* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: HOME
  • Availability : Available
  • Translators : SUNANDA AMRAPURKAR
  • ISBN : 9788184980585
  • Edition : 2
  • Publishing Year : SEPTEMBER 2009
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 372
  • Language : Translated From ENGLISH to MARATHI
  • Category : FICTION
Quantity
Buying Options:
  • Print Books:
IN MANJU KAPUR`S EMBLEMATIC NEW NOVEL, THE SEEMINGLY TRANQUILWOFID OF A JOINT FAMILY IS COMING APART. BANWARI LAL, PATRIARCH OF A CLOTH BUSINESS IN THE MIDDLE CLASS NEW DELHI NEIGHBOURHOOD OF KAROL BAGH, IS A BELIEVER IN THE OLD WAYS. MEN WORK,; OUT OF TLTE HOME, WOMEN WITHIN. MEN CARRYFORWARD THE FAMILY LINE, WOMEN ENABLE THEIR MISSION. HIS TWO SONS UNQUESTIONINGLY FOLLOW THEIR FATHER IN BUSINESS AND IN LIFE, BUT THEIR WIVES WILL NOT. NEITHER WILL HIS GRAND-DAUGLTTER, WHO MAKES CONSIDERED UNAVAILABLE TO THE WOMEN OF THE FAMILY. WITH UNSWERVING ATTENTION, KAPUR FOLLOWS THE MEMBERS OF THIS TRADITIONAL FAMILY INTO THE UNEASY WORLD THEY COME TO INHABIT. FROM THE FRENETIC SENSORY OVERLOAD OF MODERN URBAN INDIA, SHE CONSTRUC.TS A STORY AS INTRICATE, QUIET AND DAZZLING AS THE FABRIC PRODUCED BY THE FAMILY. TOLD IN A SUSTAINED COLLOQUIAL VOICE, HOME STARTLING ITS SWEEP_AND UNERRINGLY ACCURATE IN THE BLEAKNESS AND HOPE IT PRESENTS.
पाकिस्तानात भरभराटीला आलेलं कापड दुकान फाळणीच्या वणव्यात बेचिराख झाल्यावर, गरोदर पत्नी आणि दोन लहान मुलांसह, चालत चालत सरहद्द ओलांडून दिल्लीच्या निर्वासित छावणीत दाखल झालेले लाला बनवारीलाल. शून्यापासून सुरुवात करून पुन्हा करोल बागेतले प्रतिष्ठित व्यापारी म्हणून स्वत:ला सिद्ध करेपर्यंतचा आणि त्यानंतरचा त्यांच्या कुटुंबाचा प्रवास. काळानुसार केलेले, करावे लागलेले बदल. एकत्र कुटुंबपद्धती, एकत्र व्यवसाय दोन्हींचा समतोल राखणं, पिढ्या-पिढ्यांच्या विचारांतलं अंतर, घरातल्या माणसा-माणसांचे बदलते विचार, वाढत राहणारे नातेसंबंध, वेगवेगळे स्वभाव या सगळ्याचं मनोज्ञ दर्शन ‘फ़ैमिली’ वाचताना घडत राहतं. आई-वडील, पती-पत्नी, बहिणी-बहिणी, सासू-सुना, दीर-जावा, मुलं-मुली, व्याही-विहिणी अशा कुटंबातल्या सगळ्या नातेसंबंधांचं अचूक वर्णन वास्तवदर्शी, ओघवत्या बोलीभाषेतून वाचताना, प्रसंग सजीव होऊन नजरेसमोर उभे राहतात. दैनंदिन जीवनात येणारे छोटे-मोठे विजयाचे, पराभवाचे, आनंदाचे, काळजीचे प्रसंग. एकत्र कुटुंबामुळे वाढणारं बळ आणि येणारे ताण. सत्तासंघर्ष, निरपेक्ष आणि सापेक्ष माया-ममता, परंपरा पाळण्याचे आणि संस्कृती राखण्याचे प्रयत्न हे सारं आपल्यासमोर घडल्यासारखं वाटतं आणि पाश्र्वभूमीवर जाणवत राहतो स्वातंत्र्यप्राप्तीनंतर बदलत गेलेल्या सामाजिक परिस्थितीचा, बदलत्या व्यावसायिक, धार्मिक आणि नैतिक कल्पनांचा धावता आलेख. ‘फ़ैमिली’मधली माणसं आपल्यातली, ओळखीची वाटतात. तिथेच राहून आपल्याशी गप्पा मारल्यासारखी लेखिका हकिगत सांगत जाते आणि आपण त्यात गुंतून राहतो.
