* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: WE, THE PEOPLE
  • Availability : Available
  • Translators : V.S.WALIMBE
  • ISBN : 9788177663440
  • Edition : 8
  • Publishing Year : JUNE 1985
  • Weight : 350.00 gms
  • Pages : 424
  • Language : Translated From ENGLISH to MARATHI
  • Category : POLITICS & GOVERNMENT
  • Available in Combos :V. S. WALIMBE COMBO SET- 4 BOOKS
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
HIS BOOKS `LAW AND PRACTICE OF INCOME TAX`, `TAXATION INDIA`, HIGHEST TAXED NATION`, `OUR CONSTITUTION DEFACED AND DEFILED` AND `INDIA`S PRICELESS HERITAGE` ARE CONSIDERED TO BE STANDARD.HE IS RELATED WITH MANY INDUSTRIES AND BUSINESSES AS THE CHAIRMAN, VICE CHAIRMAN AND DIRECTOR.HE IS THE CHAIRMAN OF `FORUM OF FREE ENTERPRISE` AND LESLEY SOHONI PROGRAMME OF TRAINING FOR DEMOCRACY`.
माझी दृष्टी अशा माणसाला द्यावी ज्याने कधीही सूर्योदय पाहिलेला नाही. माझे हृदय अशा व्यक्तीच्या हाती स्वाधीन करावे ज्याने त्याच्या हृदयात दु:ख झेलले आहे. त्या तरुणाला दान करावे ज्याला पुढे आपली नातवंडे खेळत आहेत हे पाहण्याइतके दीर्घायुष्य मिळेल. माझी मूत्रपिंडे दुस-याच्या शरीरातील विष काढू देत. माझी हाडे पंगू मुलाला पावले टाकण्यास मदत करू देतं. माझ्या शरीराचा आता जो काही भाग राहील त्याचे दहन करावे. काही दफन करायचे असल्यास माझे दोष व माझे भाऊबंदांबरोबरचे पूर्वग्रह यांना मूठमाती द्यावी. माझे प्रमाद सैतानाकडे पोहोचावेत. माझा आत्मा परमेश्वराला अर्पण करावा. माझे स्मरण करायचे झाल्यास जिला तुमची आवश्यकता आहे अशा व्यक्तीशी चार गोड शब्द बोलून किंवा तिच्यासाठी काही सत्कार्य करून ते साधावे.
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
#NANI PALKHIWALA #V.S.SVALIMBE#WARSAWTEHIROSHIMA #WETHEPEOPLE #WETHENATION
Customer Reviews
  • Rating StarPravin Karvekar

    Bhashecha khup chan darja

  • Rating StarDAINIK SAKAL 15-12-2002

    नानी पालखीवाला : पारदर्शी व्यक्तिमत्त्व… नानी पालखीवाला. घटना आणि आयकर अशा क्लिष्ट विषयांतील अभ्यासू आणि भारतातील उत्तुंग, आदरणीय व्यक्तिमत्त्व. ‘वई दि पीपल’ हे त्यांचं पुस्तक इंग्रजीत प्रसिद्ध झालं होतं. त्याचं मराठीत भाषांतर करायचं माझ्या मनात हतं. त्यासंबंधीचे हक्क मागण्यासाठी मी त्यांच्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करीत होतो. त्यांना मी मुंबईत फोन लावला. ‘तीन सेकंदात बोल’ ते म्हणाले. ‘तुमच्या वुई, दि पीपल या पुस्तकाचं मराठीत भाषांतर करून ते प्रकाशित करायचं आहे.’ मी ‘तसं पत्र लिही.’ बस फोन बंद. मी त्यांना तीन-चार पत्रं लिहिली. उत्तर नाही मी विचारात पडलो. माझे करसल्लागार बी. के. शहा यांचे मुंबईत एक समव्यावसायिक मित्र आहेत. ते नानी पालखीवालांशी संबंधित आहेत असं समजलं. त्यांच्याकडून मी नानींच्या घरचा फोन नंबर मिळविला. (कारण तो नंबर अनलिस्टेड होता) मी घरी फोन केला. ‘तू उद्या येऊ शकशील का?’ या त्यांच्या प्रश्नावर मी होकार दिला. ‘ठीक आहे येताना तुझ्या भाषांतरकाराला घेऊन ये.’ त्यांनी सांगितलं. भाषांतराचं काम मी श्री. वि. स. वाळिंबे यांना देणार होता. नानीशी फोनवर बोलणं झाल्यावर त्यांच्या स्वभावाचा एक पैलू माझ्या ठळकपणानं लक्षात आला. तो हा की, ते वेळेला अतिशय महत्त्व देत असत. फोनवर त्यांनी मला विचारलं. ‘तू मुंबईला कसा येणार आणि परत केव्हा आणि कसा जाणार?’ मी सांगितलं, ‘‘मी डेक्कन क्वीननं येणार आणि त्याच गाडीनं परत येणार.’’ मग त्यांनी मला दुपारी दीडची वेळ दिली. आम्ही वेळेवर त्यांच्याकडे पोहोचलो; पण त्यांची सेक्रेटरी आम्हाला आज जाऊ देईना; कारण तिच्याकडे आमच्या भेटीची वेळ नव्हती. शेवटी मोठ्या मिनतवारीनं मी तिला माझं व्हिजिटिंग कार्ड आत नेऊन द्यायला राजी केलं. ती आत गेली कार्ड पाहिल्याबरोबर त्यांनी आम्हाला आत बोलावलं. त्या पहिल्या भेटीतच त्यांची साधी राहणी, निगर्वी, पारदर्शी स्वभाव यांची माझ्यावर छाव पडली. श्री. वाळिंबे यांनी अनुवादित केलेली काही पुस्तकं आम्ही त्यांना दाखवली, त्यात श्री. अरूण शौरी यांच्या पुस्तकाच्या अनुवादाचाही समावेश होता. श्री. शौरी त्यांचे मित्र त्यामुळे त्यांनी चटकन भाषांतराला परवानगी दिली. त्यांना मराठी येत नव्हतं. त्यामुळं त्या पुस्तकाचा अनुवाद तपासायला एका विशिष्ट संपादकांकडे पाठवा, असं त्यांनी सांगितलं. मला या संपादकांचा वाईट अनुभव आला होता. त्यामुळें या गोष्टीस मी स्पष्ट नकार दिला. मी त्यांना म्हणालो, ‘‘मी अनुवाद तुमच्याकडे पाठवितो. तुम्ही तो कुणाकडूनही तपासून घ्या.’’ निघता निघता मी त्यांना रॉयल्टीबद्दल विचारलं. ते म्हणाले, ‘‘मला रॉयल्टी नको; पण पुस्तकाचा अनुवाद आणि त्याची निर्मिती दोन्ही अत्युत्तम दर्जाची हवी.’’ अर्थातच मी होकार दिला. याच भेटीत मी त्यांच्याकडून आणखी एक गोष्ट कबूल करून घेतली. या पुस्तकाच्या मराठी आवृत्तीच्या प्रकाशन समारंभाला त्यांनी पत्नीसह यावं, असं मी सांगितलं. माझी ही विनंतीसुद्धा त्यांनी मान्य केली. त्यांच्याकडून बाहेर पडल्यानंतर श्री. वाळिंबे यांनीसुद्धा रॉयल्टी न घेण्याचा निर्णय मला सांगितला. पुस्तक तयार झाल्यानंतर काही प्रती घेऊन मी त्यांना दाखवायला गेलो. त्यांना पुस्तक खूपच आवडलं, मात्र प्रकाशन समारंभाला येण्यासाठी त्यांच्याकडे तीन-चार महिने तरी वेळ नव्हता. ते म्हणाले, ‘‘प्रकाशनापूर्वीच तू पुस्तक विक्रीसाठी उपलब्ध कर. पुस्तक बाजारात येऊ दे.’’ मी ही गोष्ट मान्य केली नाही म्हणालो, ‘‘तुम्हाला वेळ नसेल, तर तीन-चार महिने ही पुस्तकं गोडाऊनमध्ये पडून राहतील; पण प्रकाशनापूर्वी मी त्यांची विक्री करणार नाही.’’ ‘गोडाऊन’ हा शब्द ऐकताच त्यांना राग आला. मग मी त्यांना त्यांच्या वचनाची आठवण करून दिली. मी विनातक्रार थांबायला तयार असल्याचंही सांगितलं. मग मात्र त्यांनी मला पंधरा दिवसांतलच वेळ दिली आणि तो समारंभ पुण्यात झाला. पुण्यातील टिळक स्मारक मंदिरात कार्यक्रम ठरला. त्याचदिवशी सकाळी नानी पालखीवाला पत्नीसह विमानाने आले. त्यांना आणण्यासाठी टेल्को कंपनीची मर्सिडीज गाडी आली होती. माझे पुण्यातील मित्र डॉ. अनिल गांधी यांची मर्सिडीत घेऊन मी विमानतळावर गेलो होतो. मी त्यांना आमच्या गाडीतून येण्याची विनंती केली; कारण त्या दिवशी ते आमचे पाहुणे होते. त्याप्रमाणेच झाले. ते आमच्या गाडीतून हॉटेलवर आले. त्या दिवशी दुपारी मी त्यांच्याकडे त्यांचा एक तास मागितला. त्यांनी मान्यता दिली. दुपारी दीड वाजता मी आणि वाळिंबे अनुवादाच्या शंभर प्रती घेऊन गेला. त्यावर त्यांच्या स्वाक्षऱ्या घेतल्या; कारण ऐनवेळी खूपच गर्दी होणार याची आम्हाला खात्री होती. दुपारीच स्वाक्षऱ्या घेण्यामागे ही गर्दी टाळण्याचा हेतू होता. एका तासात त्यांनी शंभर स्वाक्षऱ्या पूर्ण केल्या. शेजारीच त्यांच्या पत्नी होत्या त्या मिस्कीलपणे हसत होत्या. स्वाक्षऱ्या संपल्यावर त्या माझ्या जवळ आल्या आणि त्यांनी माझी पाठ थोपटली. त्या म्हणाल्या, ‘‘स्वाक्षऱ्या करण्याचा त्यांना फार आळस आहे आणि त्यांच्याकडून तू तासाभरात चक्क शंभर स्वाक्षऱ्या करून घेतल्यास म्हणून तुला शाबासकी देते!’’ सभागृह तुडुंब भरलं होतं. प्रसिद्ध विचारवंत ग. प्र. प्रधान, एस. एम. जोशी यांच्यासह अनेक नामवंत, विद्वान आवर्जून उपस्थित होते. सभागृहाच्या बाहेरही तीन चारशे लोक उभे होते. त्यांनी आत येऊन मध्ये बसण्यास परवानगी मागितली. हळूहळू शे-दीडशे लोक सभागृहात मिळेल त्या जागेवर चक्क मांडी घालून बसले. त्याचदिवशी श्री. भोगिशयन यांचं भाषण अतिशय सुंदर झालं. नानी मला म्हणाले, ‘‘इतक्या उत्तम भाषणानंतर मी काय बोलू? त्यापेक्षा आधी माझं भाषण ठेवलं असतं तर मी अधिक चांगलं बोललो असतो.’’ असं ते म्हणाले खरे; पण त्यांचंही भाषण खूपच सुरेख झालं. त्यांच्या त्या भाषणाचं पहिलं वाक्य असं होतं – ‘मी अनेक पुस्तके लिहिली; पण कोणत्याही पुस्तकाचा प्रकाशन समारंभ झाला नाही. त्या अर्थाने माझ्या आयुष्यातील हा पहिलाच प्रकाशन समारंभ आहे.’’ ‘वई, दि नेशन’ हे त्यांचं पुस्तक इंग्रजीत झाल्यानंतर त्यांनी आपणहून मला फोन केला. म्हणाले, ‘‘हे पुस्तक तू मराठीत करावंस अशी माझी इच्छा आहे.’’ मी मान्यता दिली. या पुस्तकाचा प्रकाशन समारंभ कोल्हापुरात करण्याची माझी इच्छा होती; पण नानी यांना वेळ मिळत नव्हता. वय वाढत होतं. मागच्या वर्षी पेटिट डे दिवशी त्यांना फोन केला (शुभेच्छा देण्यासाठी) पण त्यांच्या सहकाऱ्याने त्यांच्या आजाराविषयी सांगितले. आता ते कोल्हापूरला कधीच येणार नाही. -अनिल मेहता ...Read more

  • Rating StarNEWSPAPER REVIEW

    नानी पालखीवाला यांचे नाव भारताच्या कायदेविषयक क्षेत्रात अनन्यसाधारण मान्यता पावलेले आहे. त्यांना अनेक विषयात रुची असल्याने त्यांनी सहजतेने अनेक क्षेत्रे गाजवली. त्यांनी जी भाषणे दिली आणि लेख लिहिले त्यांचे हे संकलन आहे. काही ठिकाणी थोडासा संक्षेपही कलेला आहे, परंतु या सगळ्या विचारांमध्ये एक सूत्र आहे आणि ते सूत्र या पुस्तकाच्या शिर्षकामध्ये सूचित झालेले आहे. या लेखांमध्ये काही मूलभूत विचार आणि विषय मांडलेले आहेत, तर काही ठिकाणी त्यांचा पुरेसा विस्तार करण्यात आलेला नाही. त्यांचे अधिक विकसित रूप नंतरच्या काही लेखांमध्ये आढळेल, त्यामुळे काही प्रमाणात एखाद्या विचाराची वा विषयाची पुनरुक्ती झालेली आढळून येईल. आणीबाणीच्या काळात त्यांनी जे लिखाण केले, ते हेतुत: येथे पुनर्मुद्रित करण्यात आलेले आहे. कारण आपल्या प्रजासत्ताकाच्या इतिहासामध्ये १९७५ ते १९७७ हा काळ फारच उद्बोधक ठरला जॉर्ज सान्तायन यांनी म्हटले आहे, ‘‘प्रगतीमध्ये बदलाइतकेच सातत्यालाही महत्त्व असते... जे भूतकाळ विसरतात त्यांच्या हातून जुन्या चुका पुन्हा घडण्याचा संभव असतो.’’ आपल्याला जर आपल्या मूलभूत अधिकारांचे संरक्षण करायचे असेल तर आणीबाणीत काय घडले हे आपण कधीही विसरता कामा नये. कारण त्या काळात नागरिकांचे मूलभूत अधिकार स्थगित ठेवण्यात आलेले होते. जे त्या वेळी घडले ते पुन्हा केव्हाही घडू शकते. जेव्हा जेव्हा कठीण प्रसंग उद्भवले, तेव्हा तेव्हा राष्ट्रहितासाठी पालखीवाला मोठ्या तडफेने आपल्या साऱ्या बुद्धिवैभवासह उभे ठाकले. एका महान देशाला नैतिक ऱ्हासाने ग्रासून टाकले आहे असे या लेखांमधून आपल्या देशाचे चित्र साकार होते. या परिस्थितीत नजीकच्या भविष्यकाळात तरी बदल होण्याची काहीही चिन्हे दिसत नाहीत. आपली सद्सद्विवेक बुद्धी पार गारठून गेली आहे हे आपले खरे दुखणे आहे, आणि हे दुखणे केवळ टिकून राहिले असे नव्हे, तर ते चिघळत चाललेले आहे. ‘माणसाने पैसा मिळविणे एवढे एकच ध्येय डोळ्यांपुढे ठेवले, की त्याचे मन कंगाल बनते,’ या म्हणीचा प्रत्यय आपल्याला असंख्य राजकारणी लोकांची आणि व्यापारीवर्गाची विलासी राहणी पाहिली की येतो. आज देशावर जो तिरंगी ध्वज फडफडत आहे त्यात काळा, तांबडा आणि शेंदरी हे रंग दिसत आहेत-बेहिशोबी पैशाचा काळा, दफ्तर-दिरंगाईच्या लाल