* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
"ONE AMAZING STORY. TWO DIFFERENT ENDINGS. AT THE END OF PERUMAL MURUGAN’S TRAILBLAZING NOVEL ONE PART WOMAN, READERS ARE LEFT ON A CLIFFHANGER AS KALI AND PONNA’S INTENSE LOVE FOR EACH OTHER IS TORN TO SHREDS. WHAT IS GOING TO HAPPEN NEXT TO THIS BELOVED COUPLE? IN A LONELY HARVEST-ONE OF TWO INVENTIVE SEQUELS THAT PICK UP THE STORY RIGHT WHERE ONE PART WOMAN ENDS-PONNA RETURNS FROM THE TEMPLE FESTIVAL TO FIND THAT KALI HAS KILLED HIMSELF IN DESPAIR. DEVASTATED THAT HE COULD PUNISH HER SO CRUELLY, BUT CONSTANTLY HAUNTED BY MEMORIES OF THE HAPPINESS SHE ONCE SHARED WITH KALI, PONNA MUST NOW LEARN TO FACE THE WORLD ALONE. WITH POIGNANCY AND COMPASSION, MURUGAN WEAVES A POWERFUL TALE OF FEMALE SOLIDARITY AND SECOND CHANCES."
"पेरुमल मुरुगन यांच्या वन पार्ट वुमन (माधुरोबागन) या कादंबरीच्या घवघवीत यशानंतर काली आणि पोन्ना यांच्या उत्कट प्रेमाच्या अशा चिंध्या उडालेल्या पाहून वाचक विमनस्क होतात. या प्रेमी जोडप्याचं पुढे काय होणार? माधुरोबागन जिथे संपतं तिथूनच ‘एकाकी सुगी’ (अ लोनली हार्वेस्ट - आलवायन) ही कादंबरी सुरू होते. दोन उत्तरार्धांपैकी एक असणार्‍या या कादंबरीत पोन्ना मंदिरोत्सवातून परत येते आणि कालीने स्वत:ला नैराश्येपायी संपवल्याचं तिला दिसून येतं. त्याने इतक्या क्रूर पद्धतीने शिक्षा केल्याने पोन्ना जरी उद्ध्वस्त होते तरी त्याच्या बरोबरच्या मधुर आठवणींनी ती सतत झपाटलेली असते. या जगाला एकटीने तोंड द्यायला शिकणं तिला भाग असतं. करुणा आणि मार्मिकता यांच्या मिश्रणातून मुरुगन आपल्यासमोर स्त्रियांचा खंबीरपणा आणि आयुष्य पेलण्याची क्षमता यांची सुरेख गुंफण मांडतात."
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
#मराठीपुस्तके #मराठीप्रकाशक #मेहतापब्लिशिंगहाऊस #एकाकी सुगी #पेरुमलमुरुगन #तामिळ #कादंबरी #शुचिताफडके #MARATHIBOOKS #ONLINEMARATHIBOOKS #LOVESTORY #MARATHINOVEL #MEHTAPUBLISHINGHOUSE #PERUMALMURUGAN #SHUCHITAPHADAKE
Customer Reviews
Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

CHHATITO GAPPA
CHHATITO GAPPA by G.B. DESHMUKH Rating Star
रत्ना सुदामे, ठाणे

`छाटितो गप्पा` हे पुस्तक मी एका बैठकीत वाचून काढले, अप्रतिम लेखन आहे. प्रत्येक प्रसंगाचे वर्णन वाचून प्रसंग डोळ्यासमोर उभा राहतो. एक तर अमरावती , नागपूर आणि इतर विदर्भातील गावे परिचित आहेत, त्यात मणीबाई गुजराती हायस्कूल ही अत्यंत आवडती शाळा तसेच `महाुद्र` हे पुस्तक वाचले असल्याने अनेक प्रसंग ओळखीचे वाटत होते. अनगळ मॅडम, झा काका, निरागस स्पर्धा, या गोष्टी मनाला भिडल्या. `सारी दुनिया का बोझ हम उठाते है ` पण मस्त. खूप सुंदर पुस्तक आहे. ...Read more

