* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: THE HUNGRY SPIRIT
  • Availability : Available
  • Translators : PRASHANT TALNIKAR
  • ISBN : 9788190734455
  • Edition : 2
  • Publishing Year : NOVEMBER 2008
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 256
  • Language : Translated From ENGLISH to MARATHI
  • Category : SELF HELP, HEALTH & PERSONAL DEVELOPMENT
Quantity
Buying Options:
  • Print Books:
THERE IS SO MUCH CONTROVERSY IN THIS WORLD. ON ONE HAND, ONE THIRD OF THE TOTAL WORKERS ARE WITHOUT ANY WORK. ON THE OTHER HAND, TWO THIRD OF THE WORLD TRADE IS CONCENTRATED WITH ONLY 500 OF THE COMPANIES ALL OVER THE WORLD. THESE COMPANIES ARE ANSWERABLE TO THE SHARE HOLDERS. ON THE BACKGROUND OF THIS CONTROVERSY AND UNCERTAINTY, CHARLES HENRY EARNESTLY PENS DOWN THE NEED OF CREATING A FUTURE WHICH WILL BE MORE CERTAIN THAN THE CURRENT EASILY SHAKABLE CULTURE AND VALUES. THIS BOOK GIVES AN INITIATIVE. IT EXPRESSES THE AUTHENTICITY OF THE WRITER AND HIS THOUGHTS, AT THE SAME TIME, IT PROVOKES OUR HOUGHTS.THE WONDERFUL PART OF IT IS THE OPTIMISM. WHEREVER THE READING OF THIS BOOK IS DONE I AM SURE IT WILL CREATE AN ATMOSPHERE OF DIFFERENCE OF OPINIONS AND ARGUMENTS. "ONCE AGAIN CHARLES HANDY: THE HUNGRY SPIRIT IS THE MORAL OF THE AUTHOR`S LIFE. THIS IS IN A WAY HIS PERSONAL APPROACH SO AS TO STAND FIRMLY ROOTED IN THE WORLD OF CAPITALISM. HIS STYLE IS DIFFERENT, HE DOES NOT LECTURE US ABOUT ANYTHING, ON THE CONTRARY WITH THE HELP OF SMALL STORIES HE ELABORATES HIS POINT MAKING IT VERY INTERESTING. HIS INTELLECTUAL THINKING IS REVEALED ON EACH OF THE PAGE OF THIS BOOK." PEOPLE`S MANAGEMENT: "THE HUNGRY SPIRIT: IS A RESEARCH WORK ON THE INDUSTRY, TRADE AND SOCIAL PROBLEMS. IT IS A HIGHLY EFFECTIVE AND INTELLIGENT PRESENTATION OF THE PROBLEMS." MODERN MANAGEMENT: "CHARLES HANDY IS THE ONE AND ONLY MANAGEMENT BOSS OF BRITAIN." DIRECTOR MAGAZINE: AT LAST, CHARLES HANDY IS AN AUTHOR; HE IS ALSO AN EFFECTIVE AND MOST POPULAR SPEAKER ON THE RADIO AND T.V. MORE THAN 10 LAC COPIES OF HIS BOOK HAVE BEEN SOLD.
एकीकडे जगातील एकतृतीयांश कामगार बेकार आहेत, तर त्याचवेळी दुसरीकडे जगाच्या एकूण व्यापाराच्या दोनतृतीयांश व्यापार फक्त ५०० कंपन्यांच्या हातांत आहे आणि या कंपन्या फक्त त्यांच्या गुंतवणूकदारांनाच उत्तरं देण्यास बांधील आहेत. या विषमता आणि अनिश्चिततेच्या पाश्र्वभूमीवर, बाजारपेठ अभिमुख भांडवलशाहीच्या मूल्यांपेक्षा अधिक चिरंतन आणि समृद्ध मूल्यं असणारं भविष्य निर्माण करण्याची गरज चार्ल्स हॅन्डी अतिशय कळकळीनं मांडतात. द हंग्री स्पिरीट हे एक प्रेरणादायी पुस्तक आहे. या पुस्तकात लेखकाच्या व्यक्तिगत विचारांची तीव्रता तर जाणवतेच, पण काही वेळा ते आपल्याही विचारांना चालना देतं आणि मुख्यत: त्यात आशावाद ठासून भरलेला आहे. हे पुस्तक जिथे कुठे वाचलं जाईल, तिथे मतभेद आणि वादविवाद नक्कीच उफाळून येतील. ‘‘पुन्हा एकदा चार्ल्स हॅन्डी : द हंग्री स्पिरीट म्हणजे आयुष्यभराच्या अनुभवांचं सार आहे. भांडवलशाही समाजामध्ये कशी तग धरायची, याची ही एक व्यक्तिगत पद्धत आहे. हॅन्डी यांची शैली गोष्टीरूपानं विचार मांडण्याची असल्यामुळे पुस्तक खूपच वाचनीय झालं आहे आणि त्यांची विद्वत्ता प्रत्येक पानावर दिसून येते. हे एक महत्त्वपूर्ण पुस्तक आहे.’’ : पीपल मॅनेजमेंट. ‘‘द हंग्री स्पिरीट हा उद्योग-व्यापार संबंधित तसंच सामाजिक समस्यांचा एक विस्तृत शोध आहे. या समस्यांंचं हे एक चतुर, विद्वत्तापूर्ण आणि विवेकी विश्लेषण आहे.’’ : मॉडर्न मॅनेजमेंट. ‘‘चार्ल्स हॅन्डी हे ब्रिटनचे एकमेव जागतिक दर्जाचे व्यवस्थापन गुरू आहेत.’’ : डायरेक्टर मासिक. चार्ल्स हॅन्डी हे एक लेखक आणि नभोवाणी तसेच दूरचित्रवाणीवरचे नामांकित वक्ते आहेत. जगभर त्यांच्या पुस्तकांच्या दहा लाखांहून जास्त प्रती खपल्या आहेत.
