* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: A CALL TO HONOUR : IN SERVICE OF EMERGENT INDIA
  • Availability : Available
  • Translators : ASHOK PADHYE
  • ISBN : 9788177668155
  • Edition : 4
  • Publishing Year : JANUARY 2007
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 515
  • Language : Translated From ENGLISH to MARATHI
  • Category : BIOGRAPHY
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
JASWANTSINGH`S UNIQUENESS WAS IMPRINTED DURING THE REIGN OF BHARATIYA JANATA PARTY`S RASHTRIYA LOKSHAHI AGHADI. THE MOST PROMINENT OF HIS WORK WAS THE WAY HE HANDLED THE CHAOS AFTER THE NUCLEAR PROGRAM AND TESTS CONDUCTED UNDER IT. NOT ONLY THIS, HE SUCCEEDED IN MAKING AMERICA UNDERSTAND INDIA`S STAND ON THE NUCLEAR FRONTS. THIS BOOK CASTS A LIGHT ON THIS VERY FACT.THIS BOOK ALSO INCLUDES VARIOUS SENSITIVE MATTERS WHICH WERE NOT BROUGHT INTO OPEN TILL TODAY, SUCH AS FORMATION OF PAKISTAN, NUCLEAR BOMB, SARDAR VALLBHBHAI PATEL`S WARNING TO PANDIT NEHRU 12 YEARS PRIOR TO THE ATTACK FROM CHINA, THE RECORDING OF MUSHARRAF`S SECRET PLANS, THE REAL SITUATION BEHIND THE RESCUE OF THE HIJACKED INDIAN AEROPLANE, KARGIL WAR, THE ATTACK ON THE PARLIAMENT, INDIA`S PROTECTION, THE DANGERS AND THE COGNIZANCE, ETC. THOUGH BASED ON POLITICS; THIS BOOK IS REALLY A VERY THRILLING ONE.
भाजपच्या राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या सत्ताकाळात श्री. जसवंतसिंग यांनी आपल्या कार्याने वेगळाच ठसा उमटविला. विशेषत: अणुचाचण्या केल्यावर जो जागतिक गदारोळ भारताविरुद्ध झाला, तो त्यांनी शमवला. इतकेच नव्हे, तर विरुद्ध गेलेल्या अमेरिकेला भारताच्या बाजूने वळवून दाखवले. या पुस्तकात त्याची रोमहर्षक कहाणी आहे. शिवाय पाकिस्तानची निर्मिती, अणुबाँब आणि पाकिस्तानी अस्मिता, चिनी आक्रमणाच्या १२ वर्षे आधी सरदार पटेल यांनी नेहरूंना दिलेला इशारा, मुशर्रफ यांच्या गुप्त खलबतांचे ध्वनिमुद्रण, पळवलेल्या भारतीय विमानाची सुटकेमागची परिस्थिती, कारगिल युद्ध, संसदेच्या इमारतीवरील हल्ला, ‘भारताचे संरक्षण-धोके व जाणिवा’ अशा अनेक बाबतीत अद्याप प्रकाशात न आलेली माहिती जसवंतसिंग यांनी या पुस्तकात दिली आहे. एक वैचारिक पण थरारक, राजकीय पण खिळवून ठेवणारे पुस्तक!
