* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: 35 DAYS:HOW POLITICS IN MAHARASHTRA CHANGED FOREVER IN 2019
  • Availability : Available
  • Translators : PARAG POTDAR
  • ISBN : 9789353174774
  • Edition : 2
  • Publishing Year : AUGUST 2020
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 212
  • Language : Translated From ENGLISH to MARATHI
  • Category : POLITICS & GOVERNMENT
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
IN 2019, A HIGH-VOLTAGE POLITICAL DRAMA UNFOLDED OVER THIRTY-FIVE DAYS BETWEEN THE DECLARATION OF THE MAHARASHTRA ASSEMBLY ELECTION RESULTS AND THE FORMATION OF THE SHIV SENA-NCP-CONGRESS GOVERNMENT IN THE STATE. THE STARTLING EVENTS THAT HAD THE ENTIRE COUNTRY GLUED TO TELEVISION SCREENS CULMINATED IN THE SWEARING IN OF UDDHAV THACKERAY AS CHIEF MINISTER ON 28 NOVEMBER 2019. THIS BOOK IS A BLOW-BY-BLOW ACCOUNT OF THE UPS AND DOWNS THAT TOOK PLACE DURING THOSE THIRTY-FIVE DAYS THAT BAFFLED EVEN HARDCORE POLITICAL PUNDITS. THE GOINGS-ON UNMASKED ALMOST ALL PARTIES AND POLITICIANS OF THE STATE AND CHANGED MAHARASHTRA`S POLITICS FOREVER. WITH EXCLUSIVE REPORTAGE AND INTERVIEWS FROM CLOSE OBSERVERS OF THE WHOLE DRAMA, 35 DAYS GOES BEHIND THE SCENES TO RECONSTRUCT WHAT TOOK PLACE DURING THE MAHARASHTRA ELECTIONS 2019.
महाराष्ट्र विधानसभेच्या २०१९च्या निवडणुकांचे निकाल लागण्यापासून ते शिवसेना-राष्ट्रवादी काॅंग्रेस- काॅंग्रेस आघाडी प्रेणित सरकार स्थापनेपर्यतचा ३५ दिवसांचा काळ म्हणजे जणू एका महानाट्याचा काळ होता. २८ नोव्हेंबर २०१९ रोजी उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेईपर्यंतच्या लक्षवेधी घटनांनी जनतेला टीव्ही माध्यमांशी अक्षरशः चिकटवून टाकले होते. राजकीय पंडितांनाही अचंबित करणारे या ३५ दिवसातले चढउतार या पुस्तकात संगतवार विस्ताराने समोर येतात. महाराष्ट्राच्या राजकारणाचा चेहरामोहरा बदलण्यासोबतच या काळाने सर्वच राजकीय चेहऱ्यांचे नकाब उतरवले. या विलक्षण रिपोर्ताजमध्ये या नाट्यात सहभागी असलेले आणि याचे साक्षीदार असलेल्यांच्या मुलाखतींच्या माध्यमातून पडद्यामागच्या नाट्याचा चेहराही स्पष्ट होतो.

No Records Found
No Records Found
Keywords
#35DAYS #MAHARASHTRAPOLITICS #JITENDRADIXIT #UDDHAVTHACKREY #DEVENDRAFADANVIS #SHARADPAWAR #MAHARASHTRAASSEMBLY2019 #PARAGPOTDAR #MARATHITRANSLATIONS #ONLINEBOOKS #POLITICAL #MEHTAPUBLISHINGHOUSE #३५दिवस #महाराष्ट्रराजकारण #जीतेंद्रदीक्षित #परागपोतदार #उद्धवठाकरे #देवेंद्रफडणवीस #शरदपवार #महाराष्ट्रविधानसभा #मराठीअनुवाद #आॅनलाईनपुस्तके #राजकीय #मेहतापब्लिशिंगहाऊस
Customer Reviews
  • Rating Starलोकसत्ता २८/११/२०२०