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
"#MARATHIBOOKS#ONLINEMARATHIBOOKS#TRANSLATEDMARATHIBOOKS#TBC#TRANSLATEDBOOKS@50% #SWARTHATUNPARARTHAKADE #THEHUNGRYSPIRIT #स्वार्थातूनपरमार्थाकडे #SELFHELPHEALTH&PERSONALDEVELOPMENT #TRANSLATEDFROMENGLISHTOMARATHI #PRASHANTTALNIKAR #CHARLESHANDY "
Customer Reviews
  • Rating StarDAINIK AIKYA SATARA 25-01-2009

    भांडवलशाहीचे आशावादी तत्त्वज्ञान… चार्ल्स हॅन्डी हे ब्रिटनमधील जागतिक दर्जाचे व्यवस्थापन गुरू आहेत. व्यापार उद्योगातील असमतोल आणि त्यामुळे निर्माण होणारा सामाजिक बेबनाव भांडवलशाहीचे सद्य:स्वरूप आणि तिची अधिक प्रगत अशी भावी दिशा. छोट्या गावातील परस्प संबंध आणि शहरीकरणानंतर माणसामाणसांत येणारा दुरावा. गरीब-श्रीमंत यांच्यातील वाढता भेदभाव, पृथ्वीच्या पर्यावरणात मानवी चंगळवादाने निर्माण होणारा अनर्थ, ज्यांचा उपयोग आणि उपभोग आपण कधीच करून शकणार नाही इतके अतिरिक्त आणि अनावश्यक उत्पादन जगातील तीस टक्के कामगार बेकार असताना उपभोग्य वस्तूंच्या जलद उत्पादनासाठी विकसित करण्यात येणारी कार्यक्षमता, अनेक देशांच्या संपूर्ण वार्षिक अंदाजपत्रकापेक्षाही अधिक उलाढाल असणाऱ्या सतराव्या अग्रगण्य बहुराष्ट्रीय कंपन्या, काळ, तंत्रज्ञान आणि आर्थिक प्रगतीमुळे जनसामान्यांतील असंतोष आणि चिंता आपोआप दूर होऊ शकतील हा भ्रामक आशावाद आर्थिक आणि शास्त्रीय प्रगतीने सर्व प्रश्न सुटतील या गृहीतकातील भ्रामक भाबडेपणा आणि मतलबी दांभिकपणा, शासनव्यवस्थेने सगळ्या नागरिकांचे हित समोर ठेवून सभ्य आणि समताधिष्ठित कायदेकानून करावे की काही मूठभर बहुराष्ट्रीय उत्पादकांच्या नफावाढीसाठी आणि वाढत्या करसंकलनासाठी त्यांच्यावर सवलतींचा मारा करावा आणि सर्वसामान्य नागरिकाला स्वातंत्र्य आणि बांधिलकी यांच्यातला सुवर्णमध्य गाठणे अशक्य व्हावे. सर्वभक्षक अशा या शासनव्यवस्थेची आणि बहुराष्ट्रीय कंपन्यांची अधाशी भूक ही दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. ही भूक आटोक्यात राहिली तरच सर्वसामान्य व्यक्तीला सन्मानाचे जिणे जगणे शक्य होईल. त्यासाठी भांडवलशाहीने आता नवा टप्पा गाठायला हवा. चार्ल्स हॅन्डी यांनी त्याबाबत एक मूलगामी विचार मांडला आहे. भांडवलशाही आणि उदारमतवादी लोकशाहीमुळे शक्य झालेले स्वातंत्र्य आणि उपलब्ध झालेले वेगवेगळे पर्याय हे अधिकाधिक वस्तूंचा संचय करण्यात वाया घालवू नका, जास्तीत जास्त लोकांना स्वातंत्र्य मिळू द्या, त्यासाठी तुमच्याएवढेच पर्याय त्यांनाही मिळवून देण्यासाठी जागरूक राहा, त्याबाबत सुयोग्य स्वार्थीपणा दाखवा अशी हॅन्डी यांची भूमिका आहे. ‘हे एक आशावादी तत्त्वज्ञान आहे’ असे हॅन्डी यांचे प्रतिपादन आहे. शामरॉक आणि संघराज्याच्या स्वरूपाच्या संघटना, रोजगार मिळवून देणाऱ्या कामाचे स्वरूप या दोन कल्पनांवर त्यांचा भर आहे. दि हंग्री स्पिरिट या पुस्तकाचे तीन भाग पाडले आहेत. सद्य:कालीन भांडवलशाहीचे दोष पहिल्या भागात भांडवलशाहीच्या सद्य:कालीन स्वरूपाचे विश्लेषण करून तिच्यातील दोषांची आणि त्रुटींची चर्चा केली आहे. कार्यक्षमतेत वाढ होत आहे. परंतु प्रगत तंत्रज्ञानामुळे नोकऱ्या घटत आहेत; त्यामुळे कार्यक्षमता हीच एक धोंड बनत आहे. भांडवलशाही म्हणजे एक मुक्त तत्त्वप्रणाली; पैसा हे या प्रणालीत एक साधन आहे, साध्य नव्हे, जीवनाची विविध साधनं मिळवून देण्याची यंत्रणा भांडवलशाहीत आहे. तो साम्यवादात नाही. साम्यवाद गरीबीचे उच्चाटन, रोजगाराची हमी आणि प्रत्येकाला अन्न-वस्त्र निवारा यांचा आग्रह धरतो; परंतु त्या त्या व्यक्तीला ते मिळवून देण्याचा मार्ग मात्र साम्यवादाकडे नाही. भांडवलशाही ही केवळ एक यंत्रणा आहे आणि तिचा कार्यकारणभाव ठरवण्याची जबाबदारी स्वत:पुरती प्रत्येक व्यक्तीवर आहे. भांडवलशाहीचा साचा होऊ शकत नाही. भांडवलशाही कितीही यशस्वी ठरली तरी भांडवलशाही कशासाठी या प्रश्नाचं उत्तर देण्याची ताकद तिच्यात नाही. भांडवलशाहीच्या सार्थकतेसाठी आपल्याला आपल्या स्वत:साठी आणि इतरांसाठी जीवनाकडून काय हवं आहे या संबंधीची अधिक नेमकी, चांगली समजूत सर्वंकष जाणीव आवश्यक आहे. या जाणिवेमध्ये पैशाला योग्य ते महत्त्व असेल परंतु त्याचे फाजील स्तोम माजवले जाणार नाही. शासनाच्या दृष्टीने भांडवलशाही सांभाळणे ही एक महाकर्मकठीण बाब आहे. बाजारपेठेचा भस्मासुर सर्व काही गिळंकृत करू शकेल. भांडवलशाहीवर त्यासाठी अंकुश हवा; त्यासाठी लोकांची सामूहिक इच्छाशक्ती जागवावी लागेल. दुसऱ्या भागात व्यक्तिगत सार्वभौमत्वात उद्घोष करण्यात आला आहे. आपले जीवन हे आपले स्वत:चे आहे. आपल्या जगण्याचा उद्देश त्यासाठी स्पष्ट जाणवायला हवा. हा उद्देश ठरवण्यासाठी काही तात्त्विक अधिष्ठान लागते. हा उद्देश केवळ आर्थिक व्यवस्थेने ठरवता येत नाही. ठरवू नये. विशिष्ट शासकीय पद्धत, विशिष्ट शासकीय धोरण, बाजारपेठेचे स्वरूप याद्वारे आपल्या जीवनाचे उद्दिष्टे ठरवणे इष्ट नाही. आपल्या वैयक्तिक अस्तित्वाचा आणि जीवनाचा हेतू काय आहे, काय असावा हे प्रथम आपण ठरवायला हवे. त्याचा निरोप विचारबुद्धी गहाण टाकून विशिष्ट धार्मिक दंडक वा नीतिनियम प्रमाण मानायला आता लोक तयार नाहीत. धार्मिकता अंतरात्म्याशी संपर्क साधण्याचे मार्ग दाखवते. त्या अर्थाने महत्त्वपूर्ण असते चार्ल्स हॅन्डी या संदर्भात सुयोग्य स्वार्थीपणाची संकल्पना मांडतात. तिच्यासाठी स्वहिताचा अर्थ नव्याने लावताना आर्थिक बाबींवर फार जोर देण्याचे टाळावे असे म्हणतात. स्वहितावर आधारित प्रगती ही आर्थिक प्रगतीपेक्षा व्यापक हवी. आर्थिक सुरक्षिततेबरोबर सामाजिक सुरक्षिततेलाही महत्त्व असते. टिवूâन राहण्याची इच्छाही महत्त्वाची ठरते. बाह्य गोष्टींद्वारे तसेच आंतरिक गोष्टींद्वारे प्रेरणा मिळते. स्वार्थीपणामागची नैतिकता ही सुयोग्य पातळीवर राहिली तर तो सर्वांनी हितावह ठरते. इतरांबरोबर नैतिकता ही सुयोग पातळीवर राहिली तर ती सर्वांना हितावह ठरते. इतरांबरोबर राहून काम करणे हेही एक मूल्य आहे. माणसाच्या स्वास्थ्यासाठी त्याची गरज आहे. अधिक सभ्य आणि सुखी समाज तिसऱ्या भागात अधिक चांगल्या भांडवली व्यवस्थेकडे जाण्याचे, अधिक सभ्य व सुखकारक समाजाकडे जाण्याचे मार्ग सुचवण्यात आले आहेत. भांडवलशाहीला सभ्यता देण्यासाठी संस्था, शिक्षणव्यवस्था, शासकीय प्रणाली, वैयक्तिक जबाबदारीची उन्नत जाणीव या सर्व गोष्टींची गरज आहे. बर्टेलसमान (प्रसारमाध्यमातील एक महत्त्वपूर्ण कंपनी-उलाढाल ८२ लक्ष पौंड) च्या उदाहरणाद्वारे सध्याच्या व्यवस्थापनाचे स्वरूप स्पष्ट करण्यात आले आहे. ब्रँडनेमबद्दलचा विश्वास निर्माण करणे हे एक मोठे दिव्य असते. सुयोग्य शिक्षणाद्वारे माहिती, विश्लेषण, आकडेवारी, क्रीडा, अंतज्र्ञान, भावना, व्यवहार, नातेसंबंध, संगीत वगैरे बाबतीतील बुद्धिमत्तेचा