* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
HUMAN NATURE IS STRANGE INDEED. ONE NEVER LIKES WHAT ONE HAS GOT. THE MIND LUSTS FOR THE UNATTAINABLE. WHILE WALKING ALONG ONE PATH, THE OTHER PATH SEEMS BETTER; AND AMIDST THIS CONFUSION, THE TRUE PATH ELUDES US. MANY COUPLES STRUGGLE TO FIND THE TRUE PATH AS THEY LIVE THEIR LIVES. BUT THOSE WHO HAVE UNDERSTOOD THE MEANING OF LIFE, SUCCEED IN ACHIEVING BALANCE AND EQUANIMITY. ‘HARAVALELYA VATA’ – A NOVEL THAT EXPLORES SUCH SUCCESSFUL LIVES.
माणसाचा स्वभावच विचित्र असतो. त्याला जे मिळालेलं असतं, ते त्याला कधीच आवडत नसतं. आणि जे अप्राप्य, त्याचा हव्यास लागलेला असतो. या वाटेवरून चालावं, तोवर पलीकडची वाट बरी वाटते; आणि या संभ्रमातच खरी वाट हरवून जाते. संसारात अनेक स्त्री-पुरुष अशा हरवलेल्या वाटांवरून चालत असतात. खरी वाट शोधत असतात. ज्यांना जीवनाचा स्पष्ट अर्थ समजलेला असतो, ते मात्र समतोल वृत्तीने वाटचाल करत असतात. अशा जीवनाचं चित्रण करणारी कादंबरी- हरवलेल्या वाटा!

No Records Found
No Records Found
Keywords
#MADHAVIDESAI #NIYATI #HAEVALELYAVATA #MANJIRI #KANCHANGANGA #PRARTHANA #DHUMARE #SAGAR #SHUKRACHANDANI #ASA MHANUNAKOS #KATHASAVALICHI #
Customer Reviews
  • Rating StarDAINIK LOKMAT 17-07-1993

    गुंतागुंतीत ‘हरवलेल्या वाटा’… ‘हरवलेल्या वाटा’ ही माधवी देसाई यांची सामाजिक कादंबरी. प्रख्यात अ‍ॅडव्होकेट विजय-आभा-रेणू आणि डॉ. तेजस्विनी मेहंदळे व डॉ. प्रशांत. ही सारी प्रमुख पात्र. घटस्फोटाच्या कल्पनेनही स्त्री किती व्याकुळ होते, मग भले ती सुशिक्षत किंवा डॉक्टर असो. अगर सामान्य गृहिणी असो. डॉ. प्रशांतने घटस्फोटाची नोटीस पाठवल्याने उद्ध्वस्त झालेली तेजस्विनी निखळत्या संसाराचे दुवे जुळविण्याकरिता अ‍ॅडव्होकेट विजयकडे सल्ला घेण्याकरिता येते आणि तिच्या जीवनाची कहाणी ऐकताना अ‍ॅडव्होकेट विजय तिच्या आयुष्याची तुलना स्वत:च्या आयुष्याशी करू लागतात. आणि आजवर बुद्धिमान सहकारी म्हणून जिला सर्वांर्थान आपलं मानलं त्या अ‍ॅड. आभाच अस्तित्व नेमकं काय हा प्रश्न विजयला सतावतो. त्याहीपेक्षा त्रासदायक वाटतं ते त्यांच रेणूशी आपल्या बायकोशी वागणं, तिचा तिरस्कार... तिचा मानसिक छळा आणि तिच्या सोशिकतेचा अंत पाहणारा त्यांचा तिच्या चारित्र्यावरचा आरोप !... रेणूचं दूर निघून जाणं आणि तेजस्विनीच्या मोडकळीला आलेल्या संसारातून विजयला रेणूची आठवण तीव्रतेनं होणं... आणि त्यांनी रेणुकडे जाणं... पण त्या वाटेवर रेणू आहे का ?... का ती वाट कधीच