फितीचा तांबडा आणि भ्रष्टाचाराचा झगमगता शेंदरी. आपल्या सरकारी प्रशासनयंत्रणेला वेळेचे महत्व जाणवतच नाही. आर्थिक आणि वैज्ञानिक संशोधन प्रतिष्ठानने आपल्या अलिकडच्या एका पाहाणीत असे नमूद केले आहे की पंचवार्षिक योजनांमधील कार्यक्रमांची अंमलबजावणी करण्यात दिरंगाई झाली नसती तर (अ) आपले राष्ट्रीय उत्पन्न दरवर्षी १,२०,००० कोटी रुपयांनी वाढले असते, (ब) निर्यातीमध्ये दरवर्षी ९,६०० कोटी रुपयांची वाढझाली असती. (क) अन्नधान्याच्या वार्षिक उत्पादनात ५ कोटी ४० लाख टनांची वाढघडून आली असती (ड) नवे १ कोटी ४४ लाख रोजगार निर्माण झाले असते, आणि (ई) दर माणशी उत्पन्नात तिप्पट वाढझाली असती. काल आणि उद्या यांना ‘कल’ हा एकच शब्द वापरणारा भारत हा जगातील बहुधा एकमेव देश असावा. गेल्या तीस वर्षांत आपण अनेक चुकीचे निर्णय केले, वेळ वाया घालविला, सोन्याला राखेची किंमत दिली आणि सोन्याच्या भावाने राख खरेदी केली. असे असले तरी भारताच्या दीर्घकालीन उज्ज्वल भवितव्याबद्दल माझ्या मनात किंचितही संदेह नाही, असे ते आग्रहाने नमुद करतात. प्रत्येक नागरिकाने वाचावे असे अभ्यासाचे महत्त्वपूर्ण पुस्तक. ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

BHARTIYA GANIKA
BHARTIYA GANIKA by DR.S.R. DESHPANDE Rating Star
डॉ. शुचिता नांदापूरकर-फडके

मंडळी, कालच्या ऱ्हासचक्रानंतर मी विचार करत होते की आज काय? पुस्तकं तर काही वाचून ठेवली होती (म्हणजे वाचली आणि ठेवून दिली बाजूला... अक्षरशः). आत्ताची समोर आहेत ती. कदाचित त्यातलं एखादं उद्या घेईन. मध्ये अचानक या पुस्तकाची जाहिरात वाचली, अगदी गेल्या ठवड्यातली गोष्ट. उत्सुकता चाळवली. समूहात काहीतरी आगळं वेगळं पुस्तक घ्यावं हा विचार सतत मनात असतोच. तसं पुस्तक घरी येताच (जय amazon) चाळायला म्हणून बसले, आणि काय सांगू, हातात मार्कर कधी आलं, मी खुणा कधी केल्या, पुस्तक कधी संपलं... कळलंच नाही. एक गोष्ट प्रामाणिकपणे सांगते... प्रेयर पुस्तकाला तुम्ही जो भरघोस प्रतिसाद दिलात, अनेकांनी ते विकत घेण्याचा विचार केला तेव्हाच सांगायचं होतं, पण राहिलं. ओळख करून दिलेलं पुस्तक पूर्णपणे वाचनीय असतं असं नाही. त्याचा बरचसं भाग बोजड असतो. पण ते नाही का, डेटिंगच्या काळात मुलगा मुलगी स्वतःमधलं केवळ उत्तम ते दाखवतात, तसं मला प्रेयर बद्दल वाटलं. आय मीन प्रेयर पुस्तकाबद्दल वाटलं आणि गणिका या पुस्तकाबद्दल मला नेमकं तेच वाटत आहे. ========== ‘भारतीय कामशिल्प’ या पुस्तकाचं लेखन करत असताना प्राचीन भारताच्या समाजजीवनाची माहिती देणारे अनेक संदर्भग्रंथ वाचण्यात येऊन लेखकांची उत्सुकता चाळवली गेली आणि जेव्हा या विषयावर मराठीत एकही परिपूर्ण संदर्भग्रंथ नाही हे लक्षात आलं, तेव्हा त्यांनी स्वतःच या पुस्तकाचं लेखन मनावर घेतलं. केवळ सनसनाटी विषय सवंगपणे हाताळला आहे असं कुठेही वाटत नाही. अतिशय अभ्यासपूर्वक लेखन आहे. सोबत जोडलेली संदर्भग्रंथांची यादी (एकूण संख्या ६४) पुरेशी आहे. गणिका आणि उर्वरित श्रेणी या शरीरविक्रय करतात, हा वैश्विक व्यवसाय आहे. कैक काळापासून या व्यवसायाला मान्यता मिळाली आहे आणि त्याची आवश्यकता वाटली आहे. प्राचीन काळात भारतीय गणिका यांना एक संस्कृती आणि दर्जा होता. नीतीनियम होते, ते पाळावे लागत होते. पुस्तकाची प्रकरणं – प्रास्ताविक, विदेशी गणिका, भारतीय साहित्यातील गणिका, गणिकेची प्रशिक्षण व वर्णन, गानिकांची वेशभूषा, सौंदर्यप्रसाधने, विट, गणिकामाता, प्रियकराचा राग-रंग, कथांविषयी थोडेसे आणि कथा (या शेवटच्या प्रकरणात एकूण १३ कथा आहेत – अगदी सुरस आणि चमत्कारिक वाटाव्यात अशा, त्यांचा परिचय मी देणार....... नाही.) प्रास्ताविक – (नऊ पानांचं प्रकरण) कुटुंब किंवा विवाहसंस्था कधी आकाराला आले हे नक्की सांगता येत नसलं तरी स्त्री-पुरुष शरीरसंबंध हे आदिम असून ते पशु – पक्ष्यांप्रमाणेच जनन हेतुस्तव नैसर्गिक होते आणि राहतील. फलन हे स्त्रीदेहामध्ये होतं या जाणीवेतून तिला आदरस्थान प्राप्त झालं. सर्जनाची गूढ शक्ती धारण करणारी ती आदिमाया/माता/ अद्याशक्ती होय. जवळपास प्रत्येक धर्मात प्रजा, पशु आणि धान्य समृद्धीसाठी सुफलता विधी आहेत. भारतीय हिंदू धर्म शास्त्रीय ग्रंथांतून स्त्री पवित्र्याच्या कथा वाचायला मिळतात. पतीला परमेश्वर मानलं जाई. त्याही काळात गणिका हा व्यवसाय होता आणि त्याकडे सहिष्णू वृत्तीने पाहिलं जाई.राजे महाराजे त्यांचे पोशिंदे असतं. शरीरविक्रय करणाऱ्या स्त्रिया तिरस्काराला पात्र असत, पण गणिका नाही. त्यांना नगर भूषण, नगर अलंकार, नाग्त रत्न मानलं जाई. प्रसंगी, राजे त्यांचा सल्ला घेत. त्या बहुश्रुत असतं चौसष्ट कलांत पारंगत असतं. संभाषणचतुर, हुशार, समंजस, उदार, योग्य आदर राखणाऱ्या, विनयशील आणि अनुपम सौंदर्यवती असत. एखाद्या गणिकेमुळे त्या राज्याची कीर्ती वाढत असे. धार्मिक समारंभ, सामाजिक कार्यक्रम (विविध झुंजी, शर्यती), करमणुकीचे कार्यक्रम (जलक्रीडा, वनविहार), रंगमंचावर अभिनय, अशा नानाविध ठिकाणी त्यांची ठळक उपस्थिती असे. रथारूढ अथवा सिंहासनाधिष्ठ राजाला वारा घालणे, चवरी ढाळणे, छत्र धरणे अशी कामं त्या करत. त्यांच्याशी संबंध ठेवणं समाजमान्य होतं. प्रतिष्ठितांचा त्यांच्याकडे पाहण्याचा दृष्टीकोन व्यापक, अगत्यशील आणि स्नेहिल होता. मात्र, त्यांना कडक आणि कठोर नियम पालन करावे लागे.विजयनगर साम्राज्याच्या अस्तानंतर ते पेशवाई संपेपर्यंतच्या काळात, मोगल राजवट येऊन गेली, ब्रिटीश वसवतवादाचा प्रसार सुरू झाला, समाज व्यवस्था बदलली, गणिका संस्कृतीला ओहोटी लागली. ब्रिटीशांचा अंमल सुरू झाल्यावर गणिका संस्था नष्ट होऊन वेश्या व्यवसाय वाढीला लागला. यामागे औद्योगिक क्रांती हे एक कारण आहे. वेश्यागमन निंद्य कृत्य मानलं जाऊ लागलं. तरुण अधिकाधिक सुशिक्षित होऊ लागला तसा शरीरसंबंधांपायी स्वास्थ्य गमवावं लागलं तर काय, हा विचार थोडाफार मूळ धरू लागला. आणि या शौकाची आसक्ती कमी झाली. चरितार्थाकरता पैसे मिळवण्यासाठी वेश्याव्यवसाय हादेखील विश्वसनीय आर्थिक व्यवसाय मानण्यात यावा असा निकाल १९११मध्ये युरोपियन न्यायालयाने दिला. विदेशी गणिका – (२७) बहुतेक सर्व प्राचीन संस्कृतीत गणिकांचे पुरावे मिळतात. इजिप्त, बबिलोन, सिरीया, फिनिशिया, ही काही उदाहरणं. ग्रीस, इटली, भारत इथे त्यांना विशिष्ट दर्जा प्राप्त झाला. त्यांचेही प्रकार होते, सामान्य वेश्या अलेत्रय्डी, आणि सर्वोच्च म्हणजे हेटीअरा (या शब्दाचा अर्थ सोबती). काही हेटीअरा वादविवादपटू होत्या. क्लेप्सीड्रा हिच्या वक्तशीरपणामुळे तिला ते नाव मिळालं होतं त्याचा अर्थ जलघटिकापात्र असा होतो. थीओफ्रत्स याने इ.पू. ३७२ – २८७ या काळात ‘ऑन मरेज’ हा ग्रंथ लिहिला, याचा सविस्तर अभ्यास करून लिओंटीयम या हेटीअराने त्यावर प्रगल्भ टीका लिहिली. रोमन समाजात कोर्टीझन अस्तित्वात होत्या. पॉम्पेई इथे व्हिकोली बाल्कोन पन्सिली नावाच्या इमारतीत शेकडो रमणी वास करत. या संदर्भातली रतिक्रिडेची मूळ चित्रं पॉम्पेईन wall paintings म्हणून प्रसिद्ध असून ती इटलीच्या वस्तुसंग्रहालयात सुरक्षित आहेत. रोमन साम्राज्यात हेटीअरा ऐवजी कोर्टीझन शब्द रूढ झाला. युरोपात पंधरा-अठरा शतकांत कोर्टीझन आणि कलावंतीण यांना समाजात विशिष्ट स्थान आणि आदर मिळत होता. फ्रान्समध्ये सतराव्या शतकात रमणींची सत्कारगृहं (सलो) प्रसिद्ध होती. जपानमध्ये गै (कलात्मक क्षमता) आणि शा (व्यक्ती) यावरून गैशा ही संज्ञा रूढ झाली. त्यांच्यात अलंकारिक सुरावट, सौजन्य, निष्कपट, सुसंस्कृतपण असे. बाराव्या शतकापासून कार्यरत असलेली ही प्रथा इडो काळात (इ.