* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: THE HUNGRY SPIRIT
  • Availability : Available
  • Translators : PRASHANT TALNIKAR
  • ISBN : 9788190734455
  • Edition : 2
  • Publishing Year : NOVEMBER 2008
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 256
  • Language : Translated From ENGLISH to MARATHI
  • Category : SELF HELP, HEALTH & PERSONAL DEVELOPMENT
Quantity
Buying Options:
  • Print Books:
THERE IS SO MUCH CONTROVERSY IN THIS WORLD. ON ONE HAND, ONE THIRD OF THE TOTAL WORKERS ARE WITHOUT ANY WORK. ON THE OTHER HAND, TWO THIRD OF THE WORLD TRADE IS CONCENTRATED WITH ONLY 500 OF THE COMPANIES ALL OVER THE WORLD. THESE COMPANIES ARE ANSWERABLE TO THE SHARE HOLDERS. ON THE BACKGROUND OF THIS CONTROVERSY AND UNCERTAINTY, CHARLES HENRY EARNESTLY PENS DOWN THE NEED OF CREATING A FUTURE WHICH WILL BE MORE CERTAIN THAN THE CURRENT EASILY SHAKABLE CULTURE AND VALUES. THIS BOOK GIVES AN INITIATIVE. IT EXPRESSES THE AUTHENTICITY OF THE WRITER AND HIS THOUGHTS, AT THE SAME TIME, IT PROVOKES OUR HOUGHTS.THE WONDERFUL PART OF IT IS THE OPTIMISM. WHEREVER THE READING OF THIS BOOK IS DONE I AM SURE IT WILL CREATE AN ATMOSPHERE OF DIFFERENCE OF OPINIONS AND ARGUMENTS. "ONCE AGAIN CHARLES HANDY: THE HUNGRY SPIRIT IS THE MORAL OF THE AUTHOR`S LIFE. THIS IS IN A WAY HIS PERSONAL APPROACH SO AS TO STAND FIRMLY ROOTED IN THE WORLD OF CAPITALISM. HIS STYLE IS DIFFERENT, HE DOES NOT LECTURE US ABOUT ANYTHING, ON THE CONTRARY WITH THE HELP OF SMALL STORIES HE ELABORATES HIS POINT MAKING IT VERY INTERESTING. HIS INTELLECTUAL THINKING IS REVEALED ON EACH OF THE PAGE OF THIS BOOK." PEOPLE`S MANAGEMENT: "THE HUNGRY SPIRIT: IS A RESEARCH WORK ON THE INDUSTRY, TRADE AND SOCIAL PROBLEMS. IT IS A HIGHLY EFFECTIVE AND INTELLIGENT PRESENTATION OF THE PROBLEMS." MODERN MANAGEMENT: "CHARLES HANDY IS THE ONE AND ONLY MANAGEMENT BOSS OF BRITAIN." DIRECTOR MAGAZINE: AT LAST, CHARLES HANDY IS AN AUTHOR; HE IS ALSO AN EFFECTIVE AND MOST POPULAR SPEAKER ON THE RADIO AND T.V. MORE THAN 10 LAC COPIES OF HIS BOOK HAVE BEEN SOLD.
