* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: EMPOWERING WOMEN AS I SEE
  • Availability : Available
  • Translators : MADHURI SHANGBAUG
  • ISBN : 9789387789661
  • Edition : 5
  • Publishing Year : MARCH 2009
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 168
  • Language : Translated From ENGLISH to MARATHI
  • Category : POLITICS & GOVERNMENT
  • Available in Combos :KIRAN BEDI COMBO SET - 11 BOOKS
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
I BELIEVE IN CONTINUOUS LEARNING AND SHARING THE KNOWLEDGE. I FEEL THAT IT IS MY DUTY TO WRITE DOWN ABOUT THE THINGS WHICH UPSET ME THE MOST, WHETHER I SEE THEM, LISTEN TO THEM OR READ THEM. WITH OPEN EYES AND MIND WE SHOULD WORK TOWARDS MAKING EVERY WOMAN COMPETENT. I WILL CONTINUE TO WRITE ABOUT THE COMMON MAN`S PROBLEMS, I WILL USE THE POWER OF WORDS TO REACH ALL. DR. 106~ HAS WRITTEN ON THE VARIOUS PROBLEMS OF WOMEN NOW AND THEN. IN THIS BOOK, MANY OF HER ARTICLES ARE BOUND TOGETHER. WE HOPE THAT THEY WILL COMPEL THE READER TO THINK SENSITIVELY ABOUT THE WOMEN AND TO ACT FOR THEIR BETTERMENT.
``सतत शिकणे अन् मिळालेले ज्ञान वाटून घेणे यावर माझा पूर्ण विश्वास आहे. मी जे पाहते, ऐकते, वाचते त्यातील जे मला अस्वस्थ करते, त्याबद्दल लिहिणे हे माझे कर्तव्य आहे असे मला वाटते. विशेषत: स्त्री आणि तरुण यांच्या सक्षमीकरणासाठी सर्वांनी सजग राहून कृती करायची गरज आहे. लेखणीची ताकद वापरून, सामान्यांचा आवाज जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी हाती निशाण धरायचे काम मी यापुढेही करत राहीन.`` डॉ. किरण बेदी यांनी वेळोवेळी वेगवेगळ्या प्रश्नांवर लिहिलेल्या लेखांचे हे संकलन, वाचकांना स्त्रीप्रश्नांबद्दल संवेदनशील करेल आणि प्रतिसाद द्यायला, कृती करायला उद्युक्त करेल.
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
#9TH JUNE #I DARE #ITS ALWAYS POSSIBLE #WHAT WENT WRONG AND WHY #MAJAL DARMAJAL #AS I SEE STRIYANCHE SAKSHAMIKARAN #AS I SEE BHARTIYA POLICE SEVA #AS I SEE NETRUTVA AANI PRASHASAN #BE THE CHANGE FIGHTING CORRUPTION #KIRAN BEDI #MADHURI SHANGBAUG #आय डेअर #इट्स ऑलवेज पॉसिबल #व्हॉट वेंट राँग अ‍ॅण्ड व्हाय #मजल दरमजल #अ‍ॅज आय सी...-स्त्रियांचे सक्षमीकरण...#भारतीय पोलीस सेवा...#नेतृत्व आणि प्रशासन...#भ्रष्टाचाराशी लढा #किरण बेदी #माधुरी शानभाग
Customer Reviews
  • Rating StarDAINIK LOKSATTA 03-04-2005