    जितेंद्र दीक्षित यांचे `३५ डेज : हाऊ पॉलिटिक्स इन महाराष्ट्र चेंज्ड फॉरेव्हर इन २०१९` हे पुस्तक म्हणजे एखाद्या सामन्याच्या समालोचनासारखे आहे. पूर्वी आतासारखा टीव्ही घराघरांत नसल्याने व प्रत्येक सामन्याचे थेट प्रक्षेपण होत नसल्याने आद्ल्या दिवशीच्यासामन्याचे डोळ्यांसमोर चित्र उभे राहील असे वर्णन त्याच्या विश्लेषणासह वाचकांसमोर मांडण्याचे कौशल्य आदल्या पिढीच्या क्रीडापत्रकारांमध्ये होते. त्यातून सामना पाहिल्याचा आनंद वाचकांना मिळत असे. दीक्षित यांच्या पुस्तकाचा ढाचा तसा आहे. सहजसोपी व ओघवती भाषाशैली हि त्यांच्या पुस्तकाची मोठी ताकद आहे. ज्यांनी या सत्तांतराचा काळात त्याबाबतच्या बातम्या, मुलाखती फारशा पाहिल्या नाहीत किंवा अजिबात पाहिल्या नाहीत, त्यांच्यासाठी त्या सार्वजनिक माहितीचे संकलन व त्याचे विश्लेषण या पुस्तकातून एका ठिकाणी उपलब्ध होते. एकूण १७ प्रकरणांमधून त्यांनी या सत्तांतराची कहाणी कथन केली आहे. भाजप- शिवसेना युती तुटण्यासाठी पाश्र्वभूमी तयार करणाऱ्या घटनांचा चांगला आढावा दीक्षित यांनी घेतला आहे. मुंबई महापालिका शिवसेनेच्या ताब्यातून खेचण्याचे प्रयत्न व आरे कारशेडच्या निमित्ताने पर्यावरणाचा विषय घेऊन पुढे आलेल्या आदित्य ठाकरे यांच्या मागणीकडे दुर्लक्ष करत ठाकरेंच्या नव्या पिढीच्या खच्चीकरणाच्या भाजपच्या खेळीमुळे ठाकरे कुटुंबाच्या मनावर कसा ओरखडा उमटला, याची `मार्मिक` नोंद या पुस्तकात आहे. त्यातून निकालानंतर सत्ता आलेली असतानाही भाजपबरोबर राहण्यापेक्षा वेगळा विचार करण्याचा निर्णय शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी कसा घेतला, यासारख्या प्रश्नांची उत्तरे समजण्यास मदत होते. पुस्तकाचा समारोप राज ठाकरे यांच्यावरील प्रकरणाने करून दीक्षित यांनी या सत्तांतराचा परिणाम म्हणून राजकारण कोणत्या दिशेने जाणार यावर बोट ठेवले आहे. `मराठी व हिंदुत्वादी` हि शिवसेनेची ओळख आता धुरकट करून ती जागा राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने व्यापावी अशा रीतीने वाव देत भाजपा नवीन युतीकडे वाटचाल करत असल्याचे सूतोवाच दीक्षित यांनी केले आहे. त्या दृष्टीने, गेल्या वर्षभरात मनसेची वाटचाल कशी झाली, याचा विचार महाराष्ट्रीय वाचक आपसूकच करू लागतील. ...Read more

  • Rating StarAbhijeet Pendharkar

    महाराष्ट्रात गेल्या वर्षी सत्तास्थापनेसाठी जे नाट्य रंगलं, ते एखाद्या थ्रिलरमधल्या नाट्यालाही मागे टाकेल, एवढ्या ताकदीचं होतं. या 35 दिवसांत महाराष्ट्राच्या जनतेला राजकारणातले नवरस आणि डावपेचांचे सगळे प्रकार बघायला मिळाले. पडद्यासमोर आणि पडद्याआड घडणऱ्या घडामोडींची नोंद घेणारं `35 days` हे पुस्तक जीतेंद्र दीक्षित यांनी लिहिलं आहे. मेहता प्रकाशनाने हे पुस्तक मराठीत आणलं असून, पराग पोतदार यांनी त्याचा अनुवाद केलाय. विधानसभा निवडणुकीचे अनपेक्षित निकाल, त्यात कुठल्याच एका पक्षाला स्पष्ट कौल न मिळणं आणि निकाल जाहीर झाल्या झाल्या सुरू झालेलं वर्चस्वाचं आणि मानापमानाचं राजकारण, इथून पुस्तकाची सुरुवात होते. ही कादंबरी नाही, त्यामुळे लेखकानं जे