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
#MEHTAPUBLISHINGHOUSE #MARATHIBOOKS #TRANSLATEDBOOKS #ONLINEBOOKS #BIOGRAPHYA&TRUESTORIES #FAMILYHOME #फॅमिली #FICTION #TRANSLATEDFROMENGLISHTOMARATHI #SUNANDAAMRAPURKAR #सुनंदाअमरापूरकर #MANJUKAPUR
Customer Reviews
  • Rating StarDAINIK PRABHAT 6-12-2009

    एकत्र कुटुंबपद्धती, एकत्र व्यवसाय यांचा समतोल राखणं, पिढ्यापिढ्यांच्या विचारातलं अंतर, वाढत राहणारे नातेसंबंध या सगळ्याचं मनोज्ञ दर्शन ‘फॅमिली’ हे पुस्तक वाचताना घडतं. फाळणीनंतर पाकिस्तानातून अनेक हिंदू कुटुंबं भारतात आली. हिंसाचाराच्या आगीत होरपळले्या यांपैकी अनेकांनी पुन्हा पहिल्यापासून सुरुवात करत नवीन विश्वाची निर्मिती केली. ‘फॅमिली’ या कादंबरीत अशाच एका कुटुंबाची कथा वाचायला मिळते. मंजू कपूर यांनी लिहिलेल्या ‘होम’ या इंग्रजी पुस्तकाचा अनुवाद सुनंदा अमरापूरकर यांनी केला आहे. पाकिस्तानात भरभराटीला आलेल्या एका प्रख्यात कापड दुकानदाराची कथा यामध्ये चितारली आहे. फाळणीच्या वणव्यात हे कापड दुकान बेचिराख होतं आणि आपली गरोदर पत्नी, दोन मुलांना घेऊन कुटुंबप्रमुख चालत-चालत दिल्लीच्या निर्वासित छावणीत येतात. लाला बनवारीलाल असं या कुटुंबप्रमुखाचं नाव.दिल्लीत आल्यावर शून्यापासून सुरुवात करून पुन्हा प्रतिष्ठित व्यापारी म्हणून ते स्वत:ला सिद्ध करतात. बनवारीलाल परिवार हा अशा स्तरातला होता की, ज्यांनी बाजारातलं आपलं अव्वल स्थान टिकविण्यासाठी पिढ्यांनपिढ्या प्रयत्न केले होते. लग्नसंबंध जोडताना त्यामुळे समृद्धीत भर पडेल असं पाहिलं होतं. कोणत्याही परिस्थितीत कुटुंब विभक्त होऊ द्यायचं नाही, असा या परिवाराचा नियम होता. या परिवाराने आपल्या मुलांना अगदी लहानपणापासून कुटुंबाचा पाया भक्कम करण्याचं शिक्षण दिलं होतं. मुलांना देण्यात आलेले शिक्षण, अंगी बाणवलेली मूल्यं, जोडलेले संबंध या सगळयांमागे त्यांच्या जीवनात सौख्य भरणारा सोन्या-चांदीचा प्रवाह सतत वाहत राहिला पाहिजे, हा एकच हेतू होता. या कादंबरीत विविध व्यक्तिरेखा येतात. कादंबरीची सुरुवात सोना आणि सुनीता या दोन बहिणींच्या कुटुंबाची ओळख करून देत होते. या दोघी सख्ख्या बहिणी असल्या तरी दोघींच्या स्वभावात आणि रुपातही बराच फरक आहे. सोना नितळ गोरेपणा, अप्रतिम सौंदर्य घेऊन जन्माला आलेली, तर सुनीता तिच्या तुलनेत सावळी आणि रुपानेही सामान्य. सोनाच्या सौंदर्याच्या बळावरच तिला बनवारीलालसारख्या नावाजलेल्या व्यापारी कुटुंबातून मागणी येते, तर सुनीताचा विवाह सरकारी नोकरी असणाऱ्या मुलाशी होतो. सोनाचा बनवारीलाल परिवार हा एकत्र कुटुंबपद्धतीला अनन्यसाधारण महत्त्व देणारा. घराण्याचा वंश सुरू राहण्यासाठी मुलगा हवाच, हा त्यांचा हट्ट. या घरात मुलगा असणाऱ्या स्त्रीचं स्थान वरचं असतं. दुर्दैवाने सोनाला लग्नानंतर बरीच वर्षे मूल होत नाही. तिच्या धाकट्या दिराचं लग्न होऊन त्या दांपत्याला मूल होतं