* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: 35 DAYS:HOW POLITICS IN MAHARASHTRA CHANGED FOREVER IN 2019
  • Availability : Available
  • Translators : PARAG POTDAR
  • ISBN : 9789353174774
  • Edition : 2
  • Publishing Year : AUGUST 2020
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 212
  • Language : Translated From ENGLISH to MARATHI
  • Category : POLITICS & GOVERNMENT
  • Available in Combos :JITENDRA DIXIT BIRTHDAY OFFER
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
IN 2019, A HIGH-VOLTAGE POLITICAL DRAMA UNFOLDED OVER THIRTY-FIVE DAYS BETWEEN THE DECLARATION OF THE MAHARASHTRA ASSEMBLY ELECTION RESULTS AND THE FORMATION OF THE SHIV SENA-NCP-CONGRESS GOVERNMENT IN THE STATE. THE STARTLING EVENTS THAT HAD THE ENTIRE COUNTRY GLUED TO TELEVISION SCREENS CULMINATED IN THE SWEARING IN OF UDDHAV THACKERAY AS CHIEF MINISTER ON 28 NOVEMBER 2019. THIS BOOK IS A BLOW-BY-BLOW ACCOUNT OF THE UPS AND DOWNS THAT TOOK PLACE DURING THOSE THIRTY-FIVE DAYS THAT BAFFLED EVEN HARDCORE POLITICAL PUNDITS. THE GOINGS-ON UNMASKED ALMOST ALL PARTIES AND POLITICIANS OF THE STATE AND CHANGED MAHARASHTRA`S POLITICS FOREVER. WITH EXCLUSIVE REPORTAGE AND INTERVIEWS FROM CLOSE OBSERVERS OF THE WHOLE DRAMA, 35 DAYS GOES BEHIND THE SCENES TO RECONSTRUCT WHAT TOOK PLACE DURING THE MAHARASHTRA ELECTIONS 2019.
महाराष्ट्र विधानसभेच्या २०१९च्या निवडणुकांचे निकाल लागण्यापासून ते शिवसेना-राष्ट्रवादी काॅंग्रेस- काॅंग्रेस आघाडी प्रेणित सरकार स्थापनेपर्यतचा ३५ दिवसांचा काळ म्हणजे जणू एका महानाट्याचा काळ होता. २८ नोव्हेंबर २०१९ रोजी उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेईपर्यंतच्या लक्षवेधी घटनांनी जनतेला टीव्ही माध्यमांशी अक्षरशः चिकटवून टाकले होते. राजकीय पंडितांनाही अचंबित करणारे या ३५ दिवसातले चढउतार या पुस्तकात संगतवार विस्ताराने समोर येतात. महाराष्ट्राच्या राजकारणाचा चेहरामोहरा बदलण्यासोबतच या काळाने सर्वच राजकीय चेहऱ्यांचे नकाब उतरवले. या विलक्षण रिपोर्ताजमध्ये या नाट्यात सहभागी असलेले आणि याचे साक्षीदार असलेल्यांच्या मुलाखतींच्या माध्यमातून पडद्यामागच्या नाट्याचा चेहराही स्पष्ट होतो.