जनतेसमोर घडलं, तेच क्रमानं आणि वस्तुनिष्ठपणे मांडण्याचा प्रयत्न केला आहे. त्याचवेळी पडद्यामागे सुरू असलेल्या घडामोडींची माहितीही देण्याचा प्रयत्न केला आहे. भाजप-शिवसेना युती असतानाही शिवसेनेची मनःस्थिती कशी बदलत गेली, त्यामागे कुठल्या कुठल्या घटकांचा हात होता, कुणाच्या भेटींचे, बोलण्याचे कसे अर्थ निघाले, याची तपशीलवार नोंद पुस्तकात करण्यात आलेय. त्या काळी ज्यांनी उत्सुकतेने या घडामोडी बघितल्या, त्यांच्या आठवणींना उजाळा मिळतोच, शिवाय बरीच अतिरिक्त माहिती आणि पाहण्यातून निसटलेले धागेदोरेही इथे सापडू शकतात. माहीत असलेल्या सगळ्या घडामोडी अधिक तपशीलात आणि लेखकासह इतर अनेक अनुभवी पत्रकारांच्या मुलाखतींतूनही उलगडत जातात आणि हेच पुस्तकाचं वैशिष्ट्य आहे. पुस्तकात काही त्रुटीही आहेत. पडद्यामागे नेमकं काय घडलं, कसं घडलं, त्याची कारणं काय होती, याचा केवळ अंदाज काही पत्रकारांनी बांधला आहे आणि त्या संदर्भाने लेखकानं लिहिलं आहे. त्यांची स्वतःची मतं फार कमी ठिकाणी उमटलेली दिसतात. पडद्याआडच्या घडामोडीही जास्त ठळकपणे यायला हव्या होत्या. तसंच, कॉंग्रेसचा आधी असलेला ठाम नकार, मग सत्तेत सहभागी होण्यासाठीची धावपळ आणि हौस, या घटकाला तुलनेनं कमी महत्त्व मिळालं आहे. पराग पोतदार यांनी अनुवाद उत्तम आणि प्रवाही केला आहे. महाराष्ट्राच्या राजकारणाची दिशा बदलणाऱ्या या महत्त्वाच्या दस्तावेजाचं स्वागत करायला हवं. - अभिजित पेंढारकर. ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

RAZOR SHARP
RAZOR SHARP by ASHWIN SANGHI Rating Star
सुनील माने, पुणे

लेखक अश्विन सांघी “द रोझाबल लाइन” या पहिल्याच कादंबरीने खूप लोकप्रिय झाला. प्राचीन भारतीय दंतकथा/ऐतिहासिक संदर्भ घेऊन त्याच्याभोवती आजच्या काळात रहस्यपूर्ण कथा लिहिणारा अश्विन. Chanakya’s Chant, The Krishna Key, The Sialkot Saga, Keepers of the Kalacakra, The Vault of Vishnu, The Magicians of Mazda अशा एकापेक्षा एक सुंदर रहस्य कादंबर्या “भारत सिरीज़” नावाने खूप प्रसिद्ध झाल्या. या सर्व कादंबऱ्या मी इंग्लिश मधेच वाचल्या. यांचा मराठी अनुवाद मेहता पब्लिशिंग हाउस यांच्याकडे उपलब्ध आहे. अश्विन सांघीने या भारत सिरीज शिवाय एक नवीन थ्रिल्लर सिरीज (कुत्ता कदम) सुरू केली आहे. त्यांतील पहिली कादंबरी Razor Sharp. एक सिरियल किलर मुंबईत एकानंतर एक खून पाडतोय. पोलिस चक्रावले आहेत. 1. रविवार दि २ फेब्रुवारी , गोरेगाव पश्चिममधे रवि मेहराचा खून होतो. त्याची बायको खुशी कॅाल सेंटरचा जॅाब करून रात्री ११.३० ला परत येते. खूप वेळा बेल वाजवून दार न उघडल्यामुळे ती उघडून आत येते तर रवि रक्ताच्या थारोळ्यात मरून पडलेला असतो. त्याचे हात पाठीमागे नायलॅान दोरीने बांधलेले असतात. त्याच्या छातीत सुरा खुपसलेला असतो. त्याच्या तोंडात काहीतरी खाद्य पदार्थ असतो. 