* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Availability : Notify Me
     
  • ISBN : 9789386888495
  • Edition : 1
  • Publishing Year : NOVEMBER 2017
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 344
  • Language : MARATHI
  • Category : FICTION
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
BAPA CHEMICAL WAS CHEMICAL FACTORY IN THE CENTRAL POPULATED AREA OF MUMBAI. THE CHAIRMAN OF BAPA CHEMICAL IS RASIKBHAI PATEL. POLITICIAN SHIRGOPIKAR AND UNION LEADER JANGI CHACHA TRY TO CAPTURE IT. MAX ENGINEERING FACTORY AT KALWA BELONGS TO SHIRGOPIKAR. SCHOOL CHILDREN OF KALWA MUNICIPAL SCHOOL FAINTED DUE TO POISONOUS GAS LEAK FROM MAX ENGINEERING. DUE TO THIS ROIT OCCURED AT KALWA. PRATAPSINGH MALKAPURKAR, DIRECTOR, INDUSTRIAL SAFETY AND HEALTH (DISH) FIND OUT CAUSES OF GAS LEAK. NAGRAJ DOIJAD, FACTORY INSPECTOR VISITS BAPA CHEMICAL REGARDING ONE WORKER NAMED KRISHNA SURVE. HE WAS DEATHLY ATTACHED BY UNKNOWN PERSON. THE POLICE AND INTELLIGENCE BUREAU (IB) INVESTIGATE ABOUT THIS ATTACK. COL.PRAKASH INVESTIGATES WITH THE HELP OF PRATAPSINGH MALKAPURKAR AND AMITA PATEL INCIDENTS AT BAPA CHEMICALS. IN THE INVESTIGATION COL.PRAKASH MEETS THE FOLLOWERS OF DINE-E-LAHI RELIGION AT PARBHANI. HE COMES TO KNOW THAT FACT OF JEHADIS DECLARATION REGARDING LAND OF BHARAT DECLARED AS DAR-AL-HEARB FROM THE PAKISTANIS WHO SNEAKED IN INDIA BY ILLEGAL MEANS. SHIRGOPIKAR WITHDRAWS THE HIGH COURT PETITION AGAINST BAPA CHEMICALS DUE TO EFFORTS OF PRATAPSINGH MALKAPURKAR. DUE TO THIS DISPUT AROSE BETWEEN SHIRGOPIKAR AND JANGI CHACHA. JANGI CHACHA TRY TO CAPTURE BAPA CHEMICALS WITH THE HELP OF HAMEEDBHAI, A CRIMINAL. HAMEEDBHAI TRY TO KILL PRATAPSINGH. IN THIS MALEE POLICE INSPECTOR KILLS A WORKER OF BAPA CHEMICALS. A RIOT ERUPTS DUE TO THIS. IN THE RIOT CHLORINE GAS LEAK OCCURE. PRATAPSINGH STOPS THE GAS LEAK. MAULANA ASIF, A TERRORIST TRY TO TAKE AWAY PHOSGENE BULLETS OF BAPA CHEMICALS UNDER THE PRESUMPTION OF NECLEAR WEAPONS. COL.PRAKASH FOILS THE ATTEMPT AND KILLS ALL THE TERRIORISTS.
