KANCHAN GHANEKAR

About Author

Birth Date : 16/09/1947


MRS. KANCHAN KASHINATH GHANEKAR IS THE DAUGHTER OF VETERAN FILM ACTRESS SULOCHANA AND WIFE OF FILM AND THEATER ACTOR KASHINATH GHANEKAR. HE WAS BORN ON 16 SEPTEMBER 1947. HE DID HIS BA IN MARATHI AND PHILOSOPHY FROM MUMBAI UNIVERSITY. DEGREE AND M.A. FROM THE SAME UNIVERSITY. THIS DEGREE WAS ACQUIRED WITH THE SUBJECTS OF MARATHI AND LINGUISTICS.

श्रीमती कांचन काशिनाथ घाणेकर या ज्येष्ठ सिनेअभिनेत्री सुलोचना यांची कन्या आणि सिने-नाट्य अभिनेते काशिनाथ घाणेकर यांच्या पत्नी. त्यांचा जन्म १६ सप्टेंबर१९४७ रोजी झाला. त्यांनी मराठी व तत्त्वज्ञान या विषयांत मुंबई विद्यापीठातून बी.ए. ही पदवी संपादन केली आणि त्याच विद्यापीठातून एम.ए. ही पदवी मराठी व भाषाशास्त्र या विषयांसह संपादन केली. १९६९ पासून विविध वृत्तपत्रांतून, सिनेसाप्ताहिकांतून आणि दिवाळी अंकांतून त्यांचे लेख प्रसिद्ध झाले आहेत. नाथ हा माझा या मेहता पब्लिशिंग हाऊसने प्रकाशित केलेल्या त्यांच्या चरित्रग्रंथाला वाचकांचा उदंड प्रतिसाद मिळाला असून, आतापर्यंत त्याच्या नऊ आवृत्त्या प्रकाशित झाल्या आहेत. महाराष्ट्र टाइम्स तर्पेÂ केल्या गेलेल्या दशकातील १०१ मराठी पुस्तकांच्या यादीत चरित्र विभागात या पुस्तकाची नोंद झाली आहे. भालजी पेंढारकर, लता मंगेशकर, सुलोचना, राजा परांजपे यांच्यासह चित्रपटसृष्टीतील १५ दिग्गजांवरील व्यक्तिचित्रांवर आधारित रेशीमगाठी हा लेखसंग्रहही मेहता पब्लिशिंग हाऊसने प्रकाशित केलेला असून, त्याच्याही तीन आवृत्त्या प्रकाशित झाल्या आहेत. ज्येष्ठ अभिनेत्री सुलोचना यांच्या प्रदीर्घ चित्रपट कारकिर्दीवर आधारित आठवणींचं पुस्तक माझी माणसं याचं लेखन सध्या त्या करत आहेत. नाट्यविषयक लोकप्रिय ग्रंथ गौरव पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आलं आहे. भालजी पेंढारकर सांस्कृतिक केंद्र आणि डॉ. काशिनाथ घाणेकर स्मृती विश्वस्त प्रतिष्ठानच्या त्या सदस्य आहेत. अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेतर्फे आयोजित व्यावसायिक नाटकांच्या स्पर्धेकरीता, म.टा. सन्मान - महाराष्ट्रतर्फे आयोजित स्पर्धेकरीता (चित्रपट विभागासाठी), महाराष्ट्र राज्य चित्रपट महोत्सवाकरीता, चित्रपती व्ही. शांताराम पुरस्कारासाठी दोनदा आणि महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट महोत्सवासाठी त्यांनी परीक्षक म्हणून काम पाहिलं आहे.
Sort by
Show per page
Items 1 to 3 of 3 total
24 %
OFF
KANCHAN GHANEKAR COMBO SET - 2 BOOKS Rating Star
Add To Cart INR 565 INR 429
NATH HA MAZA Rating Star
Add To Cart INR 395
RESHIMGATHI Rating Star
Add To Cart INR 170

Latest Reviews

RADHEYA
RADHEYA by RANJEET DESAI Rating Star
विश्वजीत श्रीपती शिंत्रे.

