* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Availability : Available
  • ISBN : 9788177663358
  • Edition : 4
  • Publishing Year : JULY 1991
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 116
  • Language : MARATHI
  • Category : FICTION
  • Available in Combos :MADHAVI DESAI COMBO 11 BOOKS
  • Discount : WORLD BOOK DAY OFFER 23 APRIL(Login to get best discount offers.)
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
HUMAN NATURE IS STRANGE INDEED. ONE NEVER LIKES WHAT ONE HAS GOT. THE MIND LUSTS FOR THE UNATTAINABLE. WHILE WALKING ALONG ONE PATH, THE OTHER PATH SEEMS BETTER; AND AMIDST THIS CONFUSION, THE TRUE PATH ELUDES US. MANY COUPLES STRUGGLE TO FIND THE TRUE PATH AS THEY LIVE THEIR LIVES. BUT THOSE WHO HAVE UNDERSTOOD THE MEANING OF LIFE, SUCCEED IN ACHIEVING BALANCE AND EQUANIMITY. ‘HARAVALELYA VATA’ – A NOVEL THAT EXPLORES SUCH SUCCESSFUL LIVES.
माणसाचा स्वभावच विचित्र असतो. त्याला जे मिळालेलं असतं, ते त्याला कधीच आवडत नसतं. आणि जे अप्राप्य, त्याचा हव्यास लागलेला असतो. या वाटेवरून चालावं, तोवर पलीकडची वाट बरी वाटते; आणि या संभ्रमातच खरी वाट हरवून जाते. संसारात अनेक स्त्री-पुरुष अशा हरवलेल्या वाटांवरून चालत असतात. खरी वाट शोधत असतात. ज्यांना जीवनाचा स्पष्ट अर्थ समजलेला असतो, ते मात्र समतोल वृत्तीने वाटचाल करत असतात. अशा जीवनाचं चित्रण करणारी कादंबरी- हरवलेल्या वाटा!

No Records Found
No Records Found
Keywords
#MADHAVIDESAI #NIYATI #HAEVALELYAVATA #MANJIRI #KANCHANGANGA #PRARTHANA #DHUMARE #SAGAR #SHUKRACHANDANI #ASA MHANUNAKOS #KATHASAVALICHI #
Customer Reviews
  • Rating StarDAINIK LOKMAT 17-07-1993

