* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Availability : Available
  • ISBN : 9788177664515
  • Edition : 14
  • Publishing Year : APRIL 1984
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 308
  • Language : MARATHI
  • Category : BIOGRAPHY
  • Available in Combos :RANJEET DESAI COMBO SET- 42 BOOKS
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
THE NOVEL IS A GRAPHIC DESCRIPTION OF RAJA RAVI VERMA`S LIFE WHICH BEGINS WITH HIS EARLY CHILDHOOD DAYS IN HIS NATIVE PLACE, KILIMANOOR, A TYPICAL KERALA VILLAGE. HIS DEVELOPMENT AS AN YOUNG ARTIST UNDER THE GUIDANCE OF HIS MATERNAL UNCLE RAJA RAJ VERMA.
"राजा रविवर्मा या अजरामर चित्रकाराच्या जीवनावरील श्रेष्ठ कादंबरी.या कादंबरीत प्रसिद्ध चित्रकार राजा रविवर्मा यांची जीवनकहाणी चित्रमय शैलीत सांगण्यात आली आहे. कादंबरीची सुरुवात होते ती, निसर्गरम्य केरळमधल्या किलीमनुर या गावातून. या गावात रवीवर्मांच बालपण गेल. कादंबरीत तरुण वयात झालेली त्यांची जडणघडण,त्यांच्या काकाकडे-राजा रविवर्माकडे घेतलेले चित्रकलेचे शिक्षण यांचे ओघवत्या शैलीत वर्णन केले आहे.

No Records Found
Original LanguageTranslated LanguageTranslated ByWebsite
MARATHIENGLISHHARPERCOLLINS INDIA https://harpercollins.co.in/product/raja-ravi-varma/
Keywords
#8 APRIL # SWAMI # SHRIMAN YOGI # RADHEYA # MAZA GAON # ABHOGI # BARI # PRATIKSHA # SAMIDHA # PAVANKHIND # LAKSHYAVEDH # SHEKARA # MORPANKHI SAVALYA # SANKET # ASHADH # MADHUMATEE # MEKH MOGARI # KATAL # ROOPMAHAL # MEGH # PRAPAT # VAISHAKH # KAMODINI # GANDHALI # BABULMORA # AALEKH # KANCHANMRUG # SHRIMANYOGI (NATAK)# SANGEET TANSEN (NATAK)# SAVALI UNHACHI (NATAK)# HE BANDH RESHMACHE (NATAK)# PANKH JAHALE VAIRI (NATAK)# DHAN APURE (NATAK)# RAMSHASTRI (NATAK)# LOKNAYAK (NATAK)# SWAMI (NATAK)# VAARSA (NATAK)# TUZI VAT VEGALI (NATAK)# PANGULGADA (NATAK)# GARUDZEP (NATAK)# SNEHADHARA (NATAK)# (NATAK)# SANCHIT (NATAK) #८ एप्रिल #स्वामी (राज्य पुरस्कार १९६२,ह.ना. आपटे पुरस्कार १९६३) #साहित्य अकादमी पुरस्कार १९६४) #श्रीमान योगी #राजा रविवर्मा #राधेय #माझा गाव #अभोगी #बारी #प्रतिक्षा #समिधा #पावनखिंड #लक्ष्यवेध #शेकरा #मोरपंखी सावल्या #संकेत #आषाढ #मधुमती #मेख मोगरी #कातळ #रुपमहाल #रुपमहाल #मेघ #प्रपात #वैशाख #कमोदिनी #गंधाली #बाबुलमोरा #आलेख #कांचनमृग #श्रीमानयोगी-नाटक #संगीत तानसेन-नाटक #सावली उन्हाची –नाटक #हे बंध रेशमाचे –नाटक #पंख जाहले वैरी –नाटक #रामशास्त्री –नाटक #धन अपुरे –नाटक #लोकनायक –नाटक #स्वामी –नाटक #वारसा –नाटक #तुझी वाट वेगळी –नाटक #पांगुळगाडा –नाटक #पांगुळगाडा –नाटक #गरुडझेप –नाटक #स्नेहधारा –नाटक #संचित -नाटक
Customer Reviews
  • Rating Starभावना प्रसाद नातु

    प्रसिद्ध लेखक रणजित देसाई,सर्वांना “स्वामी कार” म्हणून परिचित आहेत.त्यांच्या स्वामी,श्रीमानयोगी,राधेय या कादंबऱ्या ऐतिहासिक व्यक्तिरेखांवर आधारलेल्या आहेत.पण राजा रविवर्मा ही कादंबरी,प्रख्यात चित्रकार राजा रवी वर्मा,यांच्या जीवनावर आधारित आहे.कादंबरत एखाद्या कलावंताचे चरित्र लिहायला घेताना,नुसता सत्याचा आधार घेऊन चालत नाही.त्यात कलावंताच्या कल्पकतेचा आधार घ्यावा लागतो,असे लेखक म्हणतात.या कादंबरीतील,साऱ्याच व्यक्तिरेखा वास्तवातल्या नाहीत.तर काही कल्पक आहेत,याची नोंद घ्यावी,असे लेखक सुचवतात.राजा रविवर्मा,यांच्यावर कादंबरी लिहावी.असे रॉय किणीकर यांनी सुचवले.मग लेखक त्यावर विचार करू लागले.त्यांनी आधी,रविवर्मा यांचे वास्तव्य असलेले प्रदेश पाहिले.बंगलोर, म्हैसूर, केरळ, मावेलीकिरा, कन्याकुमारी ही चित्रकाराची वास्तव्याची,सारी स्थळे पाहून झाली.त्यांचे काही नातेवाईक भेटले. त्यांच्याशी बोलून सगळी माहिती गोळा करून,प्रस्तुत कादंबरी पूर्णत्वास नेली,असे रणजित देसाई सांगतात. राजा रवी वर्मा यांचा जन्म,राजघराण्यात झाला.वडील इझूमाविल वेदशास्त्रसंपन्न पंडित,आई उमांबा,मामा राजा राज वर्मा, बहीण मंगला हे सारे किलीमानुर येथे रहात असत.