एकीकडे जगातील एकतृतीयांश कामगार बेकार आहेत, तर त्याचवेळी दुसरीकडे जगाच्या एकूण व्यापाराच्या दोनतृतीयांश व्यापार फक्त ५०० कंपन्यांच्या हातांत आहे आणि या कंपन्या फक्त त्यांच्या गुंतवणूकदारांनाच उत्तरं देण्यास बांधील आहेत. या विषमता आणि अनिश्चिततेच्या पाश्र्वभूमीवर, बाजारपेठ अभिमुख भांडवलशाहीच्या मूल्यांपेक्षा अधिक चिरंतन आणि समृद्ध मूल्यं असणारं भविष्य निर्माण करण्याची गरज चार्ल्स हॅन्डी अतिशय कळकळीनं मांडतात. द हंग्री स्पिरीट हे एक प्रेरणादायी पुस्तक आहे. या पुस्तकात लेखकाच्या व्यक्तिगत विचारांची तीव्रता तर जाणवतेच, पण काही वेळा ते आपल्याही विचारांना चालना देतं आणि मुख्यत: त्यात आशावाद ठासून भरलेला आहे. हे पुस्तक जिथे कुठे वाचलं जाईल, तिथे मतभेद आणि वादविवाद नक्कीच उफाळून येतील. ‘‘पुन्हा एकदा चार्ल्स हॅन्डी : द हंग्री स्पिरीट म्हणजे आयुष्यभराच्या अनुभवांचं सार आहे. भांडवलशाही समाजामध्ये कशी तग धरायची, याची ही एक व्यक्तिगत पद्धत आहे. हॅन्डी यांची शैली गोष्टीरूपानं विचार मांडण्याची असल्यामुळे पुस्तक खूपच वाचनीय झालं आहे आणि त्यांची विद्वत्ता प्रत्येक पानावर दिसून येते. हे एक महत्त्वपूर्ण पुस्तक आहे.’’ : पीपल मॅनेजमेंट. ‘‘द हंग्री स्पिरीट हा उद्योग-व्यापार संबंधित तसंच सामाजिक समस्यांचा एक विस्तृत शोध आहे. या समस्यांंचं हे एक चतुर, विद्वत्तापूर्ण आणि विवेकी विश्लेषण आहे.’’ : मॉडर्न मॅनेजमेंट. ‘‘चार्ल्स हॅन्डी हे ब्रिटनचे एकमेव जागतिक दर्जाचे व्यवस्थापन गुरू आहेत.’’ : डायरेक्टर मासिक. चार्ल्स हॅन्डी हे एक लेखक आणि नभोवाणी तसेच दूरचित्रवाणीवरचे नामांकित वक्ते आहेत. जगभर त्यांच्या पुस्तकांच्या दहा लाखांहून जास्त प्रती खपल्या आहेत.
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
"#MARATHIBOOKS#ONLINEMARATHIBOOKS#TRANSLATEDMARATHIBOOKS#TBC#TRANSLATEDBOOKS@50% #SWARTHATUNPARARTHAKADE #THEHUNGRYSPIRIT #स्वार्थातूनपरमार्थाकडे #SELFHELPHEALTH&PERSONALDEVELOPMENT #TRANSLATEDFROMENGLISHTOMARATHI #PRASHANTTALNIKAR #CHARLESHANDY "
Customer Reviews
  • Rating StarDAINIK AIKYA SATARA 25-01-2009

    भांडवलशाहीचे आशावादी तत्त्वज्ञान… चार्ल्स हॅन्डी हे ब्रिटनमधील जागतिक दर्जाचे व्यवस्थापन गुरू आहेत. व्यापार उद्योगातील असमतोल आणि त्यामुळे निर्माण होणारा सामाजिक बेबनाव भांडवलशाहीचे सद्य:स्वरूप आणि तिची अधिक प्रगत अशी भावी दिशा. छोट्या गावातील परस्प संबंध आणि शहरीकरणानंतर माणसामाणसांत येणारा दुरावा. गरीब-श्रीमंत यांच्यातील वाढता भेदभाव, पृथ्वीच्या पर्यावरणात मानवी चंगळवादाने निर्माण होणारा अनर्थ, ज्यांचा उपयोग आणि उपभोग आपण कधीच