* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: THE SPY GAME
  • Availability : Available
  • Translators : UJWALA GOKHALE
  • ISBN : 9788184984385
  • Edition : 2
  • Publishing Year : NOVEMBER 2012
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 236
  • Language : Translated From ENGLISH to MARATHI
  • Category : FICTION
Quantity
Buying Options:
  • Print Books:
ON A FREEZING JANUARY MORNING IN 1961, EIGHT-YEAR-OLD ANNA`S MOTHER DISAPPEARS INTO THE FOG. THAT SAME MORNING, A SPY CASE BREAKS IN THE NEWS. OBSESSED BY STORIES OF ESPIONAGE, ANNA`S BROTHER PETER BEGINS TO CONSTRUCT A THEORY THAT THEIR MOTHER, A REFUGEE FROM EASTERN GERMANY, WAS AN UNDERCOVER SPY AND MIGHT EVEN STILL BE ALIVE
एका गारठलेल्या सकाळी आठ वर्षांच्या अ‍ॅनाची आई घराबाहेर पडते आणि गर्द धुक्यात हरवून जाते.... या घटनेकडे फिरून पाहताना अ‍ॅनाला वाटते की, आपण त्या दिवशी घडलेल्या सगळ्या गोष्टी नीट तपशीलवार लक्षात ठेवायला हव्या होत्या. अ‍ॅनाच्या मनात तिच्या आठवणी रेंगाळू लागतात.... अ‍ॅनाचा मोठा भाऊ पीटर हेरगिरी, शीतयुद्ध काळातल्या घटना, त्यामुळे उडणारा अफवांचा धुरळा व रहस्यमयता यांकडे आकर्षित होतो. तो अ‍ॅनाला म्हणतो की, त्यांना आईचा मृत्यू झालाय असं सांगितलं गेलंय. पण ते खरं असेल कशावरून? ते तर अंत्ययात्रेलाही गेलेले नाहीत. आणि मग तो आईबद्दल एक गोष्ट रचू लागतो – पूर्व जर्मनीतली निर्वासित असलेली त्यांची आई मरण पावली नसून कदाचित ती रहस्यमयरीत्या हेरगिरी करत असावी.... अ‍ॅना तिच्या कल्पनेमध्ये आईच्या आठवणींचे तुकडे जोडत तिची प्रतिमा तयार करू लागते.... तिच्या आईचं आयुष्य गूढ आणि रहस्यांनी भरलेलं होतं का? तिची आई कोण होती? भूतकाळ, आठवणी, कल्पना आणि वास्तव यांचा कौशल्याने विणलेला रहस्यमय गोफ!
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
#MARATHIBOOKS#ONLINEMARATHIBOOKS#TRANSLATEDMARATHIBOOKS#TBC#TRANSLATEDBOOKS@50% #HERGIRICHAPORKHEL #THESPYGAME #हेरगिरीचापोरखेळ #FICTION #TRANSLATEDFROMENGLISHTOMARATHI #BERNARD&MICHAELGRZIMEK #बर्नार्डआणिमिशेलग्रीमेक #GEORGINAHARDING
Customer Reviews
  • Rating StarDAINIK LOKPRABHA 20-05-2016

    चांगल्या हेराचं लक्षण म्हणजे तो ज्यांच्यामध्ये वावरत असतो, तिथल्या सामान्य माणसांना तो कुणी तरी वेगळा वैशिष्ट्यपूर्ण माणूस न वाटता त्यांच्यामधलाच एक वाटतो. त्याच्याबद्दलच्या खऱ्या गोष्टी लोकांपर्यंत कधीच पोहोचत नाहीत. अशा हेरांच्या विविध कथा प्रसिद्धआहेत. हेरगिरीचं विश्व इतकं गूढ आहे, की त्यामुळेच त्याचं बहुतेकांना कमालीचं आकर्षण असतं. जॉर्जिना हार्डिंग यांनी लिहिलेली ‘द स्पाय गेम’ ही कादंबरीही एका हेर स्त्रीच्या कुटुंबावरची, विशेषत: तिच्या मुलांवरची कादंबरी. १९६१ मध्ये लंडनमध्ये कॅरोलीन नावाची एक स्त्री सकाळीसकाळी दाट धुक्यामध्ये गाडी घेऊन बाहेर पडते आणि ती परत येतच नाही. तिच्या लहान मुलांना ती अपघातात मरण पावली एवढंच सांगितलं जातं. हा एवढाच तपशील घेऊन जगणारी अ‍ॅना आणि पीटर ही तिची दोन लहान मुलं नंतर कशी वाढतात, आईच्या नाहीसं होण्याचा आणि ती हेर होती, या कुजबुजीचा त्यांच्यावर नेमका काय परिणाम होतो, आपल्या आईचा इतिहास नेमका काय होता. तिचं नेमकं काय झालं याचा शोध घेण्याची प्रेरणा तिच्या मुलीमध्ये कशी निर्माण होते. या सगळ्याची मांडणी या कादंबरीत करण्यात आली आहे. ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

