* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: 35 DAYS
  • Availability : Available
  • Translators : PARAG POTDAR
  • ISBN : 9789353174774
  • Edition : 1
  • Publishing Year : AUGUST 2020
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 212
  • Language : Translated From ENGLISH to MARATHI
  • Category : POLITICS & GOVERNMENT
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
IN 2019, A HIGH-VOLTAGE POLITICAL DRAMA UNFOLDED OVER THIRTY-FIVE DAYS BETWEEN THE DECLARATION OF THE MAHARASHTRA ASSEMBLY ELECTION RESULTS AND THE FORMATION OF THE SHIV SENA-NCP-CONGRESS GOVERNMENT IN THE STATE. THE STARTLING EVENTS THAT HAD THE ENTIRE COUNTRY GLUED TO TELEVISION SCREENS CULMINATED IN THE SWEARING IN OF UDDHAV THACKERAY AS CHIEF MINISTER ON 28 NOVEMBER 2019. THIS BOOK IS A BLOW-BY-BLOW ACCOUNT OF THE UPS AND DOWNS THAT TOOK PLACE DURING THOSE THIRTY-FIVE DAYS THAT BAFFLED EVEN HARDCORE POLITICAL PUNDITS. THE GOINGS-ON UNMASKED ALMOST ALL PARTIES AND POLITICIANS OF THE STATE AND CHANGED MAHARASHTRA`S POLITICS FOREVER. WITH EXCLUSIVE REPORTAGE AND INTERVIEWS FROM CLOSE OBSERVERS OF THE WHOLE DRAMA, 35 DAYS GOES BEHIND THE SCENES TO RECONSTRUCT WHAT TOOK PLACE DURING THE MAHARASHTRA ELECTIONS 2019.
महाराष्ट्र विधानसभेच्या २०१९च्या निवडणुकांचे निकाल लागण्यापासून ते शिवसेना-राष्ट्रवादी काॅंग्रेस- काॅंग्रेस आघाडी प्रेणित सरकार स्थापनेपर्यतचा ३५ दिवसांचा काळ म्हणजे जणू एका महानाट्याचा काळ होता. २८ नोव्हेंबर २०१९ रोजी उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेईपर्यंतच्या लक्षवेधी घटनांनी जनतेला टीव्ही माध्यमांशी अक्षरशः चिकटवून टाकले होते. राजकीय पंडितांनाही अचंबित करणारे या ३५ दिवसातले चढउतार या पुस्तकात संगतवार विस्ताराने समोर येतात. महाराष्ट्राच्या राजकारणाचा चेहरामोहरा बदलण्यासोबतच या काळाने सर्वच राजकीय चेहऱ्यांचे नकाब उतरवले. या विलक्षण रिपोर्ताजमध्ये या नाट्यात सहभागी असलेले आणि याचे साक्षीदार असलेल्यांच्या मुलाखतींच्या माध्यमातून पडद्यामागच्या नाट्याचा चेहराही स्पष्ट होतो.