करून शकणार नाही इतके अतिरिक्त आणि अनावश्यक उत्पादन जगातील तीस टक्के कामगार बेकार असताना उपभोग्य वस्तूंच्या जलद उत्पादनासाठी विकसित करण्यात येणारी कार्यक्षमता, अनेक देशांच्या संपूर्ण वार्षिक अंदाजपत्रकापेक्षाही अधिक उलाढाल असणाऱ्या सतराव्या अग्रगण्य बहुराष्ट्रीय कंपन्या, काळ, तंत्रज्ञान आणि आर्थिक प्रगतीमुळे जनसामान्यांतील असंतोष आणि चिंता आपोआप दूर होऊ शकतील हा भ्रामक आशावाद आर्थिक आणि शास्त्रीय प्रगतीने सर्व प्रश्न सुटतील या गृहीतकातील भ्रामक भाबडेपणा आणि मतलबी दांभिकपणा, शासनव्यवस्थेने सगळ्या नागरिकांचे हित समोर ठेवून सभ्य आणि समताधिष्ठित कायदेकानून करावे की काही मूठभर बहुराष्ट्रीय उत्पादकांच्या नफावाढीसाठी आणि वाढत्या करसंकलनासाठी त्यांच्यावर सवलतींचा मारा करावा आणि सर्वसामान्य नागरिकाला स्वातंत्र्य आणि बांधिलकी यांच्यातला सुवर्णमध्य गाठणे अशक्य व्हावे. सर्वभक्षक अशा या शासनव्यवस्थेची आणि बहुराष्ट्रीय कंपन्यांची अधाशी भूक ही दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. ही भूक आटोक्यात राहिली तरच सर्वसामान्य व्यक्तीला सन्मानाचे जिणे जगणे शक्य होईल. त्यासाठी भांडवलशाहीने आता नवा टप्पा गाठायला हवा. चार्ल्स हॅन्डी यांनी त्याबाबत एक मूलगामी विचार मांडला आहे. भांडवलशाही आणि उदारमतवादी लोकशाहीमुळे शक्य झालेले स्वातंत्र्य आणि उपलब्ध झालेले वेगवेगळे पर्याय हे अधिकाधिक वस्तूंचा संचय करण्यात वाया घालवू नका, जास्तीत जास्त लोकांना स्वातंत्र्य मिळू द्या, त्यासाठी तुमच्याएवढेच पर्याय त्यांनाही मिळवून देण्यासाठी जागरूक राहा, त्याबाबत सुयोग्य स्वार्थीपणा दाखवा अशी हॅन्डी यांची भूमिका आहे. ‘हे एक आशावादी तत्त्वज्ञान आहे’ असे हॅन्डी यांचे प्रतिपादन आहे. शामरॉक आणि संघराज्याच्या स्वरूपाच्या संघटना, रोजगार मिळवून देणाऱ्या कामाचे स्वरूप या दोन कल्पनांवर त्यांचा भर आहे. दि हंग्री स्पिरिट या पुस्तकाचे तीन भाग पाडले आहेत. सद्य:कालीन भांडवलशाहीचे दोष पहिल्या भागात भांडवलशाहीच्या सद्य:कालीन स्वरूपाचे विश्लेषण करून तिच्यातील दोषांची आणि त्रुटींची चर्चा केली आहे. कार्यक्षमतेत वाढ होत आहे. परंतु प्रगत तंत्रज्ञानामुळे नोकऱ्या घटत आहेत; त्यामुळे कार्यक्षमता हीच एक धोंड बनत आहे. भांडवलशाही म्हणजे एक मुक्त तत्त्वप्रणाली; पैसा हे या प्रणालीत एक साधन आहे, साध्य नव्हे, जीवनाची विविध साधनं मिळवून देण्याची यंत्रणा भांडवलशाहीत आहे. तो साम्यवादात नाही. साम्यवाद गरीबीचे उच्चाटन, रोजगाराची हमी आणि प्रत्येकाला अन्न-वस्त्र निवारा यांचा आग्रह धरतो; परंतु त्या त्या व्यक्तीला ते मिळवून देण्याचा मार्ग मात्र साम्यवादाकडे नाही. भांडवलशाही ही केवळ एक