* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: RAJA RAVI VARMA
  • Availability : Available
  • ISBN : 9788177664515
  • Edition : 13
  • Publishing Year : APRIL 1984
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 308
  • Language : MARATHI
  • Category : BIOGRAPHY
  • Available in Combos :RANJEET DESAI COMBO SET- 42 BOOKS
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
THE NOVEL IS A GRAPHIC DESCRIPTION OF RAJA RAVI VERMA`S LIFE WHICH BEGINS WITH HIS EARLY CHILDHOOD DAYS IN HIS NATIVE PLACE, KILIMANOOR, A TYPICAL KERALA VILLAGE. HIS DEVELOPMENT AS AN YOUNG ARTIST UNDER THE GUIDANCE OF HIS MATERNAL UNCLE RAJA RAJ VERMA.
"राजा रविवर्मा या अजरामर चित्रकाराच्या जीवनावरील श्रेष्ठ कादंबरी.या कादंबरीत प्रसिद्ध चित्रकार राजा रविवर्मा यांची जीवनकहाणी चित्रमय शैलीत सांगण्यात आली आहे. कादंबरीची सुरुवात होते ती, निसर्गरम्य केरळमधल्या किलीमनुर या गावातून. या गावात रवीवर्मांच बालपण गेल. कादंबरीत तरुण वयात झालेली त्यांची जडणघडण,त्यांच्या काकाकडे-राजा रविवर्माकडे घेतलेले चित्रकलेचे शिक्षण यांचे ओघवत्या शैलीत वर्णन केले आहे.

No Records Found
Original LanguageTranslated LanguageTranslated ByWebsite
MARATHIENGLISHHARPERCOLLINS INDIA https://harpercollins.co.in/product/raja-ravi-varma/
Keywords
#8 APRIL # SWAMI # SHRIMAN YOGI # RADHEYA # MAZA GAON # ABHOGI # BARI # PRATIKSHA # SAMIDHA # PAVANKHIND # LAKSHYAVEDH # SHEKARA # MORPANKHI SAVALYA # SANKET # ASHADH # MADHUMATEE # MEKH MOGARI # KATAL # ROOPMAHAL # MEGH # PRAPAT # VAISHAKH # KAMODINI # GANDHALI # BABULMORA # AALEKH # KANCHANMRUG # SHRIMANYOGI (NATAK)# SANGEET TANSEN (NATAK)# SAVALI UNHACHI (NATAK)# HE BANDH RESHMACHE (NATAK)# PANKH JAHALE VAIRI (NATAK)# DHAN APURE (NATAK)# RAMSHASTRI (NATAK)# LOKNAYAK (NATAK)# SWAMI (NATAK)# VAARSA (NATAK)# TUZI VAT VEGALI (NATAK)# PANGULGADA (NATAK)# GARUDZEP (NATAK)# SNEHADHARA (NATAK)# (NATAK)# SANCHIT (NATAK) #८ एप्रिल #स्वामी (राज्य पुरस्कार १९६२,ह.ना. आपटे पुरस्कार १९६३) #साहित्य अकादमी पुरस्कार १९६४) #श्रीमान योगी #राजा रविवर्मा #राधेय #माझा गाव #अभोगी #बारी #प्रतिक्षा #समिधा #पावनखिंड #लक्ष्यवेध #शेकरा #मोरपंखी सावल्या #संकेत #आषाढ #मधुमती #मेख मोगरी #कातळ #रुपमहाल #रुपमहाल #मेघ #प्रपात #वैशाख #कमोदिनी #गंधाली #बाबुलमोरा #आलेख #कांचनमृग #श्रीमानयोगी-नाटक #संगीत तानसेन-नाटक #सावली उन्हाची –नाटक #हे बंध रेशमाचे –नाटक #पंख जाहले वैरी –नाटक #रामशास्त्री –नाटक #धन अपुरे –नाटक #लोकनायक –नाटक #स्वामी –नाटक #वारसा –नाटक #तुझी वाट वेगळी –नाटक #पांगुळगाडा –नाटक #पांगुळगाडा –नाटक #गरुडझेप –नाटक #स्नेहधारा –नाटक #संचित -नाटक
Customer Reviews
  • Rating Starभावना प्रसाद नातु

    प्रसिद्ध लेखक रणजित देसाई,सर्वांना “स्वामी कार” म्हणून परिचित आहेत.त्यांच्या स्वामी,श्रीमानयोगी,राधेय या कादंबऱ्या ऐतिहासिक व्यक्तिरेखांवर आधारलेल्या आहेत.पण राजा रविवर्मा ही कादंबरी,प्रख्यात चित्रकार राजा रवी वर्मा,यांच्या जीवनावर आधारित आहे.कादंबरत एखाद्या कलावंताचे चरित्र लिहायला घेताना,नुसता सत्याचा आधार घेऊन चालत नाही.त्यात कलावंताच्या कल्पकतेचा आधार घ्यावा लागतो,असे लेखक म्हणतात.या कादंबरीतील,साऱ्याच व्यक्तिरेखा वास्तवातल्या नाहीत.तर काही कल्पक आहेत,याची नोंद घ्यावी,असे लेखक सुचवतात.राजा रविवर्मा,यांच्यावर कादंबरी लिहावी.असे रॉय किणीकर यांनी सुचवले.मग लेखक त्यावर विचार करू लागले.त्यांनी आधी,रविवर्मा यांचे वास्तव्य असलेले प्रदेश पाहिले.बंगलोर, म्हैसूर, केरळ, मावेलीकिरा, कन्याकुमारी ही चित्रकाराची वास्तव्याची,सारी स्थळे पाहून झाली.त्यांचे काही नातेवाईक भेटले. त्यांच्याशी बोलून सगळी माहिती गोळा करून,प्रस्तुत कादंबरी पूर्णत्वास नेली,असे रणजित देसाई सांगतात. राजा रवी वर्मा यांचा जन्म,राजघराण्यात झाला.वडील इझूमाविल वेदशास्त्रसंपन्न पंडित,आई उमांबा,मामा राजा राज वर्मा, बहीण मंगला हे सारे किलीमानुर येथे रहात असत.मातृकूलपद्धतीनुसार रवीचे वडील लग्नानंतर त्याच्या आईच्या, उमांबाच्या घरी राह्यला येतात.