स.१६००-१८६८) अधिक वाढीला लागली. ओकिया ही त्यांची निवासस्थानं होत. विसाव्या शतकात त्यांचं वर्चस्व राजकीय क्षेत्रात वाढीला लागलं. १९२०-३० मध्ये त्यांची संख्या साधारण ८० हजार होती, ती १९७०-८० दम्यान १७ हजार इतकीच उरली आहे. चीनमध्ये पूर्वी पीकिंग (बीजिंग) इथे सिंगसॉंग हाउस हा भाग राखीव होता. शांघाय इथे अत्यंत विलासी वारांगना गृहं आहेत. सिंगापूरमध्येगिटार गर्ल्स (पीपाचाई) या नावाने त्या ओळखल्या जातात. पाकिस्तानात त्या तवायफ, कान्जारी आणि गश्ती नावाने ओळखल्या जातात. आज मात्र सर्वत्र आमुलाग्र बदल झाला आहे. भारतीय साहित्यातील गणिका – (३२) संस्कृत, प्राकृत, पाळी भाषांत, हिंदू, बौद्ध, जैन वान्ग्मयात, त्यांचा उल्लेख आढळतो. त्या वैदिक काळात भारतात होत्या हे काही ऋचांवरून समजतं. (ऋचा १.१६७.४ – अनेक पुरुषांशी सांग करणारी ती साधारणी). पंचचुडा अप्सरेपासून त्यांची उत्पत्ती झाली असं मानतात. महाभारत काळात त्यांना प्रतिष्ठा प्राप्त झाली. (राज, नागरी, गुप्त, देव आणि ब्रह्म असे पाच प्रकार होते). रामायणात फार स्थान नव्हतं. अमरकोश, महाभाष्य, वार्त्तिके, दशरूपक, कौटिलीय अर्थशास्त्र जातक कथा, पंचतंत्र, वेताळकथा, शुकबहात्तरी, गाथासप्तशती, अशा विविध ग्रंथांत त्यांचा उल्लेख आहे. कामसूत्र या ग्रंथात वात्सायनाने ‘वैशिक’ या प्रकरणात त्यांची माहिती दिली आहे. कथासरीत्सागर, राजतरंगिणी, शृंगारतिलक, सरस्वतीकंठभरणा, कलाविलास, मेघदूत, मृच्छकटिक, रत्नावली, नागानंदा, अशा नाटकांतून त्यांचा उल्लेख येतो. भारतात इ.पू. पहिल्या सहस्रकात ती प्रथा अस्तित्वात येऊन ब्रिटीशांच्या आगमनानंतर एकोणिसाव्या शतकात लोप पावली असावी असं समजलं जातं. गणिकेची प्रशिक्षण व वर्णन – (१६) गणिकेला बालपण जवळपास नव्हतच. वयाच्या सहा-सात वर्षापासून तिला घडवायला सुरुवात होत असे. त्यांच्या प्रशिक्षणात आचार, विचार, शिष्टाचार, विविध कला, खेळ, भाषा, वर्तन, सौंदर्यवर्धन, गायन, वादन, नृत्य, अलंकरण, शरीर सौष्ठव, बुद्धिवर्धन अशा प्रत्येक अंगाचा व्यापक विचार होता. काही हस्तकला शिकाव्या लागत. पाककला, सुगंधी द्रव्य निर्मिती, कामशास्त्र, प्रणायाराधन, हिकाव्म लागे. स्वसंरक्षण शिकावं लागे. गणिकांची वेशभूषा, सौंदर्यप्रसाधने – (५) आधीच्या प्रशिक्षणात हाही एक महत्त्वाचा भाग होता. विट – (७) हा शब्द मी पहिल्यांदाच ऐकला. त्याचा इथे दिलेला अर्थ – शृंगाररस नायकानुचराप्रमाणे संपत्तीचा भोग न घेणारा किंवा जो आपल्या पैशाचा वापर कधी करत नाही, असं नाटकातलं लबाड, धूर्त पात्र. गणिका संस्थेत त्याच्या जोडीने वयस्य, अनुचर, धूर्त आणि डिंडिक ही पुरुष पात्र वावरतात. प्रतिवेशिनी ही गणिकेची शेजारीण. ती विश्वासातली. ती गणिकेसाठी विट आणि प्रियकर यांच्याशी संवाद साधते. गणिकामाता – (७) हे पात्र फार महत्त्वाच. तिला संरक्षित स्त्री, कुट्टनी किंवा कुट्टीनी म्हटलं जाई. तिचं काम शिस्त राखणे, थोडक्यात रेक्टर. कामकुजानांना आळा घालणं, गणिकांना खऱ्या प्रेमापासून वंचित ठेवणं. कामुकांचं मानसशास्त्र तिला मुखोद्गत. पुरुषांच्या गुणदोषाच्या’ आधारे अचूक आडाखे बांधत ती गणिकेला सल्ला देता. तिचा दबदबा असतो. ते नसती तर गणिका ही संस्था कधीच नामशेष झाली असती. कारण स्त्रिया या स्त्रिया असल्याने स्त्रीसुलभ भावनेनुसार गणिकागिरीत न रमता त्या केव्हाच संसाराला लागल्या असत्या. प्रियकराचा राग-रंग – (९) रग हे बारा छटांमधली काम आसक्ती असं म्हणता येईल. पुरुषाची