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
"#MARATHIBOOKS#ONLINEMARATHIBOOKS#TRANSLATEDMARATHIBOOKS#TBC#TRANSLATEDBOOKS@50% #ACALLTOHONOUR #ACALLTOHONOUR:INSERVICEOFEMERGENTINDIA #एकॉलटूऑनर #BIOGRAPHY #TRANSLATEDFROMENGLISHTOMARATHI #ASHOKPADHYE #अशोकपाध्ये #JASWANTSINGH "
Customer Reviews
  • Rating StarPrabhakar Yerolkar

    जसवंतसिंगाचे हे आत्मचरीत्र. ते म्हणतात , " सावधगिरीने आणि दबकत दबकत वावरणाऱ्या भारताने मे २००४ नंतर एकदम आत्मविश्वास पुर्वक दमदारपणे वाटचाल सुरू केली . एका नव्या भारताचा उदय झाला होता . त्या भारताचा आवाज मला ऐकू येतो आहे. पुन्हा पुन्हा ऐकू येतो आे ." १९९८ ते २००४ या काळात भाजपाच्या आघाडी सरकारच्या काळात संरक्षण, परराष्ट्र आणि अर्थ खात्याचे मंत्री म्हणून जसवंतसिंग यांनी अत्यंत महत्त्वाची भूमिका निभावली . नंतर ते राज्यसभेतील विरोधी पक्ष नेते होते . याशिवाय ते आँक्सफर्ड आणि वाँरविक विद्यापीठात मानद प्राध्यापक देखील होते . हार्वर्ड विद्यापीठात ते सिनीयर फेलो सुध्दा होते . त्यांचे हे सातवे पुस्तक. माझ्या कडे आले ते माझ्या नियमित स्तंभातुन या तब्बल४९० पानांच्या पुस्तकाची ओळख करून देण्यासाठी . मी या पुस्तकावर मागेच लिहीलेही आहे .आणि मला आठवते, अगदी तासाभरात तो लेख मी लिहुन काढला होता . याबाबतीत माझी एक अत्यंत वाईट खोड अशी की ,पुस्तक पुर्ण न वाचताच जणू काही ते पुस्तक दोन वेळा वाचून मी त्यावर लिहीले आहे, असे माझ्या वाचकांना आणि संपादकांना भासविणे. फक्त ते चाळत चाळत माझा लेख तयार होतो . मात्र आता या लाँकडाऊन मध्ये हे अत्यंत महत्त्वाचे पुस्तक मी वाचावयास घेतले आहे . जसवंतसिंग आज हयात नाहीत. पण त्यांना एकदा विचारले गेले ,आपल्याला वेळ कसा पूरतो ? यावर ते उत्तर देतात , " आपण काम करायचे ठरवलं तर वेळसुध्दा आपल्यासाठी प्रसरण पावत असतो . हे माझे सातवे पुस्तक आहे आणि अजुन बरीच पुस्तके मी लिहीणार असुन त्यातली काही निर्मिती च्या अवस्थेत आहेत . मेहता पब्लिशिंग हाऊसचे हे पुस्तक वाचनीय तर आहेच परंतु एका अशा कालखंडाचा ईतिहास आहे ज्यावर आधारित आजच्या विश्वगुरू आणि आर्थिक महासत्ता बणण्याची स्वप्ने पहाणारा आणि करोनाशी लढण्यासाठी सज्ज असलेल्या भारताची उभारणी झालेली आहे ...Read more

  • Rating StarHEMANT RANADE

    fantastic

  • Rating StarSAKAL SAPTARANG 16TH SEPT.2007

    भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते जसवंतसिंग हे राष्ट्रीय लोकशाही आघाडी (एनडीए) सरकारमधील बडे प्रस्थ होते. सुरवातीला नियोजन आयोगाचे उपाध्यक्ष, नंतर परराष्ट्र मंत्री, काही काळ संरक्षण मंत्री आणि सगळ्यात शेवटी अर्थमंत्रिपदाचा भारही त्यांना सांभाळावा लागा होता. सुमारे साडेचार वर्षे टिकलेल्या वाजपेयी सरकारमधील त्यांच्या आठवणींवर अधारित ‘ए कॉल टू ऑनर’ हे पुस्तक अर्थातच घटनांची जंत्री आहे. पुस्तकाची सुरवातीची काही प्रकरणे जसवंतसिंग यांच्या राजस्थानातील कौटुंबिक पाश्र्वभूमीमध्ये जातात. तयानंतर ते पाकिस्तानची निर्मिती, फाळणीची वेदना, द्विराष्ट्राचा सिध्दांत यांचा तात्त्विक अंगाने वेध घेतात. ‘आत्मसन्मानाचा शोधा’ ही जी या पुस्तकाची ‘थीम’ आहे, त्याच्याशी ही सगळी प्रकरणे विसंगत वाटत राहतात. त्यामुळे सुरवातीसच पुस्तकावरील जसवंतसिंग यांची लेखक म्हणून पकड ढिली होत जाते. पुढे मात्र ‘एनडीए’ सरकारच्या कारकिर्दीत घडलेल्या अनेक महत्त्वपूर्ण घटनांमागील कथा ते उलगडत जातात आणि वाचक त्यात गुंतत जातो. १९९८ मध्ये केलेला अणुस्फोट, कारगिलचे युध्द, सरकारवर झालेले भ्रष्टाचाराचे विविध आरोप, आग्रा येथील वाजपेयी - मुशर्रफ यांच्यातील अपयशी ठरलेली परिषद, कंदाहार अपहरण प्रकरण, संसदेवर झालेला हल्ला आणि त्यानंतर सीमेवर झालेली सैन्याची जमवाजमव यांचा ते चित्तथरारक तपशील देतात. चीनी आक्रमणाच्या १२ वर्षे पूर्वीच सरदार वल्लभभाई पटेल यांनी सविस्तर पत्र लिहून पंडित नेहरू यांना दिलेला धोक्याचा इशारा, अणुस्फोटाचा निर्णय वाजपेयी यांनी त्यांच्यापासूनही कसा गुप्त ठेवला होता, अणुस्फोटापूर्वी डॉ. ए.पी.जे अब्दुल कलाम हे पोखरण येथे लष्करी वेशात कसे गेले होते, अशा आतापर्यंत फारशी माहीत नसलेल्या गोष्टी ते सांगतात. अमेरिकेशी ‘व्यूहतंत्रात्मक चर्चा’ सुरू करण्याचे श्रेय निश्चतपणे जसवंतसिंग यांना जाते. अमेरिकेचे तत्कालीन उप परराष्ट्रमंत्री स्ट्रोब टाल्बोट यांच्याशी ही चर्चा कशी सुरू केली, संशय-गैरसमज-भीती या अनेक अडथळ्यांना मागे टावूâन मैत्रीचा नवा धागा कसा विणला गेला, याचे त्यांनी केलेले वर्णन खूपच रोचक आहे. चीनबरोबरील ‘व्यूहतंत्रात्मक चर्चे’चा तपशीलही पुस्तकात सविस्तर येतो. जसवंतसिंग यांचे व्यक्तिमत्त्व लष्करी आहे. अवघड शब्द, लांबलचक पल्लेदार वाक्ये यामुळे त्यांचे बोलणे किचकट, गुंतागुंतीचे वाटते. नेमके याबाबीचे प्रतिबिंब त्यांच्या लिखाणात पडले आहे. त्यातच त्यांनी हाताळलेले विषय तितकेच अवघड आहेत. परिणामी त्याचे सोप्या, सरळ, ओघवत्या मराठीत भाषांतर करणे, हे कठीण काम. अनुवादक अशोक पाध्ये यांनी ते चांगल्या पध्दतीने पार पाडले आहे; तरीही त्यांनी