* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: COCKTALE CARNIVAL
  • Availability : Available
  • Translators : MANJIRI DHAMANKAR
  • ISBN : 9789353174958
  • Edition : 1
  • Publishing Year : DECEMBER 2020
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 304
  • Language : Translated From ENGLISH to MARATHI
  • Category : SHORT STORIES
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
COCK-TALE CARNIVAL IS A CELEBRATION OF STORIES TO TICKLE YOUR LITERARY BONE. A SCRUMPTIOUS FEAST, WHERE YOU ARE BOUND TO EXPERIENCE THE ENTIRE GAMUT OF EMOTIONS...FROM AMUSEMENT TO INTRIGUE, FROM PATHOS TO AROUSAL TO SURPRISE – AN ORDER, FAIRLY UNPREDICTABLE!
कॉकटेल कार्निव्हल हा तुमच्या साहित्यिक अभिरुचीला साद घालणार्या कथांचा एक उत्सव आहे, एक रुचकर मेजवानी आहे. यात अनेक रस चाखायला मिळतात - मनोरंजनापासून ते कुतूहलापर्यंत, कारुण्यापासून ते विस्मयापर्यंत – कुठला रस केव्हा पुढे ठाकेल याची पूर्वकल्पना न देता. ज्याला विविध प्रकारच्या निमंत्रितांच्यात मिसळायला आवडेल अश्या वाचनवेड्यांसाठी ही जत्रा.
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
#COCKTALECARNIVAL #CHETAANJOSHII #MANJIRIDHAMANKAR #TRANSLATED STORIES #MARATHIBOOKS#ONLINEMARATHIBOOKS#TRANSLATEDMARATHIBOOKS#TBC#TRANSLATEDBOOKS@50% #कॉकटेलकार्निव्हल #चेतनजोशी #मंजिरीधामणकर #अनुवादितकथासंग्रह #मराठीपुस्तके #मराठीप्रकाशक
Customer Reviews
  • Rating StarMAHARASHTRA TIMES 30-05-2021

    वेगळ्या वाटेवरच्या कथा... ‘कॉकटेल कार्निव्हल’ हा कथासंग्रह चेतन जोशी यांच्या त्याच नावाच्या इंग्रजी पुस्तकाचा अनुवाद आहे. हा अनुवाद मराठीत मंजिरी धामणकर यांनी केला आहे. वेगळी वाट चोखाळून लिहिलेल्या या कथा आहेत. प्रत्येक कथेचा आकृतीबंध वेगळा, शैली वेळी, मुळात कल्पनाच वेगळी आणि या वेगळ्या कल्पनेला कुठल्याही साच्यात न अडकता लेखक मुक्त सोडतो, तिच्याशी प्रामाणिक राहतो, असे वाटते, की लेखक शिल्प घडवीत आहे. त्यात प्रयोग करीत आहे. वेगळा आकार देऊन बघत आहे. कदाचित शिल्प स्वत:च्या इच्छेने साकारत जात आहे आणि त्यावेळी लेखक फक्त माध्यम उरतो आहे. ‘अरूपाचे रूप’ कथेत सर्जनाला प्रेरणा देणारा राग निर्मितीचा ध्यास आहे. सात स्वरांतील एक स्वर गायब होणे, ही कल्पनाच विलक्षण आहे. या भन्नाट कल्पनेचा ओहोळ बघता बघता प्रपात होतो, वाचकाला त्यात ओढून पुढे मार्गक्रमण करतो. ‘पैसा झाला खोटा’ असेच एक वेगळे शिल्प. ‘बोलाविता धनी’ ही कथा शब्दभ्रामकाची आहे बोलक्या बाहुल्या