* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: NOSTRADEMASCHI BHAVISHYAVANI
  • Availability : Available
  • ISBN : 9788177664126
  • Edition : 6
  • Publishing Year : AUGUST 2003
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 136
  • Language : MARATHI
  • Category : REFERENCE AND GENERAL
  • Available in Combos :SURESHCHANDRA NADKARNI COMBO SET- 4 BOOKS
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
THE WOMAN WHO WAS NO MORE HAVING THE RULING POWER WILL COME INTO POWER ONCE AGAIN. HER ENEMIES WILL CONSPIRE AGAINST HER; SHE WILL BE KILLED AT THE AGE OF 67...THE GREAT PILOT WILL GAIN ULTIMATE POWER...HE WILL BE VERY SUCCESSFUL...AFTER 7 YEARS HE WILL HAVE TO FACE REBELLION AGAINST HIM... VENICE CITY WILL BE FLOODED BY SORROW...THESE WERE NOSTRADAMUS` PREDICTION ABOUT INDIA 400 YEARS BACK WHICH CAME INTO REALITY... WHAT WILL HAPPEN IN FUTURE? THE GREAT LEADER BORN IN THE COUNTRY SURROUNDED BY OCEAN ON ALL THREE SIDES WILL RISE ONE DAY LIKE A STORM, HE WILL DECLARE THURSDAY AS A WEEKLY OFF...READ IN THIS BOOK THE EXCITING ASTROLOGICAL PREDICTIONS ABOUT THE WORLD AS WELL AS INDIA.
‘‘ती सत्ताहीन झालेली स्त्री अधिकच जोमाने पुन्हा सत्तेवर येईल ...तिचे शत्रू गुप्त कारस्थान रचतील... ...सत्तरीला तीन वर्षे कमी असताना तिचा मृत्यू घडवून आणला जाईल...’’ ‘‘तो थोर पायलट मोठ्या पदावर येईल... विलक्षण विजय मिळवील.... सात वर्षांनी त्याच्याविरुद्ध विद्रोह होईल... व्हेनिस नगरी दु:खात बुडून जाईल...’’ नॉस्त्रादेमसची भारताविषयीची ही भविष्यवाणी... चारशे वर्षांपूर्वी लिहून ठेवलेली.... तंतोतंत खरी ठरलेली.... आणि भावी काळात काय घडेल? ‘‘तीन बाजूंनी समुद्रांनी वेढलेल्या देशातील महान नेता वादळाप्रमाणे येईल... गुरुवार हा त्याचा सुटीचा दिवस असेल....’’ जगाबरोबरच भारताबद्दलही नॉस्त्रादेमसने वर्तविलेल्या भाकीतांची थक्क करणारी विलक्षण रोमहर्षक अशी नॉस्त्रादेमसची भविष्यवाणी.
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
#MARATHIBOOKS#ONLINEMARATHIBOOKS#TRANSLATEDMARATHIBOOKS#TBC#TRANSLATEDBOOKS@50% #NOSTRADEMASCHI #BHAVISHYAVANI #NOSTRADEMASCHIBHAVISHYAVANI #नॉस्रादेमसचीभविष्यवाणी #REFERENCEANDGENERAL #MARATHI #SURESHCHANDRANADKARNI #सुरेशचंद्रनाडकर्णी
Customer Reviews
  • Rating StarSahitya Sudha

    ‘‘ती सत्ताहीन झालेली स्त्री अधिकच जोमाने पुन्हा सत्तेवर येईल ...तिचे शत्रू गुप्त कारस्थान रचतील. ...सत्तरीला तीन वर्षे कमी असताना तिचा मृत्यू घडवून आणला जाईल...’’‘‘तो थोर पायलट मोठ्या पदावर येईल...विलक्षण विजय मिळवील....सात वर्षांनी त्याच्याविरुदध विद्रोह होईल...व्हेनिस नगरी दु:खात बुडून जाईल...’’नॉस्त्रादेमसची भारताविषयीची ही भविष्यवाणी..चारशे वर्षांपूर्वी लिहून ठेवलेली....तंतोतंत खरी ठरलेली...आणि भावी काळात काय घडेल? ‘‘तीन बाजूंनी समुद्रांनी वेढलेल्या देशातील महान नेता वादळाप्रमाणे येईल...गुरुवार हा त्याचा सुटीचा दिवस असेल....’’जगाबरोबरच भारताबद्दलही नॉस्त्रादेमसने वर्तविलेल्या भाकीतांची थक्क करणारी विलक्षण रोमहर्षक अशी नॉस्त्रादेमसची भविष्यवाणी. ...Read more

  • Rating StarAshutosh Kamble

