* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: PREY
  • Availability : Available
  • Translators : PRAMOD JOGLEKAR
  • ISBN : 9788177667548
  • Edition : 1
  • Publishing Year : 2002
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 376
  • Language : Translated From ENGLISH to MARATHI
  • Category : FICTION
Quantity
Buying Options:
  • Print Books:
IN THE NEVADA DESERT, AN EXPERIMENT HAS GONE HORRIBLY WRONG. A CLOUD OF NANOPARTICLES—MICRO-ROBOTS—HAS ESCAPED FROM THE LABORATORY. THIS CLOUD IS SELF-SUSTAINING AND SELF-REPRODUCING. IT IS INTELLIGENT AND LEARNS FROM EXPERIENCE. FOR ALL PRACTICAL PURPOSES, IT IS ALIVE. IT HAS BEEN PROGRAMMED AS A PREDATOR. IT IS EVOLVING SWIFTLY, BECOMING MORE DEADLY WITH EACH PASSING HOUR. EVERY ATTEMPT TO DESTROY IT HAS FAILED. AND WE ARE THE PREY.
नेवाडा वाळवंटातल्या एका कंपनीत चालू असणा-या प्रयोगांमध्ये भयंकर विचका झालेला आहे. सूक्ष्म आकाराचे जणू यंत्रमानव असावेत अशा नॅनोकणांचा एक ढग प्रयोगशाळेतून निसटला. हा ढग बुद्धिमान आहे. तो सहज शिकू शकतो आणि पुनरुत्पादन करू शकतो. निराळ्या शब्दात सांगायचं तर तो `जिवंत` आहे. त्याची रचना एक शिकारी म्हणून झालेली आहे. तो उत्क्रांत होतोय. दर तासाला त्याचं स्वरूप अधिकच भयानक होत चाललंय. त्याला नष्ट करण्याचे सगळे प्रयत्न फोल ठरले आहेत. ह्या शिकारी ढगाचं सावज आपण आहोत....
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
#MEHTAPUBLISHINGHOUSE #MARATHIBOOKS #TRANSLATEDBOOKS #ONLINEBOOKS #BIOGRAPHYA&TRUESTORIES # PREY #प्रे #PRAMOD JOGLEKAR #प्रमोदजोगळेकर #STATE OF FEAR #MICHAELCRICHTON #NEXT # PIRATE LATITUDES
Customer Reviews
  • Rating StarKiran Borkar

    शिकारी आणि सावज या संकल्पनेवर जैविक आणि वैज्ञानिक शास्त्रज्ञ मिळून एक नवीन प्रयोग करतायत . नेवाडा येथील रखरखत्या वाळवंटात त्यांची प्रयोगशाळा आहे .त्यामुळे येत्या पन्नास ते शंभर वर्षात कृत्रीम सजीव निर्माण होतील.केवळ मानवाने निर्मिती केली म्हणून ते कृ्रीम म्हणता येतील. अन्यथा ते सजीव आहेत . ते स्वतः पुनरुत्पादन करतील. स्वतः पॉवर निर्माण करतील ..तर विचारही करतील.पण याचा जैविकसृष्टीवर होणारा परिणाम विलक्षण असेल. मानवजातीच्या मदतीसाठी जरी याची निर्मिती करण्याचा हेतू असला तरी याचे उलट ही परिणाम होऊ शकतात आणि नेमके हेच नेवाडा येथील झायमॉस कंपनीच्या प्रयोगशाळेत घडत आहे . मानवनिर्मित नॅनोकणांचा ढग बाहेर पडला आहे .हा ढग बुद्धिवान आहे . तो स्वतः शिकू शकतो.. स्वतःसाठी पॉवर निर्माण करू शकतो..तो विचार करू शकतो...मुख्य म्हणजे तो शिकार करू शकतो.यांची पुनरुत्पादन क्षमता ही प्रचंड आहे . त्याची रचनाच शिकारी म्हणून झाली आहे आणि दर तासाला त्याची शक्ती वाढतेय . त्याना नष्ट करण्यासाठी सध्या बेकार आणि आपल्या मुलांना सांभाळणाऱ्या जॅक या सॉफ्टवेअर प्रोग्रॅमरला बोलावण्यात आलेय. मुख्य म्हणजे जॅकची बायको ज्युलिया झायमॉस कंपनीच्या ह्या प्रोजेक्टची मुख्य अधिकारी आहे . बघूया ते शिकारी नॅनोकण जॅकला नष्ट करता येतात का ...?? की या शिकारी ढगांचे सावज आपण ठरणार ....?? .एक श्वास रोखून ठे ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

FRANKLIN MALIKA COMBO SET - 29 BOOKS
FRANKLIN MALIKA COMBO SET - 29 BOOKS by PAULETTE BOURGEOIS Rating Star
रश्मी मुसळे-साळगांवकर

लहानग्यांच्या विश्वातल्या छोट्या छोट्या गमतीजमती या पुस्तकांच्या मालिकेतून अगदी मजेशीर पद्धतीने मुलांसमोर येतात..त्या गोष्टी ऐकताना, वाचताना मूलं यात अगदी रमून जातात... शिवाय आजवर ससा आणि कासव यांव्यतिरिक्त इतर कथाविश्वात काहीसा दुर्लक्षित राहिलेलया कासवाच्या जगातही अनेक गंमती घडू शकतात ही नवखी कल्पना मुलांना भारीच आवडते... ...Read more

MARATHI DAULATICHE NARI SHILP
MARATHI DAULATICHE NARI SHILP by GOPAL DESHMUKH Rating Star
लोकसत्ता २२ जानेवारी २०२३.

