* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Availability : Available
  • ISBN : 9789386888495
  • Edition : 1
  • Publishing Year : NOVEMBER 2017
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 344
  • Language : MARATHI
  • Category : FICTION
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
BAPA CHEMICAL WAS CHEMICAL FACTORY IN THE CENTRAL POPULATED AREA OF MUMBAI. THE CHAIRMAN OF BAPA CHEMICAL IS RASIKBHAI PATEL. POLITICIAN SHIRGOPIKAR AND UNION LEADER JANGI CHACHA TRY TO CAPTURE IT. MAX ENGINEERING FACTORY AT KALWA BELONGS TO SHIRGOPIKAR. SCHOOL CHILDREN OF KALWA MUNICIPAL SCHOOL FAINTED DUE TO POISONOUS GAS LEAK FROM MAX ENGINEERING. DUE TO THIS ROIT OCCURED AT KALWA. PRATAPSINGH MALKAPURKAR, DIRECTOR, INDUSTRIAL SAFETY AND HEALTH (DISH) FIND OUT CAUSES OF GAS LEAK. NAGRAJ DOIJAD, FACTORY INSPECTOR VISITS BAPA CHEMICAL REGARDING ONE WORKER NAMED KRISHNA SURVE. HE WAS DEATHLY ATTACHED BY UNKNOWN PERSON. THE POLICE AND INTELLIGENCE BUREAU (IB) INVESTIGATE ABOUT THIS ATTACK. COL.PRAKASH INVESTIGATES WITH THE HELP OF PRATAPSINGH MALKAPURKAR AND AMITA PATEL INCIDENTS AT BAPA CHEMICALS. IN THE INVESTIGATION COL.PRAKASH MEETS THE FOLLOWERS OF DINE-E-LAHI RELIGION AT PARBHANI. HE COMES TO KNOW THAT FACT OF JEHADIS DECLARATION REGARDING LAND OF BHARAT DECLARED AS DAR-AL-HEARB FROM THE PAKISTANIS WHO SNEAKED IN INDIA BY ILLEGAL MEANS. SHIRGOPIKAR WITHDRAWS THE HIGH COURT PETITION AGAINST BAPA CHEMICALS DUE TO EFFORTS OF PRATAPSINGH MALKAPURKAR. DUE TO THIS DISPUT AROSE BETWEEN SHIRGOPIKAR AND JANGI CHACHA. JANGI CHACHA TRY TO CAPTURE BAPA CHEMICALS WITH THE HELP OF HAMEEDBHAI, A CRIMINAL. HAMEEDBHAI TRY TO KILL PRATAPSINGH. IN THIS MALEE POLICE INSPECTOR KILLS A WORKER OF BAPA CHEMICALS. A RIOT ERUPTS DUE TO THIS. IN THE RIOT CHLORINE GAS LEAK OCCURE. PRATAPSINGH STOPS THE GAS LEAK. MAULANA ASIF, A TERRORIST TRY TO TAKE AWAY PHOSGENE BULLETS OF BAPA CHEMICALS UNDER THE PRESUMPTION OF NECLEAR WEAPONS. COL.PRAKASH FOILS THE ATTEMPT AND KILLS ALL THE TERRIORISTS.
बाह्य शक्तींची उद्योग विश्वातील ढवळाढवळ आणि त्यातून कामगार-व्यवस्थापन आणि कारखान्यांवर नियंत्रण ठेवणारी यंत्रणा यांच्या संबंधात निर्माण होणारा तणाव, त्यातून निर्माण होणारे प्रश्न याचं तपशीलवार चित्रण ‘आघात’ या कादंबरीतून केलं आहे. मुंबईतील बापा केमिकलच्या विस्तारीकरणाला डिश या सरकारी संस्थेचे तरुण संचालक राजे यांचा सार्वजनिक हिताच्या दृष्टिकोनातून विरोध असतो; पण राजे अत्यंत संयमाने ते प्रकरण हाताळत असतात. बापा केमिकलच्या वापरात नसलेल्या गोदामात फॉसजीन या विषारी गॅसची नळकांडी आहेत, असं डिश संस्थेचे फॅक्टरी इन्स्पेक्टर सरपोतदार यांना आढळतं. अर्थातच ते ही बाब राजेंच्या निदर्शनाला आणून देतात. फॉसजीनची नळकांडी हस्तगत करण्यासाठी जेहादी बापाच्या गोडाऊनमध्ये शिरतात आणि एक संघर्षनाट्य पेटतं. त्या संघर्षनाट्याला राजे कसं तोंड देतात आणि कर्नल प्रकाश राजेंच्या मदतीला कसे धावून येतात, हे जाणून घेण्यासाठी ‘आघात’ ही कादंबरी वाचली पाहिजे.
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
#AGHAT#SURYKANTJADHAV#RAJE#KARNAL#BAPACHEMICAL#MAXENGINEERING#CARBONMONOXIDELEAKAGE#VISHARI VAYU
Customer Reviews
  • Rating Starदैनिक शिवनातीर औरंगाबाद २९ नोव्हेंबर 2017

    बाह्य शक्ती आणि उद्योगविश्व यांच्यातील संघर्षाचं संयत चित्रण कामगार-मालक संघर्ष आणि त्या अनुषंगाने उपस्थित होणारे अनेक प्रश्न हा विषय मराठी साहित्यात फार कमी चर्चिला गेला आहे. ज्या साहित्यकृतींमध्ये हा प्रश्न हाताळला गेला त्यामध्ये व्यवस्थापन आणि कागार यांच्यातील संघर्ष हे मुख्य सूत्र होतं. (एखाद-दुसरा अपवाद असूही शकतो.); परंतु सूर्यकांत जाधव यांनी कामगार-मालक असा संघर्ष न रंगवता बाह्य शक्तींची उद्योग विश्वातील ढवळाढवळ आणि त्यातून कामगार-व्यवस्थापन आणि कारखान्यांवर नियंत्रण ठेवणारी यंत्रणा यांच्या संबंधात निर्माण होणारा तणाव, त्यातून निर्माण होणारे प्रश्न याचं तपशीलवार चित्रण ‘आघात’ या कादंबरीतून केलं आहे. मुंबईतील बापा केमिकलच्या विस्तारीकरणाला डिश या सरकारी संस्थेचे तरुण संचालक राजे यांचा सार्वजनिक हिताच्या दृष्टिकोनातून विरोध असतो; पण राजे अत्यंत संयमाने ते प्रकरण हाताळत असतात. बापा केमिकलचे मालक रसिकभाई पटेल यांची मुलगी अमिता आणि राजे या प्रकरणात जवळ येतात आणि लग्न करायचं ठरवतात. बापा केमिकलच्या वापरात नसलेल्या गोदामात फॉसजीन या विषारी गॅसची नळकांडी आहेत, असे डिश संस्थेचे फॅक्टरी इन्स्पेक्टर सरपोतदार यांना आढळते. अर्थातच ते ही बाब राजेंच्या निदर्शनाला आणून देतात. राजे आणि कर्नल प्रकाश हे प्रकरण शांतपणे हाताळायचं ठरवतात. दरम्यान, राजकीय पुढारी असलेले मॅक्स इंजिनिअरिंग कंपनीचे मालक शिरगोपीकर आणि युनियन लीडर जंगी यांनी बापा केमिकलच्या विरोधात कोर्टात केस दाखल केलेली असते, ती केस मागे घेण्याचा निर्णय शिरगोपीकर घेतात आणि जंगी भडकतो. बाहेरच्या कामगारांना आणि युनियनला हाताशी धरून बापाच्या व्यवस्थापनाला पायाशी आणायचा जंगीचा डाव असतो; पर्यावरणाच्या मुद्द्यावरून कारखान्याच्या मालकांना अडचणीत आणायचं आणि वाटेल तेवढे पैसे उकळायचे, हा जंगीचा उद्योग असतो. आताही बापा केमिकलच्या कामगारांना तो कामावर जाण्यापासून रोखू पाहतो आणि रसिकभाई पटेलांना नेस्तनाबूत करण्यासाठी पूर्ण तयारीनिशी मैदानात उतरलेला असतो; पण ऐन वेळेला शिरगोपीकरांची माणसे जंगी आणि त्याच्या माणसांवर हल्ला चढवतात आणि जंगीचं आंदोलन चिरडलं जातं. फॉसजीनची नळकांडी हस्तगत करण्यासाठी जेहादी बापाच्या गोडाऊनमध्ये शिरतात आणि एक संघर्षनाट्य पेटतं. त्या संघर्षनाट्याला राजे कसं तोंड देतात आणि कर्नल प्रकाश राजेंच्या मदतीला कसे धावून येतात, याच्या साद्यंत तपशीलासाठी ‘आघात’ ही कादंबरी वाचली पाहिजे. अशा रीतीने कारखाने, कामगार, कारखान्यांवर नियंत्रण ठेवणारी यंत्रणा या घटकांचं आणि जेहादींसारख्या बाह्य शक्तींमुळे या घटकांमध्ये निर्माण होणाऱ्या तणावाचं वास्तव चित्रण ‘आघात’ या कादंबरीतून केलं आहे. कोणत्याही एका घटकाची बाजू न घेता, आहे ती वस्तुस्थिती समोर आणणे, हे पथ्य लेखकाने पाळल्यामुळे कादंबरी भडक होत नाही. तसेच फॅक्टरी इन्स्पेक्टरला केवळ कामगारांचे प्रश्न सोडवायचे नसतात, तर अन्यही कामे करावी लागतात, याचंही दिग्दर्शन या कादंबरीतून होतं. फॅक्टरी इन्स्पेक्टरच्या कामातील बारकावे या कादंबरीमुळे समजतात. राजे, कर्नल प्रकाश यांच्या व्यक्तिरेखा संयतपणे चित्रित केल्यामुळे जगात काही माणसं तरी समतोल आहेत, असा सकारात्मक संदेश या कादंबरीतून मिळतो. शिरगोपीकर या राजकारणी व्यक्तीची व्यक्तिरेखाही नेहमीप्रमाणे काळ्या रंगात न रंगवता त्या व्यक्तिरेखेचीही उजळ बाजू अधोरेखित केली आहे. त्यामुळे ‘आघात’ ही एका संघर्षपूर्ण विषयावरची संयतपणे मांडणी केलेली कादंबरी आहे, असं म्हणायला हरकत नसावी. सुरुवातीला ही कादंबरी कामगार-व्यवस्थापन यांच्यातील संघर्षाची आहे, असं वाटत असताना जेहादींच्या प्रवेशामुळे ती गुप्तहेर कथेच्या वळणाने जाते. कामगार-व्यवस्थापन या पैलूंबरोबरच बाह्यशक्ती हा पैलू त्यात सामील झाल्यामुळे कारखान्यांना बाह्य शक्तींपासून उपद्रव होऊ शकतो, ही बाजूही समोर येते. ही कादंबरी कुठेही कंटाळवाणी होत नाही. ती वाचनीय आहे. ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

RAZOR SHARP
RAZOR SHARP by ASHWIN SANGHI Rating Star
सुनील माने, पुणे

लेखक अश्विन सांघी “द रोझाबल लाइन” या पहिल्याच कादंबरीने खूप लोकप्रिय झाला. प्राचीन भारतीय दंतकथा/ऐतिहासिक संदर्भ घेऊन त्याच्याभोवती आजच्या काळात रहस्यपूर्ण कथा लिहिणारा अश्विन. Chanakya’s Chant, The Krishna Key, The Sialkot Saga, Keepers of the Kalacakra, The Vault of Vishnu, The Magicians of Mazda अशा एकापेक्षा एक सुंदर रहस्य कादंबर्या “भारत सिरीज़” नावाने खूप प्रसिद्ध झाल्या. या सर्व कादंबऱ्या मी इंग्लिश मधेच वाचल्या. यांचा मराठी अनुवाद मेहता पब्लिशिंग हाउस यांच्याकडे उपलब्ध आहे. अश्विन सांघीने या भारत सिरीज शिवाय एक नवीन थ्रिल्लर सिरीज (कुत्ता कदम) सुरू केली आहे. त्यांतील पहिली कादंबरी Razor Sharp. एक सिरियल किलर मुंबईत एकानंतर एक खून पाडतोय. पोलिस चक्रावले आहेत. 1. रविवार दि २ फेब्रुवारी , गोरेगाव पश्चिममधे रवि मेहराचा खून होतो. त्याची बायको खुशी कॅाल सेंटरचा जॅाब करून रात्री ११.३० ला परत येते. खूप वेळा बेल वाजवून दार न उघडल्यामुळे ती उघडून आत येते तर रवि रक्ताच्या थारोळ्यात मरून पडलेला असतो. त्याचे हात पाठीमागे नायलॅान दोरीने बांधलेले असतात. त्याच्या छातीत सुरा खुपसलेला असतो. त्याच्या तोंडात काहीतरी खाद्य पदार्थ असतो. 