DALE CARNEGIE

About Author

Birth Date : 24/11/1900
Death Date : 01/11/1955


DALE CARNEGIE WAS AN AMERICAN WRITER AND LECTURER, AND THE DEVELOPER OF COURSES IN SELF-IMPROVEMENT, SALESMANSHIP, CORPORATE TRAINING, PUBLIC SPEAKING, AND INTERPERSONAL SKILLS

लोकप्रिय लेखक आणि प्रशिक्षक असलेल्या कार्नेगी यांचा जन्म मिसुरीतील एका गरीब शेतकरी कुटुंबात झाला. बालपण कष्टप्रद असूनही त्यांनी आपले शिक्षण पूर्ण केले, आणि नंतर त्यांनी आर्मर अ‍ॅन्ड कंपनी च्या विक्री विभागामध्ये यशस्वी कामगिरी बजावली. व्याख्याता होणे हे त्यांचे स्वप्न होते आणि म्हणून त्यांनी ती कंपनी सोडली होती. कार्नेगी खासकरून प्रसिद्ध आहेत, ते व्याख्याते व स्वसुधार समितीचे उद्गाते म्हणून. त्यांनी संवादकला व व्यक्तिमत्त्व सुधारणा या विषयांवर लिहिलेली पुस्तके विशेष गाजली असून सर्वाधिक विक्री झालेल्या पुस्तकांमध्ये त्यांचा समावेश होतो. त्यांच्या वैयक्तिक कौशल्य व व्यक्तिमत्त्व सुधारणा प्रशिक्षण कार्यक्रमांचा लाभ आजवर अनेक कॉर्पोरेट संस्थांनी व विविध क्षेत्रांतील अनेक लोकांनी घेतला आहे व त्याचा फायदा अनेकांना झालेला आहे. १९३२ साली त्यांनी लिंकन द अननोन हे पुस्तक लिहिले. त्यानंतर १९३६ साली त्यांनी लिहिलेले हाउ टू विन फ्रेड्स अ‍ॅन्ड इन्फ्लुएन्स पीपल हे पुस्तक प्रचंड गाजले आणि आजही ते तितकेच लोकप्रिय आहे. याशिवाय १९४८ साली लिहिलेले हाउ टू स्टॉप वरिंग अ‍ॅन्ड स्टार्ट लिव्हिंग हे पुस्तकही विशेष लोकप्रिय झाले. त्यांची इतरही पुस्तके लोकप्रिय व बेस्टसेलर आहेत.
Sort by
Show per page
Items 1 to 7 of 7 total
AAVASHYAK ASHI PACH LOKKOUSHALYE Rating Star
Add To Cart INR 200
CHINTA SODA SUKHANE JAGA Rating Star
Add To Cart INR 300
DALE CARNEGIE COMBO SET- 6 BOOKS Rating Star
Add To Cart INR 1470
MAJET JAGA ANI ANANDANE KAM KARA Rating Star
Add To Cart INR 220
MITRA JODA ANI LONKANVAR PRABHAV PADA Rating Star
Add To Cart INR 250
PRABHAVSHALI SAMBHASHANACHA ZATPAT V... Rating Star
Add To Cart INR 280
SWATAHLA AVISMARANIYA BANVA Rating Star
Add To Cart INR 220

Latest Reviews

KULAMAMACHYA DESHAT
KULAMAMACHYA DESHAT by G.B. DESHMUKH Rating Star
डॉ शिंदे निलेश, अमरावती

