* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: KUNTI
  • Availability : Available
  • Translators : SUDHIR KAUTHALKAR
  • ISBN : 9789386888570
  • Edition : 1
  • Publishing Year : NOVEMBER 2017
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 524
  • Language : Translated From GUJRATI to MARATHI
  • Category : FICTION
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
KUNTI (NAME CHANGED) IS A TRUE STORY OF A STRONG MINDED WOMAN, BORN IN AN SOMEWHAT ORTHODOX FAMILY. SHE IS VERY MUCH FOND OF DANCE AND MUSIC. HER FATHER DR. GAJENDRAPRASAD IS TOTALLY AGAINST HER HOBBIES. HE DOES NOT ALLOW KUNTI TO GO OUT OF THE HOUSE. BUT DOCTOR HIMSELF IS FOND OF WINE AND WOMAN. HE LOSES HIS WIFE WHEN KUNTI WAS 18. YOUNG BUT SELFISH MANIBHADRA IS APPOINTED AS A COMPOUNDER BY DOCTOR. HE IS ATTRACTED TOWARDS YOUNG AND BEAUTIFUL KUNTI. BOTH COME TOGETHER. HE TAKES DISADVANTAGE OF SIMPLE KUNTI. SHE BECOMES PREGNANT. SHE IS AFRAID OF HER HOT TEMPERED FATHER. REQUESTS MANIBHADRA TO MARRY HER. BUT HE LEAVES KUNTI AND FLEES AWAY FROM HOME. REJECTED KUNTI SECRETLY LEAVES HER HOUSE, THINKING TO COMMIT SUICIDE – REACHES THE CENTRAL CITY LAKE. BUT THINKING ABOUT THE CHILD IN THE WOMB, SHE CHANGES HER MIND, DECIDES TO BRING UP THE CHILD. SHE TAKES RESCUE OF MAHILA ASHRAM IN THE CITY. ASHRAM CHIEF SARALABEN KNOWS KUNTI AS SHE WAS ONCE A FRIEND OF KUNTI’S MOTHER, ADMITS HER IN THE ASHRAM. THERE KUNTI MEETS A SAINT NAMED HARIRAJSWAMI. SHE IS HIGHLY IMPRESSED BY HIS PERSONALITY. KUNTI UNDERGOES PREMATURE DELIVERY AND GIVES BIRTH TO A SON WHO IS NAMED AS KARNA. HE IS A HEALTHY CHILD. AS PER ASHRAM RULES ANY CHILD BORN BEFORE MARRIAGE HAS TO BE GIVEN FOR ADOPTION. KARNA BECOMES 6 MONTHS OLD. SARALABEN EXPLAINS THE RULE TO KUNTI. SHE STRONGLY OPPOSES KARNA’S ADOPTION. A SWEDISH COUPLE VISITS ASHRAM TO ADOPT A CHILD. COUPLE LIKES KARNA. SEEING KUNTI’S FIRM STAND AGAINST ADOPTION, SARLABEN SENDS KUNTI OUT OF THE TOWN UNDER PRETEXT TO FIND HER ONLY LOVER. WITH GREAT EAGERNESS KUNTI LEAVES THE ASHRAM WITH HIMMAT. HE IS STRAIGHTFORWARD AND FAITHFUL SERVANT IN SURAJMAL’S MILL. SHETH IS ALSO ONE OF THE TRUSTEES OF ASHRAM. BEFORE KUNTI RETURNS, THE ADOPTION CEREMONY OF LITTLE KARNA TAKES PLACE. THE COUPLE IMMEDIATELY LEAVES FOR