* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: TATVAMASI
  • Availability : Available
  • Translators : ANJANI NARAVANE
  • ISBN : 9788177664058
  • Edition : 5
  • Publishing Year : AUGUST 2003
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 192
  • Language : Translated From GUJRATI to MARATHI
  • Category : FICTION
  • Available in Combos :DHRUV BHATT COMBO SET - 7 BOOKS
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
"THIS BOOK IS ENGLISH TRANSLATION OF TATVAMASI, THE SAHITYA ACADEMY AWARD-WINNING GUJARATI NOVEL BY DHRUV BHATT. IT IS SURE THAT ALL THOSE WHO COULD NOT READ IT IN GUJARATI WILL ENJOY READING IT. IT WILL BE DEFINITELY APPRECIATED BY ALL THOSE WHO LOVE INDIA AND ITS GREAT ANCIENT CULTURE. SHRI DHRUV BHATT HAS WRITTEN SEVEN NOVELS SO FAR. THE THEMES OF EACH OF HIS NOVELS ARE VERY DIFFERENT FROM THE USUAL NOVELS. IN ALL THIS NOVELS THERE ARE UNDERCURRENTS SUGGESTING UNEXPRESSED TENDER FEELING BETWEEN THE HERO AND THE HEROINE, BUT THERE ARE NO LOVE-STORIES AS SUCH. AND YET, ALL HIS NOVELS HOLD THE READER’S INTEREST THROUGHOUT, WITH GRIPPING STORIES WHICH ARE BEAUTIFULLY WORDED AND THOUGHT PROVOKING. SHRI DRUV BHATT ALWAYS EMPHASISES THE BASIC DECENCY AND VALUE OF LIFE, WHICH ARE FOUND IN INDIANS ALL OVER THE COUNTRY AT THE GRASS LEVEL. HE ATTRIBUTES THESE COMMENDABLE PROPERTIES NOT TO ANY RELIGION BUT TO THE DEEP-ROOTED SPIRITUALITY AMONG THE PEOPLE. "
"परदेशात शिक्षित कथानायक अठरा वर्षांनी भारतात परततो ते अंधश्रद्धा आणि धर्मांधता यांनी ग्रासलेल्या प्रजेला योग्य दिशा दाखवण्याच्या उद्देशाने. प्रजेतील सुप्त शक्ती शोधून त्याचा समाजाला लाभ मिळवून देण्याच्या प्रयत्नात कथानायकाला आदिवासी प्रदेशात काम करीत असताना अनेक लोक भेटतात. या लोकांच्या संस्कृती, परंपरा इत्यादींचा परिचय करून घेत असताना त्याच्या मनात अनेक प्रश्‍नांची द्वंद्वे उभी राहतात. आधुनिक ज्ञानाच्या कसोटीवर घासून पाहताना या संकल्पना त्याला कशा दिसतात? धु्रव भट्ट हे गुजराती साहित्य जगतातील प्रसिद्ध नाव आहे. समुद्रान्तिके आणि तत्त्वमसि या त्यांच्या पहिल्या दोन कादंबर्‍यांना गुजरात साहित्य अकादमी तसेच तत्त्वमसिला केंद्रिय साहित्य अकादमी पुरस्कार मिळाले आहेत. "
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
#MEHTAPUBLISHINGHOUSE #MARATHIBOOKS #TRANSLATEDBOOKS #ONLINEBOOKS #BIOGRAPHYA&TRUESTORIES #TATVAMASI #TATVAMASI #तत्त्वमसि #FICTION #TRANSLATEDFROM #GUJRATITOMARATHI #ANJANINARAVANE #अंजनीनरवणे #DHRUVBHATT #ध्रुवभट्ट
Customer Reviews
  • Rating StarRasika Hinge

    *पुस्तक परीक्षण* मूळ भारतीय वंशाचा पण परदेशात शिकलेला कथानायक त्याच्या अमेरिकन प्रोफेसरच्या सांगण्यावरून भारतात आदिवासी बद्दल अंधश्रद्धा, धर्मांधता, याविषयी संशोधन करायला येतो. अनिच्छेने इथे आलेल्या कथानायकास सौराष्ट्राच्या जंगलातील न्मदेच्या खोऱ्यात आदिवासी प्रदेशात काम करतांना, त्यांच्या सोबत राहतांना आलेले अनुभव म्हणजे गुजराथी लेखक ध्रुव भट्ट यांची अंजनी नरवणे यांनी अनुवादित केलेली तत्वमसि कादंबरी. वास्तविक कथानायकाला या आदिवासी बद्दल ना आकर्षण ना इथे काम करण्याची इच्छा. तरीही काही दिवस राहू, माहिती गोळा करू , आदिवासींना काही शिकवता आलं, त्यांच्या श्रद्धा किती चुकीच्या आहेत हे पटवून देण्यासाठी आणि जमलं तर एखादी शाळा वगैरे काढता आली तर पाहू असा विचार करून कथानायक भारत भूवर पाय ठेवतो. इथे आल्यावर आदिवासी जीवन त्याला जवळून पहायला मिळतं. त्यांच्या श्रद्धा,परंपरा स्वतःवर असलेला विश्वास यामुळे तो नकळत त्यांच्याकडे खेचला जातो. भारतीय परंपरागत संस्कृती आणि पाश्चात्य संस्कृती याची तुलना नकळत होऊ लागते. आदिवासी प्रदेशातील काही ठिकाणं, काही घटना त्याला अचंबित करतात. तर काही प्रथा विचार करायला भाग पाडतात. नर्मदेच्या खोऱ्यात परिक्रमेसाठी आलेल्या परिक्रमा वासींची जमेल तशी सेवा करायची हे आदिवासीचे तत्व. मुळात नदीची प्रदक्षिणा करणे म्हणजे अंधश्रद्धा आणि मागासलेपण आहे असे कथानायकाला वाटते. आदिवासी भाषा शिकतांना, एखादा उपक्रम राबवितांना जसे मध गोळा करणे, शाळा सुरू करणे यासाठी त्याला