* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: HOME
  • Availability : Available
  • Translators : SUNANDA AMRAPURKAR
  • ISBN : 9788184980585
  • Edition : 2
  • Publishing Year : SEPTEMBER 2009
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 372
  • Language : Translated From ENGLISH to MARATHI
  • Category : FICTION
Quantity
Buying Options:
  • Print Books:
IN MANJU KAPUR`S EMBLEMATIC NEW NOVEL, THE SEEMINGLY TRANQUILWOFID OF A JOINT FAMILY IS COMING APART. BANWARI LAL, PATRIARCH OF A CLOTH BUSINESS IN THE MIDDLE CLASS NEW DELHI NEIGHBOURHOOD OF KAROL BAGH, IS A BELIEVER IN THE OLD WAYS. MEN WORK,; OUT OF TLTE HOME, WOMEN WITHIN. MEN CARRYFORWARD THE FAMILY LINE, WOMEN ENABLE THEIR MISSION. HIS TWO SONS UNQUESTIONINGLY FOLLOW THEIR FATHER IN BUSINESS AND IN LIFE, BUT THEIR WIVES WILL NOT. NEITHER WILL HIS GRAND-DAUGLTTER, WHO MAKES CONSIDERED UNAVAILABLE TO THE WOMEN OF THE FAMILY. WITH UNSWERVING ATTENTION, KAPUR FOLLOWS THE MEMBERS OF THIS TRADITIONAL FAMILY INTO THE UNEASY WORLD THEY COME TO INHABIT. FROM THE FRENETIC SENSORY OVERLOAD OF MODERN URBAN INDIA, SHE CONSTRUC.TS A STORY AS INTRICATE, QUIET AND DAZZLING AS THE FABRIC PRODUCED BY THE FAMILY. TOLD IN A SUSTAINED COLLOQUIAL VOICE, HOME STARTLING ITS SWEEP_AND UNERRINGLY ACCURATE IN THE BLEAKNESS AND HOPE IT PRESENTS.
पाकिस्तानात भरभराटीला आलेलं कापड दुकान फाळणीच्या वणव्यात बेचिराख झाल्यावर, गरोदर पत्नी आणि दोन लहान मुलांसह, चालत चालत सरहद्द ओलांडून दिल्लीच्या निर्वासित छावणीत दाखल झालेले लाला बनवारीलाल. शून्यापासून सुरुवात करून पुन्हा करोल बागेतले प्रतिष्ठित व्यापारी म्हणून स्वत:ला सिद्ध करेपर्यंतचा आणि त्यानंतरचा त्यांच्या कुटुंबाचा प्रवास. काळानुसार केलेले, करावे लागलेले बदल. एकत्र कुटुंबपद्धती, एकत्र व्यवसाय दोन्हींचा समतोल राखणं, पिढ्या-पिढ्यांच्या विचारांतलं अंतर, घरातल्या माणसा-माणसांचे बदलते विचार, वाढत राहणारे नातेसंबंध, वेगवेगळे स्वभाव या सगळ्याचं मनोज्ञ दर्शन ‘फ़ैमिली’ वाचताना घडत राहतं. आई-वडील, पती-पत्नी, बहिणी-बहिणी, सासू-सुना, दीर-जावा, मुलं-मुली, व्याही-विहिणी अशा कुटंबातल्या सगळ्या नातेसंबंधांचं अचूक वर्णन वास्तवदर्शी, ओघवत्या बोलीभाषेतून वाचताना, प्रसंग सजीव होऊन नजरेसमोर उभे राहतात. दैनंदिन जीवनात येणारे छोटे-मोठे विजयाचे, पराभवाचे, आनंदाचे, काळजीचे प्रसंग. एकत्र कुटुंबामुळे वाढणारं बळ आणि येणारे ताण. सत्तासंघर्ष, निरपेक्ष आणि सापेक्ष माया-ममता, परंपरा पाळण्याचे आणि संस्कृती राखण्याचे प्रयत्न हे सारं आपल्यासमोर घडल्यासारखं वाटतं आणि पाश्र्वभूमीवर जाणवत राहतो स्वातंत्र्यप्राप्तीनंतर बदलत गेलेल्या सामाजिक परिस्थितीचा, बदलत्या व्यावसायिक, धार्मिक आणि नैतिक कल्पनांचा धावता आलेख. ‘फ़ैमिली’मधली माणसं आपल्यातली, ओळखीची वाटतात. तिथेच राहून आपल्याशी गप्पा मारल्यासारखी लेखिका हकिगत सांगत जाते आणि आपण त्यात गुंतून राहतो.
