* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: SHIVCHATRPATI EK MAGOVA
  • Availability : Available
  • ISBN : 9789387789159
  • Edition : 6
  • Publishing Year : APRIL 2005
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 144
  • Language : MARATHI
  • Category : REFERENCE AND GENERAL
  • Available in Combos :DR.JAYSINGHRAO PAWAR & VASUDHA PAWAR COMBO SET- 21 BOOKS
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
"IS IT TRUE THAT QUEEN SOYRABAI POISONED SHIV CHHATRAPATI? DID SHIVAJI HAVE CONCUBINES? WHY DID SAMBHAJI JOIN DILERKHAN? WAS HE ANNOYED WITH SHIVAJI MAHARAJ? SHIVAJI RAJE DECIDED TO PUT AN END TO ‘WATANDARI’. WAS THIS DECISION A BEGINNING OF SOCIAL REVOLUTION? WAS SHIVAJI BORN IN THE ‘GAVALI-DHANGAR’ CLAN? WHAT IS THE JAMES LANE ISSUE? DR. JAISINGRAO PAWAR HAS DISCUSSED MANY SUCH ISSUES IN THIS BOOK. "
"राणी सोयराबार्इंनी शिवछत्रपतींवर विषप्रयोग केल्याचा आरोप खरा आहे काय?... शिवछत्रपतींना उपस्त्रिया होत्या काय?.... संभाजीराजे शिवछत्रपतींना रुसून दिलेरखानास का मिळाले?.. वलने खालसाचा शिवछत्रपतींचा निर्णय म्हणजे एक आमूलाग्र समाजक्रांतीच कशी होती?...... शिवछत्रपतींचे कूळ ‘गवळी-धनगर’ होते काय?... ‘जेम्स लेन प्रकरण’ काय आहे?.... या व यासारख्या अनेक प्रश्नांची चर्चा ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ. जयसिंगराव पवार आपल्या या लेख-संग्रहात करत आहेत. "

No Records Found
No Records Found
Keywords
#JAYSINGRAO PAWAR #SHIVACHHATRAPATI EK MAGOVA# #जयसिंगराव पवार #शिवछत्रपती एक मागोवा #
Customer Reviews
  • Rating StarTushar Kute

    इतिहास संशोधक डॉ. जयसिंगराव पवार यांनी छत्रपती शिवाजी महाराजांवर चिकित्सक पद्धतीने लिहिलेले हे पुस्तक होय. शिवरायांच्या विविध अंगांचा मागोवा घेण्याचा प्रयत्न त्यांनी या पुस्तकातून केला आहे. शिवछत्रपतींच्या पूर्ण परिवाराची माहिती या पुस्तकात सापडल. त्यांनी तत्कालीन समाज पद्धतीचा विचार करून समाज क्रांतीची बीजे रोवली होती. याचा सविस्तर आढावा डॉ. पवार घेतात. शिवाजी महाराजांसाठी आत्मबलिदान करणारा शिवा काशीद नक्की कोण होता व त्यासंबंधी माहिती नक्की कशी उजेडात आली? शिवाजी महाराज व संभाजी महाराज यांचे संबंध कसे होते? या प्रश्‍नांच्या उत्तरांचासह संभाजी महाराजांच्या जीवनाचा सारांश या पुस्तकात वाचायला मिळेल. महाराणी सोयराबाई व येसूबाई यांच्या विषयी सारांशरुपी मागोवा डॉ. पवार यांनी घेतला आहे. शिवाय शिवाजी महाराजांचे कुळ कोणते? तसेच जेम्स लेन प्रकरण नक्की काय होते? याची विस्तृत माहिती या पुस्तकातील दोन प्रकरणात मिळते. त्यामुळे शिवचरित्राची आणखी बारकाईने ओळख करून घ्यायची असेल तर कथा-कादंबऱ्या पेक्षा अशाप्रकारे इतिहासकारांच्या दृष्टीतून लिहिलेले साहित्य निश्चितच उपयोगी पडेल. ...Read more

  • Rating StarRajiv Lute.

