* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: WE, THE NATION
  • Availability : Available
  • Translators : V.S.WALIMBE
  • ISBN : 9788177667165
  • Edition : 6
  • Publishing Year : MAY 1995
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 320
  • Language : Translated From ENGLISH to MARATHI
  • Category : POLITICS & GOVERNMENT
  • Available in Combos :V. S. WALIMBE COMBO SET- 4 BOOKS
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
A BOOK FOR ALL PERSONS AND ALL SEASONS INDEED. EACH TOPIC IS ILLUMINATED WITH SENSITIVITY AND SUNLIGHT-CLEAR EXPOSITION. PUBLIC MEMORIES ARE IRRESPONSIBLY SHORT AND SELECTIVE, AND THIS BOOK, SPANNING AS IT DOES THE PANORAMA OF THE LAST TEN TUMULTUOUS YEARS, BECOMES ESSENTIAL READING - THE HISTORY THAT MUST BE1 READ SO THAT WE ARE NOT CONDEMNED TO REPEATING IT. INDIA, THE SLEEPING GIANT OF AN ECONOMY IN THE WORDS OF LEE KUAN YEW IS, AT LAST, SLOWLY STIRRING FROM ITS LONG NIGHT OF SLUMBER, DRUGGED AS IT HAS BEEN FOR DECADES WITH THE OPIATE OF SOCIALISM. THIS AMAZING SUBCONTINENT WITH ITS MOSAIC OF COLOURS, CULTURES, CONTRASTS AND MADDENING CONTRADICTIONS, ALWAYS HAS, THANKS TO VAST QUANTITIES OF ITS OWN INDIGENOUSLY MANUFACTURED RED TAPE AND VENAL POLITICIANS, BEEN HELD IN THRALL FOR SO LONG. IT IS ONLY NOW, AND THAT TOO HESITANTLY, THAT INDIA IS MOVING TO TAKE ITS RIGHTFUL PLACE IN THE COMMUNITY OF NATIONS OF THE WORLD. WHAT AILS INDIA, WHAT ITS POTENTIAL IS, HOW MAGNIFICENT ITS HERITAGE IS, HOW RICHLY ENDOWED IT IS BY BOTH HISTORY AND NATURE, ARE ALL HIGHLIGHTED IN THIS BOOK.
`निद्रिस्त महाशक्ती’ असे ली कुआन यू यांनी भारताचे वर्णन केले होते. समाजवादाची नशा ओसरल्यामूळे, सुदैवाने भारत दीर्घ निद्रेतून हळूहळू जागा होत आहे. त्यामूळे लवकरच तो आंतरराष्ट्रीय पटावर आपले न्याय्य स्थान संपादन करील,असा विश्वास वाटतो. भारताचे दुखणे काय आहे, त्याच्यापाशी केवढी उदंड क्षमता आहे, त्याला केवढा वैभवशाली वारसा लाभलेला आहे, इतिहास आणि निसर्ग या दोन्ही बाबतींत तो किती समृध्द आहे, याचे अत्यंत मार्मिक विवेचन या पुस्तकात करण्यात आलेले आहे. भारताच्या उदात्त राज्यघटनेपासून, या देशाला वेळोवेळी भेडसावत गेलेल्या माननिर्मित समस्यांपर्यंत अनेक विषयांचा वेध लेखकाने आपल्या अजोड बुध्दिमत्तेच्या बळावर अचूक रीतीने घेतला आहे. पालखीवाला यांनी केवळ समस्यांचेच सूचन केले आहे. असे नाही; आपल्या वैशिष्ट्यपूर्ण व्यासंगाच्या आणि विविध क्षेत्रांतील सखोल अनुभवाच्या आधारे त्यांच्या सोडवणुकीची दिशाही सांगितली आहे. जो देश इतिहास विसरतो, त्याच्या नशिबी त्या इतिहासाची पुनरावरावृत्ती अनुभवण्याची वेळ येते, असे सर्वच विचारवंत मानतात. त्या दृष्टीनेच पालखीवाला यांनी गेल्या सहा वर्षांच्या वाटचालीसंबंधी या ग्रंथात मागोवा घेतला आहे. थोडक्यात सांगायचे, तर सर्व व्यक्तींना सर्व प्रसंगी उपयुक्त ठरते, असे हे पुस्तक आहे.