    रोखठोक वैचारिक मंथन… डॉ. किरण बेदी! काही आठवले का? हो त्याच त्या भारतीय पोलीस सेवेतील सर्वोच्च पदावर पोहोचलेल्या पहिल्या स्त्री-अधिकारी. रॅमन मॅगसेसेसह अनेक पुरस्कारांनी सन्मानित. विविध समाजोपयोगी कामांतून महत्त्वाचा सहभाग. वेळात वेळ काढून स्तंभलेखन या आधी काही पुस्तकांचे प्रकाशन. इ. इ. हा बायोडेटा’ सर्वांना माहीत असेलच. तो पुनहा आठवण्याचे कारण त्यांचे ‘अ‍ॅज आय सी...’ हे नवीन पुस्तक होय. ‘द ट्रिब्यून’ आणि ‘पंजाब केसरी’मध्ये सातत्याने आलेल्या शंभर लेखांचे संकलन या पुस्तकात करण्यात आले आहे. समाज आणि त्यात घडणाऱ्या असंख्य लहान-मोठ्या घडामोडींवर बेदींचे बारीक लक्ष दिसते. किंबहुंना तो त्यांच्या चिंतनाचा विषय आहे. भारतीय पोलीस सेवेदरम्यान आलेले अनुभव या लेखांतून आधिक्याने जाणवतात. पोलीस, प्रशिक्षण केंद्र, पोलिसांची जीवनशैली, त्यांच्याविषयी वाटणाऱ्या आत्मीयतेसोबतच सेवाकार्याचा वारसा चालावा, सांगण्याची धडपड या लेखांतून दिसते. ‘स्त्री’ हा किरण बेदीचा दुसरा जिव्हाळ्याचा विषय मानता येईल. स्त्री शिक्षण, सबलीकरण, अनिष्ट प्रथावृत्तींच्या विरोधात ठामपणे उभे राहणे, स्त्री-शक्तीची जाणीव करून देणे असे कार्य या लेखाद्वारे होताना दिसते. देशाचे भावी नागरिक कसे हवेत, त्यांचे शिक्षण, त्यांच्यावर होणारे संस्कार, त्यांचा सर्वांगीण विकास यादृष्टीने मुलांच्या भवितव्याचा विचार बेदी या लेखात करताना दिसतात. सैनिकांचे बलिदान, देशाभिमान, आपल्या उपयुक्त आर्दर्श ठरणाऱ्या परंपरा त्या वाचकांपुढे ठेवतात. तशाच समाजात चालणारे गैरव्यवहार, साध्या साध्या वाटणाऱ्या प्रश्नांनी घेतलेले भयनाक स्वरूप आणि या साऱ्यांतूनही आशेचा किरण दिसू शकतो, ही भावना यातून व्यक्त होते. परदेशातील कायदा-सुव्यवस्था, ‘इथे-तिथे’ मधला जाणवणारा फरक, तिथल्या चांगल्या-वाईट, आदर्श गोष्टी, दाखले किरण बेदी देतात. स्वत: उत्तम खेळाडू असल्याने खेळ-आरोग्याची महती त्या गातात. काही निवडक लोकांची पत्रे दाखवत त्यावर भाष्य करतात. कधी एखाद्या ठिकाणी आपण केलेले भाषणच ओघवते लिहून जातात. या साऱ्यांतून त्यांचे चतुरस्त्र व्यक्तिमत्व जाणवून जाते. ‘‘मी जे पाहते, ऐकते, वाचते, बारकाईने निरखते त्याचे काय करावे असा प्रश्न मला पडतो. मी ते सर्व विसरून जाऊ शकते, दुर्लक्षू शकते. त्याबद्दल तक्रारी करू शकते वा पुढे बघू म्हणून हात झटकू शकते. पण तसे न करता त्यावर लिहून शब्दांतून माझी अस्वस्थता प्रकट करणे ही मला माझी एक गरज वाटते. म्हणून मी लिहिते आणि लिहित राहीन.’’ या किरण बेदींच्या उद्गारातून त्यांची भूमिका सहज स्पष्ट होऊ शकते. यथार्थ शीर्षके आणि रोखठोक कथन असलेले हे अनुभव बेदींची चीड, प्रेरणा, चित्तवेधक गोष्टी, वैचारिकता असे कंगोरे दाखवतात. समाज वास्तवाच्या असंख्या छटा रंगवून त्यांचे दर्शन वाचकांना घडवायचा त्यांचा मानस आहे. ओघवती भाषा, सुबोध आणि नेमका आशय थोडक्या शब्दांत पोचवणारी शैली बेदींनी आत्मसात केलेली दिसते. वाचकांशी संवाद साधत, सजग करत, त्यांना ‘माणूस’ बनवण्याचे बेदींचे प्रयत्न प्रामाणिक वाटतात. समाज सर्वार्थाने सुंदर व्हावा, असे किरण बेदींना वाटते. त्यासाठी अर्थातच प्रत्येकाने झटायला हवे. म्हणूनच ‘अ‍ॅज आय सी...’ असे म्हणताना तुम्हीही पाहा, असे मन:पूर्वक त्या वाचकांना सांगतात. -राधिका कुंटे ...Read more

  • Rating StarDAINIK DESHDOOT 19-7-2009

    ‘अ‍ॅज आय सी’ (स्त्रियांचे सक्षमीकरण) यात अनुक्रमणिकेवर नुसती दृष्टी फिरवली तरी केवढा मोठा आवाका त्यांनी लेखनातून वाचकांसमोर मांडलाय याची कल्पना येते. त्यांच्या मते स्त्री असणे ही एक मूल्यवान गोष्ट अन् जबाबदारी आहे. स्त्री स्वयंनिर्भर, स्वावलंबी असते ेव्हा ती साक्षात दुर्गालक्ष्मीचे स्वरूप असते. अन् स्त्री जेव्हा शिकलेली नसते, आर्थिकदृष्ट्या दुसऱ्यावर अवलंबून असते, त्यातून मानसिकदृष्ट्याही ती दुस-यावर अवलंबून असते तेव्हा तर तिचे जगणे पुरातन काळातल्या गुलामासारखे असते. किरण बेदींनी आजूबाजूच्या निरीक्षणातून अनुभवातून स्त्रियांचे अनेक प्रश्न यानिमित्ताने उजेडात आणले आहेत. स्त्री शिक्षण, हुंडा, स्त्री भ्रूणहत्या, घरगुती हिंसाचार, स्त्रियांची मानसिकता अशा विषयांवर परखड विचार मांडले आहेत. कृपया वाचू नका, बोला, तुमच्या सर्व शक्तिनिशी, विकासदृष्टीला प्रणाम, कुणीतरी कुठेतरी, इथे अजिबात सहनशीलता दाखवू नका, या प्रश्नांना उत्तरे हवी आहेत, जन्मापासून बंदिवासात, इच्छा आहेत तिथे मार्ग आहे, उत्कृष्ट आणि निकृष्ट आपणच आपल्याला मदत करूया, जबाबदार पालकत्त्व चौफेर व्यक्तिमत्त्व, दुहेरी मूल्यमापन, नव्या पिढीची पहाट अशा अनेक विषयांचे विस्ताराने विवेचन केले असून प्रत्येक स्त्रीच्या मनातल्या भावना, विचार मांडले आहेत. प्रत्येकाने अगदी स्त्री-पुरुष सगळ्यांनी वाचावं असं पुस्तक आहे. ‘अ‍ॅज आय सी’ चे हे तीन भाग वाचून, त्यातून ज्ञान माहिती तर मिळतेच, परंतु प्राप्त परिस्थितीचेही भान येते. ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

KHULBHAR DUDHACHI KAHANI
KHULBHAR DUDHACHI KAHANI by SUNANDA AMRAPURKAR Rating Star
श्रीपाद ब्रह्मे

नुकतंच असंच वेगानं वाचून संपवलेलं दुसरं पुस्तक म्हणजे सुनंदा अमरापूरकर यांचं ‘खुलभर दुधाची कहाणी’. दिवंगत ज्येष्ठ अभिनेते सदाशिव अमरापूरकर यांच्या त्या पत्नी. अर्थात ही काही त्यांची एकमेव ओळख नव्हे. एक चांगल्या अभिनेत्री, उत्तम अनुवादक म्हणूनही त्या ्रसिद्ध आहेत. त्यांनी ‘खुलभर दुधाची कहाणी’ या आत्मचरित्रवजा लेखनातून त्यांच्या जगण्याचा व्यापक पट अतिशय प्रांजळपणे उलगडला आहे. मला हे पुस्तक