मनोवृत्ती, प्रवृत्ती, स्वभाव, गुणविशेष आणि खास करून राग-लोभ जाणून घेत गणिकेला त्याच्याशी वर्तन करावे लागते. कथांविषयी थोडेसे आणि कथा (४८) – ‘शृंगारमंजरीकथा’ हा राजा भोज रचित संस्कृत ग्रंथ असून त्यात स्त्री-पुरुष मनोवृत्ती दर्शन घडवणाऱ्या तेरा कथा आहेत. त्यापैकी काही जीर्ण, काही अपूर्ण आहेत. पैकी एक कथा वाचून दाखवते. संदर्भग्रंथ (४) सोबत फोटो दिले आहेत त्या पानांचे. या पुस्तकात आढळलेले सुंदर शब्द – गरती, लीलासहचारी, पृथुल (अर्थ कळला नाही अजून), रूपाजीवा, सूरसुंदरी परिचय फार लांबला. या विषयावरच्या इतक्या अभ्यासानंतर एखादा पेपर सहज देता येईल. परत अभिमानाने म्हणता येईल, ‘मा, मै फर्स्ट क्लास फर्स्ट आया!’ मनापासून धन्यवाद. माझी परिचय पाळी नसती तर मी हे पुस्तक वाचलंच नसतं. मजा आली मला वाचताना. तशी तुम्हालाही आली असेल अशी खात्री आहे. थांबते. ...Read more

RESHIMREGHA
RESHIMREGHA by SHANTA J SHELAKE Rating Star
मीना कश्यप शाह

शांता शेळके या कवयित्री म्हणून आपल्या सर्वांच्या माहितीच्या आहेतच. गीतकार म्हणूनही त्यांचे मोठे नाव झाले. रेशीमरेघा हे त्यांनी रचलेल्या गीतांचे पुस्तक. मुख्यतः त्यांनी चित्रपट आणि नाटक यासाठी गीते लिहिली आहेत. प्रस्तावनेत शांताबाई म्हणतात, गीते लििणे त्यांना अतिशय आकर्षक वाटत गेले आणि म्हणून केवळ चित्रपट आणि नाटकांसाठीच नाही, तर स्वानंदासाठीही, त्या गीतं लिहित राहिल्या. चालीवर गीते लिहिणे त्यांना आव्हानात्मक वाटायचे, बंधनकारक नाही. पुढे बंगाली, गुजराती अशा काही गीतांच्या चाली आवडल्या, तर त्या, त्या चालींवरही छंद म्हणून गीते लिहू लागल्या. त्यांच्या गीतांमध्ये लावण्या, गवळणी, नृत्यगीते आणि युगुलगीते (त्यांनी द्वंद्वगीते हा शब्द वापरला आहे, जो मला आवडत नाही) जास्त आहेत. ह्या पुस्तकात त्यांचे संकलन आढळून येतं. पुस्तकातील काही गीतांपेक्षा मला त्यांची प्रस्तावनाच जास्त आवडली. आपल्या गीतांबद्दल त्यांनी हळुवार होत लिहिलं आहे. प्रत्येक गाणं ध्वनिमुद्रीत होतानाचे क्षण त्यांना आठवतात. आणि ही गीतं प्रसिद्ध होण्यासाठी संगीतकार, गायक यांचा हातभार नक्कीच आहे याची त्या आठवण काढतात. गीतांचा अर्थ रसिकांपर्यंत पूर्णपणे पोहोचवण्यासाठी गायक-गायिकांचा खूपच मोठा वाटा आहे, त्यांच्याबद्दल त्या अपार कृतज्ञता व्यक्त करतात. हे पुस्तक त्यांनी लावणेसम्राज्ञी यमुनाबाईंना अर्पित केलेले आहे. त्यान्नी लिहिलेल्या "रेशमाच्या रेघांनी" या सर्वात जास्त प्रसिद्ध पावलेल्या लावणीच्या नावावर ह्या पुस्तकाचे नाव आधारित आहे. अनेक प्रसिद्ध गाणी या गीत संग्रहात आढळतात. रेशमाच्या रेघांनी, काय बाई सांगू, मनाच्या धुंदीत लहरीत, हे श्यामसुंदर, राजसा, शालू हिरवा पाच नि मरवा, चाल तुरू तुरू, मनाच्या धुंदीत लहरीत येना आणि अशी अनेक. शांताबाईंचं काव्य सामर्थ्य ह्या लावण्या/गीतांमध्ये देखील दिसून येतं... कळ्या आजच्या, शिळ्या उद्याला, ओठांशी न्याल का, आल्यावर जवळ मला घ्याल का.... अशी अनेक उदाहरणं! पुस्तकातील बहुतेक गाणी ही लावण्यांच्या स्वरूपातली आहेत. त्यामुळे त्याच त्याच भावना सारख्या सारख्या आढळून येतात. बोलावणे किंवा नको जाऊ म्हणणे, भेटी (गिफ्ट्स) घेणे, वाट पाहणे, विरह, सौंदर्याचे वर्णन, शृंगाराचे वर्णन, म्हणजे तुम्हाला काय मिळू शकेल याची कल्पना गीतातून देणे (उदा. कंबरपट्टा रेखून दावी, देहाचा आकार!!) अशा प्रकारचे विषय पुन्हा पुन्हा येत राहतात, पण (शांताबाई बीइंग शांताबाई) कुठेच तोचतोचपणा कंटाळवाणा होत नाही (वाचकाने जरा रोमँटिकपणा दाखवून वाचली ही गीतं तर फारच बहार!) शांताबाई नथ फारच आवडते असं दिसतं... नथ सर्जाची नाकी घालता हसेल डावा गाल किंवा सलगी करते नथ ओठांशी, तो तुमचा अधिकार अशा प्रकारे ती खुलून देखील दिसते ह्या गीतांमधे!! अनेकविध लावण्या आहेत ह्या पुस्तकात. पाडव्याची, रंगपंचमीची, श्रावणाची, अशा विविध दिवसांच्या लावण्या तर हिरव्या रंगाची लावणी देखील आहे. पाडव्याची लावणी म्हणजे पाडव्याला शालू मागते आहे, कारण ती रात्री एकांतात उभारणार आहे. 