मातृकूलपद्धतीनुसार रवीचे वडील लग्नानंतर त्याच्या आईच्या, उमांबाच्या घरी राह्यला येतात.एकदा मामाचा सेवक पाचन हा रवीची तक्रार घेऊन मामाकडे येतो आणि रवीने देवळाच्या भिंती कोळश्याने चित्र काढून,रंगविल्याचे सांगतो.रवीचा मामा चित्र पहातो,तो रवीला विचारतो की ही चित्रे कुणी काढलीत.रवी स्वतःच काढल्याचे सांगतो.राजा राज मामा रवीच्या आईला बोलावून घेतो आणि रवीने काढलेल्या घोड्याच्या चित्राचे कौतुक करतो आणि रवीच्या आईस म्हणतो की,घोड्याचे चित्र काढणे कठीण गोष्ट आहे,जे ज्याने इतके सुरेख काढले आहे.यापुढे मी त्याला शिकवू शकत नाही.त्याने आता त्रावणकोरची राजधानी त्रिवेंद्रमला जाऊन शिक्षण घ्यावे.तेथील राजे आईल्यम तिरूनाल कलेचे भोक्ते आहेत.तिथे त्याला चांगले शिक्षण मिळेल.असे म्हणून राजा राज मामा,रवीला त्रिवेंद्रमला घेऊन जातो.राजे तिरूनालशी परिचय करुन देतो.राजे खुष होतात.राजे तिरूनाल दूरदर्शी, स्पष्ट विचारांचे,कलाकारांना प्रोत्साहन देणारे असतात.त्यांच्या दरबारी परदेशी चित्रकार,चित्र काढण्यास येतात.तेव्हा राजे,त्यांना रवीला शिकवण्याची विनंती करतात.तिथे ब्रूक्स नावाच्या गोऱ्या चित्रकाराला रवीला शिकव असे राजे सांगतात.तो मला चित्र काढत असतांना जवळ कुणी चालत नाही.म्हणून नकार देतो.राजे ज्यावेळेस त्यास तुमची आम्हास गरज नाही सांगतात,तेव्हा ब्रूक्स चित्र काढतांना दूरुन पाह्यला परवानगी देतो.रवी दुरूनच चित्र कसे काढतात,रंग तबक कसे वापरतात,ते बघतो. एकदा राजे तिरूनाल ह्यांच्या भगिनी राणी लक्ष्मीबाई रवी वर्माच्या महालात येतात.तेव्हा रवी त्यांना त्यांचे “अन्नपूर्णा देवीच्या” स्वरूपांत चित्र काढू देण्याची परवानगी मागतो. राजे तिरूनाल यांना सांगायचे नाही एवढ्या एका अटीवर त्या तयार होतात.चित्र पुर्ण झाल्यावर तो त्यांना दाखवतो आणि चित्र पाहण्यासाठी बोलावणे करतो,चित्र पाहून राजे खूप खुष होतात.हेच रवी वरम्याचे पहिले चित्र. ते चित्र पाहिल्यावर राजे,राणी साहेबांना म्हणतात की मी मागे तुमची बहीण,पुरुतार्थीचे लग्न रवी वर्माशी लावण्याबाबत बोललो होतो.तेव्हा तुम्ही त्याच्या काळ्या रंगावरुन नकार दिला होता.माणसं नुसती रुपानं संपन्न असून चालत नाहीत,ती गुणानही संपन्न असावी लागतात.रवी वर्माचे पुरुतार्थीशी लग्न होते.रवीला मातृकूलपद्धतीनुसार पुरुतार्थीच्या घरी मावेलीकिराला जावे लागते.तिथे रवीचे पुरुतार्थीशी मतभेद होतात.तिला ह्याचे चित्रकार असणे मान्य नसते.रवी पुनः किलीमानुरला परत येतो. काही दिवसांनी राजे आईल्यम तिरूनाल रवीला,पुनः त्रिवेंद्रमला बोलावतात.राजा तिरूनाल यांनी खास दरबार भरविलेला असतो.रवी वर्मा याचे जेव्हा दरबारात आगमन होते.तेव्हा राजे, “राजा रवी वर्मा आपण पुढे यावे.”असे महणून स्वागत करतात.रवी वर्मा ‘राजा’ असा उल्लेख केल्यामुळे गडबडून जातात.तेव्हा राजे तिरूनाल खुलासा करतात आणि दरबारचा वीरशृंखलेचा मान प्रदान करतात आणि राजा ही पदवी बहाल करतात,तेव्हा पासून रविवर्मा,”राजा रविवर्मा” म्हणून ओळखला जाऊ लागतो. . आता रविवर्मा सगळ्या भारतभर भ्रमंती करून,वेगवेगळ्या विषयावरील चित्र काढतात.त्यातील देवदेवतांची चित्रे खूप प्रसिद्ध पावतात.घराघरात त्यांचे नाव पोहोचते.पण त्यांना वेगळे विषय हवे असतात. त्यातूनच पुराणातील काही प्रसंगावर,आधारित चित्र काढतात.रविवर्मा कलेसाठी घरदार सोडून मुंबईला येतो. मुंबईत आल्यावर एका प्रशस्त बंगल्यात,रंगशाळा निर्माण करून,तेथे भाऊ राज वर्मा सह रहाण्यास सुरुवात करतो.यादरम्यान सुगंधा नामे कलावंतीण,त्याच्या आयुष्यात येते.ती त्यावर मनापासून प्रेम करत असते.त्याच्या कलेची प्रशंसा करते.रवि वर्माचे कलेवरील प्रेम,त्याची सुंदर देहयष्टी,सुंदर आणि सरळ नासिका,मध्यभागी गंध लावलेले भव्य कपाळ,तेजस्वी डोळे,धारदार नजर तिच्या मनात भरते.तिच्या सहवासात,रवी वर्मा कडून एकसेएक कलाकृती घडत जाते.जसे शकुंतला आणि मेनका,हंस दमयंती,मानिनी राधा,अशी अनेक उत्तम चित्रांची निर्मिती होते.आसेतू हिमाचल त्यांच्या चित्रांची कीर्ती पसरते.रवी वर्माच्या चित्रांचे वैशिष्ट केवळ सुंदरता एवढेच नव्हते,तर त्याच्या चित्राच्या चेहऱ्यावरील भाव इतके खरे असत,की पहाणाऱ्याची नजर चेहऱ्यावरून खाली ढळतं नसे.