* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: HARAWALELYA WATA
  • Availability : Available
  • ISBN : 9788177663358
  • Edition : 4
  • Publishing Year : JULY 1991
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 116
  • Language : MARATHI
  • Category : FICTION
  • Available in Combos :MADHAVI DESAI COMBO 11 BOOKS
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
HUMAN NATURE IS STRANGE INDEED. ONE NEVER LIKES WHAT ONE HAS GOT. THE MIND LUSTS FOR THE UNATTAINABLE. WHILE WALKING ALONG ONE PATH, THE OTHER PATH SEEMS BETTER; AND AMIDST THIS CONFUSION, THE TRUE PATH ELUDES US. MANY COUPLES STRUGGLE TO FIND THE TRUE PATH AS THEY LIVE THEIR LIVES. BUT THOSE WHO HAVE UNDERSTOOD THE MEANING OF LIFE, SUCCEED IN ACHIEVING BALANCE AND EQUANIMITY. ‘HARAVALELYA VATA’ – A NOVEL THAT EXPLORES SUCH SUCCESSFUL LIVES.
माणसाचा स्वभावच विचित्र असतो. त्याला जे मिळालेलं असतं, ते त्याला कधीच आवडत नसतं. आणि जे अप्राप्य, त्याचा हव्यास लागलेला असतो. या वाटेवरून चालावं, तोवर पलीकडची वाट बरी वाटते; आणि या संभ्रमातच खरी वाट हरवून जाते. संसारात अनेक स्त्री-पुरुष अशा हरवलेल्या वाटांवरून चालत असतात. खरी वाट शोधत असतात. ज्यांना जीवनाचा स्पष्ट अर्थ समजलेला असतो, ते मात्र समतोल वृत्तीने वाटचाल करत असतात. अशा जीवनाचं चित्रण करणारी कादंबरी- हरवलेल्या वाटा!

No Records Found
No Records Found
Keywords
#MADHAVIDESAI #NIYATI #HAEVALELYAVATA #MANJIRI #KANCHANGANGA #PRARTHANA #DHUMARE #SAGAR #SHUKRACHANDANI #ASA MHANUNAKOS #KATHASAVALICHI #
Customer Reviews
  • Rating StarDAINIK LOKMAT 17-07-1993

    गुंतागुंतीत ‘हरवलेल्या वाटा’… ‘हरवलेल्या वाटा’ ही माधवी देसाई यांची सामाजिक कादंबरी. प्रख्यात अ‍ॅडव्होकेट विजय-आभा-रेणू आणि डॉ. तेजस्विनी मेहंदळे व डॉ. प्रशांत. ही सारी प्रमुख पात्र. घटस्फोटाच्या कल्पनेनही स्त्री किती व्याकुळ होते, मग भले ती सुशिक्षत किंवा डॉक्टर असो. अगर सामान्य गृहिणी असो. डॉ. प्रशांतने घटस्फोटाची नोटीस पाठवल्याने उद्ध्वस्त झालेली तेजस्विनी निखळत्या संसाराचे दुवे जुळविण्याकरिता अ‍ॅडव्होकेट विजयकडे सल्ला घेण्याकरिता येते आणि तिच्या जीवनाची कहाणी ऐकताना अ‍ॅडव्होकेट विजय तिच्या आयुष्याची तुलना स्वत:च्या आयुष्याशी करू लागतात. आणि आजवर बुद्धिमान सहकारी म्हणून जिला सर्वांर्थान आपलं मानलं त्या अ‍ॅड. आभाच अस्तित्व नेमकं काय हा प्रश्न विजयला सतावतो. त्याहीपेक्षा त्रासदायक वाटतं ते त्यांच रेणूशी आपल्या बायकोशी वागणं, तिचा तिरस्कार... तिचा मानसिक छळा आणि तिच्या सोशिकतेचा अंत पाहणारा त्यांचा तिच्या चारित्र्यावरचा आरोप !... रेणूचं दूर निघून जाणं आणि तेजस्विनीच्या मोडकळीला आलेल्या संसारातून विजयला रेणूची आठवण तीव्रतेनं होणं... आणि त्यांनी रेणुकडे जाणं... पण त्या वाटेवर रेणू आहे का ?... का ती वाट कधीच हरवलीय ? ह्या प्रश्नचिन्हासहितचा शेवट असलेली ही कादंबरी फारशी पकड घेणारी नसली, तरी माधवी देसार्इंनी अलंकारिक शब्दांची पुनरावृत्ती टाळल्याने वाचताना ‘कंटाळवाणे’ होत नाही हेच या कादंबरीचे वैशिष्ट्य. यातली सारी पात्र ओढून ताणून आणल्यागत वाटत असल्याने भाववृत्तीचा परिपोष इथं नाही. ‘कथेसाठी कथा’ या पार्श्वभूमीवर एकत्र आणलेली पात्रं ठाव घेऊ शकत नाही. मात्र कोकण परिसराचं वर्णन, कोकणातला समुद्र आणि मुंबापुरीच्या समुद्राची प्रसंगानुरूप आलेली तुलनात्मक वर्णनं सुरेख तर आहेतच पण त्यातून माणसाच्या प्रवृत्तीचा वेध घेण्याचा प्रयत्न देखील चांगला साधला आहे. ‘नाच ग घुमा’ नंतरची ही स्वतंत्र सामाजिक कादंबरी. या कादंबरीचं कथानक जरी चांगलं असलं तरी पात्राच्या अवास्तव गुंतागुंतीत खरी वाट हरवली आहे असच वाटायला लागतं. प्रत्येक पात्राच्या आयुष्याचा आलेख पहाता त्यांची खरी वाअ हरवलेली आहे या अर्थाने शीर्षकाची समर्पकता पटते. चंद्रमोहन कुलकर्णीचं मुखपृष्ठ कल्पक आहे. ढोबळ दोष वगळता कादंबरी वाचनीय आहे. ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

