* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: FORWARD AND DELETE
  • Availability : Available
  • ISBN : 9788184985344
  • Edition : 2
  • Publishing Year : FEBRUARY 2014
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 168
  • Language : MARATHI
  • Category : FICTION
  • Available in Combos :SWATI CHANDORKAR COMBO SET - 18 BOOKS
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
AMOLIKA FORWARDS A COMPUTER GAME ‘DATE OF DEATH’ TO NAROTTAM. THE GAME GIVES THE DATE OF DEATH AFTER SOME BASIC DATA IS FED IN. NAROTTAM TRIES THE GAME AFTER FILLING IN DATA OF HIS FRIEND, KUMAR. KUMAR’S DEATH SHATTERS NAROTTAM WHO TAKES ILL MENTALLY. HE DOES NOT RESPOND TO ANY MEDICAL TREATMENT. LATER AS AMOLIKA HAS A CONVERSATION WITH HIM SHE LEARNS THAT HE HAD SEXUALLY ABUSED A SIX YEAR OLD CHILD. DETERMINED TO PUNISH HIM FOR HIS HIDEOUS CRIME, AMOLIKA DESIGNS THE GAME HERSELF AND FORWARDS IT TO HIM. AWARE OF HIS OBSESSION TOWARDS COMPUTER GAMES AND MAILS SHE IS SURE THAT HER GAME WILL SUCCEED: NARROTAM WILL MEET HIS END. SHE SIMPLY WALKS AWAY FROM NAROTTAM; NEVER INTENDING TO RETURN.
‘बदला घेण्यासाठी रक्तलांच्छितच घटना घडायला हव्यात असं कोण म्हणतं? आणि जर तसं म्हणत असतील, तर ते चूक, अयोग्य. शांत मनाने आणि अक्कलहुशारीनेही बदला घेता येतो. आणि मग तो गुन्हा ठरत नाही. ठरवता येत नाही. गुन्हेगार सापडतच नाही.’ अमोलिका मनातल्या मनात असाच काहीसा विचार करत होती,
प्रसादबन पुरस्कार, नांदेड २०१४.
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
Customer Reviews
  • Rating StarShucheta Khadilkar

    Khup chan pustak ahe jarur vacha

  • Rating StarLOKPRABHA - 22-08-2014

    अनपेक्षित शेवटाची कहाणी... सध्याच्या इंटरनेटच्या जमान्यात ‘साइन इन-युवर नेम - पासवर्ड - मेल - ओपन - क्लिक - क्लिक - फॉरवर्ड - सेंट’ या सगळ्या स्टेप्स काही सेकंदात करता येतात, आणि एखादा आवडलेला ई-मेल क्षणात दुसऱ्याला पाठवता येतो. पण बीभत्स ई-मेल्सच्य चक्रव्यूहात अडकले की भल्याभल्यांचा अभिमन्यू होऊ शकतो. अशा क्षणिक आनंदाच्या मृगजळामागे धावणाऱ्या नरोत्तमाच्या आयुष्याचा होणारा धक्कादायक शेवट म्हणजे स्वाती चांदोरकरांची ही कादंबरी. कादंबरीची नायिका अमोलिका वास्तुविद्याविशारद आहे. रुपाने देखणी नसली तरी नाकी-डोळी नीटस असणारी ही आत्मविश्वासू मुलगी, सुसंस्कारित, नीतिमान आहे. या उलट तिचा नवा आणि कादंबरीचा नायक नरोत्तम फडणीस हा सुखवस्तू घरातला, हुशार मात्र अहंकारी आणि ‘ग’ची बाधा झालेला तरुण. कादंबरी या दोन मुख्य पात्रांभोवती फिरते. अमोलिका बांधीलकी पाळणारी तर नरोत्तम विषयासक्त असल्याने अधमेध्ये त्यांच्या संसारात वादळे येत राहतात. मात्र वाट चुकलेला