* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: HOME
  • Availability : Available
  • Translators : SUNANDA AMRAPURKAR
  • ISBN : 9788184980585
  • Edition : 2
  • Publishing Year : SEPTEMBER 2009
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 372
  • Language : Translated From ENGLISH to MARATHI
  • Category : FICTION
Quantity
Buying Options:
  • Print Books:
IN MANJU KAPUR`S EMBLEMATIC NEW NOVEL, THE SEEMINGLY TRANQUILWOFID OF A JOINT FAMILY IS COMING APART. BANWARI LAL, PATRIARCH OF A CLOTH BUSINESS IN THE MIDDLE CLASS NEW DELHI NEIGHBOURHOOD OF KAROL BAGH, IS A BELIEVER IN THE OLD WAYS. MEN WORK,; OUT OF TLTE HOME, WOMEN WITHIN. MEN CARRYFORWARD THE FAMILY LINE, WOMEN ENABLE THEIR MISSION. HIS TWO SONS UNQUESTIONINGLY FOLLOW THEIR FATHER IN BUSINESS AND IN LIFE, BUT THEIR WIVES WILL NOT. NEITHER WILL HIS GRAND-DAUGLTTER, WHO MAKES CONSIDERED UNAVAILABLE TO THE WOMEN OF THE FAMILY. WITH UNSWERVING ATTENTION, KAPUR FOLLOWS THE MEMBERS OF THIS TRADITIONAL FAMILY INTO THE UNEASY WORLD THEY COME TO INHABIT. FROM THE FRENETIC SENSORY OVERLOAD OF MODERN URBAN INDIA, SHE CONSTRUC.TS A STORY AS INTRICATE, QUIET AND DAZZLING AS THE FABRIC PRODUCED BY THE FAMILY. TOLD IN A SUSTAINED COLLOQUIAL VOICE, HOME STARTLING ITS SWEEP_AND UNERRINGLY ACCURATE IN THE BLEAKNESS AND HOPE IT PRESENTS.
पाकिस्तानात भरभराटीला आलेलं कापड दुकान फाळणीच्या वणव्यात बेचिराख झाल्यावर, गरोदर पत्नी आणि दोन लहान मुलांसह, चालत चालत सरहद्द ओलांडून दिल्लीच्या निर्वासित छावणीत दाखल झालेले लाला बनवारीलाल. शून्यापासून सुरुवात करून पुन्हा करोल बागेतले प्रतिष्ठित व्यापारी म्हणून स्वत:ला सिद्ध करेपर्यंतचा आणि त्यानंतरचा त्यांच्या कुटुंबाचा प्रवास. काळानुसार केलेले, करावे लागलेले बदल. एकत्र कुटुंबपद्धती, एकत्र व्यवसाय दोन्हींचा समतोल राखणं, पिढ्या-पिढ्यांच्या विचारांतलं अंतर, घरातल्या माणसा-माणसांचे बदलते विचार, वाढत राहणारे नातेसंबंध, वेगवेगळे स्वभाव या सगळ्याचं मनोज्ञ दर्शन ‘फ़ैमिली’ वाचताना घडत राहतं. आई-वडील, पती-पत्नी, बहिणी-बहिणी, सासू-सुना, दीर-जावा, मुलं-मुली, व्याही-विहिणी अशा कुटंबातल्या सगळ्या नातेसंबंधांचं अचूक वर्णन वास्तवदर्शी, ओघवत्या बोलीभाषेतून वाचताना, प्रसंग सजीव होऊन नजरेसमोर उभे राहतात. दैनंदिन जीवनात येणारे छोटे-मोठे विजयाचे, पराभवाचे, आनंदाचे, काळजीचे प्रसंग. एकत्र कुटुंबामुळे वाढणारं बळ आणि येणारे ताण. सत्तासंघर्ष, निरपेक्ष आणि सापेक्ष माया-ममता, परंपरा पाळण्याचे आणि संस्कृती राखण्याचे प्रयत्न हे सारं आपल्यासमोर घडल्यासारखं वाटतं आणि पाश्र्वभूमीवर जाणवत राहतो स्वातंत्र्यप्राप्तीनंतर बदलत गेलेल्या सामाजिक परिस्थितीचा, बदलत्या व्यावसायिक, धार्मिक आणि नैतिक कल्पनांचा धावता आलेख. ‘फ़ैमिली’मधली माणसं आपल्यातली, ओळखीची वाटतात. तिथेच राहून आपल्याशी गप्पा मारल्यासारखी लेखिका हकिगत सांगत जाते आणि आपण त्यात गुंतून राहतो.
