* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: FORWARD AND DELETE
  • Availability : Available
  • ISBN : 9788184985344
  • Edition : 2
  • Publishing Year : FEBRUARY 2014
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 168
  • Language : MARATHI
  • Category : FICTION
  • Available in Combos :SWATI CHANDORKAR COMBO SET - 18 BOOKS
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
AMOLIKA FORWARDS A COMPUTER GAME ‘DATE OF DEATH’ TO NAROTTAM. THE GAME GIVES THE DATE OF DEATH AFTER SOME BASIC DATA IS FED IN. NAROTTAM TRIES THE GAME AFTER FILLING IN DATA OF HIS FRIEND, KUMAR. KUMAR’S DEATH SHATTERS NAROTTAM WHO TAKES ILL MENTALLY. HE DOES NOT RESPOND TO ANY MEDICAL TREATMENT. LATER AS AMOLIKA HAS A CONVERSATION WITH HIM SHE LEARNS THAT HE HAD SEXUALLY ABUSED A SIX YEAR OLD CHILD. DETERMINED TO PUNISH HIM FOR HIS HIDEOUS CRIME, AMOLIKA DESIGNS THE GAME HERSELF AND FORWARDS IT TO HIM. AWARE OF HIS OBSESSION TOWARDS COMPUTER GAMES AND MAILS SHE IS SURE THAT HER GAME WILL SUCCEED: NARROTAM WILL MEET HIS END. SHE SIMPLY WALKS AWAY FROM NAROTTAM; NEVER INTENDING TO RETURN.
‘बदला घेण्यासाठी रक्तलांच्छितच घटना घडायला हव्यात असं कोण म्हणतं? आणि जर तसं म्हणत असतील, तर ते चूक, अयोग्य. शांत मनाने आणि अक्कलहुशारीनेही बदला घेता येतो. आणि मग तो गुन्हा ठरत नाही. ठरवता येत नाही. गुन्हेगार सापडतच नाही.’ अमोलिका मनातल्या मनात असाच काहीसा विचार करत होती,
प्रसादबन पुरस्कार, नांदेड २०१४.
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
Customer Reviews
  • Rating StarShucheta Khadilkar

    Khup chan pustak ahe jarur vacha

  • Rating StarLOKPRABHA - 22-08-2014

    अनपेक्षित शेवटाची कहाणी... सध्याच्या इंटरनेटच्या जमान्यात ‘साइन इन-युवर नेम - पासवर्ड - मेल - ओपन - क्लिक - क्लिक - फॉरवर्ड - सेंट’ या सगळ्या स्टेप्स काही सेकंदात करता येतात, आणि एखादा आवडलेला ई-मेल क्षणात दुसऱ्याला पाठवता येतो. पण बीभत्स ई-मेल्सच्य चक्रव्यूहात अडकले की भल्याभल्यांचा अभिमन्यू होऊ शकतो. अशा क्षणिक आनंदाच्या मृगजळामागे धावणाऱ्या नरोत्तमाच्या आयुष्याचा होणारा धक्कादायक शेवट म्हणजे स्वाती चांदोरकरांची ही कादंबरी. कादंबरीची नायिका अमोलिका वास्तुविद्याविशारद आहे. रुपाने देखणी नसली तरी नाकी-डोळी नीटस असणारी ही आत्मविश्वासू मुलगी, सुसंस्कारित, नीतिमान आहे. या उलट तिचा नवा आणि कादंबरीचा नायक नरोत्तम