SHIVAJI SAWANT

About Author

Birth Date : 31/08/1940
Death Date : 18/09/2002


AFTER COMPLETING HIS EDUCATION UP TO FYBA, SHIVAJI SAWANT COMPLETED A SHORTHAND AND TYPEWRITING COURSE IN COMMERCE. HE WORKED AS A TEACHER AT RAJARAM PRASHALA KOLHAPUR FOR TWENTY YEARS. HE WORKED IN PUNE FOR SIX YEARS IN LOK SHIKSHAN MAGAZINE OF MAHARASHTRA GOVERNMENTS EDUCATION DEPARTMENT. THROUGH DEEP STUDY OF MAHABHARATA, HE CREATED MASTERPIECES LIKE MRITYUNJAYA.

एफ.वाय.बी.ए पर्यंत शिक्षण झाल्यावर शिवाजी सावंतांनी वाणिज्य विषयाच्या लघुलिपी आणि टंकलेखन यांचा अभ्यासक्रम पूर्ण केला. राजाराम प्रशाला कोल्हापूर या ठिकाणी वीस वर्षे अध्यापनाचे कार्य त्यांनी केले. पुण्यात महाराष्ट्र शासनाच्या शिक्षण खात्याच्या लोकशिक्षण मासिकामध्ये त्यांनी सहा वर्षे काम केले. महाभारताच्या सखोल अभ्यासातून त्यांनी मृत्युंजय सारखी अजरामर कलाकृती निर्माण केली. इतर अनेक पुरस्कारांसह दिल्लीतील ज्ञानपीठ संस्थेचा मूर्तिदेवी पुरस्कार या कादंबरीला मिळाला. मृत्युंजय हिंदी, गुजराथी, मल्याळम्, बंगाली, राजस्थानी, कन्नडसह इंग्रजीतही भाषांतरित झाली आहे. पुढे त्यांच्या छावा, युगंधर या पुस्तकांनीही अमाप प्रसिद्धी मिळवली. मृत्युंजय व छावा कादंबरीवर आधारित नाटकांचे लेखनही केले. १९८३ मध्ये बडोदा मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपदही त्यांनी भूषविले. तसेच महाराष्ट्र साहित्य परिषदेचे उपाध्यक्ष म्हणूनही काही काळ ते कार्यरत होते.
Sort by
Show per page
Items 1 to 12 of 18 total
ASHI MANE ASE NAMUNE Rating Star
Add To Cart INR 260
CHHAAVA [PAPERBACK LIMITED EDITION] Rating Star
Add To Cart INR 625
CHHAAVA [HARDBOUND] Rating Star
Add To Cart INR 750
CHHAAVA, CHATRAPATI SAMBHAJI, AND HI... Rating Star
Add To Cart INR 899
CHHAVA , MRUTYUNJAY AND YUGANDHAR [P... Rating Star
Add To Cart INR 1745
CHHAVA - NATAK Rating Star
Add To Cart INR 150
KANCHANKAN Rating Star
Add To Cart INR 140
KAVADASE Rating Star
Add To Cart INR 190
MORAVALA Rating Star
Add To Cart INR 110
MRUTYUNJAY - NATAK Rating Star
Add To Cart INR 140
MRUTYUNJAY [HARDBOUND] Rating Star
Add To Cart INR 695
MRUTYUNJAY [PAPERBACK] Rating Star
Add To Cart INR 495
12

Latest Reviews

KULAMAMACHYA DESHAT
KULAMAMACHYA DESHAT by G.B. DESHMUKH Rating Star
डॉ शिंदे निलेश, अमरावती