No Records Found
No Records Found
Keywords
#35DAYS #MAHARASHTRAPOLITICS #JITENDRADIXIT #UDDHAVTHACKREY #DEVENDRAFADANVIS #SHARADPAWAR #MAHARASHTRAASSEMBLY2019 #PARAGPOTDAR #MARATHITRANSLATIONS #ONLINEBOOKS #POLITICAL #MEHTAPUBLISHINGHOUSE #३५दिवस #महाराष्ट्रराजकारण #जीतेंद्रदीक्षित #परागपोतदार #उद्धवठाकरे #देवेंद्रफडणवीस #शरदपवार #महाराष्ट्रविधानसभा #मराठीअनुवाद #आॅनलाईनपुस्तके #राजकीय #मेहतापब्लिशिंगहाऊस
Customer Reviews
  • Rating Starलोकसत्ता २८/११/२०२०

    जितेंद्र दीक्षित यांचे `३५ डेज : हाऊ पॉलिटिक्स इन महाराष्ट्र चेंज्ड फॉरेव्हर इन २०१९` हे पुस्तक म्हणजे एखाद्या सामन्याच्या समालोचनासारखे आहे. पूर्वी आतासारखा टीव्ही घराघरांत नसल्याने व प्रत्येक सामन्याचे थेट प्रक्षेपण होत नसल्याने आद्ल्या दिवशीच्यासामन्याचे डोळ्यांसमोर चित्र उभे राहील असे वर्णन त्याच्या विश्लेषणासह वाचकांसमोर मांडण्याचे कौशल्य आदल्या पिढीच्या क्रीडापत्रकारांमध्ये होते. त्यातून सामना पाहिल्याचा आनंद वाचकांना मिळत असे. दीक्षित यांच्या पुस्तकाचा ढाचा तसा आहे. सहजसोपी व ओघवती भाषाशैली हि त्यांच्या पुस्तकाची मोठी ताकद आहे. ज्यांनी या सत्तांतराचा काळात त्याबाबतच्या बातम्या, मुलाखती फारशा पाहिल्या नाहीत किंवा अजिबात पाहिल्या नाहीत, त्यांच्यासाठी त्या सार्वजनिक माहितीचे संकलन व त्याचे विश्लेषण या पुस्तकातून एका ठिकाणी उपलब्ध होते. एकूण १७ प्रकरणांमधून त्यांनी या सत्तांतराची कहाणी कथन केली आहे. भाजप- शिवसेना युती तुटण्यासाठी पाश्र्वभूमी तयार करणाऱ्या घटनांचा चांगला आढावा दीक्षित यांनी घेतला आहे. मुंबई महापालिका शिवसेनेच्या ताब्यातून खेचण्याचे प्रयत्न व आरे कारशेडच्या निमित्ताने पर्यावरणाचा विषय घेऊन पुढे आलेल्या आदित्य ठाकरे यांच्या मागणीकडे दुर्लक्ष करत ठाकरेंच्या नव्या पिढीच्या खच्चीकरणाच्या भाजपच्या खेळीमुळे ठाकरे कुटुंबाच्या मनावर कसा ओरखडा उमटला, याची `मार्मिक` नोंद या पुस्तकात आहे. त्यातून निकालानंतर सत्ता आलेली असतानाही भाजपबरोबर राहण्यापेक्षा वेगळा विचार करण्याचा निर्णय शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी कसा घेतला, यासारख्या प्रश्नांची उत्तरे समजण्यास मदत होते. पुस्तकाचा समारोप राज ठाकरे यांच्यावरील प्रकरणाने करून दीक्षित यांनी या सत्तांतराचा परिणाम म्हणून राजकारण कोणत्या दिशेने जाणार यावर बोट ठेवले आहे. `मराठी व हिंदुत्वादी` हि शिवसेनेची ओळख आता धुरकट करून ती जागा राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने व्यापावी अशा रीतीने वाव देत भाजपा नवीन युतीकडे वाटचाल करत असल्याचे सूतोवाच दीक्षित यांनी केले आहे. त्या दृष्टीने, गेल्या वर्षभरात मनसेची वाटचाल कशी झाली, याचा विचार महाराष्ट्रीय वाचक आपसूकच करू लागतील. ...Read more