परंतु मनुष्याच्या आयुष्यात चांगल्या बरोबर वाईटही घडतच असतं.ज्यांना रविवर्मा यांची कीर्ती सहन होत नाही,असे लोकं त्यांची नाहक बदनामी करतात.रवी वर्माला अनेक चढ-उतारांना तोंड द्यावे लागले.प्रत्येक मोठ्या माणसाच्या बाबतीत जे घडते ते,की प्रशंसा करणारे लोक कमी व नावं ठेवणारे लोक जास्त अशी परिस्थिति त्याच्याही जीवनांत येते. मुंबईला असतांनाच राजा रवी वर्मा यांस कोर्टाची नोटिस येते.त्याच्यावर दोन गुन्हे दाखल करण्यांत आलेले असतात.पहिला गुन्हा ‘हिंदूंच्या देवदेवता घराघरांत पोहोचवून त्यांच पावित्र्य नष्ट केले’ आणि दूसरा ‘देवदेवतांची नग्न चित्र काढून त्यांना बीभत्स रूप दिले आहे.देवदेवतांची विटंबना केली आहे. हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावल्या आहेत.ही बातमी पसरल्यावर बापट नावाचे वकील,जे त्यांच्या चित्रांचे ग्राहक व चाहते असतात.ते राजा रवी वर्मा यांचे वकीलपत्र घेण्यास पुढे येतात.पण राजा रवी खटला स्वतःच चालविण्याचे ठरवितात.नकार देतांना जे शब्द लेखकाने राजा रवी ह्यांच्या तोंडी दिलेले आहेत,ते असे “बापट,एक गोष्ट लक्षांत घ्या. माणसान आयुष्यात कुठेतरी श्रद्धा बाळगून जगावं. त्या श्रद्धेला तडा जातो असं वाटलं तर सर्वस्व पणाला लावावं..ही माझी श्रद्धा आहे.तिला कोणीतरी आव्हान दिले आहे.ते स्वीकारणें हा माझा एकट्याचा धर्म आहे.खटला दाखल करणाऱ्यांचे वकील आणि रवी वर्मा ह्यांच्यातील दावे आणि प्रतिदावे हे कादंबरीची 10-12 पाने व्यापुन टाकतात.ते येथे देणे शक्य नाही.पण राजा रवी वर्मा कोर्टापुढे जे म्हणतो ते असे, “महाराज माझ्यावर जो आरोप केला आहे की, माझ्या चित्रात नग्नता आहे आणि मी देवादिकाच्या चित्रांचा प्रसार केला,हा आरोप मला मान्य आहे,फक्त मला आज एवढाच खेद वाटतो की माझ्या मनातलं नग्नतेचे जेवढं सुंदर रूप मला दिसलं तेवढं मला चित्रित करता आलं नाही.” राजा रवी वर्माची ह्या खटल्यातून सुटका होते. या कटू पण जीवघेण्या प्रसंगातून ते सहीसलामत बाहेर पडतात.पण सुगंधाला गमावून बसतात. मुंबईच्या वास्तव्यातच, बडोद्याचे राजे सयाजीराव गायकवाड यांच्याशी,रविवर्मा ह्यांचा परिचय होतो.ते रवी वर्मा ह्यांना चित्र परदेशात पाठविण्यासाठी सुचवितात व संधी उपलब्ध करून देतात.राजे गायकवाड गुणग्राही असतात व उत्तम कलाकारांना मानसन्मान देतात.बडोदा संस्थानांमध्ये प्रदर्शन भरवितात.तिथून पुढे चित्रकलेचा प्रसार व्हावा,म्हणून त्यांच्या मदतीने,रविवर्मा वेगवेगळ्या शहरांमधून चित्रांची प्रदर्शनं भरवितात.लोकांचा चांगला प्रतिसाद मिळतो.चित्रांची कमतरता भासू लागते.म्हणून ते चित्रांचा छापखाना काढायचे ठरवतात.यामागे लोकांना चांगली चित्रे पहाण्याची सवय लागली पाहिजे,हा त्यांचा उद्देश असतो.पण हा सगळा कामाचा डोलारा सांभाळताना,त्यांच्या स्वतःच्या तब्येतीकडे ते लक्ष देऊ शकत नाही.दरम्यान त्यांचे मामाजी,जे त्यांच्यासाठी दैवता समान असतात,त्यांचा मृत्यू होतो.लहान भाऊ,जो चित्र काढण्यास नेहमी मदत करतो,त्याचा मृत्यू होतो.मृत्यूची साखळी संपतच नाही.आईचा वृद्धापकाळाने मृत्यु होतो.रवी या सगळ्यात एकाकी पडतो.खचून जातो. ह्या सगळ्याच कारणांमुळे,ते मुंबईचा छापखाना विक्रीला काढतात.चांगल्या किंमतीची अपेक्षा असूनही,जर्मन तंत्रज्ञान असलेला हा कारखाना,फक्त पंचवीस हजार रुपये एवढ्या किमतीला विकला जातो.मुंबई सोडून ते आपल्या जुन्या गावी,किलीमानूर येथे येऊन रहातात.आपुली अर्धवट राहिलेली चित्रे पुर्ण करतात.ते निराश झालेले असतांना,त्यांची मैत्रीण फ्रेंना म्हणते,नाही रवी,तुझा पराजय नाही झाला,तू यशस्वी झाला आहेस.ती कांगरा आर्ट,ती मुगल आर्ट यांचे वळण बदलून,तू चित्राला नवीन दिशा दिलीस.माणसासारखी माणसं निर्मिलीस,हेच तुझ्या कलेचे मोठेपण आहे.ती समजावते.पण कलावंताचे कलासक्त मन,ते समजण्याच्या पलीकडचे असते.त्या आजारपणात रवी वर्मा जगाचा निरोप घेतात. कादंबरी वाचून आपण सुन्न होऊन जातो.प्रत्येकाने वाचावे अशी ही कादंबरी आहे.रणजीत देसाईंनी कादंबरीत,प्रत्येक प्रसंग अक्षरश जिवंत केला आहे.राजा रवी वर्माच्या आजूबाजूच्या व्यक्तिरेखा जिवंत उभ्या केल्या आहेत.कादंबरी वाचतांना,प्रत्यक्षात प्रसंग घडताहेत,असे वाटत राहते.