`कुलमामाच्या देशात` वाचून काढले. प्रत्येक कथा खुप वाचनीय आहे. `कपारीत वाघोबा` मध्ये रवींद्र वानखडे ह्यांनी पहाटे चार ते 10 नुसती भ्रमंती केली आहे.. सकाळची सूर्यकिरण अंगावर पडली असताना वाघ बघायला भेटणं ही एक अप्रूप वाटणारी गोष्ट आहे. `डरकाळीचा रार` वानखडे साहेबांनी बेलसरें सोबत अनुभवला आहे. `जिवाची पर्वा` न करता वानखडे साहेब पाळण्यात विसावले होते. गव्याच्या पिलावर वाघीणीने हल्ला केला नाही.. हे वानखडे साहेबांनी स्वतः बघितले व आम्हाला देखील समजले.. वाघाच्या पंजाची कशी प्रतिकृती तयार करतात हे सांगितले परंतू मला लक्षात आले नाही (मी प्रत्यक्ष बोलून जाणून घेईन). `मेहमान रह गया` या कथेत वाघाने माणसाची शिकार कशी केली त्यानंतर वनविभागाने बसची सोय करून मुलांना मदत कशी झाली हे देखील सांगितले व आपल्या सारखे वन अधिकारी काय करू शकतो हे प्रांजळ पणे नमूद केले आहे.. सेमडोह येथील गजराजाची कथा अजून देखील लोक सांगतात त्यातील तुम्ही त्याला वाचवयाचा प्रयत्न केला परंतू तो नियतीला मान्य नसेल. बाणा का घुंगरू- मधील हल्ला व घटना मन विचलित करणारी वाटली व मेळघाट मधील वन कर्मचारी किती कामसू आहेत हे त्या वरून दिसले.. मला बाणा ढाप प्रत्यक्ष बघायला आवडेल.. `रानगव्यांची कवायत` मध्ये रानगवे स्वतःच रक्षण कश्या पद्धतीनं करतात हे मला पहिल्यांदा समजले.. कोकटु इथं तीन दिवस आपण वाघ बघण्याची केलेली हॅट्रिक ही जंगलाने तुम्हा वनाधिकार्‍यास दिलेली सलामी आहे. `शिकार हो गया` - माहुल वेलीचा कसा उपयोग केला जातो व पोळी तयार करतात हे देखील वेगळी गोष्ट वाटली.. आपण सांबर शिकार कशी थांबवली व वन्यजीवनाची साखळी अबाधित राखली.. वाघ खेकडे मारून खातो हे ऐकून नवल वाटले.. असा सॉलिड वन अधिकारी मेळघाटला लाभला हे या कथां मधून मला समजलं व प्रत्येक वाचकाला हे जंगल, इथले लोक या विषयी कायम आकर्षण निर्माण करत राहील.. ...Read more

MAHARUDRA
MAHARUDRA by G.B. DESHMUKH Rating Star
श्री. बाबाराव घोरमाडे, अमरावती

अमरावती जिल्हा मधील एका सामान्य खेड्यातील, एक अलौकिक असामान्य अशा फुटबॉल खेळाडूचे हे व्यक्तिचरित्र. १९४० ते १९५१ हा कालखंड म्हंजे तसाही भारतीया करीता त्यातल्या त्यात ग्रामीण भागाकरिता खडतर कालखंड. अशा विपरीत परिस्थितीत शैक्षणिक आर्थिक सामाजिक मारगदर्शन इत्यादी पाठबळ चा अभाव असताना सुद्धा आतंरराष्ट्रीय दर्जा चा खेळाडू निर्माण होणे हे ते चरित्र नायक चे असामान्य व्यक्तिमत्व अधोरेखित होते. समाधानाची आनंदाची बाब ही की हे पुस्तक रूपाने प्रसिध्द करण्याचे काम चरित्र नायक चे सुपुत्र श्री गजाननराव उर्फ जी बी देशमुख यांनी केले. हे सर्व काही अंशी कर्ज ओझे हलके करण्यासारखे आहे लेखकाला या करीता खूप मेहनत करून माहिती संकलित करावी लागली. एखादी थप्पड बनती थी........ बडे बेआबरू होकर घरी आलो........पण कहाणी मे ट्विस्ट अभि बाकी था..... प्रसंगी चे वाक्य रचना , कोसळणाऱ्या धबधबा सारखे निखळ आनंद देऊन गेले . मेहता पब्लिशिंग ने लॉन्च केले म्हणजे सर्वदूर मराठी माणसाचे पर्यंत पोहोचले आहे वाचनीय आहे प्रत्येकाने वाचावे.विसावा शतकातील पुर्वाध, विपरीत परिस्थितीतही किती कष्ट करावे लागले असतील? धन्य ते.. ...Read more