* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: BETTER
  • Availability : Available
  • Translators : SUNITI KANE
  • ISBN : 9789353172572
  • Edition : 1
  • Publishing Year : JUNE 2019
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 240
  • Language : Translated From ENGLISH to MARATHI
  • Category : REFERENCE AND GENERAL
  • Sub Category : RESEARCH & INFORMATION
  • Available in Combos :ATUL GAWANDE COMBO SET-4 BOOKS
Quantity
Buying Options:
  • Print Books:
THE NEW YORK TIMES BESTSELLING AUTHOR OF COMPLICATIONS EXAMINES, IN RIVETING ACCOUNTS OF MEDICAL FAILURE AND TRIUMPH, HOW SUCCESS IS ACHIEVED IN A COMPLEX AND RISK-FILLED PROFESSION THE STRUGGLE TO PERFORM WELL IS UNIVERSAL: EACH ONE OF US FACES FATIGUE, LIMITED RESOURCES, AND IMPERFECT ABILITIES IN WHATEVER WE DO. BUT NOWHERE IS THIS DRIVE TO DO BETTER MORE IMPORTANT THAN IN MEDICINE, WHERE LIVES ARE ON THE LINE WITH EVERY DECISION. IN HIS NEW BOOK, ATUL GAWANDE EXPLORES HOW DOCTORS STRIVE TO CLOSE THE GAP BETWEEN BEST INTENTIONS AND BEST PERFORMANCE IN THE FACE OF OBSTACLES THAT SOMETIMES SEEM INSURMOUNTABLE. GAWANDE`S GRIPPING STORIES OF DILIGENCE, INGENUITY, AND WHAT IT MEANS TO DO RIGHT BY PEOPLE TAKE US TO BATTLEFIELD SURGICAL TENTS IN IRAQ, TO LABOR AND DELIVERY ROOMS IN BOSTON, TO A POLIO OUTBREAK IN INDIA, AND TO MALPRACTICE COURTROOMS AROUND THE COUNTRY. HE DISCUSSES THE ETHICAL DILEMMAS OF DOCTORS` PARTICIPATION IN LETHAL INJECTIONS, EXAMINES THE INFLUENCE OF MONEY ON MODERN MEDICINE, AND RECOUNTS THE ASTOUNDINGLY CONTENTIOUS HISTORY OF HAND WASHING. AND AS IN ALL HIS WRITING, GAWANDE GIVES US AN INSIDE LOOK AT HIS OWN LIFE AS A PRACTICING SURGEON, OFFERING A SEARINGLY HONEST FIRSTHAND ACCOUNT OF WORK IN A FIELD WHERE MISTAKES ARE BOTH UNAVOIDABLE AND UNTHINKABLE. AT ONCE UNFLINCHING AND COMPASSIONATE, BETTER IS AN EXHILARATING JOURNEY NARRATED BY "ARGUABLY THE BEST NONFICTION DOCTOR-WRITER AROUND" (SALON). GAWANDE`S INVESTIGATION INTO MEDICAL PROFESSIONALS AND HOW THEY PROGRESS FROM MERELY GOOD TO GREAT PROVIDES RARE INSIGHT INTO THE ELEMENTS OF SUCCESS, ILLUMINATING EVERY AREA OF HUMAN ENDEAVOR.
डॉ. अतुल गवांदे या शल्यविशारदाचं गुणवत्तेबाबतचं चिंतन प्रकट करणारं पुस्तक आहे ‘बेटर.’ वैद्यकीय क्षेत्रातील कार्यक्षमता, प्रयोगशीलता, कल्पकता, विश्वासार्हता, एकूणच या क्षेत्रातील गुणवत्ता कशी वाढेल, याकडे डॉ. गवांदे यांनी लक्ष वेधलं आहे. या गुणवत्तेसंबंधी विवेचन करताना त्यांनी वैद्यकीय क्षेत्रातील अनेक विषयांना स्पर्श केला आहे. अगदी हात स्वच्छ करण्यापासून ते फाशीच्या कोठडीतील डॉक्टर्सपर्यंत. त्यांनी या विवेचनाला उदाहरणांची जोड दिल्यामुळे त्यांच्या मुद्द्यांमध्ये स्पष्टता आली आहे. या पुस्तकाचा समारोप आणि एकूणच हे पुस्तक वैद्यकीय क्षेत्रात येऊ पाहणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आणि त्या क्षेत्रात काम करणाऱ्यांसाठीही मार्गदर्शक ठरावं. अगदी साध्या-सोप्या भाषेत लिहिल्यामुळे हे पुस्तक वाचनीय झालं आहे.
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
#अतुलगवांदे #सुनितीकाणे #वैद्यकशास्त्र #परिश्रम #जंतुसंसर्ग #स्वच्छंती #योग्यकार्यप्रणाली #रुग्ण #डॉक्टर #पोलिओलसीकरणमोहिम #युद्धातीलदुर्घटना #उपकारबद्धता #फाशीच्याकोठडीतलेडॉक्टर्स #कल्पकता #कामाचादर्जा #समस्या #मर्यादा #ATULGAWANDE #MEDICALSCIENCE #CASUALTIESOFWAR #DOCTORS #OWE #PIECEWORK #WASHING HANDS #DEATHCHEMBER #CANCER #ARMY #INGENUITY #NAKED #SURGERY #POLIO #MEDICALMYSTERIES #DOCTOR #RULES #LAW
Customer Reviews
  • Rating Starविलास भांदिर्गे

    डाॅ.अतुल गवांदे यांनी लिहलेल "बेटर" एका शल्यविशारदचं गुणवत्तेचं चिंतन .पुस्तक खूप छान. मला आपला अनुवादही आवडला.