    जेष्ठ इतिहास संशोधक डॉ. जयसिंगराव पवार यांनी मराठ्यांच्या इतिहासाबद्दल आणि शिवरायांच्या कामगिरीवर वेळोवेळी आणि प्रसंगानुरूप अनेक लेख लिहले आहेत. त्यातील सहा लेखांचा संग्रह म्हणजे शिवछत्रपती : एक मागोवा’ हे छोटेखानी पुस्तक होय. १)शिवछत्रपती आणि त्यंचा परिवार:- शिवाजी महाराजांच्या राजपरिवारातील महत्त्वाच्या व्यक्तींशी असलेल्या शिवाजी महाराजांच्या भावनिक नात्याची चर्चा करणारा हा लेख आहे. २)शिवाजी राजांसाठी आत्मबलिदान करणारा शिवा काशीद:- दुसरा लेख ‘शिवा काशीद’ या शिवकालातील एका सामान्य माणसाच्या असामान्य हौतात्म्याबद्दल आहे. ३)शिवछत्रपती आणि युवराज संभाजीराजे:- तिसरा लेख युवराज संभाजीराजांच्या व्यक्तिमत्त्वाच्या जडणघडणीची व पितापुत्राच्या संबंधांची चर्चा करणारा आहे. ४)शिवछत्रपतींचा समाजक्रांतीचा एक महान प्रयत्न:- चौथा लेख शिवाजी महाराजांनी आपल्या कारकिर्दीत स्वराज्यात घडवून आणलेल्या एका महान सामाजिक क्रांतीची ओळख करून देणारा आहे. हिंदवी स्वराज्याची स्थापना ही महाराजांची थोर राजकीय कामगिरी सर्वांना सुपरिचितच आहे. त्यामुळे एक महान राजकीय क्रांतिकारक म्हणून त्यांची प्रतिमा जनमानसात रुजली आहे; पण महाराजांची ‘स्वराज्या’ची संकल्पना केवळ परकीय दास्यापासून स्वजनांची मुक्तता एवढ्यापुरतीच मर्यादित नव्हती; तर जुलमी स्वकीयांच्या पिळवणुकीपासूनची त्यांची मुक्तताही त्यामध्ये त्यांना अभिप्रेत होती. ५)शिवछत्रपतींचे कुल : वास्तव कोणते आणि मिथक कोणते?:- शिवाजी महाराजांचे घराणे जरी रजपूत कुलोत्पन्न असले‚ तरी त्यांनी स्वत:ला ‘रजपूत’ म्हणवून घेण्यात अभिमान बाळगलेला नाही‚ हेही एक ऐतिहासिक वास्तव आहे. महाराज आपणास इतर मराठा क्षत्रियांप्रमाणे ‘मराठा’च मानत होते व त्यामध्ये त्यांना भूषण वाटत होते‚ असा तत्कालीन कागदपत्रांतील‚ म्हणजे खुद्द त्यांच्याच एका पत्रातील दाखला आहे. कर्नाटक दिग्विजयाच्या मोहिमेवर असताना मार्च १६७७मध्ये महाराजांनी कुतुबशहाशी भेट झाल्यावर मुधोळच्या मालोजीराजे घोरपडे यांना आपणास या मोहिमेत येऊन मिळावे‚ म्हणून आवाहन करणारे पत्र पाठविले होते. ६)जेम्स लेनचे शिवचरित्र आणि त्याचे ‘कवित्व’:- शेवटचा लेख - ‘जेम्स लेनचे शिवचरित्र व त्याचे कवित्व’ हा लेनच्या शिवचरित्राने व भांडारकर प्राच्य विद्या संशोधन संस्थेवर झालेल्या हल्ल्याने महाराष्ट्रात उठलेल्या गदारोळाच्या पार्श्वभूमीवर लिहिला गेला आहे. या सहा लेखांचे मिळून बनलेले ‘शिवछत्रती: एक मागोवा’ हे पुस्तक शिवप्रेमी, ऐतिहासिक विषयावरील वाचन लेखन करणारे आणि मराठ्यांच्या इतिहासाचा अभ्यास करणार्यां तमाम मराठी वाचकास मार्गदर्शक आहे. ...Read more