    गुंतागुंतीत ‘हरवलेल्या वाटा’… ‘हरवलेल्या वाटा’ ही माधवी देसाई यांची सामाजिक कादंबरी. प्रख्यात अ‍ॅडव्होकेट विजय-आभा-रेणू आणि डॉ. तेजस्विनी मेहंदळे व डॉ. प्रशांत. ही सारी प्रमुख पात्र. घटस्फोटाच्या कल्पनेनही स्त्री किती व्याकुळ होते, मग भले ती सुशिक्षत किंवा डॉक्टर असो. अगर सामान्य गृहिणी असो. डॉ. प्रशांतने घटस्फोटाची नोटीस पाठवल्याने उद्ध्वस्त झालेली तेजस्विनी निखळत्या संसाराचे दुवे जुळविण्याकरिता अ‍ॅडव्होकेट विजयकडे सल्ला घेण्याकरिता येते आणि तिच्या जीवनाची कहाणी ऐकताना अ‍ॅडव्होकेट विजय तिच्या आयुष्याची तुलना स्वत:च्या आयुष्याशी करू लागतात. आणि आजवर बुद्धिमान सहकारी म्हणून जिला सर्वांर्थान आपलं मानलं त्या अ‍ॅड. आभाच अस्तित्व नेमकं काय हा प्रश्न विजयला सतावतो. त्याहीपेक्षा त्रासदायक वाटतं ते त्यांच रेणूशी आपल्या बायकोशी वागणं, तिचा तिरस्कार... तिचा मानसिक छळा आणि तिच्या सोशिकतेचा अंत पाहणारा त्यांचा तिच्या चारित्र्यावरचा आरोप !... रेणूचं दूर निघून जाणं आणि तेजस्विनीच्या मोडकळीला आलेल्या संसारातून विजयला रेणूची आठवण तीव्रतेनं होणं... आणि त्यांनी रेणुकडे जाणं... पण त्या वाटेवर रेणू आहे का ?... का ती वाट कधीच हरवलीय ? ह्या प्रश्नचिन्हासहितचा शेवट असलेली ही कादंबरी फारशी पकड घेणारी नसली, तरी माधवी देसार्इंनी अलंकारिक शब्दांची पुनरावृत्ती टाळल्याने वाचताना ‘कंटाळवाणे’ होत नाही हेच या कादंबरीचे वैशिष्ट्य. यातली सारी पात्र ओढून ताणून आणल्यागत वाटत असल्याने भाववृत्तीचा परिपोष इथं नाही. ‘कथेसाठी कथा’ या पार्श्वभूमीवर एकत्र आणलेली पात्रं ठाव घेऊ शकत नाही. मात्र कोकण परिसराचं वर्णन, कोकणातला समुद्र आणि मुंबापुरीच्या समुद्राची प्रसंगानुरूप आलेली तुलनात्मक वर्णनं सुरेख तर आहेतच पण त्यातून माणसाच्या प्रवृत्तीचा वेध घेण्याचा प्रयत्न देखील चांगला साधला आहे. ‘नाच ग घुमा’ नंतरची ही स्वतंत्र सामाजिक कादंबरी. या कादंबरीचं कथानक जरी चांगलं असलं तरी पात्राच्या अवास्तव गुंतागुंतीत खरी वाट हरवली आहे असच वाटायला लागतं. प्रत्येक पात्राच्या आयुष्याचा आलेख पहाता त्यांची खरी वाअ हरवलेली आहे या अर्थाने शीर्षकाची समर्पकता पटते. चंद्रमोहन कुलकर्णीचं मुखपृष्ठ कल्पक आहे. ढोबळ दोष वगळता कादंबरी वाचनीय आहे. ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