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
#MEHTAPUBLISHINGHOUSE #MARATHIBOOKS #TRANSLATEDBOOKS #ONLINEBOOKS #BIOGRAPHYA&TRUESTORIES #FAMILYHOME #फॅमिली #FICTION #TRANSLATEDFROMENGLISHTOMARATHI #SUNANDAAMRAPURKAR #सुनंदाअमरापूरकर #MANJUKAPUR
Customer Reviews
  • Rating StarDAINIK PRABHAT 6-12-2009

    एकत्र कुटुंबपद्धती, एकत्र व्यवसाय यांचा समतोल राखणं, पिढ्यापिढ्यांच्या विचारातलं अंतर, वाढत राहणारे नातेसंबंध या सगळ्याचं मनोज्ञ दर्शन ‘फॅमिली’ हे पुस्तक वाचताना घडतं. फाळणीनंतर पाकिस्तानातून अनेक हिंदू कुटुंबं भारतात आली. हिंसाचाराच्या आगीत होरपळले्या यांपैकी अनेकांनी पुन्हा पहिल्यापासून सुरुवात करत नवीन विश्वाची निर्मिती केली. ‘फॅमिली’ या कादंबरीत अशाच एका कुटुंबाची कथा वाचायला मिळते. मंजू कपूर यांनी लिहिलेल्या ‘होम’ या इंग्रजी पुस्तकाचा अनुवाद सुनंदा अमरापूरकर यांनी केला आहे. पाकिस्तानात भरभराटीला आलेल्या एका प्रख्यात कापड दुकानदाराची कथा यामध्ये चितारली आहे. फाळणीच्या वणव्यात हे कापड दुकान बेचिराख होतं आणि आपली गरोदर पत्नी, दोन मुलांना घेऊन कुटुंबप्रमुख चालत-चालत दिल्लीच्या निर्वासित छावणीत येतात. लाला बनवारीलाल असं या कुटुंबप्रमुखाचं नाव.दिल्लीत आल्यावर शून्यापासून सुरुवात करून पुन्हा प्रतिष्ठित व्यापारी म्हणून ते स्वत:ला सिद्ध करतात. बनवारीलाल परिवार हा अशा स्तरातला होता की, ज्यांनी बाजारातलं आपलं अव्वल स्थान टिकविण्यासाठी पिढ्यांनपिढ्या प्रयत्न केले होते. लग्नसंबंध जोडताना त्यामुळे समृद्धीत भर पडेल असं पाहिलं होतं. कोणत्याही परिस्थितीत कुटुंब विभक्त होऊ द्यायचं नाही, असा या परिवाराचा नियम होता. या परिवाराने आपल्या मुलांना अगदी लहानपणापासून कुटुंबाचा पाया भक्कम करण्याचं शिक्षण दिलं होतं. मुलांना देण्यात आलेले शिक्षण, अंगी बाणवलेली मूल्यं, जोडलेले संबंध या सगळयांमागे त्यांच्या जीवनात सौख्य भरणारा सोन्या-चांदीचा प्रवाह सतत वाहत राहिला पाहिजे, हा एकच हेतू होता. या कादंबरीत विविध व्यक्तिरेखा येतात. कादंबरीची सुरुवात सोना आणि सुनीता या दोन बहिणींच्या कुटुंबाची ओळख करून देत होते. या दोघी सख्ख्या बहिणी असल्या तरी दोघींच्या स्वभावात आणि रुपातही बराच फरक आहे. सोना नितळ गोरेपणा, अप्रतिम सौंदर्य घेऊन जन्माला आलेली, तर सुनीता तिच्या तुलनेत सावळी आणि रुपानेही सामान्य. सोनाच्या सौंदर्याच्या बळावरच तिला बनवारीलालसारख्या नावाजलेल्या व्यापारी कुटुंबातून मागणी येते, तर सुनीताचा विवाह सरकारी नोकरी असणाऱ्या मुलाशी होतो. सोनाचा बनवारीलाल परिवार हा एकत्र कुटुंबपद्धतीला अनन्यसाधारण महत्त्व देणारा. घराण्याचा वंश सुरू राहण्यासाठी मुलगा हवाच, हा त्यांचा हट्ट. या घरात मुलगा असणाऱ्या स्त्रीचं स्थान वरचं असतं. दुर्दैवाने सोनाला लग्नानंतर बरीच वर्षे मूल होत नाही. तिच्या धाकट्या दिराचं लग्न होऊन त्या दांपत्याला मूल होतं तरी सोनाची कूस उजवलेली नसते. यामुळे थोरली सून असूनही तिचं घरातलं वजन कमी झालेलं असतं. सासूकडून आणि नणंदा-जावांकडूनही तिला बरंच ऐकून घ्यावं लागलेलं असतं. याउलट धाकट्या सूनेला मूल