यंत्रणा आहे आणि तिचा कार्यकारणभाव ठरवण्याची जबाबदारी स्वत:पुरती प्रत्येक व्यक्तीवर आहे. भांडवलशाहीचा साचा होऊ शकत नाही. भांडवलशाही कितीही यशस्वी ठरली तरी भांडवलशाही कशासाठी या प्रश्नाचं उत्तर देण्याची ताकद तिच्यात नाही. भांडवलशाहीच्या सार्थकतेसाठी आपल्याला आपल्या स्वत:साठी आणि इतरांसाठी जीवनाकडून काय हवं आहे या संबंधीची अधिक नेमकी, चांगली समजूत सर्वंकष जाणीव आवश्यक आहे. या जाणिवेमध्ये पैशाला योग्य ते महत्त्व असेल परंतु त्याचे फाजील स्तोम माजवले जाणार नाही. शासनाच्या दृष्टीने भांडवलशाही सांभाळणे ही एक महाकर्मकठीण बाब आहे. बाजारपेठेचा भस्मासुर सर्व काही गिळंकृत करू शकेल. भांडवलशाहीवर त्यासाठी अंकुश हवा; त्यासाठी लोकांची सामूहिक इच्छाशक्ती जागवावी लागेल. दुसऱ्या भागात व्यक्तिगत सार्वभौमत्वात उद्घोष करण्यात आला आहे. आपले जीवन हे आपले स्वत:चे आहे. आपल्या जगण्याचा उद्देश त्यासाठी स्पष्ट जाणवायला हवा. हा उद्देश ठरवण्यासाठी काही तात्त्विक अधिष्ठान लागते. हा उद्देश केवळ आर्थिक व्यवस्थेने ठरवता येत नाही. ठरवू नये. विशिष्ट शासकीय पद्धत, विशिष्ट शासकीय धोरण, बाजारपेठेचे स्वरूप याद्वारे आपल्या जीवनाचे उद्दिष्टे ठरवणे इष्ट नाही. आपल्या वैयक्तिक अस्तित्वाचा आणि जीवनाचा हेतू काय आहे, काय असावा हे प्रथम आपण ठरवायला हवे. त्याचा निरोप विचारबुद्धी गहाण टाकून विशिष्ट धार्मिक दंडक वा नीतिनियम प्रमाण मानायला आता लोक तयार नाहीत. धार्मिकता अंतरात्म्याशी संपर्क साधण्याचे मार्ग दाखवते. त्या अर्थाने महत्त्वपूर्ण असते चार्ल्स हॅन्डी या संदर्भात सुयोग्य स्वार्थीपणाची संकल्पना मांडतात. तिच्यासाठी स्वहिताचा अर्थ नव्याने लावताना आर्थिक बाबींवर फार जोर देण्याचे टाळावे असे म्हणतात. स्वहितावर आधारित प्रगती ही आर्थिक प्रगतीपेक्षा व्यापक हवी. आर्थिक सुरक्षिततेबरोबर सामाजिक सुरक्षिततेलाही महत्त्व असते. टिवूâन राहण्याची इच्छाही महत्त्वाची ठरते. बाह्य गोष्टींद्वारे तसेच आंतरिक गोष्टींद्वारे प्रेरणा मिळते. स्वार्थीपणामागची नैतिकता ही सुयोग्य पातळीवर राहिली तर तो सर्वांनी हितावह ठरते. इतरांबरोबर नैतिकता ही सुयोग पातळीवर राहिली तर ती सर्वांना हितावह ठरते. इतरांबरोबर राहून काम करणे हेही एक मूल्य आहे. माणसाच्या स्वास्थ्यासाठी त्याची गरज आहे. अधिक सभ्य आणि सुखी समाज तिसऱ्या भागात अधिक चांगल्या भांडवली व्यवस्थेकडे जाण्याचे, अधिक सभ्य व सुखकारक समाजाकडे जाण्याचे मार्ग सुचवण्यात आले आहेत. भांडवलशाहीला सभ्यता देण्यासाठी संस्था, शिक्षणव्यवस्था, शासकीय प्रणाली, वैयक्तिक जबाबदारीची उन्नत जाणीव या सर्व गोष्टींची गरज आहे. बर्टेलसमान (प्रसारमाध्यमातील एक महत्त्वपूर्ण