विकास साधायला हवा याकडे लक्ष वेधले आहे. आयुष्यही एक लांब पल्ल्याची मॅरेथॉन शर्यत आहे, याचेही भान हवे, असे हॅन्डी बजावतात. सुयोग्य शिक्षण या प्रकरणात शेवटी चार्ल्स हॅन्डी अनेक अभिनव कल्पना मांडतात. शाळा-कॉलेजातून ज्ञान देण्याची जी शिक्षणपद्धती आहे, ती मुलामुलींना बाह्य जगापासून दूर ठेवते. शिक्षण घेताना मुलांना बाहेरच्या जगाचेही अनुभव आवश्यक आहेत. तेव्हा चार्ल्स हॅन्डी युनिव्हर्सिटी र्आफ कम्युनिटी, व्यावसायिक विद्यापीठ, जीवनविषयक विश्वविद्यापीठ यासारख्या कल्पनांचा पुरस्कार करतात. देशाने, शासनाने आपल्या आयुष्याचे व्यवस्थापन करण्याऐवजी ते अधिक सुखकर करण्याकडे लक्ष द्यावे; आपण प्रजानन नाही, नागरिक आहो हे शासनाने लक्षात ठेवावे. पुरेसं मिळवल्याची तृप्तीची, समाधानाची भावना नागरिकांमध्ये निर्माण व्हावी यासाठी शासनाने आवश्यक ती संसाधने पुरवावी. हे लोकांचा सेवक असलेल्या शासनाचे कर्तव्य आहे. जीवनाचे पायाभूत घटक शासनाने पुरवायला हवेत. हे घटक केवळ उच्च वर्गीयांसाठी सीमित राहू नयेत, ते कमजोर वर्गालाही सहज साध्य हवेत. त्यामुळे त्यांनाही समर्थ होणे शक्य व्हावे असा दृष्टिकोन हवा. कार्यक्षमता आणि परिणामकारकता आंतरराष्ट्रीय उद्योगक्षेत्रात स्पर्धात्मक वातावरणात क्रमप्राप्त आहे. परंतु जेथे अधिक लोक लागतात त्या क्षेत्रात (उदाहरणार्थ सरकारी कामकाज) निकष जरासे सैल करून तांत्रिकदृष्ट्या आवश्यक त्यापेक्षा जास्त लोकांना कामावर ठेवावे असाही सल्ला हॅन्डी यांनी दक्षिण आफ्रिकन सरकारला दिला होता. बेकारभत्ता देण्यापेक्षा हा मार्ग श्रेयस्कर असे त्यांना वाटते. लोकांचा संपूर्ण माहिती देणे, त्यांचे मत जाणून निर्णय घेणे हा मार्ग श्रेयस्कर असे त्यांना वाटते. लोकांचा सेवक असलेल्या शासनाने लोकांवर वाटेल तशी सक्ती करू नये, लोकांच्या मर्जीने आणि संमतीने त्यांच्याचसाठी काम करावे. लोकांना संपूर्ण माहिती देणे, त्यांचे मत जाणून निर्णय घेणे हा मार्ग श्रेयस्कर. याबाबतीत भलेबुरे अनुभव ग्रामपंचायतीपासून संसदेपर्यंत सर्वत्र आलेले आहेत. जबाबदार सुजाण नागरिकत्व आणि व्यापक जनहित यावर भर दिला तर त्यातून मार्ग निघेल. जबाबदारी हक्कातून जन्मते. खऱ्या सुयोग्य स्वार्थासाठी आपली जबाबदारीची जाणीवच प्रखर करायला हवी असा याचा अर्थ आहे. ‘दि हंग्री स्पिरिट’मुळे जागतिक समस्यांवरचा, राजकीय व्यवस्थेबाबतचा तोडगा एका नव्या भूमिकेतून समोर येतो. ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

HATUMUTUCHA CHANDRA
HATUMUTUCHA CHANDRA by FARUK KAZI Rating Star
परेश जयश्री मनोहर

मराठी बालसाहित्याचा गेल्या काही दशकांचा अवकाश हा सातत्याने प्रबोधनपर, उद्बोधनपर आणि कोणत्याही कथेच्या शेवटी एका वाक्यात तात्पर्य सांगणाऱ्या बाळबोधकथांचा राहिलेला आहे. या बाल साहित्यामध्ये प्रामुख्याने येणारे पात्र ही मध्यमवर्गीय, उच्च जातीय मराठी घरतील मुलं मुली असतात आणि जेव्हा केव्हा वंचित समाजातील, शोषित समाजातील, गरीब ग्रामीण घरातील मुलांचे चित्रण येतं तेव्हा ते अति दुःखी आणि बिचारे, ज्यांना मदतीची गरज आहे आणि अशी मदत करण्याची जबाबदारी मोठ्या घरातील उच्चवर्णीय, उच्चवर्गीय नायक मुला मुलींची असते. त्यातूनही प्रामुख्याने काय करावे काय करू नये किंवा तत्सम उपदेशच प्रामुख्याने कथेच्या शेवटी केलेले दिसतात. आणि हा लेखक वर्ग ही प्रामुख्याने पुणे