घेऊन विविध आवाज काढणाऱ्या अवलियाची कॉलेजात घडणारी ही कथा शेवटी काय वळण घेते, हे कथेतच वाचायला हवे. शेवटची कथा ‘ओ हेन्रीचा शाप’ असाच वेगळ्या वाटेवरचा वेगळा अनुभव देते. ‘लवकर ये रे मित्रा’ ही गूढकथेच्या वाटेवर जाणारी कथादेखील अगदी वेगळे वळण घेते. कुठलेही पान उघडावे अन् कुठलीही कथा वाचावी. कथा छोट्या, कंटाळा येण्यापूर्वीच संपणाऱ्या आणि स्तंभित करणाऱ्या आहेत. ‘द्विभुज त्रिकोण’ यात दुभंग व्यक्तिमत्त्वातील दोघांचेही एकीवरच प्रेम जडते, ही अफलातून कल्पना कथा रूप घेते. ‘वर्षानृत्य’ कथेतील निसर्गाच्या वेगळ्या चपखल शब्दांतील वर्णनात वाचक हरवून जातो. तो देखावा नजरेसमोर साकारतो. कोकिळा कुहुकली, कावळा कावकावला, बिरंगी खंड्या अशा शब्दयोजना वाचताना अनुवादिकेचे कौशल्य दिसते. मुळात अनुवाद हा अवघड लेखन प्रकार. त्यातही अशा वेगळ्या आशयाच्या, वेगळ्या पातळीवरील कथांचा अनुवाद फारच कठीण. तारेवरची कसरत. तीही सहज व्हायला हवी. या अनुवादात ती दिसून येते. ‘रेडिओऍक्टिव्ह प्रेम’, ‘ऍडव्हर्टिब्रेट’, ‘संकेतस्थळ-प्लँचेट’, ‘माउस ट्रॅप’, ‘इतिहासाला स्मरण नसतं’ इत्यादी प्रत्येक कथेचा वेगळा विषय, त्यासाठी प्रत्येक वेळी वापरलेला वेगळा आकृतिबंध, कथा विषयातील ज्ञान, भावनांची प्रामाणिक अभिव्यक्ती, कथेच्या शेवटासाठी केलेला अनेक शक्यतांचा विचार ही चेतन जोशी यांच्या कथालेखनाची ठळक वैशिष्ट्ये आहेत. म्हणूनच त्यांच्या कथा बौद्धिक आनंद देत देत मनोरंजन करतात. कल्पनाबीजाचे रूप साकारताना लेखक त्यावर संस्कार करीत नाहीत. त्याला फुलू देतात. वाढू देतात. कथा पुढे सरकते, दिशा ठरते, त्या दिशेने वाचकांचे विचार पुढे धावतात आणि एका बेसावध क्षणी लेखक वाचकाला सोडून वेगळ्याच मार्गाने निघून गेलेला असतो. वाचक अचंबित, स्तंभित! अनेकदा आपण कविता कशी जन्म घेते ही कवीकडून ऐकतो; पण लेखनसुन्नता - रायटर्स ब्लॉक याविषयी तुम्ही लेखकाचा स्वानुभव कधी ऐकला आहे का? तर मग तो पहिल्याच कथेत वाचायला हवा. कथेचे नाव आहे ‘मोरपंखी शाईची दलदल’. या सुन्नतेत येणारा अनुभव मानसिक पातळीवर कसा असतो, हे शब्दात उतरवणे महाकठीण, लेखकाचा प्रामाणिक प्रयत्न, झोकून देणे अशातून हा अनुभवही वाचकांसमोर साकारतो. मानसिक पातळीवरील विचार आणि प्रत्यक्ष जीवन याचा दुपेडी गोफ कथेत गुंफला आहे. मुळात हा विषय नव्हे, अनुभव लिहावासा वाटला, हेच विशेष आणि तो उतरलाही असा, की वाचक लेखकाच्या मानसिक क्लेशाचा साक्षीदार होतो. अनुवादाला कठीण अशा या कथेत अनुवादिकेने लेखकाचा मानसिक अवकाश कवेत घेतला आहे. नावाप्रमाणेच विविध विषय, विविध आकृतिबंध यांनी बनवलेले हे ‘कथांचे कॉकटेल’ रसपूर्ण आणि चवदार बनले आहे. कथांचा रोचक, रंजक व रोमांचक अनुभव घेण्यासाठी हे पुस्तक वाचायलाच हवे. – प्रतिमा दुरुगकर ...Read more

