* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: NOSTRADEMASCHI BHAVISHYAVANI
  • Availability : Available
  • ISBN : 9788177664126
  • Edition : 6
  • Publishing Year : AUGUST 2003
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 136
  • Language : MARATHI
  • Category : REFERENCE AND GENERAL
  • Available in Combos :SURESHCHANDRA NADKARNI COMBO SET- 4 BOOKS
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
THE WOMAN WHO WAS NO MORE HAVING THE RULING POWER WILL COME INTO POWER ONCE AGAIN. HER ENEMIES WILL CONSPIRE AGAINST HER; SHE WILL BE KILLED AT THE AGE OF 67...THE GREAT PILOT WILL GAIN ULTIMATE POWER...HE WILL BE VERY SUCCESSFUL...AFTER 7 YEARS HE WILL HAVE TO FACE REBELLION AGAINST HIM... VENICE CITY WILL BE FLOODED BY SORROW...THESE WERE NOSTRADAMUS` PREDICTION ABOUT INDIA 400 YEARS BACK WHICH CAME INTO REALITY... WHAT WILL HAPPEN IN FUTURE? THE GREAT LEADER BORN IN THE COUNTRY SURROUNDED BY OCEAN ON ALL THREE SIDES WILL RISE ONE DAY LIKE A STORM, HE WILL DECLARE THURSDAY AS A WEEKLY OFF...READ IN THIS BOOK THE EXCITING ASTROLOGICAL PREDICTIONS ABOUT THE WORLD AS WELL AS INDIA.
‘‘ती सत्ताहीन झालेली स्त्री अधिकच जोमाने पुन्हा सत्तेवर येईल ...तिचे शत्रू गुप्त कारस्थान रचतील... ...सत्तरीला तीन वर्षे कमी असताना तिचा मृत्यू घडवून आणला जाईल...’’ ‘‘तो थोर पायलट मोठ्या पदावर येईल... विलक्षण विजय मिळवील.... सात वर्षांनी त्याच्याविरुद्ध विद्रोह होईल... व्हेनिस नगरी दु:खात बुडून जाईल...’’ नॉस्त्रादेमसची भारताविषयीची ही भविष्यवाणी... चारशे वर्षांपूर्वी लिहून ठेवलेली.... तंतोतंत खरी ठरलेली.... आणि भावी काळात काय घडेल? ‘‘तीन बाजूंनी समुद्रांनी वेढलेल्या देशातील महान नेता वादळाप्रमाणे येईल... गुरुवार हा त्याचा सुटीचा दिवस असेल....’’ जगाबरोबरच भारताबद्दलही नॉस्त्रादेमसने वर्तविलेल्या भाकीतांची थक्क करणारी विलक्षण रोमहर्षक अशी नॉस्त्रादेमसची भविष्यवाणी.
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
#MARATHIBOOKS#ONLINEMARATHIBOOKS#TRANSLATEDMARATHIBOOKS#TBC#TRANSLATEDBOOKS@50% #NOSTRADEMASCHI #BHAVISHYAVANI #NOSTRADEMASCHIBHAVISHYAVANI #नॉस्रादेमसचीभविष्यवाणी #REFERENCEANDGENERAL #MARATHI #SURESHCHANDRANADKARNI #सुरेशचंद्रनाडकर्णी
Customer Reviews
  • Rating StarSahitya Sudha

    ‘‘ती सत्ताहीन झालेली स्त्री अधिकच जोमाने पुन्हा सत्तेवर येईल ...तिचे शत्रू गुप्त कारस्थान रचतील. ...सत्तरीला तीन वर्षे कमी असताना तिचा मृत्यू घडवून आणला जाईल...’’‘‘तो थोर पायलट मोठ्या पदावर येईल...विलक्षण विजय मिळवील....सात वर्षांनी त्याच्याविरुदध विद्रोह होईल...व्हेनिस नगरी दु:खात बुडून जाईल...’’नॉस्त्रादेमसची भारताविषयीची ही भविष्यवाणी..चारशे वर्षांपूर्वी लिहून ठेवलेली....तंतोतंत खरी ठरलेली...आणि भावी काळात काय घडेल? ‘‘तीन बाजूंनी समुद्रांनी वेढलेल्या देशातील महान नेता वादळाप्रमाणे येईल...गुरुवार हा त्याचा सुटीचा दिवस असेल....’’जगाबरोबरच भारताबद्दलही नॉस्त्रादेमसने वर्तविलेल्या भाकीतांची थक्क करणारी विलक्षण रोमहर्षक अशी नॉस्त्रादेमसची भविष्यवाणी. ...Read more

  • Rating StarAshutosh Kamble

