* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: THE HUNGRY SPIRIT
  • Availability : Available
  • Translators : PRASHANT TALNIKAR
  • ISBN : 9788190734455
  • Edition : 2
  • Publishing Year : NOVEMBER 2008
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 256
  • Language : Translated From ENGLISH to MARATHI
  • Category : SELF HELP, HEALTH & PERSONAL DEVELOPMENT
Quantity
Buying Options:
  • Print Books:
THERE IS SO MUCH CONTROVERSY IN THIS WORLD. ON ONE HAND, ONE THIRD OF THE TOTAL WORKERS ARE WITHOUT ANY WORK. ON THE OTHER HAND, TWO THIRD OF THE WORLD TRADE IS CONCENTRATED WITH ONLY 500 OF THE COMPANIES ALL OVER THE WORLD. THESE COMPANIES ARE ANSWERABLE TO THE SHARE HOLDERS. ON THE BACKGROUND OF THIS CONTROVERSY AND UNCERTAINTY, CHARLES HENRY EARNESTLY PENS DOWN THE NEED OF CREATING A FUTURE WHICH WILL BE MORE CERTAIN THAN THE CURRENT EASILY SHAKABLE CULTURE AND VALUES. THIS BOOK GIVES AN INITIATIVE. IT EXPRESSES THE AUTHENTICITY OF THE WRITER AND HIS THOUGHTS, AT THE SAME TIME, IT PROVOKES OUR HOUGHTS.THE WONDERFUL PART OF IT IS THE OPTIMISM. WHEREVER THE READING OF THIS BOOK IS DONE I AM SURE IT WILL CREATE AN ATMOSPHERE OF DIFFERENCE OF OPINIONS AND ARGUMENTS. "ONCE AGAIN CHARLES HANDY: THE HUNGRY SPIRIT IS THE MORAL OF THE AUTHOR`S LIFE. THIS IS IN A WAY HIS PERSONAL APPROACH SO AS TO STAND FIRMLY ROOTED IN THE WORLD OF CAPITALISM. HIS STYLE IS DIFFERENT, HE DOES NOT LECTURE US ABOUT ANYTHING, ON THE CONTRARY WITH THE HELP OF SMALL STORIES HE ELABORATES HIS POINT MAKING IT VERY INTERESTING. HIS INTELLECTUAL THINKING IS REVEALED ON EACH OF THE PAGE OF THIS BOOK." PEOPLE`S MANAGEMENT: "THE HUNGRY SPIRIT: IS A RESEARCH WORK ON THE INDUSTRY, TRADE AND SOCIAL PROBLEMS. IT IS A HIGHLY EFFECTIVE AND INTELLIGENT PRESENTATION OF THE PROBLEMS." MODERN MANAGEMENT: "CHARLES HANDY IS THE ONE AND ONLY MANAGEMENT BOSS OF BRITAIN." DIRECTOR MAGAZINE: AT LAST, CHARLES HANDY IS AN AUTHOR; HE IS ALSO AN EFFECTIVE AND MOST POPULAR SPEAKER ON THE RADIO AND T.V. MORE THAN 10 LAC COPIES OF HIS BOOK HAVE BEEN SOLD.
एकीकडे जगातील एकतृतीयांश कामगार बेकार आहेत, तर त्याचवेळी दुसरीकडे जगाच्या एकूण व्यापाराच्या दोनतृतीयांश व्यापार फक्त ५०० कंपन्यांच्या हातांत आहे आणि या कंपन्या फक्त त्यांच्या गुंतवणूकदारांनाच उत्तरं देण्यास बांधील आहेत. या विषमता आणि अनिश्चिततेच्या पाश्र्वभूमीवर, बाजारपेठ अभिमुख भांडवलशाहीच्या मूल्यांपेक्षा अधिक चिरंतन आणि समृद्ध मूल्यं असणारं भविष्य निर्माण करण्याची गरज चाल्र्स हॅन्डी अतिशय कळकळीनं मांडतात. द हंग्री स्पिरीट हे एक प्रेरणादायी पुस्तक आहे. या पुस्तकात लेखकाच्या व्यक्तिगत विचारांची तीव्रता तर जाणवतेच, पण काही वेळा ते आपल्याही विचारांना चालना देतं आणि मुख्यत: त्यात आशावाद ठासून भरलेला आहे. हे पुस्तक जिथे कुठे वाचलं जाईल, तिथे मतभेद आणि वादविवाद नक्कीच उफाळून येतील. ‘‘पुन्हा एकदा चाल्र्स हॅन्डी : द हंग्री स्पिरीट म्हणजे आयुष्यभराच्या अनुभवांचं सार आहे. भांडवलशाही समाजामध्ये कशी तग धरायची, याची ही एक व्यक्तिगत पद्धत आहे. हॅन्डी यांची शैली गोष्टीरूपानं विचार मांडण्याची असल्यामुळे पुस्तक खूपच वाचनीय झालं आहे आणि त्यांची विद्वत्ता प्रत्येक पानावर दिसून येते. हे एक महत्त्वपूर्ण पुस्तक आहे.’’ : पीपल मॅनेजमेंट. ‘‘द हंग्री स्पिरीट हा उद्योग-व्यापार संबंधित तसंच सामाजिक समस्यांचा एक विस्तृत शोध आहे. या समस्यांंचं हे एक चतुर, विद्वत्तापूर्ण आणि विवेकी विश्लेषण आहे.’’ : मॉडर्न मॅनेजमेंट. ‘‘चाल्र्स हॅन्डी हे ब्रिटनचे एकमेव जागतिक दर्जाचे व्यवस्थापन गुरू आहेत.’’ : डायरेक्टर मासिक. चाल्र्स हॅन्डी हे एक लेखक आणि नभोवाणी तसेच दूरचित्रवाणीवरचे नामांकित वक्ते आहेत. जगभर त्यांच्या पुस्तकांच्या दहा लाखांहून जास्त प्रती खपल्या आहेत.
