* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
SOFTWARE EXPERT PAR EXCELLENCE, NARAYANA MURTHY STRONGLY BELIEVED IN PUTTING INDIA ON THE GLOBAL MAP OF SOFTWARE TECHNOLOGY. HE AND HIS FRIENDS STRUGGLED HARD TO EARN WEALTH THROUGH FAIR AND HONEST MEANS AND FOUNDED INFOSYS, ONE OF THE LARGEST SOFTWARE COMPANIES IN INDIA TODAY.
आय.आय.टी.मध्ये प्रवेश मिळाला होता; परंतु ते तिथे शिकायला जाऊ शकले नव्हते, कारण त्यांच्या वडिलांकडे त्यांना ते शिक्षण देण्याइतके पैसे नव्हते. त्यांच्या सात मित्रांबरोबर नवी कंपनी सुरू करण्यासाठी त्यांनी त्यांच्या पत्नीकडून १०,०००/- रुपये उसने घेतले होते! क्षुल्लक कारणाने झालेल्या गैरसमजापायी एका साम्यवादी देशाच्या तुरुंगात त्यांना साठ तास कोंडून ठेवलं होतं! कॉम्प्युटरच्या दुनियेत प्रवेश मिळवण्यासाठी त्यांनी अहमदाबादच्या आय.आय.एम.मध्ये अत्यल्प पगारावर नोकरी पत्करली. आणि आज?... आज नारायण मूर्ती आणि त्यांच्या मित्रांची कंपनी ‘इन्फोसिस’मध्ये १,३०,००० कर्मचारी नोकरी करत आहेत आणि कंपनीचा वार्षिक नफा १,००० कोटी रुपयांपेक्षाही जास्त आहे! ह्या उज्ज्वल यशामागच्या बहुमोल जीवनाचं चित्रण ह्या पुस्तकात आहे. – आयुष्याला प्रेरणा देईल आणि मार्गदर्शन करेल, अशा ह्या पुस्तकाचं स्थान तुमच्या आयुष्यात कुठं असलं पाहिजे, ते तुम्ही ठरवायचं आहे.
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
#N. CHOKKAN# ANJANI NARAWANE# COMPUTER SERVICES# COMPUTER TECHNOLOGY# MYSOR# KOLAR# CHITALGATTA# SWAPNA# COMPUTER EXPERT# I.I.M.# SUDHA NARAYAN MURTHY# INFOSYS# BHARTIYA SOFTWARE UDYOG# MULYA #एन. चोक्कन# अंजनी नरवणे# कॉम्प्युटर सर्व्हिसेस# कॉम्प्युटर टेक्नॉलॉजी# म्हैसूर# कोलार# चिटलगट्टा# स्वप्न# कॉम्प्युटर एक्स्पर्ट# आय.आय.एम. सुधा नारायण मूर्ती# बंगळुरू# इन्फोसिस# भारतीय सॉफ्टवेअर उद्योग# मूल्य
Customer Reviews
  • Rating StarPandurangdongre Dada

    आयुष्यात कधीही किती ही मोठे संकट आले तरी ही तो घाबरत नाही त्याचा सामना करतो.