    नॉस्त्रादेमसची भविष्यवाणी` वाचुन पुर्ण! नॉस्त्रादेमस हा जगातील महान भविष्यवेत्ता मानला जातो. त्याच्या `सेंच्युरीज` या पुस्तकाच्या अब्जावधी प्रती विकल्या गेल्या आहेत, अजुनही विकल्या जात आहेत! या पुस्तकात नॉस्त्रादेमसने बर्याच भविष्यवाण्या लिहून ठेवले्या आहेत, ज्यातील काही भविष्यवाण्या घडूनही गेल्या आहेत! पण या भविष्यवाण्या गद्यमय नसुन पद्यमय आहेत. ज्यामुळे त्यांचा अचुक अर्थ लावणे हे मोठे जिकीरीचे काम आहे. शिवाय काही अपवाद सोडला तर बाकीच्या ओळींमधे ज्यांच्याबद्दल भविष्यवाणी केलीये त्यांचं सरळ सरळ नाव न सांगता त्यांच्या उल्लेख समर्पक विशेषणाने करतो. उदा.- जर्मनला वुल्फ (लांडगा), भारताला समुद्राच्या नावाचा देश(सिंधु-हिंदु-हिंदुस्तान),चीनला ड्रॅगन इ. मानवी भविष्यवाणी गद्यमय असते व ईश्वरी भविष्यवाणी पद्यमय असे म्हटले जाते. स्वतः नॉस्त्रादेमस कबुल करतो की त्याने लिहिलेल्या सर्व भविष्यवाणी ईश्वराने(नियतीने) सांगितलेल्या आहेत. त्याने त्या तशाच शब्दात लिहिलेल्या आहेत. मायकेल नॉस्त्रादेमस हा चित्रपट बघावा तश्या भविष्यवाणी बघत असे. त्यासाठी त्याला काही ठराविक क्रियाकर्म करावे लागे. याबद्दल त्याने `सेंच्युरीज` या पुस्तकात सुरुवातीसच सर्वकाही सांगितले आहे. त्याच्या काळात त्याने केलेल्या काही कटू भविष्यवाणींमुळे व त्या लोकांना प्रत्ययास आल्यामुळे त्याच्या जिवालाही धोका निर्माण झाला होता. लोक त्याच्यावर संशय घ्यायचे की नॉस्त्रादेमस काहीतरी काळी जादू करुन तोच हे सर्व घडवित आहे. परंतु इंग्लडच्या राणीने त्याला संरक्षण दिल्यामुळे त्याला कुणीच हातही लावु शकत नव्हता(या राणीने नॉस्त्रादेमसनी `सेंच्युरीज` या पुस्तकात वर्तवलेली स्वतःच्या पतीच्या मृत्युची भविष्यवाणी वाचली होती. तिने त्याबद्दल राजालाही सावधान करण्याचा प्रयत्न केला. पण राजाने ही गोष्ट हसण्यावारी नेली. परिणामी पुस्तकात वर्णन केल्याप्रमाणे तंतोतंत तसाच राजाचा मृत्यु झाला.) नेपोलियन बोनापार्ट आणि अडॉल्फ हिटलर यांच्याबद्दलतर त्यानी सर्वकाही चारशेवर्षापूर्वीच लिहून ठेवलंय. अगदी त्यांच्या जन्मापासुन तर ते मृत्युपर्यंत आणि ते ही त्यांच्या नावासकट! त्यांचा जन्म होण्याआधीच! हिटलरला त्याचा मृत्यु कसा होणार हे आधीच या पुस्तकामुळे कळले होते. पण नियती अटळ असते, त्याप्रमाणेच झालं. भारताबद्दलही नॉस्त्रादेमसनी काही भविष्यवाणी लिहिल्यात. पैकी त्यात झाशीची राणी लक्ष्मीबाईच्या मृत्युची भविष्यवाणी प्रत्ययास आलीये. अजुनएक भविष्यवाणी म्हणजे भारतात पाच नद्या असलेल्या राज्यात जन्माला येणारा महामानव! हा मानव भारताचा सर्वेसर्वा होईल आणि याच मानवामुळे तिसरे विश्व महायुद्ध समाप्त होईल! ह्याच्यामुळेच भारत जगात महासत्ता होईल आणि दहशतवाद समाप्त होईल! याच्यामुळेच जगात शांतता स्थापित होईल व जग या महामानवाच्या वक्तृत्वाचा दिवाना होईल! तिसर्या महायुद्धाच्याच बहुतेक भविष्यवाण्या नॉस्त्रादेमसच्या `सेंच्युरीज` या पुस्तकात आहेत. तिसरे महायुद्ध हे अघोषित महायुद्ध असेल! म्हणजे तिसरे महायुद्ध सुरु झालंय याचा कुणालाही थांगपत्ता लागणार नाही. जेव्हा लागेल तेव्हा पहिल्यापेक्षा जास्त भयंकर परिस्थिती निर्माण होईल! जगाचं खुप नुकसान होईल. पण जेव्हा हे महायुद्ध संपेल, तेव्हा जगातुन दहशतवादही संपेल! नॉस्त्रादेमसच्या मते जगातील चौथे आणि शेवटचे महायुद्ध हे तिसर्या महायुद्धानंतर कित्येक शतकानंतर, हजारो वर्षानंतर होईल! या महायुद्धामुळे पृथ्वी मानवांस राहण्यायोग्य असणार नाही. महायुद्ध संपल्यानंतरही सगळीकडे मृत्युचे थैमान असेल, रोगराई असेल! या महायुद्धामुळेच मानवाचा आणि पर्यायाने सर्व सजीवसृष्टीचा ऱ्हास्य होईल! वेल, या सर्व गोष्टींना अजुन अवकाश आहे. मायकेल नॉस्त्रादेमस या सर्वोत्तम भविष्यवेत्ता आणि महान द्रष्टाबद्दल असेच काही अजुन माहिती, किस्से `नॉस्त्रादेमसची भविष्यवाणी` या मराठी पुस्तकात वाचायला मिळेल. स्वतःचा मृत्यु केव्हा असेल व मृत्युनंतर पंचवीस- पन्नास वर्षानंतर त्याच्या प्रेतासोबत काय होईल याची आधीच जाणीव असलेला व आपल्या या भविष्यवाणींचा कुणी दुष्ट हेतूने वापर करु नये म्हणुन खबरदारी घेणारा मायकेल नॉस्त्रादेमस हे अजब रसायन एकदा अनुभवून पहाच ...Read more