    नॉस्त्रादेमसची भविष्यवाणी` वाचुन पुर्ण! नॉस्त्रादेमस हा जगातील महान भविष्यवेत्ता मानला जातो. त्याच्या `सेंच्युरीज` या पुस्तकाच्या अब्जावधी प्रती विकल्या गेल्या आहेत, अजुनही विकल्या जात आहेत! या पुस्तकात नॉस्त्रादेमसने बर्याच भविष्यवाण्या लिहून ठेवले्या आहेत, ज्यातील काही भविष्यवाण्या घडूनही गेल्या आहेत! पण या भविष्यवाण्या गद्यमय नसुन पद्यमय आहेत. ज्यामुळे त्यांचा अचुक अर्थ लावणे हे मोठे जिकीरीचे काम आहे. शिवाय काही अपवाद सोडला तर बाकीच्या ओळींमधे ज्यांच्याबद्दल भविष्यवाणी केलीये त्यांचं सरळ सरळ नाव न सांगता त्यांच्या उल्लेख समर्पक विशेषणाने करतो. उदा.- जर्मनला वुल्फ (लांडगा), भारताला समुद्राच्या नावाचा देश(सिंधु-हिंदु-हिंदुस्तान),चीनला ड्रॅगन इ. मानवी भविष्यवाणी गद्यमय असते व ईश्वरी भविष्यवाणी पद्यमय असे म्हटले जाते. स्वतः नॉस्त्रादेमस कबुल करतो की त्याने लिहिलेल्या सर्व भविष्यवाणी ईश्वराने(नियतीने) सांगितलेल्या आहेत. त्याने त्या तशाच शब्दात लिहिलेल्या आहेत. मायकेल नॉस्त्रादेमस हा चित्रपट बघावा तश्या भविष्यवाणी बघत असे. त्यासाठी त्याला काही ठराविक क्रियाकर्म करावे लागे. याबद्दल त्याने `सेंच्युरीज` या पुस्तकात सुरुवातीसच सर्वकाही सांगितले आहे. त्याच्या काळात त्याने केलेल्या काही कटू भविष्यवाणींमुळे व त्या लोकांना प्रत्ययास आल्यामुळे त्याच्या जिवालाही धोका निर्माण झाला होता. लोक त्याच्यावर संशय घ्यायचे की नॉस्त्रादेमस काहीतरी काळी जादू करुन तोच हे सर्व घडवित आहे. परंतु इंग्लडच्या राणीने त्याला संरक्षण दिल्यामुळे त्याला कुणीच हातही लावु शकत नव्हता(या राणीने नॉस्त्रादेमसनी `सेंच्युरीज` या पुस्तकात वर्तवलेली स्वतःच्या पतीच्या मृत्युची भविष्यवाणी वाचली होती. तिने त्याबद्दल राजालाही सावधान करण्याचा प्रयत्न केला. पण राजाने ही गोष्ट हसण्यावारी नेली. परिणामी पुस्तकात वर्णन केल्याप्रमाणे तंतोतंत तसाच राजाचा मृत्यु झाला.) नेपोलियन बोनापार्ट आणि अडॉल्फ हिटलर यांच्याबद्दलतर त्यानी सर्वकाही चारशेवर्षापूर्वीच लिहून ठेवलंय. अगदी त्यांच्या जन्मापासुन तर ते मृत्युपर्यंत आणि ते ही त्यांच्या नावासकट! त्यांचा जन्म होण्याआधीच! हिटलरला त्याचा मृत्यु कसा होणार हे आधीच या पुस्तकामुळे कळले होते. पण नियती अटळ असते, त्याप्रमाणेच झालं. भारताबद्दलही नॉस्त्रादेमसनी काही भविष्यवाणी लिहिल्यात. पैकी त्यात झाशीची राणी लक्ष्मीबाईच्या मृत्युची भविष्यवाणी प्रत्ययास आलीये. अजुनएक भविष्यवाणी म्हणजे भारतात पाच नद्या असलेल्या राज्यात जन्माला येणारा महामानव! हा मानव भारताचा सर्वेसर्वा होईल आणि याच मानवामुळे तिसरे विश्व महायुद्ध समाप्त होईल! ह्याच्यामुळेच भारत जगात महासत्ता होईल आणि दहशतवाद समाप्त होईल! याच्यामुळेच जगात शांतता स्थापित होईल व जग या महामानवाच्या वक्तृत्वाचा दिवाना होईल! तिसर्या महायुद्धाच्याच बहुतेक भविष्यवाण्या नॉस्त्रादेमसच्या `सेंच्युरीज` या पुस्तकात आहेत. तिसरे महायुद्ध हे अघोषित महायुद्ध असेल! म्हणजे तिसरे महायुद्ध सुरु झालंय याचा कुणालाही थांगपत्ता लागणार नाही. जेव्हा लागेल तेव्हा पहिल्यापेक्षा जास्त भयंकर परिस्थिती निर्माण होईल! जगाचं खुप नुकसान होईल. पण जेव्हा हे महायुद्ध संपेल, तेव्हा जगातुन दहशतवादही संपेल! नॉस्त्रादेमसच्या मते जगातील चौथे आणि शेवटचे महायुद्ध हे तिसर्या महायुद्धानंतर कित्येक शतकानंतर, हजारो वर्षानंतर होईल! या महायुद्धामुळे पृथ्वी मानवांस राहण्यायोग्य असणार नाही. महायुद्ध संपल्यानंतरही सगळीकडे मृत्युचे थैमान असेल, रोगराई असेल! या महायुद्धामुळेच मानवाचा आणि पर्यायाने सर्व सजीवसृष्टीचा ऱ्हास्य होईल! वेल, या सर्व गोष्टींना अजुन अवकाश आहे. मायकेल नॉस्त्रादेमस या सर्वोत्तम भविष्यवेत्ता आणि महान द्रष्टाबद्दल असेच काही अजुन माहिती, किस्से `नॉस्त्रादेमसची भविष्यवाणी` या मराठी पुस्तकात वाचायला मिळेल. स्वतःचा मृत्यु केव्हा असेल व मृत्युनंतर पंचवीस- पन्नास वर्षानंतर त्याच्या प्रेतासोबत काय होईल याची आधीच जाणीव असलेला व आपल्या या भविष्यवाणींचा कुणी दुष्ट हेतूने वापर करु नये म्हणुन खबरदारी घेणारा मायकेल नॉस्त्रादेमस हे अजब रसायन एकदा अनुभवून पहाच ...Read more

