* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: AAGHAT
  • Availability : Available
  • ISBN : 9789386888495
  • Edition : 1
  • Publishing Year : NOVEMBER 2017
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 344
  • Language : MARATHI
  • Category : FICTION
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
BAPA CHEMICAL WAS CHEMICAL FACTORY IN THE CENTRAL POPULATED AREA OF MUMBAI. THE CHAIRMAN OF BAPA CHEMICAL IS RASIKBHAI PATEL. POLITICIAN SHIRGOPIKAR AND UNION LEADER JANGI CHACHA TRY TO CAPTURE IT. MAX ENGINEERING FACTORY AT KALWA BELONGS TO SHIRGOPIKAR. SCHOOL CHILDREN OF KALWA MUNICIPAL SCHOOL FAINTED DUE TO POISONOUS GAS LEAK FROM MAX ENGINEERING. DUE TO THIS ROIT OCCURED AT KALWA. PRATAPSINGH MALKAPURKAR, DIRECTOR, INDUSTRIAL SAFETY AND HEALTH (DISH) FIND OUT CAUSES OF GAS LEAK. NAGRAJ DOIJAD, FACTORY INSPECTOR VISITS BAPA CHEMICAL REGARDING ONE WORKER NAMED KRISHNA SURVE. HE WAS DEATHLY ATTACHED BY UNKNOWN PERSON. THE POLICE AND INTELLIGENCE BUREAU (IB) INVESTIGATE ABOUT THIS ATTACK. COL.PRAKASH INVESTIGATES WITH THE HELP OF PRATAPSINGH MALKAPURKAR AND AMITA PATEL INCIDENTS AT BAPA CHEMICALS. IN THE INVESTIGATION COL.PRAKASH MEETS THE FOLLOWERS OF DINE-E-LAHI RELIGION AT PARBHANI. HE COMES TO KNOW THAT FACT OF JEHADIS DECLARATION REGARDING LAND OF BHARAT DECLARED AS DAR-AL-HEARB FROM THE PAKISTANIS WHO SNEAKED IN INDIA BY ILLEGAL MEANS. SHIRGOPIKAR WITHDRAWS THE HIGH COURT PETITION AGAINST BAPA CHEMICALS DUE TO EFFORTS OF PRATAPSINGH MALKAPURKAR. DUE TO THIS DISPUT AROSE BETWEEN SHIRGOPIKAR AND JANGI CHACHA. JANGI CHACHA TRY TO CAPTURE BAPA CHEMICALS WITH THE HELP OF HAMEEDBHAI, A CRIMINAL. HAMEEDBHAI TRY TO KILL PRATAPSINGH. IN THIS MALEE POLICE INSPECTOR KILLS A WORKER OF BAPA CHEMICALS. A RIOT ERUPTS DUE TO THIS. IN THE RIOT CHLORINE GAS LEAK OCCURE. PRATAPSINGH STOPS THE GAS LEAK. MAULANA ASIF, A TERRORIST TRY TO TAKE AWAY PHOSGENE BULLETS OF BAPA CHEMICALS UNDER THE PRESUMPTION OF NECLEAR WEAPONS. COL.PRAKASH FOILS THE ATTEMPT AND KILLS ALL THE TERRIORISTS.
बाह्य शक्तींची उद्योग विश्वातील ढवळाढवळ आणि त्यातून कामगार-व्यवस्थापन आणि कारखान्यांवर नियंत्रण ठेवणारी यंत्रणा यांच्या संबंधात निर्माण होणारा तणाव, त्यातून निर्माण होणारे प्रश्न याचं तपशीलवार चित्रण ‘आघात’ या कादंबरीतून केलं आहे. मुंबईतील बापा केमिकलच्या विस्तारीकरणाला डिश या सरकारी संस्थेचे तरुण संचालक राजे यांचा सार्वजनिक हिताच्या दृष्टिकोनातून विरोध असतो; पण राजे अत्यंत संयमाने ते प्रकरण हाताळत असतात. बापा केमिकलच्या वापरात नसलेल्या गोदामात फॉसजीन या विषारी गॅसची नळकांडी आहेत, असं डिश संस्थेचे फॅक्टरी इन्स्पेक्टर सरपोतदार यांना आढळतं. अर्थातच ते ही बाब राजेंच्या निदर्शनाला आणून देतात. फॉसजीनची नळकांडी हस्तगत करण्यासाठी जेहादी बापाच्या गोडाऊनमध्ये शिरतात आणि एक संघर्षनाट्य पेटतं. त्या संघर्षनाट्याला राजे कसं तोंड देतात आणि कर्नल प्रकाश राजेंच्या मदतीला कसे धावून येतात, हे जाणून घेण्यासाठी ‘आघात’ ही कादंबरी वाचली पाहिजे.