RADHEYA
RADHEYA by RANJEET DESAI Rating Star
विश्वजीत श्रीपती शिंत्रे.

राधेय.... लेखक रणजित देसाई... मित्र कसा असावा...कर्णासारखा दातृत्व कसं असावं...कर्णासारखं असा हा कर्ण... त्याला अंगराज म्हणावं, दान देणारा दाता म्हणावं, राधेय म्हणावं कि कौतेय... काहीही म्हणा पण कर्णासारखा दाता कर्णानंतर कधी झाला नाही आणि कधी होणरही नाही... रणजित देसाई लिखीत कर्णचरीत्र राधेय आज हातावेगळं झालं ते अश्रुभरल्या नयनांनी...ज्याचा अंत करायला स्वतः देवाधिदेव कृष्णाला अर्जुनाचं सारथ्य करावं लागलं यातच अंगराज कर्णांचं विरत्व अधोरेखीत होत आहे. जन्मापासुन ज्याला केवळ सुतपुत्र म्हणुन वागणुक मिळाली असा तो कर्ण स्वतःच्या बळावर इतका महान लढवय्या बनला. पुस्तकाच्या प्रास्ताविकात देसाईंनी म्हटलं आहे की राधेय मधला कर्ण महाभारतात शोधायची गरज नाही. प्रत्येकाच्या मनातच तो दडलेला असतो, कदाचित आपल्या मनाची चार पाने उलटलीत, तर त्यात हा कर्ण दिसेल. त्याचं दु:खं, पोरकेपण आणि त्यातून पार होवून एक अनोखी ऊंची गाठणारं त्याचं दातृत्व, व्यक्तित्व याचं एक भव्य, शोकात्म चित्र राधेय मधून उभं राहतं. राधेय या कादंबरीत रणजित देसाईंच्या शब्दांनी कर्णाची अनेक रुपे अनुभवता आली. त्यामध्ये राधाई आणि वृषाली सोबतचा कर्ण, दुर्यौधनासोबतचा कर्ण, कृष्णासोबतचा कर्ण, रणांगणावरचा कर्ण आणि नदीकाठी पाठमोरा ऊभा राहत दान करत असलेला कर्ण अशा अनेक रुपांनी प्रत्येकवेळी वेगळा भासला. वृषसेन आणि चक्रधराच्या मृत्युने हळवा झालेला कर्णही वाचकाच्या डोळ्यातही पाणी आणवतो... समोर मृत्यु दिसत असताना सुध्दा केवळ दिलेल्या वचनामुळे हातातील धनुष्याचा त्याग करुन शस्त्रहिन हेणारा कर्ण रणजित देसाईंच्या शब्दांमुळे आजन्म लक्षात राहील. कर्णासारखं होणं कुणालाही कदापि शक्य नाही पण त्यातला एखादा जरी चांगला गुण अंगी बाळगण्याचा प्रयत्न प्रत्येकाने नक्कीच केला पाहीजे... प्रत्येकाच्या संग्रही असावं आणि एकदा तरी वाचावं असं पुस्तक रणजित देसाई लिखीत...राधेय... © विश्वजित शिंत्रे. ...Read more

BAJIND
BAJIND by PAHILWAN GANESH MANUGADE Rating Star
विश्वजीत श्रीपती शिंत्रे.

