MADHAVI DESAI

About Author

Birth Date : 21/07/1933
Death Date : 15/07/2013


MADHAVI DESAI WAS BORN IN KOLHAPUR, BUT SPENT MOST OF HER LIFE IN GOA. PRODUCER OF MARATHI FILMS AND DADASAHEB PHALKE AWARD WINNER KAI. BHALJI PENDHARKAR IS HIS FATHER. MADHAVITAR GOT THE HERITAGE OF ART AND LITERATURE FROM THE FAMILY ITSELF.

माधवी देसाई यांचा जन्म कोल्हापूरमध्ये झाला, पण त्यांनी आपल्या आयुष्याचा बराच काळ गोव्यामध्येच व्यतीत केला. मराठी चित्रपटांचे निर्माते आणि दादासाहेब फाळके पुरस्कार विजेते कै. भालजी पेंढारकर हे त्यांचे वडील. माधवीतार्इंना कलेचा, साहित्याचा वारसा घराण्याकडूनच मिळाला. माधवीतार्इंनी जवळ-जवळ १६ वर्षे शिक्षणक्षेत्रात काम केले. नंतर त्या गोव्यामध्ये वास्तव्यास गेल्या. त्या २५ वर्षे तेथे राहिल्या. आपल्या साहित्यिक कारकिर्दीचा प्रारंभही त्यांनी तेथेच केला. अखिल गोवा साहित्य संमेलनाची स्थापनाही त्यांनी केली. त्यांनी जवळ-जवळ ३८ पुस्तके लिहिली. नाच ग घुमा या त्यांच्या आत्मचरित्राला यशो दामिनी हा साहित्य पुरस्कारही मिळाला. प्रतारणा व सीमारेषा या त्यांच्या पुस्तकांना कला अ‍ॅकॅडमी साहित्य पुरस्कार प्राप्त झाला आहे. देवराई, जगावेगळी, नियती, कांचनगंगा, मंजिरी, प्रार्थना, हरवलेल्या वाटा, स्वयंसिद्धा आम्ही, शाल्मली, आवतन या त्यांच्या कादंबऱ्याही खूप गाजल्या. असं म्हणू नकोस, कथा सावलीची, सागर, किनारा, शुक्रचांदणी हे कथासंग्रहही प्रसिद्ध आहेत. त्यांनी घे भरारी या चित्रपटासाठी पटकथा व संवाद लेखनही केले. या चित्रपटाला अल्फा गौरव अ‍ॅवॉर्डसाठी नामांकन मिळाले होते.
Sort by
Show per page
Items 1 to 12 of 12 total
ASA MAHNU NAKOS Rating Star
Add To Cart INR 170
DHUMARE Rating Star
Add To Cart INR 130
HARAWALELYA WATA Rating Star
Add To Cart INR 120
KANCHANGANGA Rating Star
Add To Cart INR 220
KATHA SAWALICHI Rating Star
Add To Cart INR 190
KINARA Rating Star
Add To Cart INR 120
28 %
OFF
MADHAVI DESAI COMBO 11 BOOKS Rating Star
Add To Cart INR 1670 INR 1199
MANJIRI Rating Star
Add To Cart INR 150
NIYATI Rating Star
Add To Cart INR 120
PRARTHANA Rating Star
Add To Cart INR 220
SAGAR Rating Star
Add To Cart INR 100
SHUKRACHANDANI Rating Star
Add To Cart INR 130