एकदा मामाचा सेवक पाचन हा रवीची तक्रार घेऊन मामाकडे येतो आणि रवीने देवळाच्या भिंती कोळश्याने चित्र काढून,रंगविल्याचे सांगतो.रवीचा मामा चित्र पहातो,तो रवीला विचारतो की ही चित्रे कुणी काढलीत.रवी स्वतःच काढल्याचे सांगतो.राजा राज मामा रवीच्या आईला बोलावून घेतो आणि रवीने काढलेल्या घोड्याच्या चित्राचे कौतुक करतो आणि रवीच्या आईस म्हणतो की,घोड्याचे चित्र काढणे कठीण गोष्ट आहे,जे ज्याने इतके सुरेख काढले आहे.यापुढे मी त्याला शिकवू शकत नाही.त्याने आता त्रावणकोरची राजधानी त्रिवेंद्रमला जाऊन शिक्षण घ्यावे.तेथील राजे आईल्यम तिरूनाल कलेचे भोक्ते आहेत.तिथे त्याला चांगले शिक्षण मिळेल.असे म्हणून राजा राज मामा,रवीला त्रिवेंद्रमला घेऊन जातो.राजे तिरूनालशी परिचय करुन देतो.राजे खुष होतात.राजे तिरूनाल दूरदर्शी, स्पष्ट विचारांचे,कलाकारांना प्रोत्साहन देणारे असतात.त्यांच्या दरबारी परदेशी चित्रकार,चित्र काढण्यास येतात.तेव्हा राजे,त्यांना रवीला शिकवण्याची विनंती करतात.तिथे ब्रूक्स नावाच्या गोऱ्या चित्रकाराला रवीला शिकव असे राजे सांगतात.तो मला चित्र काढत असतांना जवळ कुणी चालत नाही.म्हणून नकार देतो.राजे ज्यावेळेस त्यास तुमची आम्हास गरज नाही सांगतात,तेव्हा ब्रूक्स चित्र काढतांना दूरुन पाह्यला परवानगी देतो.रवी दुरूनच चित्र कसे काढतात,रंग तबक कसे वापरतात,ते बघतो. एकदा राजे तिरूनाल ह्यांच्या भगिनी राणी लक्ष्मीबाई रवी वर्माच्या महालात येतात.तेव्हा रवी त्यांना त्यांचे “अन्नपूर्णा देवीच्या” स्वरूपांत चित्र काढू देण्याची परवानगी मागतो. राजे तिरूनाल यांना सांगायचे नाही एवढ्या एका अटीवर त्या तयार होतात.चित्र पुर्ण झाल्यावर तो त्यांना दाखवतो आणि चित्र पाहण्यासाठी बोलावणे करतो,चित्र पाहून राजे खूप खुष होतात.हेच रवी वरम्याचे पहिले चित्र. ते चित्र पाहिल्यावर राजे,राणी साहेबांना म्हणतात की मी मागे तुमची बहीण,पुरुतार्थीचे लग्न रवी वर्माशी लावण्याबाबत बोललो होतो.तेव्हा तुम्ही त्याच्या काळ्या रंगावरुन नकार दिला होता.माणसं नुसती रुपानं संपन्न असून चालत नाहीत,ती गुणानही संपन्न असावी लागतात.रवी वर्माचे पुरुतार्थीशी लग्न होते.रवीला मातृकूलपद्धतीनुसार पुरुतार्थीच्या घरी मावेलीकिराला जावे लागते.तिथे रवीचे पुरुतार्थीशी मतभेद होतात.तिला ह्याचे चित्रकार असणे मान्य नसते.रवी पुनः किलीमानुरला परत येतो. काही दिवसांनी राजे आईल्यम तिरूनाल रवीला,पुनः त्रिवेंद्रमला बोलावतात.राजा तिरूनाल यांनी खास दरबार भरविलेला असतो.रवी वर्मा याचे जेव्हा दरबारात आगमन होते.तेव्हा राजे, “राजा रवी वर्मा आपण पुढे यावे.”असे महणून स्वागत करतात.रवी वर्मा ‘राजा’ असा उल्लेख केल्यामुळे गडबडून जातात.तेव्हा राजे तिरूनाल खुलासा करतात आणि दरबारचा वीरशृंखलेचा मान प्रदान करतात आणि राजा ही पदवी बहाल करतात,तेव्हा पासून रविवर्मा,”राजा रविवर्मा” म्हणून ओळखला जाऊ लागतो. . आता रविवर्मा सगळ्या भारतभर भ्रमंती करून,वेगवेगळ्या विषयावरील चित्र काढतात.त्यातील देवदेवतांची चित्रे खूप प्रसिद्ध पावतात.घराघरात त्यांचे नाव पोहोचते.पण त्यांना वेगळे विषय हवे असतात. त्यातूनच पुराणातील काही प्रसंगावर,आधारित चित्र काढतात.रविवर्मा कलेसाठी घरदार सोडून मुंबईला येतो. मुंबईत आल्यावर एका प्रशस्त बंगल्यात,रंगशाळा निर्माण करून,तेथे भाऊ राज वर्मा सह रहाण्यास सुरुवात करतो.यादरम्यान सुगंधा नामे कलावंतीण,त्याच्या आयुष्यात येते.ती त्यावर मनापासून प्रेम करत असते.त्याच्या कलेची प्रशंसा करते.रवि वर्माचे कलेवरील प्रेम,त्याची सुंदर देहयष्टी,सुंदर आणि सरळ नासिका,मध्यभागी गंध लावलेले भव्य कपाळ,तेजस्वी डोळे,धारदार नजर तिच्या मनात भरते.तिच्या सहवासात,रवी वर्मा कडून एकसेएक कलाकृती घडत जाते.जसे शकुंतला आणि मेनका,हंस दमयंती,मानिनी राधा,अशी अनेक उत्तम चित्रांची निर्मिती होते.आसेतू हिमाचल त्यांच्या चित्रांची कीर्ती पसरते.रवी वर्माच्या चित्रांचे वैशिष्ट केवळ सुंदरता एवढेच नव्हते,तर त्याच्या चित्राच्या चेहऱ्यावरील भाव इतके खरे असत,की पहाणाऱ्याची नजर चेहऱ्यावरून खाली ढळतं नसे.परंतु मनुष्याच्या आयुष्यात चांगल्या बरोबर वाईटही घडतच असतं.ज्यांना रविवर्मा यांची कीर्ती सहन होत नाही,असे लोकं त्यांची नाहक बदनामी करतात.रवी वर्माला अनेक चढ-उतारांना तोंड द्यावे लागले.प्रत्येक मोठ्या माणसाच्या बाबतीत जे घडते ते,की प्रशंसा करणारे लोक कमी व नावं ठेवणारे लोक जास्त अशी परिस्थिति त्याच्याही जीवनांत येते. मुंबईला असतांनाच राजा रवी वर्मा यांस कोर्टाची नोटिस येते.