रविवर्म्याचे मामा,राजा राज वर्मा ह्यांची बुद्धिमत्ता तेजस रंग,भेदक डोळे,अशी प्रतिमा उभी केली आहे.तर कुटुंबातील इतर सदस्य आई,वडील,भाऊ राज,बहिण मंगल,सगळे अवतीभवती वावरत आहेत असे वाटते.बडोद्याचे राजे सयाजीराव,तसेच सेवक रविवर्माचा मित्र रामय्या,या पात्रांच्या व्यक्तिरेखा,छान रेखाटल्या आहेत.त्यांची लेखणी साहित्याच्या सर्व अंगाला स्पर्शून जाते.कादंबरीत स्वामी विवेकानंद रविवर्म्याच्या घरी भेट देतात तो प्रसंग,रविवर्मा आपल्या आई,वडील,मामांना भेटायला जातो तो प्रसंग, गोपाळ कृष्ण गोखले,दादाभाई नवरोजी इत्यादी मान्यवर राजा रविवर्माना भेटतात तो प्रसंग,आणि राजा रवी वर्माच्या अंतिम प्रवासाचा प्रसंग,असे अनेक प्रसंग,लेखक आपल्या लेखणीने अजरामर करतात.ही कादंबरी,वाचण्यायोग्य आहे.एका जगप्रसिद्ध कीर्तीच्या,अजरामर चित्रकाराची, सिद्धहस्त लेखणीतून उतरलेली कादंबरी “राजा रवी वर्मा” आपण वाचली नसल्यास अवश्य वाचा. मला कल्पना आहे की,परिचय अतिदीर्घ झाला आहे.पण राजा रवी वर्मा सारखे अफाट व्यक्तिमत्व, रणजीत देसाई ह्यांच्या सारखा सिद्धहस्त लेखक आणि 300 पानांची कादंबरी, ह्या सगळ्याकडे बघता हा फारसा मोठा नाही,हे आपणांस ही कादंबरी वाचतांना जाणवेल. येथे प्रामुख्याने उल्लेख करावासा वाटतो की मी आणि प्रसाद आणि श्री आणि सौ दिवटे,स्वामीकारांच्या गांवी कोवाडला गेलो असतांना,स्वामीकारांचा नातु सिद्धार्थ शिंदे (मुलीचा मुलगा) ह्याने आम्हांस स्वामीकारांची 3 पुस्तके भेट दिली होती.‘राजा रवी वर्मा’ हे त्यातलेच एक पुस्तक. ...Read more

  • Rating StarYashashri Rahalkar

    पुस्तक:- राजा रवि वर्मा प्रकार :- कादंबरी लेखन:- रणजित देसाई प्रकाशक :- मेहता प्रकाशन आज खूपच दिवसांनी एका बैठकीत पुस्तक वाचून पूर्ण केले. राजा रवि वर्मा ह्या विख्यात चित्रकाराची हा जीवनप्रवास.... कादंबरी खिळवून ठेवते.... आपण रवि वर्माच्या कथेतइतके गुरफटत जातो की जणू त्यातले एक पात्र. रणजित देसाई सरांनी ह्या कादंबरी साठी पाच वर्षे अभ्यास केल्याचे , देशाविदेशात फिरून माहिती गोळा केल्याचे म्हटले आहे ते अगदी यथार्थ वाटते... एकूणात रवि वर्मा ह्यांचा प्रवास दाखविताना जे detailing केलेलं आहे ते अफाट अभ्यास करूनच शक्य आहे. चित्र , रंग आणि चित्रकला ह्यांचाही अभ्यास प्रचंड कमाल आहे... अगदी बारीक बारीक सांगायचे झाल्यास पूर्वी रंग खलून तयार केले जात मग विदेशातून तैल रंग येऊ लागले ... हा सगळा प्रवास कमाल रेखाटला आहे. अगदी एक उदाहरण द्यायचे झाल्यास एके ठिकाणी ब्राउन ते ब्लॅक मधील अनेक रंगछटांचा उल्लेख केला आहे... तो पाहून आपण थक्क होतो. अप्रतिम सुंदर , विख्यात असणारी त्यांची काही निवडक चित्रे देखील समाविष्ट केलेली आहेत. कलाकाराचे कलेच्या रंगात न्हाऊन जाणे, त्याच्यावर लुब्ध होणाऱ्या स्त्रिया, सर्वसामान्य आणि जुनाट विचारसरणीची बायको... सगळं अगदी सहज मांडल आहे. मामाचा मृत्यू, आईचा आणि धाकट्या भावंडांचा मृत्यू प्रसंग कमाल चितारला आहे . हिंदू देवदेवतांची विटंबना केली असा आरोप ठेऊन लावलेला खटला आणि त्याचे यशस्वीपणे केलेले खंडन अप्रतिम आहे. "नग्नता ही पाहणाऱ्याच्या दृष्टीत असते" हे राजा रवि वर्मा इतक्या प्रभावीपणे मांडतात की आहा! चित्रकाराच्या आयुष्यात मॉडेल म्हणून येणाऱ्या अलौकिक सौंदर्यवतीबाबत कुठलेही पुरुष म्हणून आकर्षण न वाटण इतकं कलाकार म्हणून स्थिर असणं कमाल आहे. देहापलीकडची ओढ अतिशय सुंदर वाचकांपुढे ठेवली आहे. थोडक्यात, जरूर जरुर वाचा👍 प्रेमात पाडणारे पुस्तक ✒️यशश्री रहाळकर नाशिक ...Read more

  • Rating StarTejaswini Tawade Kolungade

    नमस्कार आज राजा रवी वर्मा हे पुस्तक वाचून झाले. नेहमी प्रमाणे रणजीत देसाई यांचे दर्जेदार लिखाण. त्यांनी प्रस्तावनेत नमूद केले आहे की ह्या पुस्तकात वास्तव आणि कल्पविलास ह्या दोहोंचे मिश्रण आहे. राजा रवी वर्मा यांची चित्रकलेशी एकनिष्ठता आणि एकरूपता खप छान प्रकारे मांडली आहे. आपली कला हेच आपले दैवत आहे असे मानणारे राजा रवी वर्मा सदैव आपल्या कलेशी प्रामाणिक राहिले. एकदा नक्की वाचावे असे पुस्तक. ...Read more

  • Rating StarAniket Save

