* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Availability : Available
  • ISBN : 9788177667387
  • Edition : 4
  • Publishing Year : SEPTEMBER 2006
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 272
  • Language : MARATHI
  • Category : FICTION
  • Available in Combos :DR.CHHAYA MAHAJAN COMBO SET - 6 BOOKS
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
THIS NOVEL IS A CRITICAL COMMENT ON PREVAILING EDUCATION SYSTEM AND IS REPRESENTATIVE OF THE STATE OF AFFAIRS IN THE FIELD OF EDUCATION ALL OVER THE COUNTRY. IT IS IN A WAY AN ASSESSMENT OF THE SYSTEM PUTTING A QUESTION MARK ON THE ALL ROUND DEVELOPMENT OF THE STUDENT AND OUR FUTURE GENERATION – THE BACKBONE OF THE NATION. IT IS IRONICAL THAT WHEREAS THE STUDENT SHOULD BE IN THE FOCUS AND THE CENTRE HE IS MARGINALIZED TOTALLY AND SO IS SEEN IN THIS NOVEL.
`या कॉलेजमध्ये यूज अँड थ्रो पॉलिसी आहे. डिपार्टमेंट सुरू मी करायचं. एस्टॅब्लिश मी करायचं. मग हळूच कोणीतरी संधिसाधू मतलबी वाकडेबाई गरजू म्हणून, लाचार बनून येणार आणि शिरजोर होऊन टेकओव्हर करणार. विद्यार्थी आपण जमवायचे. तुकड्या वाढवण्यासाठी प्रयत्न करायचे. मग तथाकथित संस्थाचालक आणि प्राचार्य आपल्यापुढं गोंडा घोळणाऱ्या माणसांची अध्यापक म्हणून वर्णी लावणार. रिझल्ट उत्तम लागावेत म्हणून आपण मरमर करणार. रजा न घेता एक्स्ट्रॉ क्लासेस घेणार. नोट्स देणार. त्यातून तुकडी तयार होणार. त्या तुकडीला हे नवे लोक शिकवणार. उत्तम शिक्षक म्हणून आपलाच उदो उदो करायला विद्याथ्र्यांना चलाखीनं प्रेरित करणार. इतकं सगळं किळसवाणं आहे, ओंगळ आहे... या सगळ्याची चीड येत नाही तुम्हाला, सर?` ‘तुम्ही अजूनही पक्क्या मुरलेल्या प्राध्यापिका झाला नाहीत. अजून अनुभव येतील. मग इतकी चीड येणार नाही. फक्त असहाय्यता जाणवेल. तीही आपण काही करू शकत नाही याची! सगळेजण एकच गोष्ट सांगतील. सगळ्या कॉलेजमध्ये असंच चालतं. पुढं पुढं आपलीही खात्री पटते की, सगळीकडे हेच चालत असेल तर भल्याभल्यांनी हात टेकले असणार. त्यामुळे तुम्हाला एक पोक्त सल्ला देतो- तुमचं करियर पाहा.’ सध्याच्या महाविद्यालयाीन वातावरणातील मूल्यहीनतेचा सर्वंकष आलेख काढणारी आणि अंतर्मुख करणारी सामथ्र्यशाली कादंबरी.
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
#मराठीपुस्तके#मराठीप्रकाशक #MARATHIBOOKS#ONLINEMARATHIBOOKS#TRANSLATEDMARATHIBOOKS#TBC#TRANSLATEDBOOKS@50% #TRANSLATEDFROMENGLISHTOMARATHI #COLLEGE #MANASI #ADNYAT #CHHAYA MAHAJAN #
Customer Reviews
  • Rating Starनि. द. अटकेकर

    मानवी मनाचे व विशेष करून स्त्री मनाचे आपण फार प्रभावी व नेमके चित्रण केले आहेत. आपण स्वत: प्राध्यापकी पेशात असल्याने आपल्याला त्या पेशातील ताणतणाव, त्यातील गमती, एकमेकांवर कुरघोड्या करण्याची वृत्ती, ज्ञानदानातील आनंद या सर्वाची नेमकी जाण आहे. लिखाणाून प्रकर्षाने आपले सुसंस्कृत व परिपक्व मन दिसून येते. आपण कोठेही निराशावादी सूर लावला नाहीत. सर्व प्रसंगाना सामोरे जाताना आपल्या अभ्यासू व सुजाण मनाची प्रचिती येते. आपल्या कादंबऱ्यातून एका उच्चविद्याविभूषित स्त्रीच्या दृष्टीकोनातून प्रकटलेले कॉलेज विश्व पण मला तेवढेच महत्त्वाचे वाटते व त्याबरोबर मनातील सूक्ष्म आंदोलने आपण फार नेमकेपणाने मांडली आहेत. ...Read more

  • Rating StarDAINIK AIKYA 05-11-2006