झाल्यानंतर तिचा भाव वधारतो. इकडे सुनीताच्या पोटालाही मूल नसतं. मात्र, तिला सोनासारखा त्रास सहन करावा लागत नाही. तिचं कुटुंबही मर्यादित असतं. गृहउद्योग करून पतीला हातभार लावण्यात ती मोठा वाटा उचलते. तिच्या या उद्योगात सोनाचा पतीही मदत करतो. इकडे काही वर्षांनी सोनाच्या पोटी मूल जन्माला येतं आणि तिची घरातली किंमत एकदम वाढते. पहिली मुलगी जन्माला येते आणि पाठोपाठ एक मुलगा. आई झाल्यामुळे सोनाचं घरातील स्थान एकदम उंचावलेलं असतं. आता ती थोरली सून म्हणून घरभर तोरा मिरवू शेत असते. स्थान, घरची श्रीमंती, पदरात दोन मुलं या साऱ्यामुळे तिचा अहंकार आपोआप उसळून येतो. या कुटुंबात पुरुषांनी व्यवसाय सांभाळायचा आणि स्त्रियांनी संसार पहायचा, मुलांचं संगोपन करायचं, कुटुंबाचा वंश पुढे सुरू ठेवायचा हीच पारंपारिक कल्पना असते. मुलगा असो किंवा मुलगी त्यांच्या शिक्षणाला फारसं महत्त्व नसतंच. सोनाच्या पोटी जन्मलेली निशा मात्र, अभ्यासात कमालीची हुशार असते. तिचं लग्न व्हायचं असेल तर तिनं सुंदर दिसलं पाहिजे, घरकामात हुशार बनलं पाहिजे हा तिच्या आईचा आणि इतरांचाही दृष्टिकोन असतो. तथापि, सुनीताच्या पतीला शिक्षणाचं महत्त्व माहिती असतं. याच दरम्यान बनवारीलाल कुटुंबात विकी हा मुलगा दाखल झालेला असतो. सोनाच्या नणंदेचा मुलगा. त्याच्या आईचा सासरी छळ झाल्यामुळे तिने आत्महत्या केलेली असते आणि या मुलाला त्याचे मामा (सोनाचा पती) आपले घरी घेऊन आलेले असतात. मुलगा त्याच्या वडिलांप्रमाणेच स्वार्थी, आत्मकेंद्री असतो. पौगंडावस्थेतील विकी छोट्या निशाचं लैंगिक शेषण करतो. पण, ही गोष्ट कोणालाही कळत नाही; पण निशाच्या मनावर त्या घटनेचा जबरदस्त परिणाम झालेला असतो. पुढे ती मोठी झाल्यावर एका तरुणाशी तिचं प्रेम जमतं. मात्र, त्याचं कुटुंब बनवारीलाल कुटुंबाच्या तुलनेत खालच्या दर्जाचं असल्याने हे प्रकरण संपवलं जातं. पुढे निशाची ओढाताण सुरू होते. ती कशी संपते हे सांगत असतानाच ‘फॅमिली’ची गोष्ट संपते. एकत्र कुटुंबपद्धती, एकत्र व्यवसाय यांचा समतोल राखणं, पिढ्यांनपिढ्यांच्या विचारातलं अंतर, वाढत राहणारे नातेसंबंध या सगळ्याचं मनोज्ञ दर्शन ‘फॅमिली’ हे पुस्तक वाचताना घडतं. कुटुंबातील सर्व घडामोडींचं अचूक वर्णन वास्तवदर्शी आणि ओघवत्या बोलीभषेतून वाचाताना प्रसंग सजीव होऊन नजरेसमोर उभे राहतात. एकत्र कुटुंबामुळे वाढणारं बळ आणि येणारे ताण याचंही सुरेख दर्शन ‘फॅमिली’ मध्ये घडतं. लेखिकेने वाचकांशी गप्पा माराव्यात अशा पद्धतीने कादंबरीचं लेखन केलं आहे. या पुस्तकाच्या मूळ लेखिका मंजू कपूर या दिल्लीतील इरांडा हाऊस येथे इंग्रजी विषयाच्या प्राध्यापिका आहेत. इरांडा हाऊस येथून पदवी प्राप्त करून त्यांनी कॅनडातील डलहौसी विद्यापीठातून एम.फील केले. त्यांच्या ‘डिफिकल्ट डॉटर्स’ या पहिल्या कादंबरीला युरेशियन विभागासाठी कॉमनवेल्थ पुरस्कार मिळाला. त्यांच्या नावावर इतरही अनेक दर्जेदार पुस्तकाचा मराठी अनुवाद सुनंदा अमरापूरकर यांनी तेवढ्याच ओघवत्या शैलीत केला आहे. ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

DURDAMYA
DURDAMYA by G.B. DESHMUKH Rating Star
हेमंत कान्हे, अमरावती.