बाईचे विश्व हे चूल आणि मूल एवढय़ापुरतेच मर्यादित नसते याची उदाहरणे आपल्याला इतिहासातसुद्धा पाहायला मिळतात. इतिहासात डोकावून पाहिले तर स्त्रियांचे आयुष्य हजार बंधनांनी जखडलेले होते. लहान वयातच मुलींची लग्नं केली जात असत. सतीची चाल, विधवांना केशपनाची सक्ती, सती जाणाऱ्या स्त्रियांच्या मरणाइतकेच सती न जाणाऱ्या विधवांचे जगणे भयंकर होते. अशा समाजातच काही स्त्रिया अशासुद्धा होऊन गेल्या ज्यांनी आपल्या कार्याने, आपल्या धाडसाने, शौर्याने महाराष्ट्राच्या जडणघडणीत मोलाची भर टाकली. समाजाचा स्त्रीकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलण्यात ज्यांचा मोलाचा वाटा आहे अशाच काही निवडक स्त्रियांचे चरित्र रेखाटन गोपाळ देशमुख यांनी ‘मराठी दौलतीचे नारी शिल्प’ या पुस्तकात केले आहे. जिजाऊमातेने बालशिवाजींची जडणघडण केली. अशा कर्तृत्ववान जिजाबाईंचे व्यक्तिचरित्र ‘राजमाता जिजाऊ’ या प्रकरणामध्ये सारांशरूपाने रेखाटण्याचा प्रयत्न लेखकाने केला आहे. तसेच शिवरायांच्या जीवनात ज्या आठ राण्या आल्या त्यांच्या जीवनकार्याचे वर्णन ‘राणीवसा’ या प्रकरणात येते. ‘महाराणी येसूबाई’ या प्रकरणात त्यांची स्वराज्यनिष्ठा व दूरदृष्टी कशी दिसून येते याचे वर्णन केले आहे. संकटसमयी संभाजी राजांना दिलेल्या सल्ल्यामुळे त्यांच्या कार्यात मदत कशी झाली याचेही वर्णन आले आहे. ताराबाई, उमाबाई दाभाडे, झाशीची राणी लक्ष्मीबाई यांनी युद्धभूमीवर शत्रूला तोंड कसे दिले. दर्याबाई निंबाळकर, पेशवा पत्नी गोपिकाबाई, रमाबाई, गंगाबाई यांनाही व्यक्तिगत सुखदु:खाबरोबरच मराठी दौलतीच्या वाटचालीत आपली भूमिका कशी पार पाडावी लागली याचीही माहिती पुस्तकात देण्यात आली आहे. दौलतीचा कारभार करताना अहिल्याबाईंना तीस वर्षे वैयक्तिक दु:खांना सामोरे जावे लागले. या साऱ्या दु:खांना बाजूला सारून उत्कृष्ट कार्य करून त्या ‘साध्वी पुण्यश्लोक अहिल्या’ कशा झाल्या याचा थोडक्यात आढावा घेतला आहे ‘अहिल्याबाई होळकर’ या प्रकरणात. तसेच पुतळाबाई आणि रमाबाई यांचे पतिनिष्ठेचे वर्णनही वाचायला मिळते. या सर्व व्यक्तिचरित्रांपैकी ‘राणी लक्ष्मीबाई’ यांचे चरित्र वाचताना त्यांची धाडसी वृत्ती, चिकाटी, येईल त्या प्रसंगाला न घाबरता शौर्याने सामोरे जाण्याची वृत्ती व शेवटी त्यांचा झालेला शोकात्मक शेवट आपल्या मनाला चटका लावून गेल्याशिवाय राहात नाही. वयाच्या चौदाव्या वर्षी गंगाधरराव यांच्याशी विवाह झाल्यानंतर आपल्या मुलाच्या आणि पतीच्या निधनानंतर शोक करत न बसता ही वीरांगना आपला दत्तक मुलगा दामोदर याला घेऊन ब्रिटिशांच्या कटू कारस्थानांना तोंड देण्यास सज्ज झाली होती. यातच तिला वीरमरण आले. हे वीरमरण येतानासुद्धा ती मोठय़ा शौर्याने अखेरच्या क्षणापर्यंत लढली आणि जेव्हा आपला देह आपल्याला साथ देत नाही हे लक्षात आले तेव्हा तिने आपल्या अनुयायांना आपला देह शत्रूच्या हातात पडता कामा नये, त्याला अग्नी द्या, असे सांगितले. अशा या वीरांगनेची गर्जना ‘मै मेरी झांसी नही दूंगी’ ही आजही अनेक स्त्रियांना आपल्या कामात प्रेरणा देणारी अशी आहे. राणी लक्ष्मीबाईच्या मरणाविषयी अनेक हकीकती उपलब्ध आहेत. त्यांचा उल्लेखही या पुस्तकात आला आहे. या पुस्तकातील स्त्रिया इतिहासकालीन असल्याने काही ठिकाणी ऐतिहासिक संदर्भाची पुनरावृत्ती झाल्यासारखे वाटते; पण ते येणेसुद्धा गरजेचे आहे. साध्या सोप्या भाषेत ही स्त्री चरित्रे आपल्याला वाचायला मिळतात. थोडक्यात असे म्हणता येईल की, इतिहासकाळातील थोर महिला विभूतींच्या जीवनकार्याचा अल्पांशाने सार वाचकांपुढे मांडण्याचा प्रयत्न लेखक गोपाळ देशमुख यांनी केला आहे, तो कौतुकास्पद आहे. ...Read more