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
#AGHAT#SURYKANTJADHAV#RAJE#KARNAL#BAPACHEMICAL#MAXENGINEERING#CARBONMONOXIDELEAKAGE#VISHARI VAYU
Customer Reviews
  • Rating Starदैनिक शिवनातीर औरंगाबाद २९ नोव्हेंबर 2017

    बाह्य शक्ती आणि उद्योगविश्व यांच्यातील संघर्षाचं संयत चित्रण कामगार-मालक संघर्ष आणि त्या अनुषंगाने उपस्थित होणारे अनेक प्रश्न हा विषय मराठी साहित्यात फार कमी चर्चिला गेला आहे. ज्या साहित्यकृतींमध्ये हा प्रश्न हाताळला गेला त्यामध्ये व्यवस्थापन आणि कागार यांच्यातील संघर्ष हे मुख्य सूत्र होतं. (एखाद-दुसरा अपवाद असूही शकतो.); परंतु सूर्यकांत जाधव यांनी कामगार-मालक असा संघर्ष न रंगवता बाह्य शक्तींची उद्योग विश्वातील ढवळाढवळ आणि त्यातून कामगार-व्यवस्थापन आणि कारखान्यांवर नियंत्रण ठेवणारी यंत्रणा यांच्या संबंधात निर्माण होणारा तणाव, त्यातून निर्माण होणारे प्रश्न याचं तपशीलवार चित्रण ‘आघात’ या कादंबरीतून केलं आहे. मुंबईतील बापा केमिकलच्या विस्तारीकरणाला डिश या सरकारी संस्थेचे तरुण संचालक राजे यांचा सार्वजनिक हिताच्या दृष्टिकोनातून विरोध असतो; पण राजे अत्यंत संयमाने ते प्रकरण हाताळत असतात. बापा केमिकलचे मालक रसिकभाई पटेल यांची मुलगी अमिता आणि राजे या प्रकरणात जवळ येतात आणि लग्न करायचं ठरवतात. बापा केमिकलच्या वापरात नसलेल्या गोदामात फॉसजीन या विषारी गॅसची नळकांडी आहेत, असे डिश संस्थेचे फॅक्टरी इन्स्पेक्टर सरपोतदार यांना आढळते. अर्थातच ते ही बाब राजेंच्या निदर्शनाला आणून देतात. राजे आणि कर्नल प्रकाश हे प्रकरण शांतपणे हाताळायचं ठरवतात. दरम्यान, राजकीय पुढारी असलेले मॅक्स इंजिनिअरिंग कंपनीचे मालक शिरगोपीकर आणि युनियन लीडर जंगी यांनी बापा केमिकलच्या विरोधात कोर्टात केस दाखल केलेली असते, ती केस मागे घेण्याचा निर्णय शिरगोपीकर घेतात आणि जंगी भडकतो. बाहेरच्या कामगारांना आणि युनियनला हाताशी धरून बापाच्या व्यवस्थापनाला पायाशी आणायचा जंगीचा डाव असतो; पर्यावरणाच्या मुद्द्यावरून कारखान्याच्या मालकांना अडचणीत आणायचं आणि वाटेल तेवढे पैसे उकळायचे, हा जंगीचा उद्योग असतो. आताही बापा केमिकलच्या कामगारांना तो कामावर जाण्यापासून रोखू पाहतो आणि रसिकभाई पटेलांना नेस्तनाबूत करण्यासाठी पूर्ण तयारीनिशी मैदानात उतरलेला असतो; पण ऐन वेळेला शिरगोपीकरांची माणसे जंगी आणि त्याच्या माणसांवर हल्ला चढवतात आणि जंगीचं आंदोलन चिरडलं जातं. फॉसजीनची नळकांडी हस्तगत करण्यासाठी जेहादी बापाच्या गोडाऊनमध्ये शिरतात आणि एक संघर्षनाट्य पेटतं. त्या संघर्षनाट्याला राजे कसं तोंड देतात आणि कर्नल प्रकाश राजेंच्या मदतीला कसे धावून येतात, याच्या साद्यंत तपशीलासाठी ‘आघात’ ही कादंबरी वाचली पाहिजे. अशा रीतीने कारखाने, कामगार, कारखान्यांवर नियंत्रण ठेवणारी यंत्रणा या घटकांचं आणि जेहादींसारख्या बाह्य शक्तींमुळे या घटकांमध्ये निर्माण होणाऱ्या तणावाचं वास्तव चित्रण ‘आघात’ या कादंबरीतून केलं आहे. कोणत्याही