* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
SOFTWARE EXPERT PAR EXCELLENCE, NARAYANA MURTHY STRONGLY BELIEVED IN PUTTING INDIA ON THE GLOBAL MAP OF SOFTWARE TECHNOLOGY. HE AND HIS FRIENDS STRUGGLED HARD TO EARN WEALTH THROUGH FAIR AND HONEST MEANS AND FOUNDED INFOSYS, ONE OF THE LARGEST SOFTWARE COMPANIES IN INDIA TODAY.
आय.आय.टी.मध्ये प्रवेश मिळाला होता; परंतु ते तिथे शिकायला जाऊ शकले नव्हते, कारण त्यांच्या वडिलांकडे त्यांना ते शिक्षण देण्याइतके पैसे नव्हते. त्यांच्या सात मित्रांबरोबर नवी कंपनी सुरू करण्यासाठी त्यांनी त्यांच्या पत्नीकडून १०,०००/- रुपये उसने घेतले होते! क्षुल्लक कारणाने झालेल्या गैरसमजापायी एका साम्यवादी देशाच्या तुरुंगात त्यांना साठ तास कोंडून ठेवलं होतं! कॉम्प्युटरच्या दुनियेत प्रवेश मिळवण्यासाठी त्यांनी अहमदाबादच्या आय.आय.एम.मध्ये अत्यल्प पगारावर नोकरी पत्करली. आणि आज?... आज नारायण मूर्ती आणि त्यांच्या मित्रांची कंपनी ‘इन्फोसिस’मध्ये १,३०,००० कर्मचारी नोकरी करत आहेत आणि कंपनीचा वार्षिक नफा १,००० कोटी रुपयांपेक्षाही जास्त आहे! ह्या उज्ज्वल यशामागच्या बहुमोल जीवनाचं चित्रण ह्या पुस्तकात आहे. – आयुष्याला प्रेरणा देईल आणि मार्गदर्शन करेल, अशा ह्या पुस्तकाचं स्थान तुमच्या आयुष्यात कुठं असलं पाहिजे, ते तुम्ही ठरवायचं आहे.
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
#N. CHOKKAN# ANJANI NARAWANE# COMPUTER SERVICES# COMPUTER TECHNOLOGY# MYSOR# KOLAR# CHITALGATTA# SWAPNA# COMPUTER EXPERT# I.I.M.# SUDHA NARAYAN MURTHY# INFOSYS# BHARTIYA SOFTWARE UDYOG# MULYA #एन. चोक्कन# अंजनी नरवणे# कॉम्प्युटर सर्व्हिसेस# कॉम्प्युटर टेक्नॉलॉजी# म्हैसूर# कोलार# चिटलगट्टा# स्वप्न# कॉम्प्युटर एक्स्पर्ट# आय.आय.एम. सुधा नारायण मूर्ती# बंगळुरू# इन्फोसिस# भारतीय सॉफ्टवेअर उद्योग# मूल्य
Customer Reviews
  • Rating StarPandurangdongre Dada

    आयुष्यात कधीही किती ही मोठे संकट आले तरी ही तो घाबरत नाही त्याचा सामना करतो.