Latest Reviews

RADHEYA
RADHEYA by RANJEET DESAI Rating Star
तेजस यादव

वाचला तो कर्ण ! आवडला तो कर्ण ! भावला तो कर्ण ...! दोन वर्षापुर्वी मृत्युंजय कादंबरी वाचून झालती . त्या कादंबरीने कित्येक जणांच आयुष्य कायापालट केल , हे मराठी साहित्य विश्व जाणून आहे . आता नुकतीच राधेय वाचून पुर्ण झाली . लेखक रणजित देसाई सुरवातीच ्हणतात .... " राधेय हे कर्णचरित्र नव्हे . प्रत्येकाच्या मनात दडलेला कर्ण असतो . माझ्या मनातल्या कर्णाची ही कहाणी . भावकहाणी . याची सत्यता शोधायची झाली , तर त्यासाठी महाभारताची पाने चाळण्याचे काहीच प्रयोजन नाही , कदाचित आपल्या मनाची चार पाने उलटलीत , तर त्यात हा कर्ण दिसेल ." मला कादंबरीत एक विशेष गोष्ट आवडली , ती म्हणजे कर्ण कुठेच वरचढ , रंगवून दाखवला नाही. त्याचे गुण दाखवले तसे त्याचे दोष ही दाखवले . नदीच्या प्रवाहावर वाहत जाणार त्याचं आयुष्य , त्याच दातृत्व , त्याच मित्रप्रेम , त्याचा मनाचा गाभारा , त्याचा आयुष्यी आलेली अहवेला वाचकांसं खुप काही शिकवून जाते . देसाईंची लेखणी इतकी प्रभावशाली आहे की ते कुरुक्षेत्राची युध्दभुमीही जिवंत झालेला भास होतो . मी जेवढा कर्ण वाचला तो मला सर्व आठवला ! मग तो ` शिवाजी सावंतांचा ` असो अथवा नटसम्राट मधील ` वि.वा.शिरवाडकर ( कुसुमाग्रजांचा ) . कादंबरी वाचून झाल्यावर कुसुमाग्रजांची ती ओळ आठवली कृष्ण - " अरे वेड्या तुझ्यासारखे कर्मयात्री ह्या धरेवरच्या माणसांचे दिपस्तंभ.! तुमचे जीवन हे केवळ जळण्यासाठी , ह्या प्रकाशात आम्हाला आमच्या वाटा सापडतात . खुप सुंदर वाचनीय , आणि भरभरुन शिकवनारी कादंबरी .... ...Read more

MAHASAMRAT ZANZAVAT
MAHASAMRAT ZANZAVAT by VISHWAS PATIL Rating Star
Abhiram Bhadkamkar

महा-सम्राट "इतिहास वाचून माणूस बेभान होतो, भानावर येतोच असं नाही" हे (बहुधा) वि ग कानेटकर यांचे विधान मला कायमच महत्वाचे वाटते। प्रकाशनास काही महिने लोटले असले तरी निवांत ऐसपैस वेळ काढून वाचायची म्हणून बाजूला ठेवलेली ज्येष्ठ कादंबरीकार विश्वा पाटील ह्यांची महासम्राट ही कादंबरी हातात घेतली आणि तिने झपाटून गेलो। ही कादंबरी बेभानही करते आणि एक भानही देते हे तिचे वैशिष्ट्य आहे. विश्वासरावांची शैली आणि त्यांची शब्दसंपत्ती ह्यावर नवे काय बोलणार? पण ही कादंबरी उभ्या देशाचे आराध्य दैवत असलेल्या छत्रपती शिवरायांच्या आयुष्यातील घटनांचे केवळ चमकदार कथन यापुरती मर्यादित न राहता तत्कालीन सामाजिक व राजकीय परिसराचे भान देणारी ठरते। तेव्हाचा काळ बारीकसारीक तपशिलांसह उभा करते. ती छत्रपतींच्या तेजस्वी कर्तृत्वाला मुजरा तर करतेच पण त्यासोबत त्यांच्या जन्मापूर्वीची राजकीय परिस्थिती, त्यातून आईसाहेबांच्या मनात उगवलेल्या हिंदवी स्वराज्याच्या अत्यंत अवघड, जवळजवळ अशक्यप्राय स्वप्नाच्या पाठलागाची वेगवान घडामोड चितारते. मुघलांचे डावपेच, खेळया नेस्तनाबूत करण्यामागची `अत्यंत योजनाबद्ध आखणी` मांडत जाते। ही कादंबरी माझे त्याकाळाबद्दलचे आकलन वाढवते. मऱ्हाटी मुलाखातला तत्कालीन निसर्ग यात येतो, तत्कालीन नातेसंबंध, समाजधारणा आणि परचक्राच्या दडपणाखालची उलघाल यातून त्या काळाचा पट मांडला जातो आणि इथेच कादंबरी केवळ एका युगपुरुषांचे चरित्रकथन न रहाता एका शतकाचा लेखाजोखा होऊन जाते। वेगळेपण आहे ते हेच की ही कहाणी महाराक्षसी लाटांविरुद्ध पोहून जात महासागरालाच बांधून घालणाऱ्या चिवट आशावादाची आणि या स्वप्नाला प्रत्यक्षात उतरवणाऱ्या बुद्धीचातुर्याची होत जाते। म्हणूनच ती एकाच वेळी बेभानही करते आणि भानही देते। कादंबरी संपते एक स्वल्पविराम देत... आता पुढचे भाग... त्याची अधीरता आणि उत्सुकता... डोळे दिपून जावेत अशा थोर व्यक्तिमत्वाचे चित्रण हे शिवधनुष्य होते, जे लिलया पेलले आहे... यात रेखाटलेली चित्रे अप्रतिम आहेत... घराघरात भक्तिभावाने ठेवावा आणि `अभ्यासावा` असा हा `झंझावात` आहे... ...Read more