हे महान लेखक आता आपल्यात नाहीत. पण त्यांनी केलेले लेखन. आपल्याला त्यांच्या उमद्या व्यक्तीमत्त्वाची साक्ष देते व त्यांचे लेखन परत परत वाचायला भाग पाडते. हे नक्की! – रवीन्द्र अनंत गाडगीळ ...Read more

  • Rating StarTarun Bharat 03 -02 -2008

    पुनःप्रत्ययाचा आनंद ‘मायाबाजार’ हा व. पु. काळे यांचा कथासंग्रह. जानेवारी १९७७ मध्ये त्याची पहिली आवृत्ती प्रकाशित झाली आणि तीस वर्षानंतर त्याची सहावी आवृत्ती ‘मेहता पब्लिशिंग हाऊस’ने प्रकाशित केली आहे. या संग्रहात एकूण ११ कथा समाविष्ट करण्यात आल्या हेत. तीस वर्षांनंतरही या कथा वाचताना वाचकाला आनंद देतात, अनुभवाचे बोल ऐकवतात, जीवनमूल्यांविषयी, जीवनाविषयी भाष्य करतात आणि माणसांचाही नव्याने शोध घेतात. व. पु. काळे यांच्या या साऱ्या कथा आजही ताज्या, वैशिष्ट्यपूर्ण वाटतात. पुन:प्रत्यायाचा आनंद देणारा हा कथासग्रंह वाचकांना पुनःपुन्हा वाचावासा वाटतो, हे वपुंच्या लेखनाचे यश आहे. ‘मायाबाजार’, ‘षंढ’, ‘झिंटू’, ‘अधांतरी’, ‘मृदंग’, ‘हनीमून’, ‘सटवाई’, ‘न उमटलेलं छायाचित्र’, ‘दीडदमडीची माणसं’, ‘चोर’ आणि ‘नालायक’ अशा या कथा आहेत. या साऱ्या कथांमध्ये एक आंतरिक सूत्र शोधले तर ते वपुंच्या माणसांच्या विविध परी, जीवनदृष्टीकोन, जगण्याचा तात्त्विक झगडा, मानवी मूल्यांचा शोध घेण्याचं आहे, हे प्रकर्षाने अधोरेखित होते. पहिल्या ‘मायाबाजार’मध्ये आपल्या मनातील आदर्श जोडीदार शोधणारे दाम्पत्य, ‘षंढ’मधील अंतर्गत ऊर्मी दाबून, समाजासमोरील मुखवटे शाबूत ठेवून खोटी प्रतिष्ठा जपणारी माणसं, ‘झिंटू’च्या रूपातील तत्त्वशून्य, चारित्र्यहीन पिढी, ‘अधांतरी’मधील आस्तिक-नास्तिकतेच्या दोलायमान अवस्थेतील नायिका आणि पुढच्या संभ्रावास्थतेच्या पिढीचं नेतृत्व करणारा तिचा मुलगा, ‘मृदंग’मधील विपरित परिस्थितीत अडकलेला प्रामाणिक अधिकारी, व्यवस्थेचा शिकार होतो. ‘हनीमून’मधील नवविवाहित दाम्पत्याची पूर्वग्रहमुळे होणारी फजिती, ‘सटवाई’मधील उपहास, त्यातून मांडलेलं आजचं विदारक वास्तव. ‘छायाचित्र’, ‘माणसं’, ‘चोर’, ‘नालायक’ यातील सत्त्व जपणारी, माणुसकी जोपासाणारी, तत्त्वशील मातीच्या पायाची (देव) माणसं यांचं चित्रण वपुंनी केलं आहे. वपुंच्या साऱ्याच कथालेखनाचे वैशिष्ट्य म्हणजे त्यांची प्रचंड प्रवाही, ओघवती निवेदनशैली, मित्राला आपलं अनुभव कथन करावं तसा त्यांच्या कथांचा घाट आहे. कथांतील पात्रांची व्यक्तिमत्त्वं त्याच्या मनात अगदी स्पष्ट असल्याने कथांची मांडणी आणि व्यक्तिमत्त्वांचा विकास ते सहजतेने करतात. पात्रांविषयी वाचकांच्या मनात निर्माण होणाऱ्या प्रतिमेला ते कथेच्य या अखेरीस जी छेद देतात, त्याने ती पात्रं वेगळ्याच उंचीवर जातात आणि कथाही वाचकांच्या मनात रुजते. त्यांचे अनुभवही सुभाषितासारखे व्यक्त होतात. उदा. ‘सुखं कधी संपत नाहीत. ती नित्य नवी उगवतात...’ नव्या सुखांना जागा करून दिली की ती न बोलावता येतात. (पृ. १३) ‘सगळे वार परतवात येत नाही आणि पचवताही येत नाही. (पृ. १४)’,‘ आनंद जसा लादता येत नाही, तसाच जबरदस्तीने मिळवताही येत नाही’ (पृ. २५) ‘भीतीपायी माणूस लांब राहातो.’ अनुभवातून जाण्याचं तो नाकारतो. भिणाऱ्या माणसाची वाढ होत नाही. भिणारा माणूस संशोधनही करीत नाही’ (पृ. ६७) किंवा ‘अशी देवमाणसे ठिकठिकाणी गावोगावी आहेत. ती माणसे प्रसिद्धीपराङ्मुख असतात, म्हणून त्यांचा सहज काढलेला फोटो येऊ शकत नाही.’ (पृ. ११७) आपल्या आसपासच्या जीवनातील अनुभव, माणसं यांना वपुंनी कथारूप दिल्याने वाचकांना ती आपल्या जवळची वाटतात. कथेतील पात्रांच्या जीवनानुभवाशी ते समरस होऊ शकतात. वपुंच्या कथाशैलीचं हेही एक वैशिष्ट्य आहे. ‘मायाबाजार’ पुन्हा एकदा वाचून रसिकांनी पुनप्र्रत्ययाचा आनंद अवश्य घ्यावा. ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

आबासाहेब कडू, अमरावती.

एकाच दमात छप्पन वेळा वाचावा असा काव्यसंग्रह* दै.सकाळच्या सप्तरंग पुरवणीत अ-अमिताभचा व दै.हिंदस्थान मधील `अमरावती सिरीज` चे स्तंभलेखक व अमरावती येथील प्रसिद्ध साहित्यिक श्री जी.बी.देशमुख ह्यांचा छप्पन कवितांचा समावेश असलेल्या अमरावतीच्या वस्तू,वास्ू आणि माणसाच्या वैशिष्ट्यावर आधारित `अमरावतीचे छप्पन स्वभाव` हे पुस्तक मी विकत घेतले. घरी गेल्यावर त्यातील छप्पनही कविता एकाच दमात वाचून काढल्या अन् पैसा वसूल झाल्याचे समाधान झाल्यावर त्यावर चिंतन करावेसे वाटले, म्हणून हा लेखनप्रपंच. वाचक हा अमरावतीकर असेल तर `अमरावतीतल्या गमती` ही पहिलीच कविता त्याच्या मनाचा ठाव घेते आणि `याटोत` बसवून परकोटातल्या मुर्गी मठासह अख्खी अमरावती फिरवून आणते. गांधीचौकात गांधी नाही मालटेकडीवर माल नाही.. खेटरे झाली ब्रँडेड सगळी मोची गल्लीत मोची नाही.. तपोवनात तपस्वी नाही कल्याणनगरात कल्याण नाही… लेखकाच्या भारदस्त शब्दशक्तीचा इथेच विजय होतो आणि मग अमरावतीची एकेक वैशिष्ट्ये पादाक्रांत करित छप्पनीकडे वाटचाल करीत जातो. ही काव्यात्मक रुपातील वैशिष्ट्ये वाचतांना अमरावतीचा पन्नाशितला वाचक देहभान विसरुन गतकाळात रममाण होतो. त्याचे मन नकळत सुखावते, गात्रे जागृत होतात, मेंदू रिचार्ज होतो तर तरुण वाचकाच्या मनात अमरावती शहराविषयी कुतुहल निर्माण