* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: JINNAH : INDIA– PARTITION–INDEPENDENCE
  • Availability : Available
  • Translators : ASHOK PADHYE
  • ISBN : 9788184981124
  • Edition : 3
  • Publishing Year : JUNE 2010
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 584
  • Language : Translated From ENGLISH to MARATHI
  • Category : POLITICS & GOVERNMENT
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
LORD MOUNTBATTEN: I TRIED EVERY TRICK I COULD PLAY... TO SHAKE JINNAH`S RESOLVE .NOTHING WOULD MOVE HIM FROM HIS CONSUMING DETERMINATION TO REALISE THE DREAM OF PAKISTAN...THE DATE I CHOSE (FOR INDEPENDENCE) CAME OUT OF THE BLUE. I WAS DETERMINED TO SHOW I WAS MASTER OF THE WHOLE EVENT. JASWANT SINGH HAS COME A LONG WAY FROM HIS HOME IN THE DESERT DISTRICTS OF RAJASTHAN. COMMISSIONED IN THE INDIAN ARMY WHEN BARELY NINETEEN, HE WENT THROUGH TWO WARS WHILST IN SERVICE (1962 AND 1965) BEFORE RESIGNING HIS COMMISSION TO PURSUE A POLITICAL CAREER. HE HAS SERVED SEVEN TERMS IN PARLIAMENT, AND, IN THE BJP-LED GOVERNMENTS OF 1996 AND 1998-2004, HELD CHARGE OF SIX MINISTRIES OF THE GOVERNMENT OF INDIA, INCLUDING EXTERNAL AFFAIRS, DEFENCE AND FINANCE. REGARDED AS AN AUTHORITY ON INDIAN FOREIGN POLICY AND NATIONAL SECURITY, JASWANT SINGH IS AMONG THE MOST RESPECTED NAMES IN THE COUNTRY`S PUBLIC LIFE, AND IN THE WORLD OF DIPLOMACY. HE IS DESERVEDLY GIVEN CREDIT FOR DEXTEROUSLY STEERING INDIA OUT OF THE TURBULENT DIPLOMATIC SEAS ENCOUNTERED IN THE AFTERMATH OF THE NUCLEAR TESTS.
१९०६ ते १९४७ या कालखंडातील भारतीय स्वातंत्र्याच्या इतिहासातील फारच थोडा भाग आपल्या समोर ठेवला गेला होता. टिळक, गांधी, सत्याग्रह, चलेजाव चळवळ, क्रांतिकारकांचे प्रयत्न... बस्स. एवढेच आपल्याला ठाऊक आहे. परंतु याखेरीज असलेला ९० टक्के इतिहास हा श्री. जसवंतसिंग यांनी संशोधन करून बाहेर काढला. जिनांचे चरित्र अभ्यासताना हे सारे त्यांच्या हातात येत गेले. पाच वर्षे ३० माणसांची तुकडी हे काम करत होती. सुमारे ५००० संदर्भ गोळा केले गेले. त्यातील सार या पुस्तकात एकवटले आहे. ‘‘खादीने कुठे स्वातंत्र्य मिळते?’’ नेहरूंचा महात्मा गांधींना सवाल. जिनांनी ठरवून कोलकात्यात दंगल करवली व ६००० हिंदूंची कत्तल घडवली. ‘हिंदू-मुस्लीम ऐक्याचे दूत’ असे प्रमाणपत्र गोपाळ कृष्ण गोखले यांच्याकडून घेणारे जिना शेवटी हिंदूंचे कर्दनकाळ बनले. आपल्या कौशल्याने, काँग्रेसच्या नेत्यांना भोंगळपणाचा फायदा उठवत, धमकी देत जिनांनी पाकिस्तान निर्माण केले. पुन्हा एकदा दाहीर राजाचा पराभव ८०० वर्षांनी जिना नावाच्या महंमद कासिम याने केला. अत्यंत खळबळजनक माहितीने भरलेले पुस्तक.

