* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
HOW CAN SHIVAJI’S WORK GUIDE TODAY’S SECULAR DEMOCRACY? WHAT IS THE TRUE MEANING OF SHIVAJI MAHARAJ’S SWARAJYA? WHAT IS THE INTERPRETATION OF SHIVAJI MAHARAJ’S CORONATION? WHAT DO THE HISTORIANS EXPECT FROM LITERATEURS? DR. JAISINGRAO PAWAR PRESENTS ANSWERS TO MANY SUCH QUESTIONS THROUGH THIS BOOK. HE HAS ALSO INCLUDED VARIOUS ARTICLES ON SHIVAJI’S NAVY, COMMANDER-IN-CHIEF HAMBIRRAO MOHITE, ATTEMPT OF SHIVAJI’S ASSASSINATION, ETC.IN THIS BOOK.
आजच्या आपल्या धर्मनिरपेक्ष लोकशाही राज्यात शिवचरित्र आम्हास कसे मार्गदर्शक होऊ शकते?.... शिवछत्रपतींच्या ‘स्वराज्याचा’ खरा अर्थ कोणता?.... शिवराज्याभिषेकाचा अन्वयार्थ काय?.... ऐतिहासिक ललित साहित्यिकांपासून इतिहासकारांची कोणती अपेक्षा आहे?... इत्यादी प्रश्नांचा ऊहापोह महाराष्ट्रातील ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ. जयसिंगराव पवार करत आहेत. याशिवाय शिवछत्रपतींचे आरमार, त्यांचे मुंबईकर इंग्रजांशी असलेले सबंध, सरसेनापती हंबीरराव मोहिते, शिवछत्रपतींवरील खुनी हल्ला इत्यादी विषयांवरील महितीपूर्ण लेख.

No Records Found
No Records Found
Keywords
#SHIVCHARITRAPASUN AAMHI KAY SHIKAVE #JAYSINGRAO PAWAR #SHIVAJI #HAMBIRRAO MOHITE #शिवचरित्रापासून आम्ही काय शिकावे? #शिवाजी #जयशिंग पवार #हंबीरराव मोहिते
Customer Reviews
  • Rating StarPratik Patole

    इतिहासातून प्रेरणा घ्यायची असते.इतिहास विसरून ही चालत नाही. जे राष्ट्र इतिहास विसरत (किंवा चुकीचा समजून घेत) ते राष्ट्र कधीच इतिहास घडवू शकत नाही. छत्रपती शिवाजी महाराज तर संपूर्ण जगासाठी नवसंजीवनी. युगपुरूष छ.शिवराय हे आपल्या मातीत जन्मले हे आपल्यासठी मोठी अभिमानास्पद गोष्ट आहे. शिवचरीत्रातील प्रत्येक घटनेतून काहीतरी घेण्यासारखे आहे. अश्या वेळी *शिवचरित्रापासून, आम्ही काय शिकावे..?* या पुस्तकात लेखक डॉ.जयसिंगराव पवार अगदी सोप्या शब्दात शिवचरित्रातून आपण काय शिकावे सांगतात. डॉ.जयसिंगराव पवार हे वर्तमानातील निपक्ष इतिहासकार म्हणून ओळख आहे. वाचताना ही वाचकांना हे लगेच समजते. 45 हुन अधिक शोधनिबंध, 25 हुन अधिक इतिहासविषयक ग्रंथ लेखन त्यांनी केले आहे. ◆हा नऊ लेखांचा लेखसंग्रह आहे. त्याप्रकरणांची माहिती पुढीलप्रमाणे- *१)शिवचरित्रापासून आम्ही काय शिकावे.* शिवचरित्र अभ्यासाचा आजच्या घडीला व आजच्या पिढीला काय फायदा..? शिवाजी महाराज हिंदूधर्म रक्षक होते का..? किंवा ते केवळ हिंदूंचेच राजे होते का..? शिवाजी महाराजांनी इस्लामी प्रजेला कशाप्रकारे वागणूक दिली. महाराजांनी स्वभाषेचं (मराठी) महत्व ओळखून कशापद्धतीने भाषेच संवर्धन केले. हिंदुत्व म्हणजे काय..? या सर्व प्रश्नांची उत्तरे या प्रकरणामध्ये सापडतात. यावेळी लेखकांनी जेव्हा हिंदूंवर जिझिया कर लादला तेव्हा महाराजांनी औरंजेबाला लिहलेल्या पत्राचा संदर्भ,तसेच विविध संदर्भ लेखक देतात. *या प्रकरणातील काही निवडक वाक्य-* ◆शिवाजी महाराजांनी हिंदू धर्माचे जितके रक्षण केले हे जितके खरे तितके त्यांनी दुसऱ्या धर्माचा तिरस्कार केला नाही. ◆महाराजांनी शत्रू ज्या धर्माचा होता,त्या धर्माच्या लोकांच्या कत्तली अथवा प्रार्थना स्थळे सूडबुद्धीने उद्ध्वस्त केले नाहीत. ◆धर्मवेडाने राज्य (प्रगती)होत नाही. ◆खरे हिंदुत्व हे वैश्विक बंधुभावाचा पुरस्कार करते, ते अन्य कोणाचा व्देष करत नाही. ◆महाराजांनी इस्लामी शत्रूशी संघर्ष केला पण इस्लामी जनतेशी नाही. *२)शिवछत्रपती:रयतेचा राजा* राज्याभिषेक करण्याची का गरज होती..? रयतेच्या पैशावर ऐशोआराम करणाऱ्या जमीनदारांवर महाराजांनी लादलेली बंधने. वतनदारांच्या कडून होणारी रयतेची पिळवनुक कशाप्रकारे थांबवली..? मोरया गोसावींच्या देवस्थानच्या कचाट्यातून रयतेची मुक्तता व देवस्थानचे संवर्धन. रयतेला त्रास होऊ नये म्हणून महाराजांनी लावलेली सैन्याला शिस्त. आर्थिकदृष्ट्या दुर्बल रयतेला अनेक योजना राबवून कसे स्वावलंबी बनवले. याची माहिती आपल्याला या प्रकरणातून मिळते. यातून आजच्या राज्यकर्त्यांनी काहीतरी घेतले पाहिजे. *या प्रकरणातील काही निवडक वाक्य* ◆शिवछत्रपतींचे स्वराज्य हे वतनदारासाठी नव्हते. ते बहुजनांच्या,रयतेच्या सुखासाठी,कल्याणासाठी होते. ◆राज्याभिषेक ही कामगिरी शिवछत्रपतींची त्यांच्या लष्करी पराक्रमाइतकीच महत्वाची आहे. ◆स्वराज्याचे सैनिकच जर रयतेस लुबाडू लागले तर मग स्वराज्य ते कसले?