मुंबई भागात स्थिरावलेला राहणारा तिथल्या अनुभूती आणि तिथल्या जगण्याचा अवकाश सोबत घेऊन येणारा असतो. अशा सगळ्या पार्श्वभूमीवरती सोलापूर जिल्ह्यातल्या सांगोला तालुक्यात अनकढाळ सारख्या एका छोट्या गावात राहणारा फारुक काझी हा लेखक जेव्हा गेलं दशकभर कवितांमधून, कथांमधून बालविश्व चितारण्याचा प्रयत्न करतो तेव्हा ते जास्त करून ग्रामीण भागातील मातीशी जोडलेलं असतं. आपल्या भोवतालच्या खऱ्याखुऱ्या मुलांमुलींच्या भावविश्वाच्या जवळ जाणारं चित्रण त्याच्या कथांमधून आपण सातत्याने बघत असतो. त्याचे "शिकण्याच्या वाटेवरील आनंदवन" हे पहिले पुस्तक एका प्रयोगशील शिक्षकाच्या शाळेतील अनुभवांवर आधारलेले आहे. त्यांचे आजवर मित्र, प्रिय अब्बू, चुटकीचे जग हे कथासंग्रह प्रकाशित झालेले आहेत. या सगळ्याच पुस्तकातून त्याने सातत्याने ग्रामीण, निमशहरी भागातील कनिष्ठ मध्यमवर्गीय आणि गरीब कुटुंबातील बहुजन आणि वंचित घटकातील, मुस्लिम कुटुंबातील मुलांच्या नजरेने दिसणाऱ्या गोष्टी टिपण्याचा प्रयत्न केलेला आहे. यात कुठेही गरिबीचे गोडवे नाहीत की काठोकाठ पसरलेलं बिचारेपण नाही. तर या आर्थिक दृष्ट्या नागवलेल्या लोकांच्या घरातील मुलांच्या कथा आहेत, ज्यात प्रेम, उत्सुकता, जिद्द, समजून घेणे आणि अनुभवातून आलेलं शहाणपण हे प्रामुख्याने जाणवते. अभावग्रस्तता, एखाद्या गोष्टीचे नसणे, तरीही नातेसंबंधांवरील विश्वास, प्रेम आणि एकमेकांबद्दलचा आदर, काळजी घेऊन जपणारी कुटुंबं फारुकच्या लिखाणात सातत्याने येत राहतात. त्याचा आत्ता आलेला हाटूमुटूचा चंद्र हा एक अफलातून कथासंग्रह आहे. यामध्ये फारुकने वेगवेगळे प्रयोग केलेले आहेत जे त्याच्या नेहेमीच्या लेखन शैलीपेक्षा जरा वेगळ्या अंगाने जाणारे आहेत आणि ते उत्तम जमून आलेले आहेत. या दहा कथांमधल्या पहिल्या तीन कथा या मुलांच्या नजरेतून होणारा पर्यावरण विनाश, निसर्गाची भाषा समजून घेण्याचा मुलांचा प्रयत्न आणि नुसते समजून घेणे नाही तर मुलानी आपले हे जग आपण नीट ठेवण्यासाठी केलेले प्रयत्न असे ही आहे. यात आनंद शोधण्याचे मार्ग, जबाबदारीचे असणारे भान आणि काल्पनिक ग्रहाची भेट करवून आणणारी समायरा आपल्याला भेटते, तर मोकळ्या हवेत असणारा आनंद भरुन कसा घेणार असा प्रश्न विचारणारा अर्पित ही भेटतो आणि तसेच टेकडी स्वच्छ करण्यासाठी न थकता प्रयत्न करणारे ओजस आणि रेहान ही भेटतात. लहानपणी न कळत्या वयात चिंचेवरच्या माकडाला तोटा फेकून मारणारा आणि त्या माराची मनावर झालेली जखम मोठा झाल्यावरही मनावर कोरलेला योगेश, आपल्या लाडक्या लहानग्या मैत्रिणीसाठी व्याकुळ होऊन रोज दारावर धडका देणारे शाहताब अस्वल आपल्याला अस्वस्थ करुन जातात. एका कथेत तर चक्क सायकल ही कथेची नायिका आहे आणि तिच्या सुखाच्या आणि नाराज होण्याच्या अनुभवातून आपणही तिच्यासोबत प्रवास करतो. इथे आपण बाबांच्या अपघाताने अस्वस्थ असणाऱ्या सारंगा सोबत त्या दवाखान्याच्या बाहेर येरझारा घालत असतो आणि अमृताच्या मैतरासोबत मेंढक्या बनून रानावनात चालत असतो. गावात फिरताना, गावाला पडणारं हिरवं स्वप्न अनुभवणारा मंदार आपल्या भेटतो आणि सोबतच गावात राहणारी आणि तुमच्या शहरालाही स्वप्न पडतच असेल की रे? काय असेल ते स्वप्नं? असा प्रश्न विचारणारी चंदा हाच प्रश्न आपल्यालाही विचारते असा भास आपल्याला होतोच होती. शाळेच्या ट्रीपला जायला हजार रुपये नाहीत म्हणून रुसलेल्या साक्षीला