आलेल्या विविध अडचणी, स्थानिक आदिवासींची परंपरेवर असलेली श्रध्दा या सगळ्या गोष्टी त्याच्या आकलन शक्तीच्या बाहेर आहेत असे त्याला वाटत राहतं. भारतीय संस्कृतीत तीर्थाटन, आचार विचार, परंपरा यांची देवाण घेवाण यामुळे भारत एकत्रित बांधला गेला आहे असे कथानायकाला आदिवासींनी केलेली परिक्रमा वासींची सेवा पाहून पटायला लागतं,. परिक्रमा करतांना प्रत्यक्ष नर्मदा दर्शन देते यावर त्याचा विश्वास नसतो. आलेल्या परिक्रमवासी शी बोलून माहिती घेण्याचा प्रयत्न कथानायक करतो. पण हे सांगून पटणारी गोष्ट नाही. यासाठी प्रत्यक्ष अनुभव घ्यावा म्हणून तो परिक्रमा अनुभवण्यास निघतो. अवघे विश्व एकाच मूलतत्वापासून निर्माण झाले आहे याचा अनुभव नर्मदेच्या तीरावर चालतांना येतो. नर्मदा नदी ही जिवंत मानली जाते. तिच्या सहवासात ,तिच्या तीरावरील रम्य अनुभव वाचतांना नकळत आपणही मी कोण? विचार करू लागतो...... तत्वमसि आवडली कारण वाचतांना खिळवून ठेवण्याचं सामर्थ्य तिच्यात आहे... वाचा आणि अनुभवा एक उत्कट अनुभव..... ©️रसिका राजीव हिंगे ...Read more

  • Rating StarPratima Deshpande

    मागच्या आठवड्यात गुजराथी लेखक ध्रुव भट्ट यांच्या तत्वमसि कादंबरीचा अंजली नरवणे यांनी केलेला मराठी अनुवाद वाचला. भारतातील लोकांच्या मनात असलेल्या अनेक समजुती, किंवा शास्त्राने दिलेली आज्ञा म्हणून पाळल्या जाणाऱ्या अनेक गोष्टी, मग त्या भोळ्या समजुती असतल किंवा समजुती नसून खरेच ते सत्य असेल किंवा अमुक एक गोष्ट करण्यामागे किंवा न करण्यामागे अमुक अमुक शास्त्रीय कारण आहे, फक्त लोकांच्या समजुतीखातर त्याला पाप-पुण्याचे संकेत दिले असावेत इत्यादी गोष्टींवर अनेकदा चर्चा होताना आपण ऐकतो. तर अशा समजुती किंवा शास्त्राच्या आज्ञा असण्याने आपल्या देशात नेमकं काय झालंय याबद्दल खूप साधेपणाने बोलणारे हे पुस्तक आहे. फार अवजड काही न बोलता, सांस्कृतिक वारशाचे जतन कारण्याबद्दलचा खूप महत्वाचा आणि मोठा विचार या पुस्तकातून प्रभावीपणे मांडलेला आहे. निसर्गाच्या समीप राहिल्यामुळे आदिवासी माणूस जास्त संवेदनशील असतो आणि सजीव-निर्जीव अशा सर्वच घटकांबद्दल त्याला निसर्गतःच खूप ममत्व असते असा अनुभव नायक घेतो. एक वेळ अशी येते की, त्याला प्रश्न पडतो, आदिवासींना सुधारण्याचा अधिकार खरंच आपल्याला आहे का? आदिवासींना पाहून आणि त्यांचे निरीक्षण करून करून सुरुवातीला त्यांना अडाणी, घाणेरडे समजणारा नायक कशा नकळत त्यांच्यावर प्रेम करू लागतो, त्यांना सुसंस्कृत समजू लागतो. नर्मदा परिक्रमा, आदिवासी लोकसंस्कृती, जंगलात राहताना त्यांच्यापुढे येणाऱ्या अडचणी यांच्याभोवती गुंफलेले कथानक आदिवासींच्या आयुष्यातील अनेक पैलूंवर प्रकाश टाकते. बरेचदा कादंबरी एका विशिष्ट वळणावर येऊन थांबते, मग लेखक आपला विचार मांडून त्या गोष्टीचा समारोप करतो. इथे तसं न होता, कादंबरीच्या शेवटातून अनेक नवीन विचारांची मनात सुरुवात होते. कादंबरीचा नायक अगदी सुरुवातीपासून एका प्रश्नाचं उत्तर शोधताना सापडतो, तो प्रश्न म्हणजे भारतातील सर्व लोकांच्यात असं काय उपजतच आहे जे सर्वांना एका सामान धाग्यात बांधून ठेवते? या प्रश्नापासून सुरु झालेला त्याचा प्रवास त्याला अनेक वेगवेगळ्या वाटांवरून घेऊन जातो. त्यावेळी अजूनही अनेक प्रश्न त्याच्या मनात येतात. कादंबरीच्या नायकाची काही ठाम समजूत झालेली आहे असं ना दाखवता आजूबाजूच्या लोकांचे विचार, आणि त्यातून त्याचं झालेलं विचारमंथन हे आपल्यालादेखील काही विचार करण्यास भाग पडतं, ही यातील सर्वात आवडलेली गोष्ट. ...Read more

  • Rating StarAshiwini Gore

    ` तत्वमसि` ही रूढार्थाने कादंबरी असली तरी ते एक मुक्त चिंतन आहे. ते चिंतन रंजक वाटावे म्हणून त्याला कथेत परावर्तीत केले आहे असे फार तर आपण म्हणू शकतो. ध्रुव भट्ट ह्या प्रसिद्ध गुजराती लेखकाची ही कादंबरी अंजली नरवणे ह्यानी मराठीत अनुवादित केली आहे. गुराती आणि भारतीय साहित्य अकादमीचा पुरस्कार ह्या कादंबरीला मिळालेला आहे . लेखक म्हणतात ही कादंबरी म्हणजे नर्मदा नदी, तिच्या आजूबाजूचे आदिवासी , तिच्या काठच्या मंदिरांमधून किंवा आश्रमांमधून राहिलेले परिक्रमावासी ह्या सगळ्यांकडून ऐकलेल्या गोष्टी आणि काही माझ्या स्वतःच्या कल्पना ह्याचे फळ आहे. भारताच्या उत्तर आणि दक्षिण भागाला जोडण्याऱ्या नर्मदेच्या काठी ही कथा आकार घेते. कथेला नायक नाही, वाचकच त्याचा नायक होतो इतकी ही कथा आपली होऊन जाते. बालपणीचा काही काळ हा आपला नायक भारतात राहिलेला असतो नंतर मात्र तो परदेशात जातो आणि जवळजवळ १८ वर्षानंतर परत येतो, ह्या मधल्या काळात तो आपल्या ह्या मायभूमीपासून दुरावलेला असतो त्यामुळे त्याचे प्रोफेसर रुडॉल्फ जेव्हा त्याला आदिवासी संस्कृतीच्या अभ्यासासाठी भारतात जायला सांगतात तेव्हा तो काहीसा नाखूष होतो, त्यांच्याकडे बरीच रदबदली करून बघतो, दुसऱ्या एका योग्य सहकाऱ्याचे नाव सुचवतो परंतु काहीही उपयोग होत नाही. `सुप्रिया भारतीय` ह्या तिथे आदिवासींमध्ये काम करणाऱ्या एका स्वयंसेविकेचे नाव प्रो. रुडॉल्फ त्याला सांगतात तेव्हा तर ही कोणीतरी ६०-६५ वर्षाची चष्मा घालणारी, खादी वापरणारी, भाषणं देणारी स्त्री असेल अशी त्याची खात्रीच होते. शेवटी ` तू आदिवासींमध्येच रहा, तिथे एक शाळा काढ, त्यांचं रोजचं आयुष्य बघ आणि त्याची टिपणं काढून मला पाठव` ह्या बोलीवर त्याची रवानगी भारतात होते. भारतातला त्याचा पहिलाच रेल्वेप्रवास म्हणजे बालपणीच्या आठवणींचं मोहोळ असतं. लहान वयातच आईला पारखा झालेल्या त्याने नंतरचं एक वर्ष गुजरातमधल्या एका छोट्या खेड्यात नानीजवळ काढलेलं असतं. सकाळी उठल्याबरोबर झालेलं नर्मदेचं पाहिलं दर्शन त्याला त्याच्या बालपणीच्या काळात घेऊन जातं. परदेशातल्या खाजगीपणाची सवय झालेल्या त्याला माणसं ओळख नसतांना इतकी एकमेकांशी कशी बोलतात,किंवा काय काय बोलू शकतात, ह्याचं भयंकर आश्चर्य वाटतं ` भारतीयत्व` म्हणून जे काही आहे ते म्हणजे काय ह्याची ओळख त्याला व्हायला लागते. भोपाळहून पुढे प्रत्यक्ष कामाच्या ठिकाणी जायला म्हणून आपला नायक रेल्वेत बसतो आणि आदिवासींशी त्याची पहिली तोंडओळख होते. आपल्यातच मग्न होऊन गाणाऱ्या एका आदिवासी युवतीला बघून नायकाला प्रश्न पडतो ` अनेक गोष्टींचा अभाव असतांना , अंगभर कपडे आणि पोटभर अन्न नसतांना सुद्धा ही मुलगी एवढी आनंदी कशी ?` सुखाची हिची व्याख्या नक्की आहेतरी काय ?. ही वनकन्या म्हणजे पुरिया पुढे नायकाला त्याच्या इच्छित स्थळी घेऊन जाते. कादंबरीत मध्ये मध्ये येणारी आदिवासींची भाषा खूप गोड वाटते , अर्थात लगेच त्याचा अनुवाद केलेला आहे त्यामुळे कथा सहज पुढे जाते. ह्या निर्मनुष्य स्थानकावर काही वेळ वाट बघून नायक एकटाच पुढे निघतो, इथला निसर्ग हळूहळू त्याच्या नजरेसमोर जणू उलगडत असतो. एका मोठ्या रायण वृक्षाच्या सावलीत बसल्यावर `मुनि का डेरा` आणि `बित्तुबंगा` असं लिहिलेले दोन दगड आणि त्यावरची व्याधाची आकृती त्याचं लक्ष वेधून घेते आणि लगेच तो आपली संशोधक मैत्रीण ल्युसी हिला त्याबद्दल कळवतो. थोड्यावेळाने त्याला घ्यायला येणारे गुप्ताजी आपल्याबरोबर सुप्रिया भारतीय ला घेऊन येतात आणि तिला बघून आपला नायक आश्चर्यचकित होतो, आनंदी, तरुण सुप्रिया बघून हिला काय दुःख असेल म्हणून ही इथे येऊन राहतेय ? असा अगदी सामान्य माणसाला पडेल असा प्रश्न त्यालाही पडतो. अतिशय हुशार, तंत्रकुशल अशी ही चुणचुणीत सुप्रिया आदिवासींची, गुप्तांजींच्या परिवाराची खूप जवळची असते, त्या साध्या लोकांनी तिचं नावही साधं सोपं करून टाकलेलं असतं, ते तिला `सुपरिया` म्हणत असतात. आपला नायक सुपारियाला बित्तुबंगा बद्दल विचारतो पण ती त्याला ताकास तूर लागू देत नाही, गुप्तजींबरोबर राहून तो इथली सगळी माहिती घेत असतो, इथल्या लोकांचे आचारविचार,त्यांची भाषा , संस्कृती ह्याबद्दलचं त्याचं गूढ मात्र वाढतच जात असतं. नकळत तो ह्या सगळ्यांमध्ये रमायला लागतो, कुठेतरी ह्यांच्यात आणि आपल्यात काहीतरी समान धागा आहे हे त्याला जाणवायला लागतं. इतकी वर्ष विस्मरणात गेलेलं कच्छच्या छोट्याशा खेड्यातलं त्याचं एक वर्ष पुनः पुनः त्याच्या डोळ्यासमोर उभं राहायला लागतं, त्याची नानी, मामा, मामी ,त्याच्या नानाजींचे एक चुलतभाऊ जे मंद बुद्धीचे होते ह्यांचं एकमेकांशी जोडलेलं असणं, एकमेकांना जपणं, सांभाळून घेणं, सहजपणे सामावून घेणं आज तो परत नव्याने अनुभवू लागतो. नायक म्हणतो तसं ऐशोआराम, भरपूर संपत्ती, पद, प्रतिष्ठा हे सगळं मिळवूनही सुखी, सुंदर नसलेले चेहरे आपल्या अवतीभवती सतत वावरत असतात किंवा बरेचदा तर आपणही त्यात असतो मग ह्या सगळ्याचाच अभाव असतांना इथे ह्या जंगलात सुपरियाच्या, पुरियाच्या, आदिवासींच्या किंवा लहानपणी पाहिलेल्या वरवर कठोर भासणाऱ्या नानीच्या रुपात एवढं नितळ निर्मळ सौन्दर्य कसं काय असू शकतं ?...