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
"#MARATHIBOOKS#ONLINEMARATHIBOOKS#TRANSLATEDMARATHIBOOKS#TBC#TRANSLATEDBOOKS@50% #SWARTHATUNPARARTHAKADE #THEHUNGRYSPIRIT #स्वार्थातूनपरमार्थाकडे #SELFHELPHEALTH&PERSONALDEVELOPMENT #TRANSLATEDFROMENGLISHTOMARATHI #PRASHANTTALNIKAR #CHARLESHANDY "
Customer Reviews
  • Rating StarDAINIK AIKYA SATARA 25-01-2009

    भांडवलशाहीचे आशावादी तत्त्वज्ञान… चार्ल्स हॅन्डी हे ब्रिटनमधील जागतिक दर्जाचे व्यवस्थापन गुरू आहेत. व्यापार उद्योगातील असमतोल आणि त्यामुळे निर्माण होणारा सामाजिक बेबनाव भांडवलशाहीचे सद्य:स्वरूप आणि तिची अधिक प्रगत अशी भावी दिशा. छोट्या गावातील परस्प संबंध आणि शहरीकरणानंतर माणसामाणसांत येणारा दुरावा. गरीब-श्रीमंत यांच्यातील वाढता भेदभाव, पृथ्वीच्या पर्यावरणात मानवी चंगळवादाने निर्माण होणारा अनर्थ, ज्यांचा उपयोग आणि उपभोग आपण कधीच करून शकणार नाही इतके अतिरिक्त आणि अनावश्यक उत्पादन जगातील तीस टक्के कामगार बेकार असताना उपभोग्य वस्तूंच्या जलद उत्पादनासाठी विकसित करण्यात येणारी कार्यक्षमता, अनेक देशांच्या संपूर्ण वार्षिक अंदाजपत्रकापेक्षाही अधिक उलाढाल असणाऱ्या सतराव्या अग्रगण्य बहुराष्ट्रीय कंपन्या, काळ, तंत्रज्ञान आणि आर्थिक प्रगतीमुळे जनसामान्यांतील असंतोष आणि चिंता आपोआप दूर होऊ शकतील हा भ्रामक आशावाद आर्थिक आणि शास्त्रीय प्रगतीने सर्व प्रश्न सुटतील या गृहीतकातील भ्रामक भाबडेपणा आणि मतलबी दांभिकपणा, शासनव्यवस्थेने सगळ्या नागरिकांचे हित समोर ठेवून सभ्य आणि समताधिष्ठित कायदेकानून करावे की काही मूठभर बहुराष्ट्रीय उत्पादकांच्या नफावाढीसाठी आणि वाढत्या करसंकलनासाठी त्यांच्यावर सवलतींचा मारा करावा आणि सर्वसामान्य नागरिकाला स्वातंत्र्य आणि बांधिलकी यांच्यातला सुवर्णमध्य गाठणे अशक्य व्हावे. सर्वभक्षक अशा या शासनव्यवस्थेची आणि बहुराष्ट्रीय कंपन्यांची अधाशी भूक ही दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. ही भूक आटोक्यात राहिली तरच सर्वसामान्य व्यक्तीला सन्मानाचे जिणे जगणे शक्य होईल. त्यासाठी भांडवलशाहीने आता नवा टप्पा गाठायला हवा. चार्ल्स हॅन्डी यांनी त्याबाबत एक मूलगामी विचार मांडला आहे. भांडवलशाही आणि उदारमतवादी लोकशाहीमुळे शक्य झालेले स्वातंत्र्य आणि उपलब्ध झालेले वेगवेगळे पर्याय हे अधिकाधिक वस्तूंचा संचय करण्यात वाया घालवू नका, जास्तीत जास्त लोकांना स्वातंत्र्य मिळू द्या, त्यासाठी तुमच्याएवढेच पर्याय त्यांनाही मिळवून देण्यासाठी जागरूक राहा, त्याबाबत सुयोग्य स्वार्थीपणा दाखवा अशी हॅन्डी यांची भूमिका आहे. ‘हे एक आशावादी तत्त्वज्ञान आहे’ असे हॅन्डी यांचे प्रतिपादन आहे. शामरॉक आणि संघराज्याच्या स्वरूपाच्या संघटना, रोजगार मिळवून देणाऱ्या कामाचे स्वरूप या दोन कल्पनांवर त्यांचा भर आहे. दि हंग्री स्पिरिट या पुस्तकाचे तीन भाग पाडले आहेत. सद्य:कालीन भांडवलशाहीचे दोष पहिल्या भागात भांडवलशाहीच्या सद्य:कालीन स्वरूपाचे विश्लेषण करून तिच्यातील दोषांची आणि त्रुटींची चर्चा केली आहे. कार्यक्षमतेत वाढ होत आहे. परंतु प्रगत तंत्रज्ञानामुळे नोकऱ्या घटत आहेत; त्यामुळे कार्यक्षमता हीच एक धोंड बनत आहे. भांडवलशाही म्हणजे एक मुक्त तत्त्वप्रणाली; पैसा हे या प्रणालीत एक साधन आहे, साध्य नव्हे, जीवनाची विविध साधनं मिळवून देण्याची यंत्रणा भांडवलशाहीत आहे. तो साम्यवादात नाही. साम्यवाद गरीबीचे उच्चाटन, रोजगाराची हमी आणि