  • Rating StarMAHARASHTRA TIMES 25.04.2021

    कागद तोच, रंग तेच , कुंचला तोच; पण प्रतिभावान चित्रकार त्यातून पाहता पाहता इतरांपेक्षा वेगळे काही तरी साकारून दाखवितात. हे पुस्तक तसेच आहे. पात्र , प्रसंग आपल्यातीलच ; पण चेतन जोशी या सर्वांना वेगळा आयाम देतात. कथेला सुरुवात करताना वाचक ज्या अपेक्षा ेऊन असतो, त्या पलीकडे ते घेऊन जातात. ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

SARTH
SARTH by DR. S. L. BHYRAPPA Rating Star
हेमंत सांबरे

गेल्या तीन दिवसांत ही कादंबरी वाचून पूर्ण झाली .. ही कादंबरी वाचून होताच मन अगदी सुन्न होऊन गेले आहे . त्याचबरोबर अनेक संमिश्र भावना मनात दाटून आल्या आहेत . #आवरण ही जगप्रसिद्ध कादंबरी वाचल्यानंतर भैरप्पा यांच्या बद्दल मनात खूप आदरभाव निर्माण झाला होा . त्यानंतर त्यांचे हे दुसरे पुस्तक म्हणजे #सार्थ आज वाचून पूर्ण केले. या कादंबरीची कथा सातव्या शतकात घडत असते . *नागभट्ट* हा कादंबरीचा नायक आहे . हा नागभट्ट तुमच्या माझ्या सारखा एक सर्वसामान्य मनुष्य आहे . भैरप्पा यांनी त्याच्या नजरेतून त्या काळात घडत असलेल्या अनेक घटनांचा सूक्ष्म आढावा आपल्या समोर अतिशय समर्थपणे मांडला आहे . हे सातवे शतक म्हणजे असे होते की वैदिक धर्माचा प्रभाव जरी जनमानसात असला तरी , बौद्ध धर्माने ही आपली पाळेमुळे पूर्ण निदान उत्तर भारत , पूर्व भारत या भागात पसरवली होती . एक सामान्य मनुष्य म्हणून नागभट्टच्या मनात सुरू असलेली विविध द्वंद , त्याची वैदिक धर्म की बौद्ध धर्म याविषयी झालेली द्विधा मनस्थिती ही लेखकाने अचूक टिपली आहे . अनेक चर्चांमधून बौद्ध तत्त्वज्ञान , वैदिक तत्त्वज्ञान यांची ओळख अतिशय सोप्या भाषेत लेखक आपल्याला करून देतात , ते वाचताना आपल्या चित्ताला एक वेगळेच समाधान मिळत राहते .. या सर्व तत्त्वज्ञानाची प्रदीर्घ चर्चा , नायकाला येत असलेले वेगवेगळे अनुभव यातून आपणही समृध्द होत जातो . मधल्या काळात नायक मथुरेला येऊन राहतो . तेव्हा तिथल्या एका नाटक मंडळींबरोबर ओळख होऊन नायकाला त्यांच्या एका नाटकात प्रत्यक्ष *कृष्णाची* भूमिका करायला मिळते . तेव्हा त्याचे नाव *कृष्णानंद* असे होते . या भूमिकेमुळे नायकाला त्या भागात प्रचंड प्रसिध्दी मिळते . या नाटकातील असलेली त्याची नायिका चंद्रिका या सुंदर स्त्री बरोबर त्याचा विशेष स्नेह होऊन त्यांचे प्रेम ही जुळते . एखादी गोष्टीचा प्रचंड अभ्यास करून त्याला मांडणे यात भैरप्पा यांचा हात कदाचित फार कमी लेखक धरू शकतील . ही कादंबरी