तरी सोनाची कूस उजवलेली नसते. यामुळे थोरली सून असूनही तिचं घरातलं वजन कमी झालेलं असतं. सासूकडून आणि नणंदा-जावांकडूनही तिला बरंच ऐकून घ्यावं लागलेलं असतं. याउलट धाकट्या सूनेला मूल झाल्यानंतर तिचा भाव वधारतो. इकडे सुनीताच्या पोटालाही मूल नसतं. मात्र, तिला सोनासारखा त्रास सहन करावा लागत नाही. तिचं कुटुंबही मर्यादित असतं. गृहउद्योग करून पतीला हातभार लावण्यात ती मोठा वाटा उचलते. तिच्या या उद्योगात सोनाचा पतीही मदत करतो. इकडे काही वर्षांनी सोनाच्या पोटी मूल जन्माला येतं आणि तिची घरातली किंमत एकदम वाढते. पहिली मुलगी जन्माला येते आणि पाठोपाठ एक मुलगा. आई झाल्यामुळे सोनाचं घरातील स्थान एकदम उंचावलेलं असतं. आता ती थोरली सून म्हणून घरभर तोरा मिरवू शेत असते. स्थान, घरची श्रीमंती, पदरात दोन मुलं या साऱ्यामुळे तिचा अहंकार आपोआप उसळून येतो. या कुटुंबात पुरुषांनी व्यवसाय सांभाळायचा आणि स्त्रियांनी संसार पहायचा, मुलांचं संगोपन करायचं, कुटुंबाचा वंश पुढे सुरू ठेवायचा हीच पारंपारिक कल्पना असते. मुलगा असो किंवा मुलगी त्यांच्या शिक्षणाला फारसं महत्त्व नसतंच. सोनाच्या पोटी जन्मलेली निशा मात्र, अभ्यासात कमालीची हुशार असते. तिचं लग्न व्हायचं असेल तर तिनं सुंदर दिसलं पाहिजे, घरकामात हुशार बनलं पाहिजे हा तिच्या आईचा आणि इतरांचाही दृष्टिकोन असतो. तथापि, सुनीताच्या पतीला शिक्षणाचं महत्त्व माहिती असतं. याच दरम्यान बनवारीलाल कुटुंबात विकी हा मुलगा दाखल झालेला असतो. सोनाच्या नणंदेचा मुलगा. त्याच्या आईचा सासरी छळ झाल्यामुळे तिने आत्महत्या केलेली असते आणि या मुलाला त्याचे मामा (सोनाचा पती) आपले घरी घेऊन आलेले असतात. मुलगा त्याच्या वडिलांप्रमाणेच स्वार्थी, आत्मकेंद्री असतो. पौगंडावस्थेतील विकी छोट्या निशाचं लैंगिक शेषण करतो. पण, ही गोष्ट कोणालाही कळत नाही; पण निशाच्या मनावर त्या घटनेचा जबरदस्त परिणाम झालेला असतो. पुढे ती मोठी झाल्यावर एका तरुणाशी तिचं प्रेम जमतं. मात्र, त्याचं कुटुंब बनवारीलाल कुटुंबाच्या तुलनेत खालच्या दर्जाचं असल्याने हे प्रकरण संपवलं जातं. पुढे निशाची ओढाताण सुरू होते. ती कशी संपते हे सांगत असतानाच ‘फॅमिली’ची गोष्ट संपते. एकत्र कुटुंबपद्धती, एकत्र व्यवसाय यांचा समतोल राखणं, पिढ्यांनपिढ्यांच्या विचारातलं अंतर, वाढत राहणारे नातेसंबंध या सगळ्याचं मनोज्ञ दर्शन ‘फॅमिली’ हे पुस्तक वाचताना घडतं. कुटुंबातील सर्व घडामोडींचं अचूक वर्णन वास्तवदर्शी आणि ओघवत्या बोलीभषेतून वाचाताना प्रसंग सजीव होऊन नजरेसमोर उभे राहतात. एकत्र कुटुंबामुळे वाढणारं बळ आणि येणारे ताण याचंही सुरेख दर्शन ‘फॅमिली’ मध्ये घडतं. लेखिकेने वाचकांशी गप्पा माराव्यात अशा पद्धतीने कादंबरीचं लेखन केलं आहे. या पुस्तकाच्या मूळ लेखिका मंजू कपूर या दिल्लीतील इरांडा हाऊस येथे इंग्रजी विषयाच्या प्राध्यापिका आहेत. इरांडा हाऊस येथून पदवी प्राप्त करून त्यांनी कॅनडातील डलहौसी विद्यापीठातून एम.फील केले. त्यांच्या ‘डिफिकल्ट डॉटर्स’ या पहिल्या कादंबरीला युरेशियन विभागासाठी कॉमनवेल्थ पुरस्कार मिळाला. त्यांच्या नावावर इतरही अनेक दर्जेदार पुस्तकाचा मराठी अनुवाद सुनंदा अमरापूरकर यांनी तेवढ्याच ओघवत्या शैलीत केला आहे. ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