कंपनी-उलाढाल ८२ लक्ष पौंड) च्या उदाहरणाद्वारे सध्याच्या व्यवस्थापनाचे स्वरूप स्पष्ट करण्यात आले आहे. ब्रँडनेमबद्दलचा विश्वास निर्माण करणे हे एक मोठे दिव्य असते. सुयोग्य शिक्षणाद्वारे माहिती, विश्लेषण, आकडेवारी, क्रीडा, अंतज्र्ञान, भावना, व्यवहार, नातेसंबंध, संगीत वगैरे बाबतीतील बुद्धिमत्तेचा विकास साधायला हवा याकडे लक्ष वेधले आहे. आयुष्यही एक लांब पल्ल्याची मॅरेथॉन शर्यत आहे, याचेही भान हवे, असे हॅन्डी बजावतात. सुयोग्य शिक्षण या प्रकरणात शेवटी चार्ल्स हॅन्डी अनेक अभिनव कल्पना मांडतात. शाळा-कॉलेजातून ज्ञान देण्याची जी शिक्षणपद्धती आहे, ती मुलामुलींना बाह्य जगापासून दूर ठेवते. शिक्षण घेताना मुलांना बाहेरच्या जगाचेही अनुभव आवश्यक आहेत. तेव्हा चार्ल्स हॅन्डी युनिव्हर्सिटी र्आफ कम्युनिटी, व्यावसायिक विद्यापीठ, जीवनविषयक विश्वविद्यापीठ यासारख्या कल्पनांचा पुरस्कार करतात. देशाने, शासनाने आपल्या आयुष्याचे व्यवस्थापन करण्याऐवजी ते अधिक सुखकर करण्याकडे लक्ष द्यावे; आपण प्रजानन नाही, नागरिक आहो हे शासनाने लक्षात ठेवावे. पुरेसं मिळवल्याची तृप्तीची, समाधानाची भावना नागरिकांमध्ये निर्माण व्हावी यासाठी शासनाने आवश्यक ती संसाधने पुरवावी. हे लोकांचा सेवक असलेल्या शासनाचे कर्तव्य आहे. जीवनाचे पायाभूत घटक शासनाने पुरवायला हवेत. हे घटक केवळ उच्च वर्गीयांसाठी सीमित राहू नयेत, ते कमजोर वर्गालाही सहज साध्य हवेत. त्यामुळे त्यांनाही समर्थ होणे शक्य व्हावे असा दृष्टिकोन हवा. कार्यक्षमता आणि परिणामकारकता आंतरराष्ट्रीय उद्योगक्षेत्रात स्पर्धात्मक वातावरणात क्रमप्राप्त आहे. परंतु जेथे अधिक लोक लागतात त्या क्षेत्रात (उदाहरणार्थ सरकारी कामकाज) निकष जरासे सैल करून तांत्रिकदृष्ट्या आवश्यक त्यापेक्षा जास्त लोकांना कामावर ठेवावे असाही सल्ला हॅन्डी यांनी दक्षिण आफ्रिकन सरकारला दिला होता. बेकारभत्ता देण्यापेक्षा हा मार्ग श्रेयस्कर असे त्यांना वाटते. लोकांचा संपूर्ण माहिती देणे, त्यांचे मत जाणून निर्णय घेणे हा मार्ग श्रेयस्कर असे त्यांना वाटते. लोकांचा सेवक असलेल्या शासनाने लोकांवर वाटेल तशी सक्ती करू नये, लोकांच्या मर्जीने आणि संमतीने त्यांच्याचसाठी काम करावे. लोकांना संपूर्ण माहिती देणे, त्यांचे मत जाणून निर्णय घेणे हा मार्ग श्रेयस्कर. याबाबतीत भलेबुरे अनुभव ग्रामपंचायतीपासून संसदेपर्यंत सर्वत्र आलेले आहेत. जबाबदार सुजाण नागरिकत्व आणि व्यापक जनहित यावर भर दिला तर त्यातून मार्ग निघेल. जबाबदारी हक्कातून जन्मते. खऱ्या सुयोग्य स्वार्थासाठी आपली जबाबदारीची जाणीवच प्रखर करायला हवी असा याचा अर्थ आहे. ‘दि हंग्री स्पिरिट’मुळे जागतिक समस्यांवरचा, राजकीय व्यवस्थेबाबतचा तोडगा एका नव्या भूमिकेतून समोर येतो. ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