  • Rating StarKiran Borkar

    जगातील प्रसिद्ध थोर ज्योतिषी ,डॉक्टर म्हणून नॉस्ट्रदिमस प्रसिद्ध आहे . त्याने अनेक भविष्य वर्तवली. ती बहुतेक चतुस्पदी मांडली आहेत. त्यावरून काही उत्पाद होऊ नये म्हणून ती गूढ आणि सांकेतिक भाषेत लिहिली गेली आहेत.नॉस्ट्रदिमसने भारताबद्दलही सुमारे चारशे र्षांपूर्वी काही भविष्य मांडली होती .त्यात पाकिस्तानची निर्मिती ,1857 चा उठाव ,इंदिरा गांधींचा काळ त्यांची हत्या ,राजीव गांधी यांची हत्या .भारत चीन युद्ध यांचा समावेश आहे . तसेच पाहिले महायुद्ध ,हिटलरचा उदय ,मुसोलिनीची हत्या ,हिरोशिमा ,नागासाकीवर अमेरिकेने टाकलेले अणुबाँब या विषयी ही भविष्य वर्तविले होते. लेखकांनी यातील काही भविष्य इथे चतुष्पदी मध्ये मांडले आहेत आणि त्याचा अर्थ ही सांगितला आहे . जगातील प्रमुख घटनांवर त्यांनी भर दिला आहे . ...Read more

  • Rating StarDAINIK SAMANA (KOLHAPUR) 28-09-2003

    ‘ज्योतिष हे शास्त्र आहे काय? यावर कुणाचे काहीही मत असो, पण या सर्वांसाठी नॉस्त्रादेमस मात्र एक न सुटणारं कोडंच बनून राहिला आहे. तो एक उत्तम गणिती, निष्णात खगोलशात्रज्ञ आणि वाचसिद्धी प्राप्त झालेला ज्योतिषी होता. त्याला अनेक गूढविद्यांचेही ज्ञान होते.तो भाषाप्रभूही होता. त्याला ग्रीक, लॅटिन, फ्रेंच, इटालियन या युरोपीयन भाषांबरोबर हिब्रू, अरेबिक आदी भाषाही अवगत होत्या. नॉस्त्रादेमसचा काळ १५०३ ते १५६६. त्या काळात धर्मसत्ता आणि राजसत्ता अतिशय प्रवळ होती. भ्रामक, पाखंडी कल्पनांचा समाजावर पगडा होता. त्यावर उपाय म्हणून नॉ़स्त्रादेमसने ते फ्रेंच राजघराण्यालाच अपर्णन केले. नॉस्त्रादेमसकालीन जगाची कल्पना भूगोल, तत्कालीन नाव ग्रीक पुराणातील संदर्भ यामुळे नॉस्त्रादेमस नक्की कुणाबद्दल व काय भाकीत करतोय हे समजणे एकंदरीतच कठीण. नॉस्त्रादेमसने तसे एके ठिकाणी म्हटलंही आहे. या चतुष्पदींचा अर्थ विद्वानांनी लावावा! अर्थात तसा तो लावण्याचा, आपापल्यापरीने त्याची उकल करण्याचा प्रयत्न अनेकांनी केला. डॉ. सुरेशचंद्र नाडकर्णींनी असाच एक प्रयत्न दै लोकसत्तामध्ये ‘नॉस्त्रादेमसची भविष्यवाणी’ या शीर्षकाने स्तंभलेखन करून केला. त्या स्तंभलेखनातील काही भागांचे संकलन म्हणजे सदरचे पुस्तक. नॉस्त्रादेमसने अनेक ठिकाणी चतुष्पदी उलगडण्यासाठी खगोलशास्त्रीय ग्रहगणिताची सूचना दिली आहे. चतुष्पदी रचताना प्रत्येक शब्द अत्यंत विचारपूर्वक योजला आहे. अनेक शहरांचा व स्थळांचा त्याने स्पष्ट उल्लेख केला आहे; व्यक्ती आणि घटनांबाबत त्याने सुरेख रूपके उपयोगात आणली आहेत. चिनी लोकांच्या संदर्भात ड्रॅगन, हिंदुस्थानसंबंधी लिहिताना समुद्राचे नाव असलेल्या धर्माचा देश ‘सिंधू-हिंदू-हिंदूस्थान’ वगैरे प्रतीके वापरून त्याने भविष्य कथन केले आहे. हे सारं त्याने लेखनाची गूढरत्यता वाढावी म्हणून केलेले नसून तत्कालीन राज्यव्यवस्था तसेच धर्मव्यवस्था डोळ्यासमोर ठेवून केलेले आहे. तसे त्याने आपल्या मुलाला लिहिलेल्या पात्रात स्पष्ट कबूल केले आहे. जगाच्या भवितव्याबाबत भविष्य कथन करणारी प्रत्येकी शंभर चतुष्पदी असलेली