2. सोमवार दि १० फेब्रुवारी , लोअर परळमधे सुचंद्रा अग्रवालचा खून. तिची कामवाली आल्यावर दार न उघडल्यामुळे सोसायटीवाले दार तोडतात. आत सुचंद्राचा खून झालेला. हात नायलॅान दोरीने मागे बांधलेले, छातीमधे चाकू खुपसलेला, तोंडात काहीतरी खाद्यपदार्थ. पोलिस चक्रावलेले. मग पोलिसखाते जागे होते. त्यांचा नावाजलेला अधिकारी जो सस्पेंड झालेला आहे, त्या प्रकाश कदम, DCP याला बोलावले जाते. राज्याचे गृहमंत्री ओंकार लोखंडे, त्यांचा माणूस कमिशनर चव्हाण आणि उपगृहमंत्री जयंत गायकवाड व त्यांचा माणूस SCP राणे, मुंबईचा डॅान भाऊ पाटील जो लोखंडेचाच माणूस असतो, हे सर्व या केसच्या मागावर लागतात. कदम हा राणेंच्या ओळखीचा खास ऑफिसर असतो म्हणून त्यालाही इन्व्हेस्टीगेशनला बोलावले जाते. 3. मंगळवार दि १८ फेब्रुवारी , ठाणे येथे मंगला शहाचा खून. तिच्या शेजारणीमुळे हे कळते. मंगलाचे हात नायलॅान दोरीने पाठीमागे बांधलेले, छातीमधे चाकू खुपसलेला, तोंडात खाद्यपदार्थ. पोलिस अधिकारी शिंदे कदमबरोबर येतात. मंगलाच्या चेहऱ्याजवळ कदमला पेस्टिसाईडचा वास येतो. चेहरा निळसर झालेला. खून झाल्यावर बॅाडीला हलवलेले दिसते. तो ऑफिसमध्ये जुन्या खूनांचे फोटो तपासतो. त्यांचीही बॅाडी खून केल्यावर हलवलेली दिसते. चेहऱ्यावर निळसर झाक दिसते. तिन्ही खून “फिनेक” ब्रॅंडच्या चाकूने केलेले असतात. हे समान धागे कदम त्याची मुलगी केतुल बरोबर चर्चा करतो. केतुलची आई काही वर्षांपूर्वी कदमला सोडून गेलेली असते. ती भाऊ पाटीलची सावत्र बहीण असते. पण सध्या ती कुठे आहे व काय करते हे माहित नसते. केतुल कोर्टात काम करत असते तसेच ती “शक्ती” या NGO मधेही काम करते. शक्ती हे सोनापूरमधुन सुटका केलेल्या वेश्यांचे पुनर्वसन करत असते. निर्मल नावाचा तिचा मित्र एथिकल हॅकर असतो. तिच्यावर प्रेम करत असतो. कदमला हार्ट अटॅक येऊन गेलेला व स्टेंट बसवलेला असतो. Depression मुळे त्याची सायकॅालॅाजिस्टकडे ट्रिटमेंट चालू असते. कदमला या तिन्ही केसमधे आणखी एक धागा सापडतो. हे खून आठ दिवसांच्या अंतरावर झालेले असतात. म्हणजे पुढचा खून बुधवारी होणार असल्याचे तो राणे व शिंदेला सांगतो. 4. बुधवार दि २६ फेब्रुवारी, कांदिवली पश्चिम, लक्ष्मी बुधीराजाचा खून. तोच पॅटर्न. 5. गुरुवार दि ५ मार्च, खार पश्चिम, गुरुराज अदवानीचा खून सेम पॅटर्न. गुरूराज हा युट्युबवरचा प्रसिद्ध सिंगर असतो. 6. शुक्रवार दि १३ मार्च, ताडदेव, दिव्या शुक्रपाणीवर खूनी हल्ला होतो. पण ती जबर जखमी होते. ती फिटनेस ट्रेनर असल्यामुळे खुन्याबरोबर झटापट करते. पण चाकू पोटात घुसल्यामुळे ती जबर जखमी होते. हात बांधलेले असतानाही ती फोनवर “सिरी” ला तिच्या भावाला, ध्रुवला फोन लावायला सांगते. फोन लागतो व ती “हेल्प हेल्प” एव्हढेच बोलून बेशुद्ध होते. म्हणून खुनी पळून जातो. ध्रुव तिथे पोहोचून तिला हॅास्पिटलमधे ॲडमिट करतो. पोलिसांना तिथे खुन्याची बॅग सापडते. त्यांत नायलॅानची दोरी, बेगॅान स्प्रे व राजमाच्या बिया सापडतात. तिसऱ्या खुनाआधी पोलिस संशयित म्हणून राजू दाभाडेला अटक करतात. पण चौथ्या खूनाच्या वेळेस तो कस्टडीतच असतो. मग खूनी कोण? 7. शनिवार दि २१ मार्च, बान्द्रा पश्चिम, शनिया डिसौजाचा खून होतो. सेम मोडस ऑपरेंडी . 