आणि मग मोगलांईत आणि आपल्यात फरक तो काय..( मावळ्यांना रयतेला त्रास झाला नाही पाहिजे हे समजवतानाचे महाजांच्या तोंडचे वाक्य..) *३)शिवछत्रपतींची एक आरमारी मोहीम* शिवाजी महाराजांची बसरूरची एकमेव आरमार मोहीम. बसरूरच्या मोहिमेचे वैशिष्ट्ये, बसरूर स्वारीचे ऐतिहासिक महत्त्व, शिवछत्रपतींचे शत्रूच्या प्रदेशातील रयतेसोबत चे संबंध. शत्रू प्रदेशातील रयतेला ही स्वराज्य प्रेरणा महाराजांनी कशी दिली. शिवछत्रपतींचे आरमार. याची माहिती या प्रकरणात मिळते. *प्रकरणातील काही निवडक वाक्य.* ◆अखिल हिंदुस्थानात मोगली सत्तेला आव्हान देण्याचे सामर्थ्य व मनोधैर्य कोणाही हिंदू अथवा मुस्लिम राजाकडे नव्हते. अशा परिस्थितीत दक्षिणेतील मराठ्यांच्या राजाने -शिवछत्रपतींनि- दिले. ◆बादशहा अकबरापासून औरंजेबापर्यंतचे हे दिल्लीपती सागरावर मात्र हतबल ठरले. ◆शिवछत्रपतींचे पश्चिम किनाऱ्यावर स्वतंत्र आरमाराची स्थापना आणि उभारणी केली; एवढेच नव्हे तर सागरावर अधिराज्य गाजवणाऱ्या उपरोक्त परकीय सत्तांच्या हृदयात विलक्षण दहशद निर्माण केली. ◆शिवचरित्रामधील अफजलखान वध, शाहिस्तेखानावरील छापा यासारखे महाराजांचे प्रसिध्द पराक्रम सर्वांनाच परिचित असतात. त्या मानाने महाराजांचे हा सागरावरील पराक्रम तसा उपेक्षित राहिला आहे. *४)मराठा आरमाराचे जनक:शिवछत्रपती* महाराजांनी परकीय शत्रूला तिलांजली देत कशाप्रकारे मराठा आरमाराची उभारणी केली. मराठा आरमाराचे महत्व. सिद्धी कोण होते...? आंतरराष्ट्रीय कीर्तीचे राजे शिवछत्रपती. आरमार बांधणीचे तंत्र हिंदुस्थानातील कोणत्याच सत्तेला अवगत नसताना आरमाराची उभारणी कशी केली. परकीय पोर्तुगीजांचे सहकार्य कशाप्रकारे घेतले. महाराजांचे आरमारी सामर्थ्य, महाराजांचे आरमारी सत्तांशी संधर्ष. अंधश्रद्धेला महाराजांनी दिलेली तिलांजली(समुद्र उल्लंधन,समुद्रपर्यटन-निषिद्ध). ही सर्व माहिती या प्रकरणात मिळते. *काही निवडक वाक्य* ◆नव्यानेच स्थापन झालेल्या मराठी आरमाराकडून इंग्रजांसारख्या युरोपियन आरमारी सत्तेचा पराभव व्हावा, ही गोष्ट सर्व युरोपियन राष्ट्रांना नामुष्कीची, तर सर्व हिंदुस्थानात मोठी अभिमानाची होती! ◆हिंदू लोकांच्या मूर्ख समजुतीपैकी `समृद्रपर्यटन-निषिद्ध`ही एक होती.शिवछत्रपतींनी या समजुतीला तिलांजली देऊन स्वतंत्र आरमार दलाची स्थापना केली. ◆`The Father of the Maratha Navy And Creator of the Indian Merchantil Marine` *५)शिवछत्रपतींवरील एक खुनी हल्ला* संबंध हिंदुस्थानाला व व्यापार करणाऱ्या युरोपियन लोकांना धास्तावून सोडणाऱ्या सुरत लुटीचे वर्णन याप्रकरणात केले आहे. सुरतेचे मोघलांच्या दृष्टीने असणारे महत्व, सुरतेला जाण्यापूर्वी केलेले नियोजन, इनायतखानाचा भष्ट्राचार, सुरतेच्या लुटीवेळी तहा दरम्यान झालेला महाराजांच्या वरील खुनी हल्ला, गुन्हेगारांना दिली जाणारी शिक्षा याची माहिती मिळते. *६)शिवछत्रपतींच्या राज्याभिषेकाचा अनव्यार्थ* राज्याभिषेक कश्यासाठी..? राज्याभिषेकासाठी झालेला विरोध. राज्याभिषेक समयीचे प्रश्न,राज्याभिषेकाचे महत्व.पृथ्वी नि:क्षत्रिय सिद्धांत, ही माहिती या प्रकरणात मिळते. *प्रकरणातील काही निवडक वाक्य.* ◆समाज्याच्या धारणेसाठी जे स्वतःला धर्मवेत्ते म्हणवून घेत होते, समाज्याचे वैचारिक नेतृत्व करीत होते, त्यांनीच क्षत्रियांचे खच्चीकरण करण्यासाठी `पृथ्वी नि:क्षत्रिय` सिद्धांत शोधून काढला. ◆समाज्याचे संरक्षण करण्याची जबाबदारी ज्या क्षत्रियांवर होती, त्यांचे अस्तित्व आमच्या धर्मपंडितांनी नाकारले.