एकूण बारा शतके रचण्याचा नॉस्त्रादेमसचा मानस असावा; परंतु काही कारणामुळे तो सिद्धीस गेला नसावा. एकूण संकल्पित लिखाण पूर्ण घेण्यापूर्वीच त्याची इहलोकीचा यात्रा संपुष्टात आली. या बारा शतकांपैकी सातव्या शतकात फक्त बेचाळीस चतुष्पदी आहेत. अकराव्या शतकात फक्त दोन आणि बाराव्या शतकात फक्त अकरा चतुष्पदी आहेत. इतर सर्व शतके पूर्ण शंभर चतुष्पदीची आहेत. बहुतेक पुस्तकातून फक्त दहाच शतके छापलेली आढळतात. वास्तविक ग्रंथाचे मूळ नाव ‘प्रोफेटिक्स द मायकेल नॉस्त्रादेमस’ पण ते मागे पडून ‘सेंच्युरीज’ याच नावाने तो रूढ झाल्या. फ्रेंच राज्यक्रांतीबद्दल नॉस्त्रादेमस लिहितो - ‘‘लढाईपूर्वीच त्या भल्यामोठ्या (तुरुंगाच्या भिंतीवर) कब्जा केला जाईल. राजाचा अकस्मात वध केला जाईल. सारेच अतिशय दु:खद खेदजनक अनेक रक्षक मारले जातील. अन् (सीन) नदीच्या परिसरातील भूमी रक्ताने न्हाऊन निघेल.’’ याव्यतिरिक्त राजा दुसरा हेन्रीचा मृत्यू, नेपोलियन, पहिले महायुद्ध, हिटलर-मुसोलिनी, दुसरे महायुद्ध, हिरोशिमा-नागासाकीवरील बॉम्बहल्ले, इस्त्रायलची निर्मिती, इराणमधील क्रांती आदी जागतिक घडामोंडीवरही नास्त्रादेमसने भाकीत केले होते. डायनाचा दुर्दैवी मृत्यू, अमेरिकेतील वर्ल्ड ट्रेड सेंटरवरील हल्ला, अमेरिका-इराक युद्ध, अमेरिका अफगाणिस्तान युद्ध, रशियाचे विभाजन या घटनांचेही भाकीत नॉस्त्रादेमसने आपल्या चतुष्पदी केले आहे. तो म्हणतो. ‘‘ती सत्ताहीन झालेली स्त्री. अधिकच जोमाने पुन्हा सत्तेवर येईल. तिचे शत्रू गुप्त कारस्थान रचतील. सत्तरीला तीन वर्षे कमी असताना तिचा मृत्यू घडवून आणला जाईल.’’ लेखकाच्या मते ही चतुष्पदी माजी दिवंगत पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्याशी बरेचसे साधर्म्य बाळगणारी आहे. याव्यतिरिक्त १८५७चे स्वातंत्र्यसमर, झाशीची राणी, बहादूर शहर जफर, सुभाषचंद्र बोस, हिंदुस्थानची स्वातंत्र्यप्राप्ती, चीनचे आक्रमण, राजीव गांधी वगैरे घटनांचाही नॉस्त्रादेमसच्या दिव्यचक्षूंना सुगावा लागला होता असे स्पष्ट प्रतिपादन लेखक करतो. नॉस्त्रादेमसच्या महानिर्वाणाला १९६६ साली चारशे वर्षे पूर्ण झाली. या चारशे वर्षांत त्याने कथन केलेली सुमारे साडेतीनशे भाकिते तंतोतंत प्रत्ययाला आल्याचे म्हटले जाते. उर्वरित साडेचारशे चतुष्पदी प्रत्ययाला यायच्या आहेत. तिसरे महायुद्ध, इस्त्रायल-इजिप्तचे भवितव्य, जैविक युद्ध, महायुद्धाचा शेवट, सात चांद्रचक्रांपैकी सातवे चांद्रचक्र, चौथे महायुद्ध, पृथ्वीचे भवितव्य वगैरे बऱ्याच जागतिक स्तरांवरील घडामोडींची सदर पुस्तकात उकल केली गेली आहे. तथापि विशेष उल्लेख करण्यासारखी, गोष्ट म्हणजे नॉस्त्रादेमसच्या पहिल्या शतकातील ७६व्या क्रमांकाची चतुष्पदी. ‘‘तीन बाजूंनी समुद्रांनी वेढलेल्या देशातील महान नेता वादळाप्रमाणे येईल... गुरुवार हा त्याचा सुटीचा दिवस असेल.’’ या चतुष्पदीबद्दल लेख म्हणतो चतुष्पदी हिंदुस्थानला बऱ्याच अंशी लागू पडणारी अशीच आहे. इतकेच नव्हे ती हिंदुस्थानासंदर्भातच रचली असावी. नॉस्त्रदेमसने सांगिलेल्या एकूण साडेआठशे भाकितांपैकी सत्य म्हणून प्रत्ययास आलेली भाकिते पाहता उर्वरित भाकितेही बऱ्याच अंशी खरी ठरावीत. तिसरे महायुद्ध होईल की नाही? चौथे महायुद्ध केव्हा होईल? जगाचा अंत केव्हा असेल? या व इतरही अनेका प्रश्नांनी उकल आपल्याला सदर पुस्तकातून मिळू शकेल. लेखकाने तशी ती करण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला आहे. -नी. तु. भोसले ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

HATUMUTUCHA CHANDRA
HATUMUTUCHA CHANDRA by FARUK KAZI Rating Star