एका घटकाची बाजू न घेता, आहे ती वस्तुस्थिती समोर आणणे, हे पथ्य लेखकाने पाळल्यामुळे कादंबरी भडक होत नाही. तसेच फॅक्टरी इन्स्पेक्टरला केवळ कामगारांचे प्रश्न सोडवायचे नसतात, तर अन्यही कामे करावी लागतात, याचंही दिग्दर्शन या कादंबरीतून होतं. फॅक्टरी इन्स्पेक्टरच्या कामातील बारकावे या कादंबरीमुळे समजतात. राजे, कर्नल प्रकाश यांच्या व्यक्तिरेखा संयतपणे चित्रित केल्यामुळे जगात काही माणसं तरी समतोल आहेत, असा सकारात्मक संदेश या कादंबरीतून मिळतो. शिरगोपीकर या राजकारणी व्यक्तीची व्यक्तिरेखाही नेहमीप्रमाणे काळ्या रंगात न रंगवता त्या व्यक्तिरेखेचीही उजळ बाजू अधोरेखित केली आहे. त्यामुळे ‘आघात’ ही एका संघर्षपूर्ण विषयावरची संयतपणे मांडणी केलेली कादंबरी आहे, असं म्हणायला हरकत नसावी. सुरुवातीला ही कादंबरी कामगार-व्यवस्थापन यांच्यातील संघर्षाची आहे, असं वाटत असताना जेहादींच्या प्रवेशामुळे ती गुप्तहेर कथेच्या वळणाने जाते. कामगार-व्यवस्थापन या पैलूंबरोबरच बाह्यशक्ती हा पैलू त्यात सामील झाल्यामुळे कारखान्यांना बाह्य शक्तींपासून उपद्रव होऊ शकतो, ही बाजूही समोर येते. ही कादंबरी कुठेही कंटाळवाणी होत नाही. ती वाचनीय आहे. ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

SARTH
SARTH by DR. S. L. BHYRAPPA Rating Star
हेमंत सांबरे

गेल्या तीन दिवसांत ही कादंबरी वाचून पूर्ण झाली .. ही कादंबरी वाचून होताच मन अगदी सुन्न होऊन गेले आहे . त्याचबरोबर अनेक संमिश्र भावना मनात दाटून आल्या आहेत . #आवरण ही जगप्रसिद्ध कादंबरी वाचल्यानंतर भैरप्पा यांच्या बद्दल मनात खूप आदरभाव निर्माण झाला होा . त्यानंतर त्यांचे हे दुसरे पुस्तक म्हणजे #सार्थ आज वाचून पूर्ण केले. या कादंबरीची कथा सातव्या शतकात घडत असते . *नागभट्ट* हा कादंबरीचा नायक आहे . हा नागभट्ट तुमच्या माझ्या सारखा एक सर्वसामान्य मनुष्य आहे . भैरप्पा यांनी त्याच्या नजरेतून त्या काळात घडत असलेल्या अनेक घटनांचा सूक्ष्म आढावा आपल्या समोर अतिशय समर्थपणे मांडला आहे . हे सातवे शतक म्हणजे असे होते की वैदिक धर्माचा प्रभाव जरी जनमानसात असला तरी , बौद्ध धर्माने ही आपली पाळेमुळे पूर्ण निदान उत्तर भारत , पूर्व भारत या भागात पसरवली होती . एक सामान्य मनुष्य म्हणून नागभट्टच्या मनात सुरू असलेली विविध द्वंद , त्याची वैदिक धर्म की बौद्ध धर्म याविषयी झालेली द्विधा मनस्थिती ही लेखकाने अचूक टिपली आहे . अनेक चर्चांमधून बौद्ध तत्त्वज्ञान , वैदिक तत्त्वज्ञान यांची ओळख अतिशय सोप्या भाषेत लेखक आपल्याला करून देतात , ते वाचताना आपल्या चित्ताला एक वेगळेच समाधान मिळत राहते .. या सर्व तत्त्वज्ञानाची प्रदीर्घ चर्चा , नायकाला येत असलेले वेगवेगळे अनुभव यातून आपणही समृध्द होत जातो . मधल्या काळात नायक मथुरेला येऊन राहतो . तेव्हा तिथल्या एका नाटक मंडळींबरोबर ओळख होऊन नायकाला त्यांच्या एका नाटकात प्रत्यक्ष *कृष्णाची* भूमिका करायला मिळते . तेव्हा त्याचे नाव *कृष्णानंद* असे