BACKSTAGE
BACKSTAGE by MONTEK SINGH AHLUWALIA Rating Star
महाराष्ट्र टाईम्स.. ६.९.२०२६

भारताच्या आर्थिक सुधारणांवर अनेक पुस्तके आजवर प्रसिद्ध झाली आहेत. काहींमध्ये आकडेवारीचे जंजाळ असते, काही धोरणांचे विश्लेषण करतात, तर काही विशिष्ट नेत्यांची जाहिरातबाजी करतात. मात्र माँटेकसिंग अहलुवालिया यांचे `बॅकस्टेज : भारताच्या उच्च वाढीच्या र्षांमागची कहाणी` हे पुस्तक या सगळ्यांपेक्षा वेगळे ठरते. कारण हे पुस्तक भारताच्या आर्थिक परिवर्तनाची कथा बाहेरून पाहणाऱ्या अभ्यासकाने नव्हे, तर त्या परिवर्तनाच्या केंद्रस्थानी उभ्या असलेल्या व्यक्तीने सांगितलेली आहे. जी. बी. देशमुख यांनी मूळ इंग्रजी पुस्तकाचा केलेला मराठी अनुवाद सरस उतरला आहे. पुस्तकाच्या सुरुवातीलाच माँटेकसिंग एक गोष्ट स्पष्ट करतात, ती म्हणजे, हे पुस्तक आत्मकथन नाही. आत्मप्रौढी मिरवण्यासाठी नव्हे, तर भारताच्या आर्थिक सुधारणांचा प्रवास समजावून सांगण्यासाठी अहलुवालिया हे पुस्तक लिहितात. विषयाच्या अनुषंगाने पुस्तकात त्यांच्या वैयक्तिक आयुष्यातील संदर्भ येतात, पण ते आर्थिक आणि राजकीय घडामोडी समजावून सांगण्यापुरतेच. सिकंदराबादमधील मध्यमवर्गीय वातावरणातून सुरू झालेला त्यांचा प्रवास दिल्ली स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स, ऑक्सफर्ड, जागतिक बँक, अर्थ मंत्रालय, योजना आयोग आणि अखेर देशाच्या सर्वोच्च आर्थिक धोरणनिर्मितीच्या केंद्रापर्यंत पोहोचतो. हा प्रवास वाचताना स्वतंत्र भारताच्या आर्थिक विचारसरणीचा विकासक्रम उलगडत जातो. पुस्तकाचे केंद्रस्थान अर्थातच १९९१च्या आर्थिक संकटाचे आहे. त्यावेळी देशाकडे काही आठवड्यांच्या आयातीपुरताही डॉलर शिल्लक नव्हता. सोन्याचा साठा गहाण ठेवण्याची वेळ आली होती आणि आर्थिक दिवाळखोरीची शक्यता प्रत्यक्ष समोर उभी होती. अशावेळी सरकारने घेतलेले निर्णय, त्यामागील तणाव, राजकीय अनिश्चितता आणि प्रशासकीय संघर्ष यांचे वर्णन पुस्तकात अत्यंत जिवंतपणे आले आहे. नाणेनिधी किंवा जागतिक बँकेच्या दबावामुळे या सुधारणा झाल्याची धारणा माँटेकसिंग ठामपणे नाकारतात. हे पुस्तक आर्थिक सुधारणांना कोणत्याही प्रकारच्या विचारधारेच्या चष्म्यातून पाहत नाही. लेखक ना मुक्त बाजाराचे अंधसमर्थन करतात, ना राज्यनियंत्रित व्यवस्थेचे. त्यांचा दृष्टिकोन व्यवहारवादी आहे. भारतासारख्या लोकशाही देशात सुधारणा एका झटक्यात होत नाहीत; त्या राजकीय वास्तवाशी जुळवून घेत हळूहळू पुढे सरकतात, हे ते वारंवार. अधोरेखित करतात. पुस्तकात अनेक ठिकाणी `सुधारणा` हा आर्थिक नव्हे, तर राजकीय प्रक्रियेचाही