होते. तोही मग त्यातील खाणाखुणा शोधायचा प्रयत्न करत बसतो. या संग्रहातील प्रत्येक कवितेवर एकेक निबंध तयार होऊ शकतो. स्वभाव हा शब्द सहसा मनुष्याशी जोडून उपयोगात आणला जातो पण इथे तर लेखकाने निर्जीवातही प्राण फुंकले आहे. अमरावतीच्या याटोत बसून ह्यातील सजीवता आपल्याला अनुभवता येईल. मग तो बेनाम चौक असो, कुथे बस स्टॉप असो, अनेक नावांचे कापसाचे जीन असो, वालकट कम्पाउंड असो, हनुमान आखाडा असो, इर्विन, डफरीन दवाखाने असो, `अमरावतीतल्या विहिरी` असो नाहीतर मोर्शी रोडवरील थोर महात्म्यांचे पुतळे असो. अमरावतीच्या शब्दकळा, अमरावतीच्या हाका, अमरावतीच्या वल्ली, अमरावतीच्या टॉमीची पाॅटी, अमरावतीचे सुपरस्टार, अमरावतीचा बागुलबोवा, अमरावतीचे वेडे एकदमच बेस्ट. अमरावतीच्या रेल्वे ब्रीजचे तर ते भरभरुन कौतुक करतात. चारी बाजूनं उतरणारा पूल फक्त जपानमध्ये आहे अन् सिंगापूरच्या नंतर नंबर आपल्याच पुलाचा आहे कारण हा पूल आहेच कौतुक करण्याजोगा, मलाही ह्या पूलाचे कौतुक याच्याकरिता आहे की ह्या पूलाचे बांधकाम माझ्या पेठ मांगरुळी गावच्या अभियंत्याच्याच देखरेखीखाली झाले आहे. अमरावतीशी प्रत्यक्ष संबंध आला तो १९७५ सालापासून,पण काही अपवाद वगळता लेखकाच्या छप्पनीतील अनेक वैशिष्ट्ये मी अनुभवलेली आहेत. ह्याच रेल्वेपुलावर रोज संध्याकाळी एक भोळसट मुलगा गाणे गायचा,लोक त्याला प्रेमाने शाहरुख म्हणायचे,कारण तो स्वतःला शाहरुख खानंच समजत असे. अमरावतीच्या कॉलेजमधील तरुणांचे भावविश्व मांडतांना लेखकाने हात आखडता घेतला नाही. इंजिनिअरिंग कॉलेज व व्ही.एम.व्ही. ही त्यावेळची आघाडीवरची कॉलेजेस होती. त्यामधील कॉलेजियन्सचे दर्द लेखकाने मिश्कीलपणे मांडले त्या `अमरावतीचा दर्द` ह्या कवितेतील ओळी आताच्या पेन्शनरांना त्या काळात घेऊन जातील. तरुण मंडळींनी तो आनंद पुस्तक वाचून घ्यावा. अमरावतीचा आद्य मॉल म्हणजे फक्त महिलांसाठीच राखीव असलेली बाजारपेठ अशी ओळख असलेलं `जोशी मार्केट`, `अमरावतीची नवरात्र`, `अमरावतीचे जेष्ठ नागरिक` ह्या पूरक कविताही त्याच प्रेमाच्या विश्वात घेऊन जातात.. `अमरावतीचा भुलभुलैय्या` मधील अनुभव आजही अनेकांना येतो, मलाही अनेकदा आला, त्याकरिता ही पूर्ण कविताच वाचणे आवश्यक आहे. अमरावतीचा अंबानाला, त्यानुषंगाने मास्तराने दिलेली `पदवी`, अमरावतीचे भोंगे, अमरावतीच्या उन्हाच्या चटक्यातील गरम चहाचे घोट थेट लंडनच्या थंड हवामानातल्या आईस्क्रीमलाही थंड करुन टाकतात ही तुलना मनाला भावून जाते. ब्लॅक अँड व्हाईट फोटोग्राफीतली मजा आताच्या डिजीटल फोटोग्राफीत नाही. त्यावेळी अमरावतीत मोजक्याच असलेल्या फोटो स्टुडिओची नावे लेखकाने दिलेली आहेत.