ह्या आणि अशा अनेक प्रश्नांची उकल त्याला आदिवासींच्या सहवासात मिळत जाते. बित्तुबंगा ह्या नावाबद्दलचं गूढ उकलतं हे दोघे आदिवासी भाऊ असतात पुढे एका नरभक्षीण वाघिणीच्या हल्ल्यात त्यातला एक मरण पावतो , आपल्या भावाचा बळी घेणारी ही वाघीण नंतर बित्तुच्या मदतीने वनविभागाच्या जाळ्यात पकडल्या जाते, सुडाने बेभान झालेला बित्तु तिला खरंतर ठार मारणार असतो पण ही वाघीण जेव्हा थोड्याच काळात पिल्लाला जन्म देणार असते हे त्याला कळतं तेव्हा तो सहज तिला मुक्त करतो. इतक्या सहजपणे क्षमा करण्याची वृत्ती कुठलेही तथाकथित शिक्षण न घेतलेल्या बित्तुकडे कुठून येतात ह्याचं नायकाला महादाश्चर्य वाटतं. मध्ये एकदा नायकाला एक छोटासा अपघात होतो आणि बेशुद्ध अवस्थेत नर्मदा तीरावरच्या गणेश शास्त्रींच्या आश्रमात त्याच्यावर उपचार होतात गणेश शास्त्री , गुप्ताजी किंवा सुप्रिया हे सगळे आदिवासीसाठीच काम करणारे असतात. गणेश शास्त्रीशी इथला धर्म,संस्कृती ,परंपरा रीतिरिवाज ह्या विषयांवर भरपूर चर्चा होते. शास्त्रीजी त्याला समजावून सांगतात तुला इथे काम करायचे असेल , इथल्या लोकांच्या चुकीच्या समजुती बदलायच्या असतील, त्यांना काही नवं द्यायचं असेल तर आधी तुला त्यांना समजून घ्यावं लागेल, त्यांच्याशी मैत्री करावी लागेल, हळूहळू नायकाच्या विचारात परिवर्तन होऊ लागतं तो बदलू लागतो, त्याला ह्या लोकांबद्दल आत्मीयता वाटायला लागते, स्वयंसेवकांच्या मदतीनी तो इथे शाळा, मधुमक्षिका पालन असे छोटे उद्योग सुरु करतो. अतिशय साध्या वाटणाऱ्या ह्या आदिवासींची क्रूर बाजू सुद्धा पुरियाच्या निमित्ताने त्याच्या समोर येते तेव्हा तो हबकतो, अल्लड निरागस पुरीयाला काही कारणानी `डाकिण` ठरवलं जातं आणि मग अशी डाकीण नको म्हणून सगळे आदिवासी तिला ठार मारायला निघतात अशावेळी `साठसाली` ह्या आदिवासी जमातीची प्रमुख `कालेवाली माँ ` तिथे पोहचते आणि हकनाक बळी जाणारी पुरीया वाचते, तेव्हापासून हे `साठसाली` कोण आणि हि नखशिखांत बुरख्यात वावरणारी ` कालेवली माँ` काय प्रकरण आहे ह्याबद्दल नायकाला उत्सुकता वाटायला लागते . आदिवासींच्या सांगण्यानुसार साठसाली हि जंगलातल्या आतल्या भागात राहणारी अतिशय कट्टर अशी आदिवासी जमात आहे आणि त्यांच्या भागात कोणालाही सहज प्रवेश मिळत नाही, `कालेवली माँ ` चा रहस्यभेद मात्र लगेच होत नाही. नायकाला आता ह्या भागात येऊन 2,3 वर्ष झालेली असतात, उन्हाळ्याच्या दिवसांमधे रखरखीत निष्पर्ण झालेल्या ह्या जंगलात आग लागते आणि ही आग हा हा म्हणता पसरत जाते, हा वणवा विझवण्याच्या कामी सरकार, तिथे काम करणारे स्वयंसेवक, आदिवासी सगळे एकत्र येतात, त्यात येणारी छोटी खेडी, आदिवासी पाडे रिकामी करायला लागतात, नायकाला हे संकट नवं असतं पण आता तो इथे सरावलेला असतो, ह्या प्रसंगामुळेच इथल्या प्राथमिक शाळेच्या ध्येयवेड्या शिक्षकाची आणि त्याची मैत्री होते. दरम्यानच्या काळात ह्या सगळ्या घटनांची माहिती, त्याचं निरीक्षण, अनुमानं हे सगळं तो जमेल तसं प्रो. रुडॉल्फ आणि ल्युसी ह्यांना पाठवत असतो, आपल्या अभ्यासाचा एक भाग म्हणून ल्युसी इथे येते, ह्या भागात फिरते तिला हवी ती माहिती गोळा करते, तिच्यासोबत फिरताना नायकाला कालेवाली माँ ला भेटण्याचा योग येतो ही कालेवाली माँ म्हणजे दुसरीतिसरी कोणी नसून सुपरियाची आई असते, ह्याच प्रवासात ` जिंदा सागबान ` चे सुद्धा नायकाला दर्शन होते. दैवी भासणारा हा सागचा सदाहरित वृक्ष म्हणजे जणू ह्या संपूर्ण जंगलाचा पुराणपुरुष असतो, अवघ्या चराचर प्राणिसृष्टीचा पोशिंदा असतो. तुम्ही जर कुठल्याही प्रकारचं वाईट काम कधीही केलं नसेल तर तुम्हाला इथे कुठलाही धोका नाही उलट तुम्ही ह्या वृक्षाच्या छत्रछायेत अगदी सुरक्षित आहात अशी आदिवासींची समजूत असते. ल्युसी ह्या सगळ्याच प्रकरणाकडे खूप तार्किक,वैज्ञानिक दृष्टिकोनातून पाहत असते अर्थात नायकाचा सुरवातीचा दृष्टीकोन काही फारसा वेगळा नसतो पण आता इथे राहून तो ह्या सगळ्याबद्दल जास्त खोलात जाऊन विचार करू लागतो आणि त्यामुळेच ल्युसी जेव्हा त्याला इथून परतण्याबद्दल, स्वतःच्या नात्याबद्दल विचारते तेव्हा तो तिच्याकडे ह्या सगळ्यासाठी वेळ मागतो. नर्मदा ही निव्वळ नदी नाही तर ती एक जिवंत अनुभूती आहे हे इथल्या लोकांचा मानणं त्यानं सुरवातीला नाकारलेलं असतं पण त्याला आलेल्या काही अनुभवांवरून , अचानकपणे घडलेल्या परिक्रमेवरून तो गोंधळून जातो. शूलपाणीच्या जंगलात येणाऱ्या नायकाला तिथले आदिवासी लुटतात, त्याच्याजवळचं होतं नव्हतं ते सारं काढून घेतात आणि वरून हा नर्मदा मैय्याचा आदेश आहे असं सांगतात, नायक म्हणतो का असा आदेश देत असेल मैय्या ? आधीच निष्कांचंन, थकलेल्या जीवाकडून त्यांना काय मिळणार? पण जिवंत राहण्यासाठी तडफडणारा हा उपाशीतापाशी वस्त्रविहीन प्रवासी जेव्हा इथून बाहेर येईल तेव्हा `अहं ब्रह्मस्मि। ` हा त्याचा अहंकार पूर्णपणे नष्ट होईल आणि `तत् त्वं असि।