मराठीत वापरलेले काही पर्यायी शब्द खटकत राहतात. इंग्रजीतील पल्लेदार वाक्यांचे भाषांतर करताना त्याची धावपळ झालेली स्पष्टपणे जाणवते. हे पुस्तक प्रकाशित करण्याच्या वेळीच जसवंतसिंग यांनी पी. व्ही. नरसिंहराव यांच्या कारकिर्दीत पंतप्रधान कार्यालयात अमेरिकेचा गुप्तहेर कार्यरत होता, असा आरोप करून मोठी खळबळ उडवून दिली होती. त्यानंतर जसवंतसिंग यांनी उलटसुलट वक्तव्ये करून ज्या कोलांट्या उड्या मारल्या होत्या, त्यावरून त्यांच्या हेतूवरच प्रश्नचिन्ह उभे राहिले. परिणामी या पुस्तकांबाबत ‘सेन्सेशन’निर्माण झाले खरे, पण त्याची विश्वासार्हता संपुष्टात येत गेली. नेमके हेच ‘इम्प्रेशन’ घेऊन पुस्तक वाचले जाते आणि जसवंतसिंहांनी ‘उगवत्या भारताच्या जयजयकारासाठी घातलेली साद’ अपूर्ण असल्यासारखी वाटत राहते. एकेकाळी फ्रान्सचे सर्वेसर्वा असणारे द गॉल यांच्या आत्मचरित्रावरून जसवंतसिंग यांनी या पुस्तकाचे नाव ‘ए कॉल टू ऑनर’ असे नाव ठेवले आहे; मात्र पुस्तकातील आशय बघता त्याचाही फारसा उपयोग झालेला दिसत नाही. ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

आबासाहेब कडू, अमरावती.

एकाच दमात छप्पन वेळा वाचावा असा काव्यसंग्रह* दै.सकाळच्या सप्तरंग पुरवणीत अ-अमिताभचा व दै.हिंदस्थान मधील `अमरावती सिरीज` चे स्तंभलेखक व अमरावती येथील प्रसिद्ध साहित्यिक श्री जी.बी.देशमुख ह्यांचा छप्पन कवितांचा समावेश असलेल्या अमरावतीच्या वस्तू,वास्ू आणि माणसाच्या वैशिष्ट्यावर आधारित `अमरावतीचे छप्पन स्वभाव` हे पुस्तक मी विकत घेतले. घरी गेल्यावर त्यातील छप्पनही कविता एकाच दमात वाचून काढल्या अन् पैसा वसूल झाल्याचे समाधान झाल्यावर त्यावर चिंतन करावेसे वाटले, म्हणून हा लेखनप्रपंच. वाचक हा अमरावतीकर असेल तर `अमरावतीतल्या गमती` ही पहिलीच कविता त्याच्या मनाचा ठाव घेते आणि `याटोत` बसवून परकोटातल्या मुर्गी मठासह अख्खी अमरावती फिरवून आणते. गांधीचौकात गांधी नाही मालटेकडीवर माल नाही.. खेटरे झाली ब्रँडेड सगळी मोची गल्लीत मोची नाही.. तपोवनात तपस्वी नाही कल्याणनगरात कल्याण नाही… लेखकाच्या भारदस्त शब्दशक्तीचा इथेच विजय होतो आणि मग अमरावतीची एकेक वैशिष्ट्ये पादाक्रांत करित छप्पनीकडे वाटचाल करीत जातो. ही काव्यात्मक रुपातील वैशिष्ट्ये वाचतांना अमरावतीचा पन्नाशितला वाचक देहभान विसरुन गतकाळात रममाण होतो. त्याचे मन नकळत सुखावते, गात्रे जागृत होतात, मेंदू रिचार्ज होतो तर तरुण वाचकाच्या मनात अमरावती शहराविषयी कुतुहल निर्माण होते. तोही मग त्यातील खाणाखुणा शोधायचा प्रयत्न करत