त्याच्यावर दोन गुन्हे दाखल करण्यांत आलेले असतात.पहिला गुन्हा ‘हिंदूंच्या देवदेवता घराघरांत पोहोचवून त्यांच पावित्र्य नष्ट केले’ आणि दूसरा ‘देवदेवतांची नग्न चित्र काढून त्यांना बीभत्स रूप दिले आहे.देवदेवतांची विटंबना केली आहे. हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावल्या आहेत.ही बातमी पसरल्यावर बापट नावाचे वकील,जे त्यांच्या चित्रांचे ग्राहक व चाहते असतात.ते राजा रवी वर्मा यांचे वकीलपत्र घेण्यास पुढे येतात.पण राजा रवी खटला स्वतःच चालविण्याचे ठरवितात.नकार देतांना जे शब्द लेखकाने राजा रवी ह्यांच्या तोंडी दिलेले आहेत,ते असे “बापट,एक गोष्ट लक्षांत घ्या. माणसान आयुष्यात कुठेतरी श्रद्धा बाळगून जगावं. त्या श्रद्धेला तडा जातो असं वाटलं तर सर्वस्व पणाला लावावं..ही माझी श्रद्धा आहे.तिला कोणीतरी आव्हान दिले आहे.ते स्वीकारणें हा माझा एकट्याचा धर्म आहे.खटला दाखल करणाऱ्यांचे वकील आणि रवी वर्मा ह्यांच्यातील दावे आणि प्रतिदावे हे कादंबरीची 10-12 पाने व्यापुन टाकतात.ते येथे देणे शक्य नाही.पण राजा रवी वर्मा कोर्टापुढे जे म्हणतो ते असे, “महाराज माझ्यावर जो आरोप केला आहे की, माझ्या चित्रात नग्नता आहे आणि मी देवादिकाच्या चित्रांचा प्रसार केला,हा आरोप मला मान्य आहे,फक्त मला आज एवढाच खेद वाटतो की माझ्या मनातलं नग्नतेचे जेवढं सुंदर रूप मला दिसलं तेवढं मला चित्रित करता आलं नाही.” राजा रवी वर्माची ह्या खटल्यातून सुटका होते. या कटू पण जीवघेण्या प्रसंगातून ते सहीसलामत बाहेर पडतात.पण सुगंधाला गमावून बसतात. मुंबईच्या वास्तव्यातच, बडोद्याचे राजे सयाजीराव गायकवाड यांच्याशी,रविवर्मा ह्यांचा परिचय होतो.ते रवी वर्मा ह्यांना चित्र परदेशात पाठविण्यासाठी सुचवितात व संधी उपलब्ध करून देतात.राजे गायकवाड गुणग्राही असतात व उत्तम कलाकारांना मानसन्मान देतात.बडोदा संस्थानांमध्ये प्रदर्शन भरवितात.तिथून पुढे चित्रकलेचा प्रसार व्हावा,म्हणून त्यांच्या मदतीने,रविवर्मा वेगवेगळ्या शहरांमधून चित्रांची प्रदर्शनं भरवितात.लोकांचा चांगला प्रतिसाद मिळतो.चित्रांची कमतरता भासू लागते.म्हणून ते चित्रांचा छापखाना काढायचे ठरवतात.यामागे लोकांना चांगली चित्रे पहाण्याची सवय लागली पाहिजे,हा त्यांचा उद्देश असतो.पण हा सगळा कामाचा डोलारा सांभाळताना,त्यांच्या स्वतःच्या तब्येतीकडे ते लक्ष देऊ शकत नाही.दरम्यान त्यांचे मामाजी,जे त्यांच्यासाठी दैवता समान असतात,त्यांचा मृत्यू होतो.लहान भाऊ,जो चित्र काढण्यास नेहमी मदत करतो,त्याचा मृत्यू होतो.मृत्यूची साखळी संपतच नाही.आईचा वृद्धापकाळाने मृत्यु होतो.रवी या सगळ्यात एकाकी पडतो.खचून जातो. ह्या सगळ्याच कारणांमुळे,ते मुंबईचा छापखाना विक्रीला काढतात.चांगल्या किंमतीची अपेक्षा असूनही,जर्मन तंत्रज्ञान असलेला हा कारखाना,फक्त पंचवीस हजार रुपये एवढ्या किमतीला विकला जातो.मुंबई सोडून ते आपल्या जुन्या गावी,किलीमानूर येथे येऊन रहातात.आपुली अर्धवट राहिलेली चित्रे पुर्ण करतात.ते निराश झालेले असतांना,त्यांची मैत्रीण फ्रेंना म्हणते,नाही रवी,तुझा पराजय नाही झाला,तू यशस्वी झाला आहेस.ती कांगरा आर्ट,ती मुगल आर्ट यांचे वळण बदलून,तू चित्राला नवीन दिशा दिलीस.माणसासारखी माणसं निर्मिलीस,हेच तुझ्या कलेचे मोठेपण आहे.ती समजावते.पण कलावंताचे कलासक्त मन,ते समजण्याच्या पलीकडचे असते.त्या आजारपणात रवी वर्मा जगाचा निरोप घेतात. कादंबरी वाचून आपण सुन्न होऊन जातो.प्रत्येकाने वाचावे अशी ही कादंबरी आहे.रणजीत देसाईंनी कादंबरीत,प्रत्येक प्रसंग अक्षरश जिवंत केला आहे.राजा रवी वर्माच्या आजूबाजूच्या व्यक्तिरेखा जिवंत उभ्या केल्या आहेत.कादंबरी वाचतांना,प्रत्यक्षात प्रसंग घडताहेत,असे वाटत राहते.रविवर्म्याचे मामा,राजा राज वर्मा ह्यांची बुद्धिमत्ता तेजस रंग,भेदक डोळे,अशी प्रतिमा उभी केली आहे.तर कुटुंबातील इतर सदस्य आई,वडील,भाऊ राज,बहिण मंगल,सगळे अवतीभवती वावरत आहेत असे वाटते.बडोद्याचे राजे सयाजीराव,तसेच सेवक रविवर्माचा मित्र रामय्या,या पात्रांच्या व्यक्तिरेखा,छान रेखाटल्या आहेत.त्यांची लेखणी साहित्याच्या सर्व अंगाला स्पर्शून जाते.कादंबरीत स्वामी विवेकानंद रविवर्म्याच्या घरी भेट देतात तो प्रसंग,रविवर्मा आपल्या आई,वडील,मामांना भेटायला जातो तो प्रसंग, गोपाळ कृष्ण गोखले,दादाभाई नवरोजी इत्यादी मान्यवर राजा रविवर्माना भेटतात तो प्रसंग,आणि राजा रवी वर्माच्या अंतिम प्रवासाचा प्रसंग,असे अनेक प्रसंग,लेखक आपल्या लेखणीने अजरामर करतात.