* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: NOSTRADEMASCHI BHAVISHYAVANI
  • Availability : Available
  • ISBN : 9788177664126
  • Edition : 6
  • Publishing Year : AUGUST 2003
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 136
  • Language : MARATHI
  • Category : REFERENCE AND GENERAL
  • Available in Combos :SURESHCHANDRA NADKARNI COMBO SET- 4 BOOKS
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
THE WOMAN WHO WAS NO MORE HAVING THE RULING POWER WILL COME INTO POWER ONCE AGAIN. HER ENEMIES WILL CONSPIRE AGAINST HER; SHE WILL BE KILLED AT THE AGE OF 67...THE GREAT PILOT WILL GAIN ULTIMATE POWER...HE WILL BE VERY SUCCESSFUL...AFTER 7 YEARS HE WILL HAVE TO FACE REBELLION AGAINST HIM... VENICE CITY WILL BE FLOODED BY SORROW...THESE WERE NOSTRADAMUS` PREDICTION ABOUT INDIA 400 YEARS BACK WHICH CAME INTO REALITY... WHAT WILL HAPPEN IN FUTURE? THE GREAT LEADER BORN IN THE COUNTRY SURROUNDED BY OCEAN ON ALL THREE SIDES WILL RISE ONE DAY LIKE A STORM, HE WILL DECLARE THURSDAY AS A WEEKLY OFF...READ IN THIS BOOK THE EXCITING ASTROLOGICAL PREDICTIONS ABOUT THE WORLD AS WELL AS INDIA.
‘‘ती सत्ताहीन झालेली स्त्री अधिकच जोमाने पुन्हा सत्तेवर येईल ...तिचे शत्रू गुप्त कारस्थान रचतील... ...सत्तरीला तीन वर्षे कमी असताना तिचा मृत्यू घडवून आणला जाईल...’’ ‘‘तो थोर पायलट मोठ्या पदावर येईल... विलक्षण विजय मिळवील.... सात वर्षांनी त्याच्याविरुद्ध विद्रोह होईल... व्हेनिस नगरी दु:खात बुडून जाईल...’’ नॉस्त्रादेमसची भारताविषयीची ही भविष्यवाणी... चारशे वर्षांपूर्वी लिहून ठेवलेली.... तंतोतंत खरी ठरलेली.... आणि भावी काळात काय घडेल? ‘‘तीन बाजूंनी समुद्रांनी वेढलेल्या देशातील महान नेता वादळाप्रमाणे येईल... गुरुवार हा त्याचा सुटीचा दिवस असेल....’’ जगाबरोबरच भारताबद्दलही नॉस्त्रादेमसने वर्तविलेल्या भाकीतांची थक्क करणारी विलक्षण रोमहर्षक अशी नॉस्त्रादेमसची भविष्यवाणी.
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
#MARATHIBOOKS#ONLINEMARATHIBOOKS#TRANSLATEDMARATHIBOOKS#TBC#TRANSLATEDBOOKS@50% #NOSTRADEMASCHI #BHAVISHYAVANI #NOSTRADEMASCHIBHAVISHYAVANI #नॉस्रादेमसचीभविष्यवाणी #REFERENCEANDGENERAL #MARATHI #SURESHCHANDRANADKARNI #सुरेशचंद्रनाडकर्णी
Customer Reviews
  • Rating StarSahitya Sudha

    ‘‘ती सत्ताहीन झालेली स्त्री अधिकच जोमाने पुन्हा सत्तेवर येईल ...तिचे शत्रू गुप्त कारस्थान रचतील. ...सत्तरीला तीन वर्षे कमी असताना तिचा मृत्यू घडवून आणला जाईल...’’‘‘तो थोर पायलट मोठ्या पदावर येईल...विलक्षण विजय मिळवील....सात वर्षांनी त्याच्याविरुदध विद्रोह होईल...व्हेनिस नगरी दु:खात बुडून जाईल...’’नॉस्त्रादेमसची भारताविषयीची ही भविष्यवाणी..चारशे वर्षांपूर्वी लिहून ठेवलेली....तंतोतंत खरी ठरलेली...आणि भावी काळात काय घडेल? ‘‘तीन बाजूंनी समुद्रांनी वेढलेल्या देशातील महान नेता वादळाप्रमाणे येईल...गुरुवार हा त्याचा सुटीचा दिवस असेल....’’जगाबरोबरच भारताबद्दलही नॉस्त्रादेमसने वर्तविलेल्या भाकीतांची थक्क करणारी विलक्षण रोमहर्षक अशी नॉस्त्रादेमसची भविष्यवाणी. ...Read more