    महाविद्यालयातील ‘राजकारण’… कोणत्याही महाविद्यालयात असतं तसंच वातावरण असणाऱ्या शिवापूरच्या महाविद्यालयातलं वातावरण या कादंबरीत लेखिकेने मांडलं आहे. सुमती सुखटणकर या कादंबरीच्या केंद्रस्थानी आहेत. झुऑलॉजीच्या विभाग प्रमुख म्हणून त्यांना ज्या समस्यांनासामोरे जावे लागते आणि त्यामुळे निर्माण होणाऱ्या अडचणींचा आलेख महाविद्यालयातील राजकारणाभोवती गुंफुन कॉलेजचे लिखाण केलेले आहे. आशा वाकडे नावाच्या प्राध्यापिका सुखटणकर यांच्याच शिफारशीने त्यांच्या विभागात पार्टटाईम म्हणून येतात आणि सुखटणकर यांना कॉलेजमधील राजकारणाचे भयंकर दर्शन घडते. लपवाछपवी, बनवेगिरी करत ‘थ्रू प्रॉपर चॅनेल’ सुममीमार्फत पूर्णवेळ होण्याच्या तयारीत असणाऱ्या या वाकडेबाईमुळे जे काही राजकारण घडते त्याचे सविस्तर वर्णन लेखिकेने केले आहे. रिमा डिसिल्व्हा या इंग्रजीच्या विभागप्रमुख सुमतीची मैत्रिण. प्राचार्य ग्रामीण भागातून आलेले. त्यातून संस्थाचालकांच्या गळ्यातील ताईत. संस्था आणि प्राध्यापक यांच्यात ताळमेळ घालून हा अप्पलपोट्या स्वार्थासाठी कोणाचाही बळी देतो. रिमा आणि सुमती त्यांच्या विभागाच्या प्रमुख झाल्या, त्या त्यांच्या गुणवत्तेच्या जोरावर. पण संस्थाचालकांच्या वशिल्याने महाविद्यालयात नव्याने घेतलेल्या मर्जीतल्या प्राध्यापकाची वर्णी हळूहळू कशी पूर्णवेळ म्हणून लावली जाते. हा या कादंबरीचा मूळ विषय. या अनुषंगाने सुमती, तिचा नवरा जयंत, मुलगा रोहन, परदेशात राहणारा भाऊ दिलीप, आई, सामाजिक कार्य करणारी मैत्रिण जयू या व्यक्तिरेखा कादंबरीच्या ओघात येतात. प्राचार्यांनी सुमतीच्या विभागात दोन नव्या जागा निर्माण करण्यासाठी राजकारण सुरू केले. त्यांच्या मर्जीतल्या विसपुते नावाच्या माजी विद्यार्थ्यालाच प्राध्यामक म्हणून ते घेतात आणि त्याला पूर्णवेळ करण्यासाठी अनेक हिकमती करतात. वर्कलोड असताना प्राचार्यांच्या अनुपस्थितीत विभाग प्रमुख या नात्याने सुमतीने पारमार नावाच्या एका गरजू आणि गरीब विद्यार्थ्याला प्राध्यापक म्हणून नेमले. प्राचार्यांना हे कळताच त्यांच्या रागाचा पारा चढतो. सुमतीला मग ते घालून पाडून बोलणे सुरू करतात. पारमारच्या शिकवण्यावर विद्यार्थी नाराज आहेत, अशी तक्रार आल्याचे सांगून सुमतीवर दडपण आणायला सुरुवात करतात. सुमतीच्या विभागातील एका प्राध्यापकाला प्राचार्य सुमतीच्या नकळत शिष्यवृत्ती मिळवून देऊन त्यांना वर्षभरासाठी बाहेरगावी पाठवतात. त्यामुळे नवीन जागा भरण्याची गरज भासते. याच काळात सुमतीला एनएसएसच्या कॅम्पसाठी आठवडाभर बाहेरगावी पाठवून तिच्या अनुपस्थितीत मर्जीतले दोन नवीन प्राध्यापक रुजू करून घेण्यात ते यशस्वी होतात. या प्रकारचा सुमतीला त्रास सुरू होतो. सुमतीला विभागाकडे फारसे लक्ष देता येऊ नये म्हणून हळूहळू विविध कमिट्या तिच्यावर लादल्या जातात. सुमती मैत्रिण रिमाला प्रथम याचा संशय येतो. माटे नावाच्या दुसऱ्या कॉलेजातील प्राध्यापिकेकरवी सुमतीची ओळख काढून वाकडे नावाच्या नव्या प्राध्यापिकेची जागा निर्माण करण्यामागे प्राचार्यांचाच कट आहे. हे ती दाखवून देते. सुमतीने नेमलेल्या परमारवर आरोप आणि मर्जीतल्या अर्धवेळ प्राध्यापकांना कमिट्यांवर नेमण्यात येऊ लागले. कमवा आणि शिका योजना आणि राष्ट्रीय सेवा योजनेच्या संयुक्त कार्यक्रमात बाहेरच्या विद्याथ्र्यांना बक्षिसे दिल्याचे जगजाहीर होताच ते प्रकरण सुमतीवर ढकलण्याचा प्रयत्न होतो. या काळात सुमती सुट्टीवर गेल्याचे पाहून प्राचार्य नवीन पर्यावरणाचा प्रकल्प तिच्या विभागाला जोडून वर्कलोड निर्माण करतात. सुमतीने तात्पुरती नेमणूक दिलेल्या परमारला काढून टाकले तर वाकडे आणि विसपुते या प्राचार्यांच्या मर्जीतल्या दोन प्राध्यापकांना कायम करता येऊ शकते म्हणून बाहेरगावी गेलेले प्राध्यापक परत येताच परमारला काढून