* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: FORWARD AND DELETE
  • Availability : Available
  • ISBN : 9788184985344
  • Edition : 2
  • Publishing Year : FEBRUARY 2014
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 168
  • Language : MARATHI
  • Category : FICTION
  • Available in Combos :SWATI CHANDORKAR COMBO SET - 16 BOOKS
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
AMOLIKA FORWARDS A COMPUTER GAME ‘DATE OF DEATH’ TO NAROTTAM. THE GAME GIVES THE DATE OF DEATH AFTER SOME BASIC DATA IS FED IN. NAROTTAM TRIES THE GAME AFTER FILLING IN DATA OF HIS FRIEND, KUMAR. KUMAR’S DEATH SHATTERS NAROTTAM WHO TAKES ILL MENTALLY. HE DOES NOT RESPOND TO ANY MEDICAL TREATMENT. LATER AS AMOLIKA HAS A CONVERSATION WITH HIM SHE LEARNS THAT HE HAD SEXUALLY ABUSED A SIX YEAR OLD CHILD. DETERMINED TO PUNISH HIM FOR HIS HIDEOUS CRIME, AMOLIKA DESIGNS THE GAME HERSELF AND FORWARDS IT TO HIM. AWARE OF HIS OBSESSION TOWARDS COMPUTER GAMES AND MAILS SHE IS SURE THAT HER GAME WILL SUCCEED: NARROTAM WILL MEET HIS END. SHE SIMPLY WALKS AWAY FROM NAROTTAM; NEVER INTENDING TO RETURN.
‘बदला घेण्यासाठी रक्तलांच्छितच घटना घडायला हव्यात असं कोण म्हणतं? आणि जर तसं म्हणत असतील, तर ते चूक, अयोग्य. शांत मनाने आणि अक्कलहुशारीनेही बदला घेता येतो. आणि मग तो गुन्हा ठरत नाही. ठरवता येत नाही. गुन्हेगार सापडतच नाही.’ अमोलिका मनातल्या मनात असाच काहीसा विचार करत होती,
प्रसादबन पुरस्कार, नांदेड २०१४.
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
Customer Reviews
  • Rating StarShucheta Khadilkar