  • Rating StarAshutosh Kamble

    नॉस्त्रादेमसची भविष्यवाणी` वाचुन पुर्ण! नॉस्त्रादेमस हा जगातील महान भविष्यवेत्ता मानला जातो. त्याच्या `सेंच्युरीज` या पुस्तकाच्या अब्जावधी प्रती विकल्या गेल्या आहेत, अजुनही विकल्या जात आहेत! या पुस्तकात नॉस्त्रादेमसने बर्याच भविष्यवाण्या लिहून ठेवले्या आहेत, ज्यातील काही भविष्यवाण्या घडूनही गेल्या आहेत! पण या भविष्यवाण्या गद्यमय नसुन पद्यमय आहेत. ज्यामुळे त्यांचा अचुक अर्थ लावणे हे मोठे जिकीरीचे काम आहे. शिवाय काही अपवाद सोडला तर बाकीच्या ओळींमधे ज्यांच्याबद्दल भविष्यवाणी केलीये त्यांचं सरळ सरळ नाव न सांगता त्यांच्या उल्लेख समर्पक विशेषणाने करतो. उदा.- जर्मनला वुल्फ (लांडगा), भारताला समुद्राच्या नावाचा देश(सिंधु-हिंदु-हिंदुस्तान),चीनला ड्रॅगन इ. मानवी भविष्यवाणी गद्यमय असते व ईश्वरी भविष्यवाणी पद्यमय असे म्हटले जाते. स्वतः नॉस्त्रादेमस कबुल करतो की त्याने लिहिलेल्या सर्व भविष्यवाणी ईश्वराने(नियतीने) सांगितलेल्या आहेत. त्याने त्या तशाच शब्दात लिहिलेल्या आहेत. मायकेल नॉस्त्रादेमस हा चित्रपट बघावा तश्या भविष्यवाणी बघत असे. त्यासाठी त्याला काही ठराविक क्रियाकर्म करावे लागे. याबद्दल त्याने `सेंच्युरीज` या पुस्तकात सुरुवातीसच सर्वकाही सांगितले आहे. त्याच्या काळात त्याने केलेल्या काही कटू भविष्यवाणींमुळे व त्या लोकांना प्रत्ययास आल्यामुळे त्याच्या जिवालाही धोका निर्माण झाला होता. लोक त्याच्यावर संशय घ्यायचे की नॉस्त्रादेमस काहीतरी काळी जादू करुन तोच हे सर्व घडवित आहे. परंतु इंग्लडच्या राणीने त्याला संरक्षण दिल्यामुळे त्याला कुणीच हातही लावु शकत नव्हता(या राणीने नॉस्त्रादेमसनी `सेंच्युरीज` या पुस्तकात वर्तवलेली स्वतःच्या पतीच्या मृत्युची भविष्यवाणी वाचली होती. तिने त्याबद्दल राजालाही सावधान करण्याचा प्रयत्न केला. पण राजाने ही गोष्ट हसण्यावारी नेली. परिणामी पुस्तकात वर्णन केल्याप्रमाणे तंतोतंत तसाच राजाचा मृत्यु झाला.) नेपोलियन बोनापार्ट आणि अडॉल्फ हिटलर यांच्याबद्दलतर त्यानी सर्वकाही चारशेवर्षापूर्वीच लिहून ठेवलंय. अगदी त्यांच्या जन्मापासुन तर ते मृत्युपर्यंत आणि ते ही त्यांच्या नावासकट! त्यांचा जन्म होण्याआधीच! हिटलरला त्याचा मृत्यु कसा होणार हे आधीच या पुस्तकामुळे कळले होते. पण नियती अटळ असते, त्याप्रमाणेच झालं. भारताबद्दलही नॉस्त्रादेमसनी काही भविष्यवाणी लिहिल्यात. पैकी त्यात झाशीची राणी लक्ष्मीबाईच्या मृत्युची भविष्यवाणी प्रत्ययास आलीये. अजुनएक भविष्यवाणी म्हणजे भारतात पाच नद्या असलेल्या राज्यात जन्माला येणारा महामानव! हा मानव भारताचा सर्वेसर्वा होईल आणि याच मानवामुळे तिसरे विश्व महायुद्ध समाप्त होईल! ह्याच्यामुळेच भारत जगात महासत्ता होईल आणि दहशतवाद