* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: FISH!
  • Availability : Available
  • Translators : DR. SHUCHITA NANDAPURKAR-PHADKE
  • ISBN : 9789353171070
  • Edition : 1
  • Publishing Year : SEPTEMBER 2018
  • Weight : 100.00 gms
  • Pages : 104
  • Language : Translated From ENGLISH to MARATHI
  • Category : SELF HELP, HEALTH & PERSONAL DEVELOPMENT
  • Available in Combos :FISH SERIES COMBO SET - 4 BOOKS
Quantity
Buying Options:
  • Print Books:
IMAGINE A WORKPLACE WHERE EVERYONE CHOOSES TO BRING ENERGY, PASSION AND A POSITIVE ATTITUDE TO THE JOB EVERY DAY. IN THIS ENGROSSING PARABLE, A FICTIONAL MANAGER HAS THE RESPONSIBILITY OF TURNING A CHRONICALLY UNENTHUSIASTIC AND UNHELPFUL DEPARTMENT INTO AN EFFECTIVE TEAM. SEATTLE`S PIKE PLACE FISH IS A WORLD FAMOUS MARKET THAT IS WILDLY SUCCESSFUL THANKS TO ITS FUN, BUSTLING, JOYFUL ATMOSPHERE AND GREAT CUSTOMER SERVICE. BY APPLYING INGENIOUSLY SIMPLE LESSONS LEARNED FROM THE PIKE PLACE, OUR MANAGER DISCOVERS HOW TO ENERGISE AND TRANSFORM HER WORKPLACE. ADDRESSING TODAY`S MOST PRESSING WORK ISSUES WITH AN ENGAGING METAPHOR AND AN APPEALING MESSAGE, FISH! OFFERS WISDOM THAT IS EASY TO GRASP, INSTANTLY APPLICABLE, AND PROFOUND.
वातावरणातील सकारात्मक ऊर्जा माणसाची कार्यक्षमता कशी वाढवते, याचा वस्तुपाठ देणारं हे पुस्तक आहे. एका छोट्याशा कथेतून हा वस्तुपाठ दिला आहे. मेरी जेन ही ‘फर्स्ट गॅरंटी फायनांशिअल’ या सिअ‍ॅटलमधल्या प्रथितयश कंपनीच्या ‘ऑपरेशन विभागा’त सुपरवायझर म्हणून काम करत असते. या कंपनीच्या पहिल्या मजल्यावर मेरीच्या हसत-खेळत वागण्यामुळे आणि तिच्या व्यवस्थापन कौशल्यामुळे एकूणच उत्साही वातावरण असतं. त्याच्या विरुद्ध वातावरण याच कंपनीच्या तिसऱ्या मजल्यावर असतं. या मजल्यावरील ऑपरेशन विभागाच्या हातात फर्स्ट गॅरंटीच्या सर्व व्यवहारांचं काम असतं. ‘विषारी ऊर्जेचा कचरा डेपो’ असं संबोधल्या जाणाऱ्या या विभागाची जबाबदारी मेरीवर सोपवली जाते. या विभागातील अकार्यक्षम कर्मचाऱ्यांमध्ये कशी सुधारणा करायची, या विचारात असताना मेरी पाइक प्लेस फिश मार्केटमध्ये जाते आणि तेथील उत्साही वातावरणाने प्रभावित होते. तेथील एक तरुण विक्रेता लोनी हे उत्साही वातावरण तिथे जाणीवपूर्वक निर्माण केल्याचे आणि त्याचे फायदे तिला सांगतो. फिश मार्केटचं हे यशाचं सूत्र मेरी आपल्या विभागाला कसं लागू करते आणि आपल्या कर्मचाऱ्यांमध्ये कसा सकारात्मक बदल घडवून आणते, हे जाणून घेण्यासाठी हे पुस्तक वाचलं पाहिजे.
