* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: COCKTALE CARNIVAL
  • Availability : Available
  • Translators : MANJIRI DHAMANKAR
  • ISBN : 9789353174958
  • Edition : 1
  • Publishing Year : DECEMBER 2020
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 304
  • Language : Translated From ENGLISH to MARATHI
  • Category : SHORT STORIES
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
COCK-TALE CARNIVAL IS A CELEBRATION OF STORIES TO TICKLE YOUR LITERARY BONE. A SCRUMPTIOUS FEAST, WHERE YOU ARE BOUND TO EXPERIENCE THE ENTIRE GAMUT OF EMOTIONS...FROM AMUSEMENT TO INTRIGUE, FROM PATHOS TO AROUSAL TO SURPRISE – AN ORDER, FAIRLY UNPREDICTABLE!
कॉकटेल कार्निव्हल हा तुमच्या साहित्यिक अभिरुचीला साद घालणाऱ्या कथांचा एक उत्सव आहे, एक रुचकर मेजवानी आहे. यात अनेक रस चाखायला मिळतात - मनोरंजनापासून ते कुतूहलापर्यंत, कारुण्यापासून ते विस्मयापर्यंत – कुठला रस केव्हा पुढे ठाकेल याची पूर्वकल्पना न देता. ज्याला विविध प्रकारच्या निमंत्रितांच्यात मिसळायला आवडेल अश्या वाचनवेड्यांसाठी ही जत्रा.
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
#COCKTALECARNIVAL #CHETAANJOSHII #MANJIRIDHAMANKAR #TRANSLATED STORIES #MARATHIBOOKS#ONLINEMARATHIBOOKS#TRANSLATEDMARATHIBOOKS#TBC#TRANSLATEDBOOKS@50% #कॉकटेलकार्निव्हल #चेतनजोशी #मंजिरीधामणकर #अनुवादितकथासंग्रह #मराठीपुस्तके #मराठीप्रकाशक
Customer Reviews
  • Rating StarMAHARASHTRA TIMES 30-05-2021

    वेगळ्या वाटेवरच्या कथा... ‘कॉकटेल कार्निव्हल’ हा कथासंग्रह चेतन जोशी यांच्या त्याच नावाच्या इंग्रजी पुस्तकाचा अनुवाद आहे. हा अनुवाद मराठीत मंजिरी धामणकर यांनी केला आहे. वेगळी वाट चोखाळून लिहिलेल्या या कथा आहेत. प्रत्येक कथेचा आकृतीबंध वेगळा, शैली वेळी, मुळात कल्पनाच वेगळी आणि या वेगळ्या कल्पनेला कुठल्याही साच्यात न अडकता लेखक मुक्त सोडतो, तिच्याशी प्रामाणिक राहतो, असे वाटते, की लेखक शिल्प घडवीत आहे. त्यात प्रयोग करीत आहे. वेगळा आकार देऊन बघत आहे. कदाचित शिल्प स्वत:च्या इच्छेने साकारत जात आहे आणि त्यावेळी लेखक फक्त माध्यम उरतो आहे. ‘अरूपाचे रूप’ कथेत सर्जनाला प्रेरणा देणारा राग निर्मितीचा ध्यास आहे. सात स्वरांतील एक स्वर गायब होणे, ही कल्पनाच विलक्षण आहे. या भन्नाट कल्पनेचा ओहोळ बघता बघता प्रपात होतो, वाचकाला त्यात ओढून पुढे मार्गक्रमण करतो. ‘पैसा झाला खोटा’ असेच एक वेगळे शिल्प. ‘बोलाविता धनी’ ही कथा शब्दभ्रामकाची आहे बोलक्या बाहुल्या घेऊन