KISAN DAGDU SHINDE

About Author

Birth Date : 01/10/1946


KISAN SHINDE BORN IN A SOCIALLY DEPRIVED FAMILY AT MAHALUNGE PADWAL. PASSED SSC EXAMINATION IN 1964 WITH THIRD RANK IN RESERVED CATEGORY IN ENTIRE MAHARASHTRA STATE. HE COMPLETED HIS COLLEGE EDUCATION AT S. P. COLLEGE, PUNE & COLLEGE OF ENGINEERING, AND PUNE. HE PASSED B.E (CIVIL) IN 1970 WITH FIRST CLASS FROM PUNE UNIVERSITY. SELECTED THROUGH MPSC EXAMINATION FOR CLASS 1 SERVICE OF STATE ENGINEERING SERVICES AND JOINED AS ASSISTANT ENGINEER CLASS 1 IN 1973. AFTERWARD, WORKED AS THE EXECUTIVE ENGINEER, SUPERINTENDING ENGINEER, CHIEF ENGINEER, AND EXECUTIVE DIRECTOR. WORKED ON KHADAKWASLA, KUKADI, MULA, CHASKAMAN, BHAMA ASKHED, NIRA DEVGHAR, WARNA, DUDHGANGA PROJECTS. HE RETIRED FROM SERVICE IN 2004. AFTER RETIREMENT STARTED READING & WRITING AS A HOBBY & PASSION. HIS THREE BOOKS HAS PUBLISHED.

किसन दगडू शिंदे यांचा जन्म पुणे जिल्ह्यातील महाळुंगे पडवळ इथे एका मागासवर्गीय कुटुंबात झाला. त्यांचं मॅट्रिकपर्यंतचं शिक्षणही याच गावात झालं. उच्च माध्यमिक शिक्षण एस.पी. कॉलेजमधून पूर्ण केल्यावर त्यांनी पुण्याच्या इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये प्रवेश घेतला. १९७०मध्ये त्यांनी इंजिनिअरिंगची (स्थापत्य) पदवी प्राप्त केली. MPSCची परीक्षा देऊन १९७३मध्ये सहायक अभियंता म्हणून ते पाटबंधारे खात्यात रुजू झाले. त्यानंतर वेळोवेळी त्यांना बढती मिळत गेली. आपल्या नोकरी कालावधीत त्यांनी खडकवासला, कुकडी, मुळा, चासकमान, भामा आसखेड, नीरा देवघर, वारणा, दूधगंगा या प्रकल्पांवर काम केले. त्याचबरोबर दुसरा सिंचन आयोग, एमआयडीसी इत्यादी संस्थांमध्ये महत्त्वाची जबाबदारी पार पाडली. २००४मध्ये कृष्णा खोरे महामंडळाचे कार्यकारी संचालक म्हणून ते निवृत्त झाले. निवृत्तीनंतर लेखन-वाचनाचा छंद त्यांनी जोपासला आहे. ज्ञानेश्वरीचा भावगंध, बालसंस्कार नीती ही त्यांची पुस्तके प्रकाशित झाली आहेत. इंजिनिअरिंग (स्थापत्य) या विषयावरही काही पुस्तके त्यांनी लिहिली आहेत, जी संबंधित क्षेत्रातील लोकांसाठी मार्गदर्शक ठरू शकतात.
Sort by
Show per page
Items 1 to 1 of 1 total
JAICHI SUGANDHI PHULE Rating Star
Add To Cart INR 395

Latest Reviews

KULAMAMACHYA DESHAT
KULAMAMACHYA DESHAT by G.B. DESHMUKH Rating Star
डॉ शिंदे निलेश, अमरावती