नरोत्तम, त्याला येणारे अश्लील ई-मेल्स इतरांना फॉरवर्ड करत राहतो, ई-मेल फॉरवर्ड करण्याइतकं आयुष्य सोपं असतं, या समजुतीवर जगू लागतो. लग्नानंतर, मुलगा झाल्यावरही त्याची ही सवय सुटत नाही, उलट ती व्यसनात बदलते. असा हा नरोत्तम म्हणजे, ध्येयहीन, शरीरसुखाची चटक लागलेला, त्याचा विश्वात बुडालेला, भरकटलेल्या वाटेवरचा तरुण पिढीचा जणू प्रतिनिधी आहे. या लोकांना ताटात वाढलेले नीट खाण्याचेही भान उरत नाही आणि व्हायचे तेच होते. त्यांची आयुष्य उद्ध्वस्त होतातच मात्र त्यांचे संसारही धुळीला मिळतात, कधी कधी अनेक कोवळ्या कळ्या या विकृतींना बळी पडून भस्म होतात. त्यांना न्याय देण्याचा प्रयत्न कथेची नायिका करते. अवघी २०० पानेही नसलेल्या या पुस्तकात घडणाऱ्या घटना अत्यंत वेगाने घडत जातात अमोलिकाचे व्यावसायिक आयुष्य यशस्वितेचे शिखर गाठत असते, एका हॉस्पिटलचे डिझाइन बनवताना तिने केलेल्या बारकाव्यांचा अभ्यास, उगाचंच नसून त्याचा उपयोग कथेच्या शेवटी लेखिकेने अत्यंत खुबीने केला आहे. कादंबरी अनोळखी वळणे घेत पुढे जाते, शेवट अत्यंत अनपेक्षित, अकल्पित आणि चटका लावणारा आहे. आजच्या काळाचे समर्पक चित्र उभे करण्यासाठी, धकाधकीचे जीवनमान शब्दात पकडण्यासाठी लेखिकेने घेतलेला इंग्रजीचा आधार अपरिहार्य वाटतो. रक्षिता, अमोलिकाची आई, बाई सप्रे, फडणीस दांपत्य यांची पात्रे कथेच्या सूत्रात मोलाची भर घालतात. मात्र उमाकांत सप्रेंची मूल्ये, त्यांची वैचारिक बैठक वाचकांना खिळवून ठेवणारी आहे. उदाहरणादाखल त्यांचे पत्नीला म्हणजे बाई सप्रेंना उद्देशून एक स्वागत आहे. ‘मला नेहमीच एक कोडं पडतं. समजा एक व्यक्ती... तिला तिच्या लहानपणी काही गोष्टी मिळाल्या नाहीत, म्हणजे प्रेम, वात्सल्य, कौतुक वगैरे, अशी व्यक्ती मोठी होते. तिचं लग्न होतं. तिला मूल होतं. तर, त्या मुलाला ती कसं वाढवेल? जे आपल्याला मिळालं नाही, ते ती आपल्या मुलाला देईल? की जे मिळालंच नाही म्हणून द्यायचं कसं हेच तिला समजणार नाही. बाई या दुसऱ्या प्रकारात मोडतात. नायिकेची भावनिक गुंतागुंत, त्यावर अलगद फुंकर घालणारी अकील या तिच्या सहकाऱ्याची निखळ मैत्री स्वाती चांदोरकरांनी सुरेख रेखाटली आहे. कादंबरी नात्यांमधल्या गुंत्याबद्दल भाष्य करेल असे वाटत असताना, एका सामाजिक समस्येकडे आपले लक्ष वेधते. मलपृष्ठावरील पुस्तकाच्या मजकुराचा हळूहळू संदर्भ लागतो. सूडभावनेने पेटलेल्या व्यक्ती गुंड प्रवृत्तीच्या असतात, या गृहीतकाला फोल ठरवणारे वळण वाचकांचे कुतूहल वाढवते. बदल्याची आग सर्वसामान्यांचेही आयुष्य ढवळून काढू शकते, याची खात्री पटते आणि शांत डोक्याने केलेल्या कट-कारस्थानांचा मक्ता हा पुरुषवर्गाचा किंवा सराईत गुन्हेगारांचा, या धारणेला शंभर टक्के हादरे देणारा शेवट कादंबरीचा परमोच्च बिंदू ठरेल असा आहे. म्हणूनच आवर्जून वाचावे असे पुस्तक. ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

आबासाहेब कडू, अमरावती.