    आत्ताच रणजित देसाई लिखित "राजा रवि वर्मा" वाचुन झाले अन् ह्याच कादंबरीवर आधारित "रंग रसिया" हा चित्रपट सुद्धा पाहुन झाला. राजा रवि वर्मा वाचुन झाल्यावर चित्रपटातील काही दृष्ये खटकतात कारण आपण पुस्तकाच्या अनुषंगाने विचार करीत असतो. असो परंतु चित्रप बनवताना दिग्दर्शकाला काही व्यक्तिस्वातंत्र्य हे घ्यावच लागतं. परंतु रणजित देसाई लिखित ह्या कादंबरी बद्दल बोलायचे झाले तर ते हातातील पुस्तक खाली ठेवु देत नाहीत अन् ठेवलं तर पुन्हा हातात घेण्याची हुरहुर लागुन राहते. त्यांची भाषा अतिशय सोपी,ओघवती आणि गुंतवुन ठेवणारी. कुठेही आपल्याला ती कंटाळवाणी किंवा बोजड वाटत नाही. हेच तर खरं यश आहे लेखकाचं. राजा रवि वर्मा यांनी काढलेल्या देवादिकांच्या चिञांनसमोर जनता आजही नतमस्तक होते आणि आजही अनेक उदयोन्मुख चित्रकार त्यांनाच आपले प्रेरणास्थान मानतात. राजा रवि वर्मा यांनी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय चित्रकारितेत एक मैलाचा दगड स्थापन केला आहे. मला वाटते ज्यावेळेस चित्रकलेचं नाव घेतलं जाईल तेव्हा राजा रवि वर्मा ह्या नावाचा उल्लेख केल्याशिवाय आपण पुढे जाऊच शकत नाही. आपल्या अवघ्या ५८ वर्षांच्या जीवन कारकीर्दींत त्यांनी अनेक पौराणिक कथांना मूर्त रूप देऊन ती पात्र चित्ररूपात अजरामर करून भारताची चित्रकला एका वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवली... ...Read more

  • Read more reviews
Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

ANUWADATUN ANUSARJANAKADE
ANUWADATUN ANUSARJANAKADE by LEENA SOHONI Rating Star
कौशिक लेले

पुस्तक – अनुवादातून अनुसर्जनाकडे (Anuwadatun Anusarjanakade) लेखिका – लीना सोहोनी (Leena Sohoni) भाषा – मराठी पाने – २३९ प्रकाशन – मेहता पब्लिशिंग हाऊस. फेब २०२४ छापील किंमत – रु. ३७०/- ISBN – 9789357205337 ह्या परिचयाची माझी वेबसाईट लिंक htps://learnmarathiwithkaushik.com/courses/anuwadatun-anusarjanakade/ मराठी पुस्तकांमध्ये सध्या इतर भाषांतून अनुवादित झालेली पुस्तके सुद्धा मोठ्या संख्येने दिसतात. एखादा सरस अनुवाद वाचताना आपल्या डोक्यात सुद्धा आपल्या आवडीच्या परभाषेतल्या पुस्तकांची यादी तयार होते. ही पुस्तकं सुद्धा मराठीत आली तर काय मजा येईल असं वाटतं. भाषा हा ज्यांचा जिव्हाळ्याचा विषय आहे त्यांची इच्छा एक पुढचं पाऊल टाकेल. आपणही स्वतः असा अनुवाद केला तर ? आपल्यालाही दोन्ही भाषा चांगल्या येत आहेत मग अनुवाद का करू नये ? हे पिल्लू डोक्यात शिरेलच. असा अनुवाद करायचा स्वतः काही प्रयत्न केला की लक्षात येईल की हे किती किचकट काम आहे. चांगला अनुवाद करायचा असेल तर सराव लागेल. अभ्यास लागेल. त्याची काही तंत्र मंत्र शिकून घ्यावी लागतील. एखाद्या चांगल्या जाणकार व्यक्तीचं, अनुभवी व्यक्तीचं मार्गदर्शनही मिळायला हवं. जर तुमच्याही मनात अशा भावना आल्या असतील तर लीना सोहोनी यांचं “अनुवादाकडून अनुसर्जनाकडे” हे पुस्तक तुम्हाला नक्की आवडेल. लीना सोहोनी हे नाव मराठीत अनुवादिका म्हणून प्रसिद्ध आहे. आत्तापर्यंत त्यांनी अनुवाद केलेली पन्नासच्यावर पुस्तके प्रकाशित झाली आहेत. त्यांचा अनुभव व अधिकार वेगळा सांगायला नको. त्यांचे हे पुस्तक "अनुवादातून अनुसर्जनाकडे" पुस्तकाचा पहिला भागात लीना सोनी यांनी आपल्या अनुवादाच्या प्रवासाचं सिंहावलोकन केलं आहे. त्यांनी अनुवादाची सुरुवात कशी केली, त्यात प्रगती कशी झाली हे लिहिलं आहे. अनुवादामुळे प्रसिद्ध लेखक जेफ्री आर्चर, सुधा मूर्ती, किरण बेदी यांच्याशी जुळलेले संबंध आणि त्यांच्या भेटीची वर्णनं आहेत. ह्या प्रवासात “मेहता पब्लिशिंग हाऊस” या प्रकाशन संस्थेचा भरभक्कम पाठिंबा त्यांना मिळाला. सुनील मेहता आणि अनिल मेहता यांच्याबरोबरच्या आठवणी सुद्धा पुस्तकात आहेत. पुढच्या भागात अनुवाद या विषयाची एखाद्या शास्त्रीय शोधनिबंधाप्रमाणे माहिती दिलेली आहे. यात अनुवाद प्रक्रियेकडे अतिशय बारकाईने बघितलं आहे. ढोबळमानाने बघितलं तर, अनुवाद म्हणजे तर एका भाषेतल्या शब्दांच्या ऐवजी दुसऱ्या भाषेतले शब्द वापरणे. पण प्रत्येक वेळी एका शब्दाच्या बदल्यात दुसरा भाषेतला एक शब्द असं होतंच असं नाही. त्यामुळे काही वेळा शब्दाची फोड करून दाखवावी लागते. तर काही वेळा मूळ मोठं वाक्य लहान होऊ शकतं. कदाचित तिथे पूर्णपणे वेगळीच शब्दयोजना वाक्यरचना होऊ शकते. या प्रत्येक प्रकाराला एक विशिष्ट शास्त्रीय नाव (पारिभाषिक संज्ञा) आहे हे आपल्याला पुस्तक वाचून कळतं. जे शब्दांच्या बाबतीत तेच वाक्यांच्या बाबतीत. मूळ भाषेतल्या शब्दांसाठी नवीन शब्द वापरून वाक्य तयार झालं तरी ते वाचकाला सहज वाटलं पाहिजे. नाहीतर आपण लगेच म्हणू, “अनुवाद खूप बोजड झाला आहे; ठोकळेबाज झाला आहे”. हे टाळायचं तर वाक्यरचना सुद्धा सुधारायला पाहिजे. याची उदाहरणे पुस्तकात दिली आहेत आणि त्या अनुषंगाने पारिभाषिक संज्ञा (terminology) काय आहे हे मराठी आणि इंग्रजी दोन्हीत दिलं आहे. शब्द, वाक्य ह्यांना लावलेल्या कसोटीचा विस्तार करून ती कसोटी “संकल्पनां”ना लावायला पाहिजे. एखाद्या भाषेत, एखाद्या समाजात असणाऱ्या संकल्पना, प्रथा-परंपरा मराठी भाषेत नसतील तर अनुवाद करताना ते जसंच्या तसं ठेवायचं का तिथे काही वेगळी संकल्पना वापरायची ? का तळ टीप देऊन स्पष्टीकरण द्यायचं? असे एकाच गोष्टीकडे बघण्याचे वेगवेगळे पर्याय उपलब्ध आहेत. हा मुद्दा आपण सोदाहरण स्पष्ट केला आहे. हा ऊहापोह वाचल्यासार अनुवादासाठी दोन्ही भाषांवर आपली किती चांगली पकड पाहिजे हे वाचकाच्या लक्षात येईल. त्याचबरोबर जे पुस्तक आपण वाचतोय त्याची पार्श्वभूमी, त्यातल्या प्रसंगाची सामाजिक पार्श्वभूमी, आणि लेखकाला काय ध्वनीत करायचे आहे हे सगळं समजणं सुद्धा किती महत्त्वाचं हे लक्षात येईल. म्हणजे अनुवाद प्रक्रिया दिसताना शब्दांची दिसली तरी “शब्दांच्या पलीकडले” अनुवादकाला पकडता आले तरच मूळ कृतीला न्याय मिळेल. हे या पुस्तकाच्या वाचनातून अधोरेखित होतं. पुस्तकाचा प्रकारानुसार अनुवादकासमोर असणारी आव्हाने सुद्धा बदलतात. कथा-कादंबरीचा अनुवाद वेगळा तर कवितेचा अनुवाद वेगळा. कारण कवितेमध्ये भावभावनांना महत्त्व आहे तितकेच महत्त्व शब्द, लय, शब्दचमत्कृती यांनाही आहे. म्हणूनच तर ते पद्य आहे गद्य नाही. लीनाजींनी ह्याचाही परामर्श घेतला आहे. नाटकाचा अनुवाद करताना येणारी आव्हाने अजून वेगळी. परिणामकारक संवाद, नेपथ्य, पात्रांची देहबोली, त्याचा प्रेक्षकांवर होणारा परिणाम या सगळ्याचा विचार करून अनुवाद करावा लागतो. म्हणूनच, अनुवाद म्हणजे प्रत्येक वेळी “शंभर टक्के पुस्तक जसेच्या तसे” असं नसतं. तर काही वेळा ते रूपांतर ठरतं. काही वेळा तो स्वैर अनुवाद ठरतो. तर काही वेळा मूळ कलाकृतीवर आधारित नवीन कलाकृती ठरते. हे सुद्धा कितीतरी उदाहरणे देऊन स्पष्ट केले आहे. हे सगळे मुद्दे एकमेकांशी निगडित आहेत त्यामुळे पुस्तकात बऱ्याच वेळा मुद्द्यांची पुनरावृत्ती झाली आहे असं मला वाटलं. ती पुनरुक्ती टाळून कदाचित थोडी पानं कमी करता आली असती. पण मुद्दा वाचकाच्या मनावर ठसावा, कुठलंही विशिष्ट प्रकरण वाचायला घेतले तरी ते त्या मुद्द्यापुरतं पूर्ण असावं हा त्यामागचा हेतू असेल. पुस्तकात पुढे अनुवादकांना नोकरी, व्यवसायाच्या काय संधी आहेत; कुठल्या संस्था याबद्दलचं शिक्षण देतात; कुठले कोर्सेस उपलब्ध आहेत याबद्दलचा तपशील आहे. अनुवाद करायला सुरुवात करायची असेल तर मजकूरनिवड, प्रकाशकांशी संपर्क, परवानगी ह्याचे मार्गदर्शन आहे. त्यांनतर शाळेत आपण जे प्राथमिक व्याकरण शिकतो; म्हणजे कर्ता, कर्म, क्रियापद, ॲक्टिव-पॅसिव्ह व्हॉइस, वेगवेगळे काळ इत्यादींच्या व्याख्या देऊन सगळ्याची उजळणी केली आहे. ज्याला अनुवाद क्षेत्रात उतरायचे आहे त्याला व्याकरणाचा अजून बराच अभ्यास करावा लागणारच आहे. आणि पुस्तकाचा उद्देश व्याकरण शिकवणं नाही तर अनुवादकासाठी व्याकरण अत्यावश्यक आहे हे ठसवणं आहे. त्यामुळे व्याकरणाचा भाग पुस्तकात नसता तरी चालला असता असं मला वाटलं. पुस्तकातील काही पाने वर दिलेल्या लिंकवर शेअर केली आहेत. म्हणजे तुम्हाला पुस्तकाची, लेखनशैलीची अजून चांगली कल्पना येईल. त्यात पुढील मुद्द्यांबद्दलची पाने आहेत १) अनुवादिका म्हणून येणारे कटुगोड अनुभव. २) प्रसिद्ध लेखक जेफ्री आर्चर ह्यांच्या पुस्तकांचा मराठी अनुवाद लीनाजींनी केला आहे. त्यातून जेफ्री आर्चर ह्यांच्याशी भेटीगाठी झाल्या त्यातला एक प्रसंग. ३) अनुवादाचे वर्गीकरण/प्रकार सांगणाऱ्या प्रकरणातली दोन पाने. अनुवाद प्रक्रियेची किती