राधेय.... लेखक रणजित देसाई... मित्र कसा असावा...कर्णासारखा दातृत्व कसं असावं...कर्णासारखं असा हा कर्ण... त्याला अंगराज म्हणावं, दान देणारा दाता म्हणावं, राधेय म्हणावं कि कौतेय... काहीही म्हणा पण कर्णासारखा दाता कर्णानंतर कधी झाला नाही आणि कधी होणरही नाही... रणजित देसाई लिखीत कर्णचरीत्र राधेय आज हातावेगळं झालं ते अश्रुभरल्या नयनांनी...ज्याचा अंत करायला स्वतः देवाधिदेव कृष्णाला अर्जुनाचं सारथ्य करावं लागलं यातच अंगराज कर्णांचं विरत्व अधोरेखीत होत आहे. जन्मापासुन ज्याला केवळ सुतपुत्र म्हणुन वागणुक मिळाली असा तो कर्ण स्वतःच्या बळावर इतका महान लढवय्या बनला. पुस्तकाच्या प्रास्ताविकात देसाईंनी म्हटलं आहे की राधेय मधला कर्ण महाभारतात शोधायची गरज नाही. प्रत्येकाच्या मनातच तो दडलेला असतो, कदाचित आपल्या मनाची चार पाने उलटलीत, तर त्यात हा कर्ण दिसेल. त्याचं दु:खं, पोरकेपण आणि त्यातून पार होवून एक अनोखी ऊंची गाठणारं त्याचं दातृत्व, व्यक्तित्व याचं एक भव्य, शोकात्म चित्र राधेय मधून उभं राहतं. राधेय या कादंबरीत रणजित देसाईंच्या शब्दांनी कर्णाची अनेक रुपे अनुभवता आली. त्यामध्ये राधाई आणि वृषाली सोबतचा कर्ण, दुर्यौधनासोबतचा कर्ण, कृष्णासोबतचा कर्ण, रणांगणावरचा कर्ण आणि नदीकाठी पाठमोरा ऊभा राहत दान करत असलेला कर्ण अशा अनेक रुपांनी प्रत्येकवेळी वेगळा भासला. वृषसेन आणि चक्रधराच्या मृत्युने हळवा झालेला कर्णही वाचकाच्या डोळ्यातही पाणी आणवतो... समोर मृत्यु दिसत असताना सुध्दा केवळ दिलेल्या वचनामुळे हातातील धनुष्याचा त्याग करुन शस्त्रहिन हेणारा कर्ण रणजित देसाईंच्या शब्दांमुळे आजन्म लक्षात राहील. कर्णासारखं होणं कुणालाही कदापि शक्य नाही पण त्यातला एखादा जरी चांगला गुण अंगी बाळगण्याचा प्रयत्न प्रत्येकाने नक्कीच केला पाहीजे... प्रत्येकाच्या संग्रही असावं आणि एकदा तरी वाचावं असं पुस्तक रणजित देसाई लिखीत...राधेय... © विश्वजित शिंत्रे. ...Read more

BAJIND
BAJIND by PAHILWAN GANESH MANUGADE Rating Star
विश्वजीत श्रीपती शिंत्रे.