बसतो. या संग्रहातील प्रत्येक कवितेवर एकेक निबंध तयार होऊ शकतो. स्वभाव हा शब्द सहसा मनुष्याशी जोडून उपयोगात आणला जातो पण इथे तर लेखकाने निर्जीवातही प्राण फुंकले आहे. अमरावतीच्या याटोत बसून ह्यातील सजीवता आपल्याला अनुभवता येईल. मग तो बेनाम चौक असो, कुथे बस स्टॉप असो, अनेक नावांचे कापसाचे जीन असो, वालकट कम्पाउंड असो, हनुमान आखाडा असो, इर्विन, डफरीन दवाखाने असो, `अमरावतीतल्या विहिरी` असो नाहीतर मोर्शी रोडवरील थोर महात्म्यांचे पुतळे असो. अमरावतीच्या शब्दकळा, अमरावतीच्या हाका, अमरावतीच्या वल्ली, अमरावतीच्या टॉमीची पाॅटी, अमरावतीचे सुपरस्टार, अमरावतीचा बागुलबोवा, अमरावतीचे वेडे एकदमच बेस्ट. अमरावतीच्या रेल्वे ब्रीजचे तर ते भरभरुन कौतुक करतात. चारी बाजूनं उतरणारा पूल फक्त जपानमध्ये आहे अन् सिंगापूरच्या नंतर नंबर आपल्याच पुलाचा आहे कारण हा पूल आहेच कौतुक करण्याजोगा, मलाही ह्या पूलाचे कौतुक याच्याकरिता आहे की ह्या पूलाचे बांधकाम माझ्या पेठ मांगरुळी गावच्या अभियंत्याच्याच देखरेखीखाली झाले आहे. अमरावतीशी प्रत्यक्ष संबंध आला तो १९७५ सालापासून,पण काही अपवाद वगळता लेखकाच्या छप्पनीतील अनेक वैशिष्ट्ये मी अनुभवलेली आहेत. ह्याच रेल्वेपुलावर रोज संध्याकाळी एक भोळसट मुलगा गाणे गायचा,लोक त्याला प्रेमाने शाहरुख म्हणायचे,कारण तो स्वतःला शाहरुख खानंच समजत असे. अमरावतीच्या कॉलेजमधील तरुणांचे भावविश्व मांडतांना लेखकाने हात आखडता घेतला नाही. इंजिनिअरिंग कॉलेज व व्ही.एम.व्ही. ही त्यावेळची आघाडीवरची कॉलेजेस होती. त्यामधील कॉलेजियन्सचे दर्द लेखकाने मिश्कीलपणे मांडले त्या `अमरावतीचा दर्द` ह्या कवितेतील ओळी आताच्या पेन्शनरांना त्या काळात घेऊन जातील. तरुण मंडळींनी तो आनंद पुस्तक वाचून घ्यावा. अमरावतीचा आद्य मॉल म्हणजे फक्त महिलांसाठीच राखीव असलेली बाजारपेठ अशी ओळख असलेलं `जोशी मार्केट`, `अमरावतीची नवरात्र`, `अमरावतीचे जेष्ठ नागरिक` ह्या पूरक कविताही त्याच प्रेमाच्या विश्वात घेऊन जातात.. `अमरावतीचा भुलभुलैय्या` मधील अनुभव आजही अनेकांना येतो, मलाही अनेकदा आला, त्याकरिता ही पूर्ण कविताच वाचणे आवश्यक आहे. अमरावतीचा अंबानाला, त्यानुषंगाने मास्तराने दिलेली `पदवी`, अमरावतीचे भोंगे, अमरावतीच्या उन्हाच्या चटक्यातील गरम चहाचे घोट थेट लंडनच्या थंड हवामानातल्या आईस्क्रीमलाही थंड करुन टाकतात ही तुलना मनाला भावून जाते. ब्लॅक अँड व्हाईट फोटोग्राफीतली मजा आताच्या डिजीटल फोटोग्राफीत नाही. त्यावेळी अमरावतीत मोजक्याच असलेल्या फोटो स्टुडिओची नावे लेखकाने दिलेली आहेत.