HATUMUTUCHA CHANDRA
HATUMUTUCHA CHANDRA by FARUK KAZI Rating Star
परेश जयश्री मनोहर

मराठी बालसाहित्याचा गेल्या काही दशकांचा अवकाश हा सातत्याने प्रबोधनपर, उद्बोधनपर आणि कोणत्याही कथेच्या शेवटी एका वाक्यात तात्पर्य सांगणाऱ्या बाळबोधकथांचा राहिलेला आहे. या बाल साहित्यामध्ये प्रामुख्याने येणारे पात्र ही मध्यमवर्गीय, उच्च जातीय मराठी घरतील मुलं मुली असतात आणि जेव्हा केव्हा वंचित समाजातील, शोषित समाजातील, गरीब ग्रामीण घरातील मुलांचे चित्रण येतं तेव्हा ते अति दुःखी आणि बिचारे, ज्यांना मदतीची गरज आहे आणि अशी मदत करण्याची जबाबदारी मोठ्या घरातील उच्चवर्णीय, उच्चवर्गीय नायक मुला मुलींची असते. त्यातूनही प्रामुख्याने काय करावे काय करू नये किंवा तत्सम उपदेशच प्रामुख्याने कथेच्या शेवटी केलेले दिसतात. आणि हा लेखक वर्ग ही प्रामुख्याने पुणे मुंबई भागात स्थिरावलेला राहणारा तिथल्या अनुभूती आणि तिथल्या जगण्याचा अवकाश सोबत घेऊन येणारा असतो. अशा सगळ्या पार्श्वभूमीवरती सोलापूर जिल्ह्यातल्या सांगोला तालुक्यात अनकढाळ सारख्या एका छोट्या गावात राहणारा फारुक काझी हा लेखक जेव्हा गेलं दशकभर कवितांमधून, कथांमधून बालविश्व चितारण्याचा प्रयत्न करतो तेव्हा ते जास्त करून ग्रामीण भागातील मातीशी जोडलेलं असतं. आपल्या भोवतालच्या खऱ्याखुऱ्या मुलांमुलींच्या भावविश्वाच्या जवळ जाणारं चित्रण त्याच्या कथांमधून आपण सातत्याने बघत असतो. त्याचे "शिकण्याच्या वाटेवरील आनंदवन" हे पहिले पुस्तक एका प्रयोगशील शिक्षकाच्या शाळेतील अनुभवांवर आधारलेले आहे. त्यांचे आजवर मित्र, प्रिय अब्बू, चुटकीचे जग हे कथासंग्रह प्रकाशित झालेले आहेत. या सगळ्याच पुस्तकातून त्याने सातत्याने ग्रामीण, निमशहरी भागातील कनिष्ठ मध्यमवर्गीय आणि गरीब कुटुंबातील बहुजन आणि वंचित घटकातील, मुस्लिम कुटुंबातील मुलांच्या नजरेने दिसणाऱ्या गोष्टी टिपण्याचा प्रयत्न केलेला आहे. यात कुठेही गरिबीचे गोडवे नाहीत की काठोकाठ पसरलेलं बिचारेपण नाही. तर या आर्थिक दृष्ट्या नागवलेल्या लोकांच्या घरातील मुलांच्या कथा आहेत, ज्यात प्रेम, उत्सुकता, जिद्द, समजून घेणे आणि अनुभवातून आलेलं शहाणपण हे प्रामुख्याने जाणवते. अभावग्रस्तता, एखाद्या गोष्टीचे नसणे, तरीही नातेसंबंधांवरील विश्वास, प्रेम आणि एकमेकांबद्दलचा आदर, काळजी घेऊन जपणारी कुटुंबं फारुकच्या लिखाणात सातत्याने येत राहतात. त्याचा आत्ता आलेला हाटूमुटूचा चंद्र हा एक अफलातून कथासंग्रह आहे. यामध्ये फारुकने वेगवेगळे प्रयोग केलेले आहेत जे त्याच्या नेहेमीच्या लेखन शैलीपेक्षा