JIM MACGREGOR

About Author


JIM MCGREGOR WAS BORN IN GLASGOW IN 1947. HE GREW UP IN A COTTAGE ON THE GROUNDS OF THE ERSKINE HOSPITAL FOR THE INVALIDS. HE SAW THE DISASTER THAT WAS HAPPENING IN THE LATER YEARS DUE TO THE WAR THERE EVERY DAY. HE WAS DEEPLY DISTURBED BY WHAT HE SAW. IT WAS FROM THAT EXPERIENCE THAT HE GOT A TASTE FOR FINDING THE ORIGIN OR ROOT CAUSES OF WARS AND WORLD CONFLICTS, WHICH HE HAD FOR THE REST OF HIS LIFE.

जिम मॅकग्रेगरचा जन्म ग्लासगो इथे १९४७ साली झाला. अपंगांसाठी असलेल्या अर्सकिन हॉस्पिटलच्या आवारातील कॉटेजमध्ये तो लहानाचा मोठा झाला. युद्धामुळे नंतरच्या काळात घडत असलेला अनर्थ तो तिथे रोजच बघत होता. जे पाहिले त्यामुळे त्याचे मन फार खोलवर व्यथित झाले. त्या अनुभवातूनच युद्धे आणि जागतिक संघर्ष यांचे उगम वा मूळ कारणे शोधण्याची त्याला जी गोडी लागली, ती आयुष्यभरासाठीच. पंधराव्या वर्षी शाळा संपल्यावर त्याने भिन्नभिन्न प्रकारच्या नोकऱ्या केल्या. जसे की शेतमजुरी, पशुरेतन आणि औषधसंशोधन इत्यादी. त्यानंतर १९७८मध्ये त्याने डॉक्टर ही पदवी घेतली. ‘युद्धे टाळण्यात येणारे राजकीय अपयश’ याबाबत त्याला संशोधन करावयाचे होते. या संशोधनात स्वत:ला पूर्णवेळ झोकून देण्यासाठी त्याने २००१ साली वैद्यकीय व्यवसाय सोडला. त्याचे ‘कायद्याचे गर्भपात’, इराक युद्ध, जागतिक गरिबी आणि युनायटेड स्टेट्समध्ये फॅसिझमचा उदय अशा विविध विषयांवरचे असंख्य लेख प्रसिद्ध झाले आहेत. त्याने लिहिलेली ‘द इबोगा व्हिजन्स’ ही युद्धविरोधी जबरदस्त कादंबरी २००९ मध्ये प्रकाशित झाली व तिचे समीक्षकांकडून दणदणीत स्वागत/कौतुक झाले.
Sort by
Show per page
Items 1 to 1 of 1 total
DADLELA ITIHAS Rating Star
Add To Cart INR 650

Latest Reviews

रुपाली सोनवणे

#रुक #जाना #नही लेखक: Dr. भावेश भाटिया शब्दांकन: Dr: सचिन पाचोरकर अनुवाद: सुप्रिया वकील ​अंथरून पाहून पाय पसरावे... अह्ह.. त्या निर्जीव अंथरुणासाठी आपल्या सजीव पावलांना का त्रास द्यावा? असेच एक जबरदस्त आत्मचरित्र वाचून संपवलं आणि एक ऊर्जा निर्माणकरून गेलं, पुस्तकाचं नाव आहे `रुक जाना नहीँ ​डॉ. भावेश भाटिया यांची ही प्रेरणादायी कहाणी. शाळेत असताना आलेलं अकाली अंधत्व आणि त्यानंतर खडखडीत खडतर जीवनाचा सुरू झालेला प्रवास, पण या प्रवासात खचलेल्या बालमनाला त्यांच्या आईने दिलेलं बळ, प्रेरणा व आत्मसन्मानाची शिकवण आणि स्वाभिमानाचे धडे लेखकास पुरे होते. हा प्रवास सोपा नक्कीच नव्हता. चांगल्या धडधाकट व्यक्तीवर संकट आल्यावर दूर दूर पळणारे नातलग, मित्र परिवार, जातभाई... दृष्टी गेलेल्या व्यक्तीस कितपत आधार देतील? पण एक ऑपरेटर ते एक उद्योजक, `सनराईज कॅण्डल`चा विस्तार आणि स्वतःबरोबर अनेक दृष्टिहीन व्यक्तींना स्वतःच्या पायावर उभं करून रोजगार देणारा हा अवलिया किती अडथळे पार करून आलाय हे जाणून घेण्यासाठी पुस्तक वाचायला हवंच. ​कुठलाही वशीला नाही की कोणाची सहानुभूती नाही, स्वबळावर विविध प्रयोग करत उद्योग यशस्वी करणं सोपं नाही. यात ज्या ज्या देवमाणसांनी हातभार लावला त्यांचा पण उल्लेख आहे, पण त्या देवमाणसांनी देखील कधीच उपकारिक भाषा न करता व स्वाभिमान न दुखावता कशी मदत करता येऊ शकते हे त्यांच्या कृतीतून दाखवून दिलंय. लेखक फक्त उद्योग उभारून थांबले नाहीत तर त्यांनी सामाजिक जाणीवेचं भान देखील ठेवलंय. महाबळेश्वरमध्ये सनराईज कॅण्डल नावाने त्यांनी भव्य असा उद्योग परिसर आणि म्युझियम सुरू केलंय, तेथे अनेक दृष्टिहीन व्यक्तींना रोजगार मिळाला आहे त्याचबरोबर सर्वजण स्वाभिमानाने कष्ट करून जगत आहेत. हजारो आयुष्य त्यांनी उजळून टाकली आहेत. दोन वेळा राष्ट्रपती पुरस्कार सह एकून 46 पुरस्कारांचे ते मानकरी आहेत.विशेष म्हणजे सर्व पुरस्कार त्यांच्या योग्यतेनुसार दिले आहेत.. आणी अशा हजारो पुरस्कारांचे ते मानकरी आहेत असंच वाटत..त्यांच्या कामाची दखल रिलायन्स ग्रुप ने देखील घेतली आहे.व त्यांच्या पुस्तकास प्रस्तावना देखील नीता अंबानी यांनी दिली आहे.उद्योग करताना छोट्या छोट्या गोष्टी कसा प्रभाव करतात याच वर्णन देखील त्यांनी लिहिल आहे.. ​या कार्यात महत्त्वाचं योगदान त्यांच्या धर्मपत्नी नीता भाटिया यांनी दिलं आहे. दूरदृष्टी ठेवून आपल्या पतीस प्रोत्साहन देऊन, नवीन कल्पनेसह पाठिंबा देऊन त्यांना हुरूप देण्याचं काम त्यांनी केलंय. नीता भाटिया यांचं कर्तृत्व, त्यांचं पवित्र निस्वार्थी प्रेम या पुस्तकातून वाचताना आंतरिक वेगळी ऊर्जा मिळते. कलियुगातील देवी हा शब्द व मान त्यांना समर्पक वाटतो. पुस्तक सर्व वयोगटातील वाचक वाचू शकतात. मनाने खचलेल्या पण शरीराने धडधाकट असलेल्या प्रत्येक व्यक्तीने वरील पुस्तक नक्की वाचावं आणि आत्मसात करावं. एवढ्या उंचीवर असूनही जमिनीवर पाय असलेल व्यक्तिमत्व आहे. अगदी प्रेमळ पणे वागण बोलण सन्मान देण..ही दैवी देणगी त्यांच्या जवळ आहे. ...Read more