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
#BUSINESS&FINANCE#MANAGEMENT#HEALTH#FAMILY&PERSONALDEVELOPMENT#MINDBODY&SPIRIT#BUSINESS&ECONOMICS#BUSINESSSTRATEGY&MANAGEMENT#उद्योग#अर्थकारण#व्यवसाय#विपणन#मार्गदर्शक# व्यवस्थापन#व्यक्तिमत्वविकास
Customer Reviews
  • Rating StarManasi Phadke

    ग्रंथ दिंडीतील आजचे परिचयाचे पुस्तक आहे" फिश !" मेहता पब्लिशिंग हाऊसने प्रकाशित केलेल्या या पुस्तकाच्या सीरिज चे लेखक आहेत, स्टीफन सी लँडिंग, जॉन क्रिस्टेनसेन आणि हॅरी पॉल. त्यापैकी स्टीफन हे लेखक ,वक्ते, समुपदेशक .तर जॉनच्या नेतृत्वाखाली फिश या शॉर् फिल्म ला भरभरून यश मिळाले. हॅरी हेदेखील लेखक, वक्ते ,सल्लागार आहेत. फिश एक अप्रतिम कथा आहे. कुठल्याही परिस्थितीत चपखलपणे लागू होणारी, गुंतवून ठेवणारी! व्यवसाय कसा चालवावा? कर्मचाऱ्यांना प्रोत्साहित कसं करावं ?इथपासून तर दैनंदिन जीवन कसे जगावे, सगळ्यांशी चांगले संबंध कसे राखावे ,पर्यंत व्यक्तीला एका परिपूर्णते पर्यंत नेणारी ही पुस्तकांची सिरीज. प्रस्तुत कथेत सिएटलची एक काल्पनिक मॅनेजर आपल्याला भेटते. म्हणजे आपल्या कथेची नायिका, मेरी जेन. दोघं मुलं, संसार ,नोकरी उत्तम चालू असतानाच डॅनचा ,नवऱ्याचा अकाली मृत्यू होतो. त्याच्या हॉस्पिटल साठी लागलेले कर्ज फिटेपर्यंत, असेल ती नोकरी व प्रमोशन तिला घ्यावे लागते . ती काम करत असलेल्या फर्स्ट गॅरेंटी फायनान्शिअल या कंपनीतील तिसऱ्या मजल्यावरील डिपार्टमेंट मध्ये तिला प्रमोशन मिळते. एकूणच डिपार्टमेंटचं नाव अतिशय बदनाम झालेले. "विषारी ऊर्जेचा कचरा डेपो "म्हणून ते ओळखले जाते .अशा मरगळलेल्या वातावरणात डिपार्टमेंट हेड म्हणून तिला प्रमोशन मिळते. तिच्यासमोर एक अशक्य वाटणारे आव्हान असते ते तिच्या हाताखाली काम करणारी माणसं आणि पर्यायाने संपूर्ण चैतन्यहीन विभाग याला नवचैतन्य देण्याचे. तेथीलच जगप्रसिद्ध पाईक प्लेस फिश मार्केटला एक दिवस ती सहज भेट देते. तेथे तिची भेट लोनी या मासे विक्रेत्याशी ओळख होते . तो तिला "फिश फिलोसोफी "सांगतो. पुढे वारंवार त्यांच्या होणाऱ्या भेटीच्या रूपाने कथा फुलत जाते आणि त्याच बरोबर तिसऱ्या मजल्यावरील डिपार्टमेंट चे रुप बदलणे तिला शक्य होते. ती फिलॉसॉफी कुठली ? ती मात्र तुम्हीच प्रत्यक्षात वाचायला हवी ! या रूपाने फक्त अलीबाबाच्या गुहेची किल्ली तुमच्या स्वाधीन करते आहे. सीरिज मधील फिश फोर लाइफ ,यात पुढे लोनी व मेरी जेन हे विवाहा नंतर आयुष्यातील ताण दूर करण्यासाठी याच फिलॉसॉफी चा वापर करताना दिसतात .तर फिश टेल आणि फिश स्टिक यात हीच तत्वे वापरून दैनंदिन आयुष्य सुकर करणाऱ्यांच्या कथा आहेत. एकूणच सर्वांगीण जीवनामध्ये यशस्वी ठरणारी , फिश फिलोसोफी सांगणारी ही सिरीज आहे. वाचकाला खिळवून ठेवण्याची ताकद असणारी ही सिरीज सगळ्यांनी एकदातरी वाचायलाच हवी. ...Read more

