PURUSHOTTAM DESHMUKH

About Author

Birth Date : 17/08/1944


PURUSHOTTAM DATTATREYA DESHMUKH WAS BORN ON 17 AUGUST 1944. MA FROM AURANGABAD. (ENGLISH) HE STARTED TEACHING IN A COLLEGE IN NANDED DISTRICT. DUE TO HIS INTEREST IN ENGLISH LANGUAGE AND HIS MASTERY OVER IT, HE EVENTUALLY STARTED HOLDING THE POST OF HEAD OF ENGLISH DEPARTMENT. ALONG WITH TEACHING, HIS EMPHASIS WAS ON ENGLISH LANGUAGE, LITERATURE AND PHONETICS. DURING HIS 37 YEARS OF TEACHING, HE SUCCESSFULLY PARTICIPATED IN PAPER READINGS IN MANY ENGLISH LITERATURE CONFERENCES. ALSO SUCCESSFULLY ORGANIZED MANY SEMINARS ON ENGLISH LITERATURE. PURUSHOTTAM DESHMUKH FURTHER CHOSE THE FIELD OF TRANSLATION, KEEPING IN MIND HIS LOVE FOR MARATHI AS WELL AS ENGLISH SINCE HIS CHILDHOOD. MANY STORIES TRANSLATED BY HIM HAVE BEEN PUBLISHED IN MAGAZINES AS WELL AS DIWALI ISSUES. HIS TRANSLATIONS OF MANY WELL-KNOWN ENGLISH WRITERS HAVE BEEN PUBLISHED BY DIFFERENT PUBLISHING HOUSES. HIS TRANSLATION DIE FOR ME HAS BEEN PUBLISHED BY MEHTA PUBLISHING HOUSE. APART FROM THIS, HIS LONG ARTICLE ON INDIAN ENGLISH LITERATURE HAS BEEN PUBLISHED IN DAI.SAKAL. BESIDES WRITING, TRANSLATING, DRAWING-PAINTING, PURUSHOTTAM DESHMUKH CURRENTLY RESIDES IN AURANGABAD.

पुरुषोत्तम दत्तात्रेय देशमुख यांचा जन्म १७ ऑगस्ट १९४४ रोजी झाला. औरंगाबाद येथून एम.ए. (इंग्रजी) झाल्यानंतर नांदेड जिल्ह्यातील एका महाविद्यालयात त्यांनी अध्यापनाचे कार्य सुरू केले. इंग्रजी भाषेची आवड व त्यावरील प्रभुत्व यांमुळेच कालांतराने त्यांनी इंग्रजी विभागप्रमुख हे पद सांभाळण्यास सुरूवात केली. अध्यापनासोबतच त्यांचा इंग्रजी भाषा, साहित्य व उच्चारशास्त्र यांवर भर असे. आपल्या ३७ वर्षे अध्यापनाच्या काळात त्यांनी इंग्रजी साहित्याच्या अनेक कॉन्फरन्स मधील पेपररीडिंगमध्ये यशस्वी सहभाग नोंदविला. तसेच इंग्रजी साहित्याच्या अनेक परिसंवादांचे यशस्वी आयोजनही केले. लहानपणापासून मराठीसोबतच इंग्रजी भाषेकडे असणारी ओढ लक्षात घेऊन पुरुषोत्तम देशमुख यांनी पुढे अनुवाद हे क्षेत्र निवडले. मासिकांमध्ये तसेच दिवाळी अंकांमध्ये त्यांनी अनुवाद केलेल्या अनेक कथा प्रसिद्ध झाल्या आहेत. वेगवेगळ्या प्रकाशन संस्थांतर्पे अनेक नामांकित इंग्रजी लेखकांच्या साहित्याचे त्यांनी केलेले अनुवाद प्रकाशित झाले आहेत. मेहता पब्लिशिंग हाऊस तर्फे त्यांचा डाय फॉर मी हा अनुवाद प्रकाशित करण्यात आला आहे. याशिवाय इंडियन इंग्लिश लिटरेचर या विषयावरील त्यांची प्रदीर्घ लेखमाला दै.सकाळमध्ये प्रसिद्ध झाली आहे. लेखन, अनुवाद यांसोबतच ड्रॉइंग-पेंटिंग करणाऱ्या पुरुषोत्तम देशमुख यांचे वास्तव्य सध्या औरंगाबाद येथे आहे.
Sort by
Show per page
Items 1 to 4 of 4 total
ADOLF HITLERCHI BHASHANE BHAG I Rating Star
Add To Cart INR 720
DIE FOR ME Rating Star
Add To Cart INR 500
TBC Classic Book
KALAY NAMAH Rating Star
Add To Cart INR 160
REPLAY Rating Star
Add To Cart INR 420