  • Rating StarDAINIK TARUN BHARAT

    प्रेरणादायी व मार्गदर्शक जीवनचरित्र... मूळ तमीळ लेखक एन. चोक्कन यांनी ‘नारायण मूर्ती : मूल्य जपणारं एक अद्वितीय आयुष्य’ हा ग्रंथ लिहिला असून त्याचा गुजराती अनुवाद अदित्य वासू यांनी केला आहे व त्याचा मराठी अनुवाद अंजनी नरवणे यांनी केला आहे. ‘नारायण मर्ती : मूल्य जपणारं एक अद्वितीय आयुष्य’ हे चरित्र मेहता पब्लिशिंग हाऊसने देखण्या मुखपृष्ठासह आकर्षक स्वरूपात प्रकाशित केले आहे. इन्फोसिस या जगप्रसिद्ध सॉफ्टवेअर कंपनीच्या संस्थापकांपैकी एक आणि देशातल्या प्रमुख उद्योगपतीपैकी एक असणाऱ्या नारायण मूर्तीच्या जीवनाची कथा अलिखित करणारं हे चरित्र! अनंत अडचणीतून मार्ग काढून एखादी व्यक्ती यशाचं शिखर कसं गाठू शकते याची प्रेरणा देणारं व मार्गदर्शन करणारं नारायण मूर्तींचं जीवनचरित्र त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे पदर सहजसुंदरतेने उलगडून दाखविते. एका गरीब ब्राह्मण कुटुंबात २० ऑगस्ट १९४६ रोजी नारायण मूर्तींचा जन्म झाला आणि हेच नारायण मूर्ती सध्या इन्फोसिस टेक्नोलॉजीज लिमिटेड या बेंगलोर स्थित जागतिक सॉफ्टवेअर सल्लागार कंपनीचे संस्थापक अध्यक्ष आहेत. द इकॉनॉमिस्ट ने २००५ मध्ये जगातील सर्वाधिक आदरणीय व्यवसायिकांत पहिल्या दहामधील एक म्हणून श्री नारायण मूर्तींची नोंद केली आहे. इतकंच नाही तर भारत सरकारकडून पद्मविभूषण, फ्रान्स सरकारकडून तर ब्रिटिश सरकारकडून सीबीई ने त्यांना सन्मानित करण्यात आलं आहे. ‘नारायण मूर्ती : मूल्य जपणारं एक अद्वितीय आयुष्य’ हे जीवनचरित्र असल्याने लेखकानं त्याचे बालपण कौटुंबिक वातावरण, आर्थिक परिस्थिती, आई-वडील यांच्याकडून त्यांच्यावर होणारे संस्कार यांचा तपशील देत, नारायण मूर्तींच्या मनाची जडण-घडण कशी झाली याचे अतिशय हृद्य शब्दांकन केले आहे. मुलाचे पाय पाळण्यात दिसतात. या म्हणीनुसार नारायण मूर्तींच्या व्यक्तिमत्त्वाचे जे विशेष त्यांच्या बालपणी प्रकट होत होते. त्यावर प्रकाशझोत लेखकाने टाकला आहे. त्यांना असलेली वाचनाची आवड व सिनेमाविषयीची अरुची तसेच त्यांचा समजुतदार स्वभाव, परिस्थितीची जाण यामागे त्या वयातही त्यांची स्वत:ची अशी वैचारिक भूमिका होती. जी उत्तरोत्तर विकसित होत गेली. खूप पैसे मिळवून चैनीचं आयुष्य जगण्यापेक्षा नीट अभ्यास करून जगाबद्दल ज्ञान मिळविणं जास्त चांगलं, गरीब असण्यात लाज वाटण्यासारखं काही नाही. या भूमिकेमुळे ते कायमच स्वाभिमानानं राहायचे. स्वार्थापेक्षा समाजाच्या कल्याणाचा विचार करावा हा विचारही आईवडिलांकडून त्यांच्या मनात रुजला आणि नंतर फोफावला. त्यांची सिम्फनी संगीताची आवड तर इतकी प्रेरक, प्रेरणादायी ठरली