ही कादंबरी,वाचण्यायोग्य आहे.एका जगप्रसिद्ध कीर्तीच्या,अजरामर चित्रकाराची, सिद्धहस्त लेखणीतून उतरलेली कादंबरी “राजा रवी वर्मा” आपण वाचली नसल्यास अवश्य वाचा. मला कल्पना आहे की,परिचय अतिदीर्घ झाला आहे.पण राजा रवी वर्मा सारखे अफाट व्यक्तिमत्व, रणजीत देसाई ह्यांच्या सारखा सिद्धहस्त लेखक आणि 300 पानांची कादंबरी, ह्या सगळ्याकडे बघता हा फारसा मोठा नाही,हे आपणांस ही कादंबरी वाचतांना जाणवेल. येथे प्रामुख्याने उल्लेख करावासा वाटतो की मी आणि प्रसाद आणि श्री आणि सौ दिवटे,स्वामीकारांच्या गांवी कोवाडला गेलो असतांना,स्वामीकारांचा नातु सिद्धार्थ शिंदे (मुलीचा मुलगा) ह्याने आम्हांस स्वामीकारांची 3 पुस्तके भेट दिली होती.‘राजा रवी वर्मा’ हे त्यातलेच एक पुस्तक. ...Read more

  • Rating StarYashashri Rahalkar

    पुस्तक:- राजा रवि वर्मा प्रकार :- कादंबरी लेखन:- रणजित देसाई प्रकाशक :- मेहता प्रकाशन आज खूपच दिवसांनी एका बैठकीत पुस्तक वाचून पूर्ण केले. राजा रवि वर्मा ह्या विख्यात चित्रकाराची हा जीवनप्रवास.... कादंबरी खिळवून ठेवते.... आपण रवि वर्माच्या कथेतइतके गुरफटत जातो की जणू त्यातले एक पात्र. रणजित देसाई सरांनी ह्या कादंबरी साठी पाच वर्षे अभ्यास केल्याचे , देशाविदेशात फिरून माहिती गोळा केल्याचे म्हटले आहे ते अगदी यथार्थ वाटते... एकूणात रवि वर्मा ह्यांचा प्रवास दाखविताना जे detailing केलेलं आहे ते अफाट अभ्यास करूनच शक्य आहे. चित्र , रंग आणि चित्रकला ह्यांचाही अभ्यास प्रचंड कमाल आहे... अगदी बारीक बारीक सांगायचे झाल्यास पूर्वी रंग खलून तयार केले जात मग विदेशातून तैल रंग येऊ लागले ... हा सगळा प्रवास कमाल रेखाटला आहे. अगदी एक उदाहरण द्यायचे झाल्यास एके ठिकाणी ब्राउन ते ब्लॅक मधील अनेक रंगछटांचा उल्लेख केला आहे... तो पाहून आपण थक्क होतो. अप्रतिम सुंदर , विख्यात असणारी त्यांची काही निवडक चित्रे देखील समाविष्ट केलेली आहेत. कलाकाराचे कलेच्या रंगात न्हाऊन जाणे, त्याच्यावर लुब्ध होणाऱ्या स्त्रिया, सर्वसामान्य आणि जुनाट विचारसरणीची बायको... सगळं अगदी सहज मांडल आहे. मामाचा मृत्यू, आईचा आणि धाकट्या भावंडांचा मृत्यू प्रसंग कमाल चितारला आहे . हिंदू देवदेवतांची विटंबना केली असा आरोप ठेऊन लावलेला खटला आणि त्याचे यशस्वीपणे केलेले खंडन अप्रतिम आहे. "नग्नता ही पाहणाऱ्याच्या दृष्टीत असते" हे राजा रवि वर्मा इतक्या प्रभावीपणे मांडतात की आहा! चित्रकाराच्या आयुष्यात मॉडेल म्हणून येणाऱ्या अलौकिक सौंदर्यवतीबाबत कुठलेही पुरुष म्हणून आकर्षण न वाटण इतकं कलाकार म्हणून स्थिर असणं कमाल आहे. देहापलीकडची ओढ अतिशय सुंदर वाचकांपुढे ठेवली आहे. थोडक्यात, जरूर जरुर वाचा👍 प्रेमात पाडणारे पुस्तक ✒️यशश्री रहाळकर नाशिक ...Read more

  • Rating StarTejaswini Tawade Kolungade

    नमस्कार आज राजा रवी वर्मा हे पुस्तक वाचून झाले. नेहमी प्रमाणे रणजीत देसाई यांचे दर्जेदार लिखाण. त्यांनी प्रस्तावनेत नमूद केले आहे की ह्या पुस्तकात वास्तव आणि कल्पविलास ह्या दोहोंचे मिश्रण आहे. राजा रवी वर्मा यांची चित्रकलेशी एकनिष्ठता आणि एकरूपता खप छान प्रकारे मांडली आहे. आपली कला हेच आपले दैवत आहे असे मानणारे राजा रवी वर्मा सदैव आपल्या कलेशी प्रामाणिक राहिले. एकदा नक्की वाचावे असे पुस्तक. ...Read more

  • Rating StarAniket Save

    आत्ताच रणजित देसाई लिखित "राजा रवि वर्मा" वाचुन झाले अन् ह्याच कादंबरीवर आधारित "रंग रसिया" हा चित्रपट सुद्धा पाहुन झाला. राजा रवि वर्मा वाचुन झाल्यावर चित्रपटातील काही दृष्ये खटकतात कारण आपण पुस्तकाच्या अनुषंगाने विचार करीत असतो. असो परंतु चित्रप बनवताना दिग्दर्शकाला काही व्यक्तिस्वातंत्र्य हे घ्यावच लागतं. परंतु रणजित देसाई लिखित ह्या कादंबरी बद्दल बोलायचे झाले तर ते हातातील पुस्तक खाली ठेवु देत नाहीत अन् ठेवलं तर पुन्हा हातात घेण्याची हुरहुर लागुन राहते. त्यांची भाषा अतिशय सोपी,ओघवती आणि गुंतवुन ठेवणारी. कुठेही आपल्याला ती कंटाळवाणी किंवा बोजड वाटत नाही. हेच तर खरं यश आहे लेखकाचं. राजा रवि वर्मा यांनी काढलेल्या देवादिकांच्या चिञांनसमोर जनता आजही नतमस्तक होते आणि आजही अनेक उदयोन्मुख चित्रकार त्यांनाच आपले प्रेरणास्थान मानतात. राजा रवि वर्मा यांनी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय चित्रकारितेत एक मैलाचा दगड स्थापन केला आहे. मला वाटते ज्यावेळेस चित्रकलेचं नाव घेतलं जाईल तेव्हा राजा रवि वर्मा ह्या नावाचा उल्लेख केल्याशिवाय आपण पुढे जाऊच शकत नाही. आपल्या अवघ्या ५८ वर्षांच्या जीवन कारकीर्दींत त्यांनी अनेक पौराणिक कथांना मूर्त रूप देऊन ती पात्र चित्ररूपात अजरामर करून भारताची चित्रकला एका वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवली... ...Read more