` अर्थात ` ते तू आहेस` ह्या सृष्टीत जे काही दैवी आहे ते अंशरूपाने तुझ्यात आहे आणि जे तुझं आहे, तू प्राप्त केलं आहेस तेच ह्या सृष्टीत परत जाणार आहेस हे ज्ञान त्याला प्राप्त होईल. आपल्या प्रवासाच्या शेवटच्या टप्प्यात नायकाच्या मनातल्या ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं त्याला मिळतात, आपलं हरवलेलं मुल परत आल्यावर आई जसे त्याचे सगळे हट्ट पुरवेल तसंच त्याची इच्छा पूर्ण करण्यासाठी नर्मदा मैय्या सुद्धा त्याला स्वतःच नाव सांगून दर्शन देते आणि इथे कादंबरी संपते . ही कादंबरी वाचतांना आपल्याला सुद्धा अनेक प्रश्न पडतात, इतके विविध धर्म, समाज ,पंथ, जाती ,उपजाती त्यांचे आचारविचार असणाऱ्या आपल्या देशात असं काय आहे की जे भारतीय म्हणून आपल्याला इतकी शतकं एकत्र ठेवतय, हो अगदी एक देश म्हणून अस्तित्वात येण्याच्या अधीही आपण कुठल्यातरी सुत्राने बांधलेलो होतोच ते सूत्र वरीलपैकी काहीच नव्हतं तर कादंबरीत म्हटल्याप्रमाणे ते सुत्र होतं निसर्गाचं, त्यानं सुरु केलेल्या परंपरांचं, त्यानं रुजवलेल्या संस्कृतीचं, त्यानं दिलेल्या क्षमा, दान , परतफेड ह्या संस्कारांचं, धर्म हा कधीच इथल्या लोकांसाठी महत्वाचा नव्हता धर्म म्हणजे जीवन चांगल्या तऱ्हेने जगण्यासाठी सांगितले गेलेले नियम. इतका सरळ अर्थ सांगून कादंबरीचा शेवट होतो अर्थात आपल्या मनात मात्र ती सुरुच राहते कारण चिंतन , विचार ही एक प्रक्रिया आहे आणि तेच आपल्या जीवंतपणाचं लक्षण आहे . © अश्विनी गोरे ...Read more

  • Rating Starविंग कमांडर प्रभाकर सहस्रबुद्धे

    ‘तत्वमसि’ ही कादंबरीचे अतिशय प्रभावी लेखन अन् तितकाच प्रभावी अनुवाद. भारतीय संस्कृतीमागचे मूळ विचार, परंपरांमागचे तत्त्वज्ञान इतक्या सोप्या शब्दात मनावर बिंबवणारं लिहिलेलं कुठंच नसेल.

  • Read more reviews
Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

SARTH
SARTH by DR. S. L. BHYRAPPA Rating Star
हेमंत सांबरे

गेल्या तीन दिवसांत ही कादंबरी वाचून पूर्ण झाली .. ही कादंबरी वाचून होताच मन अगदी सुन्न होऊन गेले आहे . त्याचबरोबर अनेक संमिश्र भावना मनात दाटून आल्या आहेत . #आवरण ही जगप्रसिद्ध कादंबरी वाचल्यानंतर भैरप्पा यांच्या बद्दल मनात खूप आदरभाव निर्माण झाला होा . त्यानंतर त्यांचे हे दुसरे पुस्तक म्हणजे #सार्थ आज वाचून पूर्ण केले. या कादंबरीची कथा सातव्या शतकात घडत असते . *नागभट्ट* हा कादंबरीचा नायक आहे . हा नागभट्ट तुमच्या माझ्या सारखा एक सर्वसामान्य मनुष्य आहे . भैरप्पा यांनी त्याच्या नजरेतून त्या काळात घडत असलेल्या अनेक घटनांचा सूक्ष्म आढावा आपल्या समोर अतिशय समर्थपणे मांडला आहे . हे सातवे शतक म्हणजे असे होते की वैदिक धर्माचा प्रभाव जरी जनमानसात असला तरी , बौद्ध धर्माने ही आपली पाळेमुळे पूर्ण निदान उत्तर भारत , पूर्व भारत या भागात पसरवली होती . एक सामान्य मनुष्य म्हणून नागभट्टच्या मनात सुरू असलेली विविध द्वंद , त्याची वैदिक धर्म की बौद्ध धर्म याविषयी झालेली द्विधा मनस्थिती ही लेखकाने अचूक टिपली आहे . अनेक चर्चांमधून बौद्ध तत्त्वज्ञान , वैदिक तत्त्वज्ञान यांची ओळख अतिशय सोप्या भाषेत लेखक आपल्याला करून देतात , ते वाचताना आपल्या चित्ताला एक वेगळेच समाधान मिळत राहते .. या सर्व तत्त्वज्ञानाची प्रदीर्घ चर्चा , नायकाला येत असलेले वेगवेगळे अनुभव यातून आपणही समृध्द होत जातो . मधल्या काळात नायक मथुरेला येऊन राहतो . तेव्हा तिथल्या एका नाटक मंडळींबरोबर ओळख होऊन नायकाला त्यांच्या एका नाटकात प्रत्यक्ष *कृष्णाची* भूमिका करायला मिळते . तेव्हा त्याचे नाव *कृष्णानंद* असे होते . या भूमिकेमुळे नायकाला त्या भागात प्रचंड प्रसिध्दी मिळते . या नाटकातील असलेली त्याची नायिका चंद्रिका या सुंदर स्त्री बरोबर त्याचा विशेष स्नेह होऊन त्यांचे प्रेम ही जुळते . एखादी गोष्टीचा प्रचंड अभ्यास करून त्याला मांडणे यात भैरप्पा यांचा हात कदाचित फार कमी लेखक धरू शकतील . ही कादंबरी वाचतानाही प्रत्यही जाणवत राहते . याच काळात आद्य शंकराचार्य व मंडणमिश्र यांच्यातील झालेल्या जगप्रसिद्ध वादावर दोन ते तीन प्रकरणे या पुस्तकात आली आहे . या