No Records Found
No Records Found
Keywords
#NANI PALKHIWALA #V.S.SVALIMBE#WARSAWTEHIROSHIMA #WETHEPEOPLE #WETHENATION
Customer Reviews
  • Rating StarNEWSPAPER REVIEW

    ‘वुई दि नेशन’ हे पुस्तक प्रकाशित केल्याबद्दल प्रकाशक श्री. अनिल मेहता यांना धन्यवाद. कारण एक इंग्लिशमधील एक महत्त्वपूर्ण पुस्तक त्यांनी मराठीत आणले. पुस्तक वाचताना ते अनुवादित आहे असे कुठल्याही पानावर जाणवत नाही. इतक्या अर्थपूर्ण सामर्थ्यवान आणि ओघवतया भाषाशैलीमध्ये त्यांनी लिहिले आहे, अनुवाद ही सुद्धा एक ‘स्वतंत्र कलाकृती’ असते हेच या पुस्तकावरून जाणवते. केंद्रबिंदू अनाम देशबांधव भारतातील एक प्रसिद्ध विचारवंत श्री. नानी पालखीवाला यांचे ‘वुई दि नेशन’ हे पुस्तक म्हणजे शैक्षणिक, राजकीय, धार्मिक, आर्थिक, जातीयता, कायदा, संस्कृती, वृत्तपत्र या महत्त्वपूर्ण विषयांवरील चिंतन आणि मार्गदर्शन याचा एक वस्तुपाठच म्हणता येईल. श्री. पालखीवाला यांनी हे पुस्तक न कुरकुरता खडतर वाटचाल करीत असलेल्या कोट्यवधी सालम अनाम देशबांधवांना अर्पण केले आहे. या अर्पण पत्रिकेवरूनच लक्षात येते की, वर नमूद केलेल्या विषयांच्या मूलभूत संदर्भ किंवा केंद्रबिंदू हा देशातील अनाम देशबांधव - सामान्य माणूस आहे आणि असे असूनही हा अनाम बांधवच सदोदित उपेक्षित राहिला आहे. दुर्लक्षित राहिला आहे, हीच आपल्या देशाची शोकांतिका होय. या अनाम देशबांधवांची योग्य ती दखल राज्यकर्त्यांनी घेतली असती तर आपला देश जगातील एक समृद्ध आणि बलाढ्य देश झाला असता असेही श्री. पालखीवाला सांगतात. चुकीचा समाजवाद भारताचे दुखणे नेमके काय आहे याचा शोध पालखीवाला यांनी घेतला आहे. ते म्हणतात, ‘‘भारतातील चुकीचा समाजवाद हे त्यातील पहिले आणि मुलभूत दुखणे आहे. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर नेहरूंची काँग्रेस अधिकारावर आली आणि तेव्हापासून अधिकारावर आलेल्या सर्व सरकारांशी राष्ट्रावर विवेकशून्य आणि अनुकरणात्मक समाजवाद लादला, त्यामुळे उद्यमशिलतेला आणि उपक्रमशिलतेला वावच उरला नाही. वास्तविक सामाजिक न्याय हाच समाजवादाचा खरा आशय. त्याऐवजी रशियन-कम्युनिकेशनच्या अनुकरणातून लादलेली सरकारी नियंत्रणे आणि सरकारी मालकी म्हणजे समाजवाद असे राज्यकत्र्यांनी गृहीत धरले. वास्तविक भारतात आचरणात आणला जाणारा समाजवाद म्हणजे एक प्रचंड ढोंग आहे. अशा परखड शब्दांमध्ये पालखीवाला यांनी भारतीय समाजवादावर कडाडून टीका केली आहे.’’ फुटिरता हा दुसरा प्रश्न फुटिरता हा भारतातील आणखी एक महत्त्वाचा प्रश्न आहे. देशाच्या एकतेवर आणि अखंडतेवर जातीय विद्वेष, भाषिक दुराभिमान आणि प्रादेशिक निष्ठा प्रहार करीत असतात. जात किंवा वंश संप्रदाय किंवा भाषा यापैंकी कशाचाही आधार दहशतवाद्यांना आणि सराईत गुंडांना पुरेसा वाटतो. क्षुल्लक कारणावरून माणसे मारायला या गुंडांना जराही संकोच वाटत नाही. भारतीय प्रजासत्ताकाच्या इतिहासात पूर्वी कधीही पाहायला मिळाले नाही एवढे सध्या हिंसाचाराने थैमान घातले आहे. भारताच्या अशा अनेक समस्या असल्या तरी त्यावर उपाय करणे अशक्य आहे असे नाही. त्याबद्दल काय करणे शक्य नाही. त्याबद्दल काय करणे शक्य आहे याची चर्चा पालखीवाला यांनी आपल्या भाषणातून केली आहे. यासाठी भारताला त्याच्या उदंड, प्रचंड क्षमतेचा