  • Read more reviews
Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

BHARTIYA GANIKA
BHARTIYA GANIKA by DR.S.R. DESHPANDE Rating Star
डॉ. शुचिता नांदापूरकर-फडके

मंडळी, कालच्या ऱ्हासचक्रानंतर मी विचार करत होते की आज काय? पुस्तकं तर काही वाचून ठेवली होती (म्हणजे वाचली आणि ठेवून दिली बाजूला... अक्षरशः). आत्ताची समोर आहेत ती. कदाचित त्यातलं एखादं उद्या घेईन. मध्ये अचानक या पुस्तकाची जाहिरात वाचली, अगदी गेल्या ठवड्यातली गोष्ट. उत्सुकता चाळवली. समूहात काहीतरी आगळं वेगळं पुस्तक घ्यावं हा विचार सतत मनात असतोच. तसं पुस्तक घरी येताच (जय amazon) चाळायला म्हणून बसले, आणि काय सांगू, हातात मार्कर कधी आलं, मी खुणा कधी केल्या, पुस्तक कधी संपलं... कळलंच नाही. एक गोष्ट प्रामाणिकपणे सांगते... प्रेयर पुस्तकाला तुम्ही जो भरघोस प्रतिसाद दिलात, अनेकांनी ते विकत घेण्याचा विचार केला तेव्हाच सांगायचं होतं, पण राहिलं. ओळख करून दिलेलं पुस्तक पूर्णपणे वाचनीय असतं असं नाही. त्याचा बरचसं भाग बोजड असतो. पण ते नाही का, डेटिंगच्या काळात मुलगा मुलगी स्वतःमधलं केवळ उत्तम ते दाखवतात, तसं मला प्रेयर बद्दल वाटलं. आय मीन प्रेयर पुस्तकाबद्दल वाटलं आणि गणिका या पुस्तकाबद्दल मला नेमकं तेच वाटत आहे. ========== ‘भारतीय कामशिल्प’ या पुस्तकाचं लेखन करत असताना प्राचीन भारताच्या समाजजीवनाची माहिती देणारे अनेक संदर्भग्रंथ वाचण्यात येऊन लेखकांची उत्सुकता चाळवली गेली आणि जेव्हा या विषयावर मराठीत एकही परिपूर्ण संदर्भग्रंथ नाही हे लक्षात आलं, तेव्हा त्यांनी स्वतःच या पुस्तकाचं लेखन मनावर घेतलं. केवळ सनसनाटी विषय सवंगपणे हाताळला आहे असं कुठेही वाटत नाही. अतिशय अभ्यासपूर्वक लेखन आहे. सोबत जोडलेली संदर्भग्रंथांची यादी (एकूण संख्या ६४) पुरेशी आहे. गणिका आणि उर्वरित श्रेणी या शरीरविक्रय करतात, हा वैश्विक व्यवसाय आहे. कैक काळापासून या व्यवसायाला मान्यता मिळाली आहे आणि त्याची आवश्यकता वाटली आहे. प्राचीन काळात भारतीय गणिका यांना एक संस्कृती आणि दर्जा होता. नीतीनियम होते, ते पाळावे लागत होते. पुस्तकाची प्रकरणं – प्रास्ताविक, विदेशी गणिका, भारतीय साहित्यातील गणिका, गणिकेची प्रशिक्षण व वर्णन, गानिकांची वेशभूषा, सौंदर्यप्रसाधने, विट, गणिकामाता, प्रियकराचा राग-रंग, कथांविषयी थोडेसे आणि कथा (या शेवटच्या प्रकरणात एकूण १३ कथा आहेत – अगदी सुरस आणि चमत्कारिक वाटाव्यात अशा, त्यांचा परिचय मी देणार....... नाही.) प्रास्ताविक – (नऊ पानांचं प्रकरण) कुटुंब किंवा विवाहसंस्था कधी आकाराला आले हे नक्की सांगता येत नसलं तरी स्त्री-पुरुष शरीरसंबंध हे आदिम असून ते पशु – पक्ष्यांप्रमाणेच जनन हेतुस्तव नैसर्गिक होते आणि राहतील. फलन हे स्त्रीदेहामध्ये होतं या जाणीवेतून तिला आदरस्थान प्राप्त झालं. सर्जनाची गूढ शक्ती धारण करणारी ती आदिमाया/माता/ अद्याशक्ती होय. जवळपास प्रत्येक धर्मात प्रजा, पशु आणि धान्य समृद्धीसाठी सुफलता विधी आहेत. भारतीय हिंदू धर्म शास्त्रीय ग्रंथांतून स्त्री पवित्र्याच्या कथा वाचायला मिळतात. पतीला परमेश्वर मानलं जाई. त्याही काळात गणिका हा व्यवसाय होता आणि त्याकडे सहिष्णू वृत्तीने पाहिलं जाई.राजे महाराजे त्यांचे पोशिंदे असतं. शरीरविक्रय करणाऱ्या स्त्रिया तिरस्काराला पात्र असत, पण गणिका नाही. त्यांना नगर भूषण, नगर अलंकार, नाग्त रत्न मानलं जाई. प्रसंगी, राजे त्यांचा सल्ला घेत. त्या बहुश्रुत असतं चौसष्ट कलांत पारंगत असतं. संभाषणचतुर, हुशार, समंजस, उदार, योग्य आदर राखणाऱ्या, विनयशील आणि अनुपम सौंदर्यवती असत. एखाद्या गणिकेमुळे त्या राज्याची कीर्ती वाढत असे. धार्मिक समारंभ, सामाजिक कार्यक्रम (विविध झुंजी, शर्यती), करमणुकीचे कार्यक्रम (जलक्रीडा, वनविहार), रंगमंचावर अभिनय, अशा नानाविध ठिकाणी त्यांची ठळक उपस्थिती असे. रथारूढ अथवा सिंहासनाधिष्ठ राजाला वारा घालणे, चवरी ढाळणे, छत्र धरणे अशी कामं त्या करत. त्यांच्याशी संबंध ठेवणं समाजमान्य होतं. प्रतिष्ठितांचा त्यांच्याकडे पाहण्याचा दृष्टीकोन व्यापक, अगत्यशील आणि स्नेहिल होता. मात्र, त्यांना कडक आणि कठोर नियम पालन करावे लागे.