`कुलमामाच्या देशात` वाचून काढले. प्रत्येक कथा खुप वाचनीय आहे. `कपारीत वाघोबा` मध्ये रवींद्र वानखडे ह्यांनी पहाटे चार ते 10 नुसती भ्रमंती केली आहे.. सकाळची सूर्यकिरण अंगावर पडली असताना वाघ बघायला भेटणं ही एक अप्रूप वाटणारी गोष्ट आहे. `डरकाळीचा रार` वानखडे साहेबांनी बेलसरें सोबत अनुभवला आहे. `जिवाची पर्वा` न करता वानखडे साहेब पाळण्यात विसावले होते. गव्याच्या पिलावर वाघीणीने हल्ला केला नाही.. हे वानखडे साहेबांनी स्वतः बघितले व आम्हाला देखील समजले.. वाघाच्या पंजाची कशी प्रतिकृती तयार करतात हे सांगितले परंतू मला लक्षात आले नाही (मी प्रत्यक्ष बोलून जाणून घेईन). `मेहमान रह गया` या कथेत वाघाने माणसाची शिकार कशी केली त्यानंतर वनविभागाने बसची सोय करून मुलांना मदत कशी झाली हे देखील सांगितले व आपल्या सारखे वन अधिकारी काय करू शकतो हे प्रांजळ पणे नमूद केले आहे.. सेमडोह येथील गजराजाची कथा अजून देखील लोक सांगतात त्यातील तुम्ही त्याला वाचवयाचा प्रयत्न केला परंतू तो नियतीला मान्य नसेल. बाणा का घुंगरू- मधील हल्ला व घटना मन विचलित करणारी वाटली व मेळघाट मधील वन कर्मचारी किती कामसू आहेत हे त्या वरून दिसले.. मला बाणा ढाप प्रत्यक्ष बघायला आवडेल.. `रानगव्यांची कवायत` मध्ये रानगवे स्वतःच रक्षण कश्या पद्धतीनं करतात हे मला पहिल्यांदा समजले.. कोकटु इथं तीन दिवस आपण वाघ बघण्याची केलेली हॅट्रिक ही जंगलाने तुम्हा वनाधिकार्‍यास दिलेली सलामी आहे. `शिकार हो गया` - माहुल वेलीचा कसा उपयोग केला जातो व पोळी तयार करतात हे देखील वेगळी गोष्ट वाटली.. आपण सांबर शिकार कशी थांबवली व वन्यजीवनाची साखळी अबाधित राखली.. वाघ खेकडे मारून खातो हे ऐकून नवल वाटले.. असा सॉलिड वन अधिकारी मेळघाटला लाभला हे या कथां मधून मला समजलं व प्रत्येक वाचकाला हे जंगल, इथले लोक या विषयी कायम आकर्षण निर्माण करत राहील.. ...Read more

MAHARUDRA
MAHARUDRA by G.B. DESHMUKH Rating Star
श्री. बाबाराव घोरमाडे, अमरावती

अमरावती जिल्हा मधील एका सामान्य खेड्यातील, एक अलौकिक असामान्य अशा फुटबॉल खेळाडूचे हे व्यक्तिचरित्र. १९४० ते १९५१ हा कालखंड म्हंजे तसाही भारतीया करीता त्यातल्या त्यात ग्रामीण भागाकरिता खडतर कालखंड. अशा विपरीत परिस्थितीत शैक्षणिक आर्थिक सामाजिक मारगदर्शन इत्यादी पाठबळ चा अभाव असताना सुद्धा आतंरराष्ट्रीय दर्जा चा खेळाडू निर्माण होणे हे ते चरित्र नायक चे असामान्य व्यक्तिमत्व अधोरेखित होते. समाधानाची आनंदाची बाब ही की हे पुस्तक रूपाने प्रसिध्द करण्याचे काम चरित्र नायक चे सुपुत्र श्री गजाननराव उर्फ जी बी देशमुख यांनी केले. हे सर्व काही अंशी कर्ज ओझे हलके करण्यासारखे आहे लेखकाला या करीता खूप मेहनत करून माहिती संकलित करावी लागली. एखादी थप्पड बनती थी........ बडे बेआबरू होकर घरी आलो........पण कहाणी मे ट्विस्ट अभि बाकी था..... प्रसंगी चे वाक्य रचना , कोसळणाऱ्या धबधबा सारखे निखळ आनंद देऊन गेले . मेहता पब्लिशिंग ने लॉन्च केले म्हणजे सर्वदूर मराठी माणसाचे पर्यंत पोहोचले आहे वाचनीय आहे प्रत्येकाने वाचावे.विसावा शतकातील पुर्वाध, विपरीत परिस्थितीतही किती कष्ट करावे लागले असतील? धन्य ते.. ...Read more