की सिम्फनी संगीताबद्दल समजून घेताना विचारांची वीज त्यांच्या मनात चमकली की स्वत: हुशार असून नुसतं चालत नाही तर इतरांबरोबर समन्वय करून एकजुटीनं चांगलं काम करणं जास्त महत्त्वाचं. हाच विचाराचा प्रकाश त्यांना उत्तम व्यवस्थापक बनविण्यास कारणीभूत झाला. आयुष्यातल्या अडचणींवर मात करण्याचा एकमेव उपाय म्हणजे चांगले शिक्षण! हा दृष्टिकोन उरात ठेवून वाटचाल करणाऱ्या नारायण मूर्तींच्या शैक्षणिक उंचीचा आलेख लेखकाने या ग्रंथात रेखाटला आहे, तसेच अपेक्षित शिक्षणात उंची गाठण्यासाठी त्यांनी केलेल्या प्रयत्नांचे चित्रणही केले आहे. परिस्थितीवर काबू मिळवून मला सफल झालंच पाहिजे. या दृढनिश्चयाने त्यांनी आय.आय.टी. कानपूरला एम.टेक साठी प्रवेश कसा मिळवला. आय बी एममध्ये बनवला गेलेला कंम्प्युटर बघून ते कसे अवाक झाले. आय आय एममध्ये पगार कमी असूनही ते रुजू का झाले, पाठ्यपुस्तकांतील शिक्षण व जीवनानुभव यांची सांगड घालणे कशासाठी महत्त्वाचे आहे. इ. गोष्टींवर प्रकाश टाकीत लेखकाने त्यांच्या विस्तारलेल्या ज्ञानक्षितिजांचे दर्शन घडवले आहे. नारायण मूर्तींचे व्यावसायिक अनुभव व त्याआधारे त्यांनी जीवनात महत्त्वाचे घेतलेले निर्णय यांचे चित्रण करताना लेखकाने त्यांच्या सामाजिक भानाचे, जीवनमूल्यांवरील निष्ठेचे, पैसा मिळविण्यामागील कारण व त्यांच्या उपयोगाची योग्य दिशा याविषयीचे विचार उलगडून दाखविले आहेत. त्यांच्या मते, एक सुसंस्कृत समाज ज्याला म्हणता येईल, ज्या समाजात प्रत्येक पिढीतील व्यक्ती, येणाऱ्या पिढीचं भविष्य जास्त चांगलं, आनंदाचं व्हावं म्हणून व्यक्तिगतरित्या स्वार्थत्याग करीत राहील. नोकरी सोडून स्वतंत्र कंपनी काढण्याचा त्यांचा निर्णय, सुधा मूर्तींची त्या संदर्भात झालेली मदत, कंम्प्युटर आणि सॉफ्टवेअर कंपन्यांच्या विकासाच्या दृष्टीनं असलेली सरकारची उदासीनता, परदेशात हा व्यवसाय वृद्धिंगत करण्यात येणाऱ्या अडचणी, नियम, कायदे, कंपनीच्या विकासातील अडथळे व या सर्वांवर मात करत ठामपणे उभे राहणारे व निष्ठा, प्रेम व दूरदृष्टी यांचा साक्षात्कार घडवून सीईओची आपली इमेज बाजूला करत नेता ही इमेज सहकाऱ्याच्या मनात निर्माण करत नारायण मूर्ती कसे यशस्वी झाले याचे अत्यंत मार्मिक, रोचक, प्रासादक व प्रवाही शब्दांकन मूळ लेखकाने व अनुवादिका अंजनी नरवणे यांनी केले आहे. नारायण मूर्तींच्या जीवनचरित्राचा अनुवादही अत्यंत हृद्य व सरस झाला आहे. नारायण मूर्तींच्या व्यावसायिक विकासाचा आलेख दर्शविताना शब्दशैली जितकी सरळ, स्पष्ट आहे तितकीच कौटुंबिक प्रेमाभिव्यक्तीच्या प्रसंगी ती हळुवार व भावस्पर्शी होते. प्रसंगचित्रणात ती चित्रदर्शी बनते ज्यामुळे नारायण मूर्तींच्या जीवनातील प्रसंग जिवंत व उत्कट स्वरूपात वाचक मनाला भिडतात. विशेषत: आर्थिक परिस्थितीमुळे आय. आय. टी.