  • Rating StarKrishna Jadhav

    आपण प्रकाशित केलेले डॉक्टर अतुल गवांदे यांनी लिहिलेले व सुनीती काणे यांनी अनुवादित केलेले "बेटर "हे पुस्तकं नुकतेच वाचले. खूप आवडले, भावले. पुस्तकं खूप माहितीपूर्ण आहे. लेखकाचे व अनुवाद करणाऱ्या काणे यांचे कौतुक व मनापासून आभार. असं खूप माहितीपूर्ण पस्तकं छापल्याबद्दल आपलेही कौतुक व मनापासून आभार. ...Read more

  • Rating StarDivya Marathi 9.11.19

    वैद्यकीय क्षेत्राचा सखोलतेने, अभ्यासपूर्णतेने आणि सोदाहरण घेतलेला वेध... डॉ. अतुल गवांदे हे अमेरिकेत शल्यविशारद म्हणून प्रॅक्टिस करतात. वैद्यकीय क्षेत्रात अधिक गुणवत्ता, अचूकता, सुसूत्रता कशी आणता येईल, या विषयी त्यांनी सखोल आणि सोदाहरण चर्चा केली हे त्यांच्या ‘बेटर’ या पुस्तकातून. या पुस्तकाची त्यांनी तीन विभागांत विभागणी केली आहे. पहिला भाग आहे ‘परिश्रमपूर्वक लक्ष पुरविणे’, दुसरा भाग आहे ‘कार्यप्रणाली वापरणे’ आणि तिसरा भाग आहे ‘कल्पकता.’ या पुस्तकाचा अनुवाद केला आहे सुनीति काणे यांनी. ‘परिश्रमपूर्वक लक्ष पुरविणे’ या विभागात त्यांनी ‘हात धुण्याबाबत’ या प्रकरणात जंतुसंसर्ग टाळण्यासाठी हात धुणं कसं आवश्यक आहे, ते केव्हा आणि कशा पद्धतीने धुतले पाहिजेत याचं विवेचन केलं आहे. त्याचबरोबर विविध रोग पसरविणारे विविध रोगजंतू, जंतुसंसर्ग नियंत्रण विभाग याविषयीही माहिती दिली आहे. बाळंतरोग हा जंतुसंसर्गामुळे होतो, हे शोधून काढून निर्जंतुकतेचा आग्रह धरणाऱ्या डॉक्टरची कथा, जंतुसंसर्गाच्या संबंधातील उदाहरणं इ. बाबींचा समावेशही या प्रकरणात करण्यात आला आहे. ‘स्वच्छ करून टाकणे’ या प्रकरणात त्यांनी पोलिओ निर्मूलनाच्या मोहिमेचं तपशीलवार विवेचन केलं आहे. पोलिओ मोहीम कशी सुरू झाली, इथपासून ते या मोहिमेचं जगभर पसरलेलं जाळं, कर्नाटकमधील त्यांच्या एका डॉक्टर मित्राबरोबर फिरताना पोलिओ निर्मूलन मोहिमेच्या बाबतीत आलेले अनुभव इ. बाबत त्यांनी सविस्तर लिहिलं आहे. ‘युद्धातील दुर्घटना’ या प्रकरणात त्यांनी युद्धात जखमी होणाऱ्या सैनिकांच्या जखमा कशा प्रकारच्या असतात, सैनिकांवर उपचार करण्याच्या पद्धतींमध्ये होत गेलेल्या सुधारणा, सैनिकांना तातडीने उपचार करण्यासाठी केलेली व्यवस्था, त्यात येणाऱ्याb अडचणी, त्यावर शोधलेले उपाय इ.बाबत सविस्तर विवेचन केलं आहे. ‘योग्य कार्यप्रणाली वापरणे’ या विभागातील ‘नग्न रुग्ण’ या प्रकरणात स्त्री-पुरुषांच्या गुप्तांगांची, नाजूक अवयवांची तपासणी वेगवेगळ्या देशांत कशा प्रकारे केली जाते, या तपासणीच्या वेळी स्त्रियांनी कशा प्रकारचे कपडे घालावेत, पुरुष डॉक्टर जेव्हा एखाद्या स्त्रीच्या नाजूक अवयवांची तपासणी करत असेल तेव्हा तिथे शॅपेरॉन (नर्स किंवा दुसरी स्त्री) असावी का, याबाबतची डॉक्टरांची आणि रुग्णांची विविध मतं सांगितली आहेत. काही डॉक्टर्सचे आणि रुग्णांचे या संदर्भातील अनुभव नोंदवले आहेत. ‘तुकड्यातुकड्यातलं काम’ या प्रकरणात डॉक्टरांच्या अर्थकारणाची चर्चा केली आहे. डॉक्टरांनी प्रत्येक सेवेसाठी किती मोबदला घ्यावा, याबाबत सुनिश्चितता नसली तरी सर्वसाधारणपणे त्याचे दर ठरवता येऊ शकतात. कोणताही डॉक्टर एखाद्या विमा कंपनीशी जोडलेला आहे का नाही, यावरही त्याची आमदनी ठरलेली असते. डॉक्टरची व्यावसायिकता आणि त्याचा सेवाभाव यावरही गवांदे यांनी सोदाहरण चर्चा