प्रत्येकाला अन्न-वस्त्र निवारा यांचा आग्रह धरतो; परंतु त्या त्या व्यक्तीला ते मिळवून देण्याचा मार्ग मात्र साम्यवादाकडे नाही. भांडवलशाही ही केवळ एक यंत्रणा आहे आणि तिचा कार्यकारणभाव ठरवण्याची जबाबदारी स्वत:पुरती प्रत्येक व्यक्तीवर आहे. भांडवलशाहीचा साचा होऊ शकत नाही. भांडवलशाही कितीही यशस्वी ठरली तरी भांडवलशाही कशासाठी या प्रश्नाचं उत्तर देण्याची ताकद तिच्यात नाही. भांडवलशाहीच्या सार्थकतेसाठी आपल्याला आपल्या स्वत:साठी आणि इतरांसाठी जीवनाकडून काय हवं आहे या संबंधीची अधिक नेमकी, चांगली समजूत सर्वंकष जाणीव आवश्यक आहे. या जाणिवेमध्ये पैशाला योग्य ते महत्त्व असेल परंतु त्याचे फाजील स्तोम माजवले जाणार नाही. शासनाच्या दृष्टीने भांडवलशाही सांभाळणे ही एक महाकर्मकठीण बाब आहे. बाजारपेठेचा भस्मासुर सर्व काही गिळंकृत करू शकेल. भांडवलशाहीवर त्यासाठी अंकुश हवा; त्यासाठी लोकांची सामूहिक इच्छाशक्ती जागवावी लागेल. दुसऱ्या भागात व्यक्तिगत सार्वभौमत्वात उद्घोष करण्यात आला आहे. आपले जीवन हे आपले स्वत:चे आहे. आपल्या जगण्याचा उद्देश त्यासाठी स्पष्ट जाणवायला हवा. हा उद्देश ठरवण्यासाठी काही तात्त्विक अधिष्ठान लागते. हा उद्देश केवळ आर्थिक व्यवस्थेने ठरवता येत नाही. ठरवू नये. विशिष्ट शासकीय पद्धत, विशिष्ट शासकीय धोरण, बाजारपेठेचे स्वरूप याद्वारे आपल्या जीवनाचे उद्दिष्टे ठरवणे इष्ट नाही. आपल्या वैयक्तिक अस्तित्वाचा आणि जीवनाचा हेतू काय आहे, काय असावा हे प्रथम आपण ठरवायला हवे. त्याचा निरोप विचारबुद्धी गहाण टाकून विशिष्ट धार्मिक दंडक वा नीतिनियम प्रमाण मानायला आता लोक तयार नाहीत. धार्मिकता अंतरात्म्याशी संपर्क साधण्याचे मार्ग दाखवते. त्या अर्थाने महत्त्वपूर्ण असते चार्ल्स हॅन्डी या संदर्भात सुयोग्य स्वार्थीपणाची संकल्पना मांडतात. तिच्यासाठी स्वहिताचा अर्थ नव्याने लावताना आर्थिक बाबींवर फार जोर देण्याचे टाळावे असे म्हणतात. स्वहितावर आधारित प्रगती ही आर्थिक प्रगतीपेक्षा व्यापक हवी. आर्थिक सुरक्षिततेबरोबर सामाजिक सुरक्षिततेलाही महत्त्व असते. टिवूâन राहण्याची इच्छाही महत्त्वाची ठरते. बाह्य गोष्टींद्वारे तसेच आंतरिक गोष्टींद्वारे प्रेरणा मिळते. स्वार्थीपणामागची नैतिकता ही सुयोग्य पातळीवर राहिली तर तो सर्वांनी हितावह ठरते. इतरांबरोबर नैतिकता ही सुयोग पातळीवर राहिली तर ती सर्वांना हितावह ठरते. इतरांबरोबर राहून काम करणे हेही एक मूल्य आहे. माणसाच्या स्वास्थ्यासाठी त्याची गरज आहे. अधिक सभ्य आणि सुखी समाज तिसऱ्या भागात अधिक चांगल्या भांडवली व्यवस्थेकडे जाण्याचे, अधिक सभ्य व सुखकारक समाजाकडे जाण्याचे मार्ग सुचवण्यात आले आहेत. भांडवलशाहीला सभ्यता देण्यासाठी संस्था, शिक्षणव्यवस्था, शासकीय प्रणाली, वैयक्तिक जबाबदारीची उन्नत जाणीव या सर्व गोष्टींची गरज आहे. बर्टेलसमान (प्रसारमाध्यमातील एक महत्त्वपूर्ण कंपनी-उलाढाल ८२ लक्ष पौंड) च्या उदाहरणाद्वारे सध्याच्या व्यवस्थापनाचे स्वरूप स्पष्ट करण्यात आले आहे. ब्रँडनेमबद्दलचा विश्वास निर्माण करणे हे एक मोठे दिव्य असते. सुयोग्य शिक्षणाद्वारे माहिती, विश्लेषण, आकडेवारी, क्रीडा, अंतज्र्ञान, भावना, व्यवहार, नातेसंबंध, संगीत वगैरे बाबतीतील बुद्धिमत्तेचा विकास साधायला हवा याकडे लक्ष वेधले आहे. आयुष्यही एक लांब पल्ल्याची मॅरेथॉन शर्यत आहे, याचेही भान हवे, असे हॅन्डी बजावतात. सुयोग्य शिक्षण या प्रकरणात शेवटी चार्ल्स हॅन्डी अनेक अभिनव कल्पना मांडतात. शाळा-कॉलेजातून ज्ञान देण्याची जी