एकाच दमात छप्पन वेळा वाचावा असा काव्यसंग्रह* दै.सकाळच्या सप्तरंग पुरवणीत अ-अमिताभचा व दै.हिंदस्थान मधील `अमरावती सिरीज` चे स्तंभलेखक व अमरावती येथील प्रसिद्ध साहित्यिक श्री जी.बी.देशमुख ह्यांचा छप्पन कवितांचा समावेश असलेल्या अमरावतीच्या वस्तू,वास्ू आणि माणसाच्या वैशिष्ट्यावर आधारित `अमरावतीचे छप्पन स्वभाव` हे पुस्तक मी विकत घेतले. घरी गेल्यावर त्यातील छप्पनही कविता एकाच दमात वाचून काढल्या अन् पैसा वसूल झाल्याचे समाधान झाल्यावर त्यावर चिंतन करावेसे वाटले, म्हणून हा लेखनप्रपंच. वाचक हा अमरावतीकर असेल तर `अमरावतीतल्या गमती` ही पहिलीच कविता त्याच्या मनाचा ठाव घेते आणि `याटोत` बसवून परकोटातल्या मुर्गी मठासह अख्खी अमरावती फिरवून आणते. गांधीचौकात गांधी नाही मालटेकडीवर माल नाही.. खेटरे झाली ब्रँडेड सगळी मोची गल्लीत मोची नाही.. तपोवनात तपस्वी नाही कल्याणनगरात कल्याण नाही… लेखकाच्या भारदस्त शब्दशक्तीचा इथेच विजय होतो आणि मग अमरावतीची एकेक वैशिष्ट्ये पादाक्रांत करित छप्पनीकडे वाटचाल करीत जातो. ही काव्यात्मक रुपातील वैशिष्ट्ये वाचतांना अमरावतीचा पन्नाशितला वाचक देहभान विसरुन गतकाळात रममाण होतो. त्याचे मन नकळत सुखावते, गात्रे जागृत होतात, मेंदू रिचार्ज होतो तर तरुण वाचकाच्या मनात अमरावती शहराविषयी कुतुहल निर्माण होते. तोही मग त्यातील खाणाखुणा शोधायचा प्रयत्न करत बसतो. या संग्रहातील प्रत्येक कवितेवर एकेक निबंध तयार होऊ शकतो. स्वभाव हा शब्द सहसा मनुष्याशी जोडून उपयोगात आणला जातो पण इथे तर लेखकाने निर्जीवातही प्राण फुंकले आहे. अमरावतीच्या याटोत बसून ह्यातील सजीवता आपल्याला अनुभवता येईल. मग तो बेनाम चौक असो, कुथे बस स्टॉप असो, अनेक नावांचे कापसाचे जीन असो, वालकट कम्पाउंड असो, हनुमान आखाडा असो, इर्विन, डफरीन दवाखाने असो, `अमरावतीतल्या विहिरी` असो नाहीतर मोर्शी रोडवरील थोर महात्म्यांचे पुतळे असो. अमरावतीच्या शब्दकळा, अमरावतीच्या हाका, अमरावतीच्या वल्ली, अमरावतीच्या टॉमीची पाॅटी, अमरावतीचे सुपरस्टार, अमरावतीचा बागुलबोवा, अमरावतीचे वेडे एकदमच बेस्ट. अमरावतीच्या रेल्वे ब्रीजचे तर ते भरभरुन कौतुक करतात. चारी बाजूनं उतरणारा पूल फक्त जपानमध्ये आहे अन् सिंगापूरच्या नंतर नंबर आपल्याच पुलाचा आहे कारण हा पूल आहेच कौतुक करण्याजोगा, मलाही ह्या पूलाचे कौतुक याच्याकरिता आहे की ह्या पूलाचे बांधकाम माझ्या पेठ मांगरुळी गावच्या अभियंत्याच्याच देखरेखीखाली झाले आहे. अमरावतीशी प्रत्यक्ष संबंध आला तो १९७५ सालापासून,पण काही अपवाद वगळता लेखकाच्या छप्पनीतील अनेक वैशिष्ट्ये मी अनुभवलेली आहेत. ह्याच रेल्वेपुलावर रोज संध्याकाळी एक भोळसट मुलगा गाणे गायचा,लोक त्याला प्रेमाने शाहरुख म्हणायचे,कारण तो स्वतःला शाहरुख खानंच समजत असे. अमरावतीच्या कॉलेजमधील तरुणांचे भावविश्व मांडतांना लेखकाने हात आखडता घेतला नाही. इंजिनिअरिंग कॉलेज व व्ही.एम.