परेश जयश्री मनोहर

मराठी बालसाहित्याचा गेल्या काही दशकांचा अवकाश हा सातत्याने प्रबोधनपर, उद्बोधनपर आणि कोणत्याही कथेच्या शेवटी एका वाक्यात तात्पर्य सांगणाऱ्या बाळबोधकथांचा राहिलेला आहे. या बाल साहित्यामध्ये प्रामुख्याने येणारे पात्र ही मध्यमवर्गीय, उच्च जातीय मराठी घरतील मुलं मुली असतात आणि जेव्हा केव्हा वंचित समाजातील, शोषित समाजातील, गरीब ग्रामीण घरातील मुलांचे चित्रण येतं तेव्हा ते अति दुःखी आणि बिचारे, ज्यांना मदतीची गरज आहे आणि अशी मदत करण्याची जबाबदारी मोठ्या घरातील उच्चवर्णीय, उच्चवर्गीय नायक मुला मुलींची असते. त्यातूनही प्रामुख्याने काय करावे काय करू नये किंवा तत्सम उपदेशच प्रामुख्याने कथेच्या शेवटी केलेले दिसतात. आणि हा लेखक वर्ग ही प्रामुख्याने पुणे मुंबई भागात स्थिरावलेला राहणारा तिथल्या अनुभूती आणि तिथल्या जगण्याचा अवकाश सोबत घेऊन येणारा असतो. अशा सगळ्या पार्श्वभूमीवरती सोलापूर जिल्ह्यातल्या सांगोला तालुक्यात अनकढाळ सारख्या एका छोट्या गावात राहणारा फारुक काझी हा लेखक जेव्हा गेलं दशकभर कवितांमधून, कथांमधून बालविश्व चितारण्याचा प्रयत्न करतो तेव्हा ते जास्त करून ग्रामीण भागातील मातीशी जोडलेलं असतं. आपल्या भोवतालच्या खऱ्याखुऱ्या मुलांमुलींच्या भावविश्वाच्या जवळ जाणारं चित्रण त्याच्या कथांमधून आपण सातत्याने बघत असतो. त्याचे "शिकण्याच्या वाटेवरील आनंदवन" हे पहिले पुस्तक एका प्रयोगशील शिक्षकाच्या शाळेतील अनुभवांवर आधारलेले आहे. त्यांचे आजवर मित्र, प्रिय अब्बू, चुटकीचे जग हे कथासंग्रह प्रकाशित झालेले आहेत. या सगळ्याच पुस्तकातून त्याने सातत्याने ग्रामीण, निमशहरी भागातील कनिष्ठ मध्यमवर्गीय आणि गरीब कुटुंबातील बहुजन आणि वंचित घटकातील, मुस्लिम कुटुंबातील मुलांच्या नजरेने दिसणाऱ्या गोष्टी टिपण्याचा प्रयत्न केलेला आहे. यात कुठेही गरिबीचे गोडवे नाहीत की काठोकाठ पसरलेलं बिचारेपण नाही. तर या आर्थिक दृष्ट्या नागवलेल्या लोकांच्या घरातील मुलांच्या कथा आहेत, ज्यात प्रेम, उत्सुकता, जिद्द, समजून घेणे आणि अनुभवातून आलेलं शहाणपण हे प्रामुख्याने जाणवते. अभावग्रस्तता, एखाद्या गोष्टीचे नसणे, तरीही नातेसंबंधांवरील विश्वास, प्रेम आणि एकमेकांबद्दलचा आदर, काळजी घेऊन जपणारी कुटुंबं फारुकच्या लिखाणात सातत्याने येत राहतात. त्याचा आत्ता आलेला हाटूमुटूचा चंद्र हा एक अफलातून कथासंग्रह आहे. यामध्ये फारुकने वेगवेगळे प्रयोग केलेले आहेत जे त्याच्या नेहेमीच्या लेखन शैलीपेक्षा जरा वेगळ्या अंगाने जाणारे आहेत आणि ते उत्तम जमून आलेले आहेत. या दहा कथांमधल्या पहिल्या तीन कथा या मुलांच्या नजरेतून होणारा पर्यावरण विनाश, निसर्गाची भाषा समजून घेण्याचा मुलांचा प्रयत्न आणि नुसते समजून घेणे नाही तर मुलानी आपले हे जग आपण नीट ठेवण्यासाठी केलेले प्रयत्न असे ही आहे. यात आनंद शोधण्याचे मार्ग, जबाबदारीचे असणारे भान आणि काल्पनिक ग्रहाची भेट करवून आणणारी समायरा आपल्याला भेटते, तर मोकळ्या हवेत असणारा आनंद भरुन कसा घेणार असा प्रश्न विचारणारा अर्पित ही भेटतो आणि तसेच टेकडी स्वच्छ करण्यासाठी न थकता प्रयत्न करणारे ओजस आणि रेहान ही भेटतात. लहानपणी न कळत्या वयात चिंचेवरच्या माकडाला तोटा फेकून मारणारा आणि त्या माराची मनावर झालेली जखम मोठा झाल्यावरही मनावर कोरलेला योगेश, आपल्या लाडक्या लहानग्या मैत्रिणीसाठी व्याकुळ होऊन रोज दारावर धडका देणारे शाहताब अस्वल आपल्याला अस्वस्थ करुन जातात. एका कथेत तर चक्क सायकल ही कथेची नायिका आहे आणि तिच्या सुखाच्या आणि नाराज