हरवलीय ? ह्या प्रश्नचिन्हासहितचा शेवट असलेली ही कादंबरी फारशी पकड घेणारी नसली, तरी माधवी देसार्इंनी अलंकारिक शब्दांची पुनरावृत्ती टाळल्याने वाचताना ‘कंटाळवाणे’ होत नाही हेच या कादंबरीचे वैशिष्ट्य. यातली सारी पात्र ओढून ताणून आणल्यागत वाटत असल्याने भाववृत्तीचा परिपोष इथं नाही. ‘कथेसाठी कथा’ या पार्श्वभूमीवर एकत्र आणलेली पात्रं ठाव घेऊ शकत नाही. मात्र कोकण परिसराचं वर्णन, कोकणातला समुद्र आणि मुंबापुरीच्या समुद्राची प्रसंगानुरूप आलेली तुलनात्मक वर्णनं सुरेख तर आहेतच पण त्यातून माणसाच्या प्रवृत्तीचा वेध घेण्याचा प्रयत्न देखील चांगला साधला आहे. ‘नाच ग घुमा’ नंतरची ही स्वतंत्र सामाजिक कादंबरी. या कादंबरीचं कथानक जरी चांगलं असलं तरी पात्राच्या अवास्तव गुंतागुंतीत खरी वाट हरवली आहे असच वाटायला लागतं. प्रत्येक पात्राच्या आयुष्याचा आलेख पहाता त्यांची खरी वाअ हरवलेली आहे या अर्थाने शीर्षकाची समर्पकता पटते. चंद्रमोहन कुलकर्णीचं मुखपृष्ठ कल्पक आहे. ढोबळ दोष वगळता कादंबरी वाचनीय आहे. ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

RUCHIRA BHAG -1
RUCHIRA BHAG -1 by KAMALABAI OGALE Rating Star
संजीव_वेलणकर

*आज २० एप्रिल* *आज दोन लाख सुनांची एकच आई हे नाव कमवणाऱ्या #कमलाबाई_ओगले यांचा स्मृतिदिन.* जन्म. १६ सप्टेंबर १९१३ सांगली जिल्ह्यातील कुंडल येथे. कमलाबाई ओगले या माहेरच्या गोदूताई अनंत दांडेकर. त्याचा विवाह सांगलीतील कृष्णाजी ओगले यांच्याशी झाला. कमलााई ओगले यांच्या पाककला कृतींवरच्या ‘ रुचिरा‘ हे पुस्तक १९७० च्या सुमारास आले. कुठलाही प्रकाशक, या नाव नसलेल्या कमलाबाई ओगले यांचे हे पुस्तक स्विकारावयास तयार होईना काही प्रकाशकांनी तर बाईंकडेच प्रकाशनासाठी पैसे मागितले. पण या पुस्तकाच्या गुणवत्तेवर आणि उपयुक्ततेवर १०० % विश्वास असणार्‍या ओगल्यांनी धीर न सोडता त्यांचे आणि मुकुंदराव किर्लोस्करांचे स्नेही श्री. भिडे यांच्या मार्फत मुकुंदराव किर्लोस्कर यांना गाठले आणि पुस्तक प्रकाशनाचा प्रस्ताव ठेवला. वृत्तीने पूर्णत: व्यावसायिक असणार्‍या मुकुंदरावांनी फायदा होणार नाही म्हणून हे पुस्तक स्वीकारण्यास नकारच दिला होता पण भिडे यांनी पटवल्यावर आणि तोटा झालाच तर तो सोसण्याची तयारी ओगल्यांनी दाखवल्यावर मुकुंदराव तयार झाले . किर्लोस्कर समूहाने ‘ स्त्री सखी प्रकाशन ‘ या संस्थेची मुहूर्तमेढ रोवली आणि पहिलेच पुस्तक म्हणून ‘ रुचिरा ‘ चे प्रकाशन केले. या पुस्तकामुळे कमलाबाई ओगले या सर्वच स्तरांत अतिशय लोकप्रिय झाल्या. त्यांना परीक्षक म्हणून पूर्वीपेक्षा जास्त बोलावणी येऊ लागली. केंद्रीय मंत्री शंकरराव चव्हाण, आबासाहेब खेबुडकर — कुलकर्णी, दुर्गाबाई भागवत, शांता शेळके, मोहिनी निमकर,अशा अनेक नामवंतांच्या हस्ते त्यांचे कित्येक सत्कार झाले. मुंबईच्या एस.