विविध आवाज काढणाऱ्या अवलियाची कॉलेजात घडणारी ही कथा शेवटी काय वळण घेते, हे कथेतच वाचायला हवे. शेवटची कथा ‘ओ हेन्रीचा शाप’ असाच वेगळ्या वाटेवरचा वेगळा अनुभव देते. ‘लवकर ये रे मित्रा’ ही गूढकथेच्या वाटेवर जाणारी कथादेखील अगदी वेगळे वळण घेते. कुठलेही पान उघडावे अन् कुठलीही कथा वाचावी. कथा छोट्या, कंटाळा येण्यापूर्वीच संपणाऱ्या आणि स्तंभित करणाऱ्या आहेत. ‘द्विभुज त्रिकोण’ यात दुभंग व्यक्तिमत्त्वातील दोघांचेही एकीवरच प्रेम जडते, ही अफलातून कल्पना कथा रूप घेते. ‘वर्षानृत्य’ कथेतील निसर्गाच्या वेगळ्या चपखल शब्दांतील वर्णनात वाचक हरवून जातो. तो देखावा नजरेसमोर साकारतो. कोकिळा कुहुकली, कावळा कावकावला, बिरंगी खंड्या अशा शब्दयोजना वाचताना अनुवादिकेचे कौशल्य दिसते. मुळात अनुवाद हा अवघड लेखन प्रकार. त्यातही अशा वेगळ्या आशयाच्या, वेगळ्या पातळीवरील कथांचा अनुवाद फारच कठीण. तारेवरची कसरत. तीही सहज व्हायला हवी. या अनुवादात ती दिसून येते. ‘रेडिओऍक्टिव्ह प्रेम’, ‘ऍडव्हर्टिब्रेट’, ‘संकेतस्थळ-प्लँचेट’, ‘माउस ट्रॅप’, ‘इतिहासाला स्मरण नसतं’ इत्यादी प्रत्येक कथेचा वेगळा विषय, त्यासाठी प्रत्येक वेळी वापरलेला वेगळा आकृतिबंध, कथा विषयातील ज्ञान, भावनांची प्रामाणिक अभिव्यक्ती, कथेच्या शेवटासाठी केलेला अनेक शक्यतांचा विचार ही चेतन जोशी यांच्या कथालेखनाची ठळक वैशिष्ट्ये आहेत. म्हणूनच त्यांच्या कथा बौद्धिक आनंद देत देत मनोरंजन करतात. कल्पनाबीजाचे रूप साकारताना लेखक त्यावर संस्कार करीत नाहीत. त्याला फुलू देतात. वाढू देतात. कथा पुढे सरकते, दिशा ठरते, त्या दिशेने वाचकांचे विचार पुढे धावतात आणि एका बेसावध क्षणी लेखक वाचकाला सोडून वेगळ्याच मार्गाने निघून गेलेला असतो. वाचक अचंबित, स्तंभित! अनेकदा आपण कविता कशी जन्म घेते ही कवीकडून ऐकतो; पण लेखनसुन्नता - रायटर्स ब्लॉक याविषयी तुम्ही लेखकाचा स्वानुभव कधी ऐकला आहे का? तर मग तो पहिल्याच कथेत वाचायला हवा. कथेचे नाव आहे ‘मोरपंखी शाईची दलदल’. या सुन्नतेत येणारा अनुभव मानसिक पातळीवर कसा असतो, हे शब्दात उतरवणे महाकठीण, लेखकाचा प्रामाणिक प्रयत्न, झोकून देणे अशातून हा अनुभवही वाचकांसमोर साकारतो. मानसिक पातळीवरील विचार आणि प्रत्यक्ष जीवन याचा दुपेडी गोफ कथेत गुंफला आहे. मुळात हा विषय नव्हे, अनुभव लिहावासा वाटला, हेच विशेष आणि तो उतरलाही असा, की वाचक लेखकाच्या मानसिक क्लेशाचा साक्षीदार होतो. अनुवादाला कठीण अशा या कथेत अनुवादिकेने लेखकाचा मानसिक अवकाश कवेत घेतला आहे. नावाप्रमाणेच विविध विषय, विविध आकृतिबंध यांनी बनवलेले हे ‘कथांचे कॉकटेल’ रसपूर्ण आणि चवदार बनले आहे. कथांचा रोचक, रंजक व रोमांचक अनुभव घेण्यासाठी हे पुस्तक वाचायलाच हवे. – प्रतिमा दुरुगकर ...Read more