केली आहे. अर्थातच ती अमेरिकेतील वैद्यकीय सेवेच्या संदर्भात आहे. एकूणच हे प्रकरण डॉक्टरांच्या अर्थकारणावर सविस्तरपणे प्रकाश टाकणारं आहे. ‘फाशीच्या कोठडीतले डॉक्टर्स’ या प्रकरणात कैद्यांना प्रत्यक्ष मृत्युदंड देताना डॉक्टरांचा त्यात प्रत्यक्ष सहभाग असावा की नाही, यावर तपशीलवार चर्चा केली आहे. फाशीच्या कोठडीत डॉक्टरच्या उपस्थितीची गरज का भासली, अमेरिका आणि कॅलिफोर्नियातील डॉक्टर संघटनांनी मृत्युदंडाच्या वेळी डॉक्टरचा त्यात सहभाग असण्याला केलेला विरोध, कैद्यांना मृत्युदंड देण्याचे प्रकार, त्यातील त्रुटी, मृत्युदंडाच्या अंमलबजावणीत डॉक्टरांच्या सहभागाबाबतची आचारसंहिता, ज्या डॉक्टरांनी कैद्यांच्या मृत्युदंडात सहभाग घेतला त्यांचा दृष्टिकोन आणि त्यांचे त्या संदर्भातील अनुभव इत्यादी मुद्द्यांच्या आधारे सखोल चर्चा केली आहे. ‘लढा देण्याबाबत’ या प्रकरणात गुंतागुंतीच्या काही केसेसचे अनुभव सांगितले आहेत. डॉक्टरी कौशल्य पणाला लावूनही काही वेळेला गुंतागुंतीच्या केसेसमध्ये कसं अपयश येतं आणि काही वेळेला आश्चर्यकारकरीत्या पेशंट कसा बचावतो, हे या अनुभवांवरून दिसून येतं. शेवटी डॉक्टरांच्या प्रयत्नांनाही कधी कधी मर्यादा येते, हे या प्रकरणावरून दिसून येतं. या पुस्तकाच्या ‘कल्पकता’ या तिसऱ्या भागातील ‘गुणसंख्या’ या प्रकरणात बाळंतपणाच्या वेळेस उद्भवणाऱ्या अडचणी, त्याबाबत केल्या जाणाऱ्या उपाययोजना इ.बाबत सविस्तर आणि सोदाहरण चर्चा केली आहे. ‘बेल कव्र्ह’ या प्रकरणात सी. एफ. या कफाशी संबंधित आजाराबाबत तपशीलवार आणि सोदाहरण चर्चा केली आहे. ‘कामगिरी सुधारण्यासाठी’ या प्रकरणात डॉ. गवांदे यांनी नांदेड (कर्नाटक) जिल्हा रुग्णालयातील रुग्णांच्या बाबतीतील अनुभव सांगितले आहेत आणि त्या अनुभवांच्या आधारे सरकारी रुग्णालयातील डॉक्टर्स अनेक अडचणींवर मात करून किती कार्यक्षमतेने सेवा बजावत असतात, याची चर्चा केली आहे. जिल्हा रुग्णालयातील कार्यक्षम डॉक्टर्स बघितल्यानंतर गवांदे यांनी आपलं मत नोंदवताना लिहिलं आहे, ‘असं असूनही मला जे दिसलं, ते होतं : सुधारणा घडवणं शक्य असतं! त्यासाठी तीव्र बुद्धिमत्ता गरजेची नसते. त्यासाठी नेटानं, प्रामाणिकपणे प्रयत्न करत राहणं गरजेचं असतं. त्यासाठी स्वच्छ नैतिक विचार गरजेचे असतात आणि सर्वांत महत्त्वाची गोष्ट म्हणजे, त्यासाठी प्रयत्न करत राहण्याची तयारी गरजेची असते.’ समारोपात, सरासरीपेक्षा अधिक चांगली कार्यक्षमता प्राप्त करण्याच्या काही युक्त्या त्यांनी सांगितल्या आहेत. तर, वैद्यकशास्त्रातील काही महत्त्वाच्या बाबींची सोदाहरण आणि साधक-बाधक चर्चा करणारं हे पुस्तक वैद्यकीय क्षेत्रात येऊ घातलेल्या विद्याथ्र्यांसाठी आणि कार्यरत असणाऱ्यांसाठीही मार्गदर्शक असलं, तरी ते कुठेही कंटाळवाणं किंवा रटाळ होत नाही; कारण गवांदे यांची साधी, सोपी भाषा आणि त्यांनी दिलेली उदाहरणं. त्यामुळे सर्वसामान्य वाचकही हे पुस्तक अगदी रुचीने वाचू शकतो. गवांदे यांनी वैद्यकीय क्षेत्राच्या संदर्भात केलेली चर्चा अन्यही क्षेत्रांना लागू होऊ शकते. त्यांची ही चर्चा मानवी मू्ल्यांनाही स्पर्श करते. अगदी प्रस्तावनेपासून समारोपापर्यंत हे पुस्तक वाचकाच्या मनाची पकड घेतं. तेव्हा वैद्यकीय क्षेत्राच्या विविध पैलूंचं दर्शन घडविणारं, त्या क्षेत्राविषयीची माहिती आणि ज्ञान वाचकांपर्यंत सहजतेने पोचवणारं हे पुस्तक अवश्य वाचावं असं आहे. सुनीति काणे यांचा अनुवाद उत्तम. -अंजली पटवर्धन ...Read more