  • Rating StarSandip R Chavan

    जेष्ठ इतिहास संशोधक डॉ. जयसिंगराव पवार यांनी मराठ्यांच्या इतिहासाबद्दल आणि शिवरायांच्या कामगिरीवर वेळोवेळी आणि प्रसंगानुरूप अनेक लेख लिहले आहेत. त्यातील सहा लेखांचा संग्रह म्हणजे शिवछत्रपती : एक मागोवा’ हे छोटेखानी पुस्तक होय. १)शिवछत्रपती आणि त्ांचा परिवार:- शिवाजी महाराजांच्या राजपरिवारातील महत्त्वाच्या व्यक्तींशी असलेल्या शिवाजी महाराजांच्या भावनिक नात्याची चर्चा करणारा हा लेख आहे. २)शिवाजी राजांसाठी आत्मबलिदान करणारा शिवा काशीद:- दुसरा लेख ‘शिवा काशीद’ या शिवकालातील एका सामान्य माणसाच्या असामान्य हौतात्म्याबद्दल आहे. ३)शिवछत्रपती आणि युवराज संभाजीराजे:- तिसरा लेख युवराज संभाजीराजांच्या व्यक्तिमत्त्वाच्या जडणघडणीची व पितापुत्राच्या संबंधांची चर्चा करणारा आहे. ४)शिवछत्रपतींचा समाजक्रांतीचा एक महान प्रयत्न:- चौथा लेख शिवाजी महाराजांनी आपल्या कारकिर्दीत स्वराज्यात घडवून आणलेल्या एका महान सामाजिक क्रांतीची ओळख करून देणारा आहे. हिंदवी स्वराज्याची स्थापना ही महाराजांची थोर राजकीय कामगिरी सर्वांना सुपरिचितच आहे. त्यामुळे एक महान राजकीय क्रांतिकारक म्हणून त्यांची प्रतिमा जनमानसात रुजली आहे; पण महाराजांची ‘स्वराज्या’ची संकल्पना केवळ परकीय दास्यापासून स्वजनांची मुक्तता एवढ्यापुरतीच मर्यादित नव्हती; तर जुलमी स्वकीयांच्या पिळवणुकीपासूनची त्यांची मुक्तताही त्यामध्ये त्यांना अभिप्रेत होती. ५)शिवछत्रपतींचे कुल : वास्तव कोणते आणि मिथक कोणते?:- शिवाजी महाराजांचे घराणे जरी रजपूत कुलोत्पन्न असले‚ तरी त्यांनी स्वत:ला ‘रजपूत’ म्हणवून घेण्यात अभिमान बाळगलेला नाही‚ हेही एक ऐतिहासिक वास्तव आहे. महाराज आपणास इतर मराठा क्षत्रियांप्रमाणे ‘मराठा’च मानत होते व त्यामध्ये त्यांना भूषण वाटत होते‚ असा तत्कालीन कागदपत्रांतील‚ म्हणजे खुद्द त्यांच्याच एका पत्रातील दाखला आहे. कर्नाटक दिग्विजयाच्या मोहिमेवर असताना मार्च १६७७मध्ये महाराजांनी कुतुबशहाशी भेट झाल्यावर मुधोळच्या मालोजीराजे घोरपडे यांना आपणास या मोहिमेत येऊन मिळावे‚ म्हणून आवाहन करणारे पत्र पाठविले होते. ६)जेम्स लेनचे शिवचरित्र आणि त्याचे ‘कवित्व’:- शेवटचा लेख - ‘जेम्स लेनचे शिवचरित्र व त्याचे कवित्व’ हा लेनच्या शिवचरित्राने व भांडारकर प्राच्य विद्या संशोधन संस्थेवर झालेल्या हल्ल्याने महाराष्ट्रात उठलेल्या गदारोळाच्या पार्श्वभूमीवर लिहिला गेला आहे. या सहा लेखांचे मिळून बनलेले ‘शिवछत्रती: एक मागोवा’ हे पुस्तक शिवप्रेमी, ऐतिहासिक विषयावरील वाचन लेखन करणारे आणि मराठ्यांच्या इतिहासाचा अभ्यास करणार्यां तमाम मराठी वाचकास मार्गदर्शक आहे. (पुस्तकाच्या प्रस्तावना आणि पुस्तकांमधील माहितीचे संक्षिप्त स्वरूपात संकलन) डॉ. जयसिंगराव पवार यांची ग्रंथसंपदा नव्या व आकर्षक छपाई/बांधणीत व किंडल ईबुक मध्ये उपलब्ध करून दिल्याबद्दल मेहता पब्लिशिंग हाउस धन्यवाद.🙏🙏 ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

RADHEYA
RADHEYA by RANJEET DESAI Rating Star
विश्वजीत श्रीपती शिंत्रे.