BACKSTAGE
BACKSTAGE by MONTEK SINGH AHLUWALIA Rating Star
महाराष्ट्र टाईम्स.. ६.९.२०२६

भारताच्या आर्थिक सुधारणांवर अनेक पुस्तके आजवर प्रसिद्ध झाली आहेत. काहींमध्ये आकडेवारीचे जंजाळ असते, काही धोरणांचे विश्लेषण करतात, तर काही विशिष्ट नेत्यांची जाहिरातबाजी करतात. मात्र माँटेकसिंग अहलुवालिया यांचे `बॅकस्टेज : भारताच्या उच्च वाढीच्या र्षांमागची कहाणी` हे पुस्तक या सगळ्यांपेक्षा वेगळे ठरते. कारण हे पुस्तक भारताच्या आर्थिक परिवर्तनाची कथा बाहेरून पाहणाऱ्या अभ्यासकाने नव्हे, तर त्या परिवर्तनाच्या केंद्रस्थानी उभ्या असलेल्या व्यक्तीने सांगितलेली आहे. जी. बी. देशमुख यांनी मूळ इंग्रजी पुस्तकाचा केलेला मराठी अनुवाद सरस उतरला आहे. पुस्तकाच्या सुरुवातीलाच माँटेकसिंग एक गोष्ट स्पष्ट करतात, ती म्हणजे, हे पुस्तक आत्मकथन नाही. आत्मप्रौढी मिरवण्यासाठी नव्हे, तर भारताच्या आर्थिक सुधारणांचा प्रवास समजावून सांगण्यासाठी अहलुवालिया हे पुस्तक लिहितात. विषयाच्या अनुषंगाने पुस्तकात त्यांच्या वैयक्तिक आयुष्यातील संदर्भ येतात, पण ते आर्थिक आणि राजकीय घडामोडी समजावून सांगण्यापुरतेच. सिकंदराबादमधील मध्यमवर्गीय वातावरणातून सुरू झालेला त्यांचा प्रवास दिल्ली स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स, ऑक्सफर्ड, जागतिक बँक, अर्थ मंत्रालय, योजना आयोग आणि अखेर देशाच्या सर्वोच्च आर्थिक धोरणनिर्मितीच्या केंद्रापर्यंत पोहोचतो. हा प्रवास वाचताना स्वतंत्र भारताच्या आर्थिक विचारसरणीचा विकासक्रम उलगडत जातो. पुस्तकाचे केंद्रस्थान अर्थातच १९९१च्या आर्थिक संकटाचे आहे. त्यावेळी देशाकडे काही आठवड्यांच्या आयातीपुरताही डॉलर शिल्लक नव्हता. सोन्याचा साठा गहाण ठेवण्याची वेळ आली होती आणि आर्थिक दिवाळखोरीची शक्यता प्रत्यक्ष समोर उभी होती. अशावेळी सरकारने घेतलेले निर्णय, त्यामागील तणाव, राजकीय अनिश्चितता आणि प्रशासकीय संघर्ष यांचे वर्णन पुस्तकात अत्यंत जिवंतपणे आले आहे. नाणेनिधी किंवा जागतिक बँकेच्या दबावामुळे या सुधारणा झाल्याची धारणा माँटेकसिंग ठामपणे नाकारतात. हे पुस्तक आर्थिक सुधारणांना कोणत्याही प्रकारच्या विचारधारेच्या चष्म्यातून पाहत नाही. लेखक ना मुक्त बाजाराचे अंधसमर्थन करतात, ना राज्यनियंत्रित व्यवस्थेचे. त्यांचा दृष्टिकोन व्यवहारवादी आहे. भारतासारख्या लोकशाही देशात सुधारणा एका झटक्यात होत नाहीत; त्या राजकीय वास्तवाशी जुळवून घेत हळूहळू पुढे सरकतात, हे ते वारंवार. अधोरेखित करतात. पुस्तकात अनेक ठिकाणी `सुधारणा` हा आर्थिक नव्हे, तर राजकीय प्रक्रियेचाही विषय आहे, हे प्रकर्षाने जाणवते. अहलुवालिया या