* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: WINNING IN TROUBLED TIMES
  • Availability : Available
  • Translators : GAURI GADEKAR
  • ISBN : 9788184989229
  • Edition : 1
  • Publishing Year : NOVEMBER 2015
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 232
  • Language : Translated From ENGLISH to MARATHI
  • Category : SELF HELP, HEALTH & PERSONAL DEVELOPMENT
Quantity
Buying Options:
  • Print Books:
CREFLO A. DOLLAR SHARES TRANSFORMING WAYS TO DEAL WITH THE CHALLENGES, HARDSHIPS, AND OPPORTUNITIES EVERYONE FACES TODAY. HE EQUIPS READERS TO MOVE BEYOND TRIALS IN AREAS SUCH AS MARRIAGE, FAMILY, FINANCES, RELATIONSHIPS, PARENTING, CAREER, AND HEALTH. EVEN THOSE SUFFERING FROM PERSONAL STRUGGLES AND ADDICTIONS CAN CLAIM VICTORY AND HEALING THROUGH FAITH IN GOD`S WORD. WITH THE RIGHT ATTITUDE AND MIND-SET, ANYONE CAN OVERCOME LIFE`S OBSTACLES AND MOVE ON TO MAXIMUM LIVING. READERS WILL DISCOVER THE KEYS TO ACQUIRING CHARACTER, HOPE, AND ANSWERS NECESSARY FOR GROWTH AND EXCELLENCE. DR. DOLLAR EQUIPS READERS WITH THE TOOLS NEEDED TO TRANSFORM THEIR THINKING, BRING THIS MESSAGE OF HOPE INTO EVERYDAY PRACTICE, AND PRODUCE REAL RESULTS IN THEIR LIVES.
जीवनमार्गातल्या कठीण प्रसंगांवर मात करून निर्भयपणे जीवनपथावर चालण्याचं मार्गदर्शन ‘बायबल’चा आधार घेऊन या पुस्तकात करण्यात आलं आहे. जीवनातील आव्हानांचं रूपांतर यशात कसं करावं, विचारांचं रूपांतर आचरणात करून त्यातून उत्तम फळ कसं मिळवावं, मनातले संघर्ष, सत्त्वपरीक्षा, एवढंच नव्हे; तर व्यसनांवर श्रद्धेने मात कशी करावी, हे यात सहजसोप्या भाषेत समजावले आहे. महत्त्वाचे म्हणजे, यात सध्या सर्वांनाच भेडसावणाऱ्या नकारात्मक भावनांवर विजय कसा मिळवावा, हे तपशीलवारपणे सांगितलं आहे. पुस्तकातले भूतकाळाच्या ओझ्यातून मुक्ती, न्यूनत्वावर विजय, संदेह-निर्भत्र्सना; तसंच नैराश्यावर मात आदी विषयांवरचे चिंतन आणि उपाय उपयुक्त व उद्बोधक आहेत.

No Records Found
No Records Found
Keywords
"#MARATHIBOOKS#ONLINEMARATHIBOOKS#TRANSLATEDMARATHIBOOKS#TBC#TRANSLATEDBOOKS@50% #VADALATILDEEPSTAMBH #WINNINGINTROUBLEDTIMES #वादळातीलदीपस्तंभ #SELFHELPHEALTH&PERSONALDEVELOPMENT #TRANSLATEDFROMENGLISHTOMARATHI #GAURIGADEKAR CREFLO DOLLAR "
Customer Reviews
  • Rating StarDAINIK SAMANA 28-02-2016