विषय आहे, हे प्रकर्षाने जाणवते. अहलुवालिया या पुस्तकात अनेक व्यक्ती, अधिकारी, अर्थतज्ज्ञ आणि राजकीय नेत्यांच्या योगदानाचा उल्लेख करतात. नरसिंह राव, मनमोहन सिंग, पी. चिदंबरम, यशवंत सिन्हा, जसवंत सिंह यांच्यापासून ते विविध सनदी अधिकाऱ्यांपर्यंत अनेकांची भूमिका ते प्रामाणिकपणे नोंदवतात. योजना आयोगाचे उपाध्यक्ष म्हणून काम करताना अहलुवालिया यांनी जवळून अनुभवलेला काळ येथे उभा राहतो. सन २००४ ते २०११ या काळातील उच्च आर्थिक वाढ, दारिद्रयनिर्मूलनातील प्रगती, पायाभूत सुविधांमध्ये झालेली वाढ आणि ग्रामीण विकासाच्या कार्यक्रमांचे मूल्यमापन ते करतात. विशेषतः भारताने सलग अनेक वर्षे सात ते आठ टक्क्यांच्या दरम्यान वाढ नोंदवली, ती केवळ जागतिक परिस्थितीचा. परिणाम नव्हती; १९९० नंतरच्या सुधारणांनी घातलेल्या पायावर उभे राहून ती शक्य झाली, हा त्यांचा युक्तिवाद पटण्याजोगा वाटतो. मात्र पुस्तकाचे खरे सामर्थ्य यशोगाथेत नाही, तर आत्मपरीक्षणात आहे. यूपीए-२ दरम्यान निर्माण झालेली निर्णयप्रक्रियेतील अडचण, गुंतवणुकीतील वातावरण आणि धोरणात्मक संकोच यावर लेखक मंदी, भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे निर्माण झालेले वातावरण आणि धोरणात्मक संकोच यावर लेखक थेट भाष्य करतात. अनुवादक जी. बी. देशमुख यांनी मूळ पुस्तकातील आर्थिक संकल्पना सहज आणि प्रवाही मराठीत मांडल्या आहेत. यात कृत्रिमता जाणवत नाही. आर्थिक विषयावरील पुस्तक असूनही भाषा जड वाटत नाही. आर्थिक सुधारणांच्या व्यापक सामाजिक परिणामांचा स्वतंत्र आणि सविस्तर ऊहापोह येथे अपेक्षेपेक्षा कमी आढळतो. मात्र, हे पुस्तक ज्या उद्देशाने लिहिले गेले आहे त्या उद्देशात ते अत्यंत यशस्वी ठरते. `बॅकस्टेज` हे केवळ पुस्तक नाही; ते भारताच्या आर्थिक परिवर्तनाचा प्रत्यक्षदर्शी दस्तऐवज आहे. १९९१ नंतर भारताने घेतलेल्या वळणाचा अर्थ समजून घ्यायचा असेल, उच्च वाढीच्या वर्षामागील वास्तविक कथा जाणून घ्यायची असेल आणि धोरणनिर्मितीच्या पडद्यामागे काय घडत असते याचा मागोवा घ्यायचा असेल, तर हे पुस्तक अभ्यासणे आवश्यक ठरते. भारतीय अर्थव्यवस्थेच्या आर्थिक सुधारणांचा इतिहास आणि त्यांचे परिणाम समजून घेण्यासाठी हे पुस्तक एक महत्त्वाचा संदर्भग्रंथ म्हणून ओळखले जाऊ शकते. मराठीत उपलब्ध असलेला हा अनुवाद त्या दृष्टीने विशेष स्वागतार्ह आहे. ...Read more

HACHYUKISUNASKI
HACHYUKISUNASKI by ABA MAHAJAN Rating Star
Dinesh

This is a different planet. This is a different world. And this is a truly different book. I loved it. You should also buy it and read it. I’m sure you will love it too. Hachyukisunaski is a fantastic Book.