  • Rating StarDAINIK SAMANA 21-07-2019

    चैतन्यदायी ‘फिश’... स्टिफन सी लॅण्डेन, जॉन क्रिस्टेन्सेन आणि हॅरी पॉल यांच्या मूळ इंग्रजी ‘फिश’ या कथेचा डॉ. शूचिता नांदापूरकर-फडके यांनी ‘फिश’ हा मराठी अनुवाद केला आहे. ‘फिश’ ही संपूर्ण काल्पनिक कथा असून नोकरी, व्यवसायात व्यवस्थापन क्षेत्रात काम कराऱ्या अनेकांना मार्गदर्शक आणि प्रेरणादायी ठरली आहे. ही कथा सिअ‍ॅटलमध्ये घडते आणि या कथेची नायिका जेन रेमिरेझ. या कथानकातले घटनाचक्र अत्यंत प्रवाही असून त्यावर आधारित व्हिडिओ फिल्मही प्रसिद्ध आहे. जेनवर नवऱ्याच्या मृत्यूमुळे आकस्मिक आपत्ती कोसळते आणि आर्थिक तंगी असताना नोकरीतही अशक्य आव्हाने समोर उभी ठाकतात. या सगळ्याचा सामना जेन कसा करते त्याची कथा आहे ‘फिश’. आपले नशीब आपल्या हातात नसते. पुढे काय परिस्थिती येईल तेही कोणी सांगू शकत नाही, पण आलेल्या परिस्थितीला कसे तोंड द्यायचे हे आपण ठरवू शकतो. आपल्या आवडीचे काम निवडणे हे नेहमीच आपल्या हातात नसते, पण हातातले काम आवडीने करणे हे आपल्याच हातात असते. तिसNया मजल्यावरच्या विषारी ऊर्जेच्या कचरा डेपोचा निचरा कसा करावा ही जेनला भेडसावणारी समस्या तुम्हा आम्हालाही अनेकदा त्रस्त करते. कारण कोणतेही काम सतत करीत राहण्याचा आपल्याला कंटाळा येतो. जेन ऑफिसमधल्या सर्वांचे अजून फक्त निरीक्षण करून काही नोंदी करून घेते आणि मग एक दिवस जगप्रसिद्ध पाइक प्लेस फिश मार्केटला अपघाताने पोहोचते. या फिश मार्केटच्या भेटीनंतर तिसऱ्या मजल्यावर कोणती जादू घडते हे वाचणे आणि अनुभवणे फार आवश्यक आहे. कामाच्या ठिकाणी आनंदी आणि उत्साही वातावरण असेल, आपले काम जीव ओतून करण्याची तळमळ असेल, दुसऱ्याला सौख्य लाभू देण्याची वृत्ती असेल तर कशी मनोवृत्ती निवडावी हे ‘फिश’मधून आवश्य जाणून घ्यावे. -नमिता श्रीकांत दामले ...Read more

  • Rating StarDAINIK SAKAL 14-10-2018

    कार्यालयीन जीवनात ऊर्जा कशी वाढवायची, कर्मचाऱ्यांचा सहभाग कसा वाढवायचा याचं दर्शन घडवणारं ‘फिश!’ हे पुस्तक. सिअ‍ॅटलमधल्या एका मॅनेजरपुढे उदासवाण्या पद्धतीनं काम करणारे कर्मचारी अशी समस्या असते. तिच्या ऑफिसच्या जवळ असणाऱ्या पाइक प्लेस फिश मार्केटमधून ी उत्साह, आनंद आणि सर्वोत्तम सेवा यांचे धडे कसे घेते आणि कर्मचाऱ्यांपर्यंत कसे पोहोचवते याची कथा ‘फिश!’ या पुस्तकात मांडण्यात आली आहे. छोट्या छोट्या गोष्टी प्रत्येकालाच लागू होतील. हेच तत्त्वज्ञान पुढं घेऊन जाणाऱ्या कंपन्यामधल्या यशोकथा ‘फिश! टेल्स’ या पुस्तकात मांडण्यात आल्या आहेत. त्यातून वेगळी तत्त्वज्ञानंही मांडण्यात आली आहेत. ‘फिश! स्टिक्स’, ‘फिश! फॉर लाइफ’ या पुस्तकांतही कार्यालयीन प्रेरणादायी बोधकथांचा समावेश आहे. स्टिफन सी. लँडिन, जॉन क्रिस्टेन्सेन आणि हॅरी पॉल यांनी ही पुस्तकं लिहिली असून, डॉ. शुचिता नांदापूरकर-फडके यांनी अनुवाद केला आहे. ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