विजयनगर साम्राज्याच्या अस्तानंतर ते पेशवाई संपेपर्यंतच्या काळात, मोगल राजवट येऊन गेली, ब्रिटीश वसवतवादाचा प्रसार सुरू झाला, समाज व्यवस्था बदलली, गणिका संस्कृतीला ओहोटी लागली. ब्रिटीशांचा अंमल सुरू झाल्यावर गणिका संस्था नष्ट होऊन वेश्या व्यवसाय वाढीला लागला. यामागे औद्योगिक क्रांती हे एक कारण आहे. वेश्यागमन निंद्य कृत्य मानलं जाऊ लागलं. तरुण अधिकाधिक सुशिक्षित होऊ लागला तसा शरीरसंबंधांपायी स्वास्थ्य गमवावं लागलं तर काय, हा विचार थोडाफार मूळ धरू लागला. आणि या शौकाची आसक्ती कमी झाली. चरितार्थाकरता पैसे मिळवण्यासाठी वेश्याव्यवसाय हादेखील विश्वसनीय आर्थिक व्यवसाय मानण्यात यावा असा निकाल १९११मध्ये युरोपियन न्यायालयाने दिला. विदेशी गणिका – (२७) बहुतेक सर्व प्राचीन संस्कृतीत गणिकांचे पुरावे मिळतात. इजिप्त, बबिलोन, सिरीया, फिनिशिया, ही काही उदाहरणं. ग्रीस, इटली, भारत इथे त्यांना विशिष्ट दर्जा प्राप्त झाला. त्यांचेही प्रकार होते, सामान्य वेश्या अलेत्रय्डी, आणि सर्वोच्च म्हणजे हेटीअरा (या शब्दाचा अर्थ सोबती). काही हेटीअरा वादविवादपटू होत्या. क्लेप्सीड्रा हिच्या वक्तशीरपणामुळे तिला ते नाव मिळालं होतं त्याचा अर्थ जलघटिकापात्र असा होतो. थीओफ्रत्स याने इ.पू. ३७२ – २८७ या काळात ‘ऑन मरेज’ हा ग्रंथ लिहिला, याचा सविस्तर अभ्यास करून लिओंटीयम या हेटीअराने त्यावर प्रगल्भ टीका लिहिली. रोमन समाजात कोर्टीझन अस्तित्वात होत्या. पॉम्पेई इथे व्हिकोली बाल्कोन पन्सिली नावाच्या इमारतीत शेकडो रमणी वास करत. या संदर्भातली रतिक्रिडेची मूळ चित्रं पॉम्पेईन wall paintings म्हणून प्रसिद्ध असून ती इटलीच्या वस्तुसंग्रहालयात सुरक्षित आहेत. रोमन साम्राज्यात हेटीअरा ऐवजी कोर्टीझन शब्द रूढ झाला. युरोपात पंधरा-अठरा शतकांत कोर्टीझन आणि कलावंतीण यांना समाजात विशिष्ट स्थान आणि आदर मिळत होता. फ्रान्समध्ये सतराव्या शतकात रमणींची सत्कारगृहं (सलो) प्रसिद्ध होती. जपानमध्ये गै (कलात्मक क्षमता) आणि शा (व्यक्ती) यावरून गैशा ही संज्ञा रूढ झाली. त्यांच्यात अलंकारिक सुरावट, सौजन्य, निष्कपट, सुसंस्कृतपण असे. बाराव्या शतकापासून कार्यरत असलेली ही प्रथा इडो काळात (इ.स.१६००-१८६८) अधिक वाढीला लागली. ओकिया ही त्यांची निवासस्थानं होत. विसाव्या शतकात त्यांचं वर्चस्व राजकीय क्षेत्रात वाढीला लागलं. १९२०-३० मध्ये त्यांची संख्या साधारण ८० हजार होती, ती १९७०-८० दम्यान १७ हजार इतकीच उरली आहे. चीनमध्ये पूर्वी पीकिंग (बीजिंग) इथे सिंगसॉंग हाउस हा भाग राखीव होता. शांघाय इथे अत्यंत विलासी वारांगना गृहं आहेत. सिंगापूरमध्येगिटार गर्ल्स (पीपाचाई) या नावाने त्या ओळखल्या जातात. पाकिस्तानात त्या तवायफ, कान्जारी आणि गश्ती नावाने ओळखल्या जातात. आज मात्र सर्वत्र आमुलाग्र बदल झाला आहे. भारतीय साहित्यातील गणिका – (३२) संस्कृत, प्राकृत, पाळी भाषांत, हिंदू, बौद्ध, जैन वान्ग्मयात, त्यांचा उल्लेख आढळतो. त्या वैदिक काळात भारतात होत्या हे काही ऋचांवरून समजतं. (ऋचा १.१६७.४ – अनेक पुरुषांशी सांग करणारी ती साधारणी). पंचचुडा अप्सरेपासून त्यांची उत्पत्ती झाली असं मानतात. महाभारत काळात त्यांना प्रतिष्ठा प्राप्त झाली. (राज, नागरी, गुप्त, देव आणि ब्रह्म असे पाच प्रकार होते). रामायणात फार स्थान नव्हतं. अमरकोश, महाभाष्य, वार्त्तिके, दशरूपक, कौटिलीय अर्थशास्त्र जातक कथा, पंचतंत्र, वेताळकथा, शुकबहात्तरी, गाथासप्तशती, अशा विविध ग्रंथांत त्यांचा उल्लेख आहे. कामसूत्र या ग्रंथात वात्सायनाने ‘वैशिक’ या प्रकरणात त्यांची माहिती दिली आहे. कथासरीत्सागर, राजतरंगिणी, शृंगारतिलक, सरस्वतीकंठभरणा, कलाविलास, मेघदूत, मृच्छकटिक, रत्नावली, नागानंदा, अशा नाटकांतून त्यांचा उल्लेख येतो. भारतात इ.