तेव्हा क्षत्रियच नसतील तर राजा कसा होणार.(परशुरामाने 21 वेळा पृथ्वी नि:क्षत्रिय केली.) ◆(राज्याभिषेका मुळे)या राज्याच्या धार्मिक, सांस्कृतिक व राजकीय अधिष्ठान प्राप्त झाले.मराठ्यांचा अभिषिक्त राजा `छत्रपती` म्हणून जाहीर झाला. डोईवर छत्र धारण करणारा हा राजा म्हणजे मराठ्यांच्या स्वतंत्र व सार्वभौम सत्तेचे प्रतीक बनला. ◆"या युगी सर्व पृथ्वीवर म्लेंच्छ बादशहा. मऱ्हाठा पातशहा येवढा छत्रपती जाला." *७)शिवछत्रपती व मुंबईकर इंग्रज* शिवछत्रपतीना मुंबईकर इंग्रजनच्याकडून काय हवे होते.इंग्रज रंग बद्दलणाऱ्या सरड्याप्रमाणे परिस्थितीनिरुप कसे रंग बदलत होते. इंग्रज हे फक्त व्यापारासाठी आलेले नाहीत याची शिवरायांना आलेली कल्पना, महाराजांनी स्वराज्यात व्यापारासाठी इंग्रजांना घालून दिलेले नियम. खांदेरीची लढाई याची माहिती या प्रकरणात होते. *निवडक वाक्य..* ◆`टोपीकर`व्यापारी म्हणजे आपल्याकडील बनियांप्रमाणे निरुपद्रवी नसून,प्रसंगी उपद्रव निर्माण करणारे आहेत,याचीही जाणीव त्यांच्याकडे(महाराजांच्याकडे) होती. म्हणूनच त्यांच्याशी वागताना केव्हा गरम तर केव्हा नरम धोरण महाराजांनी स्वीकारले होते. *८)शिवछत्रपतींचा सेनापती:हंबीरराव मोहिते* हे प्रकरण म्हणजे सरसेनापती हंबीरराव मोहिते यांचे छोटेसे चरित्रच आहे. यामध्ये माणसे निवडन्याची महाराजांची पद्धत, व हंबीरराव मोहिते यांनी गाजवलेली पराक्रम तसेच गनिमी कावा म्हणजे काय..? छत्रपतींच्या घराण्यातील गृहकलश महाराजांनी कशापद्धतीने थांबवला, सेनापती कसा असावा यांची माहिती मिळते. *प्रकरणातील काही निवडक वाक्य* ◆सेनापती म्हणून हंबीररावांची निवड ही वंशपरंपरेच्या तत्वाने न होता गुणांच्या निकषावर झाली होती. ◆प्रत्येक लढाई आपल्या प्रतिष्ठेची समजून आपल्या सैनिकांची प्राणहानी करीत नाही. बऱ्याच वेळा यशस्वी हल्ला व त्याहून महत्वाचे म्हणजे यशस्वी माघार हे गनिमी काव्याच्या यशाचे रहस्य. *९)इतिहास आणि ऐतिहासिक ललित साहित्य..* इतिहासकार व ऐतिहासिक ललित साहित्यिक(कादंबरीकार) यांच्यामधील नाते, इतिहासकार व ललित साहित्याकांचे संधर्ष व त्यामागील कारणे, ललित साहित्यिकांकडून होणारे इतिहारासची विद्रुपीकरण व त्यामागील कारणे, समर्थ रामदासांना शिवरायांचे गुरू ठरवण्याचा झालेला प्रयत्न(लेखक यावेळी वर्तमान साहित्यिकांचे संदर्भ ही देतात), सोर्याबाईना खलनायिका ठरवण्याचा झालेला प्रयत्न या सर्वांची माहिती या प्रकरणातून होते. *प्रकरणातील काही निवडक वाक्य.* ◆इतिहासकार सत्य कथन करताना बुद्धीचा अवलंब करत असतो, तर साहित्यिक भावनेचा अवलंब करत असतो. ◆साहित्यात इतिहासाच्या विकृतीकरणाचा दोष प्रामुख्याने तीन कारणामुळे संभवतो. पाहिले कारण साहित्यिकांचे ऐतिहासिक अज्ञान. दुसरे कारण साहित्यिकाला आपली साहित्यकृती अधिक नाट्यमय करण्याचा झालेला मोह आणि तिसरे कारण म्हणजे *साहित्यिकांचे विशिष्ट अशा विचारप्रणाली अथवा पक्षाशी असणारी निष्ठा.* शिवचरित्रातील विविध धटनांवर प्रकाश टाकणारे, शिवरायांच्या विविध पैलूंचा दर्शन घडवणारे व सद्यस्थितीत आपण शिवचरित्रातून काय शिकावे हे सोप्या शब्दात सांगणारे, शिवरायांच्या जीवनातील काही घटनांचे ऐतिहासिक महत्त्व सांगणारे,छोटेखानी शिवचरित्र आपण एकदा वाचावे, संग्रही ठेवावे. धन्यवाद..! आपलाच-प्रतीक पाटोळे. विद्यार्थी-तात्यासाहेबांचा कोरे अभियांत्रिकी महाविद्यालय वारणानगर. 7559198475 ...Read more

  • Rating StarAjay Bobade

    छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनातील काही घटनांबाबत ऐतिहासिक माहिती देणारे पुस्तक आहे. यांमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची हिंदवी स्वराज्याची संकल्पना, त्यांचे धर्मनिरपेक्ष धोरण, रयत व कल्याणकारी प्रशासन, त्यांचा राज्याभिषेक यासंदर्भात लिहीलेले छोटेलेख आहेत. त्याचबरोबर छत्रपती शिवाजी महाराजांचे आरमार, छत्रपती शिवाजी महाराजांनी जीवनात केलेली एकमेव आरमारी मोहीम म्हणजेच `बसरूर ची मोहीम` याबाबत माहिती आहेच, त्याचबरोबर छत्रपती शिवाजी महाराज व इंग्रंज यांचे संबंध व छत्रपती शिवाजी महाराजांवर सुरतेच्या मोहिमेदरम्यान झालेला खुनी हल्ली याबाबत माहिती आहे. सर्वांनी जरूर वाचावे असे. मला पुस्तकातील आवडलेले एक वाक्य :- "शिवाजी राजा हा इतिहासावरही मात करणारा राजा होता." ! ...Read more

  • Rating StarSandeep Chavan

    जेष्ठ इतिहास संशोधक डॉ. जयसिंगराव पवार यांनी मराठ्यांच्या इतिहासाबद्दल आणि शिवरायांच्या कामगिरीवर वेळोवेळी आणि प्रसंगानुरूप अनेक लेख लिहले आहेत. त्यातील नऊ लेखांचा संग्रह म्हणजे ‘शिवचरित्रापासून आम्ही काय शिकावे?’ हे छोटेखानी पुस्तक होय. सुरवातीच्या हिल्या लेखाचे नावच पुस्तकाला दिलेले आहे. शिवछत्रपतींचा काळ आणि आताचा काळ यात कमालीचा बदल झालेला असला तरीही शिवनीती आजच्या घडीला कशी उपयुक्त आहे, शिवचरित्रातून आपण काय बोध घ्यायला हवा, शिवरायांना रयतेचा राजा का संबोधले गेले, त्यांनी रयतेच्या सुखासाठी लोकाभिमुख प्रशासनाची निर्मिती कशी केली इत्यादी प्रशांची उत्तरे ‘शिवचरित्रापासून आम्ही काय शिकावे?’ आणि ‘शिवछत्रपती : रयतेचा राजा’ या पहिल्या दोन लेखात आपल्याला सापडतात. ज्या काळात हिंदुस्थानात समुद्र पर्यटन हे निषिद्ध समजले जात होते आणि हिंदुस्थानच्या सर्व सागरावर पोर्तुगीज‚ सिद्दी‚ इंग्रज‚ डच‚ फ्रेंच‚ अरब यांची सत्ता होती, त्या काळात शिवरायांनी एक सशक्त आरमार उभारले आणि सागरावरील गुलामगिरी संपवली. हिंदुस्थानच्या इतिहासात स्वकीय सत्ताधीशांपैकी फक्त शिवरायांनी आरमाराचे महत्व ओळखले आणि त्याची बांधणी केली, समुद्री सीमांचे रक्षण करण्यासाठी अभेद्य सागरी किल्ले बांधले. म्हणूनच शिवचरित्रकार डॉ. बाळकृष्ण यांनी : ‘The Father of the Maratha Navy and Creator of the Indian Merchantile Marine’ असे शिवरायांचे वर्णन केले आहे. शिवरायांच्या या कामगीरीबद्दलची माहिती लेख क्रमांक तीन ‘शिवछत्रपतींची आरमारी मोहीम’ व लेख क्रमांक चार ‘मराठा आरमाराचे जनक : शिवछत्रपती’ यामध्ये मिळते. तळहातावर प्राण घेऊनच शिवरायांनी आणि त्यांच्या मावळ्यांनी स्वराजांची कल्पना सत्यात उतरवली. अनेक संकटाना ते सामोरे गेले. असाच प्रसंग सुरतेवर केलेल्या पहिल्या हल्ल्यावेळी घडला. सुरतेमध्ये शिवरायांवर अगदी अनपेक्षित झालेला खुनी हल्ला आणि सरंक्षणास असलेल्या मावळ्यांचे प्रसंगावधान याची माहिती पाचव्या लेखात दिलेली आहे. १७ व्या शतकात दक्षिणेतील एका मराठी राजाने स्वत:ला राज्याभिषेक करवून ‘स्वतंत्र व सार्वभौम’ राजा म्हणून घोषित करणे अभूतपूर्व होते. त्या काळी देशात फक्त मोगल बादशाहीच स्वतंत्र व सार्वभौम मानली जात होती. आता असेच एक स्वतंत्र व सार्वभौम राज्य मराठ्यांच्या रूपाने देशात निर्माण झाले. ही घटना सामान्य नव्हती. औरंगजेबला या गोष्टीचा मोठा धोका वाटत होता. औरंगजेब शिवरायांना व स्वराज्याला ओळखून होता. म्हणूनच हे शिवराज्य संपवायला तो स्वतः दक्षिणेत उतरला होता. अखिल हिंदुस्थानच्या इतिहासात शिवराज्याभिषेकाचे असलेले अनन्यसाधारण महत्व विशद करणारा सहावा लेख आहे. सातव्या लेखामध्ये स्वराज्य व इंग्रज यांच्यामध्ये संबंध कसे होते. शिवरायांना इंग्रजांकडून काय हवे होते. इंग्रज रंग बदलणाऱ्या सरड्यासारखे परिस्थितीनुरूप कसे बदलत होते. इंग्रज हे फक्त व्यापारी नाहीत याची शिवरायांना आलेली कल्पना व त्यांना स्वराज्यात व्यापारासाठी घालून दिलेले नियम इत्यादी गोष्टींचा मागोवा ‘शिवछत्रपती आणि मुंबईकर इंग्रज’ या लेखात घेतला आहे. ‘शिवछत्रपतींचा सेनापती : हंबीरराव मोहिते’ हा आठवा लेख म्हणजे पराक्रमी, निष्ठावंत, मुसुद्दी, संयमी, कर्तबगार परंतु मराठ्यांच्या आणि एकूणच हिंदुस्थानच्या इतिहासात उपेक्षित राहिलेल्या सरसेनापतीचे छोटेखानी चरित्रच आहे. हंबीरराव असण्याने स्वराज्याच्या सीमा कश्या वाढल्या व त्यांच्या जाण्याने