फडणीस हा सुखवस्तू घरातला, हुशार मात्र अहंकारी आणि ‘ग’ची बाधा झालेला तरुण. कादंबरी या दोन मुख्य पात्रांभोवती फिरते. अमोलिका बांधीलकी पाळणारी तर नरोत्तम विषयासक्त असल्याने अधमेध्ये त्यांच्या संसारात वादळे येत राहतात. मात्र वाट चुकलेला नरोत्तम, त्याला येणारे अश्लील ई-मेल्स इतरांना फॉरवर्ड करत राहतो, ई-मेल फॉरवर्ड करण्याइतकं आयुष्य सोपं असतं, या समजुतीवर जगू लागतो. लग्नानंतर, मुलगा झाल्यावरही त्याची ही सवय सुटत नाही, उलट ती व्यसनात बदलते. असा हा नरोत्तम म्हणजे, ध्येयहीन, शरीरसुखाची चटक लागलेला, त्याचा विश्वात बुडालेला, भरकटलेल्या वाटेवरचा तरुण पिढीचा जणू प्रतिनिधी आहे. या लोकांना ताटात वाढलेले नीट खाण्याचेही भान उरत नाही आणि व्हायचे तेच होते. त्यांची आयुष्य उद्ध्वस्त होतातच मात्र त्यांचे संसारही धुळीला मिळतात, कधी कधी अनेक कोवळ्या कळ्या या विकृतींना बळी पडून भस्म होतात. त्यांना न्याय देण्याचा प्रयत्न कथेची नायिका करते. अवघी २०० पानेही नसलेल्या या पुस्तकात घडणाऱ्या घटना अत्यंत वेगाने घडत जातात अमोलिकाचे व्यावसायिक आयुष्य यशस्वितेचे शिखर गाठत असते, एका हॉस्पिटलचे डिझाइन बनवताना तिने केलेल्या बारकाव्यांचा अभ्यास, उगाचंच नसून त्याचा उपयोग कथेच्या शेवटी लेखिकेने अत्यंत खुबीने केला आहे. कादंबरी अनोळखी वळणे घेत पुढे जाते, शेवट अत्यंत अनपेक्षित, अकल्पित आणि चटका लावणारा आहे. आजच्या काळाचे समर्पक चित्र उभे करण्यासाठी, धकाधकीचे जीवनमान शब्दात पकडण्यासाठी लेखिकेने घेतलेला इंग्रजीचा आधार अपरिहार्य वाटतो. रक्षिता, अमोलिकाची आई, बाई सप्रे, फडणीस दांपत्य यांची पात्रे कथेच्या सूत्रात मोलाची भर घालतात. मात्र उमाकांत सप्रेंची मूल्ये, त्यांची वैचारिक बैठक वाचकांना खिळवून ठेवणारी आहे. उदाहरणादाखल त्यांचे पत्नीला म्हणजे बाई सप्रेंना उद्देशून एक स्वागत आहे. ‘मला नेहमीच एक कोडं पडतं. समजा एक व्यक्ती... तिला तिच्या लहानपणी काही गोष्टी मिळाल्या नाहीत, म्हणजे प्रेम, वात्सल्य, कौतुक वगैरे, अशी व्यक्ती मोठी होते. तिचं लग्न होतं. तिला मूल होतं. तर, त्या मुलाला ती कसं वाढवेल? जे आपल्याला मिळालं नाही, ते ती आपल्या मुलाला देईल? की जे मिळालंच नाही म्हणून द्यायचं कसं हेच तिला समजणार नाही. बाई या दुसऱ्या प्रकारात मोडतात. नायिकेची भावनिक गुंतागुंत, त्यावर अलगद फुंकर घालणारी अकील या तिच्या सहकाऱ्याची निखळ मैत्री स्वाती चांदोरकरांनी सुरेख रेखाटली आहे. कादंबरी नात्यांमधल्या गुंत्याबद्दल भाष्य करेल असे वाटत असताना, एका सामाजिक समस्येकडे आपले लक्ष वेधते. मलपृष्ठावरील पुस्तकाच्या मजकुराचा हळूहळू संदर्भ लागतो. सूडभावनेने पेटलेल्या व्यक्ती गुंड प्रवृत्तीच्या असतात, या गृहीतकाला फोल ठरवणारे वळण वाचकांचे कुतूहल वाढवते. बदल्याची आग सर्वसामान्यांचेही आयुष्य ढवळून काढू शकते, याची खात्री पटते आणि शांत डोक्याने केलेल्या कट-कारस्थानांचा मक्ता हा पुरुषवर्गाचा किंवा सराईत गुन्हेगारांचा, या धारणेला शंभर टक्के हादरे देणारा शेवट कादंबरीचा परमोच्च बिंदू ठरेल असा आहे. म्हणूनच आवर्जून वाचावे असे पुस्तक. ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

MAHARUDRA
MAHARUDRA by G.B. DESHMUKH Rating Star
डॉ. जयंत वडतकर.अमरावती

मेळघाटचा एन्सायक्लोपिडीया असलेले निवृत्त वनाधिकारी श्री. रविंद्र वानखडे यांच्या अनुभवांवर आधारित कुलामामाच्या देशात हे पुस्तक वाचले तेव्हापासून या पुस्तकाचे लेखक श्री. जी. बी. देशमुख यांना भेटण्याची इच्छा होती. इच्छाशक्ती असली की योग जुळून येतो असं महणतात. रविंद्र वानखडे सरांच्या माध्यमातूनच तो योग जुळून आला. माझ्या एक पुस्तकाचे प्रकाशन बाबत वानखडे सरांशी चर्चा करीत असताना त्यांनी लेखकाचा संदर्भ दिला व जी.बी. ना भेटून घ्या असे सांगितले. भेट घडून आली. अगदी सहज, घरगुती भेट झाली, गप्पा रंगल्या. यावेळी जी. बी. देशमुख यांनी त्यांचे पहिले पुस्तक महारुद्र मला भेट दिले. आमच्या चर्चेतून आणि आंतरराष्ट्रीय फुटबॉल मथला मराठमोळा झंझावात महारुद्र, हे या पुस्तकाचे शीर्षक वाचून पुस्तकाचा विषय थोडक्यात समजला. लेखकाचे वडील भीमराव देशमुख यांनी फुटबॉलपटू म्हणून गाजविलेल्या कारकीदींचा आढावा या पुस्तकात होता. एका मुलाने आपल्या वडिलांवर लिहिलेले पुस्तक कसे असेल? असा प्रश्न अन पुस्तक, दोन्ही घेऊन घरी आलो. भेट मिळालेले पुस्तक वेळ मिळाला तसे एका बैठकीत वाचून काढले. आता गल्ली गल्लीत जसं क्रिकेट खेळल्या व बघितले जाते तसं स्वातंत्र्य पुर्व काळात वऱ्हाडात फुटबॉल खेळला जात असे. गावागावांत टीम असायच्या, सामने अर्थात स्पर्धा भरवल्या जात असत. स्वातंत्र्यपूर्व काळात अशाच रुपयांमधून चमकत, वऱ्हाडाच्या ग्रामीण भागातील एका खेळाडूने थेट मुंबईतील फुटबॉल क्लब व आंतरराष्ट्रीय स्पर्धेत मुसंडी मारत आपल्या खेळाचा व व्यक्तीमत्त्वाचा ठसा उमटविला होता. तो काळ होता १९३० ते १९५० चा. त्या वल्लीचे नाव होतं भिमराव देशमुख. जी. बी. देशमुख यांनी त्यांच्या वडिलांवर लिहिलेले महारुद्र पुस्तक काही फक्त भिमराव देशमुख यांची जीवन चरित्र नाही. स्वातंत्र्य मिळण्याच्या साधारण वीस वर्षा पुर्वी ३० ते ५० च्या दशकात आपल्या देशातील खेळाची स्थिती कशी होती. विशेषतः वऱ्हाडाच्या ग्रामीण भागातील स्थिती कशी होती. कुठले खेळ खेळले जात असत. स्पर्धा