होण्याच्या अनुभवातून आपणही तिच्यासोबत प्रवास करतो. इथे आपण बाबांच्या अपघाताने अस्वस्थ असणाऱ्या सारंगा सोबत त्या दवाखान्याच्या बाहेर येरझारा घालत असतो आणि अमृताच्या मैतरासोबत मेंढक्या बनून रानावनात चालत असतो. गावात फिरताना, गावाला पडणारं हिरवं स्वप्न अनुभवणारा मंदार आपल्या भेटतो आणि सोबतच गावात राहणारी आणि तुमच्या शहरालाही स्वप्न पडतच असेल की रे? काय असेल ते स्वप्नं? असा प्रश्न विचारणारी चंदा हाच प्रश्न आपल्यालाही विचारते असा भास आपल्याला होतोच होती. शाळेच्या ट्रीपला जायला हजार रुपये नाहीत म्हणून रुसलेल्या साक्षीला बघताना आपणही आपल्या लहानपणी अशा बुडालेल्या शाळेच्या सहली, आणि त्यावेळी आपल्या आईबाबांनी आपल्याला काय सांगितलं होतं आणि कशी आपली समजूत काढलेली हे आठवून आपलेही डोळे ओलसर होताना अनुभवतो. पण याही कथेत निंबोणीच्या पानांमधून दिसणारा, भासणारा तो चंद्र जो हाटूमुटूचा आहे पण त्याला बघून होणारा आनंद मात्र अस्सल आणि खराखुरा आहे. या सगळ्या कथांमधून फारुक ने आजच्या मुलामुलींना आपल्यासमोर उभं केलं आहे, त्यांचे प्रश्न, त्यांच्या विचार करण्याच्या पद्धती आणि त्याचं अस्वस्थ असणं अगदी नेमकेपणाने आपल्यासमोर येतं. ही मुलं कोणत्याही एका शहरातली, एका भागातली किंवा एकसारख्या घरातली नाहीत पण त्यांचे जगणे हे आजच्या मुलांचे जगणे आहे. फक्त एक प्रश्न मनाला पडतो की आपल्या भोवतालच्या प्रश्नांनी, आपल्या गरिबीने किंवा अभावाने काळवंडलेली मुलं जेव्हा समजूतदारपणे स्वतः शहाणे बनत पुढे निघतात तेव्हा, ही सगळं कोणामुळे, आणि माझ्याच वाट्याला का? याचे जबाबदार कोण असा एखादा प्रश्न एकाही मुलाला पडू नये याची काळजी वाटते. येत्या काळात फारुक च्या कथांतील ही मुलं तुम्हाला मला हे प्रश्न विचारतील याची खात्री आहे आणि मी त्या दिवसाची वाट ही बघतो आहेच. या पुस्तकातील चित्रांचा विशेष उल्लेख करणे फारच महत्वाचे आहे. चंद्रमोहन कुलकर्णी ज्या ताकदीने कथेची भावना नेमक्या कुंचल्यात पकडतात ते बघताना आपण निव्वळ थक्क होतो. इतकी सुंदर आणि मनाला धरुन ठेवणारी चित्रं या पाना आपल्याला भेटत राहतात. इतक्या ताकदींच्या कथांचे पुस्तक मेहता प्रकाशनाने अत्यंत प्रेमाने आणि उत्तम निर्मितीमूल्य जपत काढलेले आहे. आज आपला भोवताल इतका जातधर्म, पर्यावरणीय नाश आणि भविष्याच्या चिंतांनी कुरतडलेला असताना अशा खऱ्याखुऱ्या मुलांच्या कथा आपल्यासमोर येणं हाच आपल्याला दिलासा देणारा आपला हाटूमुटूचा चंद्र आहे...हा असाच राहो... परेश जयश्री मनोहर ...Read more

HATUMUTUCHA CHANDRA
HATUMUTUCHA CHANDRA by FARUK KAZI Rating Star
बालाजी मदन इंगळे

संवेदनशीलतेने लिहिलेल्या तरल बालकथा : हाटुमुटूचा चंद्र मराठीमध्ये जाणीवपूर्वक आणि विचारपूर्वक बालसाहित्य लिहिणाऱ्यांची संख्या खूप कमी आहे. बालसाहित्य आणि बाल मानसशास्त्र यांचा विचार करून आपली प्रतिभा त्यासाठी वापरणाऱ्या मोजक्या बालसाहित्यिकांमध्य फारूक एस. काझी यांचे नाव समाविष्ट करावे लागेल. त्यांच्या नुकत्याच प्रकाशित झालेल्या मुलांसाठीच्या ‘हाटूमुटूचा चंद्र’ या कथासंग्रहातून ही बाब ठळकपणे अधोरेखित होते. कथा म्हणजे केवळ प्रसंगानंतर प्रसंग किंवा घटनेनंतर घटना मांडणे नसते. त्यामध्ये लेखकाच्या प्रतिभेने वास्तव आणि कल्पना यांचा सुरेख संगम घडवून आणावा लागतो. कुठलीही कथा लेखकाला त्याच्या अनुभव विश्वातूनच सापडलेली असते. पण ते अनुभव विश्व मांडत असताना त्यात आपल्या प्रतिभेने काही साहित्य गुण समाविष्ट करावे लागतात. तेव्हा ती कथा साहित्यिकदृष्ट्या अभिजात व साहित्य गुणांनी युक्त