त्यांनीही आता डिजीटल फोटोग्राफीच्या युगात प्रवेश केलेला आहे.त्यावेळेस काढलेले ब्लॅक अँड व्हाईट फोटो अनेकांनी जपून ठेवले असावे. लेखक मणीबाई गुजराती शाळेत शिकत होते त्यामुळे त्या शाळेचे व गुरुजनांचे गुणगान, स्वभाववैशिष्ठ्ये हे पुस्तकात येणे स्वाभाविकच आहे, मास्तराला पाणी पाजता पाजता त्यांचा वर्गमित्र पाणी पुरवठा विभागात कार्यकारी अभियंत्यापर्यंत कसा पोचला हा मनोरंजक किस्सा `अमरावतीची गुरुवाणी` कवितेतून खुसखुशीत भाषेत रेखाटला आहे. अमरावतीच्या टाकीजा, त्यांची वैशिष्ट्ये तर आहेतच पण दर गुरुवारी नवे सिनेमे अमरावतीत सर्वात पहिल्यांदा प्रदर्शित होत होते हे आज अनेकांना सांगूनही पटणार नाही पण तो मान अमरावतीला मिळत होता हा इतिहास आपल्याला अचंबित करुन जातो, सिनेमाचे अनेक डिस्ट्रीब्युटर हे अमरावतीतच होते, जवाहर रोडवरील जुन्या इमारतीवर ते बोर्ड तेव्हा हमखास दिसत, काळाच्या ओघात त्या जागी नवीन ईमारती उभ्या झाल्या, परंतु अजूनही एक-दोन ठिकाणी ते बोर्ड दिसतात.असे अनेक अचंबित करणारे किस्से या पुस्तकात काव्यरुपात लेखकाने अत्यंत खुमासदार व मनोरंजक पद्धतीने रेखाटून त्यात जीवंतपणा आणला आहे. हा काव्यसंग्रहातील ठेवा पुढील पीढीसाठी वारसा ठरेल यात मला तीळमात्रही शंका वाटत नाही. खवैयेगीरीत म्हणाल तर विनायकराव तायडेच्या गड्डा हॉटेलचा आलुबोंडा ज्या अमरावतीकरांनी आणि इतरांनीही खाल्ला असेल त्याला जगातल्या कुठल्याही हॉटेलातील आलुबोंडा आवडत नाही, अन् खाल्लाही असेल तर खातांना त्याला विनायकरावाचे आतिथ्य व तर्रीची आठवण आल्याशिवाय रहात नाही. अमरावती जिल्ह्यातील मंडळी लग्नबस्ता खरेदी करायला आली की खरेदी झाल्यावर वर वधूकडील मंडळीचे फराळपाण्याचे हे आदराचे स्थान होते. कॉलेजमध्ये शिकत असतांना मनीऑर्डर हातात पडली की प्रभात चौकातील `गौ दुग्ध सागर` ही विद्यार्थ्यांची पहिली पसंती असे. `जीडीएस` म्हणून ते फेमस होते. साऊथ इंडियन डिशेश मिळणारे जिल्ह्यातील ते एकमेव ठिकाण होते. राजकमल चौकालगतच्या टी स्टॉलवरच्या बोर्डावर चहाचे नावंच `स्पेशल चहा`, `बादशाही चहा`, `यादगार चहा` अन साब को `एक शिंगल मलाई मारके` असा आपुलकीचा चहा तेव्हा अमरावतीकरांनी यथेच्छ रिचवला. आता ह्या सर्व चहांचा मिळून एकच चहा मिळतो. पण ह्या चहात ती लज्जत नाही. मग तुम्ही त्या स्टॉलला `प्रेमाचा चहा` हे नांव ठेवा किंवा अजून काही. हरेक शहराला एक संस्कृती असते, वस्तू-वास्तू वारसा असतो, त्यातून जगण्यातली नजाकत शोधावी लागते. ती नजाकत `अमरावतीचे छप्पन स्वभाव` ह्या काव्यसंग्रहातून अनुभवावयास मिळते.