No Records Found
No Records Found
Keywords
"#MARATHIBOOKS#ONLINEMARATHIBOOKS#TRANSLATEDMARATHIBOOKS#TBC#TRANSLATEDBOOKS@50% #JINNAHINDIA-PARTITION–INDEPENDENCE #JINNAHINDIA– PARTITION–INDEPENDENCE #जिना हिंदुस्थान-फाळणी-स्वातंत्र्य #POLITICS&GOVERNMENT #TRANSLATEDFROMENGLISHTOMARATHI #ASHOKPADHYE #अशोकपाध्ये #JASWANTSINGH "
Customer Reviews
  • Rating StarDevdutt Kamat

    १९०६ ते १९४७ या कालखंडातील भारतीय स्वातंत्र्याच्या इतिहासातील फारच थोडा भाग आपल्या समोर ठेवला गेला होता. टिळक, गांधी, सत्याग्रह, चलेजाव चळवळ, क्रांतिकारकांचे प्रयत्न... बस्स. एवढेच आपल्याला ठाऊक आहे. परंतु याखेरीज असलेला ९० टक्के इतिहास हा श्री. जसवंसिंग यांनी संशोधन करून बाहेर काढला. जिनांचे चरित्र अभ्यासताना हे सारे त्यांच्या हातात येत गेले. पाच वर्षे ३० माणसांची तुकडी हे काम करत होती. सुमारे ५००० संदर्भ गोळा केले गेले. त्यातील सार या पुस्तकात एकवटले आहे. ‘‘खादीने कुठे स्वातंत्र्य मिळते?’’ नेहरूंचा महात्मा गांधींना सवाल. जिनांनी ठरवून कोलकात्यात दंगल करवली व ६००० हिंदूंची कत्तल घडवली. ‘हिंदू-मुस्लीम ऐक्याचे दूत’ असे प्रमाणपत्र गोपाळ कृष्ण गोखले यांच्याकडून घेणारे जिना शेवटी हिंदूंचे कर्दनकाळ बनले. आपल्या कौशल्याने, काँग्रेसच्या नेत्यांना भोंगळपणाचा फायदा उठवत, धमकी देत जिनांनी पाकिस्तान निर्माण केले. पुन्हा एकदा दाहीर राजाचा पराभव ८०० वर्षांनी जिना नावाच्या महंमद कासिम याने केला. अत्यंत खळबळजनक माहितीने भरलेले पुस्तक. ...Read more

  • Rating Starअशोक घैसास, नाशिक

    आपण प्रसिद्ध केलेले `जिना` हे पुस्तक वाचले. श्री जसवंतसिंग यांनी मोठ्या परिश्रमाने हे एक इतिहासाचे पुस्तक लिहिले आहे. आत्तापर्यंत उघड न झालेली माहिती त्यांनी प्रकाशात आणली आहे. मी आजवर म.गांधी यांच्यावरची अनेक पुस्तके वाचली आहेत. पण जिना पुस्तकातील गंधींबद्दलची माहिती अत्यंत उद्बोधक आहे. श्री. अशोक पाध्ये यांनी सरस अनुवाद केला आहे. पुनश्च एकदा आपले आभार. ...Read more

  • Rating StarNEWSPAPER REVIEW

    जिनांनी २७ जुलै १९४६ रोजी मुस्लीम लिगच्या कौन्सिलच्या सभेत भाषण केले. त्यात ‘थेट कृती’ (Direct Action) करण्याचा निर्णय घेण्यात आला. ही थेट कृती हिंसक की अहिंसक? यावर जिनांचे उत्तर होते, ‘मी त्याबद्दलच्या कोणत्याही नैतिक बाबींबरोबर चर्चा करणार नाही.’ ंतर मुस्लीम लिगच्या छापलेल्या एका पत्रकातून म्हटलं होतं, ‘केवळ कमनशिबामुळे तुम्ही हिंदूंचे आणि ब्रिटिशांचे गुलाम झालेले आहात. पण तुम्ही या रमजानच्या महिन्यात एका जिहादला प्रारंभ करणार आहात... अरे काफरांनो, तुमचे दिवस आता भरत आले आहेत... आता एक सार्वत्रिक कत्तल सुरू होईल!’ त्यावेळी मुस्लीम लीगचे सुऱ्हावर्दी बंगालमधील महत्त्वाचे पुढारी होते. त्यांच्या चिथावणीचा निदर्शकांनी फायदा उठविला. १६ ऑगस्ट १९४६ रोजी एकट्या कलकत्यांत ६००० पेक्षा जास्त हिंदूंना ठार करण्यात आले. १५००० पेक्षा जास्त हिंदू जखमी झाले. हिंदुस्थानभर त्याचे पडसाद उमटले.. मृत्यू आता थैमान घालू लागला होता... ‘नौखाली’ हा शब्द पुढे अत्याचारांचा निदर्शक बनला. त्याकाळी गांधीजी ‘सेवाग्राम’मध्ये आयुष्याच्या अखेरच्या टप्प्यावर पोहोचले होते. काँग्रेस त्यांच्याकडे पूर्ण दुर्लक्ष करीत चालली होती. गांधीजी दंगल शांत करायला पुन्हा बाहेर पडले, नौखालीकडे! हिंदुस्थानची फाळणीची प्राक्रिया या ‘थेट कृती’मुळे जलद होऊ लागली... आता ‘घटना’ माणसांना धरून पुढे नेत होत्या!’ ‘जिना : हिंदुस्थान, फाळणी, स्वातंत्र्य’ या जसवंत सिंग लिखित, अशोक पाध्ये अनुवादित पुस्तकातील अखेरच्या भागांतील वरील अंश. ‘माझ्या बऱ्याच हितचिंतकांनी मला ‘जिना व फाळणी’ या विषयावर न लिहिण्याचा सल्ला दिला होता. पण हा निर्णय शेवटी माझा होता. त्याचे भले-बुरे परिणाम भोगण्यास मी तयार होतो. १९४७ची फाळणी का झाली याचा पुन्हा एकदा शोध मला घ्यायचा होता’, असे जसवंत सिंग सुरुवातीलाच सांगतात अन् पुस्तकाच्या अखेरीस ‘फाळणीला जबाबदार कोण’ याचा निष्कर्षदेखील काढतात! यात जिनांची भूमिका कोणती? काहींच्या मते जिना खलनायक होते, तर काहींच्या मते ते प्रतिनायक होते. पाकिस्ताननिर्मितीनंतर तर ते पाकिस्तानसाठी ‘महानायक’ ठरले! खरंच कोण आणि कसे होते जिना? काठेवाडातील पानेली येथील एका ‘खोजा’ कुटुंबात २५ ऑक्टोबर वा डिसेंबर १८७८ रोजी जिनांचा जन्म झाला. लंडनला ‘बार’ची परीक्षा देऊन ते मुंबईला आले. २४ ऑगस्ट १८९६ रोजी बॉम्बे हायकोर्टात अ‍ॅडव्होकेट म्हणून त्यांनी नाव रजिस्टर केले - ‘महंमद अली जिना’ (पूर्वी त्यांचे आडनाव होते ‘जिनाभाई.’) नंतर ५१ वर्षे मुंबई हेच त्यांचे घर होते. बर्नार्ड लुई म्हणतो, खोजा म्हणजे पातळ मुस्लीम आवणाखालील हिंदूच! तर १९१७ मध्ये सरोजिनी नायडू म्हणाल्या, ‘जिना हे मानववंशशास्त्रीयदृष्ट्या हिंदूच आहेत आणि धर्माने मुसलमान आहेत. त्यामुळे ते हिंदू-मुसलमान एकतेचे दूत आहेत. आणि हा केवळ आदर्श कल्पनाविलास नाही!’ अशा धर्मनिरपेक्षतेकडून धर्मांधतेकडे झालेला जिनांचा पन्नासएक वर्षांचा प्रवास या पुस्तकातून उलगडला जातो. राजद्रोहाच्या खटल्यात टिळकांना जस्टिस दावर यांनी सहा वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा ठोठावली. तेव्हा जिनांनी टिळकांच्या वतीने जामिनासाठी अर्ज केला, तो फेटाळून दावर यांनी शिक्षा कायम केली. त्याबद्दल जेव्हा ब्रिटिश सरकारने जस्टिस दावर यांना ‘नाईट हूड’ हा किताब दिला, तेव्हा त्यावर टीका करून जिनांनी त्या समारंभावर बहिष्कार टाकला होता! गांधी आणि जिना यांची तुलना कठीण व गुंतागुंतीची, पण दोघांचे राजकीय गुरू एकच होते, गोपाळ कृष्ण गोखले! जिनांना त्या काळात ‘मुस्लीम गोखले’ म्हणत असत. गांधी व जिना दोघांनी लंडनमध्ये असताना ‘ब्रिटिश जेंटलमन’ लकब व शैली उचलली. पण २१ वर्षे दक्षिण आफ्रिकेत राहून गांधी जेव्हा हिंदुस्थानात परतले, तेव्हा त्यांनी वेशभूषेत आमूलाग्र बदल केला, पण जिनांनी ‘थ्री पीस सूट’ हा वेश कधीच सोडला नाही. त्यामुळे जिनांनी गांधींना नुसताच स्पर्धक न मानता, लोकांच्या भावनांचा फायदा उठविणारा- खोटारडा- बडबड्या राजकारणी मानलं. तरीही गांधींना आव्हान देणारे जिनाच होते तर नेहरूंना प्रतिस्पर्धी ठरलेले जिनाच होते. फाळणीपर्यंत जिनांचा सुसंवाद फक्त गांधींशीच होता. नेहरू-जिना यांच्यात तसा तो कधीच नव्हता. १९२८च्या अखेरपर्यंत ‘हिंदू-मुसलमान ऐक्य’ हा शब्दप्रयोग ‘स्वराज्य’ या शब्दाला समानार्थी आहे असे जिना मानीत. तर ‘कोणत्याही धर्माचा, जातीचा हिंदुस्थानचा नागरिक असो’, त्याला घटनेनुसार समान अधिकार मिळण्याची ग्वाही दिली जाईल, एवढे पुरेसे आहे, ही नेहरूंची भूमिका. महंमद इक्बालसारख्या काहीजणांनी १९३० मध्ये याच हिंदुस्थानात आपला ‘मुस्लीम इंडिया’ हा देश साकारावा म्हणून आव्हान केले, तर १९३३ साली रहिमत अलींनी ‘मुस्लीम इंडिया’ हा देश हिंदुस्थानपेक्षा वेगळा असावा असा आग्रह धरला. ‘पाकिस्तान’ हा या रहिमत अलींनी निर्माण केलेला शब्द. त्या वेळीदेखील जिनांनी महंमद इक्बाल यांच्या कल्पनेला विरोध केला होता. १२ नोव्हेंबर १९३०च्या लंडन येथील गोलमेज परिषदेचा ‘मँचेस्टर गार्डियन’ मधील वृत्तांत जिनांसमोरील पेच स्पष्टपणे व्यक्त करतो. ‘मिस्टर जिना यांची गोलमेज परिषदेतील अवस्थाही एकमेव अशी झाली होती. हिंदूंना वाटले की जिना हे एक मुस्लीम जातीवादी आहेत, तर मुस्लिमांना वाटले की जिना हे हिंदूंकडे झुकणारे आहेत. संस्थानिकांना वाटले की जिना हे अति लोकशाहीवादी आहेत. ब्रिटिशांना वाटत होते की जिना हे डोक्यात राख घालून टोकाशी जाणारे आहेत. यामुळे असे झाले की, जिना हे म्हटले तर सर्वत्र आहेत, आणि म्हटले तर कुठेच नाहीत. कोणालाच ते नको आहेत.’ हा जिनांच्या राजकीय कारकीर्दीचा उलटत चाललेला मध्यान्ह काळ होता. १९३३च्या सुमारास जिना एके ठिकाणी म्हणतात, ‘खऱ्याखुऱ्या हिंदू-मुसलमान ऐक्याशिवाय हिंदुस्थानला कसलीही आशा नाही. हे ऐक्य साधणं बहुसंख्य असलेल्या हिंदूंनाच जमू शकेल. मुळात आपल्या अंत:करणात त्यासाठी बदल झाला पाहिजे.’ पुढे १९३८ मध्ये अलीगढ अँग्लो-मुस्लीम कॉलेजात ते म्हणतात, ‘हिदूंच्या भावना-हिंदू मन व दृष्टिकोन पाहिल्यावर मी निष्कर्ष काढला की, ‘हिंदू-मुस्लीम ऐक्याची आशा धरण्यात अर्थ नाही. मला माझ्या देशाविषयी प्रथमच निराशा वाटली. ही स्थिती अत्यंत दुर्दैवी आहे. मी खचलो आहे... असहाय्य झाल्यासारखे वाटत आहे.’ गांधींची अवस्थादेखील वेगळी नव्हती. ‘मी असहाय्य आहे. माझी ऐक्यावरील श्रद्धा तेवढीच घट्ट आहे. पण माझ्यासमोर घनदाट अंध:कार पसरला असून, कुठेही प्रकाश दिसत नाही, अशा परिस्थितीत मी फक्त देवाला ‘मला प्रकाश दाखव’ अशी प्रार्थना करू शकतो. १९३८ साली काँग्रेसचे अध्यक्ष असताना सुभाषचंद्र बोस यांनी स्वत: हिंदू-मुसलमान प्रश्नात लक्ष घालून तो सोडवायचा प्रयत्न केला. पुढे हे सारे एकांडे प्रस्ताव अपुरे पडले. मार्ग ठप्प झाला. कदाचित हाच फाळणीचा टर्निंग पाँर्इंट होता! हिंदुस्थानात अशी चमत्कारिक परिस्थिती असताना दुसऱ्या महायुद्धाला तोंड फुटलं. २३ मार्च १९४० रोजी मुस्लीम लीगच्या खुल्या अधिवेशनात एक ठराव पास करण्यात आला. बलुचिस्तान-सिंध-पंजाब व वायव्य सरहद्द प्रांत यांचे एक वेगळे फेडरेशन बनवावे. या चारही प्रांतांना स्वायत्तता व सार्वभौमत्व बहाल करावे. हा ‘पाकिस्तान’चा जन्म होता! म्हणून आजही पाकिस्तानात २३ मार्च हा दिवस ‘पाकिस्तान दिवस’ म्हणून पाळला जातो. नंतर इकडच्या १९४२च्या ‘चले जाव’ चळवळीमुळे, ऐन युद्धकाळात इंग्रजांना हिंदुस्थान सोडण्यास सांगण्यामुळे बहुतांशी काँग्रेस नेत्यांची धरपकड झाली. १९४२ ते १९४६ या काळात बरेचसे काँग्रेस नेते तुरुंगात असल्यामुळे सरकारशी बोलणी करण्यास कुणीच उरलं नव्हतं, त्यामुळे राजकीयदृष्ट्या जिनांचे फावले! दरम्यान, गांधी तुरुंगात असताना १९४३ मध्ये जिनांनी जाहीर केले की, खुद्द गांधींना मुस्लीम लीगबरोबर समझोता हवा असेल तर त्यांचे स्वागत होईल, अन्य कुणाचे नाही. १९४४ रोजी जिनांच्या १०, माऊंट प्लेझंट रोड, मुंबई या घरी जिना-गांधी बोलणी सुरू झाली, ती १८ दिवस चालली... आणि ब्रिटिश अस्वस्थ झाले, हिंदू-मुसलमान ऐक्याच्या भीतीने, हिंदूमहासभावाले चिडले या कृतीनेच, तर लीगची पाकिस्तानची मागणी गांधी मान्य करतील म्हणून शीखही बिथरले अन् बाहेर पडले ते ‘शिखीस्तानची’ मागणी घेऊनच! अर्थात वाटाघाटी फिसकटल्या. गांधींनी जिनांना लिहिलं, ‘इस्लामचा उदय होण्यापूर्वी हिंदुस्थान एक राष्ट्र होते. ते अजूनही एकच राष्ट्र राहावं, जरी त्या राष्ट्राच्या पुत्रांनी आपला धर्म बदलला असला तरीही. तुमची नव्या राष्ट्राची कल्पना मी स्वीकारली तर नव्या समस्यांना तोंड द्यावे लागेल.’ यानंतर जिनांच्या ‘थेट कृती (Direct Action)च्या २७ जुलै १९४६च्या आवाहनानंतरचा इतिहास, हा दंगली-अत्याचार-नरसंहार-मानवतेच्या हत्येचा होता. अखंड हिंदुस्थानचे कट्टर पाठीराखेदेखील म्हणू लागले, ‘आता फाळणी झाली तर बरे पडेल. निदान संहार-अत्याचार- हत्याकांडातून तरी सुटका होईल. भूतकाळातील अनेक वर्षातील छळवाद संपेल.’ ६ मे १९४७ रोजी जिना-गांधींची शेवटची भेट दिल्ली येथे घडून आली. जिनांनी गांधींच्या संमतीने एक पत्रक काढले. ‘हिंदुस्थानच्या फाळणीवर आमच्यात चर्चा झाली; परंतु गांधींनी फाळणीचे तत्त्व स्वीकारले नाही. फाळणी अपरिहार्य आहे, हे त्यांना पटत नव्हते. माझ्या मते पाकिस्तान निर्माण होणे हे नुसते अपरिहार्यच नव्हे तर, हिंदुस्थानच्या आजच्या राजकीय समस्येवर तोच एक उपाय आहे.’ तत्पूर्वी १ एप्रिल १९४७ रोजी माऊंट बॅटन यांनी गांधींची भेट घेतली तेव्हा, माऊंट बॅटनला दचकविणारा प्रस्ताव गांधींनी ठेवला, ‘जिना यांना पंतप्रधान करा आणि संघटित हिंदुस्थानचे सरकार बनवा.’ नंतर ५-६ एप्रिलला माऊंट बॅटन जिनांना भेटले, तेव्हा जिना म्हणाले, ‘फक्त एकच उपाय आहे, हिंदुस्थानवर शस्त्रक्रिया नाहीतर हिंदुस्थान नाश पावेल.’ आता जिनांचा धर्मांधतेकडचा ‘पाकिस्ताननिर्मितीचा’ प्रवास पूर्ण होत आला होता! हिंदुस्थान पूर्वी कधीही न पाहिलेल्या सर सिरील जॉन रॅडक्लिफ याला हिंदुस्थान-पाकिस्तान सरहद्द ठरविण्याचे काम देण्यात आले. ‘रॅडक्लिफ अवॉर्ड’ १२ ऑगस्ट १९४७ला तयार झाले. १४ ऑगस्टला हिंदुस्थान अस्तित्वात आला. जन्माला आलेल्या दोन्ही देशांना आपल्या सरहद्दी माहीत नव्हत्या. कारण ‘अवॉर्ड’ १७ ऑगस्ट रोजी प्रसिद्ध झालं! मग पुन्हा दंगली उसळल्या. नरसंहार-हत्याकांडाचा रक्तरंजित इतिहास पुढे चालूच राहिला! तत्पूर्वी ७ ऑगस्ट १९४७ रोजी विमान जेव्हा जिनांना घेऊन दिल्लीहून कराचीकडे सुटलं, तेव्हा जिना स्वत:शीच पुटपुटले, ‘इट्स द एन्ड ऑफ दॅट!’ पुढे वर्षभराने ११ सप्टेंबर १९४८ रोजी जिनांचा मृत्यू झाला, तेव्हा दिल्लीत राष्ट्रीय दुखवटा जाहीर झाला. नेहरूंनी शोकसंदेश दिला, ‘जिनांनी हिंदुस्थानचा इतिहास रचला, पण तो चुकीच्या मार्गाने... भूतकाळातील घटनांबद्दल त्यांना खेद वाटला असेल की पश्चात्ताप झाला असेल? बहुधा असे काहीच वाटले नसेल, कारण त्यांनी आपल्याभोवती द्वेषाचा बुरखा पांघरून घेतला होता!’ पुढे १९७१ मध्ये पाकिस्तान फुटून बांगलादेश निर्माण झाला, हा जिनांच्या सिद्धांताचा पराभव होता हा अलीकडचा इतिहास. जिनांच्या मृत्यूपूर्वी, ३० जानेवारी १९४८ ला गांधींची हत्या झाली. १९४६च्या नौखालीच्या दंगलीत पीडीतांचे सांत्वन करताना, एका कागदाच्या तुकड्यावर शिसपेन्सिलचे थोटूक वापरून गांधींनी लिहिलं होतं, ‘I don`t want to die a failure, but I may be a failure.’ आपल्या सत्य व अहिंसा या तत्त्वांचा पराभव झाल्याचे त्यांना स्पष्ट दिसत होते! पुस्तकाच्या प्रास्ताविकात जसवंत सिंग कबूल करतात की, अखंड हिंदुस्थानासाठी कुणी आपला आवाज उठवत होते की नाही, याचे उत्तर दु:खाने असे द्यावे लागते की, ‘फक्त महात्मा गांधी.’ पण पुस्तकाच्या अखेरीस, फाळणीची टोकाची भूमिका जिनांना घ्यायला भाग पाडल्याबद्दल, फाळणीला मुख्यत्वेकरून नेहरू’च जबाबदार आहेत, असा निष्कर्ष काढतात. ‘नेहरूंच्या नेतृत्वाखालील काँग्रेसने फाळणीला मान्यता दिली होती. पण पक्षाच्या सर्वोच्च अधिकारपदावर असलेले नेहरू आणि नंतर सत्तेवर आलेल्या सरकारचे प्रमुख म्हणून नेहरूच होते. तेव्हा नेहरूंकडेच फाळणीची जबाबदारी जाते... काँग्रेसचे १९३४, १९४२, १९४५ व १९४७ चे ठराव अप्रत्यक्षरीत्या पाकिस्ताननिर्मितीला कारणीभूत ठरले.’ पुढे फाळणीची ही शोकांतिका अटळ नव्हती असा निष्कर्ष काढताना ‘जर संघराज्याचा (फेडरल) विस्तृत पाया आपण स्वीकारला असता, तर हे शक्य होते,’ असे देखील जसवंत सिंग सुचवितात. असो. जसवंत सिंग यांच्या या विषयातील अधिकाराबद्दल प्रश्नच नाही. अर्थात स्वतंत्र भारतात अटलबिहारी वाजपेयींच्या सरकारात ते परराष्ट्रमंत्री, संरक्षणमंत्री, अर्थमंत्री होते हा काही योगायोग नव्हे. १९४८ साली निजामाची राजवट संपल्यावर, हैद्राबाद संस्थान भारतात विलीन झाल्यावर तिथले मुसलमान स्वत:ला ‘अल्पसंख्याक’ म्हणवून घेऊ लागले. ज्या Minority Syndrome मुळे पाकिस्तानची निर्मिती झाली, त्याचा संसर्ग स्वतंत्र हिंदुस्थानभर पसरला... हेच जर सध्याचे वास्तव असेल, तर मग फाळणीला जबाबदार कोण, हा प्रश्नच निरर्थक आहे. ‘कोणत्याही धर्माचा, जातीचा हिंदुस्थानचा नागरिक असो, त्याला घटनेनुसार समान अधिकार मिळण्याची ग्वाही दिली जाईल,’ या नेहरूंच्या सुरुवातीपासूनच्या भूमिकेचे महत्त्व, आज स्वतंत्र्याच्या साठ वर्षांनंतरदेखील सत्तेच्या लोभपायी मान्य होत नाही, हेच या देशाचे दुर्दैव! या पुस्तकातील, जिना-गांधी यांच्यातील वाटाघाटी, गांधी-नेहरू यांच्यातील दुरावा दर्शविणारा पत्रव्यवहार, वेव्हेल-गांधी-नेहरू चर्चा, मौ. आझाद यांचे जामा मशिदीतील भाषण, डॉ. लोहियांचे फाळणीच्या योजनेवर झालेले भाषण, बॅ. जिना यांची भाषणे पत्रव्यवहार वगैरे सारं मुळातून वाचण्यासारखे आहे. त्या काळी झालेले विविध काम गोपनीय पत्रव्यवहार, करारांचे मसुदे वगैरे संदर्भासाठी हे पुस्तक महत्त्वाचं ठरतं. पुस्तक वाचून झाल्यावर एवढंच जाणवतं, फाळणीची घटना हा एक कॅलिडोस्कोप आहे. जसा ‘दृष्टिकोन’ बदलेल, तसं घटनाचित्र बदलत जातं, निष्कर्ष बदलत जातात. इतिहास कधी बदलत नाही! ...Read more

  • Rating StarDAINIK PUNYANAGARI 4-7-2010

    ज्येष्ठ राजकारणी जसवंत सिंग यांनी स्वातंत्र्यपूर्व काळात मुस्लिमांचे नेतृत्व करणाऱ्या जिनांवर लिहिलेल्या पुस्तकाचा अनुवाद नुकताच मराठीत आला. या पुस्तकाच्या निमित्ताने जसवंत सिंग यांनी व्यक्त केलेले मनोगत. महंमदअली जिना यांचे राजकीय चरित्र लिहिण्यााठी मी फार पूर्वीपासून धडपडत होतो; परंतु हा विचार कल्पनेच्या स्वरूपात खूप वर्षे नुसताच मनात पडून राहिला होता. या कल्पनांचे बीज १९९९ मध्ये रुजले आणि अखेर त्याचा हा पुस्तकरूपी वृक्ष तयार झाला. १९९९ मध्ये ऐतिहासिक दिल्ली-लखनौ बसयात्रेत पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्याबरोबर मी होतो. पाकिस्तानात ‘मिनार-ए-पाकिस्तान’ म्हणून एक ६० मीटर उंचीचा स्मारकस्तंभ बांधलेला आहे. याच जागी २३ मार्च १९४० रोजी मुस्लीम लीगने पाकिस्तान निर्मितीचा ठराव संमत केला होता. कोणत्याही राजकीय व्यक्तीने जिना यांचे चरित्र लिहिलेले नाही. मी हे चरित्र लिहिण्याचे ठरवले. या ग्रंथावरील प्रत्यक्ष काम २००४ मध्ये सुरू झाले. त्यावेळी मी मंत्री राहिलो नव्हतो. काम सुरू झाल्यावर मी अनेकांशी या पुस्तकाबद्दल बोललो. मला सल्ले दिले जाऊ लागले. ‘जिना व फाळणी’ या विषयाला हा घालणे धोक्याचे असल्याने मी या मार्गावर जाण्याचे धाडस करायला नको, असे बऱ्याचजणांचे मत पडले. मला मात्र १९४७ मध्ये हिंदुस्थानची फाळणी का झाली, याचा एकदा शोध घ्यायचा होता. त्याचा दृश्य परिणाम म्हणजे ‘जिना : हिंदुस्थान फाळणी स्वातंत्र्य’ हे पुस्तक. हे पुस्तक लिहायला, पुन:पुन्हा लिहायला, तपासायला, वेगवेगळ्या मार्गांनी माहितीची खातरजमा करून घ्यायला पाच वर्षे लागली. या कामी मला नॅशनल अर्काइव्हज ऑफ पाकिस्तानच्या ‘कैद-ए-आझम’ पेपर्स प्रोजेक्टचे प्रमुख संपादक डॉ. झैदी यांची मोलाची मदत झाली. या पुस्तकासाठी आवश्यक असलेल्या संदर्भग्रंथांची यादी अफाट मोठी झाली. या पुस्तकांमध्ये त्या काळातील, म्हणजे फाळणीच्या कालखंडातील एकूण एक घटनांच्या नोंदींचा तपशीलवार मागोवा आहे. त्या वेळच्या विविध विद्वानांनी ते ग्रंथ लिहिले आहेत. जे जुने ग्रंथ गोळा करून आणले, त्यातले काही एवढे जुने झाले होते की, हाताळताना त्यातील पानांचा