वा. पां. जाधव अमरावती

`अमरावतीचे छप्पन स्वभाव एक मनोरंजक काव्यसंग्रह` `अमरावतीचे छप्पन स्वभाव` हे अमरावतीचे सुप्रसिद्ध साहित्यिक श्री जी. बी. देशमुख यांचे अमरावती नगरीचा सहज स्वभाव व ह्या नगरीच्या वेगळ्या ओळखीवर आधारित मनोरंजक पुस्तक वाचले. वाचून भरपूर मनोरंजन झाले. खर काय लिहावे या लेखकाबद्दल, मन गोंधळले. ऐतिहासिक असो, प्रवास वर्णन असो, व्यक्ती विशेष असो, अनुभवात्मक घटना घडामोडी असो कशावरही सहज लिखाण करणारा हा लेखक आहे. आता तर त्यांनी लेखनाला विनोद प्रचुर फोडणी देऊन `अमरावतीचे छप्पन स्वभाव` या काव्यसंग्रहातून अमरावतीकरांना मनोरंजनाची मेजवानीच दिली आहे. प्रत्येक शहराची व त्या शहरातील वैशिष्ट्यांची एक वेगळीच ओळख असते. दिवस जातात, काळ लोटतो, पिढ्या बदलतात मात्र जुन्या स्मृतीची चिन्हे नवीन येणाऱ्या पिढीच्या मनात गुढ निर्माण करत कायम हाक देत राहतात. अमरावतीही त्याला अपवाद नाही. बापट चौकात चौक नाही, त्या जागेवर चौरस्ता नसून टी-पॉइंट आहे, खापर्डे बगीचा म्हणून आजही ओळख आहे मात्र तेथे बगिचा नाही किंवा प्रसिद्ध गांधी चौकात गांधीचा पुतळा अथवा स्मृतीदर्शक चिन्ह अथवा उल्लेख नाही मात्र गांधी चौक अशीच ओळख जनमानसात आहे. अशा एक ना अनेक विसंगत नाम दर्शक ओळख असलेली उदाहरणे त्यात सप्रमाण आहेत. पण खरी गंमत म्हणजे कधी काळी घडलेला इतिहास त्यामध्ये दडलेला आहे हे निश्चित. या सोबतच अमरावतीकरांच्या स्वभावातला स्थायी मजेदारपणाच्या एक एका हटके गुण वैशिष्ट्याच्या गमती लेखकाने हुबेहूब अधोरेखित केलेल्या आहेत. आणि त्यावरुन तत्सम रचनांचा उहापोह लेखकाने पुस्तकात केला असावा. विदेशात स्थाईक झालेल्या मूळ अमरावतीकरांना लेखकाने लिहिलेल्या गमती मनोरंजनात्मक वाटाव्या एवढी किमया जी.बी. च्या सहज लेखनाने दाखवली आहे. अमरावतीचे अग्रगण्य वृत्तपत्र दै. हिंदुस्थान मध्ये लेखकाने सतत ६ महीणे लिहीलेल्या काव्य सदरात अमरावतीच्या जनमानसाच्या हृदयाच्या ठाव घेणाऱ्या काव्य रचनांचा आठवणींनी महापूर ओसंडून गेला होता. विशेष म्हणजे ह्यात कुठेही अनावश्यक अभिनीवेष नव्हता. उलट गमतीत केलेले आत्मपरिक्षण मात्र काही प्रमाणात होते. वयस्क अमरावतीकर रसिकांना या रचना ताज्या करून त्यांच्या तारुण्यात घेऊन गेल्या हेच खरे. जी बी देशमुख या लेखकास मिळालेल्या सकारात्मक प्रतिक्रियां वरून दिसून येते. . सदर पुस्तकातील काव्यमय रचना वाचतांना अमरावतीच्या माणसाच्या वऱ्हाडभोळ्या स्वभावाची प्रचीती येते आणि वेगळाच आनंद देऊन जाते. निखळ मनोरंजन करत गुदगुल्या करणारा असा हा काव्यसंग्रह आहे. अमरावती शहराची ऐतिहासिक वैशिष्टे काव्यरूपात वाचण्याचा आनंद अमरावतीकरांना ते जिथं असतील त्या गावात, परगावात, परदेशात पुस्तक मागवून घेता येईल. ...Read more

ज्योती चेडे, मुंबई.

अमरावतीच्या वैशिष्ट्यांवर आधारीत खुमासदार छप्पन्न कवितांच्या संग्रहातील प्रत्येक कविता वाचत असताना अमरावतीच्या वातावरणाची धुंदी आपसुकच मनावर चढु लागली. सगळ्याच कविता सुंदर आहेत. एकेक कविता अमरावतीचे अप्रतिम वर्णन करते. प्रत्येक कवितेचा शेवट कुठेतरी गंभीर विचार करायला भाग पाडतो आणि मन गलबलून जाते. सगळ्याच कविता सुंदर आहेत पण माझ्या मनाला भावलेल्या व भिडलेल्या कविता आहेत `अमरावतीतल्या गमती`, `अमरावतीचे शिक्षण`, `अमरावतीचे हजरजबाबी`, `अमरावतीचे वेडे`, `अमरावतीच्या काकू` व बाकी सगळ्या. `अमरावतीचे वेडे` या कवितेत उल्लेखीत शेवटचा अश्रुंचा एक थेंब जरुर राखला जाईल. तसेच `अमरावतीच्या काकूं` ची उर्जा उरात भरून उरेल. जीवन देणाऱ्या विहीरीने कोणाचेही जीवन घेऊ नये, अशी सद्भावना मनात जागेल. अमरावतीकर जगात कुठेही असो त्यांच्या मनात एका कोपऱ्यात राजकमल चौक असतोच हे सत्य मनावर कोरले जाईल. प्रत्येक अमरावतीकराने ह्या कविता जगाव्यात. त्यासाठी हे पुस्तक संग्रही ठेवावे आणि परगावी राहणाऱ्या आपल्या अमरावतीकर आप्तेष्टांना भेटी दाखल द्याव्या. ...Read more