बघताना आपणही आपल्या लहानपणी अशा बुडालेल्या शाळेच्या सहली, आणि त्यावेळी आपल्या आईबाबांनी आपल्याला काय सांगितलं होतं आणि कशी आपली समजूत काढलेली हे आठवून आपलेही डोळे ओलसर होताना अनुभवतो. पण याही कथेत निंबोणीच्या पानांमधून दिसणारा, भासणारा तो चंद्र जो हाटूमुटूचा आहे पण त्याला बघून होणारा आनंद मात्र अस्सल आणि खराखुरा आहे. या सगळ्या कथांमधून फारुक ने आजच्या मुलामुलींना आपल्यासमोर उभं केलं आहे, त्यांचे प्रश्न, त्यांच्या विचार करण्याच्या पद्धती आणि त्याचं अस्वस्थ असणं अगदी नेमकेपणाने आपल्यासमोर येतं. ही मुलं कोणत्याही एका शहरातली, एका भागातली किंवा एकसारख्या घरातली नाहीत पण त्यांचे जगणे हे आजच्या मुलांचे जगणे आहे. फक्त एक प्रश्न मनाला पडतो की आपल्या भोवतालच्या प्रश्नांनी, आपल्या गरिबीने किंवा अभावाने काळवंडलेली मुलं जेव्हा समजूतदारपणे स्वतः शहाणे बनत पुढे निघतात तेव्हा, ही सगळं कोणामुळे, आणि माझ्याच वाट्याला का? याचे जबाबदार कोण असा एखादा प्रश्न एकाही मुलाला पडू नये याची काळजी वाटते. येत्या काळात फारुक च्या कथांतील ही मुलं तुम्हाला मला हे प्रश्न विचारतील याची खात्री आहे आणि मी त्या दिवसाची वाट ही बघतो आहेच. या पुस्तकातील चित्रांचा विशेष उल्लेख करणे फारच महत्वाचे आहे. चंद्रमोहन कुलकर्णी ज्या ताकदीने कथेची भावना नेमक्या कुंचल्यात पकडतात ते बघताना आपण निव्वळ थक्क होतो. इतकी सुंदर आणि मनाला धरुन ठेवणारी चित्रं या पाना आपल्याला भेटत राहतात. इतक्या ताकदींच्या कथांचे पुस्तक मेहता प्रकाशनाने अत्यंत प्रेमाने आणि उत्तम निर्मितीमूल्य जपत काढलेले आहे. आज आपला भोवताल इतका जातधर्म, पर्यावरणीय नाश आणि भविष्याच्या चिंतांनी कुरतडलेला असताना अशा खऱ्याखुऱ्या मुलांच्या कथा आपल्यासमोर येणं हाच आपल्याला दिलासा देणारा आपला हाटूमुटूचा चंद्र आहे...हा असाच राहो... परेश जयश्री मनोहर ...Read more

HATUMUTUCHA CHANDRA
HATUMUTUCHA CHANDRA by FARUK KAZI Rating Star
बालाजी मदन इंगळे

संवेदनशीलतेने लिहिलेल्या तरल बालकथा : हाटुमुटूचा चंद्र मराठीमध्ये जाणीवपूर्वक आणि विचारपूर्वक बालसाहित्य लिहिणाऱ्यांची संख्या खूप कमी आहे. बालसाहित्य आणि बाल मानसशास्त्र यांचा विचार करून आपली प्रतिभा त्यासाठी वापरणाऱ्या मोजक्या बालसाहित्यिकांमध्य फारूक एस. काझी यांचे नाव समाविष्ट करावे लागेल. त्यांच्या नुकत्याच प्रकाशित झालेल्या मुलांसाठीच्या ‘हाटूमुटूचा चंद्र’ या कथासंग्रहातून ही बाब ठळकपणे अधोरेखित होते. कथा म्हणजे केवळ प्रसंगानंतर प्रसंग किंवा घटनेनंतर घटना मांडणे नसते. त्यामध्ये लेखकाच्या प्रतिभेने वास्तव आणि कल्पना यांचा सुरेख संगम घडवून आणावा लागतो. कुठलीही कथा लेखकाला त्याच्या अनुभव विश्वातूनच सापडलेली असते. पण ते अनुभव विश्व मांडत असताना त्यात आपल्या प्रतिभेने काही साहित्य गुण समाविष्ट करावे लागतात. तेव्हा ती कथा साहित्यिकदृष्ट्या अभिजात व साहित्य गुणांनी युक्त अशी कथा होते. या संग्रहातील कथांमध्ये अशा साहित्यिक प्रतिभांच्या बऱ्याच जागा आहेत. आणि म्हणूनच फारूक एस. काझी यांच्या कथा रोजच्या जगण्यातीलच असल्या तरी त्यातील साहित्य गुणांमुळे या कथा आपले वेगळेपण सिद्ध करतात. कथेमध्येही काव्यात्मकता असते. प्रतिकात्मकता असते. आणि त्यामुळेच ती कथा वैश्विक ठरत असते. हे सर्व गुण ‘हाटुमूटुचा चंद्र’ मधील कथांमध्ये