  • Rating StarAbhijeet Pendharkar

    महाराष्ट्रात गेल्या वर्षी सत्तास्थापनेसाठी जे नाट्य रंगलं, ते एखाद्या थ्रिलरमधल्या नाट्यालाही मागे टाकेल, एवढ्या ताकदीचं होतं. या 35 दिवसांत महाराष्ट्राच्या जनतेला राजकारणातले नवरस आणि डावपेचांचे सगळे प्रकार बघायला मिळाले. पडद्यासमोर आणि पडद्याआड घडणऱ्या घडामोडींची नोंद घेणारं `35 days` हे पुस्तक जीतेंद्र दीक्षित यांनी लिहिलं आहे. मेहता प्रकाशनाने हे पुस्तक मराठीत आणलं असून, पराग पोतदार यांनी त्याचा अनुवाद केलाय. विधानसभा निवडणुकीचे अनपेक्षित निकाल, त्यात कुठल्याच एका पक्षाला स्पष्ट कौल न मिळणं आणि निकाल जाहीर झाल्या झाल्या सुरू झालेलं वर्चस्वाचं आणि मानापमानाचं राजकारण, इथून पुस्तकाची सुरुवात होते. ही कादंबरी नाही, त्यामुळे लेखकानं जे जनतेसमोर घडलं, तेच क्रमानं आणि वस्तुनिष्ठपणे मांडण्याचा प्रयत्न केला आहे. त्याचवेळी पडद्यामागे सुरू असलेल्या घडामोडींची माहितीही देण्याचा प्रयत्न केला आहे. भाजप-शिवसेना युती असतानाही शिवसेनेची मनःस्थिती कशी बदलत गेली, त्यामागे कुठल्या कुठल्या घटकांचा हात होता, कुणाच्या भेटींचे, बोलण्याचे कसे अर्थ निघाले, याची तपशीलवार नोंद पुस्तकात करण्यात आलेय. त्या काळी ज्यांनी उत्सुकतेने या घडामोडी बघितल्या, त्यांच्या आठवणींना उजाळा मिळतोच, शिवाय बरीच अतिरिक्त माहिती आणि पाहण्यातून निसटलेले धागेदोरेही इथे सापडू शकतात. माहीत असलेल्या सगळ्या घडामोडी अधिक तपशीलात आणि लेखकासह इतर अनेक अनुभवी पत्रकारांच्या मुलाखतींतूनही उलगडत जातात आणि हेच पुस्तकाचं वैशिष्ट्य आहे. पुस्तकात काही त्रुटीही आहेत. पडद्यामागे नेमकं काय घडलं, कसं घडलं, त्याची कारणं काय होती, याचा केवळ अंदाज काही पत्रकारांनी बांधला आहे आणि त्या संदर्भाने लेखकानं लिहिलं आहे. त्यांची स्वतःची मतं फार कमी ठिकाणी उमटलेली दिसतात. पडद्याआडच्या घडामोडीही जास्त ठळकपणे यायला हव्या होत्या. तसंच, कॉंग्रेसचा आधी असलेला ठाम नकार, मग सत्तेत सहभागी होण्यासाठीची धावपळ आणि हौस, या घटकाला तुलनेनं कमी महत्त्व मिळालं आहे. पराग पोतदार यांनी अनुवाद उत्तम आणि प्रवाही केला आहे. महाराष्ट्राच्या राजकारणाची दिशा बदलणाऱ्या या महत्त्वाच्या दस्तावेजाचं स्वागत करायला हवं. - अभिजित पेंढारकर. ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

HATUMUTUCHA CHANDRA
HATUMUTUCHA CHANDRA by FARUK KAZI Rating Star
परेश जयश्री मनोहर