काही पुस्तकं अशी असतात कि कितीही वेळा वाचली तरीही त्या पुस्तकाचा कंटाळा येत नाही. पुन्हा पुन्हा वाचावं असं वाटतं आणि त्याची पारायणं होतचं राहतात. असचं एक पुस्तक म्हणजे *पै.गणेश मानुगडे* लिखीत *बाजिंद.* *बाजिंद* हे एक असं रसायन आहे जे प्रत्ेकाला अक्षरशः वेड लावतं. साधारण चार पाच वर्षांपुर्वी पहील्यांदा वाचलं होतं, त्यानंतर बर्‍याचवेळा आणि आज पुन्हा एकदा. त्याबद्दलची एक सुंदर आठवण म्हणजे माझ्या बहिणीच्या गरोदरपणाच्या दिवसात ग्रहण लागलं होतं आणि त्या ग्रहणकाळात तिला मी *बाजिंद* वाचुन दाखवलं होतं, असं हे पुस्तक. कुस्ती, प्रेमकथा, हेरगिरी, गुढ रहस्यमय बाजिंदचं जंगल, पशु-पक्षी व हिंस्र जनावरांची भाषा, बहीर्जी नाईक आणि अवघ्या हिंदुस्थानाचे आणि मराठी मनाचे आराध्यदैवत *श्रीमंतयोगी छत्रपती शिवाजी महाराज* असा या पुस्तकाचा प्रवास. शेवटाला अंगावर काटा आला कि समजावं आपण या पुस्तकाच्या प्रेमात पडलोय. रायगडच्या डोंगरदरीत वसलेल्या धनगरवाडीचा सखाराम धनगर आणि त्याच्यासोबत मल्हारी, सर्जा आणि नारायण निघालेत छत्रपती शिवरायांना भेटायला. कारण टकमक टोकावरुन ज्या गद्दारांचा कडेलोट व्हायचा ती प्रेतं येऊन पडायची ती थेट धनगरवाडीच्या आसपासच्या जंगलात आणि त्यामुळे आसपासच्या परीसरात जंगली जनावरांचा सुळसुळाट खुप वाढला होता. त्यांची मेजवानी व्हायची पण जर कधी कडेलोट नसायचा तेव्हा ती हिंस्त्र जनावरं आसपासच्या लोकवस्तीत शिरायची. हिच कैफियत मांडायला सखाराम धनगर आणि इतर मंडळी रायगडी निघतात. त्यानंतरचा त्यांचा प्रवास आणि कथा वाचकाला इतकी गुरफटवुन टाकते कि शेवटच्या पानावरची शेवटची ओळ कधी वाचुन संपते, कळतही नाही. त्यांची स्वराज्यहेर खंडोजीची भेट मग सावित्री, वस्तादकाका, वाचतानाही भितीदायक दिसणारं जंगल, कधीही न पाहीलेलं महादेवाचं मंदीर, खंडोजीचा असणारा ट्विस्ट आणि मग बहिर्जी नाईक आणि मग थेट रायगड आणि महाराज, सगळं प्रत्यक्षात आपल्यासमोर घडतयं कि असा भास निर्माण करणारं असं हे पुस्तक. एखाद्या चित्रपटालाही लाजवेल अशी कथा, एकदा वाचली कि पुन्हा एकदा वाचण्याचा मोह आवरता येत नाही अशी कथा, ज्यामध्ये असं बरचं काही जे वाचल्याशिवाय कळणार नाही. अजुन एक असं कि सातासमुद्रापार जगातील अव्वल गणली जाणारी इस्त्राईलची गुप्तहेर संघटना मोसाद यांच्या अभ्यासक्रमात बहिर्जी नाईक आणि आपलं हेरखातं शिकवलं जातं अशी अभिमान वाटणारी घटना आपल्या राज्यात घडलीय त्याचीच हि गोष्ट...बाजिंद... ...इकडे खंडोजीने सावित्रीला उचलुन जंगलातुन बरेच बाहेर आणले होते. पुढे डोंगराची कडेतुट होती आणि हजारो हात खोल फेसाळणार्‍या नदीचे विशाल पात्र...खंडोजीने एकदा मागे पाहीले आणि ताडले कि शिर्क्यांची फौज पाठलाग करत आहे...त्याने कशाचाही विचार न करता सावित्रीसह स्वतःला त्या कडेतुट वरुन त्या विशाल नदीच्या पात्रात झोकुन दिले...आणि... त्यासाठी वाचा *पै.गणेश मानुगडे* लिखीत...*बाजिंद..!!!* © विश्वजीत श्रीपती शिंत्रे. मु.पो.इंचनाळ, ता.गडहिंग्लज,जि.कोल्हापुर ०९९२२३१३९१९ ...Read more