कोणता अनर्थ घडला याचा उहापोह सदर लेखात केला आहे. अगदी शेवटी ‘इतिहास आणि ऐतिहासिक ललित साहित्य’ या नवव्या लेखात इतिहास व त्यावर आधारित ऐतिहासिक ललित साहित्य यांच्या संबंधांची, इतिहासकार आणि साहित्यिक यांच्या लिखाणातील फरक, इतिहासकाराचे आणि साहित्यिकाचे मतभेद कशामुळे होतात. इत्यादी बाबींची चर्चा केलीली आहे. पुस्तकातील एकूण लेख व त्यांची नावे:- १)शिवचरित्रापासून आम्ही काय शिकावे? २)शिवछत्रपती : रयतेचा राजा ३)शिवछत्रपतींची आरमारी मोहीम ४)मराठा आरमाराचे जनक : शिवछत्रपती ५)शिवछत्रपतींवरील एक खुनी हल्ला ६)शिवछत्रपतींच्या राज्याभिषेकाचा अन्वयार्थ ७)शिवछत्रपती आणि मुंबईकर इंग्रज ८)शिवछत्रपतींचा सेनापती : हंबीरराव मोहिते ९)इतिहास आणि ऐतिहासिक ललित साहित्य पुस्तकाबद्दलचे माझे मत:- शिवकालीन इतिहासातील काही महत्वाच्या घटनांवर प्रकाश टाकणारे व सद्यस्थितीत शिवचरित्रातून काय बोध घ्यायला हवा याचे उत्तम विश्लेषण असणारे हे पुस्तक संग्रही ठेवावे असे आहे. काय बदल हवा:- पुस्तकाच्या आठव्या लेखात (शिवछत्रपतींचा सेनापती : हंबीरराव मोहिते) संभाजीराजांच्या हत्येच्या संदर्भात दोन वेळा चुकीचा शब्द (वध) प्रिंट झाला आहे तो पुढील आवृत्ती मध्ये प्रकाशक, लेखकानी दुरुस्त करावा अशी विनंती आहे. हत्या(खून) आणि वध यात खूप मोठा फरक आहे. तो दुरुस्त करण्यात यावा. @संदिप रामचंद्र चव्हाण ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

HATUMUTUCHA CHANDRA
HATUMUTUCHA CHANDRA by FARUK KAZI Rating Star
परेश जयश्री मनोहर

मराठी बालसाहित्याचा गेल्या काही दशकांचा अवकाश हा सातत्याने प्रबोधनपर, उद्बोधनपर आणि कोणत्याही कथेच्या शेवटी एका वाक्यात तात्पर्य सांगणाऱ्या बाळबोधकथांचा राहिलेला आहे. या बाल साहित्यामध्ये प्रामुख्याने येणारे पात्र ही मध्यमवर्गीय, उच्च जातीय मराठी घरतील मुलं मुली असतात आणि जेव्हा केव्हा वंचित समाजातील, शोषित समाजातील, गरीब ग्रामीण घरातील मुलांचे चित्रण येतं तेव्हा ते अति दुःखी आणि बिचारे, ज्यांना मदतीची गरज आहे आणि अशी मदत करण्याची जबाबदारी मोठ्या घरातील उच्चवर्णीय, उच्चवर्गीय नायक मुला मुलींची असते. त्यातूनही प्रामुख्याने काय करावे काय करू नये किंवा तत्सम उपदेशच प्रामुख्याने कथेच्या शेवटी केलेले दिसतात. आणि हा लेखक वर्ग ही प्रामुख्याने पुणे मुंबई भागात स्थिरावलेला राहणारा तिथल्या अनुभूती आणि तिथल्या जगण्याचा अवकाश सोबत घेऊन येणारा असतो. अशा सगळ्या पार्श्वभूमीवरती सोलापूर जिल्ह्यातल्या सांगोला तालुक्यात अनकढाळ सारख्या एका छोट्या गावात राहणारा फारुक काझी हा लेखक जेव्हा गेलं दशकभर कवितांमधून, कथांमधून बालविश्व चितारण्याचा प्रयत्न करतो तेव्हा ते जास्त करून ग्रामीण भागातील मातीशी जोडलेलं असतं. आपल्या भोवतालच्या खऱ्याखुऱ्या मुलांमुलींच्या भावविश्वाच्या जवळ जाणारं चित्रण त्याच्या कथांमधून आपण सातत्याने बघत असतो. त्याचे "शिकण्याच्या वाटेवरील आनंदवन" हे पहिले पुस्तक एका प्रयोगशील शिक्षकाच्या शाळेतील अनुभवांवर आधारलेले आहे. त्यांचे आजवर मित्र, प्रिय अब्बू, चुटकीचे जग हे कथासंग्रह प्रकाशित झालेले आहेत. या सगळ्याच पुस्तकातून त्याने सातत्याने ग्रामीण, निमशहरी भागातील कनिष्ठ मध्यमवर्गीय आणि गरीब कुटुंबातील बहुजन आणि वंचित घटकातील, मुस्लिम कुटुंबातील मुलांच्या नजरेने दिसणाऱ्या गोष्टी टिपण्याचा प्रयत्न केलेला आहे. यात कुठेही गरिबीचे गोडवे नाहीत की काठोकाठ पसरलेलं बिचारेपण नाही. तर या आर्थिक दृष्ट्या नागवलेल्या लोकांच्या घरातील मुलांच्या कथा आहेत, ज्यात प्रेम, उत्सुकता, जिद्द, समजून घेणे आणि अनुभवातून आलेलं शहाणपण हे प्रामुख्याने जाणवते. अभावग्रस्तता, एखाद्या गोष्टीचे नसणे, तरीही नातेसंबंधांवरील विश्वास, प्रेम आणि एकमेकांबद्दलचा आदर, काळजी घेऊन जपणारी कुटुंबं फारुकच्या लिखाणात सातत्याने येत राहतात. त्याचा आत्ता आलेला हाटूमुटूचा चंद्र हा एक अफलातून कथासंग्रह आहे. यामध्ये