कशा भरवल्या जात असत. शाळा आणि शिक्षण कसं होतं. आर्थिक स्थिती कशी होती. अमरावती जिल्ह्यातील कोणत्या गावात फुटबॉलच्या नावाजलेल्या टीम होत्या. अमरावती कशी होती याची माहिती सुद्धा या पुस्तकातून वाचायला मिळते. पुस्तकाच्या पहिल्याच प्रकरणात भीमराव यांचे व्यक्तिमत्व कसं होतं हे सांगण्यासाठी लेखकाने बाबा म्हणून जरी त्यांची ओळख करून दिली असली तरी पुढील सर्व प्रकरणातून त्यांनी भीमराव अशा एकेरी उल्लेखातून हे व्यक्तिमत्व साकारले आहे. वऱ्हाडातल्या आपल्या सवयीनुसार प्रसिद्धी पासून दूर राहिलेल्या एका नामवंत फुटबॉलपटूची कारकीर्द व फुटबॉल पश्चात कौटुंबिक कारकीर्द तटस्तपणे मांडण्यात लेखक यशस्वी झाले आहेत हे आधीच सांगून टाकतो. अमरावती जिल्ह्यातील खारतळेगाव येथील फुटबॉलच्या टीम मध्ये भीमराव देशमुख यांची कारकीर्द सुरु झाली. ती १९३० सालापासून त्यावेळी ते जेमतेम विशीत होते. प्रथम शालेय स्पर्धापासून पुढे क्लब स्पर्धा पासून भीमरावने आपल्या खेळाचा ठसा उमटविला हळूहळू ख्याती विदर्भांत पोहोचली, भीमराव यांचा खेळ बघण्यासाठी लोक खास वेळ काढून येऊ लागेल, १९३८-३९ मध्ये विदर्भात झालेल्या काही स्पर्धात मुबंईच्या काही टीम सहभागी झाल्या होत्या, त्यामुळे नावाजलेल्या ब्रिटीश खेळाडूंसोबत खेळण्याची संधी मिळाली. मुंबईच्या इंग्रजांच्या टीमला वऱ्हाडातील भीमराव यांच्या टीमने हरविले. वायएमसिए, मुंबईच्या अलेक्झांडर नावाच्या कप्तानाने भीमरावच्या खेळाने प्रभावित होऊन खारतळेगावच्या चार खेळाडूंना मुंबईच्या टीम कडून खेळण्याचे निमंत्रण दिले. १९४० ला भीमराव सह चार खेळाडू मुंबईत पोहोचले. अलेक्झांडरने त्यांना सराव शिबिरीत घातले. पुढील वर्षात भीमराव वायएमसिए टीम कडून खेळण्यासाठी करारबद्ध झाले. जशा आयपीएल मध्ये आज वेगवेगळ्या टीम खेळतात तसे त्यावेळी मुंबईत फुटबॉलचे क्लब होते. पुढील १० वर्षे अनेक टीम कडून खेळत अनेक स्पर्धा गाजविल्या. भीमराव यांचेवर तेव्हाच्या इंग्रजी वृत्तपत्रांतून रकाने छापले जाऊ लागले. मुंबईतील आपल्या १२ वर्षाच्या कार्यकाळात क्लब स्पर्धामधून त्यांनी ४०० सामने खेळले, तब्बल २५० गोल मारलेत. भीमराव वेगवेगळ्या स्पर्धामधून खेळत मैदान गाजवत होते. त्यातूनच १९४८ च्या ऑलम्पिक स्पर्धेच्या टीम मध्ये निवड झाली मात्र एका सराव सामन्यात पाय फॅक्चर झाल्याने देशाकडून खेळण्याची संधी हुकली. पुढील वर्षात भीमराव हे भारतीय टीम सोबत मलेशिया, कंबोडिया, इंडोनेशिया, म्यानमार, फिलिपिन्स, हाँगकाँग, थायलंड अशा देशात खेळले, या दौऱ्यातील २० पैकी १९ सामने जिंकले. भीमराव आंतरराष्ट्रीय फुटबॉलपटू झाले होते. इतके खेळून भीमराव यांचेकडे आर्थिक