* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Availability : Available
  • ISBN : 9789386888617
  • Edition : 2
  • Publishing Year : NOVEMBER 2017
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 440
  • Language : MARATHI
  • Category : BIOGRAPHY
  • Available in Combos :MANJUSHRI GOKHALE COMBO SET -14 BOOKS
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
THIS NOVEL DESCRIBES THE WHOLE PORTRAIT OF GREAT SANT TUKARAM. THIS NOVELS ELABORATES EVERYTHING ABOUT SANT TUKARAM SUCH AS HIS BIRTH,CHILDHOOD,HIS FRIENDS, HIS BRILLIANCE,HIS DEVOTION TOWORDS GOD VITTHAL,FIRST UNSUCCESSFUL MARRIAGE ,THEN HIS SECOND MARRIAGE WITH AWALI,SCHOCKING DEMISES OF HIS BELOVED FIVE FAMILY MEMBERS WHICH ENDED LEAVING TUKARAM IN TOTALLY DRAINED CONDITION,THEN HIS TOTAL SURRENDER AT GOD VITTHAL`S FEET.HE STARTED WRITING ABHANGAS.LANGUAGE AND HIDDEN KNOWLEDGE IN IT WAS APPRECIATED AND WELL ACCEPTED,PRAISED BY HIS FOLLOWERS.A LEAGUE OF COMMON PEOPLE. THIS HAS MADE ,SO CALLED HIGHER AUTHORITIES IN COMMUNITY,TO ENVY TUKOBA.THEY ORDERED TO ABOLISH HIS ABHANGAS AS PUNISHMENT FOR HIS OFFENCE OF VIOLATION OF CHATURVARNA SYSTEM.BUT TUKARAM COULD NOT BE WIPED OUT FROM HIS FOLLOWERS MIND .TUKARAM ABHANGA GATHA WAS RECONSTRUCTED BY HIS FOLLOWERS.EVEN AFTER 500YRS IT REMAINED LOOMED IN MINDS OF MAHARASTRIANS.THIS NOVEL UNDERLINES GREATNESS OF TUKOBA.IT ALSO GIVES INFORMATION ABOUT THAT TIME`S HERITAGE,CULTURE,RITUALS,SOCIAL LIFE,AND MANY OTHER THINGS.
संत तुकोबाराय, गेली साडेचारशे वर्षे मराठी माणसाच्या मनावर अगदी सगळ्या जगभरातल्या मराठी मनावर अधिराज्य गाजवणारे, अणू एवढ्या अस्तित्वापासून आकाशाएवढं महानपद मिळवणारे संत तुकाराम. माझी हेचि दान देगा देवा ही कादंबरी तुकोबांचा हाच अणू पासून आकाशापर्यंतचा जीवनपट अधोरेखित करते. तुकोबांवर अनेक प्रकाराने अनेकांनी लिखाण केलं. पण कादंबरी रुपातून तुकोबांच्या जन्मापासून ते वैकुंठ गमनापर्यंतच त्यांचं चरित्र आणि चारित्र्य ‘हेचि दान देगा देवा’ मध्ये मी शब्द बद्ध करण्याचा प्रयत्न केला आहे. तुकोबांच्या जीवनातील विशिष्ट-विशिष्ट कालखंडावर खूपच लिखाण आहे. पण अणू पासून आकाशापर्यंतचा तुकोबांचा जीवन आलेख यात मला मांडायचा होता आणि तो मांडण्याचा मी प्रामाणिक प्रयत्न केला आहे. मी संशोधक नाही. चिंतन आणि मनन करणारी विचारवंत, अभ्यासकही नाही. पण तुकोबांच्या भक्तीवर आणि त्यांच्यातल्या भक्तावर श्रद्धा ठेवणारी, तुकोबांचे अभंग विचारधन म्हणून वाचणारी नक्कीच आहे. आणि हीच माझी भावना ही