अशी कथा होते. या संग्रहातील कथांमध्ये अशा साहित्यिक प्रतिभांच्या बऱ्याच जागा आहेत. आणि म्हणूनच फारूक एस. काझी यांच्या कथा रोजच्या जगण्यातीलच असल्या तरी त्यातील साहित्य गुणांमुळे या कथा आपले वेगळेपण सिद्ध करतात. कथेमध्येही काव्यात्मकता असते. प्रतिकात्मकता असते. आणि त्यामुळेच ती कथा वैश्विक ठरत असते. हे सर्व गुण ‘हाटुमूटुचा चंद्र’ मधील कथांमध्ये आढळून येतात. म्हणून ही कथा महत्त्वाची आहे. अद्भुतरम्यता, काल्पनिकता आणि धक्का तंत्र याने लिहिलेल्या कथा नेहमीच मुलांना आवडतील असे नाही. आपल्याच अवतीभवती घडणाऱ्या घटना इतक्या सुंदर असू शकतात हे मुलांना वाचायला आवडते. नेमके तेच या कथांमध्ये आहे. या बालकथा या मातीतल्या आहेत. या संस्कृतीतल्या आहेत. म्हणून त्या महत्त्वाच्या आहेत. या संग्रहात एकूण दहा कथा आहेत. सर्वच कथा सुंदर आणि हृदयस्पर्शी आहेत. ‘फिकर नॉट’ या कथेमध्ये दोन मित्रांचे काही प्रसंग आहेत. रेहान आणि त्याचा मित्र अर्पित. दोघे एका टेकडीवर जातात. रेहानसाठी टेकडीवरील अनुभव नवीन असतो. दोघे खूप गप्पा मारतात. तळ्यात पाय सोडून बसतात. तिथे बसल्यानंतर त्या तळ्यातील काही मासे आपण बाटलीत घेऊन जावे असे रेहानला वाटते. पण अर्पित त्याला सांगतो की आपण या टेकडीवरून काय घेऊन जायला हवं तर या टेकडीवरील वातावरण, टेकडीवरील दृश्य, इथे आपण घेतलेला आनंद हे सगळे मनात भरून घेऊन जायला हवे. असं मुक्या प्राण्यांना त्रास द्यायचा नाही, हे नकळतपणे तो रेहानला सांगतो. रेहानलाही ते पटतं आणि मग तो खोल श्वास घेऊन इथल्या सगळ्या आनंदाच्या आठवणी मनात भरून घेतो. आणि निघतो. एखादा कोणी अन्य बालकथा लेखक असता तर या दोघांचं बोलणं, टेकड्यावरील वर्णन, दोघांनी केलेली मज्जा, त्यांनी केलेल्या गमती याचे वर्णन करून कथा संपवली असती पण फारूक काझी यांनी इथून काय घेऊन जायचं? हे लिहून जे एक नवीन वळण कथेला दिलेले आहे, इथेच या कथेतील साहित्यगुणाची जागा आहे. तिथेच कथा लेखक म्हणून फारूक काझी यांची प्रतिभा आपल्याला दिसून येते. आणि बालसाहित्यिक म्हणून त्यांचं वेगळेपणही इथेच आपल्याला दिसतं. ‘कर के देखो’ या कथेमध्ये ट्रेकला गेलेली मुले स्वच्छता दूत कशी बनतात हे मुळातून वाचण्यासारखे आहे. ‘जखम’ या कथेमध्ये इयत्ता तिसरीत शिकत असताना एका माकडीनीला आपण इजा पोहोचवल्याचं मोठं झाल्यावर कथेतील नायकाला आठवतं. आणि तो मोठा असूनही लहानांसारखं रडत रडत ती चूक आपल्या आईकडे कबूल करतो. ही कथा वाचताना पाषाणहृदयी माणूसही भावनिक होऊन जातो. कडूनिंबाच्या झाडाचे खाली पडलेले पान चंद्राची प्रतिमा म्हणून म्हणजेच हाटुमूटुचा चंद्र म्हणून कथेत वापरणे. आणि तो चंद्र कथेतील साक्षीच्या चेहऱ्यावर आनंदाचे प्रतिक म्हणून येणे. आणि त्याद्वारे सहलीला जाण्यासाठी पैसे न मिळाल्याच्या दुःखातून स्वतःला सावरणे ही सगळीच मांडणी भन्नाट झाली आहे. अशा भरपूर जागा या पुस्तकांमध्ये आहेत. ‘हिरवं सपान’ या कथेमध्ये शहरातला मंदार गावाकडे येतो. आणि गावातील चंदा सोबत शेत-शिवारात फिरतो. या शेत-शिवारातील भरपूर झाडे पाहून बी, रोपटं, मग त्याचं झाड ही क्रिया किती महत्त्वाची आहे. आणि या क्रियेचं स्वप्न नेहमीच गावाला पडतं. तसंच हिरवं स्वप्न शहराला का पडत नाही? हा प्रश्न खरंतर लहान-मोठ्या प्रत्येक वाचकाला अस्वस्थ करून जातो. ‘स्वप्न’ ही आणखी एक सुंदर कथा या संग्रहामध्ये आहे. माणसाला अभावातूनच वस्तूंची किंमत कळत असते. ज्याच्याकडे सर्व काही आहे अशा मुलाकडे जेव्हा सायकल येते, तेव्हा तिची काळजी घेतली जात नाही. पण स्वप्नातही ज्याच्या कधी सायकल मिळेल असं वाटत