KAHANI PAHILYA AAGINGADICHI
KAHANI PAHILYA AAGINGADICHI by RAJENDRA AKLEKAR Rating Star
Sainath Chawali

श्री राजेंद्र आकलेकर लिखित कहाणी पहिल्या आगीनगाडीची हे पुस्तक आज वाचून झालं.भारतामध्ये 16 एप्रिल 1853 रोजी 3:30वाजता बोरीबन्दर ते ठाणे या मार्गावर पहिली रेल्वे धावली.धावण्यापूर्वी ही रेल्वे भारतात सुरू करण्यासाठीचा लढा,चळवळ यातील अधिकारी लोकांनी केलें प्रामाणिक काम माणसाच्या , वाचकाच्या मनाला क्षणभर विचार करायला लावत.जेम्स बर्कले ने पहिला वहिला भारतातील रेल्वे मार्ग बांधला हे आजच्या पिढीतील क्वचित लोकांना माहिती असेल.लंडनच्या किंग्ज कॉलेजमधून त्यांनी आपलं अभियांत्रिकी शिक्षण पूर्ण केलं.रॉबर्ट स्टीफन्सन यांच्याशी बर्कले यांची आयुष्यभर मैत्री राहिली.रॉबर्ट स्टीफन्सन हे जॉर्ज स्टीफन्सन यांचे पुत्र होते.(ज्यांनी वाफेच्या इंजिनवर चालणारी पहिली रेल्वे उभारली होती.) बर्कले साहेब 7 फेब्रुवारी1850 ला भारतात पोहचले आणि 16 एप्रिल 1853 ला रेल्वे धावली.म्हणजे अवघ्या 3 वर्षात हे सर्व काम त्यांनी केले.रेल्वे सुरू करण्याचा ब्रिटिशांचा उद्देश जरी स्वार्थी असला तरी आपल्याकडे त्यांनी सुरू करण्यापूर्वी रेल्वे नव्हती आणि त्यांनी जर आणलीच नसती तर सुरू झाली असती की नाही हा गंभीर प्रश्न आहे आणि त्याच उत्तर नकारार्थीच असेल. ही आहे भारतातील पहिल्या रेल्वेमार्गाची कथा! आपला प्रवास मुंबईच्या दक्षिण टोकापासून म्हणजेच व्हिक्टोरिया टर्मिनसपासून सुरू होईल. या मूळ रेल्वेमार्गावर पडलेल्या अवशेषांकडे बघत,त्यांचा अर्थ लावत, त्यांची नोंद घेत तो उत्तर दिशेकडे कूच करेल. या अवशेषांपैकी काही अवशेष खूप महत्त्वाचे आहेत, काही अस्ताव्यस्त पडलेले आहेत, काही तर अगदीच क्षुल्लक आहेत; पण देशातील पहिल्यावहिल्या रेल्वेमार्गाच्या विकासाची गोष्ट सांगण्यासाठी ते अजूनही आपला श्वास टिकवून आहेत. त्या काळातल्या तंत्रज्ञानाबद्दल ते माहिती देतात. तसंच हे शहर कसं वाढलं, याचीही गोष्ट सांगतात. नेमक्या याच गोष्टीसाठी GIPR म्हणजे मध्य रेल्वे आणि BB&CI म्हणजे पश्चिम रेल्वे यांची रचना कशी झाली, हे इत्थंभूत सांगण्याचा प्रयत्न या पुस्तकामध्ये केला आहे. या संशोधनसाठी लेखकाने व्हिक्टोरिया टर्मिनस ते ठाणे यादरम्यान अनेकदा रेल्वेने प्रवास केला. अनेक गोष्टी धुंडाळण्यासाठी रेल्वेमार्गाच्या कडेने चालतचालत अभ्यास झाला. अर्थात त्यासाठी स्थानिक रेल्वे प्रशासनाची वेळोवेळी रीतसर परवानगी घेतली होती. भूतकाळातली रेल्वे, तिचे रूळ आणि त्यांच्याशी जोडल्या गेलेल्या गोष्टींचं कौतुक करताना आपण हे विसरता कामा नये की, मुंबईची ही रेल्वे किंवा भारतीय रेल्वे नेहमीच भविष्याकडे पाहत आली आहे. ...Read more