* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Availability : Available
  • ISBN : 9789387789258
  • Edition : 3
  • Publishing Year : NOVEMBER 2005
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 128
  • Language : MARATHI
  • Category : REFERENCE AND GENERAL
  • Available in Combos :DR.JAYSINGRAO PAWAR & VASUDHA PAWAR COMBO SET- 26 BOOKS
  • Discount : WORLD BOOK DAY OFFER 23 APRIL(Login to get best discount offers.)
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
"DR. JAISINGRAO PAWAR IS ONE OF THE MOST AUTHORITATIVE SENIOR HISTORIAN. THE MAIN SUBJECTS OF HIS INTEREST ARE BASICALLY FROM THE MARATHA DYNASTY. THEY INCLUDE CHHATRAPATI SAMBHAJI MAHARAJ, CHHTRAPATI RAJARAM MAHARAJ AND MAHARANI TARABAI. IN ADDITION TO THIS TRIPLET, DR. PAWAR HAS MASTERY OVER ANOTHER INFLUENTIAL TRI-STAR; MAHATMA PHULE, RAJARSHEE SHAHU AND DR. AMBEDKAR. SINCE LAST FOUR DECADES DR. PAWAR HAS DEDICATED HIS TIME AND EFFORTS IN PURSUING HISTORY. MORE THAN THIRTY OF HIS BOOKS AND FORTY RESEARCH PAPERS HAVE BEEN PUBLISHED. HE HAS COMPILED THREE VOLUMES OF ‘RAJARSHEE SHAHU SMARAK GRANTH’ WHICH IS A MILESTONE. THE ‘MAHARASHTRA ITIHAS PRABODHINI’ ESTABLISHED BY HIM IN KOLHAPUR IS THE LEADING HISTORY INSTITUTION PROVIDING AID FOR STUDIES RELATED TO HISTORY AND SOCIAL REFORMATION. HIS EXTENSIVE WORK HAS CREATED INTEREST REGARDING HISTORY IN THE MINDS OF COMMON PEOPLE. HIS SAID BOOK IS A COLLECTION OF MANY ARTICLES; EACH REVEALING NEW DIMENSIONS OF THE GREAT SOCIAL REFORMER THAT RAJARSHEE SHAHU MAHARAJ WAS. "
राजर्षी शाहू छत्रपतींच्या जीवनकार्यावरील हा लेखसंग्रह आहे. गेल्या दहा-बारा वर्षांत पाक्षिक लोकराज्य, साप्ताहिक सकाळ, दै. पुढारी, दै. सकाळ इत्यादी विविध नियतकालिकांच्या खास अंकांतून प्रसंगविशेषी प्रसिद्ध झालेले लेख आहेत. याशिवाय दोन लेख कोल्हापूरच्या भाई माधवराव बागल विद्यापीठाने आयोजित केलेल्या चर्चासत्रात सादर केलेले ‘शोधनिबंध’ आहेत. ‘ब्राह्मण ब्युरॉक्रसी’ व ‘क्षात्रजगद्गुरू’ या विषयांवरील लेख २००१ मध्ये आम्ही प्रकाशित केलेल्या ‘राजर्षी शाहू स्मारक ग्रंथ’या ग्रंथातून घेतले आहेत. अखिल भारतीयांचा उद्धार करण्याचे व्रत घेतलेल्या या थोर पुरुषाचा तत्कालीन वरिष्ठ वर्णीयांच्या इंग्रजांविरुद्ध चालविलेल्या स्वराज्याच्या हक्काच्या चळवळीसंबंधीचा दृष्टिकोन काय होता, हे त्यावरून समजून येते. राजर्षी शाहू छत्रपतींचा लढा अशा दुसऱ्याला स्वातंत्र्याचे हक्क नाकारणा ऱ्या वर्णवर्चस्ववाद्यांविरुद्ध होता. इंग्रजांकडून राजकीय स्वातंत्र्याचे हक्क मागणारे लोक आपल्याच देशातील आपल्याच बांधवांना सामाजिक स्वातंत्र्याचे, सामाजिक न्यायाचे हक्क नाकारत होते. इतिहासाचे विकृतीकरण करणा ऱ्याना सत्येतिहासाचे सादरीकरण करूनच उत्तर देणे, हा सुसंस्कृत समाजाचा राजमार्ग मानला जातो. प्रस्तुत संग्रहातील कोल्हापूर गॅझेटिअरवरील लेख या मार्गावरील लेखकाच्या मतानुसार केलेली वाटचालच आहे.