टाकण्यात येते. गरीब परमार कॉलेजमध्येच आत्महत्या करतो. या प्रकरणाला आता गंभीर वळण लागते. पोलीस तपास सुरू होतो. या चौकशीत कॉलेजचे बिंग बाहेर पडू लागते. चटर्जीना मुद्दाम शिष्यवृत्ती देऊन बाहेरगावी पाठवणे, त्यापूर्वी विसपुते आणि वाकडे यांच्यासाठी तात्पुरती जागा करणे, एक वर्ष आधी असूनही केवळ मर्जीत नसल्यामुळे परमारला काढून टाकणे, चटर्जी परत येताच वर्कलोड वाढला म्हणून विसपुते-वाकडे यांना सहा महिन्यांची ऑर्डर देणे, त्यासाठी रजिस्टरमध्ये खाडाखोड करणे या गोष्टी बाहेर पडतात, प्राचार्याचे हितसंबंध यात गुंतलेले आहेत, हे पोलीस संस्थाचालकांना दाखवून देतात सर्वांचे धाबे दणाणतात. अधिक तपासात वाकडे केवळ एम.एस्सी असल्याचे आणि विसपुते याच्यावर कॉलेजचा माजी विद्यार्थी असताना कॉपीप्रकरणात पकडल्याचे निष्पन्न होते. परमारने लिहिलेली पोलिसांच्या हातात पडताच सारेच गोत्यात येतात. सुमतीने त्यांचे बिंग पोलिसांसमोर फोडू नये म्हणून तिला आलेली परदेशी शिष्यवृत्तीची ऑफर संस्था तिला स्वीकारायला लावतात आणि प्राचार्यांना हटवण्याची प्रक्रिया सुरू होते. -संदीप आडनाईक ...Read more

  • Rating StarMAHARASHTRA TIMES 14-01-2007

    किंचित हादरा देणारी कादंबरी… कादंबरीचे नाव ‘कॉलेज’... कोणाच्याही मनात झिंग आणि नशा निर्माण व्हावी असं. काही नॉस्टॉल्जियात शिरतील. २००६ नंतरच्या दशकातला ऐवज यात सापडेल असं कुतूहल काहींच्या मनाला स्पर्श करेल. मात्र या कादंबरीत तरुणाईचा जल्लोष नाही. तरणांच्या ‘कॉलेज’ला त्यांच्या ‘कॉलेज जगण्या अनुभवण्याला स्पर्श करावा असा या कादंबरीचा हेतूच नाही. झूओलॉजीच्या विभागप्रमुख असणाऱ्या प्रौढ, विवाहित, हुशार प्राध्यापिकेच्या बुद्धीला – मनाला, संस्थेच्या प्राचार्य – कार्यकारिणीने, मारलेल्या डंखाची ही हकीकत आहे. कॅनव्हास आहे कॉलेज – प्राध्यापकांचे गट प्रत्येकाचे स्वभाव. त्यांच्या बऱ्यावाईट दांभिक वृत्ती. अर्धवेळासाठी काम द्या म्हणून डोळ्यात पाणी घेऊन येणारी आणि पुढे ज्यांनी काम दिलं त्यांच्याच डोळ्यातलं पाणी काढणारी वाकडे नावाची बाई. कथानक फिरतं ते या लबाड स्त्रीने खेळलेल्या खेळीभोवती. सुमती सुखटणकर या विभागप्रमुख. सरळ स्वभावाच्या पण थोडं बहुत राजकारण कळूनही स्वत:ला आक्रसून घेत. आपल्या हतबलतेचा आलेख काढणाऱ्या. त्यांची सहाध्यायी इंग्रजीची प्राध्यापिका रीमा - तिचं बुद्धीचापल्य स्पष्टवक्तेपणा याची भुरळ सुमतीवर आहे. दुसऱ्या बाजूला जयू नावाच्या अपंगासाठी आयुष्य वेचणाऱ्या मैत्रिणीबद्दलचं कौतुक... मात्र स्वत:कडे बुद्धीहुशारी असूनही असावी तेवढी तडफ-ठामपणा नसल्याने कधी पतीचा आधार कधी रीमाच्या शब्दांचा प्रभाव यातून कॉलेजमध्ये प्रचंड मानसिक गुंतवणूक केलेली सुमती... ती ज्या गोष्टी, प्रसंगांनी कोलमडून जाते त्याबाबी तात्कालिक डिप्रेशन देणाऱ्या असतीलही. परंतु तिच्या मनावर सर्वच गोष्टींचा परिणाम खोलवर होतो. तिचं प्राचार्यांच्या केबिनमध्ये जाण्यापूर्वी धास्तावणं, इतरासमोर काय व किती बोलावं याबद्दलचं दडपण. तिचं हेच ‘भिडस्तपण’ कादंबरीभर विखुरलेलं आहे. तिला समजावून घेणारे, समजावून सांगणारे तिची प्रखर बुद्धीमत्ता मान्य करतात, पण जगण्यातल्या व्यवहार्य भागाचं तिला आकलन होत नाही म्हणून अस्वस्थ होतात. तिच्याविरुद्ध चालणाऱ्या कारस्थानात अग्रभागी असणाऱ्या वावडेबाई व त्यांच्या पाठीमागे उभे राहिलेले प्राचार्य यांचे सुमतीच्या आयुष्यावर होणारे थेट परिणाम याच सूत्रातून कादंबरी पुढे सरकते. विद्यार्थ्याच्या कलाकलाने वागणाऱ्या वाकडेबार्इंना शिकवण्यासाठी तास दिले जातात. सर्व अ‍ॅक्टिविटीज दिल्या जातात. याचा अर्थ त्यांच्यात थोडीतरी क्षमता