एन.डी.टी. विद्यापीठात त्यांनी वर्ग घेतले. रुचिरा - भाग १ ने अभूतपूर्व यश मिळवले. वास्तविक रुचिराचे जे हस्तलिखित प्रथम तयार केले होते त्यात १०५० पदार्थकृतींचा समावेश होता. परंतु पुस्तक फार मोठे होईल व किंमतीलाही भारी होईल म्हणून त्यातले ३५० पदार्थ कमी करून रुचिरा प्रसिद्ध केले. या बाजूला काढलेल्या ३५० पदार्थांमध्ये अजून काही नवीन पदार्थांची भर घालून रुचिरा - भाग २, सन १९८५ मध्ये प्रसिद्ध केला आहे. कमलाबाई आपल्या मुलांकडे ऑस्ट्रेलियाला गेल्या असताना तेथेही ह्यांना नवनवीन पदार्थांचे प्रयोग केले. ऑस्ट्रेलियन सुगरणींकडून तेथील पदार्थांची माहिती करून घेतली व त्या पदार्थांना भारतीय चव देऊन रुचिराच्या पद्धतीनुसार वाटी चमच्याच्या प्रमाणात तयार केले. त्यामुळे रुचिरा - भाग २ मध्ये अनेक नाविन्यपूर्ण पदार्थांची रेलचेल आहे. स्वीडीश ऍपल पुडींग, स्वीस फिंगर्स, मटी ब्रिझल्स, ब्लॅक फॉरेस्ट केक, चीज मिरची भात, शानसाक, हुसेनी कबाब करी, ब्राऊन स्ट्यू अशा नावांनीच तोंडाला पाणी सुटावे. ऑस्ट्रेलियात तर त्यांना तीनदा बोलावणी आली. या दोन्ही खंडांत त्यांनी तेथल्या भारतीय आणि स्थानिक स्त्रियांना विविध पदार्थांची प्रात्यक्षिके दाखवली. ऑस्ट्रेलियात शिरा करतांना तूप उपलब्ध नव्हते, तर त्यांनी चक्क तेलावर शिरा करून दाखवला! तोही तितकाच स्वादिष्ट झाला होता. या पुस्तकात महाराष्ट्रीय पदार्थांप्रमाणेच काही तमिळी, पंजाबी, गुजराती आणि बंगाली पाककृतींचा समावेश केला आहे. त्याचप्रमाणे हे पुस्तक मराठी भाषेचे कुंपण ओलांडून कानडी भाषेतही गेले. विद्यामूर्ती सत्यनारायण यांनी भाषांतर केलेल्या कानडी पुस्तकाचे भाग्य मराठी पुस्तकाप्रमाणेच बलवत्तर आहे. या पुस्तकाची हिन्दी, इंग्लिश आणि गुजराती भाषांतही भाषांतरे झाली आहेत. ‘फास्ट फूड ‘ पद्धतीच्या पाक कृती असलेल्या या ‘ रुचिरा ‘ चा दुसरा भागही प्रसिद्ध झाला. एखाद्या लोकप्रिय गाण्याप्रमाणे हे पुस्तक घराघरांत पोचले. हे पुस्तक पुढच्या पिढींतील मुलींना / सुनांना ही आपले पुस्तक वाटते. दोन लाख प्रतींचा खप गाठल्यावर ‘ दोन लाख सुनांची एकच आई ‘अशी caption या पुस्तकाच्या blurb वर दिली गेली होती; ती नि:संशय समर्पक होती. या Blurb ला प्रा. मं. वि. राजाध्यक्षांनी ‘ वेष्टण लेख ‘ असा प्रतिशब्द सुचवला होता.. कमलाबाई ओगले यांचे २० एप्रिल १९९९ रोजी निधन झाले. आपल्या समुहा तर्फे कमलाबाई ओगले यांना आदरांजली. ...Read more