कादंबरी लिहताना उपयोगी ठरली. तुकोबा भक्त म्हणून थोर होतेच, कवी म्हणूनही थोर होते पण त्यांच्या अभंगाच्या माध्यमातून मी त्याचं माणूसपण ही शोधलं. खरंतर तेही सर्वश्रुतच आहे. पण त्यांच्या अभंगातून मला त्यांचं आणखी काही वेगळेपण दिसलं आणि मग ते अधोरेखित करण्यासाठी माझ्या कल्पना विश्वातून मी प्रसंग तयार करत गेले. याचं जाता जाता एक उदाहरण द्यायचंच झालं तर तुकोबांना संस्कृत येत होतं ही बाब सगळ्यांनी गृहीत धरली आहे. कारण तुकोबांचा वेदांचा आणि भगवद् गीतेचा अभ्यास होता हे त्यांच्या अभंगातून जाणवतं. पण त्या काळातील समाज व्यवस्था लक्षात घेता तुकोबा सहजपणे संस्कृत शिकले असतील असं वाटत नाही. मग त्यांना संस्कृत येत होतं हे अधोरेखित करण्यासाठी माझ्या कल्पना विश्वातून मी एक प्रसंग तयार केला आणि त्यात तुकोबा संस्कृत भाषा कुठं, कशी शिकले असावेत असा अंदाज बांधून तो प्रसंग लिहीला. हा प्रसंग कादंबरीत मुळातून वाचणं नक्कीच आनंददायी ठरेल. तुकोबांच्या व्यक्तीमत्त्वातील अशा अनेक पैलूंना साकार करण्यासाठी असे अनेक प्रसंग माझ्या कल्पना विश्वातून निर्माण करण्याचा मी प्रयत्न केला आहे. यातूनच मग आवली सोबतचा त्यांचा संसार, त्या दोघांचं भावबंध, एक पती म्हणून, पिता म्हणून, मित्र म्हणून, संत म्हणून, समाजसेवक म्हणून तुकोबा कसे दिसले, वागले, बोलले असतील याला काल्पनीक आणि भावनिक रंग देऊन प्रसंग फुलवत गेले. हे करत असताना तुकोबांच्याच अभंगांनी मला प्रेरणा दिली. ते प्रसंग तसे घडले नसतील ही कदाचित पण ते कादंबरीत मांडताना तुकोबांचे अभंगच त्यांना (प्रसंगांना) प्रमाण ठरले हे तितकेच खरे. तुकोबांची ‘मऊ मेणाहूनि आम्ही विष्णूदास’ अशीच प्रतिमा आत्तापर्यंतच्या तुकोबांवरच्या बहुतेक सर्व साहित्यात उभी केलेली दिसते. (काही अपवाद वगळता) आणि ती योग्यच आहे. पण त्यांच्या ‘कठीण वज्रास भेदू ऐसे’ या शब्दांतला चांगुलपणातला कणखरपणा अभावानेच अशा साहित्यात आलेला दिसतो. तुकोबांच्या व्यक्तीमत्त्वातला हाच कणखरपणा या कादंबरीत मला दाखवायचा होता. त्यासाठी मग काही काल्पनिक प्रसंगाची गुंफण केली आणि तुकोबांच्या अभंगातले खरे तुकोबा उभे केले. ‘‘जो जे वांछिल तो ते लाहो।’’ या ज्ञानेश्वर माऊलीच्या विश्वकल्याणाच्या पसायदानानंतर हेचि दान देगा देवा। तुझा विसर न व्हावा।। हे तुकोबांचं विश्वशांतीचं मागणं हा आपल्या मराठी भाषेचा ललामभूत जागतिक वारसा आहे. या कादंबरीतून तोच वारसा जपण्याचा मी प्रयत्न केला आहे. माझ्यावर प्रेम करणाऱ्या माझ्या वाचकांना माझा हा प्रयत्न आवडेल या विश्वासानं ‘हेचि दान देगा देवा’ हे मागणं रसिकांच्या चरणी ठेवते आहे. वाचकांना ‘माझा विसर न व्हावा’ ही विनंती.
पुणे नगर वाचन मंदिर तर्फे` संत वाङ्मय विषयक ग्रंथ पुरस्कार ` - कवी ह.स. गोखले पुरस्कार २०१७ .