असणारच. त्यांचा अदृश्य जाच परमारच्या आत्महत्येला कारणीभूत ठरतो. असं दाखवून वाकडे नावाची खलवृत्ती. तिच्या लोचटपणाचा कळसाध्याय मांडण्यात लेखिका यशस्वी ठरली आहे. या कादंबरीत कॉलेजमधल्या डिपार्टमेंटला भ्रष्ट प्राध्यापकामुळे झालेला संसर्ग, खच्चून भरलेल्या तपशीलासकट येतो. जबाबदाऱ्या उत्तम पार पाडणाऱ्या प्राध्यापकांना गृहीत धरणं इथंपासून ते एनएसएसच्या कार्यक्रमातून उघड होणारा भीषण भ्रष्टप्रकार... २१ प्रकरणांतून एक शृंखलाच वाचकांसमोर उलगडली जाते. लेखिकेची तडफड, घुसमट कादंबरीतल्या प्रत्येक पृष्ठावर व्यक्त होते. एखाद्या व्यक्तीचं खच्चीकरण करणारी यंत्रणा त्या व्यक्तीच्या विकासाबरोबरच समांतर रेषेत निर्माण होत असते. त्या व्यक्तीला तो सुगावा लागूनही ती काही करू शकत नाही. त्या होरपळीत घर तुटतं. नातलग निघून जातात. उरतं ते रितेपण. प्रश्न निर्माण करणारं रितेपण. ज्यांच्यासाठी मानसिक गुंतवणूक केली ते विद्यार्थी कुणा दुसऱ्यालाच डोक्यावर घेणार. आपण जीवघेण्या खेळाचे केवळ साक्षी... असा आशय कादंबरीतून व्यक्त होतो. अर्थात ज्या विद्यार्थ्याचा कॉलेजच्या पटावर अंतर्भाव असतो त्यांच्या संदर्भात ही कादंबरी खूप थोड्या प्रमाणात व्यक्त होते. स्टाफरूम -प्राध्यापक-संस्थाचालक-कार्यकारिणी आणि प्राचार्य याभोवती फिरताना नायिकेचं घर - तिची मानसिक - भावनिक जडणघडण यांना कवेत घेतलं जातं. त्यामुळे हा संघर्ष बहुपदी होत नाही. कादंबरीचा आवाका शीर्षकाला लक्षात घेऊन केला असता तर ही निराळी कादंबरी ठरली असती. गेल्या दशकातले येऊ घालणाऱ्या दशकातले असे अनेक प्रश्न आज कॉलेजविश्वात आहेत. कॉलेजच्या अंतर्गत राजकारणात अर्थ पूर्ण वेळ काम करणाऱ्याचं शोषण नॅक मुळे निर्माण झालेला व्यवस्थापनाच्या प्रतिष्ठेचा प्रश्न. या सर्वांत भरडून निघणारा प्राध्यापक त्यांची ससेहोलपट पाहणारा, जाणणारा विद्यार्थी हा कादंबरीतला एक प्रमुख घटक ठरणं आवश्यक होतं. भिंगाखाली सगळ्याच समस्या पाहत गेल्याने त्या खूपच मोठ्या वाटत जाऊन सुमती सुखटणकर दुरावते. असं या कथानकाचं केंद्र बनल्याने कादंबरी पसरट वाटते. यातल्या व्यक्तिरेखा ठळक आणि संवाद (क्वचित ठिकाणी) जगण्याच्या शक्यत निर्माण करणारे झाले असल्याने ती क्वचितच वाचनीय ठरते. कादंबरीचे अप्रतिम मुखपृष्ठ ही जमेची बाजू. मूल्यहिनतेचा सर्वकष आलेख या कादंबरीत काही ठिकाणी प्रकर्षाने जाणवतो. तर काही जागा रिक्त ठेवल्याने कादंबरीचं अधुरेपण ठसतं. कॉलेज पॉलिटिक्सच्या एका प्रबळ भागाचं सूक्ष्म विदारक दर्शन हे या कादंबरीचं यश. २००० नंतरच्या दशकात कॉलेजसंबंधी निर्माण झालेल्या महत्त्वपूर्ण प्रश्नांचा नसलेला समावेश हे अपयश. कॉलेजच्या कोणत्याही डिपार्टमेंटला तिथल्या कार्यपद्धतीला तळहातावर ठेवत केलेली ही मीमांसा वाचकाला थोडासाच हादरा देते. -वृंदा भार्गवे ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

ANUWADATUN ANUSARJANAKADE
ANUWADATUN ANUSARJANAKADE by LEENA SOHONI Rating Star
कौशिक लेले

पुस्तक – अनुवादातून अनुसर्जनाकडे (Anuwadatun Anusarjanakade) लेखिका – लीना सोहोनी (Leena Sohoni) भाषा – मराठी पाने – २३९ प्रकाशन – मेहता पब्लिशिंग हाऊस. फेब २०२४ छापील किंमत – रु. ३७०/- ISBN – 9789357205337 ह्या परिचयाची माझी वेबसाईट लिंक htps://learnmarathiwithkaushik.com/courses/anuwadatun-anusarjanakade/ मराठी पुस्तकांमध्ये सध्या इतर भाषांतून अनुवादित झालेली पुस्तके सुद्धा मोठ्या संख्येने दिसतात. एखादा सरस अनुवाद वाचताना आपल्या डोक्यात सुद्धा आपल्या आवडीच्या परभाषेतल्या पुस्तकांची यादी तयार होते. ही पुस्तकं सुद्धा मराठीत आली तर काय मजा