* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Availability : Available
  • ISBN : 9789386888617
  • Edition : 2
  • Publishing Year : NOVEMBER 2017
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 440
  • Language : MARATHI
  • Category : BIOGRAPHY
  • Available in Combos :MANJUSHRI GOKHALE COMBO SET -14 BOOKS
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
THIS NOVEL DESCRIBES THE WHOLE PORTRAIT OF GREAT SANT TUKARAM. THIS NOVELS ELABORATES EVERYTHING ABOUT SANT TUKARAM SUCH AS HIS BIRTH,CHILDHOOD,HIS FRIENDS, HIS BRILLIANCE,HIS DEVOTION TOWORDS GOD VITTHAL,FIRST UNSUCCESSFUL MARRIAGE ,THEN HIS SECOND MARRIAGE WITH AWALI,SCHOCKING DEMISES OF HIS BELOVED FIVE FAMILY MEMBERS WHICH ENDED LEAVING TUKARAM IN TOTALLY DRAINED CONDITION,THEN HIS TOTAL SURRENDER AT GOD VITTHAL`S FEET.HE STARTED WRITING ABHANGAS.LANGUAGE AND HIDDEN KNOWLEDGE IN IT WAS APPRECIATED AND WELL ACCEPTED,PRAISED BY HIS FOLLOWERS.A LEAGUE OF COMMON PEOPLE. THIS HAS MADE ,SO CALLED HIGHER AUTHORITIES IN COMMUNITY,TO ENVY TUKOBA.THEY ORDERED TO ABOLISH HIS ABHANGAS AS PUNISHMENT FOR HIS OFFENCE OF VIOLATION OF CHATURVARNA SYSTEM.BUT TUKARAM COULD NOT BE WIPED OUT FROM HIS FOLLOWERS MIND .TUKARAM ABHANGA GATHA WAS RECONSTRUCTED BY HIS FOLLOWERS.EVEN AFTER 500YRS IT REMAINED LOOMED IN MINDS OF MAHARASTRIANS.THIS NOVEL UNDERLINES GREATNESS OF TUKOBA.IT ALSO GIVES INFORMATION ABOUT THAT TIME`S HERITAGE,CULTURE,RITUALS,SOCIAL LIFE,AND MANY OTHER THINGS.
संत तुकोबाराय, गेली साडेचारशे वर्षे मराठी माणसाच्या मनावर अगदी सगळ्या जगभरातल्या मराठी मनावर अधिराज्य गाजवणारे, अणू एवढ्या अस्तित्वापासून आकाशाएवढं महानपद मिळवणारे संत तुकाराम. माझी हेचि दान देगा देवा ही कादंबरी तुकोबांचा हाच अणू पासून आकाशापर्यंतचा जीवनपट अधोरेखित करते. तुकोबांवर अनेक प्रकाराने अनेकांनी लिखाण केलं. पण कादंबरी रुपातून तुकोबांच्या जन्मापासून ते वैकुंठ गमनापर्यंतच त्यांचं चरित्र आणि चारित्र्य ‘हेचि दान देगा देवा’ मध्ये मी शब्द बद्ध करण्याचा प्रयत्न केला आहे. तुकोबांच्या जीवनातील विशिष्ट-विशिष्ट कालखंडावर खूपच लिखाण आहे. पण अणू पासून आकाशापर्यंतचा तुकोबांचा जीवन आलेख यात मला मांडायचा होता आणि तो मांडण्याचा मी प्रामाणिक प्रयत्न केला आहे. मी संशोधक नाही. चिंतन आणि मनन करणारी विचारवंत, अभ्यासकही नाही. पण तुकोबांच्या भक्तीवर आणि त्यांच्यातल्या भक्तावर श्रद्धा ठेवणारी, तुकोबांचे अभंग विचारधन म्हणून वाचणारी नक्कीच आहे. आणि हीच माझी भावना ही