आढळून येतात. म्हणून ही कथा महत्त्वाची आहे. अद्भुतरम्यता, काल्पनिकता आणि धक्का तंत्र याने लिहिलेल्या कथा नेहमीच मुलांना आवडतील असे नाही. आपल्याच अवतीभवती घडणाऱ्या घटना इतक्या सुंदर असू शकतात हे मुलांना वाचायला आवडते. नेमके तेच या कथांमध्ये आहे. या बालकथा या मातीतल्या आहेत. या संस्कृतीतल्या आहेत. म्हणून त्या महत्त्वाच्या आहेत. या संग्रहात एकूण दहा कथा आहेत. सर्वच कथा सुंदर आणि हृदयस्पर्शी आहेत. ‘फिकर नॉट’ या कथेमध्ये दोन मित्रांचे काही प्रसंग आहेत. रेहान आणि त्याचा मित्र अर्पित. दोघे एका टेकडीवर जातात. रेहानसाठी टेकडीवरील अनुभव नवीन असतो. दोघे खूप गप्पा मारतात. तळ्यात पाय सोडून बसतात. तिथे बसल्यानंतर त्या तळ्यातील काही मासे आपण बाटलीत घेऊन जावे असे रेहानला वाटते. पण अर्पित त्याला सांगतो की आपण या टेकडीवरून काय घेऊन जायला हवं तर या टेकडीवरील वातावरण, टेकडीवरील दृश्य, इथे आपण घेतलेला आनंद हे सगळे मनात भरून घेऊन जायला हवे. असं मुक्या प्राण्यांना त्रास द्यायचा नाही, हे नकळतपणे तो रेहानला सांगतो. रेहानलाही ते पटतं आणि मग तो खोल श्वास घेऊन इथल्या सगळ्या आनंदाच्या आठवणी मनात भरून घेतो. आणि निघतो. एखादा कोणी अन्य बालकथा लेखक असता तर या दोघांचं बोलणं, टेकड्यावरील वर्णन, दोघांनी केलेली मज्जा, त्यांनी केलेल्या गमती याचे वर्णन करून कथा संपवली असती पण फारूक काझी यांनी इथून काय घेऊन जायचं? हे लिहून जे एक नवीन वळण कथेला दिलेले आहे, इथेच या कथेतील साहित्यगुणाची जागा आहे. तिथेच कथा लेखक म्हणून फारूक काझी यांची प्रतिभा आपल्याला दिसून येते. आणि बालसाहित्यिक म्हणून त्यांचं वेगळेपणही इथेच आपल्याला दिसतं. ‘कर के देखो’ या कथेमध्ये ट्रेकला गेलेली मुले स्वच्छता दूत कशी बनतात हे मुळातून वाचण्यासारखे आहे. ‘जखम’ या कथेमध्ये इयत्ता तिसरीत शिकत असताना एका माकडीनीला आपण इजा पोहोचवल्याचं मोठं झाल्यावर कथेतील नायकाला आठवतं. आणि तो मोठा असूनही लहानांसारखं रडत रडत ती चूक आपल्या आईकडे कबूल करतो. ही कथा वाचताना पाषाणहृदयी माणूसही भावनिक होऊन जातो. कडूनिंबाच्या झाडाचे खाली पडलेले पान चंद्राची प्रतिमा म्हणून म्हणजेच हाटुमूटुचा चंद्र म्हणून कथेत वापरणे. आणि तो चंद्र कथेतील साक्षीच्या चेहऱ्यावर आनंदाचे प्रतिक म्हणून येणे. आणि त्याद्वारे सहलीला जाण्यासाठी पैसे न मिळाल्याच्या दुःखातून स्वतःला सावरणे ही सगळीच मांडणी भन्नाट झाली आहे. अशा भरपूर जागा या पुस्तकांमध्ये आहेत. ‘हिरवं सपान’ या कथेमध्ये शहरातला मंदार गावाकडे येतो. आणि गावातील चंदा सोबत शेत-शिवारात फिरतो. या शेत-शिवारातील भरपूर झाडे पाहून बी, रोपटं, मग त्याचं झाड ही क्रिया किती महत्त्वाची आहे. आणि या क्रियेचं स्वप्न नेहमीच गावाला पडतं. तसंच हिरवं स्वप्न शहराला का पडत नाही? हा प्रश्न खरंतर लहान-मोठ्या प्रत्येक वाचकाला अस्वस्थ करून जातो. ‘स्वप्न’ ही आणखी एक सुंदर कथा या संग्रहामध्ये आहे. माणसाला अभावातूनच वस्तूंची किंमत कळत असते. ज्याच्याकडे सर्व काही आहे अशा मुलाकडे जेव्हा सायकल येते, तेव्हा तिची काळजी घेतली जात नाही. पण स्वप्नातही ज्याच्या कधी सायकल मिळेल असं वाटत नव्हतं अशा अंकितला जेव्हा सायकल मिळते, तेव्हा तो तिची किती काळजी घेतो आणि हेच त्या सायकलचे स्वप्न होते. आणि अंकितचेही तेच स्वप्न होते ही स्वप्नांची सरमिसळ वाचकांना खूपच आवडून