  • Rating StarKiran Borkar

    जगातील प्रसिद्ध थोर ज्योतिषी ,डॉक्टर म्हणून नॉस्ट्रदिमस प्रसिद्ध आहे . त्याने अनेक भविष्य वर्तवली. ती बहुतेक चतुस्पदी मांडली आहेत. त्यावरून काही उत्पाद होऊ नये म्हणून ती गूढ आणि सांकेतिक भाषेत लिहिली गेली आहेत.नॉस्ट्रदिमसने भारताबद्दलही सुमारे चारशे र्षांपूर्वी काही भविष्य मांडली होती .त्यात पाकिस्तानची निर्मिती ,1857 चा उठाव ,इंदिरा गांधींचा काळ त्यांची हत्या ,राजीव गांधी यांची हत्या .भारत चीन युद्ध यांचा समावेश आहे . तसेच पाहिले महायुद्ध ,हिटलरचा उदय ,मुसोलिनीची हत्या ,हिरोशिमा ,नागासाकीवर अमेरिकेने टाकलेले अणुबाँब या विषयी ही भविष्य वर्तविले होते. लेखकांनी यातील काही भविष्य इथे चतुष्पदी मध्ये मांडले आहेत आणि त्याचा अर्थ ही सांगितला आहे . जगातील प्रमुख घटनांवर त्यांनी भर दिला आहे . ...Read more

  • Rating StarDAINIK SAMANA (KOLHAPUR) 28-09-2003

    ‘ज्योतिष हे शास्त्र आहे काय? यावर कुणाचे काहीही मत असो, पण या सर्वांसाठी नॉस्त्रादेमस मात्र एक न सुटणारं कोडंच बनून राहिला आहे. तो एक उत्तम गणिती, निष्णात खगोलशात्रज्ञ आणि वाचसिद्धी प्राप्त झालेला ज्योतिषी होता. त्याला अनेक गूढविद्यांचेही ज्ञान होते.तो भाषाप्रभूही होता. त्याला ग्रीक, लॅटिन, फ्रेंच, इटालियन या युरोपीयन भाषांबरोबर हिब्रू, अरेबिक आदी भाषाही अवगत होत्या. नॉस्त्रादेमसचा काळ १५०३ ते १५६६. त्या काळात धर्मसत्ता आणि राजसत्ता अतिशय प्रवळ होती. भ्रामक, पाखंडी कल्पनांचा समाजावर पगडा होता. त्यावर उपाय म्हणून नॉ़स्त्रादेमसने ते फ्रेंच राजघराण्यालाच अपर्णन केले. नॉस्त्रादेमसकालीन जगाची कल्पना भूगोल, तत्कालीन नाव ग्रीक पुराणातील संदर्भ यामुळे नॉस्त्रादेमस नक्की कुणाबद्दल व काय भाकीत करतोय हे समजणे एकंदरीतच कठीण. नॉस्त्रादेमसने तसे एके ठिकाणी म्हटलंही आहे. या चतुष्पदींचा अर्थ विद्वानांनी लावावा! अर्थात तसा तो लावण्याचा, आपापल्यापरीने त्याची उकल करण्याचा प्रयत्न अनेकांनी केला. डॉ. सुरेशचंद्र नाडकर्णींनी असाच एक प्रयत्न दै लोकसत्तामध्ये ‘नॉस्त्रादेमसची भविष्यवाणी’ या शीर्षकाने स्तंभलेखन करून केला. त्या स्तंभलेखनातील काही भागांचे संकलन म्हणजे सदरचे पुस्तक. नॉस्त्रादेमसने अनेक ठिकाणी चतुष्पदी उलगडण्यासाठी खगोलशास्त्रीय ग्रहगणिताची सूचना दिली आहे. चतुष्पदी रचताना प्रत्येक शब्द अत्यंत विचारपूर्वक योजला आहे. अनेक शहरांचा व स्थळांचा त्याने स्पष्ट उल्लेख केला आहे; व्यक्ती आणि घटनांबाबत त्याने सुरेख रूपके उपयोगात आणली आहेत. चिनी लोकांच्या संदर्भात ड्रॅगन, हिंदुस्थानसंबंधी लिहिताना समुद्राचे नाव असलेल्या धर्माचा देश ‘सिंधू-हिंदू-हिंदूस्थान’ वगैरे प्रतीके वापरून त्याने भविष्य कथन केले आहे. हे सारं त्याने लेखनाची गूढरत्यता वाढावी म्हणून केलेले नसून तत्कालीन राज्यव्यवस्था तसेच धर्मव्यवस्था डोळ्यासमोर ठेवून केलेले आहे. तसे त्याने आपल्या मुलाला लिहिलेल्या पात्रात स्पष्ट कबूल केले आहे. जगाच्या भवितव्याबाबत भविष्य कथन करणारी प्रत्येकी शंभर चतुष्पदी असलेली एकूण बारा शतके रचण्याचा नॉस्त्रादेमसचा मानस असावा; परंतु काही कारणामुळे तो सिद्धीस गेला नसावा. एकूण संकल्पित लिखाण पूर्ण घेण्यापूर्वीच त्याची इहलोकीचा यात्रा संपुष्टात आली. या बारा शतकांपैकी सातव्या शतकात फक्त बेचाळीस चतुष्पदी आहेत. अकराव्या शतकात फक्त दोन आणि बाराव्या शतकात फक्त अकरा चतुष्पदी आहेत. इतर सर्व शतके पूर्ण शंभर चतुष्पदीची आहेत. बहुतेक पुस्तकातून फक्त दहाच शतके छापलेली आढळतात. वास्तविक ग्रंथाचे मूळ नाव ‘प्रोफेटिक्स द मायकेल नॉस्त्रादेमस’ पण ते मागे पडून ‘सेंच्युरीज’ याच नावाने तो रूढ झाल्या. फ्रेंच राज्यक्रांतीबद्दल नॉस्त्रादेमस लिहितो - ‘‘लढाईपूर्वीच त्या भल्यामोठ्या (तुरुंगाच्या भिंतीवर) कब्जा केला जाईल. राजाचा अकस्मात वध केला जाईल. सारेच अतिशय दु:खद खेदजनक अनेक रक्षक मारले जातील. अन् (सीन) नदीच्या परिसरातील भूमी रक्ताने न्हाऊन निघेल.’’ याव्यतिरिक्त राजा दुसरा हेन्रीचा मृत्यू, नेपोलियन, पहिले महायुद्ध, हिटलर-मुसोलिनी, दुसरे महायुद्ध, हिरोशिमा-नागासाकीवरील बॉम्बहल्ले, इस्त्रायलची निर्मिती, इराणमधील क्रांती आदी जागतिक घडामोंडीवरही नास्त्रादेमसने भाकीत केले होते. डायनाचा दुर्दैवी मृत्यू, अमेरिकेतील वर्ल्ड ट्रेड सेंटरवरील हल्ला, अमेरिका-इराक युद्ध, अमेरिका अफगाणिस्तान युद्ध, रशियाचे विभाजन या घटनांचेही भाकीत नॉस्त्रादेमसने आपल्या चतुष्पदी केले आहे. तो म्हणतो. ‘‘ती सत्ताहीन झालेली स्त्री. अधिकच जोमाने पुन्हा सत्तेवर येईल. तिचे शत्रू गुप्त कारस्थान रचतील. सत्तरीला तीन वर्षे कमी असताना तिचा मृत्यू घडवून आणला जाईल.’’ लेखकाच्या मते ही चतुष्पदी माजी दिवंगत पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्याशी बरेचसे साधर्म्य बाळगणारी आहे. याव्यतिरिक्त १८५७चे स्वातंत्र्यसमर, झाशीची राणी, बहादूर शहर जफर, सुभाषचंद्र बोस, हिंदुस्थानची स्वातंत्र्यप्राप्ती, चीनचे आक्रमण, राजीव गांधी वगैरे घटनांचाही नॉस्त्रादेमसच्या दिव्यचक्षूंना सुगावा लागला होता असे स्पष्ट प्रतिपादन लेखक करतो. नॉस्त्रादेमसच्या महानिर्वाणाला १९६६ साली चारशे वर्षे पूर्ण झाली. या चारशे वर्षांत त्याने कथन केलेली सुमारे साडेतीनशे भाकिते तंतोतंत प्रत्ययाला आल्याचे म्हटले जाते. उर्वरित साडेचारशे चतुष्पदी प्रत्ययाला यायच्या आहेत. तिसरे महायुद्ध, इस्त्रायल-इजिप्तचे भवितव्य, जैविक युद्ध, महायुद्धाचा शेवट, सात चांद्रचक्रांपैकी सातवे चांद्रचक्र, चौथे महायुद्ध, पृथ्वीचे भवितव्य वगैरे बऱ्याच जागतिक स्तरांवरील घडामोडींची सदर पुस्तकात उकल केली गेली आहे. तथापि विशेष उल्लेख करण्यासारखी, गोष्ट म्हणजे नॉस्त्रादेमसच्या पहिल्या शतकातील ७६व्या क्रमांकाची चतुष्पदी. ‘‘तीन बाजूंनी समुद्रांनी वेढलेल्या देशातील महान नेता वादळाप्रमाणे येईल... गुरुवार हा त्याचा सुटीचा दिवस असेल.’’ या चतुष्पदीबद्दल लेख म्हणतो चतुष्पदी हिंदुस्थानला बऱ्याच अंशी लागू पडणारी अशीच आहे. इतकेच नव्हे ती हिंदुस्थानासंदर्भातच रचली असावी. नॉस्त्रदेमसने सांगिलेल्या एकूण साडेआठशे भाकितांपैकी सत्य म्हणून प्रत्ययास आलेली भाकिते पाहता उर्वरित भाकितेही बऱ्याच अंशी खरी ठरावीत. तिसरे महायुद्ध होईल की नाही? चौथे महायुद्ध केव्हा होईल? जगाचा अंत केव्हा असेल? या व इतरही अनेका प्रश्नांनी उकल आपल्याला सदर पुस्तकातून मिळू शकेल. लेखकाने तशी ती करण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला आहे. -नी. तु. भोसले ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

ANUWADATUN ANUSARJANAKADE
ANUWADATUN ANUSARJANAKADE by LEENA SOHONI Rating Star
कौशिक लेले