HATUMUTUCHA CHANDRA
HATUMUTUCHA CHANDRA by FARUK KAZI Rating Star
परेश जयश्री मनोहर

मराठी बालसाहित्याचा गेल्या काही दशकांचा अवकाश हा सातत्याने प्रबोधनपर, उद्बोधनपर आणि कोणत्याही कथेच्या शेवटी एका वाक्यात तात्पर्य सांगणाऱ्या बाळबोधकथांचा राहिलेला आहे. या बाल साहित्यामध्ये प्रामुख्याने येणारे पात्र ही मध्यमवर्गीय, उच्च जातीय मराठी घरतील मुलं मुली असतात आणि जेव्हा केव्हा वंचित समाजातील, शोषित समाजातील, गरीब ग्रामीण घरातील मुलांचे चित्रण येतं तेव्हा ते अति दुःखी आणि बिचारे, ज्यांना मदतीची गरज आहे आणि अशी मदत करण्याची जबाबदारी मोठ्या घरातील उच्चवर्णीय, उच्चवर्गीय नायक मुला मुलींची असते. त्यातूनही प्रामुख्याने काय करावे काय करू नये किंवा तत्सम उपदेशच प्रामुख्याने कथेच्या शेवटी केलेले दिसतात. आणि हा लेखक वर्ग ही प्रामुख्याने पुणे मुंबई भागात स्थिरावलेला राहणारा तिथल्या अनुभूती आणि तिथल्या जगण्याचा अवकाश सोबत घेऊन येणारा असतो. अशा सगळ्या पार्श्वभूमीवरती सोलापूर जिल्ह्यातल्या सांगोला तालुक्यात अनकढाळ सारख्या एका छोट्या गावात राहणारा फारुक काझी हा लेखक जेव्हा गेलं दशकभर कवितांमधून, कथांमधून बालविश्व चितारण्याचा प्रयत्न करतो तेव्हा ते जास्त करून ग्रामीण भागातील मातीशी जोडलेलं असतं. आपल्या भोवतालच्या खऱ्याखुऱ्या मुलांमुलींच्या भावविश्वाच्या जवळ जाणारं चित्रण त्याच्या कथांमधून आपण सातत्याने बघत असतो. त्याचे "शिकण्याच्या वाटेवरील आनंदवन" हे पहिले पुस्तक एका प्रयोगशील शिक्षकाच्या शाळेतील अनुभवांवर आधारलेले आहे. त्यांचे आजवर मित्र, प्रिय अब्बू, चुटकीचे जग हे कथासंग्रह प्रकाशित झालेले आहेत. या सगळ्याच पुस्तकातून त्याने सातत्याने ग्रामीण, निमशहरी भागातील कनिष्ठ मध्यमवर्गीय आणि गरीब कुटुंबातील बहुजन आणि वंचित घटकातील, मुस्लिम कुटुंबातील मुलांच्या नजरेने दिसणाऱ्या गोष्टी टिपण्याचा प्रयत्न केलेला आहे. यात कुठेही गरिबीचे गोडवे नाहीत की काठोकाठ पसरलेलं बिचारेपण नाही. तर या आर्थिक दृष्ट्या नागवलेल्या लोकांच्या घरातील मुलांच्या कथा आहेत, ज्यात प्रेम, उत्सुकता, जिद्द, समजून घेणे आणि अनुभवातून आलेलं शहाणपण हे प्रामुख्याने जाणवते. अभावग्रस्तता, एखाद्या गोष्टीचे नसणे, तरीही नातेसंबंधांवरील विश्वास, प्रेम आणि एकमेकांबद्दलचा आदर, काळजी घेऊन जपणारी कुटुंबं फारुकच्या लिखाणात सातत्याने येत राहतात. त्याचा आत्ता आलेला हाटूमुटूचा चंद्र हा एक अफलातून कथासंग्रह आहे. यामध्ये फारुकने वेगवेगळे प्रयोग केलेले आहेत जे त्याच्या नेहेमीच्या लेखन शैलीपेक्षा जरा वेगळ्या अंगाने जाणारे आहेत आणि ते उत्तम जमून आलेले आहेत. या दहा कथांमधल्या पहिल्या तीन कथा या मुलांच्या नजरेतून होणारा पर्यावरण विनाश, निसर्गाची भाषा समजून घेण्याचा मुलांचा प्रयत्न आणि नुसते समजून