No Records Found
No Records Found
Keywords
"#TRANSLATEDMARATHIBOOKS#TBC#TRANSLATEDBOOKS@50%#RAJARSHI SHAHU MAHARAJ EK MAGOVA#DR. JAYSINGRAO PAWAR #राजर्षी शाहू छत्रपती : एक मागोवा# डॉ. जयसिंगराव पवार# राजर्षी शाहू छत्रपती महाराज# एक दृष्टिक्षेप# राजर्षी शाहू छत्रपतींचा अभूतपूर्व जाहीरनामा मागासवर्गीयांचा मुक्तिदाता# लोकराजा शाहू छत्रपती# राजर्षी शाहू छत्रपती आणि ब्राह्मण ब्युरॉक्रसी# राजर्षी शाहू छत्रपती : आर्यसमाजी की सत्यशोधकी? # राजर्षी शाहू छत्रपती आणि क्षात्रजगद्गुरू# राजर्षी शाहू छत्रपती आणि स्वराज्य चळवळ# राजर्षी शाहू छत्रपती आणि स्त्रीमुक्तीचे कायदे# राजर्षी शाहू छत्रपतींची वैद्यकीय क्षेत्रातील कामगिरी# राजर्षी शाहू छत्रपती आणि कोल्हापूर गॅझेटिअर# संदर्भग्रंथ सूची #MARATHIBOOKS#ONLINEMARATHIBOOKS#TRANSLATEDMARATHIBOOKS#TBC#TRANSLATEDBOOKS@50% "
Customer Reviews
Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