दोन दिग्गज वैदिक ऋषी बद्दल मी इतर अनेक ठिकाणी खूप ओझरते उल्लेख ऐकले होते , पण या कादंबरीत विस्तृत माहिती मिळाली , व एक वेगळेच समाधान मिळाले . कादंबरीचा शेवट आपल्याला पुस्तकातील आधीच्या अनेक कथावस्तू पासून एका वेगळ्याच दुनियेत घेऊन जातो .. याच सातव्या शतकात वायव्येकडून अरब लोकांची आक्रमणे सुरू झाली होती . तोपर्यंत भारतवर्षात लढली जाणारी युद्ध फक्त रणांगणावर लढली जात , त्याचा सामान्य जनतेला कुठलाही त्रास होत नसे . पण अरबांनी केलेल्या आक्रमण मुळे भारताचा सांस्कृतिक ढाचा कसा उद्ध्वस्त होऊ लागला याचे अचूक व सत्य वर्णन भैरप्पा यांनी केले आहे . ते वाचताना तेव्हाही हिंदूंची सद्गुण विकृती ( अनावश्यक असलेली अती सहिष्णुता ) कशा प्रकारे हिंदूंचा नाश करते हे ही त्यांनी सांगितले आहे . ती सर्व शेवटची प्रकरणे आपण सर्व हिंदूंनी मुळातच वाचण्यासारखी व अभ्यास करण्यासारखी आहे . एका प्रसंगात जेव्हा काही राजे एकत्र येऊन अरबांवर आक्रमण करण्याचे योजतात , तेव्हा धूर्त अरब त्या गावातील सूर्यमंदीर भ्रष्ट करायची धमकी देऊन त्या गावातील लोकांना युद्ध करण्यापासून व बाहेरून आलेल्या सैनिकांना सहाय्य न करण्याचे वचन घेतात . त्यामुळे जे नको तेच होते , व हळूहळू तो प्रदेश अरबांच्या ताब्यात जाऊन तेथला बौद्ध , वैदिक हिंदू धर्म नष्ट होऊ लागतो , याचे विदारक वर्णन आपल्यासमोर येते . हे वाचताना मला १७५१ साली नानासाहेब पेशव्यांनी काशी वर आक्रमण करून ते क्षेत्र मुक्त करण्याच्या प्रसंगाची आठवण झाली . तेव्हाही काशी मधील जनतेने नानासाहेब पेशव्यांना रोखले होते , नाहीतर तेव्हाचा ज्ञानवापी मंदीर मुक्त झाले असते ... तेव्हाही हिंदूंची सद्गुण विकृती आड आली जशी ती सातव्या शतकात ही आड आली होती .. असो --- अनेक अद्भुत प्रसंगातून आपल्याला ही कादंबरी घेऊन जात राहते ..सातव्या शतकातील भारताचे वर्णन वाचून आपण त्यावेळच्या राजांची वृत्ती , जनतेचा स्वभाव , साधू तसेच बौद्ध भिक्खू यांचे स्वभाव, त्यांचे विचार आपल्याला कळत जातात . लेखक आपल्याला नालंदा विद्यापीठ देखील दाखवून आणतो . त्याकाळात तेथील अध्ययन कसे चालत असे , हेदेखील आपल्याला वाचायला मिळते . पुस्तकाला कादंबरीची मोकळीक असली तरी आपल्याला ऐतिहासिक दृष्टिकोन ही मिळतो , हे नक्की ! ही कादंबरी वाचून होताच, भैरप्पा यांच्या इतर सर्व कादंबऱ्या व पुस्तके वाचण्याची उत्सुकता निर्माण झाली आहे , व ती इच्छा ही लवकरच पूर्ण होईल ही आशा! ...Read more

I HAVE A DREAM
I HAVE A DREAM by RASHMI BANSAL Rating Star
Krishna Diwate

‘स्टे हंग्री स्टे फूलीश’ आणि ‘कनेक्ट द डॉटस’ या बेस्ट सेलर पुस्तकाच्या लेखिका ‘समाजातल्या परंपरागत समस्या सोडवण्याचा नवा मार्ग शोधून काढणार्‍या वीस सामाजिक उद्योजकांच्या प्रेरणादायी कहाण्या’ हे वाक्य पुस्तकाचे पहिले पान उघडले आणि दिसले. त्यामुळे माझ कुतुहल चाळवले आणि ते पुस्तक वाचायला सुरुवात केली. मनोगतात लेखिका म्हणतात की, आता नव्या दमाचे, डोक्याने आणि मनाने ही विचार करणारे काही जण एखाद्याच्या नजरेतील दुःख ओळखतात, पेटून उठतात; पण ते त्याच्यावर विचार एखाद्या उद्योजकाप्रमाणे करतात. म्हणून ते ‘सामाजिक उद्योजक.’ नफा मिळविण्याचा हव्यास नसला तरी ते बिझनेस मधील तत्वे वापरून ती गोष्ट साध्य करतात. हे काही तरी वेगळे आपण वाचत आहोत असे मला वाटले. त्यामुळेच ते पुस्तक वाचायला घेतले. ह्या मध्ये वीस लोकांची चरीत्रे आहेत. ते सर्व भारतीय, उच्चशिक्षित तरूण तरूणी आहेत. कोणी त्यातील शास्त्रज्ञ आहेत तर कोणी मरिन बायोलॉजिस्ट, आयआयटी, आयआयएम ग्रॅज्युएट आहेत पण कोणत्या कोणत्या सामाजिक प्रश्नाने ते अस्वस्थ झाले आणि नेहमीच्या मार्गाने न जाता वेगळीच वाट पकडली. पुस्तकात ‘रेनमेकर्स,’ ‘चेंजमेकर्स’ व ‘स्पिरिच्युअल कॅपिटॅलिस्ट’ असे तीन भाग आहेत. प्रत्येकात अनुक्रमे अकरा,सहा व तीन व्यक्तीमत्वांची ओळख करून दिली आहे. ‘सुलभ’ ही आधुनिक टॉयलेटस उभारणारे बिंदेश्वर पाठक ह्याच्या चरित्राने पुस्तकाची सुरुवात होते. जातीने बिहारमधील ब्राह्मण. पण लहानपणी टॉयलेटस साफ करणार्‍याला हात लावला त्यामुळे आजीने अक्षरशः शेण, गोमुत्र खायला लावले. पण त्याच बिंद्रेश्वरांनी अगदी योगायोगाने ह्याच क्षेत्रात काम करण्याचे ठरविले. अर्थात ही वाट निश्चितच सोपी नव्हती. अनेक हालअपेष्टा सोसत, जगाचे धक्के खात, अनेक समस्यांना तोंड देत आपले स्वप्न ‘सुलभ शौचालयाच्या’ माध्यमातून सुरु केले. तो सगळा खडतर प्रवास अर्थात पुस्तकातूनच वाचायला हवा. त्यासाठी त्यांनी केवळ ती यंत्रणा तयार केली नाही तर ती टॉयलेटस बांधून, त्यासाठी लागणारी प्रेरणा, शिक्षण, संभाषण, ट्रेनिंग, पाठपुरावा अशा सर्वच गोष्टी ‘सुलभ’ तर्फेच संभाळल्या जातात. सध्या ही संस्था स्वबळावर चालते. 