त्यांनीही आता डिजीटल फोटोग्राफीच्या युगात प्रवेश केलेला आहे.त्यावेळेस काढलेले ब्लॅक अँड व्हाईट फोटो अनेकांनी जपून ठेवले असावे. लेखक मणीबाई गुजराती शाळेत शिकत होते त्यामुळे त्या शाळेचे व गुरुजनांचे गुणगान, स्वभाववैशिष्ठ्ये हे पुस्तकात येणे स्वाभाविकच आहे, मास्तराला पाणी पाजता पाजता त्यांचा वर्गमित्र पाणी पुरवठा विभागात कार्यकारी अभियंत्यापर्यंत कसा पोचला हा मनोरंजक किस्सा `अमरावतीची गुरुवाणी` कवितेतून खुसखुशीत भाषेत रेखाटला आहे. अमरावतीच्या टाकीजा, त्यांची वैशिष्ट्ये तर आहेतच पण दर गुरुवारी नवे सिनेमे अमरावतीत सर्वात पहिल्यांदा प्रदर्शित होत होते हे आज अनेकांना सांगूनही पटणार नाही पण तो मान अमरावतीला मिळत होता हा इतिहास आपल्याला अचंबित करुन जातो, सिनेमाचे अनेक डिस्ट्रीब्युटर हे अमरावतीतच होते, जवाहर रोडवरील जुन्या इमारतीवर ते बोर्ड तेव्हा हमखास दिसत, काळाच्या ओघात त्या जागी नवीन ईमारती उभ्या झाल्या, परंतु अजूनही एक-दोन ठिकाणी ते बोर्ड दिसतात.असे अनेक अचंबित करणारे किस्से या पुस्तकात काव्यरुपात लेखकाने अत्यंत खुमासदार व मनोरंजक पद्धतीने रेखाटून त्यात जीवंतपणा आणला आहे. हा काव्यसंग्रहातील ठेवा पुढील पीढीसाठी वारसा ठरेल यात मला तीळमात्रही शंका वाटत नाही. खवैयेगीरीत म्हणाल तर विनायकराव तायडेच्या गड्डा हॉटेलचा आलुबोंडा ज्या अमरावतीकरांनी आणि इतरांनीही खाल्ला असेल त्याला जगातल्या कुठल्याही हॉटेलातील आलुबोंडा आवडत नाही, अन् खाल्लाही असेल तर खातांना त्याला विनायकरावाचे आतिथ्य व तर्रीची आठवण आल्याशिवाय रहात नाही. अमरावती जिल्ह्यातील मंडळी लग्नबस्ता खरेदी करायला आली की खरेदी झाल्यावर वर वधूकडील मंडळीचे फराळपाण्याचे हे आदराचे स्थान होते. कॉलेजमध्ये शिकत असतांना मनीऑर्डर हातात पडली की प्रभात चौकातील `गौ दुग्ध सागर` ही विद्यार्थ्यांची पहिली पसंती असे. `जीडीएस` म्हणून ते फेमस होते. साऊथ इंडियन डिशेश मिळणारे जिल्ह्यातील ते एकमेव ठिकाण होते. राजकमल चौकालगतच्या टी स्टॉलवरच्या बोर्डावर चहाचे नावंच `स्पेशल चहा`, `बादशाही चहा`, `यादगार चहा` अन साब को `एक शिंगल मलाई मारके` असा आपुलकीचा चहा तेव्हा अमरावतीकरांनी यथेच्छ रिचवला. आता ह्या सर्व चहांचा मिळून एकच चहा मिळतो. पण ह्या चहात ती लज्जत नाही. मग तुम्ही त्या स्टॉलला `प्रेमाचा चहा` हे नांव ठेवा किंवा अजून काही. हरेक शहराला एक संस्कृती असते, वस्तू-वास्तू वारसा असतो, त्यातून जगण्यातली नजाकत शोधावी लागते. ती नजाकत `अमरावतीचे छप्पन स्वभाव` ह्या काव्यसंग्रहातून अनुभवावयास मिळते.