फारुकने वेगवेगळे प्रयोग केलेले आहेत जे त्याच्या नेहेमीच्या लेखन शैलीपेक्षा जरा वेगळ्या अंगाने जाणारे आहेत आणि ते उत्तम जमून आलेले आहेत. या दहा कथांमधल्या पहिल्या तीन कथा या मुलांच्या नजरेतून होणारा पर्यावरण विनाश, निसर्गाची भाषा समजून घेण्याचा मुलांचा प्रयत्न आणि नुसते समजून घेणे नाही तर मुलानी आपले हे जग आपण नीट ठेवण्यासाठी केलेले प्रयत्न असे ही आहे. यात आनंद शोधण्याचे मार्ग, जबाबदारीचे असणारे भान आणि काल्पनिक ग्रहाची भेट करवून आणणारी समायरा आपल्याला भेटते, तर मोकळ्या हवेत असणारा आनंद भरुन कसा घेणार असा प्रश्न विचारणारा अर्पित ही भेटतो आणि तसेच टेकडी स्वच्छ करण्यासाठी न थकता प्रयत्न करणारे ओजस आणि रेहान ही भेटतात. लहानपणी न कळत्या वयात चिंचेवरच्या माकडाला तोटा फेकून मारणारा आणि त्या माराची मनावर झालेली जखम मोठा झाल्यावरही मनावर कोरलेला योगेश, आपल्या लाडक्या लहानग्या मैत्रिणीसाठी व्याकुळ होऊन रोज दारावर धडका देणारे शाहताब अस्वल आपल्याला अस्वस्थ करुन जातात. एका कथेत तर चक्क सायकल ही कथेची नायिका आहे आणि तिच्या सुखाच्या आणि नाराज होण्याच्या अनुभवातून आपणही तिच्यासोबत प्रवास करतो. इथे आपण बाबांच्या अपघाताने अस्वस्थ असणाऱ्या सारंगा सोबत त्या दवाखान्याच्या बाहेर येरझारा घालत असतो आणि अमृताच्या मैतरासोबत मेंढक्या बनून रानावनात चालत असतो. गावात फिरताना, गावाला पडणारं हिरवं स्वप्न अनुभवणारा मंदार आपल्या भेटतो आणि सोबतच गावात राहणारी आणि तुमच्या शहरालाही स्वप्न पडतच असेल की रे? काय असेल ते स्वप्नं? असा प्रश्न विचारणारी चंदा हाच प्रश्न आपल्यालाही विचारते असा भास आपल्याला होतोच होती. शाळेच्या ट्रीपला जायला हजार रुपये नाहीत म्हणून रुसलेल्या साक्षीला बघताना आपणही आपल्या लहानपणी अशा बुडालेल्या शाळेच्या सहली, आणि त्यावेळी आपल्या आईबाबांनी आपल्याला काय सांगितलं होतं आणि कशी आपली समजूत काढलेली हे आठवून आपलेही डोळे ओलसर होताना अनुभवतो. पण याही कथेत निंबोणीच्या पानांमधून दिसणारा, भासणारा तो चंद्र जो हाटूमुटूचा आहे पण त्याला बघून होणारा आनंद मात्र अस्सल आणि खराखुरा आहे. या सगळ्या कथांमधून फारुक ने आजच्या मुलामुलींना आपल्यासमोर उभं केलं आहे, त्यांचे प्रश्न, त्यांच्या विचार करण्याच्या पद्धती आणि त्याचं अस्वस्थ असणं अगदी नेमकेपणाने आपल्यासमोर येतं. ही मुलं कोणत्याही एका शहरातली, एका भागातली किंवा एकसारख्या घरातली नाहीत पण त्यांचे जगणे हे आजच्या मुलांचे जगणे आहे. फक्त एक प्रश्न मनाला पडतो की आपल्या भोवतालच्या प्रश्नांनी, आपल्या गरिबीने किंवा अभावाने काळवंडलेली मुलं जेव्हा समजूतदारपणे स्वतः शहाणे बनत पुढे निघतात तेव्हा, ही सगळं कोणामुळे, आणि माझ्याच वाट्याला का? याचे जबाबदार कोण असा एखादा प्रश्न एकाही मुलाला पडू नये याची काळजी वाटते. येत्या काळात फारुक च्या कथांतील ही मुलं तुम्हाला मला हे प्रश्न विचारतील याची खात्री आहे आणि मी त्या दिवसाची वाट ही बघतो आहेच. या पुस्तकातील चित्रांचा विशेष उल्लेख करणे फारच महत्वाचे आहे. चंद्रमोहन कुलकर्णी ज्या ताकदीने कथेची भावना नेमक्या कुंचल्यात पकडतात ते बघताना आपण निव्वळ थक्क होतो. इतकी सुंदर आणि मनाला धरुन ठेवणारी चित्रं या पाना आपल्याला भेटत राहतात. इतक्या ताकदींच्या कथांचे पुस्तक मेहता प्रकाशनाने अत्यंत प्रेमाने आणि उत्तम निर्मितीमूल्य जपत काढलेले आहे. आज आपला भोवताल इतका जातधर्म, पर्यावरणीय नाश आणि भविष्याच्या चिंतांनी कुरतडलेला असताना अशा खऱ्याखुऱ्या मुलांच्या कथा आपल्यासमोर येणं हाच आपल्याला दिलासा देणारा आपला हाटूमुटूचा चंद्र आहे...हा असाच राहो... परेश जयश्री मनोहर ...Read more

HATUMUTUCHA CHANDRA
HATUMUTUCHA CHANDRA by FARUK KAZI Rating Star
बालाजी मदन इंगळे

संवेदनशीलतेने लिहिलेल्या तरल बालकथा : हाटुमुटूचा चंद्र मराठीमध्ये जाणीवपूर्वक आणि विचारपूर्वक बालसाहित्य लिहिणाऱ्यांची संख्या खूप कमी आहे. बालसाहित्य आणि बाल मानसशास्त्र यांचा विचार करून आपली प्रतिभा त्यासाठी वापरणाऱ्या मोजक्या बालसाहित्यिकांमध्य फारूक एस. काझी यांचे नाव समाविष्ट करावे लागेल. त्यांच्या नुकत्याच प्रकाशित झालेल्या मुलांसाठीच्या ‘हाटूमुटूचा चंद्र’ या कथासंग्रहातून ही बाब ठळकपणे अधोरेखित होते. कथा म्हणजे केवळ प्रसंगानंतर प्रसंग किंवा घटनेनंतर घटना मांडणे नसते. त्यामध्ये लेखकाच्या प्रतिभेने वास्तव आणि कल्पना यांचा सुरेख संगम घडवून आणावा लागतो. कुठलीही कथा लेखकाला त्याच्या अनुभव विश्वातूनच सापडलेली असते. पण ते अनुभव विश्व मांडत असताना त्यात आपल्या प्रतिभेने काही साहित्य गुण समाविष्ट करावे लागतात. तेव्हा ती कथा साहित्यिकदृष्ट्या अभिजात व साहित्य गुणांनी युक्त अशी कथा होते. या संग्रहातील कथांमध्ये अशा साहित्यिक प्रतिभांच्या बऱ्याच जागा आहेत. आणि म्हणूनच फारूक एस. काझी यांच्या कथा रोजच्या जगण्यातीलच असल्या तरी त्यातील साहित्य गुणांमुळे या कथा आपले वेगळेपण सिद्ध करतात. कथेमध्येही काव्यात्मकता असते. प्रतिकात्मकता असते. आणि त्यामुळेच ती कथा वैश्विक ठरत असते. हे सर्व गुण ‘हाटुमूटुचा चंद्र’ मधील कथांमध्ये आढळून येतात. म्हणून ही कथा महत्त्वाची आहे. अद्भुतरम्यता, काल्पनिकता आणि धक्का तंत्र याने लिहिलेल्या कथा नेहमीच मुलांना आवडतील असे नाही. आपल्याच अवतीभवती घडणाऱ्या घटना इतक्या सुंदर असू शकतात हे मुलांना वाचायला आवडते. नेमके तेच या कथांमध्ये आहे. या बालकथा या मातीतल्या आहेत. या संस्कृतीतल्या आहेत. म्हणून त्या महत्त्वाच्या आहेत. या संग्रहात एकूण दहा कथा आहेत. सर्वच कथा सुंदर आणि हृदयस्पर्शी आहेत. ‘फिकर नॉट’ या कथेमध्ये दोन मित्रांचे काही प्रसंग आहेत. रेहान आणि त्याचा मित्र अर्पित. दोघे एका टेकडीवर जातात. रेहानसाठी टेकडीवरील अनुभव नवीन असतो. दोघे खूप गप्पा मारतात. तळ्यात पाय सोडून बसतात. तिथे बसल्यानंतर त्या तळ्यातील काही मासे आपण बाटलीत घेऊन जावे असे रेहानला वाटते. पण अर्पित त्याला सांगतो की आपण या टेकडीवरून काय घेऊन जायला हवं तर या टेकडीवरील वातावरण, टेकडीवरील दृश्य, इथे आपण घेतलेला आनंद हे सगळे मनात भरून घेऊन जायला हवे. असं मुक्या प्राण्यांना त्रास द्यायचा नाही, हे नकळतपणे तो रेहानला सांगतो. रेहानलाही ते पटतं आणि मग तो खोल श्वास घेऊन इथल्या सगळ्या आनंदाच्या आठवणी मनात भरून घेतो. आणि निघतो. एखादा कोणी अन्य बालकथा लेखक असता तर या दोघांचं बोलणं, टेकड्यावरील वर्णन, दोघांनी केलेली मज्जा, त्यांनी केलेल्या गमती याचे वर्णन करून कथा संपवली असती पण फारूक काझी यांनी इथून काय घेऊन जायचं? हे लिहून जे एक नवीन वळण कथेला दिलेले आहे, इथेच या कथेतील साहित्यगुणाची जागा आहे. तिथेच कथा लेखक म्हणून फारूक काझी यांची प्रतिभा आपल्याला दिसून येते. आणि बालसाहित्यिक म्हणून त्यांचं वेगळेपणही इथेच आपल्याला दिसतं. ‘कर के देखो’ या कथेमध्ये ट्रेकला गेलेली मुले स्वच्छता दूत कशी बनतात हे मुळातून वाचण्यासारखे आहे. ‘जखम’ या कथेमध्ये इयत्ता तिसरीत शिकत असताना एका माकडीनीला आपण इजा पोहोचवल्याचं मोठं झाल्यावर कथेतील नायकाला आठवतं. आणि तो मोठा असूनही लहानांसारखं रडत रडत ती चूक आपल्या आईकडे कबूल करतो. ही कथा वाचताना पाषाणहृदयी माणूसही भावनिक होऊन जातो. कडूनिंबाच्या झाडाचे खाली पडलेले पान चंद्राची प्रतिमा म्हणून म्हणजेच हाटुमूटुचा चंद्र म्हणून कथेत वापरणे. आणि तो चंद्र कथेतील साक्षीच्या चेहऱ्यावर आनंदाचे प्रतिक म्हणून येणे. आणि त्याद्वारे सहलीला जाण्यासाठी पैसे न मिळाल्याच्या दुःखातून स्वतःला सावरणे ही सगळीच मांडणी भन्नाट झाली आहे. अशा भरपूर जागा या पुस्तकांमध्ये आहेत. ‘हिरवं सपान’ या कथेमध्ये शहरातला मंदार गावाकडे येतो. आणि गावातील चंदा सोबत शेत-शिवारात फिरतो. या शेत-शिवारातील भरपूर झाडे पाहून बी, रोपटं, मग त्याचं झाड ही क्रिया किती महत्त्वाची आहे. आणि या क्रियेचं स्वप्न नेहमीच गावाला पडतं. तसंच हिरवं स्वप्न