पुस्तक – अनुवादातून अनुसर्जनाकडे (Anuwadatun Anusarjanakade) लेखिका – लीना सोहोनी (Leena Sohoni) भाषा – मराठी पाने – २३९ प्रकाशन – मेहता पब्लिशिंग हाऊस. फेब २०२४ छापील किंमत – रु. ३७०/- ISBN – 9789357205337 ह्या परिचयाची माझी वेबसाईट लिंक htps://learnmarathiwithkaushik.com/courses/anuwadatun-anusarjanakade/ मराठी पुस्तकांमध्ये सध्या इतर भाषांतून अनुवादित झालेली पुस्तके सुद्धा मोठ्या संख्येने दिसतात. एखादा सरस अनुवाद वाचताना आपल्या डोक्यात सुद्धा आपल्या आवडीच्या परभाषेतल्या पुस्तकांची यादी तयार होते. ही पुस्तकं सुद्धा मराठीत आली तर काय मजा येईल असं वाटतं. भाषा हा ज्यांचा जिव्हाळ्याचा विषय आहे त्यांची इच्छा एक पुढचं पाऊल टाकेल. आपणही स्वतः असा अनुवाद केला तर ? आपल्यालाही दोन्ही भाषा चांगल्या येत आहेत मग अनुवाद का करू नये ? हे पिल्लू डोक्यात शिरेलच. असा अनुवाद करायचा स्वतः काही प्रयत्न केला की लक्षात येईल की हे किती किचकट काम आहे. चांगला अनुवाद करायचा असेल तर सराव लागेल. अभ्यास लागेल. त्याची काही तंत्र मंत्र शिकून घ्यावी लागतील. एखाद्या चांगल्या जाणकार व्यक्तीचं, अनुभवी व्यक्तीचं मार्गदर्शनही मिळायला हवं. जर तुमच्याही मनात अशा भावना आल्या असतील तर लीना सोहोनी यांचं “अनुवादाकडून अनुसर्जनाकडे” हे पुस्तक तुम्हाला नक्की आवडेल. लीना सोहोनी हे नाव मराठीत अनुवादिका म्हणून प्रसिद्ध आहे. आत्तापर्यंत त्यांनी अनुवाद केलेली पन्नासच्यावर पुस्तके प्रकाशित झाली आहेत. त्यांचा अनुभव व अधिकार वेगळा सांगायला नको. त्यांचे हे पुस्तक "अनुवादातून अनुसर्जनाकडे" पुस्तकाचा पहिला भागात लीना सोनी यांनी आपल्या अनुवादाच्या प्रवासाचं सिंहावलोकन केलं आहे. त्यांनी अनुवादाची सुरुवात कशी केली, त्यात प्रगती कशी झाली हे लिहिलं आहे. अनुवादामुळे प्रसिद्ध लेखक जेफ्री आर्चर, सुधा मूर्ती, किरण बेदी यांच्याशी जुळलेले संबंध आणि त्यांच्या भेटीची वर्णनं आहेत. ह्या प्रवासात “मेहता पब्लिशिंग हाऊस” या प्रकाशन संस्थेचा भरभक्कम पाठिंबा त्यांना मिळाला. सुनील मेहता आणि अनिल मेहता यांच्याबरोबरच्या आठवणी सुद्धा पुस्तकात आहेत. पुढच्या भागात अनुवाद या विषयाची एखाद्या शास्त्रीय शोधनिबंधाप्रमाणे माहिती दिलेली आहे. यात अनुवाद प्रक्रियेकडे अतिशय बारकाईने बघितलं आहे. ढोबळमानाने बघितलं तर, अनुवाद म्हणजे तर एका भाषेतल्या शब्दांच्या ऐवजी दुसऱ्या भाषेतले शब्द वापरणे. पण प्रत्येक वेळी एका शब्दाच्या बदल्यात दुसरा भाषेतला एक शब्द असं होतंच असं नाही. त्यामुळे काही वेळा शब्दाची फोड करून दाखवावी लागते. तर काही वेळा मूळ मोठं वाक्य लहान होऊ शकतं. कदाचित तिथे पूर्णपणे वेगळीच शब्दयोजना वाक्यरचना होऊ शकते. या प्रत्येक प्रकाराला एक विशिष्ट शास्त्रीय नाव (पारिभाषिक संज्ञा) आहे हे आपल्याला पुस्तक वाचून कळतं. जे शब्दांच्या बाबतीत तेच वाक्यांच्या बाबतीत. मूळ भाषेतल्या शब्दांसाठी नवीन शब्द वापरून वाक्य तयार झालं तरी ते वाचकाला सहज वाटलं पाहिजे. नाहीतर आपण लगेच म्हणू, “अनुवाद खूप बोजड झाला आहे; ठोकळेबाज झाला आहे”. हे टाळायचं तर वाक्यरचना सुद्धा सुधारायला पाहिजे. याची उदाहरणे पुस्तकात दिली आहेत आणि त्या अनुषंगाने पारिभाषिक संज्ञा (terminology) काय आहे हे मराठी आणि इंग्रजी दोन्हीत दिलं आहे. शब्द, वाक्य ह्यांना लावलेल्या कसोटीचा विस्तार करून ती कसोटी “संकल्पनां”ना लावायला पाहिजे. एखाद्या भाषेत, एखाद्या समाजात असणाऱ्या संकल्पना, प्रथा-परंपरा मराठी भाषेत नसतील तर अनुवाद करताना ते जसंच्या तसं ठेवायचं का तिथे काही वेगळी संकल्पना वापरायची ? का तळ टीप देऊन स्पष्टीकरण द्यायचं? असे एकाच गोष्टीकडे बघण्याचे वेगवेगळे पर्याय उपलब्ध आहेत. हा मुद्दा आपण सोदाहरण स्पष्ट केला आहे. हा ऊहापोह वाचल्यासार अनुवादासाठी दोन्ही भाषांवर आपली किती चांगली पकड पाहिजे हे वाचकाच्या लक्षात येईल. त्याचबरोबर जे पुस्तक आपण वाचतोय त्याची पार्श्वभूमी, त्यातल्या प्रसंगाची सामाजिक पार्श्वभूमी, आणि लेखकाला काय ध्वनीत करायचे आहे हे सगळं समजणं सुद्धा किती महत्त्वाचं हे लक्षात येईल. म्हणजे अनुवाद