शिक्षणपद्धती आहे, ती मुलामुलींना बाह्य जगापासून दूर ठेवते. शिक्षण घेताना मुलांना बाहेरच्या जगाचेही अनुभव आवश्यक आहेत. तेव्हा चार्ल्स हॅन्डी युनिव्हर्सिटी र्आफ कम्युनिटी, व्यावसायिक विद्यापीठ, जीवनविषयक विश्वविद्यापीठ यासारख्या कल्पनांचा पुरस्कार करतात. देशाने, शासनाने आपल्या आयुष्याचे व्यवस्थापन करण्याऐवजी ते अधिक सुखकर करण्याकडे लक्ष द्यावे; आपण प्रजानन नाही, नागरिक आहो हे शासनाने लक्षात ठेवावे. पुरेसं मिळवल्याची तृप्तीची, समाधानाची भावना नागरिकांमध्ये निर्माण व्हावी यासाठी शासनाने आवश्यक ती संसाधने पुरवावी. हे लोकांचा सेवक असलेल्या शासनाचे कर्तव्य आहे. जीवनाचे पायाभूत घटक शासनाने पुरवायला हवेत. हे घटक केवळ उच्च वर्गीयांसाठी सीमित राहू नयेत, ते कमजोर वर्गालाही सहज साध्य हवेत. त्यामुळे त्यांनाही समर्थ होणे शक्य व्हावे असा दृष्टिकोन हवा. कार्यक्षमता आणि परिणामकारकता आंतरराष्ट्रीय उद्योगक्षेत्रात स्पर्धात्मक वातावरणात क्रमप्राप्त आहे. परंतु जेथे अधिक लोक लागतात त्या क्षेत्रात (उदाहरणार्थ सरकारी कामकाज) निकष जरासे सैल करून तांत्रिकदृष्ट्या आवश्यक त्यापेक्षा जास्त लोकांना कामावर ठेवावे असाही सल्ला हॅन्डी यांनी दक्षिण आफ्रिकन सरकारला दिला होता. बेकारभत्ता देण्यापेक्षा हा मार्ग श्रेयस्कर असे त्यांना वाटते. लोकांचा संपूर्ण माहिती देणे, त्यांचे मत जाणून निर्णय घेणे हा मार्ग श्रेयस्कर असे त्यांना वाटते. लोकांचा सेवक असलेल्या शासनाने लोकांवर वाटेल तशी सक्ती करू नये, लोकांच्या मर्जीने आणि संमतीने त्यांच्याचसाठी काम करावे. लोकांना संपूर्ण माहिती देणे, त्यांचे मत जाणून निर्णय घेणे हा मार्ग श्रेयस्कर. याबाबतीत भलेबुरे अनुभव ग्रामपंचायतीपासून संसदेपर्यंत सर्वत्र आलेले आहेत. जबाबदार सुजाण नागरिकत्व आणि व्यापक जनहित यावर भर दिला तर त्यातून मार्ग निघेल. जबाबदारी हक्कातून जन्मते. खऱ्या सुयोग्य स्वार्थासाठी आपली जबाबदारीची जाणीवच प्रखर करायला हवी असा याचा अर्थ आहे. ‘दि हंग्री स्पिरिट’मुळे जागतिक समस्यांवरचा, राजकीय व्यवस्थेबाबतचा तोडगा एका नव्या भूमिकेतून समोर येतो. ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

ANUWADATUN ANUSARJANAKADE
ANUWADATUN ANUSARJANAKADE by LEENA SOHONI Rating Star
कौशिक लेले

पुस्तक – अनुवादातून अनुसर्जनाकडे (Anuwadatun Anusarjanakade) लेखिका – लीना सोहोनी (Leena Sohoni) भाषा – मराठी पाने – २३९ प्रकाशन – मेहता पब्लिशिंग हाऊस. फेब २०२४ छापील किंमत – रु. ३७०/- ISBN – 9789357205337 ह्या परिचयाची माझी वेबसाईट लिंक htps://learnmarathiwithkaushik.com/courses/anuwadatun-anusarjanakade/ मराठी पुस्तकांमध्ये सध्या इतर भाषांतून अनुवादित झालेली पुस्तके सुद्धा मोठ्या संख्येने दिसतात. एखादा सरस अनुवाद वाचताना आपल्या डोक्यात सुद्धा आपल्या आवडीच्या परभाषेतल्या पुस्तकांची यादी तयार होते. ही पुस्तकं सुद्धा मराठीत आली तर काय मजा येईल असं वाटतं. भाषा हा ज्यांचा जिव्हाळ्याचा विषय आहे त्यांची इच्छा एक पुढचं पाऊल टाकेल. आपणही स्वतः असा अनुवाद केला तर ? आपल्यालाही दोन्ही भाषा चांगल्या येत आहेत मग अनुवाद का करू नये ? हे पिल्लू डोक्यात शिरेलच. असा अनुवाद करायचा स्वतः काही प्रयत्न केला की लक्षात येईल की हे किती किचकट काम आहे. चांगला अनुवाद करायचा असेल तर सराव लागेल. अभ्यास लागेल. त्याची काही तंत्र मंत्र शिकून घ्यावी लागतील. एखाद्या चांगल्या जाणकार व्यक्तीचं, अनुभवी व्यक्तीचं