समाप्त होईल! याच्यामुळेच जगात शांतता स्थापित होईल व जग या महामानवाच्या वक्तृत्वाचा दिवाना होईल! तिसर्या महायुद्धाच्याच बहुतेक भविष्यवाण्या नॉस्त्रादेमसच्या `सेंच्युरीज` या पुस्तकात आहेत. तिसरे महायुद्ध हे अघोषित महायुद्ध असेल! म्हणजे तिसरे महायुद्ध सुरु झालंय याचा कुणालाही थांगपत्ता लागणार नाही. जेव्हा लागेल तेव्हा पहिल्यापेक्षा जास्त भयंकर परिस्थिती निर्माण होईल! जगाचं खुप नुकसान होईल. पण जेव्हा हे महायुद्ध संपेल, तेव्हा जगातुन दहशतवादही संपेल! नॉस्त्रादेमसच्या मते जगातील चौथे आणि शेवटचे महायुद्ध हे तिसर्या महायुद्धानंतर कित्येक शतकानंतर, हजारो वर्षानंतर होईल! या महायुद्धामुळे पृथ्वी मानवांस राहण्यायोग्य असणार नाही. महायुद्ध संपल्यानंतरही सगळीकडे मृत्युचे थैमान असेल, रोगराई असेल! या महायुद्धामुळेच मानवाचा आणि पर्यायाने सर्व सजीवसृष्टीचा ऱ्हास्य होईल! वेल, या सर्व गोष्टींना अजुन अवकाश आहे. मायकेल नॉस्त्रादेमस या सर्वोत्तम भविष्यवेत्ता आणि महान द्रष्टाबद्दल असेच काही अजुन माहिती, किस्से `नॉस्त्रादेमसची भविष्यवाणी` या मराठी पुस्तकात वाचायला मिळेल. स्वतःचा मृत्यु केव्हा असेल व मृत्युनंतर पंचवीस- पन्नास वर्षानंतर त्याच्या प्रेतासोबत काय होईल याची आधीच जाणीव असलेला व आपल्या या भविष्यवाणींचा कुणी दुष्ट हेतूने वापर करु नये म्हणुन खबरदारी घेणारा मायकेल नॉस्त्रादेमस हे अजब रसायन एकदा अनुभवून पहाच ...Read more

  • Rating StarKiran Borkar

    जगातील प्रसिद्ध थोर ज्योतिषी ,डॉक्टर म्हणून नॉस्ट्रदिमस प्रसिद्ध आहे . त्याने अनेक भविष्य वर्तवली. ती बहुतेक चतुस्पदी मांडली आहेत. त्यावरून काही उत्पाद होऊ नये म्हणून ती गूढ आणि सांकेतिक भाषेत लिहिली गेली आहेत.नॉस्ट्रदिमसने भारताबद्दलही सुमारे चारशे र्षांपूर्वी काही भविष्य मांडली होती .त्यात पाकिस्तानची निर्मिती ,1857 चा उठाव ,इंदिरा गांधींचा काळ त्यांची हत्या ,राजीव गांधी यांची हत्या .भारत चीन युद्ध यांचा समावेश आहे . तसेच पाहिले महायुद्ध ,हिटलरचा उदय ,मुसोलिनीची हत्या ,हिरोशिमा ,नागासाकीवर अमेरिकेने टाकलेले अणुबाँब या विषयी ही भविष्य वर्तविले होते. लेखकांनी यातील काही भविष्य इथे चतुष्पदी मध्ये मांडले आहेत आणि त्याचा अर्थ ही सांगितला आहे . जगातील प्रमुख घटनांवर त्यांनी भर दिला आहे . ...Read more

  • Rating StarDAINIK SAMANA (KOLHAPUR) 28-09-2003

    ‘ज्योतिष हे शास्त्र आहे काय? यावर कुणाचे काहीही मत असो, पण या सर्वांसाठी नॉस्त्रादेमस मात्र एक न सुटणारं कोडंच बनून राहिला आहे. तो एक उत्तम गणिती, निष्णात खगोलशात्रज्ञ आणि वाचसिद्धी प्राप्त झालेला ज्योतिषी होता. त्याला अनेक गूढविद्यांचेही ज्ञान होते.