* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: HOME
  • Availability : Notify Me
     
  • Translators : SUNANDA AMRAPURKAR
  • ISBN : 9788184980585
  • Edition : 2
  • Publishing Year : SEPTEMBER 2009
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 372
  • Language : Translated From ENGLISH to MARATHI
  • Category : FICTION
Quantity
Buying Options:
  • Print Books:
IN MANJU KAPUR`S EMBLEMATIC NEW NOVEL, THE SEEMINGLY TRANQUILWOFID OF A JOINT FAMILY IS COMING APART. BANWARI LAL, PATRIARCH OF A CLOTH BUSINESS IN THE MIDDLE CLASS NEW DELHI NEIGHBOURHOOD OF KAROL BAGH, IS A BELIEVER IN THE OLD WAYS. MEN WORK,; OUT OF TLTE HOME, WOMEN WITHIN. MEN CARRYFORWARD THE FAMILY LINE, WOMEN ENABLE THEIR MISSION. HIS TWO SONS UNQUESTIONINGLY FOLLOW THEIR FATHER IN BUSINESS AND IN LIFE, BUT THEIR WIVES WILL NOT. NEITHER WILL HIS GRAND-DAUGLTTER, WHO MAKES CONSIDERED UNAVAILABLE TO THE WOMEN OF THE FAMILY. WITH UNSWERVING ATTENTION, KAPUR FOLLOWS THE MEMBERS OF THIS TRADITIONAL FAMILY INTO THE UNEASY WORLD THEY COME TO INHABIT. FROM THE FRENETIC SENSORY OVERLOAD OF MODERN URBAN INDIA, SHE CONSTRUC.TS A STORY AS INTRICATE, QUIET AND DAZZLING AS THE FABRIC PRODUCED BY THE FAMILY. TOLD IN A SUSTAINED COLLOQUIAL VOICE, HOME STARTLING ITS SWEEP_AND UNERRINGLY ACCURATE IN THE BLEAKNESS AND HOPE IT PRESENTS.
पाकिस्तानात भरभराटीला आलेलं कापड दुकान फाळणीच्या वणव्यात बेचिराख झाल्यावर, गरोदर पत्नी आणि दोन लहान मुलांसह, चालत चालत सरहद्द ओलांडून दिल्लीच्या निर्वासित छावणीत दाखल झालेले लाला बनवारीलाल. शून्यापासून सुरुवात करून पुन्हा करोल बागेतले प्रतिष्ठित व्यापारी म्हणून स्वत:ला सिद्ध करेपर्यंतचा आणि त्यानंतरचा त्यांच्या कुटुंबाचा प्रवास. काळानुसार केलेले, करावे लागलेले बदल. एकत्र कुटुंबपद्धती, एकत्र व्यवसाय दोन्हींचा समतोल राखणं, पिढ्या-पिढ्यांच्या विचारांतलं अंतर, घरातल्या माणसा-माणसांचे बदलते विचार, वाढत राहणारे नातेसंबंध, वेगवेगळे स्वभाव या सगळ्याचं मनोज्ञ दर्शन ‘फ़ैमिली’ वाचताना घडत राहतं. आई-वडील, पती-पत्नी, बहिणी-बहिणी, सासू-सुना, दीर-जावा, मुलं-मुली, व्याही-विहिणी अशा कुटंबातल्या सगळ्या नातेसंबंधांचं अचूक वर्णन वास्तवदर्शी, ओघवत्या बोलीभाषेतून वाचताना, प्रसंग सजीव होऊन नजरेसमोर उभे राहतात. दैनंदिन जीवनात येणारे छोटे-मोठे विजयाचे, पराभवाचे, आनंदाचे, काळजीचे प्रसंग. एकत्र कुटुंबामुळे वाढणारं बळ आणि येणारे ताण. सत्तासंघर्ष, निरपेक्ष आणि सापेक्ष माया-ममता, परंपरा पाळण्याचे आणि संस्कृती राखण्याचे प्रयत्न हे सारं आपल्यासमोर घडल्यासारखं वाटतं आणि पाश्र्वभूमीवर जाणवत राहतो स्वातंत्र्यप्राप्तीनंतर बदलत गेलेल्या सामाजिक परिस्थितीचा, बदलत्या व्यावसायिक, धार्मिक आणि नैतिक कल्पनांचा धावता आलेख. ‘फ़ैमिली’मधली माणसं आपल्यातली, ओळखीची वाटतात. तिथेच राहून आपल्याशी गप्पा मारल्यासारखी लेखिका हकिगत सांगत जाते आणि आपण त्यात गुंतून राहतो.