घेणे नाही तर मुलानी आपले हे जग आपण नीट ठेवण्यासाठी केलेले प्रयत्न असे ही आहे. यात आनंद शोधण्याचे मार्ग, जबाबदारीचे असणारे भान आणि काल्पनिक ग्रहाची भेट करवून आणणारी समायरा आपल्याला भेटते, तर मोकळ्या हवेत असणारा आनंद भरुन कसा घेणार असा प्रश्न विचारणारा अर्पित ही भेटतो आणि तसेच टेकडी स्वच्छ करण्यासाठी न थकता प्रयत्न करणारे ओजस आणि रेहान ही भेटतात. लहानपणी न कळत्या वयात चिंचेवरच्या माकडाला तोटा फेकून मारणारा आणि त्या माराची मनावर झालेली जखम मोठा झाल्यावरही मनावर कोरलेला योगेश, आपल्या लाडक्या लहानग्या मैत्रिणीसाठी व्याकुळ होऊन रोज दारावर धडका देणारे शाहताब अस्वल आपल्याला अस्वस्थ करुन जातात. एका कथेत तर चक्क सायकल ही कथेची नायिका आहे आणि तिच्या सुखाच्या आणि नाराज होण्याच्या अनुभवातून आपणही तिच्यासोबत प्रवास करतो. इथे आपण बाबांच्या अपघाताने अस्वस्थ असणाऱ्या सारंगा सोबत त्या दवाखान्याच्या बाहेर येरझारा घालत असतो आणि अमृताच्या मैतरासोबत मेंढक्या बनून रानावनात चालत असतो. गावात फिरताना, गावाला पडणारं हिरवं स्वप्न अनुभवणारा मंदार आपल्या भेटतो आणि सोबतच गावात राहणारी आणि तुमच्या शहरालाही स्वप्न पडतच असेल की रे? काय असेल ते स्वप्नं? असा प्रश्न विचारणारी चंदा हाच प्रश्न आपल्यालाही विचारते असा भास आपल्याला होतोच होती. शाळेच्या ट्रीपला जायला हजार रुपये नाहीत म्हणून रुसलेल्या साक्षीला बघताना आपणही आपल्या लहानपणी अशा बुडालेल्या शाळेच्या सहली, आणि त्यावेळी आपल्या आईबाबांनी आपल्याला काय सांगितलं होतं आणि कशी आपली समजूत काढलेली हे आठवून आपलेही डोळे ओलसर होताना अनुभवतो. पण याही कथेत निंबोणीच्या पानांमधून दिसणारा, भासणारा तो चंद्र जो हाटूमुटूचा आहे पण त्याला बघून होणारा आनंद मात्र अस्सल आणि खराखुरा आहे. या सगळ्या कथांमधून फारुक ने आजच्या मुलामुलींना आपल्यासमोर उभं केलं आहे, त्यांचे प्रश्न, त्यांच्या विचार करण्याच्या पद्धती आणि त्याचं अस्वस्थ असणं अगदी नेमकेपणाने आपल्यासमोर येतं. ही मुलं कोणत्याही एका शहरातली, एका भागातली किंवा एकसारख्या घरातली नाहीत पण त्यांचे जगणे हे आजच्या मुलांचे जगणे आहे. फक्त एक प्रश्न मनाला पडतो की आपल्या भोवतालच्या प्रश्नांनी, आपल्या गरिबीने किंवा अभावाने काळवंडलेली मुलं जेव्हा समजूतदारपणे स्वतः शहाणे बनत पुढे निघतात तेव्हा, ही सगळं कोणामुळे, आणि माझ्याच वाट्याला का? याचे जबाबदार कोण असा एखादा प्रश्न एकाही मुलाला पडू नये याची काळजी वाटते. येत्या काळात फारुक च्या कथांतील ही मुलं तुम्हाला मला हे प्रश्न विचारतील याची खात्री आहे आणि मी त्या दिवसाची वाट ही बघतो आहेच. या पुस्तकातील चित्रांचा विशेष उल्लेख करणे फारच महत्वाचे आहे. चंद्रमोहन कुलकर्णी ज्या ताकदीने कथेची भावना नेमक्या कुंचल्यात पकडतात ते बघताना आपण निव्वळ थक्क होतो. इतकी सुंदर आणि मनाला धरुन ठेवणारी चित्रं या पाना आपल्याला भेटत राहतात. इतक्या ताकदींच्या कथांचे पुस्तक मेहता प्रकाशनाने अत्यंत प्रेमाने आणि उत्तम निर्मितीमूल्य जपत काढलेले आहे. आज आपला भोवताल इतका जातधर्म, पर्यावरणीय नाश आणि भविष्याच्या चिंतांनी कुरतडलेला असताना अशा खऱ्याखुऱ्या मुलांच्या कथा आपल्यासमोर येणं हाच आपल्याला दिलासा देणारा आपला हाटूमुटूचा चंद्र आहे...