* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: WE, THE NATION
  • Availability : Available
  • Translators : V.S.WALIMBE
  • ISBN : 9788177667165
  • Edition : 6
  • Publishing Year : MAY 1995
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 320
  • Language : Translated From ENGLISH to MARATHI
  • Category : POLITICS & GOVERNMENT
  • Available in Combos :V. S. WALIMBE COMBO SET- 4 BOOKS
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
A BOOK FOR ALL PERSONS AND ALL SEASONS INDEED. EACH TOPIC IS ILLUMINATED WITH SENSITIVITY AND SUNLIGHT-CLEAR EXPOSITION. PUBLIC MEMORIES ARE IRRESPONSIBLY SHORT AND SELECTIVE, AND THIS BOOK, SPANNING AS IT DOES THE PANORAMA OF THE LAST TEN TUMULTUOUS YEARS, BECOMES ESSENTIAL READING - THE HISTORY THAT MUST BE1 READ SO THAT WE ARE NOT CONDEMNED TO REPEATING IT. INDIA, THE SLEEPING GIANT OF AN ECONOMY IN THE WORDS OF LEE KUAN YEW IS, AT LAST, SLOWLY STIRRING FROM ITS LONG NIGHT OF SLUMBER, DRUGGED AS IT HAS BEEN FOR DECADES WITH THE OPIATE OF SOCIALISM. THIS AMAZING SUBCONTINENT WITH ITS MOSAIC OF COLOURS, CULTURES, CONTRASTS AND MADDENING CONTRADICTIONS, ALWAYS HAS, THANKS TO VAST QUANTITIES OF ITS OWN INDIGENOUSLY MANUFACTURED RED TAPE AND VENAL POLITICIANS, BEEN HELD IN THRALL FOR SO LONG. IT IS ONLY NOW, AND THAT TOO HESITANTLY, THAT INDIA IS MOVING TO TAKE ITS RIGHTFUL PLACE IN THE COMMUNITY OF NATIONS OF THE WORLD. WHAT AILS INDIA, WHAT ITS POTENTIAL IS, HOW MAGNIFICENT ITS HERITAGE IS, HOW RICHLY ENDOWED IT IS BY BOTH HISTORY AND NATURE, ARE ALL HIGHLIGHTED IN THIS BOOK.
`निद्रिस्त महाशक्ती’ असे ली कुआन यू यांनी भारताचे वर्णन केले होते. समाजवादाची नशा ओसरल्यामूळे, सुदैवाने भारत दीर्घ निद्रेतून हळूहळू जागा होत आहे. त्यामूळे लवकरच तो आंतरराष्ट्रीय पटावर आपले न्याय्य स्थान संपादन करील,असा विश्वास वाटतो. भारताचे दुखणे काय आहे, त्याच्यापाशी केवढी उदंड क्षमता आहे, त्याला केवढा वैभवशाली वारसा लाभलेला आहे, इतिहास आणि निसर्ग या दोन्ही बाबतींत तो किती समृध्द आहे, याचे अत्यंत मार्मिक विवेचन या पुस्तकात करण्यात आलेले आहे. भारताच्या उदात्त राज्यघटनेपासून, या देशाला वेळोवेळी भेडसावत गेलेल्या माननिर्मित समस्यांपर्यंत अनेक विषयांचा वेध लेखकाने आपल्या अजोड बुध्दिमत्तेच्या बळावर अचूक रीतीने घेतला आहे. पालखीवाला यांनी केवळ समस्यांचेच सूचन केले आहे. असे नाही; आपल्या वैशिष्ट्यपूर्ण व्यासंगाच्या आणि विविध क्षेत्रांतील सखोल अनुभवाच्या आधारे त्यांच्या सोडवणुकीची दिशाही सांगितली आहे. जो देश इतिहास विसरतो, त्याच्या नशिबी त्या इतिहासाची पुनरावरावृत्ती अनुभवण्याची वेळ येते, असे सर्वच विचारवंत मानतात. त्या दृष्टीनेच पालखीवाला यांनी गेल्या सहा वर्षांच्या वाटचालीसंबंधी या ग्रंथात मागोवा घेतला आहे. थोडक्यात सांगायचे, तर सर्व व्यक्तींना सर्व प्रसंगी उपयुक्त ठरते, असे हे पुस्तक आहे.