बारकाईने तांत्रिक चिकित्सा केली आहे हे लक्षात येईल. ४) नाटकाचा अनुवाद करताना येणारी आव्हाने ह्याबद्दलच्या प्रकरणातली दोन पाने. लीना सोहोनींचे आत्मकथन असणारा पुस्तकाचा पहिला भाग सर्व वाचकांना वाचायला आवडेलच. पुस्तकाचा दुसरा भाग तांत्रिक आहे. तो सर्वसामान्य वाचकाला वाचायला आवडेलच असं नाही. पण तो वाचल्यावर अनुवादक म्हणून काम करताना किती कटकटी असतात, काय व्यवधानं सांभाळावी लागतात हे वाचकाच्या लक्षात येईल. त्यातून अनुवादकांकडे व त्यांच्या कामाकडे बघण्याचा दृष्टिकोन अजून कौतुकाचा आणि कृतज्ञतेचा होईल हे निश्चित. ज्यांना अनुवाद करायचा आहे, या क्षेत्रात शिरायचं आहे किंवा तशी उमेदवारी सुरू झाली आहे त्यांना हा भाग मार्गदर्शक ठरेल. जाण वाढवेल हे नक्की. त्यामुळे या पुस्तकाच्या वाचनातून अनुवादाचा किडा काही वाचकांच्या डोक्यात गेला आणि त्यातून नवे अनुवादक मराठीत निर्माण झाले तर ते सोन्याहून पिवळे ! मराठीत कथा,कादंबऱ्या, चरित्र, सामाजिक विषयांची चर्चा ह्या पद्धतीचे लेखन भरपूर होत असतं. पण ह्या पुस्तकाप्रमाणे शास्त्रीय/तांत्रिक चिकित्सा करणारी, गंभीरपणे शिकवणारी पुस्तकं कमी दिसतात. ती प्रकाशित झाली तरी ती क्रमिक पाठ्यपुस्तक किंवा “अभ्यासाचे पुस्तक” या प्रकारात ढकलली जातात आणि दुर्लक्षित होतात. पण या पुस्तकाच्या लेखिका आणि प्रकाशक यांनी हे पुस्तक मुख्यधारेतल्या पुस्तकाप्रमाणे सादर केलं आहे. त्यातून हे पुस्तक जास्त वाचलं जाईल; जास्त लोकांना विचार प्रवृत्त करेल असं मला वाटतं. अशा प्रकारची पुस्तकं मराठीत प्रकाशित होणे हे मराठी भाषेला ज्ञानभाषा करण्यासाठी मोठे योगदान आहे. त्याबद्दल प्रकाशक आणि लेखिका दोघांचेही एक मराठी भाषा प्रेमी म्हणून मी मनापासून आभार मानतो. —————————— मी दिलेली पुस्तक श्रेणी —————————— अनुवाद करणारे असाल किंवा करायची इच्छा असेल तर आवा ( आवर्जून वाचा ) इतरांनी जवा ( जमल्यास वाचा ) ——————————— आवा ( आवर्जून वाचा ) जवा ( जमल्यास वाचा ) वाठीनावाठी ( वाचलं तर ठीक नाही वाचलं तरी ठीक ) नावाठी ( नाही वाचलं तरी ठीक ) ...Read more

OMKARACHI REKH JANA
OMKARACHI REKH JANA by MANJUSHRI GOKHALE Rating Star
सौ. जस्मिन जोगळेकर

आमच्या पुस्तकप्रेमी समुहावरचा एकही दिवसाचा खंड न पडता सलग 1730 वा पुस्तक परिचय पुस्तक प्रेमी समूह,पुस्तक परिचय अभियान: एकही दिवस खंड पडू न देता पुस्तकांचा परिचय हे पुस्तकप्रेमी समूहाचे यश ! पुस्तक सत्र:- ३ सप्ताह क्रमांक:- २४८ पुस्तक क्रमांक: १७३० दिनांक: १०/०३/२०२५ पुस्तकाचे नांव:- ओंकाराची रेख जना लेखक:- मंजुश्री गोखले पहिली आवृत्ती: फेब्रुवारी २०१२ पृष्ठ संख्या : ३०८ मूल्य: रु. ३२० प्रकाशन: मेहता पब्लिशिंग हाऊस परिचयकर्ती: सौ. जस्मिन जोगळेकर एखाद्या गोष्टीसाठी वेळ यावी लागते म्हणतात, तसं काहीसं झालं माझं. खरंतर पुस्तक वाचनाच्या बाबतीत असं व्हायला नको होतं पण झालं. `हे खूप सुंदर पुस्तक आहे, तुम्ही वाचाच` म्हणून एक पुस्तक आमच्या हाती आलं. अर्थात ज्यांनी सांगितलं त्यांनी त्यांच्या संग्रहातलं पुस्तक दिलं होतं. तसं बरेच दिवस होतं आमच्याकडे. नवऱ्याने वाचून खूपच सुंदर आहे, वाच नक्की सांगितलं देखील मला. पण पुस्तक परत द्यायची वेळ आली तरी वाचलं गेलं नाही. तरी ते नाव डोक्यात फिट बसलं होतं. अखेर एक दिवस ते एकच पुस्तक नव्हे तर त्याच लेखिकेची चार पुस्तकं विकतच घेऊन आले आणि मग ती वेळ आली…. त्या पुस्तकाच्या, पुस्तकातील भाषेच्या आणि त्या लेखिकेच्या प्रेमात पडण्याची. पुस्तक होतं…मंजुश्री गोखले यांनी संत जनाबाईंवर लिहिलेलं `ओंकाराची रेख जना`. `विठू माझा लेकुरवाळा`, `धरिला पंढरीचा चोर` अशा अभंग रचनेतून जनाबाई आपल्या ओळखीच्या आहेत. किंवा विठूराया त्यांना हर कामात मदत करत असतो वगैरे माहीत आहे. पण त्यांचं संपूर्ण चरित्र सगळ्यांना माहीत असेलच असं नाही. ते माहीत करून देण्याचं सुरेख काम या कादंबरीने केलं आहे. जनाबाईंच्या जन्मापूर्वीची आणि नंतरचीही त्यांच्या कुटुंबाची परिस्थिती, छोट्या जनाला मागे ठेऊन दुखण्याने तिला सोडून गेलेली तिची आई, त्यानंतरची बिकट वेळ याचं वर्णन वाचताना डोळ्यातलं पाणी थांबत नाही. पुढेही काही प्रसंग असे आहेत…भागाबाईचं