  • Rating StarMAHARASHTRA TIMES 25.04.2021

    कागद तोच, रंग तेच , कुंचला तोच; पण प्रतिभावान चित्रकार त्यातून पाहता पाहता इतरांपेक्षा वेगळे काही तरी साकारून दाखवितात. हे पुस्तक तसेच आहे. पात्र , प्रसंग आपल्यातीलच ; पण चेतन जोशी या सर्वांना वेगळा आयाम देतात. कथेला सुरुवात करताना वाचक ज्या अपेक्षा ेऊन असतो, त्या पलीकडे ते घेऊन जातात. ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

MAHARUDRA
MAHARUDRA by G.B. DESHMUKH Rating Star
डॉ. जयंत वडतकर.अमरावती

मेळघाटचा एन्सायक्लोपिडीया असलेले निवृत्त वनाधिकारी श्री. रविंद्र वानखडे यांच्या अनुभवांवर आधारित कुलामामाच्या देशात हे पुस्तक वाचले तेव्हापासून या पुस्तकाचे लेखक श्री. जी. बी. देशमुख यांना भेटण्याची इच्छा होती. इच्छाशक्ती असली की योग जुळून येतो असं महणतात. रविंद्र वानखडे सरांच्या माध्यमातूनच तो योग जुळून आला. माझ्या एक पुस्तकाचे प्रकाशन बाबत वानखडे सरांशी चर्चा करीत असताना त्यांनी लेखकाचा संदर्भ दिला व जी.बी. ना भेटून घ्या असे सांगितले. भेट घडून आली. अगदी सहज, घरगुती भेट झाली, गप्पा रंगल्या. यावेळी जी. बी. देशमुख यांनी त्यांचे पहिले पुस्तक महारुद्र मला भेट दिले. आमच्या चर्चेतून आणि आंतरराष्ट्रीय फुटबॉल मथला मराठमोळा झंझावात महारुद्र, हे या पुस्तकाचे शीर्षक वाचून पुस्तकाचा विषय थोडक्यात समजला. लेखकाचे वडील भीमराव देशमुख यांनी फुटबॉलपटू म्हणून गाजविलेल्या कारकीदींचा आढावा या पुस्तकात होता. एका मुलाने आपल्या वडिलांवर लिहिलेले पुस्तक कसे असेल? असा प्रश्न अन पुस्तक, दोन्ही घेऊन घरी आलो. भेट मिळालेले पुस्तक वेळ मिळाला तसे एका बैठकीत वाचून काढले. आता गल्ली गल्लीत जसं क्रिकेट खेळल्या व बघितले जाते तसं स्वातंत्र्य पुर्व काळात वऱ्हाडात फुटबॉल खेळला जात असे. गावागावांत टीम असायच्या, सामने अर्थात स्पर्धा भरवल्या जात असत. स्वातंत्र्यपूर्व काळात अशाच रुपयांमधून चमकत, वऱ्हाडाच्या ग्रामीण भागातील एका खेळाडूने थेट मुंबईतील फुटबॉल क्लब व आंतरराष्ट्रीय स्पर्धेत मुसंडी मारत आपल्या खेळाचा व व्यक्तीमत्त्वाचा ठसा उमटविला होता. तो काळ होता १९३० ते १९५० चा. त्या वल्लीचे नाव होतं भिमराव देशमुख. जी. बी. देशमुख यांनी त्यांच्या वडिलांवर लिहिलेले महारुद्र पुस्तक काही फक्त भिमराव देशमुख यांची जीवन चरित्र नाही. स्वातंत्र्य मिळण्याच्या साधारण वीस वर्षा पुर्वी ३० ते ५० च्या दशकात आपल्या देशातील खेळाची स्थिती कशी होती. विशेषतः वऱ्हाडाच्या ग्रामीण भागातील स्थिती कशी होती. कुठले