No Records Found
No Records Found
Keywords
#NANI PALKHIWALA #V.S.SVALIMBE#WARSAWTEHIROSHIMA #WETHEPEOPLE #WETHENATION
Customer Reviews
  • Rating StarNEWSPAPER REVIEW

    ‘वुई दि नेशन’ हे पुस्तक प्रकाशित केल्याबद्दल प्रकाशक श्री. अनिल मेहता यांना धन्यवाद. कारण एक इंग्लिशमधील एक महत्त्वपूर्ण पुस्तक त्यांनी मराठीत आणले. पुस्तक वाचताना ते अनुवादित आहे असे कुठल्याही पानावर जाणवत नाही. इतक्या अर्थपूर्ण सामर्थ्यवान आणि ओघवतया भाषाशैलीमध्ये त्यांनी लिहिले आहे, अनुवाद ही सुद्धा एक ‘स्वतंत्र कलाकृती’ असते हेच या पुस्तकावरून जाणवते. केंद्रबिंदू अनाम देशबांधव भारतातील एक प्रसिद्ध विचारवंत श्री. नानी पालखीवाला यांचे ‘वुई दि नेशन’ हे पुस्तक म्हणजे शैक्षणिक, राजकीय, धार्मिक, आर्थिक, जातीयता, कायदा, संस्कृती, वृत्तपत्र या महत्त्वपूर्ण विषयांवरील चिंतन आणि मार्गदर्शन याचा एक वस्तुपाठच म्हणता येईल. श्री. पालखीवाला यांनी हे पुस्तक न कुरकुरता खडतर वाटचाल करीत असलेल्या कोट्यवधी सालम अनाम देशबांधवांना अर्पण केले आहे. या अर्पण पत्रिकेवरूनच लक्षात येते की, वर नमूद केलेल्या विषयांच्या मूलभूत संदर्भ किंवा केंद्रबिंदू हा देशातील अनाम देशबांधव - सामान्य माणूस आहे आणि असे असूनही हा अनाम बांधवच सदोदित उपेक्षित राहिला आहे. दुर्लक्षित राहिला आहे, हीच आपल्या देशाची शोकांतिका होय. या अनाम देशबांधवांची योग्य ती दखल राज्यकर्त्यांनी घेतली असती तर आपला देश जगातील एक समृद्ध आणि बलाढ्य देश झाला असता असेही श्री. पालखीवाला सांगतात. चुकीचा समाजवाद भारताचे दुखणे नेमके काय आहे याचा शोध पालखीवाला यांनी घेतला आहे. ते म्हणतात, ‘‘भारतातील चुकीचा समाजवाद हे त्यातील पहिले आणि मुलभूत दुखणे आहे. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर नेहरूंची काँग्रेस अधिकारावर आली आणि तेव्हापासून अधिकारावर आलेल्या सर्व सरकारांशी राष्ट्रावर विवेकशून्य आणि अनुकरणात्मक समाजवाद लादला, त्यामुळे उद्यमशिलतेला आणि उपक्रमशिलतेला वावच उरला नाही. वास्तविक सामाजिक न्याय हाच समाजवादाचा खरा आशय. त्याऐवजी रशियन-कम्युनिकेशनच्या अनुकरणातून लादलेली सरकारी नियंत्रणे आणि सरकारी मालकी म्हणजे समाजवाद असे राज्यकत्र्यांनी गृहीत धरले. वास्तविक भारतात आचरणात आणला जाणारा समाजवाद म्हणजे एक प्रचंड ढोंग आहे. अशा परखड शब्दांमध्ये पालखीवाला यांनी भारतीय समाजवादावर कडाडून टीका केली आहे.’’ फुटिरता हा दुसरा प्रश्न फुटिरता हा भारतातील आणखी एक महत्त्वाचा प्रश्न आहे. देशाच्या एकतेवर आणि अखंडतेवर जातीय विद्वेष, भाषिक दुराभिमान आणि प्रादेशिक निष्ठा प्रहार करीत असतात. जात किंवा वंश संप्रदाय किंवा भाषा यापैंकी कशाचाही आधार दहशतवाद्यांना आणि सराईत गुंडांना पुरेसा वाटतो. क्षुल्लक कारणावरून माणसे मारायला या गुंडांना जराही संकोच वाटत नाही. भारतीय प्रजासत्ताकाच्या इतिहासात पूर्वी कधीही पाहायला मिळाले नाही एवढे सध्या हिंसाचाराने थैमान घातले आहे. भारताच्या अशा अनेक समस्या असल्या तरी त्यावर उपाय करणे अशक्य आहे असे नाही. त्याबद्दल काय करणे शक्य नाही. त्याबद्दल काय करणे शक्य आहे याची चर्चा पालखीवाला यांनी आपल्या भाषणातून केली आहे. यासाठी भारताला त्याच्या उदंड, प्रचंड क्षमतेचा उपयोग करून द्यावा लागेल. भारताला पाच हजार वर्षाची सांस्कृतिक परंपरा लाभली आहे. सर्वकष, उदात्त अशी राज्यघटना आपल्याला लाभली आहे, अत्यंत सर्जनशील उपक्रमशीलता, अत्यंत गतिमान व्यापारी नेतृत्व आणि अर्थकारणाचे जाणकार तज्ज्ञ भारतात अनेक आहेत. दुर्मिळ अशी फार मोठी मानवी क्षमता आहे. एवढी विलक्षण निर्मिती शक्ती, क्षमता असताना आमचा देश मागे का पडला? मागे वळून पाहिले तर स्वातंत्र्यानंतरची महत्त्वाची २० वर्षे भारताने वाया घालविली असे म्हणावेसे वाटते. नानी पालखीवाला यांनी आपल्या भाषणातून गेल्या काही वर्षातील देशातील महत्त्वाच्या घटनांवरही चर्चा केली आहे. अयोध्या प्रश्नाविषयी ते म्हणतात, सध्याच्या कालखंडाची अयोध्याकांड म्हणून इतिहासात नोंद होईल. संघर्ष आणि समन्वय यापैकी एकाची आपल्याला निवड करावयाची आहे. भिन्न धर्मियांमध्ये सौहार्द आणि सहिष्णुता नांदावी यासाठी भारताचा आत्मा तळमळत आहे. जेथे कोठे चांगले दिसेल त्याचा स्वीकार करून ते आत्मसात करून भारतीय संस्कृती गेल्या पाच हजार वर्षांमध्ये अधिक प्रगल्भ आणि समृद्ध झाली आहे. या सर्वसमावेशक वृत्तीमुळे भारतीय संस्कृतीला वेगळेच सौंदर्य प्राप्त झाले आहे. नानी पालखीवाला यांच्या करप्रणाली आणि केंद्रीय अर्थसंकल्पावरील अभ्यासपूर्ण भाषणांचाही समावेश प्रस्तुत पुस्तकात आहे. त्यामध्ये त्यांनी भ्रष्टाचाराचा उगम आणि उपाययोजना यांचाही परामर्श घेतला आहे. भारतातील महत्त्वपूर्ण घटनात्मक प्रश्नांमध्ये त्यांनी मंडल आयोगाविषयी आपले विचार मांडले आहेत. मंडल आयोगातील पाच त्रुटी त्यांनी सांगितल्या आहेत. मान्यवरांवर लेख ‘वुई दि नेशन’ या पुस्तकाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे अनेक मान्यवर व्यक्तींच्या शैक्षणिक, सांस्कृतिक, राजकीय, सामाजिक कारकीर्दी विषयाचे लेख समाविष्ट केले आहेत. त्यामध्ये आदर्श राज्यपाल सी. सुब्रमण्यम्, आदी शंकराचार्य, दादाभाई नौरोजी, सरदार वल्लभभाई पटेल, सर आशुतोष मुखर्जी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, सुमंत मुळगावकर, एम, पी. बिर्ला, नौरोजी गोदरेज, रामनाथ गोएंका यासारख्या असामान्य व्यक्तीच्या