CHARLES HANDY

About Author


CHARLES HANDY, AUTHOR AND PHILOSOPHER, WAS BORN IN 1932 IN KILDARE, IRELAND. HE COMPLETED HIS ENTIRE EDUCATION FROM LONDON AND AMERICA. AFTER GRADUATING WITH A FIRST CLASS DEGREE FROM ORIEL COLLEGE, OXFORD, HE JOINED SHELL INTERNATIONAL IN MARKETING. SPECIALIZING IN ORGANIZATIONAL OPERATIONS AND MANAGEMENT, HANDY BEGAN STUDYING MANAGEMENT PSYCHOLOGY AT THE LONDON BUSINESS SCHOOL IN 1972.

लेखक आणि तत्वज्ञ असलेल्या चार्ल्स हॅन्डी यांचा जन्म १९३२ मध्ये किल्डरे, आयर्लंड येथे झाला. त्यांनी त्यांचे संपूर्ण शिक्षण लंडन आणि अमेरिकेतून पूर्ण केले. ओरियल कॉलेज, ऑक्सफर्ड येथून प्रथम श्रेणीत पदवी संपादन केल्यानंतर त्यांनी ‘शेल इंटरनॅशनल’साठी विपणन क्षेत्रात काम सुरू केले. ‘संस्थेचे कार्ये आणि व्यवस्थापन’ या विषयात विशेष प्रावीण्य प्राप्त केलेल्या हॅन्डी यांनी १९७२ मध्ये ‘लंडन बिझनेस स्कूल’मध्ये ‘व्यवस्थापन मानसशास्त्र’ शिकण्यास सुरुवात केली. १९७७ ते १९८१ दरम्यान त्यांनी विंडसर कॅस्टल येथील ‘स्टडी सेंटर’मध्ये ‘सामाजिक नैतिकता आणि मूल्ये’ यासंबंधी काम केले. १९८७ ते १९८९ या काळात त्यांनी लंडनच्या ‘रॉयल सोसायटी ऑफ आर्ट्स’चे अध्यक्षपद भूषवले. आत्तापर्यंत त्यांनी जवळ-जवळ सात ब्रिटीश विद्यापीठांकडून ‘डॉक्टरेट’ पदवी संपादन केली आहे. व्यवस्थानप क्षेत्रातील सर्वांत प्रभावशाली अशा ५०विचारवंतांमध्ये त्यांची गणना केली जाते. तर २००१ मध्ये ते या यादीत दुसऱ्या स्थानावर होते. सध्या ते नभोवाणी तसेच दूरचित्रवाणीवरचे नामांकित वक्ते म्हणून ओळखले जातात. जगभर त्यांच्या पुस्तकांच्या दहा लाखांहून अधिक प्रती खपल्या आहेत. सध्या हॅन्डी हे आपली पत्नी एलिझाबेथ व दोन मुलांसह इंग्लंड आणि इटली येथे वास्तव्य करत आहेत.
Sort by
Show per page
Items 1 to 1 of 1 total
SWARTHATUN PARARTHAKADE Rating Star
Add To Cart INR 250