तुकडा पडेल अशी भीती वाटे. या पुस्तकाचा विषय वरवर फारसा महत्त्वाचा वाटला नाही, तरी तो सर्वांच्या अंगात भिनला असून, अत्यंत संवेदनशील आहे. फाळणीमुळे आपल्या हृदयाला झालेली जखम अद्याप भरून निघालेली नाही. म्हणून मी ज्यांच्या-ज्यांच्याकडून सल्ले मागितले आणि अवलंबून राहिलो, त्यांनी ते सल्ले काही पाने भरतील इतक्या विस्तृतपणे दिले आहेत. या कामामध्ये अनेक भावना दाटलेल्या आहेत. फाळणीचा इतिहास म्हटल्यानंतर असे होणारच. फाळणीला गांधीजी एक अनिवार्य विच्छेदन म्हणत. परंतु हा राजकीय अर्थ झाला. यात गुंतलेल्या मानवी यातना, संवेदना आणि भावना यांचीही चिरफाड झाली, त्याचे काय? इतिहास जुळवून लिहिणाऱ्या तज्ज्ञांना याकडे मानवी दृष्टिकोनातून बघता येणे कठीण आहे. ते अशा गोष्टींकडे नेहमीच भुवया उंचावून पाहतात याची मला कल्पना आहे. पण, तशा थंडपणे, घटनांचे भावरहित कथन करणे मला जमणार नाही. तशा पद्धतीने लिहिलेले लिखाण हे नेहमीच रटाळ आणि कंटाळवाणे ठरते. माझे लिखाण अनेकांच्या हातातून आधी परीक्षणासाठी गेले होते. ते बारकाईने वाचून त्यावर त्यांनी भरपूर कष्ट घेतले. महंमदअली जिना हे सार्वजनिक जीवनात हिंदू-मुस्लीम ऐक्याचे प्रतिनिधी ठरवले गेले होते. तेथून पाकिस्तानचे ‘कैद-ए-आझम’ बनण्यापर्यंतचा त्यांचा सार्वजनिक आणि राजकीय प्रवास कसा झाला, हे मला या पुस्तकात मांडता आले. ...Read more

  • Read more reviews
Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

RADHEYA
RADHEYA by RANJEET DESAI Rating Star
विश्वजीत श्रीपती शिंत्रे.

राधेय.... लेखक रणजित देसाई... मित्र कसा असावा...कर्णासारखा दातृत्व कसं असावं...कर्णासारखं असा हा कर्ण... त्याला अंगराज म्हणावं, दान देणारा दाता म्हणावं, राधेय म्हणावं कि कौतेय... काहीही म्हणा पण कर्णासारखा दाता कर्णानंतर कधी झाला नाही आणि कधी होणरही नाही... रणजित देसाई लिखीत कर्णचरीत्र राधेय आज हातावेगळं झालं ते अश्रुभरल्या नयनांनी...ज्याचा अंत करायला स्वतः देवाधिदेव कृष्णाला अर्जुनाचं सारथ्य करावं लागलं यातच अंगराज कर्णांचं विरत्व अधोरेखीत होत आहे. जन्मापासुन ज्याला केवळ सुतपुत्र म्हणुन वागणुक मिळाली असा तो कर्ण स्वतःच्या बळावर इतका महान लढवय्या बनला. पुस्तकाच्या प्रास्ताविकात देसाईंनी म्हटलं आहे की राधेय मधला कर्ण महाभारतात शोधायची गरज नाही. प्रत्येकाच्या मनातच तो दडलेला असतो, कदाचित आपल्या मनाची चार पाने उलटलीत, तर त्यात हा कर्ण दिसेल. त्याचं दु:खं, पोरकेपण आणि त्यातून पार होवून एक अनोखी ऊंची गाठणारं त्याचं दातृत्व, व्यक्तित्व याचं एक भव्य, शोकात्म चित्र राधेय मधून उभं राहतं. राधेय या कादंबरीत रणजित देसाईंच्या शब्दांनी कर्णाची अनेक रुपे अनुभवता आली. त्यामध्ये राधाई आणि वृषाली सोबतचा कर्ण, दुर्यौधनासोबतचा कर्ण, कृष्णासोबतचा कर्ण, रणांगणावरचा कर्ण आणि नदीकाठी पाठमोरा ऊभा राहत दान करत असलेला कर्ण अशा अनेक रुपांनी प्रत्येकवेळी वेगळा भासला. वृषसेन आणि चक्रधराच्या मृत्युने हळवा झालेला कर्णही वाचकाच्या डोळ्यातही पाणी आणवतो... समोर मृत्यु दिसत असताना सुध्दा केवळ दिलेल्या वचनामुळे हातातील धनुष्याचा त्याग करुन शस्त्रहिन हेणारा कर्ण रणजित देसाईंच्या शब्दांमुळे आजन्म लक्षात राहील. कर्णासारखं होणं कुणालाही कदापि शक्य नाही पण त्यातला एखादा जरी चांगला गुण अंगी बाळगण्याचा प्रयत्न प्रत्येकाने नक्कीच केला पाहीजे... प्रत्येकाच्या संग्रही असावं आणि एकदा तरी वाचावं असं पुस्तक रणजित देसाई लिखीत...राधेय... © विश्वजित शिंत्रे. ...Read more

BAJIND
BAJIND by PAHILWAN GANESH MANUGADE Rating Star
विश्वजीत श्रीपती शिंत्रे.