SWEDEN WITH KARNA. HON. GOVERNER, HARIRAJSWAMI WERE PRESENT FOR CEREMONY. KUNTI RETURNS TO ASHRAM NOT FINDING MANIBHADRA. SHE IS TERRIBLY SHOCKED TO SEE EMPTY CRADLE OF KARNA. COMES TO KNOW WHAT HAS HAPPENED. SARLABEN TRIES TO CONSOLE HER. KUNTI IN SHOCKING GRIEF CANT SPEEK A SINGLE WORD. SHE WRITES TO THE GOVERNOR AND ALSO TO THE PRESIDENT OF INDIA. BUT SHE RECEIVES STEREOTYPE ANSWERS. AFTER SOME DAYS ON THE ADVICE OF HARIRAJSWAMI AND SARLABEN SHE AGREES TO MARY HIMMAT. HE, KNOWING HER PAST AND ABOUT KARNA, ACCEPTS HER AS A WIFE. HE ALSO TRIES TO FINDOUT KARNA’S WHEREABOUTS. BOTH ARE HAPPY IN ONE WAY BUT NEVER FORGET KARNA. AS TIME GOES ON KUNTI GIVES BIRTH TO HER SECOND SON ARJUN. THE SEARCH FOR KARNA IS ON. SARLABEN KNOWS THE ADDRESS OF KARNA, BUT CANNOT DISCLOSE IT TO KUNTI AS A PROMISE GIVEN TO SWEDISH COUPLE. SARLABEN MEETS WITH A FETAL CAR ACCIDENT NEAR BARODA AND ADMITTED IN THE HOSPITAL. SHE CONSTANTLY RECALLS KUNTI. HARIRAJSWAMI CALLS KUNTI. BOTH HIMMAT AND KUNTI RUSH TO THE HOSPITAL. KUNTI IS STRICKEN WITH GRIEF SEEING SARLABEN’S HORRIBLE CONDITION. BEFORE TAKING HER LAST BREATH, SARLABEN GIVES KARNA’S ADDRESS IN SWEDEN. COMING BACK TO AHAMADABAD HARIRAJSWAMI WRITES LETTER TO HIS FRIEND DHIREN GANDHI IN FALOON (SWEDEN). HE ASSURES SWAMIJI TO FIND OUT KARNA. WITH GREAT EFFORTS DHIRENBHAI CONTACTS KARNA, MANAGES KUNTI’S TRAVEL TO SWEDEN. KUNTI ARRIVES AND STAYS WITH GANDHI FAMILY. SHE DENIES EVEN FOOD UNLESS MEETS KARNA. DHIRENBHAI IN THAT STORMY NIGHT MANAGES A MEETING WITH KARNA. BOTH MEET NEAR HIS APARTMENT. SHE OVERWHELMED WITH LOVE, TRIES TO EXPLAIN HER REAL MOTHERHOOD. BUT KARNA HAS BECOME PERFECT SWEDISH AND REJECTS TO ACCEPT HER AS REAL MOTHER. KUNTI’S WISH TO MEET HER SON IS FULFILLED. SHE RETURNS TO INDIA BUT NOT ALONE. KARNA’S WIFE KORIN IS ALSO OF INDIAN ORIGIN AND ADOPTED BY A GUJARATI COUPLE IN SWEDEN. SHE IS PREGNANT AND COMES TO KNOW ABOUT KUNTI. SHE DECIDES TO GO WITH KUNTI TO INDIA FOR HER FIRST DELIVERY. KUNTI FEELS MOTHERLY LOVE FOR HER AND BOTH COME TO MOTHERLAND. AT THE END, ALL COME TOGETHER INCLUDING DR. GAJENDRAPRASAD. AS EVERYTHING SET ON A RIGHT TRACK, HARIRAJSWAMI DECIDES TO GO BACK TO BATALA, HIS NATIVE PLACE. ALL GATHER ON RAILWAY STATION TO SAY GOODBYE TO SWAMIJI.