उपयोग करून द्यावा लागेल. भारताला पाच हजार वर्षाची सांस्कृतिक परंपरा लाभली आहे. सर्वकष, उदात्त अशी राज्यघटना आपल्याला लाभली आहे, अत्यंत सर्जनशील उपक्रमशीलता, अत्यंत गतिमान व्यापारी नेतृत्व आणि अर्थकारणाचे जाणकार तज्ज्ञ भारतात अनेक आहेत. दुर्मिळ अशी फार मोठी मानवी क्षमता आहे. एवढी विलक्षण निर्मिती शक्ती, क्षमता असताना आमचा देश मागे का पडला? मागे वळून पाहिले तर स्वातंत्र्यानंतरची महत्त्वाची २० वर्षे भारताने वाया घालविली असे म्हणावेसे वाटते. नानी पालखीवाला यांनी आपल्या भाषणातून गेल्या काही वर्षातील देशातील महत्त्वाच्या घटनांवरही चर्चा केली आहे. अयोध्या प्रश्नाविषयी ते म्हणतात, सध्याच्या कालखंडाची अयोध्याकांड म्हणून इतिहासात नोंद होईल. संघर्ष आणि समन्वय यापैकी एकाची आपल्याला निवड करावयाची आहे. भिन्न धर्मियांमध्ये सौहार्द आणि सहिष्णुता नांदावी यासाठी भारताचा आत्मा तळमळत आहे. जेथे कोठे चांगले दिसेल त्याचा स्वीकार करून ते आत्मसात करून भारतीय संस्कृती गेल्या पाच हजार वर्षांमध्ये अधिक प्रगल्भ आणि समृद्ध झाली आहे. या सर्वसमावेशक वृत्तीमुळे भारतीय संस्कृतीला वेगळेच सौंदर्य प्राप्त झाले आहे. नानी पालखीवाला यांच्या करप्रणाली आणि केंद्रीय अर्थसंकल्पावरील अभ्यासपूर्ण भाषणांचाही समावेश प्रस्तुत पुस्तकात आहे. त्यामध्ये त्यांनी भ्रष्टाचाराचा उगम आणि उपाययोजना यांचाही परामर्श घेतला आहे. भारतातील महत्त्वपूर्ण घटनात्मक प्रश्नांमध्ये त्यांनी मंडल आयोगाविषयी आपले विचार मांडले आहेत. मंडल आयोगातील पाच त्रुटी त्यांनी सांगितल्या आहेत. मान्यवरांवर लेख ‘वुई दि नेशन’ या पुस्तकाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे अनेक मान्यवर व्यक्तींच्या शैक्षणिक, सांस्कृतिक, राजकीय, सामाजिक कारकीर्दी विषयाचे लेख समाविष्ट केले आहेत. त्यामध्ये आदर्श राज्यपाल सी. सुब्रमण्यम्, आदी शंकराचार्य, दादाभाई नौरोजी, सरदार वल्लभभाई पटेल, सर आशुतोष मुखर्जी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, सुमंत मुळगावकर, एम, पी. बिर्ला, नौरोजी गोदरेज, रामनाथ गोएंका यासारख्या असामान्य व्यक्तीच्या कर्तृत्वाचा मार्मिकतेने आढावा घेतला आहे. पारशी समाजाचे योगदान भारतातील पारशी समाजातील लोकांबद्दल आकाशवाणीवर केलेल्या भाषणात पालखीवालांनी म्हटले, ‘‘भारतातील पारशी लोकांनी देशाच्या जीवनात निर्वासित म्हणून पारशी भारतात आले. सध्या ९४³ पारशी शहरात राहतात. शिक्षण, सामाजिक सुधारणा, आर्थिक विकास आणि राजकारण अशा चार क्षेत्रांमध्ये पारशी लोकांची नावे घेता येतील. या महान देशाने पारशी समाजावर एक हजार वर्षांपूर्वी त्यांना आश्रय देऊन जे उपकार केले त्याची परतफेड एकट्या जमशेटजी टाटाने केली आहे. पारशी समाज भारताशी संपूर्णपणे समरस झाल्याचे उदाहरण म्हणजे सर फिरोजशहा मेहता, दादाभाई नौरोजी. दादाभाई नौरोजी म्हणत, मी हिंदू, मुसलमान, पारशी, खिस्ती किंवा अन्य कोणत्याही धर्माचा असो, मी सर्वप्रथम भारतीय आहे. आमचा देश भारत, आमचे राष्ट्रीयत्व भारतीय. भारतातील या अत्यंत चिमुकल्या समाजाने भारताच्या समृद्धीतच समाधान मानले. स्वत:साठी विशेषधिकाराची किंवा राखीव जागांची कधीही मागणी केली नाही. गेल्या शंभर वर्षात पारशी समाजाने अनेक आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या व्यक्तींना जन्म दिला आहे. दादाभाई नौरोजी, जमशेटजी टाटा, फिरोजशहा मेहता, मंचरजी भावनगरी, शापूरजी सावतावाला, डॉ. होती भाभा, जुबीन मेहता अशी कितीतरी नावे घेता येतील. स्वतंत्र भारताची आता ५० वर्षे पूर्ण होत आहेत. या पन्नास वर्षांत आपण नेमके काय मिळवले? आताची आपल्या देशाची परिस्थिती पाहाता ही वर्षे ‘वाया गेली’ असेच म्हणायचे का? आशियाचा दीपस्तंभ होण्याची क्षमता असलेला भारत नैतिकतेच्या दृष्टीने प्रत्यक्षात कृष्णविवर झालेला आहे. एक राष्ट्र म्हणून भारताची प्रशासन यंत्रणा असेच याला स्वरूप येत असून असे घडणे निश्चितच धोकादायक ठरेल. धार्मिक विद्वेष आणि भाषिक नि प्रादेशिक दुराभिमान यांच्या वाढत्या आघातांमुळे आपण आपली राष्ट्रीय अस्मिता विसरत चाललो आहोत. त्यातच आता शहरी विरुद्ध ग्रामीण तसेच मागासलेले आणि पुढारलेले वर्ग या नव्या संघर्षाची भर पडत आहे, त्यामुळे फुटिरतेचे वर्तुळ पूर्ण झाले आहे, असे म्हणायला हरकत नाही. हे शतक संपण्याच्या आत भारताचे विघटन घडून येईल हे जीन रिक्सन हिचे खोडसाळ भविष्य खरे व्हावे, या दृष्टीने आपण आपल्या परीने हातभार लावीत आहोत. पान नं. १०३ वरील हे विचार प्रत्येक सुजाण भारतीयाला अंतर्मुख करतील असेच आहेत तरीही, समाजवादाची नशा ओसरल्यामुळे सुदैवाने भारत दीर्घ निद्रेतून हळुहळू जागा होत आहे, त्यामुळे लवकरच ती आंतरराष्ट्रीय पटावर आपले न्यायस्थान संपादन करील असा विश्वास वाटतो.’’ असे नानी पालखीवाला यांनी आपल्या भाषणात म्हटले आहे. आपल्या देशाला सध्या सर्वच क्षेत्रात उतरती कळा आल्याचे दिसून येते. निराशापूर्ण अशा परिस्थितीत वरील विचारांनी न कुरकुरता खडतर वाटचाल करीत असलेल्या कोट्यवधी सालस, अनाम, देशबांधवांना निदान जगण्याच्या प्रेरणा मिळतील आणि त्यांच्या जगण्यातील आशावाद टिकून राहील असे वाटते. कारण सिंगापूरचे पंतप्रधान ली कुआन यू यांनी भारताचे वर्णन ‘एक निद्रिस्त महाशक्ती’ असे केले आहे. ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

HATUMUTUCHA CHANDRA
HATUMUTUCHA CHANDRA by FARUK KAZI Rating Star
परेश जयश्री मनोहर

मराठी बालसाहित्याचा गेल्या काही दशकांचा अवकाश हा सातत्याने प्रबोधनपर, उद्बोधनपर आणि कोणत्याही कथेच्या शेवटी एका वाक्यात तात्पर्य सांगणाऱ्या बाळबोधकथांचा राहिलेला आहे. या बाल साहित्यामध्ये प्रामुख्याने येणारे पात्र ही मध्यमवर्गीय, उच्च जातीय मराठी घरतील मुलं मुली असतात आणि जेव्हा केव्हा वंचित समाजातील, शोषित समाजातील, गरीब ग्रामीण घरातील मुलांचे चित्रण येतं तेव्हा ते अति दुःखी आणि बिचारे, ज्यांना मदतीची गरज आहे आणि अशी मदत करण्याची जबाबदारी मोठ्या घरातील उच्चवर्णीय, उच्चवर्गीय नायक मुला मुलींची असते. त्यातूनही प्रामुख्याने काय करावे काय करू नये किंवा तत्सम उपदेशच प्रामुख्याने कथेच्या शेवटी केलेले दिसतात. आणि हा लेखक वर्ग ही प्रामुख्याने पुणे मुंबई भागात स्थिरावलेला राहणारा तिथल्या अनुभूती आणि तिथल्या जगण्याचा अवकाश सोबत घेऊन येणारा असतो. अशा सगळ्या पार्श्वभूमीवरती सोलापूर जिल्ह्यातल्या सांगोला तालुक्यात अनकढाळ सारख्या एका छोट्या गावात राहणारा फारुक काझी हा लेखक जेव्हा गेलं दशकभर कवितांमधून, कथांमधून बालविश्व चितारण्याचा प्रयत्न करतो