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
#MEHTAPUBLISHINGHOUSE #MARATHIBOOKS #TRANSLATEDBOOKS #ONLINEBOOKS #BIOGRAPHYA&TRUESTORIES #FAMILYHOME #फॅमिली #FICTION #TRANSLATEDFROMENGLISHTOMARATHI #SUNANDAAMRAPURKAR #सुनंदाअमरापूरकर #MANJUKAPUR
Customer Reviews
  • Rating StarDAINIK PRABHAT 6-12-2009

    एकत्र कुटुंबपद्धती, एकत्र व्यवसाय यांचा समतोल राखणं, पिढ्यापिढ्यांच्या विचारातलं अंतर, वाढत राहणारे नातेसंबंध या सगळ्याचं मनोज्ञ दर्शन ‘फॅमिली’ हे पुस्तक वाचताना घडतं. फाळणीनंतर पाकिस्तानातून अनेक हिंदू कुटुंबं भारतात आली. हिंसाचाराच्या आगीत होरपळले्या यांपैकी अनेकांनी पुन्हा पहिल्यापासून सुरुवात करत नवीन विश्वाची निर्मिती केली. ‘फॅमिली’ या कादंबरीत अशाच एका कुटुंबाची कथा वाचायला मिळते. मंजू कपूर यांनी लिहिलेल्या ‘होम’ या इंग्रजी पुस्तकाचा अनुवाद सुनंदा अमरापूरकर यांनी केला आहे. पाकिस्तानात भरभराटीला आलेल्या एका प्रख्यात कापड दुकानदाराची कथा यामध्ये चितारली आहे. फाळणीच्या वणव्यात हे कापड दुकान बेचिराख होतं आणि आपली गरोदर पत्नी, दोन मुलांना घेऊन कुटुंबप्रमुख चालत-चालत दिल्लीच्या निर्वासित छावणीत येतात. लाला बनवारीलाल असं या कुटुंबप्रमुखाचं नाव.दिल्लीत आल्यावर शून्यापासून सुरुवात करून पुन्हा प्रतिष्ठित व्यापारी म्हणून ते स्वत:ला सिद्ध करतात. बनवारीलाल परिवार हा अशा स्तरातला होता की, ज्यांनी बाजारातलं आपलं अव्वल स्थान टिकविण्यासाठी पिढ्यांनपिढ्या प्रयत्न केले होते. लग्नसंबंध जोडताना त्यामुळे समृद्धीत भर पडेल असं पाहिलं होतं. कोणत्याही परिस्थितीत कुटुंब विभक्त होऊ द्यायचं नाही, असा या परिवाराचा नियम होता. या परिवाराने आपल्या मुलांना अगदी लहानपणापासून कुटुंबाचा पाया भक्कम करण्याचं शिक्षण दिलं होतं. मुलांना देण्यात आलेले शिक्षण, अंगी बाणवलेली मूल्यं, जोडलेले संबंध या सगळयांमागे त्यांच्या जीवनात सौख्य भरणारा सोन्या-चांदीचा प्रवाह सतत वाहत राहिला पाहिजे, हा एकच हेतू होता. या कादंबरीत विविध व्यक्तिरेखा येतात. कादंबरीची सुरुवात सोना आणि सुनीता या दोन बहिणींच्या कुटुंबाची ओळख करून देत होते. या दोघी सख्ख्या बहिणी असल्या तरी दोघींच्या स्वभावात आणि रुपातही बराच फरक आहे. सोना नितळ गोरेपणा, अप्रतिम सौंदर्य घेऊन जन्माला आलेली, तर सुनीता तिच्या तुलनेत सावळी आणि रुपानेही सामान्य. सोनाच्या सौंदर्याच्या बळावरच तिला बनवारीलालसारख्या नावाजलेल्या व्यापारी कुटुंबातून मागणी येते, तर सुनीताचा विवाह सरकारी नोकरी