बाह्य शक्तींची उद्योग विश्वातील ढवळाढवळ आणि त्यातून कामगार-व्यवस्थापन आणि कारखान्यांवर नियंत्रण ठेवणारी यंत्रणा यांच्या संबंधात निर्माण होणारा तणाव, त्यातून निर्माण होणारे प्रश्न याचं तपशीलवार चित्रण ‘आघात’ या कादंबरीतून केलं आहे. मुंबईतील बापा केमिकलच्या विस्तारीकरणाला डिश या सरकारी संस्थेचे तरुण संचालक राजे यांचा सार्वजनिक हिताच्या दृष्टिकोनातून विरोध असतो; पण राजे अत्यंत संयमाने ते प्रकरण हाताळत असतात. बापा केमिकलच्या वापरात नसलेल्या गोदामात फॉसजीन या विषारी गॅसची नळकांडी आहेत, असं डिश संस्थेचे फॅक्टरी इन्स्पेक्टर सरपोतदार यांना आढळतं. अर्थातच ते ही बाब राजेंच्या निदर्शनाला आणून देतात. फॉसजीनची नळकांडी हस्तगत करण्यासाठी जेहादी बापाच्या गोडाऊनमध्ये शिरतात आणि एक संघर्षनाट्य पेटतं. त्या संघर्षनाट्याला राजे कसं तोंड देतात आणि कर्नल प्रकाश राजेंच्या मदतीला कसे धावून येतात, हे जाणून घेण्यासाठी ‘आघात’ ही कादंबरी वाचली पाहिजे.
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
#AGHAT#SURYKANTJADHAV#RAJE#KARNAL#BAPACHEMICAL#MAXENGINEERING#CARBONMONOXIDELEAKAGE#VISHARI VAYU
Customer Reviews
  • Rating Starदैनिक शिवनातीर औरंगाबाद २९ नोव्हेंबर 2017

    बाह्य शक्ती आणि उद्योगविश्व यांच्यातील संघर्षाचं संयत चित्रण कामगार-मालक संघर्ष आणि त्या अनुषंगाने उपस्थित होणारे अनेक प्रश्न हा विषय मराठी साहित्यात फार कमी चर्चिला गेला आहे. ज्या साहित्यकृतींमध्ये हा प्रश्न हाताळला गेला त्यामध्ये व्यवस्थापन आणि कागार यांच्यातील संघर्ष हे मुख्य सूत्र होतं. (एखाद-दुसरा अपवाद असूही शकतो.); परंतु सूर्यकांत जाधव यांनी कामगार-मालक असा संघर्ष न रंगवता बाह्य शक्तींची उद्योग विश्वातील ढवळाढवळ आणि त्यातून कामगार-व्यवस्थापन आणि कारखान्यांवर नियंत्रण ठेवणारी यंत्रणा यांच्या संबंधात निर्माण होणारा तणाव, त्यातून निर्माण होणारे प्रश्न याचं तपशीलवार चित्रण ‘आघात’ या कादंबरीतून केलं आहे. मुंबईतील बापा केमिकलच्या विस्तारीकरणाला डिश या सरकारी संस्थेचे तरुण संचालक राजे यांचा सार्वजनिक हिताच्या दृष्टिकोनातून विरोध असतो; पण राजे अत्यंत संयमाने ते प्रकरण हाताळत असतात. बापा केमिकलचे मालक रसिकभाई पटेल यांची मुलगी अमिता आणि राजे या प्रकरणात जवळ येतात आणि लग्न करायचं ठरवतात. बापा केमिकलच्या वापरात नसलेल्या गोदामात फॉसजीन या विषारी गॅसची नळकांडी आहेत, असे डिश संस्थेचे फॅक्टरी इन्स्पेक्टर सरपोतदार यांना आढळते. अर्थातच ते ही बाब राजेंच्या निदर्शनाला आणून देतात. राजे आणि कर्नल प्रकाश हे प्रकरण शांतपणे हाताळायचं ठरवतात. दरम्यान, राजकीय पुढारी