तेव्हा ते जास्त करून ग्रामीण भागातील मातीशी जोडलेलं असतं. आपल्या भोवतालच्या खऱ्याखुऱ्या मुलांमुलींच्या भावविश्वाच्या जवळ जाणारं चित्रण त्याच्या कथांमधून आपण सातत्याने बघत असतो. त्याचे "शिकण्याच्या वाटेवरील आनंदवन" हे पहिले पुस्तक एका प्रयोगशील शिक्षकाच्या शाळेतील अनुभवांवर आधारलेले आहे. त्यांचे आजवर मित्र, प्रिय अब्बू, चुटकीचे जग हे कथासंग्रह प्रकाशित झालेले आहेत. या सगळ्याच पुस्तकातून त्याने सातत्याने ग्रामीण, निमशहरी भागातील कनिष्ठ मध्यमवर्गीय आणि गरीब कुटुंबातील बहुजन आणि वंचित घटकातील, मुस्लिम कुटुंबातील मुलांच्या नजरेने दिसणाऱ्या गोष्टी टिपण्याचा प्रयत्न केलेला आहे. यात कुठेही गरिबीचे गोडवे नाहीत की काठोकाठ पसरलेलं बिचारेपण नाही. तर या आर्थिक दृष्ट्या नागवलेल्या लोकांच्या घरातील मुलांच्या कथा आहेत, ज्यात प्रेम, उत्सुकता, जिद्द, समजून घेणे आणि अनुभवातून आलेलं शहाणपण हे प्रामुख्याने जाणवते. अभावग्रस्तता, एखाद्या गोष्टीचे नसणे, तरीही नातेसंबंधांवरील विश्वास, प्रेम आणि एकमेकांबद्दलचा आदर, काळजी घेऊन जपणारी कुटुंबं फारुकच्या लिखाणात सातत्याने येत राहतात. त्याचा आत्ता आलेला हाटूमुटूचा चंद्र हा एक अफलातून कथासंग्रह आहे. यामध्ये फारुकने वेगवेगळे प्रयोग केलेले आहेत जे त्याच्या नेहेमीच्या लेखन शैलीपेक्षा जरा वेगळ्या अंगाने जाणारे आहेत आणि ते उत्तम जमून आलेले आहेत. या दहा कथांमधल्या पहिल्या तीन कथा या मुलांच्या नजरेतून होणारा पर्यावरण विनाश, निसर्गाची भाषा समजून घेण्याचा मुलांचा प्रयत्न आणि नुसते समजून घेणे नाही तर मुलानी आपले हे जग आपण नीट ठेवण्यासाठी केलेले प्रयत्न असे ही आहे. यात आनंद शोधण्याचे मार्ग, जबाबदारीचे असणारे भान आणि काल्पनिक ग्रहाची भेट करवून आणणारी समायरा आपल्याला भेटते, तर मोकळ्या हवेत असणारा आनंद भरुन कसा घेणार असा प्रश्न विचारणारा अर्पित ही भेटतो आणि तसेच टेकडी स्वच्छ करण्यासाठी न थकता प्रयत्न करणारे ओजस आणि रेहान ही भेटतात. लहानपणी न कळत्या वयात चिंचेवरच्या माकडाला तोटा फेकून मारणारा आणि त्या माराची मनावर झालेली जखम मोठा झाल्यावरही मनावर कोरलेला योगेश, आपल्या लाडक्या लहानग्या मैत्रिणीसाठी व्याकुळ होऊन रोज दारावर धडका देणारे शाहताब अस्वल आपल्याला अस्वस्थ करुन जातात. एका कथेत तर चक्क सायकल ही कथेची नायिका आहे आणि तिच्या सुखाच्या आणि नाराज होण्याच्या अनुभवातून आपणही तिच्यासोबत प्रवास करतो. इथे आपण बाबांच्या अपघाताने अस्वस्थ असणाऱ्या सारंगा सोबत त्या दवाखान्याच्या बाहेर येरझारा घालत असतो आणि अमृताच्या मैतरासोबत मेंढक्या बनून रानावनात चालत असतो. गावात फिरताना, गावाला पडणारं हिरवं स्वप्न अनुभवणारा मंदार आपल्या भेटतो आणि सोबतच गावात राहणारी आणि तुमच्या शहरालाही स्वप्न पडतच असेल की रे? काय असेल ते स्वप्नं? असा प्रश्न विचारणारी चंदा हाच प्रश्न आपल्यालाही विचारते असा भास आपल्याला होतोच होती. शाळेच्या ट्रीपला जायला हजार रुपये नाहीत म्हणून रुसलेल्या साक्षीला बघताना आपणही आपल्या लहानपणी अशा बुडालेल्या शाळेच्या सहली, आणि त्यावेळी आपल्या आईबाबांनी आपल्याला काय सांगितलं होतं आणि कशी आपली समजूत काढलेली हे आठवून आपलेही डोळे ओलसर होताना अनुभवतो. पण याही कथेत निंबोणीच्या पानांमधून