येईल असं वाटतं. भाषा हा ज्यांचा जिव्हाळ्याचा विषय आहे त्यांची इच्छा एक पुढचं पाऊल टाकेल. आपणही स्वतः असा अनुवाद केला तर ? आपल्यालाही दोन्ही भाषा चांगल्या येत आहेत मग अनुवाद का करू नये ? हे पिल्लू डोक्यात शिरेलच. असा अनुवाद करायचा स्वतः काही प्रयत्न केला की लक्षात येईल की हे किती किचकट काम आहे. चांगला अनुवाद करायचा असेल तर सराव लागेल. अभ्यास लागेल. त्याची काही तंत्र मंत्र शिकून घ्यावी लागतील. एखाद्या चांगल्या जाणकार व्यक्तीचं, अनुभवी व्यक्तीचं मार्गदर्शनही मिळायला हवं. जर तुमच्याही मनात अशा भावना आल्या असतील तर लीना सोहोनी यांचं “अनुवादाकडून अनुसर्जनाकडे” हे पुस्तक तुम्हाला नक्की आवडेल. लीना सोहोनी हे नाव मराठीत अनुवादिका म्हणून प्रसिद्ध आहे. आत्तापर्यंत त्यांनी अनुवाद केलेली पन्नासच्यावर पुस्तके प्रकाशित झाली आहेत. त्यांचा अनुभव व अधिकार वेगळा सांगायला नको. त्यांचे हे पुस्तक "अनुवादातून अनुसर्जनाकडे" पुस्तकाचा पहिला भागात लीना सोनी यांनी आपल्या अनुवादाच्या प्रवासाचं सिंहावलोकन केलं आहे. त्यांनी अनुवादाची सुरुवात कशी केली, त्यात प्रगती कशी झाली हे लिहिलं आहे. अनुवादामुळे प्रसिद्ध लेखक जेफ्री आर्चर, सुधा मूर्ती, किरण बेदी यांच्याशी जुळलेले संबंध आणि त्यांच्या भेटीची वर्णनं आहेत. ह्या प्रवासात “मेहता पब्लिशिंग हाऊस” या प्रकाशन संस्थेचा भरभक्कम पाठिंबा त्यांना मिळाला. सुनील मेहता आणि अनिल मेहता यांच्याबरोबरच्या आठवणी सुद्धा पुस्तकात आहेत. पुढच्या भागात अनुवाद या विषयाची एखाद्या शास्त्रीय शोधनिबंधाप्रमाणे माहिती दिलेली आहे. यात अनुवाद प्रक्रियेकडे अतिशय बारकाईने बघितलं आहे. ढोबळमानाने बघितलं तर, अनुवाद म्हणजे तर एका भाषेतल्या शब्दांच्या ऐवजी दुसऱ्या भाषेतले शब्द वापरणे. पण प्रत्येक वेळी एका शब्दाच्या बदल्यात दुसरा भाषेतला एक शब्द असं होतंच असं नाही. त्यामुळे काही वेळा शब्दाची फोड करून दाखवावी लागते. तर काही वेळा मूळ मोठं वाक्य लहान होऊ शकतं. कदाचित तिथे पूर्णपणे वेगळीच शब्दयोजना वाक्यरचना होऊ शकते. या प्रत्येक प्रकाराला एक विशिष्ट शास्त्रीय नाव (पारिभाषिक संज्ञा) आहे हे आपल्याला पुस्तक वाचून कळतं. जे शब्दांच्या बाबतीत तेच वाक्यांच्या बाबतीत. मूळ भाषेतल्या शब्दांसाठी नवीन शब्द वापरून वाक्य तयार झालं तरी ते वाचकाला सहज वाटलं पाहिजे. नाहीतर आपण लगेच म्हणू, “अनुवाद खूप बोजड झाला आहे; ठोकळेबाज झाला आहे”. हे टाळायचं तर वाक्यरचना सुद्धा सुधारायला पाहिजे. याची उदाहरणे पुस्तकात दिली आहेत आणि त्या अनुषंगाने पारिभाषिक संज्ञा (terminology) काय आहे हे मराठी आणि इंग्रजी दोन्हीत दिलं आहे. शब्द, वाक्य ह्यांना लावलेल्या कसोटीचा विस्तार करून ती कसोटी “संकल्पनां”ना लावायला पाहिजे. एखाद्या भाषेत, एखाद्या समाजात असणाऱ्या संकल्पना, प्रथा-परंपरा मराठी भाषेत नसतील तर अनुवाद करताना ते जसंच्या तसं ठेवायचं का तिथे काही वेगळी संकल्पना वापरायची ? का तळ टीप देऊन स्पष्टीकरण द्यायचं? असे एकाच गोष्टीकडे बघण्याचे वेगवेगळे पर्याय उपलब्ध आहेत. हा मुद्दा आपण सोदाहरण स्पष्ट केला आहे. हा ऊहापोह वाचल्यासार अनुवादासाठी दोन्ही भाषांवर आपली किती चांगली पकड पाहिजे हे वाचकाच्या लक्षात येईल. त्याचबरोबर जे पुस्तक आपण वाचतोय त्याची पार्श्वभूमी, त्यातल्या प्रसंगाची सामाजिक पार्श्वभूमी, आणि लेखकाला काय ध्वनीत करायचे आहे हे सगळं समजणं सुद्धा किती महत्त्वाचं हे लक्षात येईल. म्हणजे अनुवाद प्रक्रिया दिसताना शब्दांची दिसली तरी “शब्दांच्या पलीकडले” अनुवादकाला पकडता आले तरच मूळ कृतीला न्याय मिळेल. हे या पुस्तकाच्या वाचनातून अधोरेखित