No Records Found
No Records Found
Keywords
#SANTTUKARAMMAHARAJ#HINDVISAMRAJYA#VITHAI# #SANTTUKARAMMAHARAJ#HINDVISAMRAJYA#VITHAI# #MARATHIBOOKS#ONLINEMARATHIBOOKS#TRANSLATEDMARATHIBOOKS#TBC#TRANSLATEDBOOKS@50%
Customer Reviews
Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

BACKSTAGE
BACKSTAGE by MONTEK SINGH AHLUWALIA Rating Star
महाराष्ट्र टाईम्स.. ६.९.२०२६

भारताच्या आर्थिक सुधारणांवर अनेक पुस्तके आजवर प्रसिद्ध झाली आहेत. काहींमध्ये आकडेवारीचे जंजाळ असते, काही धोरणांचे विश्लेषण करतात, तर काही विशिष्ट नेत्यांची जाहिरातबाजी करतात. मात्र माँटेकसिंग अहलुवालिया यांचे `बॅकस्टेज : भारताच्या उच्च वाढीच्या र्षांमागची कहाणी` हे पुस्तक या सगळ्यांपेक्षा वेगळे ठरते. कारण हे पुस्तक भारताच्या आर्थिक परिवर्तनाची कथा बाहेरून पाहणाऱ्या अभ्यासकाने नव्हे, तर त्या परिवर्तनाच्या केंद्रस्थानी उभ्या असलेल्या व्यक्तीने सांगितलेली आहे. जी. बी. देशमुख यांनी मूळ इंग्रजी पुस्तकाचा केलेला मराठी अनुवाद सरस उतरला आहे. पुस्तकाच्या सुरुवातीलाच माँटेकसिंग एक गोष्ट स्पष्ट करतात, ती म्हणजे, हे पुस्तक आत्मकथन नाही. आत्मप्रौढी मिरवण्यासाठी नव्हे, तर भारताच्या आर्थिक सुधारणांचा प्रवास समजावून सांगण्यासाठी अहलुवालिया हे पुस्तक लिहितात. विषयाच्या अनुषंगाने पुस्तकात त्यांच्या वैयक्तिक आयुष्यातील संदर्भ येतात, पण ते आर्थिक आणि राजकीय घडामोडी समजावून सांगण्यापुरतेच. सिकंदराबादमधील मध्यमवर्गीय वातावरणातून सुरू झालेला त्यांचा प्रवास दिल्ली स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स, ऑक्सफर्ड, जागतिक बँक, अर्थ मंत्रालय, योजना आयोग आणि अखेर देशाच्या सर्वोच्च आर्थिक धोरणनिर्मितीच्या केंद्रापर्यंत पोहोचतो. हा प्रवास वाचताना स्वतंत्र भारताच्या आर्थिक विचारसरणीचा विकासक्रम उलगडत जातो. पुस्तकाचे केंद्रस्थान अर्थातच १९९१च्या आर्थिक संकटाचे आहे. त्यावेळी देशाकडे काही आठवड्यांच्या आयातीपुरताही डॉलर शिल्लक नव्हता. सोन्याचा साठा गहाण ठेवण्याची वेळ आली होती आणि आर्थिक दिवाळखोरीची शक्यता प्रत्यक्ष समोर उभी होती. अशावेळी सरकारने घेतलेले निर्णय, त्यामागील तणाव, राजकीय अनिश्चितता आणि प्रशासकीय संघर्ष यांचे वर्णन पुस्तकात अत्यंत जिवंतपणे आले आहे. नाणेनिधी किंवा जागतिक बँकेच्या दबावामुळे या सुधारणा झाल्याची धारणा माँटेकसिंग ठामपणे नाकारतात. हे पुस्तक आर्थिक सुधारणांना कोणत्याही प्रकारच्या विचारधारेच्या चष्म्यातून पाहत नाही. लेखक ना मुक्त बाजाराचे अंधसमर्थन करतात, ना राज्यनियंत्रित व्यवस्थेचे. त्यांचा दृष्टिकोन व्यवहारवादी आहे. भारतासारख्या लोकशाही देशात सुधारणा एका झटक्यात होत नाहीत; त्या राजकीय वास्तवाशी जुळवून घेत हळूहळू पुढे सरकतात, हे ते