दिसणारा, भासणारा तो चंद्र जो हाटूमुटूचा आहे पण त्याला बघून होणारा आनंद मात्र अस्सल आणि खराखुरा आहे. या सगळ्या कथांमधून फारुक ने आजच्या मुलामुलींना आपल्यासमोर उभं केलं आहे, त्यांचे प्रश्न, त्यांच्या विचार करण्याच्या पद्धती आणि त्याचं अस्वस्थ असणं अगदी नेमकेपणाने आपल्यासमोर येतं. ही मुलं कोणत्याही एका शहरातली, एका भागातली किंवा एकसारख्या घरातली नाहीत पण त्यांचे जगणे हे आजच्या मुलांचे जगणे आहे. फक्त एक प्रश्न मनाला पडतो की आपल्या भोवतालच्या प्रश्नांनी, आपल्या गरिबीने किंवा अभावाने काळवंडलेली मुलं जेव्हा समजूतदारपणे स्वतः शहाणे बनत पुढे निघतात तेव्हा, ही सगळं कोणामुळे, आणि माझ्याच वाट्याला का? याचे जबाबदार कोण असा एखादा प्रश्न एकाही मुलाला पडू नये याची काळजी वाटते. येत्या काळात फारुक च्या कथांतील ही मुलं तुम्हाला मला हे प्रश्न विचारतील याची खात्री आहे आणि मी त्या दिवसाची वाट ही बघतो आहेच. या पुस्तकातील चित्रांचा विशेष उल्लेख करणे फारच महत्वाचे आहे. चंद्रमोहन कुलकर्णी ज्या ताकदीने कथेची भावना नेमक्या कुंचल्यात पकडतात ते बघताना आपण निव्वळ थक्क होतो. इतकी सुंदर आणि मनाला धरुन ठेवणारी चित्रं या पाना आपल्याला भेटत राहतात. इतक्या ताकदींच्या कथांचे पुस्तक मेहता प्रकाशनाने अत्यंत प्रेमाने आणि उत्तम निर्मितीमूल्य जपत काढलेले आहे. आज आपला भोवताल इतका जातधर्म, पर्यावरणीय नाश आणि भविष्याच्या चिंतांनी कुरतडलेला असताना अशा खऱ्याखुऱ्या मुलांच्या कथा आपल्यासमोर येणं हाच आपल्याला दिलासा देणारा आपला हाटूमुटूचा चंद्र आहे...हा असाच राहो... परेश जयश्री मनोहर ...Read more

HATUMUTUCHA CHANDRA
HATUMUTUCHA CHANDRA by FARUK KAZI Rating Star
बालाजी मदन इंगळे

संवेदनशीलतेने लिहिलेल्या तरल बालकथा : हाटुमुटूचा चंद्र मराठीमध्ये जाणीवपूर्वक आणि विचारपूर्वक बालसाहित्य लिहिणाऱ्यांची संख्या खूप कमी आहे. बालसाहित्य आणि बाल मानसशास्त्र यांचा विचार करून आपली प्रतिभा त्यासाठी वापरणाऱ्या मोजक्या बालसाहित्यिकांमध्य फारूक एस. काझी यांचे नाव समाविष्ट करावे लागेल. त्यांच्या नुकत्याच प्रकाशित झालेल्या मुलांसाठीच्या ‘हाटूमुटूचा चंद्र’ या कथासंग्रहातून ही बाब ठळकपणे अधोरेखित होते. कथा म्हणजे केवळ प्रसंगानंतर प्रसंग किंवा घटनेनंतर घटना मांडणे नसते. त्यामध्ये लेखकाच्या प्रतिभेने वास्तव आणि कल्पना यांचा सुरेख संगम घडवून आणावा लागतो. कुठलीही कथा लेखकाला त्याच्या अनुभव विश्वातूनच सापडलेली असते. पण ते अनुभव विश्व मांडत असताना त्यात आपल्या प्रतिभेने काही साहित्य गुण समाविष्ट करावे लागतात. तेव्हा ती कथा साहित्यिकदृष्ट्या अभिजात व साहित्य गुणांनी युक्त अशी कथा होते. या संग्रहातील कथांमध्ये अशा साहित्यिक प्रतिभांच्या बऱ्याच जागा आहेत. आणि म्हणूनच फारूक एस. काझी यांच्या कथा रोजच्या जगण्यातीलच असल्या तरी त्यातील साहित्य गुणांमुळे या कथा आपले वेगळेपण सिद्ध करतात. कथेमध्येही काव्यात्मकता असते. प्रतिकात्मकता असते. आणि त्यामुळेच ती कथा वैश्विक ठरत असते. हे सर्व गुण ‘हाटुमूटुचा चंद्र’ मधील कथांमध्ये आढळून येतात. म्हणून ही कथा महत्त्वाची आहे. अद्भुतरम्यता, काल्पनिकता आणि धक्का तंत्र याने लिहिलेल्या कथा नेहमीच मुलांना आवडतील असे नाही. आपल्याच