खेळ खेळले जात असत. स्पर्धा कशा भरवल्या जात असत. शाळा आणि शिक्षण कसं होतं. आर्थिक स्थिती कशी होती. अमरावती जिल्ह्यातील कोणत्या गावात फुटबॉलच्या नावाजलेल्या टीम होत्या. अमरावती कशी होती याची माहिती सुद्धा या पुस्तकातून वाचायला मिळते. पुस्तकाच्या पहिल्याच प्रकरणात भीमराव यांचे व्यक्तिमत्व कसं होतं हे सांगण्यासाठी लेखकाने बाबा म्हणून जरी त्यांची ओळख करून दिली असली तरी पुढील सर्व प्रकरणातून त्यांनी भीमराव अशा एकेरी उल्लेखातून हे व्यक्तिमत्व साकारले आहे. वऱ्हाडातल्या आपल्या सवयीनुसार प्रसिद्धी पासून दूर राहिलेल्या एका नामवंत फुटबॉलपटूची कारकीर्द व फुटबॉल पश्चात कौटुंबिक कारकीर्द तटस्तपणे मांडण्यात लेखक यशस्वी झाले आहेत हे आधीच सांगून टाकतो. अमरावती जिल्ह्यातील खारतळेगाव येथील फुटबॉलच्या टीम मध्ये भीमराव देशमुख यांची कारकीर्द सुरु झाली. ती १९३० सालापासून त्यावेळी ते जेमतेम विशीत होते. प्रथम शालेय स्पर्धापासून पुढे क्लब स्पर्धा पासून भीमरावने आपल्या खेळाचा ठसा उमटविला हळूहळू ख्याती विदर्भांत पोहोचली, भीमराव यांचा खेळ बघण्यासाठी लोक खास वेळ काढून येऊ लागेल, १९३८-३९ मध्ये विदर्भात झालेल्या काही स्पर्धात मुबंईच्या काही टीम सहभागी झाल्या होत्या, त्यामुळे नावाजलेल्या ब्रिटीश खेळाडूंसोबत खेळण्याची संधी मिळाली. मुंबईच्या इंग्रजांच्या टीमला वऱ्हाडातील भीमराव यांच्या टीमने हरविले. वायएमसिए, मुंबईच्या अलेक्झांडर नावाच्या कप्तानाने भीमरावच्या खेळाने प्रभावित होऊन खारतळेगावच्या चार खेळाडूंना मुंबईच्या टीम कडून खेळण्याचे निमंत्रण दिले. १९४० ला भीमराव सह चार खेळाडू मुंबईत पोहोचले. अलेक्झांडरने त्यांना सराव शिबिरीत घातले. पुढील वर्षात भीमराव वायएमसिए टीम कडून खेळण्यासाठी करारबद्ध झाले. जशा आयपीएल मध्ये आज वेगवेगळ्या टीम खेळतात तसे त्यावेळी मुंबईत फुटबॉलचे क्लब होते. पुढील १० वर्षे अनेक टीम कडून खेळत अनेक स्पर्धा गाजविल्या. भीमराव यांचेवर तेव्हाच्या इंग्रजी वृत्तपत्रांतून रकाने छापले जाऊ लागले. मुंबईतील आपल्या १२ वर्षाच्या कार्यकाळात क्लब स्पर्धामधून त्यांनी ४०० सामने खेळले, तब्बल २५० गोल मारलेत. भीमराव वेगवेगळ्या स्पर्धामधून खेळत मैदान गाजवत होते. त्यातूनच १९४८ च्या ऑलम्पिक स्पर्धेच्या टीम मध्ये निवड झाली मात्र एका सराव सामन्यात पाय फॅक्चर झाल्याने देशाकडून खेळण्याची संधी हुकली. पुढील वर्षात भीमराव हे भारतीय टीम सोबत मलेशिया, कंबोडिया, इंडोनेशिया, म्यानमार, फिलिपिन्स, हाँगकाँग, थायलंड अशा देशात खेळले, या दौऱ्यातील २० पैकी १९ सामने जिंकले. भीमराव आंतरराष्ट्रीय फुटबॉलपटू झाले होते. इतके खेळून भीमराव