वा. पां. जाधव अमरावती

`अमरावतीचे छप्पन स्वभाव एक मनोरंजक काव्यसंग्रह` `अमरावतीचे छप्पन स्वभाव` हे अमरावतीचे सुप्रसिद्ध साहित्यिक श्री जी. बी. देशमुख यांचे अमरावती नगरीचा सहज स्वभाव व ह्या नगरीच्या वेगळ्या ओळखीवर आधारित मनोरंजक पुस्तक वाचले. वाचून भरपूर मनोरंजन झाले. खर काय लिहावे या लेखकाबद्दल, मन गोंधळले. ऐतिहासिक असो, प्रवास वर्णन असो, व्यक्ती विशेष असो, अनुभवात्मक घटना घडामोडी असो कशावरही सहज लिखाण करणारा हा लेखक आहे. आता तर त्यांनी लेखनाला विनोद प्रचुर फोडणी देऊन `अमरावतीचे छप्पन स्वभाव` या काव्यसंग्रहातून अमरावतीकरांना मनोरंजनाची मेजवानीच दिली आहे. प्रत्येक शहराची व त्या शहरातील वैशिष्ट्यांची एक वेगळीच ओळख असते. दिवस जातात, काळ लोटतो, पिढ्या बदलतात मात्र जुन्या स्मृतीची चिन्हे नवीन येणाऱ्या पिढीच्या मनात गुढ निर्माण करत कायम हाक देत राहतात. अमरावतीही त्याला अपवाद नाही. बापट चौकात चौक नाही, त्या जागेवर चौरस्ता नसून टी-पॉइंट आहे, खापर्डे बगीचा म्हणून आजही ओळख आहे मात्र तेथे बगिचा नाही किंवा प्रसिद्ध गांधी चौकात गांधीचा पुतळा अथवा स्मृतीदर्शक चिन्ह अथवा उल्लेख नाही मात्र गांधी चौक अशीच ओळख जनमानसात आहे. अशा एक ना अनेक विसंगत नाम दर्शक ओळख असलेली उदाहरणे त्यात सप्रमाण आहेत. पण खरी गंमत म्हणजे कधी काळी घडलेला इतिहास त्यामध्ये दडलेला आहे हे निश्चित. या सोबतच अमरावतीकरांच्या स्वभावातला स्थायी मजेदारपणाच्या एक एका हटके गुण वैशिष्ट्याच्या गमती लेखकाने हुबेहूब अधोरेखित केलेल्या आहेत. आणि त्यावरुन तत्सम रचनांचा उहापोह लेखकाने पुस्तकात केला असावा. विदेशात स्थाईक झालेल्या मूळ अमरावतीकरांना लेखकाने लिहिलेल्या गमती मनोरंजनात्मक वाटाव्या एवढी किमया जी.बी. च्या सहज लेखनाने दाखवली आहे. अमरावतीचे अग्रगण्य वृत्तपत्र दै. हिंदुस्थान मध्ये लेखकाने सतत ६ महीणे लिहीलेल्या काव्य सदरात अमरावतीच्या जनमानसाच्या हृदयाच्या ठाव घेणाऱ्या काव्य रचनांचा आठवणींनी महापूर ओसंडून गेला होता. विशेष म्हणजे ह्यात कुठेही अनावश्यक अभिनीवेष नव्हता. उलट गमतीत केलेले आत्मपरिक्षण मात्र काही प्रमाणात होते. वयस्क अमरावतीकर रसिकांना या रचना ताज्या करून त्यांच्या तारुण्यात घेऊन गेल्या हेच खरे. जी बी देशमुख या लेखकास मिळालेल्या सकारात्मक प्रतिक्रियां वरून दिसून येते. . सदर पुस्तकातील काव्यमय रचना वाचतांना अमरावतीच्या माणसाच्या वऱ्हाडभोळ्या स्वभावाची प्रचीती येते आणि वेगळाच आनंद देऊन जाते. निखळ मनोरंजन करत गुदगुल्या करणारा असा हा काव्यसंग्रह आहे. अमरावती शहराची ऐतिहासिक वैशिष्टे काव्यरूपात वाचण्याचा आनंद अमरावतीकरांना ते जिथं असतील त्या गावात, परगावात, परदेशात पुस्तक मागवून घेता येईल. ...Read more

ज्योती चेडे, मुंबई.

अमरावतीच्या वैशिष्ट्यांवर आधारीत खुमासदार छप्पन्न कवितांच्या संग्रहातील प्रत्येक कविता वाचत असताना अमरावतीच्या वातावरणाची धुंदी आपसुकच मनावर चढु लागली. सगळ्याच कविता सुंदर आहेत. एकेक कविता अमरावतीचे अप्रतिम वर्णन करते. प्रत्येक कवितेचा शेवट कुठेतरी गंभीर विचार करायला भाग पाडतो आणि मन गलबलून जाते. सगळ्याच कविता सुंदर आहेत पण माझ्या मनाला भावलेल्या व भिडलेल्या कविता आहेत `अमरावतीतल्या गमती`, `अमरावतीचे शिक्षण`, `अमरावतीचे हजरजबाबी`, `अमरावतीचे वेडे`, `अमरावतीच्या काकू` व बाकी सगळ्या. `अमरावतीचे वेडे` या कवितेत उल्लेखीत शेवटचा अश्रुंचा एक थेंब जरुर राखला जाईल. तसेच `अमरावतीच्या काकूं` ची उर्जा उरात भरून उरेल. जीवन देणाऱ्या विहीरीने कोणाचेही जीवन घेऊ नये, अशी सद्भावना मनात जागेल. अमरावतीकर जगात कुठेही असो त्यांच्या मनात एका कोपऱ्यात राजकमल चौक असतोच हे सत्य मनावर कोरले जाईल. प्रत्येक अमरावतीकराने ह्या कविता जगाव्यात. त्यासाठी हे पुस्तक संग्रही ठेवावे आणि परगावी राहणाऱ्या आपल्या अमरावतीकर आप्तेष्टांना भेटी दाखल द्याव्या. ...Read more