कादंबरी लिहताना उपयोगी ठरली. तुकोबा भक्त म्हणून थोर होतेच, कवी म्हणूनही थोर होते पण त्यांच्या अभंगाच्या माध्यमातून मी त्याचं माणूसपण ही शोधलं. खरंतर तेही सर्वश्रुतच आहे. पण त्यांच्या अभंगातून मला त्यांचं आणखी काही वेगळेपण दिसलं आणि मग ते अधोरेखित करण्यासाठी माझ्या कल्पना विश्वातून मी प्रसंग तयार करत गेले. याचं जाता जाता एक उदाहरण द्यायचंच झालं तर तुकोबांना संस्कृत येत होतं ही बाब सगळ्यांनी गृहीत धरली आहे. कारण तुकोबांचा वेदांचा आणि भगवद् गीतेचा अभ्यास होता हे त्यांच्या अभंगातून जाणवतं. पण त्या काळातील समाज व्यवस्था लक्षात घेता तुकोबा सहजपणे संस्कृत शिकले असतील असं वाटत नाही. मग त्यांना संस्कृत येत होतं हे अधोरेखित करण्यासाठी माझ्या कल्पना विश्वातून मी एक प्रसंग तयार केला आणि त्यात तुकोबा संस्कृत भाषा कुठं, कशी शिकले असावेत असा अंदाज बांधून तो प्रसंग लिहीला. हा प्रसंग कादंबरीत मुळातून वाचणं नक्कीच आनंददायी ठरेल. तुकोबांच्या व्यक्तीमत्त्वातील अशा अनेक पैलूंना साकार करण्यासाठी असे अनेक प्रसंग माझ्या कल्पना विश्वातून निर्माण करण्याचा मी प्रयत्न केला आहे. यातूनच मग आवली सोबतचा त्यांचा संसार, त्या दोघांचं भावबंध, एक पती म्हणून, पिता म्हणून, मित्र म्हणून, संत म्हणून, समाजसेवक म्हणून तुकोबा कसे दिसले, वागले, बोलले असतील याला काल्पनीक आणि भावनिक रंग देऊन प्रसंग फुलवत गेले. हे करत असताना तुकोबांच्याच अभंगांनी मला प्रेरणा दिली. ते प्रसंग तसे घडले नसतील ही कदाचित पण ते कादंबरीत मांडताना तुकोबांचे अभंगच त्यांना (प्रसंगांना) प्रमाण ठरले हे तितकेच खरे. तुकोबांची ‘मऊ मेणाहूनि आम्ही विष्णूदास’ अशीच प्रतिमा आत्तापर्यंतच्या तुकोबांवरच्या बहुतेक सर्व साहित्यात उभी केलेली दिसते. (काही अपवाद वगळता) आणि ती योग्यच आहे. पण त्यांच्या ‘कठीण वज्रास भेदू ऐसे’ या शब्दांतला चांगुलपणातला कणखरपणा अभावानेच अशा साहित्यात आलेला दिसतो. तुकोबांच्या व्यक्तीमत्त्वातला हाच कणखरपणा या कादंबरीत मला दाखवायचा होता. त्यासाठी मग काही काल्पनिक प्रसंगाची गुंफण केली आणि तुकोबांच्या अभंगातले खरे तुकोबा उभे केले. ‘‘जो जे वांछिल तो ते लाहो।’’ या ज्ञानेश्वर माऊलीच्या विश्वकल्याणाच्या पसायदानानंतर हेचि दान देगा देवा। तुझा विसर न व्हावा।। हे तुकोबांचं विश्वशांतीचं मागणं हा आपल्या मराठी भाषेचा ललामभूत जागतिक वारसा आहे. या कादंबरीतून तोच वारसा जपण्याचा मी प्रयत्न केला आहे. माझ्यावर प्रेम करणाऱ्या माझ्या वाचकांना माझा हा प्रयत्न आवडेल या विश्वासानं ‘हेचि दान देगा देवा’ हे मागणं रसिकांच्या चरणी ठेवते आहे. वाचकांना ‘माझा विसर न व्हावा’ ही विनंती.
पुणे नगर वाचन मंदिर तर्फे` संत वाङ्मय विषयक ग्रंथ पुरस्कार ` - कवी ह.स. गोखले पुरस्कार २०१७ .