विशेष भावण्याचं कारण म्हणजे त्यात आलेलं नगरचं वर्णन. मी स्वत: नगरला फार प्रदीर्घ काळ राहिलो नसलो, तरी ते शेवटी माझ्या जिल्ह्याचं गाव. आणि वयाच्या १३ ते २२ अशा महत्त्वाच्या कुमार व तरुण वयातला माझा तिथला रहिवास असल्यानं नगरच्या आठवणी विसरणं शक्य नाही. सुनंदाताई माझ्या आईच्या वयाच्या. त्यामुळं त्यांच्या लहानपणच्या आठवणी जवळपास माझ्या जन्माच्या २०-२५ वर्षं आधीच्या. असं असलं तरी मी त्या वर्णनाशी, त्या काळातल्या नगरशीही रिलेट होऊ शकलो, याचं कारण मुळात गेल्या शतकात बदलांचा वेग अतिशय संथ होता. नगरसारख्या निम्नशहरी भागात तर तो आणखी संथ होता. त्यामुळं एकूण समाजजीवनात १९६० ते १९९० या तीस वर्षांत तपशिलातले फरक सोडले, तर फार मोठा बदल झाला नव्हता. सुनंदाताई माहेरच्या करमरकर. त्यांचं आजोळ‌ सातारा असलं, तरी त्या जन्मापासून नगरमध्येच लहानाच्या मोठ्या झालेल्या. अगदी पक्क्या ‘नगरी’ म्हणाव्यात अशा. ( आजही त्या स्वत:ला अभिमानानं ‘नगरकर’च म्हणवून घेतात.) सुनंदाताईंचे वडील त्या दहा वर्षांच्या असतानाच गेले. त्यांना मामांचा आधार होता, पण आईनंच लहानाचं मोठं केलं. तेव्हाचं त्यांचं निम्न मध्यमवर्गीय जगणं, नगरमधले वाडे, तिथलं समाजजीवन, तिथल्या शाळा, शिक्षक, नगरमधील दुकानं, दवाखाने, तिथल्या गल्ल्या, बाजार हे सगळं सगळं सुनंदाताई अतिशय तपशीलवार उभं करतात. नगरसारख्या मध्यम शहरात वाढलेल्या महाराष्ट्रातील कुठल्याही शहरातील त्या काळातील व्यक्तीला अतिशय सहज रिलेट होईल, असं त्यांचं हे जगणं होतं. त्यात सुनंदाताईंचं लेखन अतिशय सहज, सोपं आणि प्रांजळ असल्यामुळं ते आपल्याला अगदी भिडतं. एका प्रख्यात अभिनेत्याची पत्नी असल्यानं त्यांचं जीवन इतर सर्वसामान्य स्त्रियांपेक्षा वेगळं झालं असेल, अशी आपली अपेक्षा असते. सुनंदाताईंच्या लेखनातून या ‘वेगळ्या जीवना’ची काही तरी झलक मिळेल, अशीही आपली एक भूमिका तयार झालेली असते. सदाशिव अमरापूरकरांसारख्या मनस्वी अभिनेत्याशी लग्न झाल्यानंतर सुनंदाताईंचं जगणं बदललंही; मात्र ते वेगळ्या पद्धतीनं. सदाशिव अमरापूरकर ऊर्फ नगरकरांचा लाडका बंडू त्यांना नगरमध्ये शाळेपासून कसा भेटला, नंतर कॉलेजमध्ये दोघांनी एकाच ग्रुपमधील नाटकं कशी सादर केली, त्यात अगदी नकळतपणे त्यांचं प्रेम कसं जमलं आणि नंतर नगर सोडून त्या पतीच्या कारकिर्दीसाठी मुंबईत कशा आल्या हा सर्व नाट्यमय प्रवास सुनंदाताई अतिशय तन्मयतेनं मांडतात. अमरापूरकर मंडळींच्या घराविषयीचे तपशील त्यात येतात. अमरापूरकरांचे वडील दत्तोपंत हे नगरमधलं मोठं प्रस्थ. श्रीमंत घराणं. मोठा वाडा, नोकरचाकर वगैरे. त्या तुलनेत सुनंदाताईंची माहेरची परिस्थिती जेमतेम म्हणावी अशी. अशा परिस्थितीत हे लग्न झालं आणि त्या अमरापूरकरांची सून