मराठी बालसाहित्याचा गेल्या काही दशकांचा अवकाश हा सातत्याने प्रबोधनपर, उद्बोधनपर आणि कोणत्याही कथेच्या शेवटी एका वाक्यात तात्पर्य सांगणाऱ्या बाळबोधकथांचा राहिलेला आहे. या बाल साहित्यामध्ये प्रामुख्याने येणारे पात्र ही मध्यमवर्गीय, उच्च जातीय मराठी घरतील मुलं मुली असतात आणि जेव्हा केव्हा वंचित समाजातील, शोषित समाजातील, गरीब ग्रामीण घरातील मुलांचे चित्रण येतं तेव्हा ते अति दुःखी आणि बिचारे, ज्यांना मदतीची गरज आहे आणि अशी मदत करण्याची जबाबदारी मोठ्या घरातील उच्चवर्णीय, उच्चवर्गीय नायक मुला मुलींची असते. त्यातूनही प्रामुख्याने काय करावे काय करू नये किंवा तत्सम उपदेशच प्रामुख्याने कथेच्या शेवटी केलेले दिसतात. आणि हा लेखक वर्ग ही प्रामुख्याने पुणे मुंबई भागात स्थिरावलेला राहणारा तिथल्या अनुभूती आणि तिथल्या जगण्याचा अवकाश सोबत घेऊन येणारा असतो. अशा सगळ्या पार्श्वभूमीवरती सोलापूर जिल्ह्यातल्या सांगोला तालुक्यात अनकढाळ सारख्या एका छोट्या गावात राहणारा फारुक काझी हा लेखक जेव्हा गेलं दशकभर कवितांमधून, कथांमधून बालविश्व चितारण्याचा प्रयत्न करतो तेव्हा ते जास्त करून ग्रामीण भागातील मातीशी जोडलेलं असतं. आपल्या भोवतालच्या खऱ्याखुऱ्या मुलांमुलींच्या भावविश्वाच्या जवळ जाणारं चित्रण त्याच्या कथांमधून आपण सातत्याने बघत असतो. त्याचे "शिकण्याच्या वाटेवरील आनंदवन" हे पहिले पुस्तक एका प्रयोगशील शिक्षकाच्या शाळेतील अनुभवांवर आधारलेले आहे. त्यांचे आजवर मित्र, प्रिय अब्बू, चुटकीचे जग हे कथासंग्रह प्रकाशित झालेले आहेत. या सगळ्याच पुस्तकातून त्याने सातत्याने ग्रामीण, निमशहरी भागातील कनिष्ठ मध्यमवर्गीय आणि गरीब कुटुंबातील बहुजन आणि वंचित घटकातील, मुस्लिम कुटुंबातील मुलांच्या नजरेने दिसणाऱ्या गोष्टी टिपण्याचा प्रयत्न केलेला आहे. यात कुठेही गरिबीचे गोडवे नाहीत की काठोकाठ पसरलेलं बिचारेपण नाही. तर या आर्थिक दृष्ट्या नागवलेल्या लोकांच्या घरातील मुलांच्या कथा आहेत, ज्यात प्रेम, उत्सुकता, जिद्द, समजून घेणे आणि अनुभवातून आलेलं शहाणपण हे प्रामुख्याने जाणवते. अभावग्रस्तता, एखाद्या गोष्टीचे नसणे, तरीही नातेसंबंधांवरील विश्वास, प्रेम आणि एकमेकांबद्दलचा आदर, काळजी घेऊन जपणारी कुटुंबं फारुकच्या लिखाणात सातत्याने येत राहतात. त्याचा आत्ता आलेला हाटूमुटूचा चंद्र हा एक अफलातून कथासंग्रह आहे. यामध्ये फारुकने वेगवेगळे प्रयोग केलेले आहेत जे त्याच्या नेहेमीच्या लेखन शैलीपेक्षा जरा वेगळ्या अंगाने जाणारे आहेत आणि ते उत्तम जमून आलेले आहेत. या दहा कथांमधल्या पहिल्या तीन कथा या मुलांच्या नजरेतून होणारा पर्यावरण विनाश, निसर्गाची भाषा समजून घेण्याचा मुलांचा प्रयत्न आणि नुसते समजून घेणे नाही तर मुलानी आपले हे जग आपण नीट ठेवण्यासाठी केलेले प्रयत्न असे ही आहे. यात आनंद शोधण्याचे मार्ग, जबाबदारीचे असणारे भान आणि काल्पनिक ग्रहाची भेट करवून आणणारी समायरा आपल्याला भेटते, तर मोकळ्या हवेत असणारा आनंद भरुन कसा घेणार असा प्रश्न विचारणारा अर्पित ही भेटतो आणि तसेच टेकडी स्वच्छ करण्यासाठी न थकता प्रयत्न करणारे ओजस आणि रेहान ही भेटतात. लहानपणी न कळत्या वयात चिंचेवरच्या माकडाला तोटा फेकून मारणारा आणि त्या माराची मनावर झालेली जखम मोठा झाल्यावरही मनावर कोरलेला योगेश, आपल्या लाडक्या लहानग्या मैत्रिणीसाठी व्याकुळ होऊन रोज दारावर धडका देणारे शाहताब अस्वल आपल्याला अस्वस्थ करुन जातात. एका कथेत तर चक्क सायकल ही कथेची नायिका आहे आणि तिच्या सुखाच्या आणि नाराज होण्याच्या अनुभवातून आपणही तिच्यासोबत प्रवास करतो. इथे आपण बाबांच्या अपघाताने अस्वस्थ असणाऱ्या सारंगा सोबत त्या दवाखान्याच्या बाहेर येरझारा घालत असतो आणि अमृताच्या मैतरासोबत मेंढक्या बनून रानावनात चालत असतो. गावात फिरताना, गावाला पडणारं हिरवं स्वप्न अनुभवणारा मंदार आपल्या भेटतो आणि सोबतच गावात राहणारी आणि तुमच्या शहरालाही स्वप्न पडतच असेल की रे? काय असेल ते स्वप्नं? असा प्रश्न विचारणारी चंदा हाच प्रश्न आपल्यालाही विचारते असा भास आपल्याला होतोच होती. शाळेच्या ट्रीपला जायला हजार रुपये नाहीत म्हणून रुसलेल्या साक्षीला बघताना आपणही आपल्या लहानपणी अशा बुडालेल्या शाळेच्या सहली, आणि त्यावेळी आपल्या आईबाबांनी आपल्याला काय सांगितलं होतं आणि कशी आपली समजूत काढलेली हे आठवून आपलेही डोळे ओलसर होताना अनुभवतो. पण याही कथेत निंबोणीच्या पानांमधून दिसणारा, भासणारा तो चंद्र जो हाटूमुटूचा आहे पण त्याला बघून होणारा आनंद मात्र अस्सल आणि खराखुरा आहे. या सगळ्या कथांमधून फारुक ने आजच्या मुलामुलींना आपल्यासमोर उभं केलं आहे, त्यांचे प्रश्न, त्यांच्या विचार करण्याच्या पद्धती आणि त्याचं अस्वस्थ असणं अगदी नेमकेपणाने आपल्यासमोर येतं. ही मुलं कोणत्याही एका शहरातली, एका भागातली किंवा एकसारख्या घरातली नाहीत पण त्यांचे जगणे हे आजच्या मुलांचे जगणे आहे. फक्त एक प्रश्न मनाला पडतो की आपल्या भोवतालच्या प्रश्नांनी, आपल्या गरिबीने किंवा अभावाने काळवंडलेली मुलं जेव्हा समजूतदारपणे स्वतः शहाणे बनत पुढे निघतात तेव्हा, ही सगळं कोणामुळे, आणि माझ्याच वाट्याला का? याचे जबाबदार कोण असा एखादा प्रश्न एकाही मुलाला पडू नये याची काळजी वाटते. येत्या काळात फारुक च्या कथांतील ही मुलं तुम्हाला मला हे प्रश्न विचारतील याची खात्री आहे आणि मी त्या दिवसाची वाट ही बघतो आहेच. या पुस्तकातील चित्रांचा विशेष उल्लेख करणे फारच महत्वाचे आहे. चंद्रमोहन कुलकर्णी ज्या ताकदीने कथेची भावना नेमक्या कुंचल्यात पकडतात ते बघताना आपण निव्वळ थक्क होतो. इतकी सुंदर आणि मनाला धरुन ठेवणारी चित्रं या पाना आपल्याला भेटत राहतात. इतक्या ताकदींच्या कथांचे पुस्तक मेहता प्रकाशनाने अत्यंत प्रेमाने आणि उत्तम निर्मितीमूल्य जपत काढलेले आहे. आज आपला भोवताल इतका जातधर्म, पर्यावरणीय नाश आणि भविष्याच्या चिंतांनी कुरतडलेला असताना अशा खऱ्याखुऱ्या मुलांच्या कथा आपल्यासमोर येणं हाच आपल्याला दिलासा देणारा आपला हाटूमुटूचा चंद्र आहे...हा असाच राहो... परेश जयश्री मनोहर ...Read more