हा असाच राहो... परेश जयश्री मनोहर ...Read more

HATUMUTUCHA CHANDRA
HATUMUTUCHA CHANDRA by FARUK KAZI Rating Star
बालाजी मदन इंगळे

संवेदनशीलतेने लिहिलेल्या तरल बालकथा : हाटुमुटूचा चंद्र मराठीमध्ये जाणीवपूर्वक आणि विचारपूर्वक बालसाहित्य लिहिणाऱ्यांची संख्या खूप कमी आहे. बालसाहित्य आणि बाल मानसशास्त्र यांचा विचार करून आपली प्रतिभा त्यासाठी वापरणाऱ्या मोजक्या बालसाहित्यिकांमध्य फारूक एस. काझी यांचे नाव समाविष्ट करावे लागेल. त्यांच्या नुकत्याच प्रकाशित झालेल्या मुलांसाठीच्या ‘हाटूमुटूचा चंद्र’ या कथासंग्रहातून ही बाब ठळकपणे अधोरेखित होते. कथा म्हणजे केवळ प्रसंगानंतर प्रसंग किंवा घटनेनंतर घटना मांडणे नसते. त्यामध्ये लेखकाच्या प्रतिभेने वास्तव आणि कल्पना यांचा सुरेख संगम घडवून आणावा लागतो. कुठलीही कथा लेखकाला त्याच्या अनुभव विश्वातूनच सापडलेली असते. पण ते अनुभव विश्व मांडत असताना त्यात आपल्या प्रतिभेने काही साहित्य गुण समाविष्ट करावे लागतात. तेव्हा ती कथा साहित्यिकदृष्ट्या अभिजात व साहित्य गुणांनी युक्त अशी कथा होते. या संग्रहातील कथांमध्ये अशा साहित्यिक प्रतिभांच्या बऱ्याच जागा आहेत. आणि म्हणूनच फारूक एस. काझी यांच्या कथा रोजच्या जगण्यातीलच असल्या तरी त्यातील साहित्य गुणांमुळे या कथा आपले वेगळेपण सिद्ध करतात. कथेमध्येही काव्यात्मकता असते. प्रतिकात्मकता असते. आणि त्यामुळेच ती कथा वैश्विक ठरत असते. हे सर्व गुण ‘हाटुमूटुचा चंद्र’ मधील कथांमध्ये आढळून येतात. म्हणून ही कथा महत्त्वाची आहे. अद्भुतरम्यता, काल्पनिकता आणि धक्का तंत्र याने लिहिलेल्या कथा नेहमीच मुलांना आवडतील असे नाही. आपल्याच अवतीभवती घडणाऱ्या घटना इतक्या सुंदर असू शकतात हे मुलांना वाचायला आवडते. नेमके तेच या कथांमध्ये आहे. या बालकथा या मातीतल्या आहेत. या संस्कृतीतल्या आहेत. म्हणून त्या महत्त्वाच्या आहेत. या संग्रहात एकूण दहा कथा आहेत. सर्वच कथा सुंदर आणि हृदयस्पर्शी आहेत. ‘फिकर नॉट’ या कथेमध्ये दोन मित्रांचे काही प्रसंग आहेत. रेहान आणि त्याचा मित्र अर्पित. दोघे एका टेकडीवर जातात. रेहानसाठी टेकडीवरील अनुभव नवीन असतो. दोघे खूप गप्पा मारतात. तळ्यात पाय सोडून बसतात. तिथे बसल्यानंतर त्या तळ्यातील काही मासे आपण बाटलीत घेऊन जावे असे रेहानला वाटते. पण अर्पित त्याला सांगतो की आपण या टेकडीवरून काय घेऊन जायला हवं तर या टेकडीवरील वातावरण, टेकडीवरील दृश्य, इथे आपण घेतलेला आनंद हे सगळे