झाल्या, इथपर्यंत पुस्तकाचा निम्मा प्रवास (मध्यंतरच) होतो. पुढल्या दोनशे पानांत आपल्याला खऱ्या अर्थानं सदाशिव अमरापूरकर हे काय व्यक्तिमत्त्व होतं, हे उलगडत जातं. अमरापूरकरांनी शेवटपर्यंत त्यांची मध्यमवर्गीय राहणी व मध्यमवर्गीय मूल्यं सोडली नाहीत. ‘अर्धसत्य’सारख्या सिनेमामुळं एका रात्रीतून ते भारतभरात प्रसिद्ध झाले. या एका ओळखीमुळं अमरापूरकरांचं जीवन पूर्ण बदलून गेलं. तोपर्यंत असलेली आर्थिक ओढगस्तीही संपली. हिंदी चित्रपटसृष्टीत अगदी स्वप्नवत अशा रीतीनं ते मोठे स्टार झाले. एकापाठोपाठ एक खलनायकी भूमिका त्यांच्याकडं येऊ लागल्या. पैसा येऊ लागला. अशा परिस्थितीत एक मध्यमवर्गीय कुटुंब या सगळ्या धबधब्याला कसं तोंड देतं आणि आपली मूल्यं कायम जपत राहतं, हे सुनंदाताईंनी फार हृद्यपणे लिहिलं आहे. सुनंदाताईंनी अनेक वर्षं एलआयसीत नोकरी केली. पतीचं अस्थिर क्षेत्र असल्यानं त्यांनी सुरुवातीला नोकरी केलीच; पण नवरा हिंदी चित्रपटसृष्टीत सुपरस्टार व्हिलन झाल्यावरही त्यांनी ही नोकरी सोडली नाही. त्यांच्या तिन्ही मुलींवर त्यांनी उत्तम संस्कार केले. एका सिनेमाच्या प्रीमियरनंतर हे सगळे कुटुंबीय कसे घरी जाऊन पिठलं-भाकरीचं जेवण तयार करून जेवले हे त्यांनी एका प्रसंगात अतिशय खेळकरपणे सांगितलं आहे. अमरापूरकरांचं नाटकवेड, भौतिक सुखांविषयीची काहीशी विरक्त वृत्ती, त्यांचा मित्रांचा गोतावळा, अनेक माणसांचा घरात राबता असा एकूण ‘देशस्थी’ कारभार यावर सुनंदाताई कधी गमतीत, तर कधी काहीसं वैतागून टिप्पणी करतात. अर्थात त्यांचं सदाशिव अमरापूरकरांवर अतिशय प्रेम होतं आणि त्यांनी हे शेवटपर्यंत उत्तम निभावलं. अशा आत्मचरित्रांत अनेकदा ‘आहे मनोहर तरी... गमते उदास’ असा सूर लागण्याचा धोका असतो. सुनंदाताईंच्या लेखनाचं वैशिष्ट्य म्हणजे, एखादा अपवाद वगळता, त्यांच्या या संपूर्ण पुस्तकात असा रडवा सूर कधीही लागलेला नाही. आपल्याला जे काही मिळालं, ते आपणच निवडलं आहे आणि त्यामुळं त्याविषयी तक्रार करण्याचा आपल्याला काही अधिकार नाही, अशी एक भूमिका त्यांनी घेतलेली दिसते. त्यांच्या या पुस्तकातून विसाव्या शतकातील मध्यमवर्गीय ब्राह्मण घरातील एका तरुणीच्या आशा-आकांक्षांचा, आयुष्यानं दिलेल्या आश्चर्याच्या धक्क्यांचा आणि त्याला सामोरं जाण्यातील धीट दिलदारपणाचा लोभस प्रवास दिसतो. आपली मध्यमवर्गीय मूल्यं जपत, प्रामाणिकपणे व उमेदीनं आयुष्य जगणाऱ्या अनेक महिलांना या पुस्तकात आपल्या जगण्याचं प्रतिबिंब सापडेल. तेच या ‘खुलभर दुधाच्या कहाणी’चं यश आहे. ...Read more

HITLER AANI BHARAT
HITLER AANI BHARAT by VAIBHAV PURANDARE Rating Star
प्रभाकर गावंडे, अमरावती

मी विकत घेऊन वाचले आहे हे पुस्तकं, चांगले आहे, नवीन माहिती वाचायला मिळाली.