कर्तृत्वाचा मार्मिकतेने आढावा घेतला आहे. पारशी समाजाचे योगदान भारतातील पारशी समाजातील लोकांबद्दल आकाशवाणीवर केलेल्या भाषणात पालखीवालांनी म्हटले, ‘‘भारतातील पारशी लोकांनी देशाच्या जीवनात निर्वासित म्हणून पारशी भारतात आले. सध्या ९४³ पारशी शहरात राहतात. शिक्षण, सामाजिक सुधारणा, आर्थिक विकास आणि राजकारण अशा चार क्षेत्रांमध्ये पारशी लोकांची नावे घेता येतील. या महान देशाने पारशी समाजावर एक हजार वर्षांपूर्वी त्यांना आश्रय देऊन जे उपकार केले त्याची परतफेड एकट्या जमशेटजी टाटाने केली आहे. पारशी समाज भारताशी संपूर्णपणे समरस झाल्याचे उदाहरण म्हणजे सर फिरोजशहा मेहता, दादाभाई नौरोजी. दादाभाई नौरोजी म्हणत, मी हिंदू, मुसलमान, पारशी, खिस्ती किंवा अन्य कोणत्याही धर्माचा असो, मी सर्वप्रथम भारतीय आहे. आमचा देश भारत, आमचे राष्ट्रीयत्व भारतीय. भारतातील या अत्यंत चिमुकल्या समाजाने भारताच्या समृद्धीतच समाधान मानले. स्वत:साठी विशेषधिकाराची किंवा राखीव जागांची कधीही मागणी केली नाही. गेल्या शंभर वर्षात पारशी समाजाने अनेक आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या व्यक्तींना जन्म दिला आहे. दादाभाई नौरोजी, जमशेटजी टाटा, फिरोजशहा मेहता, मंचरजी भावनगरी, शापूरजी सावतावाला, डॉ. होती भाभा, जुबीन मेहता अशी कितीतरी नावे घेता येतील. स्वतंत्र भारताची आता ५० वर्षे पूर्ण होत आहेत. या पन्नास वर्षांत आपण नेमके काय मिळवले? आताची आपल्या देशाची परिस्थिती पाहाता ही वर्षे ‘वाया गेली’ असेच म्हणायचे का? आशियाचा दीपस्तंभ होण्याची क्षमता असलेला भारत नैतिकतेच्या दृष्टीने प्रत्यक्षात कृष्णविवर झालेला आहे. एक राष्ट्र म्हणून भारताची प्रशासन यंत्रणा असेच याला स्वरूप येत असून असे घडणे निश्चितच धोकादायक ठरेल. धार्मिक विद्वेष आणि भाषिक नि प्रादेशिक दुराभिमान यांच्या वाढत्या आघातांमुळे आपण आपली राष्ट्रीय अस्मिता विसरत चाललो आहोत. त्यातच आता शहरी विरुद्ध ग्रामीण तसेच मागासलेले आणि पुढारलेले वर्ग या नव्या संघर्षाची भर पडत आहे, त्यामुळे फुटिरतेचे वर्तुळ पूर्ण झाले आहे, असे म्हणायला हरकत नाही. हे शतक संपण्याच्या आत भारताचे विघटन घडून येईल हे जीन रिक्सन हिचे खोडसाळ भविष्य खरे व्हावे, या दृष्टीने आपण आपल्या परीने हातभार लावीत आहोत. पान नं. १०३ वरील हे विचार प्रत्येक सुजाण भारतीयाला अंतर्मुख करतील असेच आहेत तरीही, समाजवादाची नशा ओसरल्यामुळे सुदैवाने भारत दीर्घ निद्रेतून हळुहळू जागा होत आहे, त्यामुळे लवकरच ती आंतरराष्ट्रीय पटावर आपले न्यायस्थान संपादन करील असा विश्वास वाटतो.’’ असे नानी पालखीवाला यांनी आपल्या भाषणात म्हटले आहे. आपल्या देशाला सध्या सर्वच क्षेत्रात उतरती कळा आल्याचे दिसून येते. निराशापूर्ण अशा परिस्थितीत वरील विचारांनी न कुरकुरता खडतर वाटचाल करीत असलेल्या कोट्यवधी सालस, अनाम, देशबांधवांना निदान जगण्याच्या प्रेरणा मिळतील आणि त्यांच्या जगण्यातील आशावाद टिकून राहील असे वाटते. कारण सिंगापूरचे पंतप्रधान ली कुआन यू यांनी भारताचे वर्णन ‘एक निद्रिस्त महाशक्ती’ असे केले आहे. ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

रुपाली सोनवणे

#रुक #जाना #नही लेखक: Dr. भावेश भाटिया शब्दांकन: Dr: सचिन पाचोरकर अनुवाद: सुप्रिया वकील ​अंथरून पाहून पाय पसरावे... अह्ह.. त्या निर्जीव अंथरुणासाठी आपल्या सजीव पावलांना का त्रास द्यावा? असेच एक जबरदस्त आत्मचरित्र वाचून संपवलं आणि एक ऊर्जा निर्माणकरून गेलं, पुस्तकाचं नाव आहे `रुक जाना नहीँ ​डॉ. भावेश भाटिया यांची ही प्रेरणादायी कहाणी. शाळेत असताना आलेलं अकाली अंधत्व आणि त्यानंतर खडखडीत खडतर जीवनाचा सुरू झालेला प्रवास, पण या प्रवासात खचलेल्या बालमनाला त्यांच्या आईने दिलेलं बळ, प्रेरणा व आत्मसन्मानाची शिकवण आणि स्वाभिमानाचे धडे लेखकास पुरे होते. हा प्रवास सोपा नक्कीच नव्हता. चांगल्या धडधाकट व्यक्तीवर संकट आल्यावर दूर दूर पळणारे नातलग, मित्र परिवार, जातभाई... दृष्टी गेलेल्या व्यक्तीस कितपत आधार देतील? पण एक ऑपरेटर ते एक उद्योजक, `सनराईज कॅण्डल`चा विस्तार आणि स्वतःबरोबर अनेक दृष्टिहीन व्यक्तींना स्वतःच्या पायावर उभं करून रोजगार देणारा हा अवलिया किती अडथळे पार करून आलाय हे जाणून घेण्यासाठी पुस्तक वाचायला हवंच. ​कुठलाही वशीला नाही की कोणाची सहानुभूती नाही, स्वबळावर विविध प्रयोग करत उद्योग यशस्वी करणं सोपं नाही. यात ज्या ज्या देवमाणसांनी हातभार लावला त्यांचा पण उल्लेख आहे, पण त्या देवमाणसांनी देखील कधीच उपकारिक भाषा न करता व स्वाभिमान न दुखावता कशी मदत करता येऊ शकते हे त्यांच्या कृतीतून दाखवून दिलंय. लेखक फक्त उद्योग उभारून थांबले नाहीत तर त्यांनी सामाजिक जाणीवेचं भान देखील ठेवलंय. महाबळेश्वरमध्ये सनराईज कॅण्डल नावाने त्यांनी भव्य असा उद्योग परिसर आणि म्युझियम सुरू केलंय, तेथे अनेक दृष्टिहीन व्यक्तींना रोजगार मिळाला आहे त्याचबरोबर सर्वजण स्वाभिमानाने कष्ट करून जगत आहेत. हजारो आयुष्य त्यांनी उजळून टाकली आहेत. दोन वेळा राष्ट्रपती पुरस्कार सह एकून 46 पुरस्कारांचे ते मानकरी आहेत.विशेष म्हणजे सर्व पुरस्कार त्यांच्या योग्यतेनुसार दिले आहेत.. आणी अशा हजारो पुरस्कारांचे ते मानकरी आहेत असंच वाटत..त्यांच्या कामाची दखल रिलायन्स ग्रुप ने देखील घेतली आहे.व त्यांच्या पुस्तकास प्रस्तावना देखील नीता अंबानी यांनी दिली आहे.