जी.बी.देशमुख ह्यांच्याद्वारे लिखित `दुर्दम्य` हे पुस्तक सत्य घटनांवर प्रस्तुत केलं गेलं असून, मनोगत तसेच संपूर्ण पुस्तक वाचतांना अंगावर अक्षरशः काटा उभा राहतो. एकंदरीत हे पुस्तक जबरदस्त आहे. लेखकाच्या लेखनक्षमते विषयी लिहावं तेवढं कमीच आहे. लेखकासह्या साहित्य कृतीकरीता मनापासून सॅल्युट. ...Read more

BACKSTAGE
BACKSTAGE by MONTEK SINGH AHLUWALIA Rating Star
महाराष्ट्र टाईम्स.. ६.९.२०२६

भारताच्या आर्थिक सुधारणांवर अनेक पुस्तके आजवर प्रसिद्ध झाली आहेत. काहींमध्ये आकडेवारीचे जंजाळ असते, काही धोरणांचे विश्लेषण करतात, तर काही विशिष्ट नेत्यांची जाहिरातबाजी करतात. मात्र माँटेकसिंग अहलुवालिया यांचे `बॅकस्टेज : भारताच्या उच्च वाढीच्या र्षांमागची कहाणी` हे पुस्तक या सगळ्यांपेक्षा वेगळे ठरते. कारण हे पुस्तक भारताच्या आर्थिक परिवर्तनाची कथा बाहेरून पाहणाऱ्या अभ्यासकाने नव्हे, तर त्या परिवर्तनाच्या केंद्रस्थानी उभ्या असलेल्या व्यक्तीने सांगितलेली आहे. जी. बी. देशमुख यांनी मूळ इंग्रजी पुस्तकाचा केलेला मराठी अनुवाद सरस उतरला आहे. पुस्तकाच्या सुरुवातीलाच माँटेकसिंग एक गोष्ट स्पष्ट करतात, ती म्हणजे, हे पुस्तक आत्मकथन नाही. आत्मप्रौढी मिरवण्यासाठी नव्हे, तर भारताच्या आर्थिक सुधारणांचा प्रवास समजावून सांगण्यासाठी अहलुवालिया हे पुस्तक लिहितात. विषयाच्या अनुषंगाने पुस्तकात त्यांच्या वैयक्तिक आयुष्यातील संदर्भ येतात, पण ते आर्थिक आणि राजकीय घडामोडी समजावून सांगण्यापुरतेच. सिकंदराबादमधील मध्यमवर्गीय वातावरणातून सुरू झालेला त्यांचा प्रवास दिल्ली स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स, ऑक्सफर्ड, जागतिक बँक, अर्थ मंत्रालय, योजना आयोग आणि अखेर देशाच्या सर्वोच्च आर्थिक धोरणनिर्मितीच्या केंद्रापर्यंत पोहोचतो. हा प्रवास वाचताना स्वतंत्र भारताच्या आर्थिक विचारसरणीचा विकासक्रम उलगडत जातो. पुस्तकाचे केंद्रस्थान अर्थातच १९९१च्या आर्थिक संकटाचे आहे. त्यावेळी देशाकडे काही आठवड्यांच्या आयातीपुरताही डॉलर शिल्लक नव्हता. सोन्याचा साठा गहाण ठेवण्याची वेळ आली होती आणि आर्थिक दिवाळखोरीची शक्यता प्रत्यक्ष समोर उभी होती. अशावेळी सरकारने घेतलेले निर्णय, त्यामागील तणाव, राजकीय अनिश्चितता आणि प्रशासकीय संघर्ष यांचे वर्णन पुस्तकात अत्यंत जिवंतपणे आले आहे. नाणेनिधी किंवा जागतिक बँकेच्या दबावामुळे या सुधारणा झाल्याची धारणा माँटेकसिंग ठामपणे नाकारतात. हे पुस्तक आर्थिक सुधारणांना कोणत्याही प्रकारच्या विचारधारेच्या चष्म्यातून पाहत नाही. लेखक ना मुक्त बाजाराचे अंधसमर्थन करतात, ना राज्यनियंत्रित व्यवस्थेचे. त्यांचा