असलेले मॅक्स इंजिनिअरिंग कंपनीचे मालक शिरगोपीकर आणि युनियन लीडर जंगी यांनी बापा केमिकलच्या विरोधात कोर्टात केस दाखल केलेली असते, ती केस मागे घेण्याचा निर्णय शिरगोपीकर घेतात आणि जंगी भडकतो. बाहेरच्या कामगारांना आणि युनियनला हाताशी धरून बापाच्या व्यवस्थापनाला पायाशी आणायचा जंगीचा डाव असतो; पर्यावरणाच्या मुद्द्यावरून कारखान्याच्या मालकांना अडचणीत आणायचं आणि वाटेल तेवढे पैसे उकळायचे, हा जंगीचा उद्योग असतो. आताही बापा केमिकलच्या कामगारांना तो कामावर जाण्यापासून रोखू पाहतो आणि रसिकभाई पटेलांना नेस्तनाबूत करण्यासाठी पूर्ण तयारीनिशी मैदानात उतरलेला असतो; पण ऐन वेळेला शिरगोपीकरांची माणसे जंगी आणि त्याच्या माणसांवर हल्ला चढवतात आणि जंगीचं आंदोलन चिरडलं जातं. फॉसजीनची नळकांडी हस्तगत करण्यासाठी जेहादी बापाच्या गोडाऊनमध्ये शिरतात आणि एक संघर्षनाट्य पेटतं. त्या संघर्षनाट्याला राजे कसं तोंड देतात आणि कर्नल प्रकाश राजेंच्या मदतीला कसे धावून येतात, याच्या साद्यंत तपशीलासाठी ‘आघात’ ही कादंबरी वाचली पाहिजे. अशा रीतीने कारखाने, कामगार, कारखान्यांवर नियंत्रण ठेवणारी यंत्रणा या घटकांचं आणि जेहादींसारख्या बाह्य शक्तींमुळे या घटकांमध्ये निर्माण होणाऱ्या तणावाचं वास्तव चित्रण ‘आघात’ या कादंबरीतून केलं आहे. कोणत्याही एका घटकाची बाजू न घेता, आहे ती वस्तुस्थिती समोर आणणे, हे पथ्य लेखकाने पाळल्यामुळे कादंबरी भडक होत नाही. तसेच फॅक्टरी इन्स्पेक्टरला केवळ कामगारांचे प्रश्न सोडवायचे नसतात, तर अन्यही कामे करावी लागतात, याचंही दिग्दर्शन या कादंबरीतून होतं. फॅक्टरी इन्स्पेक्टरच्या कामातील बारकावे या कादंबरीमुळे समजतात. राजे, कर्नल प्रकाश यांच्या व्यक्तिरेखा संयतपणे चित्रित केल्यामुळे जगात काही माणसं तरी समतोल आहेत, असा सकारात्मक संदेश या कादंबरीतून मिळतो. शिरगोपीकर या राजकारणी व्यक्तीची व्यक्तिरेखाही नेहमीप्रमाणे काळ्या रंगात न रंगवता त्या व्यक्तिरेखेचीही उजळ बाजू अधोरेखित केली आहे. त्यामुळे ‘आघात’ ही एका संघर्षपूर्ण विषयावरची संयतपणे मांडणी केलेली कादंबरी आहे, असं म्हणायला हरकत नसावी. सुरुवातीला ही कादंबरी कामगार-व्यवस्थापन यांच्यातील संघर्षाची आहे, असं वाटत असताना जेहादींच्या प्रवेशामुळे ती गुप्तहेर कथेच्या वळणाने जाते. कामगार-व्यवस्थापन या पैलूंबरोबरच बाह्यशक्ती हा पैलू त्यात सामील झाल्यामुळे कारखान्यांना बाह्य शक्तींपासून उपद्रव होऊ शकतो, ही बाजूही समोर येते. ही कादंबरी कुठेही कंटाळवाणी होत नाही. ती वाचनीय आहे. ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

A-AMITABHCHA
A-AMITABHCHA by G.B. DESHMUKH Rating Star