लेखकाच्या बहारदार लेखणीतून उतरलेले ही काव्यमय वैशिष्ट्ये वाचतांना अमरावती बाहेरील वाचकही मग आपल्या शहरातील वैशिष्ट्ये शोधत बसतो ही हे या पुस्तकाचे वैशिष्ट्य आहे. तसेही छप्पन ह्या शब्दाला फार महत्व आहे, `छप्पन इंची छाती`, `अब तक छप्पन` हा सिनेमा, छप्पन भोग, छप्पन छुरी अन् पिव्वर वऱ्हाडातली वर्ल्ड फेमस धमकी म्हणजे `तुह्यासारखे त म्या सतराशे छप्पन पाह्यले बे, तुह्याकुन जे हुईन थे करुन घे.` छप्पन ह्या शब्दाचा पूरेपूर करुन घेतलेला वापर म्हणजे जी.बी.देशमुख सारख्या दिलखुश लेखकाने लिहिलेले हे खुमासदार,रसभरीत,टवटवीत प्रफुल्लित अन मिश्कील काव्य. आणि शेवटी……….. मणुश्याचे हे शरीर अणित्य आहे आतमा-णित्य आहे हा श्रद्धांजलीपर आवाज ज्याने हिंदू स्मशानभूमीत ऐकला नसेल त्याने ह्या जन्मात तरी तो ऐकेपर्यंत मरु नये. हे शब्द ऐकूनही त्याकडे कानाडोळा केला असेल तो माणूस करंटा पण हे करंटेपण लेखकाने घेतले नाही. लहानपणापासून अमरावतीत वावरतांना `डफरीन` (लँडीग पोर्ट) ते ही `वरची जागा` ह्यातील अत्यंत बारकाईने केलेले निरिक्षण लाजबाबच म्हणावे लागेल,त्याला तोड नाही. हे पुस्तक वाचतांना प्रत्यक्ष यमराज जरी द्वारी आला तरी त्याला "हे पुस्तक वाचेपावतर जराकसा थांबतं काय रे बॉ." अशी म्हणण्याची हिम्मत वाचकात येते हे मात्र नक्की. अमरावतीच्या वस्तू,वास्तू आणि माणसांच्या वैशिष्ट्यावर आधारित आपल्या बालमित्रांना समर्पित केलेला व मेहता पब्लिशिंग हाऊस ह्यानी प्रकाशित केलेला हा अमूल्य ठेवा आपणा सर्वांना नक्कीच आवडेल ह्याची खात्री आहे. ...Read more

बाबाराव घोरमाडे, अमरावती

प्रथम दर्शनी कविता लेखन असले तरी गद्य आणि पद्य सोबत सोबत चालल्यासारख्या लेखन शैलीचा भास जाणवतो. अमरावती शहरातील 70..80 व नंतरच्या दशकातील गुणवैशिष्ट्ये मार्मिक नर्म विनोदी शैलीत सुंदर रीतीने विषद केली आहेत. लेखकाची सुक्ष्म निरीक्षण शैली काव्य चना स्वरूपात पुस्तक रूपाने सादर करण्यात लेखक यशस्वी झाले आहेत. इजाफा,रूतबा, हिरव्या देठाचे,कैलहीचा मौहोल, ढगांचा,इत्यादी जुने वऱ्हाडी शब्द वापरल्यामुळे जुन्या आठवणींना उजाळा मिळाला. लेखकाने अमरावती शहरातील जुन्या जाणत्या, गुणवान, असामान्य अशा व्यक्तींची दखल घेतली......पण काहींची दखल राहून गेली आहे असे माझे मत आहे. उदा. सुरेश भट, मधुकर केचे व त्यांची सायकल , अमरावतीचे दहा दिवसांची गणपती उत्सव सजावट..... प्रत्येकाने वाचावे असे हे पुस्तक, विनोदी पण शेवटी असलेली कारूण्याची किनार अंतर्मुख करुन जाते. ...Read more