🙂 "मी सुंदर आहे तर आता मी काय करू?" अशी तक्रारही दिसून येते. "माझ्या नखऱ्याच्या शंभर तऱ्हा" सांगणारीला स्वतःच्या सौंदर्याची पुरेपूर जाणीव आहे आणि त्यापेक्षाही, फक्त शारीरिक सौंदर्यावर विसंबून न राहता, त्याबरोबर तोरा दाखवत भुरळ पाडणे ह्यात ती माहीर आहे. पण त्याचबरोबर ती धोक्याची सूचना पण देते आहे... घटकाभर संग बसून घालवा वेळ, जमल्यास मनांचा जमून येईल मेळ, नाहीतर यायचा अंगाशी हा खेळ, पाय टाकण्याआधी इथे, विचार पुरता करा, माझ्या नखऱ्याच्या शंभर तऱ्हा!! एका लावणीत एका पुरुषाने फसवलंय अशा स्त्रीचे रूप आहे. जत्रेत एक जण भेटला आणि त्याने आपल्याशी फ्लर्ट केलं, जत्रा उलगडल्यावर दुसऱ्या दिवशी मात्र तो डोळ्याला डोळा भिडवत नाही, तोंड चुकवून पुढे जातो, ह्याची तक्रार ह्या लावणीत येते. किती विविधता! अशा लावणी कलाकाराच्या आयुष्याचं विदारक दृश्य देखील शांताबाईंनी दाखवले आहे. तिथे येणारा आज एक, तर उद्या दुसराही असू शकेल किंवा तिथे असणारी आज एक, तर उद्या दुसरीही असू शकेल. हे सांगून त्या म्हणतात... प्रीतीचे नीतीचे व्यर्थ सांगणे, भुकेल्या देहाचे सारे मागणे, जन्माच्या नात्याचे फुका बहाणे, कुणाला सतत इथे राहणे? इथल्या महाली घडीची वस्ती, सुखाचे हिंदोळे आभाळी चढती, घडीत वरती घडीत खालती ऐन विशीतल्या स्त्रीचं सौंदर्याचं अत्युत्तम वर्णन एका गीतात केलं आहे. अनेक गीतांमध्ये पुरुषांनी स्त्रीच्या देहाचे आणि मनाचे केलेले वर्णन दिसून येते. त्यातही नुसता देहच नाही तर स्त्रीचा तोरा (attitude) देखील पुरुषाला कशी भुरळ पाडतो हे दिसतच. "ही चाल तुरुतुरु" आपल्या सगळ्यांच्या आवडीचे आणि माहितीचे आहे. असंच "मनाच्या धुंदीत लहरीत ये ना" हे देखील. गीतांमध्ये श्रावण, पाऊस, विरह, वाट बघणे हे सर्व हमखास येतं. एक गीत आहे "लहरी सजण कुणी दावा" - मीना खडीकर यांचे संगीत, उषा मंगेशकर यांचा आवाज. हे गीत मला ना वाचायला आवडलं ना ऐकायला आवडलं 🫣 श्रीकृष्ण राधेच्या कथा तर आपण गवळणींमधे अनेक वेळा ऐकल्या आहेत. कृष्णाची धून ऐकल्यानंतर अगदी काहीही न सुचता तशीच्या तशी निघालेली राधा! त्यातही तिच्या शृंगारचं वर्णन येतंच. सजण्याची आवड असलेल्या स्त्रीचे वर्णन अतिशय खुबीने शांताबाईंनी केले आहे. मला स्वतःला नटण्या मुरडण्याची अतिशय हौस असल्यामुळे हे सगळं वर्णन वाचून, "हे पुस्तक आपण आधी का नाही वाचलं" याचं दुःख मात्र झालं. ही उदाहरणं बघा ना... माथ्यावर मोतियाची जाळी, भांगेत मोती सर, चंद्रकोर भाळी, कानात झुमके, केसांमध्ये वेल, नाकात नथ, नथित हिरे, बिल्वदळे, वज्रटिक, `बोलताना पाठीवर जिचे रेशमाचे गोंडे खालीवर होतील अशी` पाच पदरी मोहन माळ!! दंडात वाकी रुताव्या, शिंदेशाही तोडे असावेत आणि पायी सांध्यात सोनसळी, गळ्यात तन्मणी, कमरेला कंबरपट्टा, पायी पैंजण.... "शालू हिरवा, पाच नि मरवा, वेणी तीपेडी घाला" हे गीत तर फारच प्रसिद्ध झाले. शृंगार आणि सौंदर्य यांचे वर्णन या सगळ्या गीतांमध्ये अगदी खुलून आलेलं आहे. आणि प्रेम! त्याविषयी किती लिहावं आणि कशाप्रकारे लिहावं असा मोठाच प्रश्न पडला आहे. तरीही एका स्त्रीच्या मनाने वाचलेल्या ह्या चार ओळी लिहीतेच... काय वाजले प्रिय ते पाऊल, तो तर वारा तिची न चाहूल, भास हो फसवा वरचेवरी, शोधितो राधेला श्रीहरी!! ...Read more