प्रा. डॉ . वैशाली रवी देशमुख, अमरावती

वाचनाचे फायदे सांगताना प्रसिद्ध इंग्रजी लेखक फ्रान्सिस बेकन म्हणतो `रीडिंग मेकेथ अ फुल मॅन`. वाचनामुळे माणूस परिपूर्ण होतो. क्वचित एखादं असं पुस्तक हाती येतं जे वाचल्यानंतर ह्या परिपूर्णतेची , आत्यंतिक समाधानाची जाणीव होते . नुकतंच जी. बी. देशुख यांचं `अ- अमिताभचा` हे पुस्तक हाती पडलं एका बैठकीत ते वाचून संपवलं आणि काहीतरी माहितीपर तरीही दर्जेदार आणि साहित्यिक मूल्य असणारं पुस्तक वाचण्याचा आनंद प्राप्त झाला. सीमा आणि केंद्रीय उत्पादन शुल्क विभागात काम करून निवृत्त झालेल्या जीबी देशमुखांनी २०२० मध्ये अमिताभ बच्चनच्या कारकिर्दीच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त त्यांच्या विविध ५० सिनेमातील भूमिकांचे विश्लेषण करणारे साप्ताहिक सदर दैनिक सकाळ मध्ये प्रकाशित केले. कोरोना काळात लिहिलेल्या या लेखमालेला त्यावेळी प्रचंड प्रतिसाद मिळाला. केवळ ज्येष्ठच नाही तर तरुण वाचकांनीही या लेखमालिकेला पसंतीची पावती दिली. २०२२ मध्ये मेहता पब्लिकेशनने अमिताभ बच्चनच्या एकूण ६२ सिनेमांवर आधारित लेख `अ अमिताभचा` या पुस्तक रूपाने प्रकाशित केले. १९६९ पासून चित्रपटसृष्टीत पदार्पण करणाऱ्या अमिताभ बच्चनच्या कारकीर्दीला पाच दशकांपेक्षा अधिक काळ लोटला तरीही त्याचे सिनेरसिकांच्या भावविश्वावर असलेले अधिराज्य कायम आहे. ती जादू कमी ओसरण्याचं नावच घेत नाही तर ती दिवसेंदिवस वाढत आहे . किरकोळ शरीरयष्टी, भरमसाठ उंची आणि सौंदर्याच्या साचेबंद व्याख्येत न बसणारा चेहरा असलेला अमिताभ आणि त्याला मिळालेली अफाट लोकप्रियता याची सांगड घालणे सर्वसामान्य व्यक्तीच्या आकलनापलीकडचे आहे. अमिताभ बच्चनचे प्रचंड चाहते असलेले जी . बी देशमुख यांच्यासाठी `अ` हा अमिताभचाच आहे. परंतु केवळ एक चाहते म्हणून त्यांनी हे पुस्तक लिहिलेलं नाही तर अमिताभ बच्चनचे जे गारुड कित्येक दशकांपासून प्रेक्षकांच्या मनावर आहे त्यामागची नेमकी कारणे कोणती असू शकतात हे अत्यंत अभ्यासपूर्ण पद्धतीने शोधण्याचा प्रयत्न त्यांनी या पुस्तकात केलेला आहे. एक रसिक, चोखंदळ प्रेक्षक, अभ्यासक आणि समीक्षक म्हणून या पुस्तकात लेखक आपल्या समोर येतात. `बेमिसाल` पासून `झुंड` या चित्रपटा पर्यंत अमिताभ बच्चनच्या कारकीर्दीतील उत्तमोत्तम ६२ सिनेमांचा लेखकांनी या पुस्तकात परामर्ष घेतलेला आहे. या चित्रपटांमधील अमिताभ बच्चनच्या भूमिकेशी संबंधित सर्व बाबींचे अत्यंत अभ्यास पूर्वक रसग्रहण केलेले आहे. `अमिताभ बच्चन चांगला कलाकार आहे` किंवा `अमुक अमुक चित्रपट चांगला आहे` असं जेव्हा एखादा सर्वसामान्य प्रेक्षक म्हणतो त्यावेळेस हे आवडणं किंवा चांगलं असणं