KANCHAN GHANEKAR

About Author

Birth Date : 16/09/1947


MRS. KANCHAN KASHINATH GHANEKAR IS THE DAUGHTER OF VETERAN FILM ACTRESS SULOCHANA AND WIFE OF FILM AND THEATER ACTOR KASHINATH GHANEKAR. HE WAS BORN ON 16 SEPTEMBER 1947. HE DID HIS BA IN MARATHI AND PHILOSOPHY FROM MUMBAI UNIVERSITY. DEGREE AND M.A. FROM THE SAME UNIVERSITY. THIS DEGREE WAS ACQUIRED WITH THE SUBJECTS OF MARATHI AND LINGUISTICS.

श्रीमती कांचन काशिनाथ घाणेकर या ज्येष्ठ सिनेअभिनेत्री सुलोचना यांची कन्या आणि सिने-नाट्य अभिनेते काशिनाथ घाणेकर यांच्या पत्नी. त्यांचा जन्म १६ सप्टेंबर१९४७ रोजी झाला. त्यांनी मराठी व तत्त्वज्ञान या विषयांत मुंबई विद्यापीठातून बी.ए. ही पदवी संपादन केली आणि त्याच विद्यापीठातून एम.ए. ही पदवी मराठी व भाषाशास्त्र या विषयांसह संपादन केली. १९६९ पासून विविध वृत्तपत्रांतून, सिनेसाप्ताहिकांतून आणि दिवाळी अंकांतून त्यांचे लेख प्रसिद्ध झाले आहेत. नाथ हा माझा या मेहता पब्लिशिंग हाऊसने प्रकाशित केलेल्या त्यांच्या चरित्रग्रंथाला वाचकांचा उदंड प्रतिसाद मिळाला असून, आतापर्यंत त्याच्या नऊ आवृत्त्या प्रकाशित झाल्या आहेत. महाराष्ट्र टाइम्स तर्पेÂ केल्या गेलेल्या दशकातील १०१ मराठी पुस्तकांच्या यादीत चरित्र विभागात या पुस्तकाची नोंद झाली आहे. भालजी पेंढारकर, लता मंगेशकर, सुलोचना, राजा परांजपे यांच्यासह चित्रपटसृष्टीतील १५ दिग्गजांवरील व्यक्तिचित्रांवर आधारित रेशीमगाठी हा लेखसंग्रहही मेहता पब्लिशिंग हाऊसने प्रकाशित केलेला असून, त्याच्याही तीन आवृत्त्या प्रकाशित झाल्या आहेत. ज्येष्ठ अभिनेत्री सुलोचना यांच्या प्रदीर्घ चित्रपट कारकिर्दीवर आधारित आठवणींचं पुस्तक माझी माणसं याचं लेखन सध्या त्या करत आहेत. नाट्यविषयक लोकप्रिय ग्रंथ गौरव पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आलं आहे. भालजी पेंढारकर सांस्कृतिक केंद्र आणि डॉ. काशिनाथ घाणेकर स्मृती विश्वस्त प्रतिष्ठानच्या त्या सदस्य आहेत. अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेतर्फे आयोजित व्यावसायिक नाटकांच्या स्पर्धेकरीता, म.टा. सन्मान - महाराष्ट्रतर्फे आयोजित स्पर्धेकरीता (चित्रपट विभागासाठी), महाराष्ट्र राज्य चित्रपट महोत्सवाकरीता, चित्रपती व्ही. शांताराम पुरस्कारासाठी दोनदा आणि महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट महोत्सवासाठी त्यांनी परीक्षक म्हणून काम पाहिलं आहे.
Sort by
Show per page
Items 1 to 3 of 3 total
24 %
OFF
KANCHAN GHANEKAR COMBO SET - 2 BOOKS Rating Star
Add To Cart INR 665 INR 505
NATH HA MAZA Rating Star
Add To Cart INR 495
RESHIMGATHI Rating Star
Add To Cart INR 170

Latest Reviews

KULAMAMACHYA DESHAT
KULAMAMACHYA DESHAT by G.B. DESHMUKH Rating Star
डॉ शिंदे निलेश, अमरावती