दृढनिश्चयी वृत्तीच्या, महत्त्वाकांक्षी स्त्रीची ही सत्यकथा आहे. `कुंती` (नाव बदलले आहे.) काहीशा सनातनी वातावरण असलेल्या परिवारात जन्म. लहानपणापासून नृत्य-संगीताची आवड. पण तिचे वडील डॉ. गजेंद्रप्रसाद त्याविरुद्ध. त्यासाठी कुंतीला घराबाहेर जायलाही मज्जाव करणारे डॉक्टर स्वतः मात्र स्त्रीसहवासाचे शौकीन. मद्यपानाचीही सवय. आपण पसंत करू त्याच्याशीच तिने लग्न केले पाहिजे हा अट्टाग्रह. मणिभद्र नामक तरुण गजेंद्रप्रसादांचा कम्पाउन्डर. बराच छेलबटाऊ. कुंती अठरा वर्षांची असतानाच कुंतीची आई निधन पावलेली. त्यामुळे घरातले सर्व व्यवहार कुंतीच पाहते. डॉ. चा राग, मद्यपान सहन करते. तरुण, देखण्या कुंती त व मणिभद्रमध्ये घनिष्ट संबंध निर्माण होतात. त्यातून तिला दिवस जातात. ती भयंकर घाबरते. मणिभद्रला लग्नाबद्दल सुचवते; पण लुच्चा मणिभद्र गुपचूप पळून जातो. निराश होऊन कुंती न सांगता घर सोडते व जीव देण्यासाठी शहरातल्या तलावाकडे निघते. पण उदरातील गर्भाच्या विचारात तिचे मन पालटते. अपत्याला जन्म देऊन वाढवण्याचा निर्धार करते. शहरातल्याच महिला आश्रमात आधार घेते. संचालिका सरलाबेन- कुंतीच्या आईची खास मैत्रीण. त्या तिला आश्रय देतात, तिची काळजी घेतात. आश्रमाचे एक उदार आधारस्तंभ अशा हरिराजस्वामींची कुंतीशी भेट होते. हरिराजस्वामींच्या तेजस्वी व्यक्तीमत्त्वाने व विलक्षण आपुलकीमुळे ती भारावून जाते. ठरल्या दिवसापेक्षा काही काळ आधीच कुंती मुलाला जन्म देते. नाव ठेवते `कर्ण`– अपुऱ्या दिवसांचा असूनही कर्ण प्रकृतीने चांगला असतो. आश्रमाच्या नियमानुसार विवाहापूर्वी झालेले बालक मातेजवळ ठेवता येत नाही, दत्तक द्यावेच लागते. पण सरलाबेन कर्ण सहा महिन्यांचा होईतोपर्यंत थांबतात. अखेरीस नियम सांगतात. कुंती कडाडून कर्णाला दत्तक देण्याबाबत विरोध करते. एक स्वीडिश जोडपे दत्तकासाठी आश्रमात येते. त्यांना कर्णच जास्त आवडतो. कुंतीचा विरोधही कळतो. `आपण तिची समजूत घालू` असे आश्वासन सरलाबेन देतात. एक दिवस कुंतीला `तिचा प्रियकर एका गावी लग्नाला आलाय, त्याला गाठ’ असे खोटेच सांगून हिंमतभाईसह दूर गावी पाठवले जाते. हिंमत सूरजमल शेठजींच्या मिलमध्ये नोकर. तसाच हरिराजस्वामींचा विश्वासू सेवक. इकडे कुंतीला कल्पना न देताच कर्णाचे दत्तकविधान आटोपले जाते. त्याचे स्वीडिश माता-पिता लगेचच मायदेशी परततात. निराश होऊन परतताच कुंतीला सर्व प्रकार कळतो. तिला विलक्षण धक्का बसतो. रागही येतो. सरलाबेन निरनिराळ्या तऱ्हेने समजूत घालायचा प्रयत्न करतात, पण कुंती कर्णाला परत आणण्याचा कृतनिश्चय करते. न्याय मागण्यासाठी ती राज्यपालांपासून राष्ट्रपतीपर्यंत अर्ज करीत राहते; पण तिला सरकारी छापील उत्तरे मिळतात. मध्यंतरी हरिराजस्वामी व सरलाबेन यांच्या सल्ल्यामुळे व मध्यस्थीमुळे कुंतीचा हिंमतभाईशी विवाह होतो. हिंमतला कुंतीच्या जीवनातील घटनेची कल्पना असूनही तो तिचा स्वीकार करतो; इतकेच नव्हे तर कर्णाला परत आणण्यासाठी मदतीचे आश्वासन देतो. काही दिवसांनी सरलाबेनना जीवघेणा अपघात होतो. हिंमत व कुंती बडोद्याला हॉस्पिटलात भेटायला जातात. `आपण जगणार नाही` हे लक्षात येताच सरलाबेन कुंतीला, आतापर्यंत लपवलेला कर्णाचा (आता अ‍ॅलनचा) पत्ता देतात. त्या मृत्यू पावतात. आता कुंती व हिंमत स्वबळावर कर्णाचा पत्ता हुडकून त्याला आणण्याचे प्रयत्न सुरू करतात. कुंतीचा दुसरा मुलगा `अर्जुन`ही मातेच्या मदतीस तत्पर होतो. कुंतीला