अवतीभवती घडणाऱ्या घटना इतक्या सुंदर असू शकतात हे मुलांना वाचायला आवडते. नेमके तेच या कथांमध्ये आहे. या बालकथा या मातीतल्या आहेत. या संस्कृतीतल्या आहेत. म्हणून त्या महत्त्वाच्या आहेत. या संग्रहात एकूण दहा कथा आहेत. सर्वच कथा सुंदर आणि हृदयस्पर्शी आहेत. ‘फिकर नॉट’ या कथेमध्ये दोन मित्रांचे काही प्रसंग आहेत. रेहान आणि त्याचा मित्र अर्पित. दोघे एका टेकडीवर जातात. रेहानसाठी टेकडीवरील अनुभव नवीन असतो. दोघे खूप गप्पा मारतात. तळ्यात पाय सोडून बसतात. तिथे बसल्यानंतर त्या तळ्यातील काही मासे आपण बाटलीत घेऊन जावे असे रेहानला वाटते. पण अर्पित त्याला सांगतो की आपण या टेकडीवरून काय घेऊन जायला हवं तर या टेकडीवरील वातावरण, टेकडीवरील दृश्य, इथे आपण घेतलेला आनंद हे सगळे मनात भरून घेऊन जायला हवे. असं मुक्या प्राण्यांना त्रास द्यायचा नाही, हे नकळतपणे तो रेहानला सांगतो. रेहानलाही ते पटतं आणि मग तो खोल श्वास घेऊन इथल्या सगळ्या आनंदाच्या आठवणी मनात भरून घेतो. आणि निघतो. एखादा कोणी अन्य बालकथा लेखक असता तर या दोघांचं बोलणं, टेकड्यावरील वर्णन, दोघांनी केलेली मज्जा, त्यांनी केलेल्या गमती याचे वर्णन करून कथा संपवली असती पण फारूक काझी यांनी इथून काय घेऊन जायचं? हे लिहून जे एक नवीन वळण कथेला दिलेले आहे, इथेच या कथेतील साहित्यगुणाची जागा आहे. तिथेच कथा लेखक म्हणून फारूक काझी यांची प्रतिभा आपल्याला दिसून येते. आणि बालसाहित्यिक म्हणून त्यांचं वेगळेपणही इथेच आपल्याला दिसतं. ‘कर के देखो’ या कथेमध्ये ट्रेकला गेलेली मुले स्वच्छता दूत कशी बनतात हे मुळातून वाचण्यासारखे आहे. ‘जखम’ या कथेमध्ये इयत्ता तिसरीत शिकत असताना एका माकडीनीला आपण इजा पोहोचवल्याचं मोठं झाल्यावर कथेतील नायकाला आठवतं. आणि तो मोठा असूनही लहानांसारखं रडत रडत ती चूक आपल्या आईकडे कबूल करतो. ही कथा वाचताना पाषाणहृदयी माणूसही भावनिक होऊन जातो. कडूनिंबाच्या झाडाचे खाली पडलेले पान चंद्राची प्रतिमा म्हणून म्हणजेच हाटुमूटुचा चंद्र म्हणून कथेत वापरणे. आणि तो चंद्र कथेतील साक्षीच्या चेहऱ्यावर आनंदाचे प्रतिक म्हणून येणे. आणि त्याद्वारे सहलीला जाण्यासाठी पैसे न मिळाल्याच्या दुःखातून स्वतःला सावरणे ही सगळीच मांडणी भन्नाट झाली आहे. अशा भरपूर जागा या पुस्तकांमध्ये आहेत. ‘हिरवं सपान’ या कथेमध्ये शहरातला मंदार गावाकडे येतो. आणि गावातील चंदा सोबत शेत-शिवारात फिरतो. या शेत-शिवारातील भरपूर झाडे पाहून बी, रोपटं, मग त्याचं झाड ही क्रिया किती महत्त्वाची आहे. आणि या क्रियेचं स्वप्न नेहमीच गावाला पडतं. तसंच हिरवं स्वप्न शहराला का पडत नाही? हा प्रश्न खरंतर लहान-मोठ्या प्रत्येक वाचकाला अस्वस्थ करून जातो. ‘स्वप्न’ ही आणखी एक सुंदर कथा या संग्रहामध्ये आहे. माणसाला अभावातूनच वस्तूंची किंमत कळत असते. ज्याच्याकडे सर्व काही आहे अशा मुलाकडे जेव्हा सायकल येते, तेव्हा तिची काळजी घेतली जात नाही. पण स्वप्नातही ज्याच्या कधी सायकल मिळेल असं वाटत नव्हतं अशा अंकितला जेव्हा सायकल मिळते, तेव्हा तो तिची किती काळजी घेतो आणि हेच त्या सायकलचे स्वप्न होते. आणि अंकितचेही तेच स्वप्न होते ही स्वप्नांची सरमिसळ वाचकांना खूपच आवडून जाते. ‘मैतर’ ही आणखीन एक अनोळखी नातेसंबंध घट्ट करणारी कथा. फक्त काही