Latest Reviews

BACKSTAGE
BACKSTAGE by MONTEK SINGH AHLUWALIA Rating Star
महाराष्ट्र टाईम्स.. ६.९.२०२६

भारताच्या आर्थिक सुधारणांवर अनेक पुस्तके आजवर प्रसिद्ध झाली आहेत. काहींमध्ये आकडेवारीचे जंजाळ असते, काही धोरणांचे विश्लेषण करतात, तर काही विशिष्ट नेत्यांची जाहिरातबाजी करतात. मात्र माँटेकसिंग अहलुवालिया यांचे `बॅकस्टेज : भारताच्या उच्च वाढीच्या र्षांमागची कहाणी` हे पुस्तक या सगळ्यांपेक्षा वेगळे ठरते. कारण हे पुस्तक भारताच्या आर्थिक परिवर्तनाची कथा बाहेरून पाहणाऱ्या अभ्यासकाने नव्हे, तर त्या परिवर्तनाच्या केंद्रस्थानी उभ्या असलेल्या व्यक्तीने सांगितलेली आहे. जी. बी. देशमुख यांनी मूळ इंग्रजी पुस्तकाचा केलेला मराठी अनुवाद सरस उतरला आहे. पुस्तकाच्या सुरुवातीलाच माँटेकसिंग एक गोष्ट स्पष्ट करतात, ती म्हणजे, हे पुस्तक आत्मकथन नाही. आत्मप्रौढी मिरवण्यासाठी नव्हे, तर भारताच्या आर्थिक सुधारणांचा प्रवास समजावून सांगण्यासाठी अहलुवालिया हे पुस्तक लिहितात. विषयाच्या अनुषंगाने पुस्तकात त्यांच्या वैयक्तिक आयुष्यातील संदर्भ येतात, पण ते आर्थिक आणि राजकीय घडामोडी समजावून सांगण्यापुरतेच. सिकंदराबादमधील मध्यमवर्गीय वातावरणातून सुरू झालेला त्यांचा प्रवास दिल्ली स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स, ऑक्सफर्ड, जागतिक बँक, अर्थ मंत्रालय, योजना आयोग आणि अखेर देशाच्या सर्वोच्च आर्थिक धोरणनिर्मितीच्या केंद्रापर्यंत पोहोचतो. हा प्रवास वाचताना स्वतंत्र भारताच्या आर्थिक विचारसरणीचा विकासक्रम उलगडत जातो. पुस्तकाचे केंद्रस्थान अर्थातच १९९१च्या आर्थिक संकटाचे आहे. त्यावेळी देशाकडे काही आठवड्यांच्या आयातीपुरताही डॉलर शिल्लक नव्हता. सोन्याचा साठा गहाण ठेवण्याची वेळ आली होती आणि आर्थिक दिवाळखोरीची शक्यता प्रत्यक्ष समोर उभी होती. अशावेळी सरकारने घेतलेले निर्णय, त्यामागील तणाव, राजकीय अनिश्चितता आणि प्रशासकीय संघर्ष यांचे वर्णन पुस्तकात अत्यंत जिवंतपणे आले आहे. नाणेनिधी किंवा जागतिक बँकेच्या दबावामुळे या सुधारणा झाल्याची धारणा माँटेकसिंग ठामपणे नाकारतात. हे पुस्तक आर्थिक सुधारणांना कोणत्याही प्रकारच्या विचारधारेच्या चष्म्यातून पाहत नाही. लेखक ना मुक्त बाजाराचे अंधसमर्थन करतात, ना राज्यनियंत्रित व्यवस्थेचे. त्यांचा दृष्टिकोन व्यवहारवादी आहे. भारतासारख्या लोकशाही देशात सुधारणा एका झटक्यात होत नाहीत; त्या राजकीय वास्तवाशी जुळवून घेत हळूहळू पुढे सरकतात, हे ते वारंवार. अधोरेखित करतात. पुस्तकात अनेक ठिकाणी `सुधारणा` हा आर्थिक नव्हे, तर राजकीय प्रक्रियेचाही विषय आहे, हे प्रकर्षाने जाणवते. अहलुवालिया