मनात भरून घेऊन जायला हवे. असं मुक्या प्राण्यांना त्रास द्यायचा नाही, हे नकळतपणे तो रेहानला सांगतो. रेहानलाही ते पटतं आणि मग तो खोल श्वास घेऊन इथल्या सगळ्या आनंदाच्या आठवणी मनात भरून घेतो. आणि निघतो. एखादा कोणी अन्य बालकथा लेखक असता तर या दोघांचं बोलणं, टेकड्यावरील वर्णन, दोघांनी केलेली मज्जा, त्यांनी केलेल्या गमती याचे वर्णन करून कथा संपवली असती पण फारूक काझी यांनी इथून काय घेऊन जायचं? हे लिहून जे एक नवीन वळण कथेला दिलेले आहे, इथेच या कथेतील साहित्यगुणाची जागा आहे. तिथेच कथा लेखक म्हणून फारूक काझी यांची प्रतिभा आपल्याला दिसून येते. आणि बालसाहित्यिक म्हणून त्यांचं वेगळेपणही इथेच आपल्याला दिसतं. ‘कर के देखो’ या कथेमध्ये ट्रेकला गेलेली मुले स्वच्छता दूत कशी बनतात हे मुळातून वाचण्यासारखे आहे. ‘जखम’ या कथेमध्ये इयत्ता तिसरीत शिकत असताना एका माकडीनीला आपण इजा पोहोचवल्याचं मोठं झाल्यावर कथेतील नायकाला आठवतं. आणि तो मोठा असूनही लहानांसारखं रडत रडत ती चूक आपल्या आईकडे कबूल करतो. ही कथा वाचताना पाषाणहृदयी माणूसही भावनिक होऊन जातो. कडूनिंबाच्या झाडाचे खाली पडलेले पान चंद्राची प्रतिमा म्हणून म्हणजेच हाटुमूटुचा चंद्र म्हणून कथेत वापरणे. आणि तो चंद्र कथेतील साक्षीच्या चेहऱ्यावर आनंदाचे प्रतिक म्हणून येणे. आणि त्याद्वारे सहलीला जाण्यासाठी पैसे न मिळाल्याच्या दुःखातून स्वतःला सावरणे ही सगळीच मांडणी भन्नाट झाली आहे. अशा भरपूर जागा या पुस्तकांमध्ये आहेत. ‘हिरवं सपान’ या कथेमध्ये शहरातला मंदार गावाकडे येतो. आणि गावातील चंदा सोबत शेत-शिवारात फिरतो. या शेत-शिवारातील भरपूर झाडे पाहून बी, रोपटं, मग त्याचं झाड ही क्रिया किती महत्त्वाची आहे. आणि या क्रियेचं स्वप्न नेहमीच गावाला पडतं. तसंच हिरवं स्वप्न शहराला का पडत नाही? हा प्रश्न खरंतर लहान-मोठ्या प्रत्येक वाचकाला अस्वस्थ करून जातो. ‘स्वप्न’ ही आणखी एक सुंदर कथा या संग्रहामध्ये आहे. माणसाला अभावातूनच वस्तूंची किंमत कळत असते. ज्याच्याकडे सर्व काही आहे अशा मुलाकडे जेव्हा सायकल येते, तेव्हा तिची काळजी घेतली जात नाही. पण स्वप्नातही ज्याच्या कधी सायकल मिळेल असं वाटत नव्हतं अशा अंकितला जेव्हा सायकल मिळते, तेव्हा तो तिची किती काळजी घेतो आणि हेच त्या सायकलचे स्वप्न होते. आणि अंकितचेही तेच स्वप्न होते ही स्वप्नांची सरमिसळ वाचकांना खूपच आवडून जाते. ‘मैतर’ ही आणखीन एक अनोळखी नातेसंबंध घट्ट करणारी कथा. फक्त काही दिवसांसाठी आलेल्या मेंढक्या काकाची आणि अमृत ची मैत्री होते. आणि ती मैत्री त्या दोघांमध्ये इतकी घट्ट होते की, मेंढक्या काका आपली मेंढरं घेऊन परत निघाल्यावर दोघांनाही एकमेकांचा निरोप घ्यावा असे वाटत नाही. निरोपावेळी दोघांच्याही डोळ्यात पाणी येते. दोघेही निरोपावेळी एकमेकांना भेटवस्तू देतात. हा प्रसंग लेखकाने स्थानिक संदर्भ, संस्कृती, भाषा