* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: FALLING OVER BACKWARDS
  • Availability : Notify Me
     
  • Translators : ASHOK PADHYE
  • ISBN : 9788184984804
  • Edition : 1
  • Publishing Year : JUNE 2013
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 456
  • Language : Translated From ENGLISH to MARATHI
  • Category : POLITICS & GOVERNMENT
  • Available in Combos :ARUN SHOURIE COMBO SET-11 BOOKS
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
METHODICAL RESEARCH RARELY LENDS ITSELF TO PASSIONATE WRITING. BUT INFALLING OVER BACKWARDS, ARUN SHOURIE SEEKS TO COMBINE FACTS, FIGURES, STATEMENTS AND JUDGEMENTS WITH THE ARGUMENTATIVE RHETORIC OF A PROPAGANDIST. THE RESULT IS AN EMINENTLY READABLE BOOK. RESERVATIONS IN JOBS AND EDUCATION HAVE ALWAYS BEEN A CONTENTIOUS ISSUE. EVER SINCE PRIME MINISTER V.P. SINGH UNLEASHED THE MANDAL COMMISSION REPORT IN 1989, THE ISSUE OF RESERVATIONS HAS BEEN HOTLY DEBATED ACROSS INDIA`S SOCIAL AND POLITICAL SPECTRUM. BUT HAVE RESERVATIONS REALLY SERVED THE PURPOSE THEY WERE INTENDED FOR? INFALLING OVER BACKWARDS, ARUN SHOURIE, WITH CHARACTERISTIC ATTENTION TO DETAIL AND METICULOUS RESEARCH, POINTS TO THE TRUTH ABOUT RESERVATIONS: THAT THEY ARE A SLEIGHT OF HAND OF THE POLITICIAN. HE ALSO TAKES APART PRORESERVATION JUDGEMENTS OF THE SUPREME COURT AND, IN THE PROCESS, BARES THE LARGER DANGER THEY PORTEND, THE DANGER TO THE ONE DYKE THAT HAS SAVED US THUS FAR, THE DOCTRINE OF THE BASIC STRUCTURE ITSELF. TRACING THE HISTORY OF RESERVATIONS FROM THE CONSTITUENT ASSEMBLY DEBATES TO THE LATEST JUDGEMENTS,FALLING OVER BACKWARDSIS A STINGING REJOINDER TO THOSE WHO ADVOCATE RESERVATIONS AS THE PANACEA FOR ALL THE ILLS THAT PLAGUE THE NATION.
तपशीलवार, शिस्तबद्ध व तथ्यांनी युक्त असे संशोधनात्मक लिखाण हे बरेचदा वाचनीय नसते. परंतु या पुस्तकात अरुण शौरी यांनी तथ्य, आकडेवारी, विधाने आणि निकाल यांवरचे भाष्य कौशल्याने कथन केले आहे. ‘नोकरी आणि शिक्षण या क्षेत्रांमधले आरक्षण’ हा विषय कैक वर्षे विवादास्पद आहे. १९८९मध्ये पंतप्रधान व्ही.पी. सिंग यांनी मंडल आयोगाचा अहवाल उचलून धरल्यापासून आरक्षण हा विषय भारताच्या सामाजिक, तसेच राजकीय क्षेत्रांत वादग्रस्त ठरला आहे. परंतु खरेच त्यामुळे आरक्षणामागचा मूळ हेतू साध्य झाला आहे का? या पुस्तकात शौरी हे खोलात संशोधन करून आरक्षणासंदर्भातल्या एकेका तपशिलाकडे लक्ष वेधतात आणि त्यांची मते मांडतात. यासोबतच ते सुप्रीम कोर्टाचे आरक्षणाच्या बाजूने दिलेले निकाल व त्यांचे विश्लेषण वाचकांसमोर ठेवतात. भारतीय समाजाला लागलेल्या जातिभेदाच्या रोगावरचा आरक्षण हा उपाय आहे, असे मानणायांसाठी हे पुस्तक म्हणजे सणसणीत टोला आहे.
महाराष्ट्र ग्रंथोत्तेजक संस्था पुरस्कार २०१६- आर.बी.भिडे परितोषिक
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
# GOVERNANCE #HESARVAAPALYALAKOTHEGHEVUNJANAR #MAGILPANAVARUNMAGECH #KALELKATYALAAAICHEMAN #ARUNSHOURIE #THEPARLIMENTARY SYSTEM #TRANSLATEDBOOK #ASHOKPATHARKAR #GOVERNENCE #VALVIGRASTAVRUKSHALAKATERIKUMPANVACHAVUSHAKELKA? #KALELKATYALAAAICHMAN #HESARVAAPALYALAKOTHEGHEVUNJANAR?
Customer Reviews
  • Rating StarKrishna Kamthe

    आरक्षण विषयात अभ्यास करणाऱ्या साठी हे पुस्तक नक्की वाचा. न्याय संस्थेला कसे खेळवण्यात आले आणि राजकारणा साठी आरक्षणाचा कसा वापर करण्यात आला ते कळेल. याचबरोबर पुरोगामी सरकारे यांची भूमिका लक्षात येईल...........