पुस्तकात अनेक व्यक्ती, अधिकारी, अर्थतज्ज्ञ आणि राजकीय नेत्यांच्या योगदानाचा उल्लेख करतात. नरसिंह राव, मनमोहन सिंग, पी. चिदंबरम, यशवंत सिन्हा, जसवंत सिंह यांच्यापासून ते विविध सनदी अधिकाऱ्यांपर्यंत अनेकांची भूमिका ते प्रामाणिकपणे नोंदवतात. योजना आयोगाचे उपाध्यक्ष म्हणून काम करताना अहलुवालिया यांनी जवळून अनुभवलेला काळ येथे उभा राहतो. सन २००४ ते २०११ या काळातील उच्च आर्थिक वाढ, दारिद्रयनिर्मूलनातील प्रगती, पायाभूत सुविधांमध्ये झालेली वाढ आणि ग्रामीण विकासाच्या कार्यक्रमांचे मूल्यमापन ते करतात. विशेषतः भारताने सलग अनेक वर्षे सात ते आठ टक्क्यांच्या दरम्यान वाढ नोंदवली, ती केवळ जागतिक परिस्थितीचा. परिणाम नव्हती; १९९० नंतरच्या सुधारणांनी घातलेल्या पायावर उभे राहून ती शक्य झाली, हा त्यांचा युक्तिवाद पटण्याजोगा वाटतो. मात्र पुस्तकाचे खरे सामर्थ्य यशोगाथेत नाही, तर आत्मपरीक्षणात आहे. यूपीए-२ दरम्यान निर्माण झालेली निर्णयप्रक्रियेतील अडचण, गुंतवणुकीतील वातावरण आणि धोरणात्मक संकोच यावर लेखक मंदी, भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे निर्माण झालेले वातावरण आणि धोरणात्मक संकोच यावर लेखक थेट भाष्य करतात. अनुवादक जी. बी. देशमुख यांनी मूळ पुस्तकातील आर्थिक संकल्पना सहज आणि प्रवाही मराठीत मांडल्या आहेत. यात कृत्रिमता जाणवत नाही. आर्थिक विषयावरील पुस्तक असूनही भाषा जड वाटत नाही. आर्थिक सुधारणांच्या व्यापक सामाजिक परिणामांचा स्वतंत्र आणि सविस्तर ऊहापोह येथे अपेक्षेपेक्षा कमी आढळतो. मात्र, हे पुस्तक ज्या उद्देशाने लिहिले गेले आहे त्या उद्देशात ते अत्यंत यशस्वी ठरते. `बॅकस्टेज` हे केवळ पुस्तक नाही; ते भारताच्या आर्थिक परिवर्तनाचा प्रत्यक्षदर्शी दस्तऐवज आहे. १९९१ नंतर भारताने घेतलेल्या वळणाचा अर्थ समजून घ्यायचा असेल, उच्च वाढीच्या वर्षामागील वास्तविक कथा जाणून घ्यायची असेल आणि धोरणनिर्मितीच्या पडद्यामागे काय घडत असते याचा मागोवा घ्यायचा असेल, तर हे पुस्तक अभ्यासणे आवश्यक ठरते. भारतीय अर्थव्यवस्थेच्या आर्थिक सुधारणांचा इतिहास आणि त्यांचे परिणाम समजून घेण्यासाठी हे पुस्तक एक महत्त्वाचा संदर्भग्रंथ म्हणून ओळखले जाऊ शकते. मराठीत उपलब्ध असलेला हा अनुवाद त्या दृष्टीने विशेष स्वागतार्ह आहे. ...Read more

HACHYUKISUNASKI
HACHYUKISUNASKI by ABA MAHAJAN Rating Star
Dinesh

This is a different planet. This is a different world. And this is a truly different book. I loved it. You should also buy it and read it. I’m sure you will love it too. Hachyukisunaski is a fantastic Book.