नव्हतं अशा अंकितला जेव्हा सायकल मिळते, तेव्हा तो तिची किती काळजी घेतो आणि हेच त्या सायकलचे स्वप्न होते. आणि अंकितचेही तेच स्वप्न होते ही स्वप्नांची सरमिसळ वाचकांना खूपच आवडून जाते. ‘मैतर’ ही आणखीन एक अनोळखी नातेसंबंध घट्ट करणारी कथा. फक्त काही दिवसांसाठी आलेल्या मेंढक्या काकाची आणि अमृत ची मैत्री होते. आणि ती मैत्री त्या दोघांमध्ये इतकी घट्ट होते की, मेंढक्या काका आपली मेंढरं घेऊन परत निघाल्यावर दोघांनाही एकमेकांचा निरोप घ्यावा असे वाटत नाही. निरोपावेळी दोघांच्याही डोळ्यात पाणी येते. दोघेही निरोपावेळी एकमेकांना भेटवस्तू देतात. हा प्रसंग लेखकाने स्थानिक संदर्भ, संस्कृती, भाषा आणि चित्रदर्शी स्वरूपात असा उभा केला आहे की, वाचक कथा संपली तरी त्या मेंढरांच्या कळपामध्ये आणि अमृतच्या घराच्या आसपासच घुटमळत राहतो. ‘जाऊ दे त्याला’ ही आणखीन एक भावस्पर्शी कथा. जंगली प्राण्यांनाही जीव लावला तर ते माणसांशी प्रेमाने वागतात हे सांगणारी ही कथा वाचकाच्या काळजाचा ठाव घेते. निधी आणि फॉरेस्ट ऑफिसर असलेले तिचे बाबा यांची ही कथा जंगलाच्या दुनियेत वाचकाला घेऊन जाते. पण तिथेही मानवी भावना कशी श्रेष्ठ ठरते हे अतिशय रंजक पद्धतीने लेखकाने लिहिले आहे. ‘बाबांची भाषा’ ही आणखी एक हृदयाला स्पर्श करणारी कथा! शाळेत शिकणारा सारंग अपघातात ऐकणं आणि बोलणं कायमचं गमावलेल्या आपल्या बाबांसाठी हातवाऱ्याची भाषा शिकून घेतो. हे जेव्हा वाचकाला कळतं तेव्हा वाचक जागच्याजागी स्थिर होऊन जातो. ‘एस पी १३’ ही आधुनिक तंत्रज्ञानात घेऊन जाणारी कथा! छोटीशी समायरा स्पेसशीप घेऊन एका नव्या प्लॅनेटवर जाते. आणि त्या नव्या प्लॅनेटवर असलेली माणसं कशी निसर्गाची काळजी घेतात हे पाहून समायरा तिथेच राहण्याचा निर्णय घेते. तेव्हा तिच्या सायंटिस्ट मामासह वाचक ही अचंबित होऊन जातात. निसर्ग आणि आधुनिक तंत्रज्ञान यांचा सुरेख आणि अफलातून संगम या कथेमध्ये लेखकाने घडवून आणला आहे. या पुस्तकाची महत्त्वाची बाजू म्हणजे यातील चित्रे! चंद्रमोहन कुलकर्णी यांची चित्रे या कथेला एक वेगळा आणि नवा आयाम देतात. ही चित्रे या कथेशी एवढी एकरूप झालेली आहेत की ही चित्रे वेगळी काढली तर या कथा अपूर्ण वाटतील! कथेला अनपेक्षित वळण देण्यामध्ये लेखक पटाईत आहेत. हे प्रत्येक कथेतून आपल्याला जाणवतं. आपण सरळ कथा वाचत जातो. आणि कथा देखील आता सरळ या वाटेने जाईल असे वाटत असताना ती कथा असं काही वळण घेते की वाजक स्तंभित होऊन जातो. आणि हीच खरे तर फारूक एस. काझी यांची खरी ताकद आहे. त्यांच्या सर्व कथांमधील पात्र आणि त्यांची नावे पाहिली तर ती विशिष्ट अशी पात्रे किंवा नावे नाहीत. तर सर्वसमावेशक अशी सर्व पात्रे आहेत. त्यामुळे किती तीव्र सामाजिक भान लेखकाला आहे हेही आपल्याला जाणवते. आजच्या सोशल मीडियाच्या काळात नातेसंबंध दूरावत असताना, नातेसंबंध दृढ करणाऱ्या या कथा प्रत्येक वाचकांपर्यंत पोहोचल्या पाहिजेत. या कथांमध्ये कल्पनाशक्ती आहे. वास्तवता आहे. पण याच्या जोडीला कथालेखक म्हणून जी एक संवेदनशीलता लागते, जी एक तरलता लागते आणि मुलांच्या कथांमध्ये जो एक हळुवारपणा आणि नाजूकता आवश्यक असते ते सगळे गुण या कथेमध्ये ओतप्रोत भरलेले आहेत. म्हणून या कथा फक्त लहानच नाही तर मोठ्यांनाही गुंतवून ठेवणाऱ्या आहेत. स्थळ आणि काळानुसार बदलणारी भाषा आणि प्रसंगानुसार बदलणारं वर्णन या कथेच्या जमेच्या बाजू आहेत. यामुळे या कथा वाचकाला पकडून ठेवतात. आणि काही एक सामाजिक भान आणि साहित्यिक जाण या कथा देतात. आणि हेच या कथेचे मोठे यश आहे. - बालाजी मदन इंगळे ...Read more