No Records Found
No Records Found
Keywords
#35DAYS #MAHARASHTRAPOLITICS #JITENDRADIXIT #UDDHAVTHACKREY #DEVENDRAFADANVIS #SHARADPAWAR #MAHARASHTRAASSEMBLY2019 #PARAGPOTDAR #MARATHITRANSLATIONS #ONLINEBOOKS #POLITICAL #MEHTAPUBLISHINGHOUSE #३५दिवस #महाराष्ट्रराजकारण #जीतेंद्रदीक्षित #परागपोतदार #उद्धवठाकरे #देवेंद्रफडणवीस #शरदपवार #महाराष्ट्रविधानसभा #मराठीअनुवाद #आॅनलाईनपुस्तके #राजकीय #मेहतापब्लिशिंगहाऊस
Customer Reviews
  • Rating Starलोकसत्ता २८/११/२०२०

    जितेंद्र दीक्षित यांचे `३५ डेज : हाऊ पॉलिटिक्स इन महाराष्ट्र चेंज्ड फॉरेव्हर इन २०१९` हे पुस्तक म्हणजे एखाद्या सामन्याच्या समालोचनासारखे आहे. पूर्वी आतासारखा टीव्ही घराघरांत नसल्याने व प्रत्येक सामन्याचे थेट प्रक्षेपण होत नसल्याने आद्ल्या दिवशीच्यासामन्याचे डोळ्यांसमोर चित्र उभे राहील असे वर्णन त्याच्या विश्लेषणासह वाचकांसमोर मांडण्याचे कौशल्य आदल्या पिढीच्या क्रीडापत्रकारांमध्ये होते. त्यातून सामना पाहिल्याचा आनंद वाचकांना मिळत असे. दीक्षित यांच्या पुस्तकाचा ढाचा तसा आहे. सहजसोपी व ओघवती भाषाशैली हि त्यांच्या पुस्तकाची मोठी ताकद आहे. ज्यांनी या सत्तांतराचा काळात त्याबाबतच्या बातम्या, मुलाखती फारशा पाहिल्या नाहीत किंवा अजिबात पाहिल्या नाहीत, त्यांच्यासाठी त्या सार्वजनिक माहितीचे संकलन व त्याचे विश्लेषण या पुस्तकातून एका ठिकाणी उपलब्ध होते. एकूण १७ प्रकरणांमधून त्यांनी या सत्तांतराची कहाणी कथन केली आहे. भाजप- शिवसेना युती तुटण्यासाठी पाश्र्वभूमी तयार करणाऱ्या घटनांचा चांगला आढावा दीक्षित यांनी घेतला आहे. मुंबई महापालिका शिवसेनेच्या ताब्यातून खेचण्याचे प्रयत्न व आरे कारशेडच्या निमित्ताने पर्यावरणाचा विषय घेऊन पुढे आलेल्या आदित्य ठाकरे यांच्या मागणीकडे दुर्लक्ष करत ठाकरेंच्या नव्या पिढीच्या खच्चीकरणाच्या भाजपच्या खेळीमुळे ठाकरे कुटुंबाच्या मनावर कसा ओरखडा उमटला, याची `मार्मिक` नोंद या पुस्तकात आहे. त्यातून निकालानंतर सत्ता आलेली असतानाही भाजपबरोबर राहण्यापेक्षा वेगळा विचार करण्याचा निर्णय शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी कसा घेतला, यासारख्या प्रश्नांची उत्तरे समजण्यास मदत होते. पुस्तकाचा समारोप राज ठाकरे यांच्यावरील प्रकरणाने करून दीक्षित यांनी या सत्तांतराचा परिणाम म्हणून राजकारण कोणत्या दिशेने जाणार यावर बोट ठेवले आहे. `मराठी व हिंदुत्वादी` हि शिवसेनेची ओळख आता धुरकट करून ती जागा राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने व्यापावी अशा रीतीने वाव देत भाजपा नवीन युतीकडे वाटचाल करत असल्याचे सूतोवाच दीक्षित यांनी केले आहे. त्या दृष्टीने, गेल्या वर्षभरात मनसेची वाटचाल कशी झाली, याचा विचार महाराष्ट्रीय वाचक आपसूकच करू लागतील. ...Read more