पू. पहिल्या सहस्रकात ती प्रथा अस्तित्वात येऊन ब्रिटीशांच्या आगमनानंतर एकोणिसाव्या शतकात लोप पावली असावी असं समजलं जातं. गणिकेची प्रशिक्षण व वर्णन – (१६) गणिकेला बालपण जवळपास नव्हतच. वयाच्या सहा-सात वर्षापासून तिला घडवायला सुरुवात होत असे. त्यांच्या प्रशिक्षणात आचार, विचार, शिष्टाचार, विविध कला, खेळ, भाषा, वर्तन, सौंदर्यवर्धन, गायन, वादन, नृत्य, अलंकरण, शरीर सौष्ठव, बुद्धिवर्धन अशा प्रत्येक अंगाचा व्यापक विचार होता. काही हस्तकला शिकाव्या लागत. पाककला, सुगंधी द्रव्य निर्मिती, कामशास्त्र, प्रणायाराधन, हिकाव्म लागे. स्वसंरक्षण शिकावं लागे. गणिकांची वेशभूषा, सौंदर्यप्रसाधने – (५) आधीच्या प्रशिक्षणात हाही एक महत्त्वाचा भाग होता. विट – (७) हा शब्द मी पहिल्यांदाच ऐकला. त्याचा इथे दिलेला अर्थ – शृंगाररस नायकानुचराप्रमाणे संपत्तीचा भोग न घेणारा किंवा जो आपल्या पैशाचा वापर कधी करत नाही, असं नाटकातलं लबाड, धूर्त पात्र. गणिका संस्थेत त्याच्या जोडीने वयस्य, अनुचर, धूर्त आणि डिंडिक ही पुरुष पात्र वावरतात. प्रतिवेशिनी ही गणिकेची शेजारीण. ती विश्वासातली. ती गणिकेसाठी विट आणि प्रियकर यांच्याशी संवाद साधते. गणिकामाता – (७) हे पात्र फार महत्त्वाच. तिला संरक्षित स्त्री, कुट्टनी किंवा कुट्टीनी म्हटलं जाई. तिचं काम शिस्त राखणे, थोडक्यात रेक्टर. कामकुजानांना आळा घालणं, गणिकांना खऱ्या प्रेमापासून वंचित ठेवणं. कामुकांचं मानसशास्त्र तिला मुखोद्गत. पुरुषांच्या गुणदोषाच्या’ आधारे अचूक आडाखे बांधत ती गणिकेला सल्ला देता. तिचा दबदबा असतो. ते नसती तर गणिका ही संस्था कधीच नामशेष झाली असती. कारण स्त्रिया या स्त्रिया असल्याने स्त्रीसुलभ भावनेनुसार गणिकागिरीत न रमता त्या केव्हाच संसाराला लागल्या असत्या. प्रियकराचा राग-रंग – (९) रग हे बारा छटांमधली काम आसक्ती असं म्हणता येईल. पुरुषाची मनोवृत्ती, प्रवृत्ती, स्वभाव, गुणविशेष आणि खास करून राग-लोभ जाणून घेत गणिकेला त्याच्याशी वर्तन करावे लागते. कथांविषयी थोडेसे आणि कथा (४८) – ‘शृंगारमंजरीकथा’ हा राजा भोज रचित संस्कृत ग्रंथ असून त्यात स्त्री-पुरुष मनोवृत्ती दर्शन घडवणाऱ्या तेरा कथा आहेत. त्यापैकी काही जीर्ण, काही अपूर्ण आहेत. पैकी एक कथा वाचून दाखवते. संदर्भग्रंथ (४) सोबत फोटो दिले आहेत त्या पानांचे. या पुस्तकात आढळलेले सुंदर शब्द – गरती, लीलासहचारी, पृथुल (अर्थ कळला नाही अजून), रूपाजीवा, सूरसुंदरी परिचय फार लांबला. या विषयावरच्या इतक्या अभ्यासानंतर एखादा पेपर सहज देता येईल. परत अभिमानाने म्हणता येईल, ‘मा, मै फर्स्ट क्लास फर्स्ट आया!’ मनापासून धन्यवाद. माझी परिचय पाळी नसती तर मी हे पुस्तक वाचलंच नसतं. मजा आली मला वाचताना. तशी तुम्हालाही आली असेल अशी खात्री आहे. थांबते. ...Read more

RESHIMREGHA
RESHIMREGHA by SHANTA J SHELAKE Rating Star
मीना कश्यप शाह

शांता शेळके या कवयित्री म्हणून आपल्या सर्वांच्या माहितीच्या आहेतच. गीतकार म्हणूनही त्यांचे मोठे नाव झाले. रेशीमरेघा हे त्यांनी रचलेल्या गीतांचे पुस्तक. मुख्यतः त्यांनी चित्रपट आणि नाटक यासाठी गीते लिहिली आहेत. प्रस्तावनेत शांताबाई म्हणतात, गीते लििणे त्यांना अतिशय आकर्षक वाटत गेले आणि म्हणून केवळ चित्रपट आणि नाटकांसाठीच नाही, तर स्वानंदासाठीही, त्या गीतं लिहित राहिल्या. चालीवर गीते लिहिणे त्यांना आव्हानात्मक वाटायचे, बंधनकारक नाही. पुढे बंगाली, गुजराती अशा काही गीतांच्या चाली आवडल्या, तर त्या, त्या चालींवरही छंद म्हणून गीते लिहू लागल्या. त्यांच्या गीतांमध्ये लावण्या, गवळणी, नृत्यगीते आणि युगुलगीते (त्यांनी द्वंद्वगीते हा शब्द वापरला आहे, जो मला आवडत नाही) जास्त आहेत. ह्या पुस्तकात त्यांचे संकलन आढळून येतं. पुस्तकातील काही गीतांपेक्षा मला त्यांची प्रस्तावनाच जास्त आवडली. आपल्या गीतांबद्दल त्यांनी हळुवार होत लिहिलं आहे. प्रत्येक गाणं ध्वनिमुद्रीत होतानाचे क्षण त्यांना आठवतात. आणि ही गीतं प्रसिद्ध होण्यासाठी संगीतकार, गायक यांचा हातभार नक्कीच आहे याची त्या आठवण काढतात. गीतांचा अर्थ रसिकांपर्यंत पूर्णपणे पोहोचवण्यासाठी गायक-गायिकांचा खूपच मोठा वाटा आहे, त्यांच्याबद्दल त्या अपार कृतज्ञता व्यक्त करतात. हे पुस्तक त्यांनी लावणेसम्राज्ञी यमुनाबाईंना अर्पित केलेले आहे. त्यान्नी लिहिलेल्या "रेशमाच्या रेघांनी" या सर्वात जास्त प्रसिद्ध पावलेल्या लावणीच्या नावावर ह्या पुस्तकाचे नाव आधारित आहे. अनेक प्रसिद्ध गाणी या गीत संग्रहात आढळतात. रेशमाच्या रेघांनी, काय बाई सांगू, मनाच्या धुंदीत लहरीत, हे श्यामसुंदर, राजसा, शालू हिरवा पाच नि मरवा, चाल तुरू तुरू, मनाच्या धुंदीत लहरीत येना आणि अशी अनेक. शांताबाईंचं काव्य सामर्थ्य ह्या लावण्या/गीतांमध्ये देखील दिसून येतं... कळ्या