जरा वेगळ्या अंगाने जाणारे आहेत आणि ते उत्तम जमून आलेले आहेत. या दहा कथांमधल्या पहिल्या तीन कथा या मुलांच्या नजरेतून होणारा पर्यावरण विनाश, निसर्गाची भाषा समजून घेण्याचा मुलांचा प्रयत्न आणि नुसते समजून घेणे नाही तर मुलानी आपले हे जग आपण नीट ठेवण्यासाठी केलेले प्रयत्न असे ही आहे. यात आनंद शोधण्याचे मार्ग, जबाबदारीचे असणारे भान आणि काल्पनिक ग्रहाची भेट करवून आणणारी समायरा आपल्याला भेटते, तर मोकळ्या हवेत असणारा आनंद भरुन कसा घेणार असा प्रश्न विचारणारा अर्पित ही भेटतो आणि तसेच टेकडी स्वच्छ करण्यासाठी न थकता प्रयत्न करणारे ओजस आणि रेहान ही भेटतात. लहानपणी न कळत्या वयात चिंचेवरच्या माकडाला तोटा फेकून मारणारा आणि त्या माराची मनावर झालेली जखम मोठा झाल्यावरही मनावर कोरलेला योगेश, आपल्या लाडक्या लहानग्या मैत्रिणीसाठी व्याकुळ होऊन रोज दारावर धडका देणारे शाहताब अस्वल आपल्याला अस्वस्थ करुन जातात. एका कथेत तर चक्क सायकल ही कथेची नायिका आहे आणि तिच्या सुखाच्या आणि नाराज होण्याच्या अनुभवातून आपणही तिच्यासोबत प्रवास करतो. इथे आपण बाबांच्या अपघाताने अस्वस्थ असणाऱ्या सारंगा सोबत त्या दवाखान्याच्या बाहेर येरझारा घालत असतो आणि अमृताच्या मैतरासोबत मेंढक्या बनून रानावनात चालत असतो. गावात फिरताना, गावाला पडणारं हिरवं स्वप्न अनुभवणारा मंदार आपल्या भेटतो आणि सोबतच गावात राहणारी आणि तुमच्या शहरालाही स्वप्न पडतच असेल की रे? काय असेल ते स्वप्नं? असा प्रश्न विचारणारी चंदा हाच प्रश्न आपल्यालाही विचारते असा भास आपल्याला होतोच होती. शाळेच्या ट्रीपला जायला हजार रुपये नाहीत म्हणून रुसलेल्या साक्षीला बघताना आपणही आपल्या लहानपणी अशा बुडालेल्या शाळेच्या सहली, आणि त्यावेळी आपल्या आईबाबांनी आपल्याला काय सांगितलं होतं आणि कशी आपली समजूत काढलेली हे आठवून आपलेही डोळे ओलसर होताना अनुभवतो. पण याही कथेत निंबोणीच्या पानांमधून दिसणारा, भासणारा तो चंद्र जो हाटूमुटूचा आहे पण त्याला बघून होणारा आनंद मात्र अस्सल आणि खराखुरा आहे. या सगळ्या कथांमधून फारुक ने आजच्या मुलामुलींना आपल्यासमोर उभं केलं आहे, त्यांचे प्रश्न, त्यांच्या विचार करण्याच्या पद्धती आणि त्याचं अस्वस्थ असणं अगदी नेमकेपणाने आपल्यासमोर येतं. ही मुलं कोणत्याही एका शहरातली, एका भागातली किंवा एकसारख्या घरातली नाहीत पण त्यांचे जगणे हे आजच्या मुलांचे जगणे आहे. फक्त एक प्रश्न मनाला पडतो की आपल्या भोवतालच्या प्रश्नांनी, आपल्या गरिबीने किंवा अभावाने काळवंडलेली मुलं जेव्हा समजूतदारपणे स्वतः शहाणे बनत पुढे निघतात तेव्हा, ही सगळं कोणामुळे, आणि माझ्याच वाट्याला का? याचे जबाबदार कोण असा एखादा प्रश्न एकाही मुलाला पडू नये याची काळजी वाटते. येत्या काळात फारुक च्या कथांतील ही मुलं तुम्हाला मला हे प्रश्न विचारतील याची खात्री आहे आणि मी त्या दिवसाची वाट ही बघतो आहेच. या पुस्तकातील चित्रांचा विशेष उल्लेख करणे