राधेय.... लेखक रणजित देसाई... मित्र कसा असावा...कर्णासारखा दातृत्व कसं असावं...कर्णासारखं असा हा कर्ण... त्याला अंगराज म्हणावं, दान देणारा दाता म्हणावं, राधेय म्हणावं कि कौतेय... काहीही म्हणा पण कर्णासारखा दाता कर्णानंतर कधी झाला नाही आणि कधी होणरही नाही... रणजित देसाई लिखीत कर्णचरीत्र राधेय आज हातावेगळं झालं ते अश्रुभरल्या नयनांनी...ज्याचा अंत करायला स्वतः देवाधिदेव कृष्णाला अर्जुनाचं सारथ्य करावं लागलं यातच अंगराज कर्णांचं विरत्व अधोरेखीत होत आहे. जन्मापासुन ज्याला केवळ सुतपुत्र म्हणुन वागणुक मिळाली असा तो कर्ण स्वतःच्या बळावर इतका महान लढवय्या बनला. पुस्तकाच्या प्रास्ताविकात देसाईंनी म्हटलं आहे की राधेय मधला कर्ण महाभारतात शोधायची गरज नाही. प्रत्येकाच्या मनातच तो दडलेला असतो, कदाचित आपल्या मनाची चार पाने उलटलीत, तर त्यात हा कर्ण दिसेल. त्याचं दु:खं, पोरकेपण आणि त्यातून पार होवून एक अनोखी ऊंची गाठणारं त्याचं दातृत्व, व्यक्तित्व याचं एक भव्य, शोकात्म चित्र राधेय मधून उभं राहतं. राधेय या कादंबरीत रणजित देसाईंच्या शब्दांनी कर्णाची अनेक रुपे अनुभवता आली. त्यामध्ये राधाई आणि वृषाली सोबतचा कर्ण, दुर्यौधनासोबतचा कर्ण, कृष्णासोबतचा कर्ण, रणांगणावरचा कर्ण आणि नदीकाठी पाठमोरा ऊभा राहत दान करत असलेला कर्ण अशा अनेक रुपांनी प्रत्येकवेळी वेगळा भासला. वृषसेन आणि चक्रधराच्या मृत्युने हळवा झालेला कर्णही वाचकाच्या डोळ्यातही पाणी आणवतो... समोर मृत्यु दिसत असताना सुध्दा केवळ दिलेल्या वचनामुळे हातातील धनुष्याचा त्याग करुन शस्त्रहिन हेणारा कर्ण रणजित देसाईंच्या शब्दांमुळे आजन्म लक्षात राहील. कर्णासारखं होणं कुणालाही कदापि शक्य नाही पण त्यातला एखादा जरी चांगला गुण अंगी बाळगण्याचा प्रयत्न प्रत्येकाने नक्कीच केला पाहीजे... प्रत्येकाच्या संग्रही असावं आणि एकदा तरी वाचावं असं पुस्तक रणजित देसाई लिखीत...राधेय... © विश्वजित शिंत्रे. ...Read more

BAJIND
BAJIND by PAHILWAN GANESH MANUGADE Rating Star
विश्वजीत श्रीपती शिंत्रे.