उद्योग करताना छोट्या छोट्या गोष्टी कसा प्रभाव करतात याच वर्णन देखील त्यांनी लिहिल आहे.. ​या कार्यात महत्त्वाचं योगदान त्यांच्या धर्मपत्नी नीता भाटिया यांनी दिलं आहे. दूरदृष्टी ठेवून आपल्या पतीस प्रोत्साहन देऊन, नवीन कल्पनेसह पाठिंबा देऊन त्यांना हुरूप देण्याचं काम त्यांनी केलंय. नीता भाटिया यांचं कर्तृत्व, त्यांचं पवित्र निस्वार्थी प्रेम या पुस्तकातून वाचताना आंतरिक वेगळी ऊर्जा मिळते. कलियुगातील देवी हा शब्द व मान त्यांना समर्पक वाटतो. पुस्तक सर्व वयोगटातील वाचक वाचू शकतात. मनाने खचलेल्या पण शरीराने धडधाकट असलेल्या प्रत्येक व्यक्तीने वरील पुस्तक नक्की वाचावं आणि आत्मसात करावं. एवढ्या उंचीवर असूनही जमिनीवर पाय असलेल व्यक्तिमत्व आहे. अगदी प्रेमळ पणे वागण बोलण सन्मान देण..ही दैवी देणगी त्यांच्या जवळ आहे. ...Read more

RAZOR SHARP
RAZOR SHARP by ASHWIN SANGHI Rating Star
सुनील माने, पुणे

लेखक अश्विन सांघी “द रोझाबल लाइन” या पहिल्याच कादंबरीने खूप लोकप्रिय झाला. प्राचीन भारतीय दंतकथा/ऐतिहासिक संदर्भ घेऊन त्याच्याभोवती आजच्या काळात रहस्यपूर्ण कथा लिहिणारा अश्विन. Chanakya’s Chant, The Krishna Key, The Sialkot Saga, Keepers of the Kalacakra, The Vault of Vishnu, The Magicians of Mazda अशा एकापेक्षा एक सुंदर रहस्य कादंबर्या “भारत सिरीज़” नावाने खूप प्रसिद्ध झाल्या. या सर्व कादंबऱ्या मी इंग्लिश मधेच वाचल्या. यांचा मराठी अनुवाद मेहता पब्लिशिंग हाउस यांच्याकडे उपलब्ध आहे. अश्विन सांघीने या भारत सिरीज शिवाय एक नवीन थ्रिल्लर सिरीज (कुत्ता कदम) सुरू केली आहे. त्यांतील पहिली कादंबरी Razor Sharp. एक सिरियल किलर मुंबईत एकानंतर एक खून पाडतोय. पोलिस चक्रावले आहेत. 1. रविवार दि २ फेब्रुवारी , गोरेगाव पश्चिममधे रवि मेहराचा खून होतो. त्याची बायको खुशी कॅाल सेंटरचा जॅाब करून रात्री ११.३० ला परत येते. खूप वेळा बेल वाजवून दार न उघडल्यामुळे ती उघडून आत येते तर रवि रक्ताच्या थारोळ्यात मरून पडलेला असतो. त्याचे हात पाठीमागे नायलॅान दोरीने बांधलेले असतात. त्याच्या छातीत सुरा खुपसलेला असतो. त्याच्या तोंडात काहीतरी खाद्य पदार्थ असतो. 2. सोमवार दि १० फेब्रुवारी , लोअर परळमधे सुचंद्रा अग्रवालचा खून. तिची कामवाली आल्यावर दार न उघडल्यामुळे सोसायटीवाले दार तोडतात. आत सुचंद्राचा खून झालेला. हात नायलॅान दोरीने मागे बांधलेले, छातीमधे चाकू खुपसलेला, तोंडात काहीतरी खाद्यपदार्थ. पोलिस चक्रावलेले. मग पोलिसखाते जागे होते. त्यांचा नावाजलेला अधिकारी जो सस्पेंड झालेला आहे, त्या प्रकाश कदम, DCP याला बोलावले जाते. राज्याचे गृहमंत्री ओंकार लोखंडे, त्यांचा माणूस कमिशनर चव्हाण आणि उपगृहमंत्री जयंत गायकवाड व त्यांचा माणूस SCP राणे, मुंबईचा डॅान भाऊ पाटील जो लोखंडेचाच माणूस असतो, हे सर्व या केसच्या मागावर लागतात. कदम हा राणेंच्या ओळखीचा खास ऑफिसर असतो म्हणून त्यालाही इन्व्हेस्टीगेशनला बोलावले जाते. 