    Khup chan pustak ahe jarur vacha

  • Rating StarLOKPRABHA - 22-08-2014

    अनपेक्षित शेवटाची कहाणी... सध्याच्या इंटरनेटच्या जमान्यात ‘साइन इन-युवर नेम - पासवर्ड - मेल - ओपन - क्लिक - क्लिक - फॉरवर्ड - सेंट’ या सगळ्या स्टेप्स काही सेकंदात करता येतात, आणि एखादा आवडलेला ई-मेल क्षणात दुसऱ्याला पाठवता येतो. पण बीभत्स ई-मेल्सच्य चक्रव्यूहात अडकले की भल्याभल्यांचा अभिमन्यू होऊ शकतो. अशा क्षणिक आनंदाच्या मृगजळामागे धावणाऱ्या नरोत्तमाच्या आयुष्याचा होणारा धक्कादायक शेवट म्हणजे स्वाती चांदोरकरांची ही कादंबरी. कादंबरीची नायिका अमोलिका वास्तुविद्याविशारद आहे. रुपाने देखणी नसली तरी नाकी-डोळी नीटस असणारी ही आत्मविश्वासू मुलगी, सुसंस्कारित, नीतिमान आहे. या उलट तिचा नवा आणि कादंबरीचा नायक नरोत्तम फडणीस हा सुखवस्तू घरातला, हुशार मात्र अहंकारी आणि ‘ग’ची बाधा झालेला तरुण. कादंबरी या दोन मुख्य पात्रांभोवती फिरते. अमोलिका बांधीलकी पाळणारी तर नरोत्तम विषयासक्त असल्याने अधमेध्ये त्यांच्या संसारात वादळे येत राहतात. मात्र वाट चुकलेला नरोत्तम, त्याला येणारे अश्लील ई-मेल्स इतरांना फॉरवर्ड करत राहतो, ई-मेल फॉरवर्ड करण्याइतकं आयुष्य सोपं असतं, या समजुतीवर जगू लागतो. लग्नानंतर, मुलगा झाल्यावरही त्याची ही सवय सुटत नाही, उलट ती व्यसनात बदलते. असा हा नरोत्तम म्हणजे, ध्येयहीन, शरीरसुखाची चटक लागलेला, त्याचा विश्वात बुडालेला, भरकटलेल्या वाटेवरचा तरुण पिढीचा जणू प्रतिनिधी आहे. या लोकांना ताटात वाढलेले नीट खाण्याचेही भान उरत नाही आणि व्हायचे तेच होते. त्यांची आयुष्य उद्ध्वस्त होतातच मात्र त्यांचे संसारही धुळीला मिळतात, कधी कधी अनेक कोवळ्या कळ्या या विकृतींना बळी पडून भस्म होतात. त्यांना न्याय देण्याचा प्रयत्न कथेची नायिका करते. अवघी २०० पानेही नसलेल्या या पुस्तकात घडणाऱ्या घटना अत्यंत वेगाने घडत जातात अमोलिकाचे व्यावसायिक आयुष्य यशस्वितेचे शिखर गाठत असते, एका हॉस्पिटलचे डिझाइन बनवताना तिने केलेल्या बारकाव्यांचा अभ्यास, उगाचंच नसून त्याचा उपयोग कथेच्या शेवटी लेखिकेने अत्यंत खुबीने केला आहे. कादंबरी अनोळखी वळणे घेत पुढे जाते, शेवट अत्यंत अनपेक्षित, अकल्पित आणि चटका लावणारा आहे. आजच्या काळाचे समर्पक चित्र उभे करण्यासाठी, धकाधकीचे जीवनमान शब्दात पकडण्यासाठी लेखिकेने घेतलेला इंग्रजीचा आधार अपरिहार्य वाटतो. रक्षिता, अमोलिकाची आई, बाई सप्रे, फडणीस दांपत्य यांची पात्रे कथेच्या सूत्रात मोलाची भर घालतात. मात्र उमाकांत सप्रेंची मूल्ये, त्यांची वैचारिक बैठक वाचकांना खिळवून ठेवणारी आहे. उदाहरणादाखल त्यांचे पत्नीला म्हणजे बाई सप्रेंना उद्देशून एक स्वागत आहे. ‘मला नेहमीच एक कोडं पडतं. समजा एक व्यक्ती... तिला तिच्या लहानपणी काही गोष्टी मिळाल्या नाहीत, म्हणजे प्रेम, वात्सल्य, कौतुक वगैरे, अशी व्यक्ती मोठी होते. तिचं लग्न होतं. तिला मूल होतं. तर, त्या मुलाला ती कसं वाढवेल? जे आपल्याला मिळालं नाही, ते ती आपल्या मुलाला देईल? की जे मिळालंच नाही म्हणून द्यायचं कसं हेच तिला समजणार नाही. बाई या दुसऱ्या प्रकारात मोडतात. नायिकेची भावनिक गुंतागुंत, त्यावर अलगद फुंकर घालणारी अकील या तिच्या सहकाऱ्याची निखळ मैत्री स्वाती चांदोरकरांनी सुरेख रेखाटली आहे. कादंबरी नात्यांमधल्या गुंत्याबद्दल भाष्य करेल असे वाटत असताना, एका सामाजिक समस्येकडे आपले लक्ष वेधते. मलपृष्ठावरील पुस्तकाच्या मजकुराचा हळूहळू संदर्भ लागतो. सूडभावनेने पेटलेल्या व्यक्ती गुंड प्रवृत्तीच्या असतात, या गृहीतकाला फोल ठरवणारे वळण वाचकांचे कुतूहल वाढवते. बदल्याची आग सर्वसामान्यांचेही आयुष्य ढवळून काढू शकते, याची खात्री पटते आणि शांत डोक्याने केलेल्या कट-कारस्थानांचा मक्ता हा पुरुषवर्गाचा किंवा सराईत गुन्हेगारांचा, या धारणेला शंभर टक्के हादरे देणारा शेवट कादंबरीचा परमोच्च बिंदू ठरेल असा आहे. म्हणूनच आवर्जून वाचावे असे पुस्तक. ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