  • Rating StarAbhijeet Pendharkar

    महाराष्ट्रात गेल्या वर्षी सत्तास्थापनेसाठी जे नाट्य रंगलं, ते एखाद्या थ्रिलरमधल्या नाट्यालाही मागे टाकेल, एवढ्या ताकदीचं होतं. या 35 दिवसांत महाराष्ट्राच्या जनतेला राजकारणातले नवरस आणि डावपेचांचे सगळे प्रकार बघायला मिळाले. पडद्यासमोर आणि पडद्याआड घडणऱ्या घडामोडींची नोंद घेणारं `35 days` हे पुस्तक जीतेंद्र दीक्षित यांनी लिहिलं आहे. मेहता प्रकाशनाने हे पुस्तक मराठीत आणलं असून, पराग पोतदार यांनी त्याचा अनुवाद केलाय. विधानसभा निवडणुकीचे अनपेक्षित निकाल, त्यात कुठल्याच एका पक्षाला स्पष्ट कौल न मिळणं आणि निकाल जाहीर झाल्या झाल्या सुरू झालेलं वर्चस्वाचं आणि मानापमानाचं राजकारण, इथून पुस्तकाची सुरुवात होते. ही कादंबरी नाही, त्यामुळे लेखकानं जे जनतेसमोर घडलं, तेच क्रमानं आणि वस्तुनिष्ठपणे मांडण्याचा प्रयत्न केला आहे. त्याचवेळी पडद्यामागे सुरू असलेल्या घडामोडींची माहितीही देण्याचा प्रयत्न केला आहे. भाजप-शिवसेना युती असतानाही शिवसेनेची मनःस्थिती कशी बदलत गेली, त्यामागे कुठल्या कुठल्या घटकांचा हात होता, कुणाच्या भेटींचे, बोलण्याचे कसे अर्थ निघाले, याची तपशीलवार नोंद पुस्तकात करण्यात आलेय. त्या काळी ज्यांनी उत्सुकतेने या घडामोडी बघितल्या, त्यांच्या आठवणींना उजाळा मिळतोच, शिवाय बरीच अतिरिक्त माहिती आणि पाहण्यातून निसटलेले धागेदोरेही इथे सापडू शकतात. माहीत असलेल्या सगळ्या घडामोडी अधिक तपशीलात आणि लेखकासह इतर अनेक अनुभवी पत्रकारांच्या मुलाखतींतूनही उलगडत जातात आणि हेच पुस्तकाचं वैशिष्ट्य आहे. पुस्तकात काही त्रुटीही आहेत. पडद्यामागे नेमकं काय घडलं, कसं घडलं, त्याची कारणं काय होती, याचा केवळ अंदाज काही पत्रकारांनी बांधला आहे आणि त्या संदर्भाने लेखकानं लिहिलं आहे. त्यांची स्वतःची मतं फार कमी ठिकाणी उमटलेली दिसतात. पडद्याआडच्या घडामोडीही जास्त ठळकपणे यायला हव्या होत्या. तसंच, कॉंग्रेसचा आधी असलेला ठाम नकार, मग सत्तेत सहभागी होण्यासाठीची धावपळ आणि हौस, या घटकाला तुलनेनं कमी महत्त्व मिळालं आहे. पराग पोतदार यांनी अनुवाद उत्तम आणि प्रवाही केला आहे. महाराष्ट्राच्या राजकारणाची दिशा बदलणाऱ्या या महत्त्वाच्या दस्तावेजाचं स्वागत करायला हवं. - अभिजित पेंढारकर. ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

RUCHIRA BHAG -1
RUCHIRA BHAG -1 by KAMALABAI OGALE Rating Star
संजीव_वेलणकर