कर्णभेटीचे वेड लागते. हरिराजस्वामींच्या संदेशामुळे फालूनला राहणारे धीरेन गांधी महत्प्रयासाने कर्णाला शोधून फोनवर संपर्क साधतात. इतकेच नव्हे तर कुंतीच्या स्वीडन प्रवासाचीही व्यवस्था करतात. कुंती त्यांच्या घरीच राहते. `कर्णाला भेटल्याशिवाय मी अन्न घेणार नाही` असे कुंती ऐकवते. त्या रात्री मोठ्या मुश्किलीने, हिमवर्षाव असताना धीरेनभाई तिला कर्णाकडे नेतात... पण तो कुंतीला `अस्सल माता` म्हणून मान्य करत नाही. तो पूर्ण स्वीडिश बनला आहे. धीरेनभाई त्याला सर्व समजवतात, तेव्हा कुंतीला तासाभरानंतर भेटतो– पण पूर्ण त्रयस्थपणे. मुलगा भेटला यावरच समाधान मानून कुंती परतीच्या प्रवासाला निघते. आश्चर्यकारकरीत्या कर्णाची पत्नी `कोरीन`- ही पण गुजराती दाम्पत्याला दत्तक गेलेली– सासूसह पहिल्या बाळंतपणासाठी भारतात यायला निघते. सर्व एकत्र येतात. सगळे व्यवस्थित झाले हे पाहून हरिराजस्वामी कायमसाठी आपल्या गावी पंजाबात, बटाल्याला जायला निघतात. कुंती, हिंमत, गजेंद्रप्रसाद इ. कुणाच्याच आग्रहाला ते मानत नाहीत. अखेर स्टेशनवर त्यांना सर्व जण साश्रू नयनांनी निरोप देतात.
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
#KUNTI#RANJIKUMARPANDYA#SUDHIRKAUTHALKAR#SWISSAIRFLIGHTNOSR185#FLIGHTNOSR416#
Customer Reviews
  • Rating StarVidya Jadhekar

    आजुबाजूच्या नकारात्मकतेतुन स्वतःला थोड लांब ठेवण्यासाठी म्हणून वाचनालयातून पुस्तक आणायला गेले वपुंची फॅन असल्याने वपृुर्झा वाचावे अस ठरवल. पण नेमकच ते न सापडल्याने व तिथल्या कर्मचार्याला घाई असल्याने त्यांनी टेबलावर ठेवलेल हे कुंती पुस्तक माझ्या हाता दिल, "हे घे हे परत पतत नाही भेटायच खुप सुंदर पुस्तक हे ने बिनास्त" अस सांगितलं आणि मीही याच ग्रुप वर कुंती पुस्तकाबद्दल वाचल होत मला वाटल चला महाभारतातील एक पात्र अजुन चांगल समजेल... पुस्तकाच्या कवर वरच `एका सामान्य मातेच्या जीवघेण्या , असामान्य संघर्षाची कहाणी ` हे वाचुनच पुस्तक वाचायचा मुड गेला कारण हलक फुलक वाचण्याची इच्छा असताना संघर्ष वैगेरे हातात आलेल. पण आता आणलचे तर वाचु नाहीच आवडल तर देउ उद्या परत हा साधा विचार करुन पुस्तक सुरु केल पुस्तकाच्या अगदी सुरूवातीलाच वाचणारा पुस्तकाच्या कथेत अडकून जातोय या कुंतीचा तिच्या इच्छेविरुद्ध स्वीडनला पाठवलेला कर्ण ती कशी मिळवते याचा सस्पेन्स अगदी शेवटच्या पानापर्यंत टिकतो. आईची माया तिच अपत्य तिच्यापासून कितीही लांब गेल आणि कितीही परिस्थिती बदलली तरीही कमी होत नाही. प्रचंड इच्छाशक्तीच्या जोरावर अनेक संकटांचा अडचणींचा सामना करत ती माता आपल्या पुत्राला कशी मिळवते हे वाचताना अगदी एक भाग संपल्यावर पुढे काय झाले असेल याची उत्कंठा वाढतेय. कुती राहीलेला आश्रम, त्यांच्या प्रमुख सरलाबेन हरिराजस्वामी तिचे वडील गजेंद्र प्रसाद, तिचा प्रियकर मनिभद्र नवरा हिंमत त्याची बायको पु्ष्पा आई रतनभद्रा ही सर्वच्या सर्व पात्र अत्यंत सुंदरतेने मांडलीयत पुस्तक वाचताना ती जणु डोळ्यासमोर उभी राहतात विशेष म्हणजे हे सर्व वाचताना सुरुवातीला पडलेल्या प्रश्नांची समाधानकारक उत्तर भेटत जातात. अगदी शेवटच्या पानावर कुंतीला तिच्या संघर्षातुन समाधान भेटल्याच समाधान वाचकालाही नक्कीच मिळतय. एकवेळ अवश्य वाचा!!! ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

RADHEYA
RADHEYA by RANJEET DESAI Rating Star
विश्वजीत श्रीपती शिंत्रे.