100 ते 125 कोटी इतके तिचे वर्षाचे उपन्न आहे. इतकेच नाही पूर्वी जे लोक सफाईचे काम करत असत त्यांच्या मुलांच्या शिक्षणाचा खर्च संस्था करत आहे. ‘सुलभ पब्लिक स्कूल’ नावाने शाळा सुरु केली आहे. तरूणांसाठी व्होकेशनल क्लासेस चालवले जातात. म्हणजे मिळालेला नफा पुन्हा त्याच सफाई कामगारांच्या कल्याणासाठी वापरला जातो. टॉयलेटस बांधून भरपूर पैसा मिळवता येतो हे वाक्य पचायला जरा जडच जाते. अनिता आहुजा ही दिल्लीत सुखवस्तू कुटूंबात रहाणारी सामान्य स्त्री. पण कचरा वेचणार्‍या मुलांचे हाल पाहून त्यांच्यासाठी काही तरी करावे असे तिने ठरविले. तिने 1998 मध्ये कॉन्झर्व्ह नावाची संस्था उभी केली. व त्यातून पहिला प्रोजेक्ट सुरु केला तो म्हणजे आजुबाजूच्या परिसरातील कचरा उचलून त्याचे कंपोस्टखत तयार करणे. कचरा गोळा करण्यासाठी चांगल्या ढकलगाड्या आणल्या, युनिफॉर्म, आय कार्डची सोय केली. 2002 पर्यंत एक पूर्ण वेळ काम करणारी मोठी संस्था बनली. त्याचवेळी त्यांनी प्लॅस्टीकच्या कचर्‍यावर प्रयोग सुरु केले. तिचे पती शलभ ह्यांनी बिटस पिलानी मधून इंजिनिअरींग केले आहे. त्यांच्या मदतीने तिने फॅक्टरी सुरु करण्याचे ठरविले. शलभने मोठ्या प्रमाणावर प्लॅस्टिक शीटस निर्मिती करू शकेल असे मशीन तयार केले. त्यासाठी अर्थातच अनेक प्रश्न समोर उभॆ राहिले. चुका झाल्या, ठोकरा खाल्या पण त्यातून वाट काढत त्यांनी चिकाटीने प्रयत्न सुरुच ठेवले. आज दोघे मिळून कचर्‍यातील प्लॅस्टिक पिशव्या वापरून आकर्षक अशा हॅडबॅगस तयार करण्याचा कारखाना चालवतात. जे लोक सुरुवातीला केवळ कचरा उचलण्याचे काम करत होते, त्यांच्या काही कौशल्य दिसले की त्यांना वेगळे काढून ट्रेनिंग दिले जाते. मशीनवर असिस्टंटचे काम करू लागतात त्यातून काही लोक तर ग्रुप लिडर ही झाले आहेत. कटींग करणॆ, क्वालिटी तपासणॆ, फिनिंशींग, पॅकिंग अशी सर्व महत्वाची कामे ते करतात. आता ते कामगार झाल्यामुळॆ त्यांना चांगला पगार, प्रॉव्हिडंट फंड, ओव्हरटाईम अशा सुविधा मिळू लागल्या त्यापेक्षा ही जास्त त्यांना समाजात प्रतिष्ठा मिळाली. त्यांच्या साठी हे नवीनच आहे. अनिता व शलभ दोघॆही मेहनत घेतात पण एनजीओ असून ही भरपूर पैसा कमावणे त्यांना चुकीचे वाटत नाही. कारण आज ह्या एका उद्योगामुळे कित्येक कुटूंबाची आर्थिक स्थिती बदलून गेली आहे. अशीच अजून एक प्रेरणादायी कथा दिल्लीतील रंगसूत्र कंपनी चालविणार्‍या सुमिता घोस ह्यांची. स्वतः ग्रॅज्युएशन पूर्ण केल्यावर मास्टर इन इकॉनॉमिक्स ची पदवी घेतल्यावर संजॉय घोस ह्या या आय आर एम मधून शिक्षण घेतलेल्या ध्येयवादी तरूणाशी लग्न केले. पण दुर्दैवाने आसाममध्ये काम करत असताना त्यांची 1998 मध्ये उल्फाच्या अतिरेक्यांनी हत्या केली. त्यानंतर अनेक टक्केटोणपे खात, दोन लहान मुलांचा संभाळ करत सुमिताने ‘रंगसूत्र’ नावाची कंपनी काढली. त्याच्या मार्फत ती खॆडॆगावातल्या लोकांकडून कापड, शोभॆच्या वस्तू, बनवून घेते आणि त्या फॅब ईंडीयासारख्या प्रसिध्द कंपन्यांना विकते. जैसलमेर, बारमेर जिल्ह्यातले कारागिर तिच्यासोबत काम करत आहेत. अजून एक अशीच ध्येयवादी तरूणी म्हणजे इशिता खन्ना. डेहराडून मध्ये जन्म झालेली एक सर्वसामान्य मुलगी. पण निसर्गसंवर्धन आणि भूगोल या विषयांची आवड असलेली. म्हणूनच तिने आपल्या ग्रॅज्युएशन नंतर टाटा इंन्स्टीट्यूट मधून मास्टर्स केले. पर्यावरण क्षेत्रातच काम करायचे आहे हे निश्चित ठरवून तिने काही वर्षे नोकरी केली. त्यानंतर 2002 मध्ये नोकरी सोडून आपल्या दोन मित्रांसोबत स्पिती व्हॅलीमध्ये मूस नावाची एन्जीओ सुरु केली. तेथील स्थानिक महिलांचे ग्रुपस करून त्यांना तिथे असणार्‍या सीबक थॉर्न ह्या फळांच्या लागवडीचे ट्रेनिंग दिले. त्यावर प्रक्रिया करायला शिकवले. ही झाडॆ मातीला धरून ठेवतात त्यामुळे धूप रोखली जाते, शिवाय नायट्रोजन ही धरून ठेवत असल्याने जमिनीचा पोत सुधारतो. त्यामुळे ह्या फळांवर लक्ष केंद्रित केले. त्यामुळे तिथल्या बायकांना चांगला रोजगार मिळू लागला. त्याचबरोबर तिने स्थानिक तरूणांना पर्यटकांना ट्रेक किंवा जीप सफारीसाठी नेणे, कॅम्प लावणे, गरज पडल्यास प्रथमोपचार करणे ही कामे ही करायला शिकवले. कारण हळूहळू तिथे पर्यटन वाढू लागले. ते इको-फ्रेंडली करण्याकडॆ तिच्या इकोस्पियर संस्थेचा भर आहे. आता दरवर्षी पर्यटनातून 35 ते 40 लाखाचे उत्पन्न मिळते.