वाचतानाही प्रत्यही जाणवत राहते . याच काळात आद्य शंकराचार्य व मंडणमिश्र यांच्यातील झालेल्या जगप्रसिद्ध वादावर दोन ते तीन प्रकरणे या पुस्तकात आली आहे . या दोन दिग्गज वैदिक ऋषी बद्दल मी इतर अनेक ठिकाणी खूप ओझरते उल्लेख ऐकले होते , पण या कादंबरीत विस्तृत माहिती मिळाली , व एक वेगळेच समाधान मिळाले . कादंबरीचा शेवट आपल्याला पुस्तकातील आधीच्या अनेक कथावस्तू पासून एका वेगळ्याच दुनियेत घेऊन जातो .. याच सातव्या शतकात वायव्येकडून अरब लोकांची आक्रमणे सुरू झाली होती . तोपर्यंत भारतवर्षात लढली जाणारी युद्ध फक्त रणांगणावर लढली जात , त्याचा सामान्य जनतेला कुठलाही त्रास होत नसे . पण अरबांनी केलेल्या आक्रमण मुळे भारताचा सांस्कृतिक ढाचा कसा उद्ध्वस्त होऊ लागला याचे अचूक व सत्य वर्णन भैरप्पा यांनी केले आहे . ते वाचताना तेव्हाही हिंदूंची सद्गुण विकृती ( अनावश्यक असलेली अती सहिष्णुता ) कशा प्रकारे हिंदूंचा नाश करते हे ही त्यांनी सांगितले आहे . ती सर्व शेवटची प्रकरणे आपण सर्व हिंदूंनी मुळातच वाचण्यासारखी व अभ्यास करण्यासारखी आहे . एका प्रसंगात जेव्हा काही राजे एकत्र येऊन अरबांवर आक्रमण करण्याचे योजतात , तेव्हा धूर्त अरब त्या गावातील सूर्यमंदीर भ्रष्ट करायची धमकी देऊन त्या गावातील लोकांना युद्ध करण्यापासून व बाहेरून आलेल्या सैनिकांना सहाय्य न करण्याचे वचन घेतात . त्यामुळे जे नको तेच होते , व हळूहळू तो प्रदेश अरबांच्या ताब्यात जाऊन तेथला बौद्ध , वैदिक हिंदू धर्म नष्ट होऊ लागतो , याचे विदारक वर्णन आपल्यासमोर येते . हे वाचताना मला १७५१ साली नानासाहेब पेशव्यांनी काशी वर आक्रमण करून ते क्षेत्र मुक्त करण्याच्या प्रसंगाची आठवण झाली . तेव्हाही काशी मधील जनतेने नानासाहेब पेशव्यांना रोखले होते , नाहीतर तेव्हाचा ज्ञानवापी मंदीर मुक्त झाले असते ... तेव्हाही हिंदूंची सद्गुण विकृती आड आली जशी ती सातव्या शतकात ही आड आली होती .. असो --- अनेक अद्भुत प्रसंगातून आपल्याला ही कादंबरी घेऊन जात राहते ..सातव्या शतकातील भारताचे वर्णन वाचून आपण त्यावेळच्या राजांची वृत्ती , जनतेचा स्वभाव , साधू तसेच बौद्ध भिक्खू यांचे स्वभाव, त्यांचे विचार आपल्याला कळत जातात . लेखक आपल्याला नालंदा विद्यापीठ देखील दाखवून आणतो . त्याकाळात तेथील अध्ययन कसे चालत असे , हेदेखील आपल्याला वाचायला मिळते . पुस्तकाला कादंबरीची मोकळीक असली तरी आपल्याला ऐतिहासिक दृष्टिकोन ही मिळतो , हे नक्की ! ही कादंबरी वाचून होताच, भैरप्पा यांच्या इतर सर्व कादंबऱ्या व पुस्तके वाचण्याची उत्सुकता निर्माण झाली आहे , व ती इच्छा ही लवकरच पूर्ण होईल ही आशा! ...Read more