SARTH
SARTH by DR. S. L. BHYRAPPA Rating Star
हेमंत सांबरे

गेल्या तीन दिवसांत ही कादंबरी वाचून पूर्ण झाली .. ही कादंबरी वाचून होताच मन अगदी सुन्न होऊन गेले आहे . त्याचबरोबर अनेक संमिश्र भावना मनात दाटून आल्या आहेत . #आवरण ही जगप्रसिद्ध कादंबरी वाचल्यानंतर भैरप्पा यांच्या बद्दल मनात खूप आदरभाव निर्माण झाला होा . त्यानंतर त्यांचे हे दुसरे पुस्तक म्हणजे #सार्थ आज वाचून पूर्ण केले. या कादंबरीची कथा सातव्या शतकात घडत असते . *नागभट्ट* हा कादंबरीचा नायक आहे . हा नागभट्ट तुमच्या माझ्या सारखा एक सर्वसामान्य मनुष्य आहे . भैरप्पा यांनी त्याच्या नजरेतून त्या काळात घडत असलेल्या अनेक घटनांचा सूक्ष्म आढावा आपल्या समोर अतिशय समर्थपणे मांडला आहे . हे सातवे शतक म्हणजे असे होते की वैदिक धर्माचा प्रभाव जरी जनमानसात असला तरी , बौद्ध धर्माने ही आपली पाळेमुळे पूर्ण निदान उत्तर भारत , पूर्व भारत या भागात पसरवली होती . एक सामान्य मनुष्य म्हणून नागभट्टच्या मनात सुरू असलेली विविध द्वंद , त्याची वैदिक धर्म की बौद्ध धर्म याविषयी झालेली द्विधा मनस्थिती ही लेखकाने अचूक टिपली आहे . अनेक चर्चांमधून बौद्ध तत्त्वज्ञान , वैदिक तत्त्वज्ञान यांची ओळख अतिशय सोप्या भाषेत लेखक आपल्याला करून देतात , ते वाचताना आपल्या चित्ताला एक वेगळेच समाधान मिळत राहते .. या सर्व तत्त्वज्ञानाची प्रदीर्घ चर्चा , नायकाला येत असलेले वेगवेगळे अनुभव यातून आपणही समृध्द होत जातो . मधल्या काळात नायक मथुरेला येऊन राहतो . तेव्हा तिथल्या एका नाटक मंडळींबरोबर ओळख होऊन नायकाला त्यांच्या एका नाटकात प्रत्यक्ष *कृष्णाची* भूमिका करायला मिळते . तेव्हा त्याचे नाव *कृष्णानंद* असे होते . या भूमिकेमुळे नायकाला त्या भागात प्रचंड प्रसिध्दी मिळते . या नाटकातील असलेली त्याची नायिका चंद्रिका या सुंदर स्त्री बरोबर त्याचा विशेष स्नेह होऊन त्यांचे प्रेम ही जुळते . एखादी गोष्टीचा प्रचंड अभ्यास करून त्याला मांडणे यात भैरप्पा यांचा हात कदाचित फार कमी लेखक धरू शकतील . ही कादंबरी वाचतानाही प्रत्यही जाणवत राहते . याच काळात आद्य शंकराचार्य व मंडणमिश्र यांच्यातील झालेल्या जगप्रसिद्ध वादावर दोन ते तीन प्रकरणे या पुस्तकात आली आहे . या दोन दिग्गज वैदिक ऋषी बद्दल मी इतर अनेक ठिकाणी खूप ओझरते उल्लेख ऐकले होते , पण या कादंबरीत विस्तृत माहिती मिळाली , व एक वेगळेच समाधान मिळाले . कादंबरीचा शेवट आपल्याला पुस्तकातील आधीच्या अनेक कथावस्तू पासून एका वेगळ्याच दुनियेत घेऊन जातो .. याच सातव्या शतकात वायव्येकडून अरब लोकांची आक्रमणे सुरू झाली होती . तोपर्यंत भारतवर्षात लढली जाणारी युद्ध फक्त रणांगणावर लढली जात , त्याचा सामान्य जनतेला कुठलाही त्रास होत नसे . पण अरबांनी केलेल्या आक्रमण मुळे भारताचा सांस्कृतिक ढाचा कसा उद्ध्वस्त होऊ लागला याचे अचूक व सत्य वर्णन भैरप्पा यांनी केले आहे . ते वाचताना तेव्हाही हिंदूंची सद्गुण विकृती ( अनावश्यक असलेली अती सहिष्णुता ) कशा प्रकारे हिंदूंचा नाश करते हे ही त्यांनी सांगितले आहे . ती सर्व शेवटची प्रकरणे आपण सर्व हिंदूंनी मुळातच वाचण्यासारखी व अभ्यास करण्यासारखी आहे . एका प्रसंगात जेव्हा काही राजे एकत्र येऊन अरबांवर आक्रमण करण्याचे योजतात , तेव्हा धूर्त अरब त्या गावातील सूर्यमंदीर भ्रष्ट करायची धमकी देऊन त्या गावातील लोकांना युद्ध करण्यापासून व बाहेरून आलेल्या सैनिकांना सहाय्य न करण्याचे वचन घेतात . त्यामुळे जे नको तेच होते , व हळूहळू तो प्रदेश अरबांच्या ताब्यात जाऊन तेथला बौद्ध , वैदिक हिंदू धर्म नष्ट होऊ लागतो , याचे विदारक वर्णन आपल्यासमोर येते . हे वाचताना मला १७५१ साली नानासाहेब पेशव्यांनी काशी वर आक्रमण करून ते क्षेत्र मुक्त करण्याच्या प्रसंगाची आठवण झाली . तेव्हाही काशी मधील जनतेने नानासाहेब पेशव्यांना रोखले होते , नाहीतर तेव्हाचा ज्ञानवापी मंदीर मुक्त झाले असते ... तेव्हाही हिंदूंची सद्गुण विकृती आड आली जशी ती सातव्या शतकात ही आड आली होती .. असो --- अनेक अद्भुत प्रसंगातून आपल्याला ही कादंबरी घेऊन जात राहते ..सातव्या शतकातील भारताचे वर्णन वाचून आपण त्यावेळच्या राजांची वृत्ती , जनतेचा स्वभाव , साधू तसेच बौद्ध भिक्खू यांचे स्वभाव, त्यांचे विचार आपल्याला कळत जातात . लेखक आपल्याला नालंदा विद्यापीठ देखील दाखवून आणतो . त्याकाळात तेथील अध्ययन कसे चालत असे , हेदेखील आपल्याला वाचायला मिळते . पुस्तकाला कादंबरीची मोकळीक असली तरी आपल्याला ऐतिहासिक दृष्टिकोन ही मिळतो , हे नक्की ! ही कादंबरी वाचून होताच, भैरप्पा यांच्या इतर सर्व कादंबऱ्या व पुस्तके वाचण्याची उत्सुकता निर्माण झाली आहे , व ती इच्छा ही लवकरच पूर्ण होईल ही आशा! ...Read more