काही पुस्तकं अशी असतात कि कितीही वेळा वाचली तरीही त्या पुस्तकाचा कंटाळा येत नाही. पुन्हा पुन्हा वाचावं असं वाटतं आणि त्याची पारायणं होतचं राहतात. असचं एक पुस्तक म्हणजे *पै.गणेश मानुगडे* लिखीत *बाजिंद.* *बाजिंद* हे एक असं रसायन आहे जे प्रत्ेकाला अक्षरशः वेड लावतं. साधारण चार पाच वर्षांपुर्वी पहील्यांदा वाचलं होतं, त्यानंतर बर्‍याचवेळा आणि आज पुन्हा एकदा. त्याबद्दलची एक सुंदर आठवण म्हणजे माझ्या बहिणीच्या गरोदरपणाच्या दिवसात ग्रहण लागलं होतं आणि त्या ग्रहणकाळात तिला मी *बाजिंद* वाचुन दाखवलं होतं, असं हे पुस्तक. कुस्ती, प्रेमकथा, हेरगिरी, गुढ रहस्यमय बाजिंदचं जंगल, पशु-पक्षी व हिंस्र जनावरांची भाषा, बहीर्जी नाईक आणि अवघ्या हिंदुस्थानाचे आणि मराठी मनाचे आराध्यदैवत *श्रीमंतयोगी छत्रपती शिवाजी महाराज* असा या पुस्तकाचा प्रवास. शेवटाला अंगावर काटा आला कि समजावं आपण या पुस्तकाच्या प्रेमात पडलोय. रायगडच्या डोंगरदरीत वसलेल्या धनगरवाडीचा सखाराम धनगर आणि त्याच्यासोबत मल्हारी, सर्जा आणि नारायण निघालेत छत्रपती शिवरायांना भेटायला. कारण टकमक टोकावरुन ज्या गद्दारांचा कडेलोट व्हायचा ती प्रेतं येऊन पडायची ती थेट धनगरवाडीच्या आसपासच्या जंगलात आणि त्यामुळे आसपासच्या परीसरात जंगली जनावरांचा सुळसुळाट खुप वाढला होता. त्यांची मेजवानी व्हायची पण जर कधी कडेलोट नसायचा तेव्हा ती हिंस्त्र जनावरं आसपासच्या लोकवस्तीत शिरायची. हिच कैफियत मांडायला सखाराम धनगर आणि इतर मंडळी रायगडी निघतात. त्यानंतरचा त्यांचा प्रवास आणि कथा वाचकाला इतकी गुरफटवुन टाकते कि शेवटच्या पानावरची शेवटची ओळ कधी वाचुन संपते, कळतही नाही. त्यांची स्वराज्यहेर खंडोजीची भेट मग सावित्री, वस्तादकाका, वाचतानाही भितीदायक दिसणारं जंगल, कधीही न पाहीलेलं महादेवाचं मंदीर, खंडोजीचा असणारा ट्विस्ट आणि मग बहिर्जी नाईक आणि मग थेट रायगड आणि महाराज, सगळं प्रत्यक्षात आपल्यासमोर घडतयं कि असा भास निर्माण करणारं असं हे पुस्तक. एखाद्या चित्रपटालाही लाजवेल अशी कथा, एकदा वाचली कि पुन्हा एकदा वाचण्याचा मोह आवरता येत नाही अशी कथा, ज्यामध्ये असं बरचं काही जे वाचल्याशिवाय कळणार नाही. अजुन एक असं कि सातासमुद्रापार जगातील अव्वल गणली जाणारी इस्त्राईलची गुप्तहेर संघटना मोसाद यांच्या अभ्यासक्रमात बहिर्जी नाईक आणि आपलं हेरखातं शिकवलं जातं अशी अभिमान वाटणारी घटना आपल्या राज्यात घडलीय त्याचीच हि गोष्ट...बाजिंद... ...इकडे खंडोजीने सावित्रीला उचलुन जंगलातुन बरेच बाहेर आणले होते. पुढे डोंगराची कडेतुट होती आणि हजारो हात खोल फेसाळणार्‍या नदीचे विशाल पात्र...खंडोजीने एकदा मागे पाहीले आणि ताडले कि शिर्क्यांची फौज पाठलाग करत आहे...त्याने कशाचाही विचार न करता सावित्रीसह स्वतःला त्या कडेतुट वरुन त्या विशाल नदीच्या पात्रात झोकुन दिले...आणि... त्यासाठी वाचा *पै.गणेश मानुगडे* लिखीत...*बाजिंद..!!!* © विश्वजीत श्रीपती शिंत्रे. मु.पो.इंचनाळ, ता.गडहिंग्लज,जि.कोल्हापुर ०९९२२३१३९१९ ...Read more