`कुलमामाच्या देशात` वाचून काढले. प्रत्येक कथा खुप वाचनीय आहे. `कपारीत वाघोबा` मध्ये रवींद्र वानखडे ह्यांनी पहाटे चार ते 10 नुसती भ्रमंती केली आहे.. सकाळची सूर्यकिरण अंगावर पडली असताना वाघ बघायला भेटणं ही एक अप्रूप वाटणारी गोष्ट आहे. `डरकाळीचा रार` वानखडे साहेबांनी बेलसरें सोबत अनुभवला आहे. `जिवाची पर्वा` न करता वानखडे साहेब पाळण्यात विसावले होते. गव्याच्या पिलावर वाघीणीने हल्ला केला नाही.. हे वानखडे साहेबांनी स्वतः बघितले व आम्हाला देखील समजले.. वाघाच्या पंजाची कशी प्रतिकृती तयार करतात हे सांगितले परंतू मला लक्षात आले नाही (मी प्रत्यक्ष बोलून जाणून घेईन). `मेहमान रह गया` या कथेत वाघाने माणसाची शिकार कशी केली त्यानंतर वनविभागाने बसची सोय करून मुलांना मदत कशी झाली हे देखील सांगितले व आपल्या सारखे वन अधिकारी काय करू शकतो हे प्रांजळ पणे नमूद केले आहे.. सेमडोह येथील गजराजाची कथा अजून देखील लोक सांगतात त्यातील तुम्ही त्याला वाचवयाचा प्रयत्न केला परंतू तो नियतीला मान्य नसेल. बाणा का घुंगरू- मधील हल्ला व घटना मन विचलित करणारी वाटली व मेळघाट मधील वन कर्मचारी किती कामसू आहेत हे त्या वरून दिसले.. मला बाणा ढाप प्रत्यक्ष बघायला आवडेल.. `रानगव्यांची कवायत` मध्ये रानगवे स्वतःच रक्षण कश्या पद्धतीनं करतात हे मला पहिल्यांदा समजले.. कोकटु इथं तीन दिवस आपण वाघ बघण्याची केलेली हॅट्रिक ही जंगलाने तुम्हा वनाधिकार्‍यास दिलेली सलामी आहे. `शिकार हो गया` - माहुल वेलीचा कसा उपयोग केला जातो व पोळी तयार करतात हे देखील वेगळी गोष्ट वाटली.. आपण सांबर शिकार कशी थांबवली व वन्यजीवनाची साखळी अबाधित राखली.. वाघ खेकडे मारून खातो हे ऐकून नवल वाटले.. असा सॉलिड वन अधिकारी मेळघाटला लाभला हे या कथां मधून मला समजलं व प्रत्येक वाचकाला हे जंगल, इथले लोक या विषयी कायम आकर्षण निर्माण करत राहील.. ...Read more

MAHARUDRA
MAHARUDRA by G.B. DESHMUKH Rating Star
श्री. बाबाराव घोरमाडे, अमरावती

अमरावती जिल्हा मधील एका सामान्य खेड्यातील, एक अलौकिक असामान्य अशा फुटबॉल खेळाडूचे हे व्यक्तिचरित्र. १९४० ते १९५१ हा कालखंड म्हंजे तसाही भारतीया करीता त्यातल्या त्यात ग्रामीण भागाकरिता खडतर कालखंड. अशा विपरीत परिस्थितीत शैक्षणिक आर्थिक सामाजिक मारगदर्शन इत्यादी पाठबळ चा अभाव असताना सुद्धा आतंरराष्ट्रीय दर्जा चा खेळाडू निर्माण होणे हे ते चरित्र नायक चे असामान्य व्यक्तिमत्व अधोरेखित होते. समाधानाची आनंदाची बाब ही की हे पुस्तक रूपाने प्रसिध्द करण्याचे काम चरित्र नायक चे सुपुत्र श्री गजाननराव उर्फ जी बी देशमुख यांनी केले. हे सर्व काही अंशी कर्ज ओझे हलके करण्यासारखे आहे लेखकाला या करीता खूप मेहनत करून माहिती संकलित करावी लागली. एखादी थप्पड बनती थी........ बडे बेआबरू होकर घरी आलो........पण कहाणी मे ट्विस्ट अभि बाकी था..... प्रसंगी चे वाक्य रचना , कोसळणाऱ्या धबधबा सारखे निखळ आनंद देऊन गेले . मेहता पब्लिशिंग ने लॉन्च केले म्हणजे सर्वदूर मराठी माणसाचे पर्यंत पोहोचले आहे वाचनीय आहे प्रत्येकाने वाचावे.विसावा शतकातील पुर्वाध, विपरीत परिस्थितीतही किती कष्ट करावे लागले असतील? धन्य ते.. ...Read more