  • Rating Star656

    32121

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

बाबाराव घोरमाडे, अमरावती

प्रथम दर्शनी कविता लेखन असले तरी गद्य आणि पद्य सोबत सोबत चालल्यासारख्या लेखन शैलीचा भास जाणवतो. अमरावती शहरातील 70..80 व नंतरच्या दशकातील गुणवैशिष्ट्ये मार्मिक नर्म विनोदी शैलीत सुंदर रीतीने विषद केली आहेत. लेखकाची सुक्ष्म निरीक्षण शैली काव्य चना स्वरूपात पुस्तक रूपाने सादर करण्यात लेखक यशस्वी झाले आहेत. इजाफा,रूतबा, हिरव्या देठाचे,कैलहीचा मौहोल, ढगांचा,इत्यादी जुने वऱ्हाडी शब्द वापरल्यामुळे जुन्या आठवणींना उजाळा मिळाला. लेखकाने अमरावती शहरातील जुन्या जाणत्या, गुणवान, असामान्य अशा व्यक्तींची दखल घेतली......पण काहींची दखल राहून गेली आहे असे माझे मत आहे. उदा. सुरेश भट, मधुकर केचे व त्यांची सायकल , अमरावतीचे दहा दिवसांची गणपती उत्सव सजावट..... प्रत्येकाने वाचावे असे हे पुस्तक, विनोदी पण शेवटी असलेली कारूण्याची किनार अंतर्मुख करुन जाते. ...Read more

वा. पां. जाधव अमरावती

`अमरावतीचे छप्पन स्वभाव एक मनोरंजक काव्यसंग्रह` `अमरावतीचे छप्पन स्वभाव` हे अमरावतीचे सुप्रसिद्ध साहित्यिक श्री जी. बी. देशमुख यांचे अमरावती नगरीचा सहज स्वभाव व ह्या नगरीच्या वेगळ्या ओळखीवर आधारित मनोरंजक पुस्तक वाचले. वाचून भरपूर मनोरंजन झाले. खर काय लिहावे या लेखकाबद्दल, मन गोंधळले. ऐतिहासिक असो, प्रवास वर्णन असो, व्यक्ती विशेष असो, अनुभवात्मक घटना घडामोडी असो कशावरही सहज लिखाण करणारा हा लेखक आहे. आता तर त्यांनी लेखनाला विनोद प्रचुर फोडणी देऊन `अमरावतीचे छप्पन स्वभाव` या काव्यसंग्रहातून अमरावतीकरांना मनोरंजनाची मेजवानीच दिली आहे. प्रत्येक शहराची व त्या शहरातील वैशिष्ट्यांची एक वेगळीच ओळख असते. दिवस जातात, काळ लोटतो, पिढ्या बदलतात मात्र जुन्या स्मृतीची चिन्हे नवीन येणाऱ्या पिढीच्या मनात गुढ निर्माण करत कायम हाक देत राहतात. अमरावतीही त्याला अपवाद नाही. बापट चौकात चौक नाही, त्या जागेवर चौरस्ता नसून टी-पॉइंट आहे, खापर्डे बगीचा म्हणून आजही ओळख आहे मात्र तेथे बगिचा नाही किंवा प्रसिद्ध गांधी चौकात गांधीचा पुतळा अथवा स्मृतीदर्शक चिन्ह अथवा उल्लेख नाही मात्र गांधी चौक अशीच ओळख जनमानसात आहे. अशा एक ना अनेक विसंगत नाम दर्शक ओळख असलेली उदाहरणे त्यात सप्रमाण आहेत. पण खरी गंमत म्हणजे कधी काळी घडलेला इतिहास त्यामध्ये दडलेला आहे हे निश्चित. या सोबतच अमरावतीकरांच्या स्वभावातला स्थायी मजेदारपणाच्या एक एका हटके गुण वैशिष्ट्याच्या गमती लेखकाने हुबेहूब अधोरेखित केलेल्या आहेत. आणि त्यावरुन तत्सम रचनांचा उहापोह लेखकाने पुस्तकात केला असावा. विदेशात स्थाईक झालेल्या मूळ अमरावतीकरांना लेखकाने लिहिलेल्या गमती मनोरंजनात्मक वाटाव्या एवढी किमया जी.बी. च्या सहज लेखनाने दाखवली आहे. अमरावतीचे अग्रगण्य वृत्तपत्र दै. हिंदुस्थान मध्ये लेखकाने सतत ६ महीणे लिहीलेल्या काव्य सदरात अमरावतीच्या जनमानसाच्या हृदयाच्या ठाव घेणाऱ्या काव्य रचनांचा आठवणींनी महापूर ओसंडून गेला होता. विशेष म्हणजे ह्यात कुठेही अनावश्यक अभिनीवेष नव्हता. उलट गमतीत केलेले आत्मपरिक्षण मात्र काही प्रमाणात होते. वयस्क अमरावतीकर रसिकांना या रचना ताज्या करून त्यांच्या तारुण्यात घेऊन गेल्या हेच खरे. जी बी देशमुख या लेखकास मिळालेल्या सकारात्मक प्रतिक्रियां वरून दिसून येते. . सदर पुस्तकातील काव्यमय रचना वाचतांना अमरावतीच्या माणसाच्या वऱ्हाडभोळ्या स्वभावाची प्रचीती येते आणि वेगळाच आनंद देऊन जाते. निखळ मनोरंजन करत गुदगुल्या करणारा असा हा काव्यसंग्रह आहे. अमरावती शहराची ऐतिहासिक वैशिष्टे काव्यरूपात वाचण्याचा आनंद अमरावतीकरांना ते जिथं असतील त्या गावात, परगावात, परदेशात पुस्तक मागवून घेता येईल. ...Read more