प्रक्रिया दिसताना शब्दांची दिसली तरी “शब्दांच्या पलीकडले” अनुवादकाला पकडता आले तरच मूळ कृतीला न्याय मिळेल. हे या पुस्तकाच्या वाचनातून अधोरेखित होतं. पुस्तकाचा प्रकारानुसार अनुवादकासमोर असणारी आव्हाने सुद्धा बदलतात. कथा-कादंबरीचा अनुवाद वेगळा तर कवितेचा अनुवाद वेगळा. कारण कवितेमध्ये भावभावनांना महत्त्व आहे तितकेच महत्त्व शब्द, लय, शब्दचमत्कृती यांनाही आहे. म्हणूनच तर ते पद्य आहे गद्य नाही. लीनाजींनी ह्याचाही परामर्श घेतला आहे. नाटकाचा अनुवाद करताना येणारी आव्हाने अजून वेगळी. परिणामकारक संवाद, नेपथ्य, पात्रांची देहबोली, त्याचा प्रेक्षकांवर होणारा परिणाम या सगळ्याचा विचार करून अनुवाद करावा लागतो. म्हणूनच, अनुवाद म्हणजे प्रत्येक वेळी “शंभर टक्के पुस्तक जसेच्या तसे” असं नसतं. तर काही वेळा ते रूपांतर ठरतं. काही वेळा तो स्वैर अनुवाद ठरतो. तर काही वेळा मूळ कलाकृतीवर आधारित नवीन कलाकृती ठरते. हे सुद्धा कितीतरी उदाहरणे देऊन स्पष्ट केले आहे. हे सगळे मुद्दे एकमेकांशी निगडित आहेत त्यामुळे पुस्तकात बऱ्याच वेळा मुद्द्यांची पुनरावृत्ती झाली आहे असं मला वाटलं. ती पुनरुक्ती टाळून कदाचित थोडी पानं कमी करता आली असती. पण मुद्दा वाचकाच्या मनावर ठसावा, कुठलंही विशिष्ट प्रकरण वाचायला घेतले तरी ते त्या मुद्द्यापुरतं पूर्ण असावं हा त्यामागचा हेतू असेल. पुस्तकात पुढे अनुवादकांना नोकरी, व्यवसायाच्या काय संधी आहेत; कुठल्या संस्था याबद्दलचं शिक्षण देतात; कुठले कोर्सेस उपलब्ध आहेत याबद्दलचा तपशील आहे. अनुवाद करायला सुरुवात करायची असेल तर मजकूरनिवड, प्रकाशकांशी संपर्क, परवानगी ह्याचे मार्गदर्शन आहे. त्यांनतर शाळेत आपण जे प्राथमिक व्याकरण शिकतो; म्हणजे कर्ता, कर्म, क्रियापद, ॲक्टिव-पॅसिव्ह व्हॉइस, वेगवेगळे काळ इत्यादींच्या व्याख्या देऊन सगळ्याची उजळणी केली आहे. ज्याला अनुवाद क्षेत्रात उतरायचे आहे त्याला व्याकरणाचा अजून बराच अभ्यास करावा लागणारच आहे. आणि पुस्तकाचा उद्देश व्याकरण शिकवणं नाही तर अनुवादकासाठी व्याकरण अत्यावश्यक आहे हे ठसवणं आहे. त्यामुळे व्याकरणाचा भाग पुस्तकात नसता तरी चालला असता असं मला वाटलं. पुस्तकातील काही पाने वर दिलेल्या लिंकवर शेअर केली आहेत. म्हणजे तुम्हाला पुस्तकाची, लेखनशैलीची अजून चांगली कल्पना येईल. त्यात पुढील मुद्द्यांबद्दलची पाने आहेत १) अनुवादिका म्हणून येणारे कटुगोड अनुभव. २) प्रसिद्ध लेखक जेफ्री आर्चर ह्यांच्या पुस्तकांचा मराठी अनुवाद लीनाजींनी केला आहे. त्यातून जेफ्री आर्चर ह्यांच्याशी भेटीगाठी झाल्या त्यातला एक प्रसंग. ३) अनुवादाचे वर्गीकरण/प्रकार सांगणाऱ्या प्रकरणातली दोन पाने. अनुवाद प्रक्रियेची किती बारकाईने तांत्रिक चिकित्सा केली आहे हे लक्षात येईल. ४) नाटकाचा अनुवाद करताना येणारी आव्हाने ह्याबद्दलच्या प्रकरणातली दोन पाने. लीना सोहोनींचे आत्मकथन असणारा पुस्तकाचा पहिला भाग सर्व वाचकांना वाचायला आवडेलच. पुस्तकाचा दुसरा भाग तांत्रिक आहे. तो सर्वसामान्य वाचकाला वाचायला आवडेलच असं नाही. पण तो वाचल्यावर अनुवादक म्हणून काम करताना किती कटकटी असतात, काय व्यवधानं सांभाळावी लागतात हे वाचकाच्या लक्षात येईल. त्यातून अनुवादकांकडे व त्यांच्या कामाकडे बघण्याचा दृष्टिकोन अजून कौतुकाचा आणि कृतज्ञतेचा होईल हे निश्चित. ज्यांना अनुवाद करायचा आहे, या क्षेत्रात शिरायचं आहे किंवा तशी उमेदवारी सुरू झाली आहे त्यांना हा भाग मार्गदर्शक ठरेल. जाण वाढवेल हे नक्की. त्यामुळे या पुस्तकाच्या वाचनातून अनुवादाचा किडा काही वाचकांच्या डोक्यात गेला आणि त्यातून नवे अनुवादक मराठीत निर्माण झाले तर ते सोन्याहून पिवळे ! मराठीत कथा,कादंबऱ्या, चरित्र, सामाजिक