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
#MEHTAPUBLISHINGHOUSE #MARATHIBOOKS #TRANSLATEDBOOKS #ONLINEBOOKS #BIOGRAPHYA&TRUESTORIES #FAMILYHOME #फॅमिली #FICTION #TRANSLATEDFROMENGLISHTOMARATHI #SUNANDAAMRAPURKAR #सुनंदाअमरापूरकर #MANJUKAPUR
Customer Reviews
  • Rating StarDAINIK PRABHAT 6-12-2009

    एकत्र कुटुंबपद्धती, एकत्र व्यवसाय यांचा समतोल राखणं, पिढ्यापिढ्यांच्या विचारातलं अंतर, वाढत राहणारे नातेसंबंध या सगळ्याचं मनोज्ञ दर्शन ‘फॅमिली’ हे पुस्तक वाचताना घडतं. फाळणीनंतर पाकिस्तानातून अनेक हिंदू कुटुंबं भारतात आली. हिंसाचाराच्या आगीत होरपळले्या यांपैकी अनेकांनी पुन्हा पहिल्यापासून सुरुवात करत नवीन विश्वाची निर्मिती केली. ‘फॅमिली’ या कादंबरीत अशाच एका कुटुंबाची कथा वाचायला मिळते. मंजू कपूर यांनी लिहिलेल्या ‘होम’ या इंग्रजी पुस्तकाचा अनुवाद सुनंदा अमरापूरकर यांनी केला आहे. पाकिस्तानात भरभराटीला आलेल्या एका प्रख्यात कापड दुकानदाराची कथा यामध्ये चितारली आहे. फाळणीच्या वणव्यात हे कापड दुकान बेचिराख होतं आणि आपली गरोदर पत्नी, दोन मुलांना घेऊन कुटुंबप्रमुख चालत-चालत दिल्लीच्या निर्वासित छावणीत येतात. लाला बनवारीलाल असं या कुटुंबप्रमुखाचं नाव.दिल्लीत आल्यावर शून्यापासून सुरुवात करून पुन्हा प्रतिष्ठित व्यापारी म्हणून ते स्वत:ला सिद्ध करतात. बनवारीलाल परिवार हा अशा स्तरातला होता की, ज्यांनी बाजारातलं आपलं अव्वल स्थान टिकविण्यासाठी पिढ्यांनपिढ्या प्रयत्न केले होते. लग्नसंबंध जोडताना त्यामुळे समृद्धीत भर पडेल असं पाहिलं होतं. कोणत्याही परिस्थितीत कुटुंब विभक्त होऊ द्यायचं नाही, असा या परिवाराचा नियम होता. या परिवाराने आपल्या मुलांना अगदी लहानपणापासून कुटुंबाचा पाया भक्कम करण्याचं शिक्षण दिलं होतं. मुलांना देण्यात आलेले शिक्षण, अंगी बाणवलेली मूल्यं, जोडलेले संबंध या सगळयांमागे त्यांच्या जीवनात सौख्य भरणारा सोन्या-चांदीचा प्रवाह सतत वाहत राहिला पाहिजे, हा एकच हेतू होता. या कादंबरीत विविध व्यक्तिरेखा येतात. कादंबरीची सुरुवात सोना आणि सुनीता या दोन बहिणींच्या कुटुंबाची ओळख करून देत होते. या दोघी सख्ख्या बहिणी असल्या तरी दोघींच्या स्वभावात आणि रुपातही बराच फरक आहे. सोना नितळ गोरेपणा, अप्रतिम सौंदर्य घेऊन जन्माला आलेली, तर सुनीता तिच्या तुलनेत सावळी आणि रुपानेही सामान्य. सोनाच्या सौंदर्याच्या बळावरच तिला बनवारीलालसारख्या नावाजलेल्या व्यापारी कुटुंबातून मागणी येते, तर सुनीताचा विवाह सरकारी नोकरी असणाऱ्या मुलाशी होतो. सोनाचा बनवारीलाल परिवार हा एकत्र कुटुंबपद्धतीला अनन्यसाधारण महत्त्व देणारा. घराण्याचा वंश सुरू राहण्यासाठी मुलगा हवाच, हा त्यांचा हट्ट. या घरात मुलगा असणाऱ्या स्त्रीचं स्थान वरचं असतं. दुर्दैवाने सोनाला लग्नानंतर बरीच वर्षे मूल होत