नेमकं का आहे याची उत्तरं देण्याचा प्रयत्न लेखकाने प्रत्येक लेखात केलेला आहे. प्रत्येक चित्रपटातील अमिताभ बच्चनच्या भूमिकेशी संबंधित हायलाइट्स जसे की, एखादा उत्कट प्रसंग, गाणे, नृत्य, मारामारीचे दृश्य यावर लेखकाने प्रकाश टाकलेला आहे. आपण जर तो चित्रपट पाहिला असेल तर लेखकाने वर्णन केलेले प्रसंग जसेच्या तसे डोळ्यासमोर उभे राहतात आणि बघितला नसेल तर तो चित्रपट आपण पाहिलाच पाहिजे अशी तीव्र इच्छा मनात निर्माण होते. उदाहरणार्थ, शोले या चित्रपटातील रसग्रहणात ,चेहऱ्यावरचे रेषाही ढळू न देता अमिताभने फेकलेले वन लाइनर्स, बुद्धीची चमक दाखवणारे शांतपणे केलेले विनोद, हळुवार प्रेमासाठी त्याचं आतल्या आत झुरणं , मित्राच्या मांडीवर प्राणत्यागाचे उत्कट दृश्य, आणि पिढ्यानपिढ्या लक्षात राहिलेला मावशी लीला मिश्रा सोबतचा विनोदी संवाद यांचे परिणामकारक वर्णन करून त्यांनी अमिताभची उत्तुंग अभिनय क्षमता उलगडून दाखवली आहे. या पुस्तकाला वाचनीय बनवणारा एक घटक म्हणजे लेखकाने वापरलेली भाषा. अत्यंत साध्या, सोप्या आणि अनुभवातून आलेल्या शब्दातून लेखकाने अमिताभ बच्चन भूमिकांचा उत्तरोत्तर चढत जाणारा आलेख शब्दांकित केला आहे. लेखकाच्या भाषा प्रभुत्वाचे साक्ष देणारी अनेक वाक्य पुस्तकांमध्ये जागजागी आढळतात. एका ठिकाणी ते लिहितात, `अमिताभने सिनेमातील विनोदाची सूत्र हाती घेतली तेव्हापासून विनोदी कलाकारांवर जणू बेकारीचं संकट कोसळलं होतं. प्रेक्षकांना दिलेल्या मनोरंजनाच्या वचनाशी `नमक हलाली` करणाऱ्या प्रकाश मेहरा आणि अमिताभ या जोडीने प्रेक्षकांना `और हम नाचे बिन घुंगरू के` असा आनंद दिला होता. असेच एक सुंदर वाक्य- `अमिताभचा उंट मनोरंजनाचा अख्खा तंबू व्यापून बसला होता`. लेखकाच्या ओघवत्या आणि मनाला भिडणाऱ्या भाषा शैलीचं एक उदाहरण मिली चित्रपटाच्या रसग्रहणातील या परिषदेतून दिसून येत: "शेखरच्या मनावर चढलेली उदासीची पुटं अमिताभच्या कसदार अभिनयामुळे आपल्याला अस्वस्थ,उदास करून सोडतात. दारूच्या नशेतील अमिताभचं एक दृश्य मस्त जमलं होतं . मोबाईल, टीव्ही इत्यादी आधुनिक साधनं व्यवहारात येण्याच्या आधीचा तो काळ होता. मिली आजारामुळे घरात बंदिस्त झाल्यानंतर त्या दोघात नोकराच्या माध्यमातून जो पत्र व्यवहार होतो तो आजच्या मोबाईल चॅटिंग पेक्षाही प्रभावी वाटतो. रोज मिलीला वरच्या मजल्यावरून खालच्या मजल्यावर गुलदस्ता पाठवणारा अमिताभ एका चिठ्ठीत लिहितो `जो गुलदस्ता बनके खुद आ जाऊ तो कहा रखुं . ` हे रोमँटिसिझम खूप वरच्या स्तराचं होतं. अमर्याद दुःखाची वीण घट्ट करत जाताना किशोर कुमारच्या दर्दभऱ्या स्वरात `बडी सुनी, सुनी है जिंदगी ये जिंदगी` आणि `आये तुम याद मुझे