तो भाषाप्रभूही होता. त्याला ग्रीक, लॅटिन, फ्रेंच, इटालियन या युरोपीयन भाषांबरोबर हिब्रू, अरेबिक आदी भाषाही अवगत होत्या. नॉस्त्रादेमसचा काळ १५०३ ते १५६६. त्या काळात धर्मसत्ता आणि राजसत्ता अतिशय प्रवळ होती. भ्रामक, पाखंडी कल्पनांचा समाजावर पगडा होता. त्यावर उपाय म्हणून नॉ़स्त्रादेमसने ते फ्रेंच राजघराण्यालाच अपर्णन केले. नॉस्त्रादेमसकालीन जगाची कल्पना भूगोल, तत्कालीन नाव ग्रीक पुराणातील संदर्भ यामुळे नॉस्त्रादेमस नक्की कुणाबद्दल व काय भाकीत करतोय हे समजणे एकंदरीतच कठीण. नॉस्त्रादेमसने तसे एके ठिकाणी म्हटलंही आहे. या चतुष्पदींचा अर्थ विद्वानांनी लावावा! अर्थात तसा तो लावण्याचा, आपापल्यापरीने त्याची उकल करण्याचा प्रयत्न अनेकांनी केला. डॉ. सुरेशचंद्र नाडकर्णींनी असाच एक प्रयत्न दै लोकसत्तामध्ये ‘नॉस्त्रादेमसची भविष्यवाणी’ या शीर्षकाने स्तंभलेखन करून केला. त्या स्तंभलेखनातील काही भागांचे संकलन म्हणजे सदरचे पुस्तक. नॉस्त्रादेमसने अनेक ठिकाणी चतुष्पदी उलगडण्यासाठी खगोलशास्त्रीय ग्रहगणिताची सूचना दिली आहे. चतुष्पदी रचताना प्रत्येक शब्द अत्यंत विचारपूर्वक योजला आहे. अनेक शहरांचा व स्थळांचा त्याने स्पष्ट उल्लेख केला आहे; व्यक्ती आणि घटनांबाबत त्याने सुरेख रूपके उपयोगात आणली आहेत. चिनी लोकांच्या संदर्भात ड्रॅगन, हिंदुस्थानसंबंधी लिहिताना समुद्राचे नाव असलेल्या धर्माचा देश ‘सिंधू-हिंदू-हिंदूस्थान’ वगैरे प्रतीके वापरून त्याने भविष्य कथन केले आहे. हे सारं त्याने लेखनाची गूढरत्यता वाढावी म्हणून केलेले नसून तत्कालीन राज्यव्यवस्था तसेच धर्मव्यवस्था डोळ्यासमोर ठेवून केलेले आहे. तसे त्याने आपल्या मुलाला लिहिलेल्या पात्रात स्पष्ट कबूल केले आहे. जगाच्या भवितव्याबाबत भविष्य कथन करणारी प्रत्येकी शंभर चतुष्पदी असलेली एकूण बारा शतके रचण्याचा नॉस्त्रादेमसचा मानस असावा; परंतु काही कारणामुळे तो सिद्धीस गेला नसावा. एकूण संकल्पित लिखाण पूर्ण घेण्यापूर्वीच त्याची इहलोकीचा यात्रा संपुष्टात आली. या बारा शतकांपैकी सातव्या शतकात फक्त बेचाळीस चतुष्पदी आहेत. अकराव्या शतकात फक्त दोन आणि बाराव्या शतकात फक्त अकरा चतुष्पदी आहेत. इतर सर्व शतके पूर्ण शंभर चतुष्पदीची आहेत. बहुतेक पुस्तकातून फक्त दहाच शतके छापलेली आढळतात. वास्तविक ग्रंथाचे मूळ नाव ‘प्रोफेटिक्स द मायकेल नॉस्त्रादेमस’ पण ते मागे पडून ‘सेंच्युरीज’ याच नावाने तो रूढ झाल्या. फ्रेंच राज्यक्रांतीबद्दल नॉस्त्रादेमस लिहितो - ‘‘लढाईपूर्वीच त्या भल्यामोठ्या (तुरुंगाच्या भिंतीवर) कब्जा केला जाईल. राजाचा अकस्मात वध केला जाईल. सारेच अतिशय दु:खद खेदजनक अनेक रक्षक मारले जातील. अन् (सीन) नदीच्या परिसरातील भूमी रक्ताने न्हाऊन निघेल.’’ याव्यतिरिक्त राजा दुसरा हेन्रीचा मृत्यू, नेपोलियन, पहिले महायुद्ध, हिटलर-मुसोलिनी, दुसरे महायुद्ध, हिरोशिमा-नागासाकीवरील बॉम्बहल्ले, इस्त्रायलची निर्मिती, इराणमधील क्रांती आदी जागतिक घडामोंडीवरही नास्त्रादेमसने भाकीत केले होते. डायनाचा दुर्दैवी मृत्यू, अमेरिकेतील वर्ल्ड ट्रेड सेंटरवरील हल्ला, अमेरिका-इराक युद्ध, अमेरिका अफगाणिस्तान युद्ध, रशियाचे विभाजन या घटनांचेही भाकीत नॉस्त्रादेमसने आपल्या चतुष्पदी केले आहे. तो म्हणतो. ‘‘ती सत्ताहीन झालेली स्त्री. अधिकच जोमाने पुन्हा सत्तेवर येईल. तिचे शत्रू गुप्त कारस्थान रचतील. सत्तरीला तीन वर्षे कमी असताना तिचा मृत्यू घडवून आणला जाईल.’’ लेखकाच्या मते ही चतुष्पदी माजी दिवंगत पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्याशी बरेचसे साधर्म्य बाळगणारी आहे. याव्यतिरिक्त १८५७चे स्वातंत्र्यसमर, झाशीची राणी, बहादूर शहर जफर, सुभाषचंद्र बोस, हिंदुस्थानची स्वातंत्र्यप्राप्ती, चीनचे आक्रमण, राजीव गांधी वगैरे घटनांचाही नॉस्त्रादेमसच्या दिव्यचक्षूंना सुगावा लागला होता असे स्पष्ट प्रतिपादन लेखक करतो. नॉस्त्रादेमसच्या महानिर्वाणाला १९६६ साली चारशे वर्षे पूर्ण झाली. या चारशे वर्षांत त्याने कथन केलेली सुमारे साडेतीनशे भाकिते तंतोतंत प्रत्ययाला आल्याचे म्हटले जाते. उर्वरित साडेचारशे चतुष्पदी प्रत्ययाला यायच्या आहेत. तिसरे महायुद्ध, इस्त्रायल-इजिप्तचे भवितव्य, जैविक युद्ध, महायुद्धाचा शेवट, सात चांद्रचक्रांपैकी सातवे चांद्रचक्र, चौथे महायुद्ध, पृथ्वीचे भवितव्य वगैरे बऱ्याच जागतिक स्तरांवरील घडामोडींची सदर पुस्तकात उकल केली गेली आहे. तथापि विशेष उल्लेख करण्यासारखी, गोष्ट म्हणजे नॉस्त्रादेमसच्या पहिल्या शतकातील ७६व्या क्रमांकाची चतुष्पदी. ‘‘तीन बाजूंनी समुद्रांनी वेढलेल्या देशातील महान नेता वादळाप्रमाणे येईल... गुरुवार हा त्याचा सुटीचा दिवस असेल.’’ या चतुष्पदीबद्दल लेख म्हणतो चतुष्पदी हिंदुस्थानला बऱ्याच अंशी लागू पडणारी अशीच आहे. इतकेच नव्हे ती हिंदुस्थानासंदर्भातच रचली असावी. नॉस्त्रदेमसने सांगिलेल्या एकूण साडेआठशे भाकितांपैकी सत्य म्हणून प्रत्ययास आलेली भाकिते पाहता उर्वरित भाकितेही बऱ्याच अंशी खरी ठरावीत. तिसरे महायुद्ध होईल की नाही? चौथे महायुद्ध केव्हा होईल? जगाचा अंत केव्हा असेल? या व इतरही अनेका प्रश्नांनी उकल आपल्याला सदर पुस्तकातून मिळू शकेल. लेखकाने तशी ती करण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला आहे. -नी. तु. भोसले ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

रुपाली सोनवणे

#रुक #जाना #नही लेखक: Dr. भावेश भाटिया शब्दांकन: Dr: सचिन पाचोरकर अनुवाद: सुप्रिया वकील ​अंथरून पाहून पाय पसरावे... अह्ह.. त्या निर्जीव अंथरुणासाठी आपल्या सजीव पावलांना का त्रास द्यावा? असेच एक जबरदस्त आत्मचरित्र वाचून संपवलं आणि एक ऊर्जा निर्माणकरून गेलं, पुस्तकाचं नाव आहे `रुक जाना नहीँ ​डॉ. भावेश भाटिया यांची ही प्रेरणादायी कहाणी. शाळेत असताना आलेलं अकाली अंधत्व आणि त्यानंतर खडखडीत खडतर जीवनाचा सुरू झालेला प्रवास, पण या प्रवासात खचलेल्या बालमनाला त्यांच्या आईने दिलेलं बळ, प्रेरणा व आत्मसन्मानाची शिकवण आणि स्वाभिमानाचे धडे लेखकास पुरे होते. हा प्रवास सोपा नक्कीच नव्हता. चांगल्या धडधाकट व्यक्तीवर संकट आल्यावर दूर दूर पळणारे नातलग, मित्र परिवार, जातभाई... दृष्टी गेलेल्या व्यक्तीस कितपत आधार देतील? पण एक ऑपरेटर ते एक उद्योजक, `सनराईज कॅण्डल`चा विस्तार आणि स्वतःबरोबर अनेक दृष्टिहीन व्यक्तींना स्वतःच्या पायावर उभं करून रोजगार देणारा हा अवलिया किती अडथळे पार करून आलाय हे जाणून घेण्यासाठी पुस्तक वाचायला हवंच. ​कुठलाही वशीला नाही की कोणाची सहानुभूती