जाते. ‘मैतर’ ही आणखीन एक अनोळखी नातेसंबंध घट्ट करणारी कथा. फक्त काही दिवसांसाठी आलेल्या मेंढक्या काकाची आणि अमृत ची मैत्री होते. आणि ती मैत्री त्या दोघांमध्ये इतकी घट्ट होते की, मेंढक्या काका आपली मेंढरं घेऊन परत निघाल्यावर दोघांनाही एकमेकांचा निरोप घ्यावा असे वाटत नाही. निरोपावेळी दोघांच्याही डोळ्यात पाणी येते. दोघेही निरोपावेळी एकमेकांना भेटवस्तू देतात. हा प्रसंग लेखकाने स्थानिक संदर्भ, संस्कृती, भाषा आणि चित्रदर्शी स्वरूपात असा उभा केला आहे की, वाचक कथा संपली तरी त्या मेंढरांच्या कळपामध्ये आणि अमृतच्या घराच्या आसपासच घुटमळत राहतो. ‘जाऊ दे त्याला’ ही आणखीन एक भावस्पर्शी कथा. जंगली प्राण्यांनाही जीव लावला तर ते माणसांशी प्रेमाने वागतात हे सांगणारी ही कथा वाचकाच्या काळजाचा ठाव घेते. निधी आणि फॉरेस्ट ऑफिसर असलेले तिचे बाबा यांची ही कथा जंगलाच्या दुनियेत वाचकाला घेऊन जाते. पण तिथेही मानवी भावना कशी श्रेष्ठ ठरते हे अतिशय रंजक पद्धतीने लेखकाने लिहिले आहे. ‘बाबांची भाषा’ ही आणखी एक हृदयाला स्पर्श करणारी कथा! शाळेत शिकणारा सारंग अपघातात ऐकणं आणि बोलणं कायमचं गमावलेल्या आपल्या बाबांसाठी हातवाऱ्याची भाषा शिकून घेतो. हे जेव्हा वाचकाला कळतं तेव्हा वाचक जागच्याजागी स्थिर होऊन जातो. ‘एस पी १३’ ही आधुनिक तंत्रज्ञानात घेऊन जाणारी कथा! छोटीशी समायरा स्पेसशीप घेऊन एका नव्या प्लॅनेटवर जाते. आणि त्या नव्या प्लॅनेटवर असलेली माणसं कशी निसर्गाची काळजी घेतात हे पाहून समायरा तिथेच राहण्याचा निर्णय घेते. तेव्हा तिच्या सायंटिस्ट मामासह वाचक ही अचंबित होऊन जातात. निसर्ग आणि आधुनिक तंत्रज्ञान यांचा सुरेख आणि अफलातून संगम या कथेमध्ये लेखकाने घडवून आणला आहे. या पुस्तकाची महत्त्वाची बाजू म्हणजे यातील चित्रे! चंद्रमोहन कुलकर्णी यांची चित्रे या कथेला एक वेगळा आणि नवा आयाम देतात. ही चित्रे या कथेशी एवढी एकरूप झालेली आहेत की ही चित्रे वेगळी काढली तर या कथा अपूर्ण वाटतील! कथेला अनपेक्षित वळण देण्यामध्ये लेखक पटाईत आहेत. हे प्रत्येक कथेतून आपल्याला जाणवतं. आपण सरळ कथा वाचत जातो. आणि कथा देखील आता सरळ या वाटेने जाईल असे वाटत असताना ती कथा असं काही वळण घेते की वाजक स्तंभित होऊन जातो. आणि हीच खरे तर फारूक एस. काझी यांची खरी ताकद आहे. त्यांच्या सर्व कथांमधील पात्र आणि त्यांची नावे पाहिली तर ती विशिष्ट अशी पात्रे किंवा नावे नाहीत. तर सर्वसमावेशक अशी सर्व पात्रे आहेत. त्यामुळे किती तीव्र सामाजिक भान लेखकाला आहे हेही आपल्याला जाणवते. आजच्या सोशल मीडियाच्या काळात नातेसंबंध दूरावत असताना, नातेसंबंध दृढ करणाऱ्या या कथा प्रत्येक वाचकांपर्यंत पोहोचल्या पाहिजेत. या कथांमध्ये कल्पनाशक्ती आहे. वास्तवता आहे. पण याच्या जोडीला कथालेखक म्हणून जी एक संवेदनशीलता लागते, जी एक तरलता लागते आणि मुलांच्या कथांमध्ये जो एक हळुवारपणा आणि नाजूकता आवश्यक असते ते सगळे गुण या कथेमध्ये ओतप्रोत भरलेले आहेत. म्हणून या कथा फक्त लहानच नाही तर मोठ्यांनाही गुंतवून ठेवणाऱ्या आहेत. स्थळ आणि काळानुसार बदलणारी भाषा आणि प्रसंगानुसार बदलणारं वर्णन या कथेच्या जमेच्या बाजू आहेत. यामुळे या कथा वाचकाला पकडून ठेवतात. आणि काही एक सामाजिक भान आणि साहित्यिक जाण या कथा देतात. आणि हेच या कथेचे मोठे यश आहे. - बालाजी मदन इंगळे ...Read more