  • Rating StarDAINIK LOKMAT 18-08-2019

    शल्यविशारदाचं चिंतन... वैद्यकीय क्षेत्रातील कामाचा दर्जा सुधारण्याबाबत बरेचदा नामवंत लोक क्रीडापटूंचा आदर्श डोळ्यांसमोर ठेवतात. चिकाटी, परिश्रम, मेहनत, सराव आणि अचूकपणा यांचे यथोचित समतोल या क्रीडापटूंमध्ये पाहायला मिळतो. पण प्रत्येक गोष्टीचं ज्ञान े केवळ कुठल्यातरी परिणामावर अवलंबून राहून कसे मिळवता येईल. त्यासाठी अवचित अतिप्रसंगाचे होणारे आगमनदेखील तितकाच महत्त्वाचा भाग असतो. जीवन-मरणाच्या सीमारेषेवर असलेल्या जीवाची घालमेल अत्यवस्था यांना सामोरे जाताना तुम्हाला अचूक आणि तितकाच विनाविलंब निर्णय घ्यायचा असतो. तो अनुभव थरारक व जीवनाच्या परिभाषेवर डॉक्टरांचे महत्त्व अधोरेखित होते. अतुल गवांदे लिखित ‘बेटर’ हे पुस्तक एका शल्यविशारदाचं गुणवत्तेबाबतचं चिंतन आहे. ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

SARTH
SARTH by DR. S. L. BHYRAPPA Rating Star
हेमंत सांबरे

गेल्या तीन दिवसांत ही कादंबरी वाचून पूर्ण झाली .. ही कादंबरी वाचून होताच मन अगदी सुन्न होऊन गेले आहे . त्याचबरोबर अनेक संमिश्र भावना मनात दाटून आल्या आहेत . #आवरण ही जगप्रसिद्ध कादंबरी वाचल्यानंतर भैरप्पा यांच्या बद्दल मनात खूप आदरभाव निर्माण झाला होा . त्यानंतर त्यांचे हे दुसरे पुस्तक म्हणजे #सार्थ आज वाचून पूर्ण केले. या कादंबरीची कथा सातव्या शतकात घडत असते . *नागभट्ट* हा कादंबरीचा नायक आहे . हा नागभट्ट तुमच्या माझ्या सारखा एक सर्वसामान्य मनुष्य आहे . भैरप्पा यांनी त्याच्या नजरेतून त्या काळात घडत असलेल्या अनेक घटनांचा सूक्ष्म आढावा आपल्या समोर अतिशय समर्थपणे मांडला आहे . हे सातवे शतक म्हणजे असे होते की वैदिक धर्माचा प्रभाव जरी जनमानसात असला तरी , बौद्ध धर्माने ही आपली पाळेमुळे पूर्ण निदान उत्तर भारत , पूर्व भारत या भागात पसरवली होती . एक सामान्य मनुष्य म्हणून नागभट्टच्या मनात सुरू असलेली विविध द्वंद , त्याची वैदिक धर्म की बौद्ध धर्म याविषयी झालेली द्विधा मनस्थिती ही लेखकाने अचूक टिपली आहे . अनेक चर्चांमधून बौद्ध तत्त्वज्ञान , वैदिक तत्त्वज्ञान यांची ओळख अतिशय सोप्या भाषेत लेखक आपल्याला करून देतात , ते वाचताना आपल्या चित्ताला एक वेगळेच समाधान मिळत राहते .. या सर्व तत्त्वज्ञानाची प्रदीर्घ चर्चा , नायकाला येत असलेले वेगवेगळे अनुभव यातून आपणही समृध्द होत जातो . मधल्या काळात नायक मथुरेला येऊन राहतो . तेव्हा तिथल्या एका नाटक मंडळींबरोबर ओळख होऊन नायकाला त्यांच्या एका नाटकात प्रत्यक्ष *कृष्णाची* भूमिका करायला मिळते . तेव्हा त्याचे नाव *कृष्णानंद* असे होते . या भूमिकेमुळे नायकाला त्या भागात प्रचंड प्रसिध्दी मिळते . या नाटकातील असलेली त्याची नायिका चंद्रिका या सुंदर स्त्री बरोबर त्याचा विशेष स्नेह होऊन त्यांचे प्रेम ही जुळते . एखादी गोष्टीचा प्रचंड अभ्यास करून त्याला मांडणे यात भैरप्पा यांचा हात कदाचित फार कमी लेखक धरू शकतील . ही कादंबरी वाचतानाही प्रत्यही जाणवत राहते . याच काळात आद्य शंकराचार्य व मंडणमिश्र यांच्यातील झालेल्या जगप्रसिद्ध वादावर दोन ते तीन प्रकरणे या पुस्तकात आली आहे . या दोन दिग्गज