गाने लगी हर धडकन` ही दोन गाणी वातावरण औदासिन्यानं भरून टाकतात. मनाचा चांगला पण लहानपणी आई वडिलांच्या बाबतीत घडलेल्या घटनेने आणि लोकांनी त्याकरिता डिवचल्यानं कच खाल्लेला, प्रेमाची आस लागलेला एक तरुण अमिताभने लाजवाब रंगवला होता. या पुस्तकाच्या रंजकतेत भर टाकणारा आणखी एक घटक म्हणजे लेखकाचे आत्मचरित्रात्मक निवेदन. प्रत्येक चित्रपटाच्या बाबतीत तो चित्रपट त्यांनी केव्हा पाहिला, कुणाबरोबर पाहिला,त्यावेळी ते किती वर्षांचे होते आणि त्या चित्रपटाचा त्यांच्या भावविश्वावर कसा परिणाम झाला याचा उल्लेख जागजागी केलेला आहे. लेखकाच्या पिढीतील वाचकांना यातून पुनः प्रत्ययाचा आनंद मिळतो. आणि आजच्या पिढीतील इतर वाचकांसाठीही ही बाब रंजक ठरते. पुस्तकाच्या मलपृष्ठावर लेखक म्हणतात, `1973 साली आम्ही पाचवीत असताना आम्हाला प्रथमच हिंदी सिनेमातील नायकाची `ये पोलीस स्टेशन है, तुम्हारे बाप का घर नही`, अशी आगळीवेगळी मिजास पडद्यावर बघायला मिळाली आणि आता निवृत्तीला आलो तर हाच अद्भुत माणूस आम्हाला `पिंक` या महिलाप्रधान सिनेमात `ना का मतलब सिर्फ ना होता है`, असं ठणकावतो, `बदला` ह्या रहस्यपटात तितक्याच जोरकसपणे `सबका सच अलग अलग होता है ,` असं तत्वज्ञान मांडतो आणि अगदी अलीकडच्या `झुंड` मध्ये झोपडपट्टीतील धटिंगण मुलांच्या घोळक्याला `झुंड नाही, टीम... `म्हणायची शिकवण देतो तेव्हा आजही त्याचं म्हणणं आमच्या हृदयात थेट उतरतं .` पुस्तक वाचत असताना लेखकाच्या अफाट निरीक्षणशक्तीचे आणि अभ्यासू वृत्तीचे दर्शन घडते . विविध दिग्दर्शकांनी अमिताभच्या अभिनयक्षमतेचा केलेला वापर , अमिताभच्या डोळ्यातून सशक्तपणे व्यक्त झालेले हृदयस्पर्शी भाव, वेगवेगळ्या चित्रपटात त्याने केलेला लाथेचा उपयोग, त्याची वैशिष्ट्यपूर्ण नृत्य, आणि भारदस्त आवाजातील संवाद आणि गाणी यांचं वर्णन वाचत असताना लेखकाची संशोधक वृत्ती तर जाणवतेच परंतु आपणही हे चित्रपट पाहून हा रसास्वाद घ्यायलाच हवा ही इच्छा वाचकांच्या मनात प्रकर्षाने निर्माण होते.यातच या पुस्तकाचे फार मोठे यश सामावले आहे हे नक्की! ...Read more

SAAD GHALATO KALAHARI
SAAD GHALATO KALAHARI by MARK & DELIA OWENS Rating Star
मोहन देशपांडे नागपुर

cry of kalahari ह्या पुस्तके अनुवाद हिंदी सर्वोत्तम (RD) मध्ये कित्येक वर्षापूर्वी वाचले होते. माझ्याजवळ, जपून ठेवलेल्या पुस्तकामधे ते पुस्तक गहाळ झाले. मग 4 वर्षापूर्वी हे पुस्तक मिळाले व विकत घेतले. ते अनेक वेळा वाचून काढले, तरी प्रत्येकवेळी वेगळा नंद होतो. ती तुमची रसाळ भाषेची किमया. ह्या मुळेच Deceiption valley एकदा तरी बघता यावी ही इच्छा तुमचे अभिनंदन व धन्यवाद... ...Read more