वागणं असेल किंवा सुळावर चढवायचा प्रसंग असेल… डोळ्यात पाणी येतच राहतं. पण एवढं होऊनही त्यांची पंढरीरायावरची भक्ती मात्र गाढ होती. जनाईसुध्दा त्याला पाहायला आतुर होती. सोसले चटके l पोटी नाही घास l विठ्ठलाची आस l जनाईला ll भेटीसाठी त्याच्या l गोळा तनमन l धाडे आवतान l विठूराया ll अखेर विठुरायाकडून आमंत्रण आल्यावर बापलेक पंढरीची वाट चालू लागतात. काळया देवाला पाहायला आसुसलेली जना आणि लेकीला कायमचं परक्या घरी सोडून यायचं या विचाराने जडावलेला दमा… नशिबाची रेख l भिवरेच्या काठी l विठूराया ओढी l जनाईची ll दोघांचा प्रवास विठ्ठलाच्या विश्वासावर सुरू होतो. पुढं जनाईला दामाशेटींच्या घरी सोडून देणं, त्या घराने जनाला आपलंच म्हणणं, नामदेवांसोबत तिचं मोठं होणं अशा कितीतरी प्रसंगांनी सुखावून जायला होतं. तेव्हाची सामाजिक परिस्थिती, जनाचं अतिशूद्र असणं आणि त्यातून स्त्री असणं…त्यासाठी तिला झेलावे लागणारे त्रास, संत म्हणून मोठेपण मिळाल्यावरही त्यांच्यावर आलेला चोरीचा आळ… त्रास होतो वाचताना. जनाची आणि विठ्ठलाची पहिली भेट आणि तिथून त्यांच्यात दृढ होत जाणारे नाते…वाचताना शहारून जायला होतं. जना ते संत जनाबाई हा प्रवास, त्यात जनाबाईंनी रचलेले अभंग, ज्ञानदेवादि भावंडांचा सहवास आणि मुख्य म्हणजे नामदेव आणि जनाबाई यांचे नाते… गुरू शिष्य ऐसी l जोडी कौतुकाची l जनी नामयाची l संतांमधे ll याबद्दल पुस्तकात आलेले उल्लेख मन लावून वाचण्यासारखे आहेत. विठ्ठलाच्या चरणी झालेला जनाबाईंच्या जीवनाचा शेवट म्हणजे तर 🙏 वृंदा कोमेजली l स्तब्ध वारा पाणी l ओघळले मणी l मंजिऱ्यांचे ll थरारली वीट l कंप राऊळाला l श्वास ओलावला l क्षणभर ll आज नाही घाई l विठोबाला काही l जनाईच येई l चरणाशी ll शांता शेळके यांनी अनुवाद केलेलं `चौघीजणी` जसं मनात कायमचं घर करुन बसलं आहे, त्या जोडीला आता `ओंकाराची रेख जना` हे ही अत्यंत आवडीचं झालं आहे. यापूर्वी संत साहित्य किंवा संतांवर लिहिलेलं साहित्य फारसं वाचलं नव्हतं. लताजी किंवा भीमसेनजींमुळे घराघरात पोहोचलेले अभंग तेवढे माहीत होते. त्यामुळं जनाबाईंवर लिहिलेल्या या पुस्तकाबाबत उत्सुकता होतीच. पहिल्या प्रकरणाच्या अगदी पहिल्या ओळीपासून या पुस्तकाशी जी बांधली गेले ते शेवटपर्यंत. पुस्तकातील सगळं वर्णन अगदी बारीक सारीक तपशील देऊन पुढं जात राहतं आणि त्यात आपल्याला गुंतवून ठेवतं. सुरुवातीची काही प्रकरणं तर डोळ्यात अश्रुंच्या धारा घेऊन, पुसट अक्षरं समोर ठेऊन वाचावी लागतात. प्रसंग सगळे l तपशिलासवे l डोळ्यात आसवे l वाचुनिया ll भाषा ही साजिरी l सत्य हेच वाटे l प्रसंग तो घडे l आसपास ll एकूणच पुस्तकातलं वर्णन इतकं जिवंत आहे की सगळे प्रसंग आपल्या आसपास घडताहेत असंच वाटत राहतं कायम. दमा - कुरुंडचं दुर्दैवी आयुष्य, पोटी मूल नसल्याचं त्यांचं दुःख, विठ्ठलाला त्यासाठी साकडं घालण्यासाठी त्यांनी केलेला पंढरपूरचा प्रवास असो किंवा जनाबाईंच्या खोलीत येऊन विठ्ठलाने त्यांच्याशी मारलेल्या गप्पा, त्यांना कामात केलेली मदत…. सगळे अगदी सगळे प्रसंग आपणच जगतोय असं वाटावेत इतके मनाला भिडून जातात. काही ठिकाणं तर अशी… `अरे विठ्ठला, गडबडीत भलतंच काय उचलतोस. तुझा रत्नहार आणि शेला तर घेऊन जा`...असं आपणच विठ्ठलाला हाक मारून सांगावं असं वाटायला लागतं वाचताना. भाषा, वर्णनशैली फार साजिरी आहे. पुस्तकातला `साजिरी` हा शब्द एकदम आवडून गेलाय. एखादा चेहरा पाहिल्यावर कसं आपल्याला कळून जातं ना की, ही व्यक्ती मायाळू आहे किंवा तुसडी आहे वगैरे…तसं पुस्तकाच्या सुरुवातीलाच यातल्या भाषेबद्दल आपुलकी, प्रेम वाटायला लागतं. भाषा साधी पण सुंदर, शब्दांचा वापर असा की यापेक्षा वेगळा शब्द इथं शोभला नसता असं वाटायला लागेल असा. अनवाणी पायाला चटके बसावेत इतकं हवामान अजून बदललं नव्हतं…यासाठी `अजून मातीने माया सोडली नव्हती`... किती सुरेख वाक्य आहे ना! अशी कितीतरी वाक्य आपल्याला त्यांच्या प्रेमात पाडायला लावणारी यात सापडतील. एकूणच सांगायचं झालं तर पुस्तक अप्रतिम आणि सगळ्यांनी आवर्जून वाचावं असंच आहे. एकाच लेखकाची पुस्तकं सलग एका मागोमाग एक अशी माझ्याकडून वाचली जात नाहीत. पण आता खुणावतंय ते… `जोहार मायबाप जोहार`. ...Read more