HATUMUTUCHA CHANDRA
HATUMUTUCHA CHANDRA by FARUK KAZI Rating Star
बालाजी मदन इंगळे

संवेदनशीलतेने लिहिलेल्या तरल बालकथा : हाटुमुटूचा चंद्र मराठीमध्ये जाणीवपूर्वक आणि विचारपूर्वक बालसाहित्य लिहिणाऱ्यांची संख्या खूप कमी आहे. बालसाहित्य आणि बाल मानसशास्त्र यांचा विचार करून आपली प्रतिभा त्यासाठी वापरणाऱ्या मोजक्या बालसाहित्यिकांमध्य फारूक एस. काझी यांचे नाव समाविष्ट करावे लागेल. त्यांच्या नुकत्याच प्रकाशित झालेल्या मुलांसाठीच्या ‘हाटूमुटूचा चंद्र’ या कथासंग्रहातून ही बाब ठळकपणे अधोरेखित होते. कथा म्हणजे केवळ प्रसंगानंतर प्रसंग किंवा घटनेनंतर घटना मांडणे नसते. त्यामध्ये लेखकाच्या प्रतिभेने वास्तव आणि कल्पना यांचा सुरेख संगम घडवून आणावा लागतो. कुठलीही कथा लेखकाला त्याच्या अनुभव विश्वातूनच सापडलेली असते. पण ते अनुभव विश्व मांडत असताना त्यात आपल्या प्रतिभेने काही साहित्य गुण समाविष्ट करावे लागतात. तेव्हा ती कथा साहित्यिकदृष्ट्या अभिजात व साहित्य गुणांनी युक्त अशी कथा होते. या संग्रहातील कथांमध्ये अशा साहित्यिक प्रतिभांच्या बऱ्याच जागा आहेत. आणि म्हणूनच फारूक एस. काझी यांच्या कथा रोजच्या जगण्यातीलच असल्या तरी त्यातील साहित्य गुणांमुळे या कथा आपले वेगळेपण सिद्ध करतात. कथेमध्येही काव्यात्मकता असते. प्रतिकात्मकता असते. आणि त्यामुळेच ती कथा वैश्विक ठरत असते. हे सर्व गुण ‘हाटुमूटुचा चंद्र’ मधील कथांमध्ये आढळून येतात. म्हणून ही कथा महत्त्वाची आहे. अद्भुतरम्यता, काल्पनिकता आणि धक्का तंत्र याने लिहिलेल्या कथा नेहमीच मुलांना आवडतील असे नाही. आपल्याच अवतीभवती घडणाऱ्या घटना इतक्या सुंदर असू शकतात हे मुलांना वाचायला आवडते. नेमके तेच या कथांमध्ये आहे. या बालकथा या मातीतल्या आहेत. या संस्कृतीतल्या आहेत. म्हणून त्या महत्त्वाच्या आहेत. या संग्रहात एकूण दहा कथा आहेत. सर्वच कथा सुंदर आणि हृदयस्पर्शी आहेत. ‘फिकर नॉट’ या कथेमध्ये दोन मित्रांचे काही प्रसंग आहेत. रेहान आणि त्याचा मित्र अर्पित. दोघे एका टेकडीवर जातात. रेहानसाठी टेकडीवरील अनुभव नवीन असतो. दोघे खूप गप्पा मारतात. तळ्यात पाय सोडून बसतात. तिथे बसल्यानंतर त्या तळ्यातील काही मासे आपण बाटलीत घेऊन जावे असे रेहानला वाटते. पण अर्पित त्याला सांगतो की आपण या टेकडीवरून काय घेऊन जायला हवं तर या टेकडीवरील वातावरण, टेकडीवरील दृश्य, इथे आपण घेतलेला आनंद हे सगळे मनात भरून घेऊन जायला हवे. असं मुक्या प्राण्यांना त्रास द्यायचा नाही, हे नकळतपणे तो रेहानला सांगतो. रेहानलाही ते पटतं आणि मग तो खोल श्वास घेऊन इथल्या