होते . या भूमिकेमुळे नायकाला त्या भागात प्रचंड प्रसिध्दी मिळते . या नाटकातील असलेली त्याची नायिका चंद्रिका या सुंदर स्त्री बरोबर त्याचा विशेष स्नेह होऊन त्यांचे प्रेम ही जुळते . एखादी गोष्टीचा प्रचंड अभ्यास करून त्याला मांडणे यात भैरप्पा यांचा हात कदाचित फार कमी लेखक धरू शकतील . ही कादंबरी वाचतानाही प्रत्यही जाणवत राहते . याच काळात आद्य शंकराचार्य व मंडणमिश्र यांच्यातील झालेल्या जगप्रसिद्ध वादावर दोन ते तीन प्रकरणे या पुस्तकात आली आहे . या दोन दिग्गज वैदिक ऋषी बद्दल मी इतर अनेक ठिकाणी खूप ओझरते उल्लेख ऐकले होते , पण या कादंबरीत विस्तृत माहिती मिळाली , व एक वेगळेच समाधान मिळाले . कादंबरीचा शेवट आपल्याला पुस्तकातील आधीच्या अनेक कथावस्तू पासून एका वेगळ्याच दुनियेत घेऊन जातो .. याच सातव्या शतकात वायव्येकडून अरब लोकांची आक्रमणे सुरू झाली होती . तोपर्यंत भारतवर्षात लढली जाणारी युद्ध फक्त रणांगणावर लढली जात , त्याचा सामान्य जनतेला कुठलाही त्रास होत नसे . पण अरबांनी केलेल्या आक्रमण मुळे भारताचा सांस्कृतिक ढाचा कसा उद्ध्वस्त होऊ लागला याचे अचूक व सत्य वर्णन भैरप्पा यांनी केले आहे . ते वाचताना तेव्हाही हिंदूंची सद्गुण विकृती ( अनावश्यक असलेली अती सहिष्णुता ) कशा प्रकारे हिंदूंचा नाश करते हे ही त्यांनी सांगितले आहे . ती सर्व शेवटची प्रकरणे आपण सर्व हिंदूंनी मुळातच वाचण्यासारखी व अभ्यास करण्यासारखी आहे . एका प्रसंगात जेव्हा काही राजे एकत्र येऊन अरबांवर आक्रमण करण्याचे योजतात , तेव्हा धूर्त अरब त्या गावातील सूर्यमंदीर भ्रष्ट करायची धमकी देऊन त्या गावातील लोकांना युद्ध करण्यापासून व बाहेरून आलेल्या सैनिकांना सहाय्य न करण्याचे वचन घेतात . त्यामुळे जे नको तेच होते , व हळूहळू तो प्रदेश अरबांच्या ताब्यात जाऊन तेथला बौद्ध , वैदिक हिंदू धर्म नष्ट होऊ लागतो , याचे विदारक वर्णन आपल्यासमोर येते . हे वाचताना मला १७५१ साली नानासाहेब पेशव्यांनी काशी वर आक्रमण करून ते क्षेत्र मुक्त करण्याच्या प्रसंगाची आठवण झाली . तेव्हाही काशी मधील जनतेने नानासाहेब पेशव्यांना रोखले होते , नाहीतर तेव्हाचा ज्ञानवापी मंदीर मुक्त झाले असते ... तेव्हाही हिंदूंची सद्गुण विकृती आड आली जशी ती सातव्या शतकात ही आड आली होती .. असो --- अनेक अद्भुत प्रसंगातून आपल्याला ही कादंबरी घेऊन जात राहते ..सातव्या शतकातील भारताचे वर्णन वाचून आपण त्यावेळच्या राजांची वृत्ती , जनतेचा स्वभाव , साधू तसेच बौद्ध भिक्खू यांचे स्वभाव, त्यांचे विचार आपल्याला कळत जातात . लेखक आपल्याला नालंदा विद्यापीठ देखील दाखवून आणतो . त्याकाळात तेथील अध्ययन कसे चालत असे , हेदेखील आपल्याला वाचायला मिळते . पुस्तकाला कादंबरीची मोकळीक असली तरी आपल्याला ऐतिहासिक दृष्टिकोन ही मिळतो , हे नक्की ! ही कादंबरी वाचून होताच, भैरप्पा यांच्या इतर सर्व कादंबऱ्या व पुस्तके वाचण्याची उत्सुकता निर्माण झाली आहे , व ती इच्छा ही लवकरच पूर्ण होईल ही आशा! ...Read more