आजच्या, शिळ्या उद्याला, ओठांशी न्याल का, आल्यावर जवळ मला घ्याल का.... अशी अनेक उदाहरणं! पुस्तकातील बहुतेक गाणी ही लावण्यांच्या स्वरूपातली आहेत. त्यामुळे त्याच त्याच भावना सारख्या सारख्या आढळून येतात. बोलावणे किंवा नको जाऊ म्हणणे, भेटी (गिफ्ट्स) घेणे, वाट पाहणे, विरह, सौंदर्याचे वर्णन, शृंगाराचे वर्णन, म्हणजे तुम्हाला काय मिळू शकेल याची कल्पना गीतातून देणे (उदा. कंबरपट्टा रेखून दावी, देहाचा आकार!!) अशा प्रकारचे विषय पुन्हा पुन्हा येत राहतात, पण (शांताबाई बीइंग शांताबाई) कुठेच तोचतोचपणा कंटाळवाणा होत नाही (वाचकाने जरा रोमँटिकपणा दाखवून वाचली ही गीतं तर फारच बहार!) शांताबाई नथ फारच आवडते असं दिसतं... नथ सर्जाची नाकी घालता हसेल डावा गाल किंवा सलगी करते नथ ओठांशी, तो तुमचा अधिकार अशा प्रकारे ती खुलून देखील दिसते ह्या गीतांमधे!! अनेकविध लावण्या आहेत ह्या पुस्तकात. पाडव्याची, रंगपंचमीची, श्रावणाची, अशा विविध दिवसांच्या लावण्या तर हिरव्या रंगाची लावणी देखील आहे. पाडव्याची लावणी म्हणजे पाडव्याला शालू मागते आहे, कारण ती रात्री एकांतात उभारणार आहे. 🙂 "मी सुंदर आहे तर आता मी काय करू?" अशी तक्रारही दिसून येते. "माझ्या नखऱ्याच्या शंभर तऱ्हा" सांगणारीला स्वतःच्या सौंदर्याची पुरेपूर जाणीव आहे आणि त्यापेक्षाही, फक्त शारीरिक सौंदर्यावर विसंबून न राहता, त्याबरोबर तोरा दाखवत भुरळ पाडणे ह्यात ती माहीर आहे. पण त्याचबरोबर ती धोक्याची सूचना पण देते आहे... घटकाभर संग बसून घालवा वेळ, जमल्यास मनांचा जमून येईल मेळ, नाहीतर यायचा अंगाशी हा खेळ, पाय टाकण्याआधी इथे, विचार पुरता करा, माझ्या नखऱ्याच्या शंभर तऱ्हा!! एका लावणीत एका पुरुषाने फसवलंय अशा स्त्रीचे रूप आहे. जत्रेत एक जण भेटला आणि त्याने आपल्याशी फ्लर्ट केलं, जत्रा उलगडल्यावर दुसऱ्या दिवशी मात्र तो डोळ्याला डोळा भिडवत नाही, तोंड चुकवून पुढे जातो, ह्याची तक्रार ह्या लावणीत येते. किती विविधता! अशा लावणी कलाकाराच्या आयुष्याचं विदारक दृश्य देखील शांताबाईंनी दाखवले आहे. तिथे येणारा आज एक, तर उद्या दुसराही असू शकेल किंवा तिथे असणारी आज एक, तर उद्या दुसरीही असू शकेल. हे सांगून त्या म्हणतात... प्रीतीचे नीतीचे व्यर्थ सांगणे, भुकेल्या देहाचे सारे मागणे, जन्माच्या नात्याचे फुका बहाणे, कुणाला सतत इथे राहणे? इथल्या महाली घडीची वस्ती, सुखाचे हिंदोळे आभाळी चढती, घडीत वरती घडीत खालती ऐन विशीतल्या स्त्रीचं सौंदर्याचं अत्युत्तम वर्णन एका गीतात केलं आहे. अनेक गीतांमध्ये पुरुषांनी स्त्रीच्या देहाचे आणि मनाचे केलेले वर्णन दिसून येते. त्यातही नुसता देहच नाही तर स्त्रीचा तोरा (attitude) देखील पुरुषाला कशी भुरळ पाडतो हे दिसतच. "ही चाल तुरुतुरु" आपल्या सगळ्यांच्या आवडीचे आणि माहितीचे आहे. असंच "मनाच्या धुंदीत लहरीत ये ना" हे देखील. गीतांमध्ये श्रावण, पाऊस, विरह, वाट बघणे हे सर्व हमखास येतं. एक गीत आहे "लहरी सजण कुणी दावा" - मीना खडीकर यांचे संगीत, उषा मंगेशकर यांचा आवाज. हे गीत मला ना वाचायला आवडलं ना ऐकायला आवडलं 🫣 श्रीकृष्ण राधेच्या कथा तर आपण गवळणींमधे अनेक वेळा ऐकल्या आहेत. कृष्णाची धून ऐकल्यानंतर अगदी काहीही न सुचता तशीच्या तशी निघालेली राधा! त्यातही तिच्या शृंगारचं वर्णन येतंच. सजण्याची आवड असलेल्या स्त्रीचे वर्णन अतिशय खुबीने शांताबाईंनी केले आहे. मला स्वतःला नटण्या मुरडण्याची अतिशय हौस असल्यामुळे हे सगळं वर्णन वाचून, "हे पुस्तक आपण आधी का नाही वाचलं" याचं दुःख मात्र झालं. ही उदाहरणं बघा ना... माथ्यावर मोतियाची जाळी, भांगेत मोती सर, चंद्रकोर भाळी, कानात झुमके, केसांमध्ये वेल, नाकात नथ, नथित हिरे, बिल्वदळे, वज्रटिक, `बोलताना पाठीवर जिचे रेशमाचे गोंडे खालीवर होतील अशी` पाच पदरी मोहन माळ!! दंडात वाकी रुताव्या, शिंदेशाही तोडे असावेत आणि पायी सांध्यात सोनसळी, गळ्यात तन्मणी, कमरेला कंबरपट्टा, पायी पैंजण.... "शालू हिरवा, पाच नि मरवा, वेणी तीपेडी घाला" हे गीत तर फारच प्रसिद्ध झाले. शृंगार आणि सौंदर्य यांचे वर्णन या सगळ्या गीतांमध्ये अगदी खुलून आलेलं आहे. आणि प्रेम! त्याविषयी किती लिहावं आणि कशाप्रकारे लिहावं असा मोठाच प्रश्न पडला आहे. तरीही एका स्त्रीच्या मनाने वाचलेल्या ह्या चार ओळी लिहीतेच... काय वाजले प्रिय ते पाऊल, तो तर वारा तिची न चाहूल, भास हो फसवा वरचेवरी, शोधितो राधेला श्रीहरी!! ...Read more