सगळ्या आनंदाच्या आठवणी मनात भरून घेतो. आणि निघतो. एखादा कोणी अन्य बालकथा लेखक असता तर या दोघांचं बोलणं, टेकड्यावरील वर्णन, दोघांनी केलेली मज्जा, त्यांनी केलेल्या गमती याचे वर्णन करून कथा संपवली असती पण फारूक काझी यांनी इथून काय घेऊन जायचं? हे लिहून जे एक नवीन वळण कथेला दिलेले आहे, इथेच या कथेतील साहित्यगुणाची जागा आहे. तिथेच कथा लेखक म्हणून फारूक काझी यांची प्रतिभा आपल्याला दिसून येते. आणि बालसाहित्यिक म्हणून त्यांचं वेगळेपणही इथेच आपल्याला दिसतं. ‘कर के देखो’ या कथेमध्ये ट्रेकला गेलेली मुले स्वच्छता दूत कशी बनतात हे मुळातून वाचण्यासारखे आहे. ‘जखम’ या कथेमध्ये इयत्ता तिसरीत शिकत असताना एका माकडीनीला आपण इजा पोहोचवल्याचं मोठं झाल्यावर कथेतील नायकाला आठवतं. आणि तो मोठा असूनही लहानांसारखं रडत रडत ती चूक आपल्या आईकडे कबूल करतो. ही कथा वाचताना पाषाणहृदयी माणूसही भावनिक होऊन जातो. कडूनिंबाच्या झाडाचे खाली पडलेले पान चंद्राची प्रतिमा म्हणून म्हणजेच हाटुमूटुचा चंद्र म्हणून कथेत वापरणे. आणि तो चंद्र कथेतील साक्षीच्या चेहऱ्यावर आनंदाचे प्रतिक म्हणून येणे. आणि त्याद्वारे सहलीला जाण्यासाठी पैसे न मिळाल्याच्या दुःखातून स्वतःला सावरणे ही सगळीच मांडणी भन्नाट झाली आहे. अशा भरपूर जागा या पुस्तकांमध्ये आहेत. ‘हिरवं सपान’ या कथेमध्ये शहरातला मंदार गावाकडे येतो. आणि गावातील चंदा सोबत शेत-शिवारात फिरतो. या शेत-शिवारातील भरपूर झाडे पाहून बी, रोपटं, मग त्याचं झाड ही क्रिया किती महत्त्वाची आहे. आणि या क्रियेचं स्वप्न नेहमीच गावाला पडतं. तसंच हिरवं स्वप्न शहराला का पडत नाही? हा प्रश्न खरंतर लहान-मोठ्या प्रत्येक वाचकाला अस्वस्थ करून जातो. ‘स्वप्न’ ही आणखी एक सुंदर कथा या संग्रहामध्ये आहे. माणसाला अभावातूनच वस्तूंची किंमत कळत असते. ज्याच्याकडे सर्व काही आहे अशा मुलाकडे जेव्हा सायकल येते, तेव्हा तिची काळजी घेतली जात नाही. पण स्वप्नातही ज्याच्या कधी सायकल मिळेल असं वाटत नव्हतं अशा अंकितला जेव्हा सायकल मिळते, तेव्हा तो तिची किती काळजी घेतो आणि हेच त्या सायकलचे स्वप्न होते. आणि अंकितचेही तेच स्वप्न होते ही स्वप्नांची सरमिसळ वाचकांना खूपच आवडून जाते. ‘मैतर’ ही आणखीन एक अनोळखी नातेसंबंध घट्ट करणारी कथा. फक्त काही दिवसांसाठी आलेल्या मेंढक्या काकाची आणि अमृत ची मैत्री होते. आणि ती मैत्री त्या दोघांमध्ये इतकी घट्ट होते की, मेंढक्या काका आपली मेंढरं घेऊन परत निघाल्यावर दोघांनाही एकमेकांचा निरोप घ्यावा असे वाटत नाही. निरोपावेळी दोघांच्याही डोळ्यात पाणी येते. दोघेही निरोपावेळी एकमेकांना भेटवस्तू देतात. हा प्रसंग लेखकाने स्थानिक संदर्भ, संस्कृती, भाषा आणि चित्रदर्शी स्वरूपात असा उभा केला आहे की, वाचक कथा संपली तरी त्या