`कुलमामाच्या देशात` वाचून काढले. प्रत्येक कथा खुप वाचनीय आहे. `कपारीत वाघोबा` मध्ये रवींद्र वानखडे ह्यांनी पहाटे चार ते 10 नुसती भ्रमंती केली आहे.. सकाळची सूर्यकिरण अंगावर पडली असताना वाघ बघायला भेटणं ही एक अप्रूप वाटणारी गोष्ट आहे. `डरकाळीचा रार` वानखडे साहेबांनी बेलसरें सोबत अनुभवला आहे. `जिवाची पर्वा` न करता वानखडे साहेब पाळण्यात विसावले होते. गव्याच्या पिलावर वाघीणीने हल्ला केला नाही.. हे वानखडे साहेबांनी स्वतः बघितले व आम्हाला देखील समजले.. वाघाच्या पंजाची कशी प्रतिकृती तयार करतात हे सांगितले परंतू मला लक्षात आले नाही (मी प्रत्यक्ष बोलून जाणून घेईन). `मेहमान रह गया` या कथेत वाघाने माणसाची शिकार कशी केली त्यानंतर वनविभागाने बसची सोय करून मुलांना मदत कशी झाली हे देखील सांगितले व आपल्या सारखे वन अधिकारी काय करू शकतो हे प्रांजळ पणे नमूद केले आहे.. सेमडोह येथील गजराजाची कथा अजून देखील लोक सांगतात त्यातील तुम्ही त्याला वाचवयाचा प्रयत्न केला परंतू तो नियतीला मान्य नसेल. बाणा का घुंगरू- मधील हल्ला व घटना मन विचलित करणारी वाटली व मेळघाट मधील वन कर्मचारी किती कामसू आहेत हे त्या वरून दिसले.. मला बाणा ढाप प्रत्यक्ष बघायला आवडेल.. `रानगव्यांची कवायत` मध्ये रानगवे स्वतःच रक्षण कश्या पद्धतीनं करतात हे मला पहिल्यांदा समजले.. कोकटु इथं तीन दिवस आपण वाघ बघण्याची केलेली हॅट्रिक ही जंगलाने तुम्हा वनाधिकार्‍यास दिलेली सलामी आहे. `शिकार हो गया` - माहुल वेलीचा कसा उपयोग केला जातो व पोळी तयार करतात हे देखील वेगळी गोष्ट वाटली.. आपण सांबर शिकार कशी थांबवली व वन्यजीवनाची साखळी अबाधित राखली.. वाघ खेकडे मारून खातो हे ऐकून नवल वाटले.. असा सॉलिड वन अधिकारी मेळघाटला लाभला हे या कथां मधून मला समजलं व प्रत्येक वाचकाला हे जंगल, इथले लोक या विषयी कायम आकर्षण निर्माण करत राहील.. ...Read more

MAHARUDRA
MAHARUDRA by G.B. DESHMUKH Rating Star
श्री. बाबाराव घोरमाडे, अमरावती

अमरावती जिल्हा मधील एका सामान्य खेड्यातील, एक अलौकिक असामान्य अशा फुटबॉल खेळाडूचे हे व्यक्तिचरित्र. १९४० ते १९५१ हा कालखंड म्हंजे तसाही भारतीया करीता त्यातल्या त्यात ग्रामीण भागाकरिता खडतर कालखंड. अशा विपरीत परिस्थितीत शैक्षणिक आर्थिक सामाजिक मारगदर्शन इत्यादी पाठबळ चा अभाव असताना सुद्धा आतंरराष्ट्रीय दर्जा चा खेळाडू निर्माण होणे हे ते चरित्र नायक चे असामान्य व्यक्तिमत्व अधोरेखित होते. समाधानाची आनंदाची बाब ही की हे पुस्तक रूपाने प्रसिध्द करण्याचे काम चरित्र नायक चे सुपुत्र श्री गजाननराव उर्फ जी बी देशमुख यांनी केले. हे सर्व काही अंशी कर्ज ओझे हलके करण्यासारखे आहे लेखकाला या करीता खूप मेहनत करून माहिती संकलित करावी लागली. एखादी थप्पड बनती थी........ बडे बेआबरू होकर घरी आलो........पण कहाणी मे ट्विस्ट अभि बाकी था..... प्रसंगी चे वाक्य रचना , कोसळणाऱ्या धबधबा सारखे निखळ आनंद देऊन गेले . मेहता पब्लिशिंग ने लॉन्च केले म्हणजे सर्वदूर मराठी माणसाचे पर्यंत पोहोचले आहे वाचनीय आहे प्रत्येकाने वाचावे.विसावा शतकातील पुर्वाध, विपरीत परिस्थितीतही किती कष्ट करावे लागले असतील? धन्य ते.. ...Read more