काही पुस्तकं अशी असतात कि कितीही वेळा वाचली तरीही त्या पुस्तकाचा कंटाळा येत नाही. पुन्हा पुन्हा वाचावं असं वाटतं आणि त्याची पारायणं होतचं राहतात. असचं एक पुस्तक म्हणजे *पै.गणेश मानुगडे* लिखीत *बाजिंद.* *बाजिंद* हे एक असं रसायन आहे जे प्रत्ेकाला अक्षरशः वेड लावतं. साधारण चार पाच वर्षांपुर्वी पहील्यांदा वाचलं होतं, त्यानंतर बर्‍याचवेळा आणि आज पुन्हा एकदा. त्याबद्दलची एक सुंदर आठवण म्हणजे माझ्या बहिणीच्या गरोदरपणाच्या दिवसात ग्रहण लागलं होतं आणि त्या ग्रहणकाळात तिला मी *बाजिंद* वाचुन दाखवलं होतं, असं हे पुस्तक. कुस्ती, प्रेमकथा, हेरगिरी, गुढ रहस्यमय बाजिंदचं जंगल, पशु-पक्षी व हिंस्र जनावरांची भाषा, बहीर्जी नाईक आणि अवघ्या हिंदुस्थानाचे आणि मराठी मनाचे आराध्यदैवत *श्रीमंतयोगी छत्रपती शिवाजी महाराज* असा या पुस्तकाचा प्रवास. शेवटाला अंगावर काटा आला कि समजावं आपण या पुस्तकाच्या प्रेमात पडलोय. रायगडच्या डोंगरदरीत वसलेल्या धनगरवाडीचा सखाराम धनगर आणि त्याच्यासोबत मल्हारी, सर्जा आणि नारायण निघालेत छत्रपती शिवरायांना भेटायला. कारण टकमक टोकावरुन ज्या गद्दारांचा कडेलोट व्हायचा ती प्रेतं येऊन पडायची ती थेट धनगरवाडीच्या आसपासच्या जंगलात आणि त्यामुळे आसपासच्या परीसरात जंगली जनावरांचा सुळसुळाट खुप वाढला होता. त्यांची मेजवानी व्हायची पण जर कधी कडेलोट नसायचा तेव्हा ती हिंस्त्र जनावरं आसपासच्या लोकवस्तीत शिरायची. हिच कैफियत मांडायला सखाराम धनगर आणि इतर मंडळी रायगडी निघतात. त्यानंतरचा त्यांचा प्रवास आणि कथा वाचकाला इतकी गुरफटवुन टाकते कि शेवटच्या पानावरची शेवटची ओळ कधी वाचुन संपते, कळतही नाही. त्यांची स्वराज्यहेर खंडोजीची भेट मग सावित्री, वस्तादकाका, वाचतानाही भितीदायक दिसणारं जंगल, कधीही न पाहीलेलं महादेवाचं मंदीर, खंडोजीचा असणारा ट्विस्ट आणि मग बहिर्जी नाईक आणि मग थेट रायगड आणि महाराज, सगळं प्रत्यक्षात आपल्यासमोर घडतयं कि असा भास निर्माण करणारं असं हे पुस्तक. एखाद्या चित्रपटालाही लाजवेल अशी कथा, एकदा वाचली कि पुन्हा एकदा वाचण्याचा मोह आवरता येत नाही अशी कथा, ज्यामध्ये असं बरचं काही जे वाचल्याशिवाय कळणार नाही. अजुन एक असं कि सातासमुद्रापार जगातील अव्वल गणली जाणारी इस्त्राईलची गुप्तहेर संघटना मोसाद यांच्या अभ्यासक्रमात बहिर्जी नाईक आणि आपलं हेरखातं शिकवलं जातं अशी अभिमान वाटणारी घटना आपल्या राज्यात घडलीय त्याचीच हि गोष्ट...बाजिंद... ...इकडे खंडोजीने सावित्रीला उचलुन जंगलातुन बरेच बाहेर आणले होते. पुढे डोंगराची कडेतुट होती आणि हजारो हात खोल फेसाळणार्‍या नदीचे विशाल पात्र...खंडोजीने एकदा मागे पाहीले आणि ताडले कि शिर्क्यांची फौज पाठलाग करत आहे...त्याने कशाचाही विचार न करता सावित्रीसह स्वतःला त्या कडेतुट वरुन त्या विशाल नदीच्या पात्रात झोकुन दिले...आणि... त्यासाठी वाचा *पै.गणेश मानुगडे* लिखीत...*बाजिंद..!!!* © विश्वजीत श्रीपती शिंत्रे. मु.पो.इंचनाळ, ता.गडहिंग्लज,जि.कोल्हापुर ०९९२२३१३९१९ ...Read more