यांचेकडे आर्थिक नियोजन नसल्याने परिस्थिती जेमतेमच होती. अशातच १९५१ साली त्यांनी निवृत्ती घेतली. अमरावती मध्ये परत आल्यावर त्यांनी आपला संसार थाटला, आर्थिक पाठबळ नसल्याने फुटकळ व्यवसाय केले. मात्र मी कधीकाळी आंतरराष्ट्रीय खेळाडू होते याचा कधी उल्लेख सुद्धा केला नाही, प्रसिद्धी पासून ते कायमच दूर राहिले. या काळात भीमराव यांच्या पत्नी अंजीरा यांनी जबाबदारीनं संसार सांभाळला. मुलांना मोठे केले. भीमराव शेवटपर्यंत मेहनत करीत राहिले. समाजात चांगले स्थान निर्माण केले. मात्र ते इतके मोठे फुटबॉलपटू होते ते अमरावतीकरांना काही माहिती झाले नाही. भीमराव यांच्या निधनानंतर या आंतरराष्ट्रीय फुटबॉलपटूचे कार्य पुढील पिढीला माहित व्हावे या उद्देशाने जी. बी. देशमुख यांनी या पुस्तकातून आपल्या तीर्थरुपांचे भावचित्र अगदी सोप्या सरळ भाषेत शब्दबद्ध करून महारुद्र च्या रूपाने वाचकांसमोर ठेवले. या लिखाणासाठी त्यांनी मुंबईत जाऊन त्या काळातील टाईम्स वृत्तपत्रांतील भीमराव यांचा उल्लेख असलेली कात्रणे मिळविली, त्यांच्या समवेत खेळलेल्या खेळाडूंना व पत्रकारांना भेटले, अमरावती मधील त्यांच्या समवयस्क परिचितांकडून त्यांची माहिती गोळा केली. त्यासाठी त्यांनी अथक अशी मेहनत घेतली. व २००५ साली हे पुस्तक प्रकाशित झाले. या पुस्तकाच्या पुढील आवृत्ती मेहता प्रकाशन पुणे यांनी प्रकाशित केल्याने ते पुस्तक महाराष्ट्रभर पोहोचले. या निमित्त्याने भीमराव यांचे कार्य, त्यांचा फुटबॉल खेळातील झंझावात मराठी माणसाला माहिती झाला. अमरावतीकर या नात्याने मला तर आपल्या मातीतील माणूस त्या काळात आंतरराष्ट्रीय पातळीवर झेंडा गाडून आल्याचा अभिमान वाटला. अशा अनेक अर्थाने महारुद्र महत्वाचे आहे. ...Read more

HATUMUTUCHA CHANDRA
HATUMUTUCHA CHANDRA by FARUK KAZI Rating Star
सलिल तांबे

ज्यांना गोष्टींची आवड आहे अशा मुलांसाठी ही मेजवानी आहेच, पण आपल्या पाल्यांमध्ये संवेदनशीलता आणि निसर्गाप्रती आदर जोपासण्यासाठी मोठ्यांनीही हे पुस्तक वाचायला हवे. प्रदूषणाविरुद्ध लहान हातांनी दिलेला लढा असो किंवा निसर्गाचा खरा आनंद पिशवीत भरून आणण्यापक्षा मनात कसा साठवावा, हे सांगणारा दृष्टिकोन असो; हे पुस्तक प्रत्येक वाचकाला समृद्ध करते. पुस्तकातील प्रत्येक कथा संपताना आपल्याला जगण्याकडे बघण्याची एक नवी दृष्टी देऊन जाते. यातलं काही गूढ, काही थरार आणि खूप सारे हळवे प्रसंग अनुभवण्यासाठी तुम्हाला हे पुस्तक स्वतः वाचायलाच हवं. म्हणूनच, आपल्या संग्रही असावा असा हा `हाटूमुटूचा चंद्र` तुम्ही एकदा नक्की अनुभवा! चला तर मग, आपणही शोधूया आपला स्वतःचा ‘हाटूमुटूचा चंद्र’! ...Read more