असणाऱ्या मुलाशी होतो. सोनाचा बनवारीलाल परिवार हा एकत्र कुटुंबपद्धतीला अनन्यसाधारण महत्त्व देणारा. घराण्याचा वंश सुरू राहण्यासाठी मुलगा हवाच, हा त्यांचा हट्ट. या घरात मुलगा असणाऱ्या स्त्रीचं स्थान वरचं असतं. दुर्दैवाने सोनाला लग्नानंतर बरीच वर्षे मूल होत नाही. तिच्या धाकट्या दिराचं लग्न होऊन त्या दांपत्याला मूल होतं तरी सोनाची कूस उजवलेली नसते. यामुळे थोरली सून असूनही तिचं घरातलं वजन कमी झालेलं असतं. सासूकडून आणि नणंदा-जावांकडूनही तिला बरंच ऐकून घ्यावं लागलेलं असतं. याउलट धाकट्या सूनेला मूल झाल्यानंतर तिचा भाव वधारतो. इकडे सुनीताच्या पोटालाही मूल नसतं. मात्र, तिला सोनासारखा त्रास सहन करावा लागत नाही. तिचं कुटुंबही मर्यादित असतं. गृहउद्योग करून पतीला हातभार लावण्यात ती मोठा वाटा उचलते. तिच्या या उद्योगात सोनाचा पतीही मदत करतो. इकडे काही वर्षांनी सोनाच्या पोटी मूल जन्माला येतं आणि तिची घरातली किंमत एकदम वाढते. पहिली मुलगी जन्माला येते आणि पाठोपाठ एक मुलगा. आई झाल्यामुळे सोनाचं घरातील स्थान एकदम उंचावलेलं असतं. आता ती थोरली सून म्हणून घरभर तोरा मिरवू शेत असते. स्थान, घरची श्रीमंती, पदरात दोन मुलं या साऱ्यामुळे तिचा अहंकार आपोआप उसळून येतो. या कुटुंबात पुरुषांनी व्यवसाय सांभाळायचा आणि स्त्रियांनी संसार पहायचा, मुलांचं संगोपन करायचं, कुटुंबाचा वंश पुढे सुरू ठेवायचा हीच पारंपारिक कल्पना असते. मुलगा असो किंवा मुलगी त्यांच्या शिक्षणाला फारसं महत्त्व नसतंच. सोनाच्या पोटी जन्मलेली निशा मात्र, अभ्यासात कमालीची हुशार असते. तिचं लग्न व्हायचं असेल तर तिनं सुंदर दिसलं पाहिजे, घरकामात हुशार बनलं पाहिजे हा तिच्या आईचा आणि इतरांचाही दृष्टिकोन असतो. तथापि, सुनीताच्या पतीला शिक्षणाचं महत्त्व माहिती असतं. याच दरम्यान बनवारीलाल कुटुंबात विकी हा मुलगा दाखल झालेला असतो. सोनाच्या नणंदेचा मुलगा. त्याच्या आईचा सासरी छळ झाल्यामुळे तिने आत्महत्या केलेली असते आणि या मुलाला त्याचे मामा (सोनाचा पती) आपले घरी घेऊन आलेले असतात. मुलगा त्याच्या वडिलांप्रमाणेच स्वार्थी, आत्मकेंद्री असतो. पौगंडावस्थेतील विकी छोट्या निशाचं लैंगिक शेषण करतो. पण, ही गोष्ट कोणालाही कळत नाही; पण निशाच्या मनावर त्या घटनेचा जबरदस्त परिणाम झालेला असतो. पुढे ती मोठी झाल्यावर एका तरुणाशी तिचं प्रेम जमतं. मात्र, त्याचं कुटुंब बनवारीलाल कुटुंबाच्या तुलनेत खालच्या दर्जाचं असल्याने हे प्रकरण संपवलं जातं. पुढे निशाची ओढाताण सुरू होते. ती कशी संपते हे सांगत