Latest Reviews

रुपाली सोनवणे

#रुक #जाना #नही लेखक: Dr. भावेश भाटिया शब्दांकन: Dr: सचिन पाचोरकर अनुवाद: सुप्रिया वकील ​अंथरून पाहून पाय पसरावे... अह्ह.. त्या निर्जीव अंथरुणासाठी आपल्या सजीव पावलांना का त्रास द्यावा? असेच एक जबरदस्त आत्मचरित्र वाचून संपवलं आणि एक ऊर्जा निर्माणकरून गेलं, पुस्तकाचं नाव आहे `रुक जाना नहीँ ​डॉ. भावेश भाटिया यांची ही प्रेरणादायी कहाणी. शाळेत असताना आलेलं अकाली अंधत्व आणि त्यानंतर खडखडीत खडतर जीवनाचा सुरू झालेला प्रवास, पण या प्रवासात खचलेल्या बालमनाला त्यांच्या आईने दिलेलं बळ, प्रेरणा व आत्मसन्मानाची शिकवण आणि स्वाभिमानाचे धडे लेखकास पुरे होते. हा प्रवास सोपा नक्कीच नव्हता. चांगल्या धडधाकट व्यक्तीवर संकट आल्यावर दूर दूर पळणारे नातलग, मित्र परिवार, जातभाई... दृष्टी गेलेल्या व्यक्तीस कितपत आधार देतील? पण एक ऑपरेटर ते एक उद्योजक, `सनराईज कॅण्डल`चा विस्तार आणि स्वतःबरोबर अनेक दृष्टिहीन व्यक्तींना स्वतःच्या पायावर उभं करून रोजगार देणारा हा अवलिया किती अडथळे पार करून आलाय हे जाणून घेण्यासाठी पुस्तक वाचायला हवंच. ​कुठलाही वशीला नाही की कोणाची सहानुभूती नाही, स्वबळावर विविध प्रयोग करत उद्योग यशस्वी करणं सोपं नाही. यात ज्या ज्या देवमाणसांनी हातभार लावला त्यांचा पण उल्लेख आहे, पण त्या देवमाणसांनी देखील कधीच उपकारिक भाषा न करता व स्वाभिमान न दुखावता कशी मदत करता येऊ शकते हे त्यांच्या कृतीतून दाखवून दिलंय. लेखक फक्त उद्योग उभारून थांबले नाहीत तर त्यांनी सामाजिक जाणीवेचं भान देखील ठेवलंय. महाबळेश्वरमध्ये सनराईज कॅण्डल नावाने त्यांनी भव्य असा उद्योग परिसर आणि म्युझियम सुरू केलंय, तेथे अनेक दृष्टिहीन व्यक्तींना रोजगार मिळाला आहे त्याचबरोबर सर्वजण स्वाभिमानाने कष्ट करून जगत आहेत. हजारो आयुष्य त्यांनी उजळून टाकली आहेत. दोन वेळा राष्ट्रपती पुरस्कार सह एकून 46 पुरस्कारांचे ते मानकरी आहेत.विशेष म्हणजे सर्व पुरस्कार त्यांच्या योग्यतेनुसार दिले आहेत.. आणी अशा हजारो पुरस्कारांचे ते मानकरी आहेत असंच वाटत..त्यांच्या कामाची दखल रिलायन्स ग्रुप ने देखील घेतली आहे.व त्यांच्या पुस्तकास प्रस्तावना देखील नीता अंबानी यांनी दिली आहे.उद्योग करताना छोट्या छोट्या गोष्टी कसा प्रभाव करतात याच वर्णन देखील त्यांनी लिहिल आहे.. ​या कार्यात महत्त्वाचं योगदान त्यांच्या धर्मपत्नी नीता भाटिया यांनी दिलं आहे. दूरदृष्टी ठेवून आपल्या पतीस प्रोत्साहन देऊन, नवीन कल्पनेसह पाठिंबा देऊन त्यांना हुरूप देण्याचं काम त्यांनी केलंय. नीता भाटिया यांचं कर्तृत्व, त्यांचं पवित्र निस्वार्थी प्रेम या पुस्तकातून वाचताना आंतरिक वेगळी ऊर्जा मिळते. कलियुगातील देवी हा शब्द व मान त्यांना समर्पक वाटतो. पुस्तक सर्व वयोगटातील वाचक वाचू शकतात. मनाने खचलेल्या पण शरीराने धडधाकट असलेल्या प्रत्येक व्यक्तीने वरील पुस्तक नक्की वाचावं आणि आत्मसात करावं. एवढ्या उंचीवर असूनही जमिनीवर पाय असलेल व्यक्तिमत्व आहे. अगदी प्रेमळ पणे वागण बोलण सन्मान देण..ही दैवी देणगी त्यांच्या जवळ आहे. ...Read more