नाही. तिच्या धाकट्या दिराचं लग्न होऊन त्या दांपत्याला मूल होतं तरी सोनाची कूस उजवलेली नसते. यामुळे थोरली सून असूनही तिचं घरातलं वजन कमी झालेलं असतं. सासूकडून आणि नणंदा-जावांकडूनही तिला बरंच ऐकून घ्यावं लागलेलं असतं. याउलट धाकट्या सूनेला मूल झाल्यानंतर तिचा भाव वधारतो. इकडे सुनीताच्या पोटालाही मूल नसतं. मात्र, तिला सोनासारखा त्रास सहन करावा लागत नाही. तिचं कुटुंबही मर्यादित असतं. गृहउद्योग करून पतीला हातभार लावण्यात ती मोठा वाटा उचलते. तिच्या या उद्योगात सोनाचा पतीही मदत करतो. इकडे काही वर्षांनी सोनाच्या पोटी मूल जन्माला येतं आणि तिची घरातली किंमत एकदम वाढते. पहिली मुलगी जन्माला येते आणि पाठोपाठ एक मुलगा. आई झाल्यामुळे सोनाचं घरातील स्थान एकदम उंचावलेलं असतं. आता ती थोरली सून म्हणून घरभर तोरा मिरवू शेत असते. स्थान, घरची श्रीमंती, पदरात दोन मुलं या साऱ्यामुळे तिचा अहंकार आपोआप उसळून येतो. या कुटुंबात पुरुषांनी व्यवसाय सांभाळायचा आणि स्त्रियांनी संसार पहायचा, मुलांचं संगोपन करायचं, कुटुंबाचा वंश पुढे सुरू ठेवायचा हीच पारंपारिक कल्पना असते. मुलगा असो किंवा मुलगी त्यांच्या शिक्षणाला फारसं महत्त्व नसतंच. सोनाच्या पोटी जन्मलेली निशा मात्र, अभ्यासात कमालीची हुशार असते. तिचं लग्न व्हायचं असेल तर तिनं सुंदर दिसलं पाहिजे, घरकामात हुशार बनलं पाहिजे हा तिच्या आईचा आणि इतरांचाही दृष्टिकोन असतो. तथापि, सुनीताच्या पतीला शिक्षणाचं महत्त्व माहिती असतं. याच दरम्यान बनवारीलाल कुटुंबात विकी हा मुलगा दाखल झालेला असतो. सोनाच्या नणंदेचा मुलगा. त्याच्या आईचा सासरी छळ झाल्यामुळे तिने आत्महत्या केलेली असते आणि या मुलाला त्याचे मामा (सोनाचा पती) आपले घरी घेऊन आलेले असतात. मुलगा त्याच्या वडिलांप्रमाणेच स्वार्थी, आत्मकेंद्री असतो. पौगंडावस्थेतील विकी छोट्या निशाचं लैंगिक शेषण करतो. पण, ही गोष्ट कोणालाही कळत नाही; पण निशाच्या मनावर त्या घटनेचा जबरदस्त परिणाम झालेला असतो. पुढे ती मोठी झाल्यावर एका तरुणाशी तिचं प्रेम जमतं. मात्र, त्याचं कुटुंब बनवारीलाल कुटुंबाच्या तुलनेत खालच्या दर्जाचं असल्याने हे प्रकरण संपवलं जातं. पुढे निशाची ओढाताण सुरू होते. ती कशी संपते हे सांगत असतानाच ‘फॅमिली’ची गोष्ट संपते. एकत्र कुटुंबपद्धती, एकत्र व्यवसाय यांचा समतोल राखणं, पिढ्यांनपिढ्यांच्या विचारातलं अंतर, वाढत राहणारे नातेसंबंध या सगळ्याचं मनोज्ञ दर्शन ‘फॅमिली’ हे पुस्तक वाचताना घडतं. कुटुंबातील सर्व घडामोडींचं अचूक वर्णन वास्तवदर्शी आणि ओघवत्या बोलीभषेतून वाचाताना प्रसंग सजीव होऊन नजरेसमोर उभे राहतात. एकत्र कुटुंबामुळे वाढणारं बळ आणि येणारे ताण याचंही सुरेख दर्शन ‘फॅमिली’ मध्ये घडतं. लेखिकेने वाचकांशी गप्पा माराव्यात अशा पद्धतीने कादंबरीचं लेखन केलं आहे. या पुस्तकाच्या मूळ लेखिका मंजू कपूर या दिल्लीतील इरांडा हाऊस येथे इंग्रजी विषयाच्या प्राध्यापिका आहेत. इरांडा हाऊस येथून पदवी प्राप्त करून त्यांनी कॅनडातील डलहौसी विद्यापीठातून एम.