दिवसांसाठी आलेल्या मेंढक्या काकाची आणि अमृत ची मैत्री होते. आणि ती मैत्री त्या दोघांमध्ये इतकी घट्ट होते की, मेंढक्या काका आपली मेंढरं घेऊन परत निघाल्यावर दोघांनाही एकमेकांचा निरोप घ्यावा असे वाटत नाही. निरोपावेळी दोघांच्याही डोळ्यात पाणी येते. दोघेही निरोपावेळी एकमेकांना भेटवस्तू देतात. हा प्रसंग लेखकाने स्थानिक संदर्भ, संस्कृती, भाषा आणि चित्रदर्शी स्वरूपात असा उभा केला आहे की, वाचक कथा संपली तरी त्या मेंढरांच्या कळपामध्ये आणि अमृतच्या घराच्या आसपासच घुटमळत राहतो. ‘जाऊ दे त्याला’ ही आणखीन एक भावस्पर्शी कथा. जंगली प्राण्यांनाही जीव लावला तर ते माणसांशी प्रेमाने वागतात हे सांगणारी ही कथा वाचकाच्या काळजाचा ठाव घेते. निधी आणि फॉरेस्ट ऑफिसर असलेले तिचे बाबा यांची ही कथा जंगलाच्या दुनियेत वाचकाला घेऊन जाते. पण तिथेही मानवी भावना कशी श्रेष्ठ ठरते हे अतिशय रंजक पद्धतीने लेखकाने लिहिले आहे. ‘बाबांची भाषा’ ही आणखी एक हृदयाला स्पर्श करणारी कथा! शाळेत शिकणारा सारंग अपघातात ऐकणं आणि बोलणं कायमचं गमावलेल्या आपल्या बाबांसाठी हातवाऱ्याची भाषा शिकून घेतो. हे जेव्हा वाचकाला कळतं तेव्हा वाचक जागच्याजागी स्थिर होऊन जातो. ‘एस पी १३’ ही आधुनिक तंत्रज्ञानात घेऊन जाणारी कथा! छोटीशी समायरा स्पेसशीप घेऊन एका नव्या प्लॅनेटवर जाते. आणि त्या नव्या प्लॅनेटवर असलेली माणसं कशी निसर्गाची काळजी घेतात हे पाहून समायरा तिथेच राहण्याचा निर्णय घेते. तेव्हा तिच्या सायंटिस्ट मामासह वाचक ही अचंबित होऊन जातात. निसर्ग आणि आधुनिक तंत्रज्ञान यांचा सुरेख आणि अफलातून संगम या कथेमध्ये लेखकाने घडवून आणला आहे. या पुस्तकाची महत्त्वाची बाजू म्हणजे यातील चित्रे! चंद्रमोहन कुलकर्णी यांची चित्रे या कथेला एक वेगळा आणि नवा आयाम देतात. ही चित्रे या कथेशी एवढी एकरूप झालेली आहेत की ही चित्रे वेगळी काढली तर या कथा अपूर्ण वाटतील! कथेला अनपेक्षित वळण देण्यामध्ये लेखक पटाईत आहेत. हे प्रत्येक कथेतून आपल्याला जाणवतं. आपण सरळ कथा वाचत जातो. आणि कथा देखील आता सरळ या वाटेने जाईल असे वाटत असताना ती कथा असं काही वळण घेते की वाजक स्तंभित होऊन जातो. आणि हीच खरे तर फारूक एस. काझी यांची खरी ताकद आहे. त्यांच्या सर्व कथांमधील पात्र आणि त्यांची नावे पाहिली तर ती विशिष्ट अशी पात्रे किंवा नावे नाहीत. तर सर्वसमावेशक अशी सर्व पात्रे आहेत. त्यामुळे किती तीव्र सामाजिक भान लेखकाला आहे हेही आपल्याला जाणवते. आजच्या सोशल मीडियाच्या काळात नातेसंबंध दूरावत असताना, नातेसंबंध दृढ करणाऱ्या या कथा प्रत्येक वाचकांपर्यंत पोहोचल्या पाहिजेत. या कथांमध्ये कल्पनाशक्ती आहे. वास्तवता आहे. पण याच्या जोडीला कथालेखक म्हणून जी एक संवेदनशीलता लागते, जी एक तरलता लागते आणि मुलांच्या कथांमध्ये जो एक हळुवारपणा आणि नाजूकता आवश्यक असते ते सगळे गुण या कथेमध्ये ओतप्रोत भरलेले आहेत. म्हणून या कथा फक्त लहानच नाही तर मोठ्यांनाही गुंतवून ठेवणाऱ्या आहेत. स्थळ आणि काळानुसार बदलणारी भाषा आणि प्रसंगानुसार बदलणारं वर्णन या कथेच्या जमेच्या बाजू आहेत. यामुळे या कथा वाचकाला पकडून ठेवतात. आणि काही एक सामाजिक भान आणि साहित्यिक जाण या कथा देतात. आणि हेच या कथेचे मोठे यश आहे. - बालाजी मदन इंगळे ...Read more