मार्गदर्शनही मिळायला हवं. जर तुमच्याही मनात अशा भावना आल्या असतील तर लीना सोहोनी यांचं “अनुवादाकडून अनुसर्जनाकडे” हे पुस्तक तुम्हाला नक्की आवडेल. लीना सोहोनी हे नाव मराठीत अनुवादिका म्हणून प्रसिद्ध आहे. आत्तापर्यंत त्यांनी अनुवाद केलेली पन्नासच्यावर पुस्तके प्रकाशित झाली आहेत. त्यांचा अनुभव व अधिकार वेगळा सांगायला नको. त्यांचे हे पुस्तक "अनुवादातून अनुसर्जनाकडे" पुस्तकाचा पहिला भागात लीना सोनी यांनी आपल्या अनुवादाच्या प्रवासाचं सिंहावलोकन केलं आहे. त्यांनी अनुवादाची सुरुवात कशी केली, त्यात प्रगती कशी झाली हे लिहिलं आहे. अनुवादामुळे प्रसिद्ध लेखक जेफ्री आर्चर, सुधा मूर्ती, किरण बेदी यांच्याशी जुळलेले संबंध आणि त्यांच्या भेटीची वर्णनं आहेत. ह्या प्रवासात “मेहता पब्लिशिंग हाऊस” या प्रकाशन संस्थेचा भरभक्कम पाठिंबा त्यांना मिळाला. सुनील मेहता आणि अनिल मेहता यांच्याबरोबरच्या आठवणी सुद्धा पुस्तकात आहेत. पुढच्या भागात अनुवाद या विषयाची एखाद्या शास्त्रीय शोधनिबंधाप्रमाणे माहिती दिलेली आहे. यात अनुवाद प्रक्रियेकडे अतिशय बारकाईने बघितलं आहे. ढोबळमानाने बघितलं तर, अनुवाद म्हणजे तर एका भाषेतल्या शब्दांच्या ऐवजी दुसऱ्या भाषेतले शब्द वापरणे. पण प्रत्येक वेळी एका शब्दाच्या बदल्यात दुसरा भाषेतला एक शब्द असं होतंच असं नाही. त्यामुळे काही वेळा शब्दाची फोड करून दाखवावी लागते. तर काही वेळा मूळ मोठं वाक्य लहान होऊ शकतं. कदाचित तिथे पूर्णपणे वेगळीच शब्दयोजना वाक्यरचना होऊ शकते. या प्रत्येक प्रकाराला एक विशिष्ट शास्त्रीय नाव (पारिभाषिक संज्ञा) आहे हे आपल्याला पुस्तक वाचून कळतं. जे शब्दांच्या बाबतीत तेच वाक्यांच्या बाबतीत. मूळ भाषेतल्या शब्दांसाठी नवीन शब्द वापरून वाक्य तयार झालं तरी ते वाचकाला सहज वाटलं पाहिजे. नाहीतर आपण लगेच म्हणू, “अनुवाद खूप बोजड झाला आहे; ठोकळेबाज झाला आहे”. हे टाळायचं तर वाक्यरचना सुद्धा सुधारायला पाहिजे. याची उदाहरणे पुस्तकात दिली आहेत आणि त्या अनुषंगाने पारिभाषिक संज्ञा (terminology) काय आहे हे मराठी आणि इंग्रजी दोन्हीत दिलं आहे. शब्द, वाक्य ह्यांना लावलेल्या कसोटीचा विस्तार करून ती कसोटी “संकल्पनां”ना लावायला पाहिजे. एखाद्या भाषेत, एखाद्या समाजात असणाऱ्या संकल्पना, प्रथा-परंपरा मराठी भाषेत नसतील तर अनुवाद करताना ते जसंच्या तसं ठेवायचं का तिथे काही वेगळी संकल्पना वापरायची ? का तळ टीप देऊन स्पष्टीकरण द्यायचं? असे एकाच गोष्टीकडे बघण्याचे वेगवेगळे पर्याय उपलब्ध आहेत. हा मुद्दा आपण सोदाहरण स्पष्ट केला आहे. हा ऊहापोह वाचल्यासार अनुवादासाठी दोन्ही भाषांवर आपली किती चांगली पकड पाहिजे हे वाचकाच्या लक्षात येईल. त्याचबरोबर जे पुस्तक आपण वाचतोय त्याची पार्श्वभूमी, त्यातल्या प्रसंगाची सामाजिक पार्श्वभूमी, आणि लेखकाला काय ध्वनीत करायचे आहे हे सगळं समजणं सुद्धा किती महत्त्वाचं हे लक्षात येईल. म्हणजे अनुवाद प्रक्रिया दिसताना शब्दांची दिसली तरी “शब्दांच्या पलीकडले” अनुवादकाला पकडता आले तरच मूळ कृतीला न्याय मिळेल. हे या पुस्तकाच्या वाचनातून अधोरेखित होतं. पुस्तकाचा प्रकारानुसार अनुवादकासमोर असणारी आव्हाने सुद्धा बदलतात. कथा-कादंबरीचा अनुवाद वेगळा तर कवितेचा अनुवाद वेगळा. कारण कवितेमध्ये भावभावनांना महत्त्व आहे तितकेच महत्त्व शब्द, लय, शब्दचमत्कृती यांनाही आहे. म्हणूनच तर ते पद्य आहे गद्य नाही. लीनाजींनी ह्याचाही परामर्श घेतला आहे. नाटकाचा अनुवाद करताना येणारी आव्हाने अजून