3. मंगळवार दि १८ फेब्रुवारी , ठाणे येथे मंगला शहाचा खून. तिच्या शेजारणीमुळे हे कळते. मंगलाचे हात नायलॅान दोरीने पाठीमागे बांधलेले, छातीमधे चाकू खुपसलेला, तोंडात खाद्यपदार्थ. पोलिस अधिकारी शिंदे कदमबरोबर येतात. मंगलाच्या चेहऱ्याजवळ कदमला पेस्टिसाईडचा वास येतो. चेहरा निळसर झालेला. खून झाल्यावर बॅाडीला हलवलेले दिसते. तो ऑफिसमध्ये जुन्या खूनांचे फोटो तपासतो. त्यांचीही बॅाडी खून केल्यावर हलवलेली दिसते. चेहऱ्यावर निळसर झाक दिसते. तिन्ही खून “फिनेक” ब्रॅंडच्या चाकूने केलेले असतात. हे समान धागे कदम त्याची मुलगी केतुल बरोबर चर्चा करतो. केतुलची आई काही वर्षांपूर्वी कदमला सोडून गेलेली असते. ती भाऊ पाटीलची सावत्र बहीण असते. पण सध्या ती कुठे आहे व काय करते हे माहित नसते. केतुल कोर्टात काम करत असते तसेच ती “शक्ती” या NGO मधेही काम करते. शक्ती हे सोनापूरमधुन सुटका केलेल्या वेश्यांचे पुनर्वसन करत असते. निर्मल नावाचा तिचा मित्र एथिकल हॅकर असतो. तिच्यावर प्रेम करत असतो. कदमला हार्ट अटॅक येऊन गेलेला व स्टेंट बसवलेला असतो. Depression मुळे त्याची सायकॅालॅाजिस्टकडे ट्रिटमेंट चालू असते. कदमला या तिन्ही केसमधे आणखी एक धागा सापडतो. हे खून आठ दिवसांच्या अंतरावर झालेले असतात. म्हणजे पुढचा खून बुधवारी होणार असल्याचे तो राणे व शिंदेला सांगतो. 4. बुधवार दि २६ फेब्रुवारी, कांदिवली पश्चिम, लक्ष्मी बुधीराजाचा खून. तोच पॅटर्न. 5. गुरुवार दि ५ मार्च, खार पश्चिम, गुरुराज अदवानीचा खून सेम पॅटर्न. गुरूराज हा युट्युबवरचा प्रसिद्ध सिंगर असतो. 6. शुक्रवार दि १३ मार्च, ताडदेव, दिव्या शुक्रपाणीवर खूनी हल्ला होतो. पण ती जबर जखमी होते. ती फिटनेस ट्रेनर असल्यामुळे खुन्याबरोबर झटापट करते. पण चाकू पोटात घुसल्यामुळे ती जबर जखमी होते. हात बांधलेले असतानाही ती फोनवर “सिरी” ला तिच्या भावाला, ध्रुवला फोन लावायला सांगते. फोन लागतो व ती “हेल्प हेल्प” एव्हढेच बोलून बेशुद्ध होते. म्हणून खुनी पळून जातो. ध्रुव तिथे पोहोचून तिला हॅास्पिटलमधे ॲडमिट करतो. पोलिसांना तिथे खुन्याची बॅग सापडते. त्यांत नायलॅानची दोरी, बेगॅान स्प्रे व राजमाच्या बिया सापडतात. तिसऱ्या खुनाआधी पोलिस संशयित म्हणून राजू दाभाडेला अटक करतात. पण चौथ्या खूनाच्या वेळेस तो कस्टडीतच असतो. मग खूनी कोण? 7. शनिवार दि २१ मार्च, बान्द्रा पश्चिम, शनिया डिसौजाचा खून होतो. सेम मोडस ऑपरेंडी . 