आणि चित्रदर्शी स्वरूपात असा उभा केला आहे की, वाचक कथा संपली तरी त्या मेंढरांच्या कळपामध्ये आणि अमृतच्या घराच्या आसपासच घुटमळत राहतो. ‘जाऊ दे त्याला’ ही आणखीन एक भावस्पर्शी कथा. जंगली प्राण्यांनाही जीव लावला तर ते माणसांशी प्रेमाने वागतात हे सांगणारी ही कथा वाचकाच्या काळजाचा ठाव घेते. निधी आणि फॉरेस्ट ऑफिसर असलेले तिचे बाबा यांची ही कथा जंगलाच्या दुनियेत वाचकाला घेऊन जाते. पण तिथेही मानवी भावना कशी श्रेष्ठ ठरते हे अतिशय रंजक पद्धतीने लेखकाने लिहिले आहे. ‘बाबांची भाषा’ ही आणखी एक हृदयाला स्पर्श करणारी कथा! शाळेत शिकणारा सारंग अपघातात ऐकणं आणि बोलणं कायमचं गमावलेल्या आपल्या बाबांसाठी हातवाऱ्याची भाषा शिकून घेतो. हे जेव्हा वाचकाला कळतं तेव्हा वाचक जागच्याजागी स्थिर होऊन जातो. ‘एस पी १३’ ही आधुनिक तंत्रज्ञानात घेऊन जाणारी कथा! छोटीशी समायरा स्पेसशीप घेऊन एका नव्या प्लॅनेटवर जाते. आणि त्या नव्या प्लॅनेटवर असलेली माणसं कशी निसर्गाची काळजी घेतात हे पाहून समायरा तिथेच राहण्याचा निर्णय घेते. तेव्हा तिच्या सायंटिस्ट मामासह वाचक ही अचंबित होऊन जातात. निसर्ग आणि आधुनिक तंत्रज्ञान यांचा सुरेख आणि अफलातून संगम या कथेमध्ये लेखकाने घडवून आणला आहे. या पुस्तकाची महत्त्वाची बाजू म्हणजे यातील चित्रे! चंद्रमोहन कुलकर्णी यांची चित्रे या कथेला एक वेगळा आणि नवा आयाम देतात. ही चित्रे या कथेशी एवढी एकरूप झालेली आहेत की ही चित्रे वेगळी काढली तर या कथा अपूर्ण वाटतील! कथेला अनपेक्षित वळण देण्यामध्ये लेखक पटाईत आहेत. हे प्रत्येक कथेतून आपल्याला जाणवतं. आपण सरळ कथा वाचत जातो. आणि कथा देखील आता सरळ या वाटेने जाईल असे वाटत असताना ती कथा असं काही वळण घेते की वाजक स्तंभित होऊन जातो. आणि हीच खरे तर फारूक एस. काझी यांची खरी ताकद आहे. त्यांच्या सर्व कथांमधील पात्र आणि त्यांची नावे पाहिली तर ती विशिष्ट अशी पात्रे किंवा नावे नाहीत. तर सर्वसमावेशक अशी सर्व पात्रे आहेत. त्यामुळे किती तीव्र सामाजिक भान लेखकाला आहे हेही आपल्याला जाणवते. आजच्या सोशल मीडियाच्या काळात नातेसंबंध दूरावत असताना, नातेसंबंध दृढ करणाऱ्या या कथा प्रत्येक वाचकांपर्यंत पोहोचल्या पाहिजेत. या कथांमध्ये कल्पनाशक्ती आहे. वास्तवता आहे. पण याच्या जोडीला कथालेखक म्हणून जी एक संवेदनशीलता लागते, जी एक तरलता लागते आणि मुलांच्या कथांमध्ये जो एक हळुवारपणा आणि नाजूकता आवश्यक असते ते सगळे गुण या कथेमध्ये ओतप्रोत भरलेले आहेत. म्हणून या कथा फक्त लहानच नाही तर मोठ्यांनाही गुंतवून ठेवणाऱ्या आहेत. स्थळ आणि काळानुसार बदलणारी भाषा आणि प्रसंगानुसार बदलणारं वर्णन या कथेच्या जमेच्या बाजू आहेत. यामुळे या कथा वाचकाला पकडून ठेवतात. आणि काही एक सामाजिक भान आणि साहित्यिक जाण या कथा देतात. आणि हेच या कथेचे मोठे यश आहे. - बालाजी मदन इंगळे ...Read more