वेगळी. परिणामकारक संवाद, नेपथ्य, पात्रांची देहबोली, त्याचा प्रेक्षकांवर होणारा परिणाम या सगळ्याचा विचार करून अनुवाद करावा लागतो. म्हणूनच, अनुवाद म्हणजे प्रत्येक वेळी “शंभर टक्के पुस्तक जसेच्या तसे” असं नसतं. तर काही वेळा ते रूपांतर ठरतं. काही वेळा तो स्वैर अनुवाद ठरतो. तर काही वेळा मूळ कलाकृतीवर आधारित नवीन कलाकृती ठरते. हे सुद्धा कितीतरी उदाहरणे देऊन स्पष्ट केले आहे. हे सगळे मुद्दे एकमेकांशी निगडित आहेत त्यामुळे पुस्तकात बऱ्याच वेळा मुद्द्यांची पुनरावृत्ती झाली आहे असं मला वाटलं. ती पुनरुक्ती टाळून कदाचित थोडी पानं कमी करता आली असती. पण मुद्दा वाचकाच्या मनावर ठसावा, कुठलंही विशिष्ट प्रकरण वाचायला घेतले तरी ते त्या मुद्द्यापुरतं पूर्ण असावं हा त्यामागचा हेतू असेल. पुस्तकात पुढे अनुवादकांना नोकरी, व्यवसायाच्या काय संधी आहेत; कुठल्या संस्था याबद्दलचं शिक्षण देतात; कुठले कोर्सेस उपलब्ध आहेत याबद्दलचा तपशील आहे. अनुवाद करायला सुरुवात करायची असेल तर मजकूरनिवड, प्रकाशकांशी संपर्क, परवानगी ह्याचे मार्गदर्शन आहे. त्यांनतर शाळेत आपण जे प्राथमिक व्याकरण शिकतो; म्हणजे कर्ता, कर्म, क्रियापद, ॲक्टिव-पॅसिव्ह व्हॉइस, वेगवेगळे काळ इत्यादींच्या व्याख्या देऊन सगळ्याची उजळणी केली आहे. ज्याला अनुवाद क्षेत्रात उतरायचे आहे त्याला व्याकरणाचा अजून बराच अभ्यास करावा लागणारच आहे. आणि पुस्तकाचा उद्देश व्याकरण शिकवणं नाही तर अनुवादकासाठी व्याकरण अत्यावश्यक आहे हे ठसवणं आहे. त्यामुळे व्याकरणाचा भाग पुस्तकात नसता तरी चालला असता असं मला वाटलं. पुस्तकातील काही पाने वर दिलेल्या लिंकवर शेअर केली आहेत. म्हणजे तुम्हाला पुस्तकाची, लेखनशैलीची अजून चांगली कल्पना येईल. त्यात पुढील मुद्द्यांबद्दलची पाने आहेत १) अनुवादिका म्हणून येणारे कटुगोड अनुभव. २) प्रसिद्ध लेखक जेफ्री आर्चर ह्यांच्या पुस्तकांचा मराठी अनुवाद लीनाजींनी केला आहे. त्यातून जेफ्री आर्चर ह्यांच्याशी भेटीगाठी झाल्या त्यातला एक प्रसंग. ३) अनुवादाचे वर्गीकरण/प्रकार सांगणाऱ्या प्रकरणातली दोन पाने. अनुवाद प्रक्रियेची किती बारकाईने तांत्रिक चिकित्सा केली आहे हे लक्षात येईल. ४) नाटकाचा अनुवाद करताना येणारी आव्हाने ह्याबद्दलच्या प्रकरणातली दोन पाने. लीना सोहोनींचे आत्मकथन असणारा पुस्तकाचा पहिला भाग सर्व वाचकांना वाचायला आवडेलच. पुस्तकाचा दुसरा भाग तांत्रिक आहे. तो सर्वसामान्य वाचकाला वाचायला आवडेलच असं नाही. पण तो वाचल्यावर अनुवादक म्हणून काम करताना किती कटकटी असतात, काय व्यवधानं सांभाळावी लागतात हे वाचकाच्या लक्षात येईल. त्यातून अनुवादकांकडे व त्यांच्या कामाकडे बघण्याचा दृष्टिकोन अजून कौतुकाचा आणि कृतज्ञतेचा होईल हे निश्चित. ज्यांना अनुवाद करायचा आहे, या क्षेत्रात शिरायचं आहे किंवा तशी उमेदवारी सुरू झाली आहे त्यांना हा भाग मार्गदर्शक ठरेल. जाण वाढवेल हे नक्की. त्यामुळे या पुस्तकाच्या वाचनातून अनुवादाचा किडा काही वाचकांच्या डोक्यात गेला आणि त्यातून नवे अनुवादक मराठीत निर्माण झाले तर ते सोन्याहून पिवळे ! मराठीत कथा,कादंबऱ्या, चरित्र, सामाजिक विषयांची चर्चा ह्या पद्धतीचे लेखन भरपूर होत असतं. पण ह्या पुस्तकाप्रमाणे शास्त्रीय/तांत्रिक चिकित्सा करणारी, गंभीरपणे शिकवणारी पुस्तकं कमी दिसतात. ती प्रकाशित झाली तरी ती क्रमिक पाठ्यपुस्तक किंवा “अभ्यासाचे पुस्तक” या प्रकारात ढकलली जातात आणि दुर्लक्षित होतात. पण या पुस्तकाच्या लेखिका आणि प्रकाशक यांनी हे पुस्तक