असतानाच ‘फॅमिली’ची गोष्ट संपते. एकत्र कुटुंबपद्धती, एकत्र व्यवसाय यांचा समतोल राखणं, पिढ्यांनपिढ्यांच्या विचारातलं अंतर, वाढत राहणारे नातेसंबंध या सगळ्याचं मनोज्ञ दर्शन ‘फॅमिली’ हे पुस्तक वाचताना घडतं. कुटुंबातील सर्व घडामोडींचं अचूक वर्णन वास्तवदर्शी आणि ओघवत्या बोलीभषेतून वाचाताना प्रसंग सजीव होऊन नजरेसमोर उभे राहतात. एकत्र कुटुंबामुळे वाढणारं बळ आणि येणारे ताण याचंही सुरेख दर्शन ‘फॅमिली’ मध्ये घडतं. लेखिकेने वाचकांशी गप्पा माराव्यात अशा पद्धतीने कादंबरीचं लेखन केलं आहे. या पुस्तकाच्या मूळ लेखिका मंजू कपूर या दिल्लीतील इरांडा हाऊस येथे इंग्रजी विषयाच्या प्राध्यापिका आहेत. इरांडा हाऊस येथून पदवी प्राप्त करून त्यांनी कॅनडातील डलहौसी विद्यापीठातून एम.फील केले. त्यांच्या ‘डिफिकल्ट डॉटर्स’ या पहिल्या कादंबरीला युरेशियन विभागासाठी कॉमनवेल्थ पुरस्कार मिळाला. त्यांच्या नावावर इतरही अनेक दर्जेदार पुस्तकाचा मराठी अनुवाद सुनंदा अमरापूरकर यांनी तेवढ्याच ओघवत्या शैलीत केला आहे. ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

आबासाहेब कडू, अमरावती.

एकाच दमात छप्पन वेळा वाचावा असा काव्यसंग्रह* दै.सकाळच्या सप्तरंग पुरवणीत अ-अमिताभचा व दै.हिंदस्थान मधील `अमरावती सिरीज` चे स्तंभलेखक व अमरावती येथील प्रसिद्ध साहित्यिक श्री जी.बी.देशमुख ह्यांचा छप्पन कवितांचा समावेश असलेल्या अमरावतीच्या वस्तू,वास्ू आणि माणसाच्या वैशिष्ट्यावर आधारित `अमरावतीचे छप्पन स्वभाव` हे पुस्तक मी विकत घेतले. घरी गेल्यावर त्यातील छप्पनही कविता एकाच दमात वाचून काढल्या अन् पैसा वसूल झाल्याचे समाधान झाल्यावर त्यावर चिंतन करावेसे वाटले, म्हणून हा लेखनप्रपंच. वाचक हा अमरावतीकर असेल तर `अमरावतीतल्या गमती` ही पहिलीच कविता त्याच्या मनाचा ठाव घेते आणि `याटोत` बसवून परकोटातल्या मुर्गी मठासह अख्खी अमरावती फिरवून आणते. गांधीचौकात गांधी नाही मालटेकडीवर माल नाही.. खेटरे झाली ब्रँडेड सगळी मोची गल्लीत मोची नाही.. तपोवनात तपस्वी नाही कल्याणनगरात कल्याण नाही… लेखकाच्या भारदस्त शब्दशक्तीचा इथेच विजय होतो आणि मग अमरावतीची एकेक वैशिष्ट्ये पादाक्रांत करित छप्पनीकडे वाटचाल करीत जातो. ही काव्यात्मक रुपातील वैशिष्ट्ये वाचतांना अमरावतीचा पन्नाशितला वाचक देहभान विसरुन गतकाळात रममाण होतो. त्याचे मन नकळत सुखावते, गात्रे जागृत होतात, मेंदू रिचार्ज होतो तर तरुण वाचकाच्या मनात अमरावती शहराविषयी कुतुहल निर्माण होते. तोही मग त्यातील खाणाखुणा शोधायचा प्रयत्न करत