नाही, स्वबळावर विविध प्रयोग करत उद्योग यशस्वी करणं सोपं नाही. यात ज्या ज्या देवमाणसांनी हातभार लावला त्यांचा पण उल्लेख आहे, पण त्या देवमाणसांनी देखील कधीच उपकारिक भाषा न करता व स्वाभिमान न दुखावता कशी मदत करता येऊ शकते हे त्यांच्या कृतीतून दाखवून दिलंय. लेखक फक्त उद्योग उभारून थांबले नाहीत तर त्यांनी सामाजिक जाणीवेचं भान देखील ठेवलंय. महाबळेश्वरमध्ये सनराईज कॅण्डल नावाने त्यांनी भव्य असा उद्योग परिसर आणि म्युझियम सुरू केलंय, तेथे अनेक दृष्टिहीन व्यक्तींना रोजगार मिळाला आहे त्याचबरोबर सर्वजण स्वाभिमानाने कष्ट करून जगत आहेत. हजारो आयुष्य त्यांनी उजळून टाकली आहेत. दोन वेळा राष्ट्रपती पुरस्कार सह एकून 46 पुरस्कारांचे ते मानकरी आहेत.विशेष म्हणजे सर्व पुरस्कार त्यांच्या योग्यतेनुसार दिले आहेत.. आणी अशा हजारो पुरस्कारांचे ते मानकरी आहेत असंच वाटत..त्यांच्या कामाची दखल रिलायन्स ग्रुप ने देखील घेतली आहे.व त्यांच्या पुस्तकास प्रस्तावना देखील नीता अंबानी यांनी दिली आहे.उद्योग करताना छोट्या छोट्या गोष्टी कसा प्रभाव करतात याच वर्णन देखील त्यांनी लिहिल आहे.. ​या कार्यात महत्त्वाचं योगदान त्यांच्या धर्मपत्नी नीता भाटिया यांनी दिलं आहे. दूरदृष्टी ठेवून आपल्या पतीस प्रोत्साहन देऊन, नवीन कल्पनेसह पाठिंबा देऊन त्यांना हुरूप देण्याचं काम त्यांनी केलंय. नीता भाटिया यांचं कर्तृत्व, त्यांचं पवित्र निस्वार्थी प्रेम या पुस्तकातून वाचताना आंतरिक वेगळी ऊर्जा मिळते. कलियुगातील देवी हा शब्द व मान त्यांना समर्पक वाटतो. पुस्तक सर्व वयोगटातील वाचक वाचू शकतात. मनाने खचलेल्या पण शरीराने धडधाकट असलेल्या प्रत्येक व्यक्तीने वरील पुस्तक नक्की वाचावं आणि आत्मसात करावं. एवढ्या उंचीवर असूनही जमिनीवर पाय असलेल व्यक्तिमत्व आहे. अगदी प्रेमळ पणे वागण बोलण सन्मान देण..ही दैवी देणगी त्यांच्या जवळ आहे. ...Read more

RAZOR SHARP
RAZOR SHARP by ASHWIN SANGHI Rating Star
सुनील माने, पुणे

लेखक अश्विन सांघी “द रोझाबल लाइन” या पहिल्याच कादंबरीने खूप लोकप्रिय झाला. प्राचीन भारतीय दंतकथा/ऐतिहासिक संदर्भ घेऊन त्याच्याभोवती आजच्या काळात रहस्यपूर्ण कथा लिहिणारा अश्विन. Chanakya’s Chant, The Krishna Key, The Sialkot Saga, Keepers of the Kalacakra, The Vault of Vishnu, The Magicians of Mazda अशा एकापेक्षा एक सुंदर रहस्य कादंबर्या “भारत सिरीज़” नावाने खूप प्रसिद्ध झाल्या. या सर्व कादंबऱ्या मी इंग्लिश मधेच वाचल्या. यांचा मराठी अनुवाद मेहता पब्लिशिंग हाउस यांच्याकडे उपलब्ध आहे. अश्विन सांघीने या भारत सिरीज शिवाय एक नवीन थ्रिल्लर सिरीज (कुत्ता कदम) सुरू केली आहे. त्यांतील पहिली कादंबरी Razor Sharp. एक सिरियल किलर मुंबईत एकानंतर एक खून पाडतोय. पोलिस चक्रावले आहेत. 1. रविवार दि २ फेब्रुवारी , गोरेगाव पश्चिममधे रवि मेहराचा खून होतो. त्याची बायको खुशी कॅाल सेंटरचा जॅाब करून रात्री ११.