चं स्वप्न दूर करून दूर दूर जाणाऱ्या ट्रेनकडे बघत मित्रांना निरोप देणारे मूर्ती हा प्रसंग तसेच सुधातार्इंच्या आई वडिलांना भेटून त्यांच्या व सुधातार्इंच्या विवाहासंदर्भात बोलणारे नारायण मूर्ती इ. प्रसंग लक्षणीय ठरतात. नारायण मूर्तींचा प्रामाणिकपणा, दृढ निश्चय, ठाम निर्णय, सत्याची कास धरणारा स्वभाव, अंतर्मुखता इ. अनेक पैलूंवर प्रकाश टाकताना लेखिकेच्या भाषेत कुठेही अभिनिवेश, आग्रहीपणा यांची छटाही नाही. संकोची, सर्वांना आदराने वागविणाऱ्या, चुकूनही कठोर शब्दांचा वापर न करणाऱ्या व लोकांना कामात तडजोड न करता विकासाच्या व परफेक्शनच्या दिशेने वाटचाल करणाऱ्या नारायण मूर्तींच्या जीवनचरित्राचा अंजली नरवणे यांनी केलेला मराठी अनुवाद सहजसुंदर उतरला आहे. -डॉ. शुभदा शहा ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

FRANKLIN MALIKA COMBO SET - 29 BOOKS
FRANKLIN MALIKA COMBO SET - 29 BOOKS by PAULETTE BOURGEOIS Rating Star
रश्मी मुसळे-साळगांवकर

लहानग्यांच्या विश्वातल्या छोट्या छोट्या गमतीजमती या पुस्तकांच्या मालिकेतून अगदी मजेशीर पद्धतीने मुलांसमोर येतात..त्या गोष्टी ऐकताना, वाचताना मूलं यात अगदी रमून जातात... शिवाय आजवर ससा आणि कासव यांव्यतिरिक्त इतर कथाविश्वात काहीसा दुर्लक्षित राहिलेलया कासवाच्या जगातही अनेक गंमती घडू शकतात ही नवखी कल्पना मुलांना भारीच आवडते... ...Read more

MARATHI DAULATICHE NARI SHILP
MARATHI DAULATICHE NARI SHILP by GOPAL DESHMUKH Rating Star
लोकसत्ता २२ जानेवारी २०२३.

बाईचे विश्व हे चूल आणि मूल एवढय़ापुरतेच मर्यादित नसते याची उदाहरणे आपल्याला इतिहासातसुद्धा पाहायला मिळतात. इतिहासात डोकावून पाहिले तर स्त्रियांचे आयुष्य हजार बंधनांनी जखडलेले होते. लहान वयातच मुलींची लग्नं केली जात असत. सतीची चाल, विधवांना केशपनाची सक्ती, सती जाणाऱ्या स्त्रियांच्या मरणाइतकेच सती न जाणाऱ्या विधवांचे जगणे भयंकर होते. अशा समाजातच काही स्त्रिया अशासुद्धा होऊन गेल्या ज्यांनी आपल्या कार्याने, आपल्या धाडसाने, शौर्याने महाराष्ट्राच्या जडणघडणीत मोलाची भर टाकली. समाजाचा स्त्रीकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलण्यात ज्यांचा मोलाचा वाटा आहे अशाच काही निवडक स्त्रियांचे चरित्र रेखाटन गोपाळ देशमुख यांनी ‘मराठी दौलतीचे नारी शिल्प’ या पुस्तकात केले आहे. जिजाऊमातेने बालशिवाजींची जडणघडण केली. अशा कर्तृत्ववान जिजाबाईंचे व्यक्तिचरित्र ‘राजमाता जिजाऊ’ या प्रकरणामध्ये सारांशरूपाने