होतं. पुस्तकाचा प्रकारानुसार अनुवादकासमोर असणारी आव्हाने सुद्धा बदलतात. कथा-कादंबरीचा अनुवाद वेगळा तर कवितेचा अनुवाद वेगळा. कारण कवितेमध्ये भावभावनांना महत्त्व आहे तितकेच महत्त्व शब्द, लय, शब्दचमत्कृती यांनाही आहे. म्हणूनच तर ते पद्य आहे गद्य नाही. लीनाजींनी ह्याचाही परामर्श घेतला आहे. नाटकाचा अनुवाद करताना येणारी आव्हाने अजून वेगळी. परिणामकारक संवाद, नेपथ्य, पात्रांची देहबोली, त्याचा प्रेक्षकांवर होणारा परिणाम या सगळ्याचा विचार करून अनुवाद करावा लागतो. म्हणूनच, अनुवाद म्हणजे प्रत्येक वेळी “शंभर टक्के पुस्तक जसेच्या तसे” असं नसतं. तर काही वेळा ते रूपांतर ठरतं. काही वेळा तो स्वैर अनुवाद ठरतो. तर काही वेळा मूळ कलाकृतीवर आधारित नवीन कलाकृती ठरते. हे सुद्धा कितीतरी उदाहरणे देऊन स्पष्ट केले आहे. हे सगळे मुद्दे एकमेकांशी निगडित आहेत त्यामुळे पुस्तकात बऱ्याच वेळा मुद्द्यांची पुनरावृत्ती झाली आहे असं मला वाटलं. ती पुनरुक्ती टाळून कदाचित थोडी पानं कमी करता आली असती. पण मुद्दा वाचकाच्या मनावर ठसावा, कुठलंही विशिष्ट प्रकरण वाचायला घेतले तरी ते त्या मुद्द्यापुरतं पूर्ण असावं हा त्यामागचा हेतू असेल. पुस्तकात पुढे अनुवादकांना नोकरी, व्यवसायाच्या काय संधी आहेत; कुठल्या संस्था याबद्दलचं शिक्षण देतात; कुठले कोर्सेस उपलब्ध आहेत याबद्दलचा तपशील आहे. अनुवाद करायला सुरुवात करायची असेल तर मजकूरनिवड, प्रकाशकांशी संपर्क, परवानगी ह्याचे मार्गदर्शन आहे. त्यांनतर शाळेत आपण जे प्राथमिक व्याकरण शिकतो; म्हणजे कर्ता, कर्म, क्रियापद, ॲक्टिव-पॅसिव्ह व्हॉइस, वेगवेगळे काळ इत्यादींच्या व्याख्या देऊन सगळ्याची उजळणी केली आहे. ज्याला अनुवाद क्षेत्रात उतरायचे आहे त्याला व्याकरणाचा अजून बराच अभ्यास करावा लागणारच आहे. आणि पुस्तकाचा उद्देश व्याकरण शिकवणं नाही तर अनुवादकासाठी व्याकरण अत्यावश्यक आहे हे ठसवणं आहे. त्यामुळे व्याकरणाचा भाग पुस्तकात नसता तरी चालला असता असं मला वाटलं. पुस्तकातील काही पाने वर दिलेल्या लिंकवर शेअर केली आहेत. म्हणजे तुम्हाला पुस्तकाची, लेखनशैलीची अजून चांगली कल्पना येईल. त्यात पुढील मुद्द्यांबद्दलची पाने आहेत १) अनुवादिका म्हणून येणारे कटुगोड अनुभव. २) प्रसिद्ध लेखक जेफ्री आर्चर ह्यांच्या पुस्तकांचा मराठी अनुवाद लीनाजींनी केला आहे. त्यातून जेफ्री आर्चर ह्यांच्याशी भेटीगाठी झाल्या त्यातला एक प्रसंग. ३) अनुवादाचे वर्गीकरण/प्रकार सांगणाऱ्या प्रकरणातली दोन पाने. अनुवाद प्रक्रियेची किती बारकाईने तांत्रिक चिकित्सा केली आहे हे लक्षात येईल. ४) नाटकाचा अनुवाद करताना येणारी आव्हाने ह्याबद्दलच्या प्रकरणातली दोन पाने. लीना सोहोनींचे आत्मकथन असणारा पुस्तकाचा पहिला भाग सर्व वाचकांना वाचायला आवडेलच. पुस्तकाचा दुसरा भाग तांत्रिक आहे. तो सर्वसामान्य वाचकाला वाचायला आवडेलच असं नाही. पण तो वाचल्यावर अनुवादक म्हणून काम करताना किती कटकटी असतात, काय व्यवधानं सांभाळावी लागतात हे वाचकाच्या लक्षात येईल. त्यातून अनुवादकांकडे व त्यांच्या कामाकडे बघण्याचा दृष्टिकोन अजून कौतुकाचा आणि कृतज्ञतेचा होईल हे निश्चित. ज्यांना अनुवाद करायचा आहे, या क्षेत्रात शिरायचं आहे किंवा तशी उमेदवारी सुरू झाली आहे त्यांना हा भाग मार्गदर्शक ठरेल. जाण वाढवेल हे नक्की. त्यामुळे या पुस्तकाच्या वाचनातून अनुवादाचा किडा काही वाचकांच्या डोक्यात गेला आणि त्यातून नवे अनुवादक मराठीत निर्माण झाले तर ते सोन्याहून पिवळे ! मराठीत कथा,कादंबऱ्या, चरित्र, सामाजिक विषयांची चर्चा ह्या पद्धतीचे लेखन भरपूर होत असतं. पण ह्या पुस्तकाप्रमाणे शास्त्रीय/तांत्रिक