*आज २० एप्रिल* *आज दोन लाख सुनांची एकच आई हे नाव कमवणाऱ्या #कमलाबाई_ओगले यांचा स्मृतिदिन.* जन्म. १६ सप्टेंबर १९१३ सांगली जिल्ह्यातील कुंडल येथे. कमलाबाई ओगले या माहेरच्या गोदूताई अनंत दांडेकर. त्याचा विवाह सांगलीतील कृष्णाजी ओगले यांच्याशी झाला. कमलााई ओगले यांच्या पाककला कृतींवरच्या ‘ रुचिरा‘ हे पुस्तक १९७० च्या सुमारास आले. कुठलाही प्रकाशक, या नाव नसलेल्या कमलाबाई ओगले यांचे हे पुस्तक स्विकारावयास तयार होईना काही प्रकाशकांनी तर बाईंकडेच प्रकाशनासाठी पैसे मागितले. पण या पुस्तकाच्या गुणवत्तेवर आणि उपयुक्ततेवर १०० % विश्वास असणार्‍या ओगल्यांनी धीर न सोडता त्यांचे आणि मुकुंदराव किर्लोस्करांचे स्नेही श्री. भिडे यांच्या मार्फत मुकुंदराव किर्लोस्कर यांना गाठले आणि पुस्तक प्रकाशनाचा प्रस्ताव ठेवला. वृत्तीने पूर्णत: व्यावसायिक असणार्‍या मुकुंदरावांनी फायदा होणार नाही म्हणून हे पुस्तक स्वीकारण्यास नकारच दिला होता पण भिडे यांनी पटवल्यावर आणि तोटा झालाच तर तो सोसण्याची तयारी ओगल्यांनी दाखवल्यावर मुकुंदराव तयार झाले . किर्लोस्कर समूहाने ‘ स्त्री सखी प्रकाशन ‘ या संस्थेची मुहूर्तमेढ रोवली आणि पहिलेच पुस्तक म्हणून ‘ रुचिरा ‘ चे प्रकाशन केले. या पुस्तकामुळे कमलाबाई ओगले या सर्वच स्तरांत अतिशय लोकप्रिय झाल्या. त्यांना परीक्षक म्हणून पूर्वीपेक्षा जास्त बोलावणी येऊ लागली. केंद्रीय मंत्री शंकरराव चव्हाण, आबासाहेब खेबुडकर — कुलकर्णी, दुर्गाबाई भागवत, शांता शेळके, मोहिनी निमकर,अशा अनेक नामवंतांच्या हस्ते त्यांचे कित्येक सत्कार झाले. मुंबईच्या एस.एन.डी.टी. विद्यापीठात त्यांनी वर्ग घेतले. रुचिरा - भाग १ ने अभूतपूर्व यश मिळवले. वास्तविक रुचिराचे जे हस्तलिखित प्रथम तयार केले होते त्यात १०५० पदार्थकृतींचा समावेश होता. परंतु पुस्तक फार मोठे होईल व किंमतीलाही भारी होईल म्हणून त्यातले ३५० पदार्थ कमी करून रुचिरा प्रसिद्ध केले. या बाजूला काढलेल्या ३५० पदार्थांमध्ये अजून काही नवीन पदार्थांची भर घालून रुचिरा - भाग २, सन १९८५ मध्ये प्रसिद्ध केला आहे. कमलाबाई आपल्या मुलांकडे ऑस्ट्रेलियाला गेल्या असताना तेथेही ह्यांना नवनवीन पदार्थांचे प्रयोग केले. ऑस्ट्रेलियन सुगरणींकडून तेथील पदार्थांची माहिती करून घेतली व त्या पदार्थांना भारतीय चव देऊन रुचिराच्या पद्धतीनुसार वाटी चमच्याच्या प्रमाणात तयार केले. त्यामुळे रुचिरा - भाग २ मध्ये अनेक नाविन्यपूर्ण पदार्थांची रेलचेल आहे. स्वीडीश ऍपल पुडींग, स्वीस फिंगर्स, मटी ब्रिझल्स, ब्लॅक फॉरेस्ट केक, चीज मिरची भात, शानसाक, हुसेनी कबाब करी, ब्राऊन स्ट्यू अशा नावांनीच तोंडाला पाणी सुटावे. ऑस्ट्रेलियात तर त्यांना तीनदा बोलावणी आली. या दोन्ही खंडांत त्यांनी तेथल्या भारतीय आणि स्थानिक स्त्रियांना विविध