बसतो. या संग्रहातील प्रत्येक कवितेवर एकेक निबंध तयार होऊ शकतो. स्वभाव हा शब्द सहसा मनुष्याशी जोडून उपयोगात आणला जातो पण इथे तर लेखकाने निर्जीवातही प्राण फुंकले आहे. अमरावतीच्या याटोत बसून ह्यातील सजीवता आपल्याला अनुभवता येईल. मग तो बेनाम चौक असो, कुथे बस स्टॉप असो, अनेक नावांचे कापसाचे जीन असो, वालकट कम्पाउंड असो, हनुमान आखाडा असो, इर्विन, डफरीन दवाखाने असो, `अमरावतीतल्या विहिरी` असो नाहीतर मोर्शी रोडवरील थोर महात्म्यांचे पुतळे असो. अमरावतीच्या शब्दकळा, अमरावतीच्या हाका, अमरावतीच्या वल्ली, अमरावतीच्या टॉमीची पाॅटी, अमरावतीचे सुपरस्टार, अमरावतीचा बागुलबोवा, अमरावतीचे वेडे एकदमच बेस्ट. अमरावतीच्या रेल्वे ब्रीजचे तर ते भरभरुन कौतुक करतात. चारी बाजूनं उतरणारा पूल फक्त जपानमध्ये आहे अन् सिंगापूरच्या नंतर नंबर आपल्याच पुलाचा आहे कारण हा पूल आहेच कौतुक करण्याजोगा, मलाही ह्या पूलाचे कौतुक याच्याकरिता आहे की ह्या पूलाचे बांधकाम माझ्या पेठ मांगरुळी गावच्या अभियंत्याच्याच देखरेखीखाली झाले आहे. अमरावतीशी प्रत्यक्ष संबंध आला तो १९७५ सालापासून,पण काही अपवाद वगळता लेखकाच्या छप्पनीतील अनेक वैशिष्ट्ये मी अनुभवलेली आहेत. ह्याच रेल्वेपुलावर रोज संध्याकाळी एक भोळसट मुलगा गाणे गायचा,लोक त्याला प्रेमाने शाहरुख म्हणायचे,कारण तो स्वतःला शाहरुख खानंच समजत असे. अमरावतीच्या कॉलेजमधील तरुणांचे भावविश्व मांडतांना लेखकाने हात आखडता घेतला नाही. इंजिनिअरिंग कॉलेज व व्ही.एम.व्ही. ही त्यावेळची आघाडीवरची कॉलेजेस होती. त्यामधील कॉलेजियन्सचे दर्द लेखकाने मिश्कीलपणे मांडले त्या `अमरावतीचा दर्द` ह्या कवितेतील ओळी आताच्या पेन्शनरांना त्या काळात घेऊन जातील. तरुण मंडळींनी तो आनंद पुस्तक वाचून घ्यावा. अमरावतीचा आद्य मॉल म्हणजे फक्त महिलांसाठीच राखीव असलेली बाजारपेठ अशी ओळख असलेलं `जोशी मार्केट`, `अमरावतीची नवरात्र`, `अमरावतीचे जेष्ठ नागरिक` ह्या पूरक कविताही त्याच प्रेमाच्या विश्वात घेऊन जातात.. `अमरावतीचा भुलभुलैय्या` मधील अनुभव आजही अनेकांना येतो, मलाही अनेकदा आला, त्याकरिता ही पूर्ण कविताच वाचणे आवश्यक आहे. अमरावतीचा अंबानाला, त्यानुषंगाने मास्तराने दिलेली `पदवी`, अमरावतीचे भोंगे, अमरावतीच्या उन्हाच्या चटक्यातील गरम चहाचे घोट थेट लंडनच्या थंड हवामानातल्या आईस्क्रीमलाही थंड करुन टाकतात ही तुलना मनाला भावून जाते. ब्लॅक अँड व्हाईट फोटोग्राफीतली मजा आताच्या डिजीटल फोटोग्राफीत नाही. त्यावेळी अमरावतीत मोजक्याच असलेल्या फोटो स्टुडिओची नावे लेखकाने दिलेली आहेत.