या पुस्तकात अनेक व्यक्ती, अधिकारी, अर्थतज्ज्ञ आणि राजकीय नेत्यांच्या योगदानाचा उल्लेख करतात. नरसिंह राव, मनमोहन सिंग, पी. चिदंबरम, यशवंत सिन्हा, जसवंत सिंह यांच्यापासून ते विविध सनदी अधिकाऱ्यांपर्यंत अनेकांची भूमिका ते प्रामाणिकपणे नोंदवतात. योजना आयोगाचे उपाध्यक्ष म्हणून काम करताना अहलुवालिया यांनी जवळून अनुभवलेला काळ येथे उभा राहतो. सन २००४ ते २०११ या काळातील उच्च आर्थिक वाढ, दारिद्रयनिर्मूलनातील प्रगती, पायाभूत सुविधांमध्ये झालेली वाढ आणि ग्रामीण विकासाच्या कार्यक्रमांचे मूल्यमापन ते करतात. विशेषतः भारताने सलग अनेक वर्षे सात ते आठ टक्क्यांच्या दरम्यान वाढ नोंदवली, ती केवळ जागतिक परिस्थितीचा. परिणाम नव्हती; १९९० नंतरच्या सुधारणांनी घातलेल्या पायावर उभे राहून ती शक्य झाली, हा त्यांचा युक्तिवाद पटण्याजोगा वाटतो. मात्र पुस्तकाचे खरे सामर्थ्य यशोगाथेत नाही, तर आत्मपरीक्षणात आहे. यूपीए-२ दरम्यान निर्माण झालेली निर्णयप्रक्रियेतील अडचण, गुंतवणुकीतील वातावरण आणि धोरणात्मक संकोच यावर लेखक मंदी, भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे निर्माण झालेले वातावरण आणि धोरणात्मक संकोच यावर लेखक थेट भाष्य करतात. अनुवादक जी. बी. देशमुख यांनी मूळ पुस्तकातील आर्थिक संकल्पना सहज आणि प्रवाही मराठीत मांडल्या आहेत. यात कृत्रिमता जाणवत नाही. आर्थिक विषयावरील पुस्तक असूनही भाषा जड वाटत नाही. आर्थिक सुधारणांच्या व्यापक सामाजिक परिणामांचा स्वतंत्र आणि सविस्तर ऊहापोह येथे अपेक्षेपेक्षा कमी आढळतो. मात्र, हे पुस्तक ज्या उद्देशाने लिहिले गेले आहे त्या उद्देशात ते अत्यंत यशस्वी ठरते. `बॅकस्टेज` हे केवळ पुस्तक नाही; ते भारताच्या आर्थिक परिवर्तनाचा प्रत्यक्षदर्शी दस्तऐवज आहे. १९९१ नंतर भारताने घेतलेल्या वळणाचा अर्थ समजून घ्यायचा असेल, उच्च वाढीच्या वर्षामागील वास्तविक कथा जाणून घ्यायची असेल आणि धोरणनिर्मितीच्या पडद्यामागे काय घडत असते याचा मागोवा घ्यायचा असेल, तर हे पुस्तक अभ्यासणे आवश्यक ठरते. भारतीय अर्थव्यवस्थेच्या आर्थिक सुधारणांचा इतिहास आणि त्यांचे परिणाम समजून घेण्यासाठी हे पुस्तक एक महत्त्वाचा संदर्भग्रंथ म्हणून ओळखले जाऊ शकते. मराठीत उपलब्ध असलेला हा अनुवाद त्या दृष्टीने विशेष स्वागतार्ह आहे. ...Read more

HACHYUKISUNASKI
HACHYUKISUNASKI by ABA MAHAJAN Rating Star
Dinesh

This is a different planet. This is a different world. And this is a truly different book. I loved it. You should also buy it and read it. I’m sure you will love it too. Hachyukisunaski is a fantastic Book.