फील केले. त्यांच्या ‘डिफिकल्ट डॉटर्स’ या पहिल्या कादंबरीला युरेशियन विभागासाठी कॉमनवेल्थ पुरस्कार मिळाला. त्यांच्या नावावर इतरही अनेक दर्जेदार पुस्तकाचा मराठी अनुवाद सुनंदा अमरापूरकर यांनी तेवढ्याच ओघवत्या शैलीत केला आहे. ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

A-AMITABHCHA
A-AMITABHCHA by G.B. DESHMUKH Rating Star
प्रा. डॉ . वैशाली रवी देशमुख, अमरावती

वाचनाचे फायदे सांगताना प्रसिद्ध इंग्रजी लेखक फ्रान्सिस बेकन म्हणतो `रीडिंग मेकेथ अ फुल मॅन`. वाचनामुळे माणूस परिपूर्ण होतो. क्वचित एखादं असं पुस्तक हाती येतं जे वाचल्यानंतर ह्या परिपूर्णतेची , आत्यंतिक समाधानाची जाणीव होते . नुकतंच जी. बी. देशुख यांचं `अ- अमिताभचा` हे पुस्तक हाती पडलं एका बैठकीत ते वाचून संपवलं आणि काहीतरी माहितीपर तरीही दर्जेदार आणि साहित्यिक मूल्य असणारं पुस्तक वाचण्याचा आनंद प्राप्त झाला. सीमा आणि केंद्रीय उत्पादन शुल्क विभागात काम करून निवृत्त झालेल्या जीबी देशमुखांनी २०२० मध्ये अमिताभ बच्चनच्या कारकिर्दीच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त त्यांच्या विविध ५० सिनेमातील भूमिकांचे विश्लेषण करणारे साप्ताहिक सदर दैनिक सकाळ मध्ये प्रकाशित केले. कोरोना काळात लिहिलेल्या या लेखमालेला त्यावेळी प्रचंड प्रतिसाद मिळाला. केवळ ज्येष्ठच नाही तर तरुण वाचकांनीही या लेखमालिकेला पसंतीची पावती दिली. २०२२ मध्ये मेहता पब्लिकेशनने अमिताभ बच्चनच्या एकूण ६२ सिनेमांवर आधारित लेख `अ अमिताभचा` या पुस्तक रूपाने प्रकाशित केले. १९६९ पासून चित्रपटसृष्टीत पदार्पण करणाऱ्या अमिताभ बच्चनच्या कारकीर्दीला पाच दशकांपेक्षा अधिक काळ लोटला तरीही त्याचे सिनेरसिकांच्या भावविश्वावर असलेले अधिराज्य कायम आहे. ती जादू कमी ओसरण्याचं नावच घेत नाही तर ती दिवसेंदिवस वाढत आहे . किरकोळ शरीरयष्टी, भरमसाठ उंची आणि सौंदर्याच्या साचेबंद व्याख्येत न बसणारा चेहरा असलेला अमिताभ आणि त्याला मिळालेली अफाट लोकप्रियता याची सांगड घालणे सर्वसामान्य व्यक्तीच्या आकलनापलीकडचे आहे. अमिताभ बच्चनचे प्रचंड चाहते असलेले जी . बी देशमुख यांच्यासाठी `अ` हा अमिताभचाच आहे. परंतु केवळ एक चाहते म्हणून त्यांनी हे पुस्तक लिहिलेलं नाही तर अमिताभ बच्चनचे जे गारुड कित्येक दशकांपासून प्रेक्षकांच्या मनावर आहे त्यामागची नेमकी कारणे कोणती असू शकतात हे अत्यंत अभ्यासपूर्ण पद्धतीने शोधण्याचा प्रयत्न त्यांनी या पुस्तकात केलेला आहे. एक रसिक, चोखंदळ प्रेक्षक, अभ्यासक आणि समीक्षक म्हणून या पुस्तकात लेखक आपल्या समोर येतात. `बेमिसाल` पासून `झुंड` या चित्रपटा पर्यंत अमिताभ बच्चनच्या कारकीर्दीतील उत्तमोत्तम ६२ सिनेमांचा लेखकांनी या पुस्तकात परामर्ष घेतलेला आहे. या चित्रपटांमधील अमिताभ बच्चनच्या भूमिकेशी संबंधित सर्व बाबींचे अत्यंत अभ्यास पूर्वक रसग्रहण केलेले आहे. `अमिताभ बच्चन चांगला कलाकार आहे` किंवा `अमुक अमुक चित्रपट चांगला आहे` असं जेव्हा एखादा सर्वसामान्य प्रेक्षक म्हणतो त्यावेळेस हे आवडणं किंवा चांगलं असणं नेमकं का आहे याची उत्तरं देण्याचा प्रयत्न लेखकाने प्रत्येक लेखात केलेला आहे. प्रत्येक चित्रपटातील अमिताभ बच्चनच्या भूमिकेशी संबंधित हायलाइट्स जसे की, एखादा उत्कट प्रसंग, गाणे, नृत्य, मारामारीचे दृश्य यावर लेखकाने प्रकाश टाकलेला आहे. आपण जर तो चित्रपट पाहिला असेल तर लेखकाने वर्णन केलेले प्रसंग जसेच्या तसे डोळ्यासमोर उभे राहतात आणि बघितला नसेल तर तो चित्रपट आपण पाहिलाच पाहिजे अशी तीव्र इच्छा मनात निर्माण होते. उदाहरणार्थ, शोले या चित्रपटातील रसग्रहणात ,चेहऱ्यावरचे रेषाही ढळू न देता अमिताभने फेकलेले वन लाइनर्स, बुद्धीची चमक दाखवणारे शांतपणे केलेले विनोद, हळुवार प्रेमासाठी त्याचं आतल्या आत झुरणं , मित्राच्या मांडीवर प्राणत्यागाचे उत्कट दृश्य, आणि पिढ्यानपिढ्या लक्षात राहिलेला मावशी लीला मिश्रा सोबतचा विनोदी संवाद यांचे परिणामकारक वर्णन करून त्यांनी अमिताभची उत्तुंग अभिनय क्षमता उलगडून दाखवली आहे. या पुस्तकाला वाचनीय बनवणारा एक घटक म्हणजे लेखकाने वापरलेली भाषा. अत्यंत साध्या, सोप्या आणि अनुभवातून आलेल्या शब्दातून लेखकाने अमिताभ बच्चन भूमिकांचा उत्तरोत्तर चढत जाणारा आलेख शब्दांकित केला आहे. लेखकाच्या भाषा प्रभुत्वाचे साक्ष देणारी अनेक वाक्य पुस्तकांमध्ये जागजागी आढळतात. एका ठिकाणी ते लिहितात, `अमिताभने सिनेमातील विनोदाची सूत्र हाती घेतली तेव्हापासून विनोदी कलाकारांवर जणू बेकारीचं संकट कोसळलं होतं. प्रेक्षकांना दिलेल्या मनोरंजनाच्या वचनाशी `नमक हलाली` करणाऱ्या प्रकाश मेहरा आणि अमिताभ या जोडीने प्रेक्षकांना `और हम नाचे बिन घुंगरू के` असा आनंद दिला होता. असेच एक सुंदर वाक्य- `अमिताभचा उंट मनोरंजनाचा अख्खा तंबू व्यापून बसला होता`. लेखकाच्या ओघवत्या आणि मनाला भिडणाऱ्या भाषा शैलीचं एक उदाहरण मिली चित्रपटाच्या रसग्रहणातील या परिषदेतून दिसून येत: "शेखरच्या मनावर चढलेली उदासीची पुटं अमिताभच्या कसदार अभिनयामुळे आपल्याला अस्वस्थ,उदास करून सोडतात. दारूच्या नशेतील अमिताभचं एक दृश्य मस्त जमलं होतं . मोबाईल, टीव्ही इत्यादी आधुनिक साधनं व्यवहारात येण्याच्या आधीचा तो काळ होता. मिली आजारामुळे घरात बंदिस्त झाल्यानंतर त्या दोघात नोकराच्या माध्यमातून जो पत्र व्यवहार होतो तो आजच्या मोबाईल चॅटिंग पेक्षाही प्रभावी वाटतो. रोज मिलीला वरच्या मजल्यावरून खालच्या मजल्यावर गुलदस्ता पाठवणारा अमिताभ एका चिठ्ठीत लिहितो `जो गुलदस्ता बनके खुद आ जाऊ तो कहा रखुं . ` हे रोमँटिसिझम