No Records Found
No Records Found
Keywords
#SANTTUKARAMMAHARAJ#HINDVISAMRAJYA#VITHAI# #SANTTUKARAMMAHARAJ#HINDVISAMRAJYA#VITHAI# #MARATHIBOOKS#ONLINEMARATHIBOOKS#TRANSLATEDMARATHIBOOKS#TBC#TRANSLATEDBOOKS@50%
Customer Reviews
Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

वा. पां. जाधव अमरावती

`अमरावतीचे छप्पन स्वभाव एक मनोरंजक काव्यसंग्रह` `अमरावतीचे छप्पन स्वभाव` हे अमरावतीचे सुप्रसिद्ध साहित्यिक श्री जी. बी. देशमुख यांचे अमरावती नगरीचा सहज स्वभाव व ह्या नगरीच्या वेगळ्या ओळखीवर आधारित मनोरंजक पुस्तक वाचले. वाचून भरपूर मनोरंजन झाले. खर काय लिहावे या लेखकाबद्दल, मन गोंधळले. ऐतिहासिक असो, प्रवास वर्णन असो, व्यक्ती विशेष असो, अनुभवात्मक घटना घडामोडी असो कशावरही सहज लिखाण करणारा हा लेखक आहे. आता तर त्यांनी लेखनाला विनोद प्रचुर फोडणी देऊन `अमरावतीचे छप्पन स्वभाव` या काव्यसंग्रहातून अमरावतीकरांना मनोरंजनाची मेजवानीच दिली आहे. प्रत्येक शहराची व त्या शहरातील वैशिष्ट्यांची एक वेगळीच ओळख असते. दिवस जातात, काळ लोटतो, पिढ्या बदलतात मात्र जुन्या स्मृतीची चिन्हे नवीन येणाऱ्या पिढीच्या मनात गुढ निर्माण करत कायम हाक देत राहतात. अमरावतीही त्याला अपवाद नाही. बापट चौकात चौक नाही, त्या जागेवर चौरस्ता नसून टी-पॉइंट आहे, खापर्डे बगीचा म्हणून आजही ओळख आहे मात्र तेथे बगिचा नाही किंवा प्रसिद्ध गांधी चौकात गांधीचा पुतळा अथवा स्मृतीदर्शक चिन्ह अथवा उल्लेख नाही मात्र गांधी चौक अशीच ओळख जनमानसात आहे. अशा एक ना अनेक विसंगत नाम दर्शक ओळख असलेली उदाहरणे त्यात सप्रमाण आहेत. पण खरी गंमत म्हणजे कधी काळी घडलेला इतिहास त्यामध्ये दडलेला आहे हे निश्चित. या सोबतच अमरावतीकरांच्या स्वभावातला स्थायी मजेदारपणाच्या एक एका हटके गुण वैशिष्ट्याच्या गमती लेखकाने हुबेहूब अधोरेखित केलेल्या आहेत. आणि त्यावरुन तत्सम रचनांचा उहापोह लेखकाने पुस्तकात केला असावा. विदेशात स्थाईक झालेल्या मूळ अमरावतीकरांना लेखकाने लिहिलेल्या गमती मनोरंजनात्मक वाटाव्या एवढी किमया जी.बी. च्या सहज लेखनाने दाखवली आहे. अमरावतीचे अग्रगण्य वृत्तपत्र दै. हिंदुस्थान मध्ये लेखकाने सतत ६ महीणे लिहीलेल्या काव्य सदरात अमरावतीच्या जनमानसाच्या हृदयाच्या ठाव घेणाऱ्या काव्य रचनांचा आठवणींनी महापूर ओसंडून गेला होता. विशेष म्हणजे ह्यात कुठेही अनावश्यक अभिनीवेष नव्हता. उलट गमतीत केलेले आत्मपरिक्षण मात्र काही प्रमाणात होते. वयस्क अमरावतीकर रसिकांना या रचना ताज्या करून त्यांच्या तारुण्यात घेऊन गेल्या हेच खरे. जी बी देशमुख या लेखकास मिळालेल्या सकारात्मक प्रतिक्रियां वरून दिसून येते. . सदर पुस्तकातील काव्यमय रचना वाचतांना अमरावतीच्या माणसाच्या वऱ्हाडभोळ्या स्वभावाची प्रचीती येते आणि वेगळाच आनंद देऊन जाते. निखळ मनोरंजन करत गुदगुल्या करणारा असा हा काव्यसंग्रह आहे. अमरावती शहराची ऐतिहासिक वैशिष्टे काव्यरूपात वाचण्याचा आनंद अमरावतीकरांना ते जिथं असतील त्या गावात, परगावात, परदेशात पुस्तक मागवून घेता येईल. ...Read more

ज्योती चेडे, मुंबई.

अमरावतीच्या वैशिष्ट्यांवर आधारीत खुमासदार छप्पन्न कवितांच्या संग्रहातील प्रत्येक कविता वाचत असताना अमरावतीच्या वातावरणाची धुंदी आपसुकच मनावर चढु लागली. सगळ्याच कविता सुंदर आहेत. एकेक कविता अमरावतीचे अप्रतिम वर्णन करते. प्रत्येक कवितेचा शेवट कुठेतरी गंभीर विचार करायला भाग पाडतो आणि मन गलबलून जाते. सगळ्याच कविता सुंदर आहेत पण माझ्या मनाला भावलेल्या व भिडलेल्या कविता आहेत `अमरावतीतल्या गमती`, `अमरावतीचे शिक्षण`, `अमरावतीचे हजरजबाबी`, `अमरावतीचे वेडे`, `अमरावतीच्या काकू` व बाकी सगळ्या. `अमरावतीचे वेडे` या कवितेत उल्लेखीत शेवटचा अश्रुंचा एक थेंब जरुर राखला जाईल. तसेच `अमरावतीच्या काकूं` ची उर्जा उरात भरून उरेल. जीवन देणाऱ्या विहीरीने कोणाचेही जीवन घेऊ नये, अशी सद्भावना मनात जागेल. अमरावतीकर जगात कुठेही असो त्यांच्या मनात एका कोपऱ्यात राजकमल चौक असतोच हे सत्य मनावर कोरले जाईल. प्रत्येक अमरावतीकराने ह्या कविता जगाव्यात. त्यासाठी हे पुस्तक संग्रही ठेवावे आणि परगावी राहणाऱ्या आपल्या अमरावतीकर आप्तेष्टांना भेटी दाखल द्याव्या. ...Read more