दृष्टिकोन व्यवहारवादी आहे. भारतासारख्या लोकशाही देशात सुधारणा एका झटक्यात होत नाहीत; त्या राजकीय वास्तवाशी जुळवून घेत हळूहळू पुढे सरकतात, हे ते वारंवार. अधोरेखित करतात. पुस्तकात अनेक ठिकाणी `सुधारणा` हा आर्थिक नव्हे, तर राजकीय प्रक्रियेचाही विषय आहे, हे प्रकर्षाने जाणवते. अहलुवालिया या पुस्तकात अनेक व्यक्ती, अधिकारी, अर्थतज्ज्ञ आणि राजकीय नेत्यांच्या योगदानाचा उल्लेख करतात. नरसिंह राव, मनमोहन सिंग, पी. चिदंबरम, यशवंत सिन्हा, जसवंत सिंह यांच्यापासून ते विविध सनदी अधिकाऱ्यांपर्यंत अनेकांची भूमिका ते प्रामाणिकपणे नोंदवतात. योजना आयोगाचे उपाध्यक्ष म्हणून काम करताना अहलुवालिया यांनी जवळून अनुभवलेला काळ येथे उभा राहतो. सन २००४ ते २०११ या काळातील उच्च आर्थिक वाढ, दारिद्रयनिर्मूलनातील प्रगती, पायाभूत सुविधांमध्ये झालेली वाढ आणि ग्रामीण विकासाच्या कार्यक्रमांचे मूल्यमापन ते करतात. विशेषतः भारताने सलग अनेक वर्षे सात ते आठ टक्क्यांच्या दरम्यान वाढ नोंदवली, ती केवळ जागतिक परिस्थितीचा. परिणाम नव्हती; १९९० नंतरच्या सुधारणांनी घातलेल्या पायावर उभे राहून ती शक्य झाली, हा त्यांचा युक्तिवाद पटण्याजोगा वाटतो. मात्र पुस्तकाचे खरे सामर्थ्य यशोगाथेत नाही, तर आत्मपरीक्षणात आहे. यूपीए-२ दरम्यान निर्माण झालेली निर्णयप्रक्रियेतील अडचण, गुंतवणुकीतील वातावरण आणि धोरणात्मक संकोच यावर लेखक मंदी, भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे निर्माण झालेले वातावरण आणि धोरणात्मक संकोच यावर लेखक थेट भाष्य करतात. अनुवादक जी. बी. देशमुख यांनी मूळ पुस्तकातील आर्थिक संकल्पना सहज आणि प्रवाही मराठीत मांडल्या आहेत. यात कृत्रिमता जाणवत नाही. आर्थिक विषयावरील पुस्तक असूनही भाषा जड वाटत नाही. आर्थिक सुधारणांच्या व्यापक सामाजिक परिणामांचा स्वतंत्र आणि सविस्तर ऊहापोह येथे अपेक्षेपेक्षा कमी आढळतो. मात्र, हे पुस्तक ज्या उद्देशाने लिहिले गेले आहे त्या उद्देशात ते अत्यंत यशस्वी ठरते. `बॅकस्टेज` हे केवळ पुस्तक नाही; ते भारताच्या आर्थिक परिवर्तनाचा प्रत्यक्षदर्शी दस्तऐवज आहे. १९९१ नंतर भारताने घेतलेल्या वळणाचा अर्थ समजून घ्यायचा असेल, उच्च वाढीच्या वर्षामागील वास्तविक कथा जाणून घ्यायची असेल आणि धोरणनिर्मितीच्या पडद्यामागे काय घडत असते याचा मागोवा घ्यायचा असेल, तर हे पुस्तक अभ्यासणे आवश्यक ठरते. भारतीय अर्थव्यवस्थेच्या आर्थिक सुधारणांचा इतिहास आणि त्यांचे परिणाम समजून घेण्यासाठी हे पुस्तक एक महत्त्वाचा संदर्भग्रंथ म्हणून ओळखले जाऊ शकते. मराठीत उपलब्ध असलेला हा अनुवाद त्या दृष्टीने विशेष स्वागतार्ह आहे. ...Read more