8. शनिवार दि २८ मार्च, चेंबूर, ७१ वर्षांच्या राहुल सिंह नावाच्या सिख व्यक्तिचा खून होतो. तीच पध्दत. यानंतर एक दिवस कदम KBC बघत असताना अमिताभ बच्चन एका सिनेमाचं गाणं लावून त्याचा पिक्चर ओळखायला सांगतात. ते गाणं असते- “सोमवार को हम मिले मंगलवार को नयन बुध को मेरी निंद खुली जुम्मेरात को चैन अरे शुक्र शनी कटे मुश्किलसे आज है इतवार सात दिनों में हो गया जैसे सात जनम का प्यार” आणि कदमच्या डोक्यात एकदम प्रकाश पडतो… अरे, हे सर्व खून असेच रविवार ते शनिवार एक एका वारी घडलेत! पण शनिवारी दोन खून कसे? याच्या मागे काही खगोलशास्त्र किंवा भविष्याचा तर संबंध नाही? कदमला आठवतं की शेजारी राहणारा डॉ. देसाईला पण भविष्य-खगोलशास्त्राची आवड व माहिती आहे. ( डॅाक्टर कडे सापडलेल्या नायलॅानचे रंगीत दोर व फिनेक कंपनीचा चाकू यामुळे एक संशयित म्हणून कदमने त्याला अटक करून पुछताछ केलेली असते) कदम लगेच डॅाक्टरांकडे जातो. त्यांची माफी मागून त्यांना या प्रश्नांत मदत करायला सांगतो. तो या सर्व खुनांचा सिक्वेन्स सांगतो. ते प्रत्येक वारी का घडले? मग शनिवारी दोन का? यापुढे कोणता वार? कुणाचा खून? डॅाक्टर सांगतात की भारतीय भविष्य व खगोल शास्त्रात नवग्रहांना खूप महत्व आहे. रवि, सोम(चंद्र), मंगळ, बुध, गुरू, शुक्र, शनि, राहू आणि केतु. यांचे रंग व धान्य वेगवेगळे असतात. त्या त्या ग्रहाला प्रसन्न करण्यासाठी ते वापरले जातात. कदम ही माहिती लिहून घेतो. त्यावरून प्रत्येक खुनात वापरण्यात आलेले फिनेक कंपनीचे चाकू, वेगवेगळ्या रंगांचे नायलॅान दोर व तोंडातील पदार्थ यांचा संबंध जोडून एक तख्ता तयार करतोः- “रवि मेहरा-रविवार-सोनेरी दोर- तोंडात गहू-दिशा पूर्व सुचंद्रा-सोमवार-चंदेरी दोर-तोंडात तांदूळ-दिशा पश्चिम मंगला शाह-मंगळवार-लाल दोर-तोंडात तूर डाळ- दिशा दक्षिण लक्ष्मी बुधीराजा-बुधवार-हिरवा दोर-तोंडात हिरवे मूग-दिशा उत्तर गुरुराज अदवानी-गुरूवार-पिवळा दोर-तोंडात हरबरा डाळ-दिशा उत्तर पूर्व(ईशान्य) दिव्या शुक्रपाणी-शुक्रवार-पांढरा दोर-राजमा-दिशा दक्षिण पूर्व शनिया डिसौजा-शनिवार-काळा दोर-तोंडात काळे तिळ-दिशा उत्तर पश्चिम राहुल सिंग-शनिवार-निळा दोर-तोंडात उडीद दाळ-दिशा दक्षिण पश्चिम” आता उरला एकच ग्रह-केतु. केतुचा वार मंगळवार. ग्रे रंग, चना दाळ, दिशा दक्षिण पश्चिम. “केतु”म्हणजे कदमची मुलगी केतुलचा नंबर लागणार? आज तर मंगळवारच आहे! कदम घाबरून जातो! तो केतुलला फोन करतो पण तो बंद लागतो. ती सध्या कुठे आहे? कोर्टात? कदम आपल्या मुलीला वाचवतो का? खरा खुनी कोण असतो? तो पकडला जातो का? त्याचे यामागचा उद्देश काय असतो? याच्यामध्ये अजून कोण सामिल असतं का? याची उत्तरे मिळण्यासाठी वाचावी लागेल अश्विन सांघी यांची कादंबरी Razor Sharp. ...Read more

BANGARWADI
BANGARWADI by VYANKATESH MADGULKAR Rating Star
Sameer Kazi

सुंदर अशी कादंबरी माणदेशी बनगरवाडी तशी कोरडी रखरखती पण, यातील पात्रात मायेचा करुणेचाओलावा मनात घर करुन जातो