चिकित्सा करणारी, गंभीरपणे शिकवणारी पुस्तकं कमी दिसतात. ती प्रकाशित झाली तरी ती क्रमिक पाठ्यपुस्तक किंवा “अभ्यासाचे पुस्तक” या प्रकारात ढकलली जातात आणि दुर्लक्षित होतात. पण या पुस्तकाच्या लेखिका आणि प्रकाशक यांनी हे पुस्तक मुख्यधारेतल्या पुस्तकाप्रमाणे सादर केलं आहे. त्यातून हे पुस्तक जास्त वाचलं जाईल; जास्त लोकांना विचार प्रवृत्त करेल असं मला वाटतं. अशा प्रकारची पुस्तकं मराठीत प्रकाशित होणे हे मराठी भाषेला ज्ञानभाषा करण्यासाठी मोठे योगदान आहे. त्याबद्दल प्रकाशक आणि लेखिका दोघांचेही एक मराठी भाषा प्रेमी म्हणून मी मनापासून आभार मानतो. —————————— मी दिलेली पुस्तक श्रेणी —————————— अनुवाद करणारे असाल किंवा करायची इच्छा असेल तर आवा ( आवर्जून वाचा ) इतरांनी जवा ( जमल्यास वाचा ) ——————————— आवा ( आवर्जून वाचा ) जवा ( जमल्यास वाचा ) वाठीनावाठी ( वाचलं तर ठीक नाही वाचलं तरी ठीक ) नावाठी ( नाही वाचलं तरी ठीक ) ...Read more

OMKARACHI REKH JANA
OMKARACHI REKH JANA by MANJUSHRI GOKHALE Rating Star
सौ. जस्मिन जोगळेकर

आमच्या पुस्तकप्रेमी समुहावरचा एकही दिवसाचा खंड न पडता सलग 1730 वा पुस्तक परिचय पुस्तक प्रेमी समूह,पुस्तक परिचय अभियान: एकही दिवस खंड पडू न देता पुस्तकांचा परिचय हे पुस्तकप्रेमी समूहाचे यश ! पुस्तक सत्र:- ३ सप्ताह क्रमांक:- २४८ पुस्तक क्रमांक: १७३० दिनांक: १०/०३/२०२५ पुस्तकाचे नांव:- ओंकाराची रेख जना लेखक:- मंजुश्री गोखले पहिली आवृत्ती: फेब्रुवारी २०१२ पृष्ठ संख्या : ३०८ मूल्य: रु. ३२० प्रकाशन: मेहता पब्लिशिंग हाऊस परिचयकर्ती: सौ. जस्मिन जोगळेकर एखाद्या गोष्टीसाठी वेळ यावी लागते म्हणतात, तसं काहीसं झालं माझं. खरंतर पुस्तक वाचनाच्या बाबतीत असं व्हायला नको होतं पण झालं. `हे खूप सुंदर पुस्तक आहे, तुम्ही वाचाच` म्हणून एक पुस्तक आमच्या हाती आलं. अर्थात ज्यांनी सांगितलं त्यांनी त्यांच्या संग्रहातलं पुस्तक दिलं होतं. तसं बरेच दिवस होतं आमच्याकडे. नवऱ्याने वाचून खूपच सुंदर आहे, वाच नक्की सांगितलं देखील मला. पण पुस्तक परत द्यायची वेळ आली तरी वाचलं गेलं नाही. तरी ते नाव डोक्यात फिट बसलं होतं. अखेर एक दिवस ते एकच पुस्तक नव्हे तर त्याच लेखिकेची चार पुस्तकं विकतच घेऊन आले आणि मग ती वेळ आली…. त्या पुस्तकाच्या, पुस्तकातील भाषेच्या आणि त्या लेखिकेच्या प्रेमात पडण्याची. पुस्तक होतं…मंजुश्री गोखले यांनी संत जनाबाईंवर लिहिलेलं `ओंकाराची रेख जना`. `विठू माझा लेकुरवाळा`, `धरिला पंढरीचा चोर` अशा अभंग रचनेतून जनाबाई आपल्या ओळखीच्या आहेत. किंवा विठूराया त्यांना हर कामात मदत करत असतो वगैरे माहीत आहे. पण त्यांचं संपूर्ण चरित्र सगळ्यांना माहीत असेलच असं नाही. ते माहीत करून देण्याचं सुरेख काम या कादंबरीने केलं आहे. जनाबाईंच्या जन्मापूर्वीची आणि नंतरचीही त्यांच्या कुटुंबाची परिस्थिती, छोट्या जनाला मागे ठेऊन दुखण्याने तिला सोडून गेलेली तिची आई, त्यानंतरची बिकट वेळ याचं वर्णन वाचताना डोळ्यातलं पाणी थांबत नाही. पुढेही काही प्रसंग असे आहेत…भागाबाईचं वागणं असेल किंवा सुळावर चढवायचा प्रसंग असेल… डोळ्यात पाणी येतच राहतं. पण एवढं होऊनही त्यांची पंढरीरायावरची भक्ती मात्र गाढ होती. जनाईसुध्दा त्याला पाहायला आतुर होती. सोसले चटके l पोटी नाही घास l विठ्ठलाची आस l जनाईला ll भेटीसाठी त्याच्या l गोळा तनमन l धाडे आवतान l विठूराया ll अखेर विठुरायाकडून आमंत्रण आल्यावर बापलेक पंढरीची वाट चालू लागतात. काळया देवाला पाहायला आसुसलेली जना आणि लेकीला कायमचं परक्या घरी सोडून यायचं या विचाराने जडावलेला दमा… नशिबाची रेख l भिवरेच्या