8. शनिवार दि २८ मार्च, चेंबूर, ७१ वर्षांच्या राहुल सिंह नावाच्या सिख व्यक्तिचा खून होतो. तीच पध्दत. यानंतर एक दिवस कदम KBC बघत असताना अमिताभ बच्चन एका सिनेमाचं गाणं लावून त्याचा पिक्चर ओळखायला सांगतात. ते गाणं असते- “सोमवार को हम मिले मंगलवार को नयन बुध को मेरी निंद खुली जुम्मेरात को चैन अरे शुक्र शनी कटे मुश्किलसे आज है इतवार सात दिनों में हो गया जैसे सात जनम का प्यार” आणि कदमच्या डोक्यात एकदम प्रकाश पडतो… अरे, हे सर्व खून असेच रविवार ते शनिवार एक एका वारी घडलेत! पण शनिवारी दोन खून कसे? याच्या मागे काही खगोलशास्त्र किंवा भविष्याचा तर संबंध नाही? कदमला आठवतं की शेजारी राहणारा डॉ. देसाईला पण भविष्य-खगोलशास्त्राची आवड व माहिती आहे. ( डॅाक्टर कडे सापडलेल्या नायलॅानचे रंगीत दोर व फिनेक कंपनीचा चाकू यामुळे एक संशयित म्हणून कदमने त्याला अटक करून पुछताछ केलेली असते) कदम लगेच डॅाक्टरांकडे जातो. त्यांची माफी मागून त्यांना या प्रश्नांत मदत करायला सांगतो. तो या सर्व खुनांचा सिक्वेन्स सांगतो. ते प्रत्येक वारी का घडले? मग शनिवारी दोन का? यापुढे कोणता वार? कुणाचा खून? डॅाक्टर सांगतात की भारतीय भविष्य व खगोल शास्त्रात नवग्रहांना खूप महत्व आहे. रवि, सोम(चंद्र), मंगळ, बुध, गुरू, शुक्र, शनि, राहू आणि केतु. यांचे रंग व धान्य वेगवेगळे असतात. त्या त्या ग्रहाला प्रसन्न करण्यासाठी ते वापरले जातात. कदम ही माहिती लिहून घेतो. त्यावरून प्रत्येक खुनात वापरण्यात आलेले फिनेक कंपनीचे चाकू, वेगवेगळ्या रंगांचे नायलॅान दोर व तोंडातील पदार्थ यांचा संबंध जोडून एक तख्ता तयार करतोः- “रवि मेहरा-रविवार-सोनेरी दोर- तोंडात गहू-दिशा पूर्व सुचंद्रा-सोमवार-चंदेरी दोर-तोंडात तांदूळ-दिशा पश्चिम मंगला शाह-मंगळवार-लाल दोर-तोंडात तूर डाळ- दिशा दक्षिण लक्ष्मी बुधीराजा-बुधवार-हिरवा दोर-तोंडात हिरवे मूग-दिशा उत्तर गुरुराज अदवानी-गुरूवार-पिवळा दोर-तोंडात हरबरा डाळ-दिशा उत्तर पूर्व(ईशान्य) दिव्या शुक्रपाणी-शुक्रवार-पांढरा दोर-राजमा-दिशा दक्षिण पूर्व शनिया डिसौजा-शनिवार-काळा दोर-तोंडात काळे तिळ-दिशा उत्तर पश्चिम राहुल सिंग-शनिवार-निळा दोर-तोंडात उडीद दाळ-दिशा दक्षिण पश्चिम” आता उरला एकच ग्रह-केतु. केतुचा वार मंगळवार. ग्रे रंग, चना दाळ, दिशा दक्षिण पश्चिम. “केतु”म्हणजे कदमची मुलगी केतुलचा नंबर लागणार? आज तर मंगळवारच आहे! कदम घाबरून जातो! तो केतुलला फोन करतो पण तो बंद लागतो. ती सध्या कुठे आहे? कोर्टात? कदम आपल्या मुलीला वाचवतो का? खरा खुनी कोण असतो? तो पकडला जातो का? त्याचे यामागचा उद्देश काय असतो? याच्यामध्ये अजून कोण सामिल असतं का? याची उत्तरे मिळण्यासाठी वाचावी लागेल अश्विन सांघी यांची कादंबरी Razor Sharp. ...Read more