  • Rating StarDAINIK TARUN BHARAT

    प्रेरणादायी व मार्गदर्शक जीवनचरित्र... मूळ तमीळ लेखक एन. चोक्कन यांनी ‘नारायण मूर्ती : मूल्य जपणारं एक अद्वितीय आयुष्य’ हा ग्रंथ लिहिला असून त्याचा गुजराती अनुवाद अदित्य वासू यांनी केला आहे व त्याचा मराठी अनुवाद अंजनी नरवणे यांनी केला आहे. ‘नारायण मर्ती : मूल्य जपणारं एक अद्वितीय आयुष्य’ हे चरित्र मेहता पब्लिशिंग हाऊसने देखण्या मुखपृष्ठासह आकर्षक स्वरूपात प्रकाशित केले आहे. इन्फोसिस या जगप्रसिद्ध सॉफ्टवेअर कंपनीच्या संस्थापकांपैकी एक आणि देशातल्या प्रमुख उद्योगपतीपैकी एक असणाऱ्या नारायण मूर्तीच्या जीवनाची कथा अलिखित करणारं हे चरित्र! अनंत अडचणीतून मार्ग काढून एखादी व्यक्ती यशाचं शिखर कसं गाठू शकते याची प्रेरणा देणारं व मार्गदर्शन करणारं नारायण मूर्तींचं जीवनचरित्र त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे पदर सहजसुंदरतेने उलगडून दाखविते. एका गरीब ब्राह्मण कुटुंबात २० ऑगस्ट १९४६ रोजी नारायण मूर्तींचा जन्म झाला आणि हेच नारायण मूर्ती सध्या इन्फोसिस टेक्नोलॉजीज लिमिटेड या बेंगलोर स्थित जागतिक सॉफ्टवेअर सल्लागार कंपनीचे संस्थापक अध्यक्ष आहेत. द इकॉनॉमिस्ट ने २००५ मध्ये जगातील सर्वाधिक आदरणीय व्यवसायिकांत पहिल्या दहामधील एक म्हणून श्री नारायण मूर्तींची नोंद केली आहे. इतकंच नाही तर भारत सरकारकडून पद्मविभूषण, फ्रान्स सरकारकडून तर ब्रिटिश सरकारकडून सीबीई ने त्यांना सन्मानित करण्यात आलं आहे. ‘नारायण मूर्ती : मूल्य जपणारं एक अद्वितीय आयुष्य’ हे जीवनचरित्र असल्याने लेखकानं त्याचे बालपण कौटुंबिक वातावरण, आर्थिक परिस्थिती, आई-वडील यांच्याकडून त्यांच्यावर होणारे संस्कार यांचा तपशील देत, नारायण मूर्तींच्या मनाची जडण-घडण कशी झाली याचे अतिशय हृद्य शब्दांकन केले आहे. मुलाचे पाय पाळण्यात दिसतात. या म्हणीनुसार नारायण मूर्तींच्या व्यक्तिमत्त्वाचे जे विशेष त्यांच्या बालपणी प्रकट होत होते. त्यावर प्रकाशझोत लेखकाने टाकला आहे. त्यांना असलेली वाचनाची आवड व सिनेमाविषयीची अरुची तसेच त्यांचा समजुतदार स्वभाव, परिस्थितीची जाण यामागे त्या वयातही त्यांची स्वत:ची अशी वैचारिक भूमिका होती. जी उत्तरोत्तर विकसित होत गेली. खूप पैसे मिळवून चैनीचं आयुष्य जगण्यापेक्षा नीट अभ्यास करून जगाबद्दल ज्ञान मिळविणं जास्त चांगलं, गरीब असण्यात लाज वाटण्यासारखं काही नाही. या भूमिकेमुळे ते कायमच स्वाभिमानानं राहायचे. स्वार्थापेक्षा समाजाच्या कल्याणाचा विचार करावा हा विचारही आईवडिलांकडून त्यांच्या मनात रुजला आणि नंतर फोफावला. त्यांची सिम्फनी संगीताची आवड तर इतकी प्रेरक, प्रेरणादायी ठरली की सिम्फनी संगीताबद्दल समजून घेताना विचारांची वीज त्यांच्या मनात चमकली की स्वत: हुशार