३० ला परत येते. खूप वेळा बेल वाजवून दार न उघडल्यामुळे ती उघडून आत येते तर रवि रक्ताच्या थारोळ्यात मरून पडलेला असतो. त्याचे हात पाठीमागे नायलॅान दोरीने बांधलेले असतात. त्याच्या छातीत सुरा खुपसलेला असतो. त्याच्या तोंडात काहीतरी खाद्य पदार्थ असतो. 2. सोमवार दि १० फेब्रुवारी , लोअर परळमधे सुचंद्रा अग्रवालचा खून. तिची कामवाली आल्यावर दार न उघडल्यामुळे सोसायटीवाले दार तोडतात. आत सुचंद्राचा खून झालेला. हात नायलॅान दोरीने मागे बांधलेले, छातीमधे चाकू खुपसलेला, तोंडात काहीतरी खाद्यपदार्थ. पोलिस चक्रावलेले. मग पोलिसखाते जागे होते. त्यांचा नावाजलेला अधिकारी जो सस्पेंड झालेला आहे, त्या प्रकाश कदम, DCP याला बोलावले जाते. राज्याचे गृहमंत्री ओंकार लोखंडे, त्यांचा माणूस कमिशनर चव्हाण आणि उपगृहमंत्री जयंत गायकवाड व त्यांचा माणूस SCP राणे, मुंबईचा डॅान भाऊ पाटील जो लोखंडेचाच माणूस असतो, हे सर्व या केसच्या मागावर लागतात. कदम हा राणेंच्या ओळखीचा खास ऑफिसर असतो म्हणून त्यालाही इन्व्हेस्टीगेशनला बोलावले जाते. 3. मंगळवार दि १८ फेब्रुवारी , ठाणे येथे मंगला शहाचा खून. तिच्या शेजारणीमुळे हे कळते. मंगलाचे हात नायलॅान दोरीने पाठीमागे बांधलेले, छातीमधे चाकू खुपसलेला, तोंडात खाद्यपदार्थ. पोलिस अधिकारी शिंदे कदमबरोबर येतात. मंगलाच्या चेहऱ्याजवळ कदमला पेस्टिसाईडचा वास येतो. चेहरा निळसर झालेला. खून झाल्यावर बॅाडीला हलवलेले दिसते. तो ऑफिसमध्ये जुन्या खूनांचे फोटो तपासतो. त्यांचीही बॅाडी खून केल्यावर हलवलेली दिसते. चेहऱ्यावर निळसर झाक दिसते. तिन्ही खून “फिनेक” ब्रॅंडच्या चाकूने केलेले असतात. हे समान धागे कदम त्याची मुलगी केतुल बरोबर चर्चा करतो. केतुलची आई काही वर्षांपूर्वी कदमला सोडून गेलेली असते. ती भाऊ पाटीलची सावत्र बहीण असते. पण सध्या ती कुठे आहे व काय करते हे माहित नसते. केतुल कोर्टात काम करत असते तसेच ती “शक्ती” या NGO मधेही काम करते. शक्ती हे सोनापूरमधुन सुटका केलेल्या वेश्यांचे पुनर्वसन करत असते. निर्मल नावाचा तिचा मित्र एथिकल हॅकर असतो. तिच्यावर प्रेम करत असतो. कदमला हार्ट अटॅक येऊन गेलेला व स्टेंट बसवलेला असतो. Depression मुळे त्याची सायकॅालॅाजिस्टकडे ट्रिटमेंट चालू असते. कदमला या तिन्ही केसमधे आणखी एक धागा सापडतो. हे खून आठ दिवसांच्या अंतरावर झालेले असतात. म्हणजे पुढचा खून बुधवारी होणार असल्याचे तो राणे व शिंदेला सांगतो. 4. बुधवार दि २६ फेब्रुवारी, कांदिवली पश्चिम, लक्ष्मी बुधीराजाचा खून. तोच पॅटर्न. 5. गुरुवार दि ५ मार्च, खार पश्चिम, गुरुराज अदवानीचा खून सेम पॅटर्न. गुरूराज हा युट्युबवरचा प्रसिद्ध सिंगर असतो. 6. शुक्रवार दि १३ मार्च, ताडदेव, दिव्या शुक्रपाणीवर खूनी हल्ला होतो. पण ती जबर जखमी होते. ती फिटनेस ट्रेनर असल्यामुळे खुन्याबरोबर झटापट करते. पण चाकू पोटात घुसल्यामुळे ती जबर जखमी होते. हात बांधलेले असतानाही ती फोनवर “सिरी” ला तिच्या भावाला, ध्रुवला फोन लावायला सांगते. फोन लागतो व ती “हेल्प हेल्प” एव्हढेच बोलून बेशुद्ध होते. म्हणून खुनी पळून जातो. ध्रुव तिथे पोहोचून तिला हॅास्पिटलमधे ॲडमिट करतो. पोलिसांना तिथे खुन्याची बॅग सापडते. त्यांत नायलॅानची दोरी, बेगॅान स्प्रे व राजमाच्या बिया सापडतात. तिसऱ्या खुनाआधी पोलिस संशयित म्हणून राजू दाभाडेला अटक करतात. पण चौथ्या खूनाच्या वेळेस तो कस्टडीतच असतो. मग खूनी कोण? 7. शनिवार दि २१ मार्च, बान्द्रा पश्चिम, शनिया डिसौजाचा खून होतो. सेम मोडस ऑपरेंडी . 