राधेय.... लेखक रणजित देसाई... मित्र कसा असावा...कर्णासारखा दातृत्व कसं असावं...कर्णासारखं असा हा कर्ण... त्याला अंगराज म्हणावं, दान देणारा दाता म्हणावं, राधेय म्हणावं कि कौतेय... काहीही म्हणा पण कर्णासारखा दाता कर्णानंतर कधी झाला नाही आणि कधी होणरही नाही... रणजित देसाई लिखीत कर्णचरीत्र राधेय आज हातावेगळं झालं ते अश्रुभरल्या नयनांनी...ज्याचा अंत करायला स्वतः देवाधिदेव कृष्णाला अर्जुनाचं सारथ्य करावं लागलं यातच अंगराज कर्णांचं विरत्व अधोरेखीत होत आहे. जन्मापासुन ज्याला केवळ सुतपुत्र म्हणुन वागणुक मिळाली असा तो कर्ण स्वतःच्या बळावर इतका महान लढवय्या बनला. पुस्तकाच्या प्रास्ताविकात देसाईंनी म्हटलं आहे की राधेय मधला कर्ण महाभारतात शोधायची गरज नाही. प्रत्येकाच्या मनातच तो दडलेला असतो, कदाचित आपल्या मनाची चार पाने उलटलीत, तर त्यात हा कर्ण दिसेल. त्याचं दु:खं, पोरकेपण आणि त्यातून पार होवून एक अनोखी ऊंची गाठणारं त्याचं दातृत्व, व्यक्तित्व याचं एक भव्य, शोकात्म चित्र राधेय मधून उभं राहतं. राधेय या कादंबरीत रणजित देसाईंच्या शब्दांनी कर्णाची अनेक रुपे अनुभवता आली. त्यामध्ये राधाई आणि वृषाली सोबतचा कर्ण, दुर्यौधनासोबतचा कर्ण, कृष्णासोबतचा कर्ण, रणांगणावरचा कर्ण आणि नदीकाठी पाठमोरा ऊभा राहत दान करत असलेला कर्ण अशा अनेक रुपांनी प्रत्येकवेळी वेगळा भासला. वृषसेन आणि चक्रधराच्या मृत्युने हळवा झालेला कर्णही वाचकाच्या डोळ्यातही पाणी आणवतो... समोर मृत्यु दिसत असताना सुध्दा केवळ दिलेल्या वचनामुळे हातातील धनुष्याचा त्याग करुन शस्त्रहिन हेणारा कर्ण रणजित देसाईंच्या शब्दांमुळे आजन्म लक्षात राहील. कर्णासारखं होणं कुणालाही कदापि शक्य नाही पण त्यातला एखादा जरी चांगला गुण अंगी बाळगण्याचा प्रयत्न प्रत्येकाने नक्कीच केला पाहीजे... प्रत्येकाच्या संग्रही असावं आणि एकदा तरी वाचावं असं पुस्तक रणजित देसाई लिखीत...राधेय... © विश्वजित शिंत्रे. ...Read more

BAJIND
BAJIND by PAHILWAN GANESH MANUGADE Rating Star
विश्वजीत श्रीपती शिंत्रे.