2. सोमवार दि १० फेब्रुवारी , लोअर परळमधे सुचंद्रा अग्रवालचा खून. तिची कामवाली आल्यावर दार न उघडल्यामुळे सोसायटीवाले दार तोडतात. आत सुचंद्राचा खून झालेला. हात नायलॅान दोरीने मागे बांधलेले, छातीमधे चाकू खुपसलेला, तोंडात काहीतरी खाद्यपदार्थ. पोलिस चक्रावलेले. मग पोलिसखाते जागे होते. त्यांचा नावाजलेला अधिकारी जो सस्पेंड झालेला आहे, त्या प्रकाश कदम, DCP याला बोलावले जाते. राज्याचे गृहमंत्री ओंकार लोखंडे, त्यांचा माणूस कमिशनर चव्हाण आणि उपगृहमंत्री जयंत गायकवाड व त्यांचा माणूस SCP राणे, मुंबईचा डॅान भाऊ पाटील जो लोखंडेचाच माणूस असतो, हे सर्व या केसच्या मागावर लागतात. कदम हा राणेंच्या ओळखीचा खास ऑफिसर असतो म्हणून त्यालाही इन्व्हेस्टीगेशनला बोलावले जाते. 3. मंगळवार दि १८ फेब्रुवारी , ठाणे येथे मंगला शहाचा खून. तिच्या शेजारणीमुळे हे कळते. मंगलाचे हात नायलॅान दोरीने पाठीमागे बांधलेले, छातीमधे चाकू खुपसलेला, तोंडात खाद्यपदार्थ. पोलिस अधिकारी शिंदे कदमबरोबर येतात. मंगलाच्या चेहऱ्याजवळ कदमला पेस्टिसाईडचा वास येतो. चेहरा निळसर झालेला. खून झाल्यावर बॅाडीला हलवलेले दिसते. तो ऑफिसमध्ये जुन्या खूनांचे फोटो तपासतो. त्यांचीही बॅाडी खून केल्यावर हलवलेली दिसते. चेहऱ्यावर निळसर झाक दिसते. तिन्ही खून “फिनेक” ब्रॅंडच्या चाकूने केलेले असतात. हे समान धागे कदम त्याची मुलगी केतुल बरोबर चर्चा करतो. केतुलची आई काही वर्षांपूर्वी कदमला सोडून गेलेली असते. ती भाऊ पाटीलची सावत्र बहीण असते. पण सध्या ती कुठे आहे व काय करते हे माहित नसते. केतुल कोर्टात काम करत असते तसेच ती “शक्ती” या NGO मधेही काम करते. शक्ती हे सोनापूरमधुन सुटका केलेल्या वेश्यांचे पुनर्वसन करत असते. निर्मल नावाचा तिचा मित्र एथिकल हॅकर असतो. तिच्यावर प्रेम करत असतो. कदमला हार्ट अटॅक येऊन गेलेला व स्टेंट बसवलेला असतो. Depression मुळे त्याची सायकॅालॅाजिस्टकडे ट्रिटमेंट चालू असते. कदमला या तिन्ही केसमधे आणखी एक धागा सापडतो. हे खून आठ दिवसांच्या अंतरावर झालेले असतात. म्हणजे पुढचा खून बुधवारी होणार असल्याचे तो राणे व शिंदेला सांगतो. 4. बुधवार दि २६ फेब्रुवारी, कांदिवली पश्चिम, लक्ष्मी बुधीराजाचा खून. तोच पॅटर्न. 5. गुरुवार दि ५ मार्च, खार पश्चिम, गुरुराज अदवानीचा खून सेम पॅटर्न. गुरूराज हा युट्युबवरचा प्रसिद्ध सिंगर असतो. 6. शुक्रवार दि १३ मार्च, ताडदेव, दिव्या शुक्रपाणीवर खूनी हल्ला होतो. पण ती जबर जखमी होते. ती फिटनेस ट्रेनर असल्यामुळे खुन्याबरोबर झटापट करते. पण चाकू पोटात घुसल्यामुळे ती जबर जखमी होते. हात बांधलेले असतानाही ती फोनवर “सिरी” ला तिच्या भावाला, ध्रुवला फोन लावायला सांगते. फोन लागतो व ती “हेल्प हेल्प” एव्हढेच बोलून बेशुद्ध होते. म्हणून खुनी पळून जातो. ध्रुव तिथे पोहोचून तिला हॅास्पिटलमधे ॲडमिट करतो. पोलिसांना तिथे खुन्याची बॅग सापडते. त्यांत नायलॅानची दोरी, बेगॅान स्प्रे व राजमाच्या बिया सापडतात. तिसऱ्या खुनाआधी पोलिस संशयित म्हणून राजू दाभाडेला अटक करतात. पण चौथ्या खूनाच्या वेळेस तो कस्टडीतच असतो. मग खूनी कोण? 7. शनिवार दि २१ मार्च, बान्द्रा पश्चिम, शनिया डिसौजाचा खून होतो. सेम मोडस ऑपरेंडी . 