त्यांनीही आता डिजीटल फोटोग्राफीच्या युगात प्रवेश केलेला आहे.त्यावेळेस काढलेले ब्लॅक अँड व्हाईट फोटो अनेकांनी जपून ठेवले असावे. लेखक मणीबाई गुजराती शाळेत शिकत होते त्यामुळे त्या शाळेचे व गुरुजनांचे गुणगान, स्वभाववैशिष्ठ्ये हे पुस्तकात येणे स्वाभाविकच आहे, मास्तराला पाणी पाजता पाजता त्यांचा वर्गमित्र पाणी पुरवठा विभागात कार्यकारी अभियंत्यापर्यंत कसा पोचला हा मनोरंजक किस्सा `अमरावतीची गुरुवाणी` कवितेतून खुसखुशीत भाषेत रेखाटला आहे. अमरावतीच्या टाकीजा, त्यांची वैशिष्ट्ये तर आहेतच पण दर गुरुवारी नवे सिनेमे अमरावतीत सर्वात पहिल्यांदा प्रदर्शित होत होते हे आज अनेकांना सांगूनही पटणार नाही पण तो मान अमरावतीला मिळत होता हा इतिहास आपल्याला अचंबित करुन जातो, सिनेमाचे अनेक डिस्ट्रीब्युटर हे अमरावतीतच होते, जवाहर रोडवरील जुन्या इमारतीवर ते बोर्ड तेव्हा हमखास दिसत, काळाच्या ओघात त्या जागी नवीन ईमारती उभ्या झाल्या, परंतु अजूनही एक-दोन ठिकाणी ते बोर्ड दिसतात.असे अनेक अचंबित करणारे किस्से या पुस्तकात काव्यरुपात लेखकाने अत्यंत खुमासदार व मनोरंजक पद्धतीने रेखाटून त्यात जीवंतपणा आणला आहे. हा काव्यसंग्रहातील ठेवा पुढील पीढीसाठी वारसा ठरेल यात मला तीळमात्रही शंका वाटत नाही. खवैयेगीरीत म्हणाल तर विनायकराव तायडेच्या गड्डा हॉटेलचा आलुबोंडा ज्या अमरावतीकरांनी आणि इतरांनीही खाल्ला असेल त्याला जगातल्या कुठल्याही हॉटेलातील आलुबोंडा आवडत नाही, अन् खाल्लाही असेल तर खातांना त्याला विनायकरावाचे आतिथ्य व तर्रीची आठवण आल्याशिवाय रहात नाही. अमरावती जिल्ह्यातील मंडळी लग्नबस्ता खरेदी करायला आली की खरेदी झाल्यावर वर वधूकडील मंडळीचे फराळपाण्याचे हे आदराचे स्थान होते. कॉलेजमध्ये शिकत असतांना मनीऑर्डर हातात पडली की प्रभात चौकातील `गौ दुग्ध सागर` ही विद्यार्थ्यांची पहिली पसंती असे. `जीडीएस` म्हणून ते फेमस होते. साऊथ इंडियन डिशेश मिळणारे जिल्ह्यातील ते एकमेव ठिकाण होते. राजकमल चौकालगतच्या टी स्टॉलवरच्या बोर्डावर चहाचे नावंच `स्पेशल चहा`, `बादशाही चहा`, `यादगार चहा` अन साब को `एक शिंगल मलाई मारके` असा आपुलकीचा चहा तेव्हा अमरावतीकरांनी यथेच्छ रिचवला. आता ह्या सर्व चहांचा मिळून एकच चहा मिळतो. पण ह्या चहात ती लज्जत नाही. मग तुम्ही त्या स्टॉलला `प्रेमाचा चहा` हे नांव ठेवा किंवा अजून काही. हरेक शहराला एक संस्कृती असते, वस्तू-वास्तू वारसा असतो, त्यातून जगण्यातली नजाकत शोधावी लागते. ती नजाकत `अमरावतीचे छप्पन स्वभाव` ह्या काव्यसंग्रहातून अनुभवावयास मिळते.