पदार्थांची प्रात्यक्षिके दाखवली. ऑस्ट्रेलियात शिरा करतांना तूप उपलब्ध नव्हते, तर त्यांनी चक्क तेलावर शिरा करून दाखवला! तोही तितकाच स्वादिष्ट झाला होता. या पुस्तकात महाराष्ट्रीय पदार्थांप्रमाणेच काही तमिळी, पंजाबी, गुजराती आणि बंगाली पाककृतींचा समावेश केला आहे. त्याचप्रमाणे हे पुस्तक मराठी भाषेचे कुंपण ओलांडून कानडी भाषेतही गेले. विद्यामूर्ती सत्यनारायण यांनी भाषांतर केलेल्या कानडी पुस्तकाचे भाग्य मराठी पुस्तकाप्रमाणेच बलवत्तर आहे. या पुस्तकाची हिन्दी, इंग्लिश आणि गुजराती भाषांतही भाषांतरे झाली आहेत. ‘फास्ट फूड ‘ पद्धतीच्या पाक कृती असलेल्या या ‘ रुचिरा ‘ चा दुसरा भागही प्रसिद्ध झाला. एखाद्या लोकप्रिय गाण्याप्रमाणे हे पुस्तक घराघरांत पोचले. हे पुस्तक पुढच्या पिढींतील मुलींना / सुनांना ही आपले पुस्तक वाटते. दोन लाख प्रतींचा खप गाठल्यावर ‘ दोन लाख सुनांची एकच आई ‘अशी caption या पुस्तकाच्या blurb वर दिली गेली होती; ती नि:संशय समर्पक होती. या Blurb ला प्रा. मं. वि. राजाध्यक्षांनी ‘ वेष्टण लेख ‘ असा प्रतिशब्द सुचवला होता.. कमलाबाई ओगले यांचे २० एप्रिल १९९९ रोजी निधन झाले. आपल्या समुहा तर्फे कमलाबाई ओगले यांना आदरांजली. ...Read more

RUCHIRA BHAG -2
RUCHIRA BHAG -2 by KAMALABAI OGALE Rating Star
संजीव वेलणकर

*आज २० एप्रिल* *आज दोन लाख सुनांची एकच आई हे नाव कमवणाऱ्या #कमलाबाई_ओगले यांचा स्मृतिदिन.* जन्म. १६ सप्टेंबर १९१३ सांगली जिल्ह्यातील कुंडल येथे. कमलाबाई ओगले या माहेरच्या गोदूताई अनंत दांडेकर. त्याचा विवाह सांगलीतील कृष्णाजी ओगले यांच्याशी झाला. कमलााई ओगले यांच्या पाककला कृतींवरच्या ‘ रुचिरा‘ हे पुस्तक १९७० च्या सुमारास आले. कुठलाही प्रकाशक, या नाव नसलेल्या कमलाबाई ओगले यांचे हे पुस्तक स्विकारावयास तयार होईना काही प्रकाशकांनी तर बाईंकडेच प्रकाशनासाठी पैसे मागितले. पण या पुस्तकाच्या गुणवत्तेवर आणि उपयुक्ततेवर १०० % विश्वास असणार्‍या ओगल्यांनी धीर न सोडता त्यांचे आणि मुकुंदराव किर्लोस्करांचे स्नेही श्री. भिडे यांच्या मार्फत मुकुंदराव किर्लोस्कर यांना गाठले आणि पुस्तक प्रकाशनाचा प्रस्ताव ठेवला. वृत्तीने पूर्णत: व्यावसायिक असणार्‍या मुकुंदरावांनी फायदा होणार नाही म्हणून हे पुस्तक स्वीकारण्यास नकारच दिला होता पण भिडे यांनी पटवल्यावर आणि तोटा झालाच तर तो सोसण्याची तयारी ओगल्यांनी दाखवल्यावर मुकुंदराव तयार झाले . किर्लोस्कर समूहाने ‘ स्त्री सखी प्रकाशन ‘ या संस्थेची मुहूर्तमेढ रोवली आणि पहिलेच पुस्तक म्हणून ‘ रुचिरा ‘ चे प्रकाशन केले. या पुस्तकामुळे कमलाबाई ओगले या सर्वच स्तरांत अतिशय लोकप्रिय झाल्या. त्यांना परीक्षक म्हणून पूर्वीपेक्षा जास्त बोलावणी येऊ लागली. केंद्रीय मंत्री शंकरराव चव्हाण, आबासाहेब खेबुडकर — कुलकर्णी, दुर्गाबाई भागवत, शांता शेळके, मोहिनी निमकर,अशा अनेक नामवंतांच्या हस्ते त्यांचे कित्येक सत्कार झाले. मुंबईच्या एस.एन.डी.टी. विद्यापीठात त्यांनी वर्ग घेतले. रुचिरा - भाग १ ने अभूतपूर्व यश मिळवले. वास्तविक रुचिराचे जे हस्तलिखित प्रथम तयार केले होते त्यात १०५० पदार्थकृतींचा समावेश होता. परंतु पुस्तक फार मोठे होईल व किंमतीलाही भारी होईल म्हणून त्यातले ३५० पदार्थ कमी करून रुचिरा प्रसिद्ध केले. या बाजूला काढलेल्या ३५० पदार्थांमध्ये अजून काही नवीन पदार्थांची भर घालून रुचिरा - भाग २, सन १९८५ मध्ये प्रसिद्ध केला आहे. कमलाबाई आपल्या मुलांकडे ऑस्ट्रेलियाला गेल्या असताना तेथेही ह्यांना नवनवीन पदार्थांचे प्रयोग केले. ऑस्ट्रेलियन सुगरणींकडून तेथील पदार्थांची माहिती करून घेतली व त्या पदार्थांना भारतीय चव देऊन रुचिराच्या पद्धतीनुसार वाटी चमच्याच्या प्रमाणात तयार केले. त्यामुळे रुचिरा - भाग २ मध्ये अनेक नाविन्यपूर्ण पदार्थांची रेलचेल आहे. स्वीडीश ऍपल पुडींग, स्वीस फिंगर्स, मटी ब्रिझल्स, ब्लॅक फॉरेस्ट केक, चीज मिरची भात, शानसाक, हुसेनी कबाब करी, ब्राऊन स्ट्यू अशा नावांनीच तोंडाला पाणी सुटावे. ऑस्ट्रेलियात तर त्यांना तीनदा बोलावणी आली. या दोन्ही खंडांत त्यांनी तेथल्या भारतीय आणि स्थानिक स्त्रियांना विविध पदार्थांची प्रात्यक्षिके दाखवली. ऑस्ट्रेलियात शिरा करतांना तूप उपलब्ध नव्हते, तर त्यांनी चक्क तेलावर शिरा करून दाखवला! तोही तितकाच स्वादिष्ट झाला होता. या पुस्तकात महाराष्ट्रीय पदार्थांप्रमाणेच काही तमिळी, पंजाबी, गुजराती आणि बंगाली पाककृतींचा समावेश केला आहे. त्याचप्रमाणे हे पुस्तक मराठी भाषेचे कुंपण ओलांडून कानडी भाषेतही गेले. विद्यामूर्ती सत्यनारायण यांनी भाषांतर केलेल्या कानडी पुस्तकाचे भाग्य मराठी पुस्तकाप्रमाणेच बलवत्तर आहे. या पुस्तकाची हिन्दी, इंग्लिश आणि गुजराती भाषांतही भाषांतरे झाली आहेत. ‘फास्ट फूड ‘ पद्धतीच्या पाक कृती असलेल्या या ‘ रुचिरा ‘ चा दुसरा भागही प्रसिद्ध झाला. एखाद्या लोकप्रिय गाण्याप्रमाणे हे पुस्तक घराघरांत पोचले. हे पुस्तक पुढच्या पिढींतील मुलींना / सुनांना ही आपले पुस्तक वाटते. दोन लाख प्रतींचा खप गाठल्यावर ‘ दोन लाख सुनांची एकच आई ‘अशी caption या पुस्तकाच्या blurb वर दिली गेली होती; ती नि:संशय समर्पक होती. या Blurb ला प्रा. मं. वि. राजाध्यक्षांनी ‘ वेष्टण लेख ‘ असा प्रतिशब्द सुचवला होता.. कमलाबाई ओगले यांचे २० एप्रिल १९९९ रोजी निधन झाले. आपल्या समुहा तर्फे कमलाबाई ओगले यांना आदरांजली. ...Read more