काही पुस्तकं अशी असतात कि कितीही वेळा वाचली तरीही त्या पुस्तकाचा कंटाळा येत नाही. पुन्हा पुन्हा वाचावं असं वाटतं आणि त्याची पारायणं होतचं राहतात. असचं एक पुस्तक म्हणजे *पै.गणेश मानुगडे* लिखीत *बाजिंद.* *बाजिंद* हे एक असं रसायन आहे जे प्रत्ेकाला अक्षरशः वेड लावतं. साधारण चार पाच वर्षांपुर्वी पहील्यांदा वाचलं होतं, त्यानंतर बर्‍याचवेळा आणि आज पुन्हा एकदा. त्याबद्दलची एक सुंदर आठवण म्हणजे माझ्या बहिणीच्या गरोदरपणाच्या दिवसात ग्रहण लागलं होतं आणि त्या ग्रहणकाळात तिला मी *बाजिंद* वाचुन दाखवलं होतं, असं हे पुस्तक. कुस्ती, प्रेमकथा, हेरगिरी, गुढ रहस्यमय बाजिंदचं जंगल, पशु-पक्षी व हिंस्र जनावरांची भाषा, बहीर्जी नाईक आणि अवघ्या हिंदुस्थानाचे आणि मराठी मनाचे आराध्यदैवत *श्रीमंतयोगी छत्रपती शिवाजी महाराज* असा या पुस्तकाचा प्रवास. शेवटाला अंगावर काटा आला कि समजावं आपण या पुस्तकाच्या प्रेमात पडलोय. रायगडच्या डोंगरदरीत वसलेल्या धनगरवाडीचा सखाराम धनगर आणि त्याच्यासोबत मल्हारी, सर्जा आणि नारायण निघालेत छत्रपती शिवरायांना भेटायला. कारण टकमक टोकावरुन ज्या गद्दारांचा कडेलोट व्हायचा ती प्रेतं येऊन पडायची ती थेट धनगरवाडीच्या आसपासच्या जंगलात आणि त्यामुळे आसपासच्या परीसरात जंगली जनावरांचा सुळसुळाट खुप वाढला होता. त्यांची मेजवानी व्हायची पण जर कधी कडेलोट नसायचा तेव्हा ती हिंस्त्र जनावरं आसपासच्या लोकवस्तीत शिरायची. हिच कैफियत मांडायला सखाराम धनगर आणि इतर मंडळी रायगडी निघतात. त्यानंतरचा त्यांचा प्रवास आणि कथा वाचकाला इतकी गुरफटवुन टाकते कि शेवटच्या पानावरची शेवटची ओळ कधी वाचुन संपते, कळतही नाही. त्यांची स्वराज्यहेर खंडोजीची भेट मग सावित्री, वस्तादकाका, वाचतानाही भितीदायक दिसणारं जंगल, कधीही न पाहीलेलं महादेवाचं मंदीर, खंडोजीचा असणारा ट्विस्ट आणि मग बहिर्जी नाईक आणि मग थेट रायगड आणि महाराज, सगळं प्रत्यक्षात आपल्यासमोर घडतयं कि असा भास निर्माण करणारं असं हे पुस्तक. एखाद्या चित्रपटालाही लाजवेल अशी कथा, एकदा वाचली कि पुन्हा एकदा वाचण्याचा मोह आवरता येत नाही अशी कथा, ज्यामध्ये असं बरचं काही जे वाचल्याशिवाय कळणार नाही. अजुन एक असं कि सातासमुद्रापार जगातील अव्वल गणली जाणारी इस्त्राईलची गुप्तहेर संघटना मोसाद यांच्या अभ्यासक्रमात बहिर्जी नाईक आणि आपलं हेरखातं शिकवलं जातं अशी अभिमान वाटणारी घटना आपल्या राज्यात घडलीय त्याचीच हि गोष्ट...बाजिंद... ...इकडे खंडोजीने सावित्रीला उचलुन जंगलातुन बरेच बाहेर आणले होते. पुढे डोंगराची कडेतुट होती आणि हजारो हात खोल फेसाळणार्‍या नदीचे विशाल पात्र...खंडोजीने एकदा मागे पाहीले आणि ताडले कि शिर्क्यांची फौज पाठलाग करत आहे...त्याने कशाचाही विचार न करता सावित्रीसह स्वतःला त्या कडेतुट वरुन त्या विशाल नदीच्या पात्रात झोकुन दिले...आणि... त्यासाठी वाचा *पै.गणेश मानुगडे* लिखीत...*बाजिंद..!!!* © विश्वजीत श्रीपती शिंत्रे. मु.पो.इंचनाळ, ता.गडहिंग्लज,जि.कोल्हापुर ०९९२२३१३९१९ ...Read more