    जीवनपथ दर्शक... डॉ. क्रेफ्ली डॉलर लिखित ‘विंनिंग इन ट्रबल्ड टाइम्स’ या पुस्तकाचा वादळातील दीपस्तंभ या नावाने गौरी गाडेकर यांनी अनुवाद केला आहे. माणसाला जगताना आयुष्यात अनेकदा कठीण प्रसंगांना सामोर जावं लागतं. त्यामुळे माणूस कधी कधी खचून जातो. हतबल हतो. नैराश्याने घेरला जातो. मनात नकळत नकारात्मक भावना प्रबळ होऊ लागतात. अशा वेळी संकटांवर मात करण्यासाठी संघर्ष करण्याचे बळ मिळवण्यासाठी व सकारात्मक विचार करण्यासाठी मानसिक आधाराची गरज असते. लेखक डॉ. डॉलर हे धर्मोपदेशक व माजी उपचारक म्हणून कार्यरत असल्याने त्यांनी बायबलचा आधार घेऊन माणसाला मार्गदर्शन करण्याचा स्तुत्य प्रयत्न केला. माणसाच्या आयुष्यात अनेक समस्या उभ्या राहत असतात. आर्थिक, कौटुंबिक, सामाजिक, वैचारिक अशा सर्व स्तरावर समस्या, संघर्ष यास त्याला तोंड द्यावे लागते. त्यासाठी सश्रद्धतेमुळे त्याला मानसिक बळ मिळते. माणसाला समृद्धीची ओढ असते. लेखकाच्या मते पैसा हा समृद्धीचा फक्त एक भाग आहे. आरोग्य, नातेसंबंध, संसार, कुटुंब याबाबतही समृद्धी आवश्यक असते. आयुष्यात प्रत्येक क्षेत्रात यशस्वी होणं ही खरी समृद्धी. येशू खिस्ताशी जवळचं नातं जुळते तेव्हा आत्मा समृद्ध होतो. तेव्हा माझे विचार, निर्णय भावना निकोप व दृढ होतात. लेखकाने बायबलमधील सात पायऱ्यांच्या उदाहरणातून हे पटवून देण्याचा प्रयत्न केला आहे. त्याचबरोबर श्रमाचे महत्त्व, कामावरील निष्ठा याचे महत्त्व सांगितले आहे. तिसऱ्या विभागात नकारात्मक भावनांवर विजय मिळण्यासंदर्भात मार्गदर्शन आहे. आयुष्यात सामोर जावं लागणाऱ्या मानसिक द्वेष, भावनिक आघात, दुखावलं जाणं अशा अनेक गोष्टींवर मात करण्यासाठी देवानेच तरतूद करून ठेवली आहे. ‘देवाच्या शब्दाच्या आधारे अंत:करणचं रक्षण करा’ हा मंत्र लेखक सांगतात. संदेह व न्यूनगंड हे प्रगतीतील अडथळे ठरू शकतात. त्यामुळे आपण श्रद्धेवर ठाम राहू शकत नाही. देवाच्या प्रेमाने मन व्यापून टाकणे. स्वत:च्या भावनांशी संवाद साधणे असे उपाय लेखक सुचवतात. लोक चुकतात. पथभ्रष्ट होतात तेव्हा येशू आपल्याला क्षमा करतो. जवळ बोलावतो. लेखक म्हणतात, पापांची कबुली दिल्याने आपण त्यातून मुक्त होतो. देवाची आपल्यावरील प्रेमाची जाणीव व विश्वास यामुळे भीतीवर मात करता येते. स्वत:ला बदलता येते. ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

FRANKLIN MALIKA COMBO SET - 29 BOOKS
FRANKLIN MALIKA COMBO SET - 29 BOOKS by PAULETTE BOURGEOIS Rating Star
रश्मी मुसळे-साळगांवकर

लहानग्यांच्या विश्वातल्या छोट्या छोट्या गमतीजमती या पुस्तकांच्या मालिकेतून अगदी मजेशीर पद्धतीने मुलांसमोर येतात..त्या गोष्टी ऐकताना, वाचताना मूलं यात अगदी रमून जातात... शिवाय आजवर ससा आणि कासव यांव्यतिरिक्त इतर कथाविश्वात काहीसा दुर्लक्षित राहिलेलया कासवाच्या जगातही अनेक गंमती घडू शकतात ही नवखी कल्पना मुलांना भारीच आवडते... ...Read more

MARATHI DAULATICHE NARI SHILP
MARATHI DAULATICHE NARI SHILP by GOPAL DESHMUKH Rating Star
लोकसत्ता २२ जानेवारी २०२३.