असून नुसतं चालत नाही तर इतरांबरोबर समन्वय करून एकजुटीनं चांगलं काम करणं जास्त महत्त्वाचं. हाच विचाराचा प्रकाश त्यांना उत्तम व्यवस्थापक बनविण्यास कारणीभूत झाला. आयुष्यातल्या अडचणींवर मात करण्याचा एकमेव उपाय म्हणजे चांगले शिक्षण! हा दृष्टिकोन उरात ठेवून वाटचाल करणाऱ्या नारायण मूर्तींच्या शैक्षणिक उंचीचा आलेख लेखकाने या ग्रंथात रेखाटला आहे, तसेच अपेक्षित शिक्षणात उंची गाठण्यासाठी त्यांनी केलेल्या प्रयत्नांचे चित्रणही केले आहे. परिस्थितीवर काबू मिळवून मला सफल झालंच पाहिजे. या दृढनिश्चयाने त्यांनी आय.आय.टी. कानपूरला एम.टेक साठी प्रवेश कसा मिळवला. आय बी एममध्ये बनवला गेलेला कंम्प्युटर बघून ते कसे अवाक झाले. आय आय एममध्ये पगार कमी असूनही ते रुजू का झाले, पाठ्यपुस्तकांतील शिक्षण व जीवनानुभव यांची सांगड घालणे कशासाठी महत्त्वाचे आहे. इ. गोष्टींवर प्रकाश टाकीत लेखकाने त्यांच्या विस्तारलेल्या ज्ञानक्षितिजांचे दर्शन घडवले आहे. नारायण मूर्तींचे व्यावसायिक अनुभव व त्याआधारे त्यांनी जीवनात महत्त्वाचे घेतलेले निर्णय यांचे चित्रण करताना लेखकाने त्यांच्या सामाजिक भानाचे, जीवनमूल्यांवरील निष्ठेचे, पैसा मिळविण्यामागील कारण व त्यांच्या उपयोगाची योग्य दिशा याविषयीचे विचार उलगडून दाखविले आहेत. त्यांच्या मते, एक सुसंस्कृत समाज ज्याला म्हणता येईल, ज्या समाजात प्रत्येक पिढीतील व्यक्ती, येणाऱ्या पिढीचं भविष्य जास्त चांगलं, आनंदाचं व्हावं म्हणून व्यक्तिगतरित्या स्वार्थत्याग करीत राहील. नोकरी सोडून स्वतंत्र कंपनी काढण्याचा त्यांचा निर्णय, सुधा मूर्तींची त्या संदर्भात झालेली मदत, कंम्प्युटर आणि सॉफ्टवेअर कंपन्यांच्या विकासाच्या दृष्टीनं असलेली सरकारची उदासीनता, परदेशात हा व्यवसाय वृद्धिंगत करण्यात येणाऱ्या अडचणी, नियम, कायदे, कंपनीच्या विकासातील अडथळे व या सर्वांवर मात करत ठामपणे उभे राहणारे व निष्ठा, प्रेम व दूरदृष्टी यांचा साक्षात्कार घडवून सीईओची आपली इमेज बाजूला करत नेता ही इमेज सहकाऱ्याच्या मनात निर्माण करत नारायण मूर्ती कसे यशस्वी झाले याचे अत्यंत मार्मिक, रोचक, प्रासादक व प्रवाही शब्दांकन मूळ लेखकाने व अनुवादिका अंजनी नरवणे यांनी केले आहे. नारायण मूर्तींच्या जीवनचरित्राचा अनुवादही अत्यंत हृद्य व सरस झाला आहे. नारायण मूर्तींच्या व्यावसायिक विकासाचा आलेख दर्शविताना शब्दशैली जितकी सरळ, स्पष्ट आहे तितकीच कौटुंबिक प्रेमाभिव्यक्तीच्या प्रसंगी ती हळुवार व भावस्पर्शी होते. प्रसंगचित्रणात ती चित्रदर्शी बनते ज्यामुळे नारायण मूर्तींच्या जीवनातील प्रसंग जिवंत व उत्कट स्वरूपात वाचक मनाला भिडतात. विशेषत: आर्थिक परिस्थितीमुळे आय. आय. टी.