आणि त्यातून नफा ही मिळतो. इकोस्पियर संस्थेने शेजारच्य़ा ‘लाहुल’ व्हॅलीमध्ये ही विकास कामे सुरु केली आहेत. पर्वतावर तयार होणार्‍या कचर्‍याच्या समस्येवरही तिला काहीतरी करायचे आहे. तिची संस्था लोकांना मुद्दाम तिथले लोक किती अवघड परिस्थितीत रहातात हे दाखवते. अतिशय थंडीत तिथे तापमान मायनस 35 पर्यंत खाली गेल्यावर हॅंडपंपने पाणी काढणे सुध्दा किती कठीण होते हे सांगितले जाते. तेव्हा आपल्यासारख्य़ा पर्यटकांना काय काय करता येईल याबद्दल ती जागरूकता निर्माण करते. मूळात हे पुस्तक 2012 साली लिहिलेले आहे. त्यामुळे आता ह्या वेगवेगळ्या प्रकारचे काम करणार्‍या संस्थेचे काम या दहा वर्षात खूपच वाढले असेल यात काही शंका नाही. दीनबंधू साहू हे मरिन बायोलॉजिस्ट आहेत पण ते प्रयोगशाळेतून बाहेर पडून समाजासाठी काम करतात. ‘प्रोजेक्ट चिलका’ ह्या त्यांच्या संस्थेमार्फत ओरिसातील लोकांना समुद्राची शेती करायला शिकवतात. ओरिसा मधील पुरी येथे जन्म झालेल्या दीनबंधूनी अतिशय हलाखीच्या परिस्थितीत शिक्षण घेतल्यानंतर दिल्लीत एमएसीला ॲडमिशन घेतली. परंतु योगायोगाने १९८७ मध्ये अंटार्क्टिक वर जाण्याची संधी मिळाली. नंतर पीएचडी पूर्ण केल्यानंतर अनेक देशांमध्ये नोकरी निमित्ताने फिरले. पण तरीही शेवटी दिल्ली युनिव्हर्सिटी मध्ये प्रोफेसर म्हणून काम सुरू केले. त्यांना समुद्री वनस्पती बद्दल विशेष आस्था होती; पण त्या बद्दल आपल्या देशात फारशी जागरूकता नव्हती. ही लागवड पर्यावरण पूरक असते शिवाय त्यातून स्थानिक लोकांना उत्पन्नाचे साधन मिळते. त्यासाठी डिएसटीने निधी मंजूर केला. मग त्यांनी चिल्का सरोवराची पहाणी केली, त्यामध्ये वाढू शकतील अशा चार जातींची निवड करून स्थानिक लोकांना समजेल अशा सोप्या भाषेत माहिती दिली. प्रात्यक्षिके दाखवली, वर्कशॉप्स घेतली. त्यामुळे तेथील शेतकऱ्यांना रोजगार मिळू लागला. यातूनच पर्यावरण संरक्षण ही होऊ लागले. यातून त्यांना प्रत्यक्ष कांहीं आर्थिक फायदा होत नसला तरी ते म्हणतात, की आम्हाला दोघांना दिल्लीत चांगली नोकरी आहे. त्यामुळे पैसे कमावणे हा उद्देश नाही; पण अजून तीस वर्षांनंतर मला मी काही तरी काम केलेले दिसेल. असे जर काहीच तुम्हाला दिसणार नसेल तर जगायचे कशाला? भूषण पुनानी हे असेच अत्यंत बुध्दीमान विद्यार्थी. मेडीकलची ॲडमिशन हुकल्यामुळे डेअरी कोर्ससाठी ॲडमिशन घेतली. तिथे ही विद्यापीठात प्रथम क्रमांक मिळविला. नंतर पीएचडी केले. ग्रामविकास शिकण्यासाठी आयआयएम मध्ये एमबीए केले. हे झाल्यावर 1979 मध्ये ब्लाईंड स्कूल मध्ये दोन वर्षांसाठी नोकरी सुरु केली ती सुधा ह्याच हेतूने की मॅनेजमेंट शिकताना जी थेअरी शिकलो ती विकासाच्या क्षेत्रात वापरता येईल का? हळूहळू त्यांना अनेक लोक मिळत गेले. सर्वांनी मिळून आज संस्था खूप मोठी केली आहे.त्यांनी काम सुरु केले तेव्हा फक्त एक कॅपस होता, आज गुजरात मध्ये आठ कॅपस आहेत. दहा लाख मूल्य असलेली संस्था आज दोन कोटी रुपयांची आहे. अपंग लोकांनी स्वावलंबी व्हावे ह्यासाठी संस्था काम करते. दृष्टीहीन मुली ब्यूटी पार्लरसारखे कोर्स चालवतात, फिजिओथेरपी शिकून सेंटर मध्ये काम करतात. विकास साधण्यासाठी योग्य व्यवस्थापनेची गरज असते हे त्यांनी दाखवून दिले आहे. हजारो लोकांच्या आयुष्यात नवा प्रकाश निर्माण करून त्यांना सामान्य आयुष्य जगण्याची संधी मिळवून दिली आहे. अशी ही एकापेक्षा एक वेगवेगळ्या प्रकारची माणसे. कोणत्या तरी ध्येयाने पछाडलेली . सामाजिक कार्य करत असतानाच त्या लोकांचे कल्याण कसे होईल असा विचार करणारी. लेखिकेने त्या सर्वांच्या प्रत्यक्ष मुलाखती घेतल्या आहेत, त्यांचे काम प्रत्यक्ष पाहून जाणून घेतले आहे. त्यामुळे सर्व माहिती व्यवस्थित गोळा करून आपल्यासमोर मांडली आहे. त्यामुळेच त्या मनोगतात म्हणतात, ‘तुमचं आयुष्य कसे ही असले तरी इतरांसाठी एखादा क्षण द्या. इतरांना प्रेम, आनंद, चांगुलपण द्या. जितकं द्याल तितकं तुम्हाला परत मिळेल.’ हेच वाक्य मलाही अतिशय उर्जा देऊन गेले. माझ्याकडे जे आहे, जे मला देणे शक्य आहे ते निरपेक्षपणे ज्यांना गरज आहे त्याला देणे ह्या सारखा आनंद अजून काय असणार? ह्याच वाक्याने मी आपली ह्या आठवड्यात रजा घेते. उद्या पासून सुरु होणार्‍या नवीन सत्रासाठी सारिका ताईंना हार्दिक शुभेच्छा. ...Read more