व्ही. ही त्यावेळची आघाडीवरची कॉलेजेस होती. त्यामधील कॉलेजियन्सचे दर्द लेखकाने मिश्कीलपणे मांडले त्या `अमरावतीचा दर्द` ह्या कवितेतील ओळी आताच्या पेन्शनरांना त्या काळात घेऊन जातील. तरुण मंडळींनी तो आनंद पुस्तक वाचून घ्यावा. अमरावतीचा आद्य मॉल म्हणजे फक्त महिलांसाठीच राखीव असलेली बाजारपेठ अशी ओळख असलेलं `जोशी मार्केट`, `अमरावतीची नवरात्र`, `अमरावतीचे जेष्ठ नागरिक` ह्या पूरक कविताही त्याच प्रेमाच्या विश्वात घेऊन जातात.. `अमरावतीचा भुलभुलैय्या` मधील अनुभव आजही अनेकांना येतो, मलाही अनेकदा आला, त्याकरिता ही पूर्ण कविताच वाचणे आवश्यक आहे. अमरावतीचा अंबानाला, त्यानुषंगाने मास्तराने दिलेली `पदवी`, अमरावतीचे भोंगे, अमरावतीच्या उन्हाच्या चटक्यातील गरम चहाचे घोट थेट लंडनच्या थंड हवामानातल्या आईस्क्रीमलाही थंड करुन टाकतात ही तुलना मनाला भावून जाते. ब्लॅक अँड व्हाईट फोटोग्राफीतली मजा आताच्या डिजीटल फोटोग्राफीत नाही. त्यावेळी अमरावतीत मोजक्याच असलेल्या फोटो स्टुडिओची नावे लेखकाने दिलेली आहेत.त्यांनीही आता डिजीटल फोटोग्राफीच्या युगात प्रवेश केलेला आहे.त्यावेळेस काढलेले ब्लॅक अँड व्हाईट फोटो अनेकांनी जपून ठेवले असावे. लेखक मणीबाई गुजराती शाळेत शिकत होते त्यामुळे त्या शाळेचे व गुरुजनांचे गुणगान, स्वभाववैशिष्ठ्ये हे पुस्तकात येणे स्वाभाविकच आहे, मास्तराला पाणी पाजता पाजता त्यांचा वर्गमित्र पाणी पुरवठा विभागात कार्यकारी अभियंत्यापर्यंत कसा पोचला हा मनोरंजक किस्सा `अमरावतीची गुरुवाणी` कवितेतून खुसखुशीत भाषेत रेखाटला आहे. अमरावतीच्या टाकीजा, त्यांची वैशिष्ट्ये तर आहेतच पण दर गुरुवारी नवे सिनेमे अमरावतीत सर्वात पहिल्यांदा प्रदर्शित होत होते हे आज अनेकांना सांगूनही पटणार नाही पण तो मान अमरावतीला मिळत होता हा इतिहास आपल्याला अचंबित करुन जातो, सिनेमाचे अनेक डिस्ट्रीब्युटर हे अमरावतीतच होते, जवाहर रोडवरील जुन्या इमारतीवर ते बोर्ड तेव्हा हमखास दिसत, काळाच्या ओघात त्या जागी नवीन ईमारती उभ्या झाल्या, परंतु अजूनही एक-दोन ठिकाणी ते बोर्ड दिसतात.असे अनेक अचंबित करणारे किस्से या पुस्तकात काव्यरुपात लेखकाने अत्यंत खुमासदार व मनोरंजक पद्धतीने रेखाटून त्यात जीवंतपणा आणला आहे. हा काव्यसंग्रहातील ठेवा पुढील पीढीसाठी वारसा ठरेल यात मला तीळमात्रही शंका वाटत नाही. खवैयेगीरीत म्हणाल तर विनायकराव तायडेच्या गड्डा हॉटेलचा आलुबोंडा ज्या अमरावतीकरांनी आणि इतरांनीही खाल्ला असेल त्याला जगातल्या कुठल्याही हॉटेलातील आलुबोंडा आवडत नाही, अन् खाल्लाही असेल तर खातांना त्याला विनायकरावाचे आतिथ्य व तर्रीची आठवण आल्याशिवाय रहात नाही. अमरावती जिल्ह्यातील मंडळी लग्नबस्ता खरेदी करायला आली की खरेदी झाल्यावर वर वधूकडील मंडळीचे फराळपाण्याचे हे आदराचे स्थान होते. कॉलेजमध्ये शिकत असतांना मनीऑर्डर हातात पडली की प्रभात चौकातील `गौ दुग्ध सागर` ही विद्यार्थ्यांची पहिली पसंती असे. `जीडीएस` म्हणून ते फेमस होते. साऊथ इंडियन डिशेश मिळणारे जिल्ह्यातील ते एकमेव ठिकाण होते. राजकमल चौकालगतच्या टी स्टॉलवरच्या बोर्डावर चहाचे नावंच `स्पेशल