शहराला का पडत नाही? हा प्रश्न खरंतर लहान-मोठ्या प्रत्येक वाचकाला अस्वस्थ करून जातो. ‘स्वप्न’ ही आणखी एक सुंदर कथा या संग्रहामध्ये आहे. माणसाला अभावातूनच वस्तूंची किंमत कळत असते. ज्याच्याकडे सर्व काही आहे अशा मुलाकडे जेव्हा सायकल येते, तेव्हा तिची काळजी घेतली जात नाही. पण स्वप्नातही ज्याच्या कधी सायकल मिळेल असं वाटत नव्हतं अशा अंकितला जेव्हा सायकल मिळते, तेव्हा तो तिची किती काळजी घेतो आणि हेच त्या सायकलचे स्वप्न होते. आणि अंकितचेही तेच स्वप्न होते ही स्वप्नांची सरमिसळ वाचकांना खूपच आवडून जाते. ‘मैतर’ ही आणखीन एक अनोळखी नातेसंबंध घट्ट करणारी कथा. फक्त काही दिवसांसाठी आलेल्या मेंढक्या काकाची आणि अमृत ची मैत्री होते. आणि ती मैत्री त्या दोघांमध्ये इतकी घट्ट होते की, मेंढक्या काका आपली मेंढरं घेऊन परत निघाल्यावर दोघांनाही एकमेकांचा निरोप घ्यावा असे वाटत नाही. निरोपावेळी दोघांच्याही डोळ्यात पाणी येते. दोघेही निरोपावेळी एकमेकांना भेटवस्तू देतात. हा प्रसंग लेखकाने स्थानिक संदर्भ, संस्कृती, भाषा आणि चित्रदर्शी स्वरूपात असा उभा केला आहे की, वाचक कथा संपली तरी त्या मेंढरांच्या कळपामध्ये आणि अमृतच्या घराच्या आसपासच घुटमळत राहतो. ‘जाऊ दे त्याला’ ही आणखीन एक भावस्पर्शी कथा. जंगली प्राण्यांनाही जीव लावला तर ते माणसांशी प्रेमाने वागतात हे सांगणारी ही कथा वाचकाच्या काळजाचा ठाव घेते. निधी आणि फॉरेस्ट ऑफिसर असलेले तिचे बाबा यांची ही कथा जंगलाच्या दुनियेत वाचकाला घेऊन जाते. पण तिथेही मानवी भावना कशी श्रेष्ठ ठरते हे अतिशय रंजक पद्धतीने लेखकाने लिहिले आहे. ‘बाबांची भाषा’ ही आणखी एक हृदयाला स्पर्श करणारी कथा! शाळेत शिकणारा सारंग अपघातात ऐकणं आणि बोलणं कायमचं गमावलेल्या आपल्या बाबांसाठी हातवाऱ्याची भाषा शिकून घेतो. हे जेव्हा वाचकाला कळतं तेव्हा वाचक जागच्याजागी स्थिर होऊन जातो. ‘एस पी १३’ ही आधुनिक तंत्रज्ञानात घेऊन जाणारी कथा! छोटीशी समायरा स्पेसशीप घेऊन एका नव्या प्लॅनेटवर जाते. आणि त्या नव्या प्लॅनेटवर असलेली माणसं कशी निसर्गाची काळजी घेतात हे पाहून समायरा तिथेच राहण्याचा निर्णय घेते. तेव्हा तिच्या सायंटिस्ट मामासह वाचक ही अचंबित होऊन जातात. निसर्ग आणि आधुनिक तंत्रज्ञान यांचा सुरेख आणि अफलातून संगम या कथेमध्ये लेखकाने घडवून आणला आहे. या पुस्तकाची महत्त्वाची बाजू म्हणजे यातील चित्रे! चंद्रमोहन कुलकर्णी यांची चित्रे या कथेला एक वेगळा आणि नवा आयाम देतात. ही चित्रे या कथेशी एवढी एकरूप झालेली आहेत की ही चित्रे वेगळी काढली तर या कथा अपूर्ण वाटतील! कथेला अनपेक्षित वळण देण्यामध्ये लेखक पटाईत आहेत. हे प्रत्येक कथेतून आपल्याला जाणवतं. आपण सरळ कथा वाचत जातो. आणि कथा देखील आता सरळ या वाटेने जाईल असे वाटत असताना ती कथा असं काही वळण घेते की वाजक स्तंभित होऊन जातो. आणि हीच खरे तर फारूक एस. काझी यांची खरी ताकद आहे. त्यांच्या सर्व कथांमधील पात्र आणि त्यांची नावे पाहिली तर ती विशिष्ट अशी पात्रे किंवा नावे नाहीत. तर सर्वसमावेशक अशी सर्व पात्रे आहेत. त्यामुळे किती तीव्र सामाजिक भान लेखकाला आहे हेही आपल्याला जाणवते. आजच्या सोशल मीडियाच्या काळात नातेसंबंध दूरावत असताना, नातेसंबंध दृढ करणाऱ्या या कथा प्रत्येक वाचकांपर्यंत पोहोचल्या पाहिजेत. या कथांमध्ये कल्पनाशक्ती आहे. वास्तवता आहे. पण याच्या जोडीला कथालेखक म्हणून जी एक संवेदनशीलता लागते, जी एक तरलता लागते आणि मुलांच्या कथांमध्ये जो एक हळुवारपणा आणि नाजूकता आवश्यक असते ते सगळे गुण या कथेमध्ये ओतप्रोत भरलेले आहेत. म्हणून या कथा फक्त लहानच नाही तर मोठ्यांनाही गुंतवून ठेवणाऱ्या आहेत. स्थळ आणि काळानुसार बदलणारी भाषा आणि प्रसंगानुसार बदलणारं वर्णन या कथेच्या जमेच्या बाजू आहेत. यामुळे या कथा वाचकाला पकडून ठेवतात. आणि काही एक सामाजिक भान आणि साहित्यिक जाण या कथा देतात. आणि हेच या कथेचे मोठे यश आहे. - बालाजी मदन इंगळे ...Read more