विषयांची चर्चा ह्या पद्धतीचे लेखन भरपूर होत असतं. पण ह्या पुस्तकाप्रमाणे शास्त्रीय/तांत्रिक चिकित्सा करणारी, गंभीरपणे शिकवणारी पुस्तकं कमी दिसतात. ती प्रकाशित झाली तरी ती क्रमिक पाठ्यपुस्तक किंवा “अभ्यासाचे पुस्तक” या प्रकारात ढकलली जातात आणि दुर्लक्षित होतात. पण या पुस्तकाच्या लेखिका आणि प्रकाशक यांनी हे पुस्तक मुख्यधारेतल्या पुस्तकाप्रमाणे सादर केलं आहे. त्यातून हे पुस्तक जास्त वाचलं जाईल; जास्त लोकांना विचार प्रवृत्त करेल असं मला वाटतं. अशा प्रकारची पुस्तकं मराठीत प्रकाशित होणे हे मराठी भाषेला ज्ञानभाषा करण्यासाठी मोठे योगदान आहे. त्याबद्दल प्रकाशक आणि लेखिका दोघांचेही एक मराठी भाषा प्रेमी म्हणून मी मनापासून आभार मानतो. —————————— मी दिलेली पुस्तक श्रेणी —————————— अनुवाद करणारे असाल किंवा करायची इच्छा असेल तर आवा ( आवर्जून वाचा ) इतरांनी जवा ( जमल्यास वाचा ) ——————————— आवा ( आवर्जून वाचा ) जवा ( जमल्यास वाचा ) वाठीनावाठी ( वाचलं तर ठीक नाही वाचलं तरी ठीक ) नावाठी ( नाही वाचलं तरी ठीक ) ...Read more

OMKARACHI REKH JANA
OMKARACHI REKH JANA by MANJUSHRI GOKHALE Rating Star
सौ. जस्मिन जोगळेकर

आमच्या पुस्तकप्रेमी समुहावरचा एकही दिवसाचा खंड न पडता सलग 1730 वा पुस्तक परिचय पुस्तक प्रेमी समूह,पुस्तक परिचय अभियान: एकही दिवस खंड पडू न देता पुस्तकांचा परिचय हे पुस्तकप्रेमी समूहाचे यश ! पुस्तक सत्र:- ३ सप्ताह क्रमांक:- २४८ पुस्तक क्रमांक: १७३० दिनांक: १०/०३/२०२५ पुस्तकाचे नांव:- ओंकाराची रेख जना लेखक:- मंजुश्री गोखले पहिली आवृत्ती: फेब्रुवारी २०१२ पृष्ठ संख्या : ३०८ मूल्य: रु. ३२० प्रकाशन: मेहता पब्लिशिंग हाऊस परिचयकर्ती: सौ. जस्मिन जोगळेकर एखाद्या गोष्टीसाठी वेळ यावी लागते म्हणतात, तसं काहीसं झालं माझं. खरंतर पुस्तक वाचनाच्या बाबतीत असं व्हायला नको होतं पण झालं. `हे खूप सुंदर पुस्तक आहे, तुम्ही वाचाच` म्हणून एक पुस्तक आमच्या हाती आलं. अर्थात ज्यांनी सांगितलं त्यांनी त्यांच्या संग्रहातलं पुस्तक दिलं होतं. तसं बरेच दिवस होतं आमच्याकडे. नवऱ्याने वाचून खूपच सुंदर आहे, वाच नक्की सांगितलं देखील मला. पण पुस्तक परत द्यायची वेळ आली तरी वाचलं गेलं नाही. तरी ते नाव डोक्यात फिट बसलं होतं. अखेर एक दिवस ते एकच पुस्तक नव्हे तर त्याच लेखिकेची चार पुस्तकं विकतच घेऊन आले आणि मग ती वेळ आली…. त्या पुस्तकाच्या, पुस्तकातील भाषेच्या आणि त्या लेखिकेच्या प्रेमात पडण्याची. पुस्तक होतं…मंजुश्री गोखले यांनी संत जनाबाईंवर लिहिलेलं `ओंकाराची रेख जना`. `विठू माझा लेकुरवाळा`, `धरिला पंढरीचा चोर` अशा अभंग रचनेतून जनाबाई आपल्या ओळखीच्या आहेत. किंवा विठूराया त्यांना हर कामात मदत करत असतो वगैरे माहीत आहे. पण त्यांचं संपूर्ण चरित्र सगळ्यांना माहीत असेलच असं नाही. ते माहीत करून देण्याचं सुरेख काम या कादंबरीने केलं आहे. जनाबाईंच्या जन्मापूर्वीची आणि नंतरचीही त्यांच्या कुटुंबाची परिस्थिती, छोट्या जनाला मागे ठेऊन दुखण्याने तिला सोडून गेलेली तिची आई, त्यानंतरची बिकट वेळ याचं वर्णन वाचताना डोळ्यातलं पाणी थांबत नाही. पुढेही काही प्रसंग असे आहेत…भागाबाईचं वागणं असेल किंवा सुळावर चढवायचा प्रसंग असेल… डोळ्यात पाणी येतच राहतं. पण एवढं होऊनही त्यांची पंढरीरायावरची भक्ती मात्र गाढ होती. जनाईसुध्दा त्याला पाहायला आतुर होती. सोसले चटके l पोटी नाही घास l विठ्ठलाची आस l जनाईला ll भेटीसाठी त्याच्या l गोळा तनमन l धाडे आवतान l विठूराया ll अखेर विठुरायाकडून आमंत्रण आल्यावर बापलेक पंढरीची वाट चालू लागतात. काळया देवाला पाहायला आसुसलेली जना आणि लेकीला कायमचं परक्या घरी सोडून यायचं