लेखकाच्या बहारदार लेखणीतून उतरलेले ही काव्यमय वैशिष्ट्ये वाचतांना अमरावती बाहेरील वाचकही मग आपल्या शहरातील वैशिष्ट्ये शोधत बसतो ही हे या पुस्तकाचे वैशिष्ट्य आहे. तसेही छप्पन ह्या शब्दाला फार महत्व आहे, `छप्पन इंची छाती`, `अब तक छप्पन` हा सिनेमा, छप्पन भोग, छप्पन छुरी अन् पिव्वर वऱ्हाडातली वर्ल्ड फेमस धमकी म्हणजे `तुह्यासारखे त म्या सतराशे छप्पन पाह्यले बे, तुह्याकुन जे हुईन थे करुन घे.` छप्पन ह्या शब्दाचा पूरेपूर करुन घेतलेला वापर म्हणजे जी.बी.देशमुख सारख्या दिलखुश लेखकाने लिहिलेले हे खुमासदार,रसभरीत,टवटवीत प्रफुल्लित अन मिश्कील काव्य. आणि शेवटी……….. मणुश्याचे हे शरीर अणित्य आहे आतमा-णित्य आहे हा श्रद्धांजलीपर आवाज ज्याने हिंदू स्मशानभूमीत ऐकला नसेल त्याने ह्या जन्मात तरी तो ऐकेपर्यंत मरु नये. हे शब्द ऐकूनही त्याकडे कानाडोळा केला असेल तो माणूस करंटा पण हे करंटेपण लेखकाने घेतले नाही. लहानपणापासून अमरावतीत वावरतांना `डफरीन` (लँडीग पोर्ट) ते ही `वरची जागा` ह्यातील अत्यंत बारकाईने केलेले निरिक्षण लाजबाबच म्हणावे लागेल,त्याला तोड नाही. हे पुस्तक वाचतांना प्रत्यक्ष यमराज जरी द्वारी आला तरी त्याला "हे पुस्तक वाचेपावतर जराकसा थांबतं काय रे बॉ." अशी म्हणण्याची हिम्मत वाचकात येते हे मात्र नक्की. अमरावतीच्या वस्तू,वास्तू आणि माणसांच्या वैशिष्ट्यावर आधारित आपल्या बालमित्रांना समर्पित केलेला व मेहता पब्लिशिंग हाऊस ह्यानी प्रकाशित केलेला हा अमूल्य ठेवा आपणा सर्वांना नक्कीच आवडेल ह्याची खात्री आहे. ...Read more

बाबाराव घोरमाडे, अमरावती

प्रथम दर्शनी कविता लेखन असले तरी गद्य आणि पद्य सोबत सोबत चालल्यासारख्या लेखन शैलीचा भास जाणवतो. अमरावती शहरातील 70..80 व नंतरच्या दशकातील गुणवैशिष्ट्ये मार्मिक नर्म विनोदी शैलीत सुंदर रीतीने विषद केली आहेत. लेखकाची सुक्ष्म निरीक्षण शैली काव्य चना स्वरूपात पुस्तक रूपाने सादर करण्यात लेखक यशस्वी झाले आहेत. इजाफा,रूतबा, हिरव्या देठाचे,कैलहीचा मौहोल, ढगांचा,इत्यादी जुने वऱ्हाडी शब्द वापरल्यामुळे जुन्या आठवणींना उजाळा मिळाला. लेखकाने अमरावती शहरातील जुन्या जाणत्या, गुणवान, असामान्य अशा व्यक्तींची दखल घेतली......पण काहींची दखल राहून गेली आहे असे माझे मत आहे. उदा. सुरेश भट, मधुकर केचे व त्यांची सायकल , अमरावतीचे दहा दिवसांची गणपती उत्सव सजावट..... प्रत्येकाने वाचावे असे हे पुस्तक, विनोदी पण शेवटी असलेली कारूण्याची किनार अंतर्मुख करुन जाते. ...Read more