वैदिक ऋषी बद्दल मी इतर अनेक ठिकाणी खूप ओझरते उल्लेख ऐकले होते , पण या कादंबरीत विस्तृत माहिती मिळाली , व एक वेगळेच समाधान मिळाले . कादंबरीचा शेवट आपल्याला पुस्तकातील आधीच्या अनेक कथावस्तू पासून एका वेगळ्याच दुनियेत घेऊन जातो .. याच सातव्या शतकात वायव्येकडून अरब लोकांची आक्रमणे सुरू झाली होती . तोपर्यंत भारतवर्षात लढली जाणारी युद्ध फक्त रणांगणावर लढली जात , त्याचा सामान्य जनतेला कुठलाही त्रास होत नसे . पण अरबांनी केलेल्या आक्रमण मुळे भारताचा सांस्कृतिक ढाचा कसा उद्ध्वस्त होऊ लागला याचे अचूक व सत्य वर्णन भैरप्पा यांनी केले आहे . ते वाचताना तेव्हाही हिंदूंची सद्गुण विकृती ( अनावश्यक असलेली अती सहिष्णुता ) कशा प्रकारे हिंदूंचा नाश करते हे ही त्यांनी सांगितले आहे . ती सर्व शेवटची प्रकरणे आपण सर्व हिंदूंनी मुळातच वाचण्यासारखी व अभ्यास करण्यासारखी आहे . एका प्रसंगात जेव्हा काही राजे एकत्र येऊन अरबांवर आक्रमण करण्याचे योजतात , तेव्हा धूर्त अरब त्या गावातील सूर्यमंदीर भ्रष्ट करायची धमकी देऊन त्या गावातील लोकांना युद्ध करण्यापासून व बाहेरून आलेल्या सैनिकांना सहाय्य न करण्याचे वचन घेतात . त्यामुळे जे नको तेच होते , व हळूहळू तो प्रदेश अरबांच्या ताब्यात जाऊन तेथला बौद्ध , वैदिक हिंदू धर्म नष्ट होऊ लागतो , याचे विदारक वर्णन आपल्यासमोर येते . हे वाचताना मला १७५१ साली नानासाहेब पेशव्यांनी काशी वर आक्रमण करून ते क्षेत्र मुक्त करण्याच्या प्रसंगाची आठवण झाली . तेव्हाही काशी मधील जनतेने नानासाहेब पेशव्यांना रोखले होते , नाहीतर तेव्हाचा ज्ञानवापी मंदीर मुक्त झाले असते ... तेव्हाही हिंदूंची सद्गुण विकृती आड आली जशी ती सातव्या शतकात ही आड आली होती .. असो --- अनेक अद्भुत प्रसंगातून आपल्याला ही कादंबरी घेऊन जात राहते ..सातव्या शतकातील भारताचे वर्णन वाचून आपण त्यावेळच्या राजांची वृत्ती , जनतेचा स्वभाव , साधू तसेच बौद्ध भिक्खू यांचे स्वभाव, त्यांचे विचार आपल्याला कळत जातात . लेखक आपल्याला नालंदा विद्यापीठ देखील दाखवून आणतो . त्याकाळात तेथील अध्ययन कसे चालत असे , हेदेखील आपल्याला वाचायला मिळते . पुस्तकाला कादंबरीची मोकळीक असली तरी आपल्याला ऐतिहासिक दृष्टिकोन ही मिळतो , हे नक्की ! ही कादंबरी वाचून होताच, भैरप्पा यांच्या इतर सर्व कादंबऱ्या व पुस्तके वाचण्याची उत्सुकता निर्माण झाली आहे , व ती इच्छा ही लवकरच पूर्ण होईल ही आशा! ...Read more

I HAVE A DREAM
I HAVE A DREAM by RASHMI BANSAL Rating Star
Krishna Diwate

‘स्टे हंग्री स्टे फूलीश’ आणि ‘कनेक्ट द डॉटस’ या बेस्ट सेलर पुस्तकाच्या लेखिका ‘समाजातल्या परंपरागत समस्या सोडवण्याचा नवा मार्ग शोधून काढणार्‍या वीस सामाजिक उद्योजकांच्या प्रेरणादायी कहाण्या’ हे वाक्य पुस्तकाचे पहिले पान उघडले आणि दिसले. त्यामुळे माझ कुतुहल चाळवले आणि ते पुस्तक वाचायला सुरुवात केली. मनोगतात लेखिका म्हणतात की, आता नव्या दमाचे, डोक्याने आणि मनाने ही विचार करणारे काही जण एखाद्याच्या नजरेतील दुःख ओळखतात, पेटून उठतात; पण ते त्याच्यावर विचार एखाद्या उद्योजकाप्रमाणे करतात. म्हणून ते ‘सामाजिक उद्योजक.’ नफा मिळविण्याचा हव्यास नसला तरी ते बिझनेस मधील तत्वे वापरून ती गोष्ट साध्य करतात. हे काही तरी वेगळे आपण वाचत आहोत असे मला वाटले. त्यामुळेच ते पुस्तक वाचायला घेतले. ह्या मध्ये वीस लोकांची चरीत्रे आहेत. ते सर्व भारतीय, उच्चशिक्षित तरूण तरूणी आहेत. कोणी त्यातील शास्त्रज्ञ आहेत तर कोणी मरिन बायोलॉजिस्ट, आयआयटी, आयआयएम ग्रॅज्युएट आहेत पण कोणत्या कोणत्या सामाजिक प्रश्नाने ते अस्वस्थ झाले आणि नेहमीच्या मार्गाने न जाता वेगळीच वाट पकडली. पुस्तकात ‘रेनमेकर्स,’ ‘चेंजमेकर्स’ व ‘स्पिरिच्युअल कॅपिटॅलिस्ट’ असे तीन भाग आहेत. प्रत्येकात अनुक्रमे अकरा,सहा व तीन व्यक्तीमत्वांची ओळख करून दिली आहे. ‘सुलभ’ ही आधुनिक टॉयलेटस उभारणारे बिंदेश्वर पाठक ह्याच्या चरित्राने पुस्तकाची सुरुवात होते. जातीने बिहारमधील ब्राह्मण. पण लहानपणी टॉयलेटस साफ करणार्‍याला हात लावला त्यामुळे आजीने अक्षरशः शेण, गोमुत्र खायला लावले. पण त्याच बिंद्रेश्वरांनी अगदी योगायोगाने ह्याच क्षेत्रात काम करण्याचे ठरविले. अर्थात ही वाट निश्चितच सोपी नव्हती. अनेक हालअपेष्टा सोसत, जगाचे धक्के खात, अनेक समस्यांना तोंड देत आपले स्वप्न ‘सुलभ शौचालयाच्या’ माध्यमातून सुरु केले. तो सगळा खडतर प्रवास अर्थात पुस्तकातूनच वाचायला हवा. त्यासाठी त्यांनी केवळ ती यंत्रणा तयार केली नाही तर ती टॉयलेटस बांधून, त्यासाठी लागणारी प्रेरणा, शिक्षण, संभाषण, ट्रेनिंग, पाठपुरावा अशा सर्वच गोष्टी ‘सुलभ’ तर्फेच संभाळल्या जातात. सध्या ही संस्था स्वबळावर चालते. 100 ते 125 कोटी इतके तिचे वर्षाचे उपन्न आहे. इतकेच नाही पूर्वी जे लोक सफाईचे काम करत असत त्यांच्या मुलांच्या शिक्षणाचा खर्च संस्था करत आहे. ‘सुलभ पब्लिक स्कूल’ नावाने शाळा सुरु केली आहे. तरूणांसाठी व्होकेशनल क्लासेस चालवले जातात. म्हणजे मिळालेला नफा पुन्हा त्याच सफाई कामगारांच्या कल्याणासाठी वापरला जातो. टॉयलेटस बांधून भरपूर पैसा मिळवता येतो हे वाक्य पचायला जरा जडच जाते. अनिता आहुजा ही दिल्लीत सुखवस्तू कुटूंबात रहाणारी सामान्य स्त्री. पण कचरा वेचणार्‍या मुलांचे हाल पाहून त्यांच्यासाठी काही तरी करावे असे तिने ठरविले. तिने 1998 मध्ये कॉन्झर्व्ह नावाची संस्था उभी केली. व त्यातून पहिला प्रोजेक्ट सुरु केला तो म्हणजे आजुबाजूच्या परिसरातील कचरा उचलून त्याचे कंपोस्टखत तयार करणे. कचरा गोळा करण्यासाठी चांगल्या ढकलगाड्या आणल्या, युनिफॉर्म, आय कार्डची सोय केली. 2002 पर्यंत एक पूर्ण वेळ काम करणारी मोठी संस्था बनली. त्याचवेळी त्यांनी प्लॅस्टीकच्या कचर्‍यावर प्रयोग सुरु केले. तिचे पती शलभ ह्यांनी बिटस पिलानी मधून इंजिनिअरींग केले आहे. त्यांच्या मदतीने तिने फॅक्टरी सुरु करण्याचे ठरविले. शलभने मोठ्या प्रमाणावर प्लॅस्टिक शीटस निर्मिती करू शकेल असे मशीन तयार केले. त्यासाठी अर्थातच अनेक प्रश्न समोर उभॆ राहिले. चुका झाल्या, ठोकरा खाल्या पण त्यातून वाट काढत त्यांनी चिकाटीने प्रयत्न सुरुच ठेवले. आज दोघे मिळून कचर्‍यातील प्लॅस्टिक पिशव्या वापरून आकर्षक अशा हॅडबॅगस तयार करण्याचा कारखाना चालवतात. जे लोक सुरुवातीला केवळ कचरा उचलण्याचे काम करत होते, त्यांच्या काही कौशल्य दिसले की त्यांना वेगळे काढून ट्रेनिंग दिले जाते. मशीनवर असिस्टंटचे काम करू लागतात त्यातून काही लोक तर ग्रुप लिडर ही झाले आहेत. कटींग करणॆ, क्वालिटी तपासणॆ, फिनिंशींग, पॅकिंग अशी सर्व महत्वाची कामे ते करतात. आता ते कामगार झाल्यामुळॆ त्यांना चांगला पगार, प्रॉव्हिडंट फंड, ओव्हरटाईम अशा सुविधा मिळू लागल्या त्यापेक्षा ही जास्त त्यांना समाजात प्रतिष्ठा मिळाली. त्यांच्या साठी हे नवीनच आहे. अनिता व शलभ दोघॆही मेहनत घेतात पण एनजीओ असून ही भरपूर पैसा कमावणे त्यांना चुकीचे वाटत नाही. कारण आज ह्या एका उद्योगामुळे कित्येक कुटूंबाची आर्थिक स्थिती बदलून गेली आहे. अशीच अजून एक प्रेरणादायी कथा दिल्लीतील रंगसूत्र कंपनी चालविणार्‍या सुमिता घोस ह्यांची. स्वतः ग्रॅज्युएशन पूर्ण केल्यावर मास्टर इन इकॉनॉमिक्स ची पदवी घेतल्यावर संजॉय घोस ह्या या आय आर एम मधून शिक्षण घेतलेल्या ध्येयवादी तरूणाशी लग्न केले. पण दुर्दैवाने आसाममध्ये काम करत असताना त्यांची 1998 मध्ये उल्फाच्या अतिरेक्यांनी हत्या केली. त्यानंतर अनेक टक्केटोणपे खात, दोन लहान मुलांचा संभाळ करत सुमिताने ‘रंगसूत्र’ नावाची कंपनी काढली. त्याच्या मार्फत ती खॆडॆगावातल्या लोकांकडून कापड, शोभॆच्या वस्तू, बनवून घेते आणि त्या फॅब ईंडीयासारख्या प्रसिध्द कंपन्यांना विकते. जैसलमेर, बारमेर जिल्ह्यातले कारागिर तिच्यासोबत काम करत आहेत. अजून एक अशीच ध्येयवादी तरूणी म्हणजे इशिता खन्ना. डेहराडून मध्ये जन्म झालेली एक सर्वसामान्य मुलगी. पण निसर्गसंवर्धन आणि भूगोल या विषयांची आवड असलेली. म्हणूनच तिने आपल्या ग्रॅज्युएशन नंतर टाटा इंन्स्टीट्यूट मधून मास्टर्स केले. पर्यावरण क्षेत्रातच काम करायचे आहे हे निश्चित ठरवून तिने काही वर्षे नोकरी केली. त्यानंतर 2002 मध्ये नोकरी सोडून आपल्या दोन मित्रांसोबत स्पिती व्हॅलीमध्ये मूस नावाची एन्जीओ सुरु केली. तेथील स्थानिक महिलांचे ग्रुपस करून त्यांना तिथे असणार्‍या सीबक थॉर्न ह्या फळांच्या लागवडीचे ट्रेनिंग दिले. त्यावर प्रक्रिया करायला शिकवले. ही झाडॆ मातीला धरून ठेवतात त्यामुळे धूप रोखली जाते, शिवाय नायट्रोजन ही धरून ठेवत असल्याने जमिनीचा पोत सुधारतो. त्यामुळे ह्या फळांवर लक्ष केंद्रित केले. त्यामुळे तिथल्या बायकांना चांगला रोजगार मिळू लागला. त्याचबरोबर तिने स्थानिक तरूणांना पर्यटकांना ट्रेक किंवा जीप सफारीसाठी नेणे, कॅम्प लावणे, गरज पडल्यास प्रथमोपचार करणे ही कामे ही करायला शिकवले. कारण हळूहळू तिथे पर्यटन वाढू लागले. ते इको-फ्रेंडली करण्याकडॆ तिच्या इकोस्पियर संस्थेचा भर आहे. आता दरवर्षी पर्यटनातून 35 ते 40 लाखाचे उत्पन्न मिळते.आणि त्यातून नफा ही मिळतो. इकोस्पियर संस्थेने शेजारच्य़ा ‘लाहुल’ व्हॅलीमध्ये ही विकास कामे सुरु केली आहेत. पर्वतावर तयार होणार्‍या कचर्‍याच्या समस्येवरही तिला काहीतरी करायचे आहे. तिची संस्था लोकांना मुद्दाम तिथले लोक किती अवघड परिस्थितीत रहातात हे दाखवते. अतिशय थंडीत तिथे तापमान मायनस 35 पर्यंत खाली गेल्यावर हॅंडपंपने पाणी काढणे सुध्दा किती कठीण होते हे सांगितले जाते. तेव्हा आपल्यासारख्य़ा पर्यटकांना काय काय करता येईल याबद्दल ती जागरूकता निर्माण करते. मूळात हे पुस्तक 2012 साली लिहिलेले आहे. त्यामुळे आता ह्या वेगवेगळ्या प्रकारचे काम करणार्‍या संस्थेचे काम या दहा वर्षात खूपच वाढले असेल यात काही शंका नाही. दीनबंधू साहू हे मरिन बायोलॉजिस्ट आहेत पण ते प्रयोगशाळेतून बाहेर पडून समाजासाठी काम करतात. ‘प्रोजेक्ट चिलका’ ह्या त्यांच्या संस्थेमार्फत ओरिसातील लोकांना समुद्राची शेती