खूप वरच्या स्तराचं होतं. अमर्याद दुःखाची वीण घट्ट करत जाताना किशोर कुमारच्या दर्दभऱ्या स्वरात `बडी सुनी, सुनी है जिंदगी ये जिंदगी` आणि `आये तुम याद मुझे गाने लगी हर धडकन` ही दोन गाणी वातावरण औदासिन्यानं भरून टाकतात. मनाचा चांगला पण लहानपणी आई वडिलांच्या बाबतीत घडलेल्या घटनेने आणि लोकांनी त्याकरिता डिवचल्यानं कच खाल्लेला, प्रेमाची आस लागलेला एक तरुण अमिताभने लाजवाब रंगवला होता. या पुस्तकाच्या रंजकतेत भर टाकणारा आणखी एक घटक म्हणजे लेखकाचे आत्मचरित्रात्मक निवेदन. प्रत्येक चित्रपटाच्या बाबतीत तो चित्रपट त्यांनी केव्हा पाहिला, कुणाबरोबर पाहिला,त्यावेळी ते किती वर्षांचे होते आणि त्या चित्रपटाचा त्यांच्या भावविश्वावर कसा परिणाम झाला याचा उल्लेख जागजागी केलेला आहे. लेखकाच्या पिढीतील वाचकांना यातून पुनः प्रत्ययाचा आनंद मिळतो. आणि आजच्या पिढीतील इतर वाचकांसाठीही ही बाब रंजक ठरते. पुस्तकाच्या मलपृष्ठावर लेखक म्हणतात, `1973 साली आम्ही पाचवीत असताना आम्हाला प्रथमच हिंदी सिनेमातील नायकाची `ये पोलीस स्टेशन है, तुम्हारे बाप का घर नही`, अशी आगळीवेगळी मिजास पडद्यावर बघायला मिळाली आणि आता निवृत्तीला आलो तर हाच अद्भुत माणूस आम्हाला `पिंक` या महिलाप्रधान सिनेमात `ना का मतलब सिर्फ ना होता है`, असं ठणकावतो, `बदला` ह्या रहस्यपटात तितक्याच जोरकसपणे `सबका सच अलग अलग होता है ,` असं तत्वज्ञान मांडतो आणि अगदी अलीकडच्या `झुंड` मध्ये झोपडपट्टीतील धटिंगण मुलांच्या घोळक्याला `झुंड नाही, टीम... `म्हणायची शिकवण देतो तेव्हा आजही त्याचं म्हणणं आमच्या हृदयात थेट उतरतं .` पुस्तक वाचत असताना लेखकाच्या अफाट निरीक्षणशक्तीचे आणि अभ्यासू वृत्तीचे दर्शन घडते . विविध दिग्दर्शकांनी अमिताभच्या अभिनयक्षमतेचा केलेला वापर , अमिताभच्या डोळ्यातून सशक्तपणे व्यक्त झालेले हृदयस्पर्शी भाव, वेगवेगळ्या चित्रपटात त्याने केलेला लाथेचा उपयोग, त्याची वैशिष्ट्यपूर्ण नृत्य, आणि भारदस्त आवाजातील संवाद आणि गाणी यांचं वर्णन वाचत असताना लेखकाची संशोधक वृत्ती तर जाणवतेच परंतु आपणही हे चित्रपट पाहून हा रसास्वाद घ्यायलाच हवा ही इच्छा वाचकांच्या मनात प्रकर्षाने निर्माण होते.यातच या पुस्तकाचे फार मोठे यश सामावले आहे हे नक्की! ...Read more

SAAD GHALATO KALAHARI
SAAD GHALATO KALAHARI by MARK & DELIA OWENS Rating Star
मोहन देशपांडे नागपुर

cry of kalahari ह्या पुस्तके अनुवाद हिंदी सर्वोत्तम (RD) मध्ये कित्येक वर्षापूर्वी वाचले होते. माझ्याजवळ, जपून ठेवलेल्या पुस्तकामधे ते पुस्तक गहाळ झाले. मग 4 वर्षापूर्वी हे पुस्तक मिळाले व विकत घेतले. ते अनेक वेळा वाचून काढले, तरी प्रत्येकवेळी वेगळा नंद होतो. ती तुमची रसाळ भाषेची किमया. ह्या मुळेच Deceiption valley एकदा तरी बघता यावी ही इच्छा तुमचे अभिनंदन व धन्यवाद... ...Read more