8. शनिवार दि २८ मार्च, चेंबूर, ७१ वर्षांच्या राहुल सिंह नावाच्या सिख व्यक्तिचा खून होतो. तीच पध्दत. यानंतर एक दिवस कदम KBC बघत असताना अमिताभ बच्चन एका सिनेमाचं गाणं लावून त्याचा पिक्चर ओळखायला सांगतात. ते गाणं असते- “सोमवार को हम मिले मंगलवार को नयन बुध को मेरी निंद खुली जुम्मेरात को चैन अरे शुक्र शनी कटे मुश्किलसे आज है इतवार सात दिनों में हो गया जैसे सात जनम का प्यार” आणि कदमच्या डोक्यात एकदम प्रकाश पडतो… अरे, हे सर्व खून असेच रविवार ते शनिवार एक एका वारी घडलेत! पण शनिवारी दोन खून कसे? याच्या मागे काही खगोलशास्त्र किंवा भविष्याचा तर संबंध नाही? कदमला आठवतं की शेजारी राहणारा डॉ. देसाईला पण भविष्य-खगोलशास्त्राची आवड व माहिती आहे. ( डॅाक्टर कडे सापडलेल्या नायलॅानचे रंगीत दोर व फिनेक कंपनीचा चाकू यामुळे एक संशयित म्हणून कदमने त्याला अटक करून पुछताछ केलेली असते) कदम लगेच डॅाक्टरांकडे जातो. त्यांची माफी मागून त्यांना या प्रश्नांत मदत करायला सांगतो. तो या सर्व खुनांचा सिक्वेन्स सांगतो. ते प्रत्येक वारी का घडले? मग शनिवारी दोन का? यापुढे कोणता वार? कुणाचा खून? डॅाक्टर सांगतात की भारतीय भविष्य व खगोल शास्त्रात नवग्रहांना खूप महत्व आहे. रवि, सोम(चंद्र), मंगळ, बुध, गुरू, शुक्र, शनि, राहू आणि केतु. यांचे रंग व धान्य वेगवेगळे असतात. त्या त्या ग्रहाला प्रसन्न करण्यासाठी ते वापरले जातात. कदम ही माहिती लिहून घेतो. त्यावरून प्रत्येक खुनात वापरण्यात आलेले फिनेक कंपनीचे चाकू, वेगवेगळ्या रंगांचे नायलॅान दोर व तोंडातील पदार्थ यांचा संबंध जोडून एक तख्ता तयार करतोः- “रवि मेहरा-रविवार-सोनेरी दोर- तोंडात गहू-दिशा पूर्व सुचंद्रा-सोमवार-चंदेरी दोर-तोंडात तांदूळ-दिशा पश्चिम मंगला शाह-मंगळवार-लाल दोर-तोंडात तूर डाळ- दिशा दक्षिण लक्ष्मी बुधीराजा-बुधवार-हिरवा दोर-तोंडात हिरवे मूग-दिशा उत्तर गुरुराज अदवानी-गुरूवार-पिवळा दोर-तोंडात हरबरा डाळ-दिशा उत्तर पूर्व(ईशान्य) दिव्या शुक्रपाणी-शुक्रवार-पांढरा दोर-राजमा-दिशा दक्षिण पूर्व शनिया डिसौजा-शनिवार-काळा दोर-तोंडात काळे तिळ-दिशा उत्तर पश्चिम राहुल सिंग-शनिवार-निळा दोर-तोंडात उडीद दाळ-दिशा दक्षिण पश्चिम” आता उरला एकच ग्रह-केतु. केतुचा वार मंगळवार. ग्रे रंग, चना दाळ, दिशा दक्षिण पश्चिम. “केतु”म्हणजे कदमची मुलगी केतुलचा नंबर लागणार? आज तर मंगळवारच आहे! कदम घाबरून जातो! तो केतुलला फोन करतो पण तो बंद लागतो. ती सध्या कुठे आहे? कोर्टात? कदम आपल्या मुलीला वाचवतो का? खरा खुनी कोण असतो? तो पकडला जातो का? त्याचे यामागचा उद्देश काय असतो? याच्यामध्ये अजून कोण सामिल असतं का? याची उत्तरे मिळण्यासाठी वाचावी लागेल अश्विन सांघी यांची कादंबरी Razor Sharp. ...Read more