चं स्वप्न दूर करून दूर दूर जाणाऱ्या ट्रेनकडे बघत मित्रांना निरोप देणारे मूर्ती हा प्रसंग तसेच सुधातार्इंच्या आई वडिलांना भेटून त्यांच्या व सुधातार्इंच्या विवाहासंदर्भात बोलणारे नारायण मूर्ती इ. प्रसंग लक्षणीय ठरतात. नारायण मूर्तींचा प्रामाणिकपणा, दृढ निश्चय, ठाम निर्णय, सत्याची कास धरणारा स्वभाव, अंतर्मुखता इ. अनेक पैलूंवर प्रकाश टाकताना लेखिकेच्या भाषेत कुठेही अभिनिवेश, आग्रहीपणा यांची छटाही नाही. संकोची, सर्वांना आदराने वागविणाऱ्या, चुकूनही कठोर शब्दांचा वापर न करणाऱ्या व लोकांना कामात तडजोड न करता विकासाच्या व परफेक्शनच्या दिशेने वाटचाल करणाऱ्या नारायण मूर्तींच्या जीवनचरित्राचा अंजली नरवणे यांनी केलेला मराठी अनुवाद सहजसुंदर उतरला आहे. -डॉ. शुभदा शहा ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

RAZOR SHARP
RAZOR SHARP by ASHWIN SANGHI Rating Star
सुनील माने, पुणे

लेखक अश्विन सांघी “द रोझाबल लाइन” या पहिल्याच कादंबरीने खूप लोकप्रिय झाला. प्राचीन भारतीय दंतकथा/ऐतिहासिक संदर्भ घेऊन त्याच्याभोवती आजच्या काळात रहस्यपूर्ण कथा लिहिणारा अश्विन. Chanakya’s Chant, The Krishna Key, The Sialkot Saga, Keepers of the Kalacakra, The Vault of Vishnu, The Magicians of Mazda अशा एकापेक्षा एक सुंदर रहस्य कादंबर्या “भारत सिरीज़” नावाने खूप प्रसिद्ध झाल्या. या सर्व कादंबऱ्या मी इंग्लिश मधेच वाचल्या. यांचा मराठी अनुवाद मेहता पब्लिशिंग हाउस यांच्याकडे उपलब्ध आहे. अश्विन सांघीने या भारत सिरीज शिवाय एक नवीन थ्रिल्लर सिरीज (कुत्ता कदम) सुरू केली आहे. त्यांतील पहिली कादंबरी Razor Sharp. एक सिरियल किलर मुंबईत एकानंतर एक खून पाडतोय. पोलिस चक्रावले आहेत. 1. रविवार दि २ फेब्रुवारी , गोरेगाव पश्चिममधे रवि मेहराचा खून होतो. त्याची बायको खुशी कॅाल सेंटरचा जॅाब करून रात्री ११.३० ला परत येते. खूप वेळा बेल वाजवून दार न उघडल्यामुळे ती उघडून आत येते तर रवि रक्ताच्या थारोळ्यात मरून पडलेला असतो. त्याचे हात पाठीमागे नायलॅान दोरीने बांधलेले असतात. त्याच्या छातीत सुरा खुपसलेला असतो. त्याच्या तोंडात काहीतरी खाद्य पदार्थ असतो. 2. सोमवार दि १० फेब्रुवारी , लोअर परळमधे सुचंद्रा अग्रवालचा खून. तिची कामवाली आल्यावर दार न उघडल्यामुळे सोसायटीवाले दार तोडतात. आत सुचंद्राचा खून झालेला. हात नायलॅान दोरीने मागे बांधलेले, छातीमधे चाकू खुपसलेला, तोंडात काहीतरी खाद्यपदार्थ. पोलिस चक्रावलेले. मग पोलिसखाते जागे होते. त्यांचा नावाजलेला अधिकारी जो सस्पेंड झालेला आहे, त्या प्रकाश कदम, DCP याला बोलावले जाते. राज्याचे गृहमंत्री ओंकार लोखंडे, त्यांचा माणूस कमिशनर चव्हाण आणि उपगृहमंत्री जयंत गायकवाड व त्यांचा माणूस SCP राणे, मुंबईचा डॅान भाऊ पाटील जो लोखंडेचाच माणूस असतो, हे सर्व या केसच्या मागावर लागतात. कदम हा राणेंच्या ओळखीचा खास ऑफिसर असतो म्हणून त्यालाही इन्व्हेस्टीगेशनला बोलावले जाते. 