या विचाराने जडावलेला दमा… नशिबाची रेख l भिवरेच्या काठी l विठूराया ओढी l जनाईची ll दोघांचा प्रवास विठ्ठलाच्या विश्वासावर सुरू होतो. पुढं जनाईला दामाशेटींच्या घरी सोडून देणं, त्या घराने जनाला आपलंच म्हणणं, नामदेवांसोबत तिचं मोठं होणं अशा कितीतरी प्रसंगांनी सुखावून जायला होतं. तेव्हाची सामाजिक परिस्थिती, जनाचं अतिशूद्र असणं आणि त्यातून स्त्री असणं…त्यासाठी तिला झेलावे लागणारे त्रास, संत म्हणून मोठेपण मिळाल्यावरही त्यांच्यावर आलेला चोरीचा आळ… त्रास होतो वाचताना. जनाची आणि विठ्ठलाची पहिली भेट आणि तिथून त्यांच्यात दृढ होत जाणारे नाते…वाचताना शहारून जायला होतं. जना ते संत जनाबाई हा प्रवास, त्यात जनाबाईंनी रचलेले अभंग, ज्ञानदेवादि भावंडांचा सहवास आणि मुख्य म्हणजे नामदेव आणि जनाबाई यांचे नाते… गुरू शिष्य ऐसी l जोडी कौतुकाची l जनी नामयाची l संतांमधे ll याबद्दल पुस्तकात आलेले उल्लेख मन लावून वाचण्यासारखे आहेत. विठ्ठलाच्या चरणी झालेला जनाबाईंच्या जीवनाचा शेवट म्हणजे तर 🙏 वृंदा कोमेजली l स्तब्ध वारा पाणी l ओघळले मणी l मंजिऱ्यांचे ll थरारली वीट l कंप राऊळाला l श्वास ओलावला l क्षणभर ll आज नाही घाई l विठोबाला काही l जनाईच येई l चरणाशी ll शांता शेळके यांनी अनुवाद केलेलं `चौघीजणी` जसं मनात कायमचं घर करुन बसलं आहे, त्या जोडीला आता `ओंकाराची रेख जना` हे ही अत्यंत आवडीचं झालं आहे. यापूर्वी संत साहित्य किंवा संतांवर लिहिलेलं साहित्य फारसं वाचलं नव्हतं. लताजी किंवा भीमसेनजींमुळे घराघरात पोहोचलेले अभंग तेवढे माहीत होते. त्यामुळं जनाबाईंवर लिहिलेल्या या पुस्तकाबाबत उत्सुकता होतीच. पहिल्या प्रकरणाच्या अगदी पहिल्या ओळीपासून या पुस्तकाशी जी बांधली गेले ते शेवटपर्यंत. पुस्तकातील सगळं वर्णन अगदी बारीक सारीक तपशील देऊन पुढं जात राहतं आणि त्यात आपल्याला गुंतवून ठेवतं. सुरुवातीची काही प्रकरणं तर डोळ्यात अश्रुंच्या धारा घेऊन, पुसट अक्षरं समोर ठेऊन वाचावी लागतात. प्रसंग सगळे l तपशिलासवे l डोळ्यात आसवे l वाचुनिया ll भाषा ही साजिरी l सत्य हेच वाटे l प्रसंग तो घडे l आसपास ll एकूणच पुस्तकातलं वर्णन इतकं जिवंत आहे की सगळे प्रसंग आपल्या आसपास घडताहेत असंच वाटत राहतं कायम. दमा - कुरुंडचं दुर्दैवी आयुष्य, पोटी मूल नसल्याचं त्यांचं दुःख, विठ्ठलाला त्यासाठी साकडं घालण्यासाठी त्यांनी केलेला पंढरपूरचा प्रवास असो किंवा जनाबाईंच्या खोलीत येऊन विठ्ठलाने त्यांच्याशी मारलेल्या गप्पा, त्यांना कामात केलेली मदत…. सगळे अगदी सगळे प्रसंग आपणच जगतोय असं वाटावेत इतके मनाला भिडून जातात. काही ठिकाणं तर अशी… `अरे विठ्ठला, गडबडीत भलतंच काय उचलतोस. तुझा रत्नहार आणि शेला तर घेऊन जा`...असं आपणच विठ्ठलाला हाक मारून सांगावं असं वाटायला लागतं वाचताना. भाषा, वर्णनशैली फार साजिरी आहे. पुस्तकातला `साजिरी` हा शब्द एकदम आवडून गेलाय. एखादा चेहरा पाहिल्यावर कसं आपल्याला कळून जातं ना की, ही व्यक्ती मायाळू आहे किंवा तुसडी आहे वगैरे…तसं पुस्तकाच्या सुरुवातीलाच यातल्या भाषेबद्दल आपुलकी, प्रेम वाटायला लागतं. भाषा साधी पण सुंदर, शब्दांचा वापर असा की यापेक्षा वेगळा शब्द इथं शोभला नसता असं वाटायला लागेल असा. अनवाणी पायाला चटके बसावेत इतकं हवामान अजून बदललं नव्हतं…यासाठी `अजून मातीने माया सोडली नव्हती`... किती सुरेख वाक्य आहे ना! अशी कितीतरी वाक्य आपल्याला त्यांच्या प्रेमात पाडायला लावणारी यात सापडतील. एकूणच सांगायचं झालं तर पुस्तक अप्रतिम आणि सगळ्यांनी आवर्जून वाचावं असंच आहे. एकाच लेखकाची पुस्तकं सलग एका मागोमाग एक अशी माझ्याकडून वाचली जात नाहीत. पण आता खुणावतंय ते… `जोहार मायबाप जोहार`. ...Read more