फारच महत्वाचे आहे. चंद्रमोहन कुलकर्णी ज्या ताकदीने कथेची भावना नेमक्या कुंचल्यात पकडतात ते बघताना आपण निव्वळ थक्क होतो. इतकी सुंदर आणि मनाला धरुन ठेवणारी चित्रं या पाना आपल्याला भेटत राहतात. इतक्या ताकदींच्या कथांचे पुस्तक मेहता प्रकाशनाने अत्यंत प्रेमाने आणि उत्तम निर्मितीमूल्य जपत काढलेले आहे. आज आपला भोवताल इतका जातधर्म, पर्यावरणीय नाश आणि भविष्याच्या चिंतांनी कुरतडलेला असताना अशा खऱ्याखुऱ्या मुलांच्या कथा आपल्यासमोर येणं हाच आपल्याला दिलासा देणारा आपला हाटूमुटूचा चंद्र आहे...हा असाच राहो... परेश जयश्री मनोहर ...Read more

HATUMUTUCHA CHANDRA
HATUMUTUCHA CHANDRA by FARUK KAZI Rating Star
बालाजी मदन इंगळे

संवेदनशीलतेने लिहिलेल्या तरल बालकथा : हाटुमुटूचा चंद्र मराठीमध्ये जाणीवपूर्वक आणि विचारपूर्वक बालसाहित्य लिहिणाऱ्यांची संख्या खूप कमी आहे. बालसाहित्य आणि बाल मानसशास्त्र यांचा विचार करून आपली प्रतिभा त्यासाठी वापरणाऱ्या मोजक्या बालसाहित्यिकांमध्य फारूक एस. काझी यांचे नाव समाविष्ट करावे लागेल. त्यांच्या नुकत्याच प्रकाशित झालेल्या मुलांसाठीच्या ‘हाटूमुटूचा चंद्र’ या कथासंग्रहातून ही बाब ठळकपणे अधोरेखित होते. कथा म्हणजे केवळ प्रसंगानंतर प्रसंग किंवा घटनेनंतर घटना मांडणे नसते. त्यामध्ये लेखकाच्या प्रतिभेने वास्तव आणि कल्पना यांचा सुरेख संगम घडवून आणावा लागतो. कुठलीही कथा लेखकाला त्याच्या अनुभव विश्वातूनच सापडलेली असते. पण ते अनुभव विश्व मांडत असताना त्यात आपल्या प्रतिभेने काही साहित्य गुण समाविष्ट करावे लागतात. तेव्हा ती कथा साहित्यिकदृष्ट्या अभिजात व साहित्य गुणांनी युक्त अशी कथा होते. या संग्रहातील कथांमध्ये अशा साहित्यिक प्रतिभांच्या बऱ्याच जागा आहेत. आणि म्हणूनच फारूक एस. काझी यांच्या कथा रोजच्या जगण्यातीलच असल्या तरी त्यातील साहित्य गुणांमुळे या कथा आपले वेगळेपण सिद्ध करतात. कथेमध्येही काव्यात्मकता असते. प्रतिकात्मकता असते. आणि त्यामुळेच ती कथा वैश्विक ठरत असते. हे सर्व गुण ‘हाटुमूटुचा चंद्र’ मधील कथांमध्ये आढळून येतात. म्हणून ही कथा महत्त्वाची आहे. अद्भुतरम्यता, काल्पनिकता आणि धक्का तंत्र याने लिहिलेल्या कथा नेहमीच मुलांना आवडतील असे नाही. आपल्याच अवतीभवती घडणाऱ्या घटना इतक्या सुंदर असू शकतात हे मुलांना वाचायला आवडते. नेमके तेच या कथांमध्ये आहे. या बालकथा या मातीतल्या आहेत. या संस्कृतीतल्या आहेत. म्हणून त्या महत्त्वाच्या आहेत. या संग्रहात एकूण दहा कथा आहेत. सर्वच कथा सुंदर आणि हृदयस्पर्शी आहेत. ‘फिकर नॉट’ या कथेमध्ये दोन मित्रांचे काही प्रसंग आहेत. रेहान आणि त्याचा मित्र अर्पित. दोघे एका टेकडीवर जातात. रेहानसाठी टेकडीवरील अनुभव नवीन असतो. दोघे खूप गप्पा मारतात. तळ्यात पाय सोडून बसतात. तिथे बसल्यानंतर त्या तळ्यातील काही मासे आपण बाटलीत घेऊन जावे असे रेहानला वाटते. पण अर्पित त्याला सांगतो की आपण या