काठी l विठूराया ओढी l जनाईची ll दोघांचा प्रवास विठ्ठलाच्या विश्वासावर सुरू होतो. पुढं जनाईला दामाशेटींच्या घरी सोडून देणं, त्या घराने जनाला आपलंच म्हणणं, नामदेवांसोबत तिचं मोठं होणं अशा कितीतरी प्रसंगांनी सुखावून जायला होतं. तेव्हाची सामाजिक परिस्थिती, जनाचं अतिशूद्र असणं आणि त्यातून स्त्री असणं…त्यासाठी तिला झेलावे लागणारे त्रास, संत म्हणून मोठेपण मिळाल्यावरही त्यांच्यावर आलेला चोरीचा आळ… त्रास होतो वाचताना. जनाची आणि विठ्ठलाची पहिली भेट आणि तिथून त्यांच्यात दृढ होत जाणारे नाते…वाचताना शहारून जायला होतं. जना ते संत जनाबाई हा प्रवास, त्यात जनाबाईंनी रचलेले अभंग, ज्ञानदेवादि भावंडांचा सहवास आणि मुख्य म्हणजे नामदेव आणि जनाबाई यांचे नाते… गुरू शिष्य ऐसी l जोडी कौतुकाची l जनी नामयाची l संतांमधे ll याबद्दल पुस्तकात आलेले उल्लेख मन लावून वाचण्यासारखे आहेत. विठ्ठलाच्या चरणी झालेला जनाबाईंच्या जीवनाचा शेवट म्हणजे तर 🙏 वृंदा कोमेजली l स्तब्ध वारा पाणी l ओघळले मणी l मंजिऱ्यांचे ll थरारली वीट l कंप राऊळाला l श्वास ओलावला l क्षणभर ll आज नाही घाई l विठोबाला काही l जनाईच येई l चरणाशी ll शांता शेळके यांनी अनुवाद केलेलं `चौघीजणी` जसं मनात कायमचं घर करुन बसलं आहे, त्या जोडीला आता `ओंकाराची रेख जना` हे ही अत्यंत आवडीचं झालं आहे. यापूर्वी संत साहित्य किंवा संतांवर लिहिलेलं साहित्य फारसं वाचलं नव्हतं. लताजी किंवा भीमसेनजींमुळे घराघरात पोहोचलेले अभंग तेवढे माहीत होते. त्यामुळं जनाबाईंवर लिहिलेल्या या पुस्तकाबाबत उत्सुकता होतीच. पहिल्या प्रकरणाच्या अगदी पहिल्या ओळीपासून या पुस्तकाशी जी बांधली गेले ते शेवटपर्यंत. पुस्तकातील सगळं वर्णन अगदी बारीक सारीक तपशील देऊन पुढं जात राहतं आणि त्यात आपल्याला गुंतवून ठेवतं. सुरुवातीची काही प्रकरणं तर डोळ्यात अश्रुंच्या धारा घेऊन, पुसट अक्षरं समोर ठेऊन वाचावी लागतात. प्रसंग सगळे l तपशिलासवे l डोळ्यात आसवे l वाचुनिया ll भाषा ही साजिरी l सत्य हेच वाटे l प्रसंग तो घडे l आसपास ll एकूणच पुस्तकातलं वर्णन इतकं जिवंत आहे की सगळे प्रसंग आपल्या आसपास घडताहेत असंच वाटत राहतं कायम. दमा - कुरुंडचं दुर्दैवी आयुष्य, पोटी मूल नसल्याचं त्यांचं दुःख, विठ्ठलाला त्यासाठी साकडं घालण्यासाठी त्यांनी केलेला पंढरपूरचा प्रवास असो किंवा जनाबाईंच्या खोलीत येऊन विठ्ठलाने त्यांच्याशी मारलेल्या गप्पा, त्यांना कामात केलेली मदत…. सगळे अगदी सगळे प्रसंग आपणच जगतोय असं वाटावेत इतके मनाला भिडून जातात. काही ठिकाणं तर अशी… `अरे विठ्ठला, गडबडीत भलतंच काय उचलतोस. तुझा रत्नहार आणि शेला तर घेऊन जा`...असं आपणच विठ्ठलाला हाक मारून सांगावं असं वाटायला लागतं वाचताना. भाषा, वर्णनशैली फार साजिरी आहे. पुस्तकातला `साजिरी` हा शब्द एकदम आवडून गेलाय. एखादा चेहरा पाहिल्यावर कसं आपल्याला कळून जातं ना की, ही व्यक्ती मायाळू आहे किंवा तुसडी आहे वगैरे…तसं पुस्तकाच्या सुरुवातीलाच यातल्या भाषेबद्दल आपुलकी, प्रेम वाटायला लागतं. भाषा साधी पण सुंदर, शब्दांचा वापर असा की यापेक्षा वेगळा शब्द इथं शोभला नसता असं वाटायला लागेल असा. अनवाणी पायाला चटके बसावेत इतकं हवामान अजून बदललं नव्हतं…यासाठी `अजून मातीने माया सोडली नव्हती`... किती सुरेख वाक्य आहे ना! अशी कितीतरी वाक्य आपल्याला त्यांच्या प्रेमात पाडायला लावणारी यात सापडतील. एकूणच सांगायचं झालं तर पुस्तक अप्रतिम आणि सगळ्यांनी आवर्जून वाचावं असंच आहे. एकाच लेखकाची पुस्तकं सलग एका मागोमाग एक अशी माझ्याकडून वाचली जात नाहीत. पण आता खुणावतंय ते… `जोहार मायबाप जोहार`. ...Read more