मुख्यधारेतल्या पुस्तकाप्रमाणे सादर केलं आहे. त्यातून हे पुस्तक जास्त वाचलं जाईल; जास्त लोकांना विचार प्रवृत्त करेल असं मला वाटतं. अशा प्रकारची पुस्तकं मराठीत प्रकाशित होणे हे मराठी भाषेला ज्ञानभाषा करण्यासाठी मोठे योगदान आहे. त्याबद्दल प्रकाशक आणि लेखिका दोघांचेही एक मराठी भाषा प्रेमी म्हणून मी मनापासून आभार मानतो. —————————— मी दिलेली पुस्तक श्रेणी —————————— अनुवाद करणारे असाल किंवा करायची इच्छा असेल तर आवा ( आवर्जून वाचा ) इतरांनी जवा ( जमल्यास वाचा ) ——————————— आवा ( आवर्जून वाचा ) जवा ( जमल्यास वाचा ) वाठीनावाठी ( वाचलं तर ठीक नाही वाचलं तरी ठीक ) नावाठी ( नाही वाचलं तरी ठीक ) ...Read more

OMKARACHI REKH JANA
OMKARACHI REKH JANA by MANJUSHRI GOKHALE Rating Star
सौ. जस्मिन जोगळेकर

आमच्या पुस्तकप्रेमी समुहावरचा एकही दिवसाचा खंड न पडता सलग 1730 वा पुस्तक परिचय पुस्तक प्रेमी समूह,पुस्तक परिचय अभियान: एकही दिवस खंड पडू न देता पुस्तकांचा परिचय हे पुस्तकप्रेमी समूहाचे यश ! पुस्तक सत्र:- ३ सप्ताह क्रमांक:- २४८ पुस्तक क्रमांक: १७३० दिनांक: १०/०३/२०२५ पुस्तकाचे नांव:- ओंकाराची रेख जना लेखक:- मंजुश्री गोखले पहिली आवृत्ती: फेब्रुवारी २०१२ पृष्ठ संख्या : ३०८ मूल्य: रु. ३२० प्रकाशन: मेहता पब्लिशिंग हाऊस परिचयकर्ती: सौ. जस्मिन जोगळेकर एखाद्या गोष्टीसाठी वेळ यावी लागते म्हणतात, तसं काहीसं झालं माझं. खरंतर पुस्तक वाचनाच्या बाबतीत असं व्हायला नको होतं पण झालं. `हे खूप सुंदर पुस्तक आहे, तुम्ही वाचाच` म्हणून एक पुस्तक आमच्या हाती आलं. अर्थात ज्यांनी सांगितलं त्यांनी त्यांच्या संग्रहातलं पुस्तक दिलं होतं. तसं बरेच दिवस होतं आमच्याकडे. नवऱ्याने वाचून खूपच सुंदर आहे, वाच नक्की सांगितलं देखील मला. पण पुस्तक परत द्यायची वेळ आली तरी वाचलं गेलं नाही. तरी ते नाव डोक्यात फिट बसलं होतं. अखेर एक दिवस ते एकच पुस्तक नव्हे तर त्याच लेखिकेची चार पुस्तकं विकतच घेऊन आले आणि मग ती वेळ आली…. त्या पुस्तकाच्या, पुस्तकातील भाषेच्या आणि त्या लेखिकेच्या प्रेमात पडण्याची. पुस्तक होतं…मंजुश्री गोखले यांनी संत जनाबाईंवर लिहिलेलं `ओंकाराची रेख जना`. `विठू माझा लेकुरवाळा`, `धरिला पंढरीचा चोर` अशा अभंग रचनेतून जनाबाई आपल्या ओळखीच्या आहेत. किंवा विठूराया त्यांना हर कामात मदत करत असतो वगैरे माहीत आहे. पण त्यांचं संपूर्ण चरित्र सगळ्यांना माहीत असेलच असं नाही. ते माहीत करून देण्याचं सुरेख काम या कादंबरीने केलं आहे. जनाबाईंच्या जन्मापूर्वीची आणि नंतरचीही त्यांच्या कुटुंबाची परिस्थिती, छोट्या जनाला मागे ठेऊन दुखण्याने तिला सोडून गेलेली तिची आई, त्यानंतरची बिकट वेळ याचं वर्णन वाचताना डोळ्यातलं पाणी थांबत नाही. पुढेही काही प्रसंग असे आहेत…भागाबाईचं वागणं असेल किंवा सुळावर चढवायचा प्रसंग असेल… डोळ्यात पाणी येतच राहतं. पण एवढं होऊनही त्यांची पंढरीरायावरची भक्ती मात्र गाढ होती. जनाईसुध्दा त्याला पाहायला आतुर होती. सोसले चटके l पोटी नाही घास l विठ्ठलाची आस l जनाईला ll भेटीसाठी त्याच्या l गोळा तनमन l धाडे आवतान l विठूराया ll अखेर विठुरायाकडून आमंत्रण आल्यावर बापलेक पंढरीची वाट चालू लागतात. काळया देवाला पाहायला आसुसलेली जना आणि लेकीला कायमचं परक्या घरी सोडून यायचं या विचाराने जडावलेला दमा… नशिबाची रेख l भिवरेच्या काठी l विठूराया ओढी l जनाईची ll दोघांचा प्रवास विठ्ठलाच्या विश्वासावर सुरू होतो. पुढं जनाईला दामाशेटींच्या