8. शनिवार दि २८ मार्च, चेंबूर, ७१ वर्षांच्या राहुल सिंह नावाच्या सिख व्यक्तिचा खून होतो. तीच पध्दत. यानंतर एक दिवस कदम KBC बघत असताना अमिताभ बच्चन एका सिनेमाचं गाणं लावून त्याचा पिक्चर ओळखायला सांगतात. ते गाणं असते- “सोमवार को हम मिले मंगलवार को नयन बुध को मेरी निंद खुली जुम्मेरात को चैन अरे शुक्र शनी कटे मुश्किलसे आज है इतवार सात दिनों में हो गया जैसे सात जनम का प्यार” आणि कदमच्या डोक्यात एकदम प्रकाश पडतो… अरे, हे सर्व खून असेच रविवार ते शनिवार एक एका वारी घडलेत! पण शनिवारी दोन खून कसे? याच्या मागे काही खगोलशास्त्र किंवा भविष्याचा तर संबंध नाही? कदमला आठवतं की शेजारी राहणारा डॉ. देसाईला पण भविष्य-खगोलशास्त्राची आवड व माहिती आहे. ( डॅाक्टर कडे सापडलेल्या नायलॅानचे रंगीत दोर व फिनेक कंपनीचा चाकू यामुळे एक संशयित म्हणून कदमने त्याला अटक करून पुछताछ केलेली असते) कदम लगेच डॅाक्टरांकडे जातो. त्यांची माफी मागून त्यांना या प्रश्नांत मदत करायला सांगतो. तो या सर्व खुनांचा सिक्वेन्स सांगतो. ते प्रत्येक वारी का घडले? मग शनिवारी दोन का? यापुढे कोणता वार? कुणाचा खून? डॅाक्टर सांगतात की भारतीय भविष्य व खगोल शास्त्रात नवग्रहांना खूप महत्व आहे. रवि, सोम(चंद्र), मंगळ, बुध, गुरू, शुक्र, शनि, राहू आणि केतु. यांचे रंग व धान्य वेगवेगळे असतात. त्या त्या ग्रहाला प्रसन्न करण्यासाठी ते वापरले जातात. कदम ही माहिती लिहून घेतो. त्यावरून प्रत्येक खुनात वापरण्यात आलेले फिनेक कंपनीचे चाकू, वेगवेगळ्या रंगांचे नायलॅान दोर व तोंडातील पदार्थ यांचा संबंध जोडून एक तख्ता तयार करतोः- “रवि मेहरा-रविवार-सोनेरी दोर- तोंडात गहू-दिशा पूर्व सुचंद्रा-सोमवार-चंदेरी दोर-तोंडात तांदूळ-दिशा पश्चिम मंगला शाह-मंगळवार-लाल दोर-तोंडात तूर डाळ- दिशा दक्षिण लक्ष्मी बुधीराजा-बुधवार-हिरवा दोर-तोंडात हिरवे मूग-दिशा उत्तर गुरुराज अदवानी-गुरूवार-पिवळा दोर-तोंडात हरबरा डाळ-दिशा उत्तर पूर्व(ईशान्य) दिव्या शुक्रपाणी-शुक्रवार-पांढरा दोर-राजमा-दिशा दक्षिण पूर्व शनिया डिसौजा-शनिवार-काळा दोर-तोंडात काळे तिळ-दिशा उत्तर पश्चिम राहुल सिंग-शनिवार-निळा दोर-तोंडात उडीद दाळ-दिशा दक्षिण पश्चिम” आता उरला एकच ग्रह-केतु. केतुचा वार मंगळवार. ग्रे रंग, चना दाळ, दिशा दक्षिण पश्चिम. “केतु”म्हणजे कदमची मुलगी केतुलचा नंबर लागणार? आज तर मंगळवारच आहे! कदम घाबरून जातो! तो केतुलला फोन करतो पण तो बंद लागतो. ती सध्या कुठे आहे? कोर्टात? कदम आपल्या मुलीला वाचवतो का? खरा खुनी कोण असतो? तो पकडला जातो का? त्याचे यामागचा उद्देश काय असतो? याच्यामध्ये अजून कोण सामिल असतं का? याची उत्तरे मिळण्यासाठी वाचावी लागेल अश्विन सांघी यांची कादंबरी Razor Sharp. ...Read more

BANGARWADI
BANGARWADI by VYANKATESH MADGULKAR Rating Star
Sameer Kazi

सुंदर अशी कादंबरी माणदेशी बनगरवाडी तशी कोरडी रखरखती पण, यातील पात्रात मायेचा करुणेचाओलावा मनात घर करुन जातो