3. मंगळवार दि १८ फेब्रुवारी , ठाणे येथे मंगला शहाचा खून. तिच्या शेजारणीमुळे हे कळते. मंगलाचे हात नायलॅान दोरीने पाठीमागे बांधलेले, छातीमधे चाकू खुपसलेला, तोंडात खाद्यपदार्थ. पोलिस अधिकारी शिंदे कदमबरोबर येतात. मंगलाच्या चेहऱ्याजवळ कदमला पेस्टिसाईडचा वास येतो. चेहरा निळसर झालेला. खून झाल्यावर बॅाडीला हलवलेले दिसते. तो ऑफिसमध्ये जुन्या खूनांचे फोटो तपासतो. त्यांचीही बॅाडी खून केल्यावर हलवलेली दिसते. चेहऱ्यावर निळसर झाक दिसते. तिन्ही खून “फिनेक” ब्रॅंडच्या चाकूने केलेले असतात. हे समान धागे कदम त्याची मुलगी केतुल बरोबर चर्चा करतो. केतुलची आई काही वर्षांपूर्वी कदमला सोडून गेलेली असते. ती भाऊ पाटीलची सावत्र बहीण असते. पण सध्या ती कुठे आहे व काय करते हे माहित नसते. केतुल कोर्टात काम करत असते तसेच ती “शक्ती” या NGO मधेही काम करते. शक्ती हे सोनापूरमधुन सुटका केलेल्या वेश्यांचे पुनर्वसन करत असते. निर्मल नावाचा तिचा मित्र एथिकल हॅकर असतो. तिच्यावर प्रेम करत असतो. कदमला हार्ट अटॅक येऊन गेलेला व स्टेंट बसवलेला असतो. Depression मुळे त्याची सायकॅालॅाजिस्टकडे ट्रिटमेंट चालू असते. कदमला या तिन्ही केसमधे आणखी एक धागा सापडतो. हे खून आठ दिवसांच्या अंतरावर झालेले असतात. म्हणजे पुढचा खून बुधवारी होणार असल्याचे तो राणे व शिंदेला सांगतो. 4. बुधवार दि २६ फेब्रुवारी, कांदिवली पश्चिम, लक्ष्मी बुधीराजाचा खून. तोच पॅटर्न. 5. गुरुवार दि ५ मार्च, खार पश्चिम, गुरुराज अदवानीचा खून सेम पॅटर्न. गुरूराज हा युट्युबवरचा प्रसिद्ध सिंगर असतो. 6. शुक्रवार दि १३ मार्च, ताडदेव, दिव्या शुक्रपाणीवर खूनी हल्ला होतो. पण ती जबर जखमी होते. ती फिटनेस ट्रेनर असल्यामुळे खुन्याबरोबर झटापट करते. पण चाकू पोटात घुसल्यामुळे ती जबर जखमी होते. हात बांधलेले असतानाही ती फोनवर “सिरी” ला तिच्या भावाला, ध्रुवला फोन लावायला सांगते. फोन लागतो व ती “हेल्प हेल्प” एव्हढेच बोलून बेशुद्ध होते. म्हणून खुनी पळून जातो. ध्रुव तिथे पोहोचून तिला हॅास्पिटलमधे ॲडमिट करतो. पोलिसांना तिथे खुन्याची बॅग सापडते. त्यांत नायलॅानची दोरी, बेगॅान स्प्रे व राजमाच्या बिया सापडतात. तिसऱ्या खुनाआधी पोलिस संशयित म्हणून राजू दाभाडेला अटक करतात. पण चौथ्या खूनाच्या वेळेस तो कस्टडीतच असतो. मग खूनी कोण? 7. शनिवार दि २१ मार्च, बान्द्रा पश्चिम, शनिया डिसौजाचा खून होतो. सेम मोडस ऑपरेंडी . 