घरी सोडून देणं, त्या घराने जनाला आपलंच म्हणणं, नामदेवांसोबत तिचं मोठं होणं अशा कितीतरी प्रसंगांनी सुखावून जायला होतं. तेव्हाची सामाजिक परिस्थिती, जनाचं अतिशूद्र असणं आणि त्यातून स्त्री असणं…त्यासाठी तिला झेलावे लागणारे त्रास, संत म्हणून मोठेपण मिळाल्यावरही त्यांच्यावर आलेला चोरीचा आळ… त्रास होतो वाचताना. जनाची आणि विठ्ठलाची पहिली भेट आणि तिथून त्यांच्यात दृढ होत जाणारे नाते…वाचताना शहारून जायला होतं. जना ते संत जनाबाई हा प्रवास, त्यात जनाबाईंनी रचलेले अभंग, ज्ञानदेवादि भावंडांचा सहवास आणि मुख्य म्हणजे नामदेव आणि जनाबाई यांचे नाते… गुरू शिष्य ऐसी l जोडी कौतुकाची l जनी नामयाची l संतांमधे ll याबद्दल पुस्तकात आलेले उल्लेख मन लावून वाचण्यासारखे आहेत. विठ्ठलाच्या चरणी झालेला जनाबाईंच्या जीवनाचा शेवट म्हणजे तर 🙏 वृंदा कोमेजली l स्तब्ध वारा पाणी l ओघळले मणी l मंजिऱ्यांचे ll थरारली वीट l कंप राऊळाला l श्वास ओलावला l क्षणभर ll आज नाही घाई l विठोबाला काही l जनाईच येई l चरणाशी ll शांता शेळके यांनी अनुवाद केलेलं `चौघीजणी` जसं मनात कायमचं घर करुन बसलं आहे, त्या जोडीला आता `ओंकाराची रेख जना` हे ही अत्यंत आवडीचं झालं आहे. यापूर्वी संत साहित्य किंवा संतांवर लिहिलेलं साहित्य फारसं वाचलं नव्हतं. लताजी किंवा भीमसेनजींमुळे घराघरात पोहोचलेले अभंग तेवढे माहीत होते. त्यामुळं जनाबाईंवर लिहिलेल्या या पुस्तकाबाबत उत्सुकता होतीच. पहिल्या प्रकरणाच्या अगदी पहिल्या ओळीपासून या पुस्तकाशी जी बांधली गेले ते शेवटपर्यंत. पुस्तकातील सगळं वर्णन अगदी बारीक सारीक तपशील देऊन पुढं जात राहतं आणि त्यात आपल्याला गुंतवून ठेवतं. सुरुवातीची काही प्रकरणं तर डोळ्यात अश्रुंच्या धारा घेऊन, पुसट अक्षरं समोर ठेऊन वाचावी लागतात. प्रसंग सगळे l तपशिलासवे l डोळ्यात आसवे l वाचुनिया ll भाषा ही साजिरी l सत्य हेच वाटे l प्रसंग तो घडे l आसपास ll एकूणच पुस्तकातलं वर्णन इतकं जिवंत आहे की सगळे प्रसंग आपल्या आसपास घडताहेत असंच वाटत राहतं कायम. दमा - कुरुंडचं दुर्दैवी आयुष्य, पोटी मूल नसल्याचं त्यांचं दुःख, विठ्ठलाला त्यासाठी साकडं घालण्यासाठी त्यांनी केलेला पंढरपूरचा प्रवास असो किंवा जनाबाईंच्या खोलीत येऊन विठ्ठलाने त्यांच्याशी मारलेल्या गप्पा, त्यांना कामात केलेली मदत…. सगळे अगदी सगळे प्रसंग आपणच जगतोय असं वाटावेत इतके मनाला भिडून जातात. काही ठिकाणं तर अशी… `अरे विठ्ठला, गडबडीत भलतंच काय उचलतोस. तुझा रत्नहार आणि शेला तर घेऊन जा`...असं आपणच विठ्ठलाला हाक मारून सांगावं असं वाटायला लागतं वाचताना. भाषा, वर्णनशैली फार साजिरी आहे. पुस्तकातला `साजिरी` हा शब्द एकदम आवडून गेलाय. एखादा चेहरा पाहिल्यावर कसं आपल्याला कळून जातं ना की, ही व्यक्ती मायाळू आहे किंवा तुसडी आहे वगैरे…तसं पुस्तकाच्या सुरुवातीलाच यातल्या भाषेबद्दल आपुलकी, प्रेम वाटायला लागतं. भाषा साधी पण सुंदर, शब्दांचा वापर असा की यापेक्षा वेगळा शब्द इथं शोभला नसता असं वाटायला लागेल असा. अनवाणी पायाला चटके बसावेत इतकं हवामान अजून बदललं नव्हतं…यासाठी `अजून मातीने माया सोडली नव्हती`... किती सुरेख वाक्य आहे ना! अशी कितीतरी वाक्य आपल्याला त्यांच्या प्रेमात पाडायला लावणारी यात सापडतील. एकूणच सांगायचं झालं तर पुस्तक अप्रतिम आणि सगळ्यांनी आवर्जून वाचावं असंच आहे. एकाच लेखकाची पुस्तकं सलग एका मागोमाग एक अशी माझ्याकडून वाचली जात नाहीत. पण आता खुणावतंय ते… `जोहार मायबाप जोहार`. ...Read more