रेखाटण्याचा प्रयत्न लेखकाने केला आहे. तसेच शिवरायांच्या जीवनात ज्या आठ राण्या आल्या त्यांच्या जीवनकार्याचे वर्णन ‘राणीवसा’ या प्रकरणात येते. ‘महाराणी येसूबाई’ या प्रकरणात त्यांची स्वराज्यनिष्ठा व दूरदृष्टी कशी दिसून येते याचे वर्णन केले आहे. संकटसमयी संभाजी राजांना दिलेल्या सल्ल्यामुळे त्यांच्या कार्यात मदत कशी झाली याचेही वर्णन आले आहे. ताराबाई, उमाबाई दाभाडे, झाशीची राणी लक्ष्मीबाई यांनी युद्धभूमीवर शत्रूला तोंड कसे दिले. दर्याबाई निंबाळकर, पेशवा पत्नी गोपिकाबाई, रमाबाई, गंगाबाई यांनाही व्यक्तिगत सुखदु:खाबरोबरच मराठी दौलतीच्या वाटचालीत आपली भूमिका कशी पार पाडावी लागली याचीही माहिती पुस्तकात देण्यात आली आहे. दौलतीचा कारभार करताना अहिल्याबाईंना तीस वर्षे वैयक्तिक दु:खांना सामोरे जावे लागले. या साऱ्या दु:खांना बाजूला सारून उत्कृष्ट कार्य करून त्या ‘साध्वी पुण्यश्लोक अहिल्या’ कशा झाल्या याचा थोडक्यात आढावा घेतला आहे ‘अहिल्याबाई होळकर’ या प्रकरणात. तसेच पुतळाबाई आणि रमाबाई यांचे पतिनिष्ठेचे वर्णनही वाचायला मिळते. या सर्व व्यक्तिचरित्रांपैकी ‘राणी लक्ष्मीबाई’ यांचे चरित्र वाचताना त्यांची धाडसी वृत्ती, चिकाटी, येईल त्या प्रसंगाला न घाबरता शौर्याने सामोरे जाण्याची वृत्ती व शेवटी त्यांचा झालेला शोकात्मक शेवट आपल्या मनाला चटका लावून गेल्याशिवाय राहात नाही. वयाच्या चौदाव्या वर्षी गंगाधरराव यांच्याशी विवाह झाल्यानंतर आपल्या मुलाच्या आणि पतीच्या निधनानंतर शोक करत न बसता ही वीरांगना आपला दत्तक मुलगा दामोदर याला घेऊन ब्रिटिशांच्या कटू कारस्थानांना तोंड देण्यास सज्ज झाली होती. यातच तिला वीरमरण आले. हे वीरमरण येतानासुद्धा ती मोठय़ा शौर्याने अखेरच्या क्षणापर्यंत लढली आणि जेव्हा आपला देह आपल्याला साथ देत नाही हे लक्षात आले तेव्हा तिने आपल्या अनुयायांना आपला देह शत्रूच्या हातात पडता कामा नये, त्याला अग्नी द्या, असे सांगितले. अशा या वीरांगनेची गर्जना ‘मै मेरी झांसी नही दूंगी’ ही आजही अनेक स्त्रियांना आपल्या कामात प्रेरणा देणारी अशी आहे. राणी लक्ष्मीबाईच्या मरणाविषयी अनेक हकीकती उपलब्ध आहेत. त्यांचा उल्लेखही या पुस्तकात आला आहे. या पुस्तकातील स्त्रिया इतिहासकालीन असल्याने काही ठिकाणी ऐतिहासिक संदर्भाची पुनरावृत्ती झाल्यासारखे वाटते; पण ते येणेसुद्धा गरजेचे आहे. साध्या सोप्या भाषेत ही स्त्री चरित्रे आपल्याला वाचायला मिळतात. थोडक्यात असे म्हणता येईल की, इतिहासकाळातील थोर महिला विभूतींच्या जीवनकार्याचा अल्पांशाने सार वाचकांपुढे मांडण्याचा प्रयत्न लेखक गोपाळ देशमुख यांनी केला आहे, तो कौतुकास्पद आहे. ...Read more