8. शनिवार दि २८ मार्च, चेंबूर, ७१ वर्षांच्या राहुल सिंह नावाच्या सिख व्यक्तिचा खून होतो. तीच पध्दत. यानंतर एक दिवस कदम KBC बघत असताना अमिताभ बच्चन एका सिनेमाचं गाणं लावून त्याचा पिक्चर ओळखायला सांगतात. ते गाणं असते- “सोमवार को हम मिले मंगलवार को नयन बुध को मेरी निंद खुली जुम्मेरात को चैन अरे शुक्र शनी कटे मुश्किलसे आज है इतवार सात दिनों में हो गया जैसे सात जनम का प्यार” आणि कदमच्या डोक्यात एकदम प्रकाश पडतो… अरे, हे सर्व खून असेच रविवार ते शनिवार एक एका वारी घडलेत! पण शनिवारी दोन खून कसे? याच्या मागे काही खगोलशास्त्र किंवा भविष्याचा तर संबंध नाही? कदमला आठवतं की शेजारी राहणारा डॉ. देसाईला पण भविष्य-खगोलशास्त्राची आवड व माहिती आहे. ( डॅाक्टर कडे सापडलेल्या नायलॅानचे रंगीत दोर व फिनेक कंपनीचा चाकू यामुळे एक संशयित म्हणून कदमने त्याला अटक करून पुछताछ केलेली असते) कदम लगेच डॅाक्टरांकडे जातो. त्यांची माफी मागून त्यांना या प्रश्नांत मदत करायला सांगतो. तो या सर्व खुनांचा सिक्वेन्स सांगतो. ते प्रत्येक वारी का घडले? मग शनिवारी दोन का? यापुढे कोणता वार? कुणाचा खून? डॅाक्टर सांगतात की भारतीय भविष्य व खगोल शास्त्रात नवग्रहांना खूप महत्व आहे. रवि, सोम(चंद्र), मंगळ, बुध, गुरू, शुक्र, शनि, राहू आणि केतु. यांचे रंग व धान्य वेगवेगळे असतात. त्या त्या ग्रहाला प्रसन्न करण्यासाठी ते वापरले जातात. कदम ही माहिती लिहून घेतो. त्यावरून प्रत्येक खुनात वापरण्यात आलेले फिनेक कंपनीचे चाकू, वेगवेगळ्या रंगांचे नायलॅान दोर व तोंडातील पदार्थ यांचा संबंध जोडून एक तख्ता तयार करतोः- “रवि मेहरा-रविवार-सोनेरी दोर- तोंडात गहू-दिशा पूर्व सुचंद्रा-सोमवार-चंदेरी दोर-तोंडात तांदूळ-दिशा पश्चिम मंगला शाह-मंगळवार-लाल दोर-तोंडात तूर डाळ- दिशा दक्षिण लक्ष्मी बुधीराजा-बुधवार-हिरवा दोर-तोंडात हिरवे मूग-दिशा उत्तर गुरुराज अदवानी-गुरूवार-पिवळा दोर-तोंडात हरबरा डाळ-दिशा उत्तर पूर्व(ईशान्य) दिव्या शुक्रपाणी-शुक्रवार-पांढरा दोर-राजमा-दिशा दक्षिण पूर्व शनिया डिसौजा-शनिवार-काळा दोर-तोंडात काळे तिळ-दिशा उत्तर पश्चिम राहुल सिंग-शनिवार-निळा दोर-तोंडात उडीद दाळ-दिशा दक्षिण पश्चिम” आता उरला एकच ग्रह-केतु. केतुचा वार मंगळवार. ग्रे रंग, चना दाळ, दिशा दक्षिण पश्चिम. “केतु”म्हणजे कदमची मुलगी केतुलचा नंबर लागणार? आज तर मंगळवारच आहे! कदम घाबरून जातो! तो केतुलला फोन करतो पण तो बंद लागतो. ती सध्या कुठे आहे? कोर्टात? कदम आपल्या मुलीला वाचवतो का? खरा खुनी कोण असतो? तो पकडला जातो का? त्याचे यामागचा उद्देश काय असतो? याच्यामध्ये अजून कोण सामिल असतं का? याची उत्तरे मिळण्यासाठी वाचावी लागेल अश्विन सांघी यांची कादंबरी Razor Sharp. ...Read more

BANGARWADI
BANGARWADI by VYANKATESH MADGULKAR Rating Star
Sameer Kazi

सुंदर अशी कादंबरी माणदेशी बनगरवाडी तशी कोरडी रखरखती पण, यातील पात्रात मायेचा करुणेचाओलावा मनात घर करुन जातो