चहा`, `बादशाही चहा`, `यादगार चहा` अन साब को `एक शिंगल मलाई मारके` असा आपुलकीचा चहा तेव्हा अमरावतीकरांनी यथेच्छ रिचवला. आता ह्या सर्व चहांचा मिळून एकच चहा मिळतो. पण ह्या चहात ती लज्जत नाही. मग तुम्ही त्या स्टॉलला `प्रेमाचा चहा` हे नांव ठेवा किंवा अजून काही. हरेक शहराला एक संस्कृती असते, वस्तू-वास्तू वारसा असतो, त्यातून जगण्यातली नजाकत शोधावी लागते. ती नजाकत `अमरावतीचे छप्पन स्वभाव` ह्या काव्यसंग्रहातून अनुभवावयास मिळते.लेखकाच्या बहारदार लेखणीतून उतरलेले ही काव्यमय वैशिष्ट्ये वाचतांना अमरावती बाहेरील वाचकही मग आपल्या शहरातील वैशिष्ट्ये शोधत बसतो ही हे या पुस्तकाचे वैशिष्ट्य आहे. तसेही छप्पन ह्या शब्दाला फार महत्व आहे, `छप्पन इंची छाती`, `अब तक छप्पन` हा सिनेमा, छप्पन भोग, छप्पन छुरी अन् पिव्वर वऱ्हाडातली वर्ल्ड फेमस धमकी म्हणजे `तुह्यासारखे त म्या सतराशे छप्पन पाह्यले बे, तुह्याकुन जे हुईन थे करुन घे.` छप्पन ह्या शब्दाचा पूरेपूर करुन घेतलेला वापर म्हणजे जी.बी.देशमुख सारख्या दिलखुश लेखकाने लिहिलेले हे खुमासदार,रसभरीत,टवटवीत प्रफुल्लित अन मिश्कील काव्य. आणि शेवटी……….. मणुश्याचे हे शरीर अणित्य आहे आतमा-णित्य आहे हा श्रद्धांजलीपर आवाज ज्याने हिंदू स्मशानभूमीत ऐकला नसेल त्याने ह्या जन्मात तरी तो ऐकेपर्यंत मरु नये. हे शब्द ऐकूनही त्याकडे कानाडोळा केला असेल तो माणूस करंटा पण हे करंटेपण लेखकाने घेतले नाही. लहानपणापासून अमरावतीत वावरतांना `डफरीन` (लँडीग पोर्ट) ते ही `वरची जागा` ह्यातील अत्यंत बारकाईने केलेले निरिक्षण लाजबाबच म्हणावे लागेल,त्याला तोड नाही. हे पुस्तक वाचतांना प्रत्यक्ष यमराज जरी द्वारी आला तरी त्याला "हे पुस्तक वाचेपावतर जराकसा थांबतं काय रे बॉ." अशी म्हणण्याची हिम्मत वाचकात येते हे मात्र नक्की. अमरावतीच्या वस्तू,वास्तू आणि माणसांच्या वैशिष्ट्यावर आधारित आपल्या बालमित्रांना समर्पित केलेला व मेहता पब्लिशिंग हाऊस ह्यानी प्रकाशित केलेला हा अमूल्य ठेवा आपणा सर्वांना नक्कीच आवडेल ह्याची खात्री आहे. ...Read more

बाबाराव घोरमाडे, अमरावती

प्रथम दर्शनी कविता लेखन असले तरी गद्य आणि पद्य सोबत सोबत चालल्यासारख्या लेखन शैलीचा भास जाणवतो. अमरावती शहरातील 70..80 व नंतरच्या दशकातील गुणवैशिष्ट्ये मार्मिक नर्म विनोदी शैलीत सुंदर रीतीने विषद केली आहेत. लेखकाची सुक्ष्म निरीक्षण शैली काव्य चना स्वरूपात पुस्तक रूपाने सादर करण्यात लेखक यशस्वी झाले आहेत. इजाफा,रूतबा, हिरव्या देठाचे,कैलहीचा मौहोल, ढगांचा,इत्यादी जुने वऱ्हाडी शब्द वापरल्यामुळे जुन्या आठवणींना उजाळा मिळाला. लेखकाने अमरावती शहरातील जुन्या जाणत्या, गुणवान, असामान्य अशा व्यक्तींची दखल घेतली......पण काहींची दखल राहून गेली आहे असे माझे मत आहे. उदा. सुरेश भट, मधुकर केचे व त्यांची सायकल , अमरावतीचे दहा दिवसांची गणपती उत्सव सजावट..... प्रत्येकाने वाचावे असे हे पुस्तक, विनोदी पण शेवटी असलेली कारूण्याची किनार अंतर्मुख करुन जाते. ...Read more