लेखकाच्या बहारदार लेखणीतून उतरलेले ही काव्यमय वैशिष्ट्ये वाचतांना अमरावती बाहेरील वाचकही मग आपल्या शहरातील वैशिष्ट्ये शोधत बसतो ही हे या पुस्तकाचे वैशिष्ट्य आहे. तसेही छप्पन ह्या शब्दाला फार महत्व आहे, `छप्पन इंची छाती`, `अब तक छप्पन` हा सिनेमा, छप्पन भोग, छप्पन छुरी अन् पिव्वर वऱ्हाडातली वर्ल्ड फेमस धमकी म्हणजे `तुह्यासारखे त म्या सतराशे छप्पन पाह्यले बे, तुह्याकुन जे हुईन थे करुन घे.` छप्पन ह्या शब्दाचा पूरेपूर करुन घेतलेला वापर म्हणजे जी.बी.देशमुख सारख्या दिलखुश लेखकाने लिहिलेले हे खुमासदार,रसभरीत,टवटवीत प्रफुल्लित अन मिश्कील काव्य. आणि शेवटी……….. मणुश्याचे हे शरीर अणित्य आहे आतमा-णित्य आहे हा श्रद्धांजलीपर आवाज ज्याने हिंदू स्मशानभूमीत ऐकला नसेल त्याने ह्या जन्मात तरी तो ऐकेपर्यंत मरु नये. हे शब्द ऐकूनही त्याकडे कानाडोळा केला असेल तो माणूस करंटा पण हे करंटेपण लेखकाने घेतले नाही. लहानपणापासून अमरावतीत वावरतांना `डफरीन` (लँडीग पोर्ट) ते ही `वरची जागा` ह्यातील अत्यंत बारकाईने केलेले निरिक्षण लाजबाबच म्हणावे लागेल,त्याला तोड नाही. हे पुस्तक वाचतांना प्रत्यक्ष यमराज जरी द्वारी आला तरी त्याला "हे पुस्तक वाचेपावतर जराकसा थांबतं काय रे बॉ." अशी म्हणण्याची हिम्मत वाचकात येते हे मात्र नक्की. अमरावतीच्या वस्तू,वास्तू आणि माणसांच्या वैशिष्ट्यावर आधारित आपल्या बालमित्रांना समर्पित केलेला व मेहता पब्लिशिंग हाऊस ह्यानी प्रकाशित केलेला हा अमूल्य ठेवा आपणा सर्वांना नक्कीच आवडेल ह्याची खात्री आहे. ...Read more

बाबाराव घोरमाडे, अमरावती

प्रथम दर्शनी कविता लेखन असले तरी गद्य आणि पद्य सोबत सोबत चालल्यासारख्या लेखन शैलीचा भास जाणवतो. अमरावती शहरातील 70..80 व नंतरच्या दशकातील गुणवैशिष्ट्ये मार्मिक नर्म विनोदी शैलीत सुंदर रीतीने विषद केली आहेत. लेखकाची सुक्ष्म निरीक्षण शैली काव्य चना स्वरूपात पुस्तक रूपाने सादर करण्यात लेखक यशस्वी झाले आहेत. इजाफा,रूतबा, हिरव्या देठाचे,कैलहीचा मौहोल, ढगांचा,इत्यादी जुने वऱ्हाडी शब्द वापरल्यामुळे जुन्या आठवणींना उजाळा मिळाला. लेखकाने अमरावती शहरातील जुन्या जाणत्या, गुणवान, असामान्य अशा व्यक्तींची दखल घेतली......पण काहींची दखल राहून गेली आहे असे माझे मत आहे. उदा. सुरेश भट, मधुकर केचे व त्यांची सायकल , अमरावतीचे दहा दिवसांची गणपती उत्सव सजावट..... प्रत्येकाने वाचावे असे हे पुस्तक, विनोदी पण शेवटी असलेली कारूण्याची किनार अंतर्मुख करुन जाते. ...Read more