टेकडीवरून काय घेऊन जायला हवं तर या टेकडीवरील वातावरण, टेकडीवरील दृश्य, इथे आपण घेतलेला आनंद हे सगळे मनात भरून घेऊन जायला हवे. असं मुक्या प्राण्यांना त्रास द्यायचा नाही, हे नकळतपणे तो रेहानला सांगतो. रेहानलाही ते पटतं आणि मग तो खोल श्वास घेऊन इथल्या सगळ्या आनंदाच्या आठवणी मनात भरून घेतो. आणि निघतो. एखादा कोणी अन्य बालकथा लेखक असता तर या दोघांचं बोलणं, टेकड्यावरील वर्णन, दोघांनी केलेली मज्जा, त्यांनी केलेल्या गमती याचे वर्णन करून कथा संपवली असती पण फारूक काझी यांनी इथून काय घेऊन जायचं? हे लिहून जे एक नवीन वळण कथेला दिलेले आहे, इथेच या कथेतील साहित्यगुणाची जागा आहे. तिथेच कथा लेखक म्हणून फारूक काझी यांची प्रतिभा आपल्याला दिसून येते. आणि बालसाहित्यिक म्हणून त्यांचं वेगळेपणही इथेच आपल्याला दिसतं. ‘कर के देखो’ या कथेमध्ये ट्रेकला गेलेली मुले स्वच्छता दूत कशी बनतात हे मुळातून वाचण्यासारखे आहे. ‘जखम’ या कथेमध्ये इयत्ता तिसरीत शिकत असताना एका माकडीनीला आपण इजा पोहोचवल्याचं मोठं झाल्यावर कथेतील नायकाला आठवतं. आणि तो मोठा असूनही लहानांसारखं रडत रडत ती चूक आपल्या आईकडे कबूल करतो. ही कथा वाचताना पाषाणहृदयी माणूसही भावनिक होऊन जातो. कडूनिंबाच्या झाडाचे खाली पडलेले पान चंद्राची प्रतिमा म्हणून म्हणजेच हाटुमूटुचा चंद्र म्हणून कथेत वापरणे. आणि तो चंद्र कथेतील साक्षीच्या चेहऱ्यावर आनंदाचे प्रतिक म्हणून येणे. आणि त्याद्वारे सहलीला जाण्यासाठी पैसे न मिळाल्याच्या दुःखातून स्वतःला सावरणे ही सगळीच मांडणी भन्नाट झाली आहे. अशा भरपूर जागा या पुस्तकांमध्ये आहेत. ‘हिरवं सपान’ या कथेमध्ये शहरातला मंदार गावाकडे येतो. आणि गावातील चंदा सोबत शेत-शिवारात फिरतो. या शेत-शिवारातील भरपूर झाडे पाहून बी, रोपटं, मग त्याचं झाड ही क्रिया किती महत्त्वाची आहे. आणि या क्रियेचं स्वप्न नेहमीच गावाला पडतं. तसंच हिरवं स्वप्न शहराला का पडत नाही? हा प्रश्न खरंतर लहान-मोठ्या प्रत्येक वाचकाला अस्वस्थ करून जातो. ‘स्वप्न’ ही आणखी एक सुंदर कथा या संग्रहामध्ये आहे. माणसाला अभावातूनच वस्तूंची किंमत कळत असते. ज्याच्याकडे सर्व काही आहे अशा मुलाकडे जेव्हा सायकल येते, तेव्हा तिची काळजी घेतली जात नाही. पण स्वप्नातही ज्याच्या कधी सायकल मिळेल असं वाटत नव्हतं अशा अंकितला जेव्हा सायकल मिळते, तेव्हा तो तिची किती काळजी घेतो आणि हेच त्या सायकलचे स्वप्न होते. आणि अंकितचेही तेच स्वप्न होते ही स्वप्नांची सरमिसळ वाचकांना खूपच आवडून जाते. ‘मैतर’ ही आणखीन एक अनोळखी नातेसंबंध घट्ट करणारी कथा. फक्त काही दिवसांसाठी आलेल्या मेंढक्या काकाची आणि अमृत ची मैत्री होते. आणि ती मैत्री त्या दोघांमध्ये इतकी घट्ट होते की, मेंढक्या काका आपली मेंढरं घेऊन परत निघाल्यावर दोघांनाही एकमेकांचा निरोप घ्यावा असे वाटत नाही. निरोपावेळी दोघांच्याही डोळ्यात पाणी येते. दोघेही निरोपावेळी एकमेकांना भेटवस्तू