मेंढरांच्या कळपामध्ये आणि अमृतच्या घराच्या आसपासच घुटमळत राहतो. ‘जाऊ दे त्याला’ ही आणखीन एक भावस्पर्शी कथा. जंगली प्राण्यांनाही जीव लावला तर ते माणसांशी प्रेमाने वागतात हे सांगणारी ही कथा वाचकाच्या काळजाचा ठाव घेते. निधी आणि फॉरेस्ट ऑफिसर असलेले तिचे बाबा यांची ही कथा जंगलाच्या दुनियेत वाचकाला घेऊन जाते. पण तिथेही मानवी भावना कशी श्रेष्ठ ठरते हे अतिशय रंजक पद्धतीने लेखकाने लिहिले आहे. ‘बाबांची भाषा’ ही आणखी एक हृदयाला स्पर्श करणारी कथा! शाळेत शिकणारा सारंग अपघातात ऐकणं आणि बोलणं कायमचं गमावलेल्या आपल्या बाबांसाठी हातवाऱ्याची भाषा शिकून घेतो. हे जेव्हा वाचकाला कळतं तेव्हा वाचक जागच्याजागी स्थिर होऊन जातो. ‘एस पी १३’ ही आधुनिक तंत्रज्ञानात घेऊन जाणारी कथा! छोटीशी समायरा स्पेसशीप घेऊन एका नव्या प्लॅनेटवर जाते. आणि त्या नव्या प्लॅनेटवर असलेली माणसं कशी निसर्गाची काळजी घेतात हे पाहून समायरा तिथेच राहण्याचा निर्णय घेते. तेव्हा तिच्या सायंटिस्ट मामासह वाचक ही अचंबित होऊन जातात. निसर्ग आणि आधुनिक तंत्रज्ञान यांचा सुरेख आणि अफलातून संगम या कथेमध्ये लेखकाने घडवून आणला आहे. या पुस्तकाची महत्त्वाची बाजू म्हणजे यातील चित्रे! चंद्रमोहन कुलकर्णी यांची चित्रे या कथेला एक वेगळा आणि नवा आयाम देतात. ही चित्रे या कथेशी एवढी एकरूप झालेली आहेत की ही चित्रे वेगळी काढली तर या कथा अपूर्ण वाटतील! कथेला अनपेक्षित वळण देण्यामध्ये लेखक पटाईत आहेत. हे प्रत्येक कथेतून आपल्याला जाणवतं. आपण सरळ कथा वाचत जातो. आणि कथा देखील आता सरळ या वाटेने जाईल असे वाटत असताना ती कथा असं काही वळण घेते की वाजक स्तंभित होऊन जातो. आणि हीच खरे तर फारूक एस. काझी यांची खरी ताकद आहे. त्यांच्या सर्व कथांमधील पात्र आणि त्यांची नावे पाहिली तर ती विशिष्ट अशी पात्रे किंवा नावे नाहीत. तर सर्वसमावेशक अशी सर्व पात्रे आहेत. त्यामुळे किती तीव्र सामाजिक भान लेखकाला आहे हेही आपल्याला जाणवते. आजच्या सोशल मीडियाच्या काळात नातेसंबंध दूरावत असताना, नातेसंबंध दृढ करणाऱ्या या कथा प्रत्येक वाचकांपर्यंत पोहोचल्या पाहिजेत. या कथांमध्ये कल्पनाशक्ती आहे. वास्तवता आहे. पण याच्या जोडीला कथालेखक म्हणून जी एक संवेदनशीलता लागते, जी एक तरलता लागते आणि मुलांच्या कथांमध्ये जो एक हळुवारपणा आणि नाजूकता आवश्यक असते ते सगळे गुण या कथेमध्ये ओतप्रोत भरलेले आहेत. म्हणून या कथा फक्त लहानच नाही तर मोठ्यांनाही गुंतवून ठेवणाऱ्या आहेत. स्थळ आणि काळानुसार बदलणारी भाषा आणि प्रसंगानुसार बदलणारं वर्णन या कथेच्या जमेच्या बाजू आहेत. यामुळे या कथा वाचकाला पकडून ठेवतात. आणि काही एक सामाजिक भान आणि साहित्यिक जाण या कथा देतात. आणि हेच या कथेचे मोठे यश आहे. - बालाजी मदन इंगळे ...Read more