बाईचे विश्व हे चूल आणि मूल एवढय़ापुरतेच मर्यादित नसते याची उदाहरणे आपल्याला इतिहासातसुद्धा पाहायला मिळतात. इतिहासात डोकावून पाहिले तर स्त्रियांचे आयुष्य हजार बंधनांनी जखडलेले होते. लहान वयातच मुलींची लग्नं केली जात असत. सतीची चाल, विधवांना केशपनाची सक्ती, सती जाणाऱ्या स्त्रियांच्या मरणाइतकेच सती न जाणाऱ्या विधवांचे जगणे भयंकर होते. अशा समाजातच काही स्त्रिया अशासुद्धा होऊन गेल्या ज्यांनी आपल्या कार्याने, आपल्या धाडसाने, शौर्याने महाराष्ट्राच्या जडणघडणीत मोलाची भर टाकली. समाजाचा स्त्रीकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलण्यात ज्यांचा मोलाचा वाटा आहे अशाच काही निवडक स्त्रियांचे चरित्र रेखाटन गोपाळ देशमुख यांनी ‘मराठी दौलतीचे नारी शिल्प’ या पुस्तकात केले आहे. जिजाऊमातेने बालशिवाजींची जडणघडण केली. अशा कर्तृत्ववान जिजाबाईंचे व्यक्तिचरित्र ‘राजमाता जिजाऊ’ या प्रकरणामध्ये सारांशरूपाने रेखाटण्याचा प्रयत्न लेखकाने केला आहे. तसेच शिवरायांच्या जीवनात ज्या आठ राण्या आल्या त्यांच्या जीवनकार्याचे वर्णन ‘राणीवसा’ या प्रकरणात येते. ‘महाराणी येसूबाई’ या प्रकरणात त्यांची स्वराज्यनिष्ठा व दूरदृष्टी कशी दिसून येते याचे वर्णन केले आहे. संकटसमयी संभाजी राजांना दिलेल्या सल्ल्यामुळे त्यांच्या कार्यात मदत कशी झाली याचेही वर्णन आले आहे. ताराबाई, उमाबाई दाभाडे, झाशीची राणी लक्ष्मीबाई यांनी युद्धभूमीवर शत्रूला तोंड कसे दिले. दर्याबाई निंबाळकर, पेशवा पत्नी गोपिकाबाई, रमाबाई, गंगाबाई यांनाही व्यक्तिगत सुखदु:खाबरोबरच मराठी दौलतीच्या वाटचालीत आपली भूमिका कशी पार पाडावी लागली याचीही माहिती पुस्तकात देण्यात आली आहे. दौलतीचा कारभार करताना अहिल्याबाईंना तीस वर्षे वैयक्तिक दु:खांना सामोरे जावे लागले. या साऱ्या दु:खांना बाजूला सारून उत्कृष्ट कार्य करून त्या ‘साध्वी पुण्यश्लोक अहिल्या’ कशा झाल्या याचा थोडक्यात आढावा घेतला आहे ‘अहिल्याबाई होळकर’ या प्रकरणात. तसेच पुतळाबाई आणि रमाबाई यांचे पतिनिष्ठेचे वर्णनही वाचायला मिळते. या सर्व व्यक्तिचरित्रांपैकी ‘राणी लक्ष्मीबाई’ यांचे चरित्र वाचताना त्यांची धाडसी वृत्ती, चिकाटी, येईल त्या प्रसंगाला न घाबरता शौर्याने सामोरे जाण्याची वृत्ती व शेवटी त्यांचा झालेला शोकात्मक शेवट आपल्या मनाला चटका लावून गेल्याशिवाय राहात नाही. वयाच्या चौदाव्या वर्षी गंगाधरराव यांच्याशी विवाह झाल्यानंतर आपल्या मुलाच्या आणि पतीच्या निधनानंतर शोक करत न बसता ही वीरांगना आपला दत्तक मुलगा दामोदर याला घेऊन ब्रिटिशांच्या कटू कारस्थानांना तोंड देण्यास सज्ज झाली होती. यातच तिला वीरमरण आले. हे वीरमरण येतानासुद्धा ती मोठय़ा शौर्याने अखेरच्या क्षणापर्यंत लढली आणि जेव्हा आपला देह आपल्याला साथ देत नाही हे लक्षात आले तेव्हा तिने आपल्या अनुयायांना आपला देह शत्रूच्या हातात पडता कामा नये, त्याला अग्नी द्या, असे सांगितले. अशा या वीरांगनेची गर्जना ‘मै मेरी झांसी नही दूंगी’ ही आजही अनेक स्त्रियांना आपल्या कामात प्रेरणा देणारी अशी आहे. राणी लक्ष्मीबाईच्या मरणाविषयी अनेक हकीकती उपलब्ध आहेत. त्यांचा उल्लेखही या पुस्तकात आला आहे. या पुस्तकातील स्त्रिया इतिहासकालीन असल्याने काही ठिकाणी ऐतिहासिक संदर्भाची पुनरावृत्ती झाल्यासारखे वाटते; पण ते येणेसुद्धा गरजेचे आहे. साध्या सोप्या भाषेत ही स्त्री चरित्रे आपल्याला वाचायला मिळतात. थोडक्यात असे म्हणता येईल की, इतिहासकाळातील थोर महिला विभूतींच्या जीवनकार्याचा अल्पांशाने सार वाचकांपुढे मांडण्याचा प्रयत्न लेखक गोपाळ देशमुख यांनी केला आहे, तो कौतुकास्पद आहे. ...Read more