देतात. हा प्रसंग लेखकाने स्थानिक संदर्भ, संस्कृती, भाषा आणि चित्रदर्शी स्वरूपात असा उभा केला आहे की, वाचक कथा संपली तरी त्या मेंढरांच्या कळपामध्ये आणि अमृतच्या घराच्या आसपासच घुटमळत राहतो. ‘जाऊ दे त्याला’ ही आणखीन एक भावस्पर्शी कथा. जंगली प्राण्यांनाही जीव लावला तर ते माणसांशी प्रेमाने वागतात हे सांगणारी ही कथा वाचकाच्या काळजाचा ठाव घेते. निधी आणि फॉरेस्ट ऑफिसर असलेले तिचे बाबा यांची ही कथा जंगलाच्या दुनियेत वाचकाला घेऊन जाते. पण तिथेही मानवी भावना कशी श्रेष्ठ ठरते हे अतिशय रंजक पद्धतीने लेखकाने लिहिले आहे. ‘बाबांची भाषा’ ही आणखी एक हृदयाला स्पर्श करणारी कथा! शाळेत शिकणारा सारंग अपघातात ऐकणं आणि बोलणं कायमचं गमावलेल्या आपल्या बाबांसाठी हातवाऱ्याची भाषा शिकून घेतो. हे जेव्हा वाचकाला कळतं तेव्हा वाचक जागच्याजागी स्थिर होऊन जातो. ‘एस पी १३’ ही आधुनिक तंत्रज्ञानात घेऊन जाणारी कथा! छोटीशी समायरा स्पेसशीप घेऊन एका नव्या प्लॅनेटवर जाते. आणि त्या नव्या प्लॅनेटवर असलेली माणसं कशी निसर्गाची काळजी घेतात हे पाहून समायरा तिथेच राहण्याचा निर्णय घेते. तेव्हा तिच्या सायंटिस्ट मामासह वाचक ही अचंबित होऊन जातात. निसर्ग आणि आधुनिक तंत्रज्ञान यांचा सुरेख आणि अफलातून संगम या कथेमध्ये लेखकाने घडवून आणला आहे. या पुस्तकाची महत्त्वाची बाजू म्हणजे यातील चित्रे! चंद्रमोहन कुलकर्णी यांची चित्रे या कथेला एक वेगळा आणि नवा आयाम देतात. ही चित्रे या कथेशी एवढी एकरूप झालेली आहेत की ही चित्रे वेगळी काढली तर या कथा अपूर्ण वाटतील! कथेला अनपेक्षित वळण देण्यामध्ये लेखक पटाईत आहेत. हे प्रत्येक कथेतून आपल्याला जाणवतं. आपण सरळ कथा वाचत जातो. आणि कथा देखील आता सरळ या वाटेने जाईल असे वाटत असताना ती कथा असं काही वळण घेते की वाजक स्तंभित होऊन जातो. आणि हीच खरे तर फारूक एस. काझी यांची खरी ताकद आहे. त्यांच्या सर्व कथांमधील पात्र आणि त्यांची नावे पाहिली तर ती विशिष्ट अशी पात्रे किंवा नावे नाहीत. तर सर्वसमावेशक अशी सर्व पात्रे आहेत. त्यामुळे किती तीव्र सामाजिक भान लेखकाला आहे हेही आपल्याला जाणवते. आजच्या सोशल मीडियाच्या काळात नातेसंबंध दूरावत असताना, नातेसंबंध दृढ करणाऱ्या या कथा प्रत्येक वाचकांपर्यंत पोहोचल्या पाहिजेत. या कथांमध्ये कल्पनाशक्ती आहे. वास्तवता आहे. पण याच्या जोडीला कथालेखक म्हणून जी एक संवेदनशीलता लागते, जी एक तरलता लागते आणि मुलांच्या कथांमध्ये जो एक हळुवारपणा आणि नाजूकता आवश्यक असते ते सगळे गुण या कथेमध्ये ओतप्रोत भरलेले आहेत. म्हणून या कथा फक्त लहानच नाही तर मोठ्यांनाही गुंतवून ठेवणाऱ्या आहेत. स्थळ आणि काळानुसार बदलणारी भाषा आणि प्रसंगानुसार बदलणारं वर्णन या कथेच्या जमेच्या बाजू आहेत. यामुळे या कथा वाचकाला पकडून ठेवतात. आणि काही एक सामाजिक भान आणि साहित्यिक जाण या कथा देतात. आणि हेच या कथेचे मोठे यश आहे. - बालाजी मदन इंगळे ...Read more