काही पुस्तकं अशी असतात कि कितीही वेळा वाचली तरीही त्या पुस्तकाचा कंटाळा येत नाही. पुन्हा पुन्हा वाचावं असं वाटतं आणि त्याची पारायणं होतचं राहतात. असचं एक पुस्तक म्हणजे *पै.गणेश मानुगडे* लिखीत *बाजिंद.* *बाजिंद* हे एक असं रसायन आहे जे प्रत्ेकाला अक्षरशः वेड लावतं. साधारण चार पाच वर्षांपुर्वी पहील्यांदा वाचलं होतं, त्यानंतर बर्‍याचवेळा आणि आज पुन्हा एकदा. त्याबद्दलची एक सुंदर आठवण म्हणजे माझ्या बहिणीच्या गरोदरपणाच्या दिवसात ग्रहण लागलं होतं आणि त्या ग्रहणकाळात तिला मी *बाजिंद* वाचुन दाखवलं होतं, असं हे पुस्तक. कुस्ती, प्रेमकथा, हेरगिरी, गुढ रहस्यमय बाजिंदचं जंगल, पशु-पक्षी व हिंस्र जनावरांची भाषा, बहीर्जी नाईक आणि अवघ्या हिंदुस्थानाचे आणि मराठी मनाचे आराध्यदैवत *श्रीमंतयोगी छत्रपती शिवाजी महाराज* असा या पुस्तकाचा प्रवास. शेवटाला अंगावर काटा आला कि समजावं आपण या पुस्तकाच्या प्रेमात पडलोय. रायगडच्या डोंगरदरीत वसलेल्या धनगरवाडीचा सखाराम धनगर आणि त्याच्यासोबत मल्हारी, सर्जा आणि नारायण निघालेत छत्रपती शिवरायांना भेटायला. कारण टकमक टोकावरुन ज्या गद्दारांचा कडेलोट व्हायचा ती प्रेतं येऊन पडायची ती थेट धनगरवाडीच्या आसपासच्या जंगलात आणि त्यामुळे आसपासच्या परीसरात जंगली जनावरांचा सुळसुळाट खुप वाढला होता. त्यांची मेजवानी व्हायची पण जर कधी कडेलोट नसायचा तेव्हा ती हिंस्त्र जनावरं आसपासच्या लोकवस्तीत शिरायची. हिच कैफियत मांडायला सखाराम धनगर आणि इतर मंडळी रायगडी निघतात. त्यानंतरचा त्यांचा प्रवास आणि कथा वाचकाला इतकी गुरफटवुन टाकते कि शेवटच्या पानावरची शेवटची ओळ कधी वाचुन संपते, कळतही नाही. त्यांची स्वराज्यहेर खंडोजीची भेट मग सावित्री, वस्तादकाका, वाचतानाही भितीदायक दिसणारं जंगल, कधीही न पाहीलेलं महादेवाचं मंदीर, खंडोजीचा असणारा ट्विस्ट आणि मग बहिर्जी नाईक आणि मग थेट रायगड आणि महाराज, सगळं प्रत्यक्षात आपल्यासमोर घडतयं कि असा भास निर्माण करणारं असं हे पुस्तक. एखाद्या चित्रपटालाही लाजवेल अशी कथा, एकदा वाचली कि पुन्हा एकदा वाचण्याचा मोह आवरता येत नाही अशी कथा, ज्यामध्ये असं बरचं काही जे वाचल्याशिवाय कळणार नाही. अजुन एक असं कि सातासमुद्रापार जगातील अव्वल गणली जाणारी इस्त्राईलची गुप्तहेर संघटना मोसाद यांच्या अभ्यासक्रमात बहिर्जी नाईक आणि आपलं हेरखातं शिकवलं जातं अशी अभिमान वाटणारी घटना आपल्या राज्यात घडलीय त्याचीच हि गोष्ट...बाजिंद... ...इकडे खंडोजीने सावित्रीला उचलुन जंगलातुन बरेच बाहेर आणले होते. पुढे डोंगराची कडेतुट होती आणि हजारो हात खोल फेसाळणार्‍या नदीचे विशाल पात्र...खंडोजीने एकदा मागे पाहीले आणि ताडले कि शिर्क्यांची फौज पाठलाग करत आहे...त्याने कशाचाही विचार न करता सावित्रीसह स्वतःला त्या कडेतुट वरुन त्या विशाल नदीच्या पात्रात झोकुन दिले...आणि... त्यासाठी वाचा *पै.गणेश मानुगडे* लिखीत...*बाजिंद..!!!* © विश्वजीत श्रीपती शिंत्रे. मु.पो.इंचनाळ, ता.गडहिंग्लज,जि.कोल्हापुर ०९९२२३१३९१९ ...Read more