नियोजन नसल्याने परिस्थिती जेमतेमच होती. अशातच १९५१ साली त्यांनी निवृत्ती घेतली. अमरावती मध्ये परत आल्यावर त्यांनी आपला संसार थाटला, आर्थिक पाठबळ नसल्याने फुटकळ व्यवसाय केले. मात्र मी कधीकाळी आंतरराष्ट्रीय खेळाडू होते याचा कधी उल्लेख सुद्धा केला नाही, प्रसिद्धी पासून ते कायमच दूर राहिले. या काळात भीमराव यांच्या पत्नी अंजीरा यांनी जबाबदारीनं संसार सांभाळला. मुलांना मोठे केले. भीमराव शेवटपर्यंत मेहनत करीत राहिले. समाजात चांगले स्थान निर्माण केले. मात्र ते इतके मोठे फुटबॉलपटू होते ते अमरावतीकरांना काही माहिती झाले नाही. भीमराव यांच्या निधनानंतर या आंतरराष्ट्रीय फुटबॉलपटूचे कार्य पुढील पिढीला माहित व्हावे या उद्देशाने जी. बी. देशमुख यांनी या पुस्तकातून आपल्या तीर्थरुपांचे भावचित्र अगदी सोप्या सरळ भाषेत शब्दबद्ध करून महारुद्र च्या रूपाने वाचकांसमोर ठेवले. या लिखाणासाठी त्यांनी मुंबईत जाऊन त्या काळातील टाईम्स वृत्तपत्रांतील भीमराव यांचा उल्लेख असलेली कात्रणे मिळविली, त्यांच्या समवेत खेळलेल्या खेळाडूंना व पत्रकारांना भेटले, अमरावती मधील त्यांच्या समवयस्क परिचितांकडून त्यांची माहिती गोळा केली. त्यासाठी त्यांनी अथक अशी मेहनत घेतली. व २००५ साली हे पुस्तक प्रकाशित झाले. या पुस्तकाच्या पुढील आवृत्ती मेहता प्रकाशन पुणे यांनी प्रकाशित केल्याने ते पुस्तक महाराष्ट्रभर पोहोचले. या निमित्त्याने भीमराव यांचे कार्य, त्यांचा फुटबॉल खेळातील झंझावात मराठी माणसाला माहिती झाला. अमरावतीकर या नात्याने मला तर आपल्या मातीतील माणूस त्या काळात आंतरराष्ट्रीय पातळीवर झेंडा गाडून आल्याचा अभिमान वाटला. अशा अनेक अर्थाने महारुद्र महत्वाचे आहे. ...Read more

HATUMUTUCHA CHANDRA
HATUMUTUCHA CHANDRA by FARUK KAZI Rating Star
सलिल तांबे

ज्यांना गोष्टींची आवड आहे अशा मुलांसाठी ही मेजवानी आहेच, पण आपल्या पाल्यांमध्ये संवेदनशीलता आणि निसर्गाप्रती आदर जोपासण्यासाठी मोठ्यांनीही हे पुस्तक वाचायला हवे. प्रदूषणाविरुद्ध लहान हातांनी दिलेला लढा असो किंवा निसर्गाचा खरा आनंद पिशवीत भरून आणण्यापक्षा मनात कसा साठवावा, हे सांगणारा दृष्टिकोन असो; हे पुस्तक प्रत्येक वाचकाला समृद्ध करते. पुस्तकातील प्रत्येक कथा संपताना आपल्याला जगण्याकडे बघण्याची एक नवी दृष्टी देऊन जाते. यातलं काही गूढ, काही थरार आणि खूप सारे हळवे प्रसंग अनुभवण्यासाठी तुम्हाला हे पुस्तक स्वतः वाचायलाच हवं. म्हणूनच, आपल्या संग्रही असावा असा हा `हाटूमुटूचा चंद्र` तुम्ही एकदा नक्की अनुभवा! चला तर मग, आपणही शोधूया आपला स्वतःचा ‘हाटूमुटूचा चंद्र’! ...Read more