वारंवार. अधोरेखित करतात. पुस्तकात अनेक ठिकाणी `सुधारणा` हा आर्थिक नव्हे, तर राजकीय प्रक्रियेचाही विषय आहे, हे प्रकर्षाने जाणवते. अहलुवालिया या पुस्तकात अनेक व्यक्ती, अधिकारी, अर्थतज्ज्ञ आणि राजकीय नेत्यांच्या योगदानाचा उल्लेख करतात. नरसिंह राव, मनमोहन सिंग, पी. चिदंबरम, यशवंत सिन्हा, जसवंत सिंह यांच्यापासून ते विविध सनदी अधिकाऱ्यांपर्यंत अनेकांची भूमिका ते प्रामाणिकपणे नोंदवतात. योजना आयोगाचे उपाध्यक्ष म्हणून काम करताना अहलुवालिया यांनी जवळून अनुभवलेला काळ येथे उभा राहतो. सन २००४ ते २०११ या काळातील उच्च आर्थिक वाढ, दारिद्रयनिर्मूलनातील प्रगती, पायाभूत सुविधांमध्ये झालेली वाढ आणि ग्रामीण विकासाच्या कार्यक्रमांचे मूल्यमापन ते करतात. विशेषतः भारताने सलग अनेक वर्षे सात ते आठ टक्क्यांच्या दरम्यान वाढ नोंदवली, ती केवळ जागतिक परिस्थितीचा. परिणाम नव्हती; १९९० नंतरच्या सुधारणांनी घातलेल्या पायावर उभे राहून ती शक्य झाली, हा त्यांचा युक्तिवाद पटण्याजोगा वाटतो. मात्र पुस्तकाचे खरे सामर्थ्य यशोगाथेत नाही, तर आत्मपरीक्षणात आहे. यूपीए-२ दरम्यान निर्माण झालेली निर्णयप्रक्रियेतील अडचण, गुंतवणुकीतील वातावरण आणि धोरणात्मक संकोच यावर लेखक मंदी, भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे निर्माण झालेले वातावरण आणि धोरणात्मक संकोच यावर लेखक थेट भाष्य करतात. अनुवादक जी. बी. देशमुख यांनी मूळ पुस्तकातील आर्थिक संकल्पना सहज आणि प्रवाही मराठीत मांडल्या आहेत. यात कृत्रिमता जाणवत नाही. आर्थिक विषयावरील पुस्तक असूनही भाषा जड वाटत नाही. आर्थिक सुधारणांच्या व्यापक सामाजिक परिणामांचा स्वतंत्र आणि सविस्तर ऊहापोह येथे अपेक्षेपेक्षा कमी आढळतो. मात्र, हे पुस्तक ज्या उद्देशाने लिहिले गेले आहे त्या उद्देशात ते अत्यंत यशस्वी ठरते. `बॅकस्टेज` हे केवळ पुस्तक नाही; ते भारताच्या आर्थिक परिवर्तनाचा प्रत्यक्षदर्शी दस्तऐवज आहे. १९९१ नंतर भारताने घेतलेल्या वळणाचा अर्थ समजून घ्यायचा असेल, उच्च वाढीच्या वर्षामागील वास्तविक कथा जाणून घ्यायची असेल आणि धोरणनिर्मितीच्या पडद्यामागे काय घडत असते याचा मागोवा घ्यायचा असेल, तर हे पुस्तक अभ्यासणे आवश्यक ठरते. भारतीय अर्थव्यवस्थेच्या आर्थिक सुधारणांचा इतिहास आणि त्यांचे परिणाम समजून घेण्यासाठी हे पुस्तक एक महत्त्वाचा संदर्भग्रंथ म्हणून ओळखले जाऊ शकते. मराठीत उपलब्ध असलेला हा अनुवाद त्या दृष्टीने विशेष स्वागतार्ह आहे. ...Read more

HACHYUKISUNASKI
HACHYUKISUNASKI by ABA MAHAJAN Rating Star
Dinesh

This is a different planet. This is a different world. And this is a truly different book. I loved it. You should also buy it and read it. I’m sure you will love it too. Hachyukisunaski is a fantastic Book.