करायला शिकवतात. ओरिसा मधील पुरी येथे जन्म झालेल्या दीनबंधूनी अतिशय हलाखीच्या परिस्थितीत शिक्षण घेतल्यानंतर दिल्लीत एमएसीला ॲडमिशन घेतली. परंतु योगायोगाने १९८७ मध्ये अंटार्क्टिक वर जाण्याची संधी मिळाली. नंतर पीएचडी पूर्ण केल्यानंतर अनेक देशांमध्ये नोकरी निमित्ताने फिरले. पण तरीही शेवटी दिल्ली युनिव्हर्सिटी मध्ये प्रोफेसर म्हणून काम सुरू केले. त्यांना समुद्री वनस्पती बद्दल विशेष आस्था होती; पण त्या बद्दल आपल्या देशात फारशी जागरूकता नव्हती. ही लागवड पर्यावरण पूरक असते शिवाय त्यातून स्थानिक लोकांना उत्पन्नाचे साधन मिळते. त्यासाठी डिएसटीने निधी मंजूर केला. मग त्यांनी चिल्का सरोवराची पहाणी केली, त्यामध्ये वाढू शकतील अशा चार जातींची निवड करून स्थानिक लोकांना समजेल अशा सोप्या भाषेत माहिती दिली. प्रात्यक्षिके दाखवली, वर्कशॉप्स घेतली. त्यामुळे तेथील शेतकऱ्यांना रोजगार मिळू लागला. यातूनच पर्यावरण संरक्षण ही होऊ लागले. यातून त्यांना प्रत्यक्ष कांहीं आर्थिक फायदा होत नसला तरी ते म्हणतात, की आम्हाला दोघांना दिल्लीत चांगली नोकरी आहे. त्यामुळे पैसे कमावणे हा उद्देश नाही; पण अजून तीस वर्षांनंतर मला मी काही तरी काम केलेले दिसेल. असे जर काहीच तुम्हाला दिसणार नसेल तर जगायचे कशाला? भूषण पुनानी हे असेच अत्यंत बुध्दीमान विद्यार्थी. मेडीकलची ॲडमिशन हुकल्यामुळे डेअरी कोर्ससाठी ॲडमिशन घेतली. तिथे ही विद्यापीठात प्रथम क्रमांक मिळविला. नंतर पीएचडी केले. ग्रामविकास शिकण्यासाठी आयआयएम मध्ये एमबीए केले. हे झाल्यावर 1979 मध्ये ब्लाईंड स्कूल मध्ये दोन वर्षांसाठी नोकरी सुरु केली ती सुधा ह्याच हेतूने की मॅनेजमेंट शिकताना जी थेअरी शिकलो ती विकासाच्या क्षेत्रात वापरता येईल का? हळूहळू त्यांना अनेक लोक मिळत गेले. सर्वांनी मिळून आज संस्था खूप मोठी केली आहे.त्यांनी काम सुरु केले तेव्हा फक्त एक कॅपस होता, आज गुजरात मध्ये आठ कॅपस आहेत. दहा लाख मूल्य असलेली संस्था आज दोन कोटी रुपयांची आहे. अपंग लोकांनी स्वावलंबी व्हावे ह्यासाठी संस्था काम करते. दृष्टीहीन मुली ब्यूटी पार्लरसारखे कोर्स चालवतात, फिजिओथेरपी शिकून सेंटर मध्ये काम करतात. विकास साधण्यासाठी योग्य व्यवस्थापनेची गरज असते हे त्यांनी दाखवून दिले आहे. हजारो लोकांच्या आयुष्यात नवा प्रकाश निर्माण करून त्यांना सामान्य आयुष्य जगण्याची संधी मिळवून दिली आहे. अशी ही एकापेक्षा एक वेगवेगळ्या प्रकारची माणसे. कोणत्या तरी ध्येयाने पछाडलेली . सामाजिक कार्य करत असतानाच त्या लोकांचे कल्याण कसे होईल असा विचार करणारी. लेखिकेने त्या सर्वांच्या प्रत्यक्ष मुलाखती घेतल्या आहेत, त्यांचे काम प्रत्यक्ष पाहून जाणून घेतले आहे. त्यामुळे सर्व माहिती व्यवस्थित गोळा करून आपल्यासमोर मांडली आहे. त्यामुळेच त्या मनोगतात म्हणतात, ‘तुमचं आयुष्य कसे ही असले तरी इतरांसाठी एखादा क्षण द्या. इतरांना प्रेम, आनंद, चांगुलपण द्या. जितकं द्याल तितकं तुम्हाला परत मिळेल.’ हेच वाक्य मलाही अतिशय उर्जा देऊन गेले. माझ्याकडे